* मोनिका अग्रवाल

बहुतेकदा असं दिसून येतं की नणंदेचं वर्चस्व असल्याने भावजयीवर अत्याचार होतात. नणंद मग ती माहेरी राहात असो की सासरी, ती आपल्या वाहिनीविरुद्ध आपल्या आईचे कान भरत असते. भावाला भडकवत राहते. याचं कारण हे आहे की बहीण भावावर आपला पूर्ण अधिकार आहे असं मानते आणि आपला गर्व आणि अहंकार गाजवू पहाते. जर भाऊ दूरदर्शी नसेल तर बहिणीच्या बोलण्यात येतो आणि मग त्याची पत्नी अत्याचाराची शिकार होते.

नणंद-भावजयीच्या या भांडणांमागे काय कारण आहे याबद्दल कधी कोणी विचार केला आहे का? जर तुम्ही हे कारण शोधाल तर तुम्हाला उत्तर मिळेल ‘मीपणा.’ जोपर्यंत हा तुमच्यात असेल तोपर्यंत तुम्ही कोणाबरोबर आपल्या नात्याची गाडी फार दूरवर घेऊन जाऊ शकत नाही.

अलीकडचीच एक घटना आहे. ज्यात लखनौस्थित एका कुटुंबात नणंद आणि भावजय यांच्यात लहान सहान गोष्टींवरून भांडण व्हायचं. नणंदेला जेव्हा सहन झालं नाही तेव्हा तिने भावजयीशी झालेल्या भांडणावरून एक कट रचला.

अचानक तिच्या भावाला एका अनोळखी नंबरवरून फोन येऊ लागले. त्याने विचारल्यावर पलीकडून तो सांगायचा की तो त्याच्या बायकोचा प्रेमी बोलतो आहे. प्रकरण इतकं चिघळलं की लग्नाच्या ४ महिन्यातच घटस्फोटाची वेळ आली. २ महिन्यांपासून ही विवाहिता आपल्या माहेरी आहे. या विवाहितेने महिला हेल्प लाईनकडे मदत मागितली. तपास सुरु होताच नणंदेने रचलेला कट समोर आला.

क्षुल्लक कारणं पण वाद मोठा : नणंद-भावजय यांची भांडणं काही क्षुल्लक कारणांवरून होतात. जसे लग्नाआधी घरातल्या प्रत्येक वस्तूवर नणंदेचा अधिकार असतो, परंतु लग्नानंतर परिस्थिती बदलत जाते. आता नणंद घरात पाहुणी होते आणि भावजय मालकीण. अशात प्रत्येक लहान सहान गोष्टीत नणंदेचा हस्तक्षेप भावजयीला सहन होत नाही. बस्स, इथूनच सुरुवात होते या नात्यातील कडवटपणाला.

हे एक सार्वभौमिक सत्य आहे की आपल्याला कधी ना कधी आपले हक्क दुसऱ्याकडे सोपवावे लागतात. आपण नेहमी मालक बनून राहिलो तर आपण कधीच कोणाचं प्रेम आणि विश्वास मिळवू शकणार नाही. आपली थोडीशी नम्रता आणि अधिकारांची विभागणी आपल्या नात्याला माधुर्य आणू शकते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...