दांपत्य जीवनातील ९ वचनं

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

बदलत्या काळाबरोबर बदलही आवश्यक आहे. आजच्या युगात दांपत्य विशेषकरून नवविवाहित जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आपल्या भावना आणि विचारांचा अंदाज थोडा बदलायलाच हवा. पूर्वी विवाहाचा अर्थ फक्त प्रेम आणि त्याग होता, ज्यात बहुतेकदा स्त्रियाच पती आणि त्याच्या घर-कुटुंबासाठी समर्पित राहण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानत असत आणि त्याग व कर्तव्याची मूर्ती बनून सारे जीवन आनंदाने व्यतित करायच्या. घरकुटुंबात यामुळेच त्यांना सन्मानही मिळत असे.

पुरुष पण अशी पत्नी मिळाल्याने आनंदीत व्हायचे. त्यांची मानसिकताही स्त्रियांप्रति हीच होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही ही गोष्ट समजली आहे. आज स्त्रियाही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, प्रगती साधत आहेत.

वर-वधू लग्नाच्या वेळेस रीती-रिवाजाच्या नावावर ७ वचने घेतात आणि बहुतेक खूप लवकर विसरूनही जातात. परंतु दांपत्य सर्वेक्षणाच्या आधारावर निष्कर्षाच्या रूपातील या वचनांचा विवाहानंतरही स्विकार करा, यांना लक्षात ठेवा आणि निभवासुद्धा. दोघांनाही एकमेकांच्या कामात सहकार्याच्या रूपाने ताळमेळ बसवून चालण्याची आवश्यकता आहे, ज्यातून सगळयांच्या विचार-विमर्शातून निघालेली ही खालील वचने मोठया कामाची आहेत :

जे माझे आहे ते तुझेही : लखनौऊचे आर्किटेक्ट सुहास आणि त्यांची पत्नी सीमामध्ये सुरुवातीला छोटया-छोटया गोष्टींवरून नेहमी भांडणे होत. सीमा म्हणते, ‘‘जसे माहेरून मिळालेल्या महाग बेड कव्हर, क्रॉकरी इत्यादीचा जेव्हा सुहास आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी उपयोग करायचे, तेव्हा मला अजिबात आवडायचे नाही. त्याचप्रमाणे त्यांनाही माझे नातेवाईक, मैत्रिणींद्वारे त्यांचे म्युझिक सिस्टम किंवा पुस्तके हाताळणे एकदम असह्य व्हायचे. नंतर एके दिवशी आम्ही ठरवले की जर आपण एक आहोत तर एकमेकांच्या वस्तूंचा उपयोग का नाही करायचा. त्यादिवसापासून सगळा परकेपणा दूर झाला.

जसे मला आपले आई-बाबा, भाऊ-बहिण, मित्र-नातेवाईक प्रिय आहेत, तसेच तुम्हालाही आपले :

जयपुरचे डॉ. राजेश आणि त्यांची होममेकर पत्नी इशाने या गोष्टीचा खुलासा केला की पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा घरात समान आदर होणे आवश्यक आहे. राजेशने आपली बहिण रिमाच्या घरी आपली व आपल्या आई-बाबांची पुन्हा-पुन्हा अपमानित होण्याची घटना सांगितली. बहिण आपल्या पतिकडून होणाऱ्या अपमानजनक व्यवहारामुळे दु:खी असायची. यामुळे त्यांचे आपसातील नाते कधी गोड झाले नाही. ही तर चुकीची अपेक्षा आहे की फक्त पत्नीने पतिच्या घरच्यांचे प्रेमाने स्वागत करायचे आणि पतिने तिच्या माहेरच्या लोकांचा आदर न करता जेव्हा-तेव्हा अपमान करायचा. पतिचेही तेवढेच कर्तव्य आहे. पत्नी अर्धांगिनी आहे, जीवनसाथी आहे, गुलाम नाही.

जशा माझ्या गरजा आवश्यक तशाच तुमच्याही : सुजाता एका कॉर्पोरेट ऑफिसात काम करते. नेहमी तिला घरी येण्यास उशीर होतो. घरी असतानाही तिला कधी-कधी ऑफिसचे काम करावे लागते. यावर पती विशाल चिडचिड करत असे. एके दिवशी सुजाताने त्याला बसवून चांगल्याप्रकारे समजावले की विशाल मी लग्नाच्या अगोदरच तुम्हाला सांगितले होते, तेव्हा तर तुम्हाला माझ्या चांगल्या पॅकेजपुढे सर्व स्वीकार होते. जेव्हा तुम्ही आपल्या बिझनेस मीटिंगमधून उशिरा येता तेव्हा तर माझी काही हरकत नसते. तर मग तुम्ही का समजून घेत नाही? मी नोकरी सोडू शकत नाही. आईचे प्रत्येक महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन मी थांबवू शकत नाही. नि:संदेह तुम्ही मला सोडू शकता. माझी यालाही काही हरकत नाही. मी डिवोर्ससाठी तयार आहे. मी उद्याच दुसरीकडे कोठे शिप्ट होईल.

आपल्या सवयी, छंद, संस्कार जसे माझे तसेच तुमचे : पती-पत्नी वेगवेगळया परिवारातून, वेगवेगळया वातावरणातून येतात पण दुसऱ्याकडून आपल्यासारखे आचरण व राहणीमानाची अपेक्षा करतात किंवा वेगळे पाहून टर उडवतात तर हे योग्य नाही, त्यापेक्षा याचे समाधान शोधणे योग्य असते. स्कूल टीचर दीप्ती आपल्या बँक मैनेजर पती शिखरला अनवाणी पायांनी घरात फिरल्यानंतर अंथरुणात घुसण्याने वैतागत असे. तर शिखर तिचे बाहेरून कोठून आल्यावर कपडे चेंज करून अंथरुणावर टाकणे पसंत नव्हते. शेवटी एके दिवशी बसून दोघांनी समस्येचे समाधान शोधले. आता पायांच्या अस्वच्छतेपासून वाचण्यासाठी शेखरने कार्पेट अंथरले तर दीप्तीनेही शिखरचे बघून कपडे व्यवस्थित हँग करायला सुरूवात केली. त्यांचे जीवन पुन्हा सुरेल सुरावट बनली.

दुसऱ्यांच्या समोर एकमेकांचे दोष किंवा टर उडवायची नाही : दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील माला पहिल्यांदा विवाहानंतर विमानयात्रा करत होती. पती अंश व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याचा एक मित्रही पत्नीसहित त्यांच्याबरोबर होता. सर्व एका तिसऱ्या मित्राच्या लग्नाला जात होते. बेल्ट बांधण्याची सूचना झाली तर मालाने घाईत जवळच्या सीटचा बेल्ट उचलला आणि लावण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून अंश हसू लागला, ‘‘अक्कल चरायला गेली आहे काय? एवढेपण कळत नाही.’’ हे बघून सर्व हसू लागले. तेव्हा मालाला खूप वाईट वाटले. मग ती म्हणाली, ‘‘तुम्हाला हसण्याऐवजी माझी मदत करायला हवी होती किंवा यांच्यासारखी श्रीमंत घरातील पत्नी आणयला हवी होती.’’

अंशला आपली चुक कळाली की त्याने असे बोलायला नको होते. अशाचप्रकारे बरेली निवासी गीताचे भाऊ-वहिनी तिला भेटण्यासाठी आले. तेव्हा पती दिपक बाटलीनेच पाणी पित होता. त्याने गीताच्या भावालाही तीच पाण्याची बाटली ऑफर केली.

‘‘थांबा, मी ग्लास आणते. आमच्या येथे कोणी अडाण्यासारखे पाणी पित नाही,’’ गीता म्हणाली.

दिपकला तिचे म्हणणे खटकले. म्हणाला, ‘‘आणि आमच्या येथेही पतिशी असे कोणी बोलत नाही.’’

भावाने गीताला टोकले व विषय सांभाळला, नंतर दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटले आणि दुसऱ्यांच्या समोर एकमेकांची टर न उडवण्याचे आणि दोष न काढायचे वचन दिले.

जशी माझी सामाजिक बांधिलकी तशीच तुमचीही : दीपांकरची पत्नी जया लग्नाच्या आधीपासूनच फार सामाजिक होती. सर्वांच्या सुखदु:खात, सणासुदीच्या प्रसंगी सामील होत आली होती. ऑफिस असो किंवा शेजारी, नातेवाईक सगळयांशी मिळून-मिसळून राहायची. आणि अजूनही राहत आहे. दीपांकरही तिला सहकार्य करतो, त्यामुळे जयासुद्धा दीपांकरच्या सामजिक नातेबंधांची काळजी घेते.

जशी मला काही स्पेस हवी तशीच तुम्हालाही : पारुलने सांगितले संपूर्ण दिवस तर ती पती रवीमागे हात धुवून लागत नाही. काही वेळ त्याला एकटे सोडते, जेणेकरून तो आपले काही काम करू शकेल. पतिसुद्धा या गोष्टीची काळजी घेतो की मला स्पेस मिळावी.

दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद होत नाही. दुसऱ्या दिवसाचा होमवर्कही सहज होतो. सोबत असल्यावर छान पटतं.

जसे माझे काही सिक्रेट्स न सांगण्यासारखे, माझी इच्छा तशीच तुझीही : लग्नाच्या आधी काय झाले होते पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर वा त्यांच्या घर-कुटुंबात. जर ही गोष्ट कोणी सांगू इच्छित नसेल तर ठीक आहे, खोदून-खोदून का विचारावे? शंकेत वा संभ्रमात राहणे व्यर्थ आहे. कॉलेजचे इंग्रजीचे प्रोफेसर डॉ. नगेंद्र आणि त्यांची हिंदीची प्रोफेसर पत्नी नीलमचे हेच मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नात्याच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. वर्तमान बघावे, एकमेकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवावा.

पॉकेटमनीच्या खर्चावर अडवणूक नको : ‘‘आमच्या दोघांच्या छान जीवनाचा हाच तर सरळ फंडा आहे. घरखर्च आम्ही सहमतीने सारखा शेअर करतो आणि पॉकेटमनीवर एकमेकांना रोखत नाही,’’ स्टेट बँक कर्मचारी प्रिया आणि तिच्या असिस्टंट मॅनेजर पती करणने आपल्या गमतीशीर गोष्टीने अजून एक महत्वाचे वचनही सांगून टाकले.

तर मग आता विलंब कशाचा. लग्नाच्या वेळेस ७ वचने घेतली होती, तर लग्नानंतरही पती-पत्नी दोघांनी ही वचनं आत्मसात करावी आणि प्रेमाने हे नाते निभवावे.

लग्न : एक बेडी

* निलू चोपडा

अनेकदा महिलांना लग्नानंतर स्वत:चं व्यक्तिमत्व, स्वभाव यांना पूर्णपणे बदलावं लागतं. स्त्रीला स्वत:ची अशी ओळखच नाहीए, अशीच समाजात धारणा आहे. लग्नानंतर तर अगदी प्रेमाने तिचं सामाजिक, मानसिक स्वातंत्र्य काढून घेतलं जातं. आणि तिचं स्वातंत्र्य हिसकावून घेणारे हे तिचे स्वत:चेच  आईवडील, सासूसासरे आणि तिचा पती नावाचा प्राणी असतो.

पाठवणीच्या वेळी आईबाबा मुलीला अगदी हुंदके देत समजावतात की मुली हा आता तुझा दुसरा जन्म आहे. सासूसासरे आणि पती यांचं म्हणणं ऐकणं तुझं पहिलं कर्तव्य आहे.

सासरी तर सासूसासरे आणि पती कधी स्पष्टपणे तर कधी आडून सासरच्या चालीरीतीनुसार चालण्याची ताकीद देतात. मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय समाजाची हिच तर मोठी समस्या आहे.

पत्नी बुद्धिमान आणि एखाद्या कलेत पारंगत असेल तर सासरची आणि संकुचित मानसिकता असणारा पती तिच्या कलेला मूठमाती देऊन टाकतात. नृत्य पारंगत वा गायन क्षेत्र असेल तर सरळसरळ सांगून टाकलं जातं की इथे हे काही चालणार नाही. कुटुंबाच्या मानमर्यादा यांचे दाखले दिले जातात.

अनेक घरात तर सुनांना नोकरी करण्यासदेखील मनाई केली जाते. मग घरात कितीही तंगी असली तरी चालेल. मात्र घराचा आर्थिक डोलारा घसरु लागताच तिला नोकरी करण्याची मुभा दिली जाते तीदेखील कार्यालयात कोणत्याही पुरुषाशी बोलायचं नाही आणि सगळा पगार पती वा सासूबाईच्या हाती द्यायचा ही खास अट ठेऊनच.

कळसूत्री बाहुलीचं आयुष्य

सुनंदा राष्ट्रीय स्तरावरची टेनिस खेळाडू होती. घरात सगळयांची लाडकी. आयुष्याचा मनमुराद आनंद कसा घ्यायचा हे तिच्याकडून शिकावं. मात्र आयुष्याच्या स्पर्धेत मात्र मागे पडली. वरवरचा सरंजाम पाहून एका अनोळखी ठिकाणी लग्न जमवलं गेलं. पती व सासरे दोघेही उच्चपदस्थ होते. मात्र लग्नाच्या महिनाभरातच कळसूत्री बाहुलीसारखं आयुष्य तिला नाईलाजाने जगावं लागलं. काय घालायचं, कुठे जायचं, किती बोलायचं हे सर्व पती आणि सासरची मंडळी ठरवत होती.

तिच्या वाहिनीने स्वत:चा मोबाईल तिला देऊन ठेवला होता. संधी मिळताच सुनंदाने तिला स्वत:ची व्यथा सांगितली तेव्हा तिच्या वाहिनीला आश्चर्य वाटलं. मात्र जर हे घरी सांगितलं तर सासरची माणसं तिच्या भावाला आणि वडिलांना त्रास देतील या भीतीने ती गप्प राहत होती.

एके दिवशी संधी मिळताच तिच्या वडिलांनी आणि भावाने तिला माहेरी परत आणलं. वर्षभर ती त्यांच्यासोबत राहिली. जिल्ह्याच्या क्लबमध्ये टेबल टेनिसची कोच बनली. वर्षभर सासरची माणसं नाराजच होती त्यामुळे कोणीच चौकशी करायला देखील आलं नाही. मात्र एकेदिवशी तिचा पती माफी मागून सुनंदाला येण्याचा आग्रह करू लागला.

नंतर मात्र तिच्या घरातल्यांनी त्याच्याकडून तो आणि त्याचे वडील ज्या गोष्टीवरून सुनंदाला धमकावत होते त्याबद्दल लेखी लिहून घेतलं तसंच सुनंदाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्याबाबतच वचन रेकॉर्ड करून घेऊन नंतरच सुनंदाला त्याच्यासोबत पाठवलं.

त्रास देण्याच्या नव्या पद्धती

अश्याच एका नव्या घटनेत एका तरुणीचा विवाह एका फसवेगिरी करणाऱ्या कुटुंबात करण्यात आला होता. त्यांनी खूप श्रीमंत आणि सुशिक्षित असल्याचा दिखावा केला होता. खरंतर ही लोकं पूर्णपणे कर्जात बुडालेली होती. लग्नात भरपूर पैसाअडका मिळेल अशी लालसा होती, मात्र तो मिळत नसल्याचं दिसताच खरं रूप समोर आलं.

मुलीच्या सर्व मूलभूत गरजावरच आडकाठी करण्यात आली. पती आणि सासरे यांच्या जेवणानंतर उरलंसूरलेलं ती खात असे. फोन करण्यास, बाहेर जाण्यास मनाई होती. माहेर दुसऱ्या शहरात होतं. सासरचे तर ओळखीच्या लोकांना देखील भेटायला देत नसतं. जर कोणी भेटायला आलं तर ती झोपलीय वा तब्बेत बिघडल्याची कारण देत असत. बऱ्याच प्रयत्नानंतर तिला तिथून बाहेर पडण्याची संधी मिळाली.

सेक्सबाबतीतदेखील पती त्याला हवं तेव्हा मागणी करतो. मग पत्नी थकलेली असो वा आजारी वा तिची इच्छा असो वा नसो तिला पतीची गरज पूर्ण करावीच लागते आणि जर पत्नीने यात पुढाकार घेतला तर तिला कामातून गेलेली बाई समजून अपमानित केल जातं. म्हणजेच पावलोपावली तिचं स्वातंत्र्य नाकारलं जातं.

काही पुरुष तर स्वत:च्या पत्नीला स्वत:ची मालमत्ताच समजतात. काही दिवसापूर्वी एका बातमीची चर्चा होती की एक सैनिक स्वत:च्या पत्नीला आपले  सैनिक मित्र आणि सहकाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडत होता. नकार दिल्यास चाकूने तिचे कपडे फाडत असे. खरंच एखाद्या स्त्रीसोबत असा दुव्यवहार करणं खूपच भयानक आहे. लग्नानंतर जर एखादी स्त्री अशाप्रकारे पुरुषरुपी लांडग्यांच्या तावडीत सापडली तर तिचं सर्वप्रकारचं स्वातंत्र्य संपून जातं.

अनेकदा स्त्रियांना स्त्री समस्यां, बलात्काराच्या वाढत्या घटना, कोणत्याही सभेत बोलण्यास वा लिहिण्यासदेखील बंदी केली जाते. पती जर दारुडा, मारझोड करणारा, नपुंसक असला तरी तिलाच जबाबदार ठरवलं जातं.

महिलांनी यासाठी काय करावं

लग्नानंतर स्वत:ची ओळख, स्वत:चं स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी स्वत:च्या अधिकारांबाबत जागरूक असायला हवं. काही दिवसांपूर्वी एका लग्नात नवरदेव दारूच्या नशेत नाचत होता. हे पाहून नववधू लग्न मोडून सरळ लग्नाच्या मंडपातून बाहेर पडली. अलीकडे अनेकदा हुंडा घेणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी स्वत: मुलीने लग्नाचं वऱ्हाड पाठवून देण्याच्या बातम्या येत असतात. हा खूपच चांगला संकेत आहे.

आजच्या तरुण पिढीने स्वत:च्या होणाऱ्या पती वा पत्नीसोबत एकत्र बसून आपली स्वप्न, इच्छा-आकांक्षा, विचार यांची देवाणघेवाण करायला हवी.

दारुडे, बेरोजगार तसंच हुंडा घेणाऱ्या लोभी पुरुषांवर बहिष्कार टाकायला हवा. आईवडिलानीदेखील स्वत:च्या मुलींना विनाकारण माघार घ्यायला भर पाडू नये.

ज्याप्रकारे आपण एखादं रोपटं मुळासकट उखडून दुसऱ्या जागी लावतो, तेव्हा आपण माती, पाणी, हवा या सगळयासाठी अनुकूल आहे की नाही हे पाहतो. जर माती ठिक नसेल, पाणी कमी वा अधिक दिलं, हवा, ऊन व्यवस्थित मिळालं नाही तर रोपटं सुकून जातं. त्याचप्रकारे स्त्रीदेखील लग्नानंतर स्वत:ची मूळ माहेराहून काढून सासररुपी बागेत लावते.

लग्न हा स्त्री स्वातंत्र्याचा शेवट नाहीए. प्रत्येक स्त्रीने स्वत:ची प्रतिभा, आकांक्षा आणि स्वप्न पाहण्याचा पूर्णपणे हक्क आहे. हा तिच्या आयुष्याचा एक अमूल्य ठेवा आहे, तो नष्ट होण्यापासून रोखायला हवा. तिचं व्यक्तिमत्व आणि अस्तित्व मिटविण्याचा कोणालाच हक्क नाहीए.

जर एखादी स्त्री एखाद्या कारणामुळे अशा नरकयातना भोगत असेल, तर तिने कोणाची तरी मदत घ्यायला हवी. स्वत:च्या स्वातंत्र्याबाबत जागरूक असायला हवं. स्त्री ही जननी आहे. तिचा अपमान करणं, तिच्यावर अत्याचार करणं वा तिचा मानसिक, शारीरिक, स्वातंत्र्यांवर पाबंदी लावणं हा सर्वात मोठा गुन्हा असण्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल.

नात्यात जेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात

* सुमन बाजपेयी

राधा आणि अनुजच्या लग्नाला २ वर्षे झाली. राधाला आपल्या नोकरीच्या निमित्ताने बऱ्याचदा बाहेर जावे लागते. वीकेंडला जेव्हा ती घरी असते, तेव्हा तिला काही वेळ एकटीने वाचन करायला किंवा मग आराम करायला आवडते किंवा घरातील बारीकसारीक कामे करण्यात तिचा वेळ जातो.

अनुजला आठवड्यातील ५ दिवस तिला मिस करत असतो. त्यामुळे त्याची अशी इच्छा असते की ते २ दिवस तरी तिने त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. दोघांनी एकत्र आउटिंग करावे, पण राधा ट्रॅव्हलिंग करून थकलेली असल्याने, बाहेर जाण्याच्या नावानेच संतापते.

अनुजला राधाचे हे वागणे हळूहळू खटकू लागले. त्याला असे वाटू लागले की राधा त्याला अव्हॉइड करत आहे. तिला कदाचित तो आवडत नसावा असे त्याला वाटू लागले होते आणि राधाला असे वाटत होते की अनुजला तिची आणि तिच्या इच्छांची मुळीच पर्वा नाही. तो फक्त आपल्या गरजा तिच्यावर लादत होता असे तिला वाटत होते. अशाप्रकारे आपल्या पद्धतीने जोडीदाराविषयी अनुमान काढल्याने त्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहू लागली.

अनेक विवाह हे असे छोटे छोटे गैरसमज दूर न केल्यामुळे तुटतात. छोटासा गैरसमज खूप मोठा व्हायला वेळ लागत नाही. गैरसमज हा एखाद्या जहाजात झालेल्या छोटयाशा छिद्रासमान असतो. तो जर का वेळीच बुजवला गेला नाही तर नाते तुटायला वेळ लागत नाही.

भावना समजून न घेणे

गैरसमज हा एखाद्या काटयासारखा असतो आणि जेव्हा तो आपल्या नात्याला टोचू लागतो, तेव्हा कधी काळी फुलासारखे जपलेले नातेही जखमा करू लागते. जे युगुल कधीकाळी एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते, एकमेकांच्या बाहुपाशात ज्यांना सर्वस्व लाभत होते आणि जे आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होते त्या नात्याला गैरसमजाचा सर्प जेव्हा दंश करतो, तेव्हा नात्यातील गोडवा आणि प्रेम यांना तिरस्कारात बदलण्यात वेळ लागत नाही.

साधारणपणे गैरसमज म्हणजे अशी स्थिती असते, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे किंवा भावना समजून घेण्यास असमर्थ ठरते आणि जेव्हा हे गैरसमज वाढतात, तेव्हा मग भांडणे होऊ लागतात आणि याचा शेवट कधी कधी फार भयंकर असतो.

रिलेशनशिप एक्स्पर्ट अंजना गौड यांच्यानुसार, ‘‘साथीदाराला माझी पर्वा नाही किंवा तो फक्त स्वत:चाच विचार करतो अशा प्रकारचा गैरसमज युगुलांमध्ये निर्माण होणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराच्या प्राथमिकता आणि विचारांना चुकीचे समजणे खूप सोपे असते.‘‘स्वत:च्या दृष्टीने जोडीदाराच्या वागण्याचा अर्थ काढणे किंवा आपले म्हणणे जोडीदाराच्या समोर मांडण्यात इगो आडवा येणे ही खरी समस्या आहे. ही गोष्ट हळूहळू मोठे रूप धारण करते आणि मग गैरसमजाचे कधी कडाक्याच्या भांडणात रूपांतर होते आपल्याला कळतच नाही.’’

कारणे काय आहेत

स्वार्थी असणे : पती आणि पत्नीचे नाते दृढ होण्यासाठी आणि एकमेकांवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून न लपवणे आणि कायम एकमेकांना सांभाळून घेणे. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ असले पाहिजे. गैरसमज तेव्हा निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आत्मकेंद्री असता. फक्त स्वत:चा विचार करता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने अविश्वास दाखवणे स्वाभाविकच ठरते.

माझी पर्वा नाही : पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही असे वाटू शकते की आपल्या जोडीदाराला आपली पर्वा नाही आणि तो आपल्यावर प्रेमही करत नाही. पण वास्तव हे आहे की विवाह हा प्रेम आणि काळजी यांच्याआधारे टिकून असतो. जेव्हा जोडीदाराला आपण इग्नोर होत आहोत किंवा आपली गरज नाही असे वाटू लागते, तेव्हा गैरसमजाचे उंच बुरुज उभे राहतात.

जबाबदाऱ्या पार पाडण्यात कमी पडणे : जेव्हा जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यात कमी पडतो किंवा घेत नाही तेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशावेळी मनात असे प्रश्न उठणे स्वाभाविक असते की त्याचे आता आपल्यावर प्रेमच नाही का? त्याला माझी पर्वाच नाही का? तो जबरदस्ती तर माझ्यासोबत संसार करत नाही ना? असे गैरसमज नात्यांमध्ये येऊ नयेत म्हणून प्रत्येक युगुलाने आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजेत.

काम आणि कमिटमेंट : हल्ली स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरापुरतेच मर्यादित राहिलेले नसून विस्तृत झाले आहे. आता त्या हाउसवाइफच्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पतिने त्यांच्या काम आणि कमिटमेंटची योग्य कदर करणे गरजेचे आहे. बदलणाऱ्या परिस्थितीत पत्नीस सर्वतोपरी सहकार्य करावे. नात्यात आलेला हा बदल स्वीकारणे हे पतिसाठी निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण हीच गोष्ट आजच्या काळात गैरसमजाचे मोठे कारण ठरू पाहत आहे. त्यामुळे दोघानांही आपापल्या कमिटमेंट्स एकमेकांशी डिस्कस करून त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

धोका : हे सर्वात सामान्य कारण आहे. हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा एका जोडीदाराला वाटू लागते की आपल्या पार्टनरचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. आणि हे तो कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधाराशिवायही मानू शकतो. असे ही होऊ शकते की ती गोष्ट खरीही असेल. पण ही गोष्ट जर योग्य रीतीने हाताळली गेली नाही तर लग्न मोडूही शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार अस्वस्थ आहे आणि तुमच्याकडे संशयाने पाहत आहे तेव्हा त्वरित सतर्क व्हा.

दुसऱ्यांचा हस्तक्षेप : जेव्हा दुसरे लोक मग ते तुमचे कुटुंबातील सदस्य असोत की तुमच्या मित्रपरिवारापैकी किंवा नातेवाईक. जर ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू लागले तर गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशा लोकांना दोघांमध्ये भांडणे लावून दिली की आनंद होतो. आणि त्यांचा स्वार्थ साधला जातो. पती आणि पत्नीचे नाते भले कितीही मधुर असो, त्यात किती का प्रेम असो, पण मतभिन्नता आणि भांडणे ही होतातच आणि हे अस्वाभाविकही नाही. असे झाल्यास कोणा तिसऱ्या व्यक्तिस आपल्या समस्या सांगण्यापेक्षा स्वत:च त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे.

सेक्सला प्राधान्य द्या : सेक्स संबंध हे वैवाहिक जीवनातील गैरसमजाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पती पत्नी दोघांचीही इच्छा असते की सेक्स संबंध एन्जॉय करावेत. पण जेव्हा तुम्ही त्यात दुरावा निर्माण करता, आणि तो नात्याला कमकुवत करू लागतो. तुमचा साथीदार तुमच्यावर खुश नसेल किंवा तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर यामुळे नात्यात खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

13-14 व्या वर्षी प्रेम, पालकांनी काय करावे

* किरण आहुजा

असं म्हणतात की प्रेम कुणावरही कोणत्याही वयात होऊ शकतं. ते हृदय आहे, ते कोणाकडे येते. असे किती किस्से वाचले आहेत की अश्याच्या प्रेमात पडलो आणि नंतर हे घडले, ते घडले इत्यादी.

प्रेम ही अशी गोष्ट आहे. माणसांना काय, प्राण्यांनाही प्रेम कळतं. प्रेमाच्या भावनेने, 60 वर्षांच्या वृद्धाचे हृदय किशोरवयीन मुलासारखे धडधडू लागते. अशा परिस्थितीत 14-15 वर्षांचा मुलगा आणि किशोरावस्थेच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवणारी मुलगी यांच्यात हेच प्रेम असेल तर काय म्हणाल?

तौबताउबा, मुला-मुलीच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची माहिती मिळताच घरात वादळ उठते. 13-14 वर्षांचे प्रेम तारुण्यात येऊन लग्नाच्या रूपाने त्यांच्या प्रेमाला कुटुंब आणि समाजाची मान्यता मिळाल्याचे फार क्वचितच ऐकायला मिळते. किशोरवयीन प्रेम यशस्वी का होत नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शालेय जीवनात घडलेले हे प्रेम पुस्तकांच्या पानांपुरतेच बंदिस्त राहते. परिपक्व प्रेम किंवा नातेसंबंधात येणारे वाद मिटवण्याचा प्रयत्न जोडपे करतात, पण किशोरवयात असे काही घडले तर जोडपे एकमेकांपासून दूर राहण्याचे मार्ग शोधू लागतात.

बहुतेक किशोरवयीन प्रेम अयशस्वी

हे खरे आहे की किशोरवयीन प्रेम सुरुवातीला त्याच्या शिखरावर आहे. ना वयाची चिंता ना समाजाच्या बंधनांची भीती. यातून सुटलेला क्वचितच कोणी असेल. प्रत्येकाला त्यांच्या शाळेच्या काळात काहीतरी क्रश असेलच. ज्यांच्यात हिंमत असते, ते आपल्या क्रशचे प्रेमात रूपांतर करतात आणि काहीजण आपली आवड हृदयात बसवून ठेवतात.

किशोरवयीन प्रेम ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. हार्मोनल बदलांमुळे मुलामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल होतात. जसजसे गुप्तांग विकसित होतात तसतसे सेक्सची इच्छा वाढणे स्वाभाविक होते. ही अशी अवस्था आहे जेव्हा तो लहान किंवा प्रौढ नसतो. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण असते आणि हे आकर्षण कुणालाही असू शकते. आपल्या स्वतःच्या वयाने किंवा अगदी मोठ्या असलेल्या कोणाशी तरी.

2002 मध्ये एक चित्रपट आला – ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’. यामध्ये हा विषय बारकाईने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 15 वर्षांचा मुलगा त्याच्या समोरच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या वृद्ध स्त्रीकडे कसा आकर्षित होतो? तो रात्रंदिवस दुर्बिणीने तिची प्रत्येक हालचाल पाहतो. जेव्हा त्या स्त्रीचा प्रियकर त्याच्या घरी येतो आणि जेव्हा ती प्रेयसी आणि ती स्त्री लैंगिक संबंध ठेवते तेव्हा तो तिला पाहतो आणि त्याला राग येतो शेवटी तो त्या स्त्रीला सांगण्याची हिंमत करतो की त्याचे तिच्यावर प्रेम आहे.

ती बाई मुलाला पटवून देण्याचा प्रयत्न करते की ती त्याच्यासाठी योग्य मुलगी नाही. पण तो म्हणतो की त्याला पर्वा नाही, तो फक्त तिच्यावर प्रेम करतो.

शेवटी, ती स्त्री त्याला स्पष्टपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की हे फक्त विरुद्ध लिंगाबद्दलचे आकर्षण आहे. प्रेम नाही. फक्त 2 मिनिटे एक आनंद आहे. स्त्री त्याला स्वतःच्या हातांनी हस्तमैथुन करून भ्रमातून बाहेर काढण्याचा आणि वास्तवाचा सामना करण्याचा प्रयत्न करते.

चित्रपटात हा मुलगा भावनिक दाखवण्यात आला असून वयाच्या १५ व्या वर्षी मन परिपक्व होत नाही हे दाखवण्यात आले आहे. अनेक गोष्टी त्याच्या आकलनापलीकडच्या असतात. जेव्हा एखादी स्त्री असे करते तेव्हा तिला खूप दुखापत होते आणि तिच्या हातातील नस कापते.

हा चित्रपट होता, पण प्रत्यक्षातही घडतो. हे वय असे असते की मनात प्रेमाची ओढ असते. समजल्यानंतरही मला प्रकरण समजत नाही. प्रेमाची नशा मनाला भिडते. या वयातील लोकांसाठी ही एक कठीण वेळ आहे जेव्हा त्यांना स्वतःला समजत नाही किंवा त्यांना काय हवे आहे आणि त्यांना काय हवे आहे? तुम्हाला कोणत्या गंतव्यस्थानी जायचे आहे?

बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनवणे हे स्टेप सिम्बॉल बनत चालले आहे

आजची आधुनिक जीवनशैली आणि बदलती जीवनशैली यामुळे या गोष्टीला अधिक चालना मिळाली आहे. BBPM शाळेतील इयत्ता 7वीतील नम्रता म्हणाली, “माझ्या बहुतेक मित्रांना बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आहेत. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल आपापसात बोलतो. अशा परिस्थितीत बॉयफ्रेंड नसल्यामुळे मला अनेकवेळा लाज वाटायची. म्हणूनच मी बॉयफ्रेंडही बनवला आहे. आता मी पण मोठ्या अभिमानाने कुठेतरी जाते आणि माझ्या बॉयफ्रेंडसोबत मित्रांच्या पार्टीत जाते.

यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. आज गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड हे स्टेटस सिम्बॉल बनले आहे आणि जो याच्या पलीकडे आहे तो निगोशिएटर मानला जातो. मुलींना वाटतं की माझ्यात आकर्षण नाही, म्हणूनच मुलं माझ्याकडे बघत नाहीत.

कारणे काय आहेत

* कुटुंबातील मुलांना पुरेसा वेळ न देणे. अनेकदा आई-वडील दोघेही नोकरी करत असतात आणि विभक्त कुटुंबामुळे मूल घरात एकटेच राहते. मुलामध्ये अतृप्त कुतूहल निर्माण होते.

* मुलांना त्या कुतूहलांची उत्तरे हवी असतात पण पालकांकडे ना वेळ असतो ना उत्तरे, ना मुलांचे ऐकण्याचा संयम.

* बदलत्या जीवनशैलीमुळे मुले तणावग्रस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत, स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी ते आपुलकीचा आधार शोधू लागतात.

* या वयात उत्साह आणि उत्साह खूप जास्त असतो, वरून खाण्याच्या खाण्याच्या सवयी आणि जास्त ऊर्जा त्यांच्यात सेक्सची इच्छा वाढवते.

* अनेक वेळा भावनिकतेच्या आहारी गेलेली किशोरवयीन मुले निकालाची चिंता न करता, कोणते पाऊल, कधी उचलायचे हे लगेच ठरवून काहीही बोलू शकत नाहीत. कधीकधी मुले फसवणूक किंवा प्रेमात मन मोडणे सहन करू शकत नाहीत आणि ते मानसिकदृष्ट्या तुटलेले असतात. अशा परिस्थितीत त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी किंवा त्यांचे मानसिक संतुलन गमावण्यापूर्वी त्यांची काळजी घ्या. त्यासाठी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

* जर मुलाने चुकीच्या मार्गावर चालणे सुरू केले असेल, तर ही वेळ त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे त्याला प्रेमाने समजावून सांगितले जाऊ शकते. जर हा वेळ वाया गेला किंवा करिअरमध्ये अडथळा आला तर तो त्याच्या सर्व समवयस्कांच्या मागे असेल आणि आयुष्यात काहीही होणार नाही. तुमच्या बोलण्याचा नक्कीच मुलावर परिणाम होईल. फक्त त्याच्यासोबत राहा आणि तुम्ही नेहमी त्याच्या पाठीशी आहात याची जाणीव करून देत रहा. त्यांच्यापासून काहीही लपवू नका.

* जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचे मूल एखाद्याच्या प्रेमात पडले आहे, तेव्हा त्याला समजावून सांगा की हे लहान वयातील प्रेम आहे. हे फक्त एक आकर्षण आहे जे कालांतराने नाहीसे होऊ शकते.

* या वयात मुलं खूप संवेदनशील आणि भावनिक असतात, त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुमचे हृदय प्रेमात मोडते तेव्हा त्यांना तुच्छ लेखू नका. त्यांना मित्रांसारखे वागवा. त्यांच्या दु:खाला आपले दु:ख मानून, त्यांना आलिंगन द्या.

* मुलाच्या प्रेयसी किंवा बॉयफ्रेंडबद्दल संपूर्ण माहिती मिळवा आणि त्यांना घरी बोलावून त्यांच्याशी बोलण्याचा दृष्टिकोन अंगीकारा, ज्यामध्ये तुमच्या मुलाला तुमच्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही आणि तो सर्व काही शेअर करतो.

* शेवटी मी हेच सांगू इच्छितो की पालकांनी केलेला छोटासा प्रयत्न मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतो. मुलांच्या नाजूक वयाचा हा टर्निंग पॉइंट आहे. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची, त्यांना मार्गदर्शन करण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे.

नाजूक आहेत कमकुवत नाही

* रोहित

२१ व्या शतकातील २०२२ या वर्षात आपण पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी बरेच बदल झाले, पण एक गोष्ट जशीच्या तशी आहे आणि ती म्हणजे समाजातील महिलांची स्थिती. हजारो वर्षांपासून जगात एक रुढीवादी परंपरा आपली मुळे घट्ट रोवून आहे, जी असे सांगते की, पौराणिक काळापासूनच देव आणि निसर्गाने महिला, पुरुषांमध्ये भेदभाव केला आहे. यामुळे पुरुषांचे काम वेगळे आणि महिलांचे काम वेगळे आहे. ही प्रवृत्ती नेहमीच असे सांगत आली आहे की, आदि मानवासापासून जेव्हा कधी जेवण गोळा करण्यासारखे अवघड काम करावे लागले, मग ती जुन्या काळात शिकार करणे असो किंवा आजच्या युगात बाहेर पडून कुटुंबासाठी पैसे कमावणे असो, त्यासाठी पुरुषांनाच सक्षम ठरवण्यात आले आहे आणि शारीरिकदृष्टया कमकुवत असल्यामुळे महिलांच्या वाटयाला घरातली कामे आली आहेत.

या लैंगिक भेदामुळेच महिलांचे बाहेर पडून काम न करण्यामागचे कारण त्यांचा शारीरिक कमकुवतपणा असल्याचे सांगण्यात आले. त्यांची शारीरिक ठेवण पुरुषांच्या तुलनेत दुबळी किंवा कमकुवत आणि अशुद्ध ठरवण्यात आली. त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले. त्या पुरुषांच्या तुलनेत शारीरिकदृष्टया कमकुवत आहेत, बाहेरचे काम करण्यासाठी योग्य नाहीत आणि कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाहीत, याची जाणीव त्यांची त्यांनाच करून देण्यात आली.

हेच कारण आहे की, आज लिंगावर आधारित असमानतेवर जगभरात वादविवादाच्या फैरी झोडत आहेत. महिलांचा शारीरिक दुबळेपणा हा नेहमीच या वादातील एक मोठा भाग राहिला आहे. याच

वादादरम्यान संशोधकांनी दक्षिण अमेरिकेतील एंडिज पर्वतरांगेत ९,००० वर्षांपूर्वीच्या अशा एका जागेचा शोध लावला जिथे महिला शिकाऱ्यांना दफन केले जात असे. या शोधामुळे प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या पुरुषप्रधान वर्चस्वाला आव्हान मिळाले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाशी जोडले गेलेले आणि या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिक असलेले रँडी हास यांचे म्हणणे आहे की, प्राचीन काळातील दफनविधी प्रक्रियेचे हे संशोधन आणि विश्लेषण फक्त पुरुषच शिकारी असण्याचे पुरुषांचे वर्चस्व मोडणारे आहे.

कुशल शिकारी

या संशोधनात यावर शिक्कामोर्तब झाले आहे की, प्राचीन काळात पुरुषांप्रमाणेच महिलाही घराबाहेर पडून शिकार करायच्या. त्यावेळी बाहेर पडून शिकार करणे हे पूर्णपणे श्रमावर आधारित होते, लिंगभेदावर नाही.

२०१८ मध्ये पेरूच्या पर्वतांवरील उंचीवर पुरातत्त्व उत्खननादरम्यान संशोधकांनी जुन्या शिकाऱ्यांना दफन केलेल्या प्राचीन जागेचा शोध लावला होता. तेथे शिकारीची आणि प्राण्यांना कापण्याची धारदार अवजारे सापडली होती. त्याच ठिकाणी ९,००० वर्षांपूर्वी दफन केलेले मानवी सांगाडे सापडले. त्यांची हाडे आणि दातांच्या तपासणीनंतर ते महिलांचे सांगाडे असल्याचा निष्कर्ष निघाला.

 

उत्तरेकडील आणि दक्षिणी अमेरिकेत सापडलेल्या अशा १०७ प्राचीन ठिकाणांच्या संशोधनानंतर संशोधकांनी ४२९ सांगाडयांची ओळख पटवली. संशोधकांनी सांगितले की, यातील एकूण २७ शिकाऱ्यांचे सांगाडे होते, ज्यात ११ महिला आणि १६ पुरुष होते. सांगाडे आणि संशोधकांनी लावलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, प्राचीन काळात महिलाही शिकार करायच्या. इतकेच नव्हे तर शिकारीच्या कामात पुरुषांच्या तुलनेत महिलाही जवळपास बरोबरीतच होत्या. संशोधनानुसार संशोधकांचे असे म्हणणे आहे की, त्या काळात शिकारीच्या कामात महिला, पुरुषांचे समान वर्चस्व होते. महिलांचा शिकारीत सहभाग घेण्याचा वाटा जवळपास ३०-५० टक्के पर्यंत होता. उत्खननात सापडलेल्या सांगाडयांच्या आधारावर असा निष्कर्ष निघतो की, असे कोणतेच निर्बंध (नैसर्गिक किंवा दैवी) त्या काळात महिलांवर नव्हते, ज्या आधारे असे म्हणता येईल की, तेव्हा कामांची विभागणी होत असे.

हा शोध लैंगिक समानतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचे मोठे कारण महिला आणि पुरुषांमध्ये कामाच्या विभागणीवरून पूर्वापार चालत आलेला वाद हे आहे. या संशोधनात जी महत्त्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे त्या काळात महिला पूर्णपणे स्वावलंबी होत्या. स्वत:चे निर्णय स्वत:च घेत होत्या. एका महिलेचे शिकारी असणे हेच सांगते की, ती आपली जमात किंवा कुटुंबासाठी बाहेर पडून काम करत होती. स्वत:च्या मुलांचे पोट स्वत: भरू शकत

होती. तिला पुरुषाच्या खांद्याच्या आधाराची गरज नव्हती. शिकार करून आणलेल्या मांसाचे वाटप कशा प्रकारे करायचे आहे, किती करायचे आहे आणि ते कोणाला द्यायचे आहे, हे सर्व निर्णय महिलाच घेत असत. हे स्वाभाविक आहे की, जो आपल्या जमातीचे पोट भरतो त्याला त्या जमातीवर वर्चस्व गाजवण्याचा अधिकार असतो. अशा वेळी जर महिला आणि पुरुष बरोबरीने कुटुंबाचे पालनपोषण करत असतील तर तिथे दोघांना समान अधिकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिकारी होण्यामागचा एक अर्थ असाही आहे की, त्या काळातील महिलांकडे आपल्या सुरक्षेसाठी लागणारी हत्यारे होती. ही हत्यारे त्यांना सुरक्षा मिळवून देण्यासोबतच ती त्यांच्याकडील बहुमूल्य साधनांपैकी एक होती. यातून कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो, जसे की, ज्या पुरुषी समाजात महिलांना स्वत:कडे संपत्ती ठेवण्याचा अधिकार नसेल, पण कदाचित त्या काळात महिलांकडेच मौल्यवान संपत्ती म्हणून पाहिले जात असेल. त्यामुळेच त्या काळातील तो एक असा समाज असेल जिथे महिलांकडे संपत्तीच्या रूपात हत्यारांचे असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.

महिला शारीरिकदृष्टया दुबळया किंवा कमकुवत असतात, त्यामुळेच त्या घराबाहेरची कामे करण्यासाठी योग्य नाहीत, असा जो तर्क पुरुषप्रधान संस्कृती पूर्वापारपासून लावत आली आहे त्या तर्काला या संशोधनाने मोठा धक्का दिला आहे. शिकारीसारख्या कामासाठी आवश्यक असलेली शारीरिक चपळता, ताकद, हिंमत महिलांमध्ये होती, सोबतच त्या हे काम करण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत कुठेच कमी नव्हत्या. अशा वेळी प्रश्न असा उपस्थित होतो की, जर प्राचीन काळात महिला शारीरिकदृष्टया पुरुषांच्या बरोबरीने काम करत होत्या तर मग आज याच्या अगदी उलट अशी त्या शारीरिकदृष्टया कमकुवत असल्याची प्रतिमा समाजात कशी रूढ झाली?

धर्माचे निर्बंध

जगातील कितीतरी इतिहासकारांनी महिलांवरील पुरुषांच्या वर्चस्वाशी संबंधित असलेले अनेक शोध यापूर्वी लावले आहेत. ज्यात त्यांनी असे सांगितले की, आदियुगात अशा समाजाचे अस्तित्व होते जिथे कुठलीही गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य महिलांना होते. परंतु या शोधांवर सर्वात जास्त कठोर आणि थेट हल्ला ज्या लोकांनी केला ते धर्मकर्माशी जोडलेले रुढीवादी लोक होते. त्यांच्या मतानुसार जग देवाने बनवले आहे आणि महिलांच्या शारीरिक ठेवणीला कमकुवत तर पुरुषांना बळकट करून या जगाचे संतुलन साधण्यात आले आहे. त्यांच्या या तर्कामुळेच पुरुषांना संरक्षक आणि महिलांना अबलेचा दर्जा देण्यात आला.

हे पूर्णपणे महिलांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रत्येक धर्मातील त्या कथांना, ग्रंथांना प्रमाण मानण्यात येऊ लागले जे महिलांना आदर्श स्त्री किंवा पतिव्रता बनण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर दबाब आणणारे होते. महिलांनी पतिव्रता असणे केवळ वंशाच्या शुद्धीसाठीच नव्हे तर परपुरुषाशी तिने शारीरिक संबंध ठेवू नयेत यासाठीही गरजेचे मानले जाऊ लागले.

धर्मदेखील आहे जबाबदार

हिंदू समाजातील ग्रंथ, पौराणिक कथा, रामायण, महाभारत, गीता, वेद आणि तत्सम संबंधित कथांमध्ये सामूहिकरित्या सांगण्यात आले आहे की, महिलांनी स्वतंत्र होता कामा नये.

मनुस्मृती ज्याला सरंजामशाहीचे संविधान मानले जाते त्यात महिला पुरुषांच्या तुलनेत कमकुवत आणि दुय्यम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जवळपास सर्वच संघटित धर्मग्रंथांमध्ये पृथ्वीवरील संतुलनासाठी लिंग भेदभाव हे प्रमाण मानले गेले. ज्या पौराणिक ग्रंथांमधून महिला स्वतंत्र असल्याचे आणि सक्षम असल्याचे समोर आले तिथे ते ग्रंथ किंवा अशा सक्षम महिलेला राक्षसीन, कुरूप समजण्यात आले. त्यांच्याऐवजी घाबरलेल्या, भित्र्या, कमकुवत, गृहिणी असलेल्या महिलेलाच आदर्श मानण्यात आले

या सर्व बुरसटलेल्या विचारसरणीमुळे महिलांना घराबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले, सोबतच राहणीमान, वागणे-बोलणे, हसणे, यौन शुचिता अशा सर्वच बाबतीत तिच्यावर निर्बंध लादण्यात आले. याचे दूरगामी परिणाम असे झाले की, महिलांकडून जबरदस्तीने किंवा त्यांना आपले म्हणणे पटवून देऊन त्यांच्याकडून यासाठी परवानगी घेण्यात आली की, त्यांचे व्यक्तिमत्त्व निसर्गत:च पुरुषांपेक्षा दुबळे, कमकुवत आहे. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी पुरुषांचा आधार घ्यायला हवा.

असो, पण या संशोधनातून २ गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे महिलांचे व्यक्तिमत्त्व नैसर्गिकरित्या पुरुषांपेक्षा कमकुवत नाही आणि दुसरे म्हणजे धर्मात महिलांसाठी लिहून ठेवण्यात आलेल्या सर्व गोष्टी या ईश्वराच्या मुखातून निघालेली अमरवाणी नाही तर धर्मातील पुरुष ठेकेदारांनी अर्ध्या लोकसंख्येकडून फुकटात श्रमाची कामे करून घेण्यासाठी आणि भोगविलासाचे जीवन जगण्यासाठी करून ठेवलेली तरतूद आहे.

आधीही नव्हती आणि आताही कमकुवत नाही

उत्तराखंडातील पौडी जिल्ह्यातील जलथा गावात राहणाऱ्या ४४ वर्षीय बसंती भंडारीचे गाव कोटद्वार शहरापासून खूप दूर, दुर्गम भागात आहे. या गावातील जनजीवन त्याच्या जवळ असलेल्या इतर भागातील गावांसारखेच खूप अवघड आहे. पहाडी, दुर्गम भाग असल्यामुळे आजही लोकांना उदरनिर्वाहासाठी बऱ्याच लांबवर शेती करण्यासाठी जावे लागते. त्यासाठी बसंती देवी यांना पाळीव जनावरांचे वजनदार शेण गोळा करून त्याचे खत बनवून ते डोक्यावरून २-३ किलोमीटरपर्यंत घेऊन जावे लागते. असे काम करण्यासाठी हिंमत आणि प्रचंड ताकदीची गरज असते.

बसंती भंडारी सांगतात, ‘‘माझे अर्धे आयुष्य असेच मेहनतीच्या कामात गेले. पर्यटकांना हे पर्वत आवडतात, पण मी नेहमीच येथे खूप काबाडकष्ट केले.

‘‘इतके अवजड वजन डोक्यावर वाहून नेण्याबाबत त्यांनी सांगितले की, पुरुषांचे काम फक्त शेतात बैलांना हाकून नांगर चालवण्यापुरतेच आहे. महिलांनाच पेरणी, खत घालणे, कापणी, गवत आणणे, दूरवरून पाणी, लाकडे आणणे, अशी श्रमाची कामे करावी लागतात. तरीही त्याची दखल कुठेच घेतली जात नाही. खरंतर जास्त मेहनतीची कामे महिलाच करतात.

नाही आहोत कमकुवत

असे फक्त खेडोपाडयात पाहायला मिळत नाही. दिल्ली शहरात मजुरी करणाऱ्या २६ वर्षीय मुनमुन देवीचे गाव उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात आहे. लग्नाला वर्ष झाल्यानंतर त्या ४ वर्षांपूर्वी आपल्या पतीसह दिल्ली शहरात आल्या होत्या. मुनमुन यांना ३ मुले आहेत. या ३ मुलांमध्ये १ मुलगी असून ती दिड वर्षांची तर मुलगा २ वर्षांचा आहे. मोठा मुलगा ३ वर्षांचा आहे. दिल्लीतील बलजीत नगर परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे, तिथे सरकारी ठेकेदाराकडे काम करताना मुनमुन एका हाताने आपल्या ३ वर्षांच्या रडणाऱ्या मुलाला कसेबसे आपल्या कमरेवर पकडून डोक्यावर सिमेंटने भरलेले घमेले घेऊन जाते.

मुनमुन सांगते की, मी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पतीसोबत मजुरी करते. आमच्यातील बहुतांश महिलांचे काम डोक्यावरून विटा उचलून नेणे, घमेल्यातून सिमेंट आणणे, खड्डा खोदणे असे असते. या कामासाठी आम्हाला तितकीच ताकद लागते जितकी एका पुरुषाला हे काम करण्यासाठी लागेल. असे असताना आम्ही कमकुवत कशा काय? अनेकदा आम्हाला कामादरम्यान मुलांना दूधही पाजावे लागते.’’

युनायटेड नेशनच्या एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय महिलांना एकूण कामांपैकी ५१ टक्के कामांचा मोबदला मिळत नाही. दुसरीकडे जगभरात घरातील ७५ टक्के काम महिला कोणताच मोबदला न घेता करतात. तरीही जगातील ६० टक्के महिला किंवा मुली भुकेल्या असतात. त्यांच्यात भूकबळीचे प्रमाण अधिक असते.

एका अभ्यासानुसार, आफ्रिका आणि आशियात एकूण कामगारांपैकी जवळपास ६० टक्के कामगार महिला असतात आणि तरीही पुरूषप्रधान समाजात त्यांना शेतकऱ्याचा दर्जाही मिळत नाही.

अशा वेळी हे स्पष्ट आहे की, महिला पूर्वीही कमकुवत नव्हत्या आणि आजही नाहीत. त्या शारीरिकदृष्टया सक्षम आहेत. पुरुषांप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. फक्त समाजाच्या डोक्यातून महिलांना कमकुवत समजण्याच्या संकुचित विचाराला कायमची तिलांजली देण्याची गरज आहे.

 

ब्रेकअपपासून मुक्ती मिळविण्याचे ५ उपाय

* रितू वर्मा

जेव्हा अंशूला समजले की तिची भाची आरवीचे ५ वर्षं जुने नाते तुटले आहे, तेव्हा ती खूप घाबरली. आरवी आणि कबीरची जोडी किती छान होती. दोघेही मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिकत होते. दोन्ही कुटुंबांनी हे नाते स्वीकारले होते, फक्त सामाजिक मान्यता मिळणे बाकी होते. अंशु अतिशय दु:खी मनाने तिच्या बहिणीच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की आरवी अगदी सामान्य दिसत होती आणि खदखदा हसत होती.

अंशूला मनाशी वाटले की आजकालच्या मुलांचे प्रेम पण काय प्रेम आहे. हवं तेव्हा नात्यात पडायचे आणि हवं तेव्हा ब्रेकअप करायचे. ही आजकालची नाती पण काय नाती आहेत? सर्व   केवळ शारीरिक पातळीवरच आधारित आहेत.

अंशूला तिचा तो काळ आठवला जेव्हा तिचे प्रवेशसोबतचे नाते तुटले होते. पूर्ण दोन वर्षे ती या गर्तेतून बाहेर पडू शकली नव्हती. तिने आपले नवीन नाते मोठया अवघडपणे स्वीकारले होते? कधी-कधी अंशूला वाटतं की आजपर्यंत ती आपल्या पतीला स्वीकारू शकली नाही. प्रवेशसोबतच्या त्या तुटलेल्या नात्याची सल अजूनही कायम आहे.

रात्री आरवीने अंशूला मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘मावशी, तू आलीस हे खूप चांगले झाले. माझे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे आहे, म्हणूनच तर मी हा निर्णय घेऊ शकले.’’

पण अंशूला वाटले की खरंतर आरवीला कधीच कबीरशी प्रेम जडले नव्हते. पण आरवीच्या म्हणण्यानुसार गुदमरल्यासारखे जगण्याऐवजी जर तुमचे जमत नसेल तर ब्रेकअप करून आगेकूच का करू नये.

दुसरीकडे जेव्हा मानसीचे ऋषीसोबतचे २ वर्षे जुने नाते तुटले तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली. आपल्या बरोबर तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे जगणेही कठीण केले होते, कोणतेही नाते जबरदस्तीने टिकत नसते. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी संबंध ठेवू इच्छित नसेल तर गयावया करण्याऐवजी जर तुम्ही सन्मानाने पुढे वाटचाल केलीत तर ते केवळ तुमच्या जोडीदारासाठीच नाही तर तुमच्यासाठीही चांगले होईल.

जर आपण वैयक्तिक जीवनात या छोटया-छोटया व्यावहारिक टिप्स अवलंबल्या तर खूप लवकर आपण परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करू शकता :

हुतात्मा भावनेने फिरू नका : ब्रेकअप झाला म्हणजे तुम्ही २४ तास मुळूमुळू रडक्या तोंडाने फिरत राहावे असे नव्हे. हा जीवनाचा शेवट नाही. आयुष्य तुम्हाला पुन्हा आनंद मिळवण्याची संधी देत आहे. तुमची ओळख ही तुमच्या स्वत:मुळे आहे. अनेकवेळा आपण नात्यांमध्येच आपले अस्तित्व शोधू लागतो. म्हणूनच आपल्याला कोणत्याही किंमतीत ब्रेकअप करायचे नसते. १-२ दिवस मूड खराब होणे स्वाभाविक आहे, परंतु त्या वाईट नातेसंबंधाच्या आठवणी च्युइंगमप्रमाणे दीर्घकाळ ओढत बसू नये.

हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा : एका अपघाताचा अर्थ तुम्ही आयुष्य जगणे थांबवणे असा होत नाही. हृदयाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा. प्रत्येक रात्रीनंतर एक सकाळ नक्कीच असते. एखादा अनुभव वाईट असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आशेच्या किरणापासून तोंड फिरवावे.

कामात मन लावा : काम हे प्रत्येक आजारावरचे औषध असते, म्हणून स्वत:ला कामात बुडवून घ्या, अर्ध्याहून अधिक दु:ख तर असेच गायब होईल आणि जितके जास्त काम तुम्ही मन लावून कराल तितकी तुमची प्रतिभा अधिक सुधारेल आणि प्रगतीचे मार्ग उघडतील.

आशा सोडू नका : ब्रेकअप झाल्यानंतर लोक निराशेच्या गर्तेत गेल्याचे अनेकदा पाहायला मिळते. एका गुदमरणाऱ्या नात्यात सर्व आयुष्य निराशेत घालवण्यापेक्षा ब्रेकअप करून नव्याने सुरुवात करणे चांगले आहे, आशेचा पदर धरून ठेवा आणि ब्रेकअपनंतर नवीन सुरुवात करा.

आयुष्य सुंदर आहे : आयुष्य सुंदर आहे आणि ब्रेकअपमुळे त्याच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या ब्रेकअपमधून काहीतरी शिका आणि त्याच चुका पुन्हा करू नका.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्रेकअप म्हणजे पूर्णविराम नव्हे, तर नात्याची नवी सुरुवात असते.

पोटगी कायदा काय म्हणतो

* गरिमा पंकज

लग्न हे प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. २ लोक एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि एकमेकांचा आधार बनतात, परंतु जेव्हा नात्यात प्रेम कमी आणि गुदमरणे जास्त होते तेव्हा अशा नात्यापासून वेगळे होणेच शहाणपणाचे मानले जाते. पण वेगळे झाल्यानंतरचा रस्ता ही तितकासा सोपा नाही.

पती-पत्नीचे नाते तुटल्यानंतर अनेकदा महिलांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. असे घडते कारण महिला सहसा आर्थिक गरजांसाठी त्यांच्या पुरुष जोडीदारावर अवलंबून असतात. वाद

पत्नी नोकरी करत नसल्यास, वाद झाल्यास न्यायालय महिलेचे वय, शैक्षणिक पात्रता, कमाईची क्षमता लक्षात घेऊन पोटगीचा निर्णय देते. मुलाची देखभाल करण्यासाठी वडिलांना वेगळे पैसे द्यावे लागतात.

सर्वोच्च न्यायालयाने मासिक पोटगीची मर्यादा निश्चिंत केली आहे. ती पतीच्या एकूण पगाराच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. पतीच्या पगारात बदल झाल्यास ती वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते.

परंतु अनेक वेळा असे दिसून येते की पती पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ करतात आणि कसेही करून ही रक्कम कमीत कमी करून घेण्याचा प्रयत्न करतात. आपले उत्पन्न खूपच कमी असल्याचे ते न्यायालयासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

भत्ता देण्यास नकार

हैदराबादमधील नुकतेच घडलेले एक प्रकरण लक्षात घेण्यासारखे आहे. एका डॉक्टरने आपल्या वेगळया राहत असलेल्या पत्नीला दरमहा १५,००० रुपये पोटगी देण्याच्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की या दोघांचे १६ ऑगस्ट २०१३ रोजी लग्न झाले होते आणि दोघांना १ अपत्यही आहे. मुलाच्या जन्मानंतर पती-पत्नीमध्ये काही मतभेद निर्माण झाले. पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणासह पोटगीसाठी अर्ज दाखल केला. पतीला दरमहा 80 हजार रुपये पगार आणि घर व शेतजमिनीतून 2 लाख रुपये भाडयाचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा पत्नीने केला होता. तिने स्वत:च्या आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी मासिक रुपये 1.10 लाखांची मागणी केली.

कौटुंबिक न्यायालयाने मुख्य याचिकेचा निकाल लागेपर्यंत पत्नी आणि मुलाला दरमहा रुपये १५ हजार पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयाविरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की आजच्या काळात केवळ रुपये 15 हजारात मुलाचे संगोपन करणे शक्य आहे का? लोकांच्या क्षुद्र प्रवृत्तीकडे लक्ष वेधत खंडपीठाने सांगितले की आजकाल बायकांनी भरणपोषणाची मागणी केल्यावर नवरे म्हणतात की ते आर्थिक संकटातून जात आहेत किंवा गरीब झाले आहेत. हे योग्य नाही. लग्नाच्या बाबतीत विचित्र ढोंगीपणा आपल्या देशात पाहायला मिळतो. जेव्हा नातेसंबंध जोडण्याची गोष्ट येते तेव्हा मुलाचे उत्पन्न आणि राहणीमान शक्य तितके फुगवून सांगितले जाते, परंतु जेव्हा लग्नानंतर बेबनाव होऊ लागतो आणि मुलाला पत्नीपासून मुक्त व्हावेसे वाटू लागते तेव्हा परिस्थिती उलट होते. कोर्टात पती स्वत:ला अधिकाधिक असहाय्य आणि गरीब सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ही दुहेरी मानसिकता अनेक महिला आणि त्यांच्या मुलांसाठी यातनांचे कारण बनते.

अलीकडेच दिल्लीतील रोहिणी येथील न्यायालयात यासंबंधीच्या एका प्रकरणाची सुनावणी झाली. तक्रारदार ही ३ वर्षाच्या मुलाची आई आहे. ती तिच्या पतीपासून वेगळी राहते आणि तिच्या पालकांच्या खर्चावर उदरनिर्वाह करत आहे. तिचा पती भोपाळचा मोठा व्यापारी आहे. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम आहे.

मात्र जेव्हा पत्नी आणि मुलाला पोटगी देण्याची वेळ आली तेव्हा प्रतिवादी पतीने आपली आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे सांगून आपल्या नावाने घेतलेले संगणक आणि लॅपटॉपही आपल्या आईच्या नावे हस्तांतरित केले. पूर्वी त्याच्या मालकीची असलेली कंपनीदेखील त्याने त्याच्या आईच्या नावावर केली होती जेणेकरून त्याला पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलाचा देखभालीचा खर्च टाळता यावा. त्याने तात्काळ कंपनीचा राजीनामा दिला आणि आता त्याच्या नावावर एक पैसाही नाही.

त्याच्या या वागण्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले की लोकांच्या या दुहेरी मानसिकतेला काय म्हणावे, ते स्वत:च्या मुलाचा खर्च उचलण्यास तयार नाहीत. नंतर न्यायालयाने पतीला कनिष्ठ न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगीची रक्कम पत्नी आणि मुलाला देण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने महिला आणि तिच्या अजाण बाळासाठी १५ हजाराची अंतरिम रक्कम देण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला पतीने सत्र न्यायालयात आव्हान दिले असता सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

यासारखी प्रकरणे दर्शवतात की काही लोकांसाठी नातेसंबंधांचे काहीही महत्त्व नसते. त्यांच्यासाठी पैशांपेक्षा काहीही महत्वाचे नाही. पैसे वाचवण्यासाठी हे लोक प्रामाणिकपणा बाजूला ठेवून कितीही खालच्या स्तरावर जाऊ शकतात. याचा फटका मुलाला सहन करावा लागतो.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या गोष्टी लक्षात घेऊन नुकताच सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वादाच्या प्रकरणात पोटगीची रक्कम ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की कोर्टातील कामकाजादरम्यान दोन्ही पक्षांना त्यांची मालमत्ता आणि दायित्वे यांचा खुलासा अनिवार्यपणे करावा लागेल. तसेच न्यायालयात अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासूनच पोटगीचा निर्णय घेतला जाईल.

सुप्रीम कोर्टाने सांगितले की देखभालीची रक्कम दोन्ही पक्षांच्या स्थितीवर अवलंबून आहे. पत्नीची गरज, मुलांचे शिक्षण, पत्नीचा व्यावसायिक अभ्यास, तिचे उत्पन्न, नोकरी, पतीची स्थिती असे सर्व मुद्दे पहावे लागतील. दोन्ही पक्षांची नोकरी आणि वयही पाहावे लागेल. या आधारे महिलेला किती पैसे द्यायचे हे ठरवले जाईल.

अनेकवेळा असेही घडते की पतीच्या क्षमतेपेक्षा जास्त पोटगीची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत जर पतीने हे सिद्ध केले की तो इतकेही कमावत नाही की स्वत:ची काळजी घेऊ शकेल किंवा पत्नीचे उत्पन्न चांगले आहे किंवा तिने दुसरे लग्न केले आहे, पुरुषाचा त्याग केला आहे किंवा इतर पुरुषाशी तिने संबंध ठेवला आहे, तर त्याला उदरनिर्वाह खर्च द्यावा लागणार नाही. स्वत:च्या कमी उत्पन्नाचा किंवा तुमच्या पत्नीच्या पुरेशा उत्पन्नाचा पुरावा सादर केला तरीही पोटगीचा बोजा पडणार  नाही.

फेब्रुवारी, २०१८ मध्ये पंजाब-हरियाणा हायकोर्टाने पोटगीबाबत असाच एक आदेश जारी करताना हे स्पष्ट केले होते की जर पत्नी स्वत:ला सांभाळू शकत असेल तर ती पतीकडून पोटगी मिळविण्यासाठी पात्र नाही म्हणजेच पतीने उच्च न्यायालयाला सांगितले होते की याचिकाकर्ता ही सरकारी शिक्षिका असून ऑक्टोबर २०११ मध्ये तिचा पगार ३२ हजार रुपये होता. या आधारावर न्यायालयाने तिची पोटगीची मागणी फेटाळून लावली.

नाते तुटल्यानंतरही एकमेकांप्रती माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपणे आवश्यक आहे विशेषत: मुले असताना, कारण या गोष्टींचा परिणाम कुठे न कुठेतरी मुलांच्या भविष्यावर होत असतो.

 

प्रेमात ‘पर्सनल स्पेस’ आवश्यक आहे

* सलोनी उपाध्याय

आपल्या जोडीदाराने त्याची काळजी घ्यावी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला साथ द्यावी, प्रत्येक गोष्ट त्याच्यासोबत शेअर करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण तुम्हाला माहित आहे का की प्रेमासोबत जोडीदाराला वैयक्तिक जागा देणंही आवश्यक आहे, तरच तुमचं तुमच्या जोडीदारासोबत चांगलं बॉन्डिंग होतं.

आकाश आणि सौम्याचा प्रेमविवाह झाला. सौम्या नोकरी करायची तर आकाशचा स्वतःचा व्यवसाय होता. आकाशला सौम्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता. ऑफिसच्या कामामुळे सौम्या फोनवर जास्त बिझी असायची. अशा स्थितीत आकाशला वाईट वाटलं. शेवटी, त्याला सौम्यावर संशय येऊ लागला. आकाश त्याच्या मेसेज, कॉल्सचे तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे. सौम्याचा फोन हातात आला की तो कॉल आणि मेसेज चेक करू लागला. एके दिवशी सौम्याने आकाशला फोन चेक करताना पाहिले. ही गोष्ट सौम्यासाठी खूप वाईट आहे. पण तो काहीच बोलला नाही.

हळू हळू सौम्याच्या लक्षात आले की आकाश तिच्या सहकलाकारांची आणि बॉसची खूप चौकशी करतो. कोणाचा फोन होता, कोणाशी बोललात… वगैरे वगैरे. ती ऑफिसमध्ये काय काम करते, ती कोणाला भेटते, हे सगळे तपशील जाणून घेण्यासाठी आकाश खूप उत्सुक झाला.

आकाशच्या या वागण्याने सौम्याला खूप वाईट वाटले. तिला आकाशला समजवायचं होतं की ऑफिसमध्ये राहून ती आकाशशी बोलू शकत नाही. तिथे त्याच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, लग्नाबाहेरही त्याचा संसार आहे. प्रेमाचा अर्थ असा नाही की वैयक्तिक जागा संपली आहे. पण आकाश झा यांना समजले नाही. परिणाम असा झाला की 3 महिन्यांतच त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि त्यांचे लग्न तुटले.

आकाश आणि सौम्या प्रमाणेच असे अनेक पार्टनर्स असतील, ज्यांच्यामध्ये आपापसात ‘पर्सनल स्पेस’ संदर्भात एक टुटू, मैनी असेल. पण, तुमच्या जोडीदाराला प्रेमासोबतच स्पेसचीही गरज आहे हे तुम्हाला वेळेनुसार समजले, तर तुमचे नाते आणखी घट्ट होईल. त्यामुळे जोडीदाराला वैयक्तिक जागा द्या.

जोडीदाराबाबत सकारात्मक राहू नका

अनेकवेळा तुम्हाला असे वाटते की तुमच्या जोडीदाराबद्दल सर्व काही जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जर त्याला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या नसतील तर तुम्ही त्याच्या मागे पडाल, त्याची हेरगिरी करायला सुरुवात करा. कुठेतरी त्याला घेऊन तुम्ही सकारात्मक होतात. तुमचा पार्टनर फसवत आहे असे तुम्हाला वाटते. ह्या सगळ्याचा विचार करून स्वतःला त्रास होतो. अशा परिस्थितीत तुमच्यातील अंतर वाढेल आणि तुमचे नाते कमकुवत होईल.

कोणत्याही कामासाठी जबरदस्ती करू नका

जर तुमचे तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम असेल तर त्याला कोणतेही काम करण्यास भाग पाडू नका. वेळ आणि त्यावरील कामाचा ताण लक्षात घेऊन तुमच्या इच्छा ठेवा. जोडीदाराला पुढे जाण्यास मदत करणे हेच खरे प्रेमाचे लक्षण आहे. त्याच्या कामासाठीही वेळ द्या. यामुळे तुमचे नाते घट्ट होईल.

सर्व वेळ हेरगिरी करू नका

आज मित्रांसोबत बाहेर जेवायला गेला होता? तू कुठे गेला होतास? तू काय खाल्लेस? ऑफिसमध्ये बॉसशी बोलतोय? ऑफिसमधला तुमचा सर्वात चांगला मित्र कोण आहे? संध्याकाळी जेव्हा तुम्ही दोघे एकत्र असाल तेव्हा तुमच्यामध्येही अशा गोष्टी आवश्यक असतील. अशा गोष्टी तुमच्या वैवाहिक जीवनाचा भाग असतात. पण, या गोष्टींनाही मर्यादा असते. ती मर्यादा लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या बोलण्याने तुमच्या जोडीदाराला असे वाटू नये की तुम्ही त्याच्या प्रेमाकडे आणि विश्वासाकडे संशयाने पाहत आहात. आपण त्याच्यावर हेरगिरी करत आहात असे त्याला वाटू देऊ नका, कारण जेव्हा अशा भावना निर्माण होतात तेव्हा नाते तुटण्याची शक्यता जास्त असते.

अस्वस्थतेचा बळी होऊ नका, करू नका

अनेकवेळा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ करू लागता की तो अस्वस्थ होतो आणि हे नाते त्याच्यासाठी ओझे बनते. जोडीदाराच्या आयुष्याकडे इतकं खोलवर पाहणंही योग्य नाही. कधी कधी तुम्ही स्वतः खूप अस्वस्थ असता. तुमच्या जोडीदाराच्या विनाकारण किंवा त्याच्याबद्दल खूप सकारात्मक असण्यामुळे अस्वस्थ शंका उद्भवतात आणि यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात डोकावायला सुरुवात करता आणि प्रश्नावर प्रश्न विचारू लागतो. असे केल्यास तुमचे नाते संपुष्टात येईल. त्यामुळे तुमच्या अस्वस्थतेमुळे तुमच्या जोडीदाराला जास्त प्रश्न विचारू नका हे लक्षात ठेवा.

तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि त्याला वैयक्तिक जागा द्या. नात्यात स्पेस दिल्याने प्रेम अधिक वाढते. स्पेस दिल्याने एकमेकांवरील विश्वासही वाढतो. केवळ प्रेम आणि पाठिंबा तुमच्या नात्याचा पाया मजबूत करेल. लक्षात ठेवा विश्वास हा नात्याला दीर्घकाळ बांधून ठेवणारा धागा आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवत असाल तर तो स्वतः तुमच्यापासून काहीही लपवणार नाही, तर होम ऑफिसच्या सर्व गोष्टी तुमच्याशी सहज शेअर करेल. पण जेव्हा तुम्ही त्याच्यावर संशय घेऊ लागाल, त्याची हेरगिरी कराल, त्याच्यावर सतत नजर ठेवा, त्याचा फोन आणि मेल तपासत राहा, मग तो तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहित नाही असा विचार करून सर्वकाही लपवू लागतो. हळूहळू, त्याचा तुमच्यावरील विश्वास आणि प्रेमदेखील कमी होईल आणि तुमच्या दोघांमध्ये शांतता आणि तणाव निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे चांगले आयुष्य आणि आनंद संपेल.

जर तुम्ही सकारात्मकतेने पाहत असाल, तर थोड्या काळासाठी वेगळे राहणे आणि पूर्ण एकांतात तुमचे काम करणे हे तुमच्या जोडीदारासाठीच नाही तर तुमच्यासाठीही चांगले आहे. यामुळे तुमचे वैयक्तिक जीवन आणि जोडप्याच्या जीवनात संतुलन निर्माण होते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू जगू शकता.

दु:खाच्या कारणाची अपेक्षा करू नका

* आभा यादव

काही वर्षांपूर्वी हसताना दिसणारी 24 वर्षीय नेहा आज अशा टप्प्यातून जात आहे की तिला निराशेशिवाय काहीच दिसत नाही. तिने आपले सुखी आयुष्य स्वतःच्या हातांनी उध्वस्त केले कारण तिने आपल्या प्रियकराकडून खूप अपेक्षा केल्या होत्या. तिला वाटले की तो तिच्या भावना समजून घेईल आणि आज नाही तर उद्या नक्कीच समजेल. पण तिला काय हवंय ते समजत नव्हतं. खरे तर प्रेम ही मनाची भावना आहे ज्यामध्ये अपेक्षांना स्थान नसते. पण बदलत्या वातावरणाने कदाचित प्रत्येक गोष्टीचा अर्थच बदलून टाकला आहे. भावनांचाही ट्रेंड हात द्या आणि हात घ्या असा झाला आहे. यासंदर्भात मानसोपचारतज्ज्ञ प्रांजली मल्होत्रा ​​सांगतात की, कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही नात्यातील अपेक्षा जास्तीत जास्त ठेवाव्यात. अपेक्षा कधीही स्वप्नवत होऊ नयेत. वास्तविकता लक्षात घेऊन कोणत्याही गोष्टीचा विचार केला तर कधीच निराशा होणार नाही. अपेक्षेत वास्तव नाही.

अपेक्षा अनंत

वेगवेगळ्या लोकांमध्ये अपेक्षा वेगळ्या पद्धतीने बघितल्या जातात. जसे की मुलांकडून पालक, मुलांचे पालक, मित्रांचे मित्र, नातेवाईकांचे नातेवाईक आणि सहकर्मचारी सहकारी. म्हणजेच अपेक्षा न संपणाऱ्या आहेत. ही गोष्ट अशा प्रकारेही म्हणता येईल की समाजातील प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा असतात, परंतु यामध्ये असे देखील घडते की समोरच्या व्यक्तीने त्याच्या विचारानुसार वागावे अशी अपेक्षा असते. पण समोरच्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या विचारसरणीनुसार वागले पाहिजे, असे अनेकदा घडत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य नसते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात रोज एक नवीन अपेक्षा जन्म घेते. पण त्याचा वास्तवाशी कितपत संबंध आहे हे सांगता येत नाही. तरीही, अपेक्षा ही कोणत्याही नात्याची पहिली पायरी असते. अपेक्षा बोलू शकत नाही. सर्व अपेक्षांना मूक स्पर्श हवा असतो. नवऱ्याची बायको जशी काळजी घेणं अपेक्षित असतं, त्याचप्रमाणे म्हातारपणी आपल्या मुलांनी सांभाळावं अशी पालकांची अपेक्षा असते. तर मुलांची अपेक्षा असते की ते त्यांच्या विचार आणि इच्छेनुसार जीवन जगतील, ज्यामध्ये पालकांची टोकाटोकी नाही. पण व्यावहारिक जीवनात असं होत नाही की समोरची व्यक्ती तुमच्या अपेक्षेनुसार वागेल किंवा तुमच्या विचाराशी सहमत असेल.

जेव्हा आपण कोणत्याही नात्यात अपेक्षा करू लागतो आणि ती पूर्ण होत नाही तेव्हा मन उदास होते. त्याचप्रमाणे जेव्हा कोणी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आणि आपण काही कारणाने ती पूर्ण करू शकत नाही तेव्हा त्याला वाईट वाटते. अनेकवेळा असंही होतं की जो अपेक्षा ठेवतो त्याच्या प्रत्येक गोष्टीवर नेहमीच अपेक्षा असतात, पण ज्याच्याकडून तो अपेक्षा करत असतो, त्याच्याकडून कोणाला अपेक्षा ठेवता येतील अशी माहिती त्याच्याकडे नसते. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवल्याने जगण्याची मजा कमी होते, त्यामुळे अतिरेक करू नका. अशा अपेक्षा कमी ठेवा ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत.

याशिवाय जीवन अपूर्ण आहे

अपेक्षा ही एक प्रकारची वृत्ती असली तरी त्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं कारण कधी कधी आयुष्यात यश मिळवण्यात स्वतःशी जोडलेल्या व्यक्तीच्या अपेक्षांचा मोठा हात असतो. ती अपेक्षा आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते.

जास्त अपेक्षा करू नका

तरीही, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल, तर कोणाकडून जास्त अपेक्षा करू नका. कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता जगण्याची सवय लावली पाहिजे, तर आपल्या सर्व समस्या आपोआप संपतील. हे अवघड काम आहे पण त्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला जाऊ शकतो. खूप अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःला तणावाखाली ठेवणे कारण अपेक्षांचा आलेख एकामागून एक वाढतच राहतो. अपेक्षा हे देखील जीवनातील अनेक दु:खाचे कारण असते. माणसाचा स्वभावच आहे की तो प्रत्येकाकडून अपेक्षा करतो आणि कधी कधी या अपेक्षा गरजेपेक्षा जास्त होतात. यामुळे जेव्हा आपण आपल्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही, तेव्हा राग, चीड, निराशा आणि दुःख हे आपले साथीदार बनतात.

महिलांच्या कमाईवर पुरूषांचा हक्क का?

* पद्मा अग्रवाल

आज जेव्हा महिला पुरुषांच्या बरोबरीने आणि कित्येकदा त्यांच्यापेक्षा जास्त पगार घेत आहेत तेव्हा हा त्यांचा अधिकार आहे की त्या या आपल्या कमवलेल्या पैशांना आपल्या इच्छेनुसार खर्च करतील.

परंतु पुरुष नेहमी स्त्रीवर सत्ता गाजवत आला आहे आणि आजदेखील पत्नीवर स्वत:चा अधिकार समजतो.

प्रोफेशनल कॉलेजमध्ये लेक्चरर इला चौधरी यांच्या फोनवर मेसेज आला की त्यांच्या पतीने त्यांच्या जॉइंट अकाउंटमधून ४०,००० काढले आहेत. त्यांचा मूड खराब झाला. त्या चिडून उठल्या.

घरी येऊन स्वत:लाच खूप संयमित करीत काहीशा तिखट आवाजात त्या बोलल्या, ‘‘कॉलेजच्या फंक्शनसाठी मी मॉलमधील एक ड्रेस आणि मॅचिंग सँडल पसंत केले होते. माझ्या अकाउंटमध्ये आता आता केवळ दहा हजारच उरले आहेत आणि अजून पूर्ण महिना जायचा आहे. तो ड्रेस विकला गेल्याशिवाय राहील का?’’

मग काय, पती आदेश नाराज होऊन ओरडू लागले, ‘‘न जाणो आपल्या पैशांची किती घमेंड आली आहे. ड्रेसेस आणि सँडल्सचा भडिमार आहे, परंतु नाही. पॉलिसी एक्सपायर झाली असती, यामुळे मी पैसे काढले.’’

ईला चौधरी म्हणू लागल्या, ‘‘माझी सॅलरी ६०,००० आहे. मला कॉलेजमध्ये चांगल्या पद्धतीने ड्रेसअप होऊन जावे लागते. परंतु जसे मी काही नवे खरेदी करू इच्छिते, तुम्ही राग दाखवून मला माझ्या मनाचे करू देत नाही.’’

पतिने मूर्खात काढले

एका मोठया स्टोअरमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करणाऱ्या मृदुला अवस्थी सांगतात, ‘‘आमच्या स्वत:च्या स्टोअरच्या मॅनेजरने पैशात पुष्कळ अफरातफरी केली. त्यामुळे त्याला काढले. पती हैराण होते. मी घरात रिकामी असण्याने दिवसभर वैतागायचे. त्यामुळे मी म्हटले की मी एमबीए आहे. जर तुम्ही म्हणाल तर स्टोअर सांभाळेन, परंतु माझी अट आहे की मी पूर्ण सॅलरी म्हणजेच तितकीच जितकी मॅनेजर घ्यायचा, घेईन.’’

पती अमर खुश होऊन म्हणाले, ‘‘हो. तू पूर्ण सॅलरी घे. तसंही सगळं तुझंच तर आहे.’’

पहिल्या महिन्यात तर कित्येक वेळा मागितल्यानंतर दिली. परंतु पुढच्या महिन्यापासून काही नाही. ‘सगळे काही तुझे वाला’ डायलॉग मूर्ख बनवण्यासाठी पुष्कळ आहे.

यासोबतच कोणतीही चूक झाल्यावर संपूर्ण स्टाफ समोर अपमानित करणेदेखील सोडत नाहीत.

मध्यमवर्गीय कुटुंबातील इशिता लग्नाच्या आधीपासूनच काम करायच्या. त्या आपल्या भावाला आपल्या पैशातून शिकवत होत्या आणि नंतर लग्नाच्या दरम्यान हुंडा इत्यादीमध्येदेखील त्यांचा पुष्कळ पैसा खर्च झाला.

पती आशिषने थेट तर नाही परंतु घुमवून फिरवून विचारले की, तू तर मागच्या काही वर्षांपासून काम करत होतीस. बँक बॅलन्स तर काहीही नाही.

पतीचे बोलणे ऐकून ईशिता हैराण झाल्या. त्या अॅडव्हर्टायझिंग फील्डमध्ये होत्या. सोबतच कपडयांचीदेखील त्यांना खूप आवड होती. पार्लरला जाणे त्यांच्यासाठी गरजेचे होते, पण पतीसाठी फालतू खर्च. पत्नीचे ऑफिसला चांगल्या पद्धतीने ड्रेस होऊन जाणे पतिला पसंत नव्हते.

इशिताची सॅलरी नंतर यायची, त्याआधीच खर्च आणि इन्वेस्टमेंटची प्लॅनिंग तयार असायची. जर त्या काही म्हणाल्या, तर नात्यात कडवटपणा. त्यामुळे मन मारून राहायच्या.

मुंबईच्या रीना जौहरी आपली वेदना व्यक्त करीत म्हणतात, ‘‘माद्ब्रा सगळया बोटांमध्ये डायमंड रिंग पाहून स्वत:लादेखील घालण्याची खूप इच्छा होती. मी पतीला सांगून एक रिकरिंग स्कीममधून एक लाख वाचवले. जेव्हा ती रक्कम मॅच्युअर झाली, तेव्हा मी जेव्हा अंगठीची गोष्ट बोलले, तेव्हा पती सुधीर म्हणाले, ‘‘काय फरक पडतो की अंगठी डायमंडची आहे का गोल्ड ची?’’

मी पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट केलेले आहेत. ते पैसे तुझेच असतील. तुझ्याच नावाने इन्व्हेस्ट केलेले आहेत. ‘‘रिनाच्या डोळयात अश्रू आले. प्रश्न आहे की पैसा पत्नीचा, मग निर्णय पतीने का घ्यावा?

पतीचे कर्तव्य

 

जेव्हा त्यांनी आपल्या पैशांनी स्कूटी खरेदी करण्याची गोष्ट सांगितली तेव्हा घरात वाद झाला.

गरज ही आहे की पतीने पत्नीच्या गरजांना समजावे. पत्नीची आवश्यकता, इच्छा, गरजांचा आदर करावा. तिच्या प्राथमिकतेला समजण्याचा प्रयत्न करावा.

मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या रिद्धीची बहिण सिद्धी तिच्या घरी पहिल्यांदा आली होती. ती आपल्या छोटया बहिणीला मुंबई फिरवण्यासाठी रोज कुठे ना कुठे जायची. त्यावेळी पती अर्पितदेखील त्यांच्यासोबतच असायचे. एक दिवस ते ऑफिसला गेले होते. दोघी बहिणी मॉलमध्ये शॉपिंग करायला गेल्या. तिने छोटया बहिणीला २-३ महाग ड्रेसेस खरेदी करून दिले. पेमेंट करताच पतीच्या फोनवर मेसेज गेला.

अर्पितने घरी येताच रागात रिद्धीला म्हटले, ‘‘खर्च करण्याचीदेखील काही मर्यादा असते. तू तर अशा पद्धतीने पैसे उडवत आहेस जणू आपण करोडपती आहोत.’’ बहिणीसमोर रिद्धीला आपली बेइज्जती सहन झाली नाही आणि छोटयाशा गोष्टीवर चांगलाच वाद सुरू झाला.

वेळेची गरज

आज वेळेचीही गरज आहे, की पती-पत्नी दोघांनी मिळून आपल्या कुटुंबाला आधुनिक सुख सुविधा द्याव्यात. आर्थिक रुपाने स्वावलंबी होणे महिलांना काम करण्यासाठी सगळयात जास्त प्रेरित करते. काम करण्याने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

वर्किंग कपल्समध्ये बहुधा पती आपल्या पत्नीच्या सॅलरीवर आपला पूर्ण हक्क समजतात. त्यांना वाटते की पत्नीची सॅलरीदेखील तिने आपल्या मर्जीनुसार खर्च करावी.

सुरुवातीला काही महिने पत्नी भले संकोचत ही गोष्ट सहन करेल. होऊ शकते, की तोंडाने बोलणार नाही परंतु ती मनातल्या मनात विचार करेल, की जेव्हा ती पतीला त्याची सॅलरी मागत नाही तर मग पतीला काय अधिकार आहे की त्याने प्रत्येक महिन्याला तिची सॅलरी हातात घ्यावी

वेगवेगळया प्राथमिकता

आजकाल आई-वडील मुलींचे खूप स्पेशल ट्रीटमेंट देऊन पोषण करतात, ज्यामुळे त्या सासरीदेखील स्पेशल ट्रीटमेंट इच्छितात आणि जिथे ती मिळू शकत नाही तिथे वाद आणि असंतोषाचे हे कारण बनते.

पती-पत्नी दोघेही वेगवेगळे वातावरण, विचार आणि परिस्थितीतून गेलेले असतात. त्यामुळे दोघांच्या प्राथमिकता वेगवेगळया असतात. पती-पत्नीमध्ये कोणीही डॉमिनेटिंग नेचरचे असू शकते. अशा वेळी दुसरा हर्ट होतो.

जर पती, पत्नीच्या एखाद्या चुकीवर नाराज होतो तेव्हा ती लगेच चिडते की तिला कोणाचा असा अटीट्युड सहन करण्याची काय गरज आहे, तीदेखील कमावते. कित्येक वेळा नोकरदार पत्नी छोटया गोष्टीवर ओव्हर रिअॅक्ट करून चिडून नाराज होऊन राईचा पर्वत करते.

असे कोणते नाते आहे ज्यात थोडे फार भांडण, वाद-विवाद नसतील. पती पत्नीचे नाते तर लहान मुलांच्या मैत्री सारखे असायला हवे. क्षणात कट्टी, क्षणात बट्टी. आनंद तर आपल्या आजूबाजूलाच विखुरलेला असतो. फक्त तो शोधण्याची गरज असते. त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षणी आनंद शोधा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें