सर्व्हाइकल कॅन्सरपासून कसे वाचाल

* डॉ. अंजलि मिश्रा

भारतीय महिला मासिक पाळीशी संबंधित गोष्टींवर आजही खुलेपणाने बोलणं टाळतात. बहुधा याचमुळे भारतीय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्व्हाइकल कॅन्सर दुसरा सर्वसाधारण कॅन्सर बनून समोर येतोय.

कसा होतो

* सर्विक्स गर्भाशयाचा भाग आहे, ज्यात सर्व्हाइकल कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही)च्या संक्रमणाने होतो.

* हे संक्रमण साधारणपणे शारीरिक संबंधांनंतर होते व या आजारात अनियमित रुपाने सेल्स वाढू लागतात.

* यामुळे योनीमध्ये रक्त येणे बंद होणे व संबंधांनंतर रक्तस्त्राव यासारख्या समस्या निर्माण होतात.

लक्षणे

साधारणपणे सुरुवातीला याची लक्षणे ठळकपणे समोर येत नाहीत, परंतु जर थोडीशी सावधगिरी बाळगली तर याची लक्षणे ओळखता येऊ शकतात :

* नियमित मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव होणे, संभोगानंतर रक्तस्त्राव होणे.

* पाण्यासारख्या दुर्गंधीयुक्त पदार्थाचे जास्त प्रमाणात स्त्रवणे.

* जेव्हा कॅन्सरच्या पेशी पसरू लागतात, तेव्हा ओटीपोटात वेदना होऊ लागतात.

* असामान्य अतिरक्तस्त्राव होणे वजन कमी होणे, थकवा जाणवणे व अॅनिमियाची समस्या ही देखील लक्षणे असू शकतात.

कॅट्रोल करण्याचे व्हॅक्सिन व टेस्ट

* तसे तर सुरुवातीला सर्व्हाइकल कॅन्सरची लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु याला थांबवण्यासाठी व्हॅक्सिन उपलब्ध आहे, ज्यामुळे जवळपास ७० टक्केपर्यंत बचाव होऊ शकतो.

* नियमितपणे तपासणी केली गेली, तर सर्व्हाइकल कॅन्सरची लक्षणे ओळखता येऊ शकतात.

* आजाराचे निदान करण्यासाठी साधारणपणे पॅप स्मीअर टेस्ट केली जाते, या टेस्टमध्ये प्री कॅन्सर सेल्सची तपासणी केली जाते.

* एलबीसी टेक्निकच्या अॅडव्हान्स वापरामुळे सर्व्हाइकल कॅन्सरची तपासणी करण्यात सुधारणा झाली आहे.

उपचार

* जर सर्व्हाइकल कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या स्टेजला केले, तर वाचण्याची शक्यता ८५ टक्क्यांपर्यंत असते.

* तसे तर सर्व्हाइकल कॅन्सरचा उपचार या गोष्टीवर अवलंबून आहे की कॅन्सर कोणत्या स्टेजला आहे. सर्वसाधारणपणे सर्जरीद्वारे गर्भाशय काढले जाते व जर आजार अगदीच अॅडव्हान्स्ड स्टेजला असेल, तर केमोथेरपी व रेडिओथेरपीदेखील दिली जाते.

सावधानता आहे गरजेची

* डॉक्टरकडून सल्ला घेऊन अँटी सर्व्हाइकल कॅन्सरच्या लसी घ्याव्यात.

* महिलांनी विशेषत: व्यक्तिगत स्वच्छतेकडेदेखील लक्ष दिले पाहिजे, कारण जननेंद्रियांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

* मासिक पाळीत चांगल्या प्रतीच्या सॅनिटरी नॅपकिनचा वापर केला पाहिजे.

* वेळीच डॉक्टरांशी संपर्क करणे कॅन्सरच्या उपचारांवरील सगळयात महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे शरीरातील बदलांना दुर्लक्षित करू नये.

महत्त्वपूर्ण तथ्य

स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचे, तर जगातील विकसित देशांमध्ये १०० पैकी एका स्त्रीला आयुष्यात सर्व्हाइकल कॅन्सर होतो, तर भारतात ५३ स्त्रियांपैकी एकीला हा आजार होतो. म्हणजे भारतीय आकडेवारीनुसार जवळपास अर्ध्याचा फरक आहे.

अन्य कारणे

* लहान वयात संभोग करणे.

* एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत

* शारीरिक संबंध ठेवणे.

* अॅक्टिव वा पॅसिव्ह स्मोकिंग.

* सातत्याने गर्भनिरोधक औषधांचा

वापर.

* रोग प्रतिकार शक्ती कमी होणे.

रोगप्रतिकारक शक्ति वाढवणारे खाद्यपदार्थ

*  प्रतिनिधी

तुम्ही अनेकदा डॉक्टरांकडून हे ऐकले असेल की तुमची इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ति कमकुवत आहे. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा खोकला, सर्दी किंवा इतर आजारांना लवकर बळी पडता. आजारी पडण्याचा प्रतिकारशक्तिशी काय संबंध आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल? आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की तुमची रोगप्रतिकारक शक्ति शरीराचे विविध रोगांपासून संरक्षण करते. तुमची रोगप्रतिकार शक्ति जितकी अधिक कणखर होईल तितके तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी आहे.

हवामान कोणतेही असो, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ति योग्य ठेवणे महत्वाचे आहे.

आपण खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तिवर परिणाम होतो. पुढील खाद्यपदार्थ आपली रोगप्रतिकार शक्ति बळकट करतात :

बदाम : दररोज ८-१० भिजवलेले बदाम खाल्ल्याने केवळ शरीराची प्रतिकारशक्तिच वाढते असे नाही तर मेंदूला ताणतणावाशी सामोरे जाण्याची शक्तिदेखील मिळते. व्हिटॅमिन ई शरीरात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या नैसर्गिक किलर पेशींना वाढविण्यास मदत करते, ज्या विषाणू आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. बदामात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी बनवते तसेच सुरकुत्या पडण्याची प्रक्रिया कमी करते.

लसूण : ही मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट बनवून आपल्या रोगप्रतिकार क्षमतेला आजारांशी लढण्याचे सामर्थ्य देते. यामध्ये एलिसिन नावाचा घटक आढळतो, जो शरीराला संसर्ग आणि बॅक्टेरियांशी लढण्याची शक्ति देतो.

आंबट फळे : संत्री, लिंबू, अननस आणि ईडलिंबूसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संक्रमणाशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास मदत होते. या फळांच्या सेवनाने तयार झालेल्या अँटीबॉडीज पेशींच्या पृष्ठभागावर एक कोटिंग बनवतात, ज्यामुळे विषाणू शरीरात प्रवेश करू शकत नाही. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे एलडीएल म्हणजेच शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, जे कार्डियो व्हॅस्क्युलर रोगांपासून संरक्षण करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही आंबट फळांचा समावेश अवश्य करा.

पालक : पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या पालेभाजीला सुपर फूड म्हणून ओळखले जाते. यामध्ये फोलेट नावाचा घटक आढळतो, जो शरीरात नवीन पेशी तयार करण्याबरोबरच त्या पेशींमध्ये असलेल्या डीएनएची दुरुस्ती करण्याचेही काम करतो. यामध्ये असलेले फायबर लोह, अँटिऑक्सिडेंट घटक आणि व्हिटॅमिन सी शरीराला सर्व प्रकारे निरोगी ठेवतात. उकडलेल्या पालक भाजीच्या सेवनाने पचनयंत्रणा योग्यरित्या कार्य करते.

मशरूम : यामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ति वाढते. हे पांढऱ्या रक्त पेशी सक्रिय करण्यात मदत करते. यात सेलेनियम नावाचे मिनरल, अँटीऑक्सिडेंट घटक, व्हिटॅमिन बी आणि नाइसिन नावाची खनिजे आढळतात. यांमुळे मशरूममध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीट्यूमर घटक आढळतात. शिटाके, मिटाके और रेशी नावाच्या मशरूमच्या प्रजातीमध्ये शरीराची रोग प्रतिकारशक्ती बळकट करणारे घटक पुरेशा प्रमाणात आढळतात.

ब्रोकोली : यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी व्यतिरिक्त ग्लूटाथिओन नावाचा एक अँटीऑक्सिडेंट घटकदेखील आढळून येतो. ही एक अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ति बळकट करते, ज्याचा वापर तुम्ही दररोजच्या आहारात सहजपणे करू शकता. थोडयाशा पनीरमध्ये वाफवलेल्या ब्रोकोलीचे मिश्रण करून एक चविष्ट कोशिंबीर तयार केली जाऊ शकते, ज्याच्या सेवनामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम देखील मिळते.

लाल शिमला मिरची : ही भोजनाचा स्वाद तर वाढवतेच, तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटनि सी पुरेशा प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असते. लाल शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ६ असते.

कोरोनापासून असे सुरक्षित ठेवा कुटुंब

* गरिमा पंकज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाबाधित आणि मृतांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडयांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑफीस बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली आहेत. संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. अशावेळी महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

मुलांची काळजी कशी घ्यावी?

मुलांना विश्वास द्या : मुले अनेकदा वस्तूंना हात लावतात. खाण्याचे पदार्थ इतरांशी शेअर करतात. म्हणजे ते संसर्ग पसरवण्याचे मोठे माध्यम आहेत. अशावेळी कोरोना म्हणजे काय आणि त्यापासून दूर राहणे किती गरजेचे आहे, हे तुम्हाला मुलांना सांगावे लागेल. मुलांसोबत या विषयावर मनमोकळेपणाने बोला. त्यांना आवश्यक ती काळजी घ्यायला सांगा.

कोरोना संसर्गासारख्या महामारीबाबत मुलांशी कशाप्रकारे बोलावे, हे त्या मुलांच्या वयानुसार ठरवावे. लहान मुले म्हणजे सर्वसाधारणपणे ६-७ वर्षांच्या मुलांना या विषयावर बोलायला आवडत नाही. याबाबत सांगितलेले ती लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रेमाने जवळ बसवून या आजाराबाबत प्राथमिक माहिती  द्या. कोरेना संसर्गाबाबत सावध करा. मोठया मुलांनाही हात धुणे आणि मास्क लावण्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सांगा की, काही जणांना कोरोना झाला असेल, पण खबररदारी बाळगल्यास काहीच होणार नाही. असे काय करायला हवे ज्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही, याचीही माहिती मुलांना द्या. सोबत कोरोना संसर्गापासून वाचणे आपल्याच हाती आहे, याची जाणीव त्यांना करुन द्या.

तुमच्याकडून मुले शिकतात : लहान मुलांवर आईवडिलांचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याकडूनच ती शिकतात. त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुम्ही बाहेर पडताना मास्क घातलात, वेळोवेळी हात धुतले आणि सॅनिटायजरचा वापर केल्यास मुलेही तुमचेच अनुकरण करतील. युवा अवस्थेतील मुलांचे विश्व वेगळे असते. ते जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी आईवडिलांवर फारशी अवलंबून नसतात. त्यांना याबाबतची माहिती जास्त करुन मित्रांकडून मिळते. त्यामुळेच सर्वकाही ठीक आहे, असे एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला सांगितले तर त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे सांगाल त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर तो तुम्हाला देईल. तुम्ही मुलाशी इतके मनमोकळेपणे वागायला हवे की, मनातील प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी शेअर करेल.

सर्वाधिक धोका कोणाला? : पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे पहायला मिळते. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा आकडा कमी आहे. पण म्हणून खबरदारी घेणे गरजेचे नाही, असा याचा अर्थ होत नाही.

वयाचा विचार केल्यास कोरोना संसर्गामुळे ०.२ टक्के लहान मुले आणि युवकांचा, तर ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या १५ टक्के लोकांना जीवास मुकावे लागले आहे. वाढत्या वयासोबत आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते कारण, त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. वय झालेल्या, आधीपासूनच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या तसेच दम्यासारखे गंभीर आजार असलेल्यांमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच वृद्ध आणि आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या. त्यांना घराबाहेर पाठवू नका.

कोरना संसर्गापासून कसे करावे रक्षण

भेटीगाठी घेणे टाळा : आजारी लोकांना भेटणे टाळा. स्वत: आजारी असाल तर डॉक्टरांकडे जाण्याव्यतिरिक्त इतर कुठेही जाणे टाळा. सर्दी, खोकला झाल्यास रुमालाचा वापर करा. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दरवाजाचे हँडल, स्वीचबोर्ड आदींना सतत हात लावणे टाळा.

घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : घरात ज्या वस्तू दररोज वापरल्या जातात त्या रोज स्वच्छ करा. खुर्ची, जेवणाचे टेबल, विजेची बटणे, दरवाजा इत्यादींचा वापर घरातील सर्वच करतात. म्हणूनच दिवसातून दोनदा त्यांची साफसफाई करा.

हात २० सेकंदांपर्यंत धुवा : पाणी, साबण किंवा हँड वॉशने २० सेकंदांपर्यंत चोळून हात धुवा. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवा. ज्यात ६० टक्के अल्कहोल असेल अशाच सॅनिटायजरचा वापर करा.

मास्कचा वापर : तोंड मास्कने झाकून घ्या. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर वापरा व नंतर तो कचऱ्यात फेकून द्या. बाहेर जातानाही मास्कचा वापर करा. जर तुमच्या जवळपास एखादा विषाणू आलाच तरी तोंड आणि नाक झाकलेले असल्यामुळे तो तुम्हाला संक्रमित करू शकणार नाही आणि तुम्ही सुरक्षित रहाल.

डाएट कसा असावा? : कुठलातरी एखादा खाद्यपदार्थ तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. पण पौष्टिक आणि समतोल आहार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतो. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुमचे शरीर मजबूत होईल. आहारात वैविध्य हवे. विविध प्रकारची फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

फळे आणि पालेभाज्या : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संत्री, मोसंबी, आवळा, लाल किंवा पिवळी शिमला मिरची, किवी, पपई, गाजर, लिंबू इत्यादींपासून तुम्हाला अगदी सहजपणे व्हिटॅमिन सी मिळू शकते.

अंडी आणि डाळी : शरीरात झिंक म्हणजे जस्ताची कमतरता असल्यास तुम्ही सहजपणे आजाराचे शिकार होऊ शकता. गहू, बीन्स, मटार, डाळी इत्यादी झिंकचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.

आल्याचा चहा : तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर आहारात आल्याचा नक्की वापर करा. आल्याची चहा पिणे हे सर्वात उत्तम. आल्यात लोह, जस्त, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.

खोबरेल तेल : घरात जेवण बनवताना सरसोचे तेल किंवा रिफाईंडऐवजी खोबरेल तेलाचा वापर करणे जास्त उपयुक्त ठरेल. यात लॉरिक अॅसिड, आर कॅप्रिलिक अॅसिड असते, जे तुमच्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवून तुमचे विषाणूंपासून संरक्षण करते.

व्हिटॅमिन ए : तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूपच महत्त्वपूर्ण आहे. मासे, अंड्यातील पिवळा बलक, चीज, डाळी आणि मेथी, पालकासारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांमधून तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळू शकेल.

लसूण : यात एलिसीन असते, ज्याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दररोज लसणाच्या दोन पाकळया गरम पाण्यासोबत खा किंवा तुम्ही याचे सूप बनवूनही पिऊ शकता. लसूण खाल्लयाने सर्व प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आणि संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते.

व्हिटॅमिन डी : सूर्यकिरणांपासून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. सुरमई, मासे, अंडी, चीज, मशरममधूनही व्हिटॅमिन डी मिळते.

पाणी : पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कोमट पाणी प्या. स्वत:ला हायड्रंट ठेवा.

आराम आणि व्यायाम : पुरेशी झोप घ्या. सोबतच सकाळच्या वेळेस फेरफटका मारा. व्यायाम अवश्य  करा. व्यायामामुळे शरीर आतून मजबूत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

हॅप्पी प्रेगनन्सी

– डॉ. साधना सिंघल

स्त्रीरोगतज्ज्ञ, श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली

आई बनणे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. परंतु अनेकदा काही कारणांमुळे काही स्त्रिया आई बनू शकत नाहीत. अशा परिस्थितीत निराश होणे स्वाभाविक आहे. परंतु बऱ्याचदा काही गोष्टींची काळजी घेऊन आणि वैद्यकीय सल्ला घेऊन उणिवा दूर केल्यास आई बनण्याचे सुख मिळविता येऊ शकते.

जाणून घेऊया प्रेगनन्सीसाठी कोणकोणत्या खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच प्रेगनन्सीची प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंत याबाबत :

महत्त्वपूर्ण खबरदारी

  • ३२ वर्षांनंतर, स्त्रियांमधील गर्भधारणेची क्षमता कमी होऊ लागते. म्हणूनच जर एखाद्या स्त्रीचे वय ३२ वर्ष झाले असेल तर तिने तिच्या गर्भधारणेस उशीर करू नये. जर ती नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नसेल तर तिने त्वरित विशेषज्ञांना दाखवले पाहिजे.
  • धूम्रपान केल्यानेही आई बनण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. इतकेच नाही, यामुळे गर्भपात होण्याचा धोकादेखील असतो, म्हणून स्त्रियांनी धूम्रपान करू नये.
  • खूप जास्त वजन असणेही आई बनण्यासाठी अडथळा ठरू शकते. जर तुम्ही लठ्ठ असाल आणि तुम्हाला गरोदरपणात त्रास होत असेल तर तुम्ही आपले वजन कमी करा.
  • ज्या महिला शाकाहारी असतात, त्यांनी आपल्या आहारात फॉलिक अॅसिड, झिंक आणि व्हिटॅमिन १२ घेण्याची गरज असते. शरीरात या पोषक तत्त्वांचा अभावही गर्भधारणेत अडथळा आणतो.
  • जर तुम्ही एका आठवडयामध्ये ७ तासांपेक्षा जास्त व्यायाम करत असाल तर तो कमी करणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त व्यायामामुळे ओव्हुलेशनची समस्या निर्माण होते, ज्यामुळे गर्भधारणेत त्रास होतो.
  • शारीरिक निष्क्रियताही कधीकधी गर्भधारणेत अडथळा आणते. जर तुम्ही खूप आळशी, शारिरीकदृष्टया अॅक्टिव्ह नसाल तर तुम्हाला अॅक्टिव्ह व्हावे लागेल.
  • एसटीआय अर्थात लैंगिक संक्रमणामुळेही गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्हाला अशी काही समस्या असल्यास त्वरित उपचार करा.
  • पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, धातू यासह काही रासायनिक घटक असे असतात की ज्यांच्या संपर्कात आल्यामुळे गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होतो. म्हणूनच शक्य तितके यांच्या थेट संपर्कात येणे टाळा.
  • मानसिक तणावही गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करते. म्हणून जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर ते टाळा.

 

गर्भधारणा कशी होते

एक स्त्री जिला दरमहा मासिक पाळी येते, तिच गर्भधारणा करू शकते. खरेतर २ मासिक पाळीदरम्यान ओव्हुलेशन कालावधी असतो. हा तो काळ असतो, जेव्हा अंडाशयातून अंडी रिलीज होतात, म्हणजे सोडली जातात. सामान्य स्थितीत एका स्त्रीमध्ये पुढील मासिक पाळीच्या २ आठवडयांपूर्वी ओव्हुलेशन प्रक्रिया सुरू होते. ओव्हुलेशनदरम्यान सोडलेली अंडी २४ तास जिवंत राहतात आणि त्यानंतर मरतात. ओव्हुलेशनदरम्यान पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध येतो, तेव्हा अंडी आणि शुक्राणू एकमेकांच्या संपर्कात येतात. त्याच वेळी, शुक्राणूने अंडयाला फर्टिलाइज्ड म्हणजे फलित केल्याने स्त्री गर्भधारण करते.

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम वेळ

ओव्हुलेशनवेळी शारीरिक संबंध ठेवणे ही गर्भधारणेसाठी सर्वात चांगली वेळ असते. सामान्य स्त्रीमध्ये ओव्हुलेशनचा कालावधी ६ दिवस असतो. ओव्हुलेशननंतर जिथे अंडी फक्त १ दिवस टिकतात, शुक्राणू १ आठवडयापर्यंत टिकतात. अशाप्रकारे ओव्हुलेशन नंतरचे ५ दिवस गर्भधारणेसाठी उत्तम मानले जातात. विशेषज्ञांच्या मते, जर ओव्हुलेशनच्या १-२ दिवस आधी शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणेची क्षमता मोठया प्रमाणात वाढते, कारण यामुळे शुक्राणूंना अंडयांशी संपर्क साधण्यास अधिक वेळ मिळतो.

गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या समस्या

गर्भधारणेनंतर स्त्रीला खूप काळजी घ्यावी लागते. तसे न केल्यास तिला अनेक समस्या येतात.

उच्च रक्तदाब : गर्भधारणेदरम्यान बऱ्याच महिलांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीची तक्रार असते.

अॅनिमिया : गर्भवती महिलेने पुरेशा लोहाचे सेवन न केल्यास तिच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास आई आणि मूल, दोघांचाही जीव जाऊ शकतो.

संसर्ग : गर्भवती महिलेस इन्फ्लूएन्  हॅपिटायटीस ई, हर्पिस सिम्पलेक्स, मलेरिया इत्यादी आजार होण्याचा धोका अधिक असतो. या आजारांवर वेळेवर उपचार करणे फारच गरजेचे असते, अन्यथा आई आणि मूल दोघांचा मृत्यू होऊ शकतो.

मूत्रमार्गातील असंयम : गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा मूत्रमार्गातील असंयम म्हणजे मूत्रमार्गाचे विकार होतात. ही समस्या उद्भवते तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तणाव : गर्भावस्थेदरम्यान आणि नंतर बऱ्याच स्त्रिया प्रचंड मानसिक तणावाखाली येतात. या तणावाचा परिणाम आई आणि मूल दोघांवर होतो. म्हणून शक्य तितक्या लवकर तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मुलीला अवश्य सांगा मासिक पाळीसंबंधी या टीप्स

* प्रतिनिधी

बहुतांश आया मासिक पाळीबाबत मुलीशी मोकळेपणाने बोलत नाहीत. हेच कारण आहे की या दरम्यान मुली हायजिनच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात आणि अनेक समस्यांच्या भक्ष्य बनतात.

मासिक पाळीबाबत जागरूकता नसणे याचे मोठे कारण आहे. सादर आहेत काही टीप्स ज्या प्रत्येक आईने आपल्या किशोरवयीन मुलीला द्यायला हव्या. जेणेकरून ती मासिकपाळीदरम्यान येणाऱ्या सगळया समस्यांना तोंड देऊ शकेल.

कपडयाला नाही म्हणा : आजही आपल्या देशात जागरूकता कमी असल्याने मासिक पाळी दरम्यान तरुणी कपडा वापरतात. असे केल्याने त्यांना गंभीर आजार होऊ शकतात. कपडयाचा वापर केल्याने होणाऱ्या आजारांबाबत आपल्या मुलीला जागरूक बनवणे हे प्रत्येक आईचे कर्तव्य आहे. मुलीला सॅनिटरी नॅपकीनचे फायदे सांगा आणि तिला याची माहिती द्या की हे वापरल्यास ती आजारांपासून दूर तर राहीलच, शिवाय या दिवसातही मोकळेपणाने वावरू शकेल.

केव्हा बदलावे पॅड : प्रत्येक आईने आपल्या मुलीला हे नक्कीच सांगावे की साधारणत: दर ६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलवायला हवे. याशिवाय आपल्या गरजेनुसारसुद्धा सॅनिटरी नॅपकीन बदलायला हवा. जास्त स्त्राव असल्यास तुम्हाला सतत पॅड बदलावे लागते, पण जर स्त्राव कमी असेल तर सतत पॅड बदलायची गरज नसते. तरीही ४-६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलत राहावे जेणेकरून इन्फेक्शनपासुन सुरक्षित राहू शकू.

गुप्तांगांची नियमित स्वच्छता : मासिक पाळी दरम्यान गुप्तांगांच्या आजूबाजूच्या त्वचेत रक्त गोळा होते, जे संक्रमणाचे कारण बनू शकते. म्हणून गुप्तांगांची नियमित स्वच्छता करण्याचा सल्ला द्या. यामुळे व्हजायनातुन दुर्गंधी येणार नाही.

हे वापरू नका : व्हजायना आपोआप स्वच्छ ठेवण्याची एक नैसर्गीक प्रक्रिया असते, जी चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन कायम ठेवते. साबण योनी मार्गात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाना नाहीसे करू शकते. म्हणून याचा वापर करू नका, असा सल्ला द्या.

धुण्याची योग्य पद्धत : मुलीला सांगा की गुप्तांगांना स्वच्छ ठेवण्यासाठी योनीकडून पार्श्वभागाच्या दिशेने स्वच्छ करा म्हणजे समोरून मागच्या दिशेने. उलटया दिशेला कधीही करू नका. उलटया दिशेने धुतल्यास पार्श्वभागात असलेले बॅक्टेरिया योनीत जाऊ शकतात आणि संक्रमणाचे कारण बनू शकतात.

सॅनिटरी पॅडची विल्हेवाट : वापरलेले पॅड योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने फेकायाला सांगावे, कारण हे संक्रमणाचे कारण बनू शकतात. पॅडस फ्लश करू नका, कारण यामुळा टॉयलेट ब्लॉक होऊ शकते. नॅपकीन फेकल्यावर हात नीट धुणे आवश्यक आहे.

रॅशेशपासून कसे दूर राहाल : मासिक पाळीत जास्त स्त्राव झाल्यास पॅडसचे रॅशेश येण्याची संभावना खूप वाढते. असे साधारणत: तेव्हा होते जेव्हा पॅड खूप काळ ओला राहतो आणि त्वचेववर घासल्या जातो. म्हणून मुलीला वेळोवेळी पॅड बदलायला सांगा. जर रॅश आलाच तर आंघोळीनंतर आणि झोपताना अँटीसेप्टीक ओइन्टमेन्ट लावा. जर ओइन्टमेन्ट लावूनही रॅश बरा झाला नाही तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा.

एकाच प्रकारचा सॅनिटरी नॅपकीन वापरा : ज्या किशोर वयीन मुलींमध्ये स्त्राव जास्त होतो, त्या एकाच वेळी २ पॅड्स अथवा एका पॅडसोबत टोपोन वापरू शकतात किंवा कधीकधी सॅनिटरी नॅपकिनसोबत कपडासुद्धा वापरू वापरतात म्हणजे असे केल्याने त्यांना दीर्घ काळ पॅड बदलावे लागत नाही. अशा वेळी मुलीला सांगा की एका वेळी एकाच प्रोडक्ट वापर. जेव्हा एकाच वेळी दोन प्रकारचे प्रॉडक्ट वापरल्या जातात तेव्हा जाहीर आहे की हे बदलता येत नाहीत, ज्यामुळे इन्फेक्शनची संभावना आणखीनच वाढते.

होली स्पेशल : खेळा आरोग्यदायी अन् सुरक्षित होळी

– प्रतिनिधी

परंपरेनुसार होळी ही गुलालाने खेळली जात असे जो ताज्या फुलांनी बनवला जात होता. पण आजकाल रंग केमिकलचा वापर करून फॅक्टरीमध्ये बनवले जाऊ लागले आहेत. यांमध्ये सामान्यपणे वापरले जाणारे केमिकल्स आहेत, लेड ऑक्साइड, कॉपर सल्फेट, अॅल्युमिनिअम ब्रोमाइड, प्रुशियन ब्लू, मर्क्युरी सल्फाइट. यापासून काळा, हिरवा, सिल्वर, निळा आणि लाल रंग बनतो. हे रंग दिसायला जेवढे आकर्षक दिसतात, तेवढेच हानिकारक तत्त्व यात वापरलेले असतात.

लेड ऑक्साइड रीनल फेलियरचे कारण बनू शकते. कॉपर सल्फेटमुळे डोळ्यांना अॅलर्जी, पफ्फिनेस आणि काही काळासाठी आंधळेपणाचे कारणही बनू शकते. अॅल्युमिनिअम ब्रोमाइड आणि मर्क्युरी सल्फाइट धोकादायक तत्त्व असतात आणि प्रुशियन ब्लू कॉन्टॅक्ट डर्मेंटाइटिसचे कारण बनू शकते. असे काही उपाय आहेत, ज्यांचा वापर करून आपण या हानिकारक तत्त्वांच्या परिणामांपासून स्वत:चे संरक्षण करू शकता.

त्वचेतील ओलावा टिकवा

पारस हॉस्पिटल, गुरुग्रामच्या त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. एच. के. कार सांगतात, ‘‘होळी खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला म्हणजे आपली त्वचा धोकादायक तत्त्वांच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित राहील. स्वत:ला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवा. कारण डिहायड्रेशनमुळे त्वचा रूक्ष होते आणि अशा वेळी आर्टिफिशियल रंगांमध्ये वापरात येणारे केमिकल्स केवळ आपल्या त्वचेलाच नुकसान पोहोचवत नाहीत, तर याचा प्रभाव बराच काळ टिकून राहील. आपले कान आणि ओठांचा ओलावा टिकून राहण्यासाठी व्हॅसलिन लावा. आपल्या नखांवरही व्हॅसलिन लावा.’’

डॉ. एच. के. कार पुढे सांगतात, ‘‘आपल्या केसांना तेल लावायला विसरू नका. असे न केल्यास केसांना होळीच्या रंगांत मिसळलेल्या केमिकल्समुळे हानि पोहोचू शकते. कोणी आपल्या चेहऱ्याला रंग लावत असेल किंवा चोळत असेल, तेव्हा आपण आपले ओठ आणि डोळे चांगल्याप्रकारे बंद करा. श्वासाव्दारे या रंगांचा गंध शरीरात गेल्याने इंफ्लेमेशन होऊ शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

‘‘होळी खेळताना आपल्या कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाका आणि डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा सुरक्षित करण्यासाठी सनग्लासेस लावा.

‘‘जास्त प्रमाणात भांग घेतल्याने आपलं ब्लडप्रेशर वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याचे सेवन चुकूनही करू नका.

‘‘आपला चेहरा कधी चोळून स्वच्छ करू नका. कारण असे केल्याने त्वचेवर रॅशेज आणि जळजळ होऊ शकते. स्किन रॅशेजपासून संरक्षणासाठी त्वचेवर बेसन व दूधमिश्रीत पेस्ट लावू शकता.’’

ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते, त्यांनी वर सांगितलेले उपाय करून खास काळजी घेतली पाहिजे. आजकाल बाजारात ऑर्गेनिक रंगही उपलब्ध आहेत. केमिकल्स असलेल्या रंगांऐवजी हे खरेदी करा. एकमेकांवर पाण्याने भरलेले फुगे मारू नका. त्यामुळे डोळे, चेहरा व शरीराला नुकसान होऊ शकते.

अति थंड असलेले पदार्थ होळीच्या सणावेळी खाण्या-पिण्यापासून लांब रहा.

इन्फेक्शनचा धोका असते.

दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये त्वचा विभागाचे प्रमुख आणि प्रोफेसर डॉ. विजय कुमार गर्ग सांगतात, ‘‘केमिकलच्या रंगांमुळे अॅलर्जीची समस्या, श्वास घेण्यास त्रास व इन्फेक्शन होऊ शकते. रंग घट्ट करण्यासाठी त्यात काचेचा चुराही मिसळला जातो. त्यामुळे त्वचा व डोळ्यांचे नुकसान होऊ शकत. आपण हर्बल रंगांनी होळी खेळणे उत्तम राहील. आपल्याजवळ रुमाल किंवा स्वच्छ कापड जरूर ठेवा, जेणेकरून डोळ्यांत रंग किंवा गुलाल गेल्यानंतर लगेच स्वच्छ करता येईल. रंग खेळताना मुलांची विशेष काळजी घ्या.’’

कोलंबिया एशिया हॉस्पिटल गाजियाबादचे त्वचा विशेषज्ज्ञ डॉ. भावक मित्तल सांगतात, ‘‘शक्य तेवढ्या सुरक्षित, नॉन टॉक्सिक आणि नैसर्गिक रंगांचा वापर करा. हे धोकादायक केमिकलमुक्त व सुरक्षित असतात, शिवाय हे त्वचेवरून स्वच्छ करणेही सोपे असते. एक अन्य मार्ग हा आहे की आपण आपल्यासाठी घरीच रंग बनवावे. उदा. जुन्या काळात फळांची पावडर व भाज्यांमध्ये हळद आणि बेसनसारख्या गोष्टी मिसळून रंग बनवले जात होते. पण लक्षात ठेवा, जर ही तत्त्व चांगल्याप्रकारे बारीक पावडर केलेली नसतील, तर त्वचेवर रॅशेज, लालसरपणा आणि इरिटेशनचे कारण बनू शकते.’’

रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून

– डॉ. डी.जे.एस. तुला, हेड ऑफ कॉस्मेटिक डिपार्टमेंट, प्राइम्स सुपर

होळी हा रंगांचा सण सर्वच वयोगटातील व्यक्तींना साजरा करावासा वाटतो. यामध्ये धर्म महत्त्वाचा नसतो. कारण प्रत्येकाला या सणामध्ये आनंदाने सहभागी व्हावंसं वाटतं.

रंगांचा हा सण आनंद देतो आणि मनोरंजन तर करतोच. पण हा सण काही कारणांमुळे शरीरासाठीही महत्त्वाचा आहे. होळी अशावेळी येते, जेव्हा वातावरण बदलत असतं आणि त्यामुळे मन आळसावत असतं. शरीरात शिथिलता जाणवते, ही शिथिलता दूर करण्यासाठी मोठ्या आवाजात संगीत ऐकणं, मोठ्या आवाजात गाणं आणि बोलणं हा उपाय आहे.

होळीला जुना इतिहास आहे. पूर्वी खऱ्या फुलांपासून बनवलेले रंग वापरले जात. पण गेल्या काही वर्षांत रासायनिक आणि नकली रंग या सणाचा एक भाग बनले आहेत. आजकाल होळीच्या रंगांमध्ये लँड ऑक्सिजन, इंजिन ऑईल, तांबा सल्फेट इत्यादींची भेसळ असते. यामुळे विविध प्रकारची एलर्जी आणि जळजळ होऊ शकते.

रंगांमुळे केसही खराब होतात. केसांमध्ये कोंडा होऊन ते गळू लागतात.

होळीच्या रंगांमुळे होणारे काही गंभीर त्वचाविकार खालीलप्रमाणे आहेत.

क्झिमा : हा कृत्रिम रंगांच्या प्रभावामुळे होणारा सर्वाधिक किचकट विकार आहे. या एलर्जीमुळे त्वचेला सूज येते, ज्यामुळे चिडचिड होऊ लागते.

त्वचेची सूज : या एलर्जीमध्ये गंभीर वेदना, त्वचेला खाज येणे याशिवाय जखमेवर खपली तयार होते.

राइनायटिंग्ज : यामुळे नाकपुड्यांमध्ये सूज येते. नाकातील रक्त असुंतलित झाल्याने खाज आणि शिंका येतात.

दमा : कृत्रिम रंगांमुळे अस्थमा होऊ शकतो. यामुळे श्वसनात अडथळे येतात.

निमोनिया : श्वासाबरोबर रासायनिक रंग शरीरात गेल्याने आणखी एक विकार होऊ शकतो, ज्याचं नाव आहे निमोनिया. यामध्ये छातीत वेदना, थकवा, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

या सूचनांचा अवलंब करून होळीचा पुरेपूर आनंद लुटा.

* त्वचेवरील रंग लवकर निघावेत म्हणून एक दिवस आधी राईचं तेल लावा. खासकरून चेहरा, हात आणि पायांवर. होळीच्या रंगांच्या हानिपासून वाचवण्यासाठी केसांनांही रंग लावा. त्यामुळे केसांवर रंगांचा थर पातळ लागतो आणि केस सुरक्षित राहतात.

* शरीरावर सनस्क्रीन लोशन लावल्याने त्वचेवर रंगांचा वाईट प्रभाव पडत नाही.

* त्वचेवरील रंगांचा प्रभाव कमी करण्यासाठी होळी खेळण्याच्या अर्धा तास आधी थंड क्रिम, व्हॅसलिन, ऑलिव्ह किंवा नारळाचं तेल शरीरावर व्यवस्थित लावा.

* चेहऱ्यावरचा गुलाल काढण्यासाठी रगडण्याऐवजी क्लिजर वापरा, यानंतर त्वचेला मऊपणा आणणारं माइश्चराइजर वापरा. खास करून संवदेनशील त्वचेसाठी असलेलं माइश्चराइजर वापरावं.

* चोळू लावले गेलेले रंग काढण्यासाठी चेहरा साबणाऐवजी फेशवाशने धुवा. रंग काढण्यासाठी त्वचा हलक्या हातांनी चोळा. रगडू नका. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.

* पापण्या आणि डोळ्यांच्या आजूबाजूला सनस्क्रीन लोशन लावल्याने डोळ्यांवर रंगांचा कमी प्रभाव पडतो आणि डोळ्यांचं संरक्षण होतं.

* रंग धुतल्यानंतर डोळ्यांमध्ये गुलाबजल घातल्याने डोळ्यांना आराम मिळतो.

* डोळ्यांमध्ये सुका रंग पडल्याने डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. डोळे रगडू नका. त्यामुळे जळजळ होईल.

निरोगी त्वचेसाठी उपाय

* अंघोळीआधी एक तास मुलतानी माती पाण्यात भिजवा. होळी खेळून झाल्यावर रंगलेल्या अंगावर याचा लेप लावा. सुकल्यानंतर गरम पाण्याने धुवा.

* खूप प्रयत्न करूनही एखादा रंग निघत नसेल तर मातीच्या तेलात कपडा भिजवून तो शरीरावर हलक्या हाताने रंगडा, रंग निघेल.

* बेसनात गोडं तेल, मलई आणि गुलाबपाणी मिसळून हा लेप आपल्या चेहरा, हात आणि पायांवर व्यवस्थित लावा. लेप व्यवस्थित सुकल्यानंतर हळूहळू चोळून तो काढा.

* अर्धी वाटी दह्यामध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळा. तो रंगांच्या डागांवर लावून हळूहळू चोळत कोमट पाण्याने धुवा. अंघोळीनंतर क्रिम लावायला विसरू नका.

* सोयाबीनच्या पिठात किंवा बेसनमध्ये दूध, मीठ, ग्लिसरीन आणि सुगंधी तेल काही थेंब टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण शरीरावर लावा. हा लेप लावून तुम्हाला तजेलदार वाटेल.

* शरीरासोबत नखांचीही काळजी घ्या. रंगांचा त्रास होऊ नये म्हणून नखं आधीच कापा आणि त्यावर नेलपेंट लावा.

* दातांच्या सुरक्षेसाठी दंतटोपी लावा.

* त्वचेला रंगांपासून वाचवण्यासाठी संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घाला. पांढरे किंवा फिकट रंगांचं कपडे घालणं टाळा. असे कपडे होळीचे रंग जास्त शोषून घेतात.

* त्वचा जळजळत असेल तर लगेच पाण्याने धुवा. एखादं चांगलं लोशन लावा.

होली स्पेशल : होळी सेफ्टी टीप्स

* प्रतिनिधी

होळीचा उत्सव म्हणजे खूप सारी पंचपक्वान्नं, गोडधोड, भांगसोबतच मित्र, कुटुंबासह गुलाल, रंगांच्या उधळणीत रंगून जाणे. लोक आता गुलालापेक्षा जास्त गडद केमिकलयुक्त रंगांनी होळी खेळणे पसंत करू लागले आहेत. ते अशी होळी खेळण्यात इतके रंगून जातात की स्वत:चेच नुकसान करून घेतात. तज्ज्ञांच्या मते, केमिकलयुक्त कलर आणि डायच्या वापरामुळे स्किन इन्फेक्शन, डोळे आणि केसांचे नुकसान होते.

डर्मोटोलॉजिस्ट आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. शैफाली ट्रासी नीरूरकर सांगतात, ‘‘होळीदरम्यान सिंथेटिक रंगांच्या वापरामुळे त्वचेची जळजळ आणि ती लालसर होण्याची समस्या निर्माण होते. बऱ्याचदा इरिटेशन इतके जास्त वाढते की ते पिग्मेंटेशनचे कारण ठरू शकते.’’

त्या सांगतात, बहुतांश रंग अल्कलाइन हा बऱ्याच रंगांचा बेस असतो. तो डोळयात गेल्यास दृष्टीवर परिणाम होतो. जे रंग पेस्ट फॉर्ममध्ये असतात, त्यात इंजिन ऑइल असल्यामुळे ते खूपच विषारी असतात. बरेच लोक स्वस्त रंगांच्या नादात हर्बल रंगांकडे दुर्लक्ष करून हेच रंग खरेदी करतात, जे त्यांचे नुकसान करू शकतात. म्हणूनच अशावेळी होळीचा उत्सव संपूर्ण सुरक्षेसह साजरा करणे गरजेचे आहे.

डॉ. नीरूरकर यांच्याकडून माहिती करून घेऊया होळीच्या सेफ्टी टिप्स

* होळी खेळण्यापूर्वी तुम्ही आपला चेहरा आणि हातांना राईचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावा. कारण यामुळे थेट चेहऱ्याला रंग लागत नाही आणि यामुळे रंगही सहज काढता येतो. सोबतच तुम्ही कमीत कमी ३० एसपीएफचे सनस्क्रीन संपूर्ण शरीराला लावा, जेणेकरून त्वचेवर रंगांचा जास्त परिणाम होणार नाही.

यासाठी नायकाचा सल्ला आहे की तुम्ही तिजोरी कोल्ड प्रोसेस्ड आलमंड अँड मस्टर्ड ऑइल, नायका कंट्री रोज बॉडी लोशन आणि न्युट्रोजिना अल्ट्रा शीर ड्राय टच सनब्लॉक एसपीएफ ५०+ चा वापर करा.

* तुम्ही केसांना चांगल्याप्रकारे तेलाने मसाज करा. ते रंगांना केसांच्या त्वचेच्या आत जाण्यापासून रोखते. त्या सांगतात, ‘‘होळीची मजा लुटल्यानंतर फक्त शाम्पूच पुरेसा नसतो तर केसांना चांगल्याप्रकारे तेल लावणेही गरजेचे असते.’’

यासाठी नायकाचा सल्ला आहे की तुम्ही कामा आयुर्वेदा एक्स्ट्रा वर्जिन ऑर्गेनिक कोकोनट ऑइल वापरा.

*द्य होळी खेळताना रंग तोंडात जाण्याची भीती सर्वात जास्त असते. यासाठी त्या सांगतात, ‘‘तुमचे दात खराब होण्यापासून वाचविण्यासाठी डेंटल कॅप वापरा किंवा जेव्हा कोणी रंग लावेल त्यावेळी तोंड व्यवस्थित बंद करून घ्या.’’

* डॉ. शैफाली सांगतात, ‘‘होळी खेळताना तुम्ही आपली त्वचा व्यवस्थित कव्हर करा. यासाठी तुम्ही डोक्यावरून स्कार्फ घेऊन केसांचे रक्षण करू शकता. सोबतच फुल स्लीव्हजचे कपडे, लाँग पँट किंवा सलवार वगैरे घालू शकता, ज्यामुळे तुम्ही त्वचेला बऱ्याच अंशी रंग लागण्यापासून वाचवू शकाल.

यासाठी नायकाचा सल्ला आहे की तुम्ही प्रोयोग वूमन ऑर्गेनिक योगा फोल्डओवर वेस्ट पँट्स आणि जॉकी ब्लॅक पोलो शर्ट घालू शकता.

* होळी खेळायला जाताना सनग्लासेस घालूनच बाहेर पडा किंवा जेव्हा कोणी तुमच्या चेहऱ्याला रंग लावायला येईल तेव्हा डोळे बंद करून घ्या, जेणेकरुन तुमच्या डोळयात रंग जाणार नाही. मात्र त्यानंतरही तुमच्या डोळयात रंग गेल्यास डोळे चोळू नका तर ते त्वरित पाण्याने धुवा आणि रोझ वॉटरचे काही थेंब डोळयात घालून त्यांना थंडावा द्या. यामुळे डोळयांची जळजळ दूर होईल.

यासाठी नायकाचा असा सल्ला आहे, नीविआ स्किन ब्रीध मिसैलर रोज वॉटरचा तुम्ही वापर करू शकता.

* होळीची मौजमस्ती पूर्ण होईल तेव्हा चेहरा एखाद्या चांगल्या मॉइश्चरायझरने स्वच्छ करा. कारण रंगांत खूपच कोरडेपणा असतो आणि त्यामुळे साबण किंवा हार्श फेसवॉशने चेहरा स्वच्छ केल्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर तुम्ही अंघोळीनंतर मॉइश्चरायझिंग क्रीम वापरा. यामुळे त्वचेतील आर्द्रता कायम राहील.

यासाठी नायकाचा सल्ला आहे की तुम्ही ओले रीजेनरिस्ट क्रीम क्लिंजर, न्यूट्रोजिना लिक्विड फेस क्लिंजर्स आणि नीविया कोको नरिश बॉडी लोशनचा वापर करा.

* चेहऱ्यावरून रंग हटवण्याचा घरगुती उपाय म्हणजे रोझ वॉटरमध्ये बेसन, स्वीट आलमंड ऑइल आणि दुधाची साय एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि जेव्हा ती सुकेल तेव्हा हळूवार हातांनी रब करा.

यासाठी नायकाचा असा सल्ला आहे की तुम्ही खादी नॅचरल स्वीट आलमंड हेअर अँड बॉडी हार्बर ऑइल आणि रुट्स अँड अबव आयुर्वेदिक रोज वॉटर वापरा.

* चेहरा आणि हातांसोबतच नखांचे रक्षण करणेही तितकेच गरजेचे आहे. ट्रासी यांनी सांगितले, ‘‘नखांना रंगांपासून वाचविण्यासाठी तुम्ही नेलपेंट लावा, म्हणजे होळीनंतरही तुमची नखे पहिल्यासारखीच सुंदर राहू शकतील.

यासाठी नायकाचा असा सल्ला आहे की तुम्ही नायका नेल केअर डबल ड्युटी टू इन वन टॉप अँड बेस कोट वापरा.

जेव्हा असते अनियमित मासिक पाळी

– डॉ. राधिका बाजपेयी, गायनोकोलॉजिस्ट, इंदिरा आयव्हिएफ हॉस्पिटल, लखनौ

पीरियड्सच्या वेळी दुखणे ही एक साधारण बाब आहे. याला डिसमेनोरिया असे म्हणतात. बोलीभाषेत यास मेनस्ट्रुअल पेन असेही म्हणतात. काहीवेळा हे दुखणे जास्त त्रासदायकही ठरू शकते. रक्तस्त्राव जसजसा कमी होत जातो तसतशी ही समस्यादेखील कमी होत जाते. जेव्हा हे दुखणे कुठल्यातरी आजाराचे कारण बनते, तेव्हा याला सेकण्डरी डिसमेनोरिया असे म्हणतात.

सेकण्डरी डिसमेनोरियाची अनेक कारणे असू शकतात, जसे इन्डोमिट्रिओसिस युटरिन फायब्रॉइड्स आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज (सेक्सच्या दरम्यान पसरणारा रोग) इन्डोमिट्रिओसिसची समस्या आनुवंशिक असल्याचे पाहायला मिळते. आईला हा रोग झाला असेल तर मुलीला तो होण्याची शक्यता ८ टक्के असते. बहिणींना होण्याचा धोका हा ६ टक्के असतो. ७ टक्के चुलत भावंडांमुळे होऊ शकतो. याचे वैशिष्टय हे आहे की जवळजवळ ३०-४० टक्के रुग्ण ज्यांना एन्डोमेट्रिओसिस आहे, त्यांना वंध्यत्वाची समस्याही आढळून येते.

अनियमित पीरियड्स हे अनेक शारीरिक समस्यांमुळे होतात. सामान्य स्थितीत पाळीचे चक्र ३ ते ७ दिवसांचे असते. अनेक वर्षांच्या कालावधीत हे चक्र स्थिरस्थावर होते. एवढेच नाही तर काही स्त्रिया मासिक पाळी कधी येणार याचा अचूक अंदाजही बांधतात. काही स्त्रियांना अति रक्तस्त्राव होतो तर काहींना नसल्यातच जमा असतो. टीनएज मुलींमध्ये अशा प्रकारची समस्या ही हार्मोन्सच्या असंतुलनामुळे उद्भवू शकते. परंतु एका ठराविक वयात मात्र या बदलाची काही वेगळी कारणे असू शकतात.

अनियमित मासिक पाळीमुळे केस गळणे, डोके दुखणे, शरीर आखडल्यासारखे वाटणे असे त्रास होऊ शकतात. एवढेच नाही तर रोजच्या वागणुकीत चिडचिडेपणाही दिसून येऊ शकतो. त्यामुळे अनियमित मासिक पाळीच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

असे का होते

असाधारण रक्तस्त्राव हा अनेक कारणांनी होऊ शकतो. ज्यात हार्मोनमधील बदलही अंतर्भूत आहेत. हे हार्मोनल बदल कधीकधी तारुण्य, गर्भावस्था, रजोनिवृत्ती यांमुळेही होऊ शकतात. वास्तविक हे बदल अनेकदा स्त्रियांच्या सामान्य प्रजनन काळात होतात.

हार्मोनल बदल २ कारणांमुळे होऊ शकतात – महिला प्रजनन किंवा इतर कोणत्यातरी हार्मोनमुळे उदा. थायरॉइड वगैरे.

लिव्हर हे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांना मेटाबोलाइज करून महिलांमध्ये मासिकपाळी नियमित करते. अशात अल्कोहोलचे सेवन लिव्हरला हानी पोहोचवते, ज्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.

उशिरा येणाऱ्या किंवा अजिबात न येणाऱ्या मासिक पाळीचे एक कारण आहारदेखील आहे. वजनाचाही यावर खूप मोठा परिणाम होतो. जर तुम्ही चुकीचा आहार घेत आहात किंवा तुमचे वजन जास्त असेल तर यादरम्यान काही हार्मोन्सच्या स्रावांचे प्रमाण बदलते, ज्याचा मासिक पाळीवर परिणाम होतो.

याशिवाय थायरॉइड हार्मोन्स कमी वा जास्त झाल्यासही मासिक पाळी नियमित येत नाही. तणाव हेदेखील अनियिमिततेचे एक मुख्य कारण आहे. जर तुमच्या रक्तप्रवाहात कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात असेल तर तुमच्या मासिक पाळीची वेळ बदलू शकते. अनेकदा मेनोपॉज सुरू होण्याच्या १० दिवस अगोदरच अनियमित मासिकपाळी सुरू होते.

लक्षणे

इन्डोमिट्रिओसिसची लक्षणे काही रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात तर काहींमध्ये कमी आढळून येतात. याचे सामान्य लक्षण म्हणजे ओटीपोटात दुखणे आणि वंध्यत्वाची समस्या उद्भवणे. मासिक पाळी दरम्यान पोटाच्या खालच्या भागात दुखते. याशिवाय कधीकधी मासिकपाळी आधी किंवा नंतरही दुखू शकते. काही महिलांना शारीरिक संबंधांच्या वेळेस, युरिन रिलीज करताना, किंवा स्टूल करतानासुद्धा या वेदनेचा अनुभव येतो.

वय

इन्डोमिट्रिओसिसची समस्या युवावस्थेत दिसून येते. जेव्हा महिलांमध्ये मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. ही स्थिती मेनोपॉजपर्यंत किंवा पोस्टमेनोपॉजपर्यंत राहू शकते. इन्डोमिट्रिओसिसचा प्रॉब्लेम बहुतांश महिलांमध्ये २५ ते ३५ वयात कळून येतो.  मात्र हे प्रॉब्लेम त्या मुलीमध्ये वयाच्या ११ व्या वर्षीपासूनही असू शकतात. इन्डोमिट्रिओसिसचा प्रॉब्लेम पोस्टमेनोपॉजल महिलांमध्ये कमी आढळून येतो.

काय करावे

या समस्येपासून दूर राहण्याकरता आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जास्तच त्रास होत असेल खासकरून  टीनएज मुलींमध्ये अशी समस्या आढळली तर त्यांना स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवले पाहिजे नाहीतर पुढे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात

दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याव्यतिरिक्त, रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. भारतीय महिला या अॅनिमियाच्या अधिक शिकार आहेत. असामान्य आणि अनियमित रक्तस्रावासोबत होणारे हार्मोनल बदल हे वाढलेले वजन आणि गर्भधारणा होण्यात येणाऱ्या अडचणींशी निगडित आहेत.

अशावेळी काय केले पाहिजे

तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. हार्मोनल बदल हे औषधांनी ठीक करता येतात. असामान्य रक्तस्त्राव हा हार्मोनल बदलांव्यतिरिक्त इतर कारणांमुळेही होऊ शकतो, जसे फायब्रॉइड, संसर्ग इ. एवढेच नाहीतर कॅन्सरमुळेदेखील असे होऊ शकते.

उपचार

इन्डोमिट्रिओसिसवर औषधे आणि शस्त्रक्त्रिया हे दोन्ही उपचार संभव आहेत. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये वेदनाशामक औषधे दिली जातात. सर्जरी ट्रीटमेंटमध्ये लॅप्रोस्कोपी केली जाते. ज्यात अॅनेस्थेशिया देऊन एक छोटा टेलिस्कोप पोटाच्या आत पोहोचवून सर्जरी करून इन्डोमिट्रिओसिसची समस्या नष्ट केली जाते.

एन्डोमेट्रिओसिसच्या ट्रीटमेंटचा उद्देश हा वेदनेपासून सुटकारा देण्याव्यतिरिक्त वंध्यत्वाची समस्या दूर करणे हादेखील असतो.

आशा

इन विट्रो फर्टिलायझेशन(आयवीएफ) प्रोसीजर याबाबतीत खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, खासकरून इन्डोमिट्रिओसिसने पीडित महिलांमध्ये जेव्हा वंध्यत्वाची     समस्या आढळून येते, आयव्हिएफ तंत्राद्वारे लॅबमध्ये स्पर्म आणि एग यांचे फलन केले जाते. मग याद्वारे तयार झालेले भ्रुण महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते. या प्रक्रियेद्वारे प्रेग्नन्सी रेट हा ५० ते ६० टक्यांनी वाढवता येऊ  शकतो.

लठ्ठपणा तुम्हाला ओझं वाटतोय का?

* शैलेंद्र सिंह

उत्तर प्रदेशात प्रयागराज शहरात राहणारी वर्निका शुक्ला स्वत:ला उत्तर प्रदेशातील पहिली प्लस साईज मॉडेल म्हणवून घेते. तिने राष्ट्रीय स्तरावरील अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. ती मॉडेलिंग करते आणि यासोबतच ती सिंगल मदर्ससाठी ‘मर्दानी द शेरो’ ही संस्थासुद्धा चालवते. ती टीचर आहे. ती इतके काम करते की तिच्याकडे पाहून कोणीही असे म्हणू शकत नाही की प्लस साईज सुंदर नसते.

प्लस साईजच्या बाबतीत फॅशनजगत बदललेले आहे. वर्निका सांगते की अलीकडे फॅशन वीकमध्ये प्लस साईजचा एक वेगळा राउंड असतो. फॅशन क्षेत्रात अशी अनेक दुकानं असतात, ज्यात प्लस साईज कपडे मिळतात. अशा कपडयांसाठी प्लस साईज मॉडेलची गरज असते. त्यामुळे प्लस साईजमुळे चिंतीत व्हायची आवश्यकता नाही.

साईज नाही मानसिकता बदला

समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. यात अनेक लोक असे असतात जे लठ्ठ असूनही आपले काम चांगल्याप्रकारे करत कार्यरत असतात आणि काही असेही असतात, जे तेवढे लठ्ठ तर नसतात पण उगाच चिंतित असतात.

सायकोथेरपीस्ट नेहा आनंद मानतात, ‘‘लठ्ठपणा ही एक मानसिक समस्या आहे. जर तुम्ही असेच मानू लागलात की तुम्ही लठ्ठ आहात आणि कोणतेच काम करू शकत नाहीत तर खरेच काहीही करू शकणार नाही. जर तुम्ही तुमचे खाणेपिणे व्यवस्थित ठेवून व व्यवस्थित व्यायाम करून शरीराला तंदुरुस्त ठेवत असाल तर लठ्ठपणा कधीच तुमच्या मार्गातला अडथळा ठरणार नाही.’’

याबाबत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की फॅट्सची शरीराला आवश्यकता असते. हे शरीराच्या बायोलॉजिकल कार्यांमध्ये विशेष भूमिका निभावते. फॅट्सची एक सूक्ष्म रेखा असते. जर लठ्ठपणाची ही सूक्ष्म रेखा पोटाच्या आसपास भेदून जात असेल तर धोका वाढतो. मुलींनी आपली वेस्टलाइन ३५ इंचांपेक्षा कमी आणि मुलांनी ती ४० इंचांपेक्षा कमी ठेवायला हवी.

फॅट्स नियंत्रणात ठेवणारा आहार घ्या

पोट भरावे म्हणून खाऊ नका. खाताना हे लक्षात ठेवा की आहार असा असावा, ज्यामुळे शरीराला चांगल्या प्रमाणात कॅलरी मिळू शकतील. काही पदार्थ असे असतात की ते खाल्ल्याने पोट भरते पण योग्य प्रमाणात कॅलरी मिळत नाही. केवळ फॅट्स वाढतात. जितक्या कॅलरीज तुम्ही अन्नाद्वारे घेता तेवढया बर्न करायला तेवढी मेहनतसुद्धा करावी लागते. एका शरीराला १६०० कॅलरीजची गरज असते. जर काम कमी करत असाल तर १००० ते १२००  कॅलरीज घ्यायला हव्या. आक्रोड, बदाम, राईचे तेल आणि डाळी यात फॅट्स कमी करणारे पदार्थ आढळतात.

तळलेल्या पदार्थांच्या जागी भाजलेले मोड आलेले कडधान्य घ्या. याने पोटही भरते व शरीराला पौष्टीक घटकसुद्धा मिळतात. डाएट शेड्युलची आखणी करताना द्रव पदार्थांचासुद्धा समावेश करा. शहाळयाचे पाणी व मोसंबीचा रस यांचा जास्त वापर केल्यास फॅट्स वाढत नाहीत. फॅट्स कमी करायला एखाद्या स्लिमिंग सेंटरमध्ये जाण्यापेक्षा व्यायाम करा. लठ्ठपणा शरीराला मिळणाऱ्या आणि खर्च होणाऱ्या कॅलरीतील असंतुलन वाढवते.

व्यायाम न करणाऱ्यांमध्ये वा बसून काम करणाऱ्यांमध्येसुद्धा ही समस्या वाढलेली आढळते. अनेक लोक मानसिक तणावाखाली असताना जास्त जेवण घेतात. यामुळेसुद्धा लठ्ठपणा वाढतो. किशोरावस्थेत आलेला लठ्ठपणा नंतर टिकून राहतो. महिलांमध्ये काही शारीरिक बदल झाले तर लठ्ठपणा वाढतो. गर्भावस्थेत लठ्ठपणा वाढतो. शरीराचे अपेक्षित वजन उंचीप्रमाणे असावे, ज्यांमुळे शरीराची प्रमाणबद्धता सुंदर वाटेल. बॉडी मास हा शरीराचे योग्य वजन मोजायचा अचूक उपाय आहे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) उंचीचा गुणाकार करून वजन किलोग्रॅमशी भागाकार करून मोजता येतो.

सेक्समध्ये बाधक नसतो लठ्ठपणा

अधिकांश लोकांचा असा ग्रह असतो की लठ्ठपणा सेक्समध्ये अडथळा आणतो. सेक्समध्ये समाधानी नसल्याने वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो. ज्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व त्याचा लठ्ठपणा बिघडवत नाही, अशा व्यक्तींकडे लोक आकर्षित होतात व त्यांना सेक्स करण्यात काही अडचण येत नाही. जर एखाद्याचा जोडीदार लठ्ठ असेल तर दुसऱ्याने त्याला सेक्स करण्यास उद्युक्त करायला हवे. सेक्सदरम्यान अशा क्रिया अवलंबायला हव्या, ज्यात लठ्ठपणा बाधा आणणार नाही. लठ्ठ व्यक्ती लवकर थकतात.

लठ्ठ स्त्रिया आणि पुरुषांच्या वेगवेगळया समस्या असतात. लठ्ठपणाला अगदी सहजतेने घेऊन सेक्स क्रियांमध्ये बदल करून त्याचा आनंद उपभोगता येऊ शकतो. लठ्ठ व्यक्तीला वाटत असते की ती आपल्या जोडीदाराला सेक्सबाबत समाधानी ठेवू शकत नाही. म्हणून आपल्या मनात न्यूनगंड न ठेवता आपल्या जोडीदाराच्या गरजा समजून घेऊन त्याला सहकार्य करायला हवे.

शरीर तसेच मनही फिट ठेवा

लठ्ठपणामुळे आपला जुना काळ आठवून तुलना करणे योग्य नाही. अनेकदा लोक आपले जुने फोटो पाहून असे म्हणत असतात की मी पूर्वी असा होतो. मी बारीक तर होतोच पण किती आकर्षक होतो. असे विचार नैराश्य आणण्यास मदत करतात. नेहमी आपण आपल्या लठ्ठपणाबाबतच विचार करत राहतो. अशी मानसिकता बरी नाही की मी २० वर्षांचा होतो तेव्हा शारीरिक आणि आकर्षक होतो.

शारीरिक आकर्षणच सगळे काही नाही

नेहा आनंद सांगतात, ‘‘केवळ शारीरिक आकर्षणच असणे जरुरी नसते. माणसाला स्वत:ला तेव्हा जास्त चिंतेत असल्यासारखे जाणवते जेव्हा त्याला लठ्ठपणाऐवजी मूर्ख समजतात. बाह्य सौंदर्याला जास्त महत्व देऊ नये. माणसातील शिस्त, मेहनत, काम करण्याप्रती निष्ठा हे गुण त्याला आकर्षक बनवत असतात.’’

१२० किलो वजन असलेल्या दिवाकरचे म्हणणे आहे, ‘‘माझा लठ्ठपणा पाहून डॉक्टर म्हणतात की मधुमेह व रक्तदाबापासून दूर राहण्यासाठी मी ६ महिन्यात २०-२५ किलो वजन कमी करायला हवे. असे असूनही मला असे वाटते की मी ५ तुकडे असलेला पिझ्झा ३-४ तासात संपवू शकतो. माझे असे मत आहे की आयुष्य फार छोटे आहे. ते आपण आपल्या पद्धतीने जगायला हवे. आपले आवडते पदार्थ खाणे सोडून वेडयाप्रमाणे बारीक होण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. जसे आहात तसेच आनंदी राहायला शिका.’’

दुसऱ्याशी तुलना करून स्वत:ला अस्वस्थ होऊ देऊ नका. काही लोक अस्वस्थपणामुळे नशेचे शिकार होतात. समाजापासून स्वत:ला वेगळे करून घेतात. जसे वय वाढते ही अस्वस्थता कमी होते, कारण व्यक्तीला वाटते की आता म्हातारे झाल्यावर काही फरक पडत नाही. उलट त्याला असे वाटू लागते की तो आणखीनच परिपक्व झाला आहे. त्याने स्वत:ला वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेतलेले असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें