गृहशोभिकेचा सल्ला

 

  • मी २३ वर्षीय तरुणी आहे. माझ्या लग्नाचं जमत आहे. मात्र, अनेक स्थळांनी या कारणामुळे मला नकार दिला आहे; कारण त्यांना चष्मा असलेली मुलगी नको आहे. मी आता कॉन्टॅक्ट लेन्स घेतल्या आहेत जेणेकरून माझं लग्न ठरेल. सध्या एकदोन ठिकाणी माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे. मी त्यांना कॉन्टॅक्ट लेन्सविषयी सांगावं की नाही? यावरून घरात खूप तणाव असतो. मला काय करायला हवं?

कॉन्टॅक्ट लेन्स हा चांगला पर्याय आहे आणि यात काही धोका नाही. पण लग्नाआधी दोन्ही पक्षांनी आपल्याविषयीची सविस्तर माहिती एकमेकांना देणं गरजेचं असतं.

जर तुमच्या कुटुंबियांना असं वाटत असेल की मुलाकडील लोकांना हे सांगू नये तर तुम्ही स्वत:हूनच मुलाला ही गोष्ट सांगू शकता.

मुलगा जर समंजस असेल तर तुमचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रभावित होईल. शिवाय तुम्हालाही लग्नानंतर ही गोष्ट लपविल्याची हुरहुर लागणार नाही.

  •  मी ३० वर्षीय विवाहित महिला आहे. आमचं विभक्त कुटुंब आहे. माझी लहान बहीण आमच्यासोबतच राहाते. माझं माहेर खेडेगावात आहेत म्हणून ती पुण्यात आमच्यासोबत राहून बीए करत आहे. माझे आईबाबा तिला हॉस्टेलमध्येच ठेवणार होते पण मी आणि माझ्या पतीने बळजबरीने तिला आमच्यासोबत ठेवून घेतलं.

माझ्या बहिणीने मला सांगितलं की भावोजींनी रात्री दारू पिऊन तिच्यासोबत गैरवर्तन केलं. या आधीही तिने मला सांगितलं होतं की, भावोजी तिची चेष्टामस्करी करतात आणि तिच्यासोबत गैरवर्तनही करु पाहातात. तेव्हा ही गोष्ट मी फारशी गंभीरपणे घेतली नव्हती, पण आता मी खूप चिंतित आहे, पतीला याविषयी कसं विचारायचं याची मला भीती वाटते. हे प्रकरण आणखी पुढे वाढू नये, यासाठी मी काय करू?

तुमच्या बहिणीने जेव्हा पहिल्यांदा तुमच्या पतीच्या गैरवर्तनाविषयी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही सावध व्हायला हवं होतं. तुम्ही तेव्हा गप्प बसल्यामुळे त्यांचं धाडस वाढलं आणि त्यांनी पुन्हा ते कृत्य केलं. आता तुम्ही त्यांना मोकळं सोडू नका. चांगलं खडसावून विचारा. याचबरोबर बहिणीला हॉस्टेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा.

जोपर्यंत बहीण तुमच्या घरी असेल तोपर्यंत तुम्ही तिला एकटीला सोडू नका. तसंही तुमच्या पतीला जर कळलं असेल की तुम्हाला ही गोष्ट आता माहीत पडली आहे तर आता ते पुन्हा असं करण्याचं धाडस करणार नाहीत.

  • मी २४ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या विवाहाला २ वर्षं झाली आहेत. पती आणि कुटुंबियांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तरीसुद्धा माझं या घरात मन लागत नाही. कारण मला माझ्या प्रियकराचा विसर पडत नाहीए. खरतर त्याने मला अगोदर लग्नाचं वचन दिलं होतं. पण नंतर त्याच्या कुटुंबियांच्या मर्जीनुसार त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. आता मी काय करू, जेणेकरून त्याचा विसर पडेल आणि मी माझ्या संसारात रममाण होईन?

हे खरंय की, पहिलं प्रेम विसरता येत नाही. पण विसरता न येणं ही गोष्टही तितकी कठीण नाही. आणि तसं पाहिलं तर तुमच्या प्रियकराने तुमची फसवणूकही केली आहे. तुम्हाला लग्नाचं वचन दिलं आणि तुम्हाला संकटात टाकून दुसऱ्याच कुणासोबत लग्नदेखील केलं. म्हणूनच हे एक वाईट स्वप्न समजून ही गोष्ट विसरून जाण्यातच तुमचं हित आहे.

तुमच्या पतीचं आणि कुटुंबियांचं जर तुमच्यावर इतकं प्रेम आहे, तर त्या बदल्यात तुम्हीदेखील त्यांच्यावर प्रेम करायला हवं. तुम्ही संसारात मन रमवलं तर भूतकाळातील या घटनेचा काही दिवसांनी तुम्हाला विसर पडेल.

  • मी १८ वर्षांची विद्यार्थिनी आहे. शाळेत असताना केवळ मैत्रिणीच होत्या. मात्र, आता कॉलेजात मित्रही सोबत शिकत आहेत. जेव्हादेखील एखादा मुलगा माझ्या शेजारी बसतो, तेव्हा मला असं वाटू लागतं की मी त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. मी जेव्हा एकटीच असते तेव्हादेखील त्या मुलाचाच विचार करत राहाते. हे कुणा एका मुलाला पाहून नाही, तर कुणीही मुलगा जो माझ्या संपर्कात येतो, तेव्हा माझ्या मनात अशीच भावना जागृत होऊ लागते. यामुळे मी अभ्यासात मागे पडू लागली आहे.

ही गोष्ट माझ्या दृष्टीने घातक तर नाही ना? मला काय करायला हवं?

तू याविषयी काळजी करू नको. खरं तर या वयात विरूद्ध सेक्सप्रती आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. हे लैंगिक आकर्षण असतं. जसजशी समज येत जाईल तसतसे सर्व काही सामान्य होत जाईल.

हो, पण यासाठी तू अभ्यासात किंवा घरकामात स्वत:ला गुंतवून ठेव. काही दिवसांनंतर तुझी ही समस्या दूर होईल.

  • मी २० वर्षीय विवाहित महिला आहे. माझं अलीकडेच लग्न झालं आहे. माझी ही समस्या आहे की माझ्या स्तनांची पुरेपूर वाढ झालेली नाहीए. त्यामुळे माझ्या पतींना संबंधाच्या वेळेस माझ्या स्तनांमध्ये अधिक रूची वाटत नाही.

शरीरसंबंधादरम्यानही आम्हाला आनंद मिळत नाही. आम्ही काय करायला हवं, जेणेकरून आम्हाला शरीरसुखाचा उपभोग घेता येईल?

स्तनांची वाढ ही आनुवंशिकतेनुसार होत असते. म्हणजेच स्त्रीची शारीरिक रचना आपल्या आईच्या शरीररचनेनुसार असते. एक मूल झालं की स्तनांच्या आकारात बदल होतो, पण स्तनांच्या आकारामुळे शरीरसंबंधाच्या आनंदावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणूनच मनामध्ये कोणतीही हीनभावना न आणता सहवासाचा आनंद घ्या.

सहवासापूर्वी फोरप्ले केल्यानेही उत्तेजना मिळेल आणि शरीरसुखाचा संपूर्ण आनंद घेता येईल.

आरोग्य परामर्श

– डॉ. यतिश अग्रवाल

प्रश्न : माझं वय ३५ वर्षं आहे आणि मी अविवाहित आहे. माझी मासिक पाळी १५ वर्षांपूर्वी सुरु झाली. सुरूवातीचे ६-७ महिने नियमित स्वरूपात येत राहिली. त्यानंतर अनियमित होऊ लागली, पण मी लक्ष दिलं नाही. आता माझं वजन वाढून ८० किलोग्रॅम झालं आहे. उलट माझी उंची ५ फूट १ इंच आहे. आता खुप वर्षांपासून मासिक पाळीसुद्धा येणं बंद झाली आहे. लग्नानंतर मला गर्भधारणेसाठी काही त्रास तर होणार नाही?

उत्तर : तुमच्या माहितीप्रमाणे स्पष्ट होतं की तुमच्या शरीरात लैंगिक हार्मोनल प्रणाली नीट काम करत नाहीए. प्रत्येक स्त्रीच्या देहात १ जैविक हार्मोनल घडयाळ टिकटिक करत असतं. ज्यामुळे दर २८-३० दिवसांनी तिचं शरीर एका लयबद्ध परिवर्तनातून जातं.

हे हार्मोनल घडयाळ तारुण्यात सुरु होतं. याची किल्ली मेंदूमध्ये असलेल्या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथींमध्ये असते. किशोरावस्थेत येताच त्यात काही विशिष्ट प्रकारचे यौन प्रेरक हारमोन्स तयार होणं सुरु होतं आणि त्यापासून प्रेरणा देणारे सिग्नल घेऊन डिम्ब ग्रंथी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार करू लागतात. याच हार्मोन्सच्या प्रभावामुळे दर महिन्यात डिम्ब ग्रंथींमध्ये एक नवा डिम्ब मॅच्युर होतो आणि डिम्ब ग्रंथीतून सुटून बाहेर येतो. याच हार्मोनल हालचालीमुळे महिन्या अखेर स्त्रीला मासिक स्त्राव होतो.

तुमच्या शरीरात हे जैविक चक्र सुरूवातीपासूनच एखाद्या कारणामुळे लय पकडू शकलं नाही. तुमच्या आईवडिलांनी आणि तुम्ही याची खूप पूर्वीच तपासणी केली असती आणि योग्य वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं. आता यात सुधार होणं कठीण वाटतं आहे. परंतु तरीही तुम्ही एखाद्या गायनोकॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली तुमची रीतसर तपासणी करू शकता.

आता लग्न आणि त्यानंतर प्रेग्नन्सीचा विचार करता, तर स्वाभाविक आहे की या सगळया गडबडीत ही इच्छा पूर्ण होणं सोपं नाही. स्त्रीच्या शरीरात वेळेत मासिक स्त्राव होणं ही गोष्ट दर्शवते की तिची प्रजनन व्यवस्था नीट काम करत आहे. जर या  नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम झाला तर अपत्य सुखाची इच्छा पूर्ण होणं कठीण जातं. तरीही प्रजननाच्या नव्या टेक्निकच्या मदतीने प्रयत्न केला जाऊ शकतो.

प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. मला २ मूलं आहेत ५ वर्षांपूर्वी मी गर्भनिरोधासाठी कॉपर टी बसवली होती. याची वेळ संपल्यावर मी त्या जागेवर नवी कॉपर टी बसवली. परंतु गेल्या काही दिवसांपासून जेव्हा मी मूत्रविसर्जनासाठी जाते तर मला प्रत्येक वेळी योनिमार्गावर जळजळ होते. या जळजळीचा सबंध कॉपर टी लावण्याशी आहे का? मी काय करायला हवं?

उत्तर : तुमच्या लक्षणांवरून हे स्पष्ट दिसून येतं की तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं आहे. अशा वेळेस तुमच्या युरीन कल्चरची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि शक्य तितक्या लवकर अँटिबायोटिक औषधं सुरु करायला हवी. औषधाचा परिणाम होण्यासाठी कमीतकमी १०-१४ दिवस ते नियमित घेणं आवश्यक आहे. औषध सुरु होताच २-३ दिवसात आराम वाटेल.

यादरम्यान पाणी आणि इतर द्रव पदार्थ जेवढे जास्त पिता येतील तेवढे प्या. यामुळे मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. जास्त मूत्र तयार झाल्याने मूत्र व्यवस्थेची वेगाने सफाई होते आणि इन्फेक्शन निर्माण करणारे बॅक्टेरिया मूत्राबरोबर शरीराच्या बाहेर जात राहतात.

औषधांचा डोज पूर्ण झाल्यावर परत युरीन कल्चर तपासून घ्या, जेणेकरून ते स्वच्छ होईल आणि युरिनरी ट्रॅकमध्ये काही अपायकारक बॅक्टेरिया तर राहिले नाही ना हे कळेल. काही केसेसमध्ये अँटिबायोटिक औषधं जास्त दिवस घ्यायची गरज भासू शकते.  औषध घेण्यात चालढकल करणं बरोबर नाही. त्यामुळे किडनीजवर  परिणाम होऊ शकतो.

आता कॉपर टी बाबत म्हणाल, तर हा मात्र योगायोगच आहे की ज्या काळात तुम्ही कॉपर टी लावली त्याच काळात तुम्ही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनशी सामना करत आहात, परंतु हे पण शक्य आहे की कॉपर टी लावताना योग्य प्रकारे अँटिसेप्टिक खबरदाऱ्या न पाळल्या गेल्याने इन्फेक्शन झाले असेल.

प्रश्न : मी ४५ वर्षाची महिला आहे. २६ वर्षांची असताना माझं लग्न झालं. वैवाहिक जीवन ठीकठाक चाललं होतं की अचानक मला गर्भाशयाचा टीबी झाला. नंतर १८ महिने मला टीबीची औषधं चालू होती. त्यानंतर डॉक्टरांनी मी बरी झाली आहे हे सांगून माझी औषधं बंद केली. परंतु अजूनही मला मासिक  पाळीच्या वेळेस खूप वेदना होतात आणि योनिमार्गातून पांढरा स्त्राव होतो. दरम्यान जेव्हा मी कधी अँटिबायोटिक्स औषध घेते तेव्हा काही दिवस आराम पडतो, पण काही दिवासांनी पुन्हा तिच समस्या सुरु होते, डॉक्टरकडे मी गर्भाशय काढण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी सरळ नकार दिला. तुमचं काय मत आहे?

उत्तर : एखाद्या अनुभवी आणि योग्य अशा गायनोकॉलॉजिस्टला दाखवणं योग्य राहील. आपली तपासणी करा आणि डॉक्टरला आवश्यक वाटलं तर पेल्वीस म्हणजे पोटाच्या खालच्या भागाची अल्ट्रासाउंड सोनोग्राफी करून घ्या.

योनीतुन पांढरा स्त्राव जाणे, मासिक पाळीच्या वेळेस वेदना होणे आणि अँटिबायोटिक्स घेतल्यावर आराम पडणे याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला सतत इन्फेक्शन होत आहे.

जर योनीत इन्फेक्शन असल्याचे समजले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या पतीचेसुद्धा योग्य उपचार करा. ही सावधगिरीन बाळगल्यास तुम्हाला हे इन्फेक्शन सतत होऊ शकतं.

आता गर्भाशयाच्या टिबीबद्दल बोलायचं झालं तर १८ महिन्यांच्या यशस्वी उपचारांनंतर त्याच्या पुनरावृत्तीचा धोका जवळपास नाहीच आहे.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

 * मी २१ वर्षांची तरुणी आहे. मला फिरायला, मौजमजा करायला आवडते. अभ्यासात किंवा घरकामात माझे मन लागत नाही. यामुळे घरातीलही सर्व माझ्यावर नाराज असतात. मी माझ्या सवयी कशा बदलू ते सांगा?

तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता. सध्या तुम्हाला फिरायला, मौजमजा करायला नक्कीच आवडत असेल, पण जेव्हा तुमचे मित्र मेहनतीने अभ्यास करुन पुढे जातील, चांगली नोकरी करू लागतील तेव्हा तुम्हाला खूपच पश्चाताप होईल.

तुम्हाला घरातली कामे करायलाही आवडत नाहीत. याचा अर्थ तुम्ही करिअरही करू शकणार नाही आणि घर कामातही पारंगत होणार नाही.

तसे तर आईवडील शक्य तोपर्यंत मुलांना लाडाने वाढवतात. त्यांच्यातील उणिवा लपवतात आणि त्यांच्यावर प्रेमही करतात. पण तुमचे लग्न होईल तेव्हा सासरचे तुम्हाला तुमच्या याच रुपात स्वीकारतील असे मुळीच नाही.

त्यामुळे वेळीच स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला तुमचा दिनक्रम बदलावा लागेल.

रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून फिरायला जा. व्यायाम करा. चांगली पुस्तके वाचा. असे एखादे काम करा ज्यामुळे दुसऱ्यांचे भले होईल. सोबतच घरातील कामातही हातभार लावा.

सुरुवातीला हे कंटाळवाणे वाटेल. पण यामुळे लवकरच तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव होऊ लागेल. यामुळे तुम्ही घरातल्यांच्या लाडक्या व्हाल शिवाय करियरही करू शकाल.

* मी २९ वर्षांची विवाहिता आहे. पती माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठे आहेत. आम्हाला एक मुलगा असून तो ज्युनिअर केजीत आहे. घरात सर्वकाही ठीक आहे. पण मुख्य समस्या पतीची आहे. वेळ मिळताच ते मोबाइलमध्ये फेसबुक, ट्विटरमध्येच हरवून जातात. रात्री उशिरापर्यंत असेच चालते. याचा माझ्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत आहे. ते महिनाभर सेक्स संबंध ठेवत नाहीत. मी पुढाकार घेतल्यावर तयार होतात, पण पहिल्यासारखे नाहीत. मोबाइलमुळे आमच्यात अनेकदा भांडणही झाले. कृपया सांगा, मी काय करू?

सोशल नेटर्वकिंग साईट्समुळे नाती आणि भावनांना तडा जात आहे. याचा परिणाम सेक्स संबंधावरही होत आहे. तरुणाई सेक्स लाईफ केवळ यामुळेच खराब करतात. तरीही हे थांबायचे नाव घेत नाही, उलट अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ब्रिटनमध्ये केलेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, तेथे १६-४४ वर्षांचे लोक महिन्यातून पाचपेक्षाही कमी वेळा सेक्स करतात. सोशल नेटर्वकिंग साईट्स, आर्थिक चणचण आणि तणाव हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे.

सध्या तुम्हाला संयमाने वागवे लागेल. पतीची ही सवय सोडवण्यासाठी त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. सोबत फिरायला जा, सिनेमा बघा, बाहेर जेवायला जा, सकाळ-संध्याकाळ सोबत फिरा आणि वेगवेगळया विषयांवर चर्चा करा. एकांतपणी त्यांच्या आवडीचा ड्रेस घाला आणि सोबतच संसारातील वेगवेगळया जबाबदारींची जाणीव त्यांना हसतखेळत करुन द्या.

तुम्ही अशा प्रकारे वागू लागल्यानंतर पती आपोआपच मोबाइल सोडून तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल.

मी २७ वर्षीय तरुण असून एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. मी स्वत:च माझ्यासाठी समस्या बनलो आहे. कारण, मला कधीच कोणती मुलगी आवडली नाही किंवा मी आतापर्यंत एखाद्या तरुणीशी सेक्स संबंध ठेवलेला नाही. मात्र, एका मुलासोबत माझी मैत्री आहे आणि आम्ही गेली ३ वर्षे एकत्र राहत आहोत. आईवडिलांना माझे लग्न लावून द्यायचे आहे, पण मला एखाद्या मुलीचे जीवन उद्भवस्त करायचे नाही. सांगा, मी काय करू?

असे वाटते की तुम्ही होमो सेक्सुअल आहात. मानसोपचारतज्ज्ञांचे असे मत आहे की, समालिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटण्यामागील एक कारण म्हणजे आपलेपणाचा अभाव, हे असू शकते.

खरंतर कुटुंबात दु:खी असणारे किंवा एखाद्या अन्य कारणामुळे त्रस्त असताना कुणीतरी आधार दिल्यास ती व्यक्ती त्यांना जवळची वाटू लागते.

संशोधनानुसार, समलिंगी सेक्सबाबत आकर्षणाचे कारण हार्मोन्सचे असंतुलन हेदेखील असू शकते. हे वंशपरंपरागत असते किंवा मग अन्य प्रभावांमुळेदेखील असे होऊ शकते.

त्यासाठी तुम्ही एखाद्या सेक्सुअल काऊन्सिलरची भेट घ्या. आवश्यकता भासल्यास मेडिकल चेकअप करा. तरच खरं कारण समजू शकेल.

तुम्हाला तुमचे आयुष्य कोणासोबत आणि कसे व्यतित करायचे आहे, याचा निर्णय तुम्ही स्वत: घ्या.

पाहायला गेल्यास आपल्या समाजात अशा नात्यांना स्वीकारले जात नाही, पण आता सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करून समलैंगिक व्यक्तींना त्यांचा हक्क बहाल केला आहे.

आरोग्य परामर्श

– डॉ. अमनजीप कौर, मेडिकल निदेशक, अमनदीप हॉस्पिटल

प्रश्न : मी २४ वर्षांची आहे. मासिक पाळीच्या दिवसात माझे पाय खूप दुखतात. हे काळजी करण्याचे कारण आहे का?

उत्तर : नाही. ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीए. मासिक पाळीच्या दिवसात शरीरातील खालील भागात दुखणे नैसर्गिक आहे. ओटीपोटीत होणाऱ्या वेदना शरीराच्या अन्य भागांपर्यंत पोहोचतात. अनेक स्त्रियांना ही समस्या जाणवते. गर्भाशय आकुंचन पावल्यानेही पाय दुखू लागतात.

प्रश्न : मी २४ वर्षांची आहे आणि मॉडेलिंग करते. रोज उंच टाचेची सॅन्डल घालावी लागते. माझे घोटे दुखतात. यामुळे माझ्या चालण्याच्या पद्धतीवर परिणाम होईल का?

उत्तर : घोट्यांमध्ये थोड्याफार वेदना असोत किंवा जास्त, पण असे असेल तेव्हा जास्त काळजी घ्यावी, सावध राहावे. घोट्यांमध्ये वेदना होण्याचे कारण दुखापत किंवा ताण असू शकतो पण आर्थ्रायटिस हेही कारण असू शकते. यामुळे तुमच्या चालण्याच्या पद्धतीत फरक पडू शकतो. पण जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर हळूहळू दुखणे कमी होऊ शकते. तुम्ही कमीत कमी २० मिनिटे घोट्यावर बर्फाने शेकवल्यास वेदनेला आराम मिळेल. असे तीन दिवस तीनवेळा करा.

प्रश्न : मी ३२ वर्षांची आहे. मला हे सांगा की ल्यूकोरिया म्हणजे काय? मी  असे ऐकले आहे की ९८ टक्के महिला यामुळे त्रस्त आहेत आणि यामुळे पुढे हाडांशी संबंधीत समस्या उद्भवतात. हे खरे आहे का? कृपया मला मार्गदर्शन करा.

उत्तर : तुम्ही घाबरण्याची गरज नाही. ल्युकोरिया म्हणजे योनिमार्गातून स्त्रवणारा घट्ट, पांढरा किंवा पिवळसर स्त्राव असतो. ही कधी ना कधी कितीही वर्षांच्या महिलेला उद्भवणारी सामान्य समस्या आहे. जसे की, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, संसर्ग, हारमोन्सचे असंतुलन इ. ल्यूकोरियामुळे हाडांची शक्ती कमी होते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर डॉक्टरांना भेटा.

प्रश्न : मी ४१ वर्षांची आहे. मी लष्करात काम करत होते. मी आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप सतर्क असते. तरीही माझी पाठ दुखते. ही मोठी समस्या आहे का?

उत्तर : ही मोठी समस्या नाही पण भविष्यात ही अवघड समस्या बनू शकते. तुम्ही लष्करात होतात, त्यामुळे व्यायामाचे महत्त्व तुम्हाला माहिती असेलच. वाढत्या वयात येणारी ही सामान्य समस्या आहे. पण पाठदुखीवर इलाज म्हणून व्यायामाचा मोठा भाग आहे. दुखण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. हीट किंवा कोल्ड थेरेपी (आइस पॅक)ही सूज कमी करून पाठीच्या वेदना कमी करण्यात सहाय्यक ठरेल.

प्रश्न : मी ३६ वर्षांची आहे. मला मधुमेह आहे. यामुळे मला भविष्यात हाडांशी संबंधित त्रास होऊ शकतो का? जर हो, तर त्यावरील उपाय काय?

उत्तर : तुम्हाला मधुमेह आहे, तर डॉक्टरांना भेटून योग्य अशा आहाराचे नियोजन केले पाहिजे. तुम्हाला हाडांचे व सांध्यासंदर्भात अनेक प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. माहितीनुसार अशा लोकांना आर्थ्रायटिस आणि सांधेदुखीसारखे त्रास होण्याची दुप्पट शक्यता असते. जर तुम्हाला सांधेदुखीची जाणीव झाली तर ‘हॉट अॅन्ड कोल्ड अप्रोच’ वापरून बघा. व्यायामानेही दुखऱ्या स्नायूंना मजबूती मिळेल व वेदनेबरोबरच सूजही कमी होईल.

प्रश्न : मी ४८ वर्षांची आहे. रोज व्यायाम करते आणि चौरस आहारही घेते. पण तरीही माझे सांधे नेहमी दुखतात. या दुखण्यापासून कशी मुक्ती मिळवू?

उत्तर : तुम्ही चौरस आहार घेता ही चांगली गोष्ट आहे व व्यायामही करता पण कुठल्याही दुखण्यापासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणेही गरजेचे असते. तसेही हल्ली सांधेदुखी ही सामान्य बाब आहे. जर तुमचे दुखणे सहन करण्यापलिकडे असेल तर तुमच्या बसण्याची पद्धत बदला आणि हाडांच्या डॉक्टरांना दाखवा. काही नैसर्गिक उपचार आहेत, ज्यामुळे दुखणे कमी केले जाऊ शकते. तुम्ही हळद व आल्याचा चहा पिण्यास सुरूवात करा. मॅग्निशियम जास्त प्रमाणात घ्या व थोडा व्यायामही करा.

प्रश्न : मी ३८ वर्षांची गृहिणी व दोन मुलांची आई आहे. मी कुठलेही जड सामान उचलू शकत नाही व वाकताही येत नाही. मी काय करू?

उत्तर : तुम्हाला पाठीचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही काही जड सामान उचलण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा स्नायूंना अतिताण आल्यामुळे तुम्हाला अतिशय वेदना होत असतील. एखादी जुनी जखम किंवा फ्रक्चरही ताणामुळे त्रासदायक ठरते व वेदना वाढवते. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतिश अग्रवाल

 प्रश्न : मी ३६ वर्षीय विवाहिता आहे. लहानपणापासून रात्री झोपण्याअगोदर दूध प्यायची सवय आहे. पण आता काही महिन्यांपासून ना मला पिशवीचे दूध पचतेए ना म्हशीचे. जेव्हा पण दूध पिते, पोटात गडबड होते. गॅस बनायला सुरूवात होते आणि म्हणून आता तर दूध प्यायची भीती वाटू लागली आहे. कृपा करून मला सांगा की या अचानक आलेल्या बदलाचे काय कारण असू शकते. दुधाची उणीव कुठल्या घरगुती उपायाने दूर येईल?

उत्तर : आपल्या छोटया आतडीतल्या आतल्या भागात एक पाचक एन्जाइम बनत असते. ज्याच्या मदतीने आपण दूधात मिळणाऱ्या नैसर्गिक साखरेला पचवू शकतो. हे एन्जाइम लॅक्टेजच्या नावाने ओळखले जाते आणि याचे कार्य दूधात उपस्थित लॅक्टोज शुगरला पचवून सरळ ग्लूकोज आणि लॅक्टोजमध्ये स्थरांवरीत करणे हे असते.

काही लोकांमध्ये हे पाचक एन्जाइम जन्मापासून नसते तर काहींमध्ये हे किशोरावस्थेत किंवा वयस्क वयात पोहोचल्यावर बनायचे बंद होते. ही समस्या नेहमी आनुवंशिक असते. व्यापक स्तरावर केल्या गेलेल्या आणि सामूहिक संशोधनानुसार, आशिया खंडातील ५० टक्के लोकांमध्ये ही समस्या असते.

आपल्याप्रमाणेच या लोकांमध्येही दूध आणि अन्य डेअरी उत्पादनं ग्रहण केल्याने वेगवेगळया समस्या निर्माण होतात. पोटदुखी, गॅस बनणे, पोट फुगणे, पोट गडबडणे इत्यादी सर्व याच समस्येचा भाग आहेत.

छोटया आतडीतल्या आतल्या भागातील पाचक पातळीवरचा हा विकार लॅक्टोज इंटोलरन्स म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत असे कुठलही रामबाण औषध तयार झाले नाही की ज्याच्यात अशी ताकत असेल की जे घेतल्यावर छोटया आतडीतील लॅक्टोज एन्जाइम पुन्हा बनू लागेल. असा कोणताही फॉर्मुला शोधलेला नाही, जो आतडयातील एन्जाइमची भरपाई करु शकेल. नशीब समजा की तुम्ही इतकी वर्ष या विकारापासून मुक्त राहू शकलात.

या समस्येपासून तुमचा बचाव व्हावा म्हणून फक्त एकच उपाय आहे की दूध आणि इतर डेअरी उत्पादनं वर्ज करा. ही तुम्ही गोष्ट दही आणि योगर्टवर लागू नाहीए. हे खरे आहे की हीसुद्धा दुधापासून बनलेली उत्पादने आहेत, पण ज्यावेळेस ही बनवली जातात त्यावेळेस लॅक्टोबॅक्टेरीया यात असलेल्या लॅक्टोज शुगरला पचवतात, ज्यामुळे हे लॅक्टोजमुक्त होतात.

बाजारात लॅक्टोजमुक्त दूधसुद्धा मिळते. हे सामान्य दुधापेक्षा महाग असते. आपण हे अगदी आरामात पिऊ शकता. सोयाबीन दूधसुद्धा लॅक्टोज मुक्त असते. दूध आणि अन्य डेअरी उत्पादन बंद केल्यानंतर शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होण्याचा धोका वाटतो. म्हणून त्याच्या भरपाईसाठी एक तर कॅल्शिअमयुक्त जेवण घ्या किंवा पूरकतेसाठी गोळया घ्या. प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डाळी, अन्न, मासे, मटण इत्यादी चांगले स्त्रोत आहेत.

प्रश्न : मी २६ वर्षीय तरूण आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून लॉची डिग्री पूर्ण केल्यानंतर आता एका मोठया लॉ कंपनीमध्ये असोसिएटच्या रूपात काम करतोय, ज्यामुळे माझे स्लिप क्लॉक बिघडले आहे. अंथरुणात झोपल्यानंतरही उशिरापर्यंत झोप येत नाही. दिवसभराच्या घटना डोक्यात थैमान घालत असतात. कृपया काही असे व्यावहारिक उपाय सांगा, ज्यामुळे मला पहिल्यासारखी छानशी झोप यायला लागेल.

उत्तर : हे  खरे आहे की जगात झोपेसारखी दुसरी प्रिय गोष्ट नाही. पुरेशी झोप घेतल्यामुळे मानसिक पातळीवर ताजेतवाने वाटते. शरीरात एक प्रकारची स्फूर्ती येते आणि जेव्हा सकाळी डोळे उघडतात, तेव्हा नसा-नसात उत्साह भरून जातो. वयस्क जीवनात ६ ते ८ तासांची झोप चांगले स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहे.

रात्री उशिरापर्यंत काम करणे ही तुमची विवशता आहे, चांगली झोप येण्यासाठी खालील उपाय लाभदायक ठरू शकतात :

ताण-तणावाचे जग मागे सोडून या : झोप येण्यासाठी मन शांत असणे जरूरी आहे. त्याच्यावर कुठलाही दबाव नको. ऑफिसातून परत आल्यावर थोडी मौज-मस्ती करावी. मन थोडे मोकळे सोडावे, ज्यामुळे  दिवसभराचा तणाव दूर होईल.

मनामध्ये शांतीचे स्वर जागवा : झोपण्याअगोदर असं काही करा की ज्यामुळे मनामध्ये सुख शांतता नांदेल. मग भले ही त्यासाठी रिलॅक्सिंग म्युझिक ऐका, एखादे पुस्तक वा मासिक वाचा आणि जेव्हा डोळे जड व्हायला लागलीत, तेव्हा झोपी जा.

टीव्ही आणि कंम्प्युटर झोपेचे साथी नाहीत : झोपण्याच्याअगोदर उशिरापर्यंत टीव्ही बघणे वा कंम्प्युटरवर काम करणे झोपेमध्ये बाधक ठरू शकते. ज्याच्या तीव्र प्रकाशामुळे मेंदूचे सर्किट जागृत अवस्थेत राहते. साखर झोप हवी असेल तर झोपण्याच्या तास-दीड तास आधी ही साधने बंद करावीत.

हलके जेवण चांगले : झोपण्याअगोदर हलके जेवण घेणे कधीही चांगले. पोट वरपर्यंत भरलेले असेल आणि शरीर पचनाकार्यात व्यस्त असेल तर झोप कशी येणार?

चहा आणि कॉफी घेणे टाळा : संध्याकाळी उशिरा चहा आणि कॉफी घेतल्याने झोप लागत नाही. यातील कॅफिन मेंदूला आराम घेऊ देत नाही.

अंघोळ करावी : अंथरुणात जाण्याच्या १ तास अगोदर अंघोळ केल्यास शरीराला शेक मिळतो आणि पेशी रिलॅक्स होतात. हा थकवा दूर करण्याचा सोपा उपाय आहे.

योगनिद्रा आहे तणावमुक्तीचे उत्तम औषध : झोपण्याअगोदर काही मिनिटे योगनिद्रेत घालवल्याने त्याचा विशेष फायदा होतो. असे केल्याने शरीर आणि मन-मेंदू शांत अवस्थेत पोहोचते आणि लगेच झोप येते.

सकारात्मक विचार मानसिकता ठेवावी. दिवसा काही वेळ व्यायामासाठीही काढावा. वजनावर नियंत्रण ठेवावे. शक्य असेल झोपेची वेळ निश्चित करावी. हे सगळं केल्यावर निश्चितच तुम्ही पुन्हा पूर्वीसारखा साखर-झोपेचा आनंद घेऊ शकाल.

गृहशोभिकेचा सल्ला

  • मी ३१ वर्षांची विवाहित स्त्री आणि ४ वर्षांच्या मुलीची आई आहे. मी एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर जिवापाड प्रेम करतो. मी विवाहित आणि एका मुलाची आई असूनही आम्हा दोघांचे प्रेमसंबंध खूप चांगले आहेत.

आम्ही निर्धास्त होऊन शारीरिकसंबंधही ठेवले आहेत. पण आता अचानक मला असं वाटू लागलं आहे की अशा प्रकारचं वाईट कृत्य मी करायला नकोय. म्हणून मी त्या मुलापासून दुरावा निर्माण केला आहे. पण तरी तो मला वारंवार फोन करत आहे.

तो मला भेटायला बोलवत आहे. मी त्याला एकदा भेटू का? मी काय करू सांगा?

तुम्ही एक विवाहित स्त्री आहात. अशा प्रकारे कोणा दुसऱ्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवून तुम्ही केवळ आपलं वैवाहिक जीवन धोक्यात घालत नव्हतात, तर त्या मुलाचीही दिशाभूल करत होता. हे तर बरं झालं की वेळीच तुम्हाला तुमची चूक कळली आणि तुम्ही तुमचं पाऊल मागे घेतलं. तुमच्यावर केवळ तुमच्या कुटुंबाचीच नव्हे तर तुमच्या लहान मुलीच्या पालनाचीही जबाबदारी आहे. म्हणून आपल्या निर्णयावर ठाम राहा.

तुमच्या प्रियकराला स्पष्ट सांगा की तुम्हाला त्याला भेटायचं नाहीए. म्हणून त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये.

  • मी ३० वर्षांची विवाहित स्त्री असून एका किशोरवयीन मुलाची आई आहे. अलीकडे मी माझ्या एका कौटुंबिक समस्येमुळे खूप चिंतित आहे. मी शासकीय शाळेत शिक्षिका आहे. मात्र माझ्या पतींची सध्या फार वाईट अवस्था सुरू आहे. ते ज्या खाजगी कंपनीमध्ये आधी काम करायचे तिथून त्यांना अचानक असं सांगून काढून टाकलं गेलं की सध्या कंपनीला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे.

आता समस्या ही आहे की त्यांना आपली पोझिशन आणि पात्रतेनुसार काम मिळत नाहीए. त्यांना आधीच्या कंपनीमध्ये जितका पगार मिळत होता, तितक्याच पगारावर काम करायचं आहे. असं घरातच रिकामं बसून त्यांना दोन महिने झालेत.

मी त्यांना सतत सांगते की पगार कमी मिळाला तरी हरकत नाही, पण त्यांनी नोकरीत रूजू व्हावं. पण ते अजिबात ऐकतच नाहीएत. म्हणतात, जग पुढे चालले आहे आणि मी का म्हणून मागे जाऊ? तुम्हीच सांगा, मी त्यांना कसं समजावू?

तुम्ही तुमच्या पतींना या गोष्टीसाठी तयार करा की त्यांना जर त्यांच्या मनासारखं काम मिळालं असेल आणि कंपनीही चांगली असेल तर त्यांनी पगाराला जास्त महत्त्व देऊ नये. कष्ट केले तर पुढे जाण्याचीही संधी मिळेल. नोकरी करता करता यापेक्षा चांगल्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. पण सतत जर ते काही काळ रिकामे बसले तर त्यांचा आत्मविश्वासही खचेल आणि मग चांगली नोकरी मिळणंही आणखीनच कठीण होऊन बसेल.

  • मी १८ वर्षांची तरुणी असून एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर खूप प्रेम करतो पण अलीकडे तो माझ्यावर नाराज आहे. त्याच्या नाराजीचं कारणही मी स्वत:च आहे. खरंतर तो जरा संशयी स्वभावाचा आहे. प्रत्येक गोष्टीवर तो संशय घेत असतो. त्याच्या या वागणुकीमुळे मी खूपच त्रस्त झाले होते.

प्रत्येक गोष्टीसाठी तो मला सतत जाब विचारायचा. त्याला धडा शिकवण्यासाठी मीही एक मूर्खपणाचं पाऊल उचललं. मी एका मुलाशी मैत्री केली.

पण तो मुलगा खूपच धूर्त निघाला. त्याने मला फूस लावून माझ्याशी शारीरिकसंबंधही ठेवले आणि त्यानंतर माझ्याशी बोलणंही सोडून दिलं. माझ्या या बालिश वागणुकीचा आता मला खूपच पश्चात्ताप होत आहे.

माझा प्रियकर जो माझी इतकी पर्वा करायचा तोही मला भाव देत नाहीए. तुम्हीच सांगा, मी काय करू?

तुम्ही तुमच्या प्रियकराच्या संशयी स्वभावामुळे जर त्रस्त होता तर यासाठी त्याला तुम्ही समजावू शकला असता, की मैत्रीमध्ये एकमेकांवर विश्वास असणं फार जरुरी आहे. नाहीतर मैत्री पुढे जात नाही. तुम्ही अजाणतेपणी जी चूक केली त्याच्यासाठी तुम्हाला आता अपराधी वाटत आहे, हेच पुरेसं आहे. आपल्या प्रियकराला समजावण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्यावर प्रेम करतो तर नक्कीच तुमचं ऐकून घेईल. तुम्ही उगाच काळजी करू नका.

  • माझा एक चुलत भाऊ आहे. आम्ही दोघे समवयीन आहोत. आम्ही जेव्हा कधी काकांच्या घरी राहायला जातो तेव्हा रात्रीच्या वेळेस माझा भाऊ माझ्याजवळ येतो. पण त्यावेळेस तो ज्याप्रकारे माझ्यासोबत अश्लील चाळे करतो ते मला आवडत नाहीत. यासाठी मला त्याला अडवताही येत नाही की घरातही मी याविषयी कोणाला सांगू शकत नाही. कृपया तुम्हीच सांगा, मी काय करू?

तुमचा चुलतभाऊ रात्री तुमच्यासोबत अश्लील चाळे करत असेल तर तुम्ही त्याच्या खोलीमध्ये झोपायला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीसोबत झोपू शकता. पण तुम्ही असं काहीच करत नाहीए. तुम्हाला जर त्याची वागणूक खरोखरच आवडत नसती तर तुम्ही पहिल्यांदाच त्याला धमकावलं असतं, म्हणजे त्याने पुन्हा असं करण्याचं धाडस केलं नसतं. पण असं वाटतंय की तुम्हालाही या सगळ्यात मज्जा येते, म्हणून तुम्ही त्याला अडवत नाहीत. अर्थातच, या सगळ्यात तुमची मूक सहमती आहे. पण तुम्हाला हे कळायला हवं की यामुळे पुढे जाऊन तुम्ही अडचणीत सापडू शकता.

म्हणून त्याला यासाठी नकार द्या. तो ऐकत नसेल तर सक्तपणे त्याला धमकी द्या की तुम्ही तुमच्या कुटुंबियांकडे त्याची तक्रार कराल. अशाने तो आपोआपच सरळ होईल.

आरोग्य परामर्श

– डॉ. राजू वैश्य

 प्रश्न : माझ्या ३३ वर्षांच्या पुतणीला अलीकडेच ऑस्टियोपोरोसिस झाल्याचं निदान झालं आहे. मला वाटायचं की हा वृद्धांचा आजार आहे, पण हा काय तरुणांनाही होतो का?

उत्तर : लोकांचा हा चुकीचा समज आहे की ऑस्टियोपोरोसिस हा केवळ वृद्धांनाच होतो, पण सत्य हे आहे की माणसांना ९८ टक्के बोन मास वयाच्या ३०व्या वर्षांपर्यंत राहातो, दरवर्षी हाडांचं घनत्त्व कमी कमी होत जातं. रजोनिवृत्तीनंतर एस्ट्रोजनच्या अभावामुळे स्त्रियांची हाडं वेगाने कमकुवत होत जातात. पण कमी वयाच्या लोकांनाही ऑस्टियोपोरोसिसची समस्या होऊ शकते. विशेष करून तेव्हा जेव्हा हार्मोन्सची समस्या असेल. व्हिटामिन डीचा अभाव असेल किंवा एखादं औषध घेत असाल जसं की थायरॉइड किंवा स्टेराइडचं. या समस्येपासून वाचण्यासाठी स्वस्थ आहार घ्या, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटामिन डी असेल. त्याचबरोबर किशोर आणि तरुणांनी कार्बोनेटेड पेय, अल्कोहोल आणि धूम्रपान करणं टाळलं पाहिजे.

प्रश्न : मी २७ वर्षांची तरुणी आहे. माझ्या बोन डेंसिटी टेस्ट (अस्थी घनत्त्व)मध्ये माझ्या हाडाचं घनत्त्व कमी आढळलं आहे. हे नीट करण्यासाठी मला काय करावं लागेल?

उत्तर : धूम्रपान करणं, अधिक मद्यपान करणं, सोडा पॉपचं सेवन, अधिक गोड आणि प्रोसेस्ड आहार घेतल्याने बोन डेंसिटीवर विपरीत परिणाम होतो. याऐवजी हलकं मांस, हलकी डेरीची उत्पादनं, भरपूर भाज्या आणि फळाचं सेवन करा. आर्थ्रायटिसग्रस्त लोकांनी वॉटर ऐरोबिक्स तर वाढवायलाच हवं, पण त्याचबरोबर वजन उचलणं आणि पायी चालणं या गोष्टी आपल्या दिनचर्येत सामील करा. याने तुमची हाडं मजबूत होतील.

प्रश्न : माझी मुलगी दूध पीत नाही. मला वाटतं यामुळे तिची हाडं कमजोर होतील. मी तिला कसा आहार देऊ ज्यामुळे तिला पुरेपूर कॅल्शियम मिळू शकेल?

उत्तर : तुमची मुलगी जर दूध पीत नसेल तर तिला दुधापासून निर्मित पदार्थ जसं की दही, चीज, पनीर इत्यादी खायला द्या. व्हिटामिन डीयुक्त इतर खाद्यपदार्थ खायला द्या. अंडी, पालक, कडधान्य हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असतात.

प्रश्न : माझ्या ४७ वर्षांच्या सासूबाई ऑस्टियोपोरोसिसच्या रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी किती प्रमाणात कॅल्शियमचं सेवन करणं योग्य आहे? जास्त प्रमाणात कॅल्शियमचं सेवन केल्याने काही साइड इफेक्ट होतो का?

उत्तर : ऑस्टियोपोरोसिस असल्यास दररोज ५०० एमजी एलिमेंटल कॅल्शियमचे ३ डोस घ्या. ३ डोस देण्यामागचं कारण म्हणजे आपलं शरीर एका वेळी इतकंच कॅल्शियम पचवू शकतं. म्हणूनच मजबूत हाडांसाठी कॅल्शियमचा त्यांचा कोटा दिवसभरातील आहाराद्वारे देत राहा. गरज पडल्यास याची कमतरता दूर करण्यासाठी कॅल्शियम सप्लिमेंट द्या.

प्रश्न : मी ४२ वर्षांचा असून काही महिन्यांपासून सांधेदुखीने त्रस्त आहे. मी शारीरिकरीत्या सक्रिय असून सैरही करतो. पण तरीदेखील वेदना कमी होत नाहीए. कृपया सांधेदुखीची वेदना कमी करण्याचा एखादा उपाय सांगा?

उत्तर : सांधेदुखी वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. यासाठी दुखापत, एखाद्या गोष्टीचा मनाला धक्का बसणं, आजार, ताणतणाव, बर्साइटिस, टेंडोनायटिस आणि ऑस्टियोपोरोसिसही कारण ठरू शकतं. आर्थ्रायटिसमुळेदेखील सांध्यांमध्ये वेदना होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सांधेदुखीची वेदनादेखील प्रत्येक व्यक्तिमध्ये वेगवेगळी असते. ही वेदना कमी करण्याचे अनेक उपाय आहेत.

आइस थेरेपी : तापमान कमी झाल्याने रक्तप्रवाह कमी होतो ज्यामुळे पेशींची सूज कमी होते. पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला वेदना जाणवत असेल तेव्हा दुखत असलेल्या भागावर तुम्ही आइसपॅक लावा. हे एका तासाच्या अंतराने दिवसातून अनेक वेळा १५ मिनिटं तरी लावा. दुसऱ्या दिवशी फक्त ४-५वेळा बर्फ लावा, पण तेही १५ मिनिटांसाठी. हा उपाय सांधेदुखीपासून आराम मिळवून देतो. पण आइसबर्नपासून काळजी घ्या. बर्फ थेट त्वचेवर ठेवू नका, टॉवेल किंवा कपड्यात गुंडाळून मगच ठेवा.

हायड्रो थेरेपी : कोमट पाण्यानेसुद्धा सांधे आणि स्नायूंवरील ताण कमी होतो म्हणूनच कोमट पाण्याने चांगल्या प्रकारे अंघोळ करावी, यामुळे नितंब आणि गुडघ्यांची वेदना कमी होते. दुखणारा भाग पाण्यात बुडवा आणि मालीश करा, यामुळे रक्तप्रवाह वाढेल.

मालीश : गुडघ्यांच्या सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मालीश सर्वात चांगला पर्याय आहे. मालीश कोणा तज्ज्ञ व्यक्तिकडून करून घ्या किंवा मग स्वत:च घरात करा. तुम्ही जर स्वत:च मालीश करत असाल तर वेदना कमी करण्यासाठी दुखणाऱ्या भागावर टोपिकल मेंथोल चोळा. तसंत मालीश करताना तुम्ही आपल्या हृदयाच्या दिशेने हात चालवा.

व्यायाम : अशा व्यायामाची निवड करा ज्यामुळे तुम्ही तुमच्या दुखण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याआधीच चालूफिरू शकाल आणि सांध्यांची वेदनाही वाढणार नाही. सामान्य व्यायामानेदेखील सांधेदुखीपासून आराम मिळतो. व्यायामामुळे गुडघ्यांची ताकद आणि लवचिकपणा वाढतो, तसंच वेदनाही दूर होते.

आरोग्य परामर्श

– डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी १६ वर्षांची तरुणी आहे. माझे नाक खूप रुंद आहे. ते चेहऱ्याला शोभत नाही. अशी काही सोपी युक्ती आहे का, ज्यामुळे माझे नाक आकाराने छोटे, पातळ आणि सुंदर दिसेल?

उत्तर : नाकाच्या सौंदर्यात सुधारणा करण्यासाठी एखाद्या सोप्या घरगुती उपायाचा प्रश्न आहे, तर विश्वास ठेवा अजूनपर्यंत असा कोणताही व्यायाम, मालीश, तेल किंवा क्रीम बनलेली नाही, जी आपली इच्छा पूर्ण करू शकेल. जर आपण या समस्येमुळे जास्त त्रस्त असाल, तर त्यासाठी एक व्यावहारिक उपाय आहे.

आपल्या समस्येबाबत आपण आईवडिलांसोबत कॉस्मॅटिक प्लास्टिक सर्जन किंवा ईएनटी सर्जनला भेटावे, जे नाक सुंदर बनवण्यासाठी राईनोप्लास्टी ऑपरेशन करतील. ऑपरेशनमुळे होऊ शकणाऱ्या सुधारणांबाबत सविस्तर जाणून घ्या. ऑपरेशनच्या वेळी येऊ शकणाऱ्या समस्यांबाबत प्रश्न विचारा. आरोग्य लाभ आणि सामान्य होण्यास किती वेळ लागेल, हे जाणून घ्या. ऑपरेशन आणि उपचारावर किती खर्च येईल इ. गोष्टी जाणून ऑपरेशनचा निर्णय घ्या.

पण हो, जर तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला असेल, तर आपण हे ऑपरेशन आपला शारीरिक विकास पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच १८-१९ वर्षांच्या वयानंतरच करणे योग्य ठरेल.

प्रश्न : मी २२ वर्षांची नवतरुणी आहे. माझे ब्रेस्ट खूप छोटे आहेत आणि पाळीही दर महिन्याला येत नाही. डॉक्टरने तपासणी करून सांगितले की माझ्या ओवरिजला सूज आणि गाठी आहेत. औषध घेतल्यानंतर सूज आणि गाठी बऱ्या झाल्या, पण पाळी अजूनही वेळेवर येत नाही. तसेच ब्रेस्टचाही पुढे विकास झाला नाहीए. मी काय करू?

उत्तर : आपल्या पत्रावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की आपल्या शरीरात एक तर सेक्स हार्मोन्स नीट बनत नाहीत किंवा मग त्यांच्या प्रमाणात काहीतरी कमतरता आहे. याच केमिकल समस्येमुळे आपली पाळी वेळेवर येत नाहीए आणि आपल्या ब्रेस्टचा विकासही अर्धवट झाला आहे.

सेक्स हार्मोन्सची ही कमतरता अनेक पातळांवर उत्पन्न होते. मेंदूतील हायपोथॅलेमस ग्लँड, पीयूष ग्रंथी आणि ओव्हरीजमध्ये आपसातील ताळमेळ बिघडणे, तिन्हीपैकी एखाद्या गोष्टीचा रुग्ण होणे किंवा ओव्हरिज सुरुवातीलाच योग्य विकसित न झाल्याने ही समस्या निर्माण होते. परिणामी एका बाजूला ओव्हरिजमधून दर महिन्याला एक अंडे बाहेर येण्याच्या सामान्य प्रक्रियेत बाधा निर्माण होते, तर दुसऱ्या बाजूला एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स निर्मितीमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे स्त्री शरीराची नैसर्गिक जननांगीय लय बिघडते. साहजिकच ना वेळेवर पाळी येते, ना ब्रेस्टचा विकास योग्य प्रकारे होतो.

एखाद्या कुशल स्त्रीरोग तज्ज्ञाकडून आपण आपल्या सर्व टेस्ट करून घेणे उत्तम ठरेल. पेल्विक अल्ट्रासाउंड, हार्मोन टेस्ट आणि इतर गरजेनुसार दिलेल्या टेस्टचा रिपोर्ट पाहून, हा निर्णय घेता येऊ शकेल की समस्या कोणत्या पातळीवर आणि कोणत्या प्रकारची आहे. त्यानुसार डॉक्टर पुढे उपचाराचे मार्ग निश्चित करू शकतात. आपण आपल्या डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणे आणि समस्येचे मूळ जाणून घेणेही आवश्यक आहे. ही माहिती आपल्याला आपल्या जीवनाचे लक्ष्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण सिध्द होऊ शकते.

प्रश्न : मी ३९ वर्षांचा विवाहित पुरुष आहे. दिर्घ काळापासून एका मोठ्या समस्येतून जात आहे. जेव्हा मी पत्नीसोबत शारीरिक मिलन करतो, तेव्हा लवकर स्खलित होतो. या समस्येतून सुटण्यासाठी नेहमी मिलनापूर्वी १ पेग वाइन घेतो आणि लैंगिक संबंध बनवताना कंडोमचा वापर करतो, कंडोम वापरल्यामुळे पत्नीला समाधान मिळत नाही. एखादा व्यावहारिक उपाय सांगा, ज्यामुळे माझी या समस्येतून सुटका होईल.

उत्तर : आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या समस्येने ग्रस्त आहात. ही पुरुषांमध्ये आढळून येणारी सामान्य समस्या आहे. याचा संबंध जास्त करून आपल्या मानसिक अवस्थेशी जोडलेला असतो. वाइन घेतल्यानंतर व कंडोमचा वापर केल्यानंतर, जर आपण लैंगिक क्रीडा दीर्घकाळ करण्यास समर्थ ठरता, तर आपल्यात काही शारीरिक कमतरता नाही, हे सिध्द होते. खरे तर हे दोन्ही उपाय लैंगिक सेंसेशन मंद करतात, ज्यामुळे आपल्याला फायदा झाल्याचा अनुभव येतो.

पण डॉक्टरांच्या दृष्टीने पाहिले तर दोन्हीपैकी कोणताही उपाय समस्येतून सुटका करून देण्यात योग्य ठरवता येणार नाही. समस्येतून सुटका करून घेण्यासाठी तर आपण एखाद्या युरोलॉजिस्ट किंवा मग रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन स्पेशालिस्टला भेटून योग्य औषध घेऊ शकता. यापेक्षाही उत्तम उपाय हा आहे की आपण एखाद्या सेक्सुअल थेरपिस्टच्या निगराणीखाली कीगल एक्सरसाइज शिकू शकता. त्यामुळे योनीच्या पेशी आधीपेक्षा जास्त मजबूत होतात. या सोप्या व्यायामाचे अनेक फायदे असतात, त्यामध्ये प्रीमॅच्योर इजॅक्युलेशनपासून सुटका होणे हाही आहे.

हा लाभ घेण्यासाठी कीगल एक्सरसाइज नियमित करावी लागते. अभ्यासातून हे आढळून आले आहे की २ ते ६ महिन्यापर्यंत सतत कीगल एक्सरसाइज करत राहिल्याने ५० टक्क्यांपेक्षा जास्त पुरुष प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या समस्येतून सुटका मिळविण्यात यशस्वी होतात.

आरोग्य परामर्श

* डॉ. पूजा राणी, आयव्हीएफ एक्सपर्ट, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, रांची

प्रश्न :  माझ्या सुनेचे वय ३१ वर्षे आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. मात्र, अजून ती आई बनू शकली नाही. मुलगा आणि सुनेच्या अनेक तपासण्या आणि उपचार केले, परंतु समस्या दूर झाली नाही. सून खूप उदास राहू लागली आहे. कधी-कधी कारणाशिवाय रडू लागते. कृपया सांगा काय करू?

उत्तर : कुठल्याही महिलेसाठी आई बनणे हा तिच्या जीवनातील सर्वात सुखद अनुभव असतो. अशा वेळी तुम्हाला तुमच्या सुनेची मनस्थिती समजू शकते. तुमच्या सांगण्यावरून वाटते की आई न बनल्यामुळे तुमच्या सुनेला नैराश्य आले आहे. तुम्हाला तिला या स्थितीतून बाहेर काढावे लागेल. कारण तणाव वांझपणाची समस्या आणखी वाढवतो. तणावामुळे प्रजनन तंत्रासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. जगभरात वांझपणाची ५० टक्के प्रकरणे तणाव व इतर मानसिक समस्यांमुळे होतात. तुम्ही त्यांना एखाद्या चांगल्या मानसशास्त्र तज्ज्ञाला दाखवा. तिला खूश ठेवण्याचा हर प्रकारे प्रयत्न करा. कदाचित त्यांचे आई न बनण्याचे कारण मानसिकही असू शकते.

प्रश्न : मी लठ्ठपणामुळे आधी गर्भधारणा करू शकले नव्हते. परंतु आता मी माझे वजन कमी केले आहे, तरीही गर्भधारणा करण्यात मला समस्या येत आहे. गर्भधारणा करण्यासाठी आता आयव्हीएफ हाच एकमेव उपाय राहिला आहे का?

उत्तर : लठ्ठपणामुळे गर्भधारणा करण्यात समस्या येऊ शकते. परंतु लठ्ठ महिला कधीही आई बनू शकत नाहीत, असे नाही. आता तर तुम्ही तुमचे वजनही कमी केले आहे. सर्वप्रथम एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला भेटून आपल्या वांझपणाचे कारण जाणून घ्या.

आयव्हीएफ वांझपणावर उपचार करण्यासाठी एकमेव उपाय नाहीए. या समस्येची अनेक कारणे असू शकतात. जेव्हा यावर योग्य प्रकारे डायग्नोसिस आणि उपचार केले जातील, तेव्हा सहजपणे गर्भधारणा करता येऊ शकते. फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये औषधे, हार्मोन थेरपी, आययूआय सर्वात प्रभावी उपचारपद्धती आहे.

काही वेळा जीवनशैलीत बदल करूनही वांझपणाची समस्या दूर होऊ शकते. जर या सर्व प्रयत्नांनंतरही संतानसुखाची प्राप्ती झाली नाही, तर मात्र आयव्हीएफ तंत्राची मदत घेता येईल.

प्रश्न :  माझे वय ३८ वर्षे हे आणि आता माझा मेनोपॉज सुरू झाला आहे. माझ्यासाठी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा होण्याची काही शक्यता आहे का?

उत्तर : मेनोपॉजसाठी ३८ वर्षे ही खूप लहान वय आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की हा खरोखरच मेनोपॉज आहे की दुसऱ्या कुठल्या कारणामुळे मासिक पाळी बंद झाली आहे. अल्ट्रासाउंडने मेनोपॉजची पुष्टी होते. मेनोपॉजमध्ये अंडेनिर्मितीची प्रक्रिया बंद होते. त्यामुळे सहजरीत्या गर्भधारणा करणे अशक्य आहे. अशा वेळी आयव्हीएफ तंत्र गर्भधारणा करण्यात मदत करते. डोनर प्रोग्रामद्वारे दुसऱ्या एखाद्या महिलेचे अंडे घेतले जाते आणि त्यांना जोडीदाराच्या स्पर्मने फलित केले जाते. या भ्रूणाला महिलेच्या गर्भाशयात इम्प्लान्ट केले जाते.

जर दुसऱ्या एखाद्या कारणामुळे मासिक पाळी बंद झाली असेल, तर त्या कारणाचा शोध घेऊन उपचार घेऊ शकतो.

प्रश्न : मी ३३ वर्षीय गृहिणी आहे. लग्नाला १२ वर्षे झाली आहेत, पण आम्हाला अजून मूलबाळ नाही. आम्हाला आयव्हीएफद्वारे मूल हवे आहे, पण मी असे ऐकलेय की अशा प्रकारे जन्मलेल्या मुलामध्ये जन्मत:च दोष निर्माण होण्याची जास्त शक्यता असते?

उत्तर : आयव्हीएफ तंत्राद्वारे जन्म घेणाऱ्या मुलांमध्ये जन्मत:च विकृती असण्याची शक्यताही, सामान्य गर्भधारणेद्वारे जन्म घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत केवळ १-२ टक्के वाढलेली असते. सामान्यत: गर्भधारणेमध्ये ही शक्यता १५ मुलांमध्ये १ अशी असते आणि आयव्हीएफमध्ये ती प्रत्येक १२ मुलांमध्ये १ अशी असते.

असिस्टिड रीप्रॉडक्टिव्ह टेक्निक्समध्ये रोज नवीन तंत्र विकसित होत आहेत. हे केवळ त्याच लोकांचीच मदत करत नाहीत, जे काही कारणामुळे संतानहिन आहेत, शिवाय आनुवंशिकरीत्या निरोगी बाळाला जन्म देण्यासही मदत करत आहे.

अशी अनेक दाम्पत्य आहेत, जी सामान्य आहेत व वांझ नाहीत. परंतु ती अशा जीन्सची संवाहक आहेत, जे एखाद्या आनुवंशिक रोगाचे कारण आहे. उदा. थॅलेसीमिया, हनटिंग्टन डिसीज, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम इ. या प्रक्रियेमुळे अशा लोकांनाही निरोगी मूल मिळविण्यास मदत होत आहे. भ्रूण विकसित केल्यानंतर त्याची प्रयोगशाळेत तपासणी होते. केवळ तेच भ्रूण महिलेच्या गर्भामध्ये इम्प्लान्ट केले जाते, ज्यामध्ये जेनेटिकल काहीही समस्या नसते.

पूर्वी आयव्हीएफचे यश २०-४० टक्केच असे. परंतु संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की सर्वश्रेष्ठ भ्रूणांना निवडण्याचे जे आधुनिक तंत्र आहे, ते याच्या यशाचा दर ७८ टक्के वाढवते.

प्रश्न : मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझ्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. संतानप्राप्तीसाठी सर्व प्रयत्न केले. आता आम्हाला आयव्हीएफची मदत घ्यायची इच्छा आहे. पण असे ऐकलेय की हा एक धोकादायक आणि खूप खर्चिक उपचार प्रकार आहे?

उत्तर : नाही, हा धोकादायक नाहीए, तर हा एक सुरक्षित उपचार आहे. केवळ १-२ टक्के महिलाच गंभीर ओव्हेरियन हायपर स्टीम्युलेशन सिंड्रोमच्या कारणामुळे आजारी पडतात. आयव्हीएफ तंत्राची सफलता जवळपास ४० टक्के असते. हे यश केवळ उपचार तंत्रावर नव्हे, तर महिलांचे वय, वांझपणाची कारणे, बायोलॉजिकल आणि हार्मोनल कारणांवरही अवलंबून असते.

हा महागडा उपचार आहे. परंतु गेल्या वर्षांमध्ये यावर होणाऱ्या एकूण खर्चात जास्त वाढ झालेली नाही.

सौंदर्य समस्या

– समाधान ब्यूटी एक्सपर्ट, पूजा साहनी

  • रेच काळे डाग आहेत, ज्यामुळे मी खूपच चिंतित आहे. मी अनेक उपाय केले, पण काहीच फायदा झाला नाही. चेहऱ्यावरील डाग दूर करण्याचे उपाय सांगा?

चेहऱ्यावर डाग दीर्घकाळ उन्हात राहिल्याने, दिवसभर प्रदूषणाच्या संपर्कात येण्याने आणि कधी कधी हार्मोनल बदलामुळेही होतात आणि मग दिवसेंदिवस हे डाग गडद होत जातात. पण काही उपाय करून हे हलके केले जाऊ शकतात. तुम्ही टोमॅटोचा रस कापसाने आपल्या डागांवर आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर धुऊन काढा. त्याचबरोबर बटाट्याच्या सालींचा रस चेहऱ्याच्या डागांवर लावल्यानेदेखील डाग हलके होतात. याशिवाय तुम्ही दही आणि बेसन किंवा लिंबू आणि मधाचा लेपही चेहऱ्यावर लावू शकता. हा लेप चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे लावून सुकू द्या, मग चेहरा धुवा. हे उपाय सतत केल्याने डागही हलके होतील आणि चेहराही उजळून निघेल.

  • माझ्या चिन आणि अपरलिपवर केस आहेत, जे मला काही दिवसांच्या अंतराने थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगद्वारे काढून टाकावे लागतात. पण ते पुन्हा लगेचच वाढतात आणि माझा चेहरा खराब दिसू लागतो. असा एखादा घरगुती उपाय सांगा ज्याने चिन आणि अपरलिपचे केस कायमस्वरूपी दूर होतील?

सामान्यपणे चेहऱ्यावर अधिक लव येणं हे हार्मोनल असंतुलनामुळे होत असतं. हे नको असलेले केस तुम्ही ब्यूटी ट्रीटमेंट जसं की ब्लीचिंग, वॅक्सिंग, लेझर ट्रीटमेंट किंवा हेअर रिमूवल क्रीमद्वारे काढू शकता. यामध्ये लेझर ट्रीटमेंट हा स्थायी उपाय आहे तर इतर अस्थायी उपाय आहेत. तुम्ही घरगुती उपाय म्हणून हळदीचा घट्ट लेप बनवा आणि नको असलेल्या केसांना लावा मग सुकू द्या. सुकल्यावर चोळून चोळून हळद काढा आणि मग चेहरा धुवा. असं ४-५ आठवडे सतत करा. हळद नैसर्गिक ब्लीचचं काम करते आणि हळूहळू केसांची वाढ मुळापासून संपवण्यासाठी मदत करते. अशाच प्रकारे लिंबू आणि साखरेचा लेपही चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यास मदत करतो.

  • मी २२ वर्षांची तरुणी असून माझ्या सावळट रंगामुळे खूप हैराण आहे. सावळट रंगामुळे मला माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये खूप मोठा अभाव असल्यासारखं वाटतं. असा एखादा घरगुती उपाय सांगा ज्याने त्वचेच्या रंगामध्ये सुधारणा होऊ शकेल?

कोणतीही व्यक्ती सावळट व गोरी असणं हे नैसर्गिक असण्याबरोबरच आनुवंशिकही असतं, जे पूर्णपणे बदलणं कठीण आहे. सावळेपणा हा कसला अभाव वा कमी नाहीए. तसंही अलीकडे डस्की ब्यूटीचं युग आहे. पण तरीदेखील तुम्हाला हवं तर तुम्ही काही घरगुती उपाय करून आपल्या रंगामध्ये सुधारणा करू शकता. तुम्ही टोनर म्हणून कच्च्या दुधाचा वापर करा. कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर दूध लावा आणि हळुवारपणे मसाज करा. जेव्हा दूध त्वचेमध्ये पूर्णपणे मुरून सुकेल तेव्हा चेहरा धुऊन काढा. याने त्वचेचा पोत सुधारेल. याव्यतिरिक्त पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यानेदखील त्वचा उजळते. याशिवाय तुम्ही उन्हात जाणं टाळा आणि घरातून बाहेर पडतेवेळी एसपीएफयुक्त सनस्क्रीन लावा.

  • मी कॉलेजात जाणारी विद्यार्थिनी आहे. माझं केस खूपच पातळ आहेत. केस स्वस्थ आणि लांबसडक बनवण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

केसांना स्वस्थ आणि लांबसडक बनवण्यासाठी दररोज तेल लावा. मालीश करण्यासाठी तुम्ही खोबरेल किंवा ऑलिव्ह तेलाचा वापर करू शकता. केसांवर केमिकल ट्रीटमेंट फार कमी प्रमाणात करा. या ट्रीटमेंटमुळे केस अशक्त होतात. केस स्वस्थ ठेवण्यासाठी आवळा पावडर आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन पेस्ट बनवा आणि केसांवर लावा. पेस्ट सुकल्यावर कोमट पाण्याने ती धुऊन काढा. याव्यतिरिक्त तुम्ही बटाट्याचा रसदेखील केसांना लावू शकता. यानेदेखील केस स्वस्थ आणि मऊसूत बनतात. बटाट्याच्या रसामध्ये व्हिटामिन एबीसी असतात जे केसांना नरीशमेंट देतात.

  • मला वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेला खाज उठण्याची समस्या आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या अंडरआर्म्सना वॅक्स करते तिथे पुरळ उठतं आणि खाज सुटते. मला सांगा, असं का होतं आणि यापासून बचावण्याचे काय उपाय आहेत?

अनेक वेळा आपण जो डिओडे्रंट वापरतो, तोदेखील आपल्या अंडरआर्म्समध्ये पुरळ उठण्याचं आणि खाज सुटण्याचं कारण ठरू शकतं. तसंच वॅक्सिंगमुळेही अनेक वेळा खाज सुटते. म्हणूनच तुम्ही कायम प्रोफेशनल सलूनमधूनच वॅक्सिंग करून घ्या. वॅक्सिंग करण्यापूर्वी प्रीवॅक्स लोशन जरूर लावा. जर त्वचा जास्तच संवेदनशील असेल तर सेन्सिटिव्ह स्किन ऑइलही तुम्ही अंडरआर्म्सला लावू शकता. याने तुमची समस्या लवकरच दूर होईल.

  • पार्टीसाठी तयार होताना ब्लशर जास्त प्रमाणात लागल्यास काय करावे?

ब्लशर जास्त लागल्यास गालांवर ब्रशच्या मदतीने लूज क्लीन पावडर ब्लश लावा. जर यानेदेखील फायदा झाला नाही तर थोडीशी ट्रान्सलूशन पावडर मिसळून गालांवर ब्रश फिरवा. ब्लशर आणि ट्रान्सलूशन पावडर मिसळल्याने एक म्यूट कलर तयार होईल आणि तुमची समस्याही दूर होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें