शरीराची दुर्गंधी आता नाही

– पारूल भटनागर

नेहा खूपच सुंदर होती व नेहमी युनिक स्टाईल परिधान करणे पसंत करायची, परंतु तरीदेखील तिच्या मैत्रिणी तिच्याजवळ जास्त वेळ बसणे टाळायच्या. ती मनातल्या मनात विचार करायची की मी तर सर्वांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनव्या स्टाईल परिधान करते, परंतु तरीदेखील सगळया माझ्यापासून पळ काढतात.

एक दिवस जेव्हा तिने वैतागून स्नेहाला याचे कारण विचारले, तेव्हा तिने म्हटले की तुझ्या शरीरातून खूप दुर्गंध येते, जी कोणीही सहन करणे अवघड आहे. त्यामुळे सगळेजण तुझ्यापासून दूर पळतात. तेव्हा कुठे नेहाच्या खरी समस्या लक्षात आली व तिने या समस्येच्या निराकरणाविषयी माहिती घेतली, जेणेकरून तिच्या शरीराची दुर्गंधी तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कमी करणार नाही.

काय आहे शरीराची दुर्गंध

शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी शरीरातून घाम बाहेर पडतो. तसं बघता घामासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. यात प्रमुख आहेत बॅक्टेरिया. यामुळेच नेहमी शरीरातून दुर्गंधी येते. बॅक्टेरिया अॅपोक्राईन ग्रंथीच्या उत्सर्जनातून विकसित होतात. हे अमिनो अॅसिडची निर्मिती करतात. परिणामी दुर्गंधीयुक्त गंध येतो.

दुर्गंध घालवण्यासाठीचे घरगुती उपाय

बेकिंग सोडा : हा त्वचेतून मॉईश्चर शोषून घेण्यासोबतच दुर्गंध दूर करतो. सोबतच हा बॅक्टेरिया नष्ट करून नैसर्गिक सुवासासारखे काम करतो.

कसे लावावे : एक चमचा बेकिंग सोडयामध्ये एक चमचा लिंबाचा रस    मिसळून तो काख व त्या जागी लावा, जिथे जास्त घाम येतो. नंतर थोडयावेळाने पाण्याने धुवावे. असे काही आठवडयांपर्यंत रोज करावे.

अॅपल साइडर विनेगर : हा बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अतिशय अॅक्टिव्ह इन्ग्रीडियंट आहे. सोबतच हा त्वचेचा पीएच बॅलन्स संतुलित ठेवून शरीराची दुर्गंधी कमी करण्याचे काम करतो.

कसे लावावे : अॅपल साइडर विनेगरमध्ये कापसाचा बोळा घालून तो काखेमध्ये चोळावा. नंतर दोन ते तीन मिनिटांनी धुवावे. असे रोज दोन वेळा करावे.

लिंबाचा रस : याचा अॅसिडिक गुणधर्म त्वचेच्या पीएच लेवलला कमी करतो, ज्यामुळे दुर्गंध निर्मिती करणारा बॅक्टेरिया वाढू शकत नाही.

कसे लावावे : लिंबू कापून त्याचा एक भाग काखेवर चांगला रगडावा व नंतर ते धुवावे. ही प्रक्रिया रोज तोपर्यंत करावी, जोपर्यंत दुर्गंधी निघून जात नाही.

रोजमेरी : यात सुगंधाचा नैसर्गिक गुण असल्याकारणाने हा दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्याचे काम करतो.

कसे लावावे : चार कप गरम पाण्यात अर्धा कप वाळलेली रोज मेरीची पाने घालून दहा मिनिटे ठेवावे. नंतर हे पाण्यात घालून अंघोळ करावी. ही प्रक्रिया रोज केल्याने दुर्गंधी निघून जाईल.

टी ट्री ऑईल : टी ट्री ऑईलमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हे त्वचेत असणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करते.

कसे लावावे : दोन चमचे पाण्यात दोन थेंब ऑइल घालून काखेवर लावावे. तुम्ही या मिश्रणाला स्प्रे बॉटलमध्येदेखील भरून ठेवू शकता. यामुळे शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका होते.

या गोष्टींचीदेखील विशेष काळजी घ्यावी

* जेव्हा तुम्ही शॉवर घ्याल, तेव्हा प्रयत्न करा की एक वेळेस कोमट पाण्यानेदेखील अंघोळ करावी, कारण हे आपल्या त्वचेत लपलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करते.

* नॅचरल फायबरचे कपडे परिधान करावेत, कारण यात हवा खेळती राहते, ज्याने घाम साठत नाही.

* एका संशोधनानुसार लसूण, कढीलिंब वा अन्य मसाले तुमच्या घामाचा वास वाढवू शकतात. त्यामुळे मसालेदार न खाण्याचे पथ्य पाळावे.

* आपल्या काखेतील केस वेळोवेळी साफ करत रहावेत, कारण केस असल्याने घाम शोषण्याची प्रक्रिया मंदावते, ज्याने शरीरातून दुर्गंधी येते.

* रोज आपली काख अँटी बॅक्टेरियल साबणाने स्वच्छ करावी, कारण यामुळे बॅक्टेरियाच्या संख्येत घट होते व शरीरातून दुर्गंधी येत नाही.

* जेव्हा तुम्ही अंघोळ कराल, तेव्हा आपल्या शरीराला चांगल्या रीतीने पूसा, विशेषत: त्याजागी जिथे सर्वात जास्त घाम साठतो.

* उन्हाळयात जास्त घाम आल्याकारणाने कपडे लवकर ओले होतात, जे जास्त वेळ घातल्याने दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे ते बदलावेत.

* आवडीचा सुवास असणाऱ्या परफ्युम्सना आपल्या पर्सनॅलिटीचा भाग जरूर बनवा. यामुळे शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका तर होईलच, तुम्हालाही ताजेतवाने वाटेल.

हनिमून सिस्टाइटिस किडनीसाठी धोकादायक

– डॉ. विपिन त्यागी, कंसल्टंट युरोलॉजिस्ट अॅन्ड रोबोटिक सर्जन,  गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली

ज्या महिला नियमित लैंगिक संबंध ठेवतात, त्यांच्या ब्लॅडरमध्ये मोठ्या संख्येने बॅक्टेरिया जातात. सतत लैंगिक संबंध ठेवून झालेल्या संसर्गाला हनिमून सिस्टाइटिस म्हटले जाते.

युरिनरी ट्रॅक्ट संसर्ग यूटीआय, युरेथरा (मूत्रनळी) ब्लॅडर (मूत्राशय), युरेटर्स (मूत्रवाहिनी) आणि किडनी (मूत्रपिंड) यांच्या संसर्गाला म्हणतात. हे शरीराचे ते भाग आहेत, ज्यांमधून मूत्र शरीराबाहेर येते. युटीआयमध्ये मूत्रमार्गाचा कुठलाही भाग बाधित होऊ शकतो. यूरिनरी ट्रॅक्टचा संसर्ग जितक्या वर असेल तितकाच तो गंभीर असतो. यानुसार यूटीआयचे अपर आणि लोअर असे वर्गीकरण केले आहे. यूटीआय संक्रमण गंभीर होऊन डीहायडे्रशन, सेप्सिस, किडनी फेल्युअरचे कारण बनू शकते.

या संसर्गाचा धोका अशा महिलांमध्ये जास्त असतो :

* ज्या गर्भनिरोधक म्हणून डायफ्राम किंवा स्पर्मिसीडलचा वापर करतात.

* ज्यांच्या यूरिनरी ट्रॅक्टमध्ये बाधा निर्माण होते जसे की मूतखडा होणे.

* एखाद्या आरोग्याशी संबंधित समस्येमुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामे होत नाही. उदाहरणार्थ स्पायनल कॉर्ड इंजुरी.

* ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल. एड्स, डायबिटिज, अवयव प्रत्यारोपण करून घेणारे रूग्ण आणि असे रूग्ण ज्यांच्यामध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी केमोथेरपी केली गेली असेल अशांचा समावेश आहे.

* वयस्क लोक आणि मुलांमध्येही याचा धोका निर्माण होऊ शकतो, कारण ते त्यांचे गुप्त अवयव व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाहीत.

महिलाच अधिक बळी का पडतात

* महिलांमध्ये युरेथराची लांबी पुरूषांच्या तुलनेत कमी असते. यामुळे बॅक्टेरिया तिथे सहज पोहचतात.

* महिलांमध्ये युरेथरा गुदमार्गाच्या जास्त जवळ असते. यामुळे गुदमार्गातील बॅक्टेरिया युरेथरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. लैंगिक संबंधादरम्यान बॅक्टेरिया युरेथरामध्ये पोहोचण्याची शक्यता अधिक असते.

* गर्भनिरोधक म्हणून डायफ्राम वापरल्याने युरेथरावर दबाव येतो. यामुळे ब्लॅडरमधील मूत्र पूर्णपणे रिकामे होत नाही. जेव्हा ब्लॅडरमध्ये थोडे मूत्र शिल्लक राहते, तेव्हा त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ लागतात आणि संसर्गाचा धोका वाढतो.

* मेनोपॉजनंतर यूटीआय संसर्गाचा धोका वाढतो. कारण अॅस्ट्रोजन हार्मोन्सची कमी झाल्यामुळे व्हजायना युरेथरा आणि ब्लॅडरच्या खालच्या भागातील पेशी पातळ आणि कमकुवत होतात.

या तुलनेत पुरूषांमध्ये युटीआयचा धोका कमी असतो. कारण त्यांचा युरेथरा लांब असतो आणि विरोध करण्यासाठी बनणारे द्रव्य बॅक्टेरियाशी लढण्यास सक्षम असतात.

युटीआय थांबवण्यासाठी काही टीप्स

* बऱ्याच प्रमाणात पाणी किंवा द्रव्य पदार्थ घ्यावेत. यामुळे तुम्ही जितक्या वेळा लघवी कराल, बॅक्टेरिया शरीरातून बाहेर फेकले जातील.

* लघवी कधीही थांबवू नये.

* मलमूत्र विसर्जन केल्यानंतर पुढून मागच्या बाजूने धुवावे, मागून पुढच्या बाजूने धुवू नये. यामुळे गुदमार्गाजवळील बॅक्टेरिया व्हजायना आणि युरेथरापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होईल.

* लैंगिक संबंध झाल्यानंतर गुप्त अंग धुवून स्वच्छ करावे व लघवी करावी म्हणजे बॅक्टेरिया शरीरातून बाहेर निघून जातील.

* जर डायफ्रामच संसर्गाचे कारण असेल तर गर्भनिरोधक म्हणून इतर साधनांचा वापर करावा.

* कोणाही प्रौढ व्यक्तीमध्ये किंवा मुलांमध्ये ही युरेनरी ट्रॅक्ट संसर्गाशी लक्षणे आढळली तर लक्षणे दिसल्याच्या २४ तासांच्या आत डॉक्टरांना भेटा.

* डॉक्टरांनी अॅण्टीबायोटिकचा कोर्स दिल्यास तो पूर्ण करा व बरे वाटत असले तरीही उपाचार सुरू ठेवा.

* कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. यामुळे ब्लॅटरला त्रास होतो.

* धुम्रपानही करू नये. यामुळेही ब्लॅडरला हानी निर्माण होते.

उपचार

प्रोस्टेट बरे करण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध आहेत. यात औषधे, थेरेपी आणि सर्जरीचा समावेश होतो. कोणते उपचार योग्य ठरतील हे अनेक गोष्टींवर अवलबूंन असते. जसे की प्रोटेस्टचा आकार काय आहे, रूग्णांचं वय, रूग्णांचं पूर्ण शरीर स्वास्थ तसेच लक्षणे किती गंभीर आहेत इ.

जर लक्षणे अधिक गंभीर नसतील तर काही दिवस उपचार न करता लक्षणांवर नजर ठेवावी. काही लोकांमधील याची लक्षणे आपोआप निघून जातात.

औषधे : लक्षणे जास्त गंभीर नसतील तर औषधे घेणे हा सर्वोत्तम उपचार आहे. अल्फा ब्लॉकर हे औषध मूत्राशयावरील भागातील स्नायू आणि त्या तंतूंना आराम मिळवून देते, ज्यामुळे मूत्र विसर्जन सोपे होते. ५-अल्फा रिडक्टस इनहिबिटर्स औषध हार्मोन्स परिवर्तन थांबवून प्रोस्टेस्ट संकूचित करते. जर ही दोन्ही औषधे वेगवेगळी उपयोगी ठरली नाहीत तर डॉक्टर दोन्हीही एकत्र घेण्याचा सल्ला देतात.

मिनिमली इनवेसिव सर्जरी : जर लक्षणे मध्यमपासून ते गंभीर आहेत आणि औषधांनी बरे होणार नाहीत, शिवाय मूत्रमार्गातही अडचणी आहेत वा मूतखडा आहे. लघवीवाटे रक्त जाते आहे किंवा किडनीशी संबंधित समस्या असेल तर डॉक्टर सर्जरी करण्याचा सल्ला देऊ शकतात. सर्जरी करून प्रोस्टेस्टचा बाहेरील भाग काढून टाकला जातो.

लेजर थेरपी : हाय एनर्जी लेजर अतिविकसित प्रोस्टेस्ट पेशींना नष्ट करते. लेजर थेरपी केल्यानंतर लवकर आरामही मिळतो आणि याचे साईड इफेक्टही कमी होतात.

अॅण्टीबायोटिक्स : अॅण्टीबायोटिक्सद्वारे यूटीआयचा उपचार केला जातो. कोणते औषध किती काळ दिले जाईल हे रूग्णाच्या आरोग्यावर व ससंर्ग किती गंभीर आहे यावर अवलंबून आहे. जर संक्रमण गंभीर असेल तर अॅण्टीबायोटिक दिले जाते.

डीहायड्रेशन होऊ नये म्हणून…

* डॉ. मंजरी चंद्रा द्य

उन्हाळ्याच्या मोसमात शरीरातून अधिक घाम निघाल्यामुळे पाण्याची कमतरता होते. शरीरातील पाण्याच्या अभावामुळे अनेक लहानमोठ्या समस्या होऊ शकतात जसं की ब्लडप्रेशर, फ्लक्चुएशन, तापमान वाढणं, अपचन होणं. याशिवाय मूत्राशय व यकृतावरही शरीरातील पाण्याच्या कमतरतेचा परिणाम होऊ शकतो.

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवरही दुष्परिणाम होतो. त्वचेवर पुरळमुरुमं येतात आणि काळे डाग पडू शकतात.

शरीराला किती प्रमाणात पाण्याची गरज आहे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जसं की तुम्ही किती शारीरिक मेहनत घेता, जेथे तुम्ही काम करता, तेथे किती तापमान असतं, जे लोक सतत एसीमध्ये काम करतात, ते पाणी कमी पितात; कारण तहान लागत नाही, परंतु वातानुकूलित ठिकाणी अधिक काळ काम करत राहिल्याने शरीर डीहायडे्रट होतं. सोबतच शरीरात पोषक तत्त्वांची घट निर्माण होते.

स्वत:ला हायडे्रट करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे की तुम्ही दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी जरूर प्या. पाण्याव्यतिरिक्त खाद्यपदार्थांतूनही शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढू शकतो.

फळं आणि भाज्या नैसर्गिक पद्धतीने शरीरातील पाण्याची पूर्तता करतात. पाण्याव्यतिरिक्त फळं आणि भाज्या अनेक महत्त्वाची पोषक तत्त्वसुद्धा शरीराला देतात. भाज्यांमधून तंतूही शरीराला मिळतात.

याशिवाय अनेक प्रकारचे पेयपदार्थही आपल्या शरीरातील पाण्याची पूर्तता करतात जसं की :

सरबत

फळांची सरबतं, कोकम सरबत आणि कैरीचं पन्हं ही पेयं उन्हाळ्याच्या मोसमात आपल्या शरीरात पाण्याचा समतोल कायम राखतात आणि शरीर थंड राखतात. सरबताच्या सेवनाने पचनशक्तीसुद्धा सुधारते.

लस्सी/ताक

दह्यामध्ये पाणी घालून पातळ करून गोड लस्सी वा ताक बनवता येतं. लस्सी गारवा देते आणि ताक पाण्याचा उत्तम स्त्रोत आहे. ताकामुळे मलावरोधापासूनही आराम मिळतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.

सूप

भाज्या जसं की लीक, स्प्रिंग ऑनियन, गाजर, टोमॅटो, कोबी, मिरी पावडर आणि मशरूम एकत्रित शिजवून पातळ सूप बनवू शकता. या सूपद्वारे पाण्यासोबत पोषक तत्त्वही शरीराला मिळतात, शिवाय हे अतिरिक्त कॅलरीपासून बचाव करतं.

फ्रूट स्मूदी

फळं, दूध, शेंगदाणे आणि व्हॅनिला इसेन्स ब्लेण्ड करून स्मूदी बनवता येतं, जी केवळ शरीराला गारवा पोहोचवत नाही, तर कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिनचेही उत्तम स्त्रोत आहे.

सेक्श्युअल लाइफ स्पाइनल इंजरीनंतरचं…

– डॉ. एच.एस. छाबडा, इंडियन स्पाइनल इंजरीज सेंटरमध्ये स्पाइन सर्विचे प्रमुख आणि मेडिकल डायरेक्टर

स्पाइनल इंजरी कोणाच्याही आयुष्याची त्रासदायक घटना असू शकते. यामुळे व्यक्ती एकप्रकारे लकवाग्रस्त होऊ शकते. इंजरी जर मानेत असेल तर यामुळे टेट्राप्लेजिया होऊ शकतं. इंजरी जर मानेच्या खाली असेल तर यामुळे पाराप्लेजिया म्हणजेच दोन्ही पाय आणि इंजरीने खालच्या शरीरात लकवा होऊ शकतो. केंद्रीय स्नायुतंत्राचा भाग असल्यामुळे स्पाइनल कॉर्डवरच संपूर्ण शरीर अवलंबून असतं. इंजरीने लैंगिक सक्रियतादेखील प्रभावी होऊ शकते. स्पाइनल कॉर्ड इंजरी उंचावरून खाली पडल्याने, रस्ते अपघात, हिंसा वा खेळांच्या घटनांमुळेदेखील होऊ शकते. स्पाइनल कॉर्ड इंजरीच्या नॉनट्रोमेटिक कारणांमुळे स्पाइन आणि ट्यूमरचा टीबी यांसारख्या संसर्गाचा समावेश आहे.

लैंगिक सक्रियता महत्त्वाची

स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिला यथासंभव आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. भारतीय समाजाच्या एका मोठ्या वर्गात लैंगिक आरोग्यावर चर्चा करणं तसं वर्जित विषय मानला जातो, त्यामुळे या विषयावर लोक चर्चा करायला तसे संकोचतात आणि रुग्ण शांतपणे हे सर्व सहन करत राहातो. शिक्षा, ज्ञान आणि जागरूकतेच्या अभावामुळे लोक अशा रुग्णाच्या बाबतीत असा विचार करू लागतात की ते यौनेच्छा वा लैंगिक समस्येने पीडित आहेत. परंतु वास्तव हे आहे की सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणेच स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिसाठीदेखील लैंगिक सक्रियता तेवढीच गरजेची आहे.

साथीदाराचा अभाव

खरंतर, स्पाइन इंजरी इच्छाशक्तीवर परिणाम करत नाही. मात्र, एखाद्या व्यक्तिच्या लैंगिक गोष्टींवर नक्कीच परिणाम करते. अनेकदा असं जोडीदाराच्या अभावामुळेदेखील होतं. इतर बाबतीत मात्र हे मांसपेशींवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यायामाच्या अभावामुळेदेखील होऊ शकतं. लैंगिक अनिच्छा लिंगाच्या आधारावरदेखील वेगवेगळी असू शकते. पुरुषाला जिथे उत्तेजनेच्या अभावामुळे त्रास होतो, तिथे स्त्रियांना साधारणपणे शिथिल जोडीदारामुळे थोडाफार त्रास होतो, खासकरून भारतीय समाजात. परंतु स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिंच्या लैंगिक अनिच्छेला सेक्श्युअल रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आणि निरंतर अभ्यासाने अधिक प्रमाणात दूर करता येऊ शकतं.

समस्येकडे दुर्लक्ष

अशा रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि लैंगिक गोष्टींबाबत त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणं खूपच गरजेचं असतं. यामध्ये तंबाखू पूर्णपणे निषिध असायला हवा. शारीरिक हालचालींचा अभाव आणि वेदनेबरोबरच एससीआय रुग्ण आकर्षण, संबंध आणि प्रजननाची क्षमतासारख्या इतर कारणांवरूनदेखील चिंतित राहातात. काळाबरोबरच रुग्ण आपल्या नवजात शिशूसोबत जगणं शिकतात आणि बाकीच्या आयुष्याचादेखील स्वीकार करतात, मात्र आपल्या लैंगिक गरजांबाबत ते अनभिज्ञ राहातात. रुग्णाच्या शरीराच्या अशा हरविलेल्या गोष्टी बहाल करण्यासाठी मोठ्या रिहॅबिलिटेशन प्रोग्रामच्या दरम्यानदेखील लैंगिक समस्येकडे दुर्लक्षच केलं जातं.

स्वत:हून पुढाकार घेत नाहीत

एससीआयच्या प्रकरणात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांसाठी अनेकदा सेक्श्युअल पार्टनर बनणं अधिक सहजसोपं होतं. हे सर्व फक्त शारीरिक रचनेमुळे नाही तर सक्रियतेच्या स्तरावरदेखील शक्य होतं. भारतासारख्या रूढिवादी समाजात स्त्रियांकडून कामेच्छाची आशा करणं कठीण आहे. भारताच्या ९० टक्के स्त्रिया पॅसिव्ह सेक्श्युअल पार्टनर असतात ज्या स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. म्हणूनच पुरुषांच्या तुलनेत त्यांच्यासाठी लैंगिक स्वास्थ पुन्हा मिळवणं अधिक सहजसोपं ठरतं आणि त्यांचं मुख्य लक्ष्य लैंगिक सक्रियता पुन्हा मिळवणं तसंच संभोग करण्याची क्षमता मिळवणं हेच असतं.

अडचणीवर उपाय

पुरुषांच्या बाबतीत अडचणी या उत्तेजनेचा अभाव आणि स्खलनशी संबंधित असतात. त्यांची उत्तेजनक्षमता आणि स्खलनमध्ये बदल होण्याव्यतिरिक्त कामोत्तेजनांचे लैंगिक समाधानदेखील एक असं क्षेत्र आहे जे एससीआयपीडित पुरुषांसाठी चिंतेचं कारण आहे. दुसरं चिंतेचं कारण म्हणजे स्पर्मच्या गुणवत्तेवर पडणारा प्रभाव आणि स्पर्म काउंटबाबतचा आहे. स्पाइनल इंजरीच्या प्रकरणात अनेकदा वियाग्रासारख्या औषधांनी उत्तेजनेची समस्या दूर केली जाऊ शकते. काही प्रकरणांत व्हॅक्यूम ट्यूमेसेंस कन्स्ट्रक्शन थेरेपी (वीटीसीटी) वा पॅनाइल प्रोस्थेसिससारख्या उपकरणांचीदेखील गरज पडू शकते.

गैरसमज

सेक्श्युअल काउन्सलिंग आणि मॅनेजमेंट विकासशील देशांमध्ये एससीआयच्या सर्वात उपेक्षित गोष्टींपैकी एक आहे. लेखकांच्या एका संशोधनानुसार आढळलंय की एससीआयने पीडित ६० टक्के रुग्णांनी आणि त्यांच्या ५६ टक्के जोडीदारांनी सेक्श्युअल काउन्सलिंग घेतलेलं नाही. ज्या गोष्टींकडे खूपच कमी लक्ष दिलं जातं, त्यापैकी एक आहे जागरूकता आणि सांस्कृतिक बदल. पती आणि पत्नींमध्ये लैंगिक संबंधाचा हेतू फक्त मुलांना जन्म देणं एवढंच मानलं जातं. सेक्सबाबत चर्चा करणं वाईट मानलं जातं. लैंगिक समस्या सर्वसामान्य झाल्या आहेत तसंच सेक्सकडे दुर्लक्ष, सेक्सबाबतच्या चुकीच्या धारणा आणि नकारात्मक विचारसरणीदेखील याची प्रमुख कारणं मानली जातात. पारंपरिक वर्जनादेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारते. सेक्श्युआलिटीला प्रभावित करणाऱ्या इतर सामाजिक, पारंपरिक फॅक्टर्समध्ये लैंगिकसंबंधांची विचारसरणी, आईवडिलांबाबत आदर तसंच इतर कारणांचा समावेश आहे. सेक्सला वाईट समजलं जातं आणि पुरुष तसंच स्त्रियांसाठी वागणुकीचे दुहेरी मापदंड असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची अवस्था अधिक बिकट असते.

आत्मविश्वासाचा अभाव

एका संशोधनानुसार विकसित देशांच्या तुलनेत भारतासारख्या देशात स्पाइनल, कॉर्ड इंजरीने पीडित व्यक्तिंच्या लैंगिक गोष्टींची वारंवारता कमी असते. अनेक रुग्ण इंजरीच्या पूर्वीच्या तुलनेत आपल्या सेक्स लैंगिक आयुष्याकडे दुर्लक्ष करतात. हे कदाचित एससीआयच्या समस्या, इंजरीनंतर पार्टनरची असंतुष्टी, लैंगिक क्रीडेच्या दरम्यान जोडीदाराचं असहकार्य, आत्मविश्वासाचा अभाव तसंच अपर्याप्त सेक्श्युअल रिहॅबिलिटेशन कारणंदेखील असू शकतात. पाश्चिमात्य देशांतील प्रकरणांप्रमाणे खूपच कमी जोडीदार समाधानी असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लैंगिक समाधानाच्या अभावाची तक्रार अधिक करतात. यामागे एक प्रचलित सांस्कृतिक मान्यता आहे की एखाद्या आजारी बाईशी लैंगिक संबंध ठेवणं नैतिकतेविरुद्ध आहे आणि यामुळे पुरुष जोडीदारालादेखील लागण होऊ शकते. भारतीय समाजात स्त्रियांची वाईट अवस्था, जोडीदारांची वेगळी विचारसरणी, पचनशक्ती इत्यादींची गडबड आणि वैयक्तिक आयुष्याचा अभावदेखील याची काही संभावित कारणं असू शकतात.

लैंगिक जीवनाला अंत नाही

स्पाइनल इंजरीला लैंगिक जीवनाचा शेवट मानू नये. यामुळे इंजरीपीडित व्यक्तिला आपल्या नवीन शरीरात लैंगिकसुखाचा स्वीकार करण्यात मदतीची गरज असते आणि अनेकदा त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज असते. परिवर्तित संवेदनशीलता, शारीरिक स्वीकृती वा मसल कंट्रोलसारखे फॅक्टर समजून घेतल्याने स्पाइनल इंजरी रुग्णाला निरामय कामजीवन बहाल करण्यात मदत मिळू शकते. त्याच्या सेक्श्युअल रिहॅबिलिटेशनसाठी मेडिकल प्रोफेशनल्सच्या मदतीची गरज असते. याबाबतीत जागरूकता वाढविण्याची गरज आहे. खासकरून भारतीय समाज तसंच प्रोफेशनल्समध्ये.

व्हल्वा कर्करोग काय आहे

सहसा स्त्रियांना कोणत्याही वयात इतर कर्करोग होऊ शकतात, परंतु व्हल्वा 60 आणि त्यापेक्षा जास्त असू शकतात. केवळ वृद्ध स्त्रिया तसेच तरूण स्त्रियादेखील यातून सुटल्या नाहीत. जरी व्हल्वा कर्करोग सामान्य नाही, परंतु अत्यंत गंभीर आहे, कारण तो स्त्रीच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकतो. यामुळे लैंगिक वेदना अधिक कठीण होतात.

अंजनाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. तिला योनीवर एक गाठ दिसली, परंतु परंत तिने जास्त लक्ष दिले नाही. पण दोन वर्षानंतर जेव्हा त्रास सुरू झाला तेव्हा तिने डॉक्टरला दाखवले. मग तिला समजले की तिला व्हल्वा कर्करोग आहे.

अंजना सांगते की कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेत होता, म्हणून डॉक्टरांनी आठवड्यांसाठी रेडिएशन थेरपी दिली, तेथून त्वचेला जळजळ व फोड आले. त्यातून सावरण्यास महिने लागले. पण तरीही काही अडचणींचा सामना करावा लागतो. व्हल्वा कर्करोगाच्या उपचारानंतर सेक्स करण्यास खूप वेदना होत आहेत त्याच्यासमोर तुम्हाला प्रसूती वेदनादेखील कमी वाटू शकते.

व्हल्वा कर्करोग म्हणजे काय

या संदर्भात, डॉ.अनिता गुप्ता म्हणतात की योनीच्या बाहेरील ओठांना व्हल्वा म्हणतात जेव्हा यामध्ये कर्करोग असतो तेव्हा त्याला व्हल्वा कर्करोग म्हणतात. हा व्हल्वा कर्करोग मानवी पॅपिलोमा विषाणू आहे म्हणजे एचपीव्हीमुळे लैंगिक संबंधातून पसरणारे आजार असून तो कोणत्याही स्त्रीमध्ये लैंगिकरित्या कार्यरत असतो. तो पसरू शकतो. व्हल्वा कर्करोगामुळे लवकर लक्षणे उद्भवत नाहीत. सुरुवातीला फक्त पांढरा पॅच किंवा खाज सुटणे होते, ज्या स्त्रिया बुरशीजन्य संसर्गाने दुर्लक्ष करतात आणि नंतर अज्ञानामुळे त्यांचा त्रास वाढतो.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार, यूएस मध्ये 2017 मध्ये व्हल्वा कर्करोगाच्या जवळपास 6 हजार रुग्णांची नोंद झाली. यामध्ये 1,150 महिला व्हल्वा कर्करोगाच्या टप्प्यावर पोहोचल्या हेत्या त्यावर उपचार शक्य नव्हते. वास्तविक या महिलांना कर्करोग असल्याची कल्पना नव्हती. तर कधी तर, जर आपल्याला खाज सुटणे, घसा, ढेकूळ, व्हल्वावर फुगवटा येणे किंवा योनीच्या आसपास किंवा भोव-यात व्हल्वाचा स्पर्श असल्यास पाण्याचे फोड असल्यास, लघवी करताना त्रास होत असल्यास या लक्षणांकडे दुलर्क्ष करू नका.

कसे हाताळायचे

व्हल्वा कर्करोगाचा उपचार करण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु ते कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या टप्प्यावर अवलंबून असते, कोणता उपचार चांगला आहेः

रेडिएशन थेरपी : या प्रकारचे थेरपी उच्च उर्जा प्रकाशाचे उत्सर्जन करते, जे कर्करोगाच्या पेशी काढून टाकते. परंतु यामुळे आजूबाजूच्या त्वचेला मोठ्या प्रमाणात हानी होते.

केमोथेरपी: या थेरपीमध्ये एकतर औषध कर्करोग दूर करण्याचा प्रयत्न करते किंवा ती कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून थांबवते.

शस्त्रक्रियाः व्हल्वा कर्करोगाच्या उपचारांची मुख्य पद्धत म्हणजे शस्त्रक्रिया. या उपचाराचा उद्देश योनी रोखणे आहे. हा कर्करोग हानी पोहोचविल्याशिवाय काढले जाणे आवश्यक आहे, ज्यामध्ये लेसर शस्त्रक्रिया, ऑक्सिजन, त्वचेची कातडी व्हल्व्हेक्टॉमी, रॅडिकल व्हेल्व्हक्टॉमी इत्यादींचा समावेश आहे.

व्हल्वा मेलानोमा: यात गडद ठिपके दिसतात. या प्रकारचा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरतो. एक जोखीमदेखील आहे आणि या प्रक्रियेस मेटास्टेसिस म्हणतात आणि याचा परिणाम तरुण वयात स्त्रियांवर होतो.

डेनोकार्सीनोमा: हा कर्करोग ग्रंथी पेशी आणि त्याच्या स्क्वामस पेशीपासून सुरू होतो. कार्सिनोमापेक्षा फुफ्फुस आणि लिम्फ नोड्सपर्यंत पसरण्याची शक्यता जास्त आहे.

कार्सिनोमा रेपॉझ करा: हा स्क्वॅमस सेल कर्करोगाचा एक उपप्रकार आहे आणि हळू वाढणारा मस्सा आहे.

स्क्वॅमस सेल कार्सिलोनाः कर्करोगाच्या पेशींमध्ये होतो आणि हळूहळू पसरतो. हे बहुधा योनीच्या सभोवताल राहते, परंतु ते फुफ्फुस, यकृत किंवा हाडांमध्येदेखील पसरते. हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.

सारकोमा: हा कर्करोग जीवघेणा आणि संयोजी ऊतक म्हणजे संयोजकासारखाच दुर्मिळ आहे.

हिवाळ्यातही स्वस्थ राहतील अस्थमाचे रूग्ण

* सोमा घोष

१५ वर्षीय अनुरिमाला दमा आहे. लहानपणापासूनच तिला दम्याचे झटके येत असत. नंतर तर वाढत्या वयाबरोबर अजून वाढत गेले. यासाठी तिला नियमित औषधं घ्यावी लागतात. खरंतर हा त्रास थंडीच्या दिवसांत खूपच वाढतो कारण थंडीच्या दिवसांत श्वासनलिकेत कफ अधिक प्रमाणात साचतो. ज्यामुळे श्वासनलिका भरून जाते व रूग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. परिणामी धाप लागते. काहीजणांना थंडीच्या अॅलर्जीमुळेही अधिक त्रास होतो.

मुंबईतील एसआरवी हॉस्पिटलच्या चेस्ट फिजिशिअन डॉ. इंदू बूबना यासंबंधी सांगतात, ‘‘अतिताण आणि धूम्रपान ही दम्याची दोन मोठी कारणे आहेत. यामुळे दमा सर्वात जास्त बळावतो. याशिवाय अपुरी झोप, प्रदूषण हेसुद्धा याला जबाबदार आहेत.

हिवाळ्याच्या दिवसात हा आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. पण योग्य दिनक्रमाने हा धोका कमी केला जाऊ शकतो. माझ्याकडे असे अनेक रूग्ण येतात जे दम्याचे नाव ऐकूनच घाबरून जातात, जेव्हा की हा आजार जीवघेणा नाहीए.’’

डॉ. इंदू यांच्या मते हिवाळ्याच्या ऋतुमध्ये दम्याच्या रूग्णांनी खाली सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी :

* सर्वप्रथम घर स्वच्छ व हवेशीर ठेवावे.

* श्वास नेहमी नाकानेच घ्यावा. यामुळे हवा गरम होऊन छातीपर्यंत पोहोचते. ज्यामुळे थंडी कमी वाजते. तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करू नये.

* तापाची लस टोचून घ्यावी. यामुळे ७० टक्के व्यक्ती थंडीच्या अॅलर्जीपासून वाचू शकतात.

* घरात जर रूमहीटरचा वापर करत असाल तर वेळोवेळी त्याच्या फिल्टरची स्वच्छता करावी, जेणेकरून त्यावर धूळमाती जमणार नाही.

* घरातील पाळीव प्राणी, टेडीबिअरसारखी फरची खेळणी, झाडे इ. बेडपासून दूर ठेवावेत.

* थंडीपासून वाचण्यासाठी कित्येक जण आगीजवळ किंवा रूमहीटरजवळ बसतात. पण हे योग्य नाही कारण यामुळे लोकरी कापडाचे धागे जळतात. त्यातून निघणारा धूर दम्याच्या रूग्णांसाठी घातक असतो. म्हणून रूम हिटरने घर गरम करावे व त्यापासून दूर रहावे. तसेच घरातील उष्णता कायम राहिल असे पहावे.

* घरात जुने सामान ठेवू नये. साफसफाई करताना धूळ उडवू नये. ओल्या कापडाने घर स्वच्छ करावे.

* जेवण करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे कुठल्याही प्रकारच्या जिवाणूंशी संपर्क होणार नाही.

* थंडीच्या दिवसातही वर्कआउट अवश्य करा. पण आधी स्वत:ला वॉर्मअप करणे विसरू नये.

* थंडीत द्रवपदार्थ अधिक प्रमाणात खावेत. घरी बनवलेल्या कमी चरबीयुक्त आहाराचे सेवन करावे. आंबट खाल्ल्याने दमा वाढत नाही. पण ज्यांना अॅलर्जी आहे, त्यांनी खाऊ नये.

* रोज स्वच्छ व धूतलेले कपडे घालावेत. कॉटनचे कपडे घालून त्यावर लोकरीचे कपडे घालावेत.

* जर लहान मुलांना दमा असेल तर त्यांना पौष्टिक व न्यूट्रीशनयुक्त आहार द्यावा.

* औषधांचे नियमित सेवन करावे.

थंड आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कारणे आणि प्रतिबंध

-गरिमा पंकज

डॉक्टर बिपिन कुमार दुबे, एचसीएमसीटी मनिपाल हॉस्पिटल, दिल्ली.

हिवाळा सुरू झाल्याबद्दल सामान्य लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोक थंड हवामानाचे स्वागत करतात तर काहींना हिवाळ्याच्या काळात फ्लू, श्वसन रोग, फ्रॉस्टबाइटची भीती असते. परंतु काळजी करण्यामागे आणखी एक कारण आहे ज्याबद्दल बरेच लोकांना माहितीही नसते. थंड हवामानात रक्तवाहिन्या आकुंचन होऊ शकतात, वाढत्या सहानुभूतीच्या स्वरुपामुळे हृदय गती वाढू शकते, रक्तदाब वाढतो आणि शरीरात रक्त जमण्याची शक्यतादेखील वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

खरं तर, हिवाळ्यादरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सुमारे 33 टक्क्यांनी वाढते. हे सांगणे आवश्यक नाही की हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी लोकांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. सर्दीच्या या महिन्यांत वृद्धांना त्रास होऊ शकतो, सर्दीमुळे त्यांच्या शरीराचे तापमान नाटकीयरित्या हायपोथर्मिया होऊ शकते. जर शरीराचे तापमान 95 अंशांपेक्षा कमी झाले तर हायपोथर्मियामुळे हृदयाच्या स्नायूचे गंभीर नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, एनजाइनामुळे ग्रस्त रूग्णांना विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण थंड हवामानात कोरोनरी रक्तवाहिन्यांमधे उबळ येऊ शकते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही व्यक्तींना थंड हवामानात हृदयविकाराचा धोका जास्त असतो, ज्यात हृदयविकाराचा झटका, कोरोनरी हृदयरोग किंवा हृदयाची कमतरता, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, धूम्रपान आणि सुस्ती यांचा समावेश आहे अशा जीवनशैलीचा मागील इतिहास आहे.

लक्षणे

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका जास्त असतो हे जाणून घेतल्यास हृदयविकाराचा झटका येणा-या लक्षणांची जाणीव ठेवणे व समजून घेणे शहाणपणाचे ठरेल. छातीत तीव्र वेदना किंवा अस्वस्थता सामान्यत: रेट्रोस्टर्नलपेक्षा वेगळी असते परंतु छातीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला, खांद्यावर, मान किंवा खालच्या जबड्यात, जठरासंबंधी असू शकते, जी वरच्या अवयवापर्यंत पसरते.

मळमळ, उलट्या किंवा चक्कर येणे श्वास घेण्याशी संबंधित असू शकते; स्त्रियांना विशेषतः जागरूक रहावे लागेल कारण त्याची लक्षणे थोडी वेगळी दिसू शकतात. म्हणूनच, जरी त्यांना असामान्य लक्षणांचा अनुभव आला तरीही हे महत्वाचे आहे की ते कोणत्याही संभाव्य लक्षणांबद्दल नेहमी सतर्क असतात.

कारणं

जरी सर्दीमुळे सहानुभूतिशील यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत, परंतु त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन होतात, हृदयाचा वेग वाढतो, अशा प्रकारे हृदयावर रक्तदाब आणि वजन वाढतो. हृदयाच्या रक्तवाहिन्या संकुचित करण्याव्यतिरिक्त, हृदयाच्या स्नायूंमध्ये ऑक्सिजनची अतुलनीय मागणी आणि पुरवठा होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

थंड हंगामात फायब्रिनोजेन, फॅक्टर, इत्यादी रक्ताच्या जाड होणा फट्स या घटकांच्या वाढीमुळे, रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या शक्यतेमुळे हृदय आणि खालच्या अवयवांच्या पेशींमध्ये गोठणे होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. खोल शिरासंबंधी थ्रोम्बोसिस उद्भवते.

 

हिवाळ्यात, सामान्य सर्दी, फ्लू, न्यूमोनियाची वाढ होणारी घटना असते ज्यामुळे हृदयाच्या पात्रात एथेरोस्क्लेरोटिक प्लेक विस्कळीत होते, ज्यामुळे गठ्ठा होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

याशिवाय हिवाळ्यामध्ये लोक जास्त तळलेले पदार्थ आणि मद्यपान करतात, जास्त धूम्रपान करतात आणि व्यायाम कमी करतात. या सर्व गोष्टी आपल्याला समजल्याशिवाय हृदयाचे नुकसान करतात.

प्रदूषण हा हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या झटक्यासाठी आणखी एक जोखीम घटक आहे, ज्याबद्दल प्रत्येकजण जागरूक आहे. हिवाळ्यात, हवेतील धुके, निलंबित कणांच्या वाढीमुळे प्रदूषण अतिशय उच्च पातळीवर जाते, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसाचा आजार आणि हृदयविकाराचा झटका येतो, विशेषत: प्रदूषित महानगरांमध्ये.

प्रतिबंध

निरोगी खा : एखाद्याने कमी चरबीयुक्त, कमी साखर, कमी-मीठ, उच्च-प्रथिने शिल्लक आहार घ्यावा, ज्यामध्ये फळे आणि भाज्या, फायबर समृद्ध धान्य, फॅटी फिश (सॅमन, सार्डिन), नट, शेंगदाणे आणि बियाणे. तसेच मद्यपान कमी करा, धूम्रपान करणे थांबवा.

सक्रिय रहा : बाह्य क्रियाकलाप टाळा आणि अत्यधिक थंड, घरातील व्यायाम, घरातील खेळ आणि योगामध्ये व्यायाम करणे तंदुरुस्त आणि निरोगी राहील.

पुरेशी झोप घ्या : चांगल्या आरोग्यासाठी 7 ते 8 तासांची झोप चांगली असते.

हवामानानुसार कपडे घालाः कोणत्याही किंमतीत कमी कपडे घालून लोकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले पाहिजे. हायपोथर्मिया (कमी शरीराचे तापमान) टाळण्यासाठी लोकांनी भरपूर कपडे, विशेषत: कोट, टोपी, हातमोजे आणि भारी मोजे घालून स्वत: ला झाकून ठेवणेदेखील महत्वाचे आहे. डोक्यावरुन बरीच उष्णता सोडली जात असल्याने बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी स्कार्फ आणि / किंवा टोपी घालण्याची देखील शिफारस केली जाते.

वारंवार हात धुवा : हे सर्वज्ञात आहे की श्वसन संसर्गामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढू शकते. साबणाने आणि पाण्याने नियमितपणे हात धुवून एखाद्याने अशी परिस्थिती टाळली पाहिजे. याव्यतिरिक्त, ताप, व्हायरल खोकला किंवा शरीरावर वेदना यासारख्या फ्लूची लक्षणे लक्षात येण्यासारखी असल्यास फ्लूचे औषध घेण्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भधारणेस अडचण येऊ नये म्हणून

* डॉ. कावेरी बॅनर्जी

काही वर्षांपूर्वी माझ्याजवळ एक जोडपं आलेलं. ३४ वर्षांच्या प्रतिभाचं ३६ वर्षांच्या अशोकबरोबर लग्न झालेलं. ते दोघेही आयटी प्रोफेशनल होते आणि आमच्या क्लीनिकमध्ये प्राथमिक इन्फर्टिलिटीची तक्रार घेऊन आलेले. ज्याची त्यांना गेल्या ५ वर्षांपासून समस्या होती. त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की लग्नानंतर आपल्या व्यस्ततेमुळे त्यांनी कधीच चांगल्याप्रकारे शारीरिकसंबंध ठेवले नाही. त्या जोडप्याची काउन्सिलिंग केली गेली. त्यांना योनीमार्गातून कृत्रिम बीजरोपण प्रक्रियेबद्दल समजावलं गेलं. ते जोडपं यासाठी तयारही झालं आणि या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रतिभा गर्भवतीही झाली. आता ती एका वर्षांच्या स्वस्थ मुलाची आई आहे.

प्रतिभाचं प्रकरण काही अशा प्रकारचं एकमेव प्रकरण नाहीए. अलीकडे प्रजननाचं वय असलेल्या प्रत्येक १० पैकी एका जोडप्याला गर्भधारणेस अडचण येते. शहरांमध्ये याचं प्रमाण वेगाने वाढत आहे, जिथे अशी जोडपी जास्त आहेत आणि दोघेही नोकरदार आहेत.

  • वेगवेगळी कारणं

यासाठी कारणंही वेगवेगळी आहेत. अलीकडे अनेक स्त्रिया आपल्या करिअरच्या बाबतीत गंभीर असतात आणि स्वत:ला पूर्णपणे स्थिर केल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्या लग्नालाही उशीर होतो. अनेक प्रकरणांमध्ये लग्न होता होता मुली तीशी ओलांडतात. मात्र स्त्रियांच्या शरीराची निर्मिती अशाप्रकारे असते की वयाच्या तिशीनंतर तिच्या शरीरातील प्रजननयोग्य अंड्यांची उत्पादन क्षमता कमी होऊ लागते. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या सुरुवातीला तीन ते पाच लक्ष अंडी असतात. वयाच्या तिशीनंतर तिच्या शरीरातील प्रजननयोग्य अंड्यांची उत्पादनक्षमता कमी होऊ लागते. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या सुरुवातीला तीन ते पाच लक्ष अंडी असतात. मासिक पाळी संपण्याच्या वयापर्यंत पोहोचता पोहोचता तिच्या शरीरातील संपूर्ण अंडी नष्ट झालेली असतात.

पुरुषांच्या विपरीत स्त्रियांमध्ये दर महिन्याला अंडयांची उत्पत्ती होत नाही. वयाच्या पस्तीशीनंतर प्रजननक्षमतेत वेगाने घट होऊ लागते. अशात अंड्यांची गुणवत्ता खराब होऊ लागल्याने अनेक स्त्रियांना गर्भधारणेत समस्या येऊ लागते.

या वर्गात येणारी अनेक जोडपी ए व्यक्तिमत्त्वांतर्गत येतात, ज्यांच्यात विशिष्ट प्रकारच्या गोष्टी आढळतात. जसं की ते खूप महत्त्वांकाक्षी असतात आणि खूप लवकर चिंतित होतात आणि एखाद्या गोष्टीचा तणावही त्यांना फार लवकर येतो. मात्र यशस्वी गर्भधारणेसाठी जोडप्यांनी तणावमुक्त राहाणं आणि नियमित शारीरिकसंबंध ठेवण्याची गरज असते. आपल्या कामाची जबाबदारी आणि अधिक तणावामुळे हे शक्य होत नाही. एक तणावपूर्ण जीवनपद्धतीमुळे अनेक लोक धूम्रपान आणि अल्कोहलसारख्या गोष्टींच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांच्या शुक्राणू आणि अंड्यांच्या गुणवत्तेत कमी येते आणि त्यांची प्रजननक्षमता अवघड होऊन बसते.

  • कामाचा ताण

कामाचा ताण आणि आयुष्यातील इतरही जबाबदाऱ्यांबरोबर समतोलपणा राखण्याबरोबरच अलीकडच्या जोडप्यांच्या आहाराच्या सवयीही बदलल्या आहेत. ते जास्तीत जास्त स्नॅक्सवर अवलंबून असतात, ज्यात फास्टफूडचं प्रमाण जास्त असतं. ते इतकं व्यस्त आयुष्य जगत आहेत की त्यात त्यांना व्यायामासाठीही वेळ नसतो. अशा अस्वस्थ जीवनपद्धतीमुळे ते लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांच्या कचाट्यात सापडत आहेत. यामुळे गर्भधारणेस समस्या येऊ लागली आहे. त्यातल्या त्यात गर्भधारणा झाली जरी, तरी अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यताही जास्त असते. यापासून बचावल्यानंतर जन्मजात उणिवांची शक्यताही खूप जास्त असते.

या सर्व समस्याचं एक समाधान म्हणजे २३-२४व्या वर्षी लग्न करणं. कारण या वयांत स्त्रीच्या शारीरिक रचनेची पूर्णपणे वाढ झालेली असते. म्हणूनच कुटुंब बनवण्याची सुरूवात वयाच्या २३-२४व्या वर्षी करावी. जास्त वेळ लागत असेल तरी वयाच्या तिशीच्या आत तरी हे झालंच पाहिजे. अनेक स्त्रियांनी असंच केलं आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी कुटुंब आणि करिअरमध्ये  एक उत्तम ताळमेळ राखण्याचं उदाहरण सादर केलं आहे.

कसलीच अडचण न येता लवकर गर्भधारणेसाठी जोडप्यांना एका चांगल्या वातावरणाची गरज असते. रिलॅक्सेशन थेरेपी अशा जोडप्यांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे तणाव कमी होतो. जास्त धूम्रपान आणि अल्कोहलचं सेवन वर्ज्य करा. अशा लोकांनी समतोल आहार घ्यायला पाहिजे ज्यामध्ये साखर, मीठ आणि स्निग्ध पदार्थ कमी असावेत. भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या खाव्यात, दररोज कमीत कमी २ लीटर पाणी प्यावं, दररोज फेरफटका मारावा, व्यायामाला आपल्या दररोजच्या जीवनाचा एक भाग बनवावं. शांत तणावरहित आणि स्वस्थ जीवनपद्धतीचा अवलंब करून विवाहित जोडपी एका स्वस्थ बाळाचे पालक बनण्याचं आपलं स्वप्न सहज पूर्ण करू शकतात.

आरोग्य बिघडवू शकते एक्सरसाईज

* डॉ. सागरिका अग्रवाल, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल्स

आरोग्याच्या दृष्टीने एक्सरसाईज किंवा व्यायामाचे बरेच फायदे आहेत. पण आजकाल आपण अशी जीवनशैली जगत आहोत, जिथे व्यायामासाठी जराही वेळ नसतो. बऱ्याच वर्षांपासून जीवनशैली एकाच प्रकारची असल्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामध्ये शारीरिक स्थितीसह मानसिक परिस्थितीचाही समावेश असतो.

कुठल्याही प्रकारे का असेना, पण आपल्या शरीराला रोज थोडया प्रमाणात सक्रिय राहाणे गरजेचे असते. यामुळे आपल्या शारीरिक विकासास प्रोत्साहन मिळते आणि आपली एकूण कार्यक्षमताही वाढते. व्यायामाचे जसे अनेक सकारात्मक पैलू आहेत तसेच नकारात्मक पैलूदेखील आहेत, ज्यांच्याकडे ठराविक लोकांचेच लक्ष जाते. जसे की भरपूर व्यायामामुळे प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतात.

एक्सरसाईजचे सकारात्मक पैलू

हृदयाच्या स्थितित सुधारणा : आपण शारीरिकरित्या किती काम करतो यावर आपल्या हृदयाची स्थिती अवलंबून असते. जे लोक दररोज शारीरिकदृष्टया सक्रिय नसतात, त्यांनाच हृदयाशी संबंधित सर्वात जास्त आजार असतात.

चांगली झोप न येणे : अनेक अभ्यासांद्वारे हे सिद्ध झाले आहे की जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांना रात्री चांगली झोप येते. हे यामुळे घडते कारण व्यायामामुळे शरीराची सर्केडियन रिद्म व्यायामामुळे मजबूत होते, जी आपल्याला दिवसा सक्रिय ठेवण्यास मदत करते. यामुळे रात्री चांगली झोप येते.

शारीरिक उर्जेमध्ये वाढ : आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात एक्सरसाईजबाबत अनेक प्रकारचे गैरसमज असतात, जसे की एक्सरसाईज आपल्या शरीराची सर्व शक्ती शोषून घेते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर काहीही करू शकत नाही. प्रत्यक्षात याच्या अगदी उलट घडते. कारण एक्सरसाईजदरम्यान, तुमच्या शरीरातून काही खास प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात, जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात.

आत्मविश्वास वाढणे : नियमित व्यायामामुळे हवा तसा परफेक्ट शेप तुमच्या शरीराला मिळू शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो. शरीराची उत्तम ठेवण आणि सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही घर आणि कार्यालयातही पूर्वीपेक्षा अधिक चांगले काम करू शकता.

अति एक्सरसाईजचे नकारात्मक पैलू

नियमित व्यायामाचे बरेच फायदे आहेत, म्हणूनच फिजिकल अॅक्टिव्हिटीजकडे दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाही. परंतु काही अशा गोष्टीही आहेत, ज्यामुळे सिद्ध झाले आहे आणि ज्यामुळे हे लक्षात येते की अति व्यायामामुळे शरीरावर नकारात्मक परिणामदेखील होऊ शकतो :

* महिलांमध्ये एक विशेष स्थिती निर्माण होते, ज्याला रजोरोध म्हणतात. ही परिस्थिती तेव्हा निर्माण होते, जेव्हा सामान्य महिलेस सलग ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत योग्य प्रकारे मासिक पाळी येत नाही. बऱ्याच महिलांमध्ये अशी स्थिती निर्माण होते, कारण त्या शरीराला नियमित ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीज देणाऱ्या पदार्थांचे सेवन न करताच जिममध्ये काही विशेष प्रकारच्या व्यायामाचे ३-४ सेशन नियमित करतात.

* शरीरातील कॅलरीजच्या कमतरतेचा थेट परिणाम केवळ प्रजननक्षमतेवरच होत नाही तर महिलांच्या लैंगिक इच्छेवरदेखील याच प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त, लठ्ठपणादेखील यात महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण बहुतेक करून लठ्ठ महिला वजन कमी करण्यासाठी अनेकदा खूपच कठीण व्यायाम करतात, ज्याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

* लठ्ठपणामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे ओव्हुलेशन आणि मासिक पाळीवर परिणाम होतो आणि वंध्यत्वाचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये तरुण महिलादेखील एवढया जास्त प्रमाणात वर्कआऊट करतात की त्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी त्या स्तरापर्यंत जाते, जी त्यांच्या मासिक पाळीत अडथळा आणते. इस्ट्रोजेनच्या पातळीत बरेच बदल झाल्यास गर्भधारणा होण्यासाठीही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

* आपल्या सर्वांना आणि विशेषत: महिलांना हे चांगले माहीत असते की बहुतेक   गर्भनिरोधक औषधांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी जास्त असते. म्हणूनच महिला    त्यांचे सेवन केल्यानंतर गर्भवती होण्यापासून स्वत:ला रोखू शकतात. अति व्यायामामुळेही इस्ट्रोजेनची पातळी वाढते. म्हणूनच जर एखाद्या महिलेला गर्भधारणा करायची असेल तर तिने हेवी एक्सरसाईज करू नये.

* हेवी ट्रेनिंग सेशनमुळे पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, जी थेट त्यांच्या प्रजननाशी संबंधित आहे. आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जे बॉडी मेन्टेन ठेवण्यासाठी प्रदीर्घ काळ कठीण ट्रेनिंग सेशन फॉलो करतात.

* तुम्ही जर अति थकवा आणणाऱ्या आणि कठीण ट्रेनिंगमधून जात असाल तर सामान्य ट्रेनिंग सेशन फॉलो करणाऱ्या लोकांच्या तुलनेत तुमच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी असण्याची शक्यता असते.

* दीर्घ काळापर्यंत थकवा आणणारा कठीण व्यायाम केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, सोबतच पुनरुत्पादनाची क्षमतादेखील कमी होऊ शकते. शिवाय हेवी रेजिस्टन्स ट्रेनिंग फायद्याऐवजी तुमचे नुकसान करू शकते. कारण यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढते, जे पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इतर हार्मोन्सवर विपरित परिणाम करते. यामुळे तुमच्या महिला जोडीदारास गर्भधारणा होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नियमित व्यायामासह पुरेसा आहार घेणेदेखील आवश्यक असते, कारण तुमच्या शरीराला नियमितपणे कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. खास करून तेव्हा ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाईजदरम्यान खूप ऊर्जा गमावता. म्हणूनच पुरुषांनी वेळोवेळी आपले स्पर्म काउंट तपासून पाहिले पाहिजेत तर महिलांनी त्यांच्या गर्भधारणेच्या क्षमतेची तपासणी करून घेतली पाहिजे. यामुळे तुम्हाला समस्येतून बाहेर पडण्यासाठी आणि सामान्य जीवन जगण्यासाठी मदत होईल.

सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता हाच मूलमंत्र

* मोनिका गुप्ता

बुहानच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना नामक रोगाने आता भारतासोबाबत इतर अनेक देशांमध्ये पाय पसरले आहे. हे इतके भयानक संक्रमण आहे कि हे एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिपर्यंत सहज पोहोचते. कोरोना संक्रमणापासून दूर राहायचे असेल तर सर्वात आवश्यक आहे ते हात चांगले धुणे. तसे पाहता लोक हात धुण्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात. अनेक लोक तर हात धुणे याचा अर्थ  पाणी आणि साबण वाहू देणे असाच घेतात. म्हणजे बहुतांश लोकांना हात धुण्याची योग्य पद्धतच माहीत नाही. ज्यामुळे लोकांमध्ये संक्रमण आणि निरनिराळे आजार पसरत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ति वर्षानुवर्षे हे मानत आले आहेत की आजारांपासून दूर राहायचे असेल तर हात धुण्याची प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे. एका शोधानुसार आपल्या देशातील ४० टक्के लोक जेवणाआधी हात धूत नाहीत. जर आपण हात धुण्याची प्रक्रिया प्रामाणिकपणे पाळली तर आपण अशा अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. कोणत्याही आजाराशी लढण्याचे हात धुणे हे पहिले हत्यार आहे.

का आवश्यक असते हात धुणे

आपण दिवसभर जे काही काम करतो, त्यात आपल्या हातांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे हातांवर किटाणू असणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. जेव्हा केव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो, आपण लिफ्टचा वापर करतो. बटणांना स्पर्श करतो, मेट्रोमध्ये हॅण्डल, ऑफिसमध्ये दरवाजाला स्पर्श करणे, नळाची तोटी, रेलिंग इत्यादींना स्पर्श करत जातो. जर आपण आपले संक्रमित हात न धुता जेवण घेतले, कोणाशी हस्तांदोलन केले, घरात लहान मुलांसोबत खेळलो वा त्यांना काही खाऊ घातले तर हातावर असलेले किटाणू रोगजंतू बनून आपल्या लोकांपर्यंत सहज पोहोचतात.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी अमेरिकेतील डॉक्टर्सनी ‘डोन्ट टच युअर फेस’ ही  मोहीम चालवली होती. या मोहिमेद्वारे डॉक्टरांना सांगायचे होते की कोविड -१९ पासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या चेहऱ्याला कमीतकमी हात लावा. जर आपण सतत चेहऱ्याला हात लावण्याची सवय सोडून दिली तर कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरण्याची शक्यता कमी होते. एका संशोधनातून हे लक्षात आले की माणूस एका तासात जवळपास २३ वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो.

यासाठी जागतिक आरोग्य संघटना व रोग नियंत्रण व निवारण केंद्र सीडीसीने अनेक उपाय जाहीर करत लोकांना कोरोनापासून वाचण्याबाबत जरुरी सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यात हात धुणे, मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे प्रमुख आहेत. याशिवाय चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना हात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यावर आयुस्पाईन हॉस्पिटलमधील सिनियर फिजिओथेरपिस्ट डॉ. सत्यम भास्कर यांच्याशी बोलत असता त्यांनी संगितले की हात कसे धुतले पाहिजे आणि किती वेळ धुतले पाहिजेत.

सॅनिटायझरपेक्षा जास्त चांगले आहे की तुम्ही साबणाने हात धुवा. कारण बाजारात जरुरी नाही की अल्कोहोल बेस्डच सॅनिटायझर असतील. लहान मुलं असो वा वयस्कर लोक सर्वानी कमीतकमी २० सेकंद हात धुवायला हवेत, वास्तविक तुम्ही हात धुण्याची योग्य पद्धत अवलंबली तर हात नीट स्वच्छ होतील आणि तुम्हाला २० सेकंड मोजावे लागणार नाहीत.

हात धुण्याच्या योग्य स्टेप्स

हातांना किटाणूंपासून दूर ठेवण्याच्या या ७ स्टेप्सचे अवश्य पालन करा.

स्टेप्स १ : हात धुण्यासाठी जंतूनाशक साबण वापरा. सर्वात आधी हात ओले करा आणि योग्य प्रमाणात साबण वापरा.

स्टेप्स २ : दोन्ही हातांचे तळवे चांगले चोळा.

स्टेप्स ३ : आता हातांना उलटया बाजूने स्वच्छ करा.

स्टेप्स ४ : आपली बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांना जोडून स्वच्छ करा.

स्टेप्स ५ : आपली नखे चांगली स्वच्छ करा.

स्टेप्स ६ : आपला अंगठा आणि मनगटे चांगली चोळा.

स्टेप्स ७ : आता पाण्याने हात स्वच्छ धुवा.

जर तुम्ही बाहेर असाल जिथे हात धुण्यासाठी तुम्ही साबण अथवा पाणी वापरू शकत नसाल, अशावेळी तुम्ही अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरू शकता. हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करताना तुम्ही हे निश्चित करायला हवे की त्यात ६० टक्के अल्कोहोल असावे तरच हे तुम्हाला लाभदायक ठरेल.

मुलांना असे शिकवा हात धुणे

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ति कमी असते, ज्यामुळे त्यांच्यावर संक्रमण लवकर पसरते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की मुलं लवकर लवकर आजारी का पडतात? वास्तविक मुलांचे अस्वच्छ हात त्यांच्या शरीरावर संक्रमण पसरवण्यास जबाबदार असतात. जर मुलाचे हात स्वच्छ नसतील तर त्याच हाताने तो जेवण घेईल, तेच हात डोळे आणि चेहऱ्याला लावेल. मुलाने हात धुणे केव्हा आवश्यक असते याबाबत पालकांना माहिती असायला हवी. हात धुणे किती महत्वाचे आहे हे मुलांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे. जर मुलाला वेळेत हे शिकवले की कोणती वस्तू खराब आहे आणि अशा वस्तूला हात लावल्यास हात धुणे अत्यावश्यक असते तर मुलं व्हायरल इन्फेक्शन आणि इतर आजारांपासून वाचू शकतात.

सीडीसी च्या रिपोर्टनुसार ५ वर्षापेक्षा कमी वयाची मुलं दरवर्षी डायरिया आणि न्यूमोनियाचे भक्ष्य बनतात. डायरिया हा घाणीमुळे पसरणारा आजार आहे. त्यामुळे अशावेळी घर स्वच्छ ठेवणे व स्वत:ला स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

केव्हा मुलांनी हात धुवायला हवे

* वॉशरुम वापरल्यावर.

* शिंकताना, खोकताना व नाकात बोट

घातल्यास.

* खाण्याआधी व नंतर हात धुणे आवश्यक

आहे.

*  खेळल्यावर.

* द्य दुसऱ्याशी हात मिळवल्यास.

* पैशांना हात लावल्यास.

* बूट, चपलांना हात लावल्यास.

* वर्गात इतर कोणाचे साहित्य वापरल्यास.

* कोणत्याही जखमेला हात लावल्यास.

असे शिकवा आपल्या मुलाला हात धुणे

मुलांना हात धुणे शिकवायला आधी तर त्यांना इंग्रजीतील ही ६ अक्षरं एस, यु, एम, ए, एन, के हे पाठ करायला सांगा. आता याचा अर्थ त्यांना सांगा :

एस : एस चा अर्थ अगदी सोपा आहे – आधी हात सरळ बाजूने स्वच्छ करा.

यु : यु चा अर्थ आहे उलटा, आता हात उलटा करून धुवा.

एम : एम चा अर्थ मूठ. दोन्ही हात जोडा आणि त्याची मूठ  तयार करा आणि रगडा.

ए : ए म्हणजे अंगठा. अंगठा स्वच्छ करा.

एन : एन म्हणजे नखं. आता दोन्ही हाताची नखं साफ करा.

के : के म्हणजे कलाइ (मनगट) नखांनंतर मनगट चोळा.

इंग्रजीतील ही सहा अक्षरं तुमच्या मुलाला अगदी सहज हात धुवायला शिकवतील जे ते कधीच विसरणार नाहीत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें