* रितू वर्मा

जेव्हा अंशूला समजले की तिची भाची आरवीचे ५ वर्षं जुने नाते तुटले आहे, तेव्हा ती खूप घाबरली. आरवी आणि कबीरची जोडी किती छान होती. दोघेही मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिकत होते. दोन्ही कुटुंबांनी हे नाते स्वीकारले होते, फक्त सामाजिक मान्यता मिळणे बाकी होते. अंशु अतिशय दु:खी मनाने तिच्या बहिणीच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की आरवी अगदी सामान्य दिसत होती आणि खदखदा हसत होती.

अंशूला मनाशी वाटले की आजकालच्या मुलांचे प्रेम पण काय प्रेम आहे. हवं तेव्हा नात्यात पडायचे आणि हवं तेव्हा ब्रेकअप करायचे. ही आजकालची नाती पण काय नाती आहेत? सर्व   केवळ शारीरिक पातळीवरच आधारित आहेत.

अंशूला तिचा तो काळ आठवला जेव्हा तिचे प्रवेशसोबतचे नाते तुटले होते. पूर्ण दोन वर्षे ती या गर्तेतून बाहेर पडू शकली नव्हती. तिने आपले नवीन नाते मोठया अवघडपणे स्वीकारले होते? कधी-कधी अंशूला वाटतं की आजपर्यंत ती आपल्या पतीला स्वीकारू शकली नाही. प्रवेशसोबतच्या त्या तुटलेल्या नात्याची सल अजूनही कायम आहे.

रात्री आरवीने अंशूला मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘मावशी, तू आलीस हे खूप चांगले झाले. माझे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे आहे, म्हणूनच तर मी हा निर्णय घेऊ शकले.’’

पण अंशूला वाटले की खरंतर आरवीला कधीच कबीरशी प्रेम जडले नव्हते. पण आरवीच्या म्हणण्यानुसार गुदमरल्यासारखे जगण्याऐवजी जर तुमचे जमत नसेल तर ब्रेकअप करून आगेकूच का करू नये.

दुसरीकडे जेव्हा मानसीचे ऋषीसोबतचे २ वर्षे जुने नाते तुटले तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली. आपल्या बरोबर तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे जगणेही कठीण केले होते, कोणतेही नाते जबरदस्तीने टिकत नसते. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी संबंध ठेवू इच्छित नसेल तर गयावया करण्याऐवजी जर तुम्ही सन्मानाने पुढे वाटचाल केलीत तर ते केवळ तुमच्या जोडीदारासाठीच नाही तर तुमच्यासाठीही चांगले होईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...