* डॉ. मीना छाबडा

असा अंदाज वर्तवला जात आहे की २०३० पर्यंत डायबिटीज मॅलिटस भारताच्या ७.९४ कोटी लोकांना प्रभावित करू शकतं, तर चीनमधील ४.२३ कोटी लोक आणि अमेरिकेतील ३.०३ कोटी लोक या रोगांच्या कचाट्यात सापडतील. अशी अनेक कारणे आहेत जे देशभरातील लोकांध्ये या रोगासाठी जबाबदार आहेत.

मधुमेहग्रस्त लोक मनामध्ये हा संशय घेऊन जगू लागतात की पुढे त्यांचे डोळे जातील किंवा त्यांचा पाय कापावा लागू शकतो वा किडनी फेल्यूअरमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

तरुणांमध्ये वाढतं प्रकरण

भारतात २२ ते ३० वयोमर्यादा असलेल्या तरुणांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. ज्यांच्यामध्ये भरपूर उर्जा आणि रचना करण्याची क्षमता आहे. पण तरुण ज्या जीवनपद्धतींचा अवलंब करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर अनेक रोगांचा वाईट प्रभाव पडू लागला आहे.

भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जाऊ लागलं आहे. खरंतर अलीकडचे तरुण आरोग्यवर्धक नसलेल्या आहाराच्या सवयीमुळे लठ्ठपणाला बळी पडू लागले आहेत. जे डायबिटीज आणि इतर कार्डियोवॅस्क्युलर समस्यांचं मुख्य कारण आहे. पूर्वी हा रोग ४० ते ४५ वयोमर्यादा असलेल्या लोकांना व्हायचा, पण आता तर हा रोग २२ ते २५ वर्षांच्या तरुणांनाही होऊ लागला आहे.

संसर्गाचा धोका

जरासं कापल्यानेदखील त्वचेमध्ये होणाऱ्या भयंकर संसर्गाला सॅल्युलायटिस म्हटलं जातं. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुमच्या त्वचेच्या बाबतीत तुम्ही अधिक सावधगिरी बाळगा, कारण ब्लड ग्लूकोज लेव्हल जास्त असल्यास संसर्गाची अधिक असते.

सॅल्यूलायटिस एक गंभीर संसर्ग आहे, जो त्वचेच्या आतमध्ये पसरतो आणि त्वचा व त्याच्या अंतर्गत चरबीला प्रभावित करतो. लोक बऱ्याचदा सॅल्यूलायटिसला सॅल्यूलाइट समजतात. पण खरंतर दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सॅल्यूलायटिज चरबीच्या आतला थर डर्मीज आणि त्वचेच्या आतल्या टिश्यूचा एक जंतूसंसर्ग असतो तर सॅल्यूलाइट त्वचेच्या आतमध्ये चरबी साचल्यामुळे होतो, जे दिसायला संत्र्यांच्या सालीसारखं दिसतं. सॅल्यूलायटिसचा सर्वात मोठा अपाय म्हणजे हा योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्यास फार वेगाने पसरतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...