साठीतले प्रेम काय करावे आणि काय करू नये

* दीपान्विता राय बॅनर्जी

अर्ध्याहून अधिक वय उलटून गेल्यानंतर जेव्हा आपल्या जीवनात नव्या साथीदाराच्या स्वरूपात एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचे आगमन होते, तेव्हा एका नव्या अध्यायाची सुरुवात होते. हा नवा अध्याय वाचण्याची जबाबदारी घेणे हे महाकठीण काम आहे.

आपण या अशा नवीन नात्यांविषयी खासकरून उतारवयात निर्माण झालेल्या या नात्यांची जोपासना, जोखीम, पारख आणि दक्षता यावर चर्चा करूया. म्हणजे वयाचे अनेक टप्पे पार करून तुम्ही जेव्हा एखाद्या नव्या नात्यात बांधले जाता, तेव्हा त्यातील धोका वेळीच ओळखता येईल. हट्टीपणा किंवा मानसिक असंतुलनाच्या नाही तर वास्तवाचे भान विकसित करणारी समज तुमच्यात निर्माण होईल.

स्त्री-पुरुष मैत्रीतील काही खास गोष्टी :

* स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्री ही फक्त मैत्रीपुरतीच मर्यादित राहणे कठीण असते. याची परिणती रोमान्समध्ये होण्याची दाट शक्यता असते.

* स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्री सामान्य असेल तर ती दीर्घकाळ टिकू शकते, पण अशा मैत्रीत जेव्हा रोमान्स येतो तेव्हा त्या मैत्रीचे आयुर्मान खुंटते. मध्येच साथ सोडून देण्याची शक्यता वाढते.

वयाच्या एका टप्प्यानंतर केलेली क्रॉस मैत्री म्हणजे विरुद्ध लिंगी व्यक्तिशी केलेली मैत्री ही कधी आणि कोणत्या परिस्थितीत होऊ शकते आणि अशा मैत्रीचे लाभ काय आणि यात काय जोखीम असते यावर बरेच संशोधन झाले आहे.

जेव्हा एखाद्या कमी वयाच्या मुलाला त्याच्याहून अधिक वयाच्या स्त्रीप्रति आकर्षण वाटते : अनेकदा काही कमी वयाच्या युवकांची मानसिक स्थिती परिपक्व असलेली दिसून येते आणि ते त्यांच्याप्रमाणेच एखाद्या मानसिकदृष्टया परिपक्व स्त्रीच्या साथीची अभिलाषा बाळगतात आणि जेव्हा अशी स्त्री त्याचवेळेस त्यांना भेटते जिच्या आवडीनिवडी, वर्तन, विचार आणि दृष्टिकोन यांच्याशी मिळतेजुळते असतात, तेव्हा तिच्यासोबत मैत्री अधिक घट्ट होते. आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात अथवा लग्नात झाले तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नसते.

कमी वयाच्या स्त्रीला जास्त वयाच्या पुरुषाचे वाटणारे आकर्षण आणि याची कारणे : अशा स्थितीत स्त्रिया आपल्याहून दुप्पट वयाच्या किंवा अगदी आपल्या पित्याच्या वयाच्या व्यक्तिसोबत मानसिक, शारीरिक पातळीवर नाते प्रस्थापित करण्याची इच्छा बाळगतात. सायकोलॉजिकली पाहिल्यास असे पुरुष हे वयाने परिपक्व असण्यासोबत सेक्स अपीलनेही परिपूर्ण असतात. त्यांना स्वत:ला पेश करण्याची कला अवगत असते आणि ते आपल्या वयानुसार नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार जगत असतात.

असे पुरुष प्रभावशाली असतात. हे आपल्या कर्म, विचार आणि सामर्थ्य यात शक्तिशाली असतात. आपल्या परिवाराची पूर्ण काळजी घेणारे किंवा आपले प्रतिष्ठेचे पद आणि कर्मजीवन उत्तमरीतीने निभावून नेणारे असतात. अशा पुरुषांना आपले सर्वस्व अर्पण करून कमी वयाच्या स्त्रिया तृप्त होऊ पाहतात.

अनेकदा तर पतिकडून होणारी अवहेलना यामुळे या स्त्रिया अशा कर्मठ आणि रोमँटिक पुरुषांकडे आकर्षित होतात. यांच्या सान्निध्यात या असमाधानी स्त्रिया आपला गमावलेला आत्मविश्वास परत मिळवतात. या पुरुषांनी केलेली प्रशंसा किंवा मदत यांना जगण्याची उमेदही दाखवते.

६० किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना कमी वयाच्या स्त्रियांचे आकर्षण : अशी स्थिती आजच्या काळात सर्वसामान्य समजली जाते. काम आणि व्यवसायाच्या निमित्ताने जास्त वयाच्या पुरुषांचा कमी वयाच्या स्त्रियांशी जेव्हा सतत जवळून संबंध येत असतो, तेव्हा पुरुषांना या स्त्रियांप्रति सहानुभूती, आपलेपणा आणि रोमान्सची भावना निर्माण होणे स्वाभाविक असते.

कमी वयाच्या स्त्रियांसोबत त्यांचे नाते कसे असेल हे त्या पुरुषाच्या व्यक्तित्वावर अवलंबून असते. त्या पुरुषाच्या बॅकग्राउंडवरच त्याच्याशी नाते प्रस्थापित करू पाहणाऱ्या स्त्रीच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट होत असतात. कसे ते जाणून घेऊया :

वयस्कर कामुक पुरुष आणि त्याच्या स्त्रीकडून अपेक्षा : असे पुरुष स्त्रीच्या शरीराची लालसा बाळगणारे असतात. ते आपल्या कामनापूर्तीतील असमाधानाची ढाल करून स्त्रियांना भोगण्याचा बहाणा शोधत असतात. यामुळे त्यांना समाजव्यवस्था, न्यायव्यवस्थेला न मानण्याच्या दोषातून मुक्त होण्याचे कारण मिळते. अशाप्रकारे अपराधभावनेतून स्वत:ला सोडवून फक्त आपला स्वार्थ साधण्याचे काम हे करत असतात.

भोगी पुरुषांची ओळख आणि अशा पुरुषांपासून स्त्रियांचे स्वसंरक्षण : हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय किंवा करिअरचा कोणताही टप्पा असो २० ते ४० वयोगटातील स्त्रियांना विशेषकरून वयस्कर पुरुषांच्या सान्निध्यात काम करावे लागते.

अशा स्त्रिया या आपल्या संभाषण, विचार, व्यवहार आणि गुणांमुळे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की वयस्कर पुरुषांना अशा स्त्रियांचे सान्निध्य आवडते. पण गोष्टी तेव्हा बिघडू लागतात, जेव्हा हे मैत्रीच्या नावावर या स्त्रियांना भुलवून आपल्या जाळयात ओढतात. ज्या स्त्रिया जाणूनबुजून स्वत:च्या रिस्कवर या नात्याला वाढवतात, त्यांच्यासाठी ही चर्चा भलेही काही कामाची नसेल परंतु त्यांना सावध करणे गरजेचे आहे ज्या अशा पुरुषांशी काहीही विचार न करता मैत्री करतात आणि नंतर न त्यांना पाठी फिरण्याचा मार्ग उरतो वा पुढे जाण्याचा. अशा वासनांध पुरुषांच्या मानसिकतेची झलक पुढे देत आहे, जेणेकरून अशा पुरुषांना सहज ओळखता येईल :

* असे पुरुष सुरुवातीच्या काळात भावनिक पातळीवर संवाद साधतात.

* ते त्या स्त्रीच्या प्रत्येक गरजेची काळजी घेऊ पाहतात.

* त्या स्त्रीचा पती किंवा तिच्या कुटुंबातील लोकांतील उणीवा शोधून स्वत:ला चांगले भासवून तिच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करतात.

* कामाच्या ठिकाणी अतिरिक्त सुविधा देतात.

* कधीकधी स्त्रीच्या शरीराला स्पर्श करून त्याला केअरचे स्वरूप देतात.

* खोटं बोलण्यात आणि अभिनयात हे माहीर असतात.

* आपल्या सावजास भरपूर वेळ देतात, जाळयात ओढण्याची घाई करत नाहीत.

वयस्कर पुरुषांचा कमी वयातील स्त्रीसोबत भावनात्मक संबंध : जास्त वयाचे काही असेही पुरुष असतात, जे कमी वयाच्या अशा समजूतदार स्त्रीसोबत मैत्रीपूर्ण भावनात्मक संपर्क ठेवू पाहतात. जी विचार, स्वभाव आणि भावना यात त्यांच्याशी साधर्त्य साधणारी असते.

जर असे संबंध सहज असतील, विचारांच्या आदानप्रदानापासून स्वस्थ मानसिकता दर्शवणारे असतील आणि दोघांच्या कौटुंबिक संबंधाना नष्ट न करणारे असतील तर अशी मैत्री योग्य आहे.

भावनात्मक आधार शोधणाऱ्या पुरुषांची कौटुंबिक स्थिती : असे पुरुष बऱ्याचदा आपल्या पत्नीला तो मान देऊ शकत नाहीत, ज्याची त्याच्या पत्नीला अपेक्षा असते. असे पुरुष आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तर निभावत असतात आणि आपल्या पत्नीच्या गरजाही पूर्ण करतात, पण पत्नीला स्वत:च्या योग्यतेचे समजत नाहीत.

असेही असू शकते की पत्नीमध्येही त्यांचा सहारा बनण्याची योग्यता नसेल. घर परिवारांत क्लेश असतील किंवा पुरुषाच्या कामकाजी जीवनातील समस्या त्याची पत्नी समजून घेत नसेल किंवा त्या पुरुषाच्याच आपल्या पत्नीकडून इतक्या अपेक्षा असतील ज्या पूर्ण करणे पत्नीला शक्य नसेल.

कारण काहीही असो जर बाहेरील स्त्री पुरुषांमध्ये संबंध निर्माण झाले असतील तर लव्ह इन सिक्स्टीजसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या स्त्रीपुरुष दोघांनाही लागू होतील :

* अशा संबंधांना निभावताना पहिल्यांदा त्या संबंधाचा प्रकार निश्चित करा. यावर दोघांनीही अंमल केला पाहिजे. उदाहरणार्थ हे नाते शेवटपर्यंत फक्त मैत्रीचेच राहील किंवा हे नाते पुढे कोणत्याही वळणावर नेण्यासाठी दोघे मोकळे असतील.

* दोघे आपली मैत्री समाज, कुटुंब यांच्यापुढे जाहीर करणार की लपून छपून मैत्री ठेवणार हे दोघांनी ठरवावे.

* दोघांनी एकमेकांना लहानशी भेटवस्तू देण्यापुरतेच सीमित राहावे. मोठमोठया भेटवस्तू देणे टाळा, ज्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होतील आणि तुम्ही नसत्या समस्येत फसू शकता.

* आपल्या नात्यात पारदर्शीपणा ठेवा आणि सत्याच्या बाजूने रहा. यामुळे तुमच्या मित्राला मर्यादेचे भान राहील आणि तुमच्याकडून तो कमी अपेक्षा ठेवेल.

लग्न गरजेचेही आणि निश्चिंतपणाही नाही

* मदन कोथुनियां

लग्नात प्रामाणिकपणा हा पाया आहे, पण आपण तो ढासळल्यानंतरही लग्न टिकवण्यावर विश्वास ठेवतो. आपल्या न्यायसंस्था, समाज सर्वच लग्न वाचवण्यावर विश्वास ठेवतात, कारण सर्व मतभेदांनंतरही सकाळी भांडणारे पती-पत्नी संध्याकाळी एक होतात. कितीतरी जोडपी घटस्फोटाच्या सीमारेषेला स्पर्श केल्यानंतरही असे एक होतात की त्यांनी कधी वेगळे होण्याचा विचार केला होता हे जाणवतही नाही.

महिमाचे आईवडील तिच्यासाठी मुलगा बघत होते. पण तिला मुलगी बघण्याचा पारंपरिक कार्यक्रम मान्य नव्हता. मात्र लग्न म्हटले की दोन कुटुंबांचे, दोन जीवांचे मिलन असते हे तिला माहीत होते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती एका नातेवाईकाच्या लग्नात भेटायचे ठरले. पुढे या भेटी हॉटेल्स आणि घरातही झाल्या. दोघांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतल्यानंतर रीतिरिवाजानुसार त्यांचे लग्न झाले.

आता जोडीदाराची निवड समान मानसिकता आणि विचारधारेनुसार होऊ लागली आहे. तरुणाई आपली आवड, विचार यांसह दोन्ही कुटुंबांच्या आवडीचाही विचार  करू लागली आहे. आता परिस्थिती अगदी बिकट असेल तरच पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला जातो.

जयपूरमध्ये मॅट्रिमोनियल एजन्सी चालवणाऱ्या श्वेता विश्नोई सांगतात, ‘‘आवडीचाच जोडीदार हवा यावर ठाम राहायला तरुणाई शिकली आहे. आता लग्नाची व्याख्याही आपोआप बदलत आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांचे सखा, मित्र, प्रेमी आहेत. अशा बदलांमुळे विवाह संस्थेचे अस्तित्व टिकून राहील शिवाय अन्य संबंध त्यांना कधीच वेगळे करू शकणार नाही.’’

लग्नानंतर आठ वर्षांनी एका अपघातात राजेशच्या पत्नीच्या जवळपास सर्वच शरीराला लकवा मारला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले लहान होती. त्यांना आईची खूप गरज होती. राजेशने आपली जबाबदारी ओळखत उपचार आणि सेवा करून पत्नीला इतके बरे केले की ती मुलांशी बोलू शकेल. त्यांच्या लहानसहान गोष्टींवर लक्ष ठेवू शकेल. भलेही येथे राजेशची शारीरिक गरज दुय्यम होऊन गेली, पण यातून हे सिद्ध होते की पत्नी आणि मुलांप्रतीच्या या जबाबदारीची भावना लग्न संस्थेत प्रवेश करताच निर्माण होऊ लागते.

विवाहामुळे पती-पत्नीच्या शारीरिक आणि मानसिक गरजांची पूर्तता होते. जी समाजात कायदा सुव्यवस्था आणि शिस्त राखण्यासाठी गरजेची आहे. याच्या नसण्याने समाज मुक्त यौन संबंधांच्या चिखलात अडकला असता. लग्न पती-पत्नीच्या रूपात स्त्री आणि पुरुषाला यौन, आर्थिक आणि अन्य अधिकारांची सामाजिक व कायदेशीर मान्यता देते. वैवाहिक संबंधातून जन्मलेले मूल वैध आणि कायदेशीर मान्यता मिळालेले असते. यातून त्याचे अधिकार आणि कर्तव्य ठरते.

लग्न संस्थेचा दुसरा पैलू

घटस्फोटाचे अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत आणि पोलीस ठाणी हुंडयाच्या सामानाने भरली आहेत. हेच कारण आहे की लग्नासोबतच पती-पत्नीला आपली संपत्ती स्पष्ट करावी लागेल. हे दस्तावेजच लग्नानंतर होणाऱ्या वादातून वाचवतील. एकनिष्ठ राहण्याच्या भावनेला कीड लागली आहे का की मग कुटुंबाचा अनावश्यक हस्तक्षेप नाते टिकू देत नाही?

रीना आणि महेशच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. महेशने व्यवसायात जम बसवल्यावर रीनाने नोकरी सोडली. अचानक महेशला व्यवसायात नुकसान झाले आणि रीना पुन्हा नोकरी शोधू लागली, पण तिला ती मिळाली नाही. आर्थिक चणचण निर्माण झाल्याने दोघांमध्ये तणाव वाढला. कटकट रोजचीच झाली. तीन वर्षे सोबत राहूनही ते एकमेकांसाठीची जबाबदारी ओळखू शकत नव्हते. रीनाला वाटत होते की तिचे खूपच शोषण झाले तर याउलट रीनाने आपला भरपूर फायदा घेत मौजमजा केली, असे महेशला वाटत होते. अखेर एक दिवस दोघांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

खरंतर किती वर्षे सोबत होतो यापेक्षा ती सोबत किती सुंदर आणि गोड होती हे समजून घेणे जास्त गरजेचे आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करणे, सामाजिक समारंभात ग्रुप फोटोत हसताना दिसणे, फेसबुकवर प्रेम व्यक्त करणारा फोटो ठेवणे वेगळी गोष्ट आहे आणि एक आनंदी, विश्वास आणि सन्मानाने परिपूर्ण असलेले एकमेकांना समजून घेणारे नाते जगणे वेगळी गोष्ट आहे.

लग्न कसे ही होऊ देत सुरुवातीच्या दिवसांत फुललेले, बहरलेले असते, दोन शरीर, भिन्न लिंगाचे आकर्षण, खूप सारे स्वातंत्र्य यामुळे जणू पंखच मिळतात. पण हळूहळू कापराप्रमाणे प्रेम उडून जाते. आरोप-प्रत्यारोप, तक्रारी, नाराजी, बेचैनी, जे केले आणि जे केले नाही त्याचा हिशोब आणि शेवटी सुकलेल्या फांद्या असलेल्या वृक्षासारखे नाते, ज्याच्या फांद्यांवर टांगलेल्या रीतीभाती, जबाबदाऱ्या, चीडचिडेपणा त्याला कुरूप बनवतात. प्रेम विवाहातही असेच घडते.

नात्यात समानाधिकार हवा, नात्याचा सुगंध कापरासारखा न उडता कायम दरवळत राहावा, असा विचार जो करतो तो लग्नाच्या नावाने घाबरतो. मग तो मुलगा असो किंवा मुलगी. कदाचित अशीच भीती, प्रश्नांमधून लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग निघाला असेल. अर्थ स्पष्ट आहे. सोबत राहण्यात अडचण नाही, पण ती लग्न करण्यात आहे. काय आहे लग्न जे गरजेचे आहे आणि निश्चिंतपणाही नाही? का लग्नानंतर दोन व्यक्ती एकमेकांवर आगपाखड करतात, स्वत:चे अस्तित्व पणाला लावतात आणि दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्यासाठी आतूर होतात?

राजस्थान विद्यापिठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापक रजनी कुंतल यांनी सांगतात, ‘‘हे नाते समाज आणि रीतीरिवाजाचे बळी ठरले नसते, दोन व्यक्तींमधील एक समर्पण आणि दुसरा अधिकाराची अपेक्षा ठेवत पुढे गेला नसता आणि दोन व्यक्तींच्या नात्यात त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दरवेळी कुणी ना कुणी नाक खुपसले नसते तर कदाचित लग्न संस्थेचे स्वरूप काही वेगळेच असते. सन्मान आणि समानतेच्या भावनिक पायावर उभे राहिलेले हे नाते आयुष्यभर दरवळत राहिले असते. समाजाने लग्न संस्थेची दोरी आपल्या हातात ठेवली आहे. तो दोन व्यक्तींच्या अतिशय खासगी क्षणातील खासगी भावनांवरही नियंत्रण ठेवतो. ही दोरी लग्न संस्था तर वाचवते, पण यातून निर्माण होणाऱ्या प्रेमाचा गळा घोटते.’’

टिकवले तरच टिकते लग्न

लग्नानंतर स्त्री-पुरुष दोघांचेही आयुष्य बदलते. पण तरीही आपल्या समाजात सर्व समज मुलींनाच देण्यात येते. मुलांना क्वचितच काही सांगितले जाते किंवा मानसिकरित्या तयार केले जाते. काही दशकांपूर्वी यामुळे काहीच फरक पडत नव्हता, कारण तेव्हा मुलीलाच नवरीच्या रूपात नवे घर, कुटुंब, नात्यांनुसार स्वत:मध्ये आमूलाग्र बदल करावे लागत होते. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांच्या जगण्याच्या पद्धतीत काहीच फरक पडत नव्हता. पण जग बदलले तसे कुटुंबाचे स्वरूप आणि नात्याचे समीकरणही बदलले. पालनपोषण, महिलांची मानसिकता आणि त्यांच्या दृष्टिकोनातही बदल झाला. या परिवर्तनात हे गरजेचे झाले की पुरुषांनीही काही गोष्टी समजून या नव्या प्रकाशात नाते टिकवायला शिकायला हवे. यावरच लग्न संस्थेचे यश अवलंबून आहे.

प्राध्यापक रजनी कुंतल सांगतात, ‘‘पती-पत्नीचे नाते प्राथमिक असते. इतर नाती यातूनच तयार होतात. त्यामुळे स्वाभाविकपणे पत्नी आपल्या जोडीदाराकडूनच सहकार्य आणि आधाराची सर्वात जास्त अपेक्षा करते. म्हणून पतीसाठी गरजेचे आहे की तिचे ऐकून घ्यावे, तिच्या भावना समजून घ्याव्यात.’’

‘‘मुलाच्या लग्नानंतर कुटुंबाची रचना बदलते. सर्व व्यवस्था नव्याने तयार होते. यामुळे खासकरून काही महिला सदस्यांमध्ये ओढाताण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांनी काही तक्रार केल्यास पुरुष सदस्यांनी नि:पक्ष राहणे शिकायला हवे. जर पुरुषांनी समजावण्याचा प्रयत्न केला किंवा एकीचे म्हणणे दुसरीपर्यंत पोहोचवले तर परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडेल. अनेकदा असे प्रश्न महिलाच आपापसात समजून घेतात.

सुखी वैवाहिक जीवनासाठी ९ टीप्स

* गरिमा

पती-पत्नी आणि ती वा तो ऐवजी पती-पत्नी आणि जीवनाच्या आनंदासाठी नात्याला प्रेम, विश्वास आणि सामंजस्याच्या धाग्यांनी बळकट बनवावे लागते. लहानसहान गोष्टी दुर्लक्षित करायच्या असतात. अडचणीच्या काळात एकमेकांचा आधार बनावे लागते. काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते :

मॅसेजवर नव्हे तर संवादावर अवलंबून राहा : ब्रीघम युनिव्हर्सिटीत केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जी दाम्पत्य जीवनाच्या छोटया-मोठया क्षणांमध्ये मॅसेज पाठवून जबाबदारी पार पाडतात. उदा-चर्चा करायची असेल तर मॅसेज, माफी मागायची असेल तर मॅसेज, कुठला निर्णय घ्यायचा असेल तर मॅसेज अशा सवयी नात्यांमध्ये पाडतात जसं की आनंद आणि प्रेम कमी करतात. जेव्हा एखादी मोठी घटना असते तेव्हा जोडीदाराला सांगण्यासाठी खऱ्या चेहऱ्याऐवजी इमोजीचा आधार घेऊ नये.

अशा मित्रांची संगत ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे : ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जर आपल्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने डिवोर्स घेतला असेल तर आपणही असाच निर्णय घेण्याची शक्यता ७५ क्क्यांपर्यंत वाढते.

पती-पत्नीने बनावे बेस्ट फ्रेंड्स : ‘द नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक’द्वारा केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जी दाम्पत्य एकमेकांना बेस्ट फ्रेंड मानतात, ती दुसऱ्यांच्या तुलनेत आपले वैवाहिक जीवन दुपटीने जास्त समाधानाने जगतात.

छोटया-छोटया गोष्टीही असतात महत्वपूर्ण : भक्कम नात्यांसाठी वेळोवेळी आपल्या जीवनसाथीला तो वा ती स्पेशल असल्याची जाणीव करून देणे गरजेचे असते. हे दर्शवणेही आवश्यक आहे की आपण त्यांची काळजी घेता आणि त्यांच्यावर प्रेम करता. यामुळे फारकतिची समस्या येत नाही. आपण जरी जास्त काही नाही तरी एवढे तर करूच शकता एक छोटेसे  प्रेमपत्र जोडीदाराच्या पर्समध्ये हळूच ठेवणे किंवा दिवसभराच्या कामानंतर त्यांच्या खांद्यांना प्रेमाने मसाज देणे. त्यांचा वाढदिवस किंवा आपल्या लग्नाचा वाढदिवस विशेष बनवा. कधी-कधी त्यांना सरप्राईज द्या. अशा छोटया-छोटया घटना आपल्याला त्यांच्याजवळ नेतात.

आपासातील विवाद अधिक चांगल्याप्रकारे हाताळा : नवरा-बायकोत विवाद होणे खूप स्वाभाविक आहे आणि यापासून कोणी वाचू शकत नाहीत. पण नात्यांची बळकटी या गोष्टीवर अवलंबून असते की आपण हे कशाप्रकारे हाताळतो. आपल्या जोडीदाराबरोबर नेहमी सभ्य आणि सौम्य व्यवहार करणाऱ्यांचे नातेसंबंध लवकर तुटत नाहीत. भांडण किंवा वाद-विवादादरम्यान ओरडणे, अपशब्द बोलणे किंवा मारहाण करणे, नात्यांमध्ये विष कालवण्यासारखे आहे. अशा गोष्टी मनुष्य कधीही विसरत नाही आणि  त्यामुळे वैवाहिक जीवनावर याचा अनिष्ट प्रभाव पडतो.

एका अभ्यासात या गोष्टीचा खुलासा केला आहे की कशाप्रकारे फायटिंग स्टाईल आपल्या वैवाहिक जीवनाला प्रभावित करते. लग्नाच्या १० वर्षांनंतर असे कपल्स की ज्यांनी फारकत घेतली आहे आणि तसे कपल्स की जे आपल्या जीवनसाथीबरोबर आनंदाने जीवन जगत आहेत. या दोहोंमध्ये जो सगळयात महत्त्वाचा फरक आढळून आला तो म्हणजे परस्पर म्हणजे लग्नानंतरच्या एक वर्षात त्यांचे परस्परांतील विवाद आणि भांडणे हाताळण्याची पद्धत. ते कपल्स ज्यांनी लग्नाच्या सुरूवातीच्या काळात आपल्या जीवनसाथीबरोबर वेळोवेळी क्रोध आणि नकारात्मक पद्धतीने वर्तन केले त्यांचा डिवोर्स १० वर्षाच्या आतच झाला.

संवादाचा विषय विस्तृत असावा : पती-पत्नीमध्ये संवादाचा विषय घरगुती मुद्दयांव्यतिरिक्त असायला हवा. नेहमी कपल्स म्हणतात की आम्ही तर आपसात बोलत असतो, संवादाची काहीही कमी नाहीए. पण जरा लक्ष्य द्या की आपण काय बोलत असता, नेहमी घर आणि मुलांशी संबंधित बोलणेच पुरेसे नसते. आनंदी जोडपे ते असते, जे आपसात आपली स्वप्नं, आशा, भीती, आनंद आणि यश सर्वावर बोलतात. एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही वयात आणि कधीही रोमँटिक होणे ते जाणतात.

चांगल्या प्रसंगाना सेलिब्रेट करा : ‘जनरल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये प्रकाशित एका शोधानुसार चांगल्या प्रसंगांमध्ये पार्टनरचे साथ देणे चांगलेच आहे, पण त्याहीपेक्षा गरजेचे आहे की दु:ख, समस्या आणि अडचणीच्या वेळी आपल्या जीवनसाथीबरोबर उभे राहणे. पूर्व अमेरिकी राष्ट्रपती बिल क्लिंटनवर मोनिका लेविंस्कीने जेव्हा लैंगिक शोषणाचा आरोप लावला, तेव्हा त्यावेळीसुद्धा हिलरी क्लिंटनने आपल्या पतिची साथ सोडली नाही. त्या दिवसांतील दिलेल्या साथीमुळे दोघांचे नाते अजून बळकट केले.

रिस्क घ्यायला घाबरू नये : पती-पत्नीच्यामध्ये जर नाविन्य, विविधता आणि विस्मयकारक गोष्टी घडत असतील तर नात्यात ताजेपणा आणि सामर्थ्य टिकून राहते. एकसाथ मिळून नवीन-नवीन एक्साइटमेंट्सने भरलेल्या अॅक्टिव्हीटिजमध्ये सहभागी व्हावे, नवीन-नवीन स्थळी फिरायला जावे, रोमांचक प्रवासाची मजा घ्यावी, लाँग ड्राईव्हवर जावे, एक-दुसऱ्याला खाणे-पिणे, फिरणे, हसणे, मस्ती करणे आणि समजून घेण्याचे विकल्प द्यावेत. कधी नात्यामध्ये कंटाळवाणेपणा आणि औदासीन्य येऊ देऊ नये.

केवळ प्रेम पुरेसे नाही : आपण जीवनात आपल्या प्रत्येक प्रकारच्या कमिटमेंटसाठी पूर्ण वेळ देतो. ट्रेनिंग्स घेतो, जेणेकरून आपण त्याला चांगल्याप्रकारे पुढे घेऊन जाऊ शकू. ज्याप्रकारे खेळाडू खेळाच्या टिप्स शिकतात, वकिल पुस्तके वाचतात, आर्टिस्ट वर्कशॉप्स करतात अगदी त्याचप्रकारे लग्नाला यशस्वी बनवण्यासाठी आपण काही ना काही नवीन शिकायला आणि करायला तयार राहायला हवे. फक्त आपल्या जोडीदाराशी प्रेम करणेच पुरेसे नाही तर त्या प्रेमाची जाणीव करून देणे आणि त्यामुळे मिळणारा आनंद सेलिब्रेट करणेही गरजेचे आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्यास अशाप्रकारचे नवीन-नवीन अनुभव शरीरात डोपामिन सिस्टमला अॅक्टिवेट करतात. ज्यामुळे आपला मेंदू लग्नाच्या सुरूवातीच्या वर्षात अनुभव होणाऱ्या रोमँटिक क्षणांना जगण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांना पॉजिटीव्ह गोष्टी बोलणे, प्रशंसा करणे आणि सोबत राहणे नात्यात बळकटी आणते.

जीवघेणा रोग, पत्नी वियोग

* भारत भूषण श्रीवास्तव

प्रेम खरोखरच माणसाला आंधळं बनवतं. त्यामुळे माणूस एवढा भावुक, भयभीत आणि संवेदनशील होतो की व्यवहार व दुनियादारी शिकू शकत नाही. अगदी हेच ऋषीशसोबत घडले. त्याने नेहासोबत लव्हमॅरेज केलं होतं. प्रेयसी पत्नीच्या रूपात मिळाल्यामुळे तो खूप खूश होता. पेशाने फुटबॉल कोच आणि ट्रेनर ऋषीशचा आनंद त्यावेळी आणखी दुप्पट झाला, जेव्हा जवळपास दीड वर्षांपूर्वी नेहाने छानशा बाहुलीला जन्म दिला.

भोपाळमधील कोलार भागात असलेल्या मध्य भारत योध्दाज क्लबला प्रत्येक जण ओळखतो. त्याचा कर्ताधर्ता ऋषीश होता. हसतमुख आणि आनंदी असलेल्या या खेळाडूला जो कोणी एकदा भेटत असे, तो त्याचाच होऊन जात असे. परंतु कोणाला माहीत नव्हतं की वरून खूश असल्याचे नाटक करणारा हा माणूस काही काळापासून आतल्या आत खूप कुढत होता. ऋषीशच्या जीवनात काही असं घडलं, ज्याची त्याला स्वत:लाही कधी अपेक्षा नव्हती.

गेल्या ३ जुलैला ३२ वर्षीय ऋषीश दुबेने विष पिऊन आत्महत्या केली, तेव्हा ज्यालाही कळलं, त्याला त्याच्या आत्महत्येचं कारण जाणून आश्चर्य वाटलं. ऋषीशने पत्नीच्या विरहात जीव दिला. त्याचे आई-वडील दोघंही बँक कर्मचारी आहेत. त्या संध्याकाळी जेव्हा ते घरी परतले, तेव्हा ऋषीश घरात बेशुध्द पडलेला होता.

घाबरलेले आईवडील लगेच मुलाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यू संशयास्पद होता, त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं, तेव्हा कळलं की ऋषीशने विष घेतलं होतं. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. परंतु मरण्यापूर्वी ऋषीशने आपल्या आठवणींचे पोस्टमार्टेम पेनाने कागदावर केले, ते नष्ट होणारे नव्हते. कारण ते शरीर नव्हे, भावना होत्या.

तर मी नसणार

कुटुंब, समाज आणि जगाच्या विरोधात जाऊन नेहाशी लग्न करणारा ऋषीश ३ जुलैला सहजच हिंमत हरला नव्हता. हिंमत हरण्याचं कारण होतं, त्याला कायम धीर देणारी नेहा काही महिन्यांपासून त्याला सोडून माहेरी जाऊन राहिली होती.

पतिशी भांडण झाल्यानंतर पत्नीचे माहेरी जाऊन राहणे काही नवीन गोष्ट नाही, उलट ही एक परंपराच ठरत आहे. जी नेहानेही निभावली आणि जाताना छोट्या मुलीलाही सोबत घेऊन गेली, जिच्यावर ऋषीशचे खूप प्रेम होते.

२ महिन्यांपूर्वी काहीतरी कारणावरून दोघांत भांडण झालं होतं. हीसुध्दा काही आश्चर्याची गोष्ट नव्हती, परंतु नेहाने ऋषीशची तक्रार पोलीस स्टेशनला केली.

आपल्या सुसाइड नोटमध्ये ऋषीशने नेहाला उद्देशून लिहिलं होतं की तू माझी साथ सोडलीस, तर मी राहणार नाही आणि मी सोबत सोडून जाईन, तेव्हा तू राहणार नाहीस.

४ पानांची लांबलचक सुसाइड नोट भावुकता आणि विरहाने भरलेली आहे, ज्याचे सार याच २ वाक्यात सामावलेले आहे. दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झाले तरी दोघंही एकमेकांशिवाय राहणार नाहीत. म्हणजेच स्थिती ‘मिलके ना होंगे जुदा आ वादा कर ले’सारखी होती.

वचन नेहाने मोडलं आणि ते पोलीस स्टेशनला नेऊन सार्वजनिकही केलं, त्यामुळे ऋषीशच्या मनाला वेदना होणं स्वाभाविक होतं. ही तिच पत्नी होती, जी त्याच्या मनाला शांती आणि रात्री सुखाची झोप देत असे. आपसात थोडीशी खटपट काय झाली की ती सर्व विसरून गेली.

वेगळे होण्यापासून आत्महत्येपर्यंत

तू मला धोका दिलास, धन्यवाद… पत्नीला लग्नापूर्वी दिलेल्या वचनांची आठवण करून देणारा ऋषीश काय खरोखरच आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करत होता की तो तिच्याशिवाय जगू शकत नव्हता. या प्रश्नाचे उत्तर भलेभले तत्त्वज्ञानी आणि मनोवैज्ञानिकही क्वचितच देऊ शकतील.

ऋषीशच्या आत्महत्येच्या कारणाचा एक पैलू जो स्पष्ट दिसतो, तो हा आहे की त्याची पत्नीकडून अशी अपेक्षा नव्हती. पण असे तर अनेक पतींबाबत घडते की पत्नी एखाद्या विवाद किंवा भांडणामुळे माहेरी जाऊन राहू लागते. पण सर्व पती पत्नीच्या वियोगात आत्महत्या करत नाहीत?

म्हणजे आत्महत्या करणारे पती पत्नीवर एवढं प्रेम करतात की तिचं दूर राहणं सहन करू शकत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी कमी, नकारार्थी जास्त मिळते. ज्यांची खासगी कौटुंबिक आणि सामाजिक कारणे आहेत, जी आता वाढत आहेत, ज्यामुळे पत्नीच्या वियोगात पतींच्या आत्महत्येची प्रकरणे वाढत आहेत.

सामाजिक दृष्टीने पाहिले, तर काळ खूप बदलला आहे. कधी पत्नी खूप त्रास सहन करतात, परंतु माहेरच्यांचा हा सल्ला लक्षात ठेवतात की ज्या घरात लग्न करून जातेस, त्या घरातूनच तुझी अंत्ययात्रा निघाली पाहिजे.

या सल्ल्याची अनेक कारणे होती. त्यात पहिले महत्त्वाचे हे होते की पती व सासरच्यांशिवाय स्त्रीचे जीवन कवडीमोलाचेही राहत नाही. दुसरे कारण आर्थिक होते. समाजात व नातेवाइकांत त्या महिलांना चांगल्या नजरेने पाहिले जात नव्हते, जी पतिला सोडून देत असे किंवा ज्यांना पती सोडून देत असे. आता स्थिती उलट आहे. आता त्या पतींना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही, ज्यांच्या पत्नी त्यांना सोडून निघून जातात.

पतिला सोडणे सामान्य गोष्ट

पत्नी वियोग पूर्वीसारखी सहजरीत्या स्वीकारली जाणारी गोष्ट राहिलेली नाही की जाऊ दे, दुसरं लग्न करू असे आता होत नाही. शिवाय असेही म्हटले जाऊ शकते की आपण एका सभ्य, शिस्तबध्द आणि नात्यांना समर्पित असलेल्या समाजात राहतो.

या सभ्य समाजाचे तत्त्व हेही आहे की पत्नी जर पतिला सोडून निघून जात असेल, तर पतिचं जगणं कठीण होतं. त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून अनेक असे प्रश्न विचारले जातात की तो घाबरून जातो. अशाच काही कमेंट्स अशा प्रकारे आहेत.

तिला खूश ठेवू शकला नाहीस का? तिचं दुसरीकडे कुठे अफेयर चालू आहे का? घरचे तिला त्रास देत होते का? तिच्यात काही खोट आहे का? काय मित्रा, एक स्त्री सांभाळू शकत नाहीस, कसला पुरुष आहेस तू? आजकाल महिला स्वतंत्र्य आणि स्थितीचा फायदा अशाच प्रकारे उठवतात. जाऊ दे गेली तर, चुकूनही माघार घेऊ नकोस. आता फसलास बेट्या, पोलीस, न्यायालयाच्या फेऱ्यात. असं ऐकलंय की तिने तक्रार नोंदवलीय? आता रात्र कशी घालवतोस? दुसरी व्यवस्था झाली का?

कोणत्याही पतिची अशा अनेक असभ्य प्रश्नांपासून सुटका होत नाही. विशेषत: तेव्हा, जेव्हा पत्नी कोणत्याही परिस्थितीत परत यायला तयार नसते.

काय करणार बिचारा

पत्नीने परत न येण्याच्या स्थितीत पतिजवळ काही दुसरा पर्याय नसतो. पहिला मार्ग कायद्याजवळून जातो. त्यावरून सुशिक्षित, समजदार तर दूरच, पण अशिक्षित, अडाणी पतिचीही जायची इच्छा नसते. या मार्गावरील अडचणींचा सामना करण्याची ताकद प्रत्येकातच असते असे नाही. पत्नीला परत आणण्याचा कायदा अस्तित्वात आहे, परंतु तो तसाच आहे, जसे इतर कायदे आहेत. म्हणजेच ते असतात, पण त्यांची अंमलबजावणी करणे सोपं नसतं.

दुसरा मार्ग पत्नीला विसरून जाण्याचा आहे. बहुतेक पती हा स्वीकारतातही, परंतु या विवशता आणि अटीसोबत की जोपर्यंत नाते कायदेशीरपणे पूर्णपणे संपुष्टात येत नाही, तोपर्यंत जपमाळ जपत बसा, म्हणजेच अनेक सुखांपासून वंचित राहा.

तिसरा आणि चौथा मार्गही आहे, पण तोही प्रभावी नाहीए. खरा त्रास त्या पतींना होतो, जे खरोखरच आपल्या पत्नीवर प्रेम करतात. ते मार्ग शोधत नाहीत, तर सरळ निर्णयापर्यंत येतात, म्हणजेच आत्महत्या करतात. जशी भोपाळच्या ऋषीशने केली आणि जशी राजस्थानातील उदयपूरमधील विनोद मीणाने केली होती.

आत्महत्या आणि बदलाही

गेल्या २४ जुलैला उदयपूरच्या गोवर्धन विलास पोलीस ठाणे भागात राहणाऱ्या विनोदचेही काहीतरी कारणावरून पत्नीशी भांडण झाले, तेव्हा तीही माहेरी निघून गेली.

५ दिवस विनोदने पत्नीची वाट पाहिली, पण ती आली नाही, तेव्हा त्याने अशा प्रकारे आत्महत्या केली की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहील. कोल माइंसमध्ये काम करणाऱ्या विनोदने स्वत:ला डॅटीनेटर बांधला. म्हणजेच मानवी बॉम्ब बनला आणि स्वत:ला आग लावली. विनोदच्या शरीराच्या एवढ्या चिंध्या उडाल्या की, त्याचे पोस्टमार्टेम करणेही कठीण झाले.

विनोदच्या उदाहरणात प्रेम कमी आणि दबाव जास्त आहे, ज्याचा बदला त्याने स्वत:शीच घेतला. कदाचित विनोदच्याही इतर आत्महत्या करणाऱ्या पतींप्रमाणे पुरुषार्थावर आघात झाला असेल किंवा स्वाभिमान दुखावला असेल किंवा तोही जगाच्या अपेक्षित प्रश्नांचा सामना करण्यास घाबरला असेल. काहीही असो, परंतु पत्नीच्या वियोगात एवढ्या घातक आणि हिंसक पध्दतीने आत्महत्या करण्याचे हे प्रकरण अपवाद होते. यात ऋषीशप्रमाणे काव्य किंवा भावुकता नव्हती. होती ती केवळ एक चीड आणि चरफड, जी त्या प्रत्येक पतित असते, ज्याची पत्नी त्याला जाहीररीत्या सोडते.

मग जाऊ का देता?

पत्नीच्या वियोगात आत्महत्या मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील २१ वर्षीय ब्रजलालनेही केली होती. पण त्याचे कारण वेगळे होते. ब्रजलालच्या लग्नाला अजून ३ महिनेच झाले होते की त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.

ब्रजलालसमोर काळजी आणि तणाव हा होता की तो नातेवाईक आणि समाजाच्या बोचऱ्या प्रश्नांना कसा सामोरा जाणार. अर्थात, इच्छा असती तर करूही शकला असता, पण २१ वर्षाच्या तरुणाकडून अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे की तो जगाशी लढेल.

इथे कारण वियोग नव्हे, तर अब्रू होते. ब्रजलालजवळ पुरेसा वेळ आणि संधी होती की तो आपल्या पत्नीची कृत्य आणि तिच्या माहेरच्यांची चूक लोकांना सांगू शकला असता व घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करू शकला असता. हीसुध्दा दीर्घ प्रक्रिया होती, पण त्यासाठी त्याच्याकडे वेळ होता, पण हिंमत, संयम आणि समजदारी नव्हती.

वेळ त्यांच्याकडे नसतो, ज्यांच्या पत्नीने काही किंवा अनेक वर्षे प्रेमाने घालवलेली असतात, परंतु मग अचानक सोडून निघून जातात. अशा वेळी हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे की जे पती पत्नीशिवाय राहू शकत नाहीत, ते शेवटी त्यांना जाऊ का देतात?

हा एक विचारात टाकणारा प्रश्न आहे, त्यात असं वाटत नाही की पत्नीवर प्रेम करणारा कोणताही पती जाणीवपूर्वक तिला पळवून लावतो किंवा जाऊ देतो. हमरीतुमरीवर येणे सामान्य बाब आहे आणि दाम्पत्य जीवनातील हिस्साही आहे, परंतु इथे येऊन पतींना वकिली करण्यास विवश व्हावं लागतं की पत्नी आपल्या मनमानीमुळे जातात. त्या आपल्या अटींवर जगण्याचा हट्ट करू लागल्या, तर पती बिचारे काय करणार? ते आधी त्यांना जाताना पाहत राहतात, मग विरहाचे गीत गातात आणि मग पत्नीला बोलावतात. एवढं होऊनही ती आली नाही, तर तिच्या वियोगात आत्महत्या करतात.

काही पत्नी पतिच्या प्रेमाला हत्यारासारखे वापरतात का? या प्रश्नाचे उत्तरही स्पष्ट आहे की हो करतात, ज्याचा परिणाम कधीकधी पतिच्या आत्महत्येच्या रूपात समोर येतो.

एखादी पत्नी असा हट्ट करत असेल की लग्नाला ५ वर्षे झाली. आता आई-बाबा किंवा कुटुंबापासून वेगळे राहू या, तर पतिचे चिडणे स्वाभाविक आहे की सर्वकाही सुरळीत चालू असताना, वेगळं का राहायचं? यावर पत्नी हट्ट करत अशी अट थोपते की ठीक आहे, जर आईवडिलांपासून वेगळं व्हायचं नसेल, तर मीच निघून जाते. जेव्हा डोकं ठिकाणावर येईल, तेव्हा न्यायला या. आणि ती खरोखरच सुटकेस उचलून मुलांना घेऊन किंवा मुलांना न घेताही निघून जाते. मागे सोडते, पतिसाठी संभ्रम, ज्याचा काही अंत किंवा उपाय नसतो.

अशी अजून अनेक कारणे असतात. त्यामुळे पत्नी चार दिवस एकटा राहील, तेव्हा त्याला बायकोची किंमत कळेल असा विचार करतात.

या पत्नी असा विचार करत नाहीत की पतिच्या आयुष्यात त्यांची किंमत आधीच आहे, जी अशा प्रकारे वसूल करणे घातक सिध्द होऊ शकते. यावरही पतिने ऐकले नाही, तर पोलीस स्टेशन आणि कोर्टकचेरीची पाळी आणणे म्हणजे पतिला आत्महत्येसाठी प्रोत्साहन देण्यासारखीच गोष्ट आहे.

दोघंही बचाव करा

पत्नीचं थेट समर्थन करणारी माहेरची माणसेही या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. मुलगी किंवा बहीण जे सांगते तेच खरं मानून चालतात आणि तिची साथही असं म्हणून सोडून देतात की, ‘अस्सं, तर ही गोष्ट आहे, आम्ही अजून मेलो नाहीए.’

मरतो तर तो पती, जो सासरच्या लोकांकडून अशी खोटी आशा करतो की ते मुलीच्या चुकीला थारा देणार नाहीत, उलट तिला समजावतील की तिने आपल्या घरी जाऊन राहावे. तिथे पती व त्याच्या घरच्यांना तिची आवश्यकता आहे. थोडंसं भांडण तर चालतच राहतं. त्यासाठी घर सोडणं शहाणपणाचं लक्षण नाही.

पण असे घडत नाही, तेव्हा पतिची उरली-सुरली आशाही संपुष्टात येते. भावुक स्वभावाचे पती जे खरोखरच पत्नीशिवाय राहू शकत नाहीत, त्यांना आपले आयुष्य वाया गेल्यासारखे वाटू लागते आणि ते हळूहळू सर्वांपासून दूर होऊ लागतात. त्यामुळे थोडीशी चूक त्यांचीही आहे, असे म्हणावे लागेल. पत्नी निघून गेल्यानंतर पतिने थोडा संयम बाळगावा, तर त्यांचे जीवन वाचू शकते.

पत्नीने काय करावं?

खरोखरच जर एखादी समस्या असेल, तर पत्नीने पतिसोबत राहत असतानाच ती सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण पतिपत्नी खरोखरच एका गाडीची दोन चाकं आहेत. ज्यांना घराबाहेरची लढाई संयुक्तपणे लढायची असते. पती जर आर्थिक, भावनात्मक किंवा खासगीरीत्या पत्नीवर जास्त अवलंबून असेल किंवा असामान्य रूपाने संवेदनशील असेल, तर पत्नीने त्याला सोडून जाऊ नये, ही पत्नीची जबाबदारी असते.

पत्नी स्वत:च्याच करतुतीने विधवा होत असेल अशा हट्टाचे कौतुक करायला हवे का? नक्कीच कोणाला हे पटणार नाही.

आईवडिलांची भूमिका

पतिच्या घरचे विशेषत: आईवडिलांनीही अशा वेळी मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि सून येत नसेल तर मुलाला समजवावे की यात खास काही चुकीचे नाहीए आणि त्यामुळे प्रतिष्ठा धुळीला मिळत असेलही तरी मुलाच्या खुशीपुढे त्याची काही किंमत नाहीए. अशा प्रकारच्या गोष्टी त्याला हिंमत देतील. जर तुम्ही एवढेही करू शकत नसाल, तर त्याला टोमणे मारू नका.

पतिला सोडून निघून जाणाऱ्या पत्नी आणि बुचकळ्यात पडलेल्या पतींसाठी ‘आप की कसम’ चित्रपटातील ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मुकाम, वे फिर नहीं आते…’ हे जरूर गुणगुणले पाहिजे.

पत्नी विरहप्रधान या चित्रपटात नायक बनलेल्या राजेश खन्नाने आत्महत्या तर केली नव्हती, पण त्याचे जीवन कशाप्रकारे मृत्यूपेक्षाही वाईट अवस्थेत गेलं होतं, हे चित्रपटात सुंदररीत्या दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पतींनीही या गाण्याचा अंतरा लक्षात ठेवला पाहिजे.

‘कल तडपना पडे याद में जिन की, रोक ‘कल तडपना पडे याद में जिन की, रोक लो उन को रूठ कर जाने ना दो…’

नणंद भावजयीचं नातं थट्टामस्करीचं

* मोनिका अग्रवाल

बहुतेकदा असं दिसून येतं की नणंदेचं वर्चस्व असल्याने भावजयीवर अत्याचार होतात. नणंद मग ती माहेरी राहात असो की सासरी, ती आपल्या वाहिनीविरुद्ध आपल्या आईचे कान भरत असते. भावाला भडकवत राहते. याचं कारण हे आहे की बहीण भावावर आपला पूर्ण अधिकार आहे असं मानते आणि आपला गर्व आणि अहंकार गाजवू पहाते. जर भाऊ दूरदर्शी नसेल तर बहिणीच्या बोलण्यात येतो आणि मग त्याची पत्नी अत्याचाराची शिकार होते.

नणंद-भावजयीच्या या भांडणांमागे काय कारण आहे याबद्दल कधी कोणी विचार केला आहे का? जर तुम्ही हे कारण शोधाल तर तुम्हाला उत्तर मिळेल ‘मीपणा.’ जोपर्यंत हा तुमच्यात असेल तोपर्यंत तुम्ही कोणाबरोबर आपल्या नात्याची गाडी फार दूरवर घेऊन जाऊ शकत नाही.

अलीकडचीच एक घटना आहे. ज्यात लखनौस्थित एका कुटुंबात नणंद आणि भावजय यांच्यात लहान सहान गोष्टींवरून भांडण व्हायचं. नणंदेला जेव्हा सहन झालं नाही तेव्हा तिने भावजयीशी झालेल्या भांडणावरून एक कट रचला.

अचानक तिच्या भावाला एका अनोळखी नंबरवरून फोन येऊ लागले. त्याने विचारल्यावर पलीकडून तो सांगायचा की तो त्याच्या बायकोचा प्रेमी बोलतो आहे. प्रकरण इतकं चिघळलं की लग्नाच्या ४ महिन्यातच घटस्फोटाची वेळ आली. २ महिन्यांपासून ही विवाहिता आपल्या माहेरी आहे. या विवाहितेने महिला हेल्प लाईनकडे मदत मागितली. तपास सुरु होताच नणंदेने रचलेला कट समोर आला.

क्षुल्लक कारणं पण वाद मोठा : नणंद-भावजय यांची भांडणं काही क्षुल्लक कारणांवरून होतात. जसे लग्नाआधी घरातल्या प्रत्येक वस्तूवर नणंदेचा अधिकार असतो, परंतु लग्नानंतर परिस्थिती बदलत जाते. आता नणंद घरात पाहुणी होते आणि भावजय मालकीण. अशात प्रत्येक लहान सहान गोष्टीत नणंदेचा हस्तक्षेप भावजयीला सहन होत नाही. बस्स, इथूनच सुरुवात होते या नात्यातील कडवटपणाला.

हे एक सार्वभौमिक सत्य आहे की आपल्याला कधी ना कधी आपले हक्क दुसऱ्याकडे सोपवावे लागतात. आपण नेहमी मालक बनून राहिलो तर आपण कधीच कोणाचं प्रेम आणि विश्वास मिळवू शकणार नाही. आपली थोडीशी नम्रता आणि अधिकारांची विभागणी आपल्या नात्याला माधुर्य आणू शकते.

प्राथमिकता बदलते : बहीण होण्याच्या नात्याने तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की लग्नानंतर भावाच्या जबाबदाऱ्या आणि प्राथमिकतासुद्धा बदलतात. स्वत:ला भावनात्मक रूपात परावलंबी होऊ देऊ नका, उलट दोघांचं नातं बळकट करायला मदत करा. नणंद आणि भावजयीला हे समजायला हवं की एखाद्या व्यक्तिसाठी पत्नी आणि बहिण दोघीही आवश्यक असतात. म्हणून त्या व्यक्तीवर दोघींपैकी एकीची निवड करण्याचा दबाव आणू नका.

प्रभुत्व : हे खरं आहे की नव्या घरात प्रत्येक भावजयीला वाटतं की तिला स्वातंत्र्य असावं आणि तिला तिच्या मर्जीने काम करता यावं. उलट नणंदेला वाटतं की जर आधी तिचं म्हणणं ऐकलं जायचं, तसंच आताही भावाच्या लग्नानंतरही व्हावं. जर या घरात नेहमी तिचं ऐकलं जात होतं तर आताही तिचंच ऐकायला हवं. परंतु दोघीना समजायला हवं की काळाप्रमाणे परिस्थिती बदलत जाते.

समवयस्क असणे : भावजय आणि नणंद दोघींचं वय साधारण सारखं असतं. दोघींना समजायला हवं की त्यांच्यामुळे त्यांच्या भावाला किंवा पतीला त्रास होऊ नये. समवयस्क असल्याने दोघींमध्ये नेहमी भांडण होत असतं. नणंद भावजयीच्या नात्याला मैत्रीच्या नात्यात बदलायचा प्रयत्न करा. मतभेद झाले तर दोघीनी शांत राहावं. प्रयत्न करा की भांडण वाढण्याआधीच मिटेल.

नाती जोडण्याआधी आपण त्याच्या दूरगामी परिणामांचाही विचार करायला हवा, कारण आपल्याला खूप लांब रस्ता पार करायचा आहे. नाती ही तयार करत तोडायची वस्तू नाही. ही तर आजन्म निभावण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्यभर हे निभावयाचे आहेत तर प्रेमाच्या अमृताने शत्रुत्वाचं विष नाहीसं का करू नये.

सरप्राइज व्हिझिटचे शिष्टाचार

* शिखा जै

वेळेच्या अभावामुळे नाती निभावण्याच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. व्यस्ततेमुळे अलीकडे लोक मोबाइल इंटरनेट इत्यादींच्या वापरामुळे एकमेकांच्या संपर्कात राहातात. परंतु जरा विचार करी की मित्रांना भेटून गप्पा मारणं आणि त्यांच्या घरी जाऊन मजा करण्याची कमी इंटरनेट वा फोन पूर्ण करू शकतात का? नाही ना? मग जे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून केलेलं नाहीए ते आता का करू नये? तर चला, तुमच्या मित्रांच्या आणि नातेवाइकांच्या घरी सरप्राइज व्हिझिट करूया.

अनेक लोकांना वाटतं की बऱ्याच दिवसांपासून आपल्या नातेवाइकांकडे जायचं तर आहे परंतु वेळ नसल्यामुळे जाता येत नाही. परंतु एकदा का तुम्ही ठरवलंच आहे की सरप्राइज व्हिझिट करायचीच आहे तर ती कराच. परंतु असं करतेवेळी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे; कारण तुम्ही तिथे मौजमजा करायला जात आहात, त्यांना त्रास द्यायला नाही.

चला तर सरप्राइज व्हिझिट देऊन ती संस्मरणीय कशी करायची ते जाणून घेऊया.

त्यांच्या सुविधेचीदेखील काळजी घ्या : मित्र आणि नातेवाइकांकडे अचानक जाणं चांगली गोष्ट आहे. परंतु असं करतेवेळी या गोष्टीची काळजी घ्या की कोणाच्याही घरी वीकेंडलाच जा म्हणजे त्यांना त्रास होणार नाही आणि ते तुम्हाला पूर्ण वेळ देऊ शकतील.

युक्तीने माहिती काढा : ज्यांच्या घरी तुम्हाला जायचंय ते त्यांच्या घरी आहेत की नाही? त्यांचा त्या दिवशीचा एखादा प्रोग्राम तर नाही ना? त्यांच्या घरी दुसरा कोणी पाहुणा तर येणार नाही ना? हे सर्वप्रथन जाणून घ्या. त्यासाठी सर्वप्रथम त्यांच्याशी फोनवरून इकडच्यातिकडच्या गप्पा मारून घ्या. त्यानंतर आज ते काय करत आहेत याबाबतदेखील माहिती घ्या आणि नंतर त्यानुसार जाण्याचा प्रोग्राम ठरवा.

पाहुणचार करून घेऊ नका : तुम्ही त्यांच्या घरी अचानक जात आहात, तेव्हा या गोष्टीचीदेखील काळजी घ्या की त्यांना कामालाच जुंपू नका, उलट तुम्ही काही वेळासाठी तिथे गेला असाल तर गप्पागोष्टी आणि थट्टामस्करीदेखील करा. फक्त खाणंपिणं करत राहू नका. मिठाईबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूदेखील घेऊन जा.

जुन्या आठवणींना उजाळा द्या : खूप दिवसांनंतर भेटला आहात मग काय झालं, हिच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या छानशा आठवणींना उजाळा देऊ शकता. आपल्या मित्रांशी आपल्या मनातील गोष्टी शाळाकॉलेजप्रमाणेच शेअर करा. अशा काही गोष्टी ज्या त्यांच्या आणि तुमच्यादेखील आवडत्या होत्या, त्यादेखील आठवा. अधिक वेळ लावू नका. सरप्राइज व्हिझिट नेहमी छोटीशी ठेवा. २५-३० मिनिटापेक्षा अजिबात जास्त नाही आणि या दरम्यान भरपूर थट्टामस्करी करून घ्या.

रागरूसवेदेखील दूर करा : तुम्ही जर खूप काळानंतर भेटत असाल आणि यापूर्वी काही गोष्टींवरून तुमच्यामध्ये काही वाद असतील ज्याचा प्रभाव तुमच्या नात्यांवर पडला असेल तर ते सर्व आता मिटवून टाका. तुमच्या मनातील सर्व गोष्टी त्यांच्याशी शेअर करा आणि त्यांचं ऐका. विश्वास ठेवा, तुमचे नातेसंबंध नक्कीच सुधारतील.

गिफ्ट खास असावं : तुमच्या नातेवाइकांकडे जाणार असाल तर गिफ्ट, खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणजेच जे काही नेणार असाल ते त्यांच्या पसंतीचं असायला हवं वा मग उपयोगी असावं. जसं की तुम्ही त्यांच्यासाठी मिठाईच्या ऐवजी ड्रायफ्रूट घेऊन जा, जे ते अनेक दिवस खातील आणि तुमची आठवण कढतील. गिफ्ट द्यायचं असल्यास ऑर्गेनिक गिफ्टदेखील देऊ शकता. जसं की ऑर्गेनिक, चहा, कॉफी, सोप क्रीम, हेअर अॅण्ड स्किन केअर रेंज वा प्लांट्स इत्यादी. गिफ्ट कोणतंही असो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ते त्यांना नंतरदेखील लक्षात राहील असं असतं.

अचानक बनविलेला प्रोग्राम छान असतो : अनेकदा आपण प्लान करून जेव्हा एखादा प्रोग्राम बनवितो तेव्हा अनेकांची परवानगी घेण्याच्या वादात प्रोग्राम बनतच नाही वा मनातील गोष्ट पूर्ण न झाल्यामुळे कोणती ना कोणती व्यक्ती असमाधानीच राहाते. परंतु जेव्हा आपण अचानक एखादा प्रोग्राम बनवितो तेव्हा अधिक विचार करण्याचा आणि प्लानिंग करण्याचा वेळच मिळत नाही. अशावेळी थोड्याच काळात जे काही होतं ते द बेस्ट होतं. मग ती कोणाच्या घरी जाऊन खाण्यापिण्याची गोष्ट असो वा मग एन्जॉय करण्याची.

सरप्राइज व्हिझिटचे फायदे

* बिघडलेली नाती वा गोष्टी पुन्हा सुरळीत होण्याचे चान्सेस अधिक असतात.

* एन्जॉय करण्याची अधिक संधी.

* तुम्हाला अचानक आलेलं पाहून नातेवाइकांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळतो ती गोष्ट वेगळीच असते.

* मित्र आणि नातेवाइकांच्या या जुन्या तक्रारी दूर होतील की तुम्ही आता आमच्याकडे येतजात नाही.

* आज तुम्ही सप्राइज व्हिझिट केलीय, उद्या ते करतील. अशाप्रकारे पुन्हा एकदा येण्याजाण्याची परंपरा सुरू होईल; जी पूर्वी कधी तुटली होती.

* अगोदर तुम्ही कळवून गेला असता तर कदाचित त्यांना डिनर वगैरे करण्याच्या औपचारिकतेत १० गोष्टी बनवाव्या लागल्या असत्या, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकला असता. परंतु तुमच्या अचानक येण्याने खाण्यापिण्याची औपचारिकता कमी होईल. कदाचित ते बाजारातून काही तयार मागवतील वा तुम्ही काही पॅक करून न्या.

* संपूर्ण कुटुंब आणि जवळचे नातेवाईक, मित्रांसोबत अशाप्रकारे टाइम स्पेंड केल्याने तुमच्या नात्यात नवीन ऊर्जा येईल.

* मुलांमध्येदेखील इमोशनल बॉडिंगच्या भावनेचा विकास होणं खूपच गरजेचं आहे आणि हे सर्व तुम्ही जेव्हा तुमच्या नातेवाइकांकडे येताजाता तेव्हाच शक्य होतं. तुम्हाला अशाप्रकारे सामाजिक व्यवहार करताना पाहून तेदेखील हे शिकतील.

सरप्राइज व्हिझिटमुळे नुकसान

* कदाचित अचानक तुम्हाला आलेलं पाहून त्यांना आवडणार नाही.

* हा विचार करूनच चला की जर मित्र वा संबंधी घरी नसतील तर तुम्ही नाराज होणार नाही. त्यामुळे एकाच दिशेच्या २-३ जणांकडे जाण्याच्या तयारीनेच जा.

* कदाचित त्यांना दुसऱ्या कोणाची अपेक्षा असेल आणि तुम्ही गेलात तर त्यांचा मूडदेखील ऑफ होऊ शकतो.

सरप्राइज केव्हा देऊ शकता

तसंही हे सरप्राइज केव्हाही कोणत्याही वीकेंडला देऊ शकता, परंतु जवळच्या लोकांचा बर्थ डे, लग्नाचा वाढदिवस, एखादा सण वगैरे असेल तर तुमचं असं अचानक मिठाई वा केक घेऊन पोहोचणं त्यांना खूप छान वाटेल आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल पूर्वीपेक्षा अधिक प्रेम आणि सन्मान वाढेल; कारण तुम्ही त्यांचा स्पेशल दिवस लक्षात ठेवला आणि त्यांच्यासोबत सेलिब्रेट केलं.

नववर्ष असो, होळी असो वा मग दिवाळी, शुभेच्छा देण्याची संधी आपण सोडत नाही. परंतु या क्षणी शुभेच्छा देण्यासाठी आपण नेहमी सोशल साइट्स आणि तंत्रज्ञानाची मदत घेतो आणि खास दिवसांच्या शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना पाठवतो तेव्हा समोरून लाइक, थँक्स वा रिप्लाय ग्रीटिंग पाहून आपल्याला तेवढ्यापुरता आनंद होतो मात्र प्रत्यक्षात भेटण्याचा आनंद खूप काही देऊन जातो. मग यावेळी स्वत:हून आपले मित्र, नातेवाइकांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्या द्या. मग पहा, त्यांना खूप आनंद होईल अणि नवीन आनंद अधिक दिवगुणित होईल.

रिजेक्शनचा सामना करा काही असा

* गरिमा पंकज

प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेकदा रिजेक्शन म्हणजेच नकाराचा सामना करावा लागतो. कारण काहीही असू शकते. कधी चांगल्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश न मिळणे, कधी परीक्षेत चांगले गुण न मिळणे, कधी नोकरीत अपयश किंवा प्रेमभंग. अशा अनेक प्रकारचे रिजेक्शन व्यक्तीला आयुष्यातील विविध टप्प्यांवर सहन करावे लागू शकते.

जरा या घटनांकडे पहा :

जुलै ०४, २०१९

एकतर्फी प्रेमात वेडया झालेल्या तरुणाचा तरुणीवर हल्ला आणि त्यानंतर आत्महत्या.

पानीपतमध्ये एका तरुणाने एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने तरुणीवर चाकूहल्ला करून तिला जखमी केले. त्यानंतर आत्महत्या केली. तरुण (राहुल) व तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानंतर तरुणीने आपल्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार राहुलसोबतचे संबंध तोडले. यामुळे नाराज झालेल्या राहुलने तरुणीला मारहाण केली. २५ मे, २०१९ ला तरुणीने राहुलची पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर दोघांमधील वाद सामंजस्याने मिटला. पण राहुलने बदला घ्यायचे ठरवले होते.

४ जुलैच्या सकाळी तरुणी आपल्या २ मैत्रिणींसोबत बागेत फिरायला गेली होती. राहुलही तेथे आला आणि त्याने ब्लेडने तरुणीच्या गळयावर वार केले. ती रस्त्यावर कोसळली. बागेत आलेल्या लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच ब्लेडने स्वत:च्या गळयावर वार करून आत्महत्या केली.

एप्रिल ३०, २०२०, नवी दिल्ली

जेईई मेनच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

जेईई मेन २०१९च्या परीक्षेत अपयश आल्याने तेलंगणातील एका १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. स्वत:वर गोळी झाडली. या परीक्षेत सुमारे १२ लाख उमेदवार सहभागी झाले होते.

मृत मुलाचे नाव सोहेल होते. तो जेईई मेन परीक्षेसोबतच तेलंगणा स्टेट इंटरमीडिएट परीक्षेतही नापास झाला होता. सोहेलने वडिलांच्या पिस्तूलमधून घरातच स्वत:वर गोळी झाडली. त्याचे वडील निवृत्त सैनिक आहेत. सोहेलने इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आकाश कोचिंग इन्स्टिट्यूटमधून अभ्यास केला होता. पण परीक्षेत यशस्वी होऊ शकला नाही. नापास झाल्याने वडील त्याला ओरडले. निराश झाल्याने तसेच वडील ओरडल्याने त्याने स्वत:वर गोळी झाडली.

अनेकदा रिजेक्शनमुळे व्यक्ती खूपच जास्त मानसिक तणावाखाली येऊन एवढी निराश होते की आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडते.

सत्य तर हेच आहे की आपण सर्व कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर रिजेक्शनचे शिकार झालेले असतो किंवा होत असतो. आज ज्यांना आपण यशाच्या शिखरावर पाहतो त्यांनीही कधीतरी रिजेक्शनचा सामना केलेला असतो. अशी कोणती यशस्वी व्यक्ती आहे जिने कधीच अपयश किंवा तिरस्काराचा सामना केलेला नाही? सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचेच उदाहरण घ्या. सिनेक्षेत्रात येण्यासाठी त्यांना अथक परिश्रम करावे लागले. दिसायला बरा चेहरा नसल्याने त्यांना अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला.

अमिताभ बच्चन यांचा आवाज रेडिओसाठी अपात्र ठरला होता. त्यांना रेडिओ स्टेशनवर रिजेक्ट केले होते. अशाच प्रकारे प्रतिभावंत गायक कैलाश खेर यांचा आवाज सुरुवातीला चित्रपटातील गाण्यांसाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले. मोहम्मद रफी यांनाही अनेक रात्री स्टेशनवर काढाव्या लागल्या. अब्राहम लिंकन यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोहियाजी यांच्यापर्यंत प्रत्येकानेच रिजेक्शनचा सामना केला आणि आपला संघर्ष सुरूच ठेवला.

जोहान्स हौसोफोर प्रिंसटोन हे युनिर्व्हसिटीत मानसशास्त्र आणि पब्लिक अफेअर्सचे (सार्वजनिक व्यवहार) प्राध्यापक आहेत. त्यांनी स्वत:च्या पदरी पडलेल्या अपयशाची तुलना मिळालेल्या यशाशी केली. त्यांचा ‘सीवी’ आणि त्यातील अपयशाची बरीच चर्चा झाली.

जिया जियांग एक मोटिव्हेशनल स्पीकर आणि रिजेक्शन थेरपी वेबसाईटचे मालकही आहेत. त्यांनी रिजेक्शनंतरचे १०० दिवस आणि अन्य अनुभवांच्या आधारे ‘हाऊ टू बीट फिअर एंड बिकम इनव्हिजिबल’ या नावाचे पुस्तक लिहिले.

यासंदर्भात क्वीन ब्रिगेडच्या संस्थापिका हिना एस. खेरा यांनी मांडलेल्या मतानुससार, आपल्या मनाला काही अशा प्रकारे समजवा :

स्वत:लाच प्रश्न विचारा : सर्वात आधी स्वत:ला विचारा की, तुम्हाला ती गोष्ट का हवी होती? जसे की, नोकरी, नाते, प्रेम, चांगले गुण इत्यादी. याचे कुठे ना कुठे तुम्हाला असेच उत्तर मिळेल की, त्यामुळे समाजात तुमची स्थिती उत्तम झाली असती. तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकला असता. असे उत्तर मिळाल्यानंतर विचार करा की, स्वत:ला सिद्ध न करू शकल्यामुळे स्वत:चाच जीव घेणे योग्य आहे का? हा मुर्खपणा ठरणार नाही का? म्हणूनच तणावात राहणे बंद करा आणि यश मिळवण्यासाठी आणखी जोमाने तयारीला लागा.

स्वत:ला त्रास करुन घेऊ नका : जीवनात चढउतार येतच राहतात. जीवनातील एखाद्या वळणावर आपल्याला रिजेक्ट केले म्हणून त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावर पडू देऊ नका. आपण हे समजून घेतले पाहिजे की, ती गोष्ट आपल्यासाठी नव्हतीच. नकारात्मक विचार आणि कमीपणाची भावना मनात निर्माण होऊ देऊ नका. यामुळे तुम्ही दु:खी होऊन नैराश्यग्रस्त होऊ शकता.

परिस्थितीकडे वेगळया नजरेतून पहा : तुम्ही हे पाहण्याचा प्रयत्न करा की, तुम्हाला जे हवे होते त्यासाठी तुम्हाला रिजेक्ट करणे ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट ठरू शकते. कदाचित तुम्हाला ती नोकरी मिळाली नाही किंवा तुमचे नाते तुटले याचा अर्थ तुम्ही वास्तविक जीवनात काहीतरी वेगळे आणि अधिक चांगले मिळवण्यासाठी लायक आहात.

स्वत:वर नियंत्रण ठेवा : सर्वसाधारणपणे आपल्याला जे हवे आहे ते मिळत नसेल तर ते मिळवण्यासाठी आपण चुकीच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतो. नव्याने नियोजन करू लागतो किंवा कटकारस्थान करू लागतो. त्यावेळी डोक्यात फक्त एवढाच विचार असतो की, काहीही करुन ती गोष्ट मिळवायचीच आहे.

अपयशातून मिळते प्रेरणा : यशाप्रमाणेच अपयश हादेखील जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा आपण खूप जास्त निराश होतो तेव्हा असा विचार करतो की, हे सर्व आपल्या बाबतीतच घडले आहे. पण असे मुळीच नसते. तुम्ही इतरांच्या आयुष्यात डोकावून पहा. जे लोक तुमच्यापेक्षा जास्त आनंदात असतात त्यांच्याशी बोलल्यानंतर  लक्षात येईल की, त्यांनी त्यासाठी किती कष्ट केले आहेत.

रिजेक्शन आपल्याला जास्त रचनात्मक, ऊर्जावान बनवते आणि मोठया कॅनव्हासवर काम करण्याची प्रेरणा देते. ज्यांनी अपयश अनुभवले आहे आणि जे रिजेक्शन कायम लक्षात ठेवतात ते नेहमीच दुसऱ्याचा मान ठेवून त्यांना मदत करतात. दुसऱ्यांना दु:ख सांगण्यापेक्षा त्यांचे दु:ख समजून घेतात. सर्व ठीक होईल, असे सांगून त्यांना धीर देतात. मुळात प्रत्येक गोष्टीत काहीतरी सकारात्मक शोधल्यामुळेच नकारात्मकतेपासून वाचणे शक्य होते.

संपत्तीची वाटणी कायद्यापेक्षा संस्कार मोठे

* सुधा कसेरा

मोबाइलची रिंग वाजताच दीपा स्क्रीनवर आपल्या मोठया बहिणीचा फोटो पाहून समजून गेली की, नक्कीच काहीतरी महत्त्वाचे असणार, कारण ती कधीच निरर्थक गप्पा मारायला फोन करत नसे.

तिने सांगितले की, ‘‘तुला माहिती आहे का? बिहारमधील वडिलांची सर्व जमीन दोन्ही भावांनी मिळून, तुझी आणि माझी सही स्वत:च करुन कवडीमोल किंमतीने विकली. मला आपल्या एका हितचिंतकाने फोन करुन ही माहिती दिली.’’

हे ऐकून दीपा सुन्न झाली. वडिलांच्या चितेची आग थंड होण्याआधीच भावांनी हे असे पाऊल उचलले, जणू ते त्यांच्या मरणाचीच वाट पाहत होते. वडिलांनी ती जागा स्वत:हून विकली असती तर सर्वांना समान वाटा मिळाला असता, पण अचानक अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी दीपाला बऱ्याचदा सांगितले होते की, कुटुंबात फक्त तिलाच आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जमिनीच्या पैशांतून तिला खूप फायदा होईल. ही घटना अपवाद नसून प्रत्येक घराची कथा आहे.

वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. बहुतांश घरातील पुरुष वडिलोपार्जित व्यवसाय करायचे. त्यामुळेच बहिणींच्या लग्नात त्यांना हुंडा म्हणून वडिलोपार्जित संपत्तीतील काही भाग देत असत. लग्नानंतरही त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात ते सहभागी व्हायचे आणि शक्य तितकी त्यांना मदत करायचे. एखाद्या महिलेला तिच्या सासरच्यांनी सोडून दिले किंवा वैधव्य आले तरी भाऊ किंवा वडील तिला सर्वतोपरी मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य समजत असत.

ते आईवडिलांबाबत असलेली आपली जबाबदारीही पार पाडत असत. दुसरीकडे लग्नानंतर मुलगी पूर्णपणे सासरची होऊन जात असे. पण, कालौघात जग आणि लोकांच्या विचारसरणीतही प्रचंड बदल झाला. आता वडिलोपार्जित व्यवसाय सोडून तरुण इतर शहरांमध्ये काम करण्यासाठी जाऊ लागले आहेत. एकत्र कुटुंब पद्धती ही त्रिकोणी कुटुंबात परिवर्तीत झाली असून प्रत्येक कुटुंब स्वतंत्रपणे राहू लागले आहे. यामुळे त्यांचा वैयक्तिक खर्चही खूप वाढला आहे.

महिला स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला आहे. मुली या भावांच्या खांद्याला खांदा लावून आईवडिलांची जबाबदारी घ्यायाला पुढे सरसावतात. आता हुंडयाची प्रथा कायदेशीररित्या अमान्य आहे. स्वावलंबी असल्याने मुलीही वडिलांकडून हुंडा घेण्यास विरोध करतात. हे सर्व पाहता वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांनाही हक्क मिळणे आवश्यक झाले आहे.

समान हक्क

१९५६ चा कायदा ‘हिंदू वारसा हक्क सुधारणा दुरुस्ती’ अस्तित्त्वात आल्यानंतर विवाहित महिलांना माहेरच्या वडिलोपार्जित मालमत्तेत पुरुषांच्या बरोबरीनेच समान हक्क बहाल केला. परंतु तो प्रभावी ठरला नाही. ९ सप्टेंबर २००५ पासून, हिंदू उत्तराधिकार अधिनियमाअंतर्गत नवीन नियमांनुसार, महिला आणि पुरुष दोघांचाही वडिलोपार्जित मालमत्तेवर समान हक्क आहे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, कायदा अस्तित्वात आला, पण प्रत्यक्ष व्यवहारातही तो कुटुंबीयांनी आचरणात आणला आहे का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. एखाद्या बहीण किंवा मुलीने स्वत:हून वडिलांच्या मालमत्तेच्या वाटणीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तर पुरुषांना ते आवडत नाही. ते तिचे हक्क अमान्य करतात. तिने नेहमीच त्यांच्यासमोर हात पसरावे असे त्यांना वाटत असते आणि अशावेळी तिची मदत करुन त्यांना समाजात कौतुकास पात्र ठरायचे असते.

ते बहिणीला मालमत्तेतील समान वाटेकरी मानण्याऐवजी केवळ आपल्या दयेस पात्र मानून स्वत:चे मोठेपण सुरक्षित ठेवण्यातच धन्यता मानतात. जणू ती त्या घरात जन्मलेलीच नसते. लग्न होताच माहेरच्या घरावरील तिचे सर्व अधिकारही संपुष्टात येतात आणि माहेरचे तिला स्वत:ला परके समजण्यास भाग पाडतात. ही एकप्रकारे तिच्या हक्काची विडंबना आहे.

विस्कटणारी नाती

‘स्त्री-पुरुषांत वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप’ या कायाद्यामुळे कुटुंबातील नात्यात बरीच कटुता आली आहे. यात दुमत नाही की जे काम पुरुष पूर्वी आपली नैतिक जबाबदारी समजून करीत होते तेच आता कायद्याच्या भीतीपोटीही करायला तयार नाहीत. पुरुषप्रधान देशातील पुरुषांच्या शतकानुशतके चालत आलेल्या मानसिकतेत कासवाच्या चालीने बदल होत आहे.

आताही पुरुष आपल्या आईवडिलांसाठी आर्थिक किंवा शारीरिक रुपात काहीही करीत नसतील तरीही वडिलोपार्जित मालमत्तेवर ते त्यांचा संपूर्ण हक्क समजतात. तर, आयुष्यभर, मुलीने जबाबदारीने त्यांच्यासाठी खूप काही केले असली तरी तिने संपत्तीत वाटा मागताच किंवा आईवडिलांनी तिला तो स्वत:हून देण्याची तयारी दाखवताच भाऊ तिचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. आपल्या हक्कांसाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावणे ही खूपच दूरची गोष्ट आहे, असे अनेकींच्या तोंडातून दररोज ऐकायला मिळते.

बहिणींना वाटा मिळणे हा अपवाद आहे. अनेकदा भाऊ भावालाच वाटा द्यायला तयार नसतो. संधी मिळताच मालमत्ता नावावर करायला मागेपुढे पाहत नाही. यामुळे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबतचा संबंध तुटला तरी त्यांना फरक पडत नाही.

मानसिकतेत बदल

बहिणींची वर्षानुवर्षे चालत आलेली मानसिकताही याला कारणीभूत आहे. लग्नानंतर अनेक बहिणी सासरच्या सणसभारंभांमध्ये प्रथापरंपरेनुसार भावांकडून मोठी रक्कम उकळू इच्छितात आणि संपत्तीतही वाटा मागतात. प्रत्यक्षात भावांपेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की, कायदा बनवण्यापेक्षा हे जास्त गरजेचे आहे की, आईवडिलांनी जिवंतपणीच मृत्युपत्र करुन त्यांच्या मालमत्तेची वाटणी करावी, जेणेकरुन त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणताही सदस्य त्यांच्या मालमत्तेवर अवैध कब्जा करू शकणार नाही.

कालौघात पुरुष आणि स्त्रीच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा. पैशांपेक्षा नातेसंबंधांना अधिक महत्त्व  देऊन नैतिकतेच्या आधारावर वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी व्हायाला हवी. आणि यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलांमध्ये एकमेकांसाठी निर्माण केलेली प्रेमाची भावना आणि पैशांपेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देणारे केलेले संस्कारच जास्तीत जास्त कुटुंब विभक्त होण्यापासून रोखण्यासाठी आणि समस्येचे निरसन करण्यासाठी सक्षम आहेत.

असा वाढवा मुलांचा आत्मविश्वास

* ऋचा शुक्ला, सीसेम, वर्कशॉप इंडिया

राहुलने वर्तुळातून चेंडू काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. आणि मग हताश होऊन रडू लागला. त्याला रडताना पाहून त्याची आई तिथे आली आणि त्याला उचलून मिठी मारली. मग तिने सांगितले की सातत्याने प्रयत्न करत राहा म्हणजे नक्कीच यशस्वी होशील. तिने राहुलला त्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा तो आपले नावही लिहू शकत नव्हता. सातत्यापूर्ण प्रयत्नांनी तो पुढे आपले नाव लिहू लागला.

अशाप्रकारच्या प्रोत्साहन आणि सकारात्मकतेमुळे मुलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होते. मुलांच्या स्वत: आणि प्रतिच्या धारणा कमी वयातच विकसित होतात. एक मूल कसा विचार करते? काय पाहते? काय ऐकत असते? आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया देते? इत्यादी बाबी त्याच्या संपूर्ण प्रतिमेची निर्मिती करतात. जर एखाद्या मुलामध्ये चिंता, ताण, असंतोष आणि भयाची भावना निर्माण झाली तर तो चिडचिड करू लागतो. त्याचा आत्मविश्वास ढळू लागतो.

अनेक संशोधनातून कळंय की लहान वयातच अनेक मुले ताण-तणावाचे बळी बनतात. बालपणीच्या नकारात्मक अनुभवांमुळे त्यांच्या शरीरावर आयुष्यभरासाठी नकारात्मक प्रभाव पडल्याचे दिसून येते.

मुल तणावग्रस्त राहण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यात एखादे कठीण कार्य करताना, काही विरूद्ध परिस्थिती निर्माण होते. मूल जेव्हा आपल्या शाळा आणि ट्यूशनचा अभ्यास समजण्यात किंवा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरते, तेव्हादेखील त्याच्यात तणाव निर्माण होतो. तो प्रदर्शित करण्यास आणि अभ्यास करण्यात ते स्वत:ला अपयशी समजू लागतो, कारण त्याच्या मित्रांसाठी असे करणे सोपे असते. यामुळे आत्मविश्वास ढळू लागतो.

मुलाने गमावलेला आत्मविश्वास हे त्याच्या संकोचावरून वा गप्प असण्यावरून समजू शकते. अशावेळी आई-वडिलांनी हे संकेत ओळखणे गरजेचे असते. अशा काही पद्धतींचा अवलंब करावा, जेणेकरून मुलांना आपल्या समस्यांना तोंड देण्यात सहाय्य मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आईवडिलांची भूमिका ही घरातील वातावरण मैत्रीपूर्ण करण्याच्या दृष्टीने असावी. मुलांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यांना कोणीही न ओरडू नये. त्यांचे म्हणणे त्यांना निर्धास्त सांगण्याची संधी मिळाली पाहिजे.

संवाद ठेवा : मुलांमध्ये सामाजिक कौशल्य विकास हे त्यांच्या कुटुंबासोबत जोडले गेल्याने तसेच संवाद साधल्याने होतो. त्यामुळे मुलांसोबत प्रभावी संवाद साधा. सहयोगी, सुखदायी आणि स्नेहशील बना. यामुळे संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत होईल. मग, मुलांमध्ये मोकळेपणाने आत्मविश्वास वाढेल.

आपली आवड निवडण्याची संधी : आपली आवड निवडणे, पर्याय आणि मतं मांडण्यात त्यांना मदत करण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका असते. पण त्यांना त्यांच्या आवडीची निवड करण्याची संधी द्या. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ही सर्वात योग्य पद्धत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात, स्वत:ची निवड समजण्यात ते सक्षम होतात, ज्यामुळे त्यांना आनंद मिळू शकतो.

प्रशंसा आणि पुरस्कार : आपल्या मुलांना सांगा की आपले त्यांच्यावर किती प्रेम आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती विशेष आहे. प्रत्येकाची स्वत:ची क्षमता आणि प्रतिभा असते. हे आईवडिलांनी मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. मुलांसाठी सकारात्मक आठवणींची निर्मिती करा. छोट्या-छोट्या संकेतांच्या माध्यमातून त्यांच्या यशाचे कौतुक करा. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टिकर, कुकीज अशा छोट्या वस्तूंनी त्यांना पुरस्कृत करा. तुमच्या अपेक्षांवर खरे न उतरल्यास त्यांना ओरडू नका. पुढच्या वेळेस त्यांना चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करा.

तुलना कधीच करू नका : आपल्या मुलांच्या क्षमतांची तुलना दुसऱ्यांच्या मुलांशी करू नका. सर्व मुलांच्या मनात वेगवेगळे भाव असतात. त्यांच्या मित्रांशी त्यांची तुलना केल्याने त्याच्या मनात हीनभावना निर्माण होते. तुलना केल्याने प्रतिस्पर्धी असल्याची भावना मुलाच्या मनात निर्माण होते, ज्यामुळे मुलांच्या मनात ईर्षा होते आणि मुलांसाठी हानिकारक ठरू शकते.

कामात दृढ असणे : मूल जेव्हा त्याला दिले गेलेले काम पूर्ण करतं तेव्हा त्याला स्वत:मध्ये आत्मविश्वास जाणवतो. त्याला प्रोत्साहन मिळते. उदाहरणार्थ जेव्हा विवेक आपल्या बूटाची लेस बांधण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता, पण तरीही त्याला जमत नव्हते. तेव्हा तो निराश झाला. यावेळी त्याच्या आईवडिलांनी त्याला हार न मानता प्रयत्न चालू ठेवण्यास यशस्वी होशील असे सांगितले आणि तो खरंच यशस्वी झाला. त्यांना अशाप्रकारे समजवण्याची गरज असते, जेणेकरून त्यांना ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.

शिक्षकांशी बातचीत करा : आईवडिलांनी मुलाची शिक्षक आणि मित्रांप्रति असलेली वागणूक समजूण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मुलाचं सामाजिक जीवन समजण्यास मदत मिळते. बाहेरच्या जगात त्याचे वागणे समजून घेणे गरजेचे आहे. जर तो घरी एखादी गोष्ट करू शकत नसेल, तर तो शाळेत करण्यास सक्षम आहे का?

यामुळे त्यांच्या आईवडिलांना हे समजेल की मुलांना शिकण्यात काही समस्या येत आहेत का? किंवा त्यांच्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे का? मुलांच्या मित्रांशी तसेच शिक्षकांशी बोला, जेणेकरून त्याची रूची जाणून घेता येईल.

काल्पनिक खेळ खेळा : काल्पनिक खेळांच्या माध्यमातून मुले त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या आणि वस्तूंच्या मदतीने काल्पनिक परिस्थिती तयार करतात आणि त्यात आपली भूमिका बजावतात. अशा खेळात त्यांना खूप विचार करता येतो. ते ज्या प्रकारचे जीवन असण्याची इच्छा बाळगतात त्याविषयी माहिती मिळते. या खेळांत सामील झाल्यामुळे आईवडिलांना त्यांच्या काल्पनिक जगात डोकावण्याची आणि त्यांना आत्मविश्वासाने प्रोत्साहित करण्याची संधी मिळते.

मुलासह विश्वासाचे आणि मित्रत्त्वाचे संबंध विकसित करा, जेणेकरून जेव्हा त्याला समस्या असेल तेव्हा तो तुमच्याजवळ येईल. तुमचं ऐकेल आणि तुमच्या सल्ल्याचा सन्मान त्याला आपलं मत विकसित करण्यात मदत करा. त्याच्या आत्मविश्वास आणि समजूतदार होण्याची सीमा वाढेल. यामुळे त्याला आपल्या मित्रांसमोर आपले म्हणणे मांडण्यात त्यांचे म्हणणे ऐकण्यात आणि दुसऱ्यांच्या मनांचा मान ठेवण्यात मदत मिळेल. यासाठी वेगवेगळ्या लोकांमध्ये आपली ओळख आणि स्वतंत्र अस्तित्त्व राखण्याच्या दृष्टिने हे महत्त्वाचे ठरेल.

माझी आई माझी ताकद

* पारुल भटनागर

‘‘सकाळी ५ वाजताचा अलार्म वाजत नाही तोच आई लगेचच उठून उभी राहते. कामाला लागते. त्यानंतर जेव्हा ती आम्हाला उठवू लागते तेव्हा आम्ही मात्र फक्त पाच मिनिटे आणखी झोपू दे, असे सांगून लोळत राहतो. उठल्याबरोबर आम्हाला ब्रेकफास्ट, लंच सर्व तयार मिळते. स्वत:ची तयारी करतानाही आम्ही कधी तिला चप्पल आणून दे असे सांगते, तर कधी आई प्लीज माझाया ड्रेसला इस्त्री करुन दे, असे म्हणत तिचीच मदत घेते.

‘‘आम्हीच नाही तर वडील आणि घरातील इतर सदस्ययही तिच्याकडे अशाच प्रकारे सतत काही ना काही मागत असतात. तिला कामाला लावतात. आई मात्र चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम ठेवून आमच्या प्रत्येकाचे काम आनंदाने करते. तिला स्वत:लाही ऑफिसला जायचे असते. पण स्वत:सोबत कुटुंबाच्या सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या, हे तिला चांगल्या प्रकारे माहीत असते.

‘‘घरातल्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या ऑफिसला जायचे असते. कधीकधी तर मला आश्चर्य वाटते की, इतक्या चांगल्या प्रकारे ती सर्व कसे काय मॅनेज करते? मलाही तिच्याकडून हे सर्व शिकून तिच्यासारखीच बनायचे आहे. खरेच माझी आई एक परिपूर्ण स्त्री तर आहेच, सोबतच माझी ताकद आहे. प्रत्येक घाव सहन करुन लोखंडासारखे मजबूत बनून जीवन जगण्याची योग्य पद्धत तिच्याकडूनच मी शिकत आहे,’’ असे १७ वर्षीय रियाने सांगितले.

फिटनेससाठी नो कॉम्प्रमाईज

ऑफिसला लवकर जाण्याच्या घाईत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आजारांच्या रुपात अनेक अडचणींचा सामाना करावा लागेल. म्हणूनच सकाळचा फेरफटका मारण्याच्या दिनक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. त्यासाठी सकाळी अर्धा तास लवकर उठावे लागले तरी हरकत नाही, असे आईचे म्हणणे असते.

ती हे केवळ स्वत:च करत नाही, तर कुटुंबातील सर्व सदस्यांनाही करायला भाग पाडते. कारण तिला माहीत असते की, फिटनेस फक्त तिच्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच गरजेचा आहे. सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका मारल्यामुळे आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, सोबतच दिवसभर प्रसन्न वाटते. आपण उत्साहाने काम करू शकतो, हे ती  घरातील सर्वांना समजावून सांगते.

आई, ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणते की, कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तिचे स्वत:चे आरोग्यही निरोगी राखणे गरजेचे आहे.

नोकरदार महिला या गोष्टीकडे विशेष करुन लक्ष देतात. त्यांना माहीत असते की, वय वाढू लागल्यानंतर महिलांच्या शरीरात आयर्न, कॅल्शियमची कमतरता जाणवू लागल्याने त्या थकून जातात. आजारी पडू शकतात. म्हणूनच कुटुंबासह त्या स्वत:च्या डाएटकडेही विशेष लक्ष देतात.

कुठलेच काम टाळायचे नसते, हे शिकलो

असे म्हणतात की, आईकडे जादूची छडी असते, जिच्यामुळे ती प्रत्येक कठीण गोष्टही सहज सोपी करते.

कुणालने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, एकाच दिवशी आईची ऑफिसमध्ये मीटिंग होती आणि आमची पार्टी असल्यामुळे मला शाळेत भात तयार करुन न्यायचा होता. आमच्या मोलकरणीनेही नेमकी त्याच दिवशी दांडी मारली. वडिलांनी तर सकाळीच सांगितले होते की, आज त्यांना मटार-बटाटयाची भाजी खायची इच्छा आहे. इतकी सर्व कामे करायची होती. तरीही माझ्या आईने कोणालाच नाराज केले नाही.

घरातले कोणतेच काम अर्धवट ठेवले नाही. इतकेच नाही तर वेळेवर ऑफिसलाही गेली. ती संध्याकाळी घरी आल्यावर आम्हाला हे सर्व समजले. तेव्हा आम्हाला वाटले की, आम्हीही आपल्या लाडक्या आईसाठी काहीतरी करायला हवे. मग काय, मी आणि वडिलांनी तिच्यासाठी डिनर तयार करुन तिला सरप्राईज दिले. माझ्या आईने अशी कितीतरी कामे फक्त एकदाच नव्हे तर अनेकदा केली आहेत. तिला असे करताना पाहून मला प्रेरणा मिळते आणि मलाही तिच्याचसारखे बनायचे आहे.

स्वत:ला नेहमीच ठेवते टापटीप

आईला हे चांगल्या प्रकारे माहिती असते की, तिची मुलगी तिला स्वत:ची ताकद तर समजतेच, पण सोबतच आपला आदर्शही मानते. त्यामुळेच ती स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाकडे, नीटनेटके राहण्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही.

आपल्या आईबाबत कृती सांगते की, कुणीही साधा एक आवाज दिला तरी आई लगेचच धावत येते. तिचा संपूर्ण दिवस घर आणि ऑफिसच्या कामात निघून जातो. तरीही ती स्वत:ला नेहमीच टापटीप ठेवते. लेटेस्ट आऊटफिट वापरते. बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तरीही स्वत:च्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करते, जेणकरुन तिची त्वचा नेहमीच सुंदर आणि तजेलदार दिसेल.

ती आम्हालाही त्वचा नेहमीच तरुण आणि सुंदर रहावी यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देते. फक्त सल्लाच देत नाही तर जबरदस्तीने आम्हाला तसे करायला भाग पाडते, जेणेकरुन हळूहळू आम्हाला पाणी पिण्याची सवय लागेल. मी जेव्हा कधी माझ्या आईसोबत जाते तेव्हा मला सतत तिचा अभिमान वाटत असतो की, ती माझी आई आहे. प्रत्येक जण तिच्या व्यक्तिमत्त्वाचे भरभरुन कौतुक करत असतो.

कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीची घेते काळजी

आई कुटुंबाची ताकद आहे, असे उगाच म्हणत नाहीत, तिला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडीची, नावडती गोष्ट बरोबर माहिती असते. कधी, कोणाला काय हवे असते हे तिला न सांगताही समजते.

आदर्शने आपल्या परीक्षेच्या दिवसांची आठवण काढून सांगितले की, मागच्या आठवडयात माझी परीक्षा होती. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. आईला माहीत होते की, मी घाईगडबडीत सवयीप्रमाणे माझे हॉलतिकीट घेऊन जायला विसरणार. त्यामुळे तिने आधीच ते माझ्या बॅगेत ठेवले होते. परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर मला हॉलतिकीटची आठवण झाली आणि मी घाबरलो. पण माझी आई ग्रेट आहे, याची आठवण होताच मी बॅग तपासली आणि मला तिने ठेवलेले हॉलतिकीट सापडले.

इतकेच नाही तर जेव्हा माझ्या वडिलांना महत्त्वाची कागदपत्रे हवी असतात तेव्हा आईच ती शोधून देते. याचाच अर्थ आम्ही तिच्याशिवाय अपूर्ण आहोत.

मुलांना देते चांगल्या वर्तणुकीची शिकवण

मुलांसमोर वेळ घालवण्यासाठी भलेही आईकडे पुरेसा वेळ नसतो, पण तरीही ती आपल्या मुलांची वर्तणूक चांगली असावी, यासाठी सतत धडपडत असते.

मोठयांसमोर कशाप्रकारे वागायला हवे, घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा, कुणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर प्रेमाने त्याला त्याची चूक कशी समजावून सांगायची, आईवडील, मोठयांना उलट उत्तर का देऊ नये, नेहमी सर्वांच्या मदतीसाठी कसे पुढे रहावे, अशाप्रकारची सर्व शिकवण ती मुलांना देते.

आईपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ही गोष्ट कोण समजू शकेल की, मुलांसाठी त्यांची पहिली शाळा त्यांचे आईवडीलच असतात. त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत आणि दैनंदिन व्यवहारावर आईवडिलांचाच ठसा असतो. म्हणूनच घरातील कुठल्याही सदस्याने मुलांसमोर अर्वाच्च भाषेत बोलू नये, गैरर्वतन करु नये याकडे आई सतत लक्ष देत असते.

समजावते अभ्यासाचे महत्त्व

मुलाला क्लासला घातले म्हणून आई निश्चिंत होत नाही तर क्लाससोबतच ती स्वत:ही त्याच्या अभ्यासासाठी वेळ देते, जेणेकरुन तो कोणत्या विषयात तरबेज आहे आणि कोणत्या विषयात कच्चा आहे, हे तिच्या लक्षात येईल. मुलाला चांगले गुण मिळावे म्हणून ती त्याच्याकडून कच्च्या विषयाची एखाद्या शिक्षकाप्रमाणे चांगली तयारी करुन घेण्याचा प्रयत्न करते.

मुलाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया रचण्यासाठी आईची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका कोणीही नाकारू शकणार नाही. तिने मुलावर दरदिवशी घेतलेल्या या मेहनतीचे फळ मुलगा स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहिल्यावरच तिला मिळते.

कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे घालवते वेळ

कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे वेळ घालवण्याला ती नेहमीच प्राधान्य देते. कारण थोडासा जरी वेळ कुटुंबासोबत घालवता आला तरी तो वेळ दिवसातील सर्वोत्तम वेळ ठरेल आणि कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्याच्याकडे कुटुंबाचे दुर्लक्ष झाले असे वाटता कमा नये.

आई कुटुंबात धाग्याप्रमाणे असते, जिच्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य या धाग्यात मोती बनून प्रेमाने गुंफला जातो. त्यामुळे दिवसातील काही क्षण का होईना, पण कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित आनंदाने वेळ घालवावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असते.

कुठलेच कार्यक्रम टाळत नाही

आजकाल व्यस्त दिनक्रमामुळे नातेवाईकांना भेटण्याची संधी कमीच मिळते. येथे आईची जबाबदारी जास्तच वाढते कारण तिने जर वेळ नाही म्हणून असे कार्यक्रम टाळले तर मुलांना आपले नातेवाईक कोण, हे समजणारच नाही.

कौटुंबिक सोहळयात सहकुटुंब सहभागी होऊन कौटुंबिक नाते दृढ करण्याचा तिचा प्रयत्न असतो. याबाबत श्रेया सांगते की, मी थकली आहे किंवा माझी अजून खूप कामे शिल्लक आहेत असे सांगून माझ्या आईने कधीच आमच्या कुटुंबातील लग्नसोहळा किंवा इतर कार्यक्रम टाळले नाहीत. उलट ती प्रत्येक कार्यक्रमाला आपुलकीने जाते.

इतकेच नाही तर घरी येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाचा ती हसतमुखाने पाहुणचार करते. नाते, कुटुंबांचे महत्त्व समजून घ्या, कारण एकत्र कुटुंबात जी ताकद असते ती वेगळे राहण्यात नाही, असे ती आम्हाला नेहमीच समजावून सांगत असते.

वेळेचे नियोजन करायला शिकवते

वेळेचे योग्य प्रकारे नियोजन कशा प्रकारे करायचे हे तर आईकडूनच शिकायला हवे. आपला अनुभव सांगताना राज म्हणाला की, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. यामुळे माझे पालक माझ्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. माझे आईवडील दोघेही कामला जातात. तरीही माझी आई घरही अतिशय व्यवस्थितपणे सांभाळते.

मी एखादी चूक केल्यास ती केवळ नजरेच्या धाकाने मला त्या चुकीची जाणीव करुन देते. यामुळे मी ती चूक दुसऱ्यांदा करण्याची हिंमतच करू शकत नाही. वेळेचे नियोजन कसे करायचे, हे मी माझ्या आईकडूनच शिकलो. मी तर असे म्हणेन की आतापर्यंत मी जे काही यश मिळवले आहे ते केवळ माझ्या आईमुळेच शक्य झाले.

आई बनवते धीट

ज्याप्रमाणे आई परिस्थितीचा सामना धैर्याने करते त्याचप्रमाणे तो धैर्याने करण्यासाठीचा धीटपणा मुलांच्या अंगी बाणवते. अनुभवने सांगितले की, माझ्या आईचे मौजमजा करण्याचे दिवस होते तेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अशावेळी आईने स्वत:ला या द:खातून तर सावरलेच, पण आम्हालाही कधी वडिलांची कमतरता भासू दिली नाही. नोकरी करुन तिने आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या.

आम्ही धीट व्हावे यासाठी ती सतत प्रयत्न करत असते. वडिलांच्या जाण्याने ती मनाने हळवी झाली होती, पण आमच्यासमेर तिने कधीच तिच्या डोळयात अश्रू येऊ दिले नाहीत. तिचा संघर्ष आणि मेहनत पाहून माझ्या तोंडून निघणारे कौतुकाचे शब्द थांबूच शकत नाहीत. मी माझ्या आईला फक्त एवढेच सांगेन की, तुला जगातील प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करेन.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें