फक्त एक साजन हवा

‘‘सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए…’’ एफएमवर वाजत असलेल्या ‘आशिकी’ चित्रपटाच्या या गाण्याने मला अचानक तनूची आठवण आली.

ती जेव्हा कधी एका नव्या प्रेमळ नात्यात अडकायची तेव्हा हेच गाणे गुणगुणायची. मनमौजी… फुलपाखरू… फटाकडी… अशी कितीतरी नावे लोकांनी तिला ठेवली होती. पण ती मात्र ‘पालथ्या घडयावर पाणी’ अशाच अविर्भावात वावरत असे. लोकांनी काहीही म्हटले तरी त्याचा तिच्यावर परिणाम होत नसे. स्वत:च्या अटी-शर्थींनुसार, स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागणारी तनू लोकांसाठी मात्र एक कोडे होती. पण मला माहिती होते की, ती खुल्या पुस्तकासारखी आहे. फक्त ते वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोडया संयमाची गरज होती.

असे म्हणतात की, चांगली पुस्तके आणि चांगली माणसे समजून घ्यायला थोडा जास्त वेळ लागतोच… तनूच्या बाबतही असे म्हणता येईल की, ती नेमकी कशी आहे, हे जरा उशिरानेच समजते.

तनू माझ्या बालपणीची मैत्रीण होती. शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत आणि त्यानंतर नोकरीला लागल्यावरही… ती तिचे प्रत्येक गुपित मला सांगत असे. तिच्या हृदयाच्या छोटयाशा नभांगणात कितीतरी इच्छा, अपेक्षांचे पाखरू स्वत:च्या पंखात असलेल्या बळापेक्षाही कितीतरी मोठी झेप घेण्यासाठी आतूर झाले होते. एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचे तिचे अश्रू क्षणार्धात संपत असे. या मुलीला नेमके काय हवे आहे, हे कधीकधी माझ्याही आकलनापलीकडचे होते.

८ वीत असताना पहिल्यांदा जेव्हा तिने मला सांगितले होते की, ती आमचा वर्गमित्र असलेल्या रवीच्या प्रेमात पडली आहे तेव्हा तिच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच मला समजेनासे झाले. रवीसोबत गप्पा मारणे, खेळणे, मौजमजा करणे तिला मनापासून आवडते, असे तनूने मला सांगितले. तेव्हा तर कदाचित प्रेमाचा नेमका अर्थ काय, हेही आम्हाला नीटसे समजत नव्हते. तरीही न जाणो कशाच्या शोधात ही वेडी मुलगी त्या अनोळख्या मार्गावरून पुढे चालली होती.

एके दिवशी रवीने लिहिलेले प्रेमपत्र तिने मला दाखवले आणि ते पाहून मी घाबरले. मी म्हटले, ‘‘फाडून फेकून दे हे पत्र… चुकून जरी सरांच्या हाती लागले तर तुमच्या दोघांची खैर नाही,’’ असे तिला समजावून सांगत मी तिची मैत्रीण असल्याचे कर्तव्य पार पाडले.

‘‘अगं यात घाबरण्यासारखे काहीच नाही… आयुष्यात एक जिवाभावाचा मित्र असायलाच हवा ना? बस एक सनम चाहीए, आशिकी के लिए…’’ असे हिंदी गाणे गुणगुणत तिने सांगितले.

‘‘तर मग मी तुझी जिवाभावाची नाही का?’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘तुला समजले नाही. जिवाभावाचा मित्र म्हणजे जो माझ्यावर खूप प्रेम करेल. फक्त प्रेम आणि प्रेम… तू मैत्रीण आहेस, मित्र नाहीस…’’ तनूने मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर एके दिवशी प्रचंड रागाने म्हणाली, ‘‘मी रवीचा तिरस्कार करते.’’

मी कारण विचारले असता तिने सांगितले की, आज सकाळी खेळाच्या तासात बॅडमिंटन खेळताना त्याने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

मी म्हटले, ‘‘तुला खूप प्रेम करणारा जिवाभावाचा मित्र हवा होता ना?’’

‘‘माझा प्रश्न ऐकून तनू काहीशी गोंधळली. नंतर म्हणाली, ‘‘हो, हवा होता मला माझ्यावर खूप प्रेम करणारा जिवाभावाचा मित्र, पण हे सर्व तेव्हाच जेव्हा प्रेम करताना त्याच्यासोबत माझी मर्जीही असेल. माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही स्पर्श करू शकणार नाही.’’ असे म्हणत तिने रवीने लिहिलेली सर्व प्रेमपत्रे फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि स्वत:चे हात झटकले.

‘‘वय केवळ १४ वर्षे आणि वागण्याची ही अशी तऱ्हा?’’ मी घाबरून गेले.

९ वीत असताना आम्ही दोघींनी आमची शाळा सोडून मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला. शाळा घरापासून फार लांब नसल्याने आम्ही सर्व मैत्रिणी सायकलवर बसून शाळेत जायचो. १० वीचे आमचे वर्ष सुरू होण्यापूर्वी एके दिवशी तिने मला सांगितले की, ‘‘आपण सायकलवरून शाळेत येताना नेहमी एक मुलगा आपल्या मागून येऊन पुढे निघून जातो. तो मला खूप आवडतो. असे वाटतेय की, मी पुन्हा प्रेमात पडलेय…’’

मी तिला पुन्हा एकदा आगीशी न खेळण्याचा सल्ला दिला. मात्र ती स्वत:च्या मनाशिवाय इतर कुणाचे कधीच ऐकत नसे, त्यामुळे तिने माझे ऐकण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता तर शाळेतून येता-जाताना माझी नजरही त्या मुलावर पडू लागली होती.

शाळेत येताना आणि जाताना तनू त्या मुलाकडे तिरप्या कटाक्षाने एकटक पाहात असे आणि तो मुलगाही तिच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर तनू शेवटचे त्याच्याकडे पाहत असे आणि त्यानंतर तो तिथून निघून जात असे.

वर्षभर त्यांची अशी नजरानजर सुरू होती. त्यानंतर दोघे एकमेकांना प्रेमपत्र देऊ लागले. १-२ वेळा त्यांनी एकमेकांना छोटयामोठया भेटवस्तूही दिल्या होत्या. अनेकदा शाळा सुटल्यावर दोघे गप्पा मारत. पूर्वीप्रमाणेच घडलेली प्रत्येक गोष्ट तनू मला सांगत असे. आता आम्ही दोघी १२ वीत गेलो होतो. मी एके दिवशी तनूला विचारले, ‘‘तुझे हे प्रेम असे किती दिवस चालणार?’’

तनू हसत म्हणाली, ‘‘जोपर्यंत हे प्रेम फक्त प्रेम असेल. ज्या दिवशी माझ्या शरीराकडे तो वाईट नजरेने बघेल तो दिवस आमच्या नात्यातला शेवटचा दिवस असेल.’’

‘‘अगं, अशी मुले रिक्षासारखी असतात. एकाला बोलावले तर कितीतरी समोर येऊन उभ्या राहतात,’’ तनू खटयाळपणे हसत म्हणाली.

तिचा बिनधास्तपणा पाहून मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिले. मी विचारले, ‘‘तनू तुला असे वागताना भीती वाटत नाही का?’’

‘‘यात घाबरण्यासारखे काय आहे? जर हे सर्व करून मला आनंद मिळत असेल तर तो मिळविण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि हो, ही मुले तरी कुठे घाबरतात? मग मी का घाबरायचे? केवळ मुलगी आहे म्हणून?’’ तनू काहीशी रागावली होती. माझ्याकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते.

त्या दिवशी आमच्या शाळेत निरोप समारंभ होता. शाळेच्या नियमानुसार आम्हाला साडी नेसून जायचे होते. लाल काठाच्या मोत्याच्या रंगाच्या साडीमध्ये तनू फारच सुंदर दिसत होती. आम्ही सायकलवरून नव्हे तर टॅक्सी करून शाळेत गेलो. येताना तनूने माझ्या कानात सांगितले की, ‘‘मी आज माझे नाते कायमचे संपवून टाकले.’’

‘‘पण तू तर संपूर्ण वेळ माझ्यासोबतच होतीस. मग त्याला कधी, कुठे आणि कशी भेटलीस?’’ मी आश्चर्याने एका मागून एक प्रश्न विचारू लागले.

‘‘शांत रहा… जरा हळू बोल.’’ तनूने मला गप्प बसायला सांगितले आणि त्यानंतर म्हणाली, ‘‘टॅक्सीतून उतरून तुम्ही सर्व जणी जेव्हा शाळेत जात होता तेव्हा माझी साडी माझ्याच चपलेत अडकली होती, आठवले का?’’

‘‘हो… हो… तू मागेच राहिली होतीस,’’ मी तो क्षण आठवत म्हणाले.

‘‘तो तेथेच उभा होता, टॅक्सी मागे लपला होता. सुरुवातीला त्याची नजर मला न्याहाळत होती. त्यानंतर त्याने माझा हात धरला आणि माझी परवानगी न घेताच मला मिठीत घेतले. तो माझे चुंबन घेणारच होता, पण त्यापूर्वीच मी त्याच्या एक जोरदार कानाखाली लगावली. पाचही बोटे उमटली असतील गालावर…’’ रागाने लालबुंद होत तनू म्हणाली.

‘‘हे मात्र तू अतीच केलेस… अगं इतका तर हक्क आहेच ना त्याला…’’ मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

‘‘नाही, मुळीच नाही. माझ्या शरीरावर फक्त माझा हक्क आहे,’’ अजूनही तनू रागात होती.

त्यानंतर परीक्षा झाल्या. सुट्टी पडली आणि निकाल लागल्यावर नवीन महाविद्यालयीन जीवन सुरू झाले. तो शाळेवेळी दिसणारा मुलगा काही दिवस आमच्या महाविद्यालयाच्या वाटेवरही घुटमळताना मला दिसला, पण तनूने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यानेही त्याचा रस्ता बदलला.

समजतच नव्हते की, कशी होती तनू? तिला प्रेम तर हवे होते, पण त्यात वासनेचा लवलेशही नको होता. महाविद्यालयीन ३ वर्षांच्या जीवनात तिने ३ मित्र बदलले. प्रत्येक वर्षाला एक नवीन मित्र. मी सतत तिला समजावत होते की, कोणाकडे तरी गांभीर्याने बघ. फुलांवर फुलपाखरासारख्या घिरटया कशाला घालतेस?

‘‘फुलांवर घिरटया घालणे हे फक्त भुंग्याचेच काम आहे का? फुलातील मकरंद चाखण्याचा अधिकार फुलपाखरालाही तितकाच असतो…’’ तनू आवेशात बोलत होती.

तनूमध्ये एक खास वैशिष्टय होते की, जोपर्यंत समोरचा त्याच्या मर्यादांचे पालन करत असे तोपर्यंतच ती ते नाते जपायची. त्याने मर्यादांचे उल्लंघन करताच तो तिच्या नजरेतून उतरायचा. त्या नात्यापासून ती लगेच दूर जायची. ‘‘माझ्या मर्जीने माझे सर्वस्व मी कोणाच्याही हाती सोपवेन, पण माझ्या मर्जीविरोधात मी कोणाला माझा साधा हातही पकडू देणार नाही,’’ असे ती मला अनेकदा सांगायची.

महाविद्यालयीन शिक्षण संपवून आता आम्ही नोकरीला लागलो होतो. सध्या मी माझ्या बॉससोबत फिरते, असे तिने मला सांगितले. त्यावेळी ‘‘आतातरी या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने बघ आणि आयुष्याचा जोडीदार निवड,’’ असे मी तळमळीने म्हटले.

‘‘माझ्या साध्याभोळया मैत्रिणी, तू नाही ओळखत या मुलांना. बोट पकडायला दिले तर ते हात पकडतात. गळाभेट घेतली तर थेट बिछान्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मी होकार देऊनही जो स्वत:च्या वासनेवर नियंत्रण ठेवेल, असा मुलगा मला ज्या दिवशी भेटेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन,’’ तनूने सांगितले.

‘‘तर मग कुमारीच रहा, असा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही.’’

त्यानंतर काहीच महिन्यात माझे लग्न झाले. तनूनेही जयपूरमधील नोकरी सोडली आणि मुंबईत नोकरीला लागली. त्यानंतर काही दिवस आम्ही एकमेकींच्या संपर्कात होतो, पण हळूहळू मी संसार, मुलांमध्ये एवढी व्यस्त झाली की तनू माझ्या हृदयाच्या कप्प्यात आठवण बनून राहिली.

आज आशिकी चित्रपटातील गाणे लागताच तनूची प्रकर्षाने आठवण झाली. तिच्याशी बोलावेसे वाटू लागले. ‘तिला तिच्या मनासारखा साजन मिळाला असेल का…,’ असा विचार करीत मी जुन्या डायरीतून तिचा नंबर शोधून लावला, पण तो बंद होता.

‘काय करू? एवढया मोठया जगात तनूला कुठे शोधू?’ असा विचार मनात घोळत असतानाच मला एक कल्पना सुचली आणि मी लॅपटॉपवर फेसबूक सुरू केले. सर्चमध्ये ‘तनू’ असे लिहिताच तनू नावाचे कितीतरी आयडी समोर आले. त्या फोटोंमधील एकीचा चेहरा ओळखीचा वाटला, ती माझीच तनू होती. मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

२ दिवस काहीच उत्तर मिळाले नाही, पण तिसऱ्या दिवशी इनबॉक्समध्ये तिचा मेसेज पाहून मला आनंद झाला. तिने तिचा मोबाईल नंबर दिला होता व रात्री ८ वाजायच्या आधी फोन करायला सांगितले होते. सुमारे ७ वाजता मी फोन केला. तीही कदाचित माझ्याच फोनची वाट पाहात होती.

फोन घेताच नेहमीच्याच बिनधास्त शैलीत तिने विचारले, ‘‘प्रिय मैत्रिणी, कशी आहेस? आज अचानक माझी आठवण कशी झाली? मुले आणि भाओजींमधून वेळ मिळाला का?’’

‘‘अगं बाई, एकत्र एवढे सर्व प्रश्न? जरासा श्वास तरी घे,’’ मी हसतच म्हणाले. त्यानंतर तिला त्या गाण्याची आठवण करून दिली जे ती अनेकदा गुणगुणत असे.

माझे बोलणे ऐकून तनू मोठयाने हसली आणि म्हणाली, ‘‘काय करू मैत्रिणी, मी अशीच आहे. प्रेमवेडया साजनाशिवाय राहू शकत नाही.’’

‘‘अजून तोच प्रकार सुरू आहे का? तुला हवा तसा साजन भेटला नाही का?’’ मी आश्चर्याने विचारले.

‘‘अगं, तुला मी सांगितले नाही का? मी राजीवशी लग्न केले.’’ तनूने नवे गुपित सांगितले होते.

‘‘आपण भेटलोच नाही, मग तू मला कधी सांगणार होतीस? पण मी खूप खुश आहे. अखेर माझ्या मेनकेला विश्वामित्र मिळालाच.’’ मी आनंदाने म्हणाले.

‘‘हो, २ वर्षे आम्ही छान फिरून घेतले. मी त्याला पारखण्याचा बराच प्रयत्न केला. प्रसंगी माझ्या मर्यादांची सीमा लांघून त्याला माझ्या शरीराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. हा नक्की पुरुष आहे ना? असा संशयही मला आला. एखादी मुलगी स्वत:हून इतका पुढाकार घेत असताना तो मात्र ब्रह्मचारी असल्यासारखा वागत होता.’’ तनूच्या बोलण्याची गाडी वेगाने धावू लागली होती. माझीही उत्सुकता वाढली होती.

‘‘हो का? पुढे काय झाले?’’ मी विचारले.

‘‘बहुतेक राजीव आला असे वाटतेय, उरलेल्या गप्पा उद्या,’’ असे म्हणत माझी उत्सुकता तशीच ताणून ठेवून तिने फोन बंद केला.

‘‘अरे वा, हा फारच छान निर्णय आहे तुमचा. माफीचे राहू दे. पुढे काय झाले ते सांग.’’ मी तिला आठवण करून दिली.

पुढे काय घडले सांगताना तनू म्हणाली, ‘‘राजीव माझ्यावर खूप प्रेम असल्याचे सतत सांगायचा, मात्र जेव्हा मी त्याच्या जवळ जात असे तेव्हा स्पष्टपणे सांगायचा की, आपली मैत्री असली तरी शारीरिक संबंध मात्र लग्नानंतरच ठेवणे योग्य आहे. असे संबंध ठेवणे म्हणजे भावी पत्नीचा विश्वासघात करण्यासारखे आहे, असे त्याचे मत होते,’’ तनूने सांगितले.

‘‘खूपच छान. तू तर असाच जोडीदार शोधत होतीस,’’ मी आनंदाने म्हटले.

‘‘हो. त्यानंतर आम्ही लग्न केले.’’

‘‘म्हणजे शेवट गोड झाला,’’ मी खूपच खुश होत म्हटले.

‘‘नाही, खरी कथा तर त्यानंतर सुरू झाली,’’ तनू काहीशी अडखळत म्हणाली.

‘‘आता काय झाले? राजीव खरंच पुरुष नाही का?’’ माझ्या मनाला उगाचच भीती वाटली.

‘‘तो पक्का पुरुष होता.’’ तनूने सांगितले.

‘‘म्हणजे काय?’’ मला काहीच समजेनासे झाले होते.

‘झाले असे की, लग्नाला वर्ष होत नाही तोच मला अस्वस्थ वाटू लागले होते. सवयीनुसार कोणाच्या तरी प्रेमासाठी माझे मन व्याकूळ झाले होते. विवेक आमच्या सोसायटीत नवीन आला होता. माझे मन त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते. सर्वांची काळजी घेण्याचा त्याचा स्वभाव मला आवडू लागला होता. ही गोष्ट एका पतीला आणि त्यातही राजीवसारख्या पतीला कशी काय मान्य झाली असती?’’ तनूने सांगितले.

‘‘पण का? राजीवच्या प्रेमात काही कमी होती का?’’ मी काळजीने विचारले.

‘‘अगं मैत्रिणी, समजून घे. जेव्हा आपण मित्राला पती बनवतो तेव्हा एक चांगला मित्र गमावून बसतो. खूप गोष्टी अशा असतात ज्या आपण पतीला नाही तर फक्त मित्राला सांगू शकतो. माझ्यासोबही असेच घडले. ही मुले लग्नानंतर एवढी भावूक का होतात, हेच मला समजत नाही,’’ तनू आपले मन माझ्याकडे मोकळे करत होती.

‘‘बरं, मग पुढे काय झाले?’’ मी सवयीनुसार कुतूहलाने विचारले.

‘‘काय होणार होते? आमच्या नात्यात दुरावा वाढू लागला. मी विवेकचे नाव घेताच राजीवच्या चेहऱ्यावरील रंग उडून जायचा. माझे विवेकला भेटणे, हसणे, बोलणे त्याला अजिबात आवडत नव्हते. लग्नानंतर पर पुरुषाशी मैत्री करणे म्हणजे चरित्रहीनता, असे त्याचे मत होते. पण मीही माझ्या मनाला समजावू शकत नव्हते. प्रेमाशिवाय मी राहू शकत नव्हते.’’

‘‘पुढे काय झाले?’’

‘‘काय होणार? एके दिवशी मी राजीवचा हात माझ्या हातात घेऊन त्याला विचारले की, अगदी खरं सांग. जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा तुला माझ्या चारित्र्याबद्दल काय वाटायचे? त्याने सांगितले की, माझ्यासारखी ठाम मते असलेली मुलगी त्याने पाहिली नव्हती आणि माझ्या याच स्वभावाच्या तो प्रेमात पडला. मी त्याला समजावले की, जर लग्नाआधी अनेक मुलांसोबत मैत्री करूनही मी माझे कौमार्य अबाधित ठेवले तर मग तो असा विचार करूच कसा शकतो की, माझ्या मैत्रीत पवित्र भावना असणार नाही.’’

‘‘ज्या दिवशी माझ्या एखाद्या मित्राचा हात माझ्या खांद्यावरून पुढे सरकत जाईल त्याच क्षणी मी त्याचा हात झटकून टाकेन. माझ्या शरीरावर आणि मनावर फक्त तुझाच अधिकार आहे, असा विश्वास मी राजीवला दिला. जिवाभावाचा मित्र असल्याशिवाय मी आयुष्यात खुश राहूच शकत नाही, हे त्याला समजावून सांगितले.’’ तनूने सांगितले.

‘‘पुढे?’’

‘‘राजीवच्या हे लक्षात आले की, मी मित्राशिवाय आनंदी राहू शकत नाही आणि जर मी आनंदी नसेन तर त्याला आनंदात कसे ठेवू शकेन?’’ तनू म्हणाली.

‘‘बरं झालं,’’ मी आनंदाने म्हणाले.

‘‘त्यानंतर त्याने मला विवेकशी मैत्री करण्यापासून रोखले नाही. मीही त्याला वचन दिले की, जेव्हा तो माझ्या सोबत असेल तेव्हा त्या वेळेवर फक्त त्याचा हक्क असेल.’’ तनूने तिचे बोलणे पूर्ण केले.

यापुढेही संपर्कात राहू, असे ठरवून आम्ही फोनवरील संभाषण थांबवले. तनूने फोन ठेवला होता, पण मी अजूनही माझा मोबाईल कानाला तसाच लावून विचार करीत होती की, खरंच खूप धीट आहे तनू. तिच्या म्हणण्यात तथ्य आहे. आयुष्यात असा एखादा जिवाभावाचा मित्र असायलाच हवा जो आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करेल. त्यात वासना नसेल. आपल्यातील सर्व वाईट गोष्टींसह आपला स्वीकार करेल. ज्या गोष्टी पतीला सांगणे शक्य नाही त्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी आपण त्याला सहजपणे सांगू. अगदी पतीबाबत असलेली गुपितेही.

आपण बायका आयुष्यभर आपल्या पतीमध्ये मित्र शोधत असतो, पण पती हा पतीच असतो तो मित्र बनू शकत नाही.

विरंगुळा

कथा * लता सोनावणे

सकाळचे नऊ वाजले होते. नंदिनीनं नवऱ्याला अन् सोनी, राहुल या मुलांना हाक मारली, ‘‘ब्रेकफास्ट तयार आहे. लवकर या.’’

टेबलवर ब्रेकफास्ट मांडून नंदिनीनं त्यांचे डबे भरायला घेतले. दुपारच्या जेवणाचे डबे बरोबर घेऊनच तिघं सकाळी घराबाहेर पडायची. ती सरळ सायंकाळी परत यायची. बिपिन नाश्ता करता करता पेपर डोळ्याखालून घालत होते. सोनी अन् राहुल आपापल्या मोबाइलमध्ये गर्क होते. या तिघांचं आटोपून ती निघून गेल्यावरच नंदिनी स्वत: ब्रेकफास्ट घेते.

मुलांना मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेलं बघितलं अन् नंदिनीचा पारा चढला, ‘‘जरा हसतबोलत नाश्ता करता येत नाही का? सगळा वेळ घराबाहेर असता, थोडा वेळ तरी तो मोबाइल बाजूला ठेवा ना?’’

बिपिनला तिचा उंच स्वर खटकला. कपाळाला आठ्या घालून म्हणाले, ‘‘का सकाळी सकाळी आरडा ओरडा करतेस? करत असतील काही त्यांच्या कामाचं.’’

नंदिनी पुन्हा करवादली, ‘‘आता तुम्ही तिघंही एकदम सांयकाळी याल. जरा मोबाइल बाजूला ठेवून चवीनं हसत बोलत खायला काय हरकत आहे?’’

बिपिन हसून म्हणाले, ‘‘खरं तर आम्ही शांतपणे खातोय अन् आरडाओरडा तू करते आहेस.’’

मुलांना बापाचं हे वाक्य फारच आवडलं, ‘‘बाबा, काय छान बोललात.’’ मुलांनी एकदम म्हटलं.

नंदिनीनं तिघांचे डबे अन् पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवल्या अन् ती उदास मनानं तिथून बाजूला झाली. आता सायंकाळपर्यंत ती घरात एकटीच होती. सकाळच्या जो थोडा वेळ हे लोक घरात असतात, त्यात नंदिनीशी थोडं बोलावं, तिची विचारपूस करावी असं यांना का वाटत नाही? सायंकाळी थकून येतील, मग टीव्हीसमोर पाय पसरून बसतील. फार तर फोन, लॅपटॉप…जेवतील की झोपले. आपसातला संवादच संपलाय. मुलं लहान असताना घरात कसं चैतन्य असे. पण ती मोठी झाली, मोबाइल, आयफोन वगैरे आले अन् घर अगदी भकास झालं. घरातल्या बाईलाही इतर सदस्यांनी तिच्याशी बोलावं, काही शाब्दिक देवाण घेवाण करावी असं वाटतं हे यांना का कळू नये?

मुलांना अन् नवऱ्याला वाटतं तिनं सोशल नेटवर्किंग करावं, शेजारीपाजारी ओळखी वाढवाव्यात, व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करावेत. पण हे सगळं नंदिनीला आवडत नाही, त्याला ती तरी काय करणार? नवऱ्याला अन् मुलांना फेसबुक मित्रांची सगळी बित्तंबातमी असते. पण घरात आईशी दोन शब्द बोलायला वेळ नसतो.

नंदिनीला फारच उदास वाटलं. तिघंही आपापले टिफिन बॉक्स घेऊन निघून गेले. तिनं स्वत:चा ब्रेकफास्ट उरकला. मोलकरीण येऊन कामं करून गेली. नंदिनीनं अंघोळ आटोपून रोजची जुजबी कामं उरकली.

पूर्वीही ती फार सोशल नव्हती. पण घरातच किती आनंद होता…तीही सतत हसायची. गाणी गुणगुणायची. आता दिवस कंटाळवाणा वाटतो. संध्याकाळ तर अधिकच रटाळ वाटते. उगीचच टीव्हीसमोर बसून वेळ काढायचा.

तिच्या घरातली बाल्कनी ही तिची फार आवडती जागा होती. लखनौहून मुंबईला येऊन तिला एक वर्षच झालं होतं. दादरसारख्या मध्यवस्तीत त्यांना सुंदर फ्लॅट मिळाला होता. मुलांना कॉलेज आणि बिपिनला ऑफिसला जाणंही इथून सोयीचं होतं.

बाल्कनीत तिनं लावलेली रातराणी आता सुरेख वाढली होती. इतरही काही झाडं छान फोफावली होती. हा हिरवागार कोपरा तिला खूप सुखावायचा. इथं तिचं एकटीचं राज्य होतं. इतर कुणी इकडे फिरकत नसे.

तेवढ्यात तिला आठवलं, बरेच दिवसात स्टोअररूममध्ये ती फिरकली नव्हती. ती स्टोअररूममध्ये गेली. थोडी आवराआवरी करताना तिला मुलांच्या खेळण्यांचा कागदी डबा हाती लागला. त्यात एक दुर्बिण किंवा बायनॉक्युलरसारखं खेळणं होतं. नैनीतालला गेले असताना मुलांनी हट्ट करून ते विकत घ्यायला लावलं होतं. आता मुलं मोठी झाल्यावरही ते त्यांच्या सामानात होतंच.

तिनं ती दुर्बिण हातात घेतली अन् गंमत म्हणून ती डोळ्याला लावून बघू लागली…लगेच ती बाल्कनीत आली. झाडांच्या आडोशात स्टुलावर बसून तिनं दुर्बिण फोकस केली अन् डोळ्याला लावून बघायला लागली. थोड्याच अंतरावर एका बिल्डिगचं बांधकाम सुरू होतं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये लोक राहायला आलेले होते. तिनं दुर्बिण थोडी फिरवली. समोरच्या घरातली बाल्कनी अन् त्याला लागून असलेली ड्रॉइंगरूम छान दिसत होती. ड्रॉइंगरूममध्ये एक मध्यमवयीन स्त्री डान्सच्या स्टेप करत कामं उरकत होती. बहुधा गाणं सुरू असावं.

तेवढ्यात तिची तरूण मुलगीही तिथं आली. आता मायलेकी दोघीही डान्स करू लागल्या. नंतर दोघीही खळखळून हसल्या अन् आतल्या खोलीत निघून गेल्या.

त्यांचं ते बिनधास्त नाचणं, खळखळून हसणं यामुळे नंदिनीचाही मूड एकदम छान झाला. तिच्या नकळत ती काही तरी गुणगुणु लागली. मग तिनं दुर्बिण इकडे तिकडे फिरवून पाहिली, पण बहुतेक फ्लॅट्स बंद होते किंवा त्यांचे पडदे ओढलेले होते.

अवचित तिची नजर एका फ्लॅटच्या बाल्कनीत स्थिरावली. ती दचकली. दुर्बिण हातातून पडता पडता वाचली.

एक बळकट, घोटील देहाचा तरूण बाल्कनीत टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत उभा होता. दुसऱ्या टॉवेलनं तो केस पुसत होता. तेवढ्यात त्याची तरूण नवविवाहित सुंदर पत्नी मागून येऊन त्याला बिलगली. वळून त्यानं तिला कवेत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् कंबरेत हात घालून तिला घेऊन तो ड्रॉइंगरूमच्या सोफ्यावर रेळून बसला. दोघंही एकमेकांची चुंबनं घेत होती. ती बेभान होती. बघताना नंदिनीचीही कानशिलं गरम झाली. हृदयाची धडधड वाढली. अंगावर गोड रोमांच उभे राहिले. किती तरी दिवसांनी शरीर अन् मन असं टवटवीत झाल्यासारखं वाटलं. काही क्षणांतच ते जोडपं आतल्या खोलीत निघून गेलं. बहुधा बेडरूममध्ये गेले असावेत, नंदिनीला हसायला आलं.

नंदिनी उठून घरात आली. एक वाजून गेला होता. वेळ इतका भर्रकन गेला होता. छान वाटत होतं. नंदिनी जेवतानाही प्रसन्न होती. तिला आपला लग्नातला शालू आठवला, हिरवा चुडा आठवला. छान नटून थटून बिपिनबरोबर फिरायला जावं असं वाटू लागलं.

जेवण आटोपून ती थोडा वेळ आडवी झाली. छानपैकी डुलकी झाली.

बारीकसारीक कामं आटोपून तिनं चहा केला. चहाचा कप अन् दुर्बिण घेऊन ती पुन्हा बाल्कनीत येऊन बसली. मायलेकींच्या घरात तर शांतता होती पण नवविवाहित जोडप्याची मात्र लगबग सुरू होती. खूप हौसेनं अन् उत्साहानं ती दोघं घर लावत होती. नवं लग्न, नवा संसार, नवं घर मांडताना त्यांचा प्रणयही रंगत होता. जोडी फारच छान होती.

नंदिनीनं हसून तिच्या बायनाक्युलरचा मुका घेतला. आज तिला एक नवीनच उत्साह वाटत होता. सगळा दिवस किती आनंदात गेला होता. गंमत म्हणजे आज तिला नवऱ्याचा किंवा मुलांचा राग आला नाही. कुठल्या जुन्या दुखवणाऱ्या घटना आठवल्या नाहीत. एकदम प्रसन्न होतं मन.

पाच वाजले. रोज सायंकाळी नंदिनी तासभर फिरायला जाते. तिनं कुठलंसं गाणं गुणगुणत स्वत:चं आवरलं अन् ती फिरायला निघाली. आज तिची चालही झपाझप होती. आपली ही दुर्बिणीची गंमत कुणालाही सांगायची नाही हे तिनं मनोमन ठरवलं होतं.

खरं तर असं चोरून बघणं बरोबर नाही, पण आजचा दिवस किती छान गेला. जाऊ दे, उगीच काय चूक काय बरोबर याचा विचार करायचाच नाही. ती फिरून आली आणि तिनं सर्वांसाठी संध्याकाळचा नाश्ता तयार केला. घरातली मंडळी येण्यापूर्वीच तिनं तिचं खेळणं कपाटात लपवून ठेवलं.

सायंकाळी घरी आलेल्या लोकांचा चहा फराळ आटोपून ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. अधूनमधून मुलांशी कॉलेजबद्दल बोलत होती. फोनवर गर्क असलेल्या राहुलला तिनं काहीतरी विचारलं, तसा एकदम तो खेकसला, ‘‘किती प्रश्न करतेस गं आई?’’

नंदिनीला आज त्याचा अजिबात राग आला नाही की वाईटही वाटलं नाही. तिला स्वत:लाच या गोष्टींचं नवल वाटलं. ती मजेत गाणं गुणगुणत काम करत होती.

जेवण झाल्यावर मुलं आपापल्या खोल्यांमधून गेली अन् बिपिन न्यूज बघू लागले. नंदिनीला वाटलं आपण आपली दुर्बिण घेऊन बाल्कनीत बसावं का? पण नकोच. घरात कुणाला काहीच कळायला नकोय. मग तिनं अत्यंत रोमँटिक पद्धतीनं बिपिनच्या गळ्यात हात घातले अन् विचारलं, ‘‘बाहेर थोडे पाय मोकळे करून येऊयात का?’’

बिपिन एकदम दचकलाच! तिच्याकडे लक्षपूर्वक बघत त्यानं विचारलं, ‘‘तुला काय झालंय?’’

हसून नंदिनीनं म्हटलं, ‘‘फक्त एवढंच नेहमी विचारता…दुसरं काही तरी बोला ना?’’

बिपिनलाही हसायला आलं. त्यांनी टीव्ही बंद केला. दोघं फिरून आली. नंदिनीचा मूड फारच छान होता. त्या नवविवाहित जोडप्याच्या प्रणयलीला आठवून ती ही उत्तेजित झाली होती. त्या रात्री कितीतरी दिवसांनी तिनं बिपिनच्या प्रेमाला मनापासून प्रतिसाद दिला.

सकाळी घरातली तिन्ही माणसं बाहेर जाताच नंदिनी ‘खेळणं’ घेऊन स्टुलावर येऊन बसली. मायलेकींच्या फ्लॅटमधली आई बहुधा नोकरी करत असावी. ती साडी नेसून तयार होती. मुलगी कॉलेजमधली असावी. दोघीही आपापलं आवरून एकत्रच बाहेर पडल्या. घरात इतर कुणी नसावं. काल बहुधा त्यांनी रजा घेतली असावी, तरीच नाचगाणं करू शकल्या. आत्ताही दोघी एकदम आनंदात अन् टवटवीत दिसत होत्या.

मग नंदिनीनं दुर्बिण दुसऱ्या फ्लॅटकडे वळवली, बघूयात राघूमैना काय करताहेत? तिला स्वत:च्या विचारांची गंमत वाटून ती मोठ्यानं हसली. राघू ऑफिससाठी तयार झाला होता. मैना त्याला स्वत:च्या हातानं सँडविच भरवत होती. व्वा! काय छान रोमांस चाललाय…खरंय, हेच दिवस असतात आयुष्य उपभोगायचे. नव्या नवलाईचे हे नऊ दिवस संपले की रटाळ आयुष्य सुरू होतं. तिला पुन्हा हसायला आलं. तेवढ्यात मोलकरीण आली. चपळाईनं नंदिनीनं दुर्बिण लपवली.

कितीतरी वर्षांनी नंदिनीनं बिपिनला मेसेज केला. ‘आय लव्ह यू’ बिपिननं आश्चर्य व्यक्त करणारी स्माइली पाठवत उत्तर दिलं, ‘आय लव्ह यू, डियर.’ नंदिनी अगदी वेगळ्याच मूडमध्ये घरातली कामं आवरत होती. दुपारी ती ब्यूटीपार्लरला गेली. फेशियल, मेनिक्योर, पॅडीक्योर, छानसा मॉडर्न हेअरकट करून घेतल्यावर आरशात स्वत:चं रूप बघून एकदम खुष झाली. तिथून ती मॉलमध्ये गेली. स्वत:साठी सुंदर कुर्ता विकत घेतला.

घरी परत येताच दुर्बिण उचलून बाल्कनी गाठली. मायलेकी बहुधा एकदम सायंकाळीच परतत असाव्यात. नवी नवरी एकदा ओझरती तिच्या बाल्कनीत दिसली अन् मग एकदम संध्याकाळी छान नटून थटून नवऱ्याची वाट बघत बाल्कनीत उभी होती. नंदिनीही आज एकदम वेगळ्याच पद्धतीने तयार झाली.

सायंकाळी सोनी, राहुल घरी परतले अन् नंदिनीला बघून सोनीनं म्हटलं, ‘‘व्वा, आई, किती छान दिसते आहेस. हा नवा हेअरकट खूप शोभून दिसतो आहे तुला.’’

राहुलनंही हसऱ्या चेहऱ्यानं म्हटलं, ‘‘अशीच राहत जा आई, लुकिंग गुड!’’

बिपिन घरी आले. ते तर कालपासूनच नंदिनीत झालेल्या बदलामुळे चकित झाले होते. वरपासून खालपर्यंत तिच्याकडे बघितल्यावर म्हणाले, ‘‘व्वा! फारच छान! काय, काही खास बेत आहे का?’’

नंदिनीनं हसून म्हटलं, ‘‘वाटलं तर तसं समजा.’’

‘‘चला तर, आजच्या या मेकओव्हर प्रित्यर्थ आपण आईस्क्रिम खाऊयात. रात्रीच्या जेवणानंतर ‘कूल कॅम्प’ला जाऊ.’’ बिपिननं म्हटलं, तशी दोघं ही मुलं आनंदानं चित्कारली.

‘‘व्वा! बाबा, किती मज्जा.’’

चौघंही आनंदात आईस्क्रीम खाऊन गप्पा मारत घरी पोहोचले. नंदिनीला स्वत:चंच आश्चर्य वाटत होतं. गेले दोन दिवस तिला कशाचाही राग आला नव्हता. सगळंच छान वाटत होतं. ती आनंदात असल्यामुळे घरातलंही वातावरण मोकळं आणि आनंदी होतं…म्हणजे, तिच्या तक्रारी व चिडचिडीमुळे घरातलं वातावरण बिघडतं? स्वत:च्या आयुष्यात आलेल्या नीरसपणाला ती स्वत:च जबाबदार होती का?

रिकामपण तिच्याजवळ होतं. इतरांना त्यांचे व्याप होते. त्या रिकामपणामुळे ती चिडचिडी बनली होती, आपला वेळ अन् एनर्जी तिघांबद्दल तक्रारी करण्यात खर्च करत होती. खरं तर आनंदी राहण्यासाठी तिनं कुणावर अवलंबून का असावं?

आता नंदिनीचं हेच रूटीन झालं. आपली बाल्कनी ती अधिक छान ठेवू लागली. रातराणी, मोगऱ्याच्या सुवासात, फांद्या अन् पानांच्या आडोशाच्या आधारानं स्टुलावर बसून दुर्बिण डोळ्याला लावायची अन् समोरच्या घरातली मजा बघायची. त्या हिरोहिरोइनच्या मादक प्रणयाची ती अबोल साक्षीदार होती. त्यांच्यामुळेच तिला स्वत:चे लग्न झाल्यानंतरचे प्रेमाचे दिवस आठवले. ती अन् बिपिन तेव्हा याच वयाचे होते.marathi-storyत्या दिवसांचा ताजेपणा आता तिला नव्यानं जाणवत होता. बिपिन टूरवर गेले तरी ती आता चिडचिड करत नव्हती. कधी मुलीबरोबर सिनेमा बघून यायची, कधी दोन्ही मुलांबरोबर त्यांच्या सोयीनुसार लंच किंवा डिनरला जायची. स्वत:च्या राहणीबद्दल अधिक सजग झाली होती. दैनंदिन कामाच्या जोडीनं व्यायमावरही लक्ष देत होती.

मायलेंकीच्या फ्लॅटमधल्या त्या दोघीही घाई गडबडीच्या आयुष्यात कायम आनंदी दिसायच्या. त्यांचा आनंद तिला सुखावत होता. ती मनातल्या मनात अंदाज बांधायची. या दोघीच का राहतात? यांच्या घरात अजून कुणी का नाही? आई विधवा असेल की घटस्फोटिता? मुलगी विवाहित आहे की अविवाहित? नंदिनीचा दिवस लवकर संपायचा. शिवाय, दुर्बिण लपवून ठेवणं आपलं गुपित आपल्यापुरंतच ठेवणं हीसुद्धा एक मज्जाच होती.

समोरच्या बिल्डिंगमधले इतर फ्लॅट्सही आता भरायला लागले होते. तिथली वस्ती वाढत होती. दुर्बिणीचा खेळ सुरू होऊन आता जवळपास सहा महिने लोटले होते. हिरोहिरोइनच्या रोमांसने तर तिच्या आयुष्यात नवं चैतन्य निर्माण केलं होतं. ती किती बदलली होती.

नेहमीप्रमाणे तिनं सकाळी आपली जागा धरून, बाल्कनीत बसून दुर्बिण डोळ्याला लावली अन् तिला धक्काच बसला. तिच्या हाताला कंप सुटला. स्वप्नांच्या जगातून वास्तवाच्या जमिनीवर दाणकन् आदळावं असं झालं. तिचे हिरोहिरोईन फ्लॅट रिकामा करण्याच्या लगबगीत होते. खाली रस्त्यावर ट्रकही उभा दिसला. हिरोनं पॅकर्स बोलावले होते. त्यांची लगबग दिसत होती.

हे काय झालं? नंदिनीला खूपच वाईट वाटलं. स्वत:च्या नकळत की किती गुंतली होती त्यांच्यात? त्यांना तर कल्पनाही नव्हती की त्यांच्यामुळेच एका कुटुंबात किती आनंद निर्माण झाला होता. त्या कुटुंबातली गृहिणी किती बदलली होती…आता पुन्हा तेच उदासपण…बोअर रूटीन…दिवसभर नंदिनी अस्वस्थ होती. बाल्कनीतून घरात फेऱ्या मारत होती.

सायंकाळ होता होता ट्रक भरून निघून गेला. हिरोहिरोइन त्यांच्या कारमधून निघून गेली. मांडीवर दुर्बिण ठेवून नंदिनीनं भिंतीला डोकं टेकवलं. कितीतरी वेळ ती तशीच बसून होती.

संध्याकाळी तिचा उतरलेला, मलूल चेहरा सगळ्यांच्याच काळजीचा विषय झाला.

पण, ‘‘जरा बरं वाटत नाहीए,’’ म्हणून तिनं पटकन् खोली गाठली अन् ती अंथरूणावर पडली. त्यानंतरचे चार पाच दिवस खूपच उदास वाटत होतं. नाही म्हणायला त्या आठवड्यात मायलेकींनी दोन दिवस रजा घेतली असावी. त्यांच्या घरात थोडा उत्साह होता. पण नंदिनीची कळी फारशी खुलली नाही.

मात्र एक दिवस स्टुलावर बसून नंदिनी दुर्बिणीतून उगीचच इकडे तिकडे बघत असताना अचानक त्या हिरोवाल्या घरात गडबड जाणवली. तीन चार तरूण मुलांनी तो फ्लॅट बहुधा भाड्यानं घेतला होता.

ती तरूण देखणी मुलं घर लावण्यात मग्न होती. एक जण पडदे लावत होता. दुसरा बहुधा डस्टिंग करत होता, पांढरा टी शर्ट आणि काळी शॉर्ट घातलेला एक जण बाल्कनीत कपडे वाळायला घालत होता. त्याच्या शेजारच्या बाल्कनीत एक तरूण मुलगी कुंड्यांना पाणी घालत होती. पाणी घालताना तिचं लक्ष पुन्हा:पुन्हा बाल्कनीतल्या त्या तरूणाकडे जात होतं.

नंदिनीला हसू फुटलं. ती लक्षपूर्वक पाहत होती. तो मुलगाही त्या मुलीकडे बघून हसला अन् ती मुलगी लाजली. अरेच्चा! इथं तर लव्हस्टोरी सुरू झालीय की! दोघं एकमेकांकडे बघून हसताहेत…मजा येईल आता. शिफ्टिंग झाल्या झाल्याच रोमांसही सुरू झाला.

तेवढ्यात एक वयस्कर स्त्री बाल्कनीत येऊन त्या मुलीला काही म्हणाली. ती बहुधा त्या तरूणीची आजी असावी. मुलीनं लगेच मुलाकडे पाठ केली. मुलगाही लगेच बाल्कनीतून घरात गेला. आजीनं कुंड्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं. मग तीही आत गेली. किती तरी दिवसांनी गाणं गुणगुणत नंदिनी बाल्कनीतून उठली अन् तिनं दुर्बिण कपाटात लपवून ठेवली. आज तिला पुन्हा उत्साही वाटत

माझिया प्रियाला

कथा * अनुजा कुलकर्णी

निशा सधन कुटुंबात वाढलेली एकुलती एक लाडाची मुलगी. त्रिकोणी कुटुंब एकदम सुखी होते. आई बाबा दोघांची आवडती होती अनिशा. एकुलती एक असल्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीला नकार मिळाला नव्हता. तिने काही बोलायचा अवकाश, लागलीच हवं ते तिला मिळत असे. या गोष्टीचा अनिशाने कधी गैरफायदा घेतला नव्हता. पण अनिशा खूप स्वतंत्र विचारांची होती. अनिशाने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिला मनासारखा उत्तम जॉबसुद्धा मिळाला. आता तिच्या आईला वेध लागले होते ते तिच्या लग्नाचे. आईला माहिती होतं की अनिशा घाईने लग्न करणार नाही. पण ‘बोलून घेऊ’ असा विचार करून एके दिवशी आईने हे अनिशाशी बोलायचा निर्णय घेतला.

‘‘अनिशा, मस्त मूड दिसतो आहे आज? काही विशेष?’’ अनिशाची आई बोलली.

‘‘नाही गं आई. जॉबमध्ये मजा येतेय, सो खुश आहे. मनासारखं काम करता येत आहे. उगाच कोणाची लुडबुड नसते. मला अशाच ठिकाणी काम करायचं होतं.’’

‘‘व्वा! जॉब आवडला आहे हे छान. बरं सांग, लग्नाबद्दल काय मतं आहेत तुझं? बरेच दिवस बोलायचं होतं, पण राहूनच जात होतं. आज निवांत दिसलीस म्हणून म्हटलं बोलून घेऊ.’’ अनिशाची आई बोलली आणि तिचं बोलण ऐकून अनिशाने कपाळावर हात मारून घेतला.

‘‘लग्न? हा एकच विषय असतो का गं आई. माझ्या कामाबद्दल बोल, ऑफिसबद्दल बोल, मित्र मैत्रिणींबद्दल बोल. पण ते नाही तर सारखं लग्न हाच विषय तुझ्या डोक्यात. तुला माहिती आहे लग्न हा माझ्यासाठी महत्वाचा विषय नाहीए.

म्हणजे आत्ता तरी नाही. सो मी आता जाते आणि मी बोलत नाही तोपर्यंत हा विषय प्लीज नको गं.’’

अनिशा इतकं बोलली आणि तिथून निघून गेली. तिच्या आईनेसुद्धा तो विषय तिथेच बंद केला आणि कामाला लागली.

पाहता पाहता दिवस पुढे सरत होते. अनिशाने ताकीद दिल्यामुळे आईने परत लग्नाचा विषय काढला नाही आणि अनिशा तिच्या रुटीनमध्ये बिझी झाली.

अनिशाला कामावर जॉईन होऊन एक वर्ष झालं. अनिशा छान मूडमध्ये होती. अनिशाने नवीन कपडे घातले आणि ती ऑफिसला पोहोचली. ऑफिसमध्ये शिरल्या शिरल्या तिला नील दिसला. त्याच्या हातात भला मोठा पुष्पगुच्छ होता. अनिशाला पाहून त्याने तो पुष्पगुच्छ तिला दिला. अनिशा खूप खुश झाली.

‘‘काँग्रॅट्स अनिशा…आज तुला इथे जॉईन होऊन एक वर्ष झालं बघ बरोबर.’’

‘‘तुझ्या लक्षात आहे नील. थँक्यू सो मच. खरं तर मी पूर्णपणे विसरले होते. सकाळी कॅलेंडर पाहिलं तेव्हा आठवलं.’’

‘‘मी कसा विसरेन अनिशा. एक वर्षापूर्वी मी तुला पाहिलं आणि त्या दिवसापासून तुझ्या आकंठ प्रेमात बुडालो आहे.’’ नील पुटपुटला. पण हे त्याला मोठयाने बोलायची हिंमत नव्हतीच. तो काय बोलतो आहे हे अनिशाला ऐकू आले नाही म्हणून तिने त्याला प्रश्न केला.

‘‘नील, आत्ता काही बोललास?’’

‘‘नाही गं. मी काही नाही बोललो. सो तू सांग, आज पार्टी देणार आहेस की नाही?’’

‘‘पार्टी कसली रे…’’

‘‘काय अनिशा. इथे एक वर्ष झालं अन् त्याचं सेलिब्रेशन तो बनता है ना…’’ नील बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून अनिशाच्या चेहऱ्यावर छान हसू आले.

‘‘आधी काम करू, मग संध्याकाळी जाऊ कुठेतरी. आणि हो, मी इतकीही कंजूस नाही…पार्टी देईन… फक्त तुला, कारण तू माझी बेस्टी आहेस…आणि तसंही, इतर कोणाच्या लक्षात आहे असं मला वाटत नाही, सो त्यांना पार्टी द्यायचा प्रश्नसुद्धा नाही.’’

अनिशाचं बोलणं ऐकून नील खुश झाला. त्याने खिशात हात घातला. तो जरा अस्वस्थ झाला. मग मात्र त्याने खिशातून हात बाहेर काढला. अनिशा ते पाहत होती. नील अस्वस्थ का आहे हे विचारणार होती, पण तितक्यात नील बोलायला लागला.

‘‘चला आता कामाला लागू नाहीतर काम झालं नाही तर जास्त वेळ थांबून काम पूर्ण करावं लागेल.’’

अनिशा फक्त हसली आणि तिला जाणवलं की नील तिच्यापासून काहीतरी लपवतो आहे. अनिशाला नीलशी बोलायचं होतं, पण तिच्या डोळयासमोर काम येत होतं… म्हणून ती काम करायला तिच्या डेस्कवर गेली. अनिशा तिथून गेली आणि नीलने पुन्हा खिशात हात घातला आणि स्वत:शीच हसून बोलला.

‘‘साहेब करा थोडी हिंमत आणि बोला जे वाटतंय ते. आता फार उशीर करून चालणार नाही.’’

मग मात्र नीलसुद्धा त्याच्या डेस्कवर जाऊन काम करायला लागला.

होता होता दुपार झाली. लंच ब्रेक झाला. नील पुन्हा अनिशाच्या डेस्कजवळ आला. मग दोघांनी कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण केलं. जेवतानासुद्धा नील सारखा खिशात हात घालून काहीतरी चाचपडत होता. पण काही बोलत मात्र नव्हता. दोघांचं जेवण आवरलं आणि दोघे पुन्हा आपल्या कामाला लागले. अनिशाला जाणवत होतं की नीलला तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण तो ते बोलणं टाळत होता. संध्याकाळ झाली. ऑफिसमधले सगळे काम आवरून बाहेर पडत होते. अनिशानेसुद्धा तिचं काम आवरलं आणि बॅग भरली. ती नीलच्या येण्याची वाट पाहायला लागली. पण नील काही आला नाही. मग शेवटी तिच उठली आणि नीलच्या डेस्कपाशी गेली. नीलचं काम आवरलं होतं, पण तो डोळे मिटून काहीतरी विचार करत होता. त्याला उठवणं खरं तर अनिशाच्या जीवावर आले होते, पण तिने शेवटी नीलला हाक मारलीच.

‘‘नील, झोपलास का काय? आणि आवर की. जायचं आहे ना आपल्याला?’’

नील ने काही प्रतिसाद दिला नाही. मग मात्र अनिशा अस्वस्थ झाली. तिने नीलला हलवलं आणि परत बोलली.

‘‘नील…चल की…’’

मग मात्र नील भानावर आला.

‘‘ओह सॉरी…मी काहीतरी विचार करत होतो आणि तंद्री लागली. तू कधी आलीस? मला नाही कळलं खरंच.’’

‘‘आत्ताच आले रे. मी सकाळपासून पाहतेय, इतका का अस्वस्थ आहेस?’’

‘‘काही नाही. नको जायला आज तुझ्या पार्टीला. नंतर कधीतरी जाऊ अनिशा.’’

‘‘काय झालं आहे नील? सकाळी तूच तर म्हणलास पार्टी हवीये आणि आता तूच म्हणतो आहेस, आत्ता पार्टी नको. आपण इथून बाहेर पडू. मग एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि बोलू. आणि तू अस्वस्थ वाटतो आहेस आज. सारखा खिशात हात घालतोस, पण काहीतरी पुटपुटतो आहेस. मला त्याबद्दल बोलायचं आहे. नेहमी माझ्याबरोबर असतोस, माझी इतकी काळजी घेतोस. आता आज माय टर्न… बघू, काय त्रास देतंय माझ्या मित्राला.’’ अनिशा हसली आणि तिने नीलचा हात धरून त्याला उठवलं. मग मात्र दोघे ऑफिसमध्ये थांबले नाहीत. ते एका छान रेस्टॉरंटमध्ये गेले आणि अनिशाने खायची ऑर्डर दिली, मग ती बोलायला लागली.

‘‘आता बोल. काय होतंय तुला आज? आपण एक वर्ष सोबत आहोत. नेहमीच सोबत असतो. तुला काही झालं की तू आधी मला सांगतोस, पण आज मात्र असा का वागतो आहेस मला कळत नाहीए.’’

‘‘सोड गं अनिशा. मला माहिती आहे. तुझं उत्तर नाहीच असणारे. मग कशाला ना उगाच. तुला त्रास, मला त्रास. आणि आज सारखं वाटतं…बोलावं पण मग असा विचार येतो, जाउदे…उगाच गैरसमज नको.’’

‘‘तू काय बोलतो आहेस नील? थोडं स्पष्ट बोलशील का?’’

‘‘काय बोलू स्पष्ट?’’

‘‘जे तुझ्या मनात आहे ते.’’

‘‘मी बोलेन, पण अजिबात वाईट प्रतिक्रिया द्यायची नाही बघ.’’

‘‘नाही रे…तू सांग तर खरं…’’

नीलने खिशात हात घालून एक डबी काढली आणि त्यातून एक अंगठी  काढली. अनिशाने ते पाहिलं आणि ती खुश झाली.

‘‘ओह माय नील. तुला कोणीतरी आवडते आणि ही अंगठी तिच्यासाठी? कधी करणारेस प्रपोज? ओह…मला आत्ता कळलं, तू अस्वस्थ का आहेस. तुला भीती वाटते आहे का? घाबरू नकोस. मी आहे. घे बोलावून इथे…’’ अनिशा उत्साहाने बोलली.

‘‘अनिशा…तुला काहीच समजत नाही की तू न समजल्याचं नाटक करतेस गं? मला तू आवडतेस. तू आणि फक्त तू…तुला तर काही कळतंच नाही ना आणि आता कळलं आहे तर तू नाही म्हणणार. मला माहिती आहे. मी तुला चांगलं ओळखतो. तुला आत्ता लग्न नकोय. तुझी तिच बडबड…नको होतं मला हे सगळं, पण आज माझा भावनांवर कंट्रोल राहिला नाही गं.’’ नील उदास होऊन बोलला, ‘‘तुला कधीच माझं प्रेम कळलं नाही ना? मला तर वाटलं होतं, तुला कधीतरी कळेल आणि तू आपणहून विचारशील. पण जाऊ दे. मी जातो आता. तू खा एकटी.’’ नील उदास होऊन बोलला. अनिशासुद्धा ओशाळली. तिच्यासमोर तिचं प्रेम तिची वाट पाहत होतं, पण ती सतत स्वत:मध्येच मग्न असायची. तिला तिची चूक कळली.

‘‘थांब नील. मला नव्हतं कळलं हे प्रेम आहे आणि सगळं स्वत:च ठरवणार तर मला सांगितलंस कशाला? तू आधी विचारू शकला असतास. पण कधी विचारलं मला? आपण जनरल बोलयचो लग्नाबद्दल, पण तुझं प्रेम आहे हे कधी बोललास? आज तू सांगितलं, पण स्वत:च निर्णय देऊन मोकळासुद्धा झालास. मी लग्नाचा विचार कधी सिरिअसली केलाच नव्हता. तू माझा खूप छान मित्र आहेस.’’

‘‘हो ना. तू भारी. जगावेगळी. तुला प्रेम कळत नाही…कशाला बोलतो आहे तु?याशी?’’ नील उखडून बोलला.

‘‘शट अप नील… मा?याकडे बघ…’’ तिने डावा हात पुढे केला.

‘‘आता काय?’’

‘‘अंगठी घाल… मला कळलं नव्हतं. पण आत्ता मी विचार केला. तुला माझ्यापेक्षा अजून चांगली कोणी मिळणार नाहीए. आय वरी फॉर यु नील…’’

अनिशा स्वत:शीच हसली आणि तिचं बोलणं ऐकून नील खूप खुश झाला. त्याने अनिशाच्या बोटात अंगठी घातली आणि तिचा हात हातात घट्ट दाबून ठेवला. मग तो मनसोक्त हसत बोलला, ‘‘माझिया प्रियाला प्रीत कळली…’’ मग दोघे आपल्या प्रेमाच्या जगतात हरखून गेले.

सायोनारा

कथा * शकुंतला सिन्हा

देवेंद्र ऊर्फ देवचं पोस्टिंग त्यावेळी झारखंड राज्यातल्या जमशेदपूरच्या टाटा स्टील इंडस्ट्रीजमध्ये होतं. तो इंजिनीयर होता. मुळचा पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातला, पण त्याच्या वडिलांचा जमशेदपूरला बिझनेस होता. जमशेदपूरला टाटा नगरी म्हणतात. तिथल्या बिष्ठुपुर भागातच त्यांचं कापड दुकान होतं.

देवचं शिक्षण तिथंच झालेले. इंजिनीयरिंग रांचीतून केलं. कॅम्पस इंटरव्हयूमध्ये लगेच नोकरीही मिळाली. तीही टाटा स्टीलमध्येच. इतर दोन तीन ऑफर्स होत्या त्याला, पण इथल्या रेखीव वसाहती, दलमा टेकडी, स्वर्णरेखा नदी अन् ज्युबिली पार्कचंही आकर्षण होतंच. शिवाय आईवडिलही होतेच.

खरकाई नदीच्या पलीकडे आदित्यपुरला त्याच्या वडिलांची मोठी हवेली होती. पण कंपनीनं त्याला इथंच ऑफिसर्स फ्लॅट्समध्ये एक छानसा फ्लॅट दिला होता. त्याला शिफ्ट ड्यूटी असायची. बऱ्याचदा रात्रपाळी करावी लागे. त्यामुळे त्यानं इथंच राहणं पसंद केलं होतं. त्यामुळे त्याचे आईवडिलही हवेलीचा काही भाग भाड्यानं देऊन इथंच त्याच्या फ्लॅटवर राहायला आले होते.

याच दरम्यान टाटा स्टीलच्या आधुनिकीकरणाचा प्रोजेक्ट आला. जपानच्या निप्पोन स्टीलच्या तांत्रिक सहयोगानं टाटा कंपनी आपल्या फोल्ड रोलिंग मिल आणि कंटिन्यूअस कास्टिंग शॉपच्या निर्मितीत गुंतली होती. देव सुरूवातीपासूनच या प्रोजेक्टमध्ये होता. जपानहून निप्पोन कंपनीनं काही टेक्निकल एक्सपर्र्ट्सही टाटा नगरीला पाठवले होते. ही मंडळी टाटा स्टीलच्या वर्कर्स आणि इंजिनीयर्सना टे्निंग देण्यासाठी आलेली होती. त्याच्यासोबत काही दुभाषीही होते. जे जपानीचं इंग्रजीत भाषांतर करून इथल्या लोकांना समजावून सांगत होते. त्या टीममध्येच अंजूही होती. जपानी व इंग्रजीवर तिचं प्रभुत्व होतं. वीस वर्षांची सुंदर तरुणी, मुख्य म्हणजे तिचे फीचर्स जपानी वाटत नव्हते. जवळजवळ सहा महिने हे सर्व तिथे राहिले. या दरम्यान अंजू व देवची चांगली ओळख झाली होती. देव तिला भारतीय पदार्थ खाऊ घालायचा. कधीतरी तीही त्याला जपानी पदार्थ करून खाऊ घालायची. इथलं काम संपवून ती सहा महिन्यांनी जपानला निघून गेली.

तिला निरोप द्यायला देव कोलकत्त्याच्या विमानतळावरही गेला होता. त्यानं तिला एक संगमरवरी ताजमहाल अन् बौद्धगयेतील बुद्ध मंदिराचा फोटो भेट म्हणून दिला. ही भेट बघून अंजूला खूप आनंद झाला. निरोप घेताना शेकहॅण्ड करत देवने म्हटलं ‘‘बाय…बाय…’’

अंजूनं हसून म्हटलं, ‘‘सायोनारा…’’ अन् ती एअरपोर्टच्या दरवाजातून आत गेली.

काही दिवसांनी नवीन काहीतरी शिकण्यासाठी टाटा स्टीलनं आपली एक टीम जपानला पाठवली. तिथल्या ओसाका फ्लॅटमध्येच हे टे्निंग होतं. या टीममध्ये देवचा समावेश होता. योगायोगाने इथंही दुभाषी म्हणून अंजूच आलेली होती. अवचित भेटल्यामुळे दोघांनाही आनंद झाला. एरवी टे्रनिंग खूपच टफ होतं. पण वीक एंडला दोघं भेटायची. एकत्र कॉफी घ्यायची.

बघता बघता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता टे्निंग संपायला थोडेच दिवस उरले होते. देवनं म्हटलं, ‘‘जवळपास बघण्यासारखं काही असेल तर दाखव ना?’’

‘‘हो, इथून हिरोशिमा जवळच आहे. बुलेट टे्ननं दोन तासातच पोहोचता येईल.’’

‘‘मला जायचंय तिथं. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं तिथंच अणुबॉम्ब टाकला होता ना?’’

‘‘होय, सहा ऑगस्ट १९४५ त्या अभद्र दिवशीच ती घटना घडली. कोणताही जपानी, जपानीच काय पण सारं जग ती घटना विसरणार नाही. माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, सुमारे ऐंशी हजार लोक एका क्षणात मृत्यूमुखी पडले होते अन् पुढल्या चारच महिन्यात ही संख्या एक कोटी एकोणपन्नास लाख एवढी झाली होती.’’

‘‘खरोखरंच फार दुर्देवी घटना होती ती. जगात पुन्हा कुठेच असं काही घडता कामा नये.’’

‘‘परवाच सहा ऑगस्ट आहे. मीही चलते तुझ्यासोबत. जपानी लोक या दिवशी शांतता स्थापित व्हावी म्हणून तिथं प्रार्थना करतात,’’ अंजूनं म्हटलं.

दोन दिवसांनी दोघंही हिरोशिमाला गेली. तिथं दोन दिवस थांबली. तिथल्या पीसपार्कमध्ये प्रार्थना केली. मग दोघंही हॉटेलात गेली. लंचमध्ये अंजूनं स्वत:साठी लेडीज ड्रिंक शोंचू ऑर्डर केलं. तिने देवला विचारलं, ‘‘तू काय घेणार?’’

‘‘आज मीदेखील शोंचू टेस्ट करून बघतो. दोघंही सोफ्यावर बसून जेवत होती. एकमेकांच्या खूपच जवळ आली होती.. अंजूनं त्याला किस केलं अन् म्हणाली, ‘‘एशिते इमासू.’’

देवला काहीच कळलं नाही. तेव्हा तिनं सांगितलं याचा अर्थ ‘‘आय लव्ह यू.’’

त्यानंतर दोघंही जणू या जगात नव्हतीच. त्यांच्यामधलं द्वैत कधी संपलं ते दोघांनाही समजलं नाही.

तिच्यापासून दूर होताना देव म्हणाला, ‘‘अंजू, तू मला जे सुख दिलंस…खरं तर मीच तुला प्रपोज करणार होतो.’’

‘‘मग आता कर ना? खरं तर मी लाजायला हवं, तर तूच लाजतो आहेस…’’

‘‘ही घे अंगठी,’’ आपल्या बोटातली अंगठी काढत देवनं म्हटलं, ‘‘सध्या यावरच भागवूयात.’’

‘‘नको, नको,’’ त्याला अडवत अंजू म्हणाली, ‘‘तू प्रपोज केलंस, मी होकार दिला…मला अंगठी नकोय…ती तुझ्या बोटातच राहू दे.’’

‘‘ठीक आहे. टे्निंग संपताच भारतात परत गेलो की आईबाबांना सगळं सांगतो. मग तूच तिथं ये. आपलं लग्न भारतीय पद्धतीनंच होईल,’’ देवनं म्हटलं.

‘‘मी त्या दिवसाची आतुरतेनं वाट बघते,’’ अंजू म्हणाली.

टे्निंग संपवून देव भारतात परत आला. इकडे त्याच्या गैरहजेरीत त्याच्या आईबाबांनी त्याचं लग्न ठरवून ठेवलं होतं. देव त्या मुलीला ओळखत होता. तिचे वडिल व देवचे वडिल पक्के मित्र होते. दोन्ही कुटुंबांचा खूप घरोबा होता. मुलीचं नाव अजिंदर होतं. ती पंजाबी होती. तिच्या वडिलांना धंद्यात खूपच नुकसान झाल्यामुळे त्यांनी आत्महत्त्या केली होती. ते कुटुंब त्या दु:खात अन् धक्क्यात असतानाच देवच्या आईबाबांनी अजिंदरच्या आईला सांगितलं होतं की अजिंदरला आम्ही सून करून घेऊ.

देवला जेव्हा अजिंदरशी लग्न ठरवल्याचं कळंलं तेव्हा त्यानं या गोष्टीला नकार दिला. ‘‘आई, माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी अजिंदरसोबत लग्न करू शकत नाही.’’ त्यानं सांगितलं.

‘‘पण तिच्यात वाईट काय आहे? अन् तू कोणती मुलगी पसंत केली आहेस?’’ बाबांनी विचारलं.

‘‘ती जपानी मुलगी अंजू…आपल्याकडे आली होती. आठवतंय का?’’

‘‘देव, त्या परदेशी पोरीशी तू लग्न करणार? आम्हाला हे अजिबात मान्य नाही. आपल्या देशात मुलींचा दुष्काळ पडलाय का? आम्ही अजिंदरच्या आई व आजीला वचन दिलंय.’’ बाबा भडकून म्हणाले.

‘‘बाबा, मी ही…’’

‘‘अजिबात काही बोलू नकोस, तुला इथे आईवडिल जिवंत बघायचे असतील तर तुला अजिंदरशी लग्न करावं लागेल.’’ बाबांनी धमकीच दिली.

काही वेळ सगळेच शांत होते. मग बाबा म्हणाले, ‘‘देव, तू जर आमचं ऐकलं नाहीस तर मीही अजिंदरच्या बापाप्रमाणे आत्महत्या करेन. त्या मृत्युसाठी तूच सर्वस्वी जबाबदार असशील.’’

‘‘छे छे, भलतंच काय बोलताय,’’ देवच्या आईनं म्हटलं.

‘‘आता सगळं तुझ्या लाडक्या पोरावर अवलंबून आहे,’’ एवढं बोलून बाबा तिथून निघून गेले.

शेवटी देवला आईबाबांचं ऐकावंच लागलं.

देवनं आपली सगळी परिस्थिती अन् असहायता अंजूला कळवल्यावर ती समजूतदारपणे म्हणाली की त्यानं अजिंदरशीच लग्न करणं योग्य ठरेल.

अंजूनं देवला जरी अगदी सहजपणे मुक्त केलं होतं तरी ती मात्र फारच अडचणीत सापडली होती. देवपासून तिला दिवस गेले होते. अजून एकच महिना झाला होता. पण तिनं देवला हे काहीच कळवलं नाही. त्याला कशाला उगीच काळजी अन् अपराधबोध.

पुढच्याच महिन्यात देवचं लग्न होतं. त्यानं अंजूला लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं. तिनंही येते म्हणून कळवलं.

अगदी मोकळ्या मनानं अंजू देवच्या लग्नात सहभागी झाली. पण तिला वरचेवर उलट्या होत होत्या. ‘‘तुला बरं नाहीए का?’’ देवनं विचारलं.

‘‘बरी आहे मी…पण विमान प्रवासाचा थोडा त्रास अन् लग्नाचं हे जड जेवण यामुळे मला बरं वाटत नाहीए.’’

लग्नानंतर तिनं देवला म्हटलं की तिला बोधगयेला जायचंय.

देव म्हणाला, ‘‘मी व अजिंदरही येतो,’’ त्यानं गाडी बुक केली व तिघंही एकत्रच बोधगयेला गेले. अंजूनं आधीच गोळ्या वगैरे घेतल्यामुळे तिला प्रवासाचा त्रास झाला नाही. रात्री तिघंही एकाच रूममध्ये राहिले. कारण अजिंदरचाच आग्रह होता, ‘‘पुन्हा केव्हा अशी संधी मिळणार. आज एकत्र राहू व पोटभर गप्पा मारू.’’

गयेतून अंजू जपानला गेली. देव व अजिंदरनं तिला विमानतळावर सोडलं. निरोप घेताना दोघांनी तिला बाय केलं. तिनंही हसून ‘सायोनारा’ म्हटलं संपर्कात राहा, असंही सांगितलं.

लग्नानंतर दहा महिन्यातच अजिंदरला मुलगा झाला. त्याच्या दोन महिने आधी अंजूला मुलगी झाली होती. तिचा चेहरा अगदी देवसारखा होता. इकडे देवचा मुलगाही हुबेहुब देवसारखाच होता. त्यानं अंजूला आपल्याला मुलगा झाल्याचं कळवलं होतं, पण अंजूनं मात्र त्याला मुलीबद्दल काहीच कळवलं नव्हतं. अजिंदर, अंजू व देवचा इंटरनेटवर संपर्क होता. ती त्याच्या मुलाला गिफ्ट पाठवायची. लग्नाच्या वाढदिवसालाही भेटवस्तू द्यायची.

देव तिला म्हणायचा, ‘‘तू लग्न कर…मला तुला काही भेटवस्तू द्यायला निमित्त हवं ना?’’

ती उत्तर टाळायची. एकदा म्हणाली, ‘‘मी माझ्या आजीकडेच वाढले कारण आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. मला लग्न करण्याची इच्छा नाहीए. पण मी एक मुलगी दत्तक घेतली आहे. एकल पालक म्हणून तिला वाढवते आहे.’’

देवनं मग फार काही विचारलं नाही. फक्त विचारलं, ‘‘मुलीचं नाव काय आहे?’’

‘‘तिचं नाव किको आहे. किकोचा अर्थ ‘आशा’ असा आहे. तिच माझ्या आयुष्याची एकमेव आशा आहे.’’

‘‘तिचे फोटो पाठव ना?’’ अजिंदरनं म्हटलं.

‘‘पाठवेन…’’ अंजू म्हणाली.

काळ पुढे पुढे जात होता. देवचा मुलगा व अंजूची मुलगी एव्हाना सात वर्षांची झाली होती. एक दिवस अंजूचा ई मेल आला. निप्पोन कंपनी एक इंजिनियर व टेकनियन्सची टीम टाटाला पाठवते आहे. त्यांच्याबरोबर इंटरप्रिटर म्हणून अंजली येते आहे.

ठरल्याप्रमाणेच अंजू आली. शिवमसाठी खूप गिफ्ट आणल्या होत्या.

‘‘किकोला का नाही आणलंस?’’

‘‘एक तर तिला व्हिसा मिळाला नाही. शिवाय शाळा बुडाली असती. माझ्या एका मैत्रीणीजवळ सोपवून आले आहे. तिची मुलगी किकोची खास मैत्रीण आहे,’’ अंजूनं म्हटलं.

अंजूच्या टीमचं काम दोन अडीच आठवड्यात आटोपलं. ती परत जाणार होती. त्याच्या आदल्या दिवशी देवकडे डिनरला आली. तिघांनी खूप गप्पा मारल्या. हसत खेळत जेवण झालं.

दुसऱ्यादिवशी अंजू टे्ननं कोलकत्त्याला जाणार होती. रेल्वेस्टेशनवर अजिंदर व देव तिला सोडायला गेली.

टे्रन सुटता सुटता अंजूनं आपल्या बॅगेतून एक मोठासा बॉक्स काढून अजिंदरला दिला.

‘‘हे काय? सध्या तर गिफ्ट घेण्यासारखा काहीच प्रसंग नाहीए?’’ तिनं म्हटलं.

‘‘घरी जाऊन बघ.’’ अंजू म्हणाली. टे्रन सुरू झाली. हात हलवून अंजूनं म्हटलं, ‘‘सायोनारा…’’

घरी जाऊन बॉक्स उघडला तेव्हा कीकोचा एक सुंदर मोठा फोटो फ्रेम केलेला मिळाला. त्या खाली लिहिलं होतं, ‘हिरोशिमाचा एक अंश.’

चकित होऊन दोघंही बघत होती. शिवम अन किको जुळी भावंडं दिसत होती. फक्त किकोचा रंग जपानी गोरा होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें