सोलो ट्रिप रोमांचकारी अनुभव

* प्रतिनिधी

काय म्हणताय, तुम्हालाही फिरायला आवडते, पण कोणाची सोबत नसल्याने तुम्ही फिरायला जात नाही, तर मग आता तयार व्हा जगाची सफर करायला. एकटं असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जगाची सफर करू शकत नाही. खरं सांगायचे तर एकटयाने प्रवास करण्याची मजा इतरांसोबत नसते. अशा प्रवासात मुलाच्या तब्येतीची चिंता नसते किंवा जोडीदाराची काळजी घेण्याची जबाबदारीही नसते. मनमुरादपणे आणि तणावमुक्त राहून सहलीचा आनंद घेता येतो. एकटे फिरण्याचे कितीतरी फायदे आहेत, जे माहिती करून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच एकट्या फिरायला सुरुवात कराल :

स्वत:ला भेटण्याची संधी

तुम्ही घरी असता तेव्हा मुलगी, कार्यालयातील सहकारी आणि मित्रांदरम्यान मैत्रिणीची भूमिका निभावता. पण मग तुमचे स्वत:चे असे काही अस्तित्व नाही का? तुमची स्वत:ची अशी ओळख नाही का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एकट्याच सहलीला जा. स्वत:ला समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. जेव्हा तुम्ही एकटया फिरायला जाता, तेव्हा नेहमीच स्वत:च्या मनाचे ऐकता. तुमच्या मनात जे येते ते करता. तुमच्यावर कोणताही दबाव नसतो. स्वत:ला समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची संधीही मिळते, जी विचारात सकारात्मकता आणते आणि निवांतही वाटते.

आत्मविश्वासाने तुम्ही असाल परिपूर्ण

तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल तर सोलो ट्रिप तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते, कारण प्रवासादरम्यान बरेच नवीन लोक भेटतात, तर कधीकधी काही अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्या स्वत:लाच सोडवाव्या लागतात. एवढेच नव्हे तर, अनेकदा धाडसी निर्णयही स्वत:लाच घ्यावे लागतात, ज्यामुळे तुमच्यातील साहस आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतो.

अनुभवांची शिदोरी

असे म्हटले जाते की अनुभव मिनिटांत बरेच काही शिकवतो, ज्यामुळे जीवनाचा मार्ग सोपा वाटू लागतो. आपल्या अनुभवांमधून शिकण्यासाठी तुम्हाला नवीन अनुभव घ्यावे लागतील, जे घरात बसून शक्य नाही. यासाठी तुम्हाला घराबाहेर पडावे लागेल. जेव्हा तुम्ही कुठेतरी फिरायला जाल, तेव्हाच तुम्हाला जगातील अशा लोकांना भेटता येईल, ज्यांना तुम्ही आजपर्यंत भेटलेला नाही. त्यांच्यासोबत तुम्ही अशा काही अनुभवांचे साक्षीदार व्हाल, जे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही अनुभवले नसतील.

एकटेपणा काय असतो तेच विसराल

प्रवासाला निघताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही एकट्या आहात, पण विश्वास ठेवा, एकदा का तुमचा प्रवास खऱ्या अर्थी सुरू झाला की एकटेपणा काय असतो, हेच तुम्ही विसराल, कारण प्रवासादरम्यान तुम्हाला बरेच असे सहकारी भेटतील जे तुमच्याप्रमाणे एकटे असतील. शक्य आहे की बऱ्याच गोष्टींमध्ये तुमच्या दोघांचा एकटेपणा सारखा असेल. कदाचित असेही होऊ शकते की ते तुमच्यापेक्षा अधिक एकाकी असतील, ज्यांना भेटल्यानंतर तुम्हाला तुमचे एकटेपण हे एकटेपण नसल्यासारखेच वाटू लागेल.

स्वत:लाच आव्हान द्या आणि यश मिळवा

स्वत:लाच आव्हान देणे आणि यशस्वी होणे, हे प्रत्येकाला शक्य नसते. पण सोलो ट्रिप तुम्हाला या दोघांचाही अनुभव देऊ शकेल. तुम्ही हॉटेलमध्ये एकटया कशा राहाल, तुम्हाला उंचीची भीती वाटते, तुम्ही कसे फिरू शकाल यासारख्या गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात, म्हणून स्वत:लाच आव्हान द्या की तुम्ही एकटया राहाल. उंचीच काय तर वादळाचाही सामना कराल. मग पाहा तुमची भीती पळून जाईल.

संकोच नसेल, तुम्ही व्हाल बिनधास्त

जर तुमच्या स्वभावात संकोच असेल, स्वत:साठी आवाज उठवण्याची क्षमता तुमच्यात नसेल, तर तुमच्यासाठी सोलो ट्रिपला जाणे खूप गरजेचे आहे, कारण जेव्हा असे वाटते की आपल्या बाजूने बोलणारे लोक आहेत, तेव्हा तुम्ही अनेकदा जाणूनबुजूनही काही बोलत नाही. पण जेव्हा तुम्ही एकट्या ट्रिपला जाल, तेव्हा तिथे तुमच्या बाजूने बोलणारा, तुमची संकटे कमी करणारा कोणीही नसेल. तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी स्वत:च कराव्या लागतील. यामुळे तुमच्यातील संकोच पूर्णपणे निघून जाईल. विश्वास ठेवा, एकटयाने सफर पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आतून शूर झाल्यासारखे वाटेल.

आनंद, समाधान आणि शांततेशी होईल भेट

दैनंदिन कामकाजापासून खूप दूर जेव्हा तुम्ही सहलीला निघाल तेव्हा नक्कीच तुमची भेट आनंद, समाधान आणि शांततेशी होईल. समजले नाही? चला आम्ही समजावून सांगतो. जेव्हा कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय तुम्ही मनात जे येईल ते कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला आनंद होईल. मनासारखे वागल्यामुळे समाधान मिळेल. केवळ तुमच्या शहरापासूनच नाही तर कार्यालयीन कामापासूनही तुम्हाला काही वेळ का होईना सुटका मिळेल. यामुळे नक्कीच शांतताही मिळेल.

बरेच नवीन मित्र बनतील

गावात, वस्तीत किंवा आपल्या शहरापर्यंतच मैत्री मर्यादित असणे पुरेसे आहे काय? तुम्हाला असे वाटत नाही का की तुमचा मित्र त्या देशाच्या कोपऱ्यात असावा जिथे आजपर्यंत तुम्ही कधीच गेला नाहीत किंवा तुमचा मित्र जगाच्या त्या कोपऱ्यात राहाता जिथे केवळ त्याच्यामुळेच तुम्हीदेखील जाऊ शकाल? तुमच्या या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर सफरीवर जायला निघा. तुम्ही एकटया असल्यामुळे स्वत:हून तेथे भेटणाऱ्या किंवा त्या सहलीला आलेल्या अनोळखी व्यक्तींना स्वत:चे मित्र बनवाल.

भेटू शकतो जीवनसाथी

तुम्ही अविवाहित आणि जीवनसाथीच्या शोधात असाल तर सोलो ट्रिप तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. शक्यता आहे की प्रवासादरम्यान तुमची भेट तुमच्या जीवनसाथीशी होईल. म्हणून अशी संधी हातातून जाऊ देऊ नका. एकटे का होईना, पण चालू लागा सफरीच्या मार्गावर. काय माहीत, परतताना तुम्ही एकटया नसाल.

करू शकता मौजमजा

अनेकदा संकोच वाटत असल्याने तर कधी लोक काय म्हणतील, असा विचार करून तुम्ही उघडपणे मौजमजा करू शकत नाही, अशावेळी तर सोलो ट्रिपला जाऊन तुम्ही या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. स्वाभाविक आहे की तिथे तुम्हाला ओळखणारे कोणीही नसेल. भरपूर मजा करायचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. सेक्सचा आनंद घ्यायचा असल्यास नवीन ठिकाणी तुम्ही एखाद्या पार्टनरसह सेक्सही एन्जॉय करू शकता. हो, पण तुमच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि सुरक्षित सेक्स करा.

सोलो ट्रिप स्वस्तही आणि मस्तही

जेव्हा तुम्ही ग्रुप किंवा जोडीदारासह कुठे फिरायला जाता, तेव्हा तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. पती हा पत्नीचा खर्च मोठया प्रमाणात उचलतो, पण तुम्ही कमावत्या पत्नी असाल तर अर्धा अर्धा खर्च केला जातो. अशावेळी एकटया महिलेने ट्रिपला जाणे खूपच स्वस्तात पडते. यासाठी तुम्हाला जास्त पैसे जमा करण्याची गरज नाही. तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती खर्च झाले आणि किती शिल्लक आहेत, हे तुम्हाला माहीत असल्याने तुम्ही अंथरूण पाहूनच पाय पसरता. तुम्ही बजेटमध्ये राहता आणि स्वत:चे बजेट कसे तयार करावे हेदेखील तुम्हाला समजते.

जेणेकरून मजा आणखी वाढेल

* प्रवास मजेदार करण्यासाठी संगीत ऐका.

* लांबचा प्रवास असल्यास कंटाळा येऊ नये म्हणून लॅपटॉपमध्ये सिनेमा पाहा.

* तुम्हाला पुस्तके वाचायला आवडत असेल तर पुस्तके वाचूनही तुम्ही अर्धा प्रवास सहज पार करू शकाल.

* आपल्यासोबत कॅमेरा नक्की ठेवा, जेणेकरून प्रत्येक सुंदर क्षण तुम्ही कॅमेऱ्यात टिपू शकाल.

* सोबत व्हिडिओ रेकॉर्डर नेऊन तुम्ही व्हिडिओही बनवू शकता.

* आपल्या सफरीत स्टायलिश लुक मिळवण्यासाठी सोबत हॅट आणि गॉगल न्यायला विसरू नका.

* जिथे जाल तेथून स्वत:साठी आठवणीत राहील अशी वस्तू नक्की आणा.

* जिथे जाल तिथले लोकल फूड नक्की खा.

* स्वत:सोबत कमीत कमी सामान न्या.

सुरक्षेचे नियम

* एकटयाने ट्रिपला जाण्यासाठी खिशात पैसे असणे जितके गरजेचे असते, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गरजेचे असते ते तुमच्यात आत्मविश्वास असणे. विसरू नका, आत्मविश्वास निशस्त्राकडील शस्त्र आहे. लोकांशी पूर्ण आत्मविश्वासाने बोला.

* स्वत:सोबत मौल्यवान गोष्टी घेऊन जाण्याची चूक करू नका. सोबत जे काही घेऊन जाल त्यावर लक्ष ठेवा.

* आजूबाजूला काय सुरू आहे, तुमच्यावर कोणी नजर ठेवून तर नाही ना, यावर लक्ष ठेवा.

* तुम्ही एकट्या आहात, एकाकीपणा जाणवत असेल तरी तो इतरांना दाखवून देऊ नका.

* तुम्ही कुठे थांबला आहात, कोणासोबत आहात, येथून कुठे जाणार आहात इत्यादी माहिती कोणाशीही शेअर करू नका.

* सर्वांपासून वेगळे राहण्याची चूक करू नका. लोकांशी गप्पा मारा, पण मर्यादा सांभाळून.

* सोशल मिडियाद्वारे आप्तांच्या संपर्कात राहा, कारण एखादे संकट आल्यास तुम्ही त्यांची मदत घेऊ शकाल.

* कोणावरही पटकन विश्वास ठेवण्याची चूक तुम्हाला संकटात टाकू शकते.

* पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड इत्यादी महत्त्वपूर्ण दस्तऐवजाची झेरॉक्स स्वत:सोबत नक्की ठेवा.

* साधे, सौम्य, सभ्य कपडे घाला. खूप जास्त तोकडे कपडे घालू नका.

* रात्री फिरायला जाणे टाळा. शक्यतो सकाळीच फिरून घ्या.

* जिथे जाणार आहात तेथील स्थानिक भाषेतील काही शब्द शिकून घ्या. जसे थँक्स, सॉरी, हेल्प इत्यादी.

* निश्चित आणि सुरक्षित सहलीला जाण्यापूर्वी ट्रॅव्हल इन्शुरन्स नक्की काढा.

सणांवर धर्माचा ताबा

* जगदीश पवार

हिंदूंचा सण, मुसलमानांचा सण, ख्रिस्तींचा सण आणि शिखांचा सण. हे सण धर्मात विभागले गेलेत. प्रत्येक धर्माचा सण वेगळा आहे. एका धर्माला मानणारे दुसऱ्याच्या सणाला महत्व देत नाहीत. धर्मांची तर गोष्टच वेगळी. एकाच धर्मात एवढे विभाजन आहे की एका धर्माचे असूनही ते सर्व उत्सव एकत्र साजरे करत नाहीत. एकाच धर्मात विविध धर्म आणि जातीचे छोटे-मोठे उत्सवही विभागले गेले आहेत.

हिंदूंचे सण मुसलमान, ख्रिस्तीय नव्हे तर खालच्या जातीचे समजले जाणारे हिंदूही साजरे करणे टाळतात. मुसलमानांमध्ये शिया वेगळे, सुन्नी वेगळे. ख्रिस्तींमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या दोघांचे संगीत वेगळे. प्रत्येक धर्मात भेदभाव, उच्चनीचता आहे. श्रेष्ठता आणि लहान-मोठयांची भावना आहे. हेच आपल्या सणांच्या विभाजनाचे वास्तव आहे. अर्थात सणांवर धर्माने पूर्णत: ताबा मिळवला आहे.

होळी-दिवाळीसारख्या सणांवर धर्माने असा काही ताबा मिळवलाय की सणांचे मूळ स्वरूपच बदलले आहे. सणांवर धर्मातील ढोंगी कर्मकांडे, दिखाऊपणा, तिरस्कार, भेदभाव आणि हिंसेचा प्रभाव पाहायला मिळतोय. धर्माने उत्सवांमध्ये कडवटपणा आणला आहे. वेगवेगळया समुदायात विभागलेल्या समाजात कटकारस्थाने करण्याची स्पर्धा सुरू झालीय. सणांचा गोडवा धर्माच्या वर्चस्वामुळे आंबट झालाय.

सणांवरील धर्माच्या ताब्यामुळे सामाजिक सलोखा, ऐक्य आणि सुसंवादाची दरी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढली आहे. ऐक्य, समन्वय आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या सणांमध्ये माणसाची विभागणी झाली आहे. या विभागणीमुळेच आता सण हे सामाजिक एकजुटीचे पर्व म्हणून सिद्ध होऊ शकत नाहीत. सणांचे शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय महत्व विसरून सर्वतोपरी धार्मिक, सांस्कृतिक बाबींचाच विचार केला जातो.

धार्मिक पात्रांना सणांशी जोडून कथा तयार केल्या आहेत. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला पांडवांचा जुगार खेळणे आणि राम लंका जिंकून आल्यावर आनंद साजरा करण्याच्या नावावरही कथा प्रचलित आहेत. अशाच प्रकारे होळीचा सण प्रल्हाद आणि होलिकेशी जोडला आहे.

धनत्रयोदशी, गोवर्धन पूजा, कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दुगार्पूजा, छटपूजा हे सर्व धर्माशी जोडले आहेत. रक्षाबंधनाचा कोणत्याही देवी-देवतांशी संबंध नाही, तरीही पुजाऱ्यांनी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त सांगण्याचा सर्वाधिकार आपल्याकडे सुरक्षित ठेवला, कारण लोक त्यांच्याकडे पवित्र मुहूर्त विचारायला यायला हवेत आणि सोबतच फळे, फुलं, मिठाई, वस्त्र आणि दानदक्षिणेची रोकड आणायला त्यांनी विसरू नये. दिवाळीत जुगार खेळणे ही प्रथा झालीय. धर्मग्रंथांचा दाखला देत सांगण्यात आले आहे की दिवाळीच्या रात्री कौरव, पांडव जुगार खेळले होते.

सण आता धर्माच्या व्यापाऱ्यांची अस्त्रे बनले आहेत. साहजिकच सणांच्या माध्यमातून द्वेष, भेदभाव अधिक दृढ केला जात आहे.

धर्माच्या नावावर पोट भरणाऱ्यांनी सणांवर कर्मकांडांची अशी काही पट्टी बांधली आहे की शुभ वेळ, मुहूर्त, विधी जाणून घेतल्याशिवाय लोक उत्सव साजरे करत  नाहीत. सणात पूजा, होमहवन करायलाच हवे असे मनावर ठसवण्यात आले, जेणेकरून पुजाऱ्यांची गरज भासेल आणि दानदक्षिणेच्या नावावर त्यांची दुकानदारी सुरू राहील.

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या नावाखाली पुजाऱ्यांची मजा असते. लक्ष्मी अर्थात धनसंपत्तीच्या आगमनासाठी ते पूजा, मंत्रजाप करायला लावतात. मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे, पूजेचा मुहूर्त, विधी करणे अनिवार्य आहे. यासाठी लोकांना पुजाऱ्याकडे जावेच लागते.

दिवाळी म्हणजे एकमेकांना भेटण्याचा, एकतेचा प्रमुख सण. हा सामुहिक उत्सव   आहे. तो वैयक्तिक नव्हे तर सामुहिक रुपात साजरा केला जातो. प्रत्येक सणाच्या आनंदात अंधविश्वासाचा अंधार पेरण्यात आला आहे. सणांमध्ये जुगार खेळणे, नशा करणे, ध्वनी व वायू प्रदूषणआणि धार्मिक, जातीय तेढ  निर्माण होणे हे धर्माच्या घुसखोरीमुळे  होते. धर्मच या सर्वांना प्रोत्साहन देतो.

धनाचे आगमन आणि समृद्धीच्या आशेने साजरा करण्यात येणाऱ्या दिवाळीच्या उत्सवाचे महत्व धनाशी संबंधित नाही, तर समाजातील एकता, प्रेम, सामंजस्य, ऐक्याशी याचा संबंध आहे.

समाजाला विभागणारा धर्म

धर्माच्या उत्सवांवरील ताब्यामुळे समाज विभागला गेला आहे. दिवाळी वैश्य, विजयादशमी क्षत्रिय, रक्षाबंधन ब्राह्मण आणि होळी शूद्रांमध्ये विभागण्यात आली आहे.

सणांना संकुचित धार्मिक श्रद्धेच्या मयार्दांमध्ये गुंडाळून संपूर्ण समाजाच्या एकतेत धर्म, जात, वर्ग यांचे अडथळे तयार करण्यात आले आहेत. यामुळे एकाच धर्माचे सर्व लोक तो सण साजरा करतील हे गरजेचे नाही. प्रेम, बंधुभाव कमी होत असून याचा दुष्परिणाम सणांच्या सोहळयावर झाला आहे.

सणांमागील प्रथेवर सर्वच जण विश्वास ठेवतील हे गरजेचे नाही. एखाद्याचा या प्रथा, परंपरेवर विश्वास नसेल तर निश्चितच मतभेद होतात. लंकेवर विजय मिळवल्यानंतर राम अयोध्येत परतल्याच्या आनंदाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते तर कुठे रावणाचे पूजकही आहेत, जे रामाला आपला आदर्श मानत नाहीत.

सणांमागील प्रथा-परंपरा धर्माशी जोडल्या गेल्याने समाजाच्या सर्व वर्गातील लोकांना एकत्र, एकमेकांशी जोडले गेल्यासारखे वाटत नाही. धर्माला प्रेम, शांतता, करुणेचे प्रतिक मानले असले तरी  प्रत्यक्षात धर्माने सामाजिक भेदभाव, शत्रूत्व, तिरस्कार, हिंसा वाढीस लावली.

सण जीवनात सुखद परिवर्तन घेऊन येतात. हर्षोल्हास व नाविन्याशी मेळ साधतात. म्हणूनच दिवाळीत कुटुंबासह स्वादिष्ट पक्वान्न आणि प्रकाशाच्या आनंदासह मित्र, नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांना अधिक ऊर्जादायी बनवा.

उत्सव सामूहिक हवेत. धर्म समाजाला विभागतो. त्यामुळेच उत्सवांवर धर्माने ताबा घेताच सामूहिक एकता लोप पावते. सर्व वर्गातील लोकांसह मिळून सण साजरे केल्याने सामाजिक एकता वृद्धिंगत होते.

सर्वांनी मिळून आनंद साजरा करावा, हीच सण साजरे करण्यामागची भावना आहे. मित्र, आप्त, शुभचिंतकांना भेटून प्रेम, आपुलकीच्या आनंदाचा अनुभव घेत उत्साही होण्याची उत्सव ही संधी आहे. तो चिंता, तणाव विसरायला लावून मनाला चैतन्य, आनंद, नव्या ऊर्जेची अनुभूती देतो.

जीवनात बदल करून आनंदी होण्याचे, शारीरिक आणि मानसिक आनंद मिळवण्यासाठी आपुलकीने आप्तांसोबत काही क्षण घालवण्याचे सण हे माध्यम आहे. सणांमुळे जीवनात येणारा उत्साह माणसाच्या जीवनात कायम राहतो. जीवनाला गती मिळते. जगण्यात सकारात्मकता येते. सणांचा हा सुगंध आयुष्यभर दरवळत राहतो.

उत्सव, पर्वांना माणुसकीतील ऐक्याचे प्रतीक मानले जाते. धर्माच्या संकुचित बंधनात बांधून भेदभावाची भिंत उभारण्याचे ते माध्यम नाही. सणांचा जन्म आपापसातील प्रेम, सुसंवाद, एकता, ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठीच झाला होता. मात्र, धर्माच्या घुसखोरांनी सणांमधील सामुहिक एकता तोडण्याचे काम केले. सामाजिक, कौटुंबिक विभाजन का होत आहे, धर्मात द्वेष का पसरत आहे, सण सुसंवाद वाढीस लावण्यासाठी मदत का करत नाहीत, याचा आपण विचार करायला नको का?

अंध:कार दूर करणे हाच सणांचा उद्देश हवा. घर, कुटुंब, समाजात प्रेम, सद्भावना नसेल तर तो कसला उत्सव?

रांगोळीचे बदलते स्वरूप

* वीरेंद्र ज्योति

हल्लीच्या धावपळीच्या युगात रांगोळी काढण्याच्या पद्धतीमध्येही झपाट्याने बदल होत आहे. रांगोळी जमिनीवर किंवा कपड्यावर काढली जाते. पण आजकाल कागद, प्लायवूड, हार्ड बोर्ड, सनमायका, कॅनव्हासवर पण रांगोळी काढली जाते. पूर्वी सणांच्या आधीच स्त्रिया रांगोळी काढण्याची तयारी करत असत. पण आता तर सणावाराला कागद, प्लॉस्टिक पेपर व प्रिंटेड रांगोळ्यांची ही सपाटून विक्री होते. ज्यांना रांगोळी काढता येत नाही किंवा त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही ते रांगोळीचे स्टिकर चिकटवून वातावरण निर्मिती करतात.

अद्भूत कला

पाटण्यातील रांगोळी स्टिकरचे घाऊक व्यापारी विनीता सेल्सचे उपेंद्र सिंह सांगतात की दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने जवळपास ३ करोड रुपयांचे रांगोळीचे स्टिकर बिहारझारखंड, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश इ. राज्यांमध्ये विकले जातात. किरकोळ बाजारात एक स्टिकर साइजनुसार २० ते २५० रुपयांपर्यंत विकतात.

साधारणत: रांगोळी काढण्यासाठी फूल, रंग, अबीर, तांदूळ, गोंद इ. वापर केला जातो. दिसायला कुठलाच डामडौल नसणाऱ्या या कलेचे स्वत:चे असे एक आकर्षण, सौंदर्य व ओळख आहे. यात भारतीय कलेची मूलभूत विचारशैली अंतर्भूत आहे.

नवा रंग नवी उमेद

पाटण्यातील गुरूदेव पेंटिंग क्लासेसच्या कलाकार अनुपम सांगतात की आपल्या देशात कुठलीही कला फक्त कला नसते. त्या कलेमागे काहीतरी विचार, उद्दिष्ट असतेच. प्रत्येक सणात कलेचा खुबीने वापर करून वातावरण रंगीत व उत्साही बनवले जाते.

रांगोळी काढण्यासाठी बहुतांशी कमळ, सूर्यफूल, शंख, दिवे, सूर्य, पक्षी, मासा इ. चित्र काढली जातात. रांगोळी गोल आकारात काढली जाते. हाताची बोटे, बांबूची काडी, कपडा यांच्या सहाय्यानेही रांगोळी काढली जाते. रांगोळी काढताना पांढऱ्या रंगाचा जास्त वापर केला जातो. कारण पांढऱ्या रंगाला शांततेचं प्रतिक मानलं जातं आणि जिथे शांतता असेल तिथेच प्रगती होते. भारतातील प्राचिन कला परंपरांमध्ये रांगोळीचा समावेश होतो आणि भारतीय कलेमध्ये रांगोळीला ६४वी कला मानले जाते.

रांगोळीचे वैशिष्ट्य

दक्षिण भारतात रांगोळीची पंरपरा फार जुनी आहे. रांगोळीचे सौंदर्य आणि तिचा मोह आजच्या धावपळीच्या जीवनातही आहे. लोक एखादवेळी रांगोळी काढू शकत नसतील पण बाजारात मिळणारे रांगोळीचे स्टिकर चिकटवून आपल्या कलेशी बांधिलकी मात्र जपतात.

ओरिसातील प्रसिद्ध कलाकार अनिल कुमार बल म्हणतात की बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये तऱ्हेतऱ्हेचे नमूने प्रसिद्ध आहेत. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात ‘धुली चित्रा’ नावाची रांगोळी तांदळाच्या द्रावणाने काढली जाते. मध्य प्रदेशात पावसाळा संपल्यानंतर घरांच्या दरवाज्यावर फूलापानांनी रांगोळी काढली जाते. राजस्थानातील रांगोळीचे महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे तिथे भडक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

वेगवेगळी नावे व रूपे

केरळमध्ये ओणम सणाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या रांगोळीत फुलांचा वापर केला जातो. जमिनीवर रांगोळी काढून रेखाटून रिकाम्या जागांमध्ये गुलाब, झेंडू, सूर्यफूल, चमेली इ. फुलांच्या पाकळ्या कौशल्याने भरल्या जातात. प्रत्येक राज्यात रांगोळीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. बिहारमध्ये अरिपन, उत्तर प्रदेशात चौक पूरना असं म्हटलं जातं. राजस्थानात मांडना नावाने रांगोळी ओळखली जाते. बंगालमध्ये अल्पना नावाने ओळखली जाते. कर्नाटकात रंगवल्ली तर तामिळनाडूत कोल्लम नावानेही रांगोळी ओळखली जाते.

आला मोसम रोमांस करण्याचा

– नसीम अंसारी कोचर  

थंडीचा मोसम रोमान्सचा मोसम असतो. या मोसमात कामुकता आणि उत्तेजनेचा स्तर वाढतो. बाहेरील तापमान घटताच अंतर्गत तापमान वाढते आणि आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची इच्छा तीव्र होते.

गुलाबी थंडीत प्रत्येक युगुल एकमेकांच्या बाहुपाशातील ऊबेची अपेक्षा करतो. सेक्स करणे एक वेगळीच जाणीव आहे. प्रत्येक प्रियकर-प्रेयसीचा प्रेमाचा एक वेगळा अंदाज असतो. काही लोकांना आपल्या बेडरूममध्ये जास्त आनंद मिळतो, तर काही लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात. काही हिल स्टेशनवर हिमवर्षावात प्रेमाचा आनंद घेतात, तर काही गरम पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये.

थंडीच्या काळात प्रेमी-प्रेमिकांमध्येच रंगेलपण वाढत नाही, तर या मोसमात निसर्गातील अन्य जीवही आपल्या जोडीदारासोबत सहवासाची इच्छा बाळगतात. एक्सपर्टही थंडीच्या मोसमाला सेक्ससाठी खूप उपयुक्त मानतात. या काळात सेक्स केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळण्याबरोबरच शारीरिक सौंदर्यही वाढते. तसेही या मोसमात पुरुष खूप मूडमध्ये असतात. थंड हवेतून परतल्यानंतर सेक्स करणे काही वाईट गोष्ट नाहीए. खरंच सांगतो, बाहेरील थंड हवेशी लढून घरात आल्यानंतर पुरुषांची सेक्सची इच्छा वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत पुरुष खूप रोमँटिक दिसतात. अशा वेळी आपणही या थंडीच्या मोसमाला स्मरणीय बनवण्यासाठी स्वत:मध्ये आणि आपल्या बेडरूममध्ये थोडासा चेंज आणण्याचा प्रयत्न करा व मग पाहा आपल्या नखऱ्यांनी आपला जोडीदार कसा फिदा होतो. थंडीच्या दिवसांत सेक्सला मजेदार बनवण्यासाठी काही खास टिप्स आम्ही आपल्याला देत आहोत :

कोमट पाण्यात बाथचा आनंद घ्या

अंथरुणावर जाण्यापूर्वी बाथ टबमध्ये कोमट पाण्यात यूडिकोलोन, चंदन किंवा मग गुलाबपाण्याचे काही थेंब टाकून जोडीदारासोबत स्नानाचा आनंद घ्या. वाटल्यास आपण बाथरूमला सुगंधित कॅन्डल्सनी सजवा. असं केल्याने आपल्या जोडीदाराची एक्साइटमेंट आणि उत्साह वाढेल. प्रेमाची ही नवीन पध्दत आपल्या संबंधांमध्ये ऊर्जा निर्माण करेल. गरम पाण्याने स्नान केल्यास शरीर ताजेतवाने होईल आणि रक्तप्रवाह वाढल्याने उत्तेजनाही वाढेल.

फरचा मऊपणा देईल गरमी

आपली जुनीपुराणी नाईटी सोडून या थंडीच्या मोसमात मऊ-ऊबदार फरवाली नाईटी किंवा गाऊन घाला. थंडीच्या मोसमात मऊ फरची ऊब केवळ आपली सेक्सची इच्छाच वाढवणार नाही, तर याचा स्पर्शही आपल्या पार्टनरला चांगल्याप्रकारे उत्तेजित करेल. आजकाल तर मऊ फरवाले ब्लँकेटही बाजारात उपलब्ध आहेत. थंडीच्या मोसमात जोडीदारासोबत फरवाल्या ब्लँकेटमध्ये रोमान्सची मजा द्विगुणित होईल.

कँप फायरचा आनंद घ्या

थंडीच्या मोसमात लोक तसं पाहिलं तर हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी हिल स्टेशनला जातात. अशा वेळी कँप फायरचा आनंद घेतला नाही, तर थंडीचा आनंद अर्धवट राहील. शेकोटी पेटवून आपल्या जोडीदारासोबत बसून शेक घेण्याची मजाच काही निराळी असते.

परफ्यूम करतो मदमस्त

थंडीच्या दिवसांत परफ्यूम आपले रोमान्सचे मार्ग सोपे बनवतो. गरमीत येणारी घामाची दुर्गंधी या दिवसांत गायब होते. अशा वेळी परफ्यूम आपला पूर्ण परफॉर्मन्स देतो आणि आपल्या जोडीदाराला सेक्ससाठी उत्तेजित करतो.

मंद प्रकाशाचा आनंद

एक्स्पर्ट मानतात की सेक्सच्या काळात खोलीतील मंद प्रकाश प्रेमी जोडप्याला उत्तेजित करतो. जर थंड रात्रींमध्ये आपल्या बेडरूममध्ये मंद प्रकाश पसरला असेल किंवा चारही बाजूला सुगंधित मेणबत्या झगमगत असतील, तर आपला प्रियकर प्रेमाने लिप्त होत आपल्याला बाहुपाशात ओढण्यास अधीर होईल.

मोजे घाला

एका रिसर्चनुसार, जर आपण मोजे घालून सेक्स करत असाल, तर आपण हे उत्तमप्रकारे एन्जॉय करू शकता. खरं तर मोजे घातल्याने आपले पाय गरम होतात. पायांत रक्तप्रवाह वाढल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढते. शरीरात गरमी आल्याने आपला सेक्स मूड अजून उत्तम होतो आणि आपल्याला जास्त उत्तेजना जाणवते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सेक्सचा आनंद घेण्यासाठी मऊ, रंगीत आणि गरम मोजे खरेदी करायला विसरू नका.

दारूपासून दूर राहा

काही लोकांचे म्हणणे आहे की, थंडीच्या मोसमात दारू प्यायल्याने शरीरात ऊब निर्माण होते आणि त्यामुळे सेक्स ड्राइव्ह चांगले होते. परंतु डॉक्टरांच्या मते, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. दारू प्यायल्याने तंत्रिकातंत्रावर परिणाम होतो आणि त्यामुळे ब्रेनमध्ये झोपेचा संदेश प्रवाहित होतो. अशा वेळी सेक्ससाठीची उत्तेजना गायब होते आणि शरीर झोपण्यासाठी तयार होते. दारूची दुर्गंधी आपल्या जोडीदाराचा मूड खराब करते. त्यामुळे सहवासाच्या काळात दारूचे सेवन करू नका.

डान्स आणि एक्सरसाइजची मजा घ्या

थंड मोसमात जोडीदारासोबत मोकळेपणाने डान्स किंवा एक्सरसाइज करणे, आपल्या सेक्स लाइफला उत्तम बनवेल. घराच्या टेरेस किंवा बेडरुमध्ये मंद म्युझिकवर एकमेकांच्या बाहुपाशात विसावून डान्स करणे दोघांनाही रोमान्सच्या सागरात डुबकी मारायला लावेल. जर आपण दोघांनीही सकाळच्या वेळी सोबत व्यायाम किंवा जॉगिंग केलात, तर त्यामुळे आपलं सेक्स लाइफ इंप्रूव्ह होईल.

निसर्गाच्या सान्निध्यात राहा

आजकाल फ्लॅट सिस्टिमच्या घरात बागेचा अनुभव खूप खटकतो. जुन्या बंगल्यांत सुंदर फुलांची बाग जरूर असे. जिथे एखाद्या झाडाच्या आडोशाला प्रियतमच्या बाहुपाशात विसावणे खूप रोमांचक अनुभव देत असे. परंतु आपण काळजी करू नका. घराच्या जवळच एखादा शांत-एकांत पार्कचा कोपरा शोधा आणि फुरसतीच्या काळात आपल्या जोडीदारासोबत तिथे बसून थंडी एन्जॉय करा.

थंडीत सेक्सचे फायदे

गरमीच्या दिवसांत सेक्स करणे एक कंटाळवाणी प्रक्रिया होऊ शकते. परंतु थंडीच्या दिवसांत असं होत नाही. थंडीच्या दिवसांत तर केवळ एकमेकांच्या मिठीत राहण्याची इच्छा होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की थंडीचा मोसम जिथे या पृथ्वीवरील प्रत्येक जिवाला रोमांचित आणि रोमँटिक बनवतो, तिथेच मानवजातीला अनेक फायदेही होतात.

सौंदर्य वाढते

थंडीच्या काळात सेक्स करणे तणावपूर्ण नसते. शरीरात रक्ताभिसरण वाढल्याने संपूर्ण शरीराला पुरेसे ऑक्सिजन प्राप्त होते. त्यामुळे डॅमेज झालेल्या कोशिकांचीही दुरुस्ती वेगाने होते. सेक्सच्या काळात शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोनचा स्त्राव पाझरतो, त्याला प्रेमाचा हार्मोनही म्हणतात. हे हार्मोन व्यक्तिमध्ये प्रेम आणि स्नेहाची भावना वाढवतो.

तणाव दूर होतो

रोजच्या कामकाजाच्या काळात निर्माण झालेला तणाव व थकवा सेक्सच्या काळात संपून जातो. गरमीमध्ये ही क्रिया तेवढी प्रभावीपणे होत नाही, परंतु थंडीत सेक्स केल्यास तणाव लगेचच छूमंतर होतो. तणाव अनेक आजारांचे मूळ आहे. मलावरोध, थकवा, अंगदु:खी, ब्लडप्रेशर, डायबिटससारखे आजार तणावातून निर्माण होतात. थंडीच्या काळात नियमित सेक्स केल्यास आपण या आजारापासून दूर राहता. डॉक्टरांच्या मतानुसार, सेक्स माणसाच्या तंत्रिकातंत्र आणि श्वसनतंत्राला आराम देतो, ज्यामुळे तणाव दूर होतो आणि आजार होत नाहीत.

गर्भधारणेची शक्यता वाढते

थंडीच्या दिवसांत महिलांची गर्भवती होण्याची शक्यता गरमीच्या तुलनेत वाढते. खरं तर याला जबाबदार पुरुष आहेत. शरीराचे तापमान कमी झाल्याने त्यांच्यामध्ये शुक्राणूंच्या संख्येत वाढ होते. थंडीच्या काळात शुक्राणू जास्त निरोगी आणि तीव्र गतीवाले असतात. त्यांच्या संख्ययेतही वृध्दी आढळून येते. त्यामुळे थंडीच्या काळात नियमित सेक्सने गर्भधारणा करणे सोपे होते.

गृहिणी दुर्लक्षित का?

* मोनिका अग्रवाल

गृहिणी असणं ही एक शिक्षा आहे का? सर्वांनाच ठाऊक आहे की बदलत्या काळानुसार गृहिणीची भूमिकासुद्धा आता बदलली आहे. परंतु तिच्या जबाबदाऱ्या कमी न होता अधिक वाढल्या आहेत. तसं बघता या आधुनिक काळात घरातील प्रत्येक कामासाठी मशिन उपलब्ध आहेत, परंतु या मशिन स्वयंचलित आहेत का? आजही गृहिणीची धावपळ सुरूच आहे ना?

जबाबदाऱ्या तर पूर्वीही होत्या, परंतु आवाका मर्यादित होता. परंतु आज आवाका अमर्यादित आहे. आज स्त्रिया घरापासून बाहेरच्या जबाबदाऱ्यांसह मुलांच्या अभ्यासापासून सर्वांचं भवितव्य घडवण्यात आणि भविष्यातील बचत योजना तयार करण्यात व्यस्त असतात आणि तेसुद्धा संपूर्ण एकाग्रतेने.

गृहिणीची धावपळ भल्या पहाटेपासून सुरू होते. मग भले ती शहरी असो वा ग्रामीण. रात्री सर्वांनंतर ती विश्रांतीचा विचार करते. रोज पती, मुलं आणि घरातील अन्य सभासदांची देखभाल करण्यात ती इतकी व्यस्त असते की स्वत:ला कायम दुय्यम दर्जावरच ठेवते. ती इतरांच्या अटी, इच्छा आणि आनंदासाठी जगण्याची इतकी अधीन होते की जर एखाद्या कामात काही कमतरता राहून गेली तरी अपराधभावाने ग्रसित होते. परंतु त्यानंतरही तिच्या वाट्याला आप्तस्वकीयांचे टोमणे येतात. तिच्या कामाचं श्रेय आणि सन्मान तिच्या वाट्याला येत नाही.

सन्मानाची अपेक्षा

गृहिणी एक अशी सपोर्ट सिस्टीम आहे, जी प्रत्येकाला जगण्याची उर्जा देते. याचा अर्थ नोकरदार महिला कमी आहे असं नव्हे. स्त्री भले ती घरात काम करत असो वा बाहेर, ती काम करतेच ना. परंतु इथे आपण त्या स्त्री, त्या गृहिणीबद्दल बोलत आहोत, जिला समाजाच्या दृष्टीने महत्व नाही. तिला एकही सुट्टी नसते, तिला पगार मिळत नाही. खरं सांगायचं तर कोणत्याही गृहिणीला पगार अपेक्षित नसतो. परंतु ती आपल्या माणसांची ज्याप्रकारे सेवा करते, त्यांची काळजी घेते, त्या मोबदल्यात सन्मानाची अपेक्षा नक्कीच बाळगते आणि तो तिचा मानवीय अधिकारही आहे.

एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार ४० टक्के ग्रामीण आणि ६५ टक्के शहरी स्त्रिया, ज्यांचं वय १५ वर्षं वा त्याहून अधिक आहे, पूर्णपणे घरगुती कार्यात व्यस्त असतात. त्याहून आश्चर्याची बाब ही की आकडेवारीनुसार ६० वर्षांहून अधिक वयाच्या एकचतुर्थांश स्त्रिया अशा आहेत, ज्यांचा सर्वाधिक वेळ या वयातही घरगुती कामं करण्यात जातो.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप अहवालानुसार केवळ भारतातच स्त्रिया दिवसभरातील ३५० मिनिटं बिनपगारी कार्य करण्यात घालवतात. याचा अर्थ या कामासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा मिळत नाही, याउलट पश्चिमी देशांमध्ये घरच्या जबाबदाऱ्या केवळ स्त्रियांच्या वाट्याला येत नाहीत.
नैराश्याला बळी

याच कारणामुळे तेथील स्त्रियांच्या गृहिणीच्या रूपालाही श्रम आणि आर्थिक भागिदारीच्या पक्षामुळे महत्व दिलं जातं. आपल्या येथील राहणीमान आणि सामाजिक रचना अशाप्रकारची आहे की घरी राहाणाऱ्या स्त्रियांच्या वाट्याला कमी सुविधा येतात. सर्वात महत्वाची बाब ही आहे की आपल्या येथे घरगुती कार्याची पूर्ण जबाबदारी स्त्रियांवर असते. पुरुषांचं योगदान नावापुरतंच असतं. आपल्या येथे घरच्या कामात पुरुषांचा सहभाग दररोज अवघा काही मिनिटं आहे. जसं की एखादा कलाकार एखादी कलाकृती रेखाटण्यासाठी कॅनव्हासची मदत घेतो, त्याचप्रमाणे घरच्या सभासदांच्या जीवनात रंग भरण्याची भूमिका गृहिणी निभावतात. भले कॅनव्हासप्रमाणे ते ठोस स्वरूपात दिसत नाही. कदाचित म्हणूनच हे रूप प्रत्येक ठिकाणी आणि कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित ठेवण्याचाच प्रयत्न केला जातो. किती सहजतेने तिला सुनावण्यात येतं की तू दिवसभर घरात बसून करतेस काय?

हे सर्व ऐकावं लागल्यामुळे ती सर्वांसोबत असूनही एकाकीपणा अनुभवते आणि नैराश्य व तणावाला बळी पडते. अपराधभावाशी संबंधित या तिच्या जाणीवा बहुतेक प्रकरणात मुलांचं पालनपोषण वा कुटुंबाच्या देखभालीशी जोडलेल्या असतात. तरीदेखील तिच्या कामाचं मुल्यांकन योग्य पद्धतीने केलं जात नाही.

प्रश्न तोच आहे

ती २४ तासांची आणि आयुष्यभराची अशी नोकर आहे, जी मोफत सेवा प्रदान करते आणि जिची नकेल पतीच्या हातात असते. पती हवा तसा तिचा वापर करतो. भले मग तो शारीरिक असो वा मानसिक स्वरूपात वा अन्य रूपात. हरतऱ्हेने तिच्या भावभावनांशी खेळलं जातं. एकाचवेळी तिचा वापर दासी आणि वेठबिगर मजूरासारखा केला जातो. ती आपल्या पतीची आणि मुलांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी नाईलाजाने राबते. अगदी ती प्रेमापोटी काम करते आणि प्रेम करणं हेसुद्धा आता तिचं एक काम बनलं आहे.

आता प्रश्न तोच आहे की गृहिणीचा आवाज धोरणनिर्मात्यांपर्यंत कसा पोहोचणार? एका गृहिणीने कोणत्या दिशेने पाऊल उचलायचं? कशाप्रकारे आंदोलन करायचं? अशा कोणत्याही आंदोलनाला राजकीय दिशा मिळणं जरूरी आहे. अनेक एनजीओ व स्वयंसेवी संस्था संपूर्ण देशात कार्यरत आहेत, ज्या गृहिणींना आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी सल्ला देण्यासाठी कार्यालयं उघडून बसल्या आहेत. परंतु जोपर्यत कुटुंबात स्त्रीपुरूष समानतेचं समीकरण बदलणार नाही, पितृसत्ताकपद्धती व वर्गीय शोषण आपण मुळापासून उपटून फेकून देणार नाही, तोवर आपण पेन किलरसारखे तात्कालिक उपाय गृहिणीला सुचवत राहाणार.

आता दुसरा प्रश्न हा आहे की गृहिणींचा शत्रू कोण आहे? तिचा पतीच पितृसत्तेचं प्रतिक आहे का? पितृसत्ता कायम राखण्यासाठी राज्यव्यवस्था, भांडवलशाही, साम्राज्यवादाची भूमिका काय राहिली आहे. या राज्यव्यवस्थेशी समझोता करून त्याचाच भाग बनून व याच सूत्राकडून आर्थिक मदत घेऊन गृहिणींचं जीवन सुसह्य बनू शकेल का? पोलीस, जज, मंत्री वगैरे याच शोषणकारी व्यवस्थेचे भाग नाहीत का? विचार करण्यासारखी बाब ही आहे की ज्या स्त्रिया घरात संपूर्ण दिवस मुलांसाठी आणि पतीसाठी राब राब राबतात, इतरही बरीच कामं करतात, त्यांना गैरकमाऊ श्रेणीत ठेवणं योग्य आहे का? याउलट आजच्या गृहिणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं योगदान देत आहेत.

२१वं शतक हे केवळ युनेस्कोने नव्हे तर भारत सरकार, सर्व बुद्धिजींवींनी ‘स्त्रियांचं शतक’ असल्याचं मान्य केलं आहे.

श्रमाचं मोल नाही

गृहिणी जे कार्य करते, त्यातून तिला फायदा मिळाला पाहिजे. तिला श्वास घेण्याचं स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य अर्थात पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. ती केवळ मुलाला जन्म देणारं वा त्याचा सांभाळ करणारं यंत्र वा रोबोट नाही. सर्वप्रथम ती माणूस आहे.

कुटुंब सदस्यांना भावनिक आधार देणं, देखभाल करणं, मैत्रीभाव जपणं, अहंकार बाजूला ठेवणं, इतरांचे आदेश मानणं, जखमांवर मलमपट्टी करणं, लैंगिक सुख देणं, घर आवरणं, जबाबदारीची जाणीव तसंच त्याग, महत्त्वकांक्षी नसणं, दुसऱ्यांसाठी आत्मत्याग करणं, सर्व गोष्टी सहन करणं आणि मदत करणं, माघार घेणं, सक्रिय राहून प्रत्येक संकटावर उपाय शोधणं, एका सैनिकाप्रमाणे सहनशक्ती आणि शिस्त बाळगणं हे सर्व कंगोरे मिळून गृहिणीची कार्यक्षमता बनवतात. या अर्थाने गृहिणीच्या श्रमांचं मोल नाही हे तितकंच खरं आहे.

नैतिकतेची आवश्यकता

असं नाहीए की आजची गृहिणी जागरूक नाही, याउलट स्त्रीमुक्ति आंदोलनामुळे गृहिणी जागृत झाल्या आहेत, कायदे बदलले आहेत. भारतीय स्त्री मग भले ती गृहिणी असतो वा नोकरदार स्त्री असो, आपल्या विकासाच्या टप्प्यांदरम्यान जिथे ती अनेक सामाजिक धार्मिक रूढीपरंपरा, कुप्रथा, क्रुर चालीरिती आणि अंधश्रद्धेच्या जंजाळातून मुक्त झाली आहे, तिथे दुसरीकडे तिच्यासमोर नवीन काळातील नवीन आव्हानं उभी ठाकली आहेत, जी पारंपरिक कुप्रथांहून अधिक घातक सिद्ध होत आहेत. जसं की नवीन रूपात स्त्री देह व्यापार, कन्या भ्रुणहत्या, लैगिंक शोषण, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचर, कुपोषण, हिंसाअपराध, हत्या, विस्थापित होणं, स्त्रियांचं बाजारीकरण, कौटुंबिक कलह यांसारखे अनेक भयानक प्रश्न स्त्रीसमोर उभे राहिले आहेत. सोबतच अनेक जुनाट बुरसटलेल्या परंपरा, रूढी, कुप्रथासुद्धा आजवर कायम आहेत, ज्या गृहिणी सक्षमीकरणात मोठा अडथळा आहेत. या कुप्रथांना खुद्द गृहिणीच कारणीभूत आहेत. अनेक गृहिणी अशा आहेत ज्या बदलत्या काळानुसार स्वत:मध्ये बदल घडवू इच्छित नाहीत आणि परिणामी वादाचे प्रसंग निर्माण होतात. अधिकार कसा जपावा हे तर गृहिणीला चांगल्याप्रकारे माहीत असते. परंतु स्त्रीपुरुष समन्वय नेमका कसा करावा किंवा कसा घडवून आणला जाईल हे मात्र अजूनही कोडे आहे. आजारावर उपचार केले गेले, परंतु थेरपीची पद्धत योग्य दिशेने नसेल तर आजार बळावणारच.

हे तर ‘जनगणमन अधिनायक जय हो’सारखं झालं, जिथे जन म्हणजे लोकांबद्दल बोललं गेलं, गण म्हणजे गृहिणींना सभेमध्ये आणलं गेलं, परंतु ‘मन’ मात्र दुर्लक्षित राहिलं. याउलट आपल्या सर्वांना ठाऊक आहे की महिला (गृहिणी) ‘मना’शी निगडित आहेत. गृहिणी आजही आपल्या वर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिकार करण्यास धजावत नाहीत. शारीरिक असो वा मानसिक ती आजही बलात्काराला घाबरते. पूर्वीपेक्षा ती अधिक निर्भीड बनली आहे हे खरं आणि आजही ती गर्दीला घाबरत नाही पण त्या गर्दीतून कधी कोण एकांताचा गैरफायदा घेत तिचं शारीरिक शोषण करेल याची भीती तिला सतावते. बलात्काऱ्यांपासून सुरक्षा करण्यासाठी/लढण्यासाठी दिल्या जाणाऱ्या स्प्रे वा जेलची आज गरज नाही, आवश्यकता आहे ती नैतिकतेची. मानसिक उभारीची कमतरता आहे हे मात्र नक्की.

परिवर्तन खूप जरूरी

पितृसत्ताक व्यवस्था बळकट करणं हा यामागे हेतू नाही, गृहिणींचा विश्वास समानतेवर आहे. समाजातील कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये. प्रत्येकाचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून महत्त्व आहे. प्रत्येकाने समान नागरिक असलं पाहिजे. अजून परिवर्तनाचा दिर्घ संघर्ष बाकी आहे. एका नव्या प्रगत दिशेने प्रवाहमान होण्याचा प्रयत्न आहे.

एकीकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रंम्प यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडत असताना दुसरीकडे अमेरिकेतील समस्त महिला वर्गाने मिरवणूक काढून आपल्या राजकारणातील समभागाची जाणीव यानिमित्ताने करून दिली होती. परिणामी ट्रंम्प असं कोणंतही पाऊल उचलत नाहीत, जे महिलांविरोधात असेल.

कोचिंग बाजार नाव मोठं लक्षण खोटं

* बीरेंद्र बरियार ज्योती

बिहारमध्ये सरकारी शाळा आणि कॉलेजांमध्ये शिक्षणाची जी दुरावस्था सुरू आहे, त्यामुळे कोचिंग क्लासेसची अमरवेल खूपच फुलत चालली आहे.

खरंतर कोचिंगच्या फुलण्यामागे सरकारी शिक्षणाला एका षड्यंत्राअंतर्गत पांगळं बनवून ठेवणं आहे. पाटणा विश्व विद्यालयाचे निवृत्त प्रोफेसर जगन्नाथ प्रसाद सांगतात की, जर सरकारी शाळाकॉलेजांत चांगलं शिक्षण दिलं गेलं तर कोचिंग इन्स्टिट्यूट्स वाढलेच नसते. सरकारी शाळाकॉलेजांतील शिक्षक मोठा पगार मिळवूनसुद्धा शिक्षणाच्या बाबतीत निष्काळजीपणा करत असतात आणि तेच शिक्षक खाजगी कोचिंग संस्थांमध्ये जाऊन पूर्ण लक्ष देऊन शिकवतात. अनेक सरकारी शिक्षक तर आपल्या घरातच कोचिंग सेंटर चालवतात आणि चांगली कमाई करतात. सरकारी शिक्षक जितकं मन लावून मुलांना कोचिंग सेंटर्समध्ये शिकवतात, त्यातील ५० टक्के जरी त्यांनी सरकारी शाळा, कॉलेजांत शिकवलं तर मुलांना वेगळ्या कोचिंगची गरजच पडणार नाही.

राज्यात सरकार दरवर्षी शिक्षणावर अब्जावधी रूपये खर्च करते, त्यानंतरही मुलांना उत्तम शिक्षणासाठी कोचिंग सेंटर्सवर राहावं लागतं. बिहारमध्ये २०१५-१६ साली शिक्षणावर जवळ जवळ २२ हजार कोटी रूपये खर्च केले गेले. त्याशिवाय केंद्र शासनही शिक्षणाच्या नावावर वेगळे पैसे देतं. प्राथमिक शिक्षणासाठी ११ हजार कोटी, माध्यमिक शिक्षणासाठी ६ हजार कोटी, विद्यापीठ शिक्षणासाठी ५ हजार कोटी आणि प्रौढ शिक्षणासाठी २५५ कोटी रुपये खर्च केले गेले. इतकी मोठी रक्कम खर्च करुनही राज्यात ज्या वेगाने शिक्षणाची दुरावस्था वाढत चालली आहे. त्यापेक्षाही कितीतरी पटीने शिक्षणाची खाजगी बाजारपेठ फुलत चालली आहे.

स्वप्नं दाखवून लुबाडणूक

सरकारचं मत आहे की राज्यात जवळ जवळ १५०० कोटीपेक्षाही जास्त कोचिंगचा व्यवसाय आहे आणि जवळ जवळ एक लक्ष लोक याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. कोचिंग उद्योग रेल्वेच्या गँगमनपासून आयएएस अधिकारी बनवण्यापर्यंतची स्वप्नं विद्यार्थ्यांना दाखवतं. यूपीएससी, स्टेट पीएससी, एसएससी, रेल्वे, बँकिंग, मॅनेजमेण्ट, क्लार्क इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याबरोबरच कम्प्युटर कोर्स आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या नावावरही कोचिंग संचालक पैशांमध्ये लोळत आहेत. रेल्वे, बँकिंग, कर्मचारी चयन आयोग इत्यादी परीक्षांची तयारी करणारे जवळजवळ तीन लाख, मेडिकल आणि इंजिनीयरिंगची तयारी करणारी २ लाख आणि प्रशासनिक व मॅनेजमेंट परीक्षांची तयारी करणारे जवळ जवळ ७५ लाख विद्यार्थी दर वर्षी कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या भरवशावर परीक्षा पास करण्याचं स्वप्नं पाहातात, जे बिहारच्या कोचिंग संस्थांच्या नेटवर्कला प्रत्येक वर्षी आणखीन मजबूत बनवतात.

विचारण्याची मुभा नाही

कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांचं वाढतं प्रमाण पाहाता कोटा आणि दिल्लीच्या अनेक संस्थांनीदेखील पाटण्यात आपले सेंटर उघडले आहेत. इंजिनीअरिंग, मेडिकलच्या कोचिंगसाठी ६० हजार ते १ लाख रुपये, मॅनेजमेंट संस्थांमध्ये दाखल्याची तयारी करण्याच्या ऐवजात २५ ते ५० हजार रुपये, बँकिंग स्पर्धांसाठी मार्गदर्शन देण्यासाठी १० ते ३० हजार रुपये, यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीच्या नावावर २० ते ४० हजार रुपये, हायस्कूल आणि इंटरमीडिएटच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास करवण्याच्या टिप्स देण्यासाठी १० ते १५ हजार रुपये कोचिंगची फी वसूल केली जात आहे.

इतकी मोठी रक्कम वसूल केल्यानंतरही अनेक कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा नाही. शिक्षकांनी जे काही शिकवलं ते विद्यार्थ्यांना समजलं आहे की नाही, याच्याशी कोचिंग संचालकांना काहीच घेणंदेणं नसतं. वर्गात प्रश्न विचारणाऱ्यांना दमदाटी करून बसवलं जातं.

आयआयटीची तयारी करणारा विद्यार्थी मयंक वर्मा सांगतो की त्याने एका प्रसिद्ध कोचिंग सेंटरमध्ये एका प्रसिद्ध शिक्षकामुळे दाखला घेतला होता. पण संपूर्ण कोर्स संपला तरी ते कधीच क्लास घ्यायला आले नाही. बारावी आणि ग्रॅज्युएशनमध्ये शिकणाऱ्या मुलांकडूनच त्यांना शिकवलं गेलं, ही अवस्था आहे कोचिंग सेंटर्सची. या कोचिंग सेंटर्ससाठी ‘नाव मोठं आणि लक्षण खोटं’ ही म्हण अगदी फिट बसते.

शासकीय योजना निष्फळ

अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालकदेखील कोचिंग सेंटर्सना यशाचं माध्यम समजतात. आता तर ही अवस्था आहे की आठवीपासूनच मुलांना कोचिंग सेंटरमध्ये दाखल केलं जातं. निवृत्त जिल्हा शिक्षण पदाधिकारी उपेंद्र प्रसाद सांगतात की, हे सत्य आहे की शिक्षणाच्या नावावर बनवलेल्या अनेक योजना फाइलींमधून बाहेरच येत नाहीत ज्यामुळे शेकडो शिक्षण माफिया शिक्षकांच्या वेशात विद्यार्थ्यांना फक्त लुटतच नाहीत, तर त्यांच्या करिअरशीही खेळत आहेत. जर कोचिंग आणि खाजगी शिकवणींमुळेच मुलाचं भविष्य उजळू शकत असेल, तर सरकारी शाळाकॉलेजांवर दरवर्षी अब्जावधी रुपये खर्च करण्याची काय गरज आहे?

बिहारमध्ये ६००० लहानमोठे कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, ज्यांचं वार्षिक टनओवर १,५०० हजार कोटी रुपयांचं आहे. जवळजवळ ९० हजार लोक कोचिंगच्या व्यवसायाशी जोडलेले आहेत. रेल्वे, बँकिंग, कर्मचारी निवड आयोग इत्यादी परीक्षांचे जवळपास ३ लाख विद्यार्थी आहेत. मेडिकलच्या तयारीसाठी दरवर्षी दीड लाखाहून जास्त आणि इंजिनीअरिंगच्या तयारीसाठी दर वर्षी १ लाख विद्यार्थी प्रयत्न करत असतात. प्रशासकीय आणि मॅनेजमेंट परीक्षांची तयारी करणारेही इतर अनेक विद्यार्थी आहेत. याने एक गोष्ट स्पष्ट होते की पाटण्याच्या कोचिंग संस्थांचं नेटवर्क आणि त्यांची मिळकत किती मोठी आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोचिंग संस्थांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विद्यार्थ्यांकडे जो रोष उत्पन्न द्ब्राला होता, तो कुठूनही चुकीचा नव्हता. हा रोष अचानक काही अचानक उत्पन्न झाला नव्हता, तर अनेक वर्षांपासून उसळत होता. कोचिंगच्या विद्यार्थ्यांनी पाटण्यातील जवळजवळ ६० कोचिंग संस्थांवर हल्ला करून तोडफोड केली आणि अनेक ठिकाणी आग लावली. कोचिंग संस्थेच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल पडताळणी केला असता त्यांची मनमानी आणि हुकूमशाही वागणुकीच्या अनेक गोष्ट समोर आल्या. कोर्स पूर्ण करण्याच्या ऐवजात कोचिंग संस्थांकडून इंजिनीअरिंग आणि मेडिकलची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून कोर्सनुसार ६० हजार ते दीड लाख रूपये वसूल केले जातात. जितकं मोठं ब्रॅण्ड असतं, फीही तितकीच मोठी असते.

अंकुश घालणं गरजेचं

कोचिंग संस्थांमध्ये साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक टेस्ट घेतल्या जातात. एखाद्या टेस्टमध्ये विद्यार्थी नापास झाला तर त्यांच्यावर जास्त लक्ष देण्याऐवजी त्यांना घरातच अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.

मेडिकलची तयारी करणारी विद्यार्थिनी सोनालीचे पिता गोविंद यादव सांगतात की, जर मुलांनी घरातच अभ्यास केला तर त्याला कोचिंगमध्ये पाठवण्याची गरजच काय आहे? मुलांना खास प्रशिक्षण मिळावं म्हणून पालक त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये दाखल करतात आणि असे हजारो लाखो रूपये खर्च करूनही जर कोचिंगवाले असं म्हणत असतील की घरातच अभ्यास करा, तर मग कोचिंगचा फायदाच काय आहे?

सुपर-३० चे संचालक आनंद कुमार सांगतात की हे सत्य आहे की काही शिक्षण माफिया शिक्षकांच्या वेशात विद्यार्थ्यांना फक्त लुबाडतच नाहीएत, तर त्यांच्या करिअरशी खेळ करत आहेत. अशा लुटारू संस्थांचा विरोध करूनच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला जाऊ शकतो.

खरंतर कोचिंग संस्थांवर सरकार आणि कायद्याचं कसलंच अंकुश नाहीए. आता जेव्हा यावर गोंधळ माजला आहे तेव्हा मुख्यमंत्री नीतीशकुमारने कोचिंग संस्थांसाठी नवीन धोरण बनवण्याची घोषणा केली आहे. बिहार येथील मानव संसाधन विकास विभागाचे प्रधान सचिव अंजनी कुमार सिंह सांगतात की, सरकारच्या कोचिंग संस्था चालवल्या जाण्याबाबत कसलीच हरकत नाही, पण निरर्थक पैसे घेऊन मुलांना ठकवणाऱ्या संस्थांवर अंकुश घालणं फार गरजेचं आहे.

विद्यार्थ्यांची नाराजी चुकीची नाही

मिर्जा गालिब कॉलेजाचे उपमुख्याध्यापक प्रोफेसर अरूण कुमार प्रसाद सांगतात की कोचिंग संस्था मुलांना रंगीत स्वप्नं दाखवून दाखल तर करून घेतात, पण त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी विसरून जातात. प्रतिस्पर्धात्मक परीक्षा डोक्यावर आल्या तरी पाठ्यक्रम अर्धाही संपलेला नसतो. अशात मुलं नाराज होणं स्वाभाविक आहे. हे कुठूनही योग्य नाही की खास शिक्षणाच्या नावावर मोठी फी घेऊन एका बॅचमध्ये ५०० ते १००० मुलांना शिकवलं जावं. कोचिंगची अवस्था तर सरकारी शाळाकॉलेजांपेक्षाही वाईट झाली आहे. जर मुलं शाळाकॉलेजांमध्येच नीट शिकली तर त्यांना खाजगी कोचिंग संस्थांमध्ये दाखला घेण्याची गरजच भासणार नाही.

इथे दुसरे व्यवसायही चालतात

पाटण्यात कोचिंगच्या व्यवसायाबरोबरच इतरही अनेक व्यवसाय चालतात. कोचिंग संस्थांच्या आजूबाजूला मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह, मेस, पुस्तकांची दुकानं, सलून आणि डबेवाल्यांचा धंदा चांगलाच चालत आहे. पाटणा येथील महेंदू्र, मुसल्लपूर, हाट, खजांची रोड, मखानियां कुआं, नया टोला, मिखना पहाडी, कंकडबाग, चित्रगुप्त नगर, डॉक्टर्स कॉलनी, राजेंद्र नगर इत्यादी परिसरांतील गल्लोगल्लीत कोचिंग सेंटर्स आणि अनेक हॉस्टेल्स आहेत. संपूर्ण शहरात ३०००पेक्षाही जास्त लहानमोठे हॉस्टेल आहेत, ज्यांचा कोट्यवधी रुपयांचा धंदा चालतो.

हॉस्टेलमध्ये दमट आणि खुराड्यांसारख्या लहानलहान खोल्या असतात, जिथे मुलांना २-३ खाटा टाकून दिल्या जातात. अभ्यासासाठी त्यांना खुर्चीटेबलही दिले जात नाहीत. मोकळ्या हवेसाठी चांगल्या खिडक्याही नसतात. बाथरूम आणि टॉयलेटचीही नित्य स्वच्छता केली जात नाही. अरुंद पायऱ्या, भिंती आणि छतावरील निघालेलं प्लास्टर, रंगरंगोटीचं तर नावनिशाणही नसतं. पाण्याची टाकीही स्वच्छ केली जात नाही. कित्येक हॉस्टेलमध्ये तर गार्डही नसतात. राज्य सरकारकडूनही हॉस्टेलच्या रजिस्टे्रशन इत्यादीचा कसलाच नियम नाहीए.

असुरक्षित वातवरण

गर्ल्स हॉस्टेलची अवस्था बघितली तर तिथलं बाहेरील वातावरण फारच गूढ वाटतं. मोडक्यातोडक्या जुन्या घरांच्या खोल्यांमध्ये लाकडी किंवा प्लायवुडचं पार्टीशन करून त्यांना लहान लहान खोल्यांचं रूप दिलं गेलं आहे. दमट खोल्यांमध्ये चांगला प्रकाशही नसतो, की पाणी वा स्वच्छतेची सोयही नसते. खाण्यापिण्याची व्यवस्थाही फारच खराब आहे. खजांची रोड येथे एका मुलीच्या वसतिगृहामध्ये राहाणारी प्रिया सांगते की, ८ बाय ८ फुटाच्या?खोलीमध्ये ३ खाटा ठेवलेल्या असतात आणि खिडकीचं तर तिथे नावनिशाणही नसतं. जेवणासाठी महिन्याचे २ हजार रुपये घेतले जातात आणि नित्कृष्ट दर्जाचा भात आणि पाण्यासारखी डाळ दिली जाते. भाजीच्या रसात बटाटा किंवा फ्लॉवर शोधूनही सापडत नाहीत.

हॉस्टेलच्या संरक्षणाच्या नावावर चारी बाजूने खिडक्या बंद केल्या जातात. कंपाउंड भलं मोठं आणि उंच केलं जातं आणि एक मोठा लोखंडी गेट लावला जातो. मखानिया कुआं येथे वसतिगृहात राहून मेडिकलची तयारी करणारी पूर्णिया येथील रश्मी सिन्हा सांगते की सकाळसंध्याकाळ मुलींची हजेरी लावली जात नाही. मुली, त्यांचे पालक आणि हॉस्टेलच्या संचालकांमध्ये पारदर्शकपणा नसल्यामुळे हॉस्टेलला कायम संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. अनेक गर्ल्स हॉस्टेलचे संचालक पुरुष असतात, जे मुलींसोबत बऱ्याचदा निर्लज्जपणे वागणूक करतात.

पाटणा येथील सिटी एसपी चंदन कुशवाहा सांगतात की गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डन स्त्रियाच असायला हव्यात. स्थानिक पोलीस स्टेशनचे नंबर हॉस्टेलांमध्ये चिकटवायला पाहिजेत. गर्ल्स हॉस्टेलच्या सततच्या तक्रारी मिळाल्याने आता वेळोवेळी महिला पोलिसांकडून हॉस्टेलच्या पाहणीची सूचना प्रत्येक पोलीस स्थानकाला दिली गेली आहे.

पाटणा येथील श्रीकृष्णापुरी मोहल्ल्यातील मुस्कान गर्ल्स हॉस्टेलची इंचार्ज श्वेता सांगते की त्यांच्या हॉस्टेलमध्ये मेडिकल आणि इंजिनीअरिंगचा अभ्यास करणाऱ्या मुलीच जास्त राहातात. त्यांचा दावा आहे की त्यांच्या हॉस्टेलमध्ये मुलींचं संरक्षण, मेडिकल आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. जर एखाद्या हॉस्टेलच्या वातावरणामुळे मुली आणि पालक संतुष्ट नसतील तर त्यांचा व्यवसाय चालणारच नाही. कोणत्याही बदनामीचा कलंक लागल्यावर हॉस्टेल चालवणं शक्य नाही.

हॉस्टेलमध्ये राहून मेडिकलची तयारी करणारी सुरभी जैन सांगते की तिच्या हॉस्टेलचा बंदोबस्त अगदी व्यवस्थित आहे. संध्याकाळी  ८ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हॉस्टेलमध्ये यायचंच असतं नाहीतर वॉर्डन पालकांना याची सूचना देते.

ढाबा, चहा आणि गाकर

कोचिंग सेंटर आणि हॉस्टेलांच्या आजूबाजूला लहानमोठे ढाबे, चहाबिस्किटांची दुकानं, समोसे भजींची दुकानं, पाणीपुरी आणि चाट मसाल्यांच्या हातगाड्या, फळं आणि ज्यूसची बरीच दुकानं उघडली आहेत. घाण आणि उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांच्या आरोग्याला अपाय करत आहेत. कुटुंबापासून दूर राहून कोचिंग संस्थांमध्ये शिकून उत्तम भविष्य घडवण्यासाठी जीवापाड कष्ट करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं जेवणही मिळत नाही. अनेक विद्यार्थी गल्लीचौकांमध्ये बनलेल्या ढाब्यांमध्ये जेवायला मजबूर आहेत, ज्यामुळे ते आजारी पडतात.

पाटण्यातील कंकडबाग मोहल्ल्यात राहून आयआयटीची तयारी करणारा शेखपुरा जिल्ह्यातील मयंक वर्मा सांगतो की कोचिंग सेंटरमधून शिकून घरी परत आल्यावर जेवण बनवण्याची हिम्मत होत नाही. तो पाटण्यात ४ मित्रांसोबत एका भाड्याच्या खोलीत राहातो. तो सांगतो की ढाब्यात एकावेळी जेवायला कमीत कमी ४० रुपये द्यावे लागतात, ज्यात एक प्लेट भात, डाळ, एक भाजी आणि कांदा मिळतो. कधी कधी तो अंडाकरी खातो, ज्यासाठी त्याला ३० रुपये वेगळे द्यावे लागतात. कोचिंग सेंटर्स आणि हॉस्टेलच्या आजूबाजूला मेस आणि ढाबे चालवून त्यांचे मालक स्वत:मालामाल होत आहेत, पण विद्यार्थ्यांना ते शारीरिक आणि मानसिकरीत्या अशक्त करत आहेत.

संरक्षण करणारे बंदूकधारी

कोचिंगच्या व्यवसायात मोठी कमाई आणि वाढत्या प्रतिस्पर्धेमुळे अनेक कोचिंग संचालकांनी आपल्या चारी बाजूला संरक्षणाची एक मजबूत भिंत तयार केली आहे. खाजगी सिक्योरिटी गार्ड्सने घेरलेल्या कोचिंग संचालकांना विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची कसलीच काळजी नसते. पाटणा विश्वविद्यालयाचे एक प्रोफेसर सांगतात की कोचिंग सेंटर चालवणाऱ्यांना सर्वात जास्त धोका विद्यार्थ्यांचाच असतो. ९५ टक्के कोचिंग सेंटर्समध्ये वेळीच अभ्यासक्रम पूर्ण केला जात नाही, पण फी मात्र आधीच वसूल केली जाते. अशात विद्यार्थ्यांचा रोष होणं स्वाभाविक आहे. दोन वर्षांपूर्वी पाटण्याच्या भिखना पहाडी मोहल्ल्यात जेव्हा विद्यार्थ्यांनी गोंधळ माजवला तेव्हा एका कोचिंग संचालकाच्या संरक्षक गार्डने मुलांच्या गर्दीवर गोळी द्ब्राडली होती ज्यामुळे ५-६ दिवस खूप गदारोळ माजला आणि सगळा अभ्यास ठप्प पडला. शिवाय त्या मोहल्ल्यातील लोकांनाही वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागलं होतं.

विद्यार्थीदेखील पालकांना फसवतात

शिक्षणतज्ज्ञ प्रियव्रत कुमार सांगतात की जी मुलं शिक्षणात कमजोर असतात त्यांनाही त्यांचे आईवडील जबरदस्ती मेडिकल किंवा इंजिनीयरिंगच्या कोचिंगला पाठवतात. तर इतर अनेक मुलं उगाच आपल्या मित्रांना पाहून कोचिंग संस्थांमध्ये दाखला घेतात. कोचिंगच्या निमित्ताने मुलामुलींना घरातून बाहेर पडण्याचं जणू लायसन्स मिळतं.

न शिकणारी मुलं आपल्या आईवडिलांना कोचिंगची दुप्पट फी सांगतात, जसं की जर एखाद्या कोचिंगची फी ५० हजार असेल तर मुलगा आपल्या आईवडिलांना त्याचे ७०-८० हजार रुपये सांगतो. अशाप्रकारे तो ५० हजार कोचिंगचे जमा करतो आणि उरलेल्या पैशांनी मज्जा करतो. पुस्तकं आणि वह्यांच्या निमित्तानेदेखील मुलं आईवडिलांकडून पैसे लुबाडत असतात.

त्यामुळे पालकांनाही त्यांच्या मुलांच्या हालचालींवर नजर ठेवायला पाहिजे आणि अधूनमधून कोचिंग सेंटर्समध्ये जाऊन त्यांच्या अभ्यासाची माहिती घेतली पाहिजे.

नववधूसाठी किचन टीप्स

* शशि बाला

लग्नानंतर प्रत्येक मुलीला एकच काळजी असते ती म्हणजे जेवण बनवताना अशी काही गडबड व्हायला नको ज्यामुळे सासरकडील मंडळी नाराज होतील.

या टीप्स तुमची काळजी दूर करण्यासाठी खूपच उपयोगी पडतील :

* दही पातळ झाले असेल तर त्यात पाण्याऐवजी दूध मिसळावे.

* तव्यावर हलकेच भाजून मग कसुरी मेथीचा वापर करावा.

* घरी पनीर बनवले असल्यास उरलेले पाणी मठरी, भटूरे, नान यांचे पीठ  मळण्यासाठी वापरावे.

* कोफ्ते बनवताना सुकं आलुबुखारा फळ किंवा चिंच घालून रोल करावा.

* लोणच्याचा मसाला चाळणीने चाळून घ्यावा. मसाल्यात चवीनुसार मीठ घालून हिरव्या मिरचीत भरून जेवणासोबत वाढावे.

* ज्या तव्यावर डोसा बनवायचा असेल त्यावर रात्रीच तेल लावून ठेवावं. डोसा चिकटणार नाही.

* पराठ्याच्या प्रत्येक बाजूवर तूप लावून कोरडं पीठ भुरभुरावं.

* खीर जास्त पातळ झाली असेल तर थोडी कस्टर्ड पावडर मिसळावी.

* तंदूरी रोट्या उरल्या असतील तर तव्यावर तूप लावून भाजून घ्या. पराठ्यांसारख्या लागतील.

* राजमा, चवळीच्या शेंगा, काळे चणे, छोले हे जर एक वाटी बनवत असाल तर त्यात १ वाटी टोमॅटो प्यूरी घाला, ग्रेव्ही छान बनेल.

* भाजीत जर कच्चे पनीर घालणार असाल तर हळद घातलेल्या पाण्यात भिजवून वापरावेत.

* राजमा उकडून पाणी गाळून घ्यावे. मसाले परतून राजमा घालून ५ मिनिटं परतावे. मसाला चांगला मुरेल. मग उरलेले पाणी घालून शिजवावे.

* पुलावसाठी मीठ टाकून तांदूळ शिजवावेत. भाज्या फ्राय करून घ्या. मिक्स करा. पुलाव मोकळा होईल.

* पीठ मळण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर पीठ भिजून ठेवावे. १५ मिनिटांनंतर तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन मळून घ्यावे. २ मिनिटांत पीठ तयार होईल.

* बटाटे वडा, कोबी, पनीरचे भजी बनवताना बेसन पीठात चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा. यामुळे भजी कुरकुरीत होतील.

* बटाटे उकडून फ्रिजमध्ये ठेवावेत. मनासारखे आकार कापून सोनेरी रंगावर तळून घ्या. आंबटगोड चटणीसोबत वाढावे.

* पोहे पाण्यात भिजवावेत. दूध उकळल्यानंतर त्यात पोहे, साखर व सुकेमेवे घालावेत. झटपट खीर तयार होईल.

* गोड चटणीत कृत्रिम रंग न टाकता थोडी बेडगी मिरची घालावी.

* डिंकाची पावडर बनवून घ्या. पीठ भाजून झाले की त्यात डिंक घालून मिसळून घ्या. डिंक रव्यासारखा फुलून येईल. वाटलेली साखर मिसळून लाडू वळून घ्या.

* गुळाचा काही पदार्थ बनवणार असाल तर आधी थोड्या पाण्यात मिसळून गरम करावा. त्यात काही कचरा असेल तर तो तळात बसेल. मग गाळून घेऊन वापरावा.

* कपड्यांवर जर तेल वगैरे सांडलं तर पटकन् त्यावर पीठ, मैदा, टाल्कम पावडर वगैरे टाकावी. काही वेळाने ब्रशने स्वच्छ करून साबणाने धुवून घ्यावे.

* गॅस शेगडीवर तेलाचा चिकटपणा साचला असेल तर त्यावर खाण्याचा सोडा पसरावा व चोळून स्वच्छ करून घ्यावा.

* स्वयंपाक घरातील काम आटोपले की ओल्या हातांवर पीठ किंवा बेसनपीठ रगडावे. सर्व मळ निघून जाईल.

* गोड चटणी बनवली की त्यात चिमूटभर मीठ टाकावे. चटपटीत चटणी बनवली की अर्धा चमचा साखर घालावी.

काही सत्य विवाहासंबंधी

* निधि निगम

व्हॉट्सअपवर या विवाहविषयक विनोदाची खूपच चर्चा झाली, ‘‘जे लोक घाईघाईत कुठलाही विचार न करता विवाह करण्याचा निर्णय घेतात, ते आपल्या आयुष्याचा सर्वनाश करून घेतात. पण जे लोक खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन विवाह करतात ते काय करून घेतात?’’

खरं आहे, गमतीगमतीमध्ये या विनोदाने विवाहसंबंधीचे सत्य उघड केले आहे. विवाह एक जुगारच तर आहे. तुमची निवड योग्य असेल तरी किंवा नसेल तरी. त्यामुळे विवाहाच्या बेडीत अडकण्याचा विचार करत असाल, ७ वचने देणार असाल तर जरा या गोष्टींकडेही लक्ष द्या. ज्या विवाहानंतर होणाऱ्या बदलांसंबंधी आहेत आणि तुमचे आईवडिल, मित्रमंडळी, शुभचिंतक कोणीच याबद्दल तुम्हाला सांगणार नाहीत आणि जरी विवाहाच्या लाडूची चव तुम्ही चाखून मोकळे झाला असाल असेल तरीही हे वाचा म्हणजे तुमच्या नात्यात काय चुकीचं आहे. दोघांमधील कोण चुकतं म्हणून सतत वादविवाद होतात याप्रकारचे विचार करणे तुम्ही बंद कराल.

शांत व्हा, हे सर्व स्वाभाविक आहे.विवाहानंतरची अपरिहार्य व आदर्श पायरी आहे ही :

विवाह प्रत्येक समस्येचे समाधान नाही

भारतीय समाजात विवाहाबद्दल असे काही समज पसरवलेले आहेत की आपला विश्वासच बसतो की विवाह हा प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय आहे. विवाहानंतर सर्व काही आपोआप व्यवस्थित होईल. मग फार विचार करण्याची गरजच नाही. नववधू असणारी मुलगी ही खात्री बाळगून असते की विवाहानंतर तिचे आयुष्य स्वर्ग बनणार आहे. चांदीसारखे दिवस व सोन्यासारख्या रात्री असतील. तिच्या स्वप्नातील राजकुमार तिला राणीसारखी वागणूक देईल. नि:संशय काही प्रमाणात असे होतेसुद्धा. आयुष्य आनंदी होते, बदलते. पण विवाह म्हणजे अशी अपेक्षा बाळगू नका की तुमच्या जीवनातील प्रत्येक कमतरता यामुळे भरून निघेल, कारण विवाहानंतर तुम्हाला फक्त एक पती मिळतो, अल्लाऊद्दीनचा दिवा नाही.

शरीर दोन प्राण एक

हे बोलणे, ऐकणे, सांगणे, गुणगुणणे खूपच रोमॅन्टीक, सुंदर आणि खरे वाटते. पण वास्तविक एक यशस्वी विवाह तो असतो जिथे दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्व आपलं नातं जीवंत व यशस्वी बनवण्यासाठी एकत्रित, सातत्याने समान तऱ्हेने प्रयत्न करत असतात. एकमेकांच्या अवतीभवती घुटमळत राहाणं आणि विवाहानंतर आपलं आयुष्य हे म्हणत घालवणे की ‘तेरे नाम पे शुरू तेरे नाम पर खत्म’ हा एक कंटाळवाणा व जुनाट प्रकार आहे, वैवाहिक जीवन जगण्याचा.

कायम आकर्षक भासणार नाही जोडीदार

विवाहानंतर एक वेळ अशी पण येते, जेव्हा तुम्ही मानसिक, भावनिक दृष्ट्या एकमेकांशी जोडलेले असाल, एकमेकांप्रति प्रामाणिक असाल, पण असे होऊ शकते की इतके असूनही तुम्हा दोघांमध्ये शारीरिक आकर्षणच उरणार नाही. म्हणजे आधी जो पति तुम्हाला हृतिक रोशनसारखा डॅशिंग वाटायचा, ज्याच्या शरीरावरून तुमची नजर हटत नसे, पण आता तोच तुमच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला नाही. याची दोन कारणे असू शकतात. पहिले शारीरिक बदल जसे की वजन वाढणे, कारण तुम्हीही मान्य कराल की पतीच्या हृदयाचा रस्ता त्यांच्या पोटातून जातो आणि तुम्ही हाच रस्ता पकडून त्यांना फुगा बनवून ठेवले आहे आणि दुसरे म्हणजे मानसिक बदल. म्हणतात ना, ‘घर की मुर्गी दाल बराबर’ म्हणून रोजच त्यांना पाहून काही विशेष जाणीव आता होत नाही. असो, कारण काही असो, पण असे झाल्यास घाबरू नका, तुम्हाला जोडीदाराविषयी आकर्षण वाटत नाही याचा अर्थ असा नाही की तुमचे प्रेम संपले आहे. लग्नानंतर ओघाने येणारी ही तात्पुरती फेज आहे, जी निघून जाते.

प्रेमात हरवून राहण्याच्या पायरीची समाप्ती

हनिमून फेज म्हणजेच हॅप्पीली एवरआफ्टर किंवा लव फॉरेव्हर. पण या भावना कायमस्वरूपी नसतात आणि कित्येकदा तर विवाहानंतर अशीही वेळ येते की जेव्हा प्रेम जाणवणं तर दूरच पण आपण चक्क विचार करतो की या माणसाशी का विवाह केला मी, याच्यात काय विशेष पाहिलं मी?

तुमच्याही सोबत असं होऊ शकतं. पण शांत व्हा. प्रत्येक विवाहित दाम्पत्य कधी ना कधी या चक्रातून जातंय. तुम्हीही जाल. पण मग जसजसा काळ सरेल, एकमेकांना व्यवस्थित ओळखल्यानंतर तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुंदर कागदी फुलांच्या जागी वास्तवातील ओबडधोबड जमिनीवर खऱ्या प्रेमाची फुले फुलतील, ज्याचा सुवास तुमचे आयुष्य सुगंधित करेल.

कधी कधी जोडीदाराची चिड येणे, तिरस्कार वाटू लागणे

इथे आपण तिरस्कार हा शब्द शब्दश: वापरत नाही आहोत. पण हो, अशी एक वेळ येते की आपण त्या गोष्टींवरूनच आपल्या जोडीदारावर चिडू लागतो, ज्यांच्या एकेकाळी प्रेमात पडून आपण जोडीदाराची निवड केलेली असते किंवा असे म्हणू शकतो की त्यांचे गुणच तुम्हाला नंतर अवगुण वाटू लागतात. जसं की त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर, त्यांचा हजरजबाबीपणा किंवा सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असणं किंवा किक्रेट, फुटबॉल याची प्रचंड आवड.

मात्र तुम्ही त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा जोडीदार जसा आहे तसंच त्याला आपलंसं करा. शेवटी ही तीच व्यक्ती आहे, जिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केले आहे.

तुमच्या जोडीदाराशी कसे वागाल?

तुम्ही तुमच्या पतीकडून अशी अपेक्षा करता की त्यांनी तुमच्याशी रोमँटिक हिरोप्रमाणे वागावं, जसं की कधीही फक्त प्रेमानेच बोलावं, लाल गुलाबाची फुलं द्यावी किंवा रात्री उशिरा सरप्राइज प्लान करावं.

पण एक सत्य हे ही आहे की नातेसंबंधांतील प्रेम तुम्ही टिकवू इच्छित असाल तर तुमच्या पतिला अशी वागणूक द्या, जी तुम्हाला अपेक्षित आहे. त्यांच्यासाठी कॅन्डल लाईट डिनर अॅरेंज करा, जो तुम्हालाही आवडतो. रोज गुडमॉर्निंग किस करा, जो तुम्हाला अपेक्षित आहे. एकदा त्यांना याची सवय होऊ द्या. मग पहा, नंतर आपोआपच तुम्हाला तशी वागणूक मिळू लागेल.

विवाह नेहमीच आनंदाने ओतप्रोत नसतात

हे समजून, उमजून घेणे व स्विकारणे आवश्यक आहे आणि हेसुद्धा की जसजसा काळ सरेल कायम नवनवीन मुद्दा तुमच्यासमोर येऊन उभा ठाकेल, ज्यावर तुमचं एकमत होणार नाही. पण हे सारे सावरून घ्यायला तुम्ही शिकलं पाहिजे. असं अनेकदा होईल की जोडीदाराचं वागणं, बोलणं तुम्हाला खटकेल. आपलीच मर्जी चालवण्याच्या त्यांच्या सवयीचा तुम्हाला राग येऊ लागेल. पण काही झाले तरी तुम्ही धीराने वागलं पाहिजे. थोडा अवधी घ्या आणि त्यांनाही द्या. आपला इगो मधे येऊन देऊ नका. समस्या कशीही असो, सुटेल.

मोडणारा संसार एक मुल वाचवू शकत नाही

खरं तर हे आहे की एका अवघड काळातून वाट काढणाऱ्या दाम्पत्यामध्ये एका लहानग्याची उपस्थिती तणाव अजून वाढवते. जर तुम्हाला आपल्या थोरामोठ्यांकडून अनुभवांच्या जोरावर असा सोनेरी सल्ला मिळत असेल की एखादे मुल होऊ दे आणि मग बघ कसे सगळे सुरळीत होईल तर असा सल्ला अजिबात ऐकू नका. कारण हा समस्येवरील उपाय नाही. उलट समस्या निर्माण करण्यासाठी उचललेले पाऊल म्हणता येईल. एक मूल या जगात आणणं ही खूप मोठी जबाबदारी असते. हा निर्णय तेव्हाच घेतला गेला पाहिजे, जेव्हा तुम्ही दोघेही त्याचे संगोपन करण्यास पूर्णपणे तयार असाल.

सत्य हेच आहे की विवाह कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. उलट हे स्वत:च एक कोडं आहे आणि ते तेव्हाच सुटते जेव्हा दोघेही आपापल्या अहंकाराचा व स्वार्थाचा त्याग करून एकरूप होतात.

एकट्या महिला प्रवाशांसाठी अॅप्स

प्रतिनिधी

आपण एखाद्या अशा ठिकाणी हरवला आहात, जिथून आपल्याला परतण्याचा मार्ग माहीत नाहीए, तरीही आपण आपला प्रवास आनंददायक, धाडसी व उत्साहजनक प्रवासात बदलू शकता, पण यासाठी आपल्याकडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे, जो आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट असेल. हा स्मार्ट फोन सर्वकाही जाणतो, त्यामुळे तो तुमच्या प्रवासात तुमचा उत्तम मित्र सिद्ध होऊ शकतो.

एका क्लिकमध्ये लोक अगदी पिनपासून ते विमानापर्यंत सर्वकाही खरेदी करू शकतात, तिथेच ते देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या प्रवासाची योजना बनवू शकता. जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही प्रवासाला निघण्याची योजना बनवाल, तेव्हा तुम्हाला कोणा स्काउटची मदत घेण्याची गरज नाही. इथे आपल्याला संपूर्ण ट्रॅव्हल गाइडबाबत सांगितले जात आहे. त्याच्या मदतीने आपण आपल्या प्रवासाचा अनुभव खास बनवू शकता:

1)गुगल अॅ

आपण कुठे जात आहात का? तर गुगल मॅपची मदत घ्या. आपण रिअल टाइम जीपीएस नेव्हीगेशन, ट्रॅफिक, ट्रानझिट आणि लाखो ठिकाणांबाबतच्या माहितीसाठी या अॅपवर अवलंबून राहू शकता. हे अॅप योग्य वेळी माहिती उपलब्ध करून आपणास अपडेट ठेवेल. रिअल टाइम, नेव्हिगेशन, इटीएसह प्रवास सोपा बनवा. यामुळे आपल्या वेळेची बचतही होईल आणि त्याचबरोबर यामुळे आपल्याला योग्य दिशाही कळेल. या अॅपच्या मदतीने प्रवासाची ठिकाणे शोधा, तसेच आपण समीक्षा, रेटिंग, फूड किंवा इंटीरियरच्या फोटोंच्या माध्यमातून श्रेष्ठ ठिकाणांबाबतचा निर्णयही घेऊ शकता. मात्र, आपल्या प्रवासाचे चांगले-वाईट अनुभव जरूर शेअर करा. जेणेकरून इतर प्रवाशांनाही चांगले ठिकाण शोधण्यास मदत मिळेल. आपल्याला ज्या ठिकाणी पुन्हा-पुन्हा जाण्याची इच्छा असेल, ते ठिकाण आपण सेव्हही करू शकता आणि एखाद्या कॉम्प्युटर किंवा डिव्हाइसच्या मदतीने नंतर लगेच शोधू शकता.

2) ट्रॅव्हलयारी

ट्रॅव्हलयारी एक असा ऑनलाइन बस बुकिंग प्लॅटफॉर्म आहे, जो बस टिकिटिंग प्रक्रिया आपल्यासाठी सोपी आणि सुलभ बनवतो. ट्रॅव्हलयारी अँड्रॉइड अॅप प्रतिस्पर्धकाशी मुकाबला करण्यास सक्षम आहे. कारण मँटिजचे कस्टमर रिझर्वेशन सीस्टम (सीआरएस) भारतात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त बससेवा प्रदातांच्या इन्वेंट्री व्यवस्थेला मजबूत बनवणारा एक प्रमुख प्रौद्योगिकी प्लॅटफॉर्म आहे. आकर्षक ग्राहकसेवा, सहज संपर्क, सीटची गॅरेंटी आणि खासकरून ट्रॅव्हलयारीवर १०० टक्के लाइव्ह बस तिकीट इन्वेंट्रीच्या उपलब्धतेने या उद्योगात मोठया बदलाची नांदी केली आहे आणि यामुळे कंपनीला स्वत:ची एक खास ओळख बनवण्यास मदत मिळाली आहे. आपण या एका अॅपच्या माध्यमातून बस, हॉटेल, टूर पॅकेज, सहजपणे पैसे भरणे आणि अन्य प्रक्रियेबाबत विचार करू शकता.

3) ओयो अॅप

ओयो अॅपने आपणास हॉटेल्समध्ये रूम शोधणे सहजसोपे आणि आनंददायक ठरेल. हे अॅप भारतातील सर्वात मोठया ब्रँडेड हॉटेल्सच्या नेटवर्कद्वारे विकसित केले गेले आहे आणि याद्वारे आपण काही वेळातच हॉटेलची रूम बुक करू शकता. या अॅपवर सूचिबद्ध भारतातील १५० शहरांतील ५० हजारांपेक्षा जास्त रूम्समधून आपल्या आवडीनुसार रूम्सची निवड करू शकता. हे अॅप आपणास रूम बुक करणे, खाण्या-पिण्याची ऑर्डर करणे, कॅबची व्यवस्था आणि आपल्या वास्तव्यासाठी पैशांचे व्यवहार करण्याबाबत सक्षम आहे. या सर्व सुविधा आपल्या स्क्रिनवर उपलब्ध होतात. त्याचबरोबर वास्तव्यासाठी उत्तम सौदे आणि स्वस्त आवास सुविधेसह घराबाहेर राहणे यापूर्वी कधी एवढे सोपे वाटले नसेल. या अॅपवर आपण कमी किंमतीत एसी, टीव्ही, वाय-फाय, स्वच्छ, तसेच नीटनेटक्या रूम यासारख्या सर्व सुविधा मिळवून, घराबाहेर राहण्याचा छान अनुभव मिळवू शकता.

4) जुगनू

जुगनू आपल्याला ४० पेक्षा जास्त शहरांमध्ये स्वस्त, वेगवान आणि सुविधाजनक प्रवासासाठी मदत करेल. आपल्या शहरात स्वस्त भाडयामध्ये सुविधाजनक आणि सुरक्षित प्रवासाचा फायदाही या अॅपद्वारे आपल्याला मिळू शकतो. आपल्याला केवळ एक बटण दाबायचा अवकाश आहे आणि जुगनू चालक काहीच मिनिटांत आपल्या पिकअप लोकेशनवर हजर होईल.

5) जोमाटो

जेवण अशी गोष्ट आहे,   ज्यावर पर्यटक सर्वप्रथम लक्ष देतात. त्यानंतरच ते आपल्या ट्रीपला अंतिम स्वरूप देतात. जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी जात असाल, तेव्हा आपणाला मार्गदर्शनासाठी एखाद्या जाणकाराची गरज भासते. जोमाटो या सर्व  गरजा पूर्ण करतो. हे भोजनासाठी रेस्टॉरन्टचा शोध घेण्याच्या दृष्टीने श्रेष्ठ अॅप आहे. रेस्टॉरन्ट मेन्यू, फोटो, यूजर रिव्ह्यू आणि रेटिंगद्वारे सर्व जाणून घेऊन आपण हा निर्णय घेऊ शकता की आपणाला जेवणासाठी कुठे जायची इच्छा आहे.

अंधश्रद्धेच्या बेड्या तोडाव्या लागतील

* गरिमा पंकज

२०२० हे भारतासह संपूर्ण जगासाठी अतिशय भयावह वर्षाच्या रूपात सरत आहे. अर्थव्यवस्था कोसळल्या आहेत. कोरोना कहरात मृत्यूच्या आकडेवारीत वाढ होत आहे आणि त्याबरोबरच आपल्या प्रियजनांबद्दल लोकांची चिंताही वाढत आहे. कोरोना साथीच्या संकटाने समाजात विज्ञान आणि संशोधनाचे महत्त्व सिद्ध केले आहे. आपल्याला विज्ञान या साथीतून बाहेर येण्याची योजना सांगेल, जेव्हा जगात कोरोना विषाणूची लस विकसित केली जाईल. परंतु तोपर्यंत वैज्ञानिक आणि संशोधक हा व्हायरस कोठून आला, तो कसा पसरला आणि कोणत्या प्रकारचे उपचार त्यावर प्रभावी ठरू शकतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जगात जेव्हा-जेव्हा अशा प्रकारचे धोके येतात, मग भले तो साथीचा रोग असो, भूकंप असो, पर्यावरणीय संकट असो की इतर काही, मनुष्याला विज्ञानाचा आधार असतो. जग विज्ञानाच्या मार्गाने जाते, परंतु अशा प्रकारच्या संकटाच्या परिस्थितीतही बहुतेक भारतीय अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारतात. धार्मिक चालीरिती, धार्मिक विधी आणि उपवास यांच्याद्वारे संकट समाप्त करण्यासाठी उपाय शोधतात.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २००८ मध्ये यंग सायंटिस्ट्स कम्युनिटीची सुरुवात केली होती. आता २०२० मध्ये जगातील १४ देशांतील एकूण २५ तरुण शास्त्रज्ञांचे चेहरे समोर आले आहेत, जे संशोधन व शोधांद्वारे जगाचे रूपडे बदलण्याचे काम करतील. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की या २५ तरुण शास्त्रज्ञांपैकी १४ महिला आहेत, म्हणजेच जगातील महिला विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात वेगाने पुढे सरकत आहेत, परंतु यामध्ये भारतीय महिला खूपच मागे आहेत.

अंधश्रद्धा आणि भारतीय महिला

भारतीय महिलांविषयी म्हणाल तर हे सर्वश्रृत आहे की भारतीय स्त्रियांना नेहमीच धर्म, ढोंगीपणा आणि अंधश्रद्धा यांच्या बंधनात अडकवण्यात आले. त्यांच्या प्रगत साधणाऱ्या पायांवर नेहमीच धर्माची बंधने घातली गेली. गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ आणि समाजसेविका अनुजा कपूर सांगतात, ‘‘जरा विचार करा, महिलांनी या निर्बंधांमुळे आपले अस्तित्व गमावले नाही काय? स्वत:ला बलात्कार, अपहरण किंवा खुनाचा बळी बनवले नाही का? शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान नाही झाले का? अंधश्रद्धेमुळेच राम रहीम, चिन्मयानंद आणि आसारामसारखे लोक पुढे आले, ज्यांनी महिलांच्या अंधश्रद्धेच्या प्रवृत्तीचा फायदा उचलून आपला बँक बॅलन्स वाढवला आणि त्यांच्या आयुष्याशी खेळले.

बऱ्याच भारतीय महिला फारशा शिक्षित नसतात, म्हणून त्यांची मने फारशी मोकळी नसतात. जरी ती स्त्री शिक्षित असेल, तरीही ती ज्या समाजात राहते, त्या समाजात तिला तिच्या मनाचा आणि ज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची परवानगी नसते. घरात सासू-सासरे असतात, तिथे शेजारी-पाजारीही असतात. प्रत्येकजण तिच्याशी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याबद्दल बोलतो. प्रत्येकाशी लढण्यास आणि आपला मुद्दा कायम ठेवण्यास तिला इतका वेळ किंवा धैर्य नसते. परिणामी तिला सर्वकाही स्वीकारावे लागते.

तसंही स्त्रिया पटकन फसवणूकीत अडकतात आणि त्यामागील कारण त्यांचे भावनिक होणे आहे. त्यांना मूर्ख बनविणे सोपे आहे. जरी त्या शिकलेल्या असल्या तरीही त्या ढोंगीपणामध्ये लवकर अडकतात. आपण पहा, बाजारपेठा स्त्रियांच्या कपडयांनी आणि दागिन्यांनी सुशोभित मिळतील, परंतु पुरुषांच्या वस्तू कमी प्रमाणात विकल्या जातील. महिला सर्वाधिक हमखास खरेदीदार आहेत. यामागील कारण म्हणजे त्यांच्यामध्ये मोठया प्रमाणात स्विकारभावाची इच्छा असते. कुठे न कुठेतरी दागदागिनेसारख्या वस्तू विकत घेऊन आणि आपला मेकअप करुन त्या सुंदर दिसू इच्छितात. त्यांना वाटते की असे केल्याने त्यांना स्विकारले जाईल. त्या विसरतात की ही स्वीकृतीची भावना कपडयांमधून, शिक्षणाद्वारे किंवा फॅशनमधून नव्हे तर आतून येते. अशाचप्रकारे त्या प्रथा व संस्कार निभावून समाजात आपली मान्यता वाढवू इच्छितात. पण याचा परिणाम खूप वाईट निघतो.

अंधश्रद्धा भीती निर्माण करते

आयुष्य अधिक चांगले कसे जगावे हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. अंधश्रद्धा आणि त्यातून उद्भवलेल्या भीतीपासून मुक्त कसे व्हावे. आपल्या समाजात अंधश्रद्धेने रूढी-प्रथांच्या माध्यमातून आपली मुळे खोलवर रुजवली आहेत. एक स्त्री आजारी आहे, तिच्या शरीरात त्राण नाही, तरीही तिला भूकेले राहून उपवास करावे लागतात. करवाचौथ ही एक अशी प्रथा आहे, जिच्यानुसार एक स्त्री दिवसभर आपल्या तोंडात अन्नाचा एक दाणाही घेवू शकत नाही. या प्रथेच्या मागे लपलेल्या अंधश्रद्धेने लोकांच्या मनात भीती भरुन टाकली आहे की जर स्त्रीने उपवास तोडला असेल तर तिचे सौभाग्य हिरावेल. अंधश्रद्धेची ही भीती बहुतेक वेळा स्त्रियांच्या जीवनावर भारी पडते. अशा परिस्थितीत हे महत्वाचे आहे की आपण कोणत्याही प्रथेला बुद्धीने समजून घ्यावे. आपण शिक्षणाद्वारे मिळवलेल्या ज्ञानाचेदेखील चिंतन करावे, तरच आपली मेंदूची कवाडं उघडतील आणि आपण या भीतीपासून मुक्त होऊ.

त्याचप्रमाणे कोणत्याही समस्येचे व्यावहारिक निराकरण शोधले पाहिजे. कुटुंबाच्या आनंदासाठी काही सांस्कृतिक प्रथा निभवा. परंतु याच्याशी संबंधित भीतीला मनात थारा देऊ नका. स्वत:च्या मनामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. नवीन मार्ग शोधा. अशी कोणतीही समस्या नाही, जिचे निराकरण उपलब्ध नाही. हृदयाच्या जाळयात अडकू नका. हृदय आपल्याला अंधविश्वासावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करते, तर मन योग्य मार्ग दाखवते, शोध करण्याचा आणि रस्ता शोधण्याचा मार्ग दर्शविते. केवळ मनानेच हृदयाला हरवू शकतो. समाजातल्या ज्या गोष्टी योग्य वाटतील, त्याच गोष्टी पाळाव्यात.

उदाहरणासाठी कोव्हिड -१९चे घ्या. यावेळी सकारात्मक विचार ठेवणे महत्वाचे आहे. खबरदारी घ्यावी. पण यामागे वेडे होऊ नये. इच्छाशक्तीने रिकव्हरी सुलभ होते. स्वत:वर विश्वास असावा, अंधश्रद्धा असू नये.

मेंढरांच्या कळपागत आहे अंधश्रद्धा

आपण लोकशाही समाजात राहतो आणि प्रत्येकाला त्याच्या मनातील विचार बोलण्याचा अधिकार आहे. लोक आपल्या या अधिकाराचा फायदा घेतात आणि बोलतात. परंतु हा विचार करित नाहीत की ही गोष्ट संशोधनावर आधारित आहे की नाही. आपण आपला मुद्दा स्टिरिओटाइप करतो. हे सांगायला विसरतो की ही वैज्ञानिक बाब नाही तर आपले विचार किंवा इतर लोकांकडून ऐकलेली गोष्ट आहे. लोकांनी आपले म्हणणे ऐकावे व आपल्याला ज्ञानी समजावे अशी आपली इच्छा असते. आपल्या समाजाची आणि राजकारणाची अशीच परिस्थिती आहे. आज शिक्षित नसलेले अर्ध्याहून अधिक लोक देश चालवत आहेत.

तसेच शिक्षण आपल्याला किती बुद्धिमान बनवते हेदेखील विचार करण्यासारखे आहे. आपण शिकून ज्ञान तर घेतो, परंतु जोपर्यंत आपण ते योग्य अर्थाने ग्रहण करत नाहीत, मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत त्याचे महत्त्व नाही.

जोखीम घेऊ इच्छित नाही

जोखीम घेण्यास लोक घाबरतात. त्यांना जोखीम घेण्याची भीती वाटते. अर्थात जिथे भीती आहे, तेथे अंधश्रद्धा आहे. आपण शिक्षित असलात तरीही आपण अंधश्रद्धाळू असू शकता, कारण आपण अशा समाजात राहता, जेथील लोक अंधश्रद्धाळू आहेत. ते तुम्हालाही अंधश्रद्धाळू बनवण्याचा प्रयत्न करतात. आपण आजारी आहात, मूल होत नाही किंवा पतीशी भांडण होत आहे तेव्हा लोकांचे सल्ले मिळू लागतात, ‘त्या बाबांकडे जा आणि जादूटोणा करा,’ ‘सोळा सोमवार उपवास करा,’ ‘मंदिरात ५१ हजार अर्पण करा,’ ‘विधी करा’ इ. लोकांकडे हजारो कथा असतात हे ऐकवायला की समस्या कोठे व कशी दूर झाली किंवा कृपादृष्टी झाली.

अशा परिस्थितीत आपण हे समजून घेणे महत्वाचे आहे की आपण सुशिक्षित आहात तर स्वत:साठी, केवळ स्वत:चा व्यवसाय चालवण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी नाहीत. शिक्षणाचा परिणाम आपल्या विचारसरणीत आणि वागण्यातही दिसून यावा. अंधश्रद्धाळू असल्याने आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचे किंवा कुंटुंबाचे नुकसान करीत असल्यास हे चुकीचे आहे. आपले ज्ञान वापरा. डोळे बंद करून ढोंगीपणा आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवणे निंदनीय आहे. एक अंधश्रद्धाळू व्यक्ति खरंच वेडगळ व्यक्तिमत्त्व बनते, जे फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवू लागते. म्हणून असे बनणे टाळा.

बाबांच्या ढोंगीपणाची सत्यता ओळखा. लोकांशी बोला, नवीन शोध करा आणि आपली समस्या टाळण्यासाठी मार्ग शोधा. आपल्याकडे कोव्हिडसारख्या समस्या हाताळण्याचे अनेक मार्ग आहेत. आज भारतातदेखील अशा काही स्त्रिया आहेत, ज्या या दिशेने आपले मार्गदर्शन करीत आहेत.

ही लढाई जिंकण्यासाठी भारताच्या या ५ महिला (डॉक्टर, आयएएस, वैज्ञानिक) कोव्हिड -१९ विरुद्ध लढयाचं नेतृत्व करत आहेत आणि आठवडयातून सातही दिवस चोवीस तास काम करीत आहेत.

  1. प्रीती सुदान

आंध्र प्रदेश कॅडरच्या १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी सुदान या सहसा रात्री उशिरा आपल्या कार्यालयाबाहेर निघताना दिसून येतात. त्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव आहेत. त्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, सरकारची धोरणे राबविण्यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधण्याचे काम करीत आहेत. त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह तयारीच्या नियमित आढाव्यातदेखील सामील आहेत.

2) डॉ निवेदिता गुप्ता

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. निवेदिता गुप्ता देशासाठी उपचार आणि चाचणी प्रोटोकॉल तयार करण्यात व्यस्त आहेत.

3) रेणू स्वरूप

स्वरूप गेल्या ३० वर्षांपासून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या बायोटेक्नॉलॉजी (डीबीटी) मध्ये कार्यरत आहेत. एप्रिल २०१८ पर्यंत, त्यांना वैज्ञानिक ‘एच’ हे पद मिळाले होते, जे एक कुशल वैज्ञानिक असल्याची ओळख आहे. त्यानंतर त्यांची सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली होती. रेणू आता कोरोना विषाणूची लस विकसित करण्याच्या संशोधनात गुंतली आहे.

4) प्रिया अब्राहम

प्रिया अब्राहम सध्या आयसीएमआरशी संलग्न असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी(एनआयव्ही) पुणेच्या प्रमुख आहेत. कोव्हिड-१९ साठी सुरुवातीला एनआयव्ही हे देशातील एकमेव चाचणी केंद्र होते.

5) बीला राजेश

तामिळनाडूच्या आरोग्य सचिव या नात्याने राज्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राजेश सगळयात अग्रणी राहिल्या. नुकतीच त्यांनी पोस्ट केली की विषाणू कोणालाही प्रभावित करू शकतो. एकमेकांबद्दल संवेदनशील रहा आणि कोव्हिड १९ विरूद्ध एक समन्वित लढा द्या. तसे तामिळनाडू सरकारने अलीकडेच डॉ. बीला राजेश यांना राज्याच्या आरोग्य सचिव पदावरून काढून वाणिज्य कर व नोंदणी विभागाच्या सचिव पदावर नियुक्त केले आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें