लिव इन पोकळ नातं

* गरिमा पंकज

लिव इन हे आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार तरुणांनी निर्मित केलेली थोडी कमी आजमावलेली कॉन्सेप्ट आहे. मुलामुलीची विवाहित जोडप्याप्रमाणे सोबत राहाण्याची व्यवस्था म्हणजे लिव इनमध्ये वैवाहिक जीवनातील आकांक्षा पूर्ण होतात, एकमेकांचा सहवासही लाभतो परंतु दीर्घकालीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते बांधील नसतात. कधीही विलग होण्याचं स्वातंत्र्य असतं. ही कॉन्सेप्ट विवाह करण्याची मानसिकता नसणाऱ्यांना वरकरणी आकर्षक भासते, परंतु आतून तितकीच पोकळ आणि अस्थिर तर आहेच शिवाय त्यातही अनेक जबाबदाऱ्या आहेत. कदाचित हेच कारण आहे की बहुतेक जण खासकरून मुली आजही याचा स्वीकार करत नाहीत.

अपूर्णतेची जाणीव

एक प्रकारे हे नातं धार्मिक मान्यतांच्या बंधनापासून सामाजिक रुढीपरंपरा आणि शोबाजीच्या रंगापासून दूर आहे आणि कायद्यानेसुद्धा याला काही मर्यादेपर्यंत मान्यता दिली आहे. परंतु तरीदेखील या नात्याच्या अपूर्णतेला दुर्लक्षित करता येणार नाही खासकरून मुली अशाप्रकारच्या नात्यांमध्ये अनेकदा गहिऱ्या मानसिक त्रासातून जातात.

वास्तविक, लिव इनमध्ये नातं जेव्हा गहिरं होतं आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात, शारीरिकसंबंध साधतात, तेव्हा ती भावना मुलीच्या मनात कायम सोबत राहाण्याच्या इच्छेला जन्म देते. ५० मिनिटांची जवळीक ५० वर्षांच्या सहवासाच्या इच्छेमध्ये बदलू लागते. परंतु जरुरी नाही की मुलगासुद्धा याच पद्धतीने विचार करेल आणि जबाबदाऱ्या पूर्ण करायला तयार होईल.

बहुतेक प्रकरणांमध्ये या गोष्टीवरून नातेसंबंध तुटतात आणि अखेरीस शारीरिक प्रेमावर आधारीत हे नातं आयुष्यभराचं दुखणं बनून राहातं. अनेकदा या दुखण्यातून निर्माण झालेली वेदना इतकी त्रासदायक असते की मुलगी स्वत:ला संपवून टाकण्यासारखं चुकीचं पाऊल उचलायलाही मागेपुढे पाहात नाही.

अशा नातेसंबंधांमध्ये प्रेम कमी वाद अधिक

अशा नातेसंबंधांमध्ये मुलामुलींचा एकमेकांवर पूर्ण हक्क नसतो. ते संयुक्त निर्णयसुद्धा घेऊ शकत नाहीत. जसं की, विवाहित दाम्पत्य मात्र घेतात. उदाहरणादाखल संपत्ती एक तर मुलाची असते वा मुलीची. दोघांचा अधिकार नसतो. दुसऱ्याला हे विचारण्याचा अधिकार नाही की पैसे कशाप्रकारे खर्च होत आहेत. दोघे आपले पैसे आपल्या मर्जीने खर्च करतात.

याच कारणामुळे बहुतेकदा यांच्यात हक्क आणि अधिकारावरून भांडणं होत राहातात. हा वाद सहजासहजी मिटत नाही. ते प्रयत्न करतात की प्रेम दर्शवून वा आपसांत बोलून वाद मिटवावा. परंतु बहुतेकदा असं होत नाही; कारण कोणतेही नातेसंबंध कायम राखण्यासाठी आणि दोन व्यक्तींना जवळ ठेवण्यासाठी जे गुण सर्वाधिक जरुरी आहेत ते आहेत, विश्वास, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आत्मिक निकटता.

हे गुण विकसित करण्यासाठी वेळ हवा असतो. केवळ भौतिक वा शारीरिक जवळीक मानसिक आणि भावनिक आधार देईल असं जरुरी नाही. अशा पोकळ नात्यांमध्ये कटुतेचा काळ सहजी संपत नाही.

जबाबदाऱ्यांपासून पळायला शिकवतं लिव इन

लिव इन रिलेशनशिप ही वास्तविक भावनिक बंधनांच्या आधारेसोबत राहाण्याची एक व्यक्तिगत आणि आर्थिक व्यवस्था आहे. यामध्ये कायमस्वरूपी एकमेकांना सोबत देण्याचं कोणतंही आश्वासन नसतं, शिवाय संपूर्ण समाजकायद्यासमोर अशाप्रकारचा कोणताही करार केला जात नाही. त्यामुळे पार्टनर्स एकमेकांवर (लेखी/तोंडी) कोणत्याही प्रकारचा कसलाही दबाव आणू शकत नाहीत. असं नातं एकप्रकारे रेंटल एग्रीमेंटसमान असतं. हे अतिशय सहजतेने बनवलं जातं. आणि जोपर्यंत दोन्ही पक्ष योग्य वर्तन करतात, एकमेकांना खूश ठेवतात तोपर्यंत ते सोबत असतात. याउलट विवाह या पार्टनरशिपहून अधिक गहिरा आहे. हा एक सार्वभौमिक पातळीवर केलेला करार आहे, ज्यासोबत कायदेशीर आणि सामाजिक जबाबदाऱ्या संबंधित असतात. वास्तविक लग्न केवळ २ व्यक्तिचं, २ कुटुंबांचं व समुदायांमध्ये बनलेलं नातं आहे, जे आयुष्यभरासाठी स्वीकारार्ह आहे. जीवनात कितीही दु:ख, समस्या आल्या, तरी परस्पर नातं जपण्याचं आश्वासन यात दिलं जातं.

असं म्हटलं जातं की, हृदयाच्या तारा जुळल्या की मग रीतिरिवाजांची काय गरज? परंतु मुद्दा इथे रीतिरिवाजाचा नाही तर सामाजिक स्तरावर केलेल्या कमिटमेंटचा आहे. कायम जबाबदारी घेण्याची कमिटमेंट, नेहमी साथ निभावण्याची कमिटमेंट, विवाहामध्ये एका वेगळ्या पातळीची कमिटमेंट असते, त्यामुळे एका वेगळ्या पातळीवरील संरक्षण, स्वातंत्र्य आणि परिणामी वेगळ्या पातळीवरील आनंदही यातून मिळतो. जे नातं केवळ परस्पर प्रेम आणि आकर्षण कायम आहे तोपर्यंत निभावलं जातं, त्यापासून हे नातं खूप निराळं आहे. त्या संबंधात उत्तम पर्याय मिळताच विलग होण्याचा मार्ग खुला असतो. कायम मानसिक तयारी ठेवावी लागते की हे नातेसंबंध कधीही संपुष्टात येऊ शकतात.

समर्पण हवं तर लिव इन नको

जेव्हा समर्पणाचा विषय येतो, तेव्हा विवाहित जोडीदार या दृष्टीने अतिशय प्रामाणिक आढळून येतात. ५ वर्षांच्या एका संशोधनानुसार ९० टक्के विवाहित स्त्रिया पतिव्रता असल्याचं आढळलं, याउलट लिव इनमध्ये असणाऱ्या केवळ ६० टक्के स्त्रियाच प्रामाणिक होत्या असं आढळलं.

पुरुषांच्या बाबतीत स्थिती अधिकच आश्चर्यकारक होती. ९० टक्के विवाहित पुरुष आपल्या पत्नीप्रती प्रामाणिक होते. याउलट लिव इन प्रकरणात अवघे ४३ टक्के पुरुषच प्रामाणिक आढळले.

इतकंच नव्हे, लिव इनचं संकट म्हणजे प्रीमॅरिटल सेक्श्युअल एटीट्यूड आणि वर्तन विवाहानंतरही बदलत नाही. जर एक स्त्री लग्नापूर्वी एका पुरुषासोबत राहात असेल तर बऱ्याच प्रमाणात शक्यता असते की ती विवाहानंतरही आपल्या पतीला धोका देईल.

संशोधन व अभ्यास अहवालांनुसार जर एखादी व्यक्ती विवाहापूर्वी सेक्सचा अनुभव घेते, तर विवाहानंतरही ती व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये गुंतेल अशी सर्वाधिक शक्यता असते. हे खासकरून स्त्रियांसाठी अधिकीने सत्य आहे

पालकांपासून अंतर

लिव इनमध्ये राहाणाऱ्या मुलामुलींच्या जीवनात सामान्यत: आईवडिलांचा हस्तक्षेप नाममात्र असतो; कारण यासाठी त्यांची संमती नसते आणि ते आपल्या मुलांपासून अंतर राखतात.

घरच्यांना या गोष्टीची माहिती त्यांनी दिली नाही, तरी हे रहस्य अधिक काळ लपवून ठेवणंही सोपं नसतं. अनेक प्रकारच्या गोष्टी जसं की आईवडिलांकडून पैशांची मदत घेणं, पार्टनर आणि त्याचं सामान लपवणं जेव्हा पालक अचानक भेटायला येतात, सातत्याने त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचा अपराधभाव आणि खोटं बोलणं यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या लिव इनमध्ये राहाणाऱ्यांना अस्वस्थ करतात.

विश्वासाचा अभाव

जे विवाहापूर्वी सोबत राहातात, त्यांच्यात बऱ्याचदा अविश्वासाची भावना विकसित होते. परिपक्व प्रेमामध्ये गहिरा विश्वास असतो की तुमचं प्रेम केवळ तुमचं आहे आणि कुणी तिसरं त्यात नाही. परंतु विवाहापूर्वीच जवळीक साधल्यावर व्यक्तिच्या मनात अनेक प्रकारचे संशय निर्माण होऊ लागतात की माझ्यापूर्वी तर जोडीदाराच्या जीवनात कुणी नव्हतं ना वा माझ्याशिवाय भविष्यात दुसऱ्या व्यक्तीसोबत याचे संबंध बनणार नाहीत ना.

अशाप्रकारचा अविश्वास आणि संशयीवृत्ती बळावल्याने व्यक्ती हळूहळू आपल्या पार्टनरप्रती प्रेम व सन्मान गमावू लागतो. याउलट वैवाहिक जीवनात विश्वास एक महत्त्वपूर्ण भाग असतो.

एकटा जीव सदाशिव

– सुमन बाजपेयी

‘‘बिचारी ३५ वर्षांची झाली. पण अजून सिंगल आहे.’’

‘‘दिसायला तर सुंदर आहे. मोठी अधिकारी आहे. काय माहीत अजून लग्न का नाही झालं?’’

सोमा आपल्या सोसायटीत शिरताच हे शब्द तिच्या कानावर पडले. खरंतर या गप्पा तिच्यासाठी नवीन नव्हत्या. तिला आता याची सवय झाली होती. पण तरीही कधीकधी तिला या गोष्टींचा त्रास व्हायचा. लोक तिच्या आयुष्यात हस्तक्षेप का करतात? तिला तिचं आयुष्य शांततेने जगू का देत नाहीत? तिच्या प्रत्येक हालाचालीवर लक्ष ठेवलं जातं. जसं काही सिंगल असणं हा गुन्हाच आहे. तिने स्वत:हून असं

आयुष्य निवडलं असेल तर समाजाला याचा त्रास का होतो? तिचं तर सगळं छान चाललंय.

आपल्या मोठ्या बहिणीचं फसलेलं लग्न पाहूनच सोमाने एकटं राहण्याचा निर्णय घेतला. किती बंधनं आहेत तिच्यावर. कोणतंही काम ती आपल्या पतीच्या परवानगीशिवाय करू शकत नाही. सोमाने रीनाला निरखून पाहिलं. पस्तीशीतही ती साठीतली दिसत होती.

सोमासारख्या सिंगल विमेन आजकाल कमी नाहीत. कारण त्या आपल्या मर्जीने लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगायचं आहे. मग एखादवेळेस लग्न नाही जरी झालं तरी एकटयाने आनंदात जगता येतं. पण जगण्याची पद्धत माहीत असायला हवी.

सोमा म्हणते, ‘‘लग्न झालंच पाहिजे असं काही नाही. काहीवेळा असं होतं की इच्छा असूनही योग्य जोडीदार न मिळाल्याने तुम्ही लग्न करू शकत नाही. कोणी आवडलंच तरी त्या व्यक्तिसोबत संपूर्ण आयुष्य काढता येण्याची खात्री नसते. माझ्यासोबतही

असंच काहीसं झालं. हे खरं आहे की प्रेम हा एक सुंदर अनुभव आहे. पण तुम्हाला कोणी जोडीदार मिळाला नाही तर त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही सुखी नाही. फक्त समाजाला तसं वाटत असतं. तुम्ही सिंगल असाल तर तुमचं आयुष्य अपूर्ण आहे असं मानणं चुकीचं आहे. लग्न म्हणजेच सर्वस्व नाही. आयुष्यात अनेक शक्यता असतात. फक्त त्या शोधणं आणि त्यांचा योग्य वापर करणं जमलं पाहिजे.’’

तुमचे मित्र, नातेवाईक, आईवडिल, भावंडं आणि समान यांना कायम असं वाटतं की तुम्ही सिंगल आहात म्हणजे तुम्ही दु:खी आहात. त्यामुळे ते तुम्हाला सेटल होण्याचा सल्ला देतात. तुम्हाला लग्न करायचं नसेल किंवा तुमच्या एकटं राहण्याचं कारण काहीही असलं तरीही तुम्ही हेच मानून चाला की तुम्ही एकट्यानेही खूश राहू शकता. एकटं राहण्याचा निर्णय तेव्हाच घ्या, जेव्हा तुमच्या मनाची पूर्ण तयारी असेल.

बंधनमुक्त होण्याचा आनंद लुटा : लग्न झालं म्हणजे तुम्ही सुखीच राहाल असं काही नाही. जबाबदाऱ्यांसोबत अडचणीही आपोआप येतात. सिंगल असाल तर ना

कोणती जबाबदारी, ना कसली कमिटमेंट. मग आयुष्य साजरं करा. एखाद्या कपलला हातात हात घालून बसलेलं पाहून नाराज होऊ नका. स्वत:साठी जगा आणि मोकळा श्वास घ्या. सिंगल स्टेटसचा त्रास करून घेण्यापेक्षा तुमच्यावर कोणंतंही बंधन नाही याचा आनंद माना, तुम्ही कधीही कुठेही येऊजाऊ शकता. यासाठी फक्त स्वत:मध्ये आत्मविश्वास बाळगा आणि लोकांचं बोलणं ऐकून दु:खी होणं किंवा काही प्रतिक्रिया देणं बंद करा.

स्वत:ला वेळ द्या : तुम्हाला स्वत:साठी खूप वेळ मिळेल. विवाहित स्त्रियांच्या मनात जी अपराधीपणाची भावना असते, ती तुमच्या मनात नसेल. नवरा, मुलं, घर-कुटुंब यामुळे महिलांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. पण सिंगल असण्याचा फायदा हा आहे की तुम्ही स्वत:ला वेळ देऊ शकता. सजा, फिरा आणि आवडतं गाणं ऐका वा पुस्तक वाचा. कोणी अडवणार नाही. शिवाय एकटेपणाची भावना मनात डोकावणारही नाही. स्वत:ची ओळख करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि स्वत:ला घडवता येतं. कोणती आशा-अपेक्षा नसल्याने विरोधाभास, हेवा यांना स्थान नसते.

सोशल व्हा : स्वत:चं सोशल सर्कल बनवा. हे आवश्यक आहे कारण कंटाळा आला की पार्टीला किंवा रेस्टॉरन्टमध्ये जाता येईल. कितीही सोशल झालात तरी कोणावरही अवलंबून राहू नका की कोणी सोबत आलं तरच सिनेमा बघायला जाल किंवा लंचला जाल. कोणाच्या सोबतीची कशासाठी अपेक्षा ठेवायची? पण तरीही आपला आवाका कशासाठी वाढवत राहा. जेणेकरून गरजेच्यावेळी नि:संकोचपणे मदत मागता येईल.

संपूर्ण लक्ष करिअरवर द्या : सिंगल असाल तर करिअरवर व्यवस्थित लक्ष देऊ शकता. मेट्रो सिटीमधल्या मुली करिअर करण्यासाठी आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकटं राहणंच पसंत करतात.

एका एमएनसीमध्ये काम करणारी ३७ वर्षीय अनुभा सांगते, ‘‘मी ठरवून लग्न केलं नाही. मी सुरूवातीपासूनच माझ्या करिअरबाबत आग्रही होते आणि मला माहीत होतं की लग्नानंतर तडजोड करावी लागेल. कदाचित नोकरी सोडावी लागेल. मधे ब्रेक घेतल्याने करिअर ग्राफवर परिणाम होतो आणि प्रत्येकवेळी नव्याने सुरूवात

करावी लागते. आधीची मेहनत वाया जाते. त्यामुळे मी माझं सगळं लक्ष करिअरवर केंद्रित केलं आणि आज मी यशस्वी आहे. माझ्या या यशाचा मी संपूर्ण आनंद घेते.’’

सिंगल वूमन करिअरमध्ये जास्त यशस्वी असतात हे आता सिद्ध झालं आहे आणि आजकाल खासगी कंपन्या त्यांनाच प्राधान्य देत आहेत. कारण त्या कामासाठी जास्त वेळ देतात आणि जास्त फोकस्ड असतात. त्या मन लावून काम करतात.

छंद जोपासा : सिंगल असाल तर संपूर्ण वेळ तुमचा असतो आणि यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. बागकाम करा, बाइक चालवा किंवा गेम्सखेळा. तुम्ही हवं ते करू शकता, कोणाच्याही हस्तक्षेपाविना. कोणी असं म्हणणार नाही की हे काय वय आहे का हे सगळं करायचं? पेंटिंग करा किंवा एखादा कोर्स करा. तुम्ही एखादा तरी छंद जोपासू शकाल. स्वत:ला नवनव्या गोष्टींबद्दल अपडेट ठेवा.

आपल्या मनाचं ऐका : सायकलिंग टे्रकिंग करा. वीकेंडला लाँग राइड्सवर जा किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणं

हेच तुमचं ध्येय असायला हवं. तुम्हाला लोकांनाही हेच दाखवायचं आहे की सिंगल असूनही तुम्ही किती खूश आहात.

सोलो ट्रिपवर जा : फिरायला कोणाला नाही आवडत? कोणी अडवलंय तुम्हाला? निघा, आपल्या आवडत्या ठिकाणी, तुम्हाला हवं तसं ट्रेकिंग करायला किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये आराम करायला. खरंच तुम्हाला मजा येईल. हे नक्की करू, ते नक्की करू, अशी कसलीच किटकिट नाही. म्युझिक फेस्टिव्हलला जा किंवा नाटक पाहा. कोणीही अडवणार नाही. विवाहित महिला हे सगळं करण्याचा विचारही करू शकत नाहीत.

खरेदी करा : तुम्ही कमवत असाल तर स्वत:वर खर्च करा. स्वत:च्या पैशांनी खरेदी करण्याची मजाच वेगळी असते. स्वत:वर पैसे खर्च करताना कोणता अपराध भाव मनात नसेल, जे हवं ते खरेदी करू शकता आणि काही खरेदी करण्यासाठी कोणाचाही दबाव नसेल. जे आवडेल ते खरेदी करण्याची मोकळीक असेल. सतत इतर कुणाची तरी किंवा नवऱ्याची परवानगी घेण्यापेक्षा आपल्या मर्जीनुसार खा-प्या आणि मजा करा.

तडजोड नको : तुम्हाला कोणासाठीही आपल्या आनंदात तडजोड करावी लागणार नाही, लोक तुम्हाला स्वार्थी म्हणू शकतात. पण यात वाईट काय आहे. थोडं स्वार्थी असण्याचीही गरज आहे. कारण आयुष्य तडजोडीच्या चक्रात अडकते तेव्हा सुख कमी  दु:खच जास्त जाणवते. कुढत जगण्याचा काय फायदा? स्वत: निर्णय घ्या. अखेरीस तुमचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून का असावा? आयुष्य मोकळेपणाने जगा.

दांपत्य जीवनातील ९ वचनं

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

बदलत्या काळाबरोबर बदलही आवश्यक आहे. आजच्या युगात दांपत्य विशेषकरून नवविवाहित जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आपल्या भावना आणि विचारांचा अंदाज थोडा बदलायलाच हवा. पूर्वी विवाहाचा अर्थ फक्त प्रेम आणि त्याग होता, ज्यात बहुतेकदा स्त्रियाच पती आणि त्याच्या घर-कुटुंबासाठी समर्पित राहण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानत असत आणि त्याग व कर्तव्याची मूर्ती बनून सारे जीवन आनंदाने व्यतित करायच्या. घरकुटुंबात यामुळेच त्यांना सन्मानही मिळत असे.

पुरुष पण अशी पत्नी मिळाल्याने आनंदीत व्हायचे. त्यांची मानसिकताही स्त्रियांप्रति हीच होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही ही गोष्ट समजली आहे. आज स्त्रियाही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, प्रगती साधत आहेत.

वर-वधू लग्नाच्या वेळेस रीती-रिवाजाच्या नावावर ७ वचने घेतात आणि बहुतेक खूप लवकर विसरूनही जातात.परंतु दांपत्य सर्वेक्षणाच्या आधारावर निष्कर्षाच्या रूपातील या वचनांचा विवाहानंतरही स्विकार करा, यांना लक्षात ठेवा आणि निभवासुद्धा. दोघांनाही एकमेकांच्या कामात सहकार्याच्या रूपाने ताळमेळ बसवून चालण्याची आवश्यकता आहे, ज्यातून सगळयांच्या विचार-विमर्शातून निघालेली ही खालील वचने मोठया कामाची आहेत :

  1. जे माझे आहे ते तुझेही : लखनौऊचे आर्किटेक्ट सुहास आणि त्यांची पत्नी सीमामध्ये सुरुवातीला छोटया-छोटया गोष्टींवरून नेहमी भांडणे होत. सीमा म्हणते, ‘‘जसे माहेरून मिळालेल्या महाग बेड कव्हर, क्रॉकरी इत्यादीचा जेव्हा सुहास आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी उपयोग करायचे, तेव्हा मला अजिबात आवडायचे नाही. त्याचप्रमाणे त्यांनाही माझे नातेवाईक, मैत्रिणींद्वारे त्यांचे म्युझिक सिस्टम किंवा पुस्तके हाताळणे एकदम असह्य व्हायचे. नंतर एके दिवशी आम्ही ठरवले की जर आपण एक आहोत तर एकमेकांच्या वस्तूंचा उपयोग का नाही करायचा. त्यादिवसापासून सगळा परकेपणा दूर झाला.
  1. जसे मला आपले आई-बाबा,भाऊ-बहिण,मित्र-नातेवाईक प्रिय आहेत, तसेच तुम्हालाही आपले :
  • जयपुरचे डॉ. राजेश आणि त्यांची होममेकर पत्नी इशाने या गोष्टीचा खुलासा केला की पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा घरात समान आदर होणे आवश्यक आहे. राजेशने आपली बहिण रिमाच्या घरी आपली व आपल्या आई-बाबांची पुन्हा-पुन्हा अपमानित होण्याची घटना सांगितली. बहिण आपल्या पतिकडून होणाऱ्या अपमानजनक व्यवहारामुळे दु:खी असायची. यामुळे त्यांचे आपसातील नाते कधी गोड झाले नाही. ही तर चुकीची अपेक्षा आहे की फक्त पत्नीने पतिच्या घरच्यांचे प्रेमाने स्वागत करायचे आणि पतिने तिच्या माहेरच्या लोकांचा आदर न करता जेव्हा-तेव्हा अपमान करायचा. पतिचेही तेवढेच कर्तव्य आहे. पत्नी अर्धांगिनी आहे, जीवनसाथी आहे, गुलाम नाही.
  1. जशा माझ्या गरजा आवश्यक तशाच तुमच्याही : सुजाता एका कॉर्पोरेट ऑफिसात काम करते. नेहमी तिला घरी येण्यास उशीर होतो. घरी असतानाही तिला कधी-कधी ऑफिसचे काम करावे लागते. यावर पती विशाल चिडचिड करत असे. एके दिवशी सुजाताने त्याला बसवून चांगल्याप्रकारे समजावले की विशाल मी लग्नाच्या अगोदरच तुम्हाला सांगितले होते, तेव्हा तर तुम्हाला माझ्या चांगल्या पॅकेजपुढे सर्व स्वीकार होते. जेव्हा तुम्ही आपल्या बिझनेस मीटिंगमधून उशिरा येता तेव्हा तर माझी काही हरकत नसते. तर मग तुम्ही का समजून घेत नाही? मी नोकरी सोडू शकत नाही. आईचे प्रत्येक महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन मी थांबवू शकत नाही. नि:संदेह तुम्ही मला सोडू शकता. माझी यालाही काही हरकत नाही. मी डिवोर्ससाठी तयार आहे. मी उद्याच दुसरीकडे कोठे शिप्ट होईल.
  2. आपल्या सवयी, छंद, संस्कार जसे माझे तसेच तुमचे : पती-पत्नी वेगवेगळया परिवारातून, वेगवेगळया वातावरणातून येतात पण दुसऱ्याकडून आपल्यासारखे आचरण व राहणीमानाची अपेक्षा करतात किंवा वेगळे पाहून टर उडवतात तर हे योग्य नाही, त्यापेक्षा याचे समाधान शोधणे योग्य असते. स्कूल टीचर दीप्ती आपल्या बँक मैनेजर पती शिखरला अनवाणी पायांनी घरात फिरल्यानंतर अंथरुणात घुसण्याने वैतागत असे. तर शिखर तिचे बाहेरून कोठून आल्यावर कपडे चेंज करून अंथरुणावर टाकणे पसंत नव्हते. शेवटी एके दिवशी बसून दोघांनी समस्येचे समाधान शोधले. आता पायांच्या अस्वच्छतेपासून वाचण्यासाठी शेखरने कार्पेट अंथरले तर दीप्तीनेही शिखरचे बघून कपडे व्यवस्थित हँग करायला सुरूवात केली. त्यांचे जीवन पुन्हा सुरेल सुरावट बनली.
  3. दुसऱ्यांच्या समोर एकमेकांचे दोष किंवा टर उडवायची नाही : दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील माला पहिल्यांदा विवाहानंतर विमानयात्रा करत होती. पती अंश व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याचा एक मित्रही पत्नीसहित त्यांच्याबरोबर होता. सर्व एका तिसऱ्या मित्राच्या लग्नाला जात होते. बेल्ट बांधण्याची सूचना झाली तर मालाने घाईत जवळच्या सीटचा बेल्ट उचलला आणि लावण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून अंश हसू लागला, ‘‘अक्कल चरायला गेली आहे काय? एवढेपण कळत नाही.’’ हे बघून सर्व हसू लागले. तेव्हा मालाला खूप वाईट वाटले. मग ती म्हणाली, ‘‘तुम्हाला हसण्याऐवजी माझी मदत करायला हवी होती किंवा यांच्यासारखी श्रीमंत घरातील पत्नी आणयला हवी होती.’’ अंशला आपली चुक कळाली की त्याने असे बोलायला नको होते.

अशाचप्रकारे बरेली निवासी गीताचे भाऊ-वहिनी तिला भेटण्यासाठी आले. तेव्हा पती दिपक बाटलीनेच पाणी पित होता. त्याने गीताच्या भावालाही तीच पाण्याची बाटली ऑफर केली.

‘‘थांबा, मी ग्लास आणते. आमच्या येथे कोणी अडाण्यासारखे पाणी पित नाही,’’ गीता म्हणाली.

दिपकला तिचे म्हणणे खटकले. म्हणाला, ‘‘आणि आमच्या येथेही पतिशी असे कोणी बोलत नाही.’’

भावाने गीताला टोकले व विषय सांभाळला, नंतर दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटले आणि दुसऱ्यांच्या समोर एकमेकांची टर न उडवण्याचे आणि दोष न काढायचे वचन दिले.

  1. जशी माझी सामाजिक बांधिलकी तशीच तुमचीही : दीपांकरची पत्नी जया लग्नाच्या आधीपासूनच फार सामाजिक होती. सर्वांच्या सुखदु:खात, सणासुदीच्या प्रसंगी सामील होत आली होती. ऑफिस असो किंवा शेजारी, नातेवाईक सगळयांशी मिळून-मिसळून राहायची. आणि अजूनही राहत आहे. दीपांकरही तिला सहकार्य करतो, त्यामुळे जयासुद्धा दीपांकरच्या सामजिक नातेबंधांची काळजी घेते.
  2. जशी मला काही स्पेस हवी तशीच तुम्हालाही : पारुलने सांगितले संपूर्ण दिवस तर ती पती रवीमागे हात धुवून लागत नाही. काही वेळ त्याला एकटे सोडते, जेणेकरून तो आपले काही काम करू शकेल. पतिसुद्धा या गोष्टीची काळजी घेतो की मला स्पेस मिळावी.दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद होत नाही. दुसऱ्या दिवसाचा होमवर्कही सहज होतो. सोबत असल्यावर छान पटतं.
  3. जसे माझे काही सिक्रेट्स न सांगण्यासारखे, माझी इच्छा तशीच तुझीही : लग्नाच्या आधी काय झाले होते पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर वा त्यांच्या घर-कुटुंबात. जर ही गोष्ट कोणी सांगू इच्छित नसेल तर ठीक आहे, खोदून-खोदून का विचारावे? शंकेत वा संभ्रमात राहणे व्यर्थ आहे. कॉलेजचे इंग्रजीचे प्रोफेसर डॉ. नगेंद्र आणि त्यांची हिंदीची प्रोफेसर पत्नी नीलमचे हेच मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नात्याच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. वर्तमान बघावे, एकमेकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवावा.
  4. पॉकेटमनीच्या खर्चावर अडवणूक नको : ‘‘आमच्या दोघांच्या छान जीवनाचा हाच तर सरळ फंडा आहे. घरखर्च आम्ही सहमतीने सारखा शेअर करतो आणि पॉकेटमनीवर एकमेकांना रोखत नाही,’’ स्टेट बँक कर्मचारी प्रिया आणि तिच्या असिस्टंट मॅनेजर पती करणने आपल्या गमतीशीर गोष्टीने अजून एक महत्वाचे वचनही सांगून टाकले. तर मग आता विलंब कशाचा. लग्नाच्या वेळेस ७ वचने घेतली होती, तर लग्नानंतरही पती-पत्नी दोघांनी ही वचनं आत्मसात करावी आणि प्रेमाने हे नाते निभवावे.

घरातले काम ही दोघांची जबाबदारी

* प्रतिनिधी

नेहमी बायकांची एक तक्रार असते की त्यांचे नवरे त्यांना घरातल्या कामांमध्ये मदत करत नाहीत. ठराविक मर्यादेपर्यंत त्यांची ही तक्रार योग्यही आहे. कारण लग्नानंतर बहुतांश नवरे घरच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या तर योग्य रीतीने पार पाडताना दिसून येतात, पण जेव्हा गोष्ट स्वयंपाकघरात बायकोला मदत करण्याची असते किंवा मग घरातल्या साफसफाईची असते, तेव्हा बहुतेक नवरे  काही ना काही बहाणा करून ते काम टाळण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. म्हणायला तर पती आणि पत्नी संसार रथाची दोन चाके आहेत असे म्हटले जाते, पण जर फक्त एकाच चाकावर भार पडत असेल तर संसाराचा गाडा डगमगू लागणे स्वाभाविकच आहे.

नेहमी बायका आपल्या घरातील कामांमध्ये एवढया व्यस्त असतात की त्यांना स्वत:साठी वेळ देणेही शक्य होत नाही. अशात जर त्यांना घरातल्या कामांत पतिची मदत मिळाली तर त्यांचा भार कमी होतोच शिवाय पती पत्नीच्या नात्यातील गोडवाही वाढतो.

अशी वाटून घ्या कामे

घरातल्या कामांना तुच्छ समजणे सोडून काही कामांची जबाबदारी जर पतिने स्वत:वर घेतली तर घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. अशी अनेक कामे आहेत, जी पती आणि पत्नी वाटून घेऊ शकतात :

* किचनला लव्ह स्पॉट बनवा. बऱ्याचदा नवरे किचनमध्ये जाण्याच्या कल्पनेनेही कचरतात. पण इथे तुम्ही पत्नीसह जेवण बनवताना प्रेमाच्या एका नव्या स्वादाचाही आस्वाद घेऊ शकता. भाजी कापणे, जेवण डायनिंग टेबलवर मांडणे, पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवणे, सॅलड बनवणे अशी कामे करून तुम्ही तुमच्या पत्नीला मदत करू शकता. विश्वास ठेवा तुमच्या या छोटया छोटया कामांमुळे तुमची पत्नी मनापासून तुमची प्रशंसा करेल.

* कधीतरी सकाळी पत्नी उठण्याआधी स्वत: उठून तिच्यासाठी मस्त चहा बनवून तर पहा. तुमचा हा छोटासा प्रयत्न तिला दिवसभर आनंदी ठेवेल यात शंकाच नाही. जर पत्नीची तब्येत ठीक नसेल तर हलकाफुलका नाश्ता बनवून तिला आराम देऊ शकता.

* जर पतिने किचनमध्ये काही बनवण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना टोकू नका. किचन व्यवस्थित ठेवा. किचनमधील सर्व डब्यांना लेबल्स लावून ठेवा म्हणजे तुमचे पती प्रत्येक गोष्टीसाठी सारखेसारखे तुम्हाला विचारत राहणार नाहीत.

* जर तुमची तुमच्या पत्नीविषयी अशी तक्रार असेल की ती दिवसभर बाथरूममध्ये कपडेच धुवत बसते आणि तुम्हाला जराही वेळ देत नाही तर त्याचा सर्व दोष पत्नीला देऊ नका. सुट्टीच्या दिवशी या कामात तुम्ही तिला मदत करू शकता. कपडे ड्रायरमध्ये सुकवून ते वाळत घाला.

* बहुतेक घरांमध्ये आठवडयाची भाजी एकदाच आणून फ्रीजमध्ये ठेवली जाते. टीव्हीवर आपला फेव्हरेट शो किंवा क्रिकेट मॅच पाहण्यात रममाण झालेल्या  तुमच्या पतिराजांकडे तुम्ही मटार सोलायला देऊ शकता किंवा भाज्याही निवडायला देऊ शकता.

* तुमच्या घरातील गार्डनमधील रोपांना पाणी घालण्याचे कामही तुम्ही पतीला करायला सांगू शकता

* घरात एखादा पाळीव प्राणी असल्यास त्याला फिरायला घेऊन जाण्याची जबाबदारी दोघांनी आलटून पालटून घ्यावी.

* मुलांचा अभ्यास घेताना काही विषय तुम्ही शिकवा तर काही विषय तुमच्या पतिवर सोपवा.

* जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतिने तुम्हाला घरातल्या कामांत मदत करावी तर त्यांना प्रेमाने आणि विनम्रतेने सांगा..

थोडे पेशन्स ठेवा, हळूहळू का होईना पण एकदा का तुमचे पती तुम्हाला मदत करू लागले की त्यांनाही जाणीव होईल की तुम्ही दिवसभर किती राबत असता. पती असो किंवा पत्नी घर दोघांचं आहे त्यामुळे घरातील जबाबदारीही दोघांनी वाटून घ्यावी. मगच संसाराची गाडी छान पैकी धावू लागेल.

उजळवा इतरांच्या जीवनात दीप

* गरिमा पंकज

दिवाळीत घरोघरी दिवे लावले जातात. नातलगांना विविध प्रकारची मिठाई भेट दिली जाते. पण तुम्ही कधी दुसऱ्यांच्या घरातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे? दिवाळीच्या दिवशी असे करून जो आनंद मिळतो त्याचाही अनुभव घेऊन पाहा.

मिळून साजरी करा दिवाळी

सद्यस्थितीत कितीतरी लोक महानगराच्या गर्दीतही एकटे, एकाकी राहतात. दिवाळीत त्यांच्यासोबत आनंद साजरा करणारे कुणीच नसते. कुठे वृद्ध आईवडील एकटे राहतात तर कुठे तरुण मुले-मुली शिक्षण किंवा नोकरीनिमित्त घरापासून दूर एकटे राहतात. काही असेही असतात, जे लग्न न केल्यामुळे एकटे राहतात तर कुणी जोडीदाराच्या मृत्यूमुळे एकटे पडतात.

तसे तर प्रत्येक सोसायटी, ऑफिस किंवा इन्स्टिट्यूटमध्ये दिवाळीचा आनंद दिवाळीच्या एक दिवस आधीच साजरा केला जातो. पण महत्त्वाचे क्षण ते असतात, जेव्हा कुणी दिवाळीच्या संध्याकाळी आपल्या घरात एकाकी असतो. त्यावेळी त्याच्यासोबत इतर कुणी दिवाळी साजरी करणारा नसतो.

अशावेळी आपली जबाबदारी असते की आपण अशा एकाकी लोकांच्या जीवनात आनंदाचा दीप उजळवण्याचा प्रयत्न करायचा. तसेही सध्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या अभावामुळे लोक एकटेच आपल्या छोटयाशा कुटुंबासह दिवाळी साजरी करतात. अशावेळी दोन-तीन कुटुंबातील लोक सण साजरा करण्यासाठी एकत्र आले तर निश्चितच दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.

तुम्ही तुमच्या आजूबाजूला एकटया राहणाऱ्या वृद्धांना किंवा तरुणांना आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. त्यांच्यासह मिळून दिवे लावा. फटाके वाजवा आणि एकमेकांना मिठाई भरवा.

कुणाच्या घरी दिवाळी साजरी करायला येणाऱ्यानेही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ज्याने तुम्हाला आमंत्रण दिले आहे त्याच्या कुटुंबासाठी मिठाई, फटाके घेऊन जा. त्याचे घर सजवालया मदत करा. त्याच्या मुलांना आपल्या घरी घेऊन या, जेणेकरून दिवाळीची मजा आणि रंगत तुम्ही तुमच्या घरातही अनुभवू शकाल.

वृद्धांसोबत मजा

पत्रकार प्रियाने सांगितले ‘‘जेव्हा मी नोकरीसाठी पहिल्यांदाच दिल्लीत आले होते तेव्हा ३ वर्षं एनडीएमसीच्या एका हॉस्टेलमध्ये राहत होते. तेथेच बाजूला एनडीएमसीचा वृद्धाश्रम होता जिथे वृद्ध, एकाकी महिला राहत होत्या. मी अनेकदा त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचे, त्यांच्यासोबत टीव्ही पाहायचे, खाण्यापिण्याचे पदार्थ शेअर करायचे. अनेक वृद्ध महिलांशी माझे जिव्हाळयाचे नाते निर्माण झाले होते. गेल्या दिवाळीत मी माझे घर सजवत होते., तेव्हा अचानक त्या वृद्ध महिलांची आठवण झाली. मग काय, मी सजावटीचे काही सामान, फटाके आणि मिठाई घेऊन तेथे पोहोचली. मला पाहाताच त्यांचा उदास चेहरा आनंदाने फुलला. वृद्धाश्रमाचा बाहेरील भाग मी खूप चांगल्याप्रकारे सजवला. त्यांना मिठाई भरवली. त्यांच्यासोबत फटाके वाजवले. खरंच खूप मजा आली.

एक वृद्ध महिला जिची मी खास होते, ती माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेली. माझ्या आवडीचा खूपच छान ड्रेस तिने मला दिला.

मी तिथे केवळ दोनच तास होते पण तरीही ती दिवाळी माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी ठरली.

आप्तजनांना गमावलेल्यांच्या जीवनात आशेचे दीप उजळवा

आपल्या ओळखीचे, शेजारी, नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे असे कुटुंब, जिथे नुकतीच एखादी दु:खद घटना, मृत्यू, पोलीस केस, हत्या किंवा कुटुंबात फूट पडली असेल तर दिवाळीत अशा कुटुंबाला नक्की भेट द्या. कुटुंबातील लोकांच्या मनात आशेचे दीप उजळवा आणि सांगा की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहाल.

अनोळखी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणा

तुमच्या ऑफिसमधील सहकारी, क्लाइंट, नातलग आणि अन्य ओळखीचे या दिवसांत मिठाई नक्कीच देतात. गरजेपेक्षा जास्त मिठाई आल्यास ती पॅक करून गरजूंना वाटा. यामुळे त्यांचा चेहरा आंनदी होईल आणि तो पाहून नक्कीच तुम्हीही आनंदित व्हाल.

स्वयंसेवक बना

दररोज कितीतर लोक दिवाळीच्या रात्री दुर्घटनेचे शिकार होतात. फटाक्यांमुळे भाजतात. ही वेळ अशी असते, जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखणे खूपच कठीण असते. अशावेळी स्वयंसेवक बनून जळालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आलात तर तुमची ही मदत पीडित व्यक्तिच्या घरात नवा प्रकाश पसरवण्याइतकीच सुखावह ठरेल.

दिवाळीत कर्तव्य बजावणाऱ्या लोकांना प्रोत्साहन

कितीतरी लोकांचे काम असे असते, ज्यांना दिवाळीतही सुट्टी मिळत नाही, जसे की वॉचमेन, पोलीस इत्यादी. ते तुमच्या सुरक्षेसाठी अव्याहत कार्यरत असतात. याची तुम्हालाही जाणीव आहे हे सांगून त्यांना चॉकलेट, भेटकार्डसारख्या वस्तूंसह दिवाळीच्या शुभेच्छा द्या. तुमचा हा प्रयत्न आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य त्यांच्याही चेहऱ्यावर आंनद घेऊन येईल.

गरजेच्या वस्तू इतरांना द्या

दिवाळीत घराची साफसफाई करताना अनेकदा आपण नको असलेल्या बऱ्याच वस्तू फेकून देतो. त्या फेकण्याऐवजी त्यांना द्या, ज्यांना याची गरज आहे. ४५ वर्षीय शिक्षिका दीपान्विता यांनी सांगितले, ‘‘आमची कामवाली जवळपास १५ वर्षांपासून आमच्याकडे काम करते.  दरवर्षी मी दिवाळीत घराची साफसफाई करते, तेव्हा बऱ्याच अशा वस्तू सापडतात, ज्या भलेही माझ्यासाठी जुन्या किंवा निरुपयोगी असतात, पण तिच्या उपयोगी येऊ शकतात. त्यामुळे अशा वस्तू गोळा करून तिला देते.’’

यातील एखादी तरी गोष्ट आचरणात आणल्यास हा सण तुमच्यासाठी संस्मरणीय ठरेल.

रुसला साजण रुसवा काढेल सण…

* प्रतिनिधी

‘‘रूठे रुठे पिया मनाऊ कैसे’ नाराज पतीराजांकडे एक प्रेमभरा कटाक्ष टाका आणि प्रेमाने त्यांना आपल्या बाहुपाशात येण्याचं निमंत्रण द्या. मग पहा मनातल्या निरगाठी कशा उकलतात ते. प्रेमाने आसुसून त्यांनी बाहुपाशात घेतलं की सुरुवातीच्या रोमॅण्टिक दिवसांतल्या मधुर क्षणांच्या आठवणी ताज्यातवान्या होतील. या विचारात हरवून गेलेली सजणी रुसलेल्या प्रियतमाचा रुसवा काढण्यासाठी काही ना काही अल्लड आणि खट्याळ खोड्या करण्यात गुंतून जाते.

तसं तर रुसणं हा तर स्त्रियांचा स्वभावधर्म. पण पतीराज नाराज झाले तर त्यांचा रुसवा काढायचं कसब तिच्याकडे नक्कीच आहे. निसर्गाने स्त्रिला अनेक कौशल्य प्रदान केली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे त्या प्रेमाने आणि आपलेपणाने सर्वांचं मन जिंकून घेतात. याच कौशल्यामुळे त्यांचे वैवाहिक संबंधही मधुर बनतात. पण पतीराजांची नाराजी जास्तच वाढलेली असेल तर त्यांचा रुसवा काढण्याच्या सर्व युक्त्या असफल होतात. अशा वेळी सणासुदीच्याप्रसंगी एकमेकांना बांधून ठेवणाऱ्या प्रेमाची जाणीव पतीराजाना करून द्या. मग पहा, ते आपणहून तुमच्या जवळ कसे येतात ते.

रम्य सकाळ तुमच्यासाठी

सकाळी डोळे उघडण्यापूर्वी तुमचा प्रेमळ स्पर्श आणि मग तुमच्या नुकत्याच न्हायलेल्या केसांतून पाण्याचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर पडणं आणि डोळे उघडत असतानाच कपाळावर उमटलेली तुमच्या प्रेमाची मोहर या सर्वांमुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी प्रसन्न होते ते पहा. सणासुदीच्या उत्साहाने आणि उल्हासाने त्यांचं मन आनंदाने भरून जाईल.

ते बेडवरून उठताक्षणी अशा नखऱ्याने त्यांना गुलाबाचं फूल द्या जणू काही एखादी प्रेमिका पहिल्यांदाच आपलं प्रेम व्यक्त करत आहे. अशा प्रकारे सकाळी लवकर त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या. शयनगृहाच्या भिंतीवर लावलेल्या रंगीत कागदावर मोठ्या अक्षरात काही प्रेमळ ओळी लिहा. जसं की, ‘दिवाळीच्या पहिल्या शुभकामना माझ्या प्रिय पतीराजाना किंवा ‘सणासुदीच्या या रम्य सकाळी माझ्या प्रियतमाला मन:पूर्वक शुभेच्छा.’ तुमच्या या प्रेमळ शब्दांमुळे त्यांना जाणीव होईल की, त्यांच्या मनात सर्वप्रथम स्थान त्यांच्या पतीराजांना आहे, त्यानंतर अन्य नात्यांना.

उत्सवाची शोभा

दिवाळीच्या दिवशी सकाळी दारासमोर काढलेल्या रांगोळीत प्रेमाचे रंग अशा प्रकारे भरा की, तुमच्या प्रियतमाला रांगोळी पाहताक्षणी त्याची जाणीव होईल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि दिवाणखान्याच्या मध्यावर सुंदर नक्षीकामाची रांगोळी काढा. बेडरूममध्येही प्रेमाचा संकेत देणारी दोन पक्ष्यांची जोडी किंवा दोन एकत्र जोडलेल्या हृदयाच्या आकाराची रांगोळी काढा. एकाबाजूला तुमचं नाव लिहा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं. तेव्हा ते तुमची कलाकुसर पाहतील. तुमची कल्पना पाहतील तेव्हा तुमचं कौतुक केल्यावाचून ते राहूच शकणार नाहीत.

सणासुदीचं मिष्टान्न बनवताना त्यांच्या आवडीनिवडीची संपूर्ण काळजी घ्या. नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत तऱ्हतऱ्हेचे असे पदार्थ बनवा की, पाहूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि त्यांचा मनमोरही थुईथुई नाचू लागेल.

उत्सवाचा आनंद तुमच्याचमुळे तुम्ही स्वत: त्यांच्या आणि त्यांना तुमच्या प्रत्येक सुखदु:खात सामील करण्याचं वचन द्या. आपला प्रत्येक आनंद पतीसोबत वाटून  घेण्याचा तुमचा निर्णय तुमच्या प्रत्येक कामातून आणि लहानमोठ्या निर्णयातून दिसून यायला हवा.

सणासुदीच्या काळात सर्व कुटुंबियांनी जर एकत्र बाहेर जायचा कार्यक्रम बनवला असेल आणि त्यांनी यायला नकार दिला तर तुम्हीही इतर कुटुंबियांसोबत न जाता त्यांच्यासोबत थांबा. साहजिकच ते विचार करायला विवश होतील की तुमचा आनंद त्यांच्याशिवाय अर्थहीन आहे.

जर यावेळी पतीराजांनी सणासाठी खास बजेट बनवलं असेल आणि मर्यादित रक्कमच खर्च करायची ठरवलं असेल तर फालतू खर्च न करता त्यांपेक्षाही कमी पैशात सण साजरा करून दाखवा.

जर दिवाळीनिमित्त घरात पूर्वनियोजित मेजवानी ठरली असेल आणि जर अचानक एखाद्या महत्वाच्या कामासाठी त्यांना मोठी रक्कम खर्च करावी लागली असेल तर घराचा मानमरातब जपण्यासाठी तुम्ही तुमच्या बचतीपैकी काही रक्कम आपल्या पतीला दया. यामुळे त्यांना अंधाऱ्या रात्री दीप उजळल्याचा भास होईल. सासुसासऱ्यांचा मानसन्मान आणि कुटुंबियांसोबत योग्य ताळमेळ राखत आपलेपणाने घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळा आणि उत्सवाचंही उत्तम नियोजन करा. मग तेही मनातल्या मनात आपल्या पत्नीचं कौतुक करून भांडणाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतील.

चमचमती संध्याकाळ तुमच्याच नावे

तसं तर तुमची प्रत्येकच संध्याकाळ पतीराजांच्या सानिध्यातच असते. तुमच्या केवळ अस्तित्वामुळे त्यांचा दिवसभराचा त्रास आणि ताणतणाव दूर पळतो आणि त्यांना आराम वाटतो.

परंतु दिवाळीच्या संध्याकाळी जर ते उत्सवाच्या आनंदापासून दूर आपल्या खोलीत बसून राहिले असतील, ऑफिसच्या कामात, पुस्तक वाचण्यात किंवा टीव्ही पाहण्यात मग्न असतील. तर तुमच्या नखऱ्यांनी त्यांना असं काही घायाळ करा की ते आपोआपच तुमच्याकडे ओढले जातील.

दिवाळीचं आनंदी वातावरण, दिव्यांचा झगमगाट आणि फटाक्यांची आतषबाजी यासर्वांमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही त्यांची मनपसंत साडी नेसा, ज्यांमध्ये तुम्ही सर्वात सुंदर दिसता.

तयार होताना त्यांना तुमच्या केसात फुलं माळायला सांगा आणि ते जवळ येताच त्यांच्या कपड्यावर अत्तर शिंपडून फुलांचा वर्षाव करा. मग पहा, तुमच्या या प्रेमळ नखऱ्याने ते कसे घायाळ होतात ते. त्यांच्या आवडीच्या साडीमध्ये उजळलेलं तुमचं रूप पहायला ते उत्सुक होतील.

दिव्यांच्या झगमगाटात नववधूसारख्या सजलेल्या संध्याकाळी रात्र होता होता तुमच्या नजरेने काही बोलत बेडरूमध्ये एकांतात म्युझिक सिस्टिमवर एखादं रोमॅण्टिक गाणं लावा. मग सगळा रुसवा, नाराजी विसरून तेही तुम्हाला आपल्या बाहुपाशात घेतील.

उपाय स्वीकारून नाती अधिक दृढ करा

* अनुराधा गुप्ता

नात्यांना अधिक दृढ करण्यासाठी काही असे उपाय करा जे तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये गोडवा भरून ते अधिक सुखद करतील.

कौटुंबिक नाती

सर्वप्रथम आपण कौटुंबिक नात्यांबद्दल बोलूया जी आपल्याला वारसाने मिळतात आणि जी एखाद्या संपत्तीपेक्षा अधिक असतात. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा काही 10 पद्धती सांगतो ज्यामुळे तुम्ही तुमची कौटुंबिक नाती अधिक दृढ करू शकाल :

1) प्रपंच सोडा : प्रपंच खूपच खमंग शब्द आहे. लोक याचा मिटक्या मारत वापर करत असतात. उदाहरणार्थ. सुनेच्या भावाने आंतरजातीय लग्न केलं. मग काय सुनेला लोकांना उत्तर देणं कठीण होऊन बसतं. सासूबाई तर त्यांच्या संस्काराची उदाहरणं देऊन देऊन सुनेच्या माहेरच्या लोकांना नावे ठेवण्यात गर्क झाल्या.

अहो, ही गोष्ट एवढा इश्यू बनविण्याची मूळात गरजेचं काय? आंतरजातीय लग्न कोणता गुन्हा तर नाहीए ना. हा, एक आहे तो म्हणजे तुमच्या समाजातील लोक ही गोष्ट पचवू शकत नाहीत. परंतु सून तर तुमच्याच घरची आहे. तिच्या सुखदु:खात सहभागी होणं तुमचं कर्तव्य आहे, जे तुम्ही प्रपंचाच्या नादात उडवत आहात. तुम्हाला काय वाटलं की प्रपंच केल्याने तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत मोठं बनता आणि समोरच्याला दुसऱ्यांच्या नजरेतून कमी करता. तसं नाहीए उलट यामुळे तुमचीच पत कमी होते. तुमच्याच कुटुंबाची खिल्ली उडते, ज्यामध्ये तुमचादेखील समावेश होतो.

म्हणूनच या रोगापासून स्वत:ला कसे मुक्त कराल आणि दुसऱ्यांना कोणता सल्ला द्याल हे नक्की ठरवा.

2) तुमचं कर्तव्य समजून घ्या : कर्तव्याचा अर्थ केवळ आईवडिलांची सेवा करणं एवढंच नाहीए, उलट तुमच्या मुलांबद्दलदेखील तुमची काही कर्तव्य असतात. अलीकडचे आईवडील आधुनिकतेच्या चादरीने लपेटलेले आहेत. मुलांना जन्म देणं आणि त्यांना सुखसुविधा देण्यातच ते आपली जबाबदारी मानतात. परंतु यापेक्षादेखील ते स्वत:;चा वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व देतात. अशावेळी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही एक आदर्श आईबाबा नाही आहात. परंतु या वर्षात तुम्हीदेखील आदर्श होण्याचा किताब मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला तुमची कर्तव्य अधिक योग्यतेने अमलात आणायला हवीत.

3) खोट्याचा आधार घेऊ नका : अनेकदा पाहाण्यात आलंय की आपल्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी, स्वत:चा बडेजाव मिरवण्यासाठी वा आपली चूक लपविण्यासाठी लोक खोट्याचा आधार घेतात. एकत्रित कुटुंबपद्धतीत या गोष्टी अधिक पाहायला मिळतात. कारण एकमेकांमध्ये स्वत:ला अधिक योग्य सिद्ध करण्याच्या नादात लोकांकडून चुकादेखील होतात. परंतु हे नकारात्मक पद्धतीने घेण्याऐवजी सकारात्मक रीतीने घ्यायला हवं. जेव्हा तुम्ही अशी विचारसरणी ठेवाल तेव्हा खोटं बोलण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. यावर्षी विचारात सकारात्मकता आणा. यामुळे कौटुंबिक नात्यांसोबत तुमचं व्यक्तिमत्त्वदेखील उजळून निघेल.

4) आर्थिक वितुष्टापासून दूर राहा : आधुनिकतेच्या काळात लोकांनी नात्यांनादेखील पैशाच्या तराजूतून तोलायला सुरुवात केलीय. नात्यांमध्ये अनेकदा एखाद्या समारंभाच्या नावाखाली पैसा उधळण्याची प्रथा आहे. लग्नासारख्या समारंभाचंच घ्या ना. इथे शगुन म्हणून पाकीट देण्याची आणि घेण्याची प्रथा आहे. या पाकिटांमध्ये पैसे ठेवून नातेवाइकांना दिले जातात. जो जेवढे पैसे देतो त्यालादेखील तेवढेच पैसे परत देऊन व्यवहार पूर्ण केला जातो. परंतु जी नाती पैशांच्या आधारावर बनतात वा बिघडतात त्यांचा काहीच फायदा नसतो. यावर्षी ठरवा की नात्यांमधील आर्थिक गोष्टीवरून निर्माण होणाऱ्या वितुष्टांपासून दूर राहायचं, तरच नात्यांना भावनांनी जुळवू शकाल.

5) अभिव्यक्तीस्वातंत्र्य : अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा उल्लेख आपल्या देशाच्या घटनेतदेखील केला गेलाय. परंतु कुटुंबाच्या घटनेत हा हक्क थोड्याच लोकांना दिलेला आहे, जो खूपच चुकीचा आहे. आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क प्रत्येकाला द्यायला हवा. अनेकदा आपण समोरच्यांचं म्हणणंच ऐकून घेत नाही. वा त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. मुळातील साधेपणामुळे ती व्यक्ती दबलीदेखील जाते. परंतु यामुळे नुकसान तुमचंच होतं. कारण तो तुम्हाला योग्य सल्लादेखील देत असतो, परंतु तुम्ही त्याचं ऐकत नाही आणि स्वत:चंच म्हणणं खरं करत राहाता. अशामध्ये खरं आणि खोट्यातील अंतर तुम्ही कधीच समजू शकणार नाहीत. म्हणूनच यावर्षांपासून ठरवा की घरात स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा मोठं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जाईल.

सामाजिक नाती : समतोल आणि सुखद आयुष्य जगण्यासाठी कौटुंबिक नात्यांबरोबरच सामाजिक नातीदेखील दृढ बनविणं गरजेचं आहे. चला तर मग आम्ही सांगतो तुम्हाला सामाजिक नाती योग्य बनविण्याच्या ५ पद्धती :

6) ईगोचा त्याग करा : ईगो खूपच लहान परंतु खूपच खतरनाक शब्द आहे. ईगो माणसांवर तेव्हा हावी होतो जेव्हा तो स्वत:च्यापुढे समोरच्याला तुच्छ समजतो, त्याला दु:ख देऊ पाहातो वा त्याचा आत्मविश्वास डळमळीत करू पाहातो. अनेकदा कार्यालयात काम करणाऱ्या साथीदारांमध्ये ईगोची भिंत उभारलेली असते. अशा परिस्थितीत अनेकदा ते अशी पावलं उचलतात ज्यामुळे ते त्यांची प्रतिमा मलिन करतात वा ते समोरच्यांचं बरंचसं नुकसान करण्यात यशस्वी होतात. परंतु ईगो तुम्हाला मोठेपणा देऊ शकतो का? कदाचित नाही. तो तुमच्याकडून नेहमी वाईट काम करवून घेतो. तुम्हाला वाईट माणसांच्या श्रेणीत आणतो. तर मग ज्यामुळे तुमचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं, अशा ईगोचा काय उपयोग? यावर्षी ठरवूनच टाका की ईगोचं नामोनिशाण तुमच्या व्यक्तिमत्त्वावरून मिटवून टाकाल आणि दुसऱ्यांचं वाईट करण्याऐवजी तुमचं व्यक्तिमत्त्व उजळविण्यात वेळ खर्च कराल.

7) मदतनीस व्हा : माणूस एक सामाजिक प्राणी आहे आणि नेहमी समूहाने राहात आलाय. या समूहात अनेक लोक याचे जाणकार असतात, तर काही अनभिज्ञदेखील असतात. परंतु मदत एक अशी प्रक्रिया आहे जी मनुष्याला मनुष्यानेच जोडते. एखाद्याच्या त्रासात त्याला सोबत करणं वा त्याला कधीही मदत करणं हे एक माणूस या नात्याने आपलं कर्तव्य आहे.

8) पुण्य नाही कर्तव्य समजा : धार्मिक ग्रंथांमध्ये पुण्य कमावणं एक मोठं व्याख्यान आहे. अनेकदा लोक पुण्य कमावण्याची संधी म्हणून एखाद्याला मदत करतात. परंतु जिथे पुण्य कमावण्याची संधी दिसत नाही तिथे ते ढुंकूनही पाहात नाहीत. असं म्हणतात की भुकेलेल्या आणि तहानलेल्या माणसाला खायला घालण्याने पुण्य मिळतं. हे पुण्य कमावण्यासाठी लाखों रूपये खर्चून भंडाऱ्याचं आयोजन करतात. मात्र दुसरीकडे हिच लोक वाटेतील गरीब भुकेलेल्या मुलाला २ भाकऱ्या देण्याऐवजी हाकलून देतात. उलट एखाद्या भुकेलेल्याला खायला घालणं हे पुण्य नाही तर तुमचं कर्तव्य आहे. अशाप्रकारे धर्माच्या नावाखाली वा त्याचा आधार घेऊन एखाद्या खास दिवसाची वाट पाहून एखादं कार्य करण्याऐवजी गरजवंताला पाहाताच त्याला आधार द्या आणि हे तुमचं कर्तव्य समजा. तर यावर्षी प्रतिज्ञा करा की काम पुण्य नाही तर कर्तव्य समजून कराल.

9) खुल्या मनाने मोठा विचार करा : यावर्षी तुमच्या विचारसरणीचा विस्तार करा. असं केल्यावर तुम्हाला आढळेल की तुमच्यापेक्षा अधिक समाधानी आणि चिंतामुक्त मनुष्य दुसरा कोणीही नाहीए. अशी अनेक लोक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला मिळतील जी स्वत:चा वेळ फक्त दुसऱ्यांबद्दल विचार करण्यासाठीच खर्च करतात. त्यांना प्रत्येक वेळी हेच वाटतं की त्यांच्या बाबतीत कोणीतरी चुकीचं करतंय वा बोलतंय. परंतु जरा विचार करा, या धावपळीच्या युगात कोणाकडेही दुसऱ्यासाठी विचार करायला तरी वेळ आहे का? तर नाही आहे. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्याबद्दल विचार करा आणि कोणाचंही नुकसान न करता आपल्या फायद्याचं काम करा.

10) सन्मान द्या आणि सन्मान मिळवा : अनेक लोक जेव्हा एकाद्या मोठ्या स्तरावर पोहोचतात तेव्हा ते नेहमी आपल्यापेक्षा छोट्या स्तरावरच्या लोकांकडे कुत्सितपणे पाहू लागतात. अनेकदा कार्यालयांत असं होतं की स्वत:ला सीनिअर म्हणवून घेण्याच्या नादात लोक आपल्यापेक्षा खालच्या पदावरच्यांचं शोषण आणि अपमान करायला सुरुवात करतात. परंतु तुम्ही ही म्हण ऐकलीच असेल की चिखलात दगड टाकल्यास त्याचे शिंतोंडे आपल्यावरदेखील उडतातच. अशाप्रकारे अपमान करण्याऱ्यांनादेखील अपमानच मिळतो. म्हणूनच यावर्षी ठरवून टाका की कोणतीही स्थिती व परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांशी सन्मानपूर्वकच वागा

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें