कसे बनाल उत्तम जीवनसाथी

* मोनिका अग्रवाल

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पतीपत्नीमधील प्रेम हरवणे स्वाभाविक आहे. पती-पत्नी दोघेही आपापले काम व जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त असतात की आयुष्य एका मशीनसारखे होऊन जाते. आश्चर्याची स्थिती तर तेव्हा होते, जेव्हा लग्नाच्या काही महिन्यानंतरच दोघे एकमेकांना समजू शकत नाहीत व अंतर वाढत जाते.

देवने जेव्हा आपला नवीन जॉब सुरू केला, तेव्हा बरेच महिने प्रचंड मेहनत केली. रात्रंदिवस फक्त आपल्या जॉबमध्येच बिझी असायचा. रात्री उशिरा घरी येऊ शकायचा. अशात त्याला आपली पत्नी सिमरनची साथ मिळाली नसती, तर कदाचित उद्दिष्ट गाठणे सोपे झाले नसते. सिमरनने केवळ पत्नीच नव्हे, तर एक मैत्रीण बनून त्याच्या प्रत्येक पावलावर व प्रत्येक निर्णयात त्याची सोबत केली.

सपोर्टिव्हही असावे : साधारणपणे बायका विचार करतात की नवऱ्याला बायकोचे रूप, शृंगार, वस्त्रे, प्रेम व गोड शब्द आवडतात, परंतु त्यांना फक्त याच गोष्टी आवडतात का? निर्विवादपणे, एक पती आपल्या पत्नीच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच साजशृंगार व शालीनतेचादेखील चाहता असावा, परंतु सोबतच तो पत्नीचा साधेपणा, अनुकूलता, गहिरे प्रेम व साथ निभावण्याचे गुणही पसंत करतो. तो इच्छितो की त्याची जीवनाची सोबतीण फक्त नावाचीच सोबतीण नसावी, तर समजूतदार, भावना समजणारी, त्याच्या सुख-दु:खात साथ देणारी, सपोर्टिव्हसुद्धा असावी.

खोटेपणा नव्हे गहनता असावी : पती-पत्नीचे नाते तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा दोघांमध्ये आपलेपणा असतो, खोटेपणा नव्हे. पतिला हे जाणवले पाहिजे की त्याची पत्नी जीवनाच्या प्रत्येक अडचणीत त्याची सोबत करेल. पत्नीची प्रेमपूर्ण साथ, त्याच्या गरजांना समजण्याची शक्ती व विश्वासच पतिचा आधार असतो, ज्याच्या बळावर तो जगातील साऱ्या अडचणींचा सामना आरामात करू शकतो.

आपसातील समजूतदारपणा : या नात्यात आपसातील समजूतदारपणा व विश्वास खूप गरजेचा आहे. एका पत्नीचीही हीच इच्छा असते की पतिने तिच्या भावना समजून घ्याव्यात व असा आधार बना, ज्याच्यासोबत ती जगातील प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकेल. परंतु हे एकतर्फी नसावं, समजूतदारपणा फक्त पत्नीच दाखवेल, तर ताळमेळ बिघडेल. त्यामुळे एकमेकांसोबत पावलाशी पाऊल मिळवून चालावे व जीवनातील सगळया अडचणींचा भार उतरवून फेकावा.

गरजा समजून घ्या : पुष्कळ पती-पत्नी वर्षानुवर्षे एकमेकांच्या गरजा व भावना ओळखू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या दरम्यानचे अंतर वाढू लागते. एकाच छताखाली राहूनदेखील ते एकमेकांसाठी अनोळखी होऊन राहतात. मानसिकरित्या त्रस्त राहतात.

जर तुम्ही पतिचा जीवनसाठी बनू इच्छिता, तर पतिची आवड-निवड लक्षात ठेवा. यात तुम्ही फक्त आहार वा पेहरावापुरत्या मर्यादित नाही ना मी ज्या आवडीनिवडीबद्दल बोलतेय, ती आहे पॅशन व विचार यांची. पॅशन पूर्ण करण्यात त्यांचा सहकारी बना, जसे की जर ते लेखक आहेत, तर त्यांच्या लेखणीला काही नवे लिहिण्याची शक्ती तुमच्याकडून मिळायला हवी.

जर त्यांना क्रिकेट खेळ आवडतो तर तुम्हीही त्यात रस घ्या व जेव्हा ते दौऱ्यावर असतील, तेव्हा वेळोवेळी त्यांना स्कोर अपडेट करा. विश्वास ठेवा, यामुळे तुमच्या दोघांमध्ये विश्वास वाढेल व जीवन सुखी होईल. त्यांच्या श्रीमंत असण्याचे दरवेळी प्रदर्शन करू नका वा कमी पगार असेल तर अगदी असंतोष वा चेष्टाही करू नका.

रिकामेपण भरून काढा : सांगण्याचा अर्थ असा, की आपल्या पतिच्या जीवनाचे रिकामंपण भरून काढा. तुमचं खरं प्रेम व सोबत त्यांच्या जीवनातील प्रत्येक कमतरता पूर्ण करेल. यातच जीवनाचा आनंद आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर चांगलेवाईट दिवस येत जात राहतात. एकमेकांवरील विश्वास कठीण परिस्थितीतदेखील हरू देणार नाही.

अनौपचारिक असावा आनंद : जीवनसाथी सोबत दु:ख वाटून घेतल्याने जितकं हलकं वाटतं, त्यापेक्षा कितीतरी आनंद त्याच्यासोबत आपलं हास्य वाटून घेतल्यानं मिळतं. जर तुमच्याकडे एक उत्तम लाइफपार्टनरची सोबत आहे, तर मग जीवनातील प्रत्येक लहानातील लहान आनंदातही तुम्ही खूपच अनौपचारिकपणे उत्साहाने हसाल.

एकमेकांकडून शिकू शकता : जर तुमच्या जीवनात एक चांगली महिला पत्नीच्या रुपात येते, तर तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे, कारण तुम्ही तिच्याकडून पुष्कळ काही शिकू शकता. तुम्ही दोघे एकमेकांशी मोकळे राहाल. यामुळे तुमच्या दोघांमध्ये चांगले कम्युनिकेशन राहू शकेल ज्यायोगे तुम्ही दोघे एकमेकांकडून पुष्कळ काही शिकू व समजू शकता.

दोन शरीरे एक मन : पतिपत्नीला उगाच दोन शरीरे एक मन म्हटले जात नाही. एक खरी व प्रेमळ महिला जेव्हा एखाद्या पुरुषाच्या जीवनात येते, तेव्हा ती नेहमी हेच इच्छिते की तिचा जीवनसाथीची कायम प्रगती व्हावी. तुमच्या जीवनसाथीमध्येदेखील असेच गुण असतील, तर स्पष्टच आहे की तुम्हा दोघांच्या जीवनाचे उद्दिष्ट वेगवेगळे नसूव एकच असेल.

दोन मिनिट नुडल्सवाले प्रेम तर बाह्यप्रदर्शनासाठी चालू शकते, परंतू जीवन त्याच व्यक्तिसोबत आनंदाने व्यतीत होते, ज्यात हे सारे गुण आहेत. असे गुण फक्त मुलांसाठीच नव्हेत, तर मुलींसाठीही गरजेचे आहेत. नात्याची दोन्ही चाके बरोबर असतील तरच नात्याची गाडी दूरवर चालेल.

कौमार्यच चारित्र्याकरता प्रमाण का?

* मिनी सिंह

आपण २१ व्या शतकात जगत आहोत. माणूस चंद्रावर पोहोचला आहे. अनेक क्षेत्रात मुली मुलांच्या समानतेने वाटचाल करत आहेत. उलट अनेक क्षेत्रात तर मुलींनी मुलांनाही मागे टाकले आहे. तरीही अजूनही काही लोक असे आहेत जे मुलींचे पावित्र्य त्यांच्या कौमार्यावरून ठरवतात. पुरुषांसाठी आजही मुलीचे कौमार्य महत्वाचे मानले जाते. आजही त्यांच्या पावित्र्याची पडताळणी केली जाते.

जरी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे पालन करतो, त्यांच्यासारखे खाणेपिणे, त्यांच्यासारखे उठणेबसणे, शिकणे, बोलणे, राहू इच्छितो, पण तरीही मानसिकता अजूनही १४-१५व्या शतकातील आहे. सुशिक्षित असूनही कुठेतरी मुलांची मानसिकता अजूनही अशीच आहे की त्यांची नववधू व्हर्जिन असायला हवी.

आजही भारतीय समाजात लग्नात मुलगी व्हर्जिन असणे अनिवार्य मानले जाते. मुली व्हर्जिन असणे घराची प्रतिष्ठा व चारित्र्य यांच्याशी तोलले जाते. जर लग्नाआधी मुलगी आपल्या पुरुष मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर तिला चारित्र्यहीन म्हटले जाते. पण जर मुलाने असे केले तर म्हटले जाते की हे वयच असे असते.

व्हर्जिनिटीचा अर्थ

व्हर्जिनिटीचा अर्थ कौमार्य म्हणजे मुलगी कुमारिका आहे व तिने याआधी कोणाशीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ती व्हर्जिन आहे. हे तपासण्यासाठी आपल्या समाजात अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ज्यात सर्वात विचित्र मार्ग म्हणजे पहिल्या रात्री बेडवर पांढरी चादर टाकून पाहणे की संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग पडले आहेत की नाही. कौमार्याबाबत आजही इतके गैरसमज आहेत की शिकलेसवरलेले लोकसुद्धा ही गोष्ट नाकारत नाही.

कौमार्याबाबत गैरसमज

पहिल्यावेळी शरीरसंबंध ठेवले की रक्तस्त्राव होतोच हा सर्वात मोठा गैरसमज आहे, कारण ९० टक्के घटनांमध्ये पहिल्यावेळी सेक्स केल्यास रक्तस्त्राव होत नाही. एका संशोधनात असे आढळले की सेक्स दरम्यान रक्तस्त्राव होत नाही. घोडेस्वारी व टेम्पोन अशा खेळांमुळे पडदा फाटतो किंवा तो अत्यंत पातळ होतो किंवा राहातच नाही.

पहिल्या वेळी सेक्स करताना वेदना होतात, हा एक दुसरा गैरसमज आहे. जर सेक्सच्या वेळी मुलगा व मुलगी मानसिकदृष्टया तयार असतील तर शक्यता आहे की वेदना होणार नाहीत. पण जर मुलगी तणावाखाली असून सेक्ससाठी मानसिकदृष्टया तयार नसेल तर योनी कोरडी व आकुंचन पावली तर पहिल्या वेळी वेदना होण्याची शक्यता असते. जर सेक्सआधी योग्य प्रकारे फोरप्ले केला गेला तरी वेदनेची शक्यता कमी असते किंवा नसतेच.

व्हर्जिन मुलीच्या योनीचा आकार लहान असतो, हे खोटे आहे, कारण प्रत्येक मुलीच्या योनीचा आकार तिच्या शरीरयष्टीप्रमाणे असतो. व्हजायनाचा आकार लहानमोठा असणे किंवा शिथिल अथवा आकुंचन पावलेला असणे याचा तिच्या व्हर्जिन असण्याशी काहीही संबंध नाही.

टू फिंगर टेस्ट

अनेक लोकांचे म्हणणे आहे की मुलीच्या कौमार्याच्या टेस्टसाठी सर्वात भरवशाची टेस्ट टू फिंगर टेस्ट आहे. पण अशी कोणतीही टेस्ट नाहीए, ज्यावरून हे समजेल की मुलीचे कुणाशी संबंध होते किंवा नाही.

हे अतिशय क्लेशकारक आहे की बलात्कारपीडित स्त्रीच्या कौमार्याचे परीक्षण टू फिंगर टेस्टने केले जाते. याने कळते की त्या मुलीचा बलात्कार झाला आहे की नाही. पण अशा प्रकारची टेस्ट करणे म्हणजे एका बलात्कारानंतर दुसरा बलात्कार करण्यासारखे आहे. २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की टू फिंगर टेस्ट पीडितेला तेवढयाच वेदना देतात, जेवढया दुष्कर्म करताना होतात. कोर्टाने असेसुद्धा म्हटले आहे की अशी टेस्ट करणे बलात्कार पीडितेचा अपमान आहे. हे तिचे अधिकार नाकारणे आहे. सरकारने ही टेस्ट बंद करून दुसरा एखादा उपाय शोधावा.

एका तज्ज्ञाचा दावा आहे की आज समाज तंत्रज्ञान जगात आहे. एका पीडितेसोबत अशी टू फिंगर टेस्ट करणे अमानवीय आहे. ही टेस्ट पीडितेसोबत परत बलात्कार करण्यासारखे आहे. म्हणून या टेस्टवर पूर्णत: बंदी आणायला हवी.

सायकल चालवणे, घोडेस्वारी, डान्स, व्यायाम किंवा इतर कोणत्या कामामुळे पडदा आधीच नाहीसा झालेला असतो. अशात एखाद्या मुलीच्या चारित्र्याचा अंदाज लावणे स्वत:लाच धोका देण्यासारखे आहे. महिलेच्या कौमार्याचे परीक्षण करणे मागास समाजाचे लक्षण आहे.

कौमार्याचे परीक्षण

तुम्ही हे ऐकून अवाक् व्हाल की आजही एक समुदाय असा आहे ज्यात नवविवाहित वधूचे कौमार्य परीक्षण केले जाते. महाराष्ट्रातील कांजरभाट समाजात पहिल्या रात्री वधूच्या कौमार्याची तपासणी त्या समाजातील महिला करतात. पहिल्या रात्री वरवधूच्या बेडवर पांढरी चादर टाकली जाते. खोलीत जाण्याआधी दागिने व टोकदार वस्तू ज्या तिने घातल्या असतात, त्या काढल्या जातात, जेणेकरून तिच्या अंगावर कोणतीही जखम होऊन रक्त येऊ नये.

जर संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग दिसले तर वधू परीक्षेत पास झाली, जर असे घडले नाही तर ती नापास झाली. या कुप्रथेत केवळ वधूचेच परीक्षण होते, वराचे नाही. मुलाने लग्नाआधी कोणाशी संबंध ठेवले आहे अथवा नाही हे कोणीच विचारात घेत नाही आणि कोणाला विचारायचेसुद्धा नसते.

कांजरभाट समाजातील अनेक तरुण व महिला या प्रथेविरुद्ध आवाज उठवतात, पण अशांना समाजातून बहिष्कृत केले जाते. या समुदायातील तरुण ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ या शीर्षकाखाली ही मोहीम चालवत आहेत. यात व्हीचा अर्थ व्हर्जिनिटी आहे. या मोहिमेचे समर्थन करणाऱ्या एका युवकाला या समुदायाने चांगलीच मारहाण केली होती.

थोड्याफार प्रमाणात ही मानसिकता इतर वर्गातही आहे. पण ती अशाप्रकारे दिसून येत नाही. पती सतत हेच जाणून घेण्यात गुंतलेला असतो की आपली पत्नी लग्नाआधी इतर कोणावर प्रेम तर करत नव्हती ना?

हायमन सर्जरीची का आवश्यकता आहे

आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की डॉक्टरांनी यावरसुद्धा उपाय शोधला आहे. हो, गमावलेली व्हर्जिनिटी मुलगी परत मिळवू शकते.

एका वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार हे ऑपरेशन केवळ हायक्लास मुलीच नाही तर उच्चवर्गीय, मध्यम वर्गीय मुलीसुद्धा करू शकतात. एका चिकित्सक संस्थानांद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात मुली हे सगळे विवश होऊन करतात, जेणेकरून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या उद्भवणार नाही.

नागपुरातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. घिसड यांचे म्हणणे आहे की मुली त्यांच्या योनीच्या आच्छादनाला पूर्ववत करण्याबाबत विचारतात कारण त्यांना वाटत असते की जर त्यांचे लग्न एखाद्या रूढीवादी कुटुंबात झाले तर ते लोक तिचे जगणे कठीण करून टाकतील.

डॉक्टर पुढे सांगतात की पालक स्वत:च मुलीला ऑपरेशन करण्यासाठी घेऊन येतात. व्हर्जिनिटी नष्ट होण्याचे कोणतेही कारण असो, जर आईबापांसोबत मुलगी आली तर तिचे मनोबल कायम राहते.

काय आहे ही हायमन सर्जरी

जर एखाद्या मुलीने कोणत्याही कारणास्तव आपली व्हर्जिनिटी गमावली असेल तर ती ही सर्जरी करू शकते. या सर्जरीत घाबरायचे कोणतेच कारण नाही ना याचे कोणते साईडइफेक्ट्स आहेत. ही सर्जरी करून कोणतीही महिला कुमारिका होऊ शकते.

मुलं कितीही उच्च विचारी असण्याचा दावा करत असतील तरी आजही त्यांचे लक्ष मुलीच्या कौमार्यावरच असते. पण आता त्यांना ही मानसिकता  बदलावी लागेल. आज जर मुलींना ही सर्जरी करावी लागत असेल तर ते केवळ त्या पुरुषी मानसिकतेमुळेच, ज्यांना लग्नानंतर आपल्या बायकोकडून हे सिद्ध करून घायचे असते की तिचे कौमार्य सुरक्षित आहे वा नाही, भले त्यांचे स्वत:चे अनेक मुलीशी संबंध का असेना.

 

काय करणार जर घटस्फोटाची वेळ आली तर

– सुमन बाजपेयी

आपल्या वैवाहिक जीवनात असंतुष्ट असल्याने घटस्फोट घेणे नि:संशय. त्यावेळी एखाद्या बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतरचे आयुष्य सहजसोपे होईल किंवा जीवनात परत आनंद निर्माण होईल, असा विचार करणे एक चूकच आहे. म्हणून घटस्फोटाचा निर्णय घेण्याआधी त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्ही घटस्फोट घेण्याचा विचार करत असाल, तर हे नक्की आहे की तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काहीतरी कुरबुर आहे अथवा लहानसहान समस्या एवढया मोठया झाल्या आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे की आता एकत्र राहणे अशक्य आहे. या गोष्टी विचारांमधील संघर्ष निर्माण होण्यापासून तर विवाहबाह्य संबंधांपर्यंत निगडीत असतात नाहीतर मुलांचे संगोपन वा आर्थिक प्रश्नांमधून उत्पन्न झालेल्या असू शकतात. म्हणजे ही लहानलहान भांडणं काळानुसार ना केवळ जोडप्यांमधील दुरावा वाढवतात तर त्यांना वेगळे होण्यास विवश करतात.

जुळवून न घेणे किंवा मानसिक स्तरावर अवलंबून असल्याने वेगळे होणे नि:संशय एक सोपा मार्ग वाटतो, पण त्यासाठी ज्या कायदेशीर, सामाजिक आणि भावनात्मक त्रासाचा सामना करावा लागतो, तो काही कमी यातना देणारा नसतो. जर एखादे जोडपे लग्नाला यातना समजत असेल, तर त्यातुन सुटका मिळवण्यासाठीसुद्धा कमी यातना सहन कराव्या लागत नाही.

मूल्यांकन करा

घटस्फोट घेण्याआधी असा विचार करा की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रास देत आहेत. शक्य आहे की त्या आपण सुधरवू शकू. मग हे ठरवा की वास्तवात तुम्ही त्यात बदल घडवून आणू इच्छिता का? आपल्या विवाहसोबत तुम्हाला याचेही मूल्यांकन करावे लागेल की हा विवाह तुम्हाला वाचवायचा आहे का? घटस्फोटाकडे वाटचाल करताना स्वत:ला अवश्य विचारा की जी असमाधानाची भावना तुमच्यात रुजते आहे ती थोडया काळासाठी आहे, जी काळानुसार दूर होणार आहे का? घटस्फोट दिल्यावर तुम्ही परत नवे संबंध निर्माण करणार आहात का? तुमच्या मुलांवर याचा काय परिणाम होईल आणि ते या निर्णयात तुम्हाला पाठिंबा देतील का?

अनेक लोक यासाठी वेगळे होतात की, कारण ते खूपच लवकर लग्नाच्या बंधनात बांधले गेलेले असतात, आणि नंतर त्यांना अशी जाणीव होते की ते एकमेकांसाठी बनलेले नसतात. अनेक दशक ते एकत्र राहतात आणि मुलं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना असे वाटे की आता सोबत राहण्यात कोणतीच विवशता नाही व ते वेगळे होतात.

सर्वात महत्वाचे कारण जोडीदाराने विश्वासघात करणे हे असते. अनेक जोडप्याना असे वाटते की आता त्यांच्यात प्रेम राहिले नाही. पैसा आणि विचारामध्ये मतभेद असल्यामुळे ते नेहमी भांडत असतात. काही जोडप्याना वाटते की त्यांना आयुष्याकडून आणखी वेगळे काही हवे आहे, आता ते या नात्याशी तडजोड करू शकत नाही.

सिनिअर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. भावना बर्मी यांच्या मते, ‘‘घटस्फोटाच्या वाढत्या दराची काही प्रमुख कारणं आहेत. व्यावसायिक पातळीवर स्त्री आणि पुरुष दोघांच्या सतत वाढत्या महत्वकांक्षा, ज्यामुळे त्याच्या प्राथमिकता परिवारपासून दूर जात करिअरवर क्रेंद्रित होतात. आपापसात बोलायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. ते काम आणि कुटुंब या ताळमेळ साधू शकत नाहीत. दोघांची अर्थिक निर्भरता एकमेकांवर कमी असते. सहनशक्ती कमी असणे महानगरांमध्ये वाढत्या घटस्फोटाचे एक मोठे कारण आहे. घटस्फोट घेताना तुम्हाला हे माहीत असायला हवे की तुमचे आयुष्य आपापसात बांधले गेले आहे आणि हे तुटणे दोघानाही एका विस्कळीत मार्गावर आणू शकते. समाजापासूनसुद्धा तुटण्याची शक्यता यामुळे वाढते.

तुम्ही हा बदल स्वीकारायला तयार आहात का?

तुमचे घटस्फोट घेण्याचे कारण, एकत्र घालवलेला वेळ, तुमची संपत्ती, मुलं या सगळया गोष्टी तुमच्या निर्णयासाठी महत्वाच्या असतात. पण सर्वात महत्वाचे हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्ही हे कशा प्रकारे हाताळणार आहात. या कारणास्तव आयुष्यात होणाऱ्या बदलांचा सामना करायला तुम्ही तयार आहात का? घटस्फोट जीवनातील अत्यंत महत्वचं वळण असते, ज्याचा नंतर येणारा बदल सुखद वा दु:खद काहीही असू शकतो. म्हणून विचार करून हा निर्णय घ्यायला हवा. शक्य आहे की मॅरेज कौन्सिलरला भेटल्यावर तुम्ही तुमचा हा विचार मनातून काढून टाकाल.

घटस्फोटाचा अर्थ आहे बदल आणि हे समजून घ्या की कोणत्याही परिस्थितीत बदलाचा सामना करणे सोपे नसते. अनेकदा मन वळून मागे पाहते, कारण नव्या प्रकारे आयुष्याची सुरवात करताना जेव्हा अडचणी येतात, तेव्हा मन पूर्वायुष्य आठवून अपराधी भावनेने दाटून येते. तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे की तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकता आणि तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता.

यादी बनवा

घटस्फोट घेण्याच्या कारणांची एक यादी बनवा. आपल्या संबंधातील चांगल्या वाईट दोन्ही बाजू लिहा. आपल्या जोडीदाराला खलनायकाच्या भूमिकेत ठेवू नका, कारण कमतरता तर तुमच्यातही असतील. घटस्फोट घेतल्यावर यशस्वी आणि सुंदर आयुष्य जगण्याची मी सकारत्मक मानसिकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हे गृहीत धरून चला की दोघांच्या चुकींमुळे आज वेगळे व्हायची वेळ आली आहे. म्हणून आपला राग आणि यातना रचनात्मक पद्धतीने हाताळा.

घटस्फोटानंतर तुम्हाला एका सपोर्ट सिस्टीमची आवश्यकता भासेल, ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून तुम्ही रडू शकाल. आपले मित्र आणि नातेवाईकांचा आधार घेण्यात संकोचू नका. जर आवश्यकता असेल तर थेरपिस्टकडे जा आणि आपल्या समस्या मोकळया करा. जेणेकरून तुमच्यावर कोणताही ताण रहाणार नाही.

मानसिकता व्यवहारी ठेवा

घटस्फोटानंतर आर्थिक समस्या सर्वात मोठी असते. जर तुम्ही कमावत्या असाल तरीसुद्धा ही अडचण असतेच. अभ्यासानंतर ही गोष्ट समोर आली आहे की ज्या स्त्रिया घटस्फोटीत असतात, त्यांच्या जीवनशैलीत ३० टक्के घट होते आणि पुरुषांच्या १० टक्के. मग स्त्री या वेगळे होण्यास कितीही तयार का असेना, ती आर्थिक पातळीवर स्वत:ला अक्षम मानू लागते.

योग्य हेच असते की आपल्या भावना नियंत्रणात ठेवून घटस्फोट घेण्याऐवजी व्यवहारीक मानसिकता ठेवून योग्य पावलं उचला. यामुळे फायदा जास्त आणि कमी हानी होते यावर लक्ष ठेवा. जर तुम्ही स्वावलंबी नसाल तर जाहीर आहे की नंतर तुम्हाला कोणावरतरी अवलंबून राहावे लागेल आणि अशाप्रकारे तुमच्या अभीमानाला ठेच लागेल.

घटस्फोटानंतर मुलांवर खोलवर परिणाम होतो, कारण त्यांच्यासाठी आईवडील दोघेही महत्वाचे असतात. वेगळे होणे त्याच्या मनाला जखम करते आणि कधीकधी तर ते वाईट मार्गाला लागतात. एकटी व्यक्ती आपल्याच समस्यांमध्ये गुंतला असल्याने त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ शकत नाही.

स्वत:ला काही प्रश्न विचारा

* आपल्या जोडीदाराप्रती अजूनही तुमच्या मनात भावना आहेत का? जर असे असेल तर एकदा आपल्या नात्याला वाचवायचा अवश्य प्रयत्न करा.

* तुम्ही यासाठी एकत्र राहत आहात का, की समाजाचे प्रेशर आहे नाहीतर नेहमी भांडतच राहिलो असतो?

* तुम्हाला खरेच घटस्फोट हवा आहे का की केवळ ही धमकी आहे? केवळ राग प्रदर्शित करण्याकरिता वा अशाप्रकारे आपल्या जोडीदाराला इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचलता आहात. अशाप्रकारे संबंध बिघडतीलच.

* तुम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक स्तरावर यासाठी तयार आहात का? तुम्ही यांच्या नकारात्मक परिणामांबाबत विचार केला आहे का? घटस्फोट तुमच्या साधनांमध्ये कमी आणू शकतो, ज्यामुळे तुमचे अनेक स्वप्न तुटू शकतात.

* तुमच्याजवळ एखादी सपोर्ट सिस्टीम आहे का? तुम्ही तुमच्या मुलांना समजावू शकाल का? आणि त्यामुळे होणारा त्रास दूर करण्यात सक्षम आहात का?

* तुम्ही तुमचे करिअर आणि आपले खाजगी आयुष्य यांचा समतोल राखू शकाल का?

घटस्फोट घेतल्यावर तुम्हाला नवे अनुभव, नवी नाती व नव्या घटना नव्या प्रकारे हाताळण्यासाठी तयार रहावे लागेल. आपले जीवन परत निर्माण करावे लागेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की दुसरे लग्न केल्यास तुमच्या सगळया समस्या सुटतील, तर या भ्रमातून बाहेर या, कारण दुसरे लग्न यशस्वी होईल याची खात्री देता येणार नाही. नक्की नाही की या वेळी योग्य जोडीदार मिळेलच.

गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट

* कुमुद कुमार

मुकुलने गर्लफ्रेंड जूहीला वाढदिवसानिमित्त जे मनगटावरील घड्याळ भेट म्हणून दिलं होतं, ते तिला काही आवडलं नव्हतं. त्याबाबत जूहीने त्याच्याकडे वर्षभर तक्रार केली होती.

मुकुलने विचार केला होता की यावेळी तो जूहीला छान भेटवस्तू देऊन तिची बोलती बंद करेल. त्याने जूहीशी बोलता बोलता जाणून घेतलं होतं की तिला कोणता आणि कोणत्या कंपनीचा मोबाइल आवडतो.

जेव्हा मोबाइल शॉपमध्ये मुकुलने त्या मोबाइलची किंमत जाणून घेतली, तेव्हा तो विचारात पडला. २५ हजार रुपयांचा मोबाइल, एवढा महागडा मोबाइल अखेरीस तो जूहीला तिच्या वाढदिवसाला कसा भेट देऊ शकणार होता? तो निराश होऊन घरी परतला.

मुकुलचे वडील दिवाणचंद्र एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. मुकुलला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी एका महागड्या शाळेत त्याचं अॅडमिशन केलं होतं. महागडी फी आणि महागडे शिक्षण. दिवाणचंद्रला यासाठी ओव्हरटाइम करावा लागत होता. नेहमीच ते उशिरा घरी परतत असत.

मुकुल या गोष्टीचा फायदा घेऊ लागला होता. साध्या भोळ्या आईला तर तो कस्पटासमान समजत असे. अभ्यासाचा काहीही बहाणा करून तो घरातून बाहेर पडत असे, जूही आणि मित्रांसोबत मौजमजा करत असे.

जूही एका मोठ्या बिझनेस मॅनची मुलगी होती. तिच्या वडिलांना व्यवसायाच्या निमित्ताने नेहमीच शहराबाहेर जावे लागत होते. जूही या गोष्टीचा खूप फायदा उठवत असे. तीसुद्धा स्वच्छंद वृत्तीची झाली होती. मोठ्या कुटुंबातील मुलगी असल्याकारणाने तिला महागड्या आणि आकर्षक वस्तू आवडत असत.

मुकुलचा जीव संकटात सापडला होता. जूहीला स्वस्त वस्तू भेट म्हणून देऊ शकत नव्हता आणि महागडी वस्तू खरेदी करणे त्याच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. आता तो काय करणार? याच विचारात तो गर्क राहत असे.

एके दिवशी मुकुलचा मित्र राकेश त्याला आपल्यासोबत मोबाइल शॉपमध्ये घेऊन गेला. त्याने तिथे एक महागडा मोबाइल खरेदी केला, त्याची किंमत ३५ हजार होती.

मुकुलने जेव्हा त्याला या महागड्या मोबाइलबाबत विचारलं की त्याने तो कोणासाठी खरेदी केला आहे? तेव्हा हे जाणून त्याला आश्चर्य वाटलं की एवढा महागडा मोबाइल राकेशने आपली गर्लफ्रेंड सारिकासाठी खरेदी केला होता. मग मुकुलने आपली उत्सुकता शमवण्यासाठी विचारलं, ‘‘एवढी महागडी भेटवस्तू खरेदी करण्याची काय आवश्यकता होती?’’

‘‘अरे मित्रा मुकुल, या मॉडर्न आणि सुंदर मुली महागड्या आणि आकर्षक वस्तूंवरच भाळतात. त्यांना जेवढ्या महागड्या भेटवस्तू द्याल, त्या तेवढ्याच अधिक खूश होतात. महागड्या भेटवस्तूद्वारेच त्या समोरच्याचीच प्रतिष्ठा जोखतात. चमकूगिरीवर मरतात या मुली, चमकूगिरीवर.’’

‘‘पण राकेश, तुझ्याकडे एवढी महागडी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले? तुझे आई-बाबा तर यासाठी तुला एवढे पैसे देणार नाहीत?’’

‘‘अरे मित्रा मुकुल, ही सर्व आतली गोष्ट आहे. गर्लफ्रेंडला खूश ठेवण्यासाठी खूप काही करावं लागतं.’’

आता मुकुल या ‘खूप काही’मध्ये गुरफटला. त्याने राकेशला याबाबत विचारलंही. परंतु राकेशने हे सांगून त्याला टाळलं की या ‘खूप काही’चा अर्थ त्याला तेव्हाच कळेल, जेव्हा तो त्याच्या इतर मित्रांशी मैत्री करेल.

रात्रभर मुकुल राकेशबाबत विचार करत राहिला. त्याला जूहीला खूश करण्याचा एक मार्ग राकेशच्या मैत्रीतून दिसत होता. एक महागडे गिफ्ट देऊन त्याला कोणत्याही परिस्थितित जूहीला खूश करायची इच्छा होती.

शेवटी त्याने निर्णय घेतला की तो राकेश आणि त्याच्या मित्रांच्या संगतीत राहील आणि ‘खूप काही’ करेल.

राकेशने मुकुलला विश्वासात घेऊन चोरी करण्याचे कौशल्य शिकवले. सायकल आणि बाइक चोरणे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. भंगार बाजारात कोणाकडे सामान विकायचे आहे, राकेश चांगल्याप्रकारे अशा चोर दुकानदारांशी परिचित होता. चेन स्नॅचिंगचे कामही राकेशच्या ग्रुपला माहित होते. याकामीही ते चांगलेच तज्ज्ञ होते.

मुकुलही लवकरच चोरी करायला, खिसा कापयला आणि सोनसाखळी खेचायला चांगल्याप्रकारे शिकला होता. जूहीला खूश करण्यात आता त्याला काही अडचण येणार नव्हती. यावेळी त्याने जूहीला केवळ महागडा मोबाइलच गिफ्ट दिला नाही तर पंचतारांकित हॉटेलमध्ये तिला बर्थडे पार्टीही दिली. जूहीला मुकुलसारखा बॉयफ्रेंड मिळाल्याने धन्य वाटत होते. मुकुल तर तिच्या स्वप्नातील राजकुमार बनला.

एके दिवशी राकेशने मुकुलसोबत मिळून चेन स्नॅचिंगची योजना बनवली. राकेश अनेक दिवसांपासून दिल्लीच्या मॉडेल टाउन गल्लीची रेकी करत होता. त्याने जाणून घेतलं की संध्याकाळच्या वेळी कोणकोणत्या महिला रोज डेअरीवरून दूध आणतात आणि कोणत्या महिला भाजी मंडईतून भाजी घेऊन परततात. त्यांचे लक्ष्य कमलादेवी होती. ती एकटीच जात-येत असे. तिच्या गळ्यात चमकणारी सोन्याची चेन त्यांचा मोह वाढवत होती.

राकेशने सर्व गोष्टी मुकुलला चांगल्याप्रकारे समजावल्या होत्या. चेनवर झडप घालून हिसकावणं एवढं काही कठीण काम नव्हतं, जेवढं त्यानंतर मोटारसायकलवर बसून पळणं होतं. चेनवर ?ाडप घालण्याचं काम मुकुलला मिळालं आणि मोटारसायकलवर ड्रायव्हिंग करण्याचं काम राकेशने स्वत:कडे घेतलं.

योजनेनुसार मुकुलने अगदी चलाखीने आपलं काम पार पाडलं. चेनवर झडप घातली, कमलादेवीला धक्का देऊन खाली पाडलं, जेणेकरून तिला उठायला उशीर होईल आणि या दरम्यान ते पळून जातील.

चेन काढून घेऊन मुकुल पापणी लवते न लवते तोच राकेशच्या मोटारसायकलवर येऊन बसला. राकेशने मोटारसायकल वेगाने पळवली, परंतु एक भटकं डुक्कर त्यांच्या मोटारसायकलपुढे आलं. डुक्कर तर पळाला, परंतु त्यांच्या मोटारसायकलचे संतुलन बिघडलं आणि दोघे मोटारसायकलसहित खाली कोसळले.

तोपर्यंत कमलादेवीचा आरडाओरडा ऐकून गल्लीतील लोक त्यांच्यामागे धावले. ते मोटारसायकलवरून पडताच, गर्दीने त्यांना पकडलं. गर्दीने त्यांना खूप मारलं.

इतक्यात गर्दीतून एक महिला पुढे आली. तिला मुकुलचा चेहरा ओळखीचा वाटला. तिने मुकुलला लक्षपूर्वक पाहिलं आणि विचारलं, ‘‘तू दिवाणचंद्रचा मुलगा मुकुल आहेस ना?’’

मुकुल रडत म्हणाला, ‘‘हो काकी.’’

त्या महिलेने मुकुलच्या जोरदार थोबाडीत लगावत म्हटलं, ‘‘शी, तुला लाज वाटत नाही, एवढ्या मेहनती आणि इज्जतदार वडिलांचा मुलगा असून असे नीच काम करतोस.’’

मुकुलच्या डोळ्यांतून सतत पाणी वाहू लागले. ती महिला दुसरी कोणी नाही, मुकुलच्या वडिलांसोबत प्रायव्हेट कंपनीमध्ये कार्यरत सहाय्यक प्रबंधक सुशीलादेवी होती. ती मुकुलचे बाबा दिवाणचंद्रना चांगल्याप्रकारे ओळखत होती. तिला हेही माहीत होतं की मुकुलच्या शिक्षणासाठी मुकुलचे वडील कसे अहोरात्र झटत होते.

सुशीलादेवीने मुकुलच्या वडिलांना फोन केला आणि गल्लीतील लोकांना सर्व हकिकत सांगत त्यांना पोलीस स्टेशनला जाण्यापासून रोखलं. जेव्हा गल्लीतील सर्व लोकांना हकिकत कळली, तेव्हा ते चकीत झाले की कसे एका प्रतिष्ठित विद्यालयाचे विद्यार्थी आपल्या गर्लफ्रेंडना खूश करण्यासाठी चोरी आणि चेन स्नॅचिंगचे काम करू लागले आहेत.

लवकरच मुकुल आणि राकेशचे आईवडील घटनास्थळी पोहोचले. त्यांची नजर लाजेने खाली झुकली होती. मुकुल आणि राकेश तर आपल्या आईवडिलांशी नजरही मिळवू शकत नव्हते. मुकुल आपल्या आईवडिलांच्या पायावर लोळण घेत म्हणाला, ‘‘आई… बाबा… मला माफ करा. अशी चूक पुन्हा करणार नाही.’’

‘‘मुकुल, मला तुझा किती अभिमान वाटत होता, पण तू हे काय केलंस तुला माहीत नाहीए. तू माझा आयुष्यभर मिळवलेला मानसन्मान व इज्जत एका क्षणात धुळीला मिळवलीस, जी कधी पुन्हा मिळू शकत नाही,’’ मुकुलचे बाबा म्हणाले.

हे ऐकताच सर्वांचे डोळे ओलावले. सर्व प्रत्यक्ष पाहत होते की, संततीचं एक कृत्य कशाप्रकारे आईवडिलांची मान खाली करायला लावतं.

सुशीलादेवी प्रकरण कसंतरी सावरून घेत गर्दीतून त्यांना आपल्या घरी घेऊन गेली. कमलादेवीलाही त्यांनी आपल्या घरी बोलावलं.

मुकुल आणि राकेशने कमलादेवीचींही माफी मागितली आणि भविष्यात असे कृत्य न करण्याचे वचन दिले.

मुकुल आणि त्याच्या आईवडिलांना त्या रात्री झोप आली नाही. मुकुलने प्रायश्चित्त करत सर्व सत्य हकिकत आईवडिलांच्या कानावर घातली. तेव्हा त्याचे बाबा म्हणाले, ‘‘बाळा, तू वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचला आहेस, जिथे तू माझा मुलगा नाहीस, तर मित्रासमान आहेस. तू मेहनत कर, तुला जूहीच काय, तिच्यापेक्षा चांगली जोडीदार मिळेल, पण आधी शिक्षण घेऊन योग्यता तरी कमाव. चोर बनून तुला जूहीही मिळणार नाही.’’

बाबांचं बोलणं खरं ठरलं. जूहीला जेव्हा मुकुलच्या कृत्याबाबत कळलं, तेव्हा तिने मुकुलला ‘चोर’ बोलून त्याच्याशी असलेले संबंध तोडले. त्याने दिलेल्या भेटवस्तूही तिने त्याला परत केल्या. मुकुलचा चेहरा पडला.

आता मुकुलला योग्य धडा मिळाला होता. त्याला आता आईवडीलच खरे मित्र वाटत होते. त्याला आता कळून चुकलं होतं की भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी योग्य मार्गदर्शक कोण होऊ शकतात, तो आता मन लावून अभ्यास करू लागला. त्याला दाखवून द्यायचं होतं की तो ‘चोर’ नाही, आपल्या आईवडिलांचा लायक मुलगा आहे.

पाळणाघराबद्ल या गोष्टी जाणून घ्या

 

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एका पाळणाघरामध्ये दहा महिन्यांच्या मुलीला जबर मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. जेव्हा पोलिस आणि मुलीच्या पालकांनी पाळणाघराचे सीसी टीव्ही कॅमेरे पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. फुटेजमध्ये पाळणाघरातील सेंटरमधील मुलगी मुलीला मारहाण करीत होती. त्याला लाथा मारत होती आणि चापट मारत होती. बरं, पाळणाघरामधील मुलांमध्ये असं प्रथमच घडले नाही आहे.

याआधीही दिल्लीतील पोलिसांनी सुमारे 70 वर्षांच्या एका व्यक्तीला पाळणाघरामध्ये जाऊन अटक केली होती. ज्यावर पाळणाघरात एका 5 वर्षाच्या मुलीची छेडछाड केल्याचा आरोप होता.

अशा घटना आगामी काळात घडतात, ज्यात पाळणाघरामधील मुलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होतात.

वास्तविक, आज महिलांना सासरी किंवा करियरमध्ये राहणे आवडत नाही. ती एक प्रकारची तडजोड करते. त्यांना असे वाटते की तेथे काही पाळणाघरं आहेत, जिथे त्यांची मुले सुरक्षित राहू शकतात. त्यांच्यासाठी खाणे, खेळणे, आराम करणे आणि क्रियाकलाप शिकण्याची संपूर्ण व्यवस्था होती.

सकाळी मुलाला ऑफिसच्या वाटेवर सोडून ती संध्याकाळी घरी परत जात असताना सोबत गेली. जर एखाद्या दिवशी ते झोपले तर पाळणाघरात ऑपरेटरला कॉल करा आणि त्यांना सांगा. जेव्हा मुलाला घरी आणले जाते तेव्हा त्याच्याबरोबर वेळ घालवण्याऐवजी इतर कामांमध्ये व्यस्त राहा. ती फक्त रविवारी मुलाबरोबर वेळ घालवते. परंतु आपल्या मुलास पाळणाघरामध्ये काळजी घेण्यासाठी पूर्णपणे सोडणे योग्य नाही. हे करून आपण आणि बॉन्डिंग मुलामध्ये होत नाही. तो आपले शब्द आपल्याशी सांगण्यात अक्षम आहे, दु:खी होऊ लागते आहे. बर्‍याच वेळा मुलाला त्याच्याबरोबर होत असलेले शोषण, त्याच्याबरोबर काय होत आहे हे समजण्यास अक्षम होतो.

पाळणाघरामध्ये मुलाची चांगली काळजी घेतली जाते, तो तेथे नवीन गोष्टी शिकतो, परंतु हे मुलाला दररोज पालणाघरामध्ये कसे ठेवले जाते याची पर्वा न करता, त्याने तेथे कोणीतरी असावे कोणतीही अडचण नाही, कारण मुले काहीच बोलत नाहीत, फक्त रडत रहा आणि पालकांना असे वाटते.

त्यांना तिथे जायचे नाही, म्हणून ते रडत आहेत. त्या बाळाला ओळखण्याची आपली जबाबदारी आहे तिथे का जायचे नाही.

हे काम दररोज करा

  • ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपण कितीही कंटाळलेले असलात तरी आपल्या मुलाबरोबर वेळ नक्कीच आहे
  • खर्च करा. आज पाळणाघरामध्ये त्याने काय केले, त्याने काय खाल्ले, काय शिकले? मजा आहे की नाही?
  • मुलाला काही विचित्र उत्तर दिल्यास, त्यास हळूवारपणे घेऊ नका, परंतु मुलास ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा

 

तो असे का बोलत आहे?

  • जेव्हा तुम्ही कचेरीतून परत याल, तेव्हा त्याच्या शरीरावर कोणतेही खूण नसल्याचे तपासा. असेल तर मुलाला विचारा की मार्क कसा आला, तसेच त्याचे लबाडी बदलली आहे का ते पहा.
  • आपण जेवणाच्या वेळी जे जे जेवताना दिले ते त्याने खाल्ले काय?

पाळणाघर कधी निवडायच

  • मुलासाठी खेळण्यासाठी, पलंग स्वच्छ आहे की नाही याची वीज आणि पाण्याची काय व्यवस्था आहे? खेळणी आहेत, हे निश्चितपणे पहा.
  • पाळणाघर नेहमी हवेशीर, खुले आणि हलके असावे. जो मुलगा त्याची देखभाल करतो, तो मुलांच्या बाबतीत कसा वागतो हे देखील पहा.
  • तिथे आलेल्या मुलांच्या पालकांशी बोला. पाळणाघर कसे आहे, ते समाधानी आहेत की नाही, ते त्यांची मुले आहेत तेव्हापासून त्यांना तिथे पाठविण्यात आले आहे
  • आपल्या मुलास स्वस्त आणि घराच्या जवळ कोणत्याही जागी ठेवू नका, कारण तेथे तुमची मुले व्यवस्थित राहतील, म्हणून स्वच्छ पाळणाघर करण्याचा प्रयत्न करा.

तर समजून जा तोच तुमचा जिवलग आहे

– गरिमा

जिवलग किंवा साथिदार हा तुमचा मित्र, नातेवाईक किंवा शिक्षक कोणीही असू शकेल, ज्याच्यासोबत मनापासून आणि दृढपणे जोडले गेल्याचे तुम्ही अनुभवत असाल. तो तुमच्यापुढे आव्हान निर्माण करतो, तुम्हाला प्रेरणा देतो, आधार देतो आणि सतत तुमच्या विचारात असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेमके काय हवे, याची जाणीव तो तुम्हाला करून देतो. तुम्ही त्याच्यासोबत शरीर, मन आणि भावनेनेही जोडले गेलेले असता.

तोच तुमचा जिवलग आहे, हे कसे ओळखाल

ज्याचा सहवास लाभताच मनाला खोलवर समाधान मिळते : अशी व्यक्ती जिच्यासोबत तुम्हाला सहजता आणि सुरक्षितता जाणवते. ज्याच्यासोबत असल्याने तुम्हाला आनंद मिळतो. तो येताच तुमच्यातील अस्वस्थता दूर होते आणि कुठल्याही कामात तुमचे मन रमू लागते, तर मग समजून जा की तोच तुमचा जिवलग आहे.

खूप काळ एकमेकांना ओळखत आहोत असे वाटते : पहिल्या भेटीत तो तुम्हाला अनोळखी भासत नाही. त्याच्याशी बोलताना तुम्ही नर्व्हस होत नाही. याच्याशी आपण कुठलीही गोष्ट शेअर करू शकतो असे तुम्हाला वाटते. शिवाय तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकाल असे मनापासून तेव्हाच वाटते, जेव्हा तुम्ही तुमच्या जिवलगास भेटता.

तो हाच आहे ज्याच्या शोधात आजवर होते : भले तुमचे वय कितीही असो किंवा अनेकांबद्दल तुम्हाला यापूर्वी आकर्षण वाटले असेल. अगदी तुम्ही विवाहित का असेना, जीवनात एक वळण असेही येते जेव्हा एखाद्याला भेटल्यानंतर तुम्हाला असे वाटू लागते की बस्स हा तोच आहे, ज्याला मन शोधत होते. त्याच्यासोबत तुम्ही जीवनात स्थैर्य अनुभवता आणि तुम्ही त्याच्यापासून कधीच वेगळे नव्हता, असे तुम्हाला अगदी अंत:करणापासून वाटते.

त्याच्यासोबत प्रत्येक समस्येचा सामना समर्थपणे करता येईल असे वाटते : अशी व्यक्ती जी केवळ जवळ असल्यानेच तुम्हाला तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्यासारखे वाटते. आव्हानांचा सामना करायला आणि संकटांना हरवायला तुम्ही उभे व्हाल, तेव्हा वाटेल जसे की ती व्यक्ती गडद अंधारात प्रकाशाच्या रुपात तुमच्यासोबत आहे, तर अशावेळी समजून जा तोच तुमचा जिवलग आहे.

सुरक्षित वाटते : एखाद्या व्यक्तिकडे तुम्ही स्वत:हून ओढले जात असाल, जणू काही चुंबकीय शक्ती तुमच्या दोघांमध्ये आहे असे तुम्हाला वाटते. शिवाय तो सोबत असताना तुम्ही सर्व प्रकारे सुरक्षित आहात असे वाटते तर समजून जा तोच तुमचा जिवलग आहे.

गरजेचे नाही की तो सुंदरच असावा : खऱ्या प्रेमाचा अर्थ केवळ शारीरिक आकर्षण नाही तर मनाने आणि भावनेनेही एकमेकांशी जोडले जाणे असते. तुम्ही त्याच्या डोळयांत तुम्हाला आणि तुमच्या डोळयांत त्याला पाहू शकत असाल तर समजून जा तोच तुमचे प्रेम आहे, जिवलग आहे. जिथे तुम्ही एकमेकांपासून वेगळे नसून एकच आहात, असा अनुभव तुम्ही घेत असाल. कारण जिथे ‘तू’ आणि ‘मी’ अशी भावना असते तिथे ओढ तर असते. पण जिवलगासोबत तुमचे नाते अतुट राहाते.

काही मिळविण्याची इच्छा नसते : त्याला भेटल्यानंतर काही मिळविण्याची इच्छाच उरत नाही. तुम्हाला त्याच्याकडून काहीही नको असते, पण तरीही तोच तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा असेल. तुम्ही नि:शब्द असूनही तासन्तास त्याच्यासोबत वेळ व्यतित करू शकता. त्याला फक्त बघत राहू शकता, त्याच्याजवळ राहू शकता किंवा दूर राहूनही त्याला अनुभवू शकता तर समजून जा की तोच तुमचा जिवलग आहे.

माहेर तुमची बँक नव्हे

* डॉ. विभा सिंह

मुलीचं सासर कितीही संपन्न असलं तरी तिला माहेरहून काहीतरी मिळवण्याची एक आशा असते आणि ही इच्छा तिच्या म्हातारपणापर्यंत तशीच राहाते. मात्र ही देवाणघेवाण योग्य पद्धतीने झाली तर ठीक आहे, पण जर कुटुंबियांमध्ये आपापसांतच लपवाछपवी होऊ लागली तर तेव्हा मात्र ही गोष्ट डोळ्यांना खुपू लागते.

मायलेक दोघी दोषी

माझ्या लांबच्या नात्यातली एक मावशी आहे. एकदा त्यांचे पती मुंबईला गेले आणि तिथून ८-१० मीटर महागडं कापड घेऊन आले आणि मग ते कापड मावशीला देत म्हणाले की त्यांना विचारल्याशिवाय ते कापड कोणालाच द्यायचं नाही. काही दिवसांनी काकांना मुलीच्या सासरी जावं लागलं. त्यांनी विचार केला की आपल्या नातीसाठी फ्रॉक शिवायला त्या कापडामधून थोडं कापड घेऊन जावं. म्हणून त्यांनी मावशीकडे कापड मागितलं. पण कापड बघताच त्यांच डोकं सटकलं; कारण ते दोन अडीच मीटरपेक्षा जास्त नव्हतं. त्यांनी मावशीला विचारलं तर ती म्हणाली, ‘‘कदाचित तुम्हीच काहीतरी शिवायला दिलं असेल आणि विसरला असाल, नाहीतर कापड कुठे जाईल?’’

असो, पण मग काका ते उरलेलं कापड घेऊन गेले. मुलीच्या घरी गेल्यावर अंगणात त्याच कपड्याची मॅक्सी घालून आपल्या नातीला खेळताना बघून मुलीला भेटण्याचा त्यांचा सगळा उत्साहच मावळला. त्यांना आपल्या पत्नीचाही खूप राग आला. तिने त्यांना न विचारता मुलीला ते कापड दिलं आणि विचारल्यावर माहीत नसल्याचं सांगितलं. या गोष्टीवरून ते इतके रागावले की आपल्या मुलीला काही न देताच ते परतले आणि घरी येऊन आपल्या पत्नीबरोबर खूप भांडले.

या सगळ्यात दोष कोणाचा होता, आईचा की मुलीचा? निश्चितच दोघींचा होता. कारण जर पतीने न विचारता कोणाला कापड देऊ नकोस असं सांगितलं होतं; तर मग पतीच्या परवानगीशिवाय का दिलं? आणि निश्चितच ते घेताना मुलीलादेखील ही गोष्ट कळली असेल, आईच्या तोंडून किंवा तिच्या हालचलाखीवरून. आणि ही गोष्ट कळूनसुद्धा जर ती काही घेते, तर चूक तिचीही आहे.

पितळ उघडं पडल्यावर नाचक्की

आमचे शेजारी दिनेशजींच्या पत्नीबद्दल ऐका. त्यांची सूनबाई काश्मीरला फिरायला गेली. तिथून ती बरंच सामान घेऊन आली. विशेष म्हणजे सूनबाई आपल्या पसंतीच्या दोन शाली घेऊन आली. एक स्वत:साठी आणि एक सासूबाईंसाठी. नणंदही आली होती म्हणून तिच्या मुलांसाठी लोकरीचे कपडेही घेतले.

सून येणार त्याच दिवशी नणंदेलाही सासरी परतायचं होतं. त्यामुळे घाईघाईत तिने सामानाची बॅग सासूकडे दिली आणि सांगितलं की कोणासाठी काय काय आणलं आहे. नणंद निघून गेली. नंतर सुनेने आपल्या वस्तू पाहिल्या तेव्हा तिला त्यात शाल मिळाली नाही. तिने सासूला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘इतकी मोठी शाल कुठे हरवणार बरं… मला तर वाटतंय की तू दुकानातच सोडून आली असशील?’’

सुनेला चांगलं माहीत होतं की ती शाल घेऊन आली होती. मग शाल गेली कुठे? शिवाय सासूबाईंवर संशय घेण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. म्हणून मग तिनेही या गोष्टीला सोडून दिलं.

काही दिवसांनी सुनेला आपल्या नणंदेच्या घरी जाण्याची संधी चालून आली. त्यांच्या सर्वांचा एका हिल स्टेशनवर जाण्याचा कार्यक्रम होता, तिथे गेल्यावर सूनबाई म्हणजे वहिनी नणंदेला म्हणाली, ‘‘ताई, मी तर शाल आणलीच नाही. तुमच्याजवळ जर असेल तर मला द्या ना…’’

नणंद कामात होती म्हणून तिने कपाटाची चावी देत वहिनीला म्हटलं, ‘‘वहिनी, तीन शाली आहेत, जी आवडेल ती काढून घे.’’

वहिनी शाल काढू लागली तेव्हा तिची नजर स्वत: विकत आणलेल्या काश्मिरी शालीवर पडली आणि ती हैराण झाली.

तोपर्यंत नणंदेलाही ही गोष्ट आठवली आणि ती धावतच खोलीमध्ये आली आणि म्हणाली, ‘‘थांबा वहिनी, तुम्हाला शाल भेटणार नाही. मी शोधते. पण तोपर्यंत तर शाल वहिनीच्या हातात आली होती.’’

आता मात्र वहिनीसमोर नणंदेची लाजेने जी मान खाली झाली, त्याबद्दल काय म्हणावं. शाल घेताना तिला ही गोष्ट माहीत नव्हती असंही नाही. ती शाल तिच्या वहिनीने स्वत:साठी पसंत केलेली आणि तिला तिच्यापासून लपवून तिला दिली होती. त्यामुळे ती शरमिंदी झाली.

एक तर चोरी वर शिरजोरी

आमच्या शेजारच्या कमलाजींना सहा मुली आहेत. सगळ्या विवाहित आहेत. एक सून आहे आणि ती खूपच समजूतदार आहे. ती जेव्हापासून लग्न होऊन आलेली तेव्हापासून तिने तिच्या सासूला तिच्यापासून, तिच्या पतीपासून आणि सासूसाऱ्यांपासूनही कायम लपूनछपून काही न काही देताना पाहिलं आहे.

सुरुवातीला २-३ वर्षं तर ती नवीन असल्यामुळे काहीच बोलली नाही पण मग एके दिवशी तिने बोलण्याबोलण्यात हे विचारलं की, ‘‘आई, तुम्ही सर्व ताईंना जे काही देता, ते आमच्यापासून लपून का बरं देता?’’

बस्स, सुनेने इतकंच विचारलं होतं की सासूबाई बिथरल्या. त्या नको नको ते सुनेला बोलल्या.

त्यावेळेस तर ती काहीच बोलली नाही. पण सासूबाईंचे बोललेले शब्द तिला टोचले आणि त्यांच्याविषयी तिच्या मनात रोष उत्पन्न झाला. मग तर सासूबाईंच्या लाख सावधगिरीनंतरही जेव्हा कधी नणंदा घरी आल्यावर त्यांना सासूबाईंनी काही देताना सुनेने बघितलं की मग तीच भांडू लागायची.

त्यांच्या भांडणामुळे जी गोष्ट आतापर्यंत घरात होती, ती शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही कळली. त्यामुळे मुलाला आणि सुनेला बहिणी व नणंदा डोळ्यांत खुपू लागल्या, त्यांच्या बाबतीत त्यांच्या मनात तिरस्कार आणि रागाच्या भावनेने जन्म घेतला आणि याचा परिणाम त्यांच्या आपापसांतील संबंधांवर झाला.

कुटुंबियांना जरूर सांगा

प्रत्येक आईने आपल्या मुलीला कोणतीही वस्तू मग ती एक पैशांची का असेना आपल्या पती आणि मुलाला व सुनेला सांगूनच द्यावी. ती जर त्यांच्या ऐपतीनुसार असेल तर ते कधीच नाकारणार नाही आणि ऐपतीपेक्षा जास्त असेल तर ते देणंच मुळी चुकीचं आहे.

याबाबतीत मुलीनेही समजूतदारपणे वागावं. जेव्हा आपली आई आपल्या वडील आणि भाऊभावजयीपासून लपूनछपून तिला काही देत असेल तर तिनेही ती गोष्ट घ्यायला नाकारलं पाहिजे. तिला जो आनंद सर्वांसमोर दिलेल्या वस्तूमुळे होईल तो लपवून दिलेली वस्तू नेण्यात होणार नाही.

सासूची ही वागणूक सुनेला बोचते

आणखीन एक दृश्य बघा. इथेही देण्याची भावना काहीशी त्याच प्रकारची आहे, पण पद्धतीत थोडासा बदल झाला आहे. माझ्या चुलतसासूला ३ मुली आहेत. सर्वांचं लग्न झालं आहे. घरात दोन सुना आहेत.

एकदा त्यांची मधली मुलगी सासरी जाणार होती. मला तिला भेटायचं होतं म्हणून मीही तिथे गेले. तिथे जाऊन काही वेळ बसल्यानंतर मला जाणवलं की तिची आई तिच्या जाण्याच्या तयारीत काही जास्तच व्यस्त होती. तिने तिचं लहानसहान सामान ठेवण्यासाठी एक मोठीशी बॅगही रिकामी करून आणली. वाटेत चहासाठी थर्मास आणि पाण्यासाठी बाटलीदेखील बाजारातून मागवली. मी असतानाच सर्व वस्तूंची जुळवाजुळव झाली.

बॅगेमध्ये मुलगी जेव्हा जुनी साडी अंथरून त्यावर कपडे ठेवू लागली तेव्हा पटकन् आईने असं म्हणत एक मोठा टॉवेल तिला दिला की ‘हा अंथरून घे, वाटेत पाणी वगैरे सांडलं तर कपडे खराब होतील.’

असो, पेटीत कपडेही ठेवले गेले. आता जेव्हा कुलूप लावायची वेळ आली तेव्हा आईने पेटीला लावलेलं लहान कुलूप काढून पेटीतच टाकलं आणि घराचं मोठं कुलूप लावलं आणि म्हणाली, ‘‘प्रवासात कधीही मजबूत कुलूप असावं. लहान कुलूप कोण जाणे कोणीही तोडेल आणि बॅगेतील सर्व वस्तू जातील.’’

मी हैराण होऊन ही सगळी तयारी पाहात होते. मान्य आहे की माहेरहून सासरी जायला तिला ४८ तासांचा रेल्वेचा प्रवास करायचा होता, पण हाच प्रवास तिने माहेरी येतानाही केला होता. मग अशी नव्याने सगळी तयारी का बरं?

ती तर निघून गेली, पण दोन दिवसांनी मी जेव्हा त्यांच्या सुनांशी याबाबत बोलले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘वहिनी, तुम्ही जे बघितलं, ते तुमच्यासाठी नवीन आहे, आमच्यासाठी नाही. त्या जेव्हा जेव्हा इथून जातात, आई त्यांना या सर्व गोष्टी देतात. अशाप्रकारे वस्तू देणं आम्हाला खुपतं तर खूप, पण करणार तरी काय?

किती आश्चर्याची गोष्ट आहे की जेव्हा त्या सासरहून माहेरी ट्रेनने आल्या तेव्हा तिला कशाचीच गरज पडली नाही. तिला जर गरज होती तर तिने आपल्या गरजेच्या वस्तू सोबत आणायला नको होत्या का?

सांगायचं उद्दिष्ट हे नाही की मुलीला एखाद्या गोष्टीची गरज पडली तर आईने ती देऊच नये. खरंतर गरजेनुसार द्यावीही, पण पद्धतशीरपणे द्यावी.

मुलीनेही आपल्या माहेरहून जितकं जास्त तितकं आणि कसंही करून घेण्याची भावना ठेवू नये. प्रत्येक वेळेस माहेरहून लहानसहान सामान घेण्याची आशा बाळगू नये. उलट आई जर चुकीच्या पद्धतीने सामान देत असेल तर ते घ्यायला नकार द्यावा.

लढाई…अशीच हरू नका

* नितिन शर्मा, ‘सबरंगी

दृष्टीकोन बदलला की बरंच काही बदलतं. उदास वाटणाऱ्या आयुष्यातही उत्साह संचारतो. यासाठी संयम, विवेक आणि योग्य संतुलन आवश्यक आहे. जे असं करू शकत नाहीत ते निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. जेव्हा तुम्ही जिंकण्याच्या निर्धाराने पुढे जात राहाता तेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितिलाही अनुकूल बनवता. पण जो वेळेआधीच हरतो तो स्वत: तणावाखाली राहातो आणि आपल्या कुटुंबालाही न विसरू शकणारं दु:खं देतो. समाजातही चुकीचा संदेश जातो. लोक त्याला भित्रा म्हणू लागतात. त्याच्या जिंवतपणी किंवा पश्चात ‘भित्रा’ अशी त्याची ओळख बनली तर ती त्याच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकते.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात राहाणारी ४६ वर्षीय नीता गुलाटी सरकारी शाळेत शिक्षिका होती. ती इतकी सुंदर होती  की सगळे तिची स्तुती करत. तिचा नवराही सरकारी कर्मचारी होता. तिचा एक मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षण घेत होते. कुटुंबात आनंद नांदत होता. वरवर दिसताना सगळं ठिक दिसत होतं. पतिपत्नीमध्ये कोणताही वाद नव्हता किंवा घरात कशाचीही कमतरता नव्हती. या सगळ्यापासून लांब नीता एका वेगळ्याच दुनियेत जगत होती, ती डिप्रेशनमध्ये होती आणि याची जाणीव तिच्या नवऱ्यालाही नव्हती.

एके दिवशी संध्याकाळी नीता घरात एकटी होती. नवरा घरी आला तेव्हा त्याला तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. आपल्या अर्धांगिनीची ती अवस्था पाहून तो बेभान झाला. नीताने गळ्याभोवती फास आवळून आपल्या श्वासांची मालिका रोखून भ्याडपणा दाखवून दिला होता. आजूबाजूची माणसं गोळा झाली.  आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आनंदी कुटुंबातल्या नीताने हे पाऊल उचललं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता.

आत्महत्येचं कारण

नीताने आपल्या आत्महत्येचं कारण एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. ‘‘सॉरी, पण काय करु? माझ्या आजारपणाने हैराण झाले आहे.’’

खरंतर नीता सनबर्नला कंटाळली होती आणि यामुळे डिप्रेशनमध्ये होती. ३ वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारांनी आजार बरा होऊ शकत होता. पण तरीही नीता डिप्रेशनमध्ये होती.

सूर्याच्या अल्ट्राव्हायोलट किरणांमुळे त्वचा जळजळते, त्याला सनबर्न म्हणतात. पाणी पिऊन त्वचा झाकून ठेवून, उन्हापासून लांब राहून आणि सनस्क्रीन लावून हा आजार सहज बरा होऊ शकतो. पण नीताला नकारात्मकतेने ग्रासलं होतं. हळूहळू ती डिप्रेशनमध्ये इतकी शिरत गेली की तिने कुटुंबाचा आणि स्वत:चा विचार न करता चुकीचा मार्ग निवडला.

नीताच्या जवळच्या माणसांचा विश्वासच बसत नव्हता की इतक्या क्षुल्लक कारणासाठी कोणी आत्महत्या करू शकतं. पण संशय येण्यासारखं काहीच नव्हतं. नीता तिच्या कुटुंबासाठी आता फक्त आठवणीतच राहिली. सकारात्मक दृष्टीकोन आणि विचारानं ती स्वत:लाही सावरू शकत होती.

धावपळीच्या आयुष्यात विविध कारणांमुळे डिप्रेशन येणे ही मोठी गोष्ट नाही. प्रत्येकजण थोड्याफार प्रमाणात याचा बळी ठरतोच. पण वेळीच या तणावावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचं रूपांतर विविध आजारांमध्ये होऊन तुमचं आयुष्य तुम्हाला वाईट दिसू लागतं. हे ते भयंकर क्षण असतात जे तुम्हाला मृत्यूच्याजवळ नेऊन ठेवतात.

आयुष्य ओझं वाटत असेल तर जगण्याची पद्धत बदला. नाजूक क्षणी विचारीपणाने निर्णय घेतले तर भविष्यातील अडचणी टाळता येतात. जे वेळीच सावरत नाहीत, त्यांना अनपेक्षित घटनांना सामोरं जावं लागतं.

तुम्हाला तुमच्या जवळपास असे काही लोक भेटतील जे तुमच्यापेक्षा जास्त त्रासात आहेत. कोणी अंध आहेत तर कोणी अपंग. पण आपल्या हिंमतीच्या जोरावर वेळ निभावून नेतात आणि इतरांसाठी आदर्श बनतात. लक्षात ठेवा, या जगात करोडो लोक आहेत जे तुमच्यासारखं आयुष्य जगायला आसुरतात. कोणाकडे खायला अन्न नाही, कोणाकडे कपडे नाहीत, डोक्यावर छत नसतं, उपचारासाठी पैसे नाहीत, पण तरीही ते आनंदाने जगत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी असते. लहानसहान गोष्टींमुळे विचलित होऊन लोक आयुष्यात हार मानू लागले तर त्यांची यादी रोज मोठी असेल. आयुष्यातली ध्येयं कायम ठेवा आणि प्रत्येक स्थितीत जगण्याची कला शिका, कोणत्याही वाईट विचारांना आणि त्रासाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. यामुळे अडचणी कमी होण्यापेक्षा वाढतील. प्रतिकूल स्थिती कधीच कायम राहात नाही, आपलं संपूर्ण लक्ष समस्येतून मार्ग काढण्याकडे असलं पाहिजं.

अशीही माणसं आहेत जी आपला दृष्टीकोन बदलून आपल्या हाताने आयुष्य सावरतात, अगदी तेव्हाही जेव्हा मनात काही वाईट विचार येतात आणि आयुष्य डोंगराएवढं वाटू लागतं.

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये राहाणाऱ्या अनिता शर्मा उर्फ भैरवी यांच्या कानाखाली एक गाठ आली. गाठीने कॅन्सरचं रूप घेतलं. यामुळे अनिताची झोपच उडाली आणि ती चिंताग्रस्त झाली. आता जगण्यात काहीच अर्थ नाही असं वाटू लागलं.  पण त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला. तेव्हा त्यांना कळलं की सकारात्मक बनून आजाराबरोबरच अनेक नकारात्मक गोष्टींशी लढता येतं. आता त्या चांगलं आयुष्य जगत आहेत. निराशेमुळे त्रास आणखी वाढतो याची जाणीव झाली. अनीताने आयुष्य जगण्याची पद्धत बदलली. त्या आपला जास्तीत  जास्त वेळ झाडंझुडपं, प्राणी-पक्षी यांच्यासह घालवू लागल्या. यामुळे त्यांना जणू काही जगण्याचं कारण मिळालं. अनिताचं महागडं ऑपरेशन होणार आहे. इतके पैसे त्यांच्याकडे आता नाहीत की तात्काळ उपचार होतील. पण यामुळे त्या अस्वस्थ नाहीत. त्या आपलं संतुलन राखून आनंदी जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. परिस्थिसमोर हरणं म्हणजे आयुष्य नाही.

पोलिस विभागात वायरलेस ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी सिंह पुंडीरनेही दृष्टीकोन बदलून स्वत:ला आणि कुटुंबाला सावरण्याचं काम केलं. २ वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं. आजारपणाच्या विचारानेच त्या कोसळल्या. ऑपरेशन आणि केमोथेरेपीने प्रकृती अधिकच बिघडली.

आजारपणावर लाखो रुपये खर्च झाले आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. अशा परिस्थितीशी झगडताना अशा आयुष्यापासून सुटका करून घ्यावी असं वाटायचं. पण अशावेळी त्या आपल्या ३ मुलांचा विचार करत. त्यांच्यासह स्वप्नं रंगवत. डिप्रेशन बरात काळ राहिलं. पण त्या आपल्या सकारात्मक विचारांनी निराशेवर मात करत. परिणामी बऱ्याच उपचारांनंतर त्यांचा आजार बऱ्याचअंशी नियंत्रणात आला.

‘‘जेव्हा तुमच्यासोबत काही नकारात्मक घडतं तेव्हा एक गोष्ट सकारात्मक घडते की तुम्ही तुमची आशा कधीच सोडत नाही. ठाम विश्वास मनात असला पाहिजे. असाच विचार करा की मला जगायचंय. मग एक दिवस सगळं ठीक होतं.

माझ्या शरीरात कॅन्सर मोठ्या प्रमाणात पसरला होता. फोर्थ स्टेजला होता. मी असाच विचार केला की मला जगायचंय आणि माझ्या आजाराला हरावं लागलं.’’ असं लक्ष्मी सांगतात.

डिप्रेशनला बळी पडू नका

डिप्रेशन म्हणजे तणाव एक गंभीर मानसिक आजार आहे. बऱ्याच संशोधनात   असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत या आजाराचं प्रमाण महिलांमध्ये    जास्त आढळतं. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिप्रेशन भावना, आकलन, वर्तणूक आणि विचारांवर वाईट परिणाम करते. हळूहळू ते माणसाला अशा अवस्थेत नेतं की त्याचं जग उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटू लागतं. जगण्यासारखं काही उरलेलंच नाही असं वाटू लागतं. यामुळे माणूस आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतो. याची बरीच कारणं असू शकतात. मेंदूमध्ये संदेश प्रसारीत करणाऱ्या रासायनिक संदेशवाहक न्यूरोट्रांसमीटरच्या असामान्य स्तराची डिप्रेशनमध्ये महत्त्वाची भूमिका असते. मानसिक रोग,   कमकुवत व्यक्तिमत्त्व, निराशाजनक दृष्टीकोन ही कारणं त्यामागे असतात. याच्या लक्षणांत उदासिनता, निराशा, निद्रानाश, भूक कमी लागणे, थकवा, न्यूनगंड, एकटेपणा, आनंदी क्षणांपासून अलिप्त राहाणं, अस्वस्थता, चिडचिड, सतत डोकेदुखी यांचा समावेश असतो.

डिप्रेशनचा उपाय आपल्या स्वत:च्या हातात असतो. तुम्ही त्यातून कशाप्रकारे     बाहेर पडू इच्छिता हे तुमच्यावर अवलंबून असतं.

मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्याने तुम्ही डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर पडू शकता. स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा          वेळ काढा. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा, कारण व्यसन डिप्रेशनला पूरक असतं. आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. अशी नाती जोडा जिथे तुम्हाला         मनमोकळं बोलता येईल. माणसांमध्ये मिळून मिसळून राहा. तरीही डिप्रेशन कमी झालं नाही तर एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जा. त्यांनी दिलेल्या औषधांचे नियमित सेवन करा आणि त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा फक्त औषध हाच यावरचा उपाय नाही. याच तुमची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टीकोनही तितकाच महत्त्वाचा आहे.

उत्तम जोडीदार कसा असेल

* निशा रॉय

आजच्या काळात एका विश्वासू जोडीदाराची साथ मिळणे याचा अर्थ आहे की तुम्ही अतिशय नशीबवान आहात, कारण असा जोडीदार मिळणे विरळाच आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. जर तुम्हाला विश्वासू जोडीदार मिळाला असेल तर तुम्ही त्याचा विश्वास कायम राखण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तो नेहमी तुमच्यासोबत राहिल. एका खऱ्या बॉयफ्रेंडचा अर्थ आहे की तो तुमची काळजी घेईल, या जाणून घेऊ की एखादा विशेष जोडीदार असल्यास तुमचे जीवन कसे आनंदी होते ते.

जो तुमची काळजी घेईल

जर तुमचा बॉयफ्रेंड चांगला आणि विश्वासू असेल तर तो तुमच्याबाबत नक्की विचार करेल आणि तुमची काळजी घेईल. जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला स्पेशल वागणूक देईल. तो तुमच्या भावनांचा विचार करेल, तुमच्या आईवडिलां व्यक्तिरिक्त फक्त तुमचा जोडीदारच तुम्हाला अशी जाणीव करून देतो की तुम्ही सगळयात वेगळया आहात. जोडीदारासोबत असताना तुम्हाला वाटेल की जणू तुमच्या आसपास असे कोणी आहे की ज्याच्या सहवासाने तुम्हाला कशाचीही काळजी करायची गरज नाही.

तो तुम्ही खास आहात याची जाणीव करून देतो

एक चांगला जोडीदार तुम्हाला नेहमी खुश ठेवायचा किंवा तुम्ही कायम आनंदी राहावं यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येक लहानसहान प्रसंगात तुम्हाला सरप्राईज देऊन खुश करतो. मग भले तो तुमच्यापासून दूर असो की तुमच्या जवळ असो. तो कायम तुमच्यासाठी असे काही करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे तुम्ही खास आहात याची तुम्हाला जाणीव होईल.

तुमच्या प्रत्येक दु:खात तो तुमच्या पाठीशी असेल

एक सच्चा जोडीदार नेहमी तुमचा ताण,   दु:ख आणि चिंता दूर करण्याचा आणि तुमची ओंजळ कायम सुखाने भरलेले राहिल असा प्रयत्न करतो. तुमच्या दु:खातसुद्धा तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे तुम्ही तुमचे दु:ख विसरून जाल. मग यासाठी तो तुम्हाला एखादा जोक ऐकवतो किंवा तुम्हाला मिठी मारतो. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तेव्हा तुमचा आधार बनून तुमच्यासोबत उभा राहिल. त्याच्यासोबत असताना तुम्ही प्रत्येक दु:ख आणि काळजी विसरता.

तुमच्याकडे विशेष लक्ष देतो

एक चांगला जोडीदार तुमच्यासोबत नेहमी असे काही क्षण व्यतित प्रयत्न करतो, जे तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरतील. नेहमी तुम्हाला उत्तोमत्तम ठिकाणी फिरायला नेऊन तुम्हाला खास जाणीव करून देतो.

यासोबतच भविष्याबाबतसुद्धा विचार करेल

एक चांगला आणि विश्वासू जोडीदार नेहमी भविष्याबाबत योजना आखेल. प्रत्येक अशा गोष्टीशी संघर्ष करेल, जी तुम्हाला त्याच्यापासून वेगळे करायचा प्रयत्न करत करेल.

लिव इन पोकळ नातं

* गरिमा पंकज

लिव इन हे आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार तरुणांनी निर्मित केलेली थोडी कमी आजमावलेली कॉन्सेप्ट आहे. मुलामुलीची विवाहित जोडप्याप्रमाणे सोबत राहाण्याची व्यवस्था म्हणजे लिव इनमध्ये वैवाहिक जीवनातील आकांक्षा पूर्ण होतात, एकमेकांचा सहवासही लाभतो परंतु दीर्घकालीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते बांधील नसतात. कधीही विलग होण्याचं स्वातंत्र्य असतं. ही कॉन्सेप्ट विवाह करण्याची मानसिकता नसणाऱ्यांना वरकरणी आकर्षक भासते, परंतु आतून तितकीच पोकळ आणि अस्थिर तर आहेच शिवाय त्यातही अनेक जबाबदाऱ्या आहेत. कदाचित हेच कारण आहे की बहुतेक जण खासकरून मुली आजही याचा स्वीकार करत नाहीत.

अपूर्णतेची जाणीव

एक प्रकारे हे नातं धार्मिक मान्यतांच्या बंधनापासून सामाजिक रुढीपरंपरा आणि शोबाजीच्या रंगापासून दूर आहे आणि कायद्यानेसुद्धा याला काही मर्यादेपर्यंत मान्यता दिली आहे. परंतु तरीदेखील या नात्याच्या अपूर्णतेला दुर्लक्षित करता येणार नाही खासकरून मुली अशाप्रकारच्या नात्यांमध्ये अनेकदा गहिऱ्या मानसिक त्रासातून जातात.

वास्तविक, लिव इनमध्ये नातं जेव्हा गहिरं होतं आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात, शारीरिकसंबंध साधतात, तेव्हा ती भावना मुलीच्या मनात कायम सोबत राहाण्याच्या इच्छेला जन्म देते. ५० मिनिटांची जवळीक ५० वर्षांच्या सहवासाच्या इच्छेमध्ये बदलू लागते. परंतु जरुरी नाही की मुलगासुद्धा याच पद्धतीने विचार करेल आणि जबाबदाऱ्या पूर्ण करायला तयार होईल.

बहुतेक प्रकरणांमध्ये या गोष्टीवरून नातेसंबंध तुटतात आणि अखेरीस शारीरिक प्रेमावर आधारीत हे नातं आयुष्यभराचं दुखणं बनून राहातं. अनेकदा या दुखण्यातून निर्माण झालेली वेदना इतकी त्रासदायक असते की मुलगी स्वत:ला संपवून टाकण्यासारखं चुकीचं पाऊल उचलायलाही मागेपुढे पाहात नाही.

अशा नातेसंबंधांमध्ये प्रेम कमी वाद अधिक

अशा नातेसंबंधांमध्ये मुलामुलींचा एकमेकांवर पूर्ण हक्क नसतो. ते संयुक्त निर्णयसुद्धा घेऊ शकत नाहीत. जसं की, विवाहित दाम्पत्य मात्र घेतात. उदाहरणादाखल संपत्ती एक तर मुलाची असते वा मुलीची. दोघांचा अधिकार नसतो. दुसऱ्याला हे विचारण्याचा अधिकार नाही की पैसे कशाप्रकारे खर्च होत आहेत. दोघे आपले पैसे आपल्या मर्जीने खर्च करतात.

याच कारणामुळे बहुतेकदा यांच्यात हक्क आणि अधिकारावरून भांडणं होत राहातात. हा वाद सहजासहजी मिटत नाही. ते प्रयत्न करतात की प्रेम दर्शवून वा आपसांत बोलून वाद मिटवावा. परंतु बहुतेकदा असं होत नाही; कारण कोणतेही नातेसंबंध कायम राखण्यासाठी आणि दोन व्यक्तींना जवळ ठेवण्यासाठी जे गुण सर्वाधिक जरुरी आहेत ते आहेत, विश्वास, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आत्मिक निकटता.

हे गुण विकसित करण्यासाठी वेळ हवा असतो. केवळ भौतिक वा शारीरिक जवळीक मानसिक आणि भावनिक आधार देईल असं जरुरी नाही. अशा पोकळ नात्यांमध्ये कटुतेचा काळ सहजी संपत नाही.

जबाबदाऱ्यांपासून पळायला शिकवतं लिव इन

लिव इन रिलेशनशिप ही वास्तविक भावनिक बंधनांच्या आधारेसोबत राहाण्याची एक व्यक्तिगत आणि आर्थिक व्यवस्था आहे. यामध्ये कायमस्वरूपी एकमेकांना सोबत देण्याचं कोणतंही आश्वासन नसतं, शिवाय संपूर्ण समाजकायद्यासमोर अशाप्रकारचा कोणताही करार केला जात नाही. त्यामुळे पार्टनर्स एकमेकांवर (लेखी/तोंडी) कोणत्याही प्रकारचा कसलाही दबाव आणू शकत नाहीत. असं नातं एकप्रकारे रेंटल एग्रीमेंटसमान असतं. हे अतिशय सहजतेने बनवलं जातं. आणि जोपर्यंत दोन्ही पक्ष योग्य वर्तन करतात, एकमेकांना खूश ठेवतात तोपर्यंत ते सोबत असतात. याउलट विवाह या पार्टनरशिपहून अधिक गहिरा आहे. हा एक सार्वभौमिक पातळीवर केलेला करार आहे, ज्यासोबत कायदेशीर आणि सामाजिक जबाबदाऱ्या संबंधित असतात. वास्तविक लग्न केवळ २ व्यक्तिचं, २ कुटुंबांचं व समुदायांमध्ये बनलेलं नातं आहे, जे आयुष्यभरासाठी स्वीकारार्ह आहे. जीवनात कितीही दु:ख, समस्या आल्या, तरी परस्पर नातं जपण्याचं आश्वासन यात दिलं जातं.

असं म्हटलं जातं की, हृदयाच्या तारा जुळल्या की मग रीतिरिवाजांची काय गरज? परंतु मुद्दा इथे रीतिरिवाजाचा नाही तर सामाजिक स्तरावर केलेल्या कमिटमेंटचा आहे. कायम जबाबदारी घेण्याची कमिटमेंट, नेहमी साथ निभावण्याची कमिटमेंट, विवाहामध्ये एका वेगळ्या पातळीची कमिटमेंट असते, त्यामुळे एका वेगळ्या पातळीवरील संरक्षण, स्वातंत्र्य आणि परिणामी वेगळ्या पातळीवरील आनंदही यातून मिळतो. जे नातं केवळ परस्पर प्रेम आणि आकर्षण कायम आहे तोपर्यंत निभावलं जातं, त्यापासून हे नातं खूप निराळं आहे. त्या संबंधात उत्तम पर्याय मिळताच विलग होण्याचा मार्ग खुला असतो. कायम मानसिक तयारी ठेवावी लागते की हे नातेसंबंध कधीही संपुष्टात येऊ शकतात.

समर्पण हवं तर लिव इन नको

जेव्हा समर्पणाचा विषय येतो, तेव्हा विवाहित जोडीदार या दृष्टीने अतिशय प्रामाणिक आढळून येतात. ५ वर्षांच्या एका संशोधनानुसार ९० टक्के विवाहित स्त्रिया पतिव्रता असल्याचं आढळलं, याउलट लिव इनमध्ये असणाऱ्या केवळ ६० टक्के स्त्रियाच प्रामाणिक होत्या असं आढळलं.

पुरुषांच्या बाबतीत स्थिती अधिकच आश्चर्यकारक होती. ९० टक्के विवाहित पुरुष आपल्या पत्नीप्रती प्रामाणिक होते. याउलट लिव इन प्रकरणात अवघे ४३ टक्के पुरुषच प्रामाणिक आढळले.

इतकंच नव्हे, लिव इनचं संकट म्हणजे प्रीमॅरिटल सेक्श्युअल एटीट्यूड आणि वर्तन विवाहानंतरही बदलत नाही. जर एक स्त्री लग्नापूर्वी एका पुरुषासोबत राहात असेल तर बऱ्याच प्रमाणात शक्यता असते की ती विवाहानंतरही आपल्या पतीला धोका देईल.

संशोधन व अभ्यास अहवालांनुसार जर एखादी व्यक्ती विवाहापूर्वी सेक्सचा अनुभव घेते, तर विवाहानंतरही ती व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये गुंतेल अशी सर्वाधिक शक्यता असते. हे खासकरून स्त्रियांसाठी अधिकीने सत्य आहे

पालकांपासून अंतर

लिव इनमध्ये राहाणाऱ्या मुलामुलींच्या जीवनात सामान्यत: आईवडिलांचा हस्तक्षेप नाममात्र असतो; कारण यासाठी त्यांची संमती नसते आणि ते आपल्या मुलांपासून अंतर राखतात.

घरच्यांना या गोष्टीची माहिती त्यांनी दिली नाही, तरी हे रहस्य अधिक काळ लपवून ठेवणंही सोपं नसतं. अनेक प्रकारच्या गोष्टी जसं की आईवडिलांकडून पैशांची मदत घेणं, पार्टनर आणि त्याचं सामान लपवणं जेव्हा पालक अचानक भेटायला येतात, सातत्याने त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचा अपराधभाव आणि खोटं बोलणं यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या लिव इनमध्ये राहाणाऱ्यांना अस्वस्थ करतात.

विश्वासाचा अभाव

जे विवाहापूर्वी सोबत राहातात, त्यांच्यात बऱ्याचदा अविश्वासाची भावना विकसित होते. परिपक्व प्रेमामध्ये गहिरा विश्वास असतो की तुमचं प्रेम केवळ तुमचं आहे आणि कुणी तिसरं त्यात नाही. परंतु विवाहापूर्वीच जवळीक साधल्यावर व्यक्तिच्या मनात अनेक प्रकारचे संशय निर्माण होऊ लागतात की माझ्यापूर्वी तर जोडीदाराच्या जीवनात कुणी नव्हतं ना वा माझ्याशिवाय भविष्यात दुसऱ्या व्यक्तीसोबत याचे संबंध बनणार नाहीत ना.

अशाप्रकारचा अविश्वास आणि संशयीवृत्ती बळावल्याने व्यक्ती हळूहळू आपल्या पार्टनरप्रती प्रेम व सन्मान गमावू लागतो. याउलट वैवाहिक जीवनात विश्वास एक महत्त्वपूर्ण भाग असतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें