* शोभा शर्मा

आई-वडिलांनी मुलांना मारझोड करण्याचं कारण काहीही असू शकतं जसं की लहानमोठं नुकसान करणं, जखमी होणं, बहिण भावंडांना मारणं, न सांगता बाहेर जाणं, मस्ती करणं, अभ्यास न करणे इत्यादी. जर तुम्ही तुमच्या मुलांवरती हात उचलत असाल तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात :

आत्मविश्वासामध्ये कमी : मारझोड करून तुम्ही तुमच्या मुलांचा आत्मविश्वास कमी करत आहात, खास करून जेव्हा त्याच्या मित्रांच्या समोर, लहान बहीणभावंड वा स्कूल कॉलेजमध्ये, सोसायटीमध्ये सर्वांच्या समोर मारता तेव्हा.

चुकीची उपाधी देऊ नका : मुलं स्वत:हून स्वत:ला तसंच समजतात जे त्याला मारते व ओरडतेवेळी तुम्ही बोलता. अनेकदा आई-वडील आपल्या मुलांना रागाने तू इतरांसारखा हुशार का नाही आहेस किंवा मस्ती का करतोस. मारतेवेळी रागामध्ये वेगवेगळी विशेषणं, उपाधी देत राहतात. जसं की गाढव, मूर्ख, घाबरट. अशावेळी तुम्ही जे त्याला बोलाल तेच तो बनेल. तो रागात असूनसुद्धा असंच बनण्याचा विचार करेल.

वाढती मस्ती : मुलांची वाढती मस्ती आणि त्यांची वागणूक आई-वडिलांना राग आणण्या वा मारण्यापासून रोखू शकत नाही. कधी कधी तर मुलं एवढी मस्ती करतात की पेरेंट्स यावरचा उपाय म्हणून फक्त आणि फक्त मारझोडंच करताना दिसतात, जे एकदम चुकीचं आहे.

बेडर होईल : तुम्ही तुमच्या मुलांना विद्रोहीदेखील बनवू शकता, कारण एक दोनदा मारल्याने तो तुम्हाला घाबरून जाईल परंतु वारंवार मारल्यामुळे तुमची जी भीती आहे ती त्याच्या मनातून निघून जाईल. कधीकधी तो समजू शकतो की जेवढे तुम्ही त्याला मारले तेवढी, त्याची एवढी चूकही नव्हती. तर तो तुम्हाला उलटून उत्तर देखील देऊ शकतो. तो असं काम करेल, जे तुम्हाला आवडणार नाही. आणि तो बेडर बनेल.

हीन भावनेने ग्रस्त : तुम्ही वारंवार मारल्यामुळे मुलांमध्ये हीन भावना येते आणि ते नकारात्मक विचार करू लागतात व रागीट बनू शकतात ज्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतात, कारण मुलं त्यांच्या लहानपणापासूनच्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवतात तसेच वाईट आठवणी देखील तेवढ्याच लक्षात ठेवतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...