* नसीम अन्सारी कोचर

आम्ही कधी असे पाहिले आहे का की कबुत्तर आणि कबुतरीण आपसात भांडत आहेत किंवा हत्ती आपल्या हत्तीणीला जिवानिशी मारतो वा मोर आणि लांडोरशी भांडला वा सिंह आपल्या सिहिणींशी भांडला नाही, तुम्ही हे कधी पाहिले अथवा ऐकले नसेल, कारण निसर्गाच्या या जातीचे काम एकमेकांना प्रेम देणे हे आहे, सोबत राहणे आणि त्या बदल्यात संतती निर्माण करणे. लाखो वर्षांपासून पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी निसर्गाच्या या नियमाचे पालन करत आपले जीवचक्र पूर्ण करत आहे. या पृथ्वीवर केवळ आपण मानवच आहोत जो निसर्गाच्या या नियमाला उध्वस्त करतो, आपल्या माद्यांना मारहाण करत आणि त्यांच्या सगळया जीवनाचे शोषण करत आहोत.

खाजगी संघटना सहज आणि समान मेजर्स २०३० द्वारे महिलांवर केलेले एक सर्वेक्षण भारताच्या आधुनिक आणि विकसित चेहऱ्यावर दिलेली सणसणीत चपराक आहे. वडोदराच्या या २ संस्थांना आपल्या सर्वेक्षणात आढळले की भारतात जवळपास १/३ विवाहित स्त्रियांना पतिच्या हातून मारहाण केली जाते, पण यात बहुतांश स्त्रियांना याबाबत काही तक्रार नाहीए. त्या हे आपले नशीब मानतात.

लज्जास्पद हे आहे की १५-४९ या वयातील महिलांमध्ये २७ टक्के महिला १५ वर्षापासूनच ही घरगुती हिंसा सहन करत आहेत. माहेरी वडील आणि भावाच्या हातून आणि सासरी पतिच्या हातचा मार खात आहेत.

अलीकडेच ‘मीटू’ आंदोलनामुळे शिकल्यासवरलेल्या, उच्च पदावर काम करणाऱ्या आणि आधुनिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांची विवशता, त्रास आणि दुर्दशा यांचं नग्न सत्य समोर ठेवलं आहे, हे पाहता अंदाज येतो की या देशाच्या कमी शिकलेल्या, आर्थिक दृष्ट्या कमजोर, विवश, खेडयापाडयात राहणाऱ्या स्त्रिया पुरुष जातीकडून कशाप्रकारे अपमान, हिंसा, छळ आणि शोषण यांचा सामना करत आहेत.

स्त्रीसोबतच हिंसा का

अखेरीस हिंसेच्या भक्ष्यस्थानी स्त्रीच का असते. तिच का मार खाते. तिचेच का शारीरिक शोषण होते? स्त्रियांना मारहाण करून आपल्या नियंत्रणात ठेवण्याची कसरत शेवटी या धरेवर केव्हा आणि कशी सुरु झाली? माणसाशिवाय आणखी कोणते सजीव आहेत, जे आपल्या माद्यांना मारहाण करतात किंवा त्यांचे शोषण करतात?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...