हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करते – ऋता दुर्गुळे

* नमिता धुरी

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तरुण प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी आणि छोट्या पडद्यावर आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सांगतेय तिच्या कलाविश्वातील आयुष्याबद्दल.

अभिनयाची सुरुवात कशी झाली?

माझं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालेलं असलं तरीही मी कधी एकांकिका वगैरे केल्या नव्हत्या. कारण मी अकरावी-बारावी सायन्सला होते. त्यानंतर मी मास मिडिया शिकत होते. त्यामुळे आम्हाला इंटर्नशिप्स कराव्या लागतात. मी ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर इंटर्नशिप करत होते. तिथे मला रसिका देवधर भेटल्या. त्या ‘दुर्वा’ मालिकेच्या कास्टिंग डिरेक्टर होत्या. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी ऑडिशन दिली आणि मला ‘दुर्वा’ मालिकेत दुर्वाची मुख्य भूमिका मिळाली. तेव्हापासून माझं या क्षेत्रात पदार्पण झालं.

सुरुवातीला एक प्यादं म्हणून वापरली जाणारी दुर्वा शेवटी स्वत:च राजकारणात उतरते. तुला काय वाटतं महिला जेव्हा राजकारणात उतरतात, तेव्हा खरंच काही बदल घडतो?

खरंतर या विषयावर मला फार काही बोलता येणार नाही. कारण मालिकेतल्या गोष्टी आणि खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी यांमध्ये खूप फरक असतो. पण तरीही मला असं वाटतं की बदल हा कोणीही घडवू शकतो. त्यासाठी तुम्ही महिलाच असलं पाहिजे असं काही नाही. फक्त तुमचे विचार चांगले असायला हवेत आणि तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात राहिलं पाहिजे.

सध्या सुरु असलेल्या फुलपाखरुमालिकेत मानस तुला म्हणजे वैदेहीला त्याच्या कविता ऐकवून प्रपोज करतो. तू स्वत: कॉलेजमध्ये असताना असं काही तुझ्यासोबत घडलं का?

नाही, माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही. पण हेच फुलपाखरु मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेतली प्रेमकथा जरी आजच्या काळातली असली तरीही प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम खूप वेगळं आहे. आजकाल सोशल मिडियावर आपण सगळ्याच गोष्टी खुलेपणाने बोलत असतो. पण तरीही मानस मात्र स्वत:च्या कवितेतून प्रेम व्यक्त करतो. त्यामुळेच ‘फुलपाखरु’ मालिका प्रेक्षकांना जास्त भावते. पण माझ्याबाबत असं कधीच झालं नाही.

कॉलेजचे दिवस हे मजामस्तीचे तर असतातच, पण या काळात मुलांचं करिअरही घडत असतं. अशावेळी पेपर फुटणे, निकाल वेळेत न लागणे अशा गोष्टींमुळे कॉलेज लाइफवर काय परिणाम होतो?

खरंतर आमची पहिली बॅच होती, जेव्हा क्रेडिट सिस्टीम आली. पण त्यावेळेला आम्हाला फार काही अडचणी जाणवल्या नाहीत. पिढीनुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आताचे विद्यापीठाचे घोळ वगैरे या गोष्टी बघितल्या की मला प्रश्न पडतो की आताचे विद्यार्थी कसे एन्जॉय करत असतील? माझ्या कॉलेज लाइफमध्ये तर मी शूटींगच करत असायचे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला कधी वेळच मिळाला नाही.

प्रसारमाध्यमं, सोशल मिडिया यामुळे कलाकारांना प्रसिद्धी तर मिळते. पण याचे काही दुष्परिणामही असतात का?

मला असं वाटतं की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणतीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत असते, तेव्हा ती चांगली असते. एखाद्या गोष्टीचे अधिकार तुमच्याकडे येतात, तेव्हा त्या गोष्टीची जबाबदारीही तुमच्याकडेच येते. तुम्ही जर पब्लिक फिगर असाल तर तुमच्यावर तेवढीच जबाबदारीही असते की समाजात कसं वागावं, सोशल मिडियावर काय पोस्ट करावं, कधीकधी यामुळे प्रायव्हसीला धक्का लागतो. पण तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता हे तुमच्यावर आहे. माझी प्रायव्हसी हरवली आहे असे अजूनतरी मला वाटत नाही.

तु ज्या मालिका पाहात मोठी झालीस त्या मालिका आणि आताच्या मालिका यात काही फरक जाणवतो का?

हो, खरंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा मलाही असंच वाटायचं की मला किचन पॉलिटिक्स नाही बघायचंय. पण आज ‘तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून मालिका सुरू केल्या आहेत. तरुण जे देशाचं भविष्य असतात, त्यांच्यासाठी मालिका सुरु करणं हा एक वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं.

महिला या सुरुवातीपासूनच मालिकांच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. पण या सगळ्याचा महिलांच्या आयुष्यावर काही परिणाम होताना दिसतो का?

मला असं वाटतं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. गृहिणी मालिकांमधल्या नायिकांशी स्वत:ला रिलेट करत असतात. त्या नायिकांचा महिलांवर काही प्रभाव पडतो का माहीत नाही, पण त्या निमित्ताने त्यांना एक कंपनी मिळत असते.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. पण त्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धेविरोधात आजपर्यंत कोणत्याच मालिका सिनेमातून भाष्य केलं गेलेलं नाही. याविषयी तुला काय वाटतं?

मला असं वाटतं की मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोललं गेलं पाहिजे. ती काही वाईट गोष्ट नाही. त्यातून आपण नवा जीव घडवतो. जी गोष्ट आपल्याला निसर्गाने दिली आहे ती वाईट असूच शकत नाही. त्यामुळे पाच दिवस मंदिरात जायचं नाही हे मला तरी पटत नाही. माझे आईवडीलही अशा गोष्टी मानत नाहीत. मालिकेतल्या नायिकांच्या तोंडून जर याविषयी बोललं गेलं तर बरं होईल. शिवाय या गोष्टीचा खूप आनंद होतोय की या विषयावरचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा लवकरच येतोय. बाकी कोणी याविषयी काही बोलत नसेल तर आपण स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे.

तुझ्या करिअरची सुरुवात तर झाली आहे. पण मग पुढे काय?

मला केणत्याही गोष्टीची घाई नाहीए. मला स्वत:ला आणखी ग्रूम करायचंय. मी नाटक आणि सिनेमामध्ये अजून काम केलेलं नाहीए. त्यामुळे त्या माध्यमांतही मला काम करायचंय. मी प्रत्येकवेळी असा प्रयत्न करेन की मी नेहमी वेगळ्या रुपात सगळ्यांसमोर येईन आणि प्रेक्षकांना खूप आवडेन.

गृहशोभिकेच्या वाचकांना काय सांगशील?

वाचकांना मी इतकंच सांगेन की तुम्हाला जे काही करायचंय ते आत्मविश्वासाने करा. टोकणारे खूप असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे करायचंय त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करा.

नवीन सिनेमाच्या निमित्ताने मोनालिसा बागलने केले वजन कमी

*सोमा घोष

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन आपण सर्वांनी अनुभवला आणि यंदाचा लॉकडाऊन देखील अनुभवतोय. लॉकडाऊनमध्ये आपण काय करू शकतो तर आपण घराबाहेर न पडता स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेऊ शकतो. घरी बसल्या आपल्याला आवडेल त्या गोष्टी करून आपलं मन गुंतवून ठेवू शकतो. अनेक ठिकाणी कामांना पुन्हा ब्रेकलागला आहे. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे पुन्हा अनेकांना घरून काम करावे लागतेय त्यामुळे जग थांबलंय ही भावना पुन्हा एकदा बऱ्याच जणांच्या मनात सतत येतेय हे सोशल मीडियावरून लक्षात येते. यासाठी एकच उपाय म्हणजे संयम सर्व काही सुरळीतपणे पुन्हा सुरू होईल असा विश्वास बाळगा, असं अभिनेत्री मोनालिसा बागल सांगतेय.

सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते, नवीन वर्षाची नवी उमेद मिळाली होती आणि असं असताना सिनेसृष्टीला देखील ब्रेक लागला. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा मोनालिसा बागलने पुरेपूर वापर केला, स्वतःला वेळ दिला आरोग्याची काळजी घेतली. नवीन वर्षात सर्वकाही सुरळीत चालू होते, त्यावेळी तिने वजन कमी करण्याकडे विशेष लक्ष दिले. एका सिनेमासाठी ती वजन कमी करत होती आणि पुन्हा लॉकडाऊन आला… पण आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, फिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देत, योग्य डाएट करून मोनालिसा कमी केलेले वजन तसेच मेन्टेन करण्याकडे विशेष लक्ष देतेय.

मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मध्यंतरी तिच्या फोटोंवरून, इंस्टाग्राम रिल्सवरून तिचा Fit & Fine लूक तिच्या चाहत्यांच्या लक्षात आला होता. वजन कमी केल्या नंतरचे नवीन स्टायलिश आणि ट्रेडिशनल फोटो मोनालिसाने शेअर केले होते. अर्थात, तिचे नवीन फोटोज् आणि तिच्या या नवीन लूक साठी त्यांनी तिच कौतुक केले.

पाहा मोनालिसाचे नवीन फोटो:-https://www.instagram.com/p/COHaeLpr2VB/?igshid=1hwedki3jodcc

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात अनु मलिक यांची हजेरी!

* सोमा घोष

सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रीकरण थांबले आहे, पण प्रेक्षकांचे मनोरंजन मात्र अबाधित राहिले आहे. प्रेक्षकांना फ्रेश एपिसोड्सची मेजवानी मिळतच होती आणि आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या हास्यजत्रेने राज्याबाहेर, दमणमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाची सुरुवात दणक्यात झाली आहे. ती सुरुवात संगीत कलाविश्वात  मोठं नाव असलेले गायकगीतकार अनु मलिक यांच्या कार्यक्रमातल्या हजेरीने! ३आणि ४ मे रोजी सोनी मराठीवरील हास्यजत्रेमध्ये पाहुणे अनु मलिक प्रेक्षकांनापाहायला मिळतील. यावेळी अनु मलिकने सेटवर धमाल केली आणि प्रसाद ओक याच्याबरोबर ‘आम्ही ढोलकर’ हे मराठी गाणंही  गायलं. ‘आग लगा दी’ असं म्हणून स्पर्धकांचं कौतुक करणाऱ्या अनु मलिकने  हास्यजत्रेच्या स्पर्धकांचं मराठमोळं कौतुक केलं आहे.

हा भाग म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे, हे नक्की. पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ३ आणि ४ मे, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठीवाहिनीवर.

‘महाराष्ट्र बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँची हजेरी!

पाहा ‘महाराष्ट्र बेस्ट डान्सर’, सोम.मंगळ., रात्री ९ वा. फक्त आपल्या  सोनी मराठीवर.

‘महाराष्ट्र बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. गेले अनेक आठवडे स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी  महाराष्ट्राला आपल्या नृत्याची चुणूक दाखवली आहे. आता या स्पर्धेत टॉप  ५ स्पर्धक  उरले  आहेत. सेमीफिनालेच्या या कार्यक्रमात नृत्याच्या महागुरूगीता माँ  येणार आहेत. गीता माँ गेली अनेक वर्षं नृत्यसृष्टीत कार्यरत  असून  त्यांच्याकडून कित्येक जणांनी  नृत्य शिकलं आहे.

या आठवड्यात एक अनोखा नृत्याविष्कार ‘महाराष्ट्र बेस्ट डान्सर’च्या  मंचावर पाहायला मिळणार आहे. एका कारमध्ये अपेक्षा आणि आशुतोष  यांनी संपूर्ण नृत्य सादर केलं आहे. हे पूर्ण नृत्य एका टेकमध्ये केलं असून  यात कोणतंही संपादन केलेलं नाही. रियालिटी शोच्या मंचावर झालेलं हे असं पाहिलंच सादरीकरण आहे.

प्राची प्रजापती, दीपक हुलसुरे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने आणि अदिती  जाधव या टॉप ५ स्पर्धकांपैकी एक जण जिंकणार आहे ‘महाराष्ट्र बेस्ट  डान्सर’चा चषक.

आजकाल प्रेम सर्शत आहे – तेजस्विनी लोणारी

* सोमा घोष 

सर्जनशील कुटुंबात जन्मलेली मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, ज्यात तिची आई नीलिमा लोणारीने तिला पाठिंबा दर्शविला. तेजस्विनीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. तेजस्विनीला नेहमीच एका नवीन कथेवर काम करायला आवडते, कारण त्यात आव्हाने असतात, ज्यामुळे अभिनयात पुढे प्रगती करण्याची संधी मिळते. तिला प्रत्येक मोठे निर्माते आणि दिग्दर्शकाचे चित्रपट करायचे आहेत, मग भले मराठी असो किंवा हिंदी तिला काही फरक पडत नाही. तिने भरतनाट्यम आणि कथक नृत्यही शिकले आहे. हसतमुख आणि नम्र स्वभावाच्या तेजस्विनीशी तिच्या यशस्वी प्रवासाबद्दल चर्चा झाली. चला जाणून घेऊया, तिची कथा तिच्या शब्दांत :

तुला अभिनयाची प्रेरणा कोठून मिळाली?

जेव्हा मी तिसऱ्या वर्गात होते, तेव्हा एका शिक्षिकेने मला माझ्या छंदाबद्दल विचारले, तेव्हा मी अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. खरं तर लहानपणापासूनच मी अभिनयाशिवाय दुसरा काही विचारच केला नव्हता. मला शिकायचं होतं पण त्यात मला करियर करायचं नव्हतं. कारण माझे मामा जुन्या मराठी चित्रपटांसाठी वित्तपुरवठा करायचे आणि आईनेही दिग्दर्शक म्हणून काम केले होते. परंतु घरातील लोकांना मुलींना अभिनय करु द्यायला आवडत नसे. म्हणून मी आधीच विचार केला होता की मला अभिनय करायचा आहे.

तुला कुटुंबात कोणाचा सर्वात जास्त आधार होता?

आईचा आधार सर्वात जास्त होता, कारण आईच्या कुटुंबात सर्जनशील गोष्टी जास्त होत, तर वडिलांचे कुटुंबीय चांगल्या शैक्षणिक गोष्टींवर जोर देत. मी डॉक्टर व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. जेव्हा मी १० वी नंतर अभिनयाबद्दल बोलले तेव्हा त्यांना खूप राग आला कारण ते लष्कराच्या पार्श्वभूमीचे आहेत. पण माझ्या आईचे कुटुंबीय मला अभिनयासाठी विचारायचे. जेव्हा मी अभिनय करण्यास सुरूवात केली तेव्हा माझे वडील माझ्याशी वर्षभर बोलले नाहीत, परंतु बऱ्याच चित्रपटांचे काम पाहून त्यांना आनंद झाला कारण मी अभिनयाबरोबरच माझा अभ्यासदेखील सुरू ठेवला होता.

तुला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

मी पुण्यात पहिले काम वयाच्या ११ व्या वर्षी एका जाहिरातीने सुरू केले. मुव्ही ब्रेक १० वी पास झाल्यानंतर सुट्टीमध्ये ‘नो प्रॉब्लेम’ हा मराठी चित्रपट मिळाला. यासाठी मी मुंबईत आले आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि चित्रपट मिळाला.

तुला येथे पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला?

प्रथम मी आणि माझी आई एकत्र मुंबईला आलो. त्या काळात मला कामासाठी खूप संघर्ष करावा लागला. अभिनयाचे प्रशिक्षण घेत असताना पहिला चित्रपट मिळाला होता. यानंतर मी काही दक्षिणात्य चित्रपट केले आणि परत मुंबईला आले.

मी अँकरिंग केले, नृत्य कार्यक्रम, फोटो शूट इ. सर्व केले. ‘बॉम्बे टू गोवा’ या हिंदी चित्रपटाच्या रिमेकमध्ये मी लावणी गर्लची छोटीशी भूमिका साकारली होती, परंतु यामुळे माझी ओळख निर्माण झाली होती.

तू साउथ फिल्म इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे, त्या सर्वांमध्ये तुम्हाला किती फरक जाणवतो?

प्रादेशिक चित्रपट ज्यात कन्नड असो किंवा तेलगू चित्रपट, दोघांमध्ये बराच फरक आहे, कन्नड नेहमीच सामग्रीभिमुख असतो. वातावरण दोघांसाठी बरेच शिस्तबद्ध असते. मराठीतदेखील कंटेंट आणि कथेकडे अधिक लक्ष दिले जाते, तर लुकवर जास्त नसते, पण प्रेक्षकांना तेच जास्त आवडते. याशिवाय मराठी चित्रपटांमध्ये काम करताना कौटुंबिक वातावरण तयार होते. हिंदीचे वातावरणही चांगले असते, परंतु त्याचे व्यावसायिक मूल्य जास्त असते, कारण पैसे देखील जास्त खर्च केले जातात.

कोणता असा कार्यक्रम, ज्याने तुझे आयुष्य बदलले?

‘चित्तोड की राणी पद्मिनी का जौहर’ या मालिकेत पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर, मला घरोघरी ओळखले जात होते, यामुळे मला तशीच शाही भूमिका मिळत राहिली, पण मला एक वेगळी भूमिका करायची आहे, अद्याप यातून बाहेर यायला वेळ लागत आहे.

तुला वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला वेब सिरीजमध्ये काम करायचे आहे, परंतु वेबवर सेन्सर नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आहेत, ज्या मी करू इच्छित नाही. सुरुवातीला वेब सीरिजसाठी माझ्याकडे आलेले सर्व फोन कॉल, भूमिका सांगितल्यानंतर, ते अर्ध-नग्नता किंवा सेक्स संबंधित गोष्टी सांगत राहिले. एक कलाकार म्हणून मला अशी भूमिका करण्याची हिम्मत नाही. मी वेबमधील प्रमाणपत्राची प्रतीक्षा करीत आहे.

तुझ्याकडे वेळ असतो तेव्हा काय करायला आवडते?

माझ्याकडे प्राण्यांसाठी ‘चतुर्थी फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था आहे, जिच्यात विशेषत: स्ट्रीट डॉग्स आणि मांजरी ठेवल्या आहेत. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करण्याचा विचार करते. माझ्याकडे १२ सुटका केलेली कुत्री आहेत. याद्वारे मी लोकांना रस्त्यावरच्या प्राण्यांविषयी जागरूक करते. याशिवाय नृत्य करणे आणि पुस्तके वाचणेदेखील आवडते.

आजकाल प्रेमाची आणि रोमांसची व्याख्या बदलली आहे, त्याबद्दल तुझे काय मत आहे?

आजकाल प्रेमात वचनबद्धता नसते म्हणून ते पटकन ब्रेक होते. प्रेमदेखील सशर्त बनले आहे, परंतु आजची जोडपी संवेदनशील झाली आहेत आणि संबंध टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वचनबद्धता खाली आली आहे.

तुझ्या स्वप्नांचा राजपुत्र कसा आहे?

मला कामाचे स्वातंत्र्य देणारा, मी जे काही करू इच्छेनं त्यामध्ये मदत करणारा. आनंदी व्यक्तिमत्त्वाचा असावा, माझ्या पालकांना समजून घेणारा असावा.

तूम्ही किती फॅशनेबल आणि फूडी आहात?

आर्मी पार्श्वभूमी असल्याने माझी ड्रेसिंग सेन्स खूप चांगली आहे आणि इतरांपेक्षा थोडी वेगळी व क्लासीदेखील आहे. मी घरात जास्त कपडे ठेवत नाही. यावर्षी माझा ठराव प्रत्येकास फॅशन प्रदूषण कमी करण्यास मदत करणारा आहे. यासाठी मी दरवर्षी माझ्या कपडयांचे प्रदर्शन आयोजित करते आणि त्यातून मिळालेले पैसे मी प्राण्यांची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थेला देते. मी खूप फूडी आहे आणि सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मला आवडतात.

तुझ्या पुढील योजना काय आहेत?

मला चित्रपटांची निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करायचं आहे, त्यासाठी मी चित्रपट निर्मितीचे कोर्सही केले आहेत.

तुझ्या स्वप्नातील प्रकल्प कोणता आहे?

मला सावित्रीबाई फुले आणि इंदिरा गांधी यांच्या बायोपिकमध्ये काम करायचे आहे.

तूम्ही कुठला संदेश देऊ इच्छिता का?

महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि तणाव निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत, कारण कोरोना संसर्गाने हे शिकवले आहे की जे काही चांगले वाटेल ते केले पाहिजे. वेळ वाया घालवू नका आणि नेहमी आनंदी रहा.

आवडता रंग – पेस्टल.

आवडता ड्रेस – वेस्टर्न.

आवडते पुस्तक – द अल्केमिस्ट.

नकारात्मकता आल्यावर – ध्यान आणि योगा.

पर्यटन स्थळे – देशात आसाम आणि दार्जिलिंग, परदेशात मालदीव आणि युरोप.

जीवनाचे आदर्श – साधे जीवन जगणे.

आवडता परफ्यूम – शनेल चांस.

आकाश ठोसरची सिरीज ‘१९६२ : दि वॉर इन दि हिल्स’साठी निवड

सोमा घोष

वास्तविक घटनांमधून प्रेरित सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ फक्त डिस्ने+हॉटस्टार व हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्टार प्रिमिअमच्या सबस्क्रायबर्ससाठी २६ फेब्रुवारी  २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपट ‘सैराट’च्या या यशानंतर भारतभरात त्वरित प्रसिद्धी मिळालेला अभिनेता आकाश ठोसर आता आगामी वॉरएपिक सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्समध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्ये अभय देओल व सुमीत व्यास यांच्यासह इतरप्रतिष्ठित कलाकार देखील आहेत. या कलाकारांची नावे लवकरच सांगण्यात येतील.

हॉटस्टार स्पेशल सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ वास्तविक घटनांमधून प्रेरित आहे. ही सिरीज शौर्य व पराक्रमाची ऐकण्यात न आलेली कथा सादर करण्यासोबत कशाप्रकारे १२५ भारतीय सैनिक ३००० चीनी सैनिकांविरूद्ध लढले, त्या कथेला देखील दाखवते

शूरवीरांपैकी एकाच भूमिकेत दिसण्यात येणाया आकाश ठोसरने नुकतेच सांगितले की, त्याचे लष्करामध्ये जाण्याचे बालपणापासून स्वप्न होते. तो म्हणाला, ”सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ माझ्यासाठी स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. बालपणापासून माझे भारतीय सेनेमध्ये जाण्याचे स्वप्न होते आणि मी चित्रपटसृष्टीमध्ये येण्या पूर्वी लष्करामध्ये निवड होण्यासाठी दोनदा परीक्षादेखील दिली होती. फक्त सैन्य अधिकारीच नव्हे तर मी पोलिस सेवेमध्येदेखील दाखल होण्याचा प्रयत्न केला. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्या देशाच्या या संरक्षणासाठी माझे करिअर सैन्यामध्ये असते.”

तो पुढे म्‍हणाला, ”पहिल्यांदाच मला सैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. मला वास्तविक जीवनात मिळाली नाही तरी रील जीवनामध्ये सैन्याचा पोशाख परिधान करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला. मला अत्यत खास वाटले. असे वाटले की, मी सैन्याचाच भाग आहे आणि मी स्वत:कडे त्यच दृष्टिने पाहीन.”

आकाश ठोसर किशनची भूमिका साकारेल, जो मेजर सुरज सिंग (अभय देओल) नेतृत्वित बटालियनचा भाग आहे. हॉटस्टार स्पेशल्स प्रस्तूत ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ प्रदर्शित होत आहे २६ फेब्रुवारी २०२१ रोजी फक्त डिस्ने+ हॉटस्टार व व व्हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्टार प्रिमिअमवर.

मराठी चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये दिसणार पाहूण्या भूमिकेत

सोमा घोष

दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला होता.

 अभिनेता उपेंद्र लिमये ह्यांनी चित्रपट सलमान सोसाइटीमध्ये एक पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत, काही दिवसांपूर्वी उपेंद्र लिमये ह्यांनी आपल्या भूमिकेच्या हिस्सेचे डब्बिंग पूर्ण केले ह्यावेळी चित्रपटाचे निर्माते श्री शांताराम भोंडवे अवार्जुन उपस्थित होते. ह्यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये ह्यांनी निर्मात्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या, आणि लवकरच चित्रपट सिनेमाघरात लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

 सलमान सोसायटी ह्या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारे गौरव मोरे , नम्रता आवटे महाराष्ट्रा ची हास्यजत्रा फेम आपल्याला एका वेगळ्या ,महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार  ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्कर लोनकरने ह्या आदी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि .व चि .सौ. का, फिरकी आणि टी. टी. एम. एम चित्रपटात अभिनय केलाय तर  शुभम मोरे ह्याने हिंदी चित्रपट रईस मध्ये बालपणच्या शाहरुख़ खान ची भूमिका वटवली तसेच हाफ टिकिट, फास्टर फेने सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट ,माउली, ताजमहल आणि येरे येरे पावसा मध्ये भूमिका केल्या आहेत.

सलमान सोसायटीचे चित्रीकरण एकूण ३ शेडूल पूर्ण केले असून चित्रपटाचे चित्रीकरण आटपाडी, नाशिक, मुंबई, नवी मुंबई च्या जवळील भागातच झाले आहे तसेच चित्रपट ह्या वर्षी  लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें