घरातले काम ही दोघांची जबाबदारी

* प्रतिनिधी

नेहमी बायकांची एक तक्रार असते की त्यांचे नवरे त्यांना घरातल्या कामांमध्ये मदत करत नाहीत. ठराविक मर्यादेपर्यंत त्यांची ही तक्रार योग्यही आहे. कारण लग्नानंतर बहुतांश नवरे घरच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या तर योग्य रीतीने पार पाडताना दिसून येतात, पण जेव्हा गोष्ट स्वयंपाकघरात बायकोला मदत करण्याची असते किंवा मग घरातल्या साफसफाईची असते, तेव्हा बहुतेक नवरे  काही ना काही बहाणा करून ते काम टाळण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. म्हणायला तर पती आणि पत्नी संसार रथाची दोन चाके आहेत असे म्हटले जाते, पण जर फक्त एकाच चाकावर भार पडत असेल तर संसाराचा गाडा डगमगू लागणे स्वाभाविकच आहे.

नेहमी बायका आपल्या घरातील कामांमध्ये एवढया व्यस्त असतात की त्यांना स्वत:साठी वेळ देणेही शक्य होत नाही. अशात जर त्यांना घरातल्या कामांत पतिची मदत मिळाली तर त्यांचा भार कमी होतोच शिवाय पती पत्नीच्या नात्यातील गोडवाही वाढतो.

अशी वाटून घ्या कामे

घरातल्या कामांना तुच्छ समजणे सोडून काही कामांची जबाबदारी जर पतिने स्वत:वर घेतली तर घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. अशी अनेक कामे आहेत, जी पती आणि पत्नी वाटून घेऊ शकतात :

* किचनला लव्ह स्पॉट बनवा. बऱ्याचदा नवरे किचनमध्ये जाण्याच्या कल्पनेनेही कचरतात. पण इथे तुम्ही पत्नीसह जेवण बनवताना प्रेमाच्या एका नव्या स्वादाचाही आस्वाद घेऊ शकता. भाजी कापणे, जेवण डायनिंग टेबलवर मांडणे, पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवणे, सॅलड बनवणे अशी कामे करून तुम्ही तुमच्या पत्नीला मदत करू शकता. विश्वास ठेवा तुमच्या या छोटया छोटया कामांमुळे तुमची पत्नी मनापासून तुमची प्रशंसा करेल.

* कधीतरी सकाळी पत्नी उठण्याआधी स्वत: उठून तिच्यासाठी मस्त चहा बनवून तर पहा. तुमचा हा छोटासा प्रयत्न तिला दिवसभर आनंदी ठेवेल यात शंकाच नाही. जर पत्नीची तब्येत ठीक नसेल तर हलकाफुलका नाश्ता बनवून तिला आराम देऊ शकता.

* जर पतिने किचनमध्ये काही बनवण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना टोकू नका. किचन व्यवस्थित ठेवा. किचनमधील सर्व डब्यांना लेबल्स लावून ठेवा म्हणजे तुमचे पती प्रत्येक गोष्टीसाठी सारखेसारखे तुम्हाला विचारत राहणार नाहीत.

* जर तुमची तुमच्या पत्नीविषयी अशी तक्रार असेल की ती दिवसभर बाथरूममध्ये कपडेच धुवत बसते आणि तुम्हाला जराही वेळ देत नाही तर त्याचा सर्व दोष पत्नीला देऊ नका. सुट्टीच्या दिवशी या कामात तुम्ही तिला मदत करू शकता. कपडे ड्रायरमध्ये सुकवून ते वाळत घाला.

* बहुतेक घरांमध्ये आठवडयाची भाजी एकदाच आणून फ्रीजमध्ये ठेवली जाते. टीव्हीवर आपला फेव्हरेट शो किंवा क्रिकेट मॅच पाहण्यात रममाण झालेल्या  तुमच्या पतिराजांकडे तुम्ही मटार सोलायला देऊ शकता किंवा भाज्याही निवडायला देऊ शकता.

* तुमच्या घरातील गार्डनमधील रोपांना पाणी घालण्याचे कामही तुम्ही पतीला करायला सांगू शकता

* घरात एखादा पाळीव प्राणी असल्यास त्याला फिरायला घेऊन जाण्याची जबाबदारी दोघांनी आलटून पालटून घ्यावी.

* मुलांचा अभ्यास घेताना काही विषय तुम्ही शिकवा तर काही विषय तुमच्या पतिवर सोपवा.

* जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतिने तुम्हाला घरातल्या कामांत मदत करावी तर त्यांना प्रेमाने आणि विनम्रतेने सांगा..

थोडे पेशन्स ठेवा, हळूहळू का होईना पण एकदा का तुमचे पती तुम्हाला मदत करू लागले की त्यांनाही जाणीव होईल की तुम्ही दिवसभर किती राबत असता. पती असो किंवा पत्नी घर दोघांचं आहे त्यामुळे घरातील जबाबदारीही दोघांनी वाटून घ्यावी. मगच संसाराची गाडी छान पैकी धावू लागेल.

नात्याचे नाव बदलणे गरजेचे आहे

* मधु शर्मा कटिहा

गुरूग्राममध्ये राहणाऱ्या रंजनाच्या मुलाचे लग्न होते. नवरी मुलीला निरोप देताना तिला मिठी मारत आईने सांगितले, ‘‘आता एका आईशी नाते तोडून तू दुसऱ्या आईला आपलेसे करणार आहेस. आजपासून रंजनाजी याच तुझ्या आई आहेत. आता तू त्यांची मुलगी आहेस.’’

रंजनाने ताबडतोब त्यांना थांबवत म्हटले, ‘‘नाही, मी तुमच्याकडून आईचा हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. हीची आई तुम्हीच असाल. आतापर्यंत मला मुलीचे प्रेम मिळतच आहे, आता सुनेचेही प्रेम मिळायला हवे. आईसोबतच आता मला सासू म्हणवून घ्यायलाही आवडेल. सासू-सुनेचे सुंदर नाते अनुभवण्याची वेळ आली आहे. मी या सुखापासून वंचित का राहू?’’

प्रश्न असा आहे की या नात्याचे नाव बदलण्याची किंवा इतर कोणत्याही नात्याशी तुलना करण्याची गरजच काय? सासू हा शब्द इतका भयंकर का झाला की तो केवळ उच्चारताच डोळयासमोर प्रेमळ स्त्रीच्या जागी एक क्रुर, खाष्ट, अर्ध्या वयाच्या बाईचे चित्र उभे राहते. सून हा शब्द इतका परका का झाला की त्यात आपलेपणा येण्यासाठी त्यावर मुलगी नावाचे आवरण चढवावे लागते. कारण स्पष्ट आहे की काही नात्यांनी त्यांच्या नावांचा अर्थ गमावला आहे.

अहंकार आणि स्वार्थाच्या दलदलीत रुतल्याने एकमेकांप्रतिचे वागणे इतके रुक्ष झाले आहे की नात्यातील केवळ एकच बाजू समोर येत आहे. त्या नात्याचे सुखद पैलू शोधण्यासाठी दुसऱ्या नात्याच्या नावाचा आधार घ्यावा लागत आहे. पण केवळ नाव बदलल्याने नातेसंबंध उज्ज्वल होऊ शकत नाही. यासाठी वागणूक आणि विचारातील परिवर्तन आवश्यक आहे.

का बदनाम आहे सासू-सुनेतील नाते

परस्पर मतभेदांमुळे सासू-सुनेचे नाते बदनाम आहे. त्याला सुंदर रूप देण्यासाठी, ते काळाबरोबर बदलले पाहिजे हे समजून घ्यायला हवे. सध्या बहुतांश सुना नोकरी करतात आणि सासूदेखील पूर्वीसारख्या घरातच राहणाऱ्या नाहीत. आता या नात्यात माय-लेकीच्या प्रेमाव्यतिरिक्त परस्पर सामंजस्य आणि मैत्रीची गरज भासू लागली आहे. जर काही गोष्टी लक्षात घेऊन त्या एकमेकींशी चांगले वागल्या तर या नात्याचे नाव बदलण्याची गरजच भासणार नाही.

सासू हा शब्द खटकतो का

‘सासू’ हा शब्द सर्वांचा आवडता व्हावा आणि सासू-सुनेचे नाते प्रेम भावनेतून फुललेले मधुर नाते म्हणून ओळखले जावे यासाठी सासूने खालील काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे :

* सुनेवर मनापासून प्रेम करण्यासोबतच तिच्यात आपली मैत्रीण पाहाण्याचा प्रयत्न करावा.

* एक स्त्री या नात्याने सुनेच्या भावना चांगल्याप्रकारे समजून घ्याव्यात.

* बुरसटलेल्या प्रथा बाजूला सारत जुनाट प्रथापरंपरा आणि व्रतवैकल्यांचे ओझे तिच्यावर लादू नये.

* वर्तमानात कपडयांचे वर्गीकरण विवाहित किंवा अविवाहित असे होत नाही. त्यामुळे ड्रेसबाबत तिच्यावर असे कोणतेही नियम लादणे टाळावे.

* घरातील सुनेकडे मशीन म्हणून न पाहाता संवेदनांनी परिपूर्ण व्यक्ती म्हणून पाहायला हवे.

* हे खरे आहे की प्रत्येक व्यक्तिचे स्वत:चे वेगळे विचार असतात. कोणत्याही विषयावर मतभेद असतील तर सासूने टोमणे मारण्यापेक्षा प्रेमाने आपले म्हणणे सांगावे आणि सुनेचे विचार ऐकून ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे संघर्षाला जागाच उरणार नाही.

* सुनेपासून काहीही न लपवता तिला कुटुंबातील एक घटक समजून सर्व गोष्टी सांगाव्यात.

* सुनेसोबत अधूनमधून फिरायला जाणे हे नात्यातील प्रेम वाढवण्यास मदत करेल.

सून शब्द नावडता का आहे

एकदा सून बनल्यावर मुलीचे जग बदलते. तिच्याकडे कर्तव्यांची मोठीशी यादी दिली जाते. नवीन वातावरणात रुळण्याचे आव्हान स्वीकारत तिला नात्यांमध्ये नवे रंग भरायचे असतात. सून शब्द नावडता वाटू नये म्हणून तिलाही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात  :

* सासरच्यांप्रती मनात आपुलकी ठेवूनच सासरी प्रवेश करा.

* तेथील वातावरणाशी लवकरच जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीत सासरची तुलना माहेराशी केली तर पदरी निराशा येईल.

* आजकाल सुशिक्षित मुली परिस्थिती समजून घेत संसारासंबंधीचे निर्णय स्वत: घेऊ इच्छितात. पण एखाद्या बाबतीत निर्णय घेताना सासू-सुनेत मतभेद  झाल्यास सून या नात्याने काही आपले तेच खरे करून तर काही सासूने सांगितलेले मान्य करून मधला मार्ग काढावा.

* आपल्या पतिचे कुटुंबातील इतर व्यक्तींशीही नाते आहे आणि त्यांच्याप्रती त्याची काही कर्तव्ये आहेत, हे सत्य विसरू नका. अर्थात ‘माझा नवरा फक्त माझा आहे,’ या विचाराचा त्याग करून ईर्षेपासून दूर राहा.

* सोशल मिडियाच्या या युगात सून मोबाइल किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तिचे नातेवाईक, मित्रपरिवाराच्या संपर्कात असते. पण तिने सासरची प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नये. छोटया-मोठया समस्या ताणून धरण्यापेक्षा त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नात्यांमध्ये असा आणा गोडवा

नणंद, मोठी भावजय आणि छोटी भावजय इत्यादी नात्यांची तुलना बहिणीशी केली जाते. पण केवळ बहीण म्हटले म्हणून त्या नात्यात गोडवा येत नाही. ही नाती निभावून नेण्यासाठी संयमाने वागणे आवश्यक आहे. एकमेकींच्या चुकांकडे दुर्लक्ष करून आपल्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात गोडवा आणता येईल. शिवाय या नात्यांना मैत्रीच्या भावनेची फोडणी दिल्यास त्यातील गोडवा अधिकच वाढेल.

खऱ्या नावाचा सुगंध दरवळू द्या

रक्ताची नाती आणि स्वत: निर्माण केलेली नाती यापैकी कोणते नाते हृदयाजवळ असेल, हे त्या व्यक्तिच्या वागणुकीवर अवलंबून असते. आजकाल तणाव तर आई, मुलगी आणि बहिणींमध्येही पाहायला मिळतो. अशावेळी या नात्यांशी तुलना करून कुठलेही संबंध चांगले असल्याचे भासवणे हे आता अतार्किक वाटू लागले आहे. म्हणूनच एखाद्या नात्याला त्याच्या खऱ्या नावानिशी स्वीकारण्यात काय गैर आहे. सद्भावना आणि प्रेमाची शिंपडण केलेले कुठलेही नाते फुलाप्रमाणेच सौंदर्य आणि सुगंधाने परिपूर्ण होईल. याउलट फक्त नाव बदलल्यास ते सुगंध आणि कोमलता नसलेल्या कृत्रिम फुलासारखे होईल.

उजळवा इतरांच्या जीवनात दीप

* गरिमा पंकज

दिवाळीत घरोघरी दिवे लावले जातात. नातलगांना विविध प्रकारची मिठाई भेट दिली जाते. पण तुम्ही कधी दुसऱ्यांच्या घरातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे? दिवाळीच्या दिवशी असे करून जो आनंद मिळतो त्याचाही अनुभव घेऊन पाहा.

मिळून साजरी करा दिवाळी

सद्यस्थितीत कितीतरी लोक महानगराच्या गर्दीतही एकटे, एकाकी राहतात. दिवाळीत त्यांच्यासोबत आनंद साजरा करणारे कुणीच नसते. कुठे वृद्ध आईवडील एकटे राहतात तर कुठे तरुण मुले-मुली शिक्षण किंवा नोकरीनिमित्त घरापासून दूर एकटे राहतात. काही असेही असतात, जे लग्न न केल्यामुळे एकटे राहतात तर कुणी जोडीदाराच्या मृत्यूमुळे एकटे पडतात.

तसे तर प्रत्येक सोसायटी, ऑफिस किंवा इन्स्टिट्यूटमध्ये दिवाळीचा आनंद दिवाळीच्या एक दिवस आधीच साजरा केला जातो. पण महत्त्वाचे क्षण ते असतात, जेव्हा कुणी दिवाळीच्या संध्याकाळी आपल्या घरात एकाकी असतो. त्यावेळी त्याच्यासोबत इतर कुणी दिवाळी साजरी करणारा नसतो.

अशावेळी आपली जबाबदारी असते की आपण अशा एकाकी लोकांच्या जीवनात आनंदाचा दीप उजळवण्याचा प्रयत्न करायचा. तसेही सध्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या अभावामुळे लोक एकटेच आपल्या छोटयाशा कुटुंबासह दिवाळी साजरी करतात. अशावेळी दोन-तीन कुटुंबातील लोक सण साजरा करण्यासाठी एकत्र आले तर निश्चितच दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.

तुम्ही तुमच्या आजूबाजूला एकटया राहणाऱ्या वृद्धांना किंवा तरुणांना आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. त्यांच्यासह मिळून दिवे लावा. फटाके वाजवा आणि एकमेकांना मिठाई भरवा.

कुणाच्या घरी दिवाळी साजरी करायला येणाऱ्यानेही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ज्याने तुम्हाला आमंत्रण दिले आहे त्याच्या कुटुंबासाठी मिठाई, फटाके घेऊन जा. त्याचे घर सजवालया मदत करा. त्याच्या मुलांना आपल्या घरी घेऊन या, जेणेकरून दिवाळीची मजा आणि रंगत तुम्ही तुमच्या घरातही अनुभवू शकाल.

वृद्धांसोबत मजा

पत्रकार प्रियाने सांगितले ‘‘जेव्हा मी नोकरीसाठी पहिल्यांदाच दिल्लीत आले होते तेव्हा ३ वर्षं एनडीएमसीच्या एका हॉस्टेलमध्ये राहत होते. तेथेच बाजूला एनडीएमसीचा वृद्धाश्रम होता जिथे वृद्ध, एकाकी महिला राहत होत्या. मी अनेकदा त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचे, त्यांच्यासोबत टीव्ही पाहायचे, खाण्यापिण्याचे पदार्थ शेअर करायचे. अनेक वृद्ध महिलांशी माझे जिव्हाळयाचे नाते निर्माण झाले होते. गेल्या दिवाळीत मी माझे घर सजवत होते., तेव्हा अचानक त्या वृद्ध महिलांची आठवण झाली. मग काय, मी सजावटीचे काही सामान, फटाके आणि मिठाई घेऊन तेथे पोहोचली. मला पाहाताच त्यांचा उदास चेहरा आनंदाने फुलला. वृद्धाश्रमाचा बाहेरील भाग मी खूप चांगल्याप्रकारे सजवला. त्यांना मिठाई भरवली. त्यांच्यासोबत फटाके वाजवले. खरंच खूप मजा आली.

एक वृद्ध महिला जिची मी खास होते, ती माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेली. माझ्या आवडीचा खूपच छान ड्रेस तिने मला दिला.

मी तिथे केवळ दोनच तास होते पण तरीही ती दिवाळी माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी ठरली.

आप्तजनांना गमावलेल्यांच्या जीवनात आशेचे दीप उजळवा

आपल्या ओळखीचे, शेजारी, नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे असे कुटुंब, जिथे नुकतीच एखादी दु:खद घटना, मृत्यू, पोलीस केस, हत्या किंवा कुटुंबात फूट पडली असेल तर दिवाळीत अशा कुटुंबाला नक्की भेट द्या. कुटुंबातील लोकांच्या मनात आशेचे दीप उजळवा आणि सांगा की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहाल.

अनोळखी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणा

तुमच्या ऑफिसमधील सहकारी, क्लाइंट, नातलग आणि अन्य ओळखीचे या दिवसांत मिठाई नक्कीच देतात. गरजेपेक्षा जास्त मिठाई आल्यास ती पॅक करून गरजूंना वाटा. यामुळे त्यांचा चेहरा आंनदी होईल आणि तो पाहून नक्कीच तुम्हीही आनंदित व्हाल.

स्वयंसेवक बना

दररोज कितीतर लोक दिवाळीच्या रात्री दुर्घटनेचे शिकार होतात. फटाक्यांमुळे भाजतात. ही वेळ अशी असते, जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखणे खूपच कठीण असते. अशावेळी स्वयंसेवक बनून जळालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आलात तर तुमची ही मदत पीडित व्यक्तिच्या घरात नवा प्रकाश पसरवण्याइतकीच सुखावह ठरेल.

दिवाळीत कर्तव्य बजावणाऱ्या लोकांना प्रोत्साहन

कितीतरी लोकांचे काम असे असते, ज्यांना दिवाळीतही सुट्टी मिळत नाही, जसे की वॉचमेन, पोलीस इत्यादी. ते तुमच्या सुरक्षेसाठी अव्याहत कार्यरत असतात. याची तुम्हालाही जाणीव आहे हे सांगून त्यांना चॉकलेट, भेटकार्डसारख्या वस्तूंसह दिवाळीच्या शुभेच्छा द्या. तुमचा हा प्रयत्न आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य त्यांच्याही चेहऱ्यावर आंनद घेऊन येईल.

गरजेच्या वस्तू इतरांना द्या

दिवाळीत घराची साफसफाई करताना अनेकदा आपण नको असलेल्या बऱ्याच वस्तू फेकून देतो. त्या फेकण्याऐवजी त्यांना द्या, ज्यांना याची गरज आहे. ४५ वर्षीय शिक्षिका दीपान्विता यांनी सांगितले, ‘‘आमची कामवाली जवळपास १५ वर्षांपासून आमच्याकडे काम करते.  दरवर्षी मी दिवाळीत घराची साफसफाई करते, तेव्हा बऱ्याच अशा वस्तू सापडतात, ज्या भलेही माझ्यासाठी जुन्या किंवा निरुपयोगी असतात, पण तिच्या उपयोगी येऊ शकतात. त्यामुळे अशा वस्तू गोळा करून तिला देते.’’

यातील एखादी तरी गोष्ट आचरणात आणल्यास हा सण तुमच्यासाठी संस्मरणीय ठरेल.

रुसला साजण रुसवा काढेल सण…

* प्रतिनिधी

‘‘रूठे रुठे पिया मनाऊ कैसे’ नाराज पतीराजांकडे एक प्रेमभरा कटाक्ष टाका आणि प्रेमाने त्यांना आपल्या बाहुपाशात येण्याचं निमंत्रण द्या. मग पहा मनातल्या निरगाठी कशा उकलतात ते. प्रेमाने आसुसून त्यांनी बाहुपाशात घेतलं की सुरुवातीच्या रोमॅण्टिक दिवसांतल्या मधुर क्षणांच्या आठवणी ताज्यातवान्या होतील. या विचारात हरवून गेलेली सजणी रुसलेल्या प्रियतमाचा रुसवा काढण्यासाठी काही ना काही अल्लड आणि खट्याळ खोड्या करण्यात गुंतून जाते.

तसं तर रुसणं हा तर स्त्रियांचा स्वभावधर्म. पण पतीराज नाराज झाले तर त्यांचा रुसवा काढायचं कसब तिच्याकडे नक्कीच आहे. निसर्गाने स्त्रिला अनेक कौशल्य प्रदान केली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे त्या प्रेमाने आणि आपलेपणाने सर्वांचं मन जिंकून घेतात. याच कौशल्यामुळे त्यांचे वैवाहिक संबंधही मधुर बनतात. पण पतीराजांची नाराजी जास्तच वाढलेली असेल तर त्यांचा रुसवा काढण्याच्या सर्व युक्त्या असफल होतात. अशा वेळी सणासुदीच्याप्रसंगी एकमेकांना बांधून ठेवणाऱ्या प्रेमाची जाणीव पतीराजाना करून द्या. मग पहा, ते आपणहून तुमच्या जवळ कसे येतात ते.

रम्य सकाळ तुमच्यासाठी

सकाळी डोळे उघडण्यापूर्वी तुमचा प्रेमळ स्पर्श आणि मग तुमच्या नुकत्याच न्हायलेल्या केसांतून पाण्याचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर पडणं आणि डोळे उघडत असतानाच कपाळावर उमटलेली तुमच्या प्रेमाची मोहर या सर्वांमुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी प्रसन्न होते ते पहा. सणासुदीच्या उत्साहाने आणि उल्हासाने त्यांचं मन आनंदाने भरून जाईल.

ते बेडवरून उठताक्षणी अशा नखऱ्याने त्यांना गुलाबाचं फूल द्या जणू काही एखादी प्रेमिका पहिल्यांदाच आपलं प्रेम व्यक्त करत आहे. अशा प्रकारे सकाळी लवकर त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या. शयनगृहाच्या भिंतीवर लावलेल्या रंगीत कागदावर मोठ्या अक्षरात काही प्रेमळ ओळी लिहा. जसं की, ‘दिवाळीच्या पहिल्या शुभकामना माझ्या प्रिय पतीराजाना किंवा ‘सणासुदीच्या या रम्य सकाळी माझ्या प्रियतमाला मन:पूर्वक शुभेच्छा.’ तुमच्या या प्रेमळ शब्दांमुळे त्यांना जाणीव होईल की, त्यांच्या मनात सर्वप्रथम स्थान त्यांच्या पतीराजांना आहे, त्यानंतर अन्य नात्यांना.

उत्सवाची शोभा

दिवाळीच्या दिवशी सकाळी दारासमोर काढलेल्या रांगोळीत प्रेमाचे रंग अशा प्रकारे भरा की, तुमच्या प्रियतमाला रांगोळी पाहताक्षणी त्याची जाणीव होईल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि दिवाणखान्याच्या मध्यावर सुंदर नक्षीकामाची रांगोळी काढा. बेडरूममध्येही प्रेमाचा संकेत देणारी दोन पक्ष्यांची जोडी किंवा दोन एकत्र जोडलेल्या हृदयाच्या आकाराची रांगोळी काढा. एकाबाजूला तुमचं नाव लिहा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं. तेव्हा ते तुमची कलाकुसर पाहतील. तुमची कल्पना पाहतील तेव्हा तुमचं कौतुक केल्यावाचून ते राहूच शकणार नाहीत.

सणासुदीचं मिष्टान्न बनवताना त्यांच्या आवडीनिवडीची संपूर्ण काळजी घ्या. नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत तऱ्हतऱ्हेचे असे पदार्थ बनवा की, पाहूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि त्यांचा मनमोरही थुईथुई नाचू लागेल.

उत्सवाचा आनंद तुमच्याचमुळे तुम्ही स्वत: त्यांच्या आणि त्यांना तुमच्या प्रत्येक सुखदु:खात सामील करण्याचं वचन द्या. आपला प्रत्येक आनंद पतीसोबत वाटून  घेण्याचा तुमचा निर्णय तुमच्या प्रत्येक कामातून आणि लहानमोठ्या निर्णयातून दिसून यायला हवा.

सणासुदीच्या काळात सर्व कुटुंबियांनी जर एकत्र बाहेर जायचा कार्यक्रम बनवला असेल आणि त्यांनी यायला नकार दिला तर तुम्हीही इतर कुटुंबियांसोबत न जाता त्यांच्यासोबत थांबा. साहजिकच ते विचार करायला विवश होतील की तुमचा आनंद त्यांच्याशिवाय अर्थहीन आहे.

जर यावेळी पतीराजांनी सणासाठी खास बजेट बनवलं असेल आणि मर्यादित रक्कमच खर्च करायची ठरवलं असेल तर फालतू खर्च न करता त्यांपेक्षाही कमी पैशात सण साजरा करून दाखवा.

जर दिवाळीनिमित्त घरात पूर्वनियोजित मेजवानी ठरली असेल आणि जर अचानक एखाद्या महत्वाच्या कामासाठी त्यांना मोठी रक्कम खर्च करावी लागली असेल तर घराचा मानमरातब जपण्यासाठी तुम्ही तुमच्या बचतीपैकी काही रक्कम आपल्या पतीला दया. यामुळे त्यांना अंधाऱ्या रात्री दीप उजळल्याचा भास होईल. सासुसासऱ्यांचा मानसन्मान आणि कुटुंबियांसोबत योग्य ताळमेळ राखत आपलेपणाने घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळा आणि उत्सवाचंही उत्तम नियोजन करा. मग तेही मनातल्या मनात आपल्या पत्नीचं कौतुक करून भांडणाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतील.

चमचमती संध्याकाळ तुमच्याच नावे

तसं तर तुमची प्रत्येकच संध्याकाळ पतीराजांच्या सानिध्यातच असते. तुमच्या केवळ अस्तित्वामुळे त्यांचा दिवसभराचा त्रास आणि ताणतणाव दूर पळतो आणि त्यांना आराम वाटतो.

परंतु दिवाळीच्या संध्याकाळी जर ते उत्सवाच्या आनंदापासून दूर आपल्या खोलीत बसून राहिले असतील, ऑफिसच्या कामात, पुस्तक वाचण्यात किंवा टीव्ही पाहण्यात मग्न असतील. तर तुमच्या नखऱ्यांनी त्यांना असं काही घायाळ करा की ते आपोआपच तुमच्याकडे ओढले जातील.

दिवाळीचं आनंदी वातावरण, दिव्यांचा झगमगाट आणि फटाक्यांची आतषबाजी यासर्वांमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही त्यांची मनपसंत साडी नेसा, ज्यांमध्ये तुम्ही सर्वात सुंदर दिसता.

तयार होताना त्यांना तुमच्या केसात फुलं माळायला सांगा आणि ते जवळ येताच त्यांच्या कपड्यावर अत्तर शिंपडून फुलांचा वर्षाव करा. मग पहा, तुमच्या या प्रेमळ नखऱ्याने ते कसे घायाळ होतात ते. त्यांच्या आवडीच्या साडीमध्ये उजळलेलं तुमचं रूप पहायला ते उत्सुक होतील.

दिव्यांच्या झगमगाटात नववधूसारख्या सजलेल्या संध्याकाळी रात्र होता होता तुमच्या नजरेने काही बोलत बेडरूमध्ये एकांतात म्युझिक सिस्टिमवर एखादं रोमॅण्टिक गाणं लावा. मग सगळा रुसवा, नाराजी विसरून तेही तुम्हाला आपल्या बाहुपाशात घेतील.

उपाय स्वीकारून नाती अधिक दृढ करा

* अनुराधा गुप्ता

नात्यांना अधिक दृढ करण्यासाठी काही असे उपाय करा जे तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये गोडवा भरून ते अधिक सुखद करतील.

कौटुंबिक नाती

सर्वप्रथम आपण कौटुंबिक नात्यांबद्दल बोलूया जी आपल्याला वारसाने मिळतात आणि जी एखाद्या संपत्तीपेक्षा अधिक असतात. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा काही 10 पद्धती सांगतो ज्यामुळे तुम्ही तुमची कौटुंबिक नाती अधिक दृढ करू शकाल :

1) प्रपंच सोडा : प्रपंच खूपच खमंग शब्द आहे. लोक याचा मिटक्या मारत वापर करत असतात. उदाहरणार्थ. सुनेच्या भावाने आंतरजातीय लग्न केलं. मग काय सुनेला लोकांना उत्तर देणं कठीण होऊन बसतं. सासूबाई तर त्यांच्या संस्काराची उदाहरणं देऊन देऊन सुनेच्या माहेरच्या लोकांना नावे ठेवण्यात गर्क झाल्या.

अहो, ही गोष्ट एवढा इश्यू बनविण्याची मूळात गरजेचं काय? आंतरजातीय लग्न कोणता गुन्हा तर नाहीए ना. हा, एक आहे तो म्हणजे तुमच्या समाजातील लोक ही गोष्ट पचवू शकत नाहीत. परंतु सून तर तुमच्याच घरची आहे. तिच्या सुखदु:खात सहभागी होणं तुमचं कर्तव्य आहे, जे तुम्ही प्रपंचाच्या नादात उडवत आहात. तुम्हाला काय वाटलं की प्रपंच केल्याने तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत मोठं बनता आणि समोरच्याला दुसऱ्यांच्या नजरेतून कमी करता. तसं नाहीए उलट यामुळे तुमचीच पत कमी होते. तुमच्याच कुटुंबाची खिल्ली उडते, ज्यामध्ये तुमचादेखील समावेश होतो.

म्हणूनच या रोगापासून स्वत:ला कसे मुक्त कराल आणि दुसऱ्यांना कोणता सल्ला द्याल हे नक्की ठरवा.

2) तुमचं कर्तव्य समजून घ्या : कर्तव्याचा अर्थ केवळ आईवडिलांची सेवा करणं एवढंच नाहीए, उलट तुमच्या मुलांबद्दलदेखील तुमची काही कर्तव्य असतात. अलीकडचे आईवडील आधुनिकतेच्या चादरीने लपेटलेले आहेत. मुलांना जन्म देणं आणि त्यांना सुखसुविधा देण्यातच ते आपली जबाबदारी मानतात. परंतु यापेक्षादेखील ते स्वत:;चा वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व देतात. अशावेळी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही एक आदर्श आईबाबा नाही आहात. परंतु या वर्षात तुम्हीदेखील आदर्श होण्याचा किताब मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला तुमची कर्तव्य अधिक योग्यतेने अमलात आणायला हवीत.

3) खोट्याचा आधार घेऊ नका : अनेकदा पाहाण्यात आलंय की आपल्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी, स्वत:चा बडेजाव मिरवण्यासाठी वा आपली चूक लपविण्यासाठी लोक खोट्याचा आधार घेतात. एकत्रित कुटुंबपद्धतीत या गोष्टी अधिक पाहायला मिळतात. कारण एकमेकांमध्ये स्वत:ला अधिक योग्य सिद्ध करण्याच्या नादात लोकांकडून चुकादेखील होतात. परंतु हे नकारात्मक पद्धतीने घेण्याऐवजी सकारात्मक रीतीने घ्यायला हवं. जेव्हा तुम्ही अशी विचारसरणी ठेवाल तेव्हा खोटं बोलण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. यावर्षी विचारात सकारात्मकता आणा. यामुळे कौटुंबिक नात्यांसोबत तुमचं व्यक्तिमत्त्वदेखील उजळून निघेल.

4) आर्थिक वितुष्टापासून दूर राहा : आधुनिकतेच्या काळात लोकांनी नात्यांनादेखील पैशाच्या तराजूतून तोलायला सुरुवात केलीय. नात्यांमध्ये अनेकदा एखाद्या समारंभाच्या नावाखाली पैसा उधळण्याची प्रथा आहे. लग्नासारख्या समारंभाचंच घ्या ना. इथे शगुन म्हणून पाकीट देण्याची आणि घेण्याची प्रथा आहे. या पाकिटांमध्ये पैसे ठेवून नातेवाइकांना दिले जातात. जो जेवढे पैसे देतो त्यालादेखील तेवढेच पैसे परत देऊन व्यवहार पूर्ण केला जातो. परंतु जी नाती पैशांच्या आधारावर बनतात वा बिघडतात त्यांचा काहीच फायदा नसतो. यावर्षी ठरवा की नात्यांमधील आर्थिक गोष्टीवरून निर्माण होणाऱ्या वितुष्टांपासून दूर राहायचं, तरच नात्यांना भावनांनी जुळवू शकाल.

5) अभिव्यक्तीस्वातंत्र्य : अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा उल्लेख आपल्या देशाच्या घटनेतदेखील केला गेलाय. परंतु कुटुंबाच्या घटनेत हा हक्क थोड्याच लोकांना दिलेला आहे, जो खूपच चुकीचा आहे. आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क प्रत्येकाला द्यायला हवा. अनेकदा आपण समोरच्यांचं म्हणणंच ऐकून घेत नाही. वा त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. मुळातील साधेपणामुळे ती व्यक्ती दबलीदेखील जाते. परंतु यामुळे नुकसान तुमचंच होतं. कारण तो तुम्हाला योग्य सल्लादेखील देत असतो, परंतु तुम्ही त्याचं ऐकत नाही आणि स्वत:चंच म्हणणं खरं करत राहाता. अशामध्ये खरं आणि खोट्यातील अंतर तुम्ही कधीच समजू शकणार नाहीत. म्हणूनच यावर्षांपासून ठरवा की घरात स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा मोठं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जाईल.

सामाजिक नाती : समतोल आणि सुखद आयुष्य जगण्यासाठी कौटुंबिक नात्यांबरोबरच सामाजिक नातीदेखील दृढ बनविणं गरजेचं आहे. चला तर मग आम्ही सांगतो तुम्हाला सामाजिक नाती योग्य बनविण्याच्या ५ पद्धती :

6) ईगोचा त्याग करा : ईगो खूपच लहान परंतु खूपच खतरनाक शब्द आहे. ईगो माणसांवर तेव्हा हावी होतो जेव्हा तो स्वत:च्यापुढे समोरच्याला तुच्छ समजतो, त्याला दु:ख देऊ पाहातो वा त्याचा आत्मविश्वास डळमळीत करू पाहातो. अनेकदा कार्यालयात काम करणाऱ्या साथीदारांमध्ये ईगोची भिंत उभारलेली असते. अशा परिस्थितीत अनेकदा ते अशी पावलं उचलतात ज्यामुळे ते त्यांची प्रतिमा मलिन करतात वा ते समोरच्यांचं बरंचसं नुकसान करण्यात यशस्वी होतात. परंतु ईगो तुम्हाला मोठेपणा देऊ शकतो का? कदाचित नाही. तो तुमच्याकडून नेहमी वाईट काम करवून घेतो. तुम्हाला वाईट माणसांच्या श्रेणीत आणतो. तर मग ज्यामुळे तुमचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं, अशा ईगोचा काय उपयोग? यावर्षी ठरवूनच टाका की ईगोचं नामोनिशाण तुमच्या व्यक्तिमत्त्वावरून मिटवून टाकाल आणि दुसऱ्यांचं वाईट करण्याऐवजी तुमचं व्यक्तिमत्त्व उजळविण्यात वेळ खर्च कराल.

7) मदतनीस व्हा : माणूस एक सामाजिक प्राणी आहे आणि नेहमी समूहाने राहात आलाय. या समूहात अनेक लोक याचे जाणकार असतात, तर काही अनभिज्ञदेखील असतात. परंतु मदत एक अशी प्रक्रिया आहे जी मनुष्याला मनुष्यानेच जोडते. एखाद्याच्या त्रासात त्याला सोबत करणं वा त्याला कधीही मदत करणं हे एक माणूस या नात्याने आपलं कर्तव्य आहे.

8) पुण्य नाही कर्तव्य समजा : धार्मिक ग्रंथांमध्ये पुण्य कमावणं एक मोठं व्याख्यान आहे. अनेकदा लोक पुण्य कमावण्याची संधी म्हणून एखाद्याला मदत करतात. परंतु जिथे पुण्य कमावण्याची संधी दिसत नाही तिथे ते ढुंकूनही पाहात नाहीत. असं म्हणतात की भुकेलेल्या आणि तहानलेल्या माणसाला खायला घालण्याने पुण्य मिळतं. हे पुण्य कमावण्यासाठी लाखों रूपये खर्चून भंडाऱ्याचं आयोजन करतात. मात्र दुसरीकडे हिच लोक वाटेतील गरीब भुकेलेल्या मुलाला २ भाकऱ्या देण्याऐवजी हाकलून देतात. उलट एखाद्या भुकेलेल्याला खायला घालणं हे पुण्य नाही तर तुमचं कर्तव्य आहे. अशाप्रकारे धर्माच्या नावाखाली वा त्याचा आधार घेऊन एखाद्या खास दिवसाची वाट पाहून एखादं कार्य करण्याऐवजी गरजवंताला पाहाताच त्याला आधार द्या आणि हे तुमचं कर्तव्य समजा. तर यावर्षी प्रतिज्ञा करा की काम पुण्य नाही तर कर्तव्य समजून कराल.

9) खुल्या मनाने मोठा विचार करा : यावर्षी तुमच्या विचारसरणीचा विस्तार करा. असं केल्यावर तुम्हाला आढळेल की तुमच्यापेक्षा अधिक समाधानी आणि चिंतामुक्त मनुष्य दुसरा कोणीही नाहीए. अशी अनेक लोक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला मिळतील जी स्वत:चा वेळ फक्त दुसऱ्यांबद्दल विचार करण्यासाठीच खर्च करतात. त्यांना प्रत्येक वेळी हेच वाटतं की त्यांच्या बाबतीत कोणीतरी चुकीचं करतंय वा बोलतंय. परंतु जरा विचार करा, या धावपळीच्या युगात कोणाकडेही दुसऱ्यासाठी विचार करायला तरी वेळ आहे का? तर नाही आहे. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्याबद्दल विचार करा आणि कोणाचंही नुकसान न करता आपल्या फायद्याचं काम करा.

10) सन्मान द्या आणि सन्मान मिळवा : अनेक लोक जेव्हा एकाद्या मोठ्या स्तरावर पोहोचतात तेव्हा ते नेहमी आपल्यापेक्षा छोट्या स्तरावरच्या लोकांकडे कुत्सितपणे पाहू लागतात. अनेकदा कार्यालयांत असं होतं की स्वत:ला सीनिअर म्हणवून घेण्याच्या नादात लोक आपल्यापेक्षा खालच्या पदावरच्यांचं शोषण आणि अपमान करायला सुरुवात करतात. परंतु तुम्ही ही म्हण ऐकलीच असेल की चिखलात दगड टाकल्यास त्याचे शिंतोंडे आपल्यावरदेखील उडतातच. अशाप्रकारे अपमान करण्याऱ्यांनादेखील अपमानच मिळतो. म्हणूनच यावर्षी ठरवून टाका की कोणतीही स्थिती व परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांशी सन्मानपूर्वकच वागा

वेडिंग गिफ्ट काय द्यावे काय नाही

* सुमन बाजपेयी

लग्नात काय भेटवस्तू द्यावी हे यावर अवलंबून असते की ज्याचे लग्न आहे त्यांच्याशी तुमचे काय नाते आहे. त्यानंतर हे महत्त्वाचे ठरते की तुम्ही कोणत्या प्रकारचे गिफ्ट त्यांना देऊ इच्छिता. गिफ्ट चांगले असेल याची काळजी अवश्य घ्या, पण त्याचबरोबर हे ही पहा की तुमचे बजेट कोलमडणार नाही. जर तुम्हाला वर किंवा वधूची पसंत नापसंत माहीत असेल तर मग त्यानुसारच गिफ्ट निवडा. जर ते शक्य नसेल तर अशी एखादी वस्तू द्या जी भविष्यात त्यांच्या कामी येईल. त्यांच्या संसारात उपयोगी ठरेल अशीच वस्तू द्या नाहीतर तुमचे गिफ्ट त्यांच्या घरातल्या एखाद्या कोपऱ्यात नुसतेच पडून राहील. सादर आहेत गिफ्ट निवडण्याच्या काही टीप्स :

डेकोरेटिव्ह आयटम्स

नवीन घर सजवायला डेकोरेटिव्ह आयटम्सची फार गरज असते. म्हणूनच तुम्ही हे गिफ्ट म्हणूनही देऊ शकता. बाजारात शोभेच्या सजावटी वस्तूंची खूप व्हरायटी उपलब्ध असते. शो पिसेस, फोटो फ्रेम, कलात्मक वस्तू, पेंटिंग आणि हँडीक्राफ्टचे सामान देता येईल. पण अशा वस्तू देताना या गोष्टी विचारात घ्या की ज्यांना तुम्ही हे गिफ्ट्स देणार आहात त्यांना अशा प्रकारच्या वस्तू आवडतात की नाही अन्यथा तुमचे गिफ्ट त्यांच्यासाठी कुठल्या निरुपयोगी वस्तूपेक्षा कमी ठरणार नाही.

सिल्व्हर गुड्स

चांदीच्या वस्तू अशा ओकेजन्ससाठी सर्वात उत्तम पर्याय असतात, कारण त्यांना एक ट्रॅडिशनल व्हॅल्यू असते. चांदीच्या वस्तूंचे वैशिष्टय म्हणजे वर आणि वधू दोघांनाही भेट देता येते. सिल्व्हर ज्वेलरी मग ती अंगठी असो किंवा इयररिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट किंवा मग चांदीचे पैंजण वधूसाठी सर्वोत्तम असतात. सिल्व्हर ज्वेलरी फार एलिगंट दिसते. खासकरून तेव्हा जेव्हा त्यावर डायमंड, रुबीसारखे स्टोन्स जडलेले असतात. चांदीची हेअर पिन, ब्रोचेस किंवा घडयाळसुद्धा देता येते. सिल्व्हर वर्क केलेल्या हॅन्डबॅग्स या उपयुक्त असतातच शिवाय ट्रेंडी लुकसुद्धा देतात. वराला सिल्व्हर चेन, रिंग आणि ब्रेसलेट देऊ शकता. दाम्पत्याला सिल्वर कटलरी सेट, सिल्व्हर पेपर आणि सॉल्ट शेकर्स किंवा सिल्व्हर बॉटल ओपनरसुद्धा देता येतो.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

आजच्या काळात पती आणि पत्नी हे दोघेही नोकरी करणारे असतात. आणि त्यांचं आधुनिक गॅजेट्सवर अवलंबून राहणं वाढलं आहे. मग अशावेळी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपेक्षा उत्तम असा काय पर्याय असू शकतो. वर वधूच्या गरजेनुसार त्यांना या वस्तू कस्टमाइज्ड करूनही देता येतात. किचनमध्ये लागणारी उपकरणे जसे मिक्सर, फूड प्रोसेसर, ज्युसर, टोस्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्ट्रिक कॅटल, वॉशिंग मशीन इ. फार उपयुक्त गिफ्ट्स ठरतात. याशिवाय टीव्ही, फ्रीP, म्युझिकसिस्टम, सेलफोन यासुद्धा अशा वस्तू आहेत, ज्या नेहमीच त्यांच्या कामी येतील.

ज्वेलरी

भलेही या दिवसांत सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत, तरीही जवळच्या नात्यात ज्वेलरी गिफ्ट करण्याची पद्धत अजूनही आहे. हल्ली बाजारात इतक्या प्रकारच्या ज्वेलरी उपलब्ध आहेत की तुम्ही आपल्या बजेट नुसार त्या निवडू शकता. स्वरोस्की, क्रिस्टल,टायटेनिअम, विभिन्न स्टोन्स ज्वेलरी गिफ्ट म्हणून देता येतात. प्लॅटिनमसुद्धा असं मेटल आहे की ज्याची ज्वेलरी आजकाल खूप फॅशनमध्ये आहे. नोकरदार महिला खासकरून ती पसंत करतात. प्लॅटिनम एक क्लासी टच देतो, जो आजच्या आधुनिक वधूला फार आवडतो.

वरासाठी गिफ्ट

वराला तुम्ही टाय, कफलिंक्स किंवा स्कार्फ अशा प्रकारच्या अॅक्सेसरीज देऊ शकता. जर तुम्हाला त्याची पसंत माहीत नसेल तर एखाद्या लाइफस्टाइल ब्रँड किंवा इलेक्ट्रॉनिक स्टोरचे गिफ्ट व्हाउचर देणे एक चांगला ऑप्शन आहे. साधारणपणे वराला इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीज नेहमीच आवडतात.

वधूसाठी गिफ्ट

वधू करता वेडिंग गिफ्टचे अनेक पर्याय आहेत, जसे कपडे, दागिने, अॅक्सेसरीज किंवा मग गिफ्ट व्हाउचर्स. लग्नाआधी स्पा किंवा ब्रायडल मेकअपचे गिफ्ट व्हाउचर्स तिच्या खूप कमी कामी येतील. याशिवाय तिला कॉस्मेटिक किट, हेअर ड्रायर, परफ्युम, गिफ्ट हॅम्पर्स, बांगडयांचा सेट वगैरेही देता येते.

कपलसाठी गिफ्ट

वर आणि वधूसाठी ते दोघेही वापरू शकतील अशी वस्तू गिफ्ट म्हणून दिली तर त्याहून चांगले आणखी काय असू शकते. तुम्ही त्यांना ट्रॅव्हल पॅकेज गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्यांचे दोघांचे हनिमून तिकीट किंवा मग हॉटेल बुकिंग्स याची व्यवस्था करू शकता. एखाद्या हॉटेलचे फूड व्हाउचर किंवा मग वीकेंड हॉलिडेचे तिकिटसही भेट म्हणून देता येतात. हल्ली वुड, रॉट आयर्न, लेदर इ. व्हरायटीमध्ये उपलब्ध असलेले फर्निचर हेसुद्धा कपल्साठी बेस्ट गिफ्ट ऑप्शन आहे. तुम्ही त्यांना डबल बेड, सोफा सेट, डायनिंग टेबल इ. देऊ शकता. पण त्याआधी त्यांच्या होम डेकोर आणि घराच्या साइझची अवश्य माहिती घ्या.

कॅश सर्वात परफेक्ट

वेडिंग गिफ्ट म्हणून कॅश देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे वर आणि वधू आपल्या पसंत आणि आवश्यकतेनुसार जेव्हा हवे तेव्हा वस्तू खरेदी करू शकतात. किंवा त्यांना वाटल्यास ते पैसे बँकेत ठेवून भविष्यासाठी सेविंग्सही करू शकतात. तसेही लग्न झाल्यावर सेटल होण्यासाठी आणि हनिमूनसाठी मोठया कॅशची गरज भासतेच. त्यामुळे कॅश ही कधीही कामी येतेच.

आकर्षक पॅकिंग

उपयुक्त गिफ्टसोबत आकर्षक पॅकिंगही चांगला प्रभाव निर्माण करते. गिफ्ट रॅपिंगसाठी थोडे जास्त पैसे खर्च करणे चांगलेच असते. आपण यासाठी स्पेशल वेडिंग गिफ्ट रॅपरचा वापर करू शकता. पॅकिंगचे अगणित पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही ज्यांना गिफ्ट देत आहात, त्यांनी तुमच्या शुभकामना आणि प्रेम कायम लक्षात ठेवावे म्हणून गिफ्टच्या रॅपिंगवर विशेष मेहनत घ्या. सोने किंवा चांदीची नाणी एखाद्या सुंदर अशा बॉक्समध्ये ठेवून गिफ्ट देऊ शकता.

हल्ली फार सुंदर दिसणाऱ्या अशा पोटल्या मिळतात. त्यातही गिफ्ट ठेवता येते. रॅप करण्याचे पेपरही अनेक व्हरायटीजमध्ये उपलब्ध असतात. ज्यांना आपण हवे तसे कापडी फुलांनी वगैरे सजवू शकतो. हल्ली लोक पॅकिंगच्या बाबतीत बरेच कॉन्शिअस झाले आहेत. म्हणूनच ड्रेसपासून ते ज्वेलरीपर्यंत प्रत्येक वस्तू खास अंदाजात पेश करायला पॅकिंगमध्ये नवनवीन प्रयोग करणे पसंत करत आहेत.

कार्डबोर्डच्या नक्षीदार बॉक्समध्ये वस्तू ठेवून गिफ्ट दिल्या जातात. पाने पेंट करून खासकरून केळयाची पाने पेंट करून गिफ्ट रॅप केली जातात. याशिवाय गिफ्टच्या आकारानुसार लाकूड, मेटलच्या टोपल्या किंवा ट्रेचा वापरही केला जात आहे.

काय द्यायचे नाही

विचार करा जेव्हा एखादे नवपरिणीत जोडपे आपल्या प्रियजन, नातेवाईक यांनी लग्नात दिलेली गिफ्ट्स उघडायला बसले आहेत आणि त्यांच्या समोर एकसारखेच दिसणारे  ६ बाउल सेट, १० घडयाळे, १० वॉल हँगिंग्स, ७-८ लॅम्प शेड्स, आईस्क्रीम कप, क्रॉकरी सेट आले तर त्यांना कसे वाटेल. हे सर्व मग पुन्हा रॅप करून ठेवावे लागते किंवा घरातल्या स्टोर रूममध्ये ठेवावे लागते.

त्यामुळे लग्नात तुमच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नाहीत असे गिफ्ट्स न देणे हेच योग्य असते. बुके देणेही टाळा. कारण त्यांचा काहीच उपयोग होत नाही. बुके देणे म्हणजे पैशाची नासाडी आहे. त्यापेक्षा कॅश द्यावी.

जेव्हा मुलांचे बोलणे आणेल लाज

* डॉ. गौरव गुप्ता

नेहमीच आपण लोकांना हे सांगताना ऐकतो की मुलं तर आता मुलांप्रमाणे वागतच नाहीत. अनेक मुलं अशा काही गोष्टी बोलतात की कुटुंबातील लोकांना दुसऱ्यांच्या समोर लाजिरवाणं वाटतं. उदा :

खासगी गोष्ट बोलणे

अनेक मुलं कुटुंबातील खासगी गोष्टी उदा. आईवडिलांच्या आपसातील संबंधांच्या गोष्टी किंवा दुसरी एखादी गोष्ट अशा प्रकारे बोलतात की आईवडिलांना शरमिंधा वाटते.

याबाबत अनेक प्रचलित घटनांची पुनरावृत्ती होणे चुकीचं ठरणार नाही. काही मित्र घरात गप्पा मारत होते, इतक्यात लाइट गेला. एक जण लाइटची व्यवस्था करण्यासाठी आत गेला. यादरम्यान तिथेच बसलेला एक मित्र ५ वर्षांच्या मुलाला विचारू लागला,  ‘‘बाळा, तुला काळोखात भीती तर वाटत नाहीए ना?’’

तो पटकन म्हणाला, ‘‘मी बाबांसारखा डरपोक नाहीए. मला जेव्हा कधी भीती वाटते, तेव्हा मी आईजवळ जाऊन झोपतो. पण बाबांना तर रोज रात्री भीती वाटते आणि तेही आईजवळ येऊन झोपतात.’’

सांगायलाच नको, सर्वजण खोखो करून हसले आणि मुलांचे आईवडील लाजेने लाल झाले.

इतरांबद्दल वाईट गोष्टी बोलणे

मुलं केवळ खासगी गोष्टीच नव्हे, काही अशा गोष्टीही दुसऱ्यांच्यासमोर बोलतात, ज्या कधी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याबाबत बोललेल्या असतात.

एका घराची घंटी वाजली, तेव्हा ७ वर्षांचा मुलगा धावत दरवाजा उघडायला गेला आणि मग तिथूनच ओरडला, ‘‘आई, काका आलेत.’’

आईने विचारलं, ‘‘कुठले काका?’’

तो म्हणाला, ‘‘आई, तेच काका, जे गेल्यानंतर तू नेहमी बाबांना सांगतेस की तुमचा हा भिकारी मित्र नेहमी जेवणाच्या वेळी टपकतो. खादाड कुठला. नकोही म्हणतो आणि खातही जातो.’’

तुम्हाला कळलंच असेल, त्या व्यक्तीसमोर आईला किती लाज वाटली असेल.

अनेकदा मुलं कुटुंबातील सदस्यांची आपसात झालेल्या भांडणांची इतरांसमोर पोलखोल करून घरच्यांना लाज आणतात.

अशा स्थितींपासून वाचण्यासाठी मुलांसमोर केवळ त्या गोष्टींचीच चर्चा करा, ज्या त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत.

शिव्या देणे

काही मुलं शिव्या द्यायला शिकतात. अर्थात, मुलांना तेवढी समज नसते, ना ही त्यांना माहीत असतं की शिव्या देणे वाईट गोष्ट आहे. त्यामुळे ती कोणासमोरही शिव्या देऊ लागतात.

अशावेळी आईवडिलांनी आपली मुलं कुठून शिव्या घालायला शिकत आहेत, याकडे लक्ष ठेवावे. याला ते स्वत: तर जबाबदार नाहीत ना. अनेक कुटुंबांत रागात शिव्या घालणे सामान्य गोष्ट आहे.

घराच्या आर्थिक स्थितीची पोलखोल करणे

घरात अनेक प्रकारच्या समस्या असतात, पण लोक समाजात आपला एक स्तर बनवून राहतात. अनेकदा मुलं घरातील आर्थिक स्थितीची पोलखोलही करतात.

उदा. घराची स्थिती ठीक नाही, तर एखाद्या खास फंक्शनसाठी आपण आपल्या एखाद्या मैत्रिणीची साडी किंवा दागिने मागून घातलेत. पार्टीत कोणीतरी कौतुक केल्यानंतर आपण हे सांगू लागलात की आपली साडी आणि दागिने किती किमती व चांगले आहेत. पण आपल्या मुलाने सर्वांसमोर हे सांगितलं की, आईजवळ पैसे नव्हते. तेव्हा आपल्याला किती लाजिरवाणं वाटेल, हे आपणच जाणू शकता.

मोठ्या आवाजात बोलणे

अनेक मुलांना लगेच राग येतो आणि ती जोरजोरात ओरडून बोलू लागतात. घरात आई सहन करत त्यांचं बोलणं मानते. त्यामुळे ती बाहेरही तसंच वागू लागतात.

समजा, आई कोणाकडे तरी डिनरसाठी गेली असेल किंवा कोणाला आपल्या घरी आमंत्रित केलं असेल. पाहुण्यांसमोर आईने आपल्या मुलांना एखाद्या कामासाठी नकार दिला. अशावेळी ती आपलं तेच खरं करण्यासाठी ओरडू लागली, तर लज्जित होण्यापासून वाचण्यासाठी आईला त्यांचं बोलणं मान्यही करावं लागतं, शिवाय पाहुण्यांसमोर तिची इमेज खराबही होते.

शॉपिंगसाठी हट्ट करणे

जर मूल मॉल किंवा एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये काही खरेदी करण्यासाठी हट्ट करत असेल आणि आईवडील घेऊन देण्यास नकार देत असतील, तेव्हा ते रडू लागते आणि वाट्टेल ते बोलू लागते. अनेकदा तर मूल एवढं उत्तेजित होतं की ते आपल्या आईला सर्वांसमोर बोलू लागते की तू घाणेरडी आहेस, मला काही घेऊन देत नाहीस आणि जमिनीवर लोळू लागतात. अशावेळी आईवडिलांचा चांगलाच तमाशा बनतो.

अपशब्द बोलणे

अनेक मुलं एवढी उध्दट असतात की घर आणि बाहेरच नाही, तर शाळेत शिक्षक व इतर मुलांनाही अपशब्द बोलायला मागे-पुढे पाहत नाहीत. जाडा, भिकारी, वेडा, चोर यांसारख्या अपशब्दांचा विचार न करता वापर करतात.

मुलांचे वागणे असे ठीक ठेवा

आईवडिलांसाठी मुलाला जन्म देण्यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्या चांगल्या देखभालीची असते. कुटुंबाला मुलाची पहिली शाळा म्हटली जाते. या शाळेत मुलाने काय शिकावं, हे संपूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून असते.

लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावा

मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मुलाच्या जीवनातील पहिली ६ वर्षे त्याच्यासाठी ब्लू प्रिंट असतात. अशावेळी आईवडिलांसाठी खूप आवश्यक आहे की त्यांनी मुलांना चांगल्या सवयी लावाव्या.

वाईट संगतीपासून दूर ठेवा

आपल्या मुलाच्या शाळेतील आणि आजूबाजूच्या मित्रांवर नजर ठेवा. जर एखाद्या मुलाचं वागणं वाईट असेल किंवा त्याच्या घरातील वातावरण खराब असेल, तर अशा मुलांसोबत आपल्या मुलाला राहू देऊ नका.

जर आपलं मूल एखादी चुकीची गोष्ट बोलत असेल, तर त्याला विचारा की हे सर्व तो कुठून शिकला. जर शेजारीपाजारील एखाद्या मुलाकडून शिकला असेल, तर त्याच्या आईवडिलांना याबाबत जरूर सांगा. जर शाळेतून शिकून आला असेल, तर पेरेंट्स-टीचर मीटिंगमध्ये या गोष्टीवर जरूर चर्चा करा.

मुलासोबत वेळ घालव

आईवडील आपल्या खासगी जीवनात एवढे व्यस्त असतात की त्यांच्याजवळ आपल्या मुलासाठी वेळच नसतो. आपण कितीही व्यस्त असलात, तरी आपल्या मुलासाठी वेळ जरूर काढा. त्यांच्या संगतीचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, मुले आपल्या आईवडिलांकडे पाहूनच शिकत असतात.

आपलं वागणं घरातील इतर लोकांसोबत कसं आहे, याचा परिणाम आपल्या मुलावर खोलवर होतो.

शक्य असेल, तर आपल्या घरातील प्रौढांना आपल्यासोबतच ठेवा. त्यामुळे आपण डे केयरच्या मोठ्या फीपासूनही वाचू शकता आणि मुलंही आईवडिलांकडून सतत शिकत राहतील.

आयुष्यातील लक्ष्य विवाह नाही

– पारुल

‘‘रमा घरातील काही कामे करणे शिकून घे, नाहीतर दुसऱ्या घरी जाशील तेव्हा सासरचे हेच म्हणतील की आईने काही शिकवले नाही.’’

‘‘शिल्पा बेटा, अजून किती शिकशील. कुठून शोधू आम्ही एवढा शिकलेला नवरा मुलगा, शिवाय जेवढा शिकलेला मुलगा तेवढाच अधिक हुंडा.’’

‘‘बघ श्रेया अजून दहा वर्षाची आहे. किती चांगल्याप्रकारे घर स्वच्छ करते. खूप चांगली गृहिणी बनेल. सासरी जाऊन आमचे नाव उज्ज्वल करेल.’’

‘‘शिल्पा आता तू बारा वर्षाची झाली आहे. प्रत्येक वेळी खीखी करत जाऊ नकोस. थोडा अभ्यासही कर नाहीतर कोण लग्न करेल तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी.’’

ही सर्व विधाने प्रत्येक मुलगी आपल्या जीवनात आई-वडिलांच्या घरी लहानपणापासून तारुण्यापर्यंत न जाणे किती वेळा ऐकते. हेच ऐकत-ऐकत त्या मोठया होतात. मुलगी सावळी आहे तर तिला डबल एमए शिकवा, जेणेकरून चेहरा नाही तर नोकरी बघून तरी मुलगा लग्नासाठी होकार देईल. कुठली शारीरिक कमी असेल तर हुंडयात जास्त पैसे देऊन सासरच्यांचे तोंड बंद करायचे.

लहानपणापासून त्यांना पुन्हा-पुन्हा अशाप्रकारच्या गोष्टी सांगून आई-वडील ना केवळ त्यांचा आत्मविश्वास कमी करतात, तर असा व्यवहार करतात की जसा त्यांचा जन्मच बस लग्नासाठी झाला आहे. विवाह नव्हे अलादिनचा दीवा असावा. मुली आई-वडिलांच्या गोष्टी ऐकून-ऐकून स्वप्नांचे असे सोनेरी महाल सजवू लागतात की जणू विवाहच त्यांचे शेवटचे लक्ष्य आहे. विवाहासाठी त्या सर्वकाही करू इच्छितात. जगभरातले कोर्सेस, शिक्षण सर्वकाही आणि विवाहानंतर?

हरवून जाते ओळख

लग्नानंतर त्या पूर्णपणे आपले पती, कुटुंब आणि मुलांसाठी समर्पित होतात. कारण त्यांना नेहमी हेच शिकवले गेले आहे. आपल्या आईला त्यांनी नेहमी असच करताना पाहिलं आहे. मग एक वेळ येते जेव्हा त्या एका वळणावर चालता-चालता विचार करण्यास विवश होऊन जातात की शेवटी त्या कुठे स्टॅन्ड करतात? त्या का जगत आहेत? त्यांची ओळख काय आहे?

शिखा सुंदर, शिकली-सवरलेली, चांगल्या कुटुंबातील खूप गुणी मुलगी आहे. खूप चांगल्या कुटुंबात लग्न झाले. पतिही चांगले आहेत. पण घरवाल्यांनी हे सांगून नोकरी करण्यास मनाई केली की तुला कुठल्या वस्तूची कमतरता आहे. नोकरी करशील तर समाज काय म्हणेल…आम्हाला हे सर्व पसंत नाही. पतिनेही आईवडिलांचीच री ओढली. शिखाने आपल्या इच्छा अपेक्षांचा गळा दाबला. कॉलेजमध्ये तिला सर्व लोक किती विचारायचे आणि आज ती बस गृहिणी बनून राहीली आहे.

महिलांना ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की काम केवळ कुठल्या वस्तूच्या कमतरतेच्या पूर्तीसाठीच नाही केले जात, तर आपल्या समाधानासाठीही केले जाते. शिखासारख्या मुली प्रत्येक घरात सापडतील. काही तर हेही विसरून गेलेल्या असतात की त्यांच्यातही काही गुण आहेत. कोणा दुसऱ्याला काम करताना पाहून उलट या अजून म्हणतात की नाही बाबा, ही माझ्या आवाक्यातील गोष्ट नाही. मी तर माझ्या पती आणि मुलांमध्येच खूष आहे. ही स्थिती सर्वांच्या जीवनात येते. काहींच्या जीवनात खूप लवकर, तर काहींच्या खूप उशिरा.

मीराचे लग्न ८ वर्षांपूर्वी झाले होते. पतिशी तिचे विचार अजिबात जुळले नाहीत. काही विशेष कारण नसल्यामुळे आई-वडिलांनीही डिवोर्स होऊ दिला नाही. आपल्या मनाला त्या कोंदट वातावरणापासून वेगळे ठेवण्यासाठी तिने काम करण्याचे ठरवले. पण त्यासाठीसुद्धा पती आणि सासरच्यांनी मनाई केली. पण मीरा आपली हिंमत हरली नाही. आपल्या एका मैत्रिणीच्या मदतीने तिने तिच्याच घरी मुलींना शिकवायला सुरूवात केली. आज ती तीस हजार रुपये महिना आरामात कमावते. विरोध खूप झाला, पण तिने पक्का निश्चय केला होता. म्हणून हळू-हळू सर्वांची तोंडं बंद झाली.

मीराची आता पूर्ण शहरात चांगली ओळख बनली आहे. लोक सन्मान करतात. आर्थिक स्तरावर स्ट्राँग झाल्यामुळेसुद्धा तिच्यात आत्मविश्वास खूप आला आहे.

अस्तित्वाला ओळखा

आपले अस्तित्व ओळखणे खूप आवश्यक आहे. निसर्गाने प्रत्येकाला कुठला न कुठला विशेष गुण दिला आहे. बस गरज आहे त्याला ओळखण्याची आणि त्या दिशेने चालण्याची. महिलांसाठी रस्ता एवढा सोपा नसतो. पण रस्ता बनत असतो दृढ निश्चयाने.

बऱ्याच महिलांना वाटतं की त्यांना काही येत नाही. असा विचार कधीही करू नये. आपण एक घर सांभाळत आहात, एका घराचा केयरटेकर असणे याचा अर्थ कमीत कमी १०-२० कामांमध्ये तुम्हाला कोणी टक्कर देऊ शकत नाही. फक्त आवश्यकता आहे त्या सर्व कामामध्ये ते ओळखणे जे आपली ओळख बनवून देईल.

उदाहरणासाठी आपण सफाईच्या बाबतीत काटेकोर आहात, तर आपल्या या काटेकोरपणाचा उपयोग पैसे कमवण्यासाठी करा. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक आपल्या घराच्या साफ-सफाईसाठी वेळ काढू शकत नाहीत आणि मग कंपनीला हायर करतात. आपण ५-१० सफाईवाल्या स्त्रियांना घेऊन हे काम करवून देऊ शकता. बाजारापेक्षा कमी मूल्यात आपण जेव्हाही काम कराल तेव्हा आपल्याला फायदाही चांगला होईल.

कुकिंगचा छंद असेल तर वेगवेगळे व्यंजन बनवून लोकांच्या पार्टीत आपण डिलिव्हरी देऊ शकता. आजकाल लोकांमध्ये खाण्याची खूप क्रेझ आहे. आपण आपल्या कुकिंगचे कोचिंग सेंटरही खोलू शकता, जेथे मुलींना कुकिंग शिकवाल.

जर आपल्याला लिहायचा छंद असेल तर आपण लेखनाच्या क्षेत्रातसुद्धा आपली ओळख बनवू शकता. यासाठी आपल्याला बाहेर जाण्याचीसुद्धा गरज नाही. आजकाल बरेच ऑनलाइन कामही आहे. जे आपण घरी बसून करू शकता. कधीही यश एकाचवेळेस मिळत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कठोर परिश्रम, एकाग्रता आणि सर्व अडथळ्यांना पार करूनच आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता.

बस आपले कौशल्य ओळखा. मग त्यासाठी वेळ काढा आणि त्यात नैपुण्य मिळवा. त्यावर अजून काम करा. नाव आणि ओळख हळू-हळू मिळत जाईल. विश्वास ठेवा ज्यादिवशी लोक आपणास आपल्या नावाने बोलावतील आणि आपल्या त्या नावाची एक ओळख निर्माण होईल, त्यादिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ मिळून जाईल.

सगळयात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या मनाला सांगा की विवाह शेवटचा आयुष्यातील एकमेव लक्ष्य आहे. विवाह यशस्वी असो किंवा नसो तो फक्त एक भाग आहे. त्याला पलटून बघा. एक नवीन लक्ष्य आपली वाट बघत आहे. एका नवीन आशेच्या किरणाबरोबर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें