* गरिमा

पती-पत्नी आणि ती वा तो ऐवजी पती-पत्नी आणि जीवनाच्या आनंदासाठी नात्याला प्रेम, विश्वास आणि सामंजस्याच्या धाग्यांनी बळकट बनवावे लागते. लहानसहान गोष्टी दुर्लक्षित करायच्या असतात. अडचणीच्या काळात एकमेकांचा आधार बनावे लागते. काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते :

मॅसेजवर नव्हे तर संवादावर अवलंबून राहा : ब्रीघम युनिव्हर्सिटीत केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जी दाम्पत्य जीवनाच्या छोटया-मोठया क्षणांमध्ये मॅसेज पाठवून जबाबदारी पार पाडतात. उदा-चर्चा करायची असेल तर मॅसेज, माफी मागायची असेल तर मॅसेज, कुठला निर्णय घ्यायचा असेल तर मॅसेज अशा सवयी नात्यांमध्ये पाडतात जसं की आनंद आणि प्रेम कमी करतात. जेव्हा एखादी मोठी घटना असते तेव्हा जोडीदाराला सांगण्यासाठी खऱ्या चेहऱ्याऐवजी इमोजीचा आधार घेऊ नये.

अशा मित्रांची संगत ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे : ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जर आपल्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने डिवोर्स घेतला असेल तर आपणही असाच निर्णय घेण्याची शक्यता ७५ क्क्यांपर्यंत वाढते.

पती-पत्नीने बनावे बेस्ट फ्रेंड्स : ‘द नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक’द्वारा केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जी दाम्पत्य एकमेकांना बेस्ट फ्रेंड मानतात, ती दुसऱ्यांच्या तुलनेत आपले वैवाहिक जीवन दुपटीने जास्त समाधानाने जगतात.

छोटया-छोटया गोष्टीही असतात महत्वपूर्ण : भक्कम नात्यांसाठी वेळोवेळी आपल्या जीवनसाथीला तो वा ती स्पेशल असल्याची जाणीव करून देणे गरजेचे असते. हे दर्शवणेही आवश्यक आहे की आपण त्यांची काळजी घेता आणि त्यांच्यावर प्रेम करता. यामुळे फारकतिची समस्या येत नाही. आपण जरी जास्त काही नाही तरी एवढे तर करूच शकता एक छोटेसे  प्रेमपत्र जोडीदाराच्या पर्समध्ये हळूच ठेवणे किंवा दिवसभराच्या कामानंतर त्यांच्या खांद्यांना प्रेमाने मसाज देणे. त्यांचा वाढदिवस किंवा आपल्या लग्नाचा वाढदिवस विशेष बनवा. कधी-कधी त्यांना सरप्राईज द्या. अशा छोटया-छोटया घटना आपल्याला त्यांच्याजवळ नेतात.

आपासातील विवाद अधिक चांगल्याप्रकारे हाताळा : नवरा-बायकोत विवाद होणे खूप स्वाभाविक आहे आणि यापासून कोणी वाचू शकत नाहीत. पण नात्यांची बळकटी या गोष्टीवर अवलंबून असते की आपण हे कशाप्रकारे हाताळतो. आपल्या जोडीदाराबरोबर नेहमी सभ्य आणि सौम्य व्यवहार करणाऱ्यांचे नातेसंबंध लवकर तुटत नाहीत. भांडण किंवा वाद-विवादादरम्यान ओरडणे, अपशब्द बोलणे किंवा मारहाण करणे, नात्यांमध्ये विष कालवण्यासारखे आहे. अशा गोष्टी मनुष्य कधीही विसरत नाही आणि  त्यामुळे वैवाहिक जीवनावर याचा अनिष्ट प्रभाव पडतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...