कथा * शकुंतला साठे

‘‘सुकेतु, स्वाती ताई अन् नकुल भावजी येताहेत उद्या. तू त्यांना एअरपोर्टवरून घरी आणशील का? माझ्या ऑफिसात बाहेरून एक डेलीगेशन येतंय, मला उद्या रजा घेता येणार नाही,’’ स्वस्तीनं नवऱ्याला म्हटलं.

‘‘मला नाही जमणार. तू फोन कर त्यांना, टॅक्सी करून येतील ते.’’ सुकेतु लॅपटॉपवरची नजर न हटवता म्हणाला.

‘‘आपल्या लग्नानंतर प्रथमच येताहेत ते दोघं. त्यांना काय वाटेल? तुझी बहीण आली होती, तेव्हा तू आठवडाभर घरून काम केलं होतंस, आता एक दिवसही जमणार नाही?’’

‘‘माझी बहीण आपला सुखी संसार बघायला आली होती. आपण किती सुखी दिसलो कुणास ठाऊक, पण ती मात्र फारच नर्व्हस अन् उदास झाली होती. तेव्हाच मी ठरवलं होतं की आपला पैसा वेगळा, आपले मित्र वेगळे, तू तुझं, मी माझं काम करतो तसेच नातेवाईकही वेगळेच ठेवायचे. काय?’’ सुकेतुनं असं म्हटल्यावर स्वस्तीचा जळफळाट झाला.

सहा वर्षं त्यांचं प्रेमप्रकरण चाललं होतं, त्यानंतर दोघांचं लग्न झालं. अजून लग्नाला वर्षही झालं नव्हतं, पण त्यांच्यातलं प्रेम पार आटलं होतं. अगदी कोरडं ठाक पडलं होतं. दोघंही एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसत. लग्नानंतर ती दोघं मधुचंद्राला गेली त्याच रात्री त्यांचं इतकं कडाक्याचं भांडण झालं की त्या पंचतारांकित हॉटेलच्या मॅनेजरनं त्यांना अत्यंत नम्रपणे, शालीनपणे हॉटेल सोडून जायला सांगितलं.

‘‘आम्ही आठवडाभराचे सर्व पैसे आगाऊ भरले आहेत,’’ स्वस्ती संतापून किंचाळली. सुकेतु मात्र शांत होता.

‘‘मॅडम, तुम्ही बरोबर म्हणताय, पण आम्ही आमच्या इतर कस्टमरला नाराज नाही करू शकत. एडव्हान्स भरलाय, पण तुम्ही आमच्या कपप्लेट्स, चादरी, उशा अन् फर्निचरची जी अवस्था केली आहे, त्याचा भुर्दंड द्यावाच लागेल. जे काही उरेल ते आम्ही परत करू.’’ अत्यंत नम्रपणे मॅनेजरनं सांगितलं.

मुकाट्यानं दोघंही आपल्या सूटमध्ये गेले. आता पुढे काय करायचं यावर संवाद व्हायला हवा होता. पण दोघांमध्ये अबोला होता, मग बोलणार कसं?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...