* प्रतिनिधी

माझी ननंद एका मुलासोबत आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. ती सांगते की त्यांनी कधीच मर्यादा ओलांडल्या नाहीत. तरी देखील मला भीती वाटते की तिने एखादा चुकीचा निर्णय घेऊ नये. तिने ही गोष्ट घरातल्यांपासून लपवून ठेवली आहे.

मला देखील याची माहिती अनाहूतपणे झाली. आता मला वाटतं की ही गोष्ट मला माझे पती व सासूबाईंना सांगायला हवी. परंतु नणंद माझ्यापासून कायमची दुखावली जाऊ नये असं वाटतं, हे योग्य आहे का?

तुम्ही तुमच्या ननंदेच्या रागाची काळजी न करता ही गोष्ट घरातल्यांना सांगा, कारण तिच्या आयुष्यात उद्या काही चुकीचं झालं तर पूर्ण आयुष्यभर तुम्हाला याचं दु:ख राहील.

माझं लग्न साधारणपणे चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालं होतं. पती व्यावसायिक आहेत. आमचं अरेंज मॅरेज झालं होतं. सुरुवातीला पतीसोबत थोड पटत नव्हतं, परंतु नंतर आम्ही हळूहळू एकमेकांना समजू लागलो आणि सर्व काही ठीक चालू लागलं. परंतु या दरम्यान माझी जाऊ, जी कुटुंबात सर्वात वरच्या मजल्यावर राहते,  अचानक स्वर्गवासी झाली. त्यांना दोन मुलं आहेत जे एवढे मोठे झाले आहेत की स्वत: स्वत:ची काळजी घेऊ शकतात.

माझ्या दिरांच जवळच कपडयांचं दुकान आहे. ते अनेकदा माझ्या पतींच्या मागे देखील आमच्या घरी येत असतात. जाऊ बाईच्या मृत्यूनंतर माझ्या मनात त्यांच्यासाठी सहानुभूतीची भावना असते, परंतु त्यांचं वागणं काही वेगळंच आहे ते अनेकदा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात. एके दिवशी ते बिनधास्त माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागले.

मी त्यावेळी त्यांना नकार दिला आणि जायला सांगितलं. परंतु आता मला भीती वाटू लागली आहे की पुन्हा जर ते या इराद्याने आले तर माझ्या पतींनादेखील या संदर्भात सांगायला भीती वाटते. कारण ते त्यांच्या मोठया भावाचा खूप आदर करतात. मला भीती आहे की ते मला दोषी मानतील. यासाठी काय करू?

सर्वप्रथम तुम्ही न घाबरता तसंच न संकोचता तुमच्या पतींना सर्व काही सांगा. त्यांना विश्वासात घेऊन तुमची भीती प्रकट करा. जर ते अजिबात मानले नाही तर एखाद्या दिवशी संधी मिळतात सर्व पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करा.

दिर जेव्हादेखील दरवाजा ठोठावतील, तेव्हा मोबाईल व्हॉइस रेकॉर्डर चालू करून तुमच्याजवळ ठेवा व दरवाजा उघडा. अशावेळी दिर जर चुकीचं बोलत असेल व अशा कोणत्या गोष्टी करत असेल तर सर्व रेकॉर्ड होईल आणि तुम्ही तुमच्या पतीला हे पुरावे म्हणून ते रेकॉर्डिंग ऐकवू शकता.

तुमच्या पतींना दुसरीकडे घर घेण्याचा आग्रह करा व दिरांचं पुन्हा लग्न करण्याचा प्रयत्न करा. त्यांना पत्नीची उणीव भासत आहे म्हणून ते तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. नवी पत्नी आल्यानंतर कदाचित ते तुमच्याशी सामान्य व्यवहार करू लागतील.

मी कॉलेजमध्ये असताना एका मुलावर प्रेम करत होती, परंतु ते प्रेम व्यक्त करू शकली नाही. नंतर माझं अरेंज मॅरेज झालं. पती खूपच समजूतदार आणि केअरिंग स्वभावाचे आहेत. माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे. परंतु एके दिवशी अचानक आयुष्यात वादळ आलं, खरं म्हणजे फेसबुकवरती त्या मुलाचा मेसेज आला की त्यांना तू माझ्याशी बोलायचं आहे. माझ्या मनात दबलेली प्रेमाची भावना पून्हा जागी झाली. मी त्वरित त्याच्या मेसेजचं उत्तर दिलं.

फेसबुकवरती आमची खूपच चांगली मैत्री झाली. माझ्या रिकाम्या वेळात त्याच्याशी गप्पा मारू लागली.

हळूहळू लाज आणि संकोच गळून पडला. नंतर त्याने एके दिवशी मला एकटीला भेटण्यासाठी बोलावलं. मला त्याचा हेतू माहीत आहे, म्हणून हिम्मत होत नाहीए की एवढ मोठं पाऊल उचलू की नको. इकडे मनात दबलेल्या भावना मला हे पाऊल उचलण्यासाठी हट्ट करताहेत. सांगा मी काय करू?

हे खरं आहे की पहिलं प्रेम कोणी विसरू शकत नाही, परंतु जेव्हा आयुष्यात तुम्ही पुढे गेला असाल तर पुन्हा मागे वळून जाणं मूर्खापणा होईल. तसंही तुमच्या पतीबाबत तुमची कोणतीही तक्रार नाही आहे. अशा वेळी प्रियकरासोबत नातं जोडून उगाच अडचणी ओढून घेऊ नका.

त्या मुलाला स्पष्टपणे ताकीद द्या की तुम्ही केवळ त्याच्याशी हेल्दी फ्रेंडशिपच ठेवली आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील एक मरगळ दूर शांतता आणि प्रेरणा मिळते. परंतु शारिकरित्या तुम्ही या नात्यांमध्ये राहून तुमच्या वैवाहिक नात्यावरतीदेखील अन्याय कराल. म्हणून उशीर न करता मनात कोणतीही द्विधा न आणता तुमच्या प्रियकरांशी याबाबत बोलून तुमचा निर्णय सांगा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...