* जगदीश पवार

हिंदूंचा सण, मुसलमानांचा सण, ख्रिस्तींचा सण आणि शिखांचा सण. हे सण धर्मात विभागले गेलेत. प्रत्येक धर्माचा सण वेगळा आहे. एका धर्माला मानणारे दुसऱ्याच्या सणाला महत्व देत नाहीत. धर्मांची तर गोष्टच वेगळी. एकाच धर्मात एवढे विभाजन आहे की एका धर्माचे असूनही ते सर्व उत्सव एकत्र साजरे करत नाहीत. एकाच धर्मात विविध धर्म आणि जातीचे छोटे-मोठे उत्सवही विभागले गेले आहेत.

हिंदूंचे सण मुसलमान, ख्रिस्तीय नव्हे तर खालच्या जातीचे समजले जाणारे हिंदूही साजरे करणे टाळतात. मुसलमानांमध्ये शिया वेगळे, सुन्नी वेगळे. ख्रिस्तींमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या दोघांचे संगीत वेगळे. प्रत्येक धर्मात भेदभाव, उच्चनीचता आहे. श्रेष्ठता आणि लहान-मोठयांची भावना आहे. हेच आपल्या सणांच्या विभाजनाचे वास्तव आहे. अर्थात सणांवर धर्माने पूर्णत: ताबा मिळवला आहे.

होळी-दिवाळीसारख्या सणांवर धर्माने असा काही ताबा मिळवलाय की सणांचे मूळ स्वरूपच बदलले आहे. सणांवर धर्मातील ढोंगी कर्मकांडे, दिखाऊपणा, तिरस्कार, भेदभाव आणि हिंसेचा प्रभाव पाहायला मिळतोय. धर्माने उत्सवांमध्ये कडवटपणा आणला आहे. वेगवेगळया समुदायात विभागलेल्या समाजात कटकारस्थाने करण्याची स्पर्धा सुरू झालीय. सणांचा गोडवा धर्माच्या वर्चस्वामुळे आंबट झालाय.

सणांवरील धर्माच्या ताब्यामुळे सामाजिक सलोखा, ऐक्य आणि सुसंवादाची दरी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढली आहे. ऐक्य, समन्वय आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या सणांमध्ये माणसाची विभागणी झाली आहे. या विभागणीमुळेच आता सण हे सामाजिक एकजुटीचे पर्व म्हणून सिद्ध होऊ शकत नाहीत. सणांचे शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय महत्व विसरून सर्वतोपरी धार्मिक, सांस्कृतिक बाबींचाच विचार केला जातो.

धार्मिक पात्रांना सणांशी जोडून कथा तयार केल्या आहेत. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला पांडवांचा जुगार खेळणे आणि राम लंका जिंकून आल्यावर आनंद साजरा करण्याच्या नावावरही कथा प्रचलित आहेत. अशाच प्रकारे होळीचा सण प्रल्हाद आणि होलिकेशी जोडला आहे.

धनत्रयोदशी, गोवर्धन पूजा, कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दुगार्पूजा, छटपूजा हे सर्व धर्माशी जोडले आहेत. रक्षाबंधनाचा कोणत्याही देवी-देवतांशी संबंध नाही, तरीही पुजाऱ्यांनी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त सांगण्याचा सर्वाधिकार आपल्याकडे सुरक्षित ठेवला, कारण लोक त्यांच्याकडे पवित्र मुहूर्त विचारायला यायला हवेत आणि सोबतच फळे, फुलं, मिठाई, वस्त्र आणि दानदक्षिणेची रोकड आणायला त्यांनी विसरू नये. दिवाळीत जुगार खेळणे ही प्रथा झालीय. धर्मग्रंथांचा दाखला देत सांगण्यात आले आहे की दिवाळीच्या रात्री कौरव, पांडव जुगार खेळले होते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...