* शशि बाला

लग्नानंतर प्रत्येक मुलीला एकच काळजी असते ती म्हणजे जेवण बनवताना अशी काही गडबड व्हायला नको ज्यामुळे सासरकडील मंडळी नाराज होतील.

या टीप्स तुमची काळजी दूर करण्यासाठी खूपच उपयोगी पडतील :

* दही पातळ झाले असेल तर त्यात पाण्याऐवजी दूध मिसळावे.

* तव्यावर हलकेच भाजून मग कसुरी मेथीचा वापर करावा.

* घरी पनीर बनवले असल्यास उरलेले पाणी मठरी, भटूरे, नान यांचे पीठ  मळण्यासाठी वापरावे.

* कोफ्ते बनवताना सुकं आलुबुखारा फळ किंवा चिंच घालून रोल करावा.

* लोणच्याचा मसाला चाळणीने चाळून घ्यावा. मसाल्यात चवीनुसार मीठ घालून हिरव्या मिरचीत भरून जेवणासोबत वाढावे.

* ज्या तव्यावर डोसा बनवायचा असेल त्यावर रात्रीच तेल लावून ठेवावं. डोसा चिकटणार नाही.

* पराठ्याच्या प्रत्येक बाजूवर तूप लावून कोरडं पीठ भुरभुरावं.

* खीर जास्त पातळ झाली असेल तर थोडी कस्टर्ड पावडर मिसळावी.

* तंदूरी रोट्या उरल्या असतील तर तव्यावर तूप लावून भाजून घ्या. पराठ्यांसारख्या लागतील.

* राजमा, चवळीच्या शेंगा, काळे चणे, छोले हे जर एक वाटी बनवत असाल तर त्यात १ वाटी टोमॅटो प्यूरी घाला, ग्रेव्ही छान बनेल.

* भाजीत जर कच्चे पनीर घालणार असाल तर हळद घातलेल्या पाण्यात भिजवून वापरावेत.

* राजमा उकडून पाणी गाळून घ्यावे. मसाले परतून राजमा घालून ५ मिनिटं परतावे. मसाला चांगला मुरेल. मग उरलेले पाणी घालून शिजवावे.

* पुलावसाठी मीठ टाकून तांदूळ शिजवावेत. भाज्या फ्राय करून घ्या. मिक्स करा. पुलाव मोकळा होईल.

* पीठ मळण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर पीठ भिजून ठेवावे. १५ मिनिटांनंतर तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन मळून घ्यावे. २ मिनिटांत पीठ तयार होईल.

* बटाटे वडा, कोबी, पनीरचे भजी बनवताना बेसन पीठात चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा. यामुळे भजी कुरकुरीत होतील.

* बटाटे उकडून फ्रिजमध्ये ठेवावेत. मनासारखे आकार कापून सोनेरी रंगावर तळून घ्या. आंबटगोड चटणीसोबत वाढावे.

* पोहे पाण्यात भिजवावेत. दूध उकळल्यानंतर त्यात पोहे, साखर व सुकेमेवे घालावेत. झटपट खीर तयार होईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...