- सुमन बाजपेयी

आपल्या वैवाहिक जीवनात असंतुष्ट असल्याने घटस्फोट घेणे नि:संशय. त्यावेळी एखाद्या बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतरचे आयुष्य सहजसोपे होईल किंवा जीवनात परत आनंद निर्माण होईल, असा विचार करणे एक चूकच आहे. म्हणून घटस्फोटाचा निर्णय घेण्याआधी त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्ही घटस्फोट घेण्याचा विचार करत असाल, तर हे नक्की आहे की तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काहीतरी कुरबुर आहे अथवा लहानसहान समस्या एवढया मोठया झाल्या आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे की आता एकत्र राहणे अशक्य आहे. या गोष्टी विचारांमधील संघर्ष निर्माण होण्यापासून तर विवाहबाह्य संबंधांपर्यंत निगडीत असतात नाहीतर मुलांचे संगोपन वा आर्थिक प्रश्नांमधून उत्पन्न झालेल्या असू शकतात. म्हणजे ही लहानलहान भांडणं काळानुसार ना केवळ जोडप्यांमधील दुरावा वाढवतात तर त्यांना वेगळे होण्यास विवश करतात.

जुळवून न घेणे किंवा मानसिक स्तरावर अवलंबून असल्याने वेगळे होणे नि:संशय एक सोपा मार्ग वाटतो, पण त्यासाठी ज्या कायदेशीर, सामाजिक आणि भावनात्मक त्रासाचा सामना करावा लागतो, तो काही कमी यातना देणारा नसतो. जर एखादे जोडपे लग्नाला यातना समजत असेल, तर त्यातुन सुटका मिळवण्यासाठीसुद्धा कमी यातना सहन कराव्या लागत नाही.

मूल्यांकन करा

घटस्फोट घेण्याआधी असा विचार करा की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रास देत आहेत. शक्य आहे की त्या आपण सुधरवू शकू. मग हे ठरवा की वास्तवात तुम्ही त्यात बदल घडवून आणू इच्छिता का? आपल्या विवाहसोबत तुम्हाला याचेही मूल्यांकन करावे लागेल की हा विवाह तुम्हाला वाचवायचा आहे का? घटस्फोटाकडे वाटचाल करताना स्वत:ला अवश्य विचारा की जी असमाधानाची भावना तुमच्यात रुजते आहे ती थोडया काळासाठी आहे, जी काळानुसार दूर होणार आहे का? घटस्फोट दिल्यावर तुम्ही परत नवे संबंध निर्माण करणार आहात का? तुमच्या मुलांवर याचा काय परिणाम होईल आणि ते या निर्णयात तुम्हाला पाठिंबा देतील का?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...