* मोनिका गुप्ता

बुहानच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना नामक रोगाने आता भारतासोबाबत इतर अनेक देशांमध्ये पाय पसरले आहे. हे इतके भयानक संक्रमण आहे कि हे एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिपर्यंत सहज पोहोचते. कोरोना संक्रमणापासून दूर राहायचे असेल तर सर्वात आवश्यक आहे ते हात चांगले धुणे. तसे पाहता लोक हात धुण्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात. अनेक लोक तर हात धुणे याचा अर्थ  पाणी आणि साबण वाहू देणे असाच घेतात. म्हणजे बहुतांश लोकांना हात धुण्याची योग्य पद्धतच माहीत नाही. ज्यामुळे लोकांमध्ये संक्रमण आणि निरनिराळे आजार पसरत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ति वर्षानुवर्षे हे मानत आले आहेत की आजारांपासून दूर राहायचे असेल तर हात धुण्याची प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे. एका शोधानुसार आपल्या देशातील ४० टक्के लोक जेवणाआधी हात धूत नाहीत. जर आपण हात धुण्याची प्रक्रिया प्रामाणिकपणे पाळली तर आपण अशा अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. कोणत्याही आजाराशी लढण्याचे हात धुणे हे पहिले हत्यार आहे.

का आवश्यक असते हात धुणे

आपण दिवसभर जे काही काम करतो, त्यात आपल्या हातांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे हातांवर किटाणू असणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. जेव्हा केव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो, आपण लिफ्टचा वापर करतो. बटणांना स्पर्श करतो, मेट्रोमध्ये हॅण्डल, ऑफिसमध्ये दरवाजाला स्पर्श करणे, नळाची तोटी, रेलिंग इत्यादींना स्पर्श करत जातो. जर आपण आपले संक्रमित हात न धुता जेवण घेतले, कोणाशी हस्तांदोलन केले, घरात लहान मुलांसोबत खेळलो वा त्यांना काही खाऊ घातले तर हातावर असलेले किटाणू रोगजंतू बनून आपल्या लोकांपर्यंत सहज पोहोचतात.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी अमेरिकेतील डॉक्टर्सनी ‘डोन्ट टच युअर फेस’ ही  मोहीम चालवली होती. या मोहिमेद्वारे डॉक्टरांना सांगायचे होते की कोविड -१९ पासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या चेहऱ्याला कमीतकमी हात लावा. जर आपण सतत चेहऱ्याला हात लावण्याची सवय सोडून दिली तर कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरण्याची शक्यता कमी होते. एका संशोधनातून हे लक्षात आले की माणूस एका तासात जवळपास २३ वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...