* नितिन शर्मा, ‘सबरंगी

दृष्टीकोन बदलला की बरंच काही बदलतं. उदास वाटणाऱ्या आयुष्यातही उत्साह संचारतो. यासाठी संयम, विवेक आणि योग्य संतुलन आवश्यक आहे. जे असं करू शकत नाहीत ते निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. जेव्हा तुम्ही जिंकण्याच्या निर्धाराने पुढे जात राहाता तेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितिलाही अनुकूल बनवता. पण जो वेळेआधीच हरतो तो स्वत: तणावाखाली राहातो आणि आपल्या कुटुंबालाही न विसरू शकणारं दु:खं देतो. समाजातही चुकीचा संदेश जातो. लोक त्याला भित्रा म्हणू लागतात. त्याच्या जिंवतपणी किंवा पश्चात ‘भित्रा’ अशी त्याची ओळख बनली तर ती त्याच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकते.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात राहाणारी ४६ वर्षीय नीता गुलाटी सरकारी शाळेत शिक्षिका होती. ती इतकी सुंदर होती  की सगळे तिची स्तुती करत. तिचा नवराही सरकारी कर्मचारी होता. तिचा एक मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षण घेत होते. कुटुंबात आनंद नांदत होता. वरवर दिसताना सगळं ठिक दिसत होतं. पतिपत्नीमध्ये कोणताही वाद नव्हता किंवा घरात कशाचीही कमतरता नव्हती. या सगळ्यापासून लांब नीता एका वेगळ्याच दुनियेत जगत होती, ती डिप्रेशनमध्ये होती आणि याची जाणीव तिच्या नवऱ्यालाही नव्हती.

एके दिवशी संध्याकाळी नीता घरात एकटी होती. नवरा घरी आला तेव्हा त्याला तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. आपल्या अर्धांगिनीची ती अवस्था पाहून तो बेभान झाला. नीताने गळ्याभोवती फास आवळून आपल्या श्वासांची मालिका रोखून भ्याडपणा दाखवून दिला होता. आजूबाजूची माणसं गोळा झाली.  आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आनंदी कुटुंबातल्या नीताने हे पाऊल उचललं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता.

आत्महत्येचं कारण

नीताने आपल्या आत्महत्येचं कारण एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. ‘‘सॉरी, पण काय करु? माझ्या आजारपणाने हैराण झाले आहे.’’

खरंतर नीता सनबर्नला कंटाळली होती आणि यामुळे डिप्रेशनमध्ये होती. ३ वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारांनी आजार बरा होऊ शकत होता. पण तरीही नीता डिप्रेशनमध्ये होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...