लोक काय म्हणतील

* गरिमा पंकज

रात्री १० वाजता मायाच्या घरासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. स्लीव्हलेस टॉप व जीन्स परिधान केलेली माया दणादण तिच्या फ्लॅटच्या पायऱ्यावरून खाली उतरत होती. तेवढयात रुना आंटी समोर धडकली. रुना आंटी तिच्या आईची सर्वात जवळची मैत्रीण आहे. आपली जबाबदारी ओळखून तिने मायाला टोकले, ‘‘मुली, एवढया रात्री तू कुठे जात आहेस? लोक काय म्हणतील याचा विचार करा.’’

मायाने हसतच आंटीचा खांदा थोपटला आणि मग म्हणाली, ‘‘आंटी, मी ऑफिसला जात आहे. माझ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी, माझी पत्रकाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी. लोक काय म्हणतील याची मला कधीच चिंता नव्हती. माझं आपलं स्वत:चं आयुष्य आहे, मला स्वत:ची प्राधान्ये आहेत, माझी आपली स्वत:ची जगण्याची पद्धत आहे. याशी लोकांना काय देणे-घेणे? मी कधी लोकांना विचारले आहे का ते कधी आणि काय करीत आहेत म्हणून?’’

रुना आंटीला मायाकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते. ती शांतपणे उभी राहिली आणि माया जीवनाला नवीन उद्देश देण्याच्या लालसेने पुढे गेली.

३२ वर्षीय माया दिल्लीत एकटीच राहते. रात्रीसुद्धा तिला बऱ्याचदा कामाच्या संदर्भात बाहेर जावं लागतं. रुना आंटी नुकतीच तिच्या सोसायटीत शिफ्ट झाली आहे.

प्रत्येक वेळी हटकणे

बहुतेकदा वडीलधारी मंडळी मायासारख्या मुलींना वेगवेगळया सूचना देतांना दिसतात. उदाहरणार्थ, ‘‘असे कपडे घालून तू कुठे जात आहेस? जरा विचार तर कर की लोक काय म्हणतील? अगं, इतक्या मुलांबरोबर तू एकटी का जात आहेस? तुला समाजाची काही पर्वा नाही का? क्लबमधील मुलांबरोबर नाचण्यात तुला लाज वाटली नाही? लोक काय म्हणतील याचाही विचार केला नाहीस? एवढया रात्री एकटी कुठे जात आहेस? एवढी मोठी झाली आहेस पण एवढाही विचार करत नाहीस की लोक काय म्हणतील.’’

लोकांचे काय घेऊन बसलात, जर मुलगी एकटीच राहत असेल तरी ते चिंतातुर, लिव्ह-इनमध्ये राहत असेल तरी ते कष्टी, मुलं होत नसेल तरी ते चिंतातुर, नोकरी करत असेल तरी त्यांना त्रास, मुलांबरोबर हसून गप्पा मारल्यात तरी त्यांना वैताग, रात्री उशीरा क्लबमध्ये गेलात तरी ते चिंतातुर, एवढेच काय तर नवरा असूनही परक्या पुरुषाकडे डोळे भरून पाहिलेत तरीसुद्धा त्यांना त्रास होतो.

समाजाची काळजी कशाला

लोकांची चिंता करू नका, कारण आपण मनुष्य आहोत, प्राणी नाहीत. आपण सर्वजण आपल्या स्वत:ची वेगळी ओळख आणि विचारसरणी घेऊन जन्माला आलो आहोत. आपण केवळ यासाठी जमावाचे अनुकरण करू शकत नाही, कारण समाजाला असे हवे आहे. आपल्या सर्वांची वेग-वेगळी स्वप्ने आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे.

आपण सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही. आपण एखाद्याच्या नजरेत चुकीचे असाल तर याचा अर्थ असा नाही की प्रत्यक्षात तसे आहे. आपण प्रत्येकाच्या नजरेत योग्य असू शकत नाही, आपल्याकडे जास्त वेळ नाही, म्हणून कुणा दुसऱ्याच्या विचारसरणीनुसार जगण्यात आपला वेळ वाया घालवू नका.

पराभव केवळ आपलाच होईल. लक्षात ठेवा की आपल्या विजयाचे श्रेय घेण्यात लोक जरा ही वेळ गमावणार नाहीत परंतु आपल्या पराभवासाठी आपल्याच जबाबदार ठरवले जाईल. म्हणून ही भीती तुमच्या आयुष्यातून आणि तुमच्या मनातून काढून टाका की लोक काय म्हणतील.

प्रत्यक्षात कोणालाही तुमची काळजी नाही. लोकांच्या विचारसरणीनुसार चालूनही आपण जर कुठल्या अडचणीत अडकलात तरीही कोणी आपल्या मदतीसाठी पुढे येणार नाही. तुमची मदद तुम्हा स्वत:लाच करावी लागेल. तेव्हा इतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपणास जे काही करायचे आहे तेच करा.

जे लोक केवळ त्यांच्या हृदयाचे ऐकतात तेच यशस्वी होतात. जर आपण इतिहासाची पाने पालटून पाहिली तर आपल्याला आढळेल की कोणताही मनुष्य यशस्वी यासाठी झाला कारण त्याने त्याच्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि कठोर परिश्रम घेतले.

हस्तक्षेप एक असह्य वेदना

जेव्हा आपण एखादे नवीन कार्य सुरू करणार असतो किंवा लोकांनी ठरवलेल्या निकषांपेक्षा काहीतरी वेगळं करणार असतो तेव्हा आपल्यातील बहुतेक लोक असा विचार करून घाबरायला लागतात की लोक काय म्हणतील. इथे ‘लोक’ या शब्दाचा अर्थ समाज आहे, ज्यास आपण एकत्र मिळून बनवले आहे. आपण समाजात एकत्र राहतो. बऱ्याच प्रकारे एकमेकांवर अवलंबूनही असतो. पण हे अवलंबन सकारात्मक अर्थाने असले पाहिजे. एक असे अवलंबन, जे एखाद्याच्या यशाचा मार्ग मोकळा करू शकेल, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकेल. जिथे प्रत्येकजण एकमेकांच्या वाईट काळात हातभार लावू शकेल, जिथे ते एकमेकांचे दु:ख वाटून घेऊ शकतील आणि आनंदांना चौपट करु शकतील.

हे बऱ्याच वेळा पाहिले गेले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यशस्वी होण्याची वेळ अगदी शिखरावर असते तेव्हाच काही संकुचित दृष्टिकोन असलेल्या लोकांच्या हस्तक्षेपाने त्या व्यक्तीची स्वप्ने धुळीस मिळतात. एक शल्य आयुष्यभर आपल्याला सतत बोचत राहते. काळ पुढे जातो, परंतु ते दु:ख त्या व्यक्तीच्या जीवनात घर करून राहते.

हस्तक्षेपाची मर्यादा निश्चित करा

आपल्या जीवनात लोकांच्या हस्तक्षेपासाठी एक मर्यादा निश्चित करा. आयुष्य तुमचं आहे. जर ध्येय तुमचे असेल तर निर्णयदेखील तुमचाच असावा. आपल्या भविष्याची चिंता आपले कुटुंब, मित्र आणि आपल्यापेक्षा जास्त इतर कुणालाही असू शकत नाही.

जरा विचार करा जेव्हा लोकांची पाळी येते तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात तुमचा हस्तक्षेप स्वीकार करतात? नाही ना? तर मग तुम्ही का?

पुरुषप्रधान समाजाची विचारसरणी

वास्तविक, पुरुषप्रधान समाजातील पुरुष स्त्रीला आपली संपत्ती मानतात. त्यांना स्त्रियांना त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवून स्वत:चा मार्ग चालवायचा आहे. त्यांना त्यांच्या जीवनाचे निर्माते व्हायचे आहे. ते महिलेच्या ‘लैंगिक शुद्धते’च्या नावाखाली निर्बंधांचे जाळे विणतात, त्यात अडकून महिला तडफडत राहतात. धार्मिक नेते या मानसिकतेचा फायदा घेण्यास चुकत नाहीत. ते वेगवेगळया प्रकारे स्त्री-विरोधी नियमकायदे आणि निर्बंधांची लांबलचक यादी जारी करून त्यांचा स्वार्थ साधत राहतात.

शिकल्या-सवरलेल्या मुलीदेखील अशा लोकांचे ऐकणे सुरू करतील तर एक वेळ असेही येऊ शकते की त्यांचा कोंडमारा होऊ लागेल. स्वातंत्र्याच्या मोकळया हवेत श्वास घेणे तर दूर मुली त्यांची ओळखदेखील गमावतील.

इभ्रतेच्या मक्तेदारांची वास्तविकता

धार्मिक आदेश, महिलांचे रक्षण आणि जातीची इभ्रत या नावांनी ध्वज उंचावणारे आणि गप्पा मारणारे हेच लोक स्त्रियांसाठी सर्वात मोठे संकट आहेत. राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठया संख्येने गर्भाशयात मुलींना ठार मारणाऱ्या या लोकांसह महिला कशा सुरक्षित राहतील ही विचार करण्यासारखी बाब आहे. त्यांना बाहेरील पुरुषांच्या आधी त्यांच्याच स्वत:च्या घरातील लोकांकडून धोका आहे. कधी त्यांना गर्भाशयातच ठार मारणे, कधी प्रेम केल्याची शिक्षा म्हणून जीव घेणे, कधी फोन वापरल्याबद्दल दंड ठोठावणे, तर कधी गिधाडासारखी बारीक नजर ठेवून आपल्याच घरातील स्त्रियांना बेअब्रु करणे. स्त्रियांच्या श्वासांवर या इभ्रतीच्या मक्तेदारांचा असा पहारा आहे, जो मृत्यूपेक्षा कितीतरी हजार पटीने अधिक भयानक आणि वेदनादायक असतो.

आजही आपला समाज २ प्रकारच्या जीवन मूल्यांनी संचालित होत आहे. एक जीवन मूल्य वर्णद्वेष-पितृसत्तेद्वारे स्थापित आहे. हे पूर्णपणे अन्याय आणि असमानतेवर आधारित आहे. ज्यात उच्च जाती आणि पुरुषांची सत्ता स्थापित केली गेली आहे. महिलांच्या विरोधात आदेश जारी करणाऱ्यांचे सामाजिक जीवन याच मूल्यांमुळे संचालित होत आहे.

दुसरीकडे, संविधानाने प्रदान केलेली जीवन मूल्ये आहेत. या जीवन मूल्यांमध्ये आधुनिकता, स्वातंत्र्य समानता आहे. यांच्यामुळेच आज महिला आगेकूच करीत आहेत.

या नासले-कुजलेल्या, असमानतेवर आधारित सामाजिक मूल्यांना कसे उद्ध्वस्त करायचे आणि समानतेची मूल्ये कशी स्थापित करायची हे देशापुढे सर्वात मोठे आव्हान आहे.

बहुतेकदा मुलींनाच लोकांच्या म्हणण्या-बोलण्याची काळजी घ्यावी लागते. लोकांच्या प्रश्नभरल्या नजरा त्यांच्यावरच येऊन थांबतात. केवळ मुलींच्या आचरणावरून प्रश्न उद्भवतात. पण हे किती काळ? आपण पितृसत्तात्मक संरचना मोडून, समान हक्कांच्या मार्गावर पुढे जाण्याची वेळ आता आली आहे.

धर्मच आहे स्त्रियांसोबतच्या हिंसेचं कारण

* नसीम अन्सारी कोचर

आम्ही कधी असे पाहिले आहे का की कबुत्तर आणि कबुतरीण आपसात भांडत आहेत किंवा हत्ती आपल्या हत्तीणीला जिवानिशी मारतो वा मोर आणि लांडोरशी भांडला वा सिंह आपल्या सिहिणींशी भांडला नाही, तुम्ही हे कधी पाहिले अथवा ऐकले नसेल, कारण निसर्गाच्या या जातीचे काम एकमेकांना प्रेम देणे हे आहे, सोबत राहणे आणि त्या बदल्यात संतती निर्माण करणे. लाखो वर्षांपासून पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी निसर्गाच्या या नियमाचे पालन करत आपले जीवचक्र पूर्ण करत आहे. या पृथ्वीवर केवळ आपण मानवच आहोत जो निसर्गाच्या या नियमाला उध्वस्त करतो, आपल्या माद्यांना मारहाण करत आणि त्यांच्या सगळया जीवनाचे शोषण करत आहोत.

खाजगी संघटना सहज आणि समान मेजर्स २०३० द्वारे महिलांवर केलेले एक सर्वेक्षण भारताच्या आधुनिक आणि विकसित चेहऱ्यावर दिलेली सणसणीत चपराक आहे. वडोदराच्या या २ संस्थांना आपल्या सर्वेक्षणात आढळले की भारतात जवळपास १/३ विवाहित स्त्रियांना पतिच्या हातून मारहाण केली जाते, पण यात बहुतांश स्त्रियांना याबाबत काही तक्रार नाहीए. त्या हे आपले नशीब मानतात.

लज्जास्पद हे आहे की १५-४९ या वयातील महिलांमध्ये २७ टक्के महिला १५ वर्षापासूनच ही घरगुती हिंसा सहन करत आहेत. माहेरी वडील आणि भावाच्या हातून आणि सासरी पतिच्या हातचा मार खात आहेत.

अलीकडेच ‘मीटू’ आंदोलनामुळे शिकल्यासवरलेल्या, उच्च पदावर काम करणाऱ्या आणि आधुनिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांची विवशता, त्रास आणि दुर्दशा यांचं नग्न सत्य समोर ठेवलं आहे, हे पाहता अंदाज येतो की या देशाच्या कमी शिकलेल्या, आर्थिक दृष्ट्या कमजोर, विवश, खेडयापाडयात राहणाऱ्या स्त्रिया पुरुष जातीकडून कशाप्रकारे अपमान, हिंसा, छळ आणि शोषण यांचा सामना करत आहेत.

स्त्रीसोबतच हिंसा का

अखेरीस हिंसेच्या भक्ष्यस्थानी स्त्रीच का असते. तिच का मार खाते. तिचेच का शारीरिक शोषण होते? स्त्रियांना मारहाण करून आपल्या नियंत्रणात ठेवण्याची कसरत शेवटी या धरेवर केव्हा आणि कशी सुरु झाली? माणसाशिवाय आणखी कोणते सजीव आहेत, जे आपल्या माद्यांना मारहाण करतात किंवा त्यांचे शोषण करतात?

या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला इतर प्राण्यांच्या वर्तनाच्या आणि मानवजाती हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाला पडताळून पहावे लागेल. याशिवाय निसर्गाच्या नियमांनासुद्धा समजून घ्यावे लागेल.

पृथ्वीवर प्रामुख्याने दोनच जाती आहेत, नर आणि मादी. या शिवाय तिसरी जात आहे संकर. माणसाच्या भाषेत सांगायचे तर या जातिला म्हणतात, हिजडा वा किन्नर म्हणजे ज्याच्यात नर आणि मादी दोघांचेही गुण आढळतात. इतर दोन्ही जातींच्या तुलनेत याची संख्या खूपच कमी आहे. नर अथवा मादी यांच्यापैकी एक जरी या धरेवर संपला तरी सृष्टी नष्ट होईल. म्हणजे दोघेही जीवन कार्यरत ठेवण्यास समानतेने महत्वपूर्ण आहेत. हे या पृथ्वीवर राहणाऱ्या लहान व मोठया जीवांसाठी सत्य आहे.

नर आणि मादी या दोन्ही जाती या पृथ्वीवर जीवन कार्यरत ठेवण्याचे माध्यम आहे. हेच यांचे मुख्य काम आहे. त्यामुळे यांच्यात नेहमी आकर्षण असते. दोन्ही  जाती एकमेकांना पूरक असल्याने तरीही त्यांचा प्रयत्न असतो की आपल्या आकर्षणात समोरच्याला बांधून ठेवावे, एकमेकांच्या प्रेमात सहभागी व्हावे, निर्सगाचे नियम पाळावे जेणेकरून नवीन जीवाला पृथ्वीवर येण्याची संधी मिळेल.

असे नाही की पृथ्वीवर वावरणाऱ्या इतर सजीवांची भांडणं होत नाहीत. अवश्य होतात, पण त्यांच्या भांडणाची कारणं काय असतात? हे सजीव जर आपसात भांडत असतील तर याचे कारण असते-जेवण. शेवटी जीवन पुढे नेण्याच्या निर्सगनियमाला पूर्ण करण्यासाठी अन्न तर आवश्यकच आहे. त्यामुळे इतर प्राण्यांमध्ये भांडण झालेच तर शिकारीसाठी होते.

सहवासात असलेले नर आणि मादी आपसात कधीच भांडत नाहीत. ते इतर प्राण्यांसोबत भांडतात. प्रत्येक प्राणी आपले आणि आपल्या पिल्लांचे पोट भरण्याच्या शोधात असतो. जंगलात एक नर दुसऱ्या नरासोबत लढतो. कधीकधी तर समोरच्या नराला मारूनसुद्धा टाकतो. पण आपल्या मादीसोबत कधीही भांडत नाही. पण माणूस सर्वात जास्त आपल्या घरातील स्त्रीसोबत भांडत असतो.

पुरुषांची क्रूरता

२३ वर्षांपूर्वी झालेले तंदूर हत्याकांड कोण विसरू शकेल. मानवी जीवनाच्या इतिहासात प्रथमच हे पाहण्यात आले की पुरुषाचा राग, घृणा, अमानुषता, क्रूरता यांची परिसीमा ही की एका स्त्रीला भट्टीत टाकून भाजून काढले. सुशील शर्मा नामक उच्चशिक्षित आणि युवा काँग्रेसच्या अध्यक्षाने त्या स्त्रीला भट्टीत टाकून भाजून काढले, जिच्यावर त्याने प्रेम केले होते, तिच्याशी सहवास साधला होता आणि जी त्याची पत्नी होती. नैना सहानी हत्याकांडाची झाळ लागून संपूर्ण देश तापू लागला होता.

सुशील शर्माने आधी आपल्या पत्नीला गोळी घातली, नंतर तिचे शव एका पॉलिथिन बॅगमध्ये गुंडाळून आपल्या कारमध्ये टाकून दिल्लीच्या रस्त्यावर फिरत राहिला. प्रयत्न केला की यमुना नदीच्या पुलावरून ते शव यमुनेत टाकू शकेल, पण लोकांच्या गर्दीमुळे तो असे करू शकला नाही. मग त्याने आपली कार कॅनॉट प्लेसमध्ये अपल्या रेस्टॉरंटकडे वळवली. रेस्टारंटमध्ये काही लोक जेवत होते. त्याने आपला मॅनेजर केशव याला रेस्टॉरंट बंद करायला सांगितले. केशवने रेस्टॉरंट बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना पाठवून दिले. यानंतर सुशीलने केशवला सांगितले की त्याच्या कारच्या डिक्कित एक शव आहे, ज्याची भट्टीत टाकून विल्हेवाट लावायची आहे. त्याने केशवला हे सांगितले नाही की ते शव त्याच्या प्रिय पत्नीचे आहे. पुरुषांच्या या भयानक चेहऱ्याच्या या कल्पनेनेच मनाचा थरकाप उडतो.

भट्टीचे तोंड लहान होते त्यामुळे त्यात पूर्ण शव जाऊ शकत नव्हते. तेव्हा केशव आणि सुशील शर्माने मिळून नैनाच्या प्रेताचे टुकडे केले. जेव्हा आग मंदावू लागली आणि शवाचे तुकडे पूर्णपणे जळत नव्हते तेव्हा त्यात भरपूर लोणी टाकले गेले. आग भडकली आणि धुराचे लोट निघाले. रेस्टॉरंटच्या बाहेर फूटपाथवर झोपलेल्या भाजी विकणाऱ्या अनारोला रेस्टॉपंटच्या चिमणीतून निघणारे धुराचे लोट पाहून वाटले की आग लागली आहे आणि तिने आरडाओरडा केला. जवळच गस्त घालणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या शिपायाच्या अब्दुल नजीर गुंजू यांच्या कानावर हा आवाज पडला आणि अशा प्रकारे समोर आली एका पुरुषाच्या क्रौर्याची अंगावर काटे उभे करणारी कथा जी वर्षानुवर्षे ऐकली आणि ऐकवली जाईल.

पुरुष समाजाच्या अत्याचाराच्या अशा कथा अगणित आहेत. मग ती जेसिका लाल केस असो, प्रियदर्शिनी मट्टु केस असो वा निर्भया बलात्कार प्रकरण आणि बीभत्स मृत्यूचे तांडव पाहून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की पुरुषासारखा क्रुर आणि दुष्ट प्राणी जगात इतर कुठल्या प्रजातीत दिसणार नाही.

पुरुष का बनला नराधम

शेवटी ही विकृत मनोवृत्ती केव्हा निर्माण झाली? कोणी निर्माण केली? का निर्माण केली. असे कोणते कारण असू शकेल ज्यामुळे पुरुषाला स्त्रीच्या वरचढ केले असेल? स्वत:ला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ समजण्याची भावना केव्हापासून आणि कशाप्रकारे पुरुषांच्या डीएनएमध्ये आली, जेव्हा की निसर्गाने दोघाना एकमेकांना पूरक बनवले होते, एकमेकांचे प्रेमी आणि जोडीदार बनवले होते, प्रतिस्पर्धी नाही.

तसे पाहता, स्त्रियांला छळण्याचा खेळ सुरू द्ब्राला. हजारो वर्ष आधी, जेव्हा पृथ्वीवर धर्माच्या प्रसाराने आपले पाय पसरणे सुरु केले होते. धर्माचा प्रसार करणाऱ्यांनी माणसामाणसांमध्ये लढाया करवल्या. जास्तीत जास्त जमिनीवर आपले शिष्य आणि आपले विचार पसरवण्यासाठी घनघोर युद्ध घडवून आणली. ईश्वरासारख्या अदृश्य शक्तीला रचले आणि आपले म्हणणे पटवण्यासाठी निसर्ग नियमांना उध्वस्त करत त्यांना कमकुवत घटकांवर अत्यावर करायला सुरूवात केली.

विरोधकांच्या स्त्रिया जबरदस्तीने त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवलेत. अनैतिक मूलं जगात आणली. बस इथूनच पृथ्वीवर जीवनातील अनंत शांती कायम ठेवणारे एकमेकांना पूरक असलेले स्त्री पुरुष यांच्या दरम्यान कटूतेचे बीज निर्माण होणे सुरु झाले, इथूनच पुरुषाच्या डीएनएमध्ये क्रूरतेचा समावेश झाला आणि स्त्रीमध्ये भयाचे.

धर्माने हिसकावले मानवाचे नैसर्गिक गुण

धर्माने मानवजातीची कधीही प्रगती केली नाही, उलट त्याच्या नैसर्गिक गुणांना त्याच्यापासून हिसकावून घेतले. धर्माच्या निर्मितीसोबतच मनुष्य या पृथ्वीवर आढळणाऱ्या अन्य सर्व प्राण्यांपासून वेगळा ठरला. निसर्गाच्या नियमांची अवहेलना करू लागला. एवढेच नाही तर पुरुष स्वत:ला इतके श्रेष्ठ समजू लागला की निसर्गाचा विनाश करू लागला,

कालांतराने क्रूरता, भय, क्रोध, विनाश, अपमान, शोषण, अत्याचार यासारखे सर्व गुण त्याच्या डीएनएमध्ये खोलवर रुजत गेले. आज जर तो स्वत:ला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ मानून तिला अत्याचार करण्याची एक वस्तू मानत असेल तर याला जबाबदार धर्म आहे.

लाखो वर्षांपासून स्त्रियाच पुरुषावर आपले सर्वस्व लुटत आल्या आहेत. युद्धात पतिचे निधन झाले तर त्याच्या प्रेतावर त्याची पत्नी जळून सती होत आली आहे. असे करण्यासाठी तिला धर्माने भाग पाडले आहे. कधी असे ऐकले आहे का की एखादा पतिसुद्धा आपल्या पत्नीसाठी सती गेला आहे? सगळे नियम, सगळी व्यवस्था, सगळी शिस्त पुरुषांनी निर्माण केली. धर्माच्या नावावर निर्माण केल्या आहेत या गोष्टी.

हा धर्म स्त्रीवर पुरुषांमार्फत थोपला गेला आहे. सगळया कथा त्यांनी रचल्या आहेत, ज्यात पुरुष स्त्रीला वाचवून घेऊन येतो आणि अशा कथा बनवल्या जात नाही, ज्यात पुरुष स्त्रीला वाचवून परत घेऊन येतो आणि स्त्री गेली की तो दुसरी स्त्री शोधू लागतो, तिला वाचवण्याचा प्रश्नच नाही. पुरूषाने आपल्या सोयीसाठी ही सगळी व्यवस्था केली आहे.

त्या पुरुषांनी, ज्यांनी स्वत:ला धर्मगुरू म्हणवून घेतले आहे आणि ज्यांनी धर्माच्या आड लपून आपल्या ऐय्याशीची सोय करून ठेवली. वास्तविक पाहता ज्यांच्याकडे थोडी जरी शक्ती असेल कोणत्याही प्रकारची, ते थोडे अशक्त असतील कोणत्याही प्रकारे, त्यांच्यापेक्षा वरचढ होतातच. लगेच मालक बनून गुलामी निर्माण करतात. शारीरिक दृष्टया पुरुष थोडा शक्तिशाली आहे. पण त्याच्यात सहनशक्ती तेवढी जास्त नसते. स्त्रीकडे शारीरिक बळ कमी, पण सहनशक्ती अपार आहे. दोघांनाही निर्सगाने असे बनवले आहे जेणेकरून याच्या शक्तीचा वापर धरणीवर जीवनाची अथक वाटचाल कायम ठेवण्यासाठी केला जाऊ शकेल.

तुटले नियम

पुरुषाचे काम आहे भोजन देणे, सुरक्षा देणे, प्रेम देणे अन् स्त्रीचे काम आहे त्याच्या प्रेमाला आपल्या कुशीत स्थान देऊन नव्या जीवाला जन्म देणे. सगळी सृष्टी याच नियमांतर्गत चालते आहे. स्त्रीला ९ महिने मूल आपल्या पोटात सांभाळावे लागते आणि नंतर त्याला जन्म देण्याच्या वेदनेतून जावे लागते, यासाठी निसर्गाने तिला जास्तीची सहनशक्ती दिली आहे. पुरुषाने या ९ महिन्यात तिची काळजी घ्यायची असते, यात तिच्या जेवणाची व्यवस्था करायची असते, यासाठी त्याला शारीरिक बळ जास्त देण्यात आले  आहे. पण काही उतावीळ, तापट लोकांनी निसर्गाचा हा साधा नियम तोडून यावर धर्माला आणून बसवले आणि पुरुषाच्या शारीरिक शक्तीचा वापर चुकीच्या कार्यासाठी करण्यासाठी दबाव आणणे सुरु केले आणि त्यांना लढाईत झोकून दिले. विध्वंसक कामामध्ये लावून टाकले.

धर्माद्वारे उत्पन्न केल्या गेलेल्या या विकृती हजारो वर्षांपासून पुरुषांच्या रक्तात धावत आहेत आणि याच विकृतींचा परिणाम आहे कौटुंबिक हिंसा.

नाही म्हणायलादेखील शिका

* प्रमीला गुप्ता

सुगंधा एक आदर्श सूनबाई, पत्नी व आई होती. सर्वजण तिची कायमच स्तुती करत असत. लग्नापूर्वी माहेरी व शाळेतदेखील ती सर्वांची आवडती होती. याचं एक कारण म्हणजे तिने कधीही कोणालाही कोणत्याही कामासाठी नकार दिला नव्हता. लहानपणापासूनच तिला आईवडिलांनी हेच शिकवलं होतं. शांत स्वभावाच्या सुगंधाचे सर्वजण चाहते होते. यामुळे सुगंधाला मनोमन एकटेपणा जाणवत होता. तिला डिप्रेशनने घेरलं.

हे पाहून सुगंधाचे पती जीतेन तिला आपल्या एका मित्राकडे घेऊन गेले. ते एक मानसोपचारतज्ज्ञ होते. सर्व गोष्टी ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘‘सुगंधा, तुम्ही एक प्रतिभासंपन्न व कुशल गृहिणी आहात, तुम्ही कायमच दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेता. तुम्हाला नकार देताच येत नाही. फक्त हीच तुमची खरी अडचण आहे. यातून बाहेर पडा. नाही म्हणायलादेखील शिका. थोडंसं तुमच्या इच्छेनेदेखील जगून पाहा.’’

घरी आल्यावर सुगंधानं डॉक्टरांच्या सल्ल्यावर विचार करायला सुरूवात केली. तेव्हा तिला त्यांच्या म्हणण्यात खरेपणा दिसून आला. दुसऱ्यांच्या आनंदासाठी तिच्या स्वत:च्या इच्छाआकांक्षा कुठेतरी दबल्या गेल्या होत्या. त्यामुळे तिने ठरवून टाकलं की ती आता स्वत:साठीदेखील जगून पाहाणार. स्वत:ची एक वेगळी ओळख बनवणार. हळूहळू ती ‘नाही’ म्हणायला शिकली.

सासूबाईंनादेखील मृदू स्वरात म्हणायची, ‘‘आई, मला तुमचं हे म्हणणं पटत नाही. आपण एखाद्याला घरगुती गोष्टीत हस्तक्षेप करता कामा नये.’’

पतींनादेखील सांगायची, ‘‘नाही, आज मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. मला महिला समितीच्या मिटिंगला जायचंय.’’

सर्वजण सुगंधामध्ये आलेल्या आकस्मित बदलामुळे चकीत झाले होते. कालपर्यंत खूपच सरळसाध्या दिसणाऱ्या सुगंधाचं स्वत:च एक स्थान, व्यक्तिमत्त्व होतं. स्वत:ची एक ओळख होती. सून, पत्नी, आईबरोबरच ती एक सशक्त नारीदेखील होती. सुगंधाला आनंदी पाहून सासूसासरे, पती व मुलंदेखील आनंदी राहू लागली होती.

स्वत:चं अस्तित्त्व विसरू नका

अनेक स्त्रीपुरूष, तरूण कोणालाही नाराज न करण्याच्या विचाराने नकार देण्याचं साहस करत नाहीत. त्यांना सर्वांच्या नजरेत स्वत:ची एक सकारात्मक छबी निर्माण करायची असते. मग भलेही होकार दिल्यानंतर ते कटकट करत.

शेवटी नकार देण्यात एवढा संकोच का? प्रत्येकवेळी नाही शब्दाचा वापर करणं योग्य नाहीए. हे खरं असलं तरी अनेकदा यामुळे तुम्ही तुमचं नुकसान करून घेता. प्रत्येक काम करणं तसं कुणालाही शक्य नाही. होकार दिल्यानंतर काम कंटाळत करणं वा न करणं अधिक चुकीचं असतं.

मानसोपचार तज्ज्ञांनुसार नकार देण्याशी आत्मसन्मानाची भावना संबंधित असते. सर्वांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात व्यक्ती आपलं अस्तित्त्वच हरवून बसते. एक वेळ अशी येते, जेव्हा ती सुगंधाप्रमाणे गळून पडते.

अनेकदा लहानपणी आईवडिलांनी उपेक्षा केल्यामुळे मोठं झाल्यावर दुसऱ्यांच्या नजरेत आपली सकारात्मक छबी बनवण्यासाठी असं करतात. खासकरून स्त्रिया असं करतात. होकार देणं म्हणजे लोकांच्या गर्दीत सामील होणं. याउलट नकार दिल्यावर व्यक्तिची ओळख वेगळी होते.

तसेही सर्व स्त्रीपुरूष, तरूण प्रशंसेचे भुकलेले असतात. प्रशंसा मिळवण्यासाठी ते सर्व काही करायला तयार असतात. अनेकदा या ‘होय’च्या चक्रव्यूहात अशाप्रकारे अडकतात की बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं. माणूस जेवढा झाकतो, तेवढं अधिक कुटुंब, समाजातील लोक त्याला झाकण्यासाठी विवश करतात. जी प्रशंसा, सकारात्मक छबी, आत्मविश्वासासाठी होय शब्दाचा वापर करतात, ती सर्व दिवास्वप्नं बनून राहतात.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तिला गरज पडल्यास नकार देण्याऐवजी कलासुद्धा यायला हवी.

यांनाही आहे जगण्याचा हक्क

* मेनका गांधी

मला एकदा एका तरुणाने जेवण्यासाठी बोलावलं. त्याचं लहानपण अनेक छोट्यामोठ्या अडचणींना तोंड देण्यात गेलं होतं. परंतु आता तो कुशल डिझायनर बनला होता व त्यामुळे त्याच्यात कमालीचा आत्मविश्वासही आलेला होता. रात्रीच्या जेवणासाठी त्याने कैव्हिअरचा बेत केला होता, जे समुद्री माशांच्या अंड्यांपासून बनविलेलं असतं व फारच महाग असतं.

मी कैव्हिअर बघून हैराण झाले. ज्याने लहानपणी इतक्या अडचणींशी सामना केलेला आहे असा माणूस अशा माशांपासून मिळविलेल्या अंड्याचा पदार्थ जेवणात कसा बनवू शकतो? कारण या माशांना समुद्रातून काढून त्यांची पोटं फाडून ती अंडी काढली जातात व त्या माशांना पुन्हा समुद्रात सोडलं जातं.

मी जेव्हा त्याला याबद्दल विचारलं तेव्हा दोन्ही कानावर हात ठेवून त्याने सांगितलं, ‘‘मेनका आंटी, मला हे काही आता सांगू नका. हे मला ऐकवत नाही.’’

त्याचं हे म्हणणं ऐकून मला समजलं की मनुष्याच्या रुचीसाठी किती जीवजंतूंना किती व कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो हे याला कधीच समजणार नाही.

आपण माणसं आपल्या स्वार्थासाठी, तोंडाच्या चवीसाठी व पैशांच्या कमाईसाठी कित्येक जीवांची शिकार करतो. त्यावेळी आपण हे विसरतो की हे प्राणीसुद्धा आपल्यासारखेच जगण्याची आशा बाळगून असतात.

पशुपक्ष्यांची अद्भूत दुनिया

पशुपक्ष्यांचं जगणंसुद्धा प्रेमळ रोमान्सने भरलेलं असतं. तेसुद्धा माणसांप्रमाणेच आपला वंश चालू ठेवतात. स्क्विड्स दिवसाच्या सुरुवातीलाच शारीरिक संबंध ठेवतात. मादी स्क्विड १ अंड देण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने दिवसात कित्येक वेळ शारीरिक संबंध ठेवते.

पेग्विनचं जीवनसुद्धा खूपच रोमांचकारी असतं. जेव्हा नर पेंग्विनला संबंध ठेवण्याची इच्छा होते तेव्हा तो मादी पेंग्विनच्या पोटावर झोपतो. तो मादीला खूष करण्यासाठी तिच्या पायांवर दगड ठेवतो. मादी पेंग्विनला जेव्हा हे सगळं आवडतं तेव्हा ती खूष होऊन बैले डान्स करत करत आपले पंख हलवून गाणं गाते व नंतर ती शारीरिक संबंध ठेवण्यास तयार होते.

नर बुबीज आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या पंखाना नखांनी ओरबाडून आपली पिसे मादीला भेट म्हणून देतो.

तर काटेदार पशू पोरक्यूपिन नराला स्वत:च मादी शोधावी लागते. यासाठी तो गाणं गाण्यास सुरुवात करतो. जर मादी परक्यूपिनचा मूड असेल तर दोघंही एकमेकांकडे तोंडं करून बैले डान्सला सुरुवात करतात. तर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मादी परक्यूपिनला आपल्या मूत्राने पूर्ण ओली करतो. ७ फुट अंतरावरूनसुद्धा तो मादीला पूर्ण ओली करू शकतो.

प्रेमाची अभिव्यक्ती

हिप्पो जेव्हा मादी हिप्पोकडे आकर्षित होतो तेव्हा तो मूत्राने पूर्ण भिजवतो. तो आपल्या शेपटीने मूत्र चारी बाजूला उडवतो. यामुळे मादी हिप्पो संबंध ठेवण्यास तयार होते व त्यानंतर दोघंही रतिक्रीडेला सुरुवात करतात.

मोर आपले प्रेम लांडोरीजवळ व्यक्त करण्यासाठी आपला पिसारा फुलवून नाचण्यास सुरुवात करतो. यामुळे खूष होऊन लांडोर संबंध ठेवण्यास तयार होते.

परंतु याची तुलना फ्रिगेट पक्ष्याशी केली जाऊ शकत नाही, नर फ्रिगेट मादीला खूष करण्यासाठी आपल्या गळ्याची पिशवी फुगवून हृदयाच्या आकाराइतकी करतो. मग आपलं डोकं व पंख हलवूनहलवून मादीला बोलवतो. ज्याचा फुगा सगळ्यात मोठा व चमकदार असतो त्याच्याबरोबर मादी संबंध ठेवण्यास राजी होते. संबंध ठेवताना नर आपल्या पंखांनी मादीचे डोळे झाकतो जेणेकरून ती दुसऱ्या नराचा फुगा बघून त्याच्याकडे जाणार नाही.

लव गार्डन बनविणारे कीटक

नर लाल मखमली किडे बसण्यासाठी आपल्या शुक्रजंतूपासून फांद्यामध्ये ‘लव्ह गार्डन’ बनवितात. जर मादीला ती आवडली तर ती त्यावर येऊन बसते. जर नराने ‘लव्ह गार्डन’ बनविल्यानंतर त्यावर तो पहारा देत बसला नाही तर दुसरा लाल मखमलीदार किडा ती नष्ट करून त्या जागी आपल्या शुक्रजंतूंपासून लव्ह गार्डन’ बनवितो.

निळ्या पक्षाच्या नावाने ओळखला जाणारा नर पक्षी मादी पक्षिणीला भुलविण्यासाठी झाडांच्या फांद्यांमध्ये स्वत:ला उलटा टांगून घेतो व आपल्या पंखांना छातीपाशी धरुन प्रेमपूर्ण आवाजात आपल्या प्रेमिकेला बोलावू लागतो.

दक्षिण अफ्रिकेतील नर सौंशबर्ड मादीला बोलाविण्यासाठी आपल्या पंखांतून सूर काढतो. त्या संगीताने खूष होऊन मादी त्याला समर्पित होते.

यानंतर मी आपणास हेच सांगू इच्छिते की, कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यापूर्वी असा विचार करा की तोसुद्धा एक जिवंत प्राणी आहे. त्यालासुद्धा जगण्याचा पूर्ण हक्क आहे. यास्तव कोणत्याही प्राण्याला ठार मारू नका!

वाईट नजरांपासून बचाव इतका वेदनादायी का?

* गरिमा पंकज

मेट्रो स्टेशनवर असो वा गजबजलेल्या रस्त्यावर असो, बसमध्ये असो वा बाईकवर किंवा रिक्षावर असो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मुली नेहमी दुपट्टा किंवा स्टोलने आपला संपूर्ण चेहरा आणि केस झाकून ठेवतात. त्यांचे फक्त डोळे दिसतात. कधीकधी तर त्यावरही गॉगल असतो. या मुलींचे वय १५ ते ३५ असते. आता तुमच्या मनात हा प्रश्न उभा राहत असेल की शेवटी या मुली डाकूप्रमाणे आपला चेहरा का लपवत असतात? अखेरीस प्रदूषण, धूळमातीचा पुरुषांना आणि जास्त वयाच्या महिलांनाही त्रास होतो, मग या मुली कोणापासून बचावाचा प्रयत्न करत असतात?

तशा तर, या मुली वाईट नजरांपासून बचाव करू पाहतात. पुरुष जात तशी तर महिलांना अतिशय सहयोग देत असते पण अनेकदा गर्दीत मुलींचा सामना अशा नजरांशीसुद्धा होतो, ज्या कपडयांसोबत शरीराचाही पूर्ण एक्सरे घेत असतात. अशा नजरांमध्ये वासनेच्या ज्वाला स्पष्ट दिसून येतात. संधी मिळताच अशा नजरेची माणसं या मुलींना पकडून त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्नांचे पंख उध्वस्त करून फेकून देतात.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या २०१४च्या अहवालानुसार आपल्या देशात दर तासाला ४ बलात्कार म्हणजे दर १४ मिनिटात एक बलात्कार होतो. अशा परिस्थितीत मुलींनी स्वत:च आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या नजरांपासून स्वत:ला सोडवणे ज्या त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारतात. त्यांच्या धैर्याला मुळापासून नाहीसे करतात. हेच कारण आहे की आता मुली जुडोकराटे शिकत आहेत. लाजाळू बनण्यापेक्षा कुस्तीत मुलांना पराभूत करणे त्यांना आवडू लागले आहे. पायलट बनून आपल्या स्वप्नांना पंख देणे शिकू लागल्या आहेत, नेता बनून संपूर्ण समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत.

पण सत्य हे आहे की उदाहरण बनणाऱ्या अशा महिला आता जास्त नाहीत. आजही अशा महिलांची संख्या अधिक आहे, ज्यांच्यासोबत भेदभाव आणि क्रुरतेचा भयानक खेळ खेळला जात आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते आणि हे काम केवळ पुरुषच करत नाही, अनेकदा महिलासुद्धा महिलांशी असे वर्तन करतात. सुरक्षेच्या नावावर त्यांच्या आयुष्याशी खेळत राहतात.

अशीच एक मनाचा थरकाप उडवणारी प्रथा आहे, पुरुषांच्या वाईट नजरांपासून बचाव करण्यासाठी ब्रेस्ट आयर्निंग.

ब्रेस्ट आयर्निंग

ब्रेस्ट आयर्निंग म्हणजे छाती गरम इस्त्रीने दाबणे. या परंपरेत मुलींच्या छातीला एखाद्या गरम वस्तूने दाबून टाकले जाते, जेणेकरून त्यांच्यावर आलेल्या वक्षांची वाढ थांबवली जाईल आणि त्यांना पुरुषांच्या वाईट नजरांपासून सुरक्षित ठेवता येईल.

आफ्रिका महाद्वीपातील कॅमरून, नायजेरिया आणि साऊथ आफ्रिकेतील अनेक समुदायात असे मानले जाते की महिलांची छाती जाळल्यास त्याची वाढ खुंटते. तेव्हा पुरुषाचे लक्ष मुलींकडे जाणार नाही. यामुळे बलात्कारासारख्या घटना कमी होतील. किशोरवयीन मुलींचे पालकच त्यांच्यासोबत असे घृणास्पद वर्तन करतात. ब्रेस्ट आयर्निंगच्या ५८ टक्के घटनांमध्ये मुलींच्या आयाच हे दुष्कृत्य करतात. दगड, हातोडा व चिमटयाला गरम करून मुलींच्या छातीवर लावले जाते, जेणेकरून त्यांच्या छातीतील पेशी कायमस्वरूपी नष्ट होतील.

ही वेदनादायी प्रक्रिया केवळ यासाठी की मुलींना तरुण दिसण्यापासून दूर ठेवले जावे. जास्तीतजास्त काळ ती मुलगी लहान दिसावी आणि अशा पुरुषांच्या दृष्टीआड राहावी जे त्यांना पळवून नेतात. त्यांचे लैंगिकशोषण करतात किंवा त्याच्यावर अश्लील शेरे मारतात. म्हणजे हा संरक्षणाचा एक मार्ग मानला जातो. यौनशोषणापासून रक्षण, बलात्कारापासून रक्षण, पुरूषांच्या मुलींप्रति आकर्षणापासूनन रक्षण.

कॅमरूनमधील बहुतांश मुली ९-१० वर्षांच्या वयातच ब्रेस्ट आयर्निंगच्या प्रक्रियेतून जातात. ब्रेस्ट आयर्निंगची ही बीभत्स प्रक्रिया मुलींसोबत सतत २-३ महिने सुरु असते.

आफ्रिकेच्या गिनियन गल्फची लोकसंख्या जवळपास दीड कोटी आहे आणि इथे साधारण २५० जमाती राहतात. टोगो, बेनिन आणि इक्काटोरियल गुनियाला लागून असलेल्या या देशाला ‘मिनिएचर आफ्रिका’सुद्धा म्हटले जाते. या विचित्र प्रथेमुळे गेल्या काही काळापासून कॅमरून चर्चेत आहे.

मुळात पश्चिमी आफ्रिकेत सुरु झालेली ही परंपरा आता ब्रिटनसहीत अन्य युरोपियन देशांपर्यंत पोहोचली आहे. एका अनुमानानुसार ब्रिटनमध्येसुद्धा जवळपास १,००० मुलींना अशा प्रक्रियेतून जावे लागते.

या प्रथेचा मुलींच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो, केवळ शारीरिकच नाही तर मानसिकसुद्धा. ब्रेस्ट आयर्निंगमुळे त्यांना इन्फेक्शन, खाज, ब्रेस्ट कॅन्सर यासारखे आजार होतात. भविष्यात स्तनपान करण्यातसुद्धा त्रास सहन करावा लागतो.

महत्वाचे हे की इतर आफ्रिकी देशांच्या तुलनेत कॅमरून ह्या देशात साक्षरतेचा दर सर्वात जास्त आहे. लैंगिक आकर्षण आणि प्रदर्शनापासून दूर राहण्यासाठी केली जाणारी ही प्रक्रिया असूनही येथील मुली अल्प वयातच गर्भवती होण्याच्या घटनांमध्ये पुढे येत असतात.

स्पष्टच आहे, ब्रेस्ट आयर्निंगमुळे या धारणेला बळकटी येते की मुलींच्या शरीराचे आकर्षणच पुरुषांना लाचार करते की ते अशा प्रकारचे दुष्कृत्य करतात, लैंगिक अत्याचार वा बलात्कार यासारख्या घटनांमध्ये पुरुषांची काही चूक नसते.

ही प्रथा व्हॉयलेन्स या अंतर्गत येते. एक असा हिंसाचार जो सुरक्षेच्या नावावर घरातील लोकच करतात आणि आपल्याच मुलीचे जीवन बरबाद करतात.

जगभरात मुलींना अशा वेदनादा प्रथांमधून जावे लागते, जेणेकरून त्यांचे चारित्र्य चांगले राहावे. जणूकाही चारित्र्य अशी गोष्ट आहे जिला अशा निरर्थक प्रथांद्वारे चोरण्यापासून वाचवले जाऊ शकते.

कुप्रथांचा काळा इतिहास

महिलांवर अत्याचार होण्याचा इतिहास खूप प्राचीन आहे आणि मार्गही अनेक आहेत. निरनिराळया प्रकारच्या प्रथा आणि परंपरा यांच्या नावावर त्यांच्यासोबत जबरदस्ती केली जाते, त्यांना त्रास देण्यात येतो आणि वेदना दिल्या जातात. त्यांच्या शरीरासोबतच त्यांच्या मनाला पायदळी तुडवले जाते. काही अशाच कुप्रथांबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्यांचा उद्देश कधी महिलांची पवित्रता तपासून पाहणे असतो तर कधी त्याची सुरक्षा, तर कधी त्यांचे सौंदर्य वाढवणे तर कधी कुरूप बनवणे. म्हणजे कारण काहीही असो पण मुळात उद्देश त्यांची प्रतारणा करणे आणि त्यांना पुरुषांच्या अधीन ठेवणे हा असतो :

* स्त्रियांना खतना यासारख्या कुप्रथेचे शिकार व्हावे लागते. यात स्त्रीचे क्लायटोरिस कापले जाते, जेणेकरून त्यांना सेक्स करण्याची इच्छा होणार नाही. भारतात या प्रथेचे चलन बोहरा मुसलमान समाजात आहे. भारतात बोहरा समाजाची लोकसंख्या साधारण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आढळते. १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा समाज खूप समृद्ध आहे आणि दाऊदी बोहरा समाज भारतातील सर्वात जास्त सुशिक्षित समाजापैकी एक आहे. शिकलेसवरलेले असूनही ते यासारख्या शेंडा ना बुडखा यासारख्या प्रथांवर विश्वास ठेवतात. मुलींचा खतनाच्या किशोरवयाच्या आधी करण्यात येतो. यात अनेक प्रकार जसे ब्लेड वा चाकूचा वापर करून क्लायटोरिसच्या बाहेरील भागाला कट देणे वा बाहेरच्या भागाची त्वचा काढून टाकणे. खातनामुळे पूर्वी अॅनेस्थेशियासुद्धा दिला जात नाही. मुली संपूर्णत: शुद्धीत असतात आणि वेदनेने किंचाळत असतात.

खतना उरकल्यावर हळद, गरम पाणी आणि किरकोळ मलम लावू वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी समजूत आहे की क्लायटोरीस काढल्याने मुलीची लैंगिक इच्छा कमी होते आणि ती लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवत नाही.

खतनामुळे स्त्रीला शारीरिक त्रास तर सहन करावाच लागतो, शिवाय निरनिराळया मानसिक त्रासांमधून जावे लागते. त्यांच्या लैंगिक जीवनावरसुद्धा परिणाम होतो आणि त्या भविष्यात लैंगिक सुखाचा आनंद उपभोगू शकत नाहीत.

* थायलंडच्या केरन जमातीत लांब मान असणे हे स्त्रीच्या सौंदर्याचे लक्षण मानले जाते. म्हणून त्यांची मान लांब करण्याकरिता त्यांना एका प्रक्रियेतून जावे लागते. ५ वर्षांच्या वयात त्यांच्या गळयात रिंग घातली जाते. याने मान भले लांब होत असेल, पण ज्या वेदनेतून आणि त्रासातून त्यांना जावे लागते हे तर ती पीडित मुलगीच जाणू शकते. ती तिची मान पूर्णपणे फिरवू शकत नाही आणि ही रिंग त्यांना आयुष्यभर घालावी लागते.

* रोमानिया, इटलीने, यूएसए शिवाय इतर अनेक देशांमध्ये जिप्सी समुदायाचे लोक राहतात. या समुदायात एखाद्या मुलीशी लग्न करायची इच्छा झाली तर मुलाला तिचे अपहरण करावे लागते. जर ३-४ दिवसात मुलगा तिच्या आईवडिलांच्या नकळत तिला लपवून ठेवण्यात यशस्वी झाला तर ती मुलगी त्याची संपत्ती मानली जाते आणि मग दोघांचे लग्न करून दिले जाते.

* भारतात दीर्घ काळ बहुविवाहाची प्रथा कायम होती, यात पुरुषांना हे स्वातंत्र्य होते की ते हवे तेव्हा पाहिजे तेवढया स्त्रियांना आपली पत्नी बनवू शकत होते. यामुळे स्त्रिया आपल्या पतिसाठी भोगदासी बनून राहिल्या. अशाच प्रकारे केरळ आणि हिमाचल प्रदेशात बहुपतित्वाची परंपरा कायम आहे, ज्यात एक स्त्री अनेक पतिची पत्नी बनणे मान्य करते. या व्यवस्थेत आधी निश्चित केले जाते की स्त्री किती दिवस कोणत्या पतिसोबत राहील.

* दक्षिण भारतातील आदिवासी टोडा, उत्तर भारतातील जौनसर भंवरमध्ये, त्रावणकोर आणि मलबारमधील नायर, हिमाचलमधील किन्नोर व पंजाबच्या मालवा क्षेत्रातसुद्धा अशा प्रथा आढळतात. जशी पूर्वीची बहूपतित्वाची परंपरा स्त्रीला भावनिक दृष्टया कमकुवत करायची, तशीच शारीरिक दृष्ट्याही धक्कादायक असायची.

* केनिया, घाना आणि युगांडा यासारख्या देशात एखाद्या विधवा स्त्रीला हे सिद्ध करावे लागते की तिच्या पतिचा मृत्यू तिच्यामुळे झाला नाही अशा वेळी त्या विधवेला क्लिनजरसोबत झोपावे लागते. कुठेकुठे तर विधवेला आपल्या मृत पतिच्या शरीरासोबत ३ दिवस झोपावे लागते. परंपरेच्या नावावर तिला पतिच्या भावांसोबत सेक्स करण्यास जबरदस्ती केली जाते.

* सुमात्रामध्ये मैनताईवान जमातीत स्त्रियांचे दात ब्लेडने टोकदार बनवले जातात. इथे अशी समजूत आहे की टोकदार दात असलेली स्त्री जास्त सुंदर दिसते.

अशाच प्रकारे आफ्रिकेच्या मुर्सी आणि सुरमा जमातीत महिला जेव्हा प्युबर्टीच्या वयात येतात, तेव्हा त्यांचे खालचे समोरचे २ दात काढून खालच्या ओठाला छिद्र करून तो ओढला जातो आणि त्याला एक पट्टी लावली जाते. वेदना सहन करण्याकरिता कोणतेही औषध देण्यात येत नाही. दर वर्षी या लिप प्लेटचा आकार वाढवला जातो. अशी समजूत आहे की जितकी मोठी प्लेट आणि जाड ओठ असतील तेवढी महिला सुंदर असेल.

* सोमालिया आणि इजिप्तच्या काही भागात मागास जमातीत खूपच विचित्र कारणासाठी क्लिटोरल विकृत केले जाते. किशोरवयीन मुलींचे कौमार्य विना औषध सुरक्षित राहावे म्हणून व्हजायना सील केला जातो. हे आजही सुरु आहे, तसे थोडे कमी झाले आहे.

* इस्लामिक गणराज्य मॉरिटानियाच्या काही भागात अशी धारणा आहे की जास्त वजन असलेली पत्नी आनंद आणि समृद्धी घेऊन येते. त्यामुळे लग्नाआधी तरुणींना जबरदस्तीने साधारण १६,००० कॅलरीचा डाएट दिला जातो, जेणेकरून त्यांचे वजन वाढेल.

*अरुणाचल प्रदेशमधील जिरो व्हॅलीच्या अपातनी जमातीच्या स्त्रियांच्या नाकाच्या छिद्रात वूडन प्लग्स घुसवतात. असे त्या कुरूप दिसाव्या म्हणून केले जाते, जेणेकरून इतर कोणत्या जमातिने त्यांना पळवून नेऊ नये. तसे तर आता यावर बऱ्याच प्रमाणात बंदी आणण्यात आली आहे.

पुरुष धुतल्या तांदळासारखे असतात का?

भारतीय इतिहासात चाणाक्य आणि त्याच्या अर्थशास्त्राचे खूपच नाव आहे. जरा त्याचे स्त्रियांबाबत विचार बघा :

स्त्रिया एकाशी बोलत असतात आणि दुसऱ्याकडे पाहात असतात आणि तिसऱ्याचे चिंतन करत असतात. या कोणा एकावर प्रेम करत नाही.

सांगायचा अर्थ हा की स्त्रीसारखी पापी आणि व्यभिचारी कोणी नसते. पण चाणाक्याला हे विचारायला नको होते का की पुरुष काय धुतल्या तांदळासारखे असतात का?

कामवासना तर मानवी प्रवृत्तीचे एक नैसर्गिक अंग आहे आणि मर्यादेचे उल्लंघन करण्याची प्रवृत्ती स्त्री आणि पुरुष दोघांनाही सामान प्रमाणात मिळते. परंतु धर्मशास्त्रात नेहमी व्यभिचारासाठी स्त्रीच्या चारित्र्यालाच दोषी मानले आहे. पुरुष आपले अवगुण सहज झाकू शकतो. समाजात त्याचे स्थान मजबूत असते, म्हणून तो निर्दोष असतो, उलट स्त्रीला नेहमीच शोषण सहन करावे लागते.

आपण शतकांपूर्वीची मानसिकता बदलवायला हवी. जर डोळे उघडून पाहिले तर शारीरिक दृष्टया वेगळे असूनही स्त्री आणि पुरुष निसर्गाच्या २ एकसारख्या रचना आहेत. दोघांनी मिळून आणि एका स्तरावर पुढे जाण्यातच समाजाची प्रगती शक्य आहे. स्त्री असो वा पुरुष दोघांनाही समान संधी व दर्जा देणे काळाची गरज आहे.

घर आणि महिला काम

* प्रतिनिधी

वर्क फ्रॉम होम कल्चरने पहिल्या कुटुंबातील मुले आणि वृद्ध लोकांना पाहण्यासाठी चांगले करिअर असूनही नोकरी सोडलेल्या महिलांसाठी नवीन दरवाजे उघडले आहेत. जॉब्स फोरर पोर्टलच्या एका अहवालानुसार, 300 मोठ्या कंपन्यांनी अशा गुणवंत शिक्षित आणि हुशार महिलांना संधी देण्यास सुरुवात केली आहे ज्यांना आधीच चांगले प्रशिक्षण मिळालेले आहे आणि पुरुषांपेक्षा त्यांना सामोरे जाणे सोपे आहे.

या महिलांना आधीच घर सांभाळत बाहेर काम करण्याची दुहेरी सवय असते आणि त्या पुरुषांइतक्या आळशी नसतात आणि क्रिकेटच्या सामन्यांसाठी टीव्हीसमोर बसतात. ज्यांच्याकडे चांगली क्षमता आहे, ते सोप ऑपेरा प्रकारच्या सास बहू मालिकांच्या वर्तुळातही राहत नाहीत. आजच्या सुशिक्षित तरुणींना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जास्त काळजी असते.

जर आजही तंत्रज्ञानाने महिलांना घरातील स्वयंपाकघर आणि अंथरुणातून मुक्त केले नाही, तर घरातून काम केल्याने त्यांच्या आयुष्यात नक्कीच क्रांती होईल आणि अनेक वर्षांची मेहनत व्यर्थ जाणार नाही.

अशा महिलांनी धर्माच्या वर्तुळात अडकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आजकाल, कोविडच्या काळात, पांड्यांच्या अत्याचारावर प्रवचन देऊ लागले, ऑनलाइन देणगी देऊ लागले, ऑनलाइन दांभिक कारवायांची मालिका सुरू केली. पुरुषांसाठी धर्म आवश्यक आहे कारण त्याच्या मदतीने ते जातिव्यवस्था मागे ठेवतात. हिंदू राजकारण करून राजकारण करतात, खेळतात………आणि……………… नोकऱ्या मिळाल्यानंतर घरी बसून महिला या भोंदूगिरीपासून वाचू शकतील आणि स्वत:चे पैसेही वाचवू शकतील. आज मुले कमी असली तरी दुहेरी उत्पन्न खूप महत्वाचे आहे. आज प्रत्येक महिलेला कोविडच्या अचानक हल्ल्यासाठी तयार राहावे लागेल. आज वैद्यकिय उपचारांचा भारही वाढत आहे कारण सरकारने वैद्यकीय सुविधा पूर्णपणे काढून घेतल्या आहेत. महिलांचे अतिरिक्त उत्पन्न त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

घरातून काम करणे हे एक प्रकारे महिलांसाठी राखीव ठेवावे आणि प्रत्येक सरकारी व निमसरकारी कंपनीत आरक्षण दिले पाहिजे. गरज भासल्यास कायदा करा. महिलांनी डेटा कनेक्‍शन घेतले, मोबाईल घेतला, लॅपटॉप घेतला, तर त्यांना मुद्रांक शुल्काप्रमाणेच करातही सवलत दिली जावी, यामुळे आज महिलांच्या हातात अनेक मालमत्ता येऊ लागल्या आहेत.

स्मार्ट पत्नीसह कसा असावा ताळमेळ

– रितु वर्मा

दीपांशुचे लहानपणापासूनच एक स्वप्न होते की त्याची पत्नी खूपच सुंदर असावी. त्याच्यासाठी इतर सर्व गुण सौंदर्यापुढे गौण होते. ठरलेल्या वेळी दिपांशुने उदयोन्मुख मॉडेल रुचिकाशी लग्न केले. वर्षभर तो सर्वत्र आपल्या स्मार्ट पत्नीचे प्रदर्शन करत राहिला. परंतु गृहस्थीची गाडी केवळ सौंदर्यानेच चालत नाही. रुचिकाच्या सौंदर्यामुळे आणि स्मार्टनेसमुळे दीपांशु आता चिडचिडत आहे. त्याच्या पगाराचा ४० टक्के हिस्सा रुचिकाच्या सजावटीवरच खर्च होत असे. रुचिका घराच्या कोणत्याही कामाला हात लावत नसे त्यामुळे ३० टक्के हिस्सा नोकरांवर खर्च केला जायचा. दिपांशु मोठया कठिणाईने गृहस्थीचा रथ खेचत होता. अधून-मधून रुचिकाला जे मॉडेलिंग असाईनमेंट मिळायचे त्यांचे पैसे ती पार्टीवर खर्च करायची. दीपांशुला स्वप्नातही कल्पना नव्हती की स्मार्ट पत्नी त्याला इतकी महाग पडेल.

दुसरीकडे, जेव्हा साधारण रुपरंगाच्या सिद्धार्थला खूप स्मार्ट आणि सुंदर पत्नी पूजा मिळाली, तेव्हा जणू त्याला खजिनाच गवसल्यासारखे वाटले. सुरुवातीला जेव्हा नातेवाईक त्याचे अभिनंदन करत असत किंवा माकडाबरोबर अप्सरा म्हणून विनोद करत तेव्हा तो हसून हे टाळायचा.पण हळू हळू याच गोष्टींमुळे त्याच्या मनात निकृष्ट भावनेने घर बनवले आणि एक चांगले नाते भरभराटीस येण्यापूर्वीच कोमजले गेले.

कमतरता कुठे आहे

जर आपण दोन्ही उदाहरणे पाहिली तर दोन्ही प्रकरणांमध्ये परस्पर समजुतीचा अभाव ठळकपणे दिसून येईल. काळ बदलला, युग बदलले. लोकांची विचारसरणीही काही प्रमाणात बदलली आहे, परंतु कदाचितच असा विवाहयोग्य मुलगा असेल, जो गुणांच्या सौंदर्याला प्राधान्य देईल. आता जर आपण वर्तमानपत्रांवर आणि वैवाहिक साईट्सवर पोस्ट केलेल्या वैवाहिक जाहिराती पाहिल्या तर आपल्याला कळेल की आता एक विवाहयोग्य कन्या शोधणे अधिक कठीण झाले आहे. पूर्वी जिथे गोरा रंग, उंच शरीरयष्टी, आकर्षक चेहरा-मोहरा आणि घरगुती मुलीची मागणी असायची तेथे आता या गुणांसह स्मार्ट आणि सर्व प्रकारे स्वतंत्र मुलीची मागणी असते.

ही स्मार्टनेस पहिल्यांदा नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांना खूपच आवडते, परंतु जेव्हा ती स्मार्ट बायको घराच्या प्रत्येक छोटया-मोठया निर्णयामध्ये आपले मत देऊ पाहते किंवा देते तेव्हा तिला फटकळ म्हटले जाते.

ताप्तीसारख्या स्मार्ट व सुंदर मुलीशी लग्न केल्यावर अनुज खूप खुश होता, पण लवकरच त्याला त्याच्या स्मार्ट बायकोचे मूल्यही कळले. स्मार्ट आणि फिट राहण्यासाठी ती आठवडयातून ३ दिवस जिममध्ये जायची. पत्नी व्यायामशाळेत जात असल्यामुळे अनुजला त्याचा सकाळचा नाश्ता आणि इतर कामे ऑफिसला जाण्यापूर्वी स्वत:च करावी लागत. ताप्ती तिच्या पगाराची संपूर्ण रक्कम स्वत:वरच खर्च करायची. अनुजने कधी काही मागितले तर त्याला न जाणे कोण-कोणत्या विशेषणांनी संबोधले जाई. स्मार्ट ताप्ती चुकूनही घरात खोलवर तळलेल पदार्थ बनवत नसे. परिणामी अनुजला ते खाद्यपदार्थ बाहेरून मागवून खावे लागत.

ताप्ती नक्कीच आजच्या युगातील हुशार पत्नी आहे, पण तिच्यात जर थोडीशी लवचिकता असती तर त्यांचे वैवाहिक जीवन थोडे सोपे झाले असते. हुशार बायका जेथे आधी नवऱ्याला त्यांच्या स्मार्टनेसने मोहित करतात, तेथे काही वर्षांनी त्यांच्या आडमुठया स्वभावामुळे आणि स्वत:ला प्रत्येक गोष्टीत पारंगत समजल्यामुळे त्यांना स्वत:च्याच घरात परके असल्यासारखे वाटते आणि मग सुरू होते स्त्रीवाद आणि पुरुषांच्या पारंपारिक विचारसरणी दरम्यान ओढाताण.

काय करावे

अशा परिस्थितीत आपण आपले वैवाहिक संबंध अशा प्रकारे सुरू केले तर पत्नीच्या हुशारपणाचा त्रास होणार नाही :

* आपण आणि आपली पत्नी एकमेकांना पूरक आहात. हे आवश्यक नाही की ती आपली स्मार्टनेस दर्शविण्यासाठी प्रत्येक कार्य करत असेल. आपणास असे वाटत असेल तर थंड आणि मोकळया मनाने आपल्या पत्नीशी चर्चा करा.

* आपल्या स्मार्ट बायकोमुळे आपण निकृष्ट असल्याचे समजणारे मित्र, हे आवश्यक नाही की आपले खरे मित्र नसतील. म्हणून, त्यांच्या सल्याबद्दल हृदयापासून नव्हे तर मनाने विचार करा. आपण आपल्या मित्रांच्या सल्ल्याचे अनुसरण करण्यापूर्वी किंवा त्यांच्या मतावर आधारित आपल्या स्मार्ट पत्नीची प्रतिमा बनवण्यापूर्वी, हे अवश्य लक्षात ठेवा की आपली पत्नीच आपल्या प्रत्येक         सुख-दु:खाची भागीदार आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा स्वभाव असतो. जर आपल्या पत्नीने प्रत्येक कामात पुढाकार घेतला असेल किंवा प्रत्येक कार्य स्वत:च्या मार्गाने करत असेल तर ती अभिमानास्पद बाब असावी.

* जर तुम्हाला स्मार्ट पत्नी हवी असेल तर तुम्हाला थोडी-फार तडजोड करावीच लागेल. जीवनात काहीही विनामूल्य उपलब्ध नाही. स्मार्ट दिसण्यासाठी पत्नीला तिच्या देखरेखीची काळजी घ्यावी लागेल, त्यासाठी तिला जिम आणि पार्लरमध्येही जावे लागेल. या सर्व गोष्टींसाठी आपण किती खर्च करू शकता हे ठरविणे आपल्या दोघांसाठी चांगले होईल आणि आपणदेखील आपल्या स्मार्ट पत्नीसमवेत जिममध्ये सामील होऊ शकता.

द्य ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रकारे जर आपली पत्नी हुशार असेल तर आयुष्यातील बऱ्याच चढ-उतारांमध्ये ती आपल्याबरोबर ढाल बनून राहील. जर आपल्या स्मार्ट पत्नीला आयुष्याच्या एखाद्या वळणावर स्वत:हून पुढाकार घ्यायचा असेल तर अजिबात संकोच करू नका तर तिला प्रोत्साहित करा. तुम्हाला कळणारही नाही की आयुष्याचा प्रवास कसा हसत-बोलत व्यतीत होईल.

* जर आपली हुशार पत्नी घरातील कामांसाठी नोकरांवर अवलंबून असेल तर मग ती आपल्या स्मार्टनेसमुळे त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करवून घेईल असे म्हणणेदेखील चुकीचे ठरणार नाही.

* तुमची हुशार पत्नी, कारण प्रत्येक निर्णय स्वत: घेत असते, तेव्हा होऊ शकते की कदाचित काही गोष्टींमध्ये तुम्हा दोघांचा दृष्टीकोन वेगळा असेल. अशा परिस्थितीत डोळे बंद करुन ती तुमची प्रत्येक गोष्ट स्वीकारेल असा अजिबात विचार करू नका. जर तिला एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती नक्कीच प्रश्न विचारेल. तिला अन्यथा घेऊ नका.

स्मार्ट बायको थोडी महाग अवश्य आहे पण आजच्या स्पर्धात्मक युगात ती आपली खरी मार्गदर्शक ठरू शकते. फक्त मुद्यांकडे थोडया वेगळया प्रकारे पाहण्याची आवश्यकता आहे.

ऑनलाइन डेटिंगचे धोके

* पूनम अहमद

लखनौहून कोटा इंजिनीअरिंगला गेलेल्या शिवीनच्या एका चुकीचा फटका संपूर्ण कुटुंबाला बसला. शिवीनने पूर्वाला ऑनलाइन डेट करायला सुरुवात केली, मैत्री वाढत गेली. पूर्वाही शिवीनच्या खोलीत भेटायला आली, दोघीही वेगाने पुढे जात होत्या. परिस्थिती अशी आली की दोघेही लिव्हनमध्ये राहू लागले. पूर्वाने त्याला सांगितले होते की ती दिल्लीहून सर्व काही सोडून त्याच्या प्रेमात त्याच्यासोबत राहायला आली आहे, तिला दुसरे कोणीही नाही. वर्षभर दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते. शिवीनच्या घरच्यांनाही मुलाच्या जिवंतपणाची माहिती नव्हती. वर्षभरानंतर जेव्हा पूर्वाने शिवीनवर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा शिवीनने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्याची कारकीर्द सुरू होण्यास बराच काळ लोटला होता.

पूर्वाने दुसरा रंग दाखवला, पोलिसात जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शिवीनला धक्काच बसला. घरच्यांना सगळा प्रकार सांगावा लागला. कुटुंबीयांनी पूर्वासोबत भेट घेतली असता, शिवीनचा पाठलाग सोडण्यासाठी त्याने स्पष्टपणे 10 लाख रुपये मागितले, अन्यथा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. असे अनेक पुरावेही त्याच्याकडे होते ज्यावरून शिवीनला अडकवता आले. शिवीनच्या कुटुंबीयांनी वकिलाचा सल्ला घेतला. शिवीनची कारकीर्द पाहता वकिलानेही पैसे देऊन त्याचा जीव वाचवल्याचं सांगितलं, अन्यथा मोठा संकट येण्याची भीती होती. या घटनेतून शिवीन आणि त्याचे कुटुंब फार काळ सावरू शकले नाही. चाचणीशिवाय ऑनलाइन डेटिंगमुळे या सर्वांचे खूप मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे.

ऑनलाइन डेटिंगचे धोके जेसन लॉरेन्सच्या बाबतीत समोर आले, जेव्हा हे उघड झाले की जेसनने डेटिंग साइटवर भेटल्यानंतर 5 महिलांवर बलात्कार केला आणि भेटल्यानंतर 2 महिलांवर हल्ला केला. 50 वर्षीय जेसनने वेबसाइटवर अनेक महिलांशी संपर्क साधला होता. या गुन्ह्यांसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या डेटिंग वेबसाइटने 4 तक्रारींनंतरही हल्लेखोराचे प्रोफाईल हटवले नाही.

सिएटल येथील 40 वर्षीय तीन मुलांची आई इंग्रिड लेन हिच्या हत्येने सायबर रोमान्सच्या जगाला हादरवून सोडले. 38 वर्षीय जॉन रॉबर्ट यांना भेटल्यानंतर लाइन गायब झाली. तिच्या माजी पतीने ती हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांना त्याचे कापलेले डोके, विकृत मृतदेह डस्टबिनमध्ये सापडला. मित्रांनी सांगितले की, रेखा काही दिवसांपूर्वीच एका ऑनलाइन डेटिंग साइटवर रॉबर्टला भेटली होती. रेखाच्या बाबतीत, या तारखेपूर्वी ते किती एकत्र होते हे माहित नव्हते, परंतु मित्रांनी सांगितले की ती तारखेपासून बेपत्ता आहे.

खूप नंतर रॉबर्ट पकडला गेला तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.

जगाशी चोवीस तास जोडलेले राहून, लोक असे भासवू शकतात की त्यांच्याकडे व्यायामासाठी वेळ नाही किंवा प्रवासासाठी वेळ नाही, परंतु एखाद्या खास व्यक्तीसाठी वेळ काढणे त्यांच्यासाठी इतके अवघड नव्हते. लोकांकडेही वेळ कमी असतो, त्यांना कोणत्याही कॅफे किंवा पार्टीत भेटायला वेळ नसतो. आता ऑनलाइन भागीदार शोधणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेकवेळा कुणाला भेटायला गेल्यावर, त्याच्याशी बोलल्यावर लक्षात येतं की, तुमच्या दोघांमध्ये काहीच साम्य नाही, प्रकरण पुढे सरकत नाही. यासह, प्रौढ ऑनलाइन डेटिंग टाळतात.

इंटरनेटवर मुले आणि तरुण अनेकदा लक्ष्य बनतात. मुलं त्यांच्या वयाच्या लोकांशी गप्पा मारायला जातात. बाल लैंगिक वकिली नेहमीच तरुण मुलींच्या शोधात असतात. पालकांनी खूप काळजी घ्यावी. लोक विविध कारणांसाठी ऑनलाइन डेटिंग सुरू करतात, 57 टक्के मौजमजेसाठी, काही केवळ गंभीर अर्थपूर्ण संबंधांसाठी आणि 13 टक्के सेक्ससाठी. यापैकी 74 टक्के ऑनलाइन डेटर्स एकमेकांशी खोटे बोलतात.

खरे प्रेम शोधणे इतके सोपे आहे का? होय, ऑनलाइन डेटिंग तुमचा वेळ वाचवते परंतु ही चांगली गोष्ट नाही. आभासी जगामध्ये वेगवेगळे धोके, वेगवेगळे इशारे आहेत, स्वाइप करण्यापूर्वी किंवा उजवीकडे क्लिक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे चांगले.

तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात तो तुम्हाला खूप गोड वाटतो. तुम्हाला तुमच्यासाठी योग्य व्यक्ती सापडली आहे असे तुम्हाला वाटेल. पण प्रत्येकजण पडद्यामागे लपून मास्क घालू शकतो. तुम्ही एखाद्या कुटिल व्यक्तीशी बोलत असाल हे जाणून घ्या. समुपदेशक डॉ. देशमुख म्हणतात, “जोपर्यंत तुम्ही एखाद्याला समोरासमोर भेटत नाही, त्यांच्याशी भावनिक जोडून घेऊ नका, सामान्य गोष्टी बोलू नका, तुम्हाला ते ओळखता किंवा ओळखता येत नाहीत. बहुतेक लोक खोटे बोलतात आणि त्यांच्यासमोर योग्य व्यक्तिमत्व नसते.

“मी एका तरुण मुलीला ओळखते जिने इंस्टाग्रामवर एका मुलासोबत भावनिक संदेश शेअर केले. त्याने स्वत:चे वर्णन खूप तरुण आणि अविवाहित असल्याचे सांगितले. त्याचे खरे तर लग्न झाले होते, जेव्हा गोष्टी उघडकीस आल्या तेव्हा तो पळून गेला. मुलगी खूप दुःखी होती. त्यामुळे आधी त्या व्यक्तीला भेटा, मग पुढचा निर्णय घ्या. अनोळखी व्यक्तीला तुमच्या आयुष्यात येण्याआधी सावध रहा. पडद्यामागे असताना त्याला समोर आणणे सोपे नाही.

तुमच्या ऑनलाइन जगात कोणालाही लवकर जोडू नका. मुंबईस्थित ग्राफिक डिझायनर नेहा म्हणते, “मी एका व्यक्तीला ऑनलाइन भेटले. त्याला खूप लाज वाटली आणि माझ्याशी बोलून खूप आनंद झाला. 2 दिवसात आम्ही एकमेकांचे कुटुंब, काम, छंद शेअर केले. मग माझ्या फेसबुक पेजवर टाकायला हरकत नव्हती. पण तो माझ्या फ्रेंड्स प्रोफाईलवर जाऊन पोस्ट लाइक करू लागला हे पाहून मला आश्चर्य वाटले. मला कसं वाटेल याचा विचारही केला नव्हता. लवकरच तो मित्राच्या मैत्रिणीपासून खूप मनमिळावू झाला. मला धक्काच बसला, मी त्याला माझ्या खात्यातून काढून टाकले आणि त्याच्याशी पुन्हा बोललो नाही.”

कुणाशी गोड बोलणं, मग त्यांच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेणं, फोटो शेअर करणं, या सगळ्यात खूप फसवणूक आहे. या गोष्टींमुळे कधीकधी ब्लॅकमेलिंग होते. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. आरती म्हणतात, “तुम्ही स्क्रीनवर कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही, त्यामुळे तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा फोटो शेअर करू नका. समोरची व्यक्ती या गोष्टींचा वापर कसा करेल हे माहीत नाही. जर कोणी तुम्हाला खरोखर आवडत असेल तर प्रथम त्याला भेटा, बोला. मग वास्तव जाणून घेऊन तुम्ही त्याकडे किती आकर्षित होतात ते पहा.

तुमचा वैयक्तिक तपशील किंवा कोणतेही पेमेंट कोणालाही कधीही देऊ नका. यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही फसवणुकीला बळी पडतात. मुंबईतील 62 वर्षीय प्रशांत कुलकर्णीने डेटिंग वेबसाइटच्या फसवणुकीत आपली सर्व बचत, निवृत्तीनंतरचा निधी गमावला. एका महिलेला वर्षभर डेट करण्यासाठी त्याने नोंदणी केली होती. नोंदणी केल्यानंतर त्यांना नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्याला काही महिला दाखवून डेटिंग पॅकेज देण्यात आले. पोलिस व्हेरिफिकेशन, इन्शुरन्स अशा अनेक गोष्टींसाठी महिलेने पैसे भरण्यास सांगितले.

प्रशांतला जेवढे सांगितले गेले, तेवढेच देत राहिले. त्यामुळे कोणतेही भावनिक बोलणे सुरू करण्यापूर्वी अत्यंत सावध राहा. कदाचित तुमच्या मित्राला त्याचा आवडता जोडीदार ऑनलाइन सापडला असेल आणि तो आनंदी असेल. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या बाबतीतही असेच घडेल. सर्व ऑनलाइन प्रणय सत्य नसतात. बाहेरच्या जगात अनेक सिंगल्स आहेत जे चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहेत. बाहेर जा, काळजीपूर्वक शोध सुरू ठेवा. नुकसान घेणे टाळा.

जगात सुमारे 8 हजार डेटिंग साइट्स आहेत, आपण प्रथम काय पहाल ते निवडू नका. ज्याचे यश तुम्ही मित्र आणि कुटुंबियांकडून ऐकले असेल तो निवडा. ,

विशेष टिप्स

* एखाद्याला भेटण्यापूर्वी आरामात विचार करा. घाईघाईत भेटण्याचा निर्णय घेऊ नका.

* आपण ऑनलाइन भेटलेल्या कोणालाही शोधण्यास घाबरू नका.

* गुगल इमेजेस वापरून, ते वापरत असलेले फोटो कोणाचेच नाहीत हे तपासा. त्या प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का हे पाहण्यासाठी सोशल मीडिया साइट्स देखील तपासा. काहीतरी योग्य वाटत नसल्यास, बोलणे थांबवण्यास घाबरू नका.

* जरी तुम्ही दुसऱ्यांदा डेटला गेला असाल, तरी लक्षात ठेवा की तुम्ही ऑनलाइन भेटत असलेली एकमेव व्यक्ती अनोळखी आहे. नेहमी सांगितल्यावरच भेटायला जा.

* एखाद्याशी ऑनलाइन बोलणे हे त्याच्याशी फोनवर बोलणे किंवा व्हिडिओवर बोलण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. असे बोलून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. वास्तविक जीवनात एखाद्याला भेटण्यापूर्वी, त्याच्याशी या दोनपैकी एक मार्गाने नक्कीच बोला.

* त्या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंट नीट तपासा. त्यावर थोडे संशोधन करा. यावरून त्याच्याबद्दल बरेच काही कळते. मित्राचा सल्ला जरूर घ्या.

* काही शंका असल्यास ते ब्लॉक करण्यास उशीर करू नका.

* जर तुम्ही त्याला भेटणार असाल तर सार्वजनिक ठिकाणीच भेटा. पहिल्यांदा त्याच्या घरी जाऊ नका, त्याला तुमच्या घरी बोलावू नका.

* तुम्हाला पाहून मुलीला असे वाटू नये की तुम्ही डेटबद्दल खूप उत्सुक आहात. सामान्य वागावे.

* एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या कपड्यांमधून दिसून येते. त्यामुळे कपड्यांची निवड हुशारीने करा. जादा कपडे घालू नका.

* काही आक्षेपार्ह असल्यास ताबडतोब उठून निघून जा, प्रकरण तिथेच संपवा.

* आपण विचार केला तसे झाले नाही तर निराश होण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार नक्कीच मिळेल. धोका पत्करण्यापेक्षा धोक्यात असणे चांगले, सावधगिरी बाळगा, शहाणपणाने निर्णय घ्या

वाचनानेच जाग येते

* भारतभूषण श्रीवास्तव

साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणजेच साधी राहणी उच्च विचारसरणी मानणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तरुण राहा, चांगले कपडे घाला, काळानुसार फॅशन करा, या गोष्टी काही अडचण नसतात, पण त्यांची विचारसरणी आणि मानसिकता कोणती असावी जी त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाऊ शकते, हा धडा 24 वर्षीय जागृती अवस्थीकडून घेतला जाऊ शकतो. भोपाळचा. ज्याने यावर्षी UPSC परीक्षेत देशभरात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील, सडपातळ पण आकर्षक दिसणारी सुंदर जागृती भोपाळच्या शिवाजी नगरमध्ये असलेल्या सरकारी निवासस्थानात राहते. त्यांचे वडील सुरेश अवस्थी हे आयुर्वेदिक महाविद्यालयात होमिओपॅथीचे प्राध्यापक आहेत आणि आई मधुलता गृहिणी आहेत. एकुलता एक भाऊ सुयश मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे.

निकालाच्या दिवसापासून जागृतीच्या घरी प्रसारमाध्यमे आणि अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. तिने हे स्थान कसे मिळवले हे प्रत्येकाला तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे.

शेजारी असल्याने या प्रतिनिधीने त्याला लहानपणापासून पाहिले आहे. जागृती पहिल्यापासूनच सामान्य मुलांपेक्षा वेगळी आहे. त्याचे कुतूहल आणि निरागसपणा त्याला त्या ठिकाणी घेऊन गेला ज्याचे स्वप्न कोणत्याही तरुणाने पाहिले.

या प्रतिनिधीने त्यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधला तेव्हा अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या, ज्यावरून असे दिसून येते की, एखादा माणूस केवळ आयएएस अधिकारी बनत नाही. या यशासाठी केवळ कठोर परिश्रम करावे लागत नाहीत तर भरपूर आनंद आणि मजा देखील सोडावी लागते. चला, जाणून घेऊया जागृतीच्या प्रवासाची कहाणी:

उच्च जोखीम उच्च लाभ

भोपाळ येथील एनआयटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर या सरकारी कंपनीत नोकरी लागल्यावर त्यांनी नागरी सेवांचा विचारही केला नव्हता. 95 हजार महिन्यांची अत्यंत महागडी नोकरी सोडणे ही मोठी जोखीम होती, त्यावर मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांनी त्यांच्या निर्णयाला एक प्रकारचा अज्ञान असल्याचे म्हटले होते. नोकरीबरोबरच तयारीही करता येते, म्हणजे नोकरी सोडण्याचा धोका पत्करू नका, असा सल्लाही काहींनी दिला.

पण जागृतीने धोका पत्करला आणि यश मिळवले. तरुणांनी धोका पत्करावा. त्यासाठी स्वत:वर विश्वास असणं गरजेचं असल्याचं ती म्हणते की, तिने जे ध्येय निवडलं आहे ते साध्य करून ते साध्य होईल. जर तुम्ही दृढनिश्चय केला आणि स्वतःला पूर्णपणे फेकून दिले तर जगातील कोणतेही काम कठीण नाही.

मासिके आवश्यक

जागृतीच्या आई-वडिलांनी तिच्या निर्णयावर कधीच आक्षेप घेतला नाही तर तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. जेव्हा मुलं मोठी होऊ लागली तेव्हा मधुलताने आपल्या चांगल्या अभ्यासासाठी शिक्षकाची नोकरी सोडली. परंतु केवळ अभ्यासात अव्वल असणे हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील यशाची हमी म्हणून जागरूकता मानत नाही. त्यानुसार, तुम्ही भरपूर आणि प्रत्येक प्रकारचे साहित्य वाचले पाहिजे जे फक्त मासिके आणि पुस्तकांमध्ये आढळते. तरुणांनी सोशल मीडिया आणि टीव्ही, मोबाईलचा मर्यादित वापर केला पाहिजे.

जागृतीच्या घरातच टीव्ही नाही, त्यामुळे अभ्यासात अडथळा येत असे. ती सांगते की परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने विविध पुस्तके वाचली, ज्यामुळे तिचे ज्ञान वाढले. ती लहानपणी चंपक खूप आवडीने वाचायची आणि आता सरिता, गृहशोभा यासह कारवां मासिकही वाचते. नियतकालिकांचा अभ्यास केल्याने तो व्यावहारिक आणि तार्किक बनला.

फक्त का आहे

जेव्हा जागृती काम करत होती, तेव्हा तिच्या लक्षात आले की, छोटे कर्मचारी त्यांच्या छोट्या-छोट्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत असत. काहींचे काम झाले तर काहींनी केले नाही. या लोकांच्या अडचणी पाहून त्यांच्या मनातही आयएएस होण्याचा विचार आला. ती म्हणते की ती स्वतः बुदेलखंड भागातील छतरपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातली आहे, त्यामुळे तिच्या बालपणात तिने ग्रामीण जीवनातील दुःख पाहिले आहे. आता त्या महिला व बालविकास विभागाला प्राधान्य ठेऊन काम करणार आहेत.

राजकीय हस्तक्षेप

नोकरशहांना अनेकदा राजकीय दबावाखाली निर्णय घ्यावे लागतात. अशी परिस्थिती कधी आली तर काय कराल? या प्रश्नावर त्या आत्मविश्वासाने म्हणाल्या की, आपण राजकीय दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ असे वाटत नाही. देशाला संविधान आहे. आपल्या कक्षेत राहून निर्णय घेतील. जागृतीचे मत आहे की, कोणताही निर्णय हा सर्वसामान्य आणि उपेक्षित लोकांच्या हितासाठी संस्थात्मक पद्धतीने घेतला पाहिजे. देश कोणत्याही धर्मादाय संस्थेने नव्हे तर कराच्या पैशावर चालतो, ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवावी. जास्तीत जास्त काय बदली होईल, कोणाला पर्वा नाही.

महिला आरक्षण

जागृतीचे लक्ष सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या विधानाकडे वेधण्यात आले ज्यात त्यांनी न्यायव्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची जोरदार वकिली केली होती, पण आरक्षण असायलाच हवे, पण ते कसे दिले जात आहे हे पाहणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण महिलांना वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले पाहिजे कारण प्रत्येकाची स्थिती सारखी नसते आणि ती सुधारण्यासाठी स्त्री शिक्षण आणि जागृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

डॉ भीमराव आंबेडकरांनी जातीवर आधारित आरक्षण देऊन शतकानुशतके शिक्षणापासून वंचित असलेल्या वर्गाचे भले केले होते. शहरांमध्ये परिस्थिती ठीक आहे, परंतु ग्रामीण भागात अद्याप या दिशेने बरेच काम होणे बाकी आहे.

लग्नाबद्दल

जागृतीची लग्नाबद्दलची दृष्टी अगदी स्पष्ट आहे. ती हसते आणि म्हणते की अनेक गोष्टींकडे बघून ती फक्त प्रतिपक्षाशीच लग्न करेल, पण त्यात तिला तिच्या पालकांची संमती असेल. याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही त्यांनी दिले आहे. माणसाला माणूस समजून घेण्याची तळमळ असणारा आणि तळागाळातल्या विचारसरणीचा असा जीवनसाथी हवाय.

तरुणांमध्ये संयम आणि समज आहे

आता अनेकांसाठी आदर्श बनलेल्या जागृतीने तोंडी मुलाखतीत एका क्षुल्लक प्रश्नावर अडखळले. प्रश्न असा होता: मध्य प्रदेशचा पिनकोड 4 ने सुरू होतो आणि कोणत्या राज्याचा पिनकोड 4 ने सुरू होतो. छत्तीसगडचे उत्तर अगदी सोपे होते कारण ते मध्य प्रदेशातून कोरले गेले होते. ती सांगते की मुलाखतीत अनेकदा असे घडते की उमेदवाराला अगदी छोट्या प्रश्नांचीही उत्तरे देता येत नाहीत.

ही भीती जागृतीच्या दृष्टीने स्वाभाविक असली, तरी तरुणांनी केवळ कोणत्याही मुलाखतीतच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक लढाईत संयम आणि समजूतदारपणा राखला पाहिजे. आजचा तरुण अनेक अनिश्चिततेत जगत आहे, पण आत्मविश्वास हे असे भांडवल आहे की ते त्यांना कधीही गरीब होऊ देत नाही.

नोकराशिवाय घरी जाता येत नाही

* स्नेहा सिंग

सुजल आणि सुनंदा हे नेहमी आनंदी पती-पत्नी असतात .त्यांना दोन मुले आहेत. सदैव आनंदी राहणारे हे जोडपे एके दिवशी दुःखी आणि अस्वस्थ होऊन आपसात भांडत होते. हर्ष आणि ग्रीष्मा दोघेही काम करतात. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दोघेही नेहमी तणावात आणि चिडखोर दिसतात. त्यांना भांडताना पाहून त्यांचे मूलही घाबरते. अमी घरी राहून तिची कामे करते. पण ती नेहमी काळजीत असते. या सर्वांच्या या त्रासाला एकच कारण आहे, कामवाला किंवा कामवाली म्हणजे नोकर किंवा दासी. अमीच्या घरी काम करणारा नोकर त्याला वाटेल तेव्हा अचानक निघून जातो. तिने किती वेळा घरात काम करणारी माणसे बदलली हे कळलेच नाही.

भारतातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला याचा अनुभव आहे. विशेषतः शहरांमध्ये, जिथे जीवन खूप व्यस्त आहे. ज्यामुळे काम करणा-या शिवाय काम होत नाही. ही समस्या फक्त अमी, सुनंदा किंवा ग्रीष्माची नाही. ती प्रत्येक स्त्रीची आहे जिच्याकडे काम करणारी किंवा काम करणारी स्त्री आहे. ज्या दिवशी मोलकरीण किंवा नोकर घरकाम करायला येत नाही, त्या दिवशी त्यांची अवस्था फार वाईट होते. ही एक समस्या आहे जी जवळजवळ प्रत्येकजण आहे. आजच्या काळात सर्वत्र मोलकरणीचा बोलबाला इतका झाला आहे की ती एक दिवस आली नाही किंवा कुठे बाहेर गेली तर तिच्याशिवाय मालकिणीला त्रास होतो.

घरात अज्ञात व्यक्तींचा प्रवेश

घरात मोलकरीण किंवा नोकरदाराचे आगमन म्हणजे घरात अनोळखी व्यक्ती आल्याने तुमची आत्मीयता आणि स्वातंत्र्य कमी होते. तिच्या उपस्थितीत तुम्ही मोकळेपणाने जगू शकत नाही म्हणजे मोलकरीण तुमच्या वेळेनुसार धावणार नाही, तुम्हाला तिच्या वेळेनुसार वेळ ठरवून चालावे लागेल. कारण ते त्यांच्या मर्जीनुसार काम करण्यासाठी ये-जा करण्याची वेळ ठरवतात. म्हणूनच तुम्हाला तुमचा वेळ त्यांच्या कामाच्या वेळेशी जुळवून वेळापत्रक बनवावे लागेल. अचानक कुठे बाहेर जावं लागलं तर त्याच्या भरवशावर घर सोडावं लागेल. कारण ती तिच्या फुरसतीनुसार तुमच्याकडे कामाला येईल. अशा प्रकारे, घरकाम करणार्‍या अनेक लोकांचे अनुभव असे दर्शवतात की मोलकरणीची उपस्थिती ही लाचखोरीसारखी घृणास्पद घटना आहे.

३२ वर्षीय रवीना रिटेल कन्सल्टंट आहे. त्यांना सहा वर्षांची मुलगी आहे. ती पाच वर्षांपासून अमेरिकेत राहिली आहे. ती सांगते की यूएसएमध्ये ती तिच्या पतीसोबत घरातील सर्व कामे करत असे. तिथं सगळं छान चाललं होतं. त्यानंतर ते भारतात आले. इथे आल्यावर त्यांनी घरातील कामात मदत करण्यासाठी एक नोकर म्हणजेच नोकर ठेवला. पण काही दिवसांनी नोकर ठेवून जबाबदारी कमी करण्याऐवजी इतर प्रकारच्या नवीन समस्या निर्माण होत आहेत, असे त्यांना वाटू लागले. त्यात चोवीस तास नोकर असेल तर कोणतीही गुप्तता पाळली जाणार नाही. पती-पत्नी एकत्र काम केल्यास त्यांच्यात जवळीक आणि प्रेम वाढते. रवीना आणि तिच्या पतीमध्ये जे प्रेम होते ते आता राहिले नाही, वरून नोकराची उपस्थिती तणावाचे कारण बनली आहे. दुसरी गृहिणी सांगतात की, दिवसभर नोकरदाराच्या उपस्थितीवरून कॅमेरा आपल्यावर लक्ष ठेवून आहे, असे दिसते. आपण मोकळ्या मनाने काहीही करू शकत नाही. दुसरी गृहिणी सांगते की, आम्हाला टीव्ही पाहण्यातही त्रास होतो. कारण जेव्हा जेव्हा मी टीव्हीवर कार्यक्रम पाहण्याचा विचार करतो तेव्हा मोलकरीण येऊन टीव्हीसमोर बसते किंवा टीव्ही चालू केल्यानंतर येऊन बसते.

अनेक घरांमध्ये लहान मुलं काळजी घेणाऱ्याच्या मत्सराचे कारण बनत आहेत. दिवसभर काळजी घेणाऱ्याच्या सोबत राहिल्यामुळे त्यांच्या मनात पाळणा-यांच्या नात्याचा त्रिकोण तयार होतो. त्यामुळे आई आणि काळजीवाहू यांच्यात मत्सराची भावना निर्माण होते. मोठ्या मुलांना नेहमी दासीची उपस्थिती त्रासलेली दिसते

आळस येऊ शकतो

अनेकदा गृहिणींची तक्रार असते की त्यांना घरच्या कामात कोणी मदत करत नाही. किंबहुना मोलकरीण किंवा नोकर असल्याने घरातील कोणालाच मदतीची गरज वाटत नाही. USA वरून आलेल्या रवीनाच्या अनुभवानुसार, जोपर्यंत घरात नोकर नसत तोपर्यंत सगळे लोंबकळत काम करायचे. घरची माणसं कामाला असायची, त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित पार पडायची. काहीही पाहण्याची किंवा तपासण्याची गरज नव्हती. सेवकाच्या कामाचा दर्जा तितकासा चांगला नसतो म्हणून मनात असंतोष निर्माण होतो आणि मन दुखावतो. नकळत किंवा नकळत काही ना काही तणाव मनात निर्माण होतो.

ज्या घरात दिवसभर नोकर असतो, त्या घरातील महिला आळशी होतात. आपण कशाला काम करायचे, असे त्यांच्या मनात येते, काम करण्यासाठी नोकर ठेवले आहेत. त्यामुळे मानसिकदृष्ट्या ते कोणतेही काम करण्यास तयार नसतात. परिणामी त्यांची शारीरिक वृत्ती कमी होते. त्यामुळे ते अनेक आजारांना बळी पडतात. काही काम नाही, म्हणून तयार होऊन फिरलो. यासोबतच बाहेरील खाण्यापिण्यामुळे त्यांच्यामध्ये लठ्ठपणा येतो. शारीरिक वृत्ती कमी झाल्यामुळे माणसामध्ये स्थूलपणा येतो आणि माणूस आळशी बनतो.

एका तज्ज्ञाच्या मते, घरातील कामे केल्यानेही कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होतात. वजन नियंत्रणात राहते आणि मूडही चांगला राहतो. घरातील कामे केल्याने दर तासाला सुमारे शंभर ते तीनशे कॅलरीज बर्न होतात. सेवकाची सवय असल्याने आपण त्याच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. त्यांची अनुपस्थिती आपल्याला अस्वस्थ करते. ज्यामुळे तणाव आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

मुलांवर परिणाम

घरामध्ये मोलकरणीची दीर्घकाळ उपस्थिती मुलांच्या वाढ आणि प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकते. नोकर कितीही महत्त्वाची असली तरी ती आई-वडिलांचा पर्याय कधीच असू शकत नाही, असे एका व्यावसायिक आईचे म्हणणे आहे. त्यामुळे पालक कितीही व्यस्त असले तरी त्यांनी ठराविक वेळ आपल्या मुलासोबत घालवलाच पाहिजे. एका गृहिणीने तिचा अनुभव सांगितला की, तिचा चार वर्षांचा मुलगा शांत झोपत होता. मध्यरात्री अचानक तो उठला आणि रडायला लागला. चौकशी केली असता असे आढळून आले की, त्याने मुलासाठी जे ठेवले होते, ते ती मुलाला धमकावत असे, मारहाण करत असे. त्यामुळे त्याला स्वतःला असुरक्षित वाटू लागले. दुसर्‍या एका आईने सांगितले की, जेव्हा तिची आया लग्न करून सासरी गेली तेव्हा तिला तिच्या मुलाची खूप काळजी वाटत होती, कारण तिचे मूल आयाने खूप हादरले होते. पण त्याला दिसले की आया गेल्यानंतर त्याचे मूल खूप आनंदी दिसत होते. तो स्वतःची कामे करू लागला. खरं तर, अय्या प्रत्येक वेळी उपस्थित राहिल्यामुळे, तो अर्धांगवायू झाला होता. स्वत:चे काम स्वत: करू लागल्यावर त्याचा आत्मविश्वासही वाढू लागला.

अया रजेवर गेल्यास किंवा काम सोडल्यास मुलांना असुरक्षित वाटते. अशा वेळी त्यांना हाताळावे लागते. वाढलेल्या या समस्येवर मात करण्यासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. आईने अया ऐवजी डे केअर सेंटरला पसंती दिली, कारण अया काम सोडून गेल्यावर तिचे मूल नाराज व्हायचे. डे केअर सेंटर्स थोडी महाग आहेत, पण तिथे अशी समस्या नाही. ज्यामुळे माता त्यांचे काम आत्मविश्वासाने करू शकतात.

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे

वॉशिंग मशिन, डिश वॉशर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन यांसारख्या उपकरणांनी मानवाची गरज लक्षणीयरीत्या कमी केली आहे. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या साहाय्याने काम केल्याने मानवाचा बराच वेळ वाचला आहे. एक गृहिणी तिच्या मुलाला काही काळ डे केअर सेंटरमध्ये सोडते. त्या काळात ती घरातील सर्व कामे पूर्ण करते. ओव्हन, वॉशिंग मशिन, फूड प्रोसेसर इत्यादींमुळे ती तिची सर्व कामे स्वतः करते. त्या गृहिणीला वाटते की त्या वेळेत सर्व कामे शांतपणे करता येतील, वाट पाहण्यात आणि मोलकरणीची देखभाल करण्यात लागणारा वेळ. ती एकटी काम करत असल्याने तिचा नवराही तिला तिच्या कामात मदत करतो. त्यांच्या घरात मोलकरीण नाही, त्यामुळे नवरा तिच्याकडे काम करून घेण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा अनेक महिला आहेत ज्यांना हे आवडते. अशा महिलांना मोलकरणीची वाट पाहावी लागते, मग ती येईल की नाही, हाही प्रश्नच राहतो, त्यांना ते फार अवघड जाते, त्यामुळे सर्व प्रकारची साधने बाजारात उपलब्ध असल्याने मोलकरणीची गरज फारच कमी असते.

घरातील कामे स्वतः केल्याने घरातील प्रत्येक सदस्याच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होते. एकत्र काम केल्याने नाते घट्ट होते आणि घर स्वच्छ व व्यवस्थित राहते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें