कोरोना काळात वाढतोय मुलांमध्ये तणाव

* सुनील शर्मा

एके दिवशी, दहा वर्षीय नीरज अचानक आईला म्हणाला, ‘‘मम्मी, मामाच्या घरी जाऊया.’’

हे ऐकून त्याच्या आईने समजावले की, ‘‘बाळा, सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आहे, म्हणून आपण कुठेही जाऊ शकत नाही.’’

हे ऐकून नीरज निराश झाला आणि पाय आपटत रागाने म्हणाल, ‘‘हे काय आहे… किती दिवस झाले, आपण कुठेच गेलोलो नाही.’’ फक्त घरातच राहायचे. उद्यानात किंवा मित्रांना भेटण्यासाठीही जाता येत नाही. सतत थोडया-थोडया अंतराने सॅनिटायझरने हात धुवावे लागतात आणि जरा जरी घराबाहेर गेल्यास तोंडावर मास्क लावावा लागतो. खेळण्यासाठी फक्त टेरेसवरच जाता येते…

‘‘मी आता कंटाळलो आहे. जेव्हा तुझ्याकडे मोबाइल मागतो, तेव्हा बाबा ओरडतात आणि तू मात्र दिवसभर इअरफोन लावून मोबाइलवर वेब सीरीज पाहत बसतेस.’’

मार्च २०२१ च्या अखेरच्या आठवडयापासून संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाशी झुंज देत आहे. कितीतरी लोक घरात बंद आहेत, विशेषत: मुले घरात कैद झाली आहेत. ती शाळेत जाऊ शकत नाहीत. पार्क सामसूम झाले आहेत.

सुरुवातीला मुलांना असे वाटले होते की, शाळा बंद झाल्या म्हणजे आता दिवसभर मजा करायची. परंतु हळूहळू त्यांना समजले की, हे सुट्टीचे दिवस नाहीत, तर त्यांच्या निरागस बागडण्यावर जणू कर्फ्यू लावण्यात आला आहे.

याचा परिणाम असा झाला की, नीरजसारख्या लहान मुलांच्या मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागले आहेत. ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान करू शकतो.

सध्या तरी ही समस्या प्राथमिक टप्प्यात आहे, म्हणूनच मुले वैतागत असल्यास मोठयांनी रागावू नये. उलट त्यांनी मुलांना या मोकळया वेळेत एखादे चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.

गॅझेट बनले आधार

केमिकल लोच्याबाबत बोलायचे झाल्यास, लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, तणावामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होतात. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा दिनक्रम बदलला आहे. मोठी माणसे कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर पडतात, पण मुले मात्र ‘बिग बॉस’ या रिएलिटी शोच्या स्पर्धकांप्रमाणे घरातच बंदिस्त झाली आहेत.

दुसरीकडे मुलांच्या शाळा सध्या बंद असल्या तरी ऑनलाइन अभ्यास मात्र सुरू आहे. त्यामुळे अभ्यासाशिवाय ते मनोरंजनसाठीही मोबाइल, संगणक, लॅपटॉप किंवा टीव्हीचाच आधार घेतात. यामुळे केवळ त्यांच्या डोळयांवरच वाईट परिणाम होत नाही तर मानसिकदृष्टयाही ते थकून जातात.

सध्या आपल्या ही गोष्ट लक्षात आलेली नाही, पण हे कटू सत्य आहे की, टीव्हीवरील कोरोनाशी संबंधित नकारात्मक बातम्या सातत्याने ऐकल्यामुळे मोठया माणसांसोबतच मुलांमध्येही तणाव वाढत आहे.

या तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? तर अशा परिस्थितीत मुलांना काहीही करून नकारात्मक वातावरणातून बाहेर काढणे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांना घरी किंवा छतावर असे खेळ खेळायला प्रोत्साहित करायला हवे, ज्यामुळे त्यांचा व्यायाम होईल, त्यांना भरपूर घाम येईल. याशिवाय त्यांना चित्रकला, पुस्तके वाचणे किंवा इतर कोणत्यातरी कलेत गुंतवून ठेवा.

यांनी असे केले

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार असलेल्या सोना चौधरी यांना २ मुलगे आहेत. कोरोना काळात ही दोन्ही मुले घरातील कामात आईला मदत करतात. स्वयंपाकघरात काहीतरी नवीन पदार्थ बनवतात. कविता लिहितात.

सोना चौधरी यांच्या २ मुलांपैकी मोठा मुलगा सुजल १५ वर्षांचा असून अकरावीत शिकतो. तर, १२ वर्षांच्या लहान मुलाचे नाव व्योम आहे आणि तो आठवीत शिकतो. दोघांनाही पुस्तक लिहिण्याची आवड आहे आणि त्यांनी प्रत्येकी २ पुस्तके लिहिली आहेत.

सोना चौधरी यांनी सांगितले की, ‘‘मी दोघांकडून घराच्या साफसफाईसारखी कामे करून घेते. मीही त्यांच्या बरोबरीने हे काम करते. त्यांना स्वयंपाकघरात माझ्या सोबत ठेवते, शिवाय मोकळा वेळ मिळताच त्याच्यांबरोबर खेळते.’’

सोना चौधरी यांच्या मते, ‘‘सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या वागणुकीत बदल झाला आहे. म्हणूनच पालक आणि शिक्षकांनी मुलांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मुले शाळेसोबतच आपल्या आजूबाजूच्या परिसराकडूनही खूप काही शिकत असत. घरातील कामातून शिकत असत.

‘‘सध्याच्या कोरोना काळात मुलांना घरातच प्रात्यक्षिक करून शिकण्याची संधी मिळाली आहे. ऑनलाइन शिकवणी चांगली आहे, परंतु मुलांना चांगल्या प्रकारे जगायची शिकवण मिळावी यासाठी वडीलधाऱ्यांनी त्यांना स्वत:सोबत ठेवायला हवे. ते जे काही करतात ते मुलांना दाखवायला हवे, शिकवायला हवे. यालाच कौशल्यांचा सराव असे म्हणतात. चीनसारख्या देशात लहान वयातच मुलांकडून कौशल्यांचा सराव करून घेतला जातो.

महिला काँग्रेसशी संबंधित आणि आया नगर प्रभागातील उपाध्यक्षा मधु गुप्ता यांना २ मुले आहेत. १० वर्षांची अग्रिमा आणि ७ वर्षांचा समन्वय. मधु गुप्ता यांनी सांगितले की, ‘‘एकीकडे ऑनलाइन वर्गामुळे त्यांचा स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ वाढत आहे. ती आळसावत असून त्यांची शारीरिक हालचालही कमी होत असल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. पण, दुसरीकडे कोरोना कालावधीत मुले घरीच असल्यामुळे मी या वेळेचा सकारात्मक उपयोग करून घेत आहे. मी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते आणि त्यांनी घरातील इतर कामे शिकावीत यासाठी त्यांना मदत करते. जसे की, डायनिंग टेबल मांडणे, खाण्याची भांडी स्वयंपाकघरात ठेवणे, कपाटात स्वत:चे कपडे नीट लावून ठेवणे, खोली स्वच्छ करणे इत्यादी.

‘‘राजकारणात असण्यासोबात मीसुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहे, म्हणूनच दररोज मला घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत, मुश्किलीने मिळणारा थोडासा वेळही योग्य प्रकारे वापरून त्यावेळेत मुलांना चांगल्या सवयी, घरकाम शिकवून मी माझा दिनक्रमही सहजसोपा करून घेतला आहे.’’

पण प्रत्येक घरात असे घडत नाही. कोरोनामुळे बऱ्याच लोकांचा रोजगार गेला आहे. याचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावर वाईट परिणाम होत आहे. मुलेही याला अपवाद नाहीत. परंतु काही खबरदारी घेतल्यास मुलांचा ताण कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त जर तुमचा मुलगा असामान्यपणे वागत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

१० उपाय गर्भावस्थेत अशी घ्या आपली काळजी

* गरिमा पंकज

गर्भावस्थेदरम्यान महिलांना अनेक शारीरिक आणि भावनिक बदलांचा सामना करावा लागतो. अशावेळेस आई आणि जन्म घेणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे की गर्भधारण करण्यापूर्वीच प्लानिंग केली जावी. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेच्या दरम्यान, प्रसूतीच्या कालखंडात आणि प्रसूतीनंतर.

चला जाणून घेऊया चारही अवस्थांदरम्यान आवश्यक दक्षतांविषयी :

गर्भधारणेपूवी

जर आपण माता बनण्याची योजना बनवत असाल तर सगळयात अगोदर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञास भेटावे. यामुळे आपणास निरोगी प्रेगनन्सी प्लॅन करण्यास मदत होईल. गर्भधारण करण्याच्या ३ महिने आधीपासून जो प्री प्रेगनन्सी पिरियड म्हटला जातो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल आणल्याने ना केवळ प्रजनन क्षमता सुधारते तर त्याचबरोबर गर्भावस्थेच्या दरम्यान होणाऱ्या समस्याही कमी होतात आणि प्रसूतीनंतर रिकव्हर होण्यास मदत मिळते.

प्रेगनन्ट होण्याआधी आपल्या मेडिकल हिस्ट्रीविषयी डॉक्टरांशी अवश्य चर्चा करा. खालील गोष्टींवर लक्ष्य द्या :

* आपणास डायबिटीज, थायरॉईड, दमा, किडनी, हार्ट डिसीज इत्यादी तर नाही ना. जर असेल तर प्रेगनन्सीच्या अगोदर त्याला नियंत्रित अवश्य करा.

* गर्भधारणेपूर्वी एचआयव्ही, हेपिटायटिस बी सिफिलिस इत्यादी टेस्ट अवश्य करून घेतल्या पाहिजे, ज्यामुळे प्रेगनन्सी किंवा प्रसूतीच्या वेळेस हे इन्फेकशन बाळात येणार नाही.

* आपण ब्लड टेस्ट करून हे लक्षात घ्या की चिकनपॉक्ससारख्या आजारापासून वाचवणारी लस घेतली आहे किंवा नाही. आपणास या आजारापासून धोका तर नाही ना, कारण असे इन्फेक्शन गर्भात वाढणाऱ्या अर्भकाला नुकसान पोहोचवू शकते.

* आपणास युटरीनं फाइब्रायड्स आणि एंडोमिट्रिओसिसच्या शक्यतेसाठीही तपासणी करून घेतली पाहिजे.

* जर आपल्या कुटुंबात डाउन सिंड्रोम, थैलेसिमियाचा इतिहास राहिला असेल तर याविषयीही डॉक्टरांना सांगावे.

सर्व्हायकल स्मीयर : आठवून पाहा की आपण मागच्या वेळेस सर्व्हायकल स्मीयर टेस्ट कधी करून घेतली होती. जर पुढची टेस्ट येणाऱ्या १ वर्षात करणे बाकी आहे तर ती आत्ताच करून घ्या. स्मीयर तपासणी साधारणपणे गर्भावस्थेत केली जात नाही, कारण गर्भावस्थेमुळे गर्भाशयमुखामध्ये बदल होऊ शकतात आणि योग्य रिपोर्ट येण्यात अडचणी येऊ शकतात.

वजन : जर आपले वजन जास्त असेल आणि बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) २३ किंवा यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टर आपल्याला वजन कमी करण्याचा सल्ला देतील. वजन घटवल्याने आपली गर्भधारण करण्याची शक्यता वाढते आणि आपण आपल्या गर्भावस्थेची निरोगी सुरुवात करू शकता.

जर आपले वजन कमी असेल तर डॉक्टरांशी बीएमआई वाढवायच्या सुरक्षित उपायांविषयी चर्चा करा. जर आपले वजन कमी असेल तर मासिक पाळी अनियमित राहण्याची शक्यता अधिक असते. यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात. आपला बीएमआई १८.५ आणि २२.९ च्या मध्ये असायला हवा.

गर्भावस्थेच्या दरम्यान : द इंस्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या गाईडलाईन्सच्या अनुसार प्रेगनन्सीदरम्यान महिलेने आपल्या बीएमआईच्या हिशोबाने वजन वाढवायला हवे. अंडरवेट वुमन अर्थात बीएमआई १८.५ पेक्षा कमी असेल तर तिने १२ ते १८ किलो वजन वाढवायला हवे. नॉर्मल वेट वुमन अर्थात बीएमआई १८.५ ते २५ असेल तर ११ ते १५ किलोपर्यंत वजन वाढवा. महिला ओवर वेट असेल अर्थात २५ ते ३० पर्यंत बीएमआई असेल तर तिने ७ ते ११ किलोपर्यंत वजन वाढवायला हवे. ३० पेक्षा जास्त बीएमआई असल्यास ५ ते ९ किलोपर्यंत वजन वाढवायला हवे.

व्यायाम : व्यायाम हेल्दी लाइफस्टाइलचा महत्वाचा भाग आहे. कुठले कॉम्प्लिकेशन नसतील तर प्रेगनन्सी वुमनला हेल्दी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करत राहिले पाहिजे. कमीतकमी ३० मिनिटांचा साधा व्यायाम अवश्य करावा. आईस हॉकी, किक बॉक्सिंग, रायडींग इत्यादी करू नये.

समतोल आणि पौष्टिक आहार घ्यावा : मॅक्स हॉस्पिटल, शालिमार बाग, दिल्लीचे डॉक्टर एसएन बसू म्हणतात की गर्भावस्थेच्या दरम्यान समतोल आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावे. ज्यामुळे बाळाचा विकास आणि आपल्या शरीरामध्ये होत असलेल्या बदलांसाठी आपले शरीर तयार होऊ शकेल. एक माता बनणाऱ्या महिलेला सामान्यपणे दररोज ३०० अतिरिक्त कॅलरीजची आवश्यकता असते.

सप्लिमेंट्स : गर्भावस्थेच्या दरम्यान दररोज कॅल्शियम, फौलेट आणि आयरनच्या निश्चित प्रमाणाची सतत आवश्यकता असते. यांच्या पूर्ततेसाठी सप्लिमेंट्सचे सेवन करणे आवश्यक असते. कॅल्शियम-१२०० एमएल, फौलेट-६०० ते ८०० एमएल, आयरन-२७ एमएल.

प्रत्येक गर्भवती महिलेने गर्भावस्थेच्या दरम्यान १०० एमजीच्या आयर्नच्या १०० गोळयांचे सेवन अवश्य करायला हवे. हे माता आणि बाळ दोघांसाठी आवश्यक आहे.

प्रेगनन्ट महिलेने नेहमी फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुऊन खायला पाहिजे.

पुरेशी झोप घ्या : प्रेगनन्ट महिलांना भरपूर आराम आणि झोपेची आवश्यकता असते. त्यांनी रात्री कमीतकमी ८ तास आणि दिवसा २ तास झोपायला हवे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची लय बिघडून जाते.

शारीरिक रूपाने सक्रिय राहा : गर्भावस्थेच्या दरम्यानही आपली सामान्य दिनचर्या चालू ठेवा. घरातले काम करा. जर नोकरी करत असाल तर ऑफिसला जा. रोज अर्धा तास फिरा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपले वर्कआऊट चालू ठेवा. लक्षात घ्या की यादरम्यान दोरीवरून उडी मारू नये आणि कोणतेच असे कार्य करू नये ज्यामुळे शरीराला झटका लागेल.

भावनिक आरोग्याची काळजी घ्या : गर्भावस्थेत भावनिक आरोग्याची काळजी घ्या. मूड स्विंग जास्त होत असेल तर औदासिन्याची शिकार होऊ शकता. जर २ आठवडयापर्यंत ही स्थिती राहिली तर डॉक्टरांशी संपर्क करावा.

प्रसूती : साधारण प्रसूतीमध्ये रिकव्हरी लवकर होते. ७ ते १० दिवसात शरीरामध्ये ऊर्जेची लेव्हल सामान्य होऊन जाते. याउलट साधारणपणे सिझेरियन प्रसूतीनंतर ४ ते ६ आठवड्यांपर्यंत कुठलेही काम न करण्याचा सल्ला दिला जातो. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर अधिक शारीरिक मेहनत करू नये.

एण्डोमॅट्रिओसिसमुळे वांझपणाचा धोका

* डॉ. क्षितिज मुर्डिया, इंदिरा इनफर्टिलिटी क्लीनिक एण्ड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी दिल्ली

एण्डोमॅट्रिओसिस गर्भाशयाशी निगडित एक समस्या आहे. ही समस्या स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेला सर्वात जास्त प्रभावित करते; कारण गर्भधारणा आणि मुलाला जन्म देण्यात गर्भाशयाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेक स्त्रिंमध्ये ही समस्या जास्त गंभीर होऊन शरीरातील इतर अवयवांवरही प्रभाव टाकते. तसंही अत्याधुनिक औषधं आणि उपचारांच्या वेगवेगळ्या पर्यायांनी वेदना आणि वांझपणा या दोन्हीपासून सुटका मिळवून दिली आहे. एण्डोमॅट्रिओसिसचा हा अर्थ नाही की याने ग्रस्त असलेल्या स्त्रिया कधीच आई होऊ शकत नाही, मात्र यामुळे गर्भधारणा करण्यास अडचण नक्कीच येते.

एण्डोमॅट्रिओसिस म्हणजे काय?

एण्डोमॅट्रिओसिस गर्भाशयातील आंतरिक थरावरील पेशींचा असामान्यरीत्या झालेला विकास असतो. ही समस्या तेव्हा होते जेव्हा पेशी गर्भाशयाच्या बाहेर विकसित होतात. याला एण्डोमॅट्रिओसिस इंप्लांट म्हणतात. हे इंम्प्लांट्स सामान्यपणे अंडाशय, फॅलोपियन ट्यूब्स, गर्भाशयाचा बाह्य स्तर किंवा आतड्या किंवा श्रोणिय गुहेच्या थरावर उद्भवत असतात. योनीमार्ग, सरविक्स आणि ब्लेडरवरही हे असू शकतात. फारच कमी प्रमाणात एण्डोमॅट्रिओसिस इंम्प्लांट्स श्रोणीच्या बाहेर यकृतावर किंवा कधी कधी फुफ्फुस वा मेंदूच्या आजूबाजूलाही होतात.

एण्डोमॅट्रिओसिसची कारणं

एण्डोमॅट्रिओसिसचा परिणाम स्त्रियांना त्यांच्या प्रजनन काळादरम्यान होतो. याची अनेक प्रकरणं २५ ते ३५ वर्षांच्या स्त्रियांमध्ये आढळतात. बऱ्याचदा १०-११ वर्षांच्या मुलींमध्येही अशा प्रकारची समस्या आढळून येतात. मॅनोपॉजचं वय ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये ही समस्या खूपच कमी असते. जगभरात कोट्यवधी स्त्रिया या समस्येने ग्रस्त आहेत. ज्या स्त्रियांना गंभीर श्रोणीय वेदना होते, त्यांच्यापैकी ८० टक्के एण्डोमैट्रिओसिसने ग्रस्त असतात.

यामागचं खरं कारण तर माहीत नाही, पण सर्वेक्षणांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की एण्डोमैट्रिओसिसची समस्या त्या स्त्रियांना जास्त असते ज्यांचा बौडी मास इंडेक्स (बीएमआय) कमी असतो. मोठ्या वयात आई होणाऱ्या किंवा कधीच आई न झालेल्या स्त्रियांमध्येही ही समस्या असू शकते. त्याचबरोबर ज्या स्त्रियांना पाळी लवकर सुरू होते किंवा मेनोपौज उशिराने होतो त्यांनाही याचा धोका संभवतो. त्याचबरोबर अनुवंशिक कारणंही यात महत्त्वाची भूमिका साकारतात.

एण्डोमॅट्रिओसिसची लक्षणं

अनेक स्त्रियांमध्ये एण्डोमॅट्रिओसिसची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. पण जी लक्षणं दिसतात त्यामध्ये पाळीच्या वेळेस जास्त वेदना होणं, पाळी किंवा अंडोत्सर्गाच्या वेळी पॅल्विक पेन एण्डोमॅट्रिओसिसचं एक लक्षण आहे. पण ही लक्षणं सामान्य स्त्रियांमध्येही दिसू शकतात.

* श्रोणी क्षेत्रात वेदना म्हणजे ओटीपोटात वेदना होणं आणि ही वेदना अनेक दिवस राहू शकते. याने कंबर आणि पोटदुखीही होऊ शकते आणि अनेक दिवस चालू शकते. मल-मूत्रोत्सर्जन करताना वेदना होऊ शकते. ही समस्या बऱ्याचदा पाळीच्या वेळेस जास्त होते. पाळीच्या वेळेस जास्त रक्तस्त्राव होणं, कधी कधी पाळी दरम्यानच जास्त रक्तस्त्राव होणं, शारीरिक संबंध ठेवताना किंवा नंतर वेदना होणं, डायरिया, मलावरोध किंवा जास्त थकवा येणं या समस्या होऊ शकतात. छातीमध्ये वेदना किंवा खोकताना रक्त येणं यांसारख्या समस्या फुफ्फुसांमध्ये एण्डोमॅट्रिओसिस असल्यास उद्भवतात आणि मेंदूमध्ये एण्डोमॅट्रिओसिस असल्यास डोकेदुखी आणि चक्कर येणं यांसारख्या समस्या उद्भवतात.

धोकादायक गोष्टी

अनेक गोष्टी एण्डोमॅट्रिओसिसची शक्यता वाढवतात. जसं की –

* मुलाला कधीच जन्म देऊ न शकणं.

* आपल्याजवळच्या एक किंवा त्यापेक्षा जास्त नातलगांना एण्डोमॅट्रिओसिस असणं.

* दुसरं एखादं वैद्यकीय कारण ज्यामुळे शरीरातून मासिक पाळीच्या स्त्रावाचा सामान्य मार्ग बाधित होतो.

* यूरिनचा असामान्यपणा.

एण्डोमॅट्रिओसिस आणि इनफर्टिलिटी

ज्या स्त्रियांना एण्डोमॅट्रिओसिस आहे त्यांच्यापैकी ३५ ते ५० टक्के स्त्रियांना गर्भधारणा करण्यास समस्या उद्भवते. यामुळे फॅलोपियन ट्यूब्स बंद पडतात, ज्यामुळे अंड आणि शुक्राणूंचं निषेचन (फलित होणं) होत नाही. कधी कधी अंड किंवा शुक्रांणूनाही अपाय होतो. यामुळेदेखील गर्भधारणा होत नाही. ज्या स्त्रियांमध्ये ही समस्या जास्त गंभीर नसते, त्यांना गर्भधारणा करण्यास जास्त अडचण येत नाही. डॉक्टरांचा सल्ला आहे की ज्या स्त्रियांना अशा प्रकारची समस्या आहे त्यांनी मुलाला जन्म देण्यास उशीर करू नये; कारण दिवसेंदिवस अशा स्त्रियांची परिस्थिती आणखीनच खराब होत जाते.

पहिल्यांदा एण्डोमॅट्रिओसिस माहिती तेव्हा कळली जेव्हा काही स्त्रिया वांझपणावर उपचार करत होत्या. एका आकडेवारीनुसार २५ ते ५० टक्के वांझ स्त्रिया एण्डोमॅट्रिओसिसने ग्रस्त असतात, तर ३० ते ५० टक्के स्त्रिया, ज्यांना एण्डोमॅट्रिओसिस असतं, त्या वांझ असतात.

वांझपणाची तपासणी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या लॅप्रोस्कोपिक परीक्षणाच्या वेळेस एण्डोमॅट्रियल इंप्लांटची माहिती कळते. अनेक अशा स्त्रियांमध्येही याची माहिती कळते, ज्यांना कसलीच वेदना होत नाही. एण्डोमॅट्रिओसिसमुळे स्त्रियांची प्रजननक्षमता का प्रभावित होते हे तर पूर्णपणे कळलं नाहीए, पण शक्यतो ऐनाटॉमिकल आणि हारमोनल कारणांमुळे ही समस्या उद्भवते.

एण्डोमॅट्रिओसिस आणि कॅन्सर

एका सर्वेक्षणानुसार ज्या स्त्रियांना एण्डोमॅट्रिओसिस असतं त्यांच्यात अंडाशयाची कॅन्सर होण्याची शक्यता अधिक वाढते. हा धोका त्या स्त्रियांना जास्त असतो ज्या वांझ असतात किंवा कधीच आई होऊ शकत नाहीत.

अजूनपर्यंत एण्डोमॅट्रिओसिस आणि ओवेरियन ऐपिथेलियन कॅन्सरमध्ये काय संबंध आहे याचं स्पष्ट कारण कळलं नाहीए. अनेक सर्वेक्षणांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की एण्डोमॅट्रिओसिस इंम्प्लांटच पुढे कॅन्सरमध्ये बदलतो. असंही सांगितलं जातं की, एण्डोमॅट्रिओसिस अनुवंशिक आणि पर्यावरणीय कारणांनीदेखील निगडित असू शकतं.

डायग्नोसिस

एण्डोमॅट्रिओसिसचं निदान करण्यासाठी या तपासण्या केल्या जातात –

* पॅल्विक ऐग्जाम : या तपासणीत डॉक्टर हातांनी ओटीपोटाची तपासणी करून कुठे काही असामान्य तर दिसत नाही, हे पाहातात.

* अल्ट्रासाउंड : याने एण्डोमॅट्रिओसिस असल्याचं कळत तर नाही, पण त्यांच्याशी निगडित सिस्टची ओळख होते.

* लॅप्रोस्कोपी : एण्डोमॅट्रिओसिस आहे की नाही याचं निदान करण्यासाठी एक लहानशी शस्त्रक्रिया केली जाते ज्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. यामध्ये पेशींचे नमुनेही घेतले जातात, ज्यांची बायोप्सी केल्याने हे कळतं की एण्डोमॅट्रिओसिस शरीरात कुठे उपस्थित आहे.

रिस्क फॅक्टर

पाळीच्या वेळेस होणारा रक्तस्त्राव आणि सहवास करताना होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नका. परिस्थिती जास्त गंभीर होण्यापूर्वीच एखाद्या फर्टिलिटी तज्ज्ञाची भेट घ्या. याच्या उपचारासाठी औषधं आणि शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. याच्या उपचारासाठी हारमोन थेरेपीरही वापरली जाते. कारण मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या हारमोन परिवर्तनामुळेदेखील ही समस्या उद्भवते. हारमोन थेरेपीमुळे एण्डोमॅट्रिओसिसचा विकास मंदावतो आणि पेशींचा नवीन इंन्प्लांटही थांबतो.

एण्डोमॅट्रिओसिसमुळे होणाऱ्या वेदनेसाठी डॉक्टर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करणं योग्य समजतात. तसंच वांझपणाच्या समस्येसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा सल्ला दिला जातो, जेणेकरून जास्त अपाय होण्यापूर्वीच अपत्य प्राप्ती केली जाऊ शकेल.

कोरोनानंतर सांधेदुखीच्या घटना वाढल्या

* मोनिका अग्रवाल

आजकाल सांधेदुखीची वाढती प्रकरणे ही नवीन आणि विलक्षण गोष्ट नाही, परंतु कोरोना युगात तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्येही ही समस्या झपाट्याने वाढली आहे. कोविडमुळे, लोकांचे एकूण आरोग्य धोक्यात आहे कारण या संसर्गामुळे प्रभावित व्यक्ती दीर्घकाळ होम क्वारंटाईन किंवा हॉस्पिटलायझेशनमुळे निष्क्रिय होते. या व्यतिरिक्त, विषाणूच्या दुष्परिणामांमुळे स्नायू आणि सांध्यातील अशक्तपणाची प्रकरणे वाढली आहेत.

डॉ. अखिलेश यादव, वरिष्ठ हिप आणि गुडघा रिप्लेसमेंट सर्जन, गुडघा आणि हिप केअर सेंटर, गाझियाबादच्या मते, कोविड समस्यांसह कौटुंबिक पार्श्वभूमी, वय संबंधित समस्या, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, संधिवातासारखे संक्रमण, ऑस्टियोपोरोसिस आणि दाहक रोग यांसह अनेक कारणे सांधेदुखीची प्रकरणेही वाढत आहेत. जीवनसत्त्वे डी 3 आणि बी 12 सह इतर पोषक घटकांच्या कमतरतेमुळे सांधे मजबूत करणाऱ्या हाडे आणि गुडग्यांवर वाईट परिणाम होतो.

कोविडनंतरच्या टप्प्यात आधीच कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असलेले लोक सांधेदुखी, सूज, स्नायू आणि सांधे मध्ये कडकपणा, चालण्यास अडचण इत्यादींना बळी पडतात. या समस्येची तीव्रता अल्पवयीन ते अल्पवयीन असताना, अनेक रुग्ण लॉकडाऊन दरम्यान अशा गंभीर आणि वारंवार होणाऱ्या समस्यांच्या तक्रारी घेऊन आले आहेत.

घरातून काम करणेदेखील व्यावसायिकांमध्ये सांधेदुखीचे एक प्रमुख कारण बनत आहे. जरी बहुतेक काम करणारे व्यावसायिक नेहमी घरून काम करण्याचे स्वप्न पाहत असले तरी, चुकीचे बसणे, लॉकडाऊन दरम्यान काम करताना आरामदायक स्थितीत काम करणे यामुळे संयुक्त रोग बराच काळ वाढत आहेत.

फिट रहा खुश रहा

* पूनम अहमद

जगभरात ‘हेल्दी खाणे आणि वेट कमी करणे’ या दोन गोष्टींसाठी लोक जिममध्ये जाण्याचा अट्टाहास करताना दिसून येतात. मात्र कालांतराने हा उत्साह थंड झालेला दिसून येतो. कोणाकडे वेळ कमी असतो तर कोणाला जेव्हा मनासारखा परिणाम दिसून येत नाही, त्यांचा उत्साह हळूहळू कमी होऊ लागतो.

अशात आपल्या दृष्टिकोन आणि फिटनेस प्लॅनमध्ये काही बदल करून तुम्ही कायम वर्ष फिट आणि फ्रेश राहू शकता.

कसे रहाल फिट

फिटनेस ट्रेनर गौरव गुप्ता सल्ला देतात की वेट उचलायला मागे पुढे पाहू नका. बरेच लोक धावणे आणि ट्रेडमिलवर चालणे यालाच फिटनेस समजतात. असे ब्रिस्क आणि जॉगिंग पुरेसे समजले जाते. वेट ट्रेनिंगमुळे तुमचा मेटाबोलिक रेट वाढतो. ज्यामुळे तुमचे शरीर आराम करूनही फॅट बर्न करते.

झुंबा स्पेशालिस्ट आणि मास्टर सविता पाल म्हणतात, तुमचे शरीर काळानुसार बदलत असते, तुमच्या एक्सरसाइजच्या स्ट्रेस नुसार अॅडजस्ट आणि मजबूत होत असते. कधी कधी बॉडी वेट बूट कॅम्पमध्ये जा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर छोटे छोटे वर्कआउट करा.

होलिस्टिक लिविंग कॉन्सेप्टच्या डॉक्टर दीपा यांचे म्हणणे आहे की कुठेही १० ते ३० मिनिटांचे हाय इंटेन्सिटी वर्कआउट करा. यामुळे कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होईल आणि वर्कआउटनंतर काही तासांसाठी तुमचा मेटाबोलिक रेट वाढलेला असेल.

यू ट्यूबवर फिटनेस ब्लॉग आणि फूड चॅनेलचे रणवीर सांगतात आपल्या शेड्युलमध्ये एक्सरसाइजचे रुटीन ठरवून टाका आणि त्यापासून मागे हटू नका. कोणताही वेळ जो तुम्हाला सोयीचा आहे तो निवडा आणि हे आपले जरुरी काम समजा आणि याला इग्नोर करू नका.

सविता पाल सल्ला देतात, ‘‘एक फिटनेस सोबती शोधा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही खूप एक्सरसाइज केली आहे, तेव्हा तोच सोबती तुम्हाला आणखी एक सेट करण्यासाठी उत्तेजन देऊ शकतो. हे आणखी जरासेच तुम्हाला खूप मोठा फरक जाणवून देईल. तुम्ही स्वत:ला जास्त स्ट्राँग फील कराल.’’

स्वत:ला करा मोटिव्हेट

आदिदासच्या मुंबई कॅप्टन यांच्या अनुसार थोडयाशा प्रेरणेनेही खूप उत्साह वाटतो. खेळाडूंची चरित्रे वाचा.

पालसुद्धा म्हणतात की तुम्ही सोशल मिडियावर फिटनेसचे व्हिडिओ बघून आपल्या फिटनेसच्या उद्देशासाठी प्रेरणा मिळवू शकता.

लेलिस्टिक न्युट्रीशनच्या ल्यूक यांचे म्हणणे असे आहे की जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यावा लागत असेल तर तुमच्या स्लीप पॅटर्न आणि रुटीन यांच्याकडे लक्ष देणे जरुरी आहे.

झोपेतही आपले शरीर अनेक अवस्थांतून जात असते जसे की सेल ग्रोथ, डिटॉक्सिफिकेशन, सेल्युलर रिपेअर, हीलिंग आणि रिज्युव्हीनेशन. बहुतांश स्वस्थ प्रौढ व्यक्तिला रात्रीची ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते. जर तुम्हाला झोपण्यात काही समस्या असेल तर, फोन आणि लॅपटॉपपासून रात्री दूरच रहा. अल्कोहोल, कॅफिन किंवा गोड पदार्थ झोपण्याआधी २ तास घेऊ नका.

पाणी कमी प्यायल्याने थकवा जाणवू शकतो. त्यामुळे जास्त पाणी प्यावे.

ल्यूक म्हणतात प्रत्येक पोषक तत्त्व हे अनेक मेटाबोलिक प्रोसेसशी जोडलेले असते. १ टक्के जरी कमी झाले तरी एनर्जीवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डी, बी १२, के, आयर्न, मॅग्नेशिअम, सिलेनियम, पोटॅशिअम आणि क्यू १०कडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. पण यांच्या कमतरतेमुळे मांसपेशींना थकवा आणि मानसिक तणाव उद्भवू शकतो.

आपल्या आहारातील पोषक तत्त्वे ग्रहण करण्यासाठी मेटाबोलिज्म वाढवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. हे आपल्या आहारात अवश्य घ्या.

साखर, मैद्यापासून बनलेल्या पदार्थांमुळे मेटाबोलिक रेट कमी होऊ शकतो. त्यामुळे केक, पेस्ट्री, बिस्किट्स यांच्यापासून दूर रहा.

फिटनेस ट्रेनर सनी पाल यांचे असे म्हणणे आहे की हल्ली लोक शारीरिक दृष्ट्या सोयीसुविधांचे आयुष्य उपभोगत आहेत. त्यामुळे दररोज १०,००० पावले अवश्य चाला. त्यामुळे १५० कॅलरी बर्न होईल, चालण्याची कोणतीही संधी सोडू नका. कार थोडी लांब पार्क करा, ज्यामुळे तुमची थोडी चाल होईल. ऑफिस ब्रेकमध्येही चालण्याचा प्रयत्न करा. जिने चढा, प्रत्येक पाच पावलांना एक कॅलरी बर्न होते. साधारणपणे जिन्याच्या पॅटर्नमध्ये १४ पायऱ्या असतात, त्यामुळे लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. जर रुटीन वर्कआउटने बोअर झाला असाल तर, ज्यांना डान्स करणे आवडते त्यांनी झुंबा जॉइन करावे. ट्रेकिंग किंवा हायकिंग यासारख्या अॅक्टिव्हिटीमुळे वर्कआउटसोबतच सोशल अफेअरही होऊ शकते.

फिट राहण्यासाठी थोडीशी मेहनत करून पहा, तुम्हाला चांगले वाटेल. आणि असे म्हटले जातेच की एका स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन वास करते, तेव्हा आजपासूनच सुरुवात करा आणि स्वस्थ रहा.

९ सवयी वाढवतात मुरूमांच्या समस्या

– गरिमा पंकज

सुंदर दिसणं आपल्यासाठी आनंददायी तर असतंच, पण यामुळे आत्मविश्वासही वाढतो, जो तुम्हाला जगाशी सामना करायला शिकवतो. परंतु आजच्या काळात वाढते प्रदूषण, आहाराच्या वाईट सवयी, वाढता तणाव इत्यादी कारणामुळे त्वचा सगळयात जास्त प्रभावित होते. एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत जागणे आणि जीवनशैलीशी संबधित इतर अनेक वाईट सवयी त्वचेला निर्जीव बनवतात व मुरुमांची शिकारही. या, अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊ, ज्या मुरुमांचे कारण ठरतात.

सतत त्वचेला स्पर्श करणं : आपले हात दिवसभरात हजारो बॅक्टिरियाच्या संपर्कात येत असतात. अशावेळेस पुन्हा-पुन्हा हात धुण्याची आवश्यकता वाटत नाही. पण अशा स्थितीत कितीतरी वेळा कळत नकळत आपण आपल्या त्वचेला स्पर्श करत असतो. अशाप्रकारे आपण आपल्या त्वचेपर्यंत बॅक्टिरिया, धूळ आणि अस्वच्छता पोहोचवण्याचे काम करत असतो. जे मुरुमांना कारणीभूत ठरते.

चुकीच्या पद्धतीने स्क्रब करणे : आपल्याला वाटते की आपण चेहऱ्यावर वारंवार स्क्रब करून किंवा टॉवेलने पुसून आपल्या रोमछिद्राला खोलपर्यंत साफ करत आहोत. पण वास्तविकता काही वेगळीच असते. असे करून आपण त्वचेला इजा पोहोचवत असतो.

घाणेरड्या मेकअप ब्रशचा वापर : बऱ्याच वेळा आळशीपणामुळे आपण आपला मेकअप ब्रश न धुता त्याचा वारंवार वापर करतो. आपल्याला वाटते की याचा वापर आपल्याशिवाय कोणी दुसरे करत तर नाहीए. पण ही एक मोठी चूक आहे. ब्रशमध्ये जमलेली धूळ आणि शिल्लक राहिलेले मेकअप त्याच्या तंतूंमध्ये अडकून राहतो.

व्यायाम केल्यावर स्नान न करणे : व्यायाम केल्यानंतर शरीरातून घाम येतो, बाहेरचे प्रदूषण, धूळ-माती इत्यादी घामात मिसळून मुरूमे तयार करतात.

पूर्ण झोप न घेणे : पर्याप्त झोप न घेतल्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्ट्रेस लेव्हल वाढते. याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. म्हणून निरोगी त्वचेसाठी आणि मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी पुरेशी झोप घ्यायला विसरू नये.

मुरुमांना दाबणे किंवा स्क्रॅच करणे : मुरुमांना दाबू वा फोडू नये कारण यामुळे त्वचेत संक्रमण होण्याचा धोका वाढतो.

सन एक्सपोजर : कडक ऊन्हात जास्त वेळ राहिल्यामुळेही मुरुमांची समस्या उद्भवते. कडक ऊन्हामुळे ना केवळ  टॅनिंगची समस्या निर्माण होते तर याचबरोबर त्वचाही जास्त रूक्ष होते. यामुळे त्वचेतील ऑईल वाढते आणि मुरुमे जास्त होऊ लागतात. म्हणून कडक ऊन्हात जाण्यापूर्वी चेहरा झाकून घ्या किंवा सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा.

तणावाग्रस्त राहणे : ज्यांना मुरुमांची समस्या आहे, त्यांच्यासाठी तणावाग्रस्त राहणे नुकसानदायक ठरू शकते. कारण तणावामुळे मुरुमे जास्त वाढत असतात, तणावापासून वाचण्यासाठी प्रत्येक स्थितीत खुश राहायला शिकले पाहिजे. आपण जेवढे आनंदी राहाल, तेवढेच मुरुमांपासून दूर राहाल.

चुकीच्या आहारपद्धती : मुरुमांचे एक कारण चुकीची आहारपद्धती आहे. दिवसाला कमीतकमी ८-१० पेले पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि डागरहित राहते. हिरव्यागार भाज्या जास्त खाव्या, चिंच, बटाटे, मिरची, वांगी, कच्चा कांदा, मुळा कॉपी, चहा इत्यादींचे सेवन कमीतकमी करावे, मध सेवन करू नये, ग्रीन टी घ्यावी. हर्बल फेस वॉशचा वापर करावा.

पुरेसे प्रोटीन घेत आहात ना

* डॉ. श्रुति शर्मा, डाएट समुपदेशक, बॅरिएट्रिक व न्यूट्रिशनिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

प्रोटीन म्हणजेच प्रथिने ही शरीरात स्नायू, अवयव, त्वचा, एंजाईम, हार्मोन्स इत्यादी बनविण्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. हे लहान रेणू आपल्या शरीरात अनेक महत्त्वपूर्ण कार्य करतात.

आपल्या शरीरात २० प्रकारचे अमिनो अॅसिड असतात. यातील ८ महत्त्वाचे अमिनो अॅसिड म्हणून ओळखले जातात, कारण शरीर ते स्वत: बनवू शकत नाही. म्हणूनच यांचे आहारातून सेवन करणे फार महत्त्वाचे असते. उर्वरित १२ अमिनो अॅसिडना अनावश्यक म्हटले जाऊ शकते, कारण आपले शरीर हे स्वत: तयार करू शकते. प्रोटीन लहान रेणूंनी बनलेले असतात, त्यांना अमिनो अॅसिड म्हणतात. हे अमिनो अॅसिड एकमेकांच्या साथीने प्रोटीनची साखळी तयार करतात.

प्रथिनयुक्त आहाराच्या पचनासाठी शरीराला अधिक ऊर्जा आवश्यक असते. म्हणूनच प्रथिनांचे पचन होताना शरीरात साठलेल्या कॅलरीज (चरबी आणि कार्बोहायड्रेट) बर्न होतात. अशाप्रकारे प्रथिनांचे सेवन केल्यामुळे शरीराचे वजन सामान्य राहते.

तुम्ही शाकाहारी असाल आणि अॅनिमल प्रोटीनचे सेवन करत नसाल तर तुमच्यासाठी शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करणे थोडेसे कठीण असते. हेच कारण आहे की शाकाहारी लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता असण्याची शक्यता थोडी जास्त असते.

एखाद्या व्यक्तिला सरासरी किती प्रोटीनची आवश्यकता असते?

प्रत्येक व्यक्तिला त्याच्या शरीरानुसार वेगवेगळया प्रमाणात प्रथिने आवश्यक असतात. हे व्यक्तिची उंची आणि वजनावर अवलंबून असते. योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुम्ही किती कार्यक्षम आहात, तुमचे वय काय आहे? तुमचे स्नायू कसे आहेत? तुमचे आरोग्य कसे आहे?

जर तुमचे वजन सामान्य असेल, तुम्ही जास्त व्यायाम करत नसाल, वजन उचलत नसाल तर तुम्हाला सरासरी ०.३६ ते ०.६ ग्रॅम प्रति पौंड (०.८ ते १.३ ग्रॅम प्रति किलोग्रॅम वजन) प्रथिने आवश्यक आहेत. पुरुषासाठी दररोज सरासरी ५६ ते ९१ ग्रॅम आणि महिलेसाठी दररोज सरासरी ४६ ते ७५ ग्रॅम प्रथिनांची गरज असते.

प्रथिनांची कमतरता म्हणजे काय?

प्रथिनांची कमतरता असल्यास शरीरात बरेच बदल होऊ शकतात. त्याच्या अभावामुळे शरीराच्या जवळजवळ प्रत्येक कार्यावर परिणाम होतो. ही १३ लक्षणे सूचित करतात की तुम्ही तुमच्या आहारातून पुरेशा प्रथिनांचे सेवन करीत नाही.

वजन कमी होणे : प्रथिनांची कमतरता दोन प्रकारची असते.

पहिला- क्वाशिओरकोर. तुम्ही पुरेशा कॅलरीज घेत असाल, पण तुमच्या आहारात प्रथिनांची कमतरता असेल तेव्हा हे होते. दुसरे म्हणजे मरॅज्मस. हे तेव्हा होते जेव्हा तुम्ही कॅलरीज आणि प्रथिने दोन्हीही कमी प्रमाणात घेता.

तुम्ही पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन करीत नसाल तर होऊ शकते की तुमचा आहार संतुलित नसेल. तुमच्या आहारात पुरेशा कॅलरीज नसतील किंवा तुमचे शरीर जेवण योग्य प्रकारे पचवण्यास सक्षम नसेल. जर तुम्ही कमी प्रमाणात कॅलरीजचे सेवन करत असाल तर तुमचे शरीर पेशींच्या निर्मितीऐवजी केवळ उर्जा मिळविण्यासाठी प्रोटीनचा वापर करेल. यामुळे तुमचे वजन कमी होईल. मात्र काही लोकांचे वजन वाढते, कारण त्यांच्या शरीरात प्रथिनांच्या पचनासाठी पुरेशी उर्जा नसते.

केस, त्वचा आणि नखांची समस्या : प्रथिनांच्या कमतरतेचा दुष्परिणाम बऱ्याचदा केस, त्वचा आणि नखांवर होतो. कारण ते पूर्णपणे प्रथिनांपासून बनलेले असतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा सर्वात आधी केस पातळ होऊ लागतात. त्वचेची सालपटे निघू लागतात. नखं तुटू लागतात.

थकवा किंवा अशक्तपणा आल्यासारखे वाटणे : शरीरला पुरेशा प्रमाणात प्रथिने न मिळाल्यास पेशी कमकुवत होऊ लागतात, शरीर पेशींमधून अमिनो अॅसिड मिळविण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे स्नायूंचे मांस कमी होऊन चयापचय प्रक्रिया मंदावते. यामुळे शरीरातील शक्ती आणि उर्जा कमी होते आणि तुम्हाला नेहमी थकल्यासारखे वाटते.

साखर किंवा गोड खाण्याची इच्छा : कार्बोहायड्रेटच्या तुलनेत प्रथिनांच्या पचनासाठी जास्त वेळ लागतो. जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेटयुक्त आहाराचे सेवन करता, तेव्हा ब्लडशुगर अचानक वाढते आणि नंतर कमी होते. त्यामुळेच साखर किंवा गोड खाण्याची इच्छा होते. यापासून वाचण्यासाठी आपल्या आहारत प्रथिन आणि कार्बोहायड्रेटचे पुरेशा प्रमाणात सेवन करा, जेणेकरून तुमचे शरीर आहार हळूहळू पचवेल आणि ब्लडशुगरच्या पातळीत अचानक बदल होणार नाही.

अॅनिमिया किंवा रक्तातील कमतरता : तुमच्या शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास व्हिटॅमिन बी १२ आणि फोलेटची कमतरतादेखील वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमिया होऊ शकतो. यामध्ये शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होते, ज्यामुळे ब्लडप्रेशर कमी होऊ शकतो आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

रोग प्रतिकारशक्ती/इम्युनिटी : प्रथिनांच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तुम्ही वारंवार आजारी पडू लागता. बरे व्हायलाही वेळ लागतो. इम्युन सेल्स प्रथिनांनी बनलेले असतात. म्हणूनच जर तुमचा आहार संतुलित नसेल तर तुम्ही डोमिनो परिणामांमुळे अस्वस्थ होऊ शकता.

ब्लडप्रेशर आणि हृदयाचे ठोके कमी होणे : प्रथिनांच्या कमतरतेमुळे ब्लडप्रेशर कमी होण्याची शक्यता वाढते. शरीराला योग्य पोषण मिळत नसल्यास त्याचा परिणाम शरीराच्या सर्व कार्यावर होतो.

यकृताच्या समस्या : प्रथिनांची कमतरता आणि यकृत रोग एकमेकांशी संबंधित आहेत. प्रथिनांअभावी तुमचे यकृत डिटॉक्सिफिकेशनचे कार्य योग्यरित्या करू शकत नाही.

स्नायू आणि सांध्यातील वेदना : प्रोटीनची कमतरता असल्यास शरीरातील उर्जेची पूर्तता करण्यासाठी शरीर स्नायूंमधून कॅलरीज बर्न करायला सुरुवात करते, ज्यामुळे स्नायूदुखी, सांधेदुखी आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

पेशींमध्ये कमकुवतपणा : मध्यम वयाच्या पुरुषांना बऱ्याचदा वय वाढण्यासह सार्कोपेनिया होतो. त्यांच्यातील स्नायूंचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यांनी आहारातून प्रथिनांचे सेवन पुरेशा प्रमाणात न केल्यास ही समस्या आणखी वाढू शकते.

सूज : शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास तुम्हाला एडेमा म्हणजेच सूज येण्याचा त्रास होऊ शकतो. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्याने फुगल्यासारखे वाटू लागते. प्रोटीन टिश्यूजमध्ये विशेष करून तुमचे पाय आणि पावलांमध्ये पाणी साचून राहण्याची प्रक्रिया रोखतात.

जखम लवकर बरी होत नाही : प्रथिनांच्या अभावामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते. सोबतच जखम बरी होण्यासाठी नवीन टिश्यूज आणि नवीन त्वचा तयार करण्यासाठीही प्रथिनांची आवश्यकता असते.

मुलांचा विकास योग्यरित्या न होणे : प्रथिने केवळ स्नायू आणि हाडे निरोगी ठेवण्यासच मदत करत नाहीत तर शरीराच्या विकासासाठीदेखील आवश्यक असतात. म्हणूनच मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता घातक ठरू शकते. प्रथिनांअभावी त्यांचा योग्य प्रकारे विकास होत नाही.

आनंदी पीरियड्स

* प्रतिनिधी

भारतात फक्त १२ टक्के महिलाच पर्सनल हायजीन म्हणजे पॅड्सचा वापर करतात, हा आश्चर्यचकित करणारा आकडा आहे, कारण खासगी स्वछतेकडे लक्ष न दिल्यास ती आपल्याला अनेक आजारांच्या जाळयात ओढते. तर युटीआय, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचेही आपण शिकार ठरतो.

केंद्र सरकारच्या ‘आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राष्ट्रीय आरोग्य अभियान’ तसेच स्वच्छ भारत अभियान मिळून मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता व सॅनिटरी पॅड्सबाबत जनजागृती वाढविण्याचे काम करत आहे. देश दीर्घ काळापासून प्रदूषणविरोधी लढाई लढत आहे, ज्यात प्लास्टिकचे प्रदूषण सर्वाधिक आहे आणि यास सॅनिटरी पॅड्सही कारणीभूत ठरत आहेत. कारण भारतात दर वर्षी ११,३०० प्लास्टिक वाया जाते. प्लास्टिक विघटनशील नाही. म्हणूनच पर्यावरणाला घातक ठरणार नाही अशा विघटनशील सॅनिटरी पॅड्सचा वापर करण्याची गरज आहे.

खासगी स्वछतेशी तडजोड नको

ग्रामीण भागात आजही महिला मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्सऐवजी कपडा, वर्तमानपत्र, झाडाची पाने, वाळू किंवा राख वापरतात. यामुळे इन्फेक्शनसह गर्भाशयाचा कॅन्सरही होऊ शकतो. म्हणून सरकार आता स्वस्त पॅड्स बनवत आहेत, जेणेकरून मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेची कपडा आदी गोष्टींपासून सुटका होईल आणि त्या सुरक्षित सॅनिटरी पॅड्स वापरू शकतील.

इको फ्रेंडली पॅड्स म्हणजे काय

तसे तर तुम्हाला मार्केटमध्ये स्वस्तात स्वस्त आणि महागात महाग पॅड्स मिळतात, पण फरक फक्त एवढाच आहे की सिन्थेटिक पॅड्समध्ये ९० टक्के प्लास्टिक, पॉलिमर्स, परफ्युम आणि अनेक प्रकारचे केमिकल्स असतात, जे महिलांच्या संवेदनशील त्वचेसाठी घातक असतात, मात्र इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड्स विविध नॅचरल विघटनशील गोष्टींपासून तयार होतात, जे पर्यावरणाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान करीत नाहीत आणि त्यांची शोषून घेण्याची क्षमताही खूप जास्त असते. अतिशय मऊ असल्याने महिलांच्या योनी भागातील संवेदनशील त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

आता वेळ आलीय अशा सॅनिटरी नॅपकिनचा वापर करण्याची जे त्या दिवसात तुमच्या खासगी स्वछतेची काळजी घेण्यासोबतच पर्यावरणाचेही नुकसान करणार नाहीत.

विघटनशील पॅड्स

हे पॅड्स झाडांच्या फायबरपासून बनवले जातात. ते डिस्पोज केल्यानंतर ६ महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीत विरघळून जातात. त्यामुळे ते पर्यावरणासाठी धोकादायक नाहीत.

पुनर्वापर करता येणारे पॅड्स

हे पॅड्स धुवून तुम्ही अनेकदा वापरू शकता. हे हायजिनिक तर असतातच, शिवाय त्वचेला जळजळ आणि रॅशेजपासूनही दूर ठेवतात.

जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर सॅनिटरी पॅड्स फेकण्यासाठी पॉलिथिन बॅग किंवा टिश्यू पेपरही घेऊन जावे लागेल असे टेन्शन घेऊ नका, कारण आता मार्केटमध्ये असे पॅड्सही तयार होऊ लागले आहेत, जे डिस्पोजल बॅगसह येतात जेणेकरून तुम्ही पॅड वापरल्यानंतर सहजपणे त्यात फेकून देऊ शकता.

मासिक पाळी ही कोणतीही समस्या नाही तर एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. या काळात स्वत:ला बंधनात बांधून घेण्याऐवजी सुरक्षित सॅनिटरी नॅपकिनचा वापर करा आणि मोकळेपणाने जगा.

१५ फायदे स्तनपानाचे

* सोमा घोष

आजकालच्या बहुतांश मातांना मुलांना स्तनपान देणे अत्यंत कठीण काम वाटते. जेव्हा की मुलाच्या जन्मानंतर आईचे दूध मुलांकरिता सर्वात जास्त फायदेशीर असते. आईच्या दुधाने मुलाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे दूध मुलांसाठी अमृतासमान असते.

या गोष्टीचे महत्व लक्षात घेत ‘वर्ल्ड फिडींग वीक’च्या निमित्ताने मुंबईच्या ‘वर्ल्ड ऑफ वूमन’ची स्त्री व प्रसूती रोग तज्ज्ञ डॉ. बंदिता सिन्हा सांगतात की स्तनपानविषयी आजही शहरी महिलांमध्ये जागरूकता कमी आहे, जेव्हा की स्तनपान केल्याने ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता कमी होते. ज्या महिलांनी कधी स्तनपान केलेले नसते, त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क जास्त असते.

एका अभ्यासात असे आढळले की ज्या महिलांना ब्रेस्ट कँसर मेनोपॉजनंतर झाला आहे, त्यांनी कधीच स्तनपान केले नव्हते. याउलट ज्या महिलांनी ३० वर्षाच्या आधी स्तनपान केले किंवा ३० वर्ष पार केल्यावर स्तनपान केले आहे अशा महिला ब्रेस्ट कॅन्सरपासून दूर आहेत. म्हणून आई झालेल्या प्रत्येक महिलेने स्तनपान अवश्य द्यावे आणि हे समजून घावे की यामुळे मुल सुदृढ होते आणि त्यासोबतच आईचे स्वास्थ्य चांगले राहते. स्तनपानाचे खालील १५ फायदे आहेत :

* हे सर्वात गुणकारी दूध असते. यात असणारे प्रथिनं आणि अमिनो अॅसिड मुलाच्या वाढीसाठी चांगले असते. हे मुलाला कुपोषणापासून वाचवते.

* स्तनातील दूध हे बॅक्टेरियामुक्त आणि ताजे असल्याने मुलासाठी सुरक्षित असते. जेव्हा आई मुलाला दूध पाजते, मुलाला अँटिबायोटिक दुधाद्वारे  मिळते, ज्यामुळे मुलाचे संसर्गापासून संरक्षण होते.

* स्तनपानामुळे आई आणि मुलादरम्यान प्रेमाचे नाते वृद्धिंगत होते, ज्यामुळे मुलाला आईच्या जवळीकतेची जाणीव होते.

* मुलाच्या जन्मानंतर आईच्या स्तनातून निघालेल्या पहिल्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. ज्यात अँटिबायोटिक्सचे प्रमाण सर्वात जास्त असते, जे मुलांच्या रोगप्रतिकारशक्तिला वाढवते. याशिवाय हे दूध मुलाच्या आतडयांना आणि श्वसन प्रक्रियेला सशक्त बनवते.

* स्तनांमधील दूध हाडांची वाढ चांगल्याप्रकारे करण्यात व हाडांना मजबूत करण्यात मदत करते.

* हे दूध ‘सडन इन्फॅन्ट डेथ सिंड्रोम’ला कमी करण्यातही मदत करते.

* जन्मानंतर मुलाची प्रारंभिक अवस्था खूप नाजूक असते. अशावेळी आईचे दूध सहज पचते, ज्यामुळे त्याला लूज मोशन्सचा त्रास होत नाही.

* आईसाठीसुद्धा याचे फायदे कमी नाहीत, स्तनपान केल्याने गर्भावस्थेत वाढलेले आईचे वजन हळूहळू कमी होते.

* एवढेच नाही तर स्तनपानाने महिलेच्या गर्भाशयाचे आकुंचन सुरु होते. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव चांगल्या प्रमाणात होतो. ज्यामुळे महिलेला ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सरचा धोका राहत नाही.

* आईकरिता पोस्टपार्टम डिप्रेशनचा धोका कमी होतो.

* स्तनपानामुळे स्तनांच्या सौंदर्यात काही फरक पडत नाही, हा निव्वळ एक गैरसमज आहे.

* जास्त वय झाल्यावर मूल झाल्यास जर महिला योग्य प्रकारे स्तनपान करत असेल तर कॅन्सरशिवाय मधुमेह, लठ्ठपणा आणि अस्थमा यासारख्या आजारांपासूनसुद्धा आपोआप दूर राहू शकते.

* स्तनपान एक वर्षांपेक्षा जास्त काळ केल्यास आई आणि मूल दोघंही सुदृढ राहतात.

* जी मुलं सतत ६ महिने स्तनपानावर अवलंबून असतात, त्याची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते.

* आईचे दूध नवजात बालकासाठी सर्वोत्तम आहे.

हिरवी बुरशी आणि मंकीपॉक्स व्हायरस काय आहे?

* अनामिका पांडे

कोरोनाचे आणखी बरेच प्रकार एक-एक करून समोर येत आहेत….एक संसर्ग संपत नाही की दुसरा संकट बनून समोर येतो. अशा स्थितीत देश या संसर्गातून कधी बाहेर येऊ शकेल यावर काहीच सांगता येत नाही. डेल्टा प्लससारखे रूप समोर आले आहेतच, परंतु त्याबरोबरच काळी बुरशी, पांढरी बुरशी आणि पिवळ्या बुरशी नंतर आता हिरव्या बुरशीचा एक रुग्ण इंदूरमध्ये आढळला आहे. देशातील हिरव्या बुरशीचे हे पहिलेच प्रकरण आहे. याबरोबरच मंकीपॉक्स बुरशीचे प्रकरण ही समोर आले आहे. खरं तर, इंदूरमध्ये ग्रीन फंगस ग्रस्त रूग्णाची पुष्टी झाली होती. त्याला इंदूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आता त्या रूग्णाला चांगल्या उपचारासाठी विमान सेवेने मुंबईत दाखल करण्यात आले आहे.

खरं तर, हा रुग्ण माणिकबाग परिसरात राहणारा 34 वर्षीय रुग्ण आहे, जो कोरोनाने संक्रमित झाला होता, त्याच्या फुफ्फुसांमध्ये 90 टक्के संसर्ग पसरला होता… पण दोन महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. असे सांगून की आता तो ठीक आहे आणि त्याच बरोबर त्यालाही बरे वाटू लागले होते. पण 10 दिवसानंतर रुग्णाची प्रकृती पुन्हा खालावू लागली. त्याच्या उजव्या फुफ्फुसामध्ये पू भरला होता ज्यामध्ये, त्याच्या फुफ्फुसांना आणि सायनसला एस्परगिलस बुरशीचा संसर्ग झाला होता, त्या कारणास्तव

त्याला मुंबईला पाठवण्यात आले. तज्ञांच्या मते हिरवी बुरशी हा काळ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक आजार आहे. ते फुफ्फुसात हिरव्या रंगाचे दिसते, ज्यामुळे त्याला हिरव्या बुरशीचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णाची स्थिती सतत खालावत जाते. कोरोनाची गती तर कमी झाली आहे. परंतु काळ्या बुरशीच्या रूग्णांची संख्या मात्र कमी होत नाही आणि त्यात हिरवी बुरशी उदयास येणे चिंताजनक आहे… तथापि त्या रूग्णाला निश्चितच चांगल्या उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे पण तो बरा होऊ शकेल की नाही हे सांगता येत नाही.

हिरव्या बुरशीची लक्षणे काहीशी अशी असतात...

रुग्णाला खाखरण्यातून आणि गुदाशयातून रक्तस्त्राव होण्यास सुरवात झाली आहे, ताप देखील 103 अंशांपर्यंत वाढतो, तर हिरव्या बुरशीवर अँफोटेरेसिन बी इंजेक्शन देखील कार्य करत नाही. राज्यातील हिरव्या बुरशीचे हे पहिलेच प्रकरण आहे. कोव्हिड पोस्ट रुग्णांमध्ये हे दिसून आले आहे.

आता मुद्दा येतो मँकीपॉक्स विषाणूचा. शास्त्रज्ञांसमोर कोरानावर रामबाण उपचार शोधणे अजूनही शक्य झाले नाही. ते अद्याप प्रयत्न करीत आहेत. त्यात आता एक नवीन विषाणू दाखल झाला आहे आणि या अत्यंत धोकादायक नवीन विषाणूचे नाव आहे मँकीपॉक्स. ब्रिटनच्या वेल्समध्ये मँकीपॉक्सची दोन प्रकरणे आढळली आहेत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू बहुधा आफ्रिकेत आढळतो. खास गोष्ट म्हणजे ज्या लोकांमध्ये हा नवीन विषाणू ओळखला गेला आहे, ते दोघेही घरीच राहत होते. ते घराबाहेर कुठेही जात-येत नव्हते, असे असूनही ते या विषाणूच्या विळख्यात अडकले. कोरोनाच्या कहरात मँकीपॉक्स विषाणूच्या प्रवेशामुळे देश अजून जास्त धोक्यात आला आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

एका अहवालानुसार मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे, जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो.

सर्वप्रथम आफ्रिकन देश कॉंगोमध्ये त्याची ओळख 1970 मध्ये झाली होती. त्यानंतर 2003 मध्ये मध्य व पश्चिम आफ्रिकेतील देश, अमेरिका आणि इतर देशांतही त्याची बरीच प्रकरणे समोर आली होती आणि मंकीपॉक्समधील मृत्यूचे प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. चेचकवरील लस मंकीपॉक्सविरूद्धदेखील प्रभावी ठरू शकते.

मंकीपॉक्सची लक्षणे कोणती आहेत?

त्याची लक्षणे स्मॉलपॉक्स म्हणजेच चेचक सारखीच आहेत, शरीरावर लाल चकत्ते [पुरळ] उठणे सुरू होते आणि नंतर ते चकत्ते जखमा बनतात.

ताप येणे, डोकेदुखी सुरू होणे, कंबरदुखी, स्नायू आकसणे आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें