* मदन कोथुनियां

लग्नात प्रामाणिकपणा हा पाया आहे, पण आपण तो ढासळल्यानंतरही लग्न टिकवण्यावर विश्वास ठेवतो. आपल्या न्यायसंस्था, समाज सर्वच लग्न वाचवण्यावर विश्वास ठेवतात, कारण सर्व मतभेदांनंतरही सकाळी भांडणारे पती-पत्नी संध्याकाळी एक होतात. कितीतरी जोडपी घटस्फोटाच्या सीमारेषेला स्पर्श केल्यानंतरही असे एक होतात की त्यांनी कधी वेगळे होण्याचा विचार केला होता हे जाणवतही नाही.

महिमाचे आईवडील तिच्यासाठी मुलगा बघत होते. पण तिला मुलगी बघण्याचा पारंपरिक कार्यक्रम मान्य नव्हता. मात्र लग्न म्हटले की दोन कुटुंबांचे, दोन जीवांचे मिलन असते हे तिला माहीत होते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती एका नातेवाईकाच्या लग्नात भेटायचे ठरले. पुढे या भेटी हॉटेल्स आणि घरातही झाल्या. दोघांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतल्यानंतर रीतिरिवाजानुसार त्यांचे लग्न झाले.

आता जोडीदाराची निवड समान मानसिकता आणि विचारधारेनुसार होऊ लागली आहे. तरुणाई आपली आवड, विचार यांसह दोन्ही कुटुंबांच्या आवडीचाही विचार  करू लागली आहे. आता परिस्थिती अगदी बिकट असेल तरच पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला जातो.

जयपूरमध्ये मॅट्रिमोनियल एजन्सी चालवणाऱ्या श्वेता विश्नोई सांगतात, ‘‘आवडीचाच जोडीदार हवा यावर ठाम राहायला तरुणाई शिकली आहे. आता लग्नाची व्याख्याही आपोआप बदलत आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांचे सखा, मित्र, प्रेमी आहेत. अशा बदलांमुळे विवाह संस्थेचे अस्तित्व टिकून राहील शिवाय अन्य संबंध त्यांना कधीच वेगळे करू शकणार नाही.’’

लग्नानंतर आठ वर्षांनी एका अपघातात राजेशच्या पत्नीच्या जवळपास सर्वच शरीराला लकवा मारला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले लहान होती. त्यांना आईची खूप गरज होती. राजेशने आपली जबाबदारी ओळखत उपचार आणि सेवा करून पत्नीला इतके बरे केले की ती मुलांशी बोलू शकेल. त्यांच्या लहानसहान गोष्टींवर लक्ष ठेवू शकेल. भलेही येथे राजेशची शारीरिक गरज दुय्यम होऊन गेली, पण यातून हे सिद्ध होते की पत्नी आणि मुलांप्रतीच्या या जबाबदारीची भावना लग्न संस्थेत प्रवेश करताच निर्माण होऊ लागते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...