* प्रतिनिधी

माझी ननंद एका मुलासोबत आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. ती सांगते की त्यांनी कधीच मर्यादा ओलांडल्या नाहीत. तरी देखील मला भीती वाटते की तिने एखादा चुकीचा निर्णय घेऊ नये. तिने ही गोष्ट घरातल्यांपासून लपवून ठेवली आहे.

मला देखील याची माहिती अनाहूतपणे झाली. आता मला वाटतं की ही गोष्ट मला माझे पती व सासूबाईंना सांगायला हवी. परंतु नणंद माझ्यापासून कायमची दुखावली जाऊ नये असं वाटतं, हे योग्य आहे का?

तुम्ही तुमच्या ननंदेच्या रागाची काळजी न करता ही गोष्ट घरातल्यांना सांगा, कारण तिच्या आयुष्यात उद्या काही चुकीचं झालं तर पूर्ण आयुष्यभर तुम्हाला याचं दु:ख राहील.

माझं लग्न साधारणपणे चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालं होतं. पती व्यावसायिक आहेत. आमचं अरेंज मॅरेज झालं होतं. सुरुवातीला पतीसोबत थोड पटत नव्हतं, परंतु नंतर आम्ही हळूहळू एकमेकांना समजू लागलो आणि सर्व काही ठीक चालू लागलं. परंतु या दरम्यान माझी जाऊ, जी कुटुंबात सर्वात वरच्या मजल्यावर राहते,  अचानक स्वर्गवासी झाली. त्यांना दोन मुलं आहेत जे एवढे मोठे झाले आहेत की स्वत: स्वत:ची काळजी घेऊ शकतात.

माझ्या दिरांच जवळच कपडयांचं दुकान आहे. ते अनेकदा माझ्या पतींच्या मागे देखील आमच्या घरी येत असतात. जाऊ बाईच्या मृत्यूनंतर माझ्या मनात त्यांच्यासाठी सहानुभूतीची भावना असते, परंतु त्यांचं वागणं काही वेगळंच आहे ते अनेकदा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात. एके दिवशी ते बिनधास्त माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागले.

मी त्यावेळी त्यांना नकार दिला आणि जायला सांगितलं. परंतु आता मला भीती वाटू लागली आहे की पुन्हा जर ते या इराद्याने आले तर माझ्या पतींनादेखील या संदर्भात सांगायला भीती वाटते. कारण ते त्यांच्या मोठया भावाचा खूप आदर करतात. मला भीती आहे की ते मला दोषी मानतील. यासाठी काय करू?

सर्वप्रथम तुम्ही न घाबरता तसंच न संकोचता तुमच्या पतींना सर्व काही सांगा. त्यांना विश्वासात घेऊन तुमची भीती प्रकट करा. जर ते अजिबात मानले नाही तर एखाद्या दिवशी संधी मिळतात सर्व पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...