गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्हाला भाऊ नाहीए. माझं आणि माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आहे. माझ्या बहिणीच्या सासरचे लोक तिला खूपच त्रास देतात. आईबाबांच्या घरी जाणं तर दूर, ते तिला त्यांना फोनही करू देत नाहीत. पोलिसांत तक्रार केली पण ते तिथे माझ्या बहिणीवर आणि माझ्या पतीच्या चारित्र्यावर दोष लावून साफ बचावले. तुम्हीच सांगा, मी माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांच्या त्रासापासून कसं वाचवू?

तुम्ही हे स्पष्ट सांगितलं नाहीए की तुमच्या बहिणीच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या माहेरच्या लोकांना भेटायला बंधन का घातलं आहे? पण कारण काही असो, अशाप्रकारे कोणाला बंधक बनवून ठेवणं अयोग्य आहे. कोणत्याही प्रकारचा अत्याचार आणि घरगुती अत्याचाराच्या विरुद्ध सरकारही सक्त आहे. तुमच्या बहिणीची जर पोलिसांनी मदत केली नसेल तर तुम्ही वुमन सेल, महिला कल्याण समिती किंवा अशाच एखाद्या समाजसेवी संस्थेची मदत घेऊ शकता. ते लोक तुमच्या बहिणीच्या सासरच्या लोकांशी भेटून चर्चा करतील आणि तुमच्या बहिणीला न्याय मिळवू देतील.

  • मी २७ वर्षांची तरुणी आहे. मला आईवडील नाहीत. धाकटा भाऊ आहे आणि एक विवाहित बहीण आहे. माझ्या भावोजींनी माझ्या भावाजवळ माझ्यासाठी एक स्थळ आणलं. मुलगा सरकारी नोकरी करतो. कुटुंबही समृद्ध आहे. बाहेरून तर सगळं काही व्यवस्थित वाटलं. भाऊ आणि भावोजींनी जाऊन लग्नासाठी होकारही दिला आणि दोन महिन्यांनी साखरपुड्याची तारीख ठरवली. तत्पूर्वी भावाने मुलाच्या कुटुंबियांबद्दल माहिती काढली तेव्हा कळलं की मुलाच्या मोठ्या भावाचा अपराधिक भूतकाळ होता. त्याने तुरुंगवासही भोगला आहे. माझ्या भावाने भावोजींना सांगितलं की त्यांनी या लग्नाला नकार द्यावा. तेव्हा ते माझ्या भावाला खूप बडबडले. आम्हाला भीती वाटत आहे की या गोष्टीवरून माझ्या भावोजींनी बहिणीला त्रास देऊ नये. हा विचार करून करून मी खूपच चिंतित आहे. तुम्हीच सांगा. मी काय करू?

लग्नसंबंधामुळे फक्त दोन माणसांचं नव्हे, तर २ कुटुंबांचं नातं जुळतं. म्हणूनच नातं ठरवताना कुटुंबाकडेही पाहिलं जातं. तुमच्या भावाने जर अशा कुटुंबात तुमचं लग्न करून द्यायला नकार दिला आहे, जिथला एक सदस्य गुन्हेगारी जगताशी जोडलेला आहे, तर यात तुमच्या भावोजींनी नाराज व्हायला नकोए. त्यांनी या गोष्टीला विनाकारण आपल्या अहंकाराशी जोडलं आहे. तुमची बहीण त्यांना प्रेमाने समजावू शकते की तिच्या बहिणीला आईवडिलांचा आधार नाहीए. भविष्यात काही अघटित घडू नये म्हणून जास्त काळजीची गरज आहे. म्हणून त्यांनी विनाकारण नाराज होऊ नये.

  • मी २२ वर्षांची तरुणी आहे. एका मुलावर मी प्रेम करायचे. त्याने मला लग्नाचं वचन दिलं होतं. म्हणून आम्ही प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आमच्यामध्ये शारीरिकसंबंधही होते, पण वर्षभरापूर्वी तो माझी फसवणूक करून निघून गेला. आता माझे कुटुंबीय माझ्या लग्नासाठी स्थळ शोधत आहेत. मी फारच द्विधावस्थेत आहे. कसलाच निर्णय घेऊ शकत नाहीए. कृपया मला सांगा की, लग्न ठरवण्यापूर्वी मी मुलाला हे सांगू का, की माझे एका मुलाबरोबर शारीरिकसंबंध होते. कारण मी त्याला हे सांगितलं नाही, तरी ही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला कळेलच. जर लग्नानंतर त्याला ही गोष्ट कळली आणि त्याने मला अपमानित करून सोडलं तर परिस्थिती आणखीनच वाईट होईल. यापेक्षा चांगलं तर हे आहे की मी आधीच ही गोष्ट सांगून टाकू. त्यानंतर त्याला नातं ठेवायचं आहे की नाही हे त्याच्यावर अवलंबून राहील. विनाकारण मला घाबरून तर राहावं लागणार नाही?

कोणत्याही मुलाला हे कळलं की लग्नाआधी मुलीचे कोणाबरोबर तरी शारीरिकसंबंध होते तर तो तिच्याशी कधीच लग्न करणार नाही. लोक कितीही आधुनिक आणि मॉडर्न व स्वतंत्र विचारांचे असल्याचा दावा करत असले तरी पत्नी म्हणून त्यांना सतीसावित्रीच हवी असते. म्हणून तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका. लग्नाच्या आधीही नाही आणि लग्नानंतरही. जोपर्यंत तुम्ही स्वत: सांगणार नाही तोपर्यंत हे कोणीच जाणू शकणार नाही की तुमचे लग्नापूर्वी कोणाशी शारीरिकसंबंध होते.

  • मी ३० वर्षांची विवाहित स्त्री आहे. मी माझ्या एका वैयक्तिक समस्येने खूप त्रस्त आहे. कोणालाही ती समस्या सांगू शकत नाही. खरंतर माझी गुप्तांग खूपच सैल झालं आहे, ज्यामुळे माझ्या पतींना सहवास करताना आनंदाचा अनुभव घेता येत नाही. यामुळे ते चिडतात आणि मग अनेक दिवस माझ्यापासून तुटक वागतात. सहवासही करत नाहीत. कृपया असा एखादा उपाय सांगा, ज्याने माझ्या गुप्तांगाला पूर्वीसारखा घट्टपणा येईल आणि पतींनाही सहवास करताना आनंद वाटेल?

तुमची समस्या काही वेगळी नाहीए. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या गुप्तांगाला लग्नाच्या काही वर्षांनी सैलपणा येतो त्यामुळे पूर्वीसारखा घट्टपणा कायम राहाणं शक्य नाही. असं असूनदेखील दाम्पत्य सहवासाचा पूर्ण आनंद घेतात. तुमच्या पतीनेही कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न बाळता परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे. पण तरीदेखील जर ते संतुष्ट होत नसतील तर तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाची भेट घेऊन आपल्या गुप्तांगाला २-३ टाके घालून ते आकुंचित करण्याची छोटीशी शस्त्रक्रिया करवून घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

*गृहशोभिका टीम

  • मी २७ वर्षीय विवाहित महिला आहे. माझे लग्न १० महिन्यांपूर्वी झाले आहे. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात, पण मी त्यांना सेक्सच्या बाबतीत संपूर्णपणे समाधानी करू शकत नाही. कारण आहे माझ्या व्हजायनल मसल्स गरजेपेक्षा जास्त आकुंचित म्हणजे जास्त टाईट आहेत. सेक्स संबंध करताना या कारणामुळे मी माझ्या पतिला साथ देऊ शकत नाही. या दरम्यान मला अत्यंत वेदना होतात. पतिच्या आग्रहाला मी नाकारूही शकत नाही. पण सेक्स करण्याच्या नावाने माझे हात पाय गळतात आणि टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करते. यामुळे माझे पती नाराज राहू लागले आहेत. सांगा मी काय करू?

आधी तर तुम्हाला तुमच्या मनात सेक्सबद्दल बसलेली भीती काढावी लागेल, कारण ही निसर्गाने दिलेली देणगी आहे जी वैवाहिक जीवनातील ऊब कायम ठेवते.

दुसरे, व्हजायनल मसल्स गरजेपेक्षा जास्त टाईट असणे फार गंभीर समस्या नाहीए, शिवाय लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसांमधील ही एक सामान्य समस्या असू शकते किंवा मनात बसलेल्या भीतिमुळे तुम्ही व्हजायना संकुचित करत असाल.

त्यापेक्षा सेक्स करण्याअगोदर फोरप्ले करणं अधिक योग्य ठरेल आणि याचा वेळ सुरूवातीला एवढा जास्त असावा की तुम्ही सेक्ससाठी पूर्णत: तयार व्हाल. हे आणखी इंटरेस्टिंग व्हावे यासाठी पतिला सांगा की त्याने ल्युब्रिकंट वा चिकट तेलाचा वापर करावा.

बाजारात आजकाल व्हजायनल मोल्ड्ससुद्धा उपलब्ध आहेत, ज्याच्या वापराने सेक्सक्रिया आणखी आनंदी केली जाऊ शकते. पतिला सेक्स संबंधांच्या काळात पेनिट्रेशन स्लो ठेवायला सांगा. हळूहळू तुम्हालासुद्धा याचा आनंद घेता येईल आणि तुम्ही मोकळेपणाने आनंद उपभोगाल. या शिवाय जर समस्या जशीच्या तशी राहिली तर एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाला भेटा.

  • मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. लग्नाला २ वर्ष झाली आहेत. सासरी कशाची कमी नाही. पती सरकारी नोकरी करतात आणि उच्चपदस्थ आहेत. ते स्कूल टॉपर विद्यार्थी होतेच शिवाय कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतसुद्धा टॉपर होते. आपल्या कार्यालयातसुद्धा त्यांच्या कामाला कोणी नावं ठेवत नाहीत. पण समस्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील आहे आणि अशी आहे की जी आजवर केवळ माझ्या आईला आणि सासूला माहीत आहे. खरेतर, पती सेक्स संबंध ठेवताना हिंसक बनतात. ते मला त्यांच्यासोबत पॉर्न मुव्ही बघायला सांगतात आणि मग सेक्स करतात. यादरम्यान ते माझ्या कोमल अवयवांना जोरजोरात घर्षण करतात आणि त्यावर दातसुद्धा रुतवतात. कधीकधी तर माझ्या ब्रेस्टमधून रक्तसुद्धा निघू लागते. अशा असह्य वेदना सहन केल्यावर माझ्याच्याने अंथरुणातून उठणेसुद्धा होत नाही. माझे पती माझी ही अवस्था पाहून खेद व्यक्त करतात आणि सारखे क्षमा मागत राहतात. कधीकधी वाटते की आत्महत्या करावी. खरेतर माझे पती माझी गरजेपेक्षा काळजी करतात आणि माझे त्यांच्यापासून दूर राहणे त्यांना इतके खटकते की ते माझ्याविना एक क्षणही राहू शकत नाही.

जर पती केवळ मानसिक त्रास देत असते आणि प्रेम केले नसते तर मी त्यांना केव्हाच घटस्फोट दिला असता पण वाटते की कदाचित ते एखाद्या मानसिक रोगाने ग्रासले आहेत. आणि असा विचार करूनच मी पतिला सोडू शकत नाही. मी माझ्या सासूला, ज्या मला आपल्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात, हे सगळे सांगितले तर त्या गप्प बसल्या. त्या केवळ एवढेच म्हणाल्या की हळूहळू सगळे नीट होईल. इकडे आईला सांगितले तेव्हा ती संतापली आणि सर्वाना एकत्र बसवून ती यावर चर्चा करू इच्छित होती. अजून हे माझाया बाबांना माहीत नाही, कारण मला माहीत आहे की ते या मुद्द्यावर गप्प बसणार नाहीत. पती, सासर आणि माहेर हे नाते क्षणात संपू शकते. काहीच समजत नाही की काय करू? कृपया सल्ला द्या?

तुमची समस्या पाहाता असे वाटते की तुमच्या पतिला सेक्शुअल सॅडिज्म हा मनोविकार आहे. असा मनोरुग्ण सामान्य जीवनात तर नॉर्मल राहतो, अशांच्या वर्तनावर कोणालाच संशय येत नाही, पण सेक्स करताना ते लोक हिंसक होतात आणि दुसऱ्याला चावणे, बोचकारणे, संवेदनशील अवयवांवर प्रहार करणे, वेगात सेक्स करणे अशा पीडा देण्यात त्यांना आनंद वाटतो. कधीकधी असे मनोरुग्ण जोडीदाराला इतक्या वेदना देतात की या संबंधांना पूर्णविराम मिळतो. तसे आपल्या अशा वर्तनाचा नंतर त्यांना पश्चातापसुद्धा होतो आणि अशी चूक परत न करण्याचे वचनसुद्धा देतात, पण परत सेक्स करताना सगळे विसरून जातात.

तुमच्याबाबतीतसुद्धा असेच झाले आहे आणि तुम्ही हे चांगले केले की हे सगळे आपल्या आईला आणि सासूला सांगितले आहे.

अशा मनोरुग्णांना भावनिक आधाराची गरज असते. रोजचे व्यवहार करताना तुमच्या पतिसोबत बोला. पतिसोबत जास्तीतजास्त वेळ घालवा, एकत्र फिरायला जा, शॉपिंग करा, चांगले साहित्य वाचायला प्रोत्साहन द्या.

एखाद्या चांगल्या सेक्शुअल सॅडिज्मच्या तज्ज्ञांकडे उपचारासाठी घेऊन जा, तरीही आशेचा काही किरण दिसत नसेल तर पतिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करा.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • माझे पती नुकतेच त्यांच्या अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. मला दोन मुले आहेत, जी विवाहित जीवन जगतात आणि दुसऱ्या शहरात राहतात. माझे पती नोकरीतून सेवानिवृत्त झाले तेव्हा वाटले की आता उर्वरित आयुष्य शांततेत व्यतित करू. पण माझ्या पतिच्या बदललेल्या वागण्याने मला आश्चर्य वाटले. खरं तर पती महिन्यात २-४ दिवस दुसऱ्या शहरात जातात आणि तेथे कॉलगर्लसमवेत वेळ घालवतात. हे सर्व मला त्यांच्या मोबाइलवरून कळाले आहे. दुसरी मोठी समस्या म्हणजे घरात होणाऱ्या पार्ट्यांची, ज्यात खाण्या-पिण्याबरोबर भरपूर मद्यपान चालते आणि आसपास राहणाऱ्या नणंदासुद्धा पार्टीत सामील होण्यासाठी येतात. कधीकधी असे वाटते की मी माझ्या मुलांना ही सर्व माहिती द्यायला हवी, परंतु नंतर असा विचार करून देत नाही की आपल्या वडिलांचा हा घृणित चेहरा पाहिल्यानंतर वडील आणि मुलांमधील नातेसंबंध बिघडतील. मी माझ्या पतिला पुष्कळ वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु उत्तर हेच मिळते की मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सर्वासाठी घालवले आहे, आता मी फक्त माझ्यासाठी जगेन. पतिला कशाप्रकारे योग्य मार्गावर आणता येईल यासाठी मला कोणताही मार्ग दिसत नाही. कृपया मला सांगा, मी काय करू?

वाढत्या वयानुसार इच्छा किंवा शारीरिक आवश्यकता कमी होत नाहीत. हे चांगले आहे की आपली मुले आपल्या पायावर उभी आहेत आणि चांगले आयुष्य व्यतित करत आहेत, तेव्हा आपल्याकडेसुद्धा जुन्या आठवणींना मुक्तपणे ताजेतवाने करण्यास आणि आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यासदेखील वेळ असेल.

स्वत:ला वृद्ध न मानता काळाबरोबर चला. साजश्रृंगार करा, आपल्या पतीबरोबर चित्रपट पाहा, मॉलमध्ये जा, खरेदी करा, जेणेकरून आपल्यालासुद्धा आपल्या पतिची जवळीक आवडेल.

जर पतिमध्ये थोडा बदल झाला तर त्यांना प्रेमाने समजावू शकता. आपण आपल्या नणंदानाही असे सांगू शकता की जेव्हा त्या दारू इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहतील तेव्हाच त्यांचे घरी स्वागत होईल. आपणसुद्धा त्यांच्या पार्टीत सामील झालात तर बरे होईल, पण दारूची फेरी होणार नाही या अटीवर.

असे असूनही जर पती आणि नणंदा योग्य मार्गावर येताना दिसत नसतील तर आपण कठोरपणे वागू शकता. जर आपण गोष्टी बिघडत असल्याचे पाहिले तर आपण सर्व काही मुलांसोबत शेअर करू शकता.

तसही, या वयात विवाहित पुरुष किंवा स्त्री या दोघांनाही एकमेकांची जास्त गरज असते, कारण या वयात येईपर्यंत मुलेही स्थायिक होतात आणि आपापले स्वत:चे कुटुंब आणि करिअर बनविण्यात व्यस्त होतात. जर आपण आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ राहिलात तर त्यांनादेखील आपले पाठबळ मिळेल आणि शक्य आहे की ते योग्य मार्गावर येतील.

  • मी एक ३६ वर्षीय महिला आणि ९ वर्षाच्या मुलीची आई आहे. ५ वर्षांपूर्वी पतिचा एका अपघातात मृत्यू झाला. माहेर आणि सासरचे लोकसुद्धा दुसरे लग्न करण्यावर ठाम आहेत, पण नवऱ्याचा चेहरा माझ्या मनातून उतरत नाही. माझ्या माहेर आणि सासरच्यांना एक मुलगा आवडला आहे. मुलगा विनाअट लग्न करण्यासदेखील तयार आहे. मी काय करू?

आयुष्य एखाद्याच्या आठवणी आणि विश्वासाने चालत नाही किंवा थांबत नाही. तुमची मुलगी अजून लहान आहे. उद्या मुलीचे लग्न होईल आणि तीही आपल्या कुटुंबात आनंदी असेल.

आपल्याकडे आता वेळ आहे. म्हणूनच दुसरे लग्न करण्यात काहीही चूक नाही. आपल्या मुलीला योग्यप्रकारे प्रशिक्षण देण्याची आणि तिचे लग्न करण्याची जबाबदारी आपण वेळेवर तेव्हाच पार पाडू शकता, जेव्हा आपल्या घर संसाराचा जम बसला असेल. आपली इच्छा असल्यास मुलीच्या पालन-पोषणासाठी आपण भावी पतिशी आधीच चर्चा करू शकता.

  • मी २६ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. ऑफिसचे वातावरण ठीक आहे, पण मी माझ्या एका सहकाऱ्यावर नाराज आहे. खरंतर तो दिवस-रात्र व्हॉट्सअॅपवर मला मेसेज पाठवत राहतो. तो उत्तर देण्यासदेखील सांगतो, परंतु मला चिड येते. एकतर वेळेचा अभाव आणि दुसरे म्हणजे कामाचा भार. वास्तविक, त्याचे संदेश मर्यादेच्या बाहेर नसले तरी वारंवार संदेशांमुळे मी अस्वस्थ होते. माझे लक्षदेखील कामापासून विचलित होते. माझी अशी इच्छा नाही की त्या सहकाऱ्यामुळे माझ्या कार्यालयीन वागणूकीवर परिणाम व्हावा, परंतु त्याचबरोबर त्याने मला असा त्रास देऊ नये अशीही माझी इच्छा आहे. सांगा, मी काय करू?

आपल्याला त्या सहकाऱ्याचे व्हॉट्सअॅप करणे आवडत नसल्यास आपण त्यास थेट नकार देऊ शकता. आपण असे म्हणू शकता की जर संदेश कामाशी संबंधित असेल तर ठीक आहे अन्यथा व्यर्थचे व्हॉट्सअॅप मेसेज करू नका. आपण त्याला असे देखील सांगू शकता की ऑफिसच्या वेळेस व्हॉट्सअॅपवर टाईमपास करून आपली प्रतिमा बिगडेल आणि जेव्हा ही गोष्ट बॉसपर्यंत पोहोचेल तेव्हा प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकेल.

तसेच त्याने पाठविलेल्या सततच्या व्हॉट्सअॅप संदेशाकडे दुर्लक्ष करा आणि कुठलाही प्रतिसाद देऊ नका. त्यानंतर काही दिवसांनी तो स्वत:च व्हॉट्सअॅप करणे बंद करेल. अशाने सापदेखील मरेल आणि काठीही तुटणार नाही.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • माझ् ?या हाताच्या वरच्या भागावर लाल रंगाचे लहान लहान फोड आले आहेत. वास्तविक पहाता मला यामुळे खाज अथवा वेदना होत नाही. पण यामुळे मी बिनबाह्यांचे ड्रेस घालू शकत नाही. हे नाहीसे करायला एखादा उपाय सांगा?

त्वचेवर लाल रंगाचे लहान फोड म्हणजे बंप्स होण्याची समस्या ज्याला केराटोटिस पाइलेरिस म्हटले जाते. जवळपास ५० टक्के माणसं या व्याधीने पीडित असतात. बंप्स सामान्यत: लाल आणि पांढऱ्या रंगाचे मुरमांप्रमाणे  दिसतात. प्रत्यक्षात हे इतर काही नसून, मृत त्वचा असते. ज्यात त्वचेवरील केस व्यत्यय आणू शकतात. हे केवळ तुमच्या हातावरच नाही तर पार्श्वभागावर आणि जांघांच्या मागेसुद्धा येऊ शकतात. यातून सुटका मिळवायला तुम्ही दिवसातून दोनदा उत्तम मॉइश्चराइजरचा वापर करा. तुम्ही सेलीसिलिक आणि अल्फा हायड्रॉक्सी निवडू शकता. ए जीवनसत्वयुक्त क्रीमने त्वचेच्या पेशींची स्थिती चांगली होते. एक्सफॉलिएशनमुळे मृत त्वचा पेशीत लक्षणीय घट होते. एक्सफॉलिएटिंग स्क्रबचासुद्धा वापर करू शकता. लक्षात ठेवा की कोणतेही क्रीम लावण्याआधी त्वचाविकार तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. उत्तम परिणाम दिसावे यासाठी या गोष्टींचा वापर नियमित करा.

  • माझा चेहरा सतत धुवूनही चिपचिपा दिसतो. मी चेहऱ्याला कोणतेही क्रीम लावत नाही, पण बघताना असं वाटते  की मी अनेक क्रीमचे थर चेहऱ्यावर थापते. कृपया एखादा उपाय सांगा?

तुमची त्वचा अतिशय तेलकट आहे आणि अशी त्वचा असणारे लोक आपल्या त्वचेमुळे  वैतागलेले असतात. पण जांभूळ ऑयली त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. हे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यात सहाय्यक असते. म्हणून आपल्या त्वचेवर जांभळाचा फेसपॅक लावू शकता. ऑयली त्वचेसाठी जांभळाचा फेस पॅक बनवण्यासाठी याचा गर काढून एका बाउलमध्ये ठेवा. आता नंतर यात एक चमचा आवळयाचा रस आणि एक चमचा गुलाबजल मिसळा. यानंतर हे मिश्रण नीट एकत्र करा आणि घट्ट पेस्ट तयार झाली की हे आपल्या चेहऱ्यावर लावा. २०-३० मिनिटांनी चेहरा धुवा.

  • माझे वय २० वर्ष आहे. माझे केस खूपच ऑयली आहेत. यामुळे जवळपास रोजच मला हे धुवावे लागतात. पण आता माझ्या केसात कोंडासुद्धा होऊ लागला आहे. मी काय करू जेणेकरून माझा त्रास दूर होईल?

तुम्ही झेंडूच्या फुलांचे हेअर टॉनिक वापरा. झेंडूच्या फुलात फायटोकॉन्स्टिट्यूंट्स असतात, जे कोंडा नाहीसा करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय हे केसांना चिकट होण्यापासून सुरक्षित ठेवते. ऑयली केस असणाऱ्या व्यक्तींसाठी झेंडूचे फुल हा फारच छान घरगुती उपाय आहे. हे वापरण्याकरिता झेंडूची सुकलेली फुलं कोमट पाण्यात उकळत ठेवा. हे पाणी गाळून घेत चोथ्यापासून वेगळे करा आणि शाम्पू केल्यावर एकदा या पाण्याने आपले केस धुवा. कोंडा निघून जाईल.

  • माझी त्वचा ऑइली आहे. मला असे वाटते की ऑयली त्वचेला मॉइश्चराइजर केल्यास ती अजूनच चिपचीपी बनेल. ऑयली त्वचेला मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे का?

हो, ऑयली त्वचेलासुद्धा मॉइश्चराइज करावे लागते. तुम्ही संत्र्यांचा रस आणि कोरफडीचा गर यापासून बनवलेला हायडे्रटिंग फेस मास्क लावू शकता, जो ऑयली त्वचेतील अतिरिक्त सिबम शोषण्यासाठी सक्षम असतो आणि त्वचेला तजेलदार बनवतो. यासाठी सर्वात आधी १ मोठा चमचा संत्र्याचा रस आणि १ चमचा कोरफडीचा गर घ्या. दोन्ही एका वाटीत एकत्र मिसळा. हे चेहऱ्यावर लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ करा आणि स्वच्छ हाताने ही पेस्ट लावा. डोळयांपाशी लावू नका नाहीतर जळजळ होऊ शकते. साधारण २० मिनिट पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

  • माझं वय ३० वर्ष आहे. माझ्या चेहऱ्यावरचे त्वचाछिद्र आत्तापासूनच मोठे दिसू लागेल आहेत. मी काय करू की माझ्या चेहऱ्यावरील त्वचाछिद्र बंद होतील. आणि माझी त्वचा पूर्वीसारखी होईल?

कोरफड चेहऱ्याला मॉइश्चराइज करते आणि मोठया त्वचाछिद्रांना संकुचित करते. कोरफडीच्या पानाच्या आत असलेला गर चेहऱ्याला उत्तम पोषण देतो आणि चेहऱ्यावर जमलेले तेल आणि मळ नाहीसे करतो, ज्यामुळे त्वचाछिद्रांवर आकुंचन पावतात. आपल्या चेहऱ्यावरील पोअर्सवर कोरफडीचा थोडा गर लावून थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर १० मिनिट तसेच ठेवा. मग थंड पाण्याने चेहरा धुवा.

  • माझे वय २५ वर्ष आहे. माझ्या कपाळावर आत्तापासूनच सुरकुत्या आल्या आहेत, ज्या खूपच वाईट दिसतात. या नाहीशा करायला एखादा घरगुती उपाय आहे का?

वयाआगोदर जर तुमच्या कपाळावर सुरकुत्या आल्या असतील तर, जवसाचे तेल हा खूप चांगला आणि तात्पुरता आणि घरगुती उपाय आहे. यात तुम्हाला जवसाच्या तेलाने मालिश करायचे नाही, तर १ चमचा जवसाचे तेल दिवसातून ३-४ वेळा प्यायचे आहे. हे त्वचेच्या बाहेरील थरांना वर आणतात, ज्यामुळे कपाळाच्या सुरकुत्या आणि रेषा कमी होतात.

सौंदर्य समस्या

– परमजीत सोई, ब्यूटी एक्सपर्ट

  • मी २० वर्षीय तरुणी आहे. चेहऱ्यावर व वरच्या ओठांवर लव आहे. वॅक्स केल्यानंतर डाग राहातात. हे हटविण्याचा उपाय सांगा?

अपरलिप्स व चेहऱ्यावरची लव व डाग हटविण्यासाठी हळदीची घट्ट पेस्ट बनवा व त्यामध्ये लिंबाचा रस एकत्रित करून त्या जागी लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवा. असं ४-५ आठवडे सतत करा. हळूहळू डाग व लव विरळ होतील.

मी ३० वर्षीय महिला आहे. माझ्या समस्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांबद्दल आहे. ते दूर करण्याचा उपाय सांगा?

डोळ्यांखालची काळी वर्तुळं कम्प्युटर स्क्रीनसमोर अधिक वेळ बसल्याने व झोप पूर्ण न होण्यामुळेदेखील होऊ शकतात. ते काढण्यासाठी झोपतेवेळी डोळ्यांच्या आजूबाजूला बदाम तेल वा अंडर आय जेल लावा. फायदा होईल. यासोबत पौष्टिक आहारदेखील घ्या.

  • मी १७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर खूपच पिंपल्स आहेत आणि त्याचे डागदेखील पडले आहेत; ज्यामुळे चेहरा खूपच कुरूप दिसतो. मी खूप उपाय केलेत परंतु काहीच फरक पडला नाही. कृपया, मला ही समस्या दूर करण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहऱ्यावर पिंपल्स हे प्रदूषण व हार्मोनल बदलामुळे होतात. पिंपल्सचे डाग हटविण्यासाठी टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने डागांवर लावा. याव्यतिरिक्त बटाट्याची सालं चेहऱ्यावर चोळा. दही व बेसनचं उटणे लावा. लिंबाच्या रसात हळद मिसळून पेस्ट बनवा व पिंपल्सवर लावा. या सर्व घरगुती उपायांनी तुमच्या समस्येचं समाधान होईल आणि हळूहळू पिंपल्सचे डागदेखील विरळ होतील. याव्यतिरिक्त अधिक तेलकट अन्न खाऊ नका. जंक फूड खाऊ नका.

  • माझं वय २२ वर्षं आहे. माझी समस्या अशी आहे की थंडीत माझी त्वचा कोरडी व रुक्ष होते. त्वचेवर अजिबात चमक नसते. त्वचेतील ओलावा कायम राहावा यासाठी मला काय करायला हवं?

त्वचेतील कोरडेपणा दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या. कारण पाण्याच्या अभावामुळेदेखील त्वचा कोरडी व रुक्ष होते. याव्यतिरिक्त त्वचेवर अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चरायझर लावा. त्वचेचा थंड वाऱ्यापासून बचाव करा. बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने चेहरा झाकून घ्या. त्वचा जर अधिक कोरडी असेल, तर गुलाबपाण्यात ग्लिसरीन एकत्रित करून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्याला ओलावा मिळण्याबरोबरच चेहऱ्याचं टोनिंगदेखील होईल.

  • मी ३० वर्षीय स्त्री आहे. माझे केस खूपच कोरडे व रूक्ष आहेत. ते सिल्की व शाइनी बनविण्याचा एखादा उपाय सांगा?

खाण्यापिण्यात पौष्टिक तत्त्वांचा अभाव आणि धूळप्रदूषणामुळे केस निस्तेज व रुक्ष दिसू लागतात. त्यांची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या. घरगुती उपायासाठी तुम्ही २ कप गरम पाण्यात १ चमचा मध मिसळून केसांवर लावा आणि अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.

याव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा कोमट खोबरेल तेलाने केसांना मसाज करा व हॉट टॉवेल थेरेपी घ्या. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होईल आणि ते सिल्की व शाइनी बनतील.

  • मी ४२ वर्षीय स्त्री आहे. माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, ज्या मी मेकअपने लपविते तरीदेखील त्या दिसतात. सुरकुत्या कमी करण्याचा एखादा उपाय सांगा?

सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही दुधाच्या पावडरमध्ये पाणी आणि मध एकत्रित करून चेहऱ्यावर लावा. असं केल्याने तुमची त्वचा कोमल होईल आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यादेखील दिसणार नाहीत. याव्यतिरिक्त केळं मॅशकडून त्याचा पॅक चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासानंतर चेहरा धुऊन घ्या. असं केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्यादेखील कमी होतात.

  • मी २२ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर व्हाइटहेड्स आहेत, ज्यामुळे चेहरा खराब दिसतो. ते घालविण्याचे उपाय सांगा?

व्हाइटहेड्स तेलकट त्वचेवर अधिक येतात. यामुळे अशा स्त्रियांनी धूळमाती व प्रदूषणयुक्त वातावरणापासून दूर राहायला हवं.

तुम्ही भरपूर पाणी प्या. बाहेरून घरी आल्यावर त्वचेचं क्लीजिंग करा. यामुळे मृतत्वचा व रोगजंतू निघून जातील. क्रीमी व ऑइली ब्यूटी प्रॉडक्ट्सचा कमीत कमी वापर करा. व्हाइटहेड्सवर लिंबाचा रस व काकडीचा रस लावा. स्टीम घेतल्यानेदेखील फायदा होईल.

  • मी १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिंनी आहे. माझे हात व चेहऱ्याचा रंग सावळा आहे. त्यामुळे रंग उजळण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहरा व हातांचा रंग उजळण्यासाठी कच्चं दूध चेहरा व हातांवर लावा. हे टोनरचं काम करेल. कच्चं दूध हात व चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि सुकल्यावर धुऊन टाका. यामुळे रंग उजळेल.

याव्यतिरिक्त पपईचा पल्प मॅश करून चेहरा व हातांवर लावा. यामुळेदेखील रंग उजळेल. घरातून निघतेवेळी चेहरा व हातांवर एसपीएफयुक्त सनस्क्रीन लावावं.

गृहशोभिकेचा सल्ला

 

  • मी २३ वर्षीय तरुणी आहे. माझ्या लग्नाचं जमत आहे. मात्र, अनेक स्थळांनी या कारणामुळे मला नकार दिला आहे; कारण त्यांना चष्मा असलेली मुलगी नको आहे. मी आता कॉन्टॅक्ट लेन्स घेतल्या आहेत जेणेकरून माझं लग्न ठरेल. सध्या एकदोन ठिकाणी माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे. मी त्यांना कॉन्टॅक्ट लेन्सविषयी सांगावं की नाही? यावरून घरात खूप तणाव असतो. मला काय करायला हवं?

कॉन्टॅक्ट लेन्स हा चांगला पर्याय आहे आणि यात काही धोका नाही. पण लग्नाआधी दोन्ही पक्षांनी आपल्याविषयीची सविस्तर माहिती एकमेकांना देणं गरजेचं असतं.

जर तुमच्या कुटुंबियांना असं वाटत असेल की मुलाकडील लोकांना हे सांगू नये तर तुम्ही स्वत:हूनच मुलाला ही गोष्ट सांगू शकता.

मुलगा जर समंजस असेल तर तुमचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रभावित होईल. शिवाय तुम्हालाही लग्नानंतर ही गोष्ट लपविल्याची हुरहुर लागणार नाही.

  •  मी ३० वर्षीय विवाहित महिला आहे. आमचं विभक्त कुटुंब आहे. माझी लहान बहीण आमच्यासोबतच राहाते. माझं माहेर खेडेगावात आहेत म्हणून ती पुण्यात आमच्यासोबत राहून बीए करत आहे. माझे आईबाबा तिला हॉस्टेलमध्येच ठेवणार होते पण मी आणि माझ्या पतीने बळजबरीने तिला आमच्यासोबत ठेवून घेतलं.

माझ्या बहिणीने मला सांगितलं की भावोजींनी रात्री दारू पिऊन तिच्यासोबत गैरवर्तन केलं. या आधीही तिने मला सांगितलं होतं की, भावोजी तिची चेष्टामस्करी करतात आणि तिच्यासोबत गैरवर्तनही करु पाहातात. तेव्हा ही गोष्ट मी फारशी गंभीरपणे घेतली नव्हती, पण आता मी खूप चिंतित आहे, पतीला याविषयी कसं विचारायचं याची मला भीती वाटते. हे प्रकरण आणखी पुढे वाढू नये, यासाठी मी काय करू?

तुमच्या बहिणीने जेव्हा पहिल्यांदा तुमच्या पतीच्या गैरवर्तनाविषयी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही सावध व्हायला हवं होतं. तुम्ही तेव्हा गप्प बसल्यामुळे त्यांचं धाडस वाढलं आणि त्यांनी पुन्हा ते कृत्य केलं. आता तुम्ही त्यांना मोकळं सोडू नका. चांगलं खडसावून विचारा. याचबरोबर बहिणीला हॉस्टेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा.

जोपर्यंत बहीण तुमच्या घरी असेल तोपर्यंत तुम्ही तिला एकटीला सोडू नका. तसंही तुमच्या पतीला जर कळलं असेल की तुम्हाला ही गोष्ट आता माहीत पडली आहे तर आता ते पुन्हा असं करण्याचं धाडस करणार नाहीत.

  • मी २४ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या विवाहाला २ वर्षं झाली आहेत. पती आणि कुटुंबियांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तरीसुद्धा माझं या घरात मन लागत नाही. कारण मला माझ्या प्रियकराचा विसर पडत नाहीए. खरतर त्याने मला अगोदर लग्नाचं वचन दिलं होतं. पण नंतर त्याच्या कुटुंबियांच्या मर्जीनुसार त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. आता मी काय करू, जेणेकरून त्याचा विसर पडेल आणि मी माझ्या संसारात रममाण होईन?

हे खरंय की, पहिलं प्रेम विसरता येत नाही. पण विसरता न येणं ही गोष्टही तितकी कठीण नाही. आणि तसं पाहिलं तर तुमच्या प्रियकराने तुमची फसवणूकही केली आहे. तुम्हाला लग्नाचं वचन दिलं आणि तुम्हाला संकटात टाकून दुसऱ्याच कुणासोबत लग्नदेखील केलं. म्हणूनच हे एक वाईट स्वप्न समजून ही गोष्ट विसरून जाण्यातच तुमचं हित आहे.

तुमच्या पतीचं आणि कुटुंबियांचं जर तुमच्यावर इतकं प्रेम आहे, तर त्या बदल्यात तुम्हीदेखील त्यांच्यावर प्रेम करायला हवं. तुम्ही संसारात मन रमवलं तर भूतकाळातील या घटनेचा काही दिवसांनी तुम्हाला विसर पडेल.

  • मी १८ वर्षांची विद्यार्थिनी आहे. शाळेत असताना केवळ मैत्रिणीच होत्या. मात्र, आता कॉलेजात मित्रही सोबत शिकत आहेत. जेव्हादेखील एखादा मुलगा माझ्या शेजारी बसतो, तेव्हा मला असं वाटू लागतं की मी त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. मी जेव्हा एकटीच असते तेव्हादेखील त्या मुलाचाच विचार करत राहाते. हे कुणा एका मुलाला पाहून नाही, तर कुणीही मुलगा जो माझ्या संपर्कात येतो, तेव्हा माझ्या मनात अशीच भावना जागृत होऊ लागते. यामुळे मी अभ्यासात मागे पडू लागली आहे.

ही गोष्ट माझ्या दृष्टीने घातक तर नाही ना? मला काय करायला हवं?

तू याविषयी काळजी करू नको. खरं तर या वयात विरूद्ध सेक्सप्रती आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. हे लैंगिक आकर्षण असतं. जसजशी समज येत जाईल तसतसे सर्व काही सामान्य होत जाईल.

हो, पण यासाठी तू अभ्यासात किंवा घरकामात स्वत:ला गुंतवून ठेव. काही दिवसांनंतर तुझी ही समस्या दूर होईल.

  • मी २० वर्षीय विवाहित महिला आहे. माझं अलीकडेच लग्न झालं आहे. माझी ही समस्या आहे की माझ्या स्तनांची पुरेपूर वाढ झालेली नाहीए. त्यामुळे माझ्या पतींना संबंधाच्या वेळेस माझ्या स्तनांमध्ये अधिक रूची वाटत नाही.

शरीरसंबंधादरम्यानही आम्हाला आनंद मिळत नाही. आम्ही काय करायला हवं, जेणेकरून आम्हाला शरीरसुखाचा उपभोग घेता येईल?

स्तनांची वाढ ही आनुवंशिकतेनुसार होत असते. म्हणजेच स्त्रीची शारीरिक रचना आपल्या आईच्या शरीररचनेनुसार असते. एक मूल झालं की स्तनांच्या आकारात बदल होतो, पण स्तनांच्या आकारामुळे शरीरसंबंधाच्या आनंदावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणूनच मनामध्ये कोणतीही हीनभावना न आणता सहवासाचा आनंद घ्या.

सहवासापूर्वी फोरप्ले केल्यानेही उत्तेजना मिळेल आणि शरीरसुखाचा संपूर्ण आनंद घेता येईल.

आरोग्य परामर्श

– डॉ. यतिश अग्रवाल

प्रश्न : माझं वय ३५ वर्षं आहे आणि मी अविवाहित आहे. माझी मासिक पाळी १५ वर्षांपूर्वी सुरु झाली. सुरूवातीचे ६-७ महिने नियमित स्वरूपात येत राहिली. त्यानंतर अनियमित होऊ लागली, पण मी लक्ष दिलं नाही. आता माझं वजन वाढून ८० किलोग्रॅम झालं आहे. उलट माझी उंची ५ फूट १ इंच आहे. आता खुप वर्षांपासून मासिक पाळीसुद्धा येणं बंद झाली आहे. लग्नानंतर मला गर्भधारणेसाठी काही त्रास तर होणार नाही?

उत्तर : तुमच्या माहितीप्रमाणे स्पष्ट होतं की तुमच्या शरीरात लैंगिक हार्मोनल प्रणाली नीट काम करत नाहीए. प्रत्येक स्त्रीच्या देहात १ जैविक हार्मोनल घडयाळ टिकटिक करत असतं. ज्यामुळे दर २८-३० दिवसांनी तिचं शरीर एका लयबद्ध परिवर्तनातून जातं.

हे हार्मोनल घडयाळ तारुण्यात सुरु होतं. याची किल्ली मेंदूमध्ये असलेल्या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथींमध्ये असते. किशोरावस्थेत येताच त्यात काही विशिष्ट प्रकारचे यौन प्रेरक हारमोन्स तयार होणं सुरु होतं आणि त्यापासून प्रेरणा देणारे सिग्नल घेऊन डिम्ब ग्रंथी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार करू लागतात. याच हार्मोन्सच्या प्रभावामुळे दर महिन्यात डिम्ब ग्रंथींमध्ये एक नवा डिम्ब मॅच्युर होतो आणि डिम्ब ग्रंथीतून सुटून बाहेर येतो. याच हार्मोनल हालचालीमुळे महिन्या अखेर स्त्रीला मासिक स्त्राव होतो.

तुमच्या शरीरात हे जैविक चक्र सुरूवातीपासूनच एखाद्या कारणामुळे लय पकडू शकलं नाही. तुमच्या आईवडिलांनी आणि तुम्ही याची खूप पूर्वीच तपासणी केली असती आणि योग्य वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं. आता यात सुधार होणं कठीण वाटतं आहे. परंतु तरीही तुम्ही एखाद्या गायनोकॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली तुमची रीतसर तपासणी करू शकता.

आता लग्न आणि त्यानंतर प्रेग्नन्सीचा विचार करता, तर स्वाभाविक आहे की या सगळया गडबडीत ही इच्छा पूर्ण होणं सोपं नाही. स्त्रीच्या शरीरात वेळेत मासिक स्त्राव होणं ही गोष्ट दर्शवते की तिची प्रजनन व्यवस्था नीट काम करत आहे. जर या  नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम झाला तर अपत्य सुखाची इच्छा पूर्ण होणं कठीण जातं. तरीही प्रजननाच्या नव्या टेक्निकच्या मदतीने प्रयत्न केला जाऊ शकतो.

प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. मला २ मूलं आहेत ५ वर्षांपूर्वी मी गर्भनिरोधासाठी कॉपर टी बसवली होती. याची वेळ संपल्यावर मी त्या जागेवर नवी कॉपर टी बसवली. परंतु गेल्या काही दिवसांपासून जेव्हा मी मूत्रविसर्जनासाठी जाते तर मला प्रत्येक वेळी योनिमार्गावर जळजळ होते. या जळजळीचा सबंध कॉपर टी लावण्याशी आहे का? मी काय करायला हवं?

उत्तर : तुमच्या लक्षणांवरून हे स्पष्ट दिसून येतं की तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं आहे. अशा वेळेस तुमच्या युरीन कल्चरची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि शक्य तितक्या लवकर अँटिबायोटिक औषधं सुरु करायला हवी. औषधाचा परिणाम होण्यासाठी कमीतकमी १०-१४ दिवस ते नियमित घेणं आवश्यक आहे. औषध सुरु होताच २-३ दिवसात आराम वाटेल.

यादरम्यान पाणी आणि इतर द्रव पदार्थ जेवढे जास्त पिता येतील तेवढे प्या. यामुळे मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. जास्त मूत्र तयार झाल्याने मूत्र व्यवस्थेची वेगाने सफाई होते आणि इन्फेक्शन निर्माण करणारे बॅक्टेरिया मूत्राबरोबर शरीराच्या बाहेर जात राहतात.

औषधांचा डोज पूर्ण झाल्यावर परत युरीन कल्चर तपासून घ्या, जेणेकरून ते स्वच्छ होईल आणि युरिनरी ट्रॅकमध्ये काही अपायकारक बॅक्टेरिया तर राहिले नाही ना हे कळेल. काही केसेसमध्ये अँटिबायोटिक औषधं जास्त दिवस घ्यायची गरज भासू शकते.  औषध घेण्यात चालढकल करणं बरोबर नाही. त्यामुळे किडनीजवर  परिणाम होऊ शकतो.

आता कॉपर टी बाबत म्हणाल, तर हा मात्र योगायोगच आहे की ज्या काळात तुम्ही कॉपर टी लावली त्याच काळात तुम्ही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनशी सामना करत आहात, परंतु हे पण शक्य आहे की कॉपर टी लावताना योग्य प्रकारे अँटिसेप्टिक खबरदाऱ्या न पाळल्या गेल्याने इन्फेक्शन झाले असेल.

प्रश्न : मी ४५ वर्षाची महिला आहे. २६ वर्षांची असताना माझं लग्न झालं. वैवाहिक जीवन ठीकठाक चाललं होतं की अचानक मला गर्भाशयाचा टीबी झाला. नंतर १८ महिने मला टीबीची औषधं चालू होती. त्यानंतर डॉक्टरांनी मी बरी झाली आहे हे सांगून माझी औषधं बंद केली. परंतु अजूनही मला मासिक  पाळीच्या वेळेस खूप वेदना होतात आणि योनिमार्गातून पांढरा स्त्राव होतो. दरम्यान जेव्हा मी कधी अँटिबायोटिक्स औषध घेते तेव्हा काही दिवस आराम पडतो, पण काही दिवासांनी पुन्हा तिच समस्या सुरु होते, डॉक्टरकडे मी गर्भाशय काढण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी सरळ नकार दिला. तुमचं काय मत आहे?

उत्तर : एखाद्या अनुभवी आणि योग्य अशा गायनोकॉलॉजिस्टला दाखवणं योग्य राहील. आपली तपासणी करा आणि डॉक्टरला आवश्यक वाटलं तर पेल्वीस म्हणजे पोटाच्या खालच्या भागाची अल्ट्रासाउंड सोनोग्राफी करून घ्या.

योनीतुन पांढरा स्त्राव जाणे, मासिक पाळीच्या वेळेस वेदना होणे आणि अँटिबायोटिक्स घेतल्यावर आराम पडणे याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला सतत इन्फेक्शन होत आहे.

जर योनीत इन्फेक्शन असल्याचे समजले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या पतीचेसुद्धा योग्य उपचार करा. ही सावधगिरीन बाळगल्यास तुम्हाला हे इन्फेक्शन सतत होऊ शकतं.

आता गर्भाशयाच्या टिबीबद्दल बोलायचं झालं तर १८ महिन्यांच्या यशस्वी उपचारांनंतर त्याच्या पुनरावृत्तीचा धोका जवळपास नाहीच आहे.

आरोग्य परामर्श

– डॉ. अमनजीप कौर, मेडिकल निदेशक, अमनदीप हॉस्पिटल

प्रश्न : मी २४ वर्षांची आहे. मासिक पाळीच्या दिवसात माझे पाय खूप दुखतात. हे काळजी करण्याचे कारण आहे का?

उत्तर : नाही. ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीए. मासिक पाळीच्या दिवसात शरीरातील खालील भागात दुखणे नैसर्गिक आहे. ओटीपोटीत होणाऱ्या वेदना शरीराच्या अन्य भागांपर्यंत पोहोचतात. अनेक स्त्रियांना ही समस्या जाणवते. गर्भाशय आकुंचन पावल्यानेही पाय दुखू लागतात.

प्रश्न : मी २४ वर्षांची आहे आणि मॉडेलिंग करते. रोज उंच टाचेची सॅन्डल घालावी लागते. माझे घोटे दुखतात. यामुळे माझ्या चालण्याच्या पद्धतीवर परिणाम होईल का?

उत्तर : घोट्यांमध्ये थोड्याफार वेदना असोत किंवा जास्त, पण असे असेल तेव्हा जास्त काळजी घ्यावी, सावध राहावे. घोट्यांमध्ये वेदना होण्याचे कारण दुखापत किंवा ताण असू शकतो पण आर्थ्रायटिस हेही कारण असू शकते. यामुळे तुमच्या चालण्याच्या पद्धतीत फरक पडू शकतो. पण जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर हळूहळू दुखणे कमी होऊ शकते. तुम्ही कमीत कमी २० मिनिटे घोट्यावर बर्फाने शेकवल्यास वेदनेला आराम मिळेल. असे तीन दिवस तीनवेळा करा.

प्रश्न : मी ३२ वर्षांची आहे. मला हे सांगा की ल्यूकोरिया म्हणजे काय? मी  असे ऐकले आहे की ९८ टक्के महिला यामुळे त्रस्त आहेत आणि यामुळे पुढे हाडांशी संबंधीत समस्या उद्भवतात. हे खरे आहे का? कृपया मला मार्गदर्शन करा.

उत्तर : तुम्ही घाबरण्याची गरज नाही. ल्युकोरिया म्हणजे योनिमार्गातून स्त्रवणारा घट्ट, पांढरा किंवा पिवळसर स्त्राव असतो. ही कधी ना कधी कितीही वर्षांच्या महिलेला उद्भवणारी सामान्य समस्या आहे. जसे की, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, संसर्ग, हारमोन्सचे असंतुलन इ. ल्यूकोरियामुळे हाडांची शक्ती कमी होते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर डॉक्टरांना भेटा.

प्रश्न : मी ४१ वर्षांची आहे. मी लष्करात काम करत होते. मी आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप सतर्क असते. तरीही माझी पाठ दुखते. ही मोठी समस्या आहे का?

उत्तर : ही मोठी समस्या नाही पण भविष्यात ही अवघड समस्या बनू शकते. तुम्ही लष्करात होतात, त्यामुळे व्यायामाचे महत्त्व तुम्हाला माहिती असेलच. वाढत्या वयात येणारी ही सामान्य समस्या आहे. पण पाठदुखीवर इलाज म्हणून व्यायामाचा मोठा भाग आहे. दुखण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. हीट किंवा कोल्ड थेरेपी (आइस पॅक)ही सूज कमी करून पाठीच्या वेदना कमी करण्यात सहाय्यक ठरेल.

प्रश्न : मी ३६ वर्षांची आहे. मला मधुमेह आहे. यामुळे मला भविष्यात हाडांशी संबंधित त्रास होऊ शकतो का? जर हो, तर त्यावरील उपाय काय?

उत्तर : तुम्हाला मधुमेह आहे, तर डॉक्टरांना भेटून योग्य अशा आहाराचे नियोजन केले पाहिजे. तुम्हाला हाडांचे व सांध्यासंदर्भात अनेक प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. माहितीनुसार अशा लोकांना आर्थ्रायटिस आणि सांधेदुखीसारखे त्रास होण्याची दुप्पट शक्यता असते. जर तुम्हाला सांधेदुखीची जाणीव झाली तर ‘हॉट अॅन्ड कोल्ड अप्रोच’ वापरून बघा. व्यायामानेही दुखऱ्या स्नायूंना मजबूती मिळेल व वेदनेबरोबरच सूजही कमी होईल.

प्रश्न : मी ४८ वर्षांची आहे. रोज व्यायाम करते आणि चौरस आहारही घेते. पण तरीही माझे सांधे नेहमी दुखतात. या दुखण्यापासून कशी मुक्ती मिळवू?

उत्तर : तुम्ही चौरस आहार घेता ही चांगली गोष्ट आहे व व्यायामही करता पण कुठल्याही दुखण्यापासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणेही गरजेचे असते. तसेही हल्ली सांधेदुखी ही सामान्य बाब आहे. जर तुमचे दुखणे सहन करण्यापलिकडे असेल तर तुमच्या बसण्याची पद्धत बदला आणि हाडांच्या डॉक्टरांना दाखवा. काही नैसर्गिक उपचार आहेत, ज्यामुळे दुखणे कमी केले जाऊ शकते. तुम्ही हळद व आल्याचा चहा पिण्यास सुरूवात करा. मॅग्निशियम जास्त प्रमाणात घ्या व थोडा व्यायामही करा.

प्रश्न : मी ३८ वर्षांची गृहिणी व दोन मुलांची आई आहे. मी कुठलेही जड सामान उचलू शकत नाही व वाकताही येत नाही. मी काय करू?

उत्तर : तुम्हाला पाठीचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही काही जड सामान उचलण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा स्नायूंना अतिताण आल्यामुळे तुम्हाला अतिशय वेदना होत असतील. एखादी जुनी जखम किंवा फ्रक्चरही ताणामुळे त्रासदायक ठरते व वेदना वाढवते. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतिश अग्रवाल

 प्रश्न : मी ३६ वर्षीय विवाहिता आहे. लहानपणापासून रात्री झोपण्याअगोदर दूध प्यायची सवय आहे. पण आता काही महिन्यांपासून ना मला पिशवीचे दूध पचतेए ना म्हशीचे. जेव्हा पण दूध पिते, पोटात गडबड होते. गॅस बनायला सुरूवात होते आणि म्हणून आता तर दूध प्यायची भीती वाटू लागली आहे. कृपा करून मला सांगा की या अचानक आलेल्या बदलाचे काय कारण असू शकते. दुधाची उणीव कुठल्या घरगुती उपायाने दूर येईल?

उत्तर : आपल्या छोटया आतडीतल्या आतल्या भागात एक पाचक एन्जाइम बनत असते. ज्याच्या मदतीने आपण दूधात मिळणाऱ्या नैसर्गिक साखरेला पचवू शकतो. हे एन्जाइम लॅक्टेजच्या नावाने ओळखले जाते आणि याचे कार्य दूधात उपस्थित लॅक्टोज शुगरला पचवून सरळ ग्लूकोज आणि लॅक्टोजमध्ये स्थरांवरीत करणे हे असते.

काही लोकांमध्ये हे पाचक एन्जाइम जन्मापासून नसते तर काहींमध्ये हे किशोरावस्थेत किंवा वयस्क वयात पोहोचल्यावर बनायचे बंद होते. ही समस्या नेहमी आनुवंशिक असते. व्यापक स्तरावर केल्या गेलेल्या आणि सामूहिक संशोधनानुसार, आशिया खंडातील ५० टक्के लोकांमध्ये ही समस्या असते.

आपल्याप्रमाणेच या लोकांमध्येही दूध आणि अन्य डेअरी उत्पादनं ग्रहण केल्याने वेगवेगळया समस्या निर्माण होतात. पोटदुखी, गॅस बनणे, पोट फुगणे, पोट गडबडणे इत्यादी सर्व याच समस्येचा भाग आहेत.

छोटया आतडीतल्या आतल्या भागातील पाचक पातळीवरचा हा विकार लॅक्टोज इंटोलरन्स म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत असे कुठलही रामबाण औषध तयार झाले नाही की ज्याच्यात अशी ताकत असेल की जे घेतल्यावर छोटया आतडीतील लॅक्टोज एन्जाइम पुन्हा बनू लागेल. असा कोणताही फॉर्मुला शोधलेला नाही, जो आतडयातील एन्जाइमची भरपाई करु शकेल. नशीब समजा की तुम्ही इतकी वर्ष या विकारापासून मुक्त राहू शकलात.

या समस्येपासून तुमचा बचाव व्हावा म्हणून फक्त एकच उपाय आहे की दूध आणि इतर डेअरी उत्पादनं वर्ज करा. ही तुम्ही गोष्ट दही आणि योगर्टवर लागू नाहीए. हे खरे आहे की हीसुद्धा दुधापासून बनलेली उत्पादने आहेत, पण ज्यावेळेस ही बनवली जातात त्यावेळेस लॅक्टोबॅक्टेरीया यात असलेल्या लॅक्टोज शुगरला पचवतात, ज्यामुळे हे लॅक्टोजमुक्त होतात.

बाजारात लॅक्टोजमुक्त दूधसुद्धा मिळते. हे सामान्य दुधापेक्षा महाग असते. आपण हे अगदी आरामात पिऊ शकता. सोयाबीन दूधसुद्धा लॅक्टोज मुक्त असते. दूध आणि अन्य डेअरी उत्पादन बंद केल्यानंतर शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होण्याचा धोका वाटतो. म्हणून त्याच्या भरपाईसाठी एक तर कॅल्शिअमयुक्त जेवण घ्या किंवा पूरकतेसाठी गोळया घ्या. प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डाळी, अन्न, मासे, मटण इत्यादी चांगले स्त्रोत आहेत.

प्रश्न : मी २६ वर्षीय तरूण आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून लॉची डिग्री पूर्ण केल्यानंतर आता एका मोठया लॉ कंपनीमध्ये असोसिएटच्या रूपात काम करतोय, ज्यामुळे माझे स्लिप क्लॉक बिघडले आहे. अंथरुणात झोपल्यानंतरही उशिरापर्यंत झोप येत नाही. दिवसभराच्या घटना डोक्यात थैमान घालत असतात. कृपया काही असे व्यावहारिक उपाय सांगा, ज्यामुळे मला पहिल्यासारखी छानशी झोप यायला लागेल.

उत्तर : हे  खरे आहे की जगात झोपेसारखी दुसरी प्रिय गोष्ट नाही. पुरेशी झोप घेतल्यामुळे मानसिक पातळीवर ताजेतवाने वाटते. शरीरात एक प्रकारची स्फूर्ती येते आणि जेव्हा सकाळी डोळे उघडतात, तेव्हा नसा-नसात उत्साह भरून जातो. वयस्क जीवनात ६ ते ८ तासांची झोप चांगले स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहे.

रात्री उशिरापर्यंत काम करणे ही तुमची विवशता आहे, चांगली झोप येण्यासाठी खालील उपाय लाभदायक ठरू शकतात :

ताण-तणावाचे जग मागे सोडून या : झोप येण्यासाठी मन शांत असणे जरूरी आहे. त्याच्यावर कुठलाही दबाव नको. ऑफिसातून परत आल्यावर थोडी मौज-मस्ती करावी. मन थोडे मोकळे सोडावे, ज्यामुळे  दिवसभराचा तणाव दूर होईल.

मनामध्ये शांतीचे स्वर जागवा : झोपण्याअगोदर असं काही करा की ज्यामुळे मनामध्ये सुख शांतता नांदेल. मग भले ही त्यासाठी रिलॅक्सिंग म्युझिक ऐका, एखादे पुस्तक वा मासिक वाचा आणि जेव्हा डोळे जड व्हायला लागलीत, तेव्हा झोपी जा.

टीव्ही आणि कंम्प्युटर झोपेचे साथी नाहीत : झोपण्याच्याअगोदर उशिरापर्यंत टीव्ही बघणे वा कंम्प्युटरवर काम करणे झोपेमध्ये बाधक ठरू शकते. ज्याच्या तीव्र प्रकाशामुळे मेंदूचे सर्किट जागृत अवस्थेत राहते. साखर झोप हवी असेल तर झोपण्याच्या तास-दीड तास आधी ही साधने बंद करावीत.

हलके जेवण चांगले : झोपण्याअगोदर हलके जेवण घेणे कधीही चांगले. पोट वरपर्यंत भरलेले असेल आणि शरीर पचनाकार्यात व्यस्त असेल तर झोप कशी येणार?

चहा आणि कॉफी घेणे टाळा : संध्याकाळी उशिरा चहा आणि कॉफी घेतल्याने झोप लागत नाही. यातील कॅफिन मेंदूला आराम घेऊ देत नाही.

अंघोळ करावी : अंथरुणात जाण्याच्या १ तास अगोदर अंघोळ केल्यास शरीराला शेक मिळतो आणि पेशी रिलॅक्स होतात. हा थकवा दूर करण्याचा सोपा उपाय आहे.

योगनिद्रा आहे तणावमुक्तीचे उत्तम औषध : झोपण्याअगोदर काही मिनिटे योगनिद्रेत घालवल्याने त्याचा विशेष फायदा होतो. असे केल्याने शरीर आणि मन-मेंदू शांत अवस्थेत पोहोचते आणि लगेच झोप येते.

सकारात्मक विचार मानसिकता ठेवावी. दिवसा काही वेळ व्यायामासाठीही काढावा. वजनावर नियंत्रण ठेवावे. शक्य असेल झोपेची वेळ निश्चित करावी. हे सगळं केल्यावर निश्चितच तुम्ही पुन्हा पूर्वीसारखा साखर-झोपेचा आनंद घेऊ शकाल.

गृहशोभिकेचा सल्ला

  • मी ३१ वर्षांची विवाहित स्त्री आणि ४ वर्षांच्या मुलीची आई आहे. मी एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर जिवापाड प्रेम करतो. मी विवाहित आणि एका मुलाची आई असूनही आम्हा दोघांचे प्रेमसंबंध खूप चांगले आहेत.

आम्ही निर्धास्त होऊन शारीरिकसंबंधही ठेवले आहेत. पण आता अचानक मला असं वाटू लागलं आहे की अशा प्रकारचं वाईट कृत्य मी करायला नकोय. म्हणून मी त्या मुलापासून दुरावा निर्माण केला आहे. पण तरी तो मला वारंवार फोन करत आहे.

तो मला भेटायला बोलवत आहे. मी त्याला एकदा भेटू का? मी काय करू सांगा?

तुम्ही एक विवाहित स्त्री आहात. अशा प्रकारे कोणा दुसऱ्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवून तुम्ही केवळ आपलं वैवाहिक जीवन धोक्यात घालत नव्हतात, तर त्या मुलाचीही दिशाभूल करत होता. हे तर बरं झालं की वेळीच तुम्हाला तुमची चूक कळली आणि तुम्ही तुमचं पाऊल मागे घेतलं. तुमच्यावर केवळ तुमच्या कुटुंबाचीच नव्हे तर तुमच्या लहान मुलीच्या पालनाचीही जबाबदारी आहे. म्हणून आपल्या निर्णयावर ठाम राहा.

तुमच्या प्रियकराला स्पष्ट सांगा की तुम्हाला त्याला भेटायचं नाहीए. म्हणून त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये.

  • मी ३० वर्षांची विवाहित स्त्री असून एका किशोरवयीन मुलाची आई आहे. अलीकडे मी माझ्या एका कौटुंबिक समस्येमुळे खूप चिंतित आहे. मी शासकीय शाळेत शिक्षिका आहे. मात्र माझ्या पतींची सध्या फार वाईट अवस्था सुरू आहे. ते ज्या खाजगी कंपनीमध्ये आधी काम करायचे तिथून त्यांना अचानक असं सांगून काढून टाकलं गेलं की सध्या कंपनीला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे.

आता समस्या ही आहे की त्यांना आपली पोझिशन आणि पात्रतेनुसार काम मिळत नाहीए. त्यांना आधीच्या कंपनीमध्ये जितका पगार मिळत होता, तितक्याच पगारावर काम करायचं आहे. असं घरातच रिकामं बसून त्यांना दोन महिने झालेत.

मी त्यांना सतत सांगते की पगार कमी मिळाला तरी हरकत नाही, पण त्यांनी नोकरीत रूजू व्हावं. पण ते अजिबात ऐकतच नाहीएत. म्हणतात, जग पुढे चालले आहे आणि मी का म्हणून मागे जाऊ? तुम्हीच सांगा, मी त्यांना कसं समजावू?

तुम्ही तुमच्या पतींना या गोष्टीसाठी तयार करा की त्यांना जर त्यांच्या मनासारखं काम मिळालं असेल आणि कंपनीही चांगली असेल तर त्यांनी पगाराला जास्त महत्त्व देऊ नये. कष्ट केले तर पुढे जाण्याचीही संधी मिळेल. नोकरी करता करता यापेक्षा चांगल्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. पण सतत जर ते काही काळ रिकामे बसले तर त्यांचा आत्मविश्वासही खचेल आणि मग चांगली नोकरी मिळणंही आणखीनच कठीण होऊन बसेल.

  • मी १८ वर्षांची तरुणी असून एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर खूप प्रेम करतो पण अलीकडे तो माझ्यावर नाराज आहे. त्याच्या नाराजीचं कारणही मी स्वत:च आहे. खरंतर तो जरा संशयी स्वभावाचा आहे. प्रत्येक गोष्टीवर तो संशय घेत असतो. त्याच्या या वागणुकीमुळे मी खूपच त्रस्त झाले होते.

प्रत्येक गोष्टीसाठी तो मला सतत जाब विचारायचा. त्याला धडा शिकवण्यासाठी मीही एक मूर्खपणाचं पाऊल उचललं. मी एका मुलाशी मैत्री केली.

पण तो मुलगा खूपच धूर्त निघाला. त्याने मला फूस लावून माझ्याशी शारीरिकसंबंधही ठेवले आणि त्यानंतर माझ्याशी बोलणंही सोडून दिलं. माझ्या या बालिश वागणुकीचा आता मला खूपच पश्चात्ताप होत आहे.

माझा प्रियकर जो माझी इतकी पर्वा करायचा तोही मला भाव देत नाहीए. तुम्हीच सांगा, मी काय करू?

तुम्ही तुमच्या प्रियकराच्या संशयी स्वभावामुळे जर त्रस्त होता तर यासाठी त्याला तुम्ही समजावू शकला असता, की मैत्रीमध्ये एकमेकांवर विश्वास असणं फार जरुरी आहे. नाहीतर मैत्री पुढे जात नाही. तुम्ही अजाणतेपणी जी चूक केली त्याच्यासाठी तुम्हाला आता अपराधी वाटत आहे, हेच पुरेसं आहे. आपल्या प्रियकराला समजावण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्यावर प्रेम करतो तर नक्कीच तुमचं ऐकून घेईल. तुम्ही उगाच काळजी करू नका.

  • माझा एक चुलत भाऊ आहे. आम्ही दोघे समवयीन आहोत. आम्ही जेव्हा कधी काकांच्या घरी राहायला जातो तेव्हा रात्रीच्या वेळेस माझा भाऊ माझ्याजवळ येतो. पण त्यावेळेस तो ज्याप्रकारे माझ्यासोबत अश्लील चाळे करतो ते मला आवडत नाहीत. यासाठी मला त्याला अडवताही येत नाही की घरातही मी याविषयी कोणाला सांगू शकत नाही. कृपया तुम्हीच सांगा, मी काय करू?

तुमचा चुलतभाऊ रात्री तुमच्यासोबत अश्लील चाळे करत असेल तर तुम्ही त्याच्या खोलीमध्ये झोपायला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीसोबत झोपू शकता. पण तुम्ही असं काहीच करत नाहीए. तुम्हाला जर त्याची वागणूक खरोखरच आवडत नसती तर तुम्ही पहिल्यांदाच त्याला धमकावलं असतं, म्हणजे त्याने पुन्हा असं करण्याचं धाडस केलं नसतं. पण असं वाटतंय की तुम्हालाही या सगळ्यात मज्जा येते, म्हणून तुम्ही त्याला अडवत नाहीत. अर्थातच, या सगळ्यात तुमची मूक सहमती आहे. पण तुम्हाला हे कळायला हवं की यामुळे पुढे जाऊन तुम्ही अडचणीत सापडू शकता.

म्हणून त्याला यासाठी नकार द्या. तो ऐकत नसेल तर सक्तपणे त्याला धमकी द्या की तुम्ही तुमच्या कुटुंबियांकडे त्याची तक्रार कराल. अशाने तो आपोआपच सरळ होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें