आरोग्य परामर्श

* डॉ. कपिल अग्रवाल, संचालक, हॅबिलिट सेंटर फॉर बॅरिएट्रिक आणि 

लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया

प्रश्न : मी ३२ वर्षांची आहे आणि माझे वजन १०८ किलो आहे. मी डायटिंग आणि व्यायामाद्वारे वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करते, पण फारसा फरक पडत नाही. बाजारात उपलब्ध असलेली वजन कमी करणारी औषधे आणि सप्लिमेंट्स घेणे सुरक्षित आहे का आणि ते प्रभावी आहेत का?

उत्तर : वजन कमी करण्यासाठी औषधे आणि पूरक आहारांचा वापर केला जाऊ शकतो. त्याचा प्रभाव असतो पण तो फार कमी काळ टिकतो. तुम्ही औषध घेणे बंद करताच, वजन पुन्हा वाढू लागते. दुसरे म्हणजे वजनात फक्त ५ ते १० टक्केच फरक पडतो.

ही औषधे आणि सप्लिमेंट्स फक्त काही जास्त वजन असलेल्या सामान्य लोकांवरच प्रभावी असल्याचे सिद्ध होते. हे मेंदूतील सेरोटोनिन रिसेप्टर २ सक्रिय करते. या रिसेप्टरच्या सक्रियतेमुळे भूक कमी होते आणि थोडेसे अन्न खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. खूप लठ्ठ असलेल्या लोकांवर या औषधाचा कोणताही परिणाम होत नाही. तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की जर तुम्हाला लठ्ठपणाची अनुवांशिक पूर्वस्थिती असेल, तर तुमच्याकडे शस्त्रक्रिया आणि नियमित संतुलित आहार व व्यायामच पर्याय आहे.

प्रश्न : मी ४० वर्षांचा आहे. बऱ्याच दिवसांपासून मला माझे ओटीपोट आणि मांडीच्यामध्ये सूज येत आहे. हळूहळू त्यात वाढ होत आहे. मी डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी हर्नियाची तक्रार सांगितली आणि ऑपरेशन करण्याचा सल्ल दिला. मला ऑपरेशनची भीती वाटते याला दुसरा पर्याय आहे का?

उत्तर : हर्निया रोगावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे. इतर कोणत्याही औषधाने तो बरा होऊ शकत नाही. आजकाल हर्नियाची शस्त्रक्रिया लॅपरोस्कोपीद्वारे ही केली जाते. यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही कारण शस्त्रक्रिया फक्त ३ छोटी छिद्र्रे करून केली जाते. रुग्णाला २४ तासांच्या आत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो. म्हणून कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता आपण एखाद्या सक्षम सर्जनकडून आपली शस्त्रक्रिया करून घ्यावी.

प्रश्न : मी ३८ वर्षांचा आहे आणि माझे वजन ११८ किलो आहे. मला गेल्या ८ वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. मला कोणीतरी सल्ला दिला आहे की बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेद्वारे अतिरिक्त चरबी काढून टाकून मधुमेहदेखील बरा होऊ शकतो. यात किती तथ्य आहे?

उत्तर : होय, बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेने मधुमेह पूर्णपणे नाहीसा होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी सर्वप्रथम शरीरातील इन्सुलिनची पातळी काही चाचणी करून आपल्याला तपासावी लागते. चाचणी अनुकूल असल्यास रुग्णाची चयापचय शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया केल्यावर तुमचा मधुमेहही बरा होतो.

प्रश्न मी ३० वर्षांची आहे. अलीकडेच माझ्या गाल ब्लॅडरमध्ये एक खडा आढळून आला आहे. यावर उपचार करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? औषधाने यावर उपचार करणे शक्य आहे का?

उत्तर : किडनी स्टोनप्रमाणे तोंडावाटे औषधे पित्ताशयातील खडे काढून टाकण्यासाठी फारशी प्रभावी ठरत नाहीत, कारण गाल ब्लॅडर हे आपल्या शरीरात अशा ठिकाणी आहे, जिथे औषधाचा फारसा परिणाम होत नाही. दुसरे म्हणजे ही अशी स्थिती असते ज्यामध्ये रुग्णाला खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे पित्ताशयातील खडयांवर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक डॉक्टर पारंपारिक शस्त्रक्रियेनुसार ४ छिद्र करून पित्ताशयातील खडा काढतात, परंतु आम्ही प्रगत तंत्राने नाभीला एक छिद्र करून यशस्वी शस्त्रक्रिया करतो, परिणामी रुग्णाच्या शरीरावर ऑपरेशनचे कोणतेही निशाण दिसत नाही आणि रिकव्हरीदेखील लवकर होते.

प्रश्न : माझा मुलगा १४ वर्षांचा आहे आणि त्याचे वजन ६६ किलो आहे. लठ्ठपणामुळे तो न्यूनगंडाचा बळी ठरत आहे. एवढया लहान वयात मधुमेह चाचणीत त्याला प्री-डायबेटिक स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे. मला माझ्या मुलाची खूप काळजी वाटते. मी काय करावे?

उत्तर : बहुतेक मुलांमध्ये लठ्ठपणा हा आनुवंशिक कारणांमुळे आणि जंक फूड खाणे व शारीरिक हालचाली न करणे यामुळे होतो. जर तुमच्या कौटुंबिक इतिहासात लठ्ठपणाचा आजार असेल, तर मुलाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण जास्त बीएमआयमुळे मधुमेहाचा धोकाही दुप्पट होतो. पूर्व-मधुमेह असण्याचा अर्थ असा आहे की त्याची ग्लुकोज पातळी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे आणि मधुमेहाच्या पातळीपेक्षा थोडी कमी आहे. म्हणूनच तुमच्या मुलाच्या जीवनशैलीत सकस आहार आणि व्यायामाचा समावेश करणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, तरीही वजन नियंत्रणात न राहिल्यास आणि वाढतच असल्यास मुलाची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय देखील आहे, कारण नंतर लठ्ठपणामुळे इतर अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २६ वर्षांची विवाहित महिला आहे. लग्नाला ३ वर्षे झाली आहेत पण अजूनही मला गर्भधारणा होऊ शकलेली नाही. यासाठी आता मी सेक्स करताना खाली उशीदेखील ठेवते आणि वीर्यपतनानंतर बराच वेळ पतीला त्याच स्थितीत राहण्यास सांगते. तरीही गर्भधारणा होऊ शकलेली नाही तथापि माझी मासिक पाळी नियमित येत आहे आणि आम्ही नियमितपणे सेक्सदेखील करतो. मला सांगा मी काय करू?

संभोगादरम्यान वीर्यपतनाच्या वेळी पुरुषाच्या लिंगातून शुक्राणू अतिशय वेगाने बाहेर पडतात आणि खोलवर पोहोचतात. जे शुक्राणू मजबूत नसतात ते योनीतून बाहेरदेखील पडतात, परंतु यामुळे गर्भधारणेच्या प्रक्रियेत काही फरक पडत नाही. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि यामुळे घाबरण्याची गरजही नाही.

जर तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या बरोबर असेल, तुमची मासिक पाळी नियमित असेल, तर तुम्हाला गर्भधारणा न होण्यामागे दुसरे काही वैद्यकीय कारण असण्याची शक्यता आहे. हे कारण तुमच्यात किंवा तुमच्या पतीमध्ये दोघांपैकी कोणामध्ये ही असू शकते.

उत्तम हेच होईल की तुम्ही कोणा स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा आणि प्रजनन क्षमतेबद्दल बोलावे तरच तुम्ही लवकर गर्भधारणा करू शकता.

मी २४ वर्षांचा आहे आणि माझी मैत्रीण २५ वर्षांची आहे. मागील काही दिवसांत मी कंडोम न लावता मैत्रिणीसोबत २-३ वेळा सेक्स केला होता. तथापि मैत्रिणीने ७२ तासांच्या वैद्यकीय मर्यादेतच इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी घेतली पण आता आम्हा दोघांचे टेन्शन वाढले आहे. मैत्रिणीला २० ते २७ दिवसांच्या दरम्यान मासिक पाळी येते, जी यावेळी आली नाही. ती गर्भवती आहे का?

इमर्जन्सी गोळया या कंडोमप्रमाणेच गर्भधारणा रोखण्याचे एक साधन आहे, परंतु त्या सहसा तेव्हा घेतल्या जातात जेव्हा लैंगिक संबंध उत्स्फूर्तपणे झाला असेल आणि त्या दरम्यान कुठल्याही गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केला गेला नसेल.

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी समागमानंतर ७२ तासांच्या आत घ्यायची असते. ७२ तासांपूर्वी घेतल्यास गर्भधारणेची शक्यता बऱ्याच प्रमाणात टाळता येते,

तुमच्या मैत्रिणीने इमर्जन्सी गोळी घेतल्याने तिच्या रक्तातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले असण्याची शक्यता आहे. तिची मासिक पाळी उशिरा येण्याचीही शक्यता आहे.

तुम्ही तुमच्या मैत्रिणीला युरिन प्रेग्नेंसी टेस्ट करायला सांगितल्यास बरे होईल. ती घरीही सहज करता येते.

सेक्समध्ये उतावळेपणा करणे किंवा घाई करणे योग्य नसते आणि कंडोमशिवाय सेक्स केल्यास नवीन समस्या उद्भवते. त्यामुळे भविष्यात जेव्हाही तुम्ही लैंगिक संबंध ठेवाल तेव्हा कंडोम अवश्य वापरा जेणेकरून तुम्हा दोघांनाही न घाबरता सेक्सचा आनंद घेता येईल आणि नंतरही कसले टेन्शन येणार नाही.

मी ३१ वर्षांची विवाहित महिला आहे. आम्हाला २ मुलं आहेत आणि आम्ही सासू-सासरे, दीर-जाऊ आणि त्यांच्या मुलासोबत एकाच छताखाली राहतो. माझ्या जाऊ छोटया-छोटया गोष्टींवरून माझ्याशी भांडतात आणि सासूचे कान भरत राहतात. मी एक खुल्या विचाराची स्त्री आहे तर जाऊ परंपरावादी आणि कमी शिकलेली आहे. त्या रोज माझ्याशी भांडत असतात. घरी जाऊशी वारंवार भांडण होत असल्याने आम्हांला वेगळया घरात राहायला हवे का? यासाठी सासू मला मनाई करते, पण जाऊचे बोलणे सहन करायलाही सांगते. मला माझ्या पतीशी याबद्दल बोलायचे आहे पण कधी बोलू शकले नाही कारण, त्यांना आई-वडिलांना सोडून वेगळे राहायचे नाही. मला सांगा मी  काय करू?

जर सलोख्याचे सर्व मार्ग बंद असतील आणि घरगुती क्लेश वारंवार होत असतील तर वेगळं राहण्यात काहीच नुकसान नाही, पण त्याआधी तुम्ही सार्थक पुढाकार घेतल्यास घरात समाधान आणि शांतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं.

सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की परस्पर भांडणाचे खरे कारण काय आहे? सामान्यत:, घरगुती भांडण, बजेटमधील भागीदारी, स्वयंपाकघरात कोण किती काम करेल, घरातील कामांचे वितरण इत्यादीशी संबंधित असते. कधी-कधी एकमेकांचा मत्सर केल्यानेही परस्परांमध्ये वितुष्टाचे वातावरण निर्माण होते.

भांडणाचे खरे कारण जाणून घेतल्यानंतर समेट करण्याचा प्रयत्न केला जाणे चांगले असेल, सासू आणि पतीकडून जाऊंच्या भांडणखोर स्वभावाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास परस्पर संबंध सुधारू शकतात. जाऊ कमी शिकलेली आहे, त्यामुळे हे देखील एक कारण असण्याची शक्यता आहे. त्यांच्यात तुमच्याबद्दल न्यूनगंड असू शकतो. योग्य वेळ साधून जाऊंशी बोलणेसुद्धा चांगले असेल.

जर सासू तुम्हाला वेगळया घरात जाण्यास नकार देत असतील तर साहजिकच त्या तुम्हाला आणि जाऊंना अधिक चांगल्या प्रकारे ओळखत असतील, त्यामुळे फक्त तुमच्या सासूच योग्य निर्णय घेऊ शकतील.

१-२ गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर संयुक्त कुटुंब ही आजच्या काळाची गरज आहे, ज्यात राहून प्रत्येकजण आपल्या स्वप्नांना पंख लावून उडू शकेल.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी २८ वर्षीय विवाहित महिला आहे. माझा रंग सावळा आहे. मी आता गरोदर आहे. असा काहीतरी उपाय सांगा की बाळ गोऱ्या रंगाचे होईल. आहाराने त्याच्यावर काही प्रभाव पडतो का? दुसरे काही घरगुती उपाय असतील, तर तेही सांगा? गृहशोभिकेच्या याच स्तंभात काही महिन्यांपूर्वी त्वचेच्या रंगामागे मिलेनोसाइटची माहिती दिली होती. असा काही उपाय आहे का की बाळाची मिलेनोसाइट अपरिणामकारक राहील व बाळ गोरेगोमटे होईल?

उत्तर : आपल्या चेहऱ्याची ठेवण आणि इतर शारीरिक गुण उदा. उंचीप्रमाणेच आपल्या त्वचेचा रंग ठरवणाऱ्या मिलेनोसाइट्सच्या घनत्वाचे गणितही आपले जीन्स निश्चित करतात. ते आपल्या आईवडील आणि इतर पूर्वजांशी जुळतात. त्यांना कशाही प्रकारे बदलता येत नाही.

तसेही एखाद्या व्यक्तिचे रूप-सौंदर्य केवळ त्याच्या रंगावरच अवलंबून नसते. अनेक सावळ्या रंगाचे लोकही खूप सुंदर दिसतात आणि अनेक गोरेगोमटे सामाजिक दृष्ट्या सुंदर नसतात. त्यामुळे आपण उगाचच स्वत:च्या व होणाऱ्या बाळाच्या रंगाबाबत एवढा विचार करू नका.

गरोदरपणानुसार उचित प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त आहार घ्या. त्यामध्ये फळे, पालेभाज्या, दूध, अंडी, डाळी पुरेशा प्रमाणात असावीत. जेणेकरून आपल्याला व आपल्या बाळाला सर्व पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळू शकतील.

प्रश्न : मी २८ वर्षांची तरुणी आहे. मला पाळी येत नाही. गेल्या काही दिवसात मी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आपले पेल्विक अल्ट्रासाउंड करून घेतले होते. त्याच्या रिपोर्टनुसार, माझ्या युटेरसची साइज २९ मिलीमीटर १८ मिलीमीटर १३ मिलीमीटर आहे. मला पुढे कधी गर्भधारणा होईल का? मी काय केले पाहिजे, योग्य सल्ला द्या?

उत्तर : तुम्ही तुमच्या अल्ट्रासाउंडचा पूर्ण रिपोर्ट पाठवला असता, तर चांगले झाले असते. त्यामुळे युटेरसबरोबरच ओव्हरीजबाबतही माहिती मिळाली असती. राहिला प्रश्न युटेरसचा, तर युटेरस लहान असून, त्याचा व्यवस्थित विकास झालेला नाहीए. याला हाइपोप्लास्टिक युटेरसचा दर्जा दिला जातो. हा विकार अनेक कारणांनी होतो. त्याच्या मुळाशी जाण्यासाठी सविस्तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

काही महिलांमध्ये युटेरस सुरुवातीपासूनच लहान असतो आणि ही स्थिती एखाद्या मोठ्या सिंड्रोमचा भाग असते. त्यामध्ये केवळ युटेरसच नव्हे, तर व्हेजाइनाचाही व्यवस्थित विकास होत नाही. काही महिलांमध्ये युटेरसचे लहान असणे त्या मोठ्या क्रोमोझमल विकाराचा भाग असतो, ज्याला टर्नर सिंड्रोम असे नाव दिले गेले आहे. त्यामध्ये मोठी सुधारणा होण्याची शक्यता नसते. एखाद्या मुलीमध्ये हा लैंगिक अवयवांचा विकास अर्धवट राहतो, जेव्हा ती आईच्या गर्भात असते आणि आई सिंथेटिक इस्टरोजेन म्हणजेच डाईइथाइलस्टील्बेस्ट्रो घेते.

काही उदाहरणांत ही संपूर्ण समस्या हार्मोनल पातळीवर निर्माण होते. किशोरावस्थेत जेव्हा शरीर प्यूबर्टीसह होणाऱ्या हार्मोनल बदलांच्या देखरेखीत स्वत:ला वाढत्या वयासाठी तयार करते आणि इतर सेक्शुअल गुणांसोबतच लैंगिक अवयवही परिपक्व होऊन मातृत्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी विकसित होतात, त्यावेळी अंतर्गत हार्मोनल गडबड झाल्यामुळे युटेरसचा विकास मध्येच अर्धवट राहतो. ही विकारमय स्थिती प्रामुख्याने पिट्युटरी ग्लँडमध्ये बनणाऱ्या प्रोलॅक्टिन हार्मोनच्या अधिकतेमुळे निर्माण होते.

आपला युटेरस का हाइपोप्लास्टिक म्हणजे अल्पविकसित राहिला, याची योग्यप्रकारे डॉक्टरी तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होईल की आपल्या मदतीसाठी काय केले जाऊ शकते? ही तपासणी आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजी विभागामध्ये करू शकता. या तपासणीत बराच काळ लागेल आणि येणाऱ्या खर्चासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल. कारण स्पष्ट झाल्यानंतरही उपचार यशस्वी होण्याची शक्यता मर्यादित राहील.

जिथे आपली पाळी न येण्याचा प्रश्न आहे, तर त्याचे मूळही युटेरसचे हाइपोप्लास्टिक होणे आहे.

प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला वेळेवर पाळी येत नाही. बहुतेकदा निश्चित वेळे, २-४ दिवस निघून गेल्यानंतर येते. याचे काय कारण आहे? मी या समस्येसाठी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घेतली पाहिजे का? माझ्या एका मैत्रिणीचे म्हणणे आहे की हे योग्य नाहीए. त्यामुळे पुढे मला याचा त्रास  सहन करावा लागू शकतो. कृपया योग्य सल्ला द्या?

उत्तर : तुम्ही असे काळजी करणे योग्य नाहीए. सत्य हे आहे की ज्या गोष्टीबाबत आपण काळजी करत आहात, ती गोष्ट अगदी सामान्य आहे. हे खरे आहे की बहुतेक महिलांमध्ये मासिकपाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण हे सत्यही तेवढेच मोठे आहे की, बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हे चक्र २६ दिवस, २७ दिवस, २९ दिवस किंवा मग ३० दिवसांचे असते. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात बनणाऱ्या लैंगिक हार्मोनचे वाढणे-कमी होणे, तिच्या शरीराच्या लयीवर अवलंबून असते, जी तिचे विशेष असते. एवढेच नव्हे, हे मासिक चक्र बऱ्याचशा अंतर्गत आणि बाहेरील तत्त्वांनी प्रभावित होऊ शकते. भौगोलिक स्थान परिवर्तन, जलवायू, व्यक्तिगत आरोग्य, मानसिक आरोग्य आणि एवढेच नव्हे, तर घरात किंवा हॉस्टेलमध्ये अन्य महिलांच्या मासिक चक्राचाही यावर प्रभाव पडताना आढळला आहे.

तुमचे मासिक चक्र ३०-३२ दिवसांचे आहे, तर यात काही विशेष गोष्ट नाही. याबाबत ना ही आपल्याला एखाद्या डॉक्टरकडे जायची गरज आहे आणि ना ही अशा एखाद्या मैत्रिणीच्या सल्ल्याने काळजीत पडण्याची गरज आहे, जिला मासिकपाळीच्या नियमांबाबत नीट माहिती नाहीए. तपासणीची आवश्यकता तेव्हाच असते, जेव्हा मासिकपाळी उशिरा येण्याबरोबरच अनियमित असेल किंवा त्यात मासिक स्त्राव थोड्याच प्रमाणात होत असेल.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २१ वर्षांचा तरूण आहे. माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे. तिचंसुद्धा माझ्यावर निरतिशय प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. पण जेव्हा मुलीने तिच्या घरी याविषयी सांगितलं तेव्हा तिच्या घरात हल्लकल्लोळ माजला. तिच्या घरच्यांनी मुलीला मारहाण केली व तिचा मोबाइल ताब्यात घेतला. एवढंच नाही तर तिचं घराबाहेर येणंजाणं बंद केलं. तिने माझ्याशी संबंध तोडले नाहीत तर ते मला खोट्या केसमध्ये अडकवून तुरूंगात पाठवतील वा मला जीवे मारतील अशी तिला धमकी दिली. मुलगी यामुळे खूप घाबरली. तिने खाणंपिणं सोडून दिलं, प्रत्येक वेळी रडत राहते. तिच्यामुळे माझ्या जिवाला धोका पोहोचू नये असं तिला वाटतं.

आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आम्ही मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही ऐकत नाही. लग्नाला नकार देण्यामागचं कारण हे आहे की मुलीच्या आजीची जात (गोत्र) आणि आमची जात एक आहे. त्यामुळे नात्याने आम्ही दोघे भाऊबहिण आहोत.

माझ्या घरच्यांचा यावर अजिबात विश्वास नाही. त्यांच्याकडून लग्नासाठी पूर्ण होकार आहे. परंतु मुलीकडच्यांची सहमती नाही. दुसरीकडे कुठे तरी लग्नासाठी ते मुलीवर दबाव आणत आहेत. पण मुलगी मात्र अडून बसली आहे की लग्न करणार तर माझ्याशीच. नाहीतर मरून जाईन असं तिचं म्हणणं आहे. मला काही समजत नाही की काय करू?

मी मुलीच्या आई व मोठ्या बहिणीला भेटलो. आम्ही दोघं एकमेकांबाबत खूप गंभीर आहोत, आम्ही एकमेकांबरोबर खूप सुखी राहू तेव्हा आमच्या लग्नाला परवानगी द्या, असं समजवायचा प्रयत्न केला. परंतु त्या काहीच करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. समाज आमचं लग्न कधीच स्वीकारणार नाही. शेवटी याच समाजात त्यांना राहायचं आहे. समाजाच्या विरोधात त्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीचा मी पिच्छा सोडणं योग्य अन्यथा अघटित घडू शकतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन आम्ही लग्न करू शकत नाही. सांगा, आम्ही काय करावं?

एकतर आपण २१व्या शतकात जगतो आहे. आपण सुशिक्षित आहोत व स्वत:ला सुधारक मानतो. असं असूनही जात, गोत्र, जन्मकुंडली याच चक्रात अडकून आहोत. जेव्हा आंतरजातीय विवाहाचा मुद्दा समोर येतो, तेव्हा काही ना काही वाद जरूर होतो.

जन्मपत्रिकेत जर वधूवराचे गुण मिळाले तर विवाह यशस्वी होतात असं मानलं जातं. परंतु प्रत्यक्षात मात्र विवाह यशस्वी होण्यात या गोष्टींचं काहीही योगदान नाही. या अशा जुन्या गोष्टींच्या मोहात अडकवून ज्योतिष-पूजारी आपलं दुकान चालवत असतात. खरंतर लोक हे वास्तव जाणून असतात. पण समाजातील तथाकथिक ठेकेदारांच्या दादागिरीमुळे विरोध करायला घाबरतात.

आता तर तुम्ही फक्त २१ वर्षांचे आहात. तुम्ही लग्नासाठी वाट पाहू शकता. शक्यता आहे की तुमच्या दबावात येऊन उशीरा का होईना मुलीकडचे होकार देतील. जर कोणत्याही परिस्थितीत मुलीकडचे मानायला तयार नसतील तर तुम्ही कोर्ट मॅरेज करू शकता. एकदा लग्न झालं की थोड्या नाराजीनंतर ते तुम्हाला स्वीकारतील.

  • मी एक विवाहित स्त्री आहे. माझ्या लग्नाला २ वर्षं झालीत. हे माझं दुसरं लग्नं आहे. पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर मी खूप दु:खी असायचे. कारण माहेरून मला कुणाचाच आधार नव्हता. अशात माझ्या नवऱ्याने मला मित्राप्रमाणे सांभाळून घेतलं आणि आमच्या मैत्रीचं रूपांतर केव्हा प्रेमात झालं कळलंच नाही. त्यांनी मग घरच्यांशी बोलून माझ्याशी विवाह केला. माझे पती मुसलमान व मी हिंदू आहे. लग्नानंतरचे ३-४ महिने चांगले गेले. त्यानंतर सासूच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती माझ्याशी नेहमी भांडते. नवऱ्याला मी याबाबत सांगते, पण तो आईला काहीही बोलत नाही. मी खूप चिंतेत असते.

पहिल्या विवाहातून मला दोन मुलं आहेत. ज्यांना पतिने घटस्फोटानंतर स्वत:जवळ ठेवून घेतलं आहे. मला त्यांची खूप आठवण येते. पण माझ्या नवऱ्याशी मी याबाबत काही बोलू शकत नाही. सतत बेचैन असते. वाटतं की दुसरं लग्न करून मी चूक केली. मी काय करू?

तुम्ही सांगितलं नाही की पहिल्या पतीशी तुमचा घटस्फोट का झाला, जेव्हा की तुम्ही दोन मुलांची आई आहात. शिवाय आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही मुलांचा विचार करायला हवा होता. पण तुम्ही आपल्या स्वार्थापायी त्यांचा तसूभरही विचार केला नाही. घटस्फोटाचे परीणाम सर्वात जास्त मुलांना भोगावे लागतात हे तुम्हाला समजायला हवं होतं.

शिवाय नवरा म्हणजे काही वस्तू नाही मनात आलं की बदलून टाका. विवाह म्हणजे तडजोड असते. ज्यात पतीपत्नींना स्वत:चे अहं बाजूला ठेवून ताळमेळ बसवावा लागतो. विशेषत: जेव्हा तुमच्यावर मुलांची जबाबदारी असते. तुमच्या बाबतीत असं वाटतं की तुम्ही आवेशात येऊन घाईघाईने निर्णय घेतला. एवढं करूनही दुसऱ्या लग्नातही तुम्ही सुखी नाही. म्हणजे की तुमच्या स्वभावातच काहीतरी खोट आहे. नातेसंबंध निभावून न्यायला शिका. हेच तुमच्यासाठी योग्य होईल. मुलांसाठी तुमचा जीव तगमगतो ते व्यर्थ आहे. याचा तुम्ही आधीच विचार करायला हवा होता. आता तर तुमच्या मुलांनाही तुम्हाला भेटायची इच्छा नसेल. शिवाय तुमचे पती व परिवार यांनासुद्धा तुमचा मूर्खपणा असह्य होईल.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : माझं वय २६ वर्षे आहे. मला मासिक पाळीच्या वेळी खूप त्रास होतो. असह्य होऊन मी डॉक्टरकडे गेले. तेव्हा डॉक्टरने अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला दिला. जेव्हा अल्ट्रासाउंड करून घेतलं, तेव्हा डॉक्टरने एक गाठ असल्याचं सांगितलं. हा रिपोर्ट पाहून डॉक्टरने मला तीन महिने औषध घ्यायला सांगितलं. आता मी बरी आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की लग्नानंतर मला आई बनण्यात अडथळा येईल. याचा अर्थ काय? मी पुन्हा अल्ट्रासाउंड करवून घ्यावं का? डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मी चिंतेत आहे. मी काय करू?

उत्तर : तुमच्या प्रश्नामध्ये हे स्पष्ट केलेलं नाही की पाळीदरम्यान तुम्हाला नक्की काय त्रास होतो. तुमची पाळी उशिराने येते आणि कमी रक्तस्राव होतो की यावेळी तुम्हाला पेल्विकमध्ये वेदना होतात की तुम्हाला आणखी काही त्रास होतो? तुम्ही पेल्विक अल्ट्रासाउंडमध्ये ज्या गाठीचा उल्लेख केला ती विविध प्रकारची असू शकते. तिचा संबंध विविध रोगांशी असू शकतो.

तुम्ही तुमच्या समस्येबाबत सविस्तर लिहिलंत आणि तुमचा पेल्विक अल्ट्रासाउंडचा रिपोर्ट पाठवला तर बरं होईल, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं गांभीर्य समजून आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकू.

तिसऱ्यांदा अल्ट्रासाउंड करायचं की नाही याचा निर्णयही आजाराची माहिती मिळाल्यानंतरच घेता येईल. अल्ट्रासाउंडसारखी कोणतीही तपासाणी करण्यामागचा उद्देश एकच असतो की डॉक्टरला आजाराचं योग्य निदान करता येईल आणि उपचार सुरू होतील.

प्रश्न : माझ्या मुलीचं वय ११ वर्षे आहे. काही महिन्यांपासून तिची छाती भरू लागली आहे. मी तिला जेव्हा अंघोळ घालते, तेव्हा ती शरीराच्या त्या भागाला हात लावू देत नाही. तिथे वेदना होतात असं ती सांगते. हे नॉर्मल आहे की मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. इतक्या लहान वयात स्तनांचा विकास व्हायला सुरूवात होणं योग्य आहे का?

उत्तर : बऱ्याचदा मुली वयात येण्याचं वय हे ८ ते १३ वर्षे असतं. शरीरात सेक्स हार्मोन्स बनायला सुरूवात झाली की हळूहळू नारीत्त्वाच्या शारीरिक खुणा प्रकट होऊ लागतात. स्तनांचा आकार वाढतो. कामेंद्रियांचा विकास होतो. काखेत आणि नाभीच्या खाली केस उगवू लागतात. अंतर्गत जननांग म्हणजेच गर्भाशयाच्या आकारात वाढ होते, तसेच क्रियात्मक दृष्टीनेही परिवर्तन येऊ लागते. मुलगी रजस्वला होते.

प्रजनन इंद्रियांमध्ये प्रौढत्त्व येण्याचा एक क्रम असतो. बऱ्याचदा मुलींमध्ये या परिवर्तनाचे पहिले लक्षण स्तन विकासाच्या रूपात दिसून येते. ८ ते १३ वयात सुरू झालेली स्तन विकासाची प्रक्रिया ५ टप्प्यांमध्ये पूर्ण होते. सर्वात आधी स्तनाग्र म्हणजे निपल आणि त्याच्या भोवतीचे गुलाबी वर्तुळ एरिओलामध्ये रक्तप्रवाह वाढतो. मग ते वर्तुळ वाढते आणि स्तनकळी दिसू लागते. पुढच्या टप्प्यात दोघांचाही आकार वाढतो. चौथ्या टप्प्यात स्तनाग्र आणि त्याच्या भोवतीचे वर्तुळ विकसित होऊन स्तनापासून वर येते. शेवटच्या टप्प्यात स्तनाचा आकार वाढतो. यामुळे स्तनाग्राच्या भोवतीचे वर्तुळ पुन्हा स्तनावर उठून दिसते आणि फक्त स्तनाग्र पुढच्या बाजूला वर येते.

जेव्हा स्तनकळी विकसित होत असते, तेव्हा शरीराच्या या भागाला स्पर्श केल्यास वेदना होणे साहजिक आहे. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. पण ही अतिरिक्त संवेदनशीलता टाळण्यासाठी तुम्ही मुलीला स्पोर्ट्स ब्रा घालण्याचा सल्ला देऊ शकता.

प्रश्न : माझं वय २० वर्षं आहे. मला कायम अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होत असतो. मी काही दिवस डॉक्टरचे उपचारही घेतले. घरातल्या वडिलधाऱ्यांच्या सांगण्यावरून घरगुती उपायही करून पाहिले. पण काहीच फरक पडला नाही. काहीतरी उपाय सांगा.

उत्तर : अॅसिडिटी आणि गॅसचा संबंध तुमच्या जीवनशैलीशी आहे. आपण काय खातो, कसं खातो, किती तणावाखाली राहतो, कसे कपडे घालतो, आपला दिनक्रम कसा असतो अशा सगळयाचा आरोग्यावर परिणाम होतो. खाण्याच्या बाबतीत थोडीफार पथ्य पाळा, टेबल मॅनर्सवर लक्ष द्या. दिनक्रमामध्ये छोटे-छोटे बदल घडवून आणा.

तेलकट पदार्थ आणि अधिक चरबीयुक्त पदार्थांमुळे असिडिटी होते. टॉमेटो, कांदा, लाल मिरची, काळी मिरची, संत्रे, मोसंबी, चॉकलेट इत्यादींपासून दूर राहा. याचप्रकारे काही फळभाज्या आणि फळे यांमुळेही गॅस होतो. शेंगा, फ्लॉवर, मुळा, कांदा, कोबी यांसारख्या भाज्या आणि सफरचंद, केळं आणि जर्दाळू यांमुळेही पोटात गॅस होतो. प्रथिने बाधक ठरतात. सिझलर्ससारख्या गरम-गरम सर्व्ह होणाऱ्या पदार्थांमुळेही गॅस होतो. त्यामुळे असे पदार्थ टाळा. जेवताना काही टेबल मॅनर्स पाळणेही महत्त्वाचे आहे. जेवताना छोटे-छोटे घास घ्या. पचपच आवाज करत खाल्यामुळेही बरीचशी हवा आत जाते. पाणी किंवा इतर पेये पिताना घाई करू नका.

पूर्ण दिवस एकाच जागी बसून राहण्यापेक्षा थोडया-थोडया वेळाने फेऱ्या मारणं आतडयांसाठी चांगलं असतं. ताणावर नियंत्रण असणंही आवश्यक आहे. व्यायाम, हास्य इत्यादींमुळे ताणातून मुक्ती मिळते.

ओव्हर द काउंटर औषधांमध्ये एन्टासिड किंवा गोळया उदा. डायजिन, म्युकेन, जेल्यूसिल आणि आम्लरोधी औषधं उदा. रेनिटिडिन, पँटोप्राजोल, लँसोप्राजोल आणि ओमेप्राजोल यामुळे आराम मिळू शकतो. यामुळे बरं वाटलं नाही तर एखाद्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

आरोग्य परामर्श

* पद्मश्री प्रोफेसर डॉ. महेश वर्मा, डायरेक्टर व प्रिंसिपल, मौलाना आझाद इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस

प्रश्न : दातांमधील संवेदनशीलतेचे तात्पर्य काय आहे?

उत्तर : जेव्हा थंड किंवा गरम पेय अथवा खाद्यपदार्थांद्वारे दातांमध्ये वेदना किंवा बेचैनी जाणवते, तेव्हा त्याला दंत संवेदनशीलता म्हणतात. दातांच्या वरील थर (इनॅमल) हटल्यामुळे आतील थर ‘डँटीन’ तोंडाच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्यातील नसांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते.

प्रश्न : दातांमध्ये संवेदनशीलतेची समस्या सामान्यपणे आढळते का?

उत्तर : हो, ही समस्या खूप सामान्य आहे. सामान्यपणे २०-५० वयोगटांतील लोकांमध्ये ही समस्या असते.

प्रश्न : संवेदनशीलता किती प्रकारची असते?

उत्तर : हिरड्यांच्या समस्येमुळे संवेदनशीलता.

* दात झिजल्यामुळे संवेदनशीलता.

* दात हिरड्यांच्या ठिकाणी झिजल्यामुळे संवेदनशीलता.

* दातांना कीड लागल्यामुळे संवेदनशीलता.

* आम्लामुळे होणारी संवेदनशीलता.

* दंतप्रक्रियेनंतर होणारी संवेदनशीलता.

प्रश्न : संवेदनशीलतेमागे काय कारणे आहेत?

उत्तर : जर तोंडाची स्वच्छता योग्यप्रकारे केली नाही, तर प्लाक एकत्र झाल्याने दातांच्या वरील थर (इनॅमल) हटतो व दातांमध्ये संवेदनशीलता सुरू होऊ लागते.

* वयाबरोबर हिरड्या दातांना सोडू लागतात. विशेषत:  जर स्वच्छता ठेवली नाही. यामुळेही संवेदनशीलता निर्माण होते.

* कडक ब्रशच्या वापराने व वेगाने मागे-पुढे ब्रश केल्यानेही दात झिजतात व संवेदनशीलता जाणवते.

* अनेक लोकांना रात्रीचे ब्रश करायची सवय असते. त्यामुळे दातांच्या वरचा थर हटतो व संवेदनशीलता सुरू होते.

* दातांना कीड लागल्याने बॅक्टेरिया इनॅमलला नष्ट करतात, त्यामुळे दात संवेदनशील होतात.

* दातांना जर मार लागला, तर त्याचा परिणाम आतील थरांवर होऊ शकतो व संवेदनशीलता उत्पन्न होऊ शकते.

* माउथवॉश, ज्यात आम्लता असते, त्याचा वापर इनॅमलच्या थराला हटवतो व संवेदनशीलता निर्माण होते.

* आम्लयुक्त खाद्यपदार्थांमुळेही इनॅमलच्या थराला नुकसान पोहोचते व संवेदनशीलता निर्माण होते.

* काही दंत प्रक्रियेनंतरही संवेदनशीलता निर्माण होते. उदा. दातांची सफाई, क्राउन लावल्यानंतर, दात भरून घेतल्यानंतर इ. काही आठवड्यानंतर ही संवेदनशीलता बरी होते.

प्रश्न : दंत संवेदनशील झाल्यावर कोणते उपचार केले पाहिजेत?

उत्तर : जर दातांवर कॅलकुलस किंवा टार्टर जमा असेल, तर मशीनद्वारे ते काढलं जातं. त्याबरोबरच संवेदनशीलतेसाठी टूथपेस्ट, जिला डिसेंसिटायजिंग टूथपेस्ट म्हणतात व माउथवॉशचा उपयोगही लाभदायक ठरतो.

* फ्लोराइड वार्निश इनॅमल व डेंटीनला मजबुती देतो व संवेदनशील दातांच्या वेदना व बेचैनीला कमी करतो.

* ज्या हिरड्या दात सोडत आहेत, त्यांच्यासाठी मुळांवर बाँडिंग एजेंट लावल्याने खूप प्रभाव पडतो. तोंडाच्या दुसऱ्या एखाद्या भागातून हिरडी घेऊन ग्राफ्टिंगही करू शकता.

* दातांना कीड लागल्याने संवेदनशीलता कमी होण्यासाठी त्यात योग्य मसाला भरू शकता. जर कीड आतपर्यंत लागली असेल, तर रूट कॅनलचा उपचार करून क्राउन लावता येईल.

* दातांच्या झिजण्याच्या सवयीसाठी माउथ गार्डद्वारे उपचार केले जातात, जेणेकरून दातांचे अजून पुढे नुकसान होऊ नये.

* दातांना मार लागल्यानंतर क्षतीनुसार उपचार केले जातात. मसाला भरणे किंवा रूट कॅनलचा उपचार व क्राउन लावला जातो.

प्रश्न : दातांच्या संवेदनशीलतेपासून वाचण्यासाठी काय उपाय आहे?

उत्तर :  तोंडाची स्वच्छता चांगल्याप्रकारे केली पाहिजे. दिवसातून २ वेळा ब्रश करण्यासोबतच माउथवॉशचा वापर करणेही चांगले असते.

* मऊ केसांच्या ब्रशचा वापर केला पाहिजे. ब्रश करण्याची योग्य पध्दत स्विकारली पाहिजे.

* फ्लोराइडयुक्त माउथवॉश, ज्यात आम्ल नसेल, त्याचा वापर केला पाहिजे.

* ज्या खाद्यपदार्थांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असेल, त्यापासून दूर राहिले पाहिजे.

* दंत विशेषज्ञांद्वारे नियमितपणे तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून दातांना कीड लागलेली असेल किंवा हिरड्यांचा आजार असेल किंवा अन्य कोणती समस्या असेल, ज्यामुळे संवेदनशीलता निर्माण होऊ शकते, त्यावर सुरुवातीलाच उपचार होईल, तर ते पुढे वाढणार नाही.

आरोग्य परामर्श

* प्रतिनिधी

प्रश्न : मी 38 वर्षांचा आयटी व्यावसायिक आहे. मी ऑफिसमध्ये बसलो असताना मला माझ्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना आणि जडपणा आहे. मला क्वचितच जिममध्ये जाण्याची आणि वर्कआउट करण्याची वेळ मिळते. जेव्हा मी गुडघेदुखीची लक्षणे शोधली तेव्हा मला आढळले की गुडघा संधिवात 30 आणि 40 च्या दशकाच्या सुरुवातीला एक सामान्य समस्या आहे. गुडघ्यांचा संधिवात दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदलांच्या गरजेवर तुम्ही अधिक प्रकाश टाकू शकता का? कोणत्या मूलभूत गोष्टी आहेत ज्याद्वारे मी माझे गुडघे फिट ठेवू शकतो आणि वेदनांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो?

उत्तर : तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या गुडघ्यांवर योग्य उपचार करा. इंटरनेटवर पाहून स्वतःचे उपचार केल्याने तुम्हाला चुकीची माहिती मिळू शकते आणि तुमची स्थिती आणखी वाईट होऊ शकते. आपले गुडघे निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला जिममध्ये जाऊन बराच वेळ बसून वेळोवेळी ब्रेक घेऊन हलका व्यायाम करावा लागत नाही. कोणत्याही प्रकारचा हलका व्यायाम जसे 30 मिनिटे चालणे आणि एस्केलेटरऐवजी पायऱ्या चढणे तुम्हाला गुडघेदुखीपासून खूप आराम देऊ शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचे वजन जास्त असेल तर ते तुमचे गुडघे मजबूत ठेवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे.

 

हेही वाचा – मला ऑस्टियोआर्थरायटिसचे निदान झाले आहे, त्याचा माझ्या गुडघ्यांवर परिणाम होईल का?

संधिवात आता आपल्या देशाचा एक सामान्य रोग बनला आहे आणि त्यातून ग्रस्त लोकांची संख्या सतत वाढत आहे. केवळ प्रौढच नव्हे तर आजचे तरुण देखील आर्थरायटिसने ग्रस्त आहेत. ज्याची कारणे आजची आधुनिक जीवनशैली, अन्न, जीवनशैली इ. आज प्रत्येक व्यक्तीला सांत्वन हवे आहे, जीवनात मेहनत संपली आहे. परिणामी, एंडस्टेज आर्थरायटिसने ग्रस्त अनेक रुग्णांना संयुक्त बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २५ वर्षांची तरूणी आहे. एका मुलावर माझे खूप प्रेम आहे. त्याचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. पण लग्नाचा विषय काढला की तो गोंधळतो. त्याच्या घरी अजून त्याच्या लग्नाचा विषय नाही असे म्हणतो. याशिवाय त्याच्या आईचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे हे ही स्पष्ट झाले आहे. तसेच तो भाड्याच्या घरात राहतो. आधी त्याला त्याचे घर घ्यायचे आहे. मग तो लग्नाचा विचार करणार आहे. त्याचे वय २९ वर्षं होऊन गेले आहे. जर अशाचप्रकारे तो लग्नाचं बोलणं टाळत राहिला तर लग्नाचे वय निघून जाईल. मी काय केले पाहिजे सांगा?

तुम्ही दोघेही आता लग्नाच्या वयाचे आहात. तुम्हाला असे वाटत असेल की तुमचा प्रियकर तुमच्याशी लग्न करण्याबाबत गंभीर आहे व तो त्याच्या आईलाही या लग्नासाठी राजी करेल तर तुम्ही थोडा वेळ त्याला देऊ शकता. स्वत:चे घर घेण्याचा निर्णयही योग्य आहे. कारण लग्नानंतर तसेही जबाबदाऱ्या व खर्च वाढतात व तेव्हा घर घेणे अवघड असते. जर सध्या तो लग्न टाळत असेल तर तो योग्य आहे आणि लग्नाच्या वयाचा जो प्रश्न आहे तर २ वर्षांनी काही फरक पडणार नाही. पण जी कारणे तो सांगत आहे, ती खरी असावी.

  • मी १९ वर्षीय तरुणी आहे. ४ वर्षांपासून मी एका तरूणावर प्रेम करते आहे. त्याचेही माझ्यावर प्रेम आहे असे मला त्याच्या वागण्या बोलण्यावरून वाटते. आम्ही अजून एकमेकांशी बोललोही नाही. त्याला पाहिले की मला खूप उत्तेजित व्हायला होते. त्याच्याशी संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा होते. माझी कामेच्छा पूर्ण करण्यासाठी मी हस्तमैथून करते. कृपया मला सांगा की मी काय करू आणि माझ्या भावना सामान्य आहेत ना? मी काही चुकीचे तर करत नाही ना?

याचा अर्थ तुम्ही १५ वर्षांच्या असल्यापासून त्या मुलावर प्रेम करत आहात. किशोरावस्थेत असताना विरूद्धलिंगी आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. हे फक्त आकर्षण आहे, प्रेम नाही आणि त्या व्यक्तिच्या फक्त हावभावांवरून व वागण्यावरून तुम्ही असा अंदाज लावत आहात की तो ही तुमच्यावर प्रेम करतो, तर हा फक्त तुमचा गोड गैरसमज असू शकतो. एकमेकांशी बोलल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय व प्रेम व्यक्त केल्याशिवाय तो तुमच्यावर प्रेम करतो हे समजणे चुकीचे आहे आणि तुम्ही स्वत:बद्दल कुठलाही पूर्वग्रह बाळगू नका. तुम्ही नॉर्मल आहात. हस्तमैथूनाद्वारे स्वत:ची यौन उत्तेजना शांत करणे चुकीचे नाही.

  • मी २४ वर्षांची तरूणी आहे. सहा महिन्यांनंतर माझे लग्न आहे. लग्नाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसा मला जास्तच ताण येत आहे. खरंतर, मी एका तरूणावर प्रेम करत होते. वर्षभर माझ्याशी प्रेमाचे नाटक केल्यानंतर माझ्या प्रियकराने जबरदस्तीने माझ्याशी संबंध प्रस्थापित केले. मी विरोध केला असता त्याने मला खूप अपमानित केले. त्याचे असे म्हणणे आहे की मी जुन्या विचारांची आहे. त्याच्याशी वाद घालत असताना त्याच्या तोंडून शेवटी खरं काय ते निघाले, की त्याचे माझ्यावर प्रेमच नाही. हे कळल्यावर मला धक्काच बसला व आता तर वेगळ्याच तरूणाशी माझे लग्न होत आहे. त्यामुळे मला काळजी वाटत आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझ्या पतीला कळेल की माझे शील भंग झाला आहे, तेव्हा काय होईल?

प्रेमात तुम्हाला त्रास, खोटेपणा सहन करावा लागला असल्यामुले ताण येणे स्वाभाविक आहे. पण आता जर तुमचे लग्न होणार आहे तर तुम्ही तुमचा भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सुखद भविष्याचा विचार केला पाहिजे. आता तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्रीचा विचार करत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही स्वत: काही बोलत नाही तोपर्यंत तुमच्या पतीला काही कळणार नाही. तुमचे इतर कोणाशी संबंध होते हे विसरून जा.

  • माझ्या लग्नाला ६ महिने झाले आहेत. माझे पती माझ्यावर प्रेम करतात व मीही त्यांच्यावर खूप प्रेम करते. तरीही माझ्या मनात कायम साशंकता असते. लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्यांनी मला सांगितलं की विवाहाआधी त्यांचे एका मुलीवर प्रेम होते. पण घरचे लग्नासाठी तयार नव्हते, म्हणून तिला सोडून मला तुझ्याशी लग्न करावे लागले. त्यांनी मला हेही सांगितलं की आता त्यांच्यासाठी मीच सर्वकाही आहे व त्या मुलीला ते पूर्णत: विसरले आहेत. पण माझ्या मनात मात्र अढी निर्माण झाली आहे. न जाणो त्यांचे प्रेम कधी जागृत झाले आणि ते मला सोडून तिच्याकडे गेले तर काय होईल?

तुमच्याशी संबंध प्रस्थापित करण्याआधी त्यांनी तुम्हाला त्यांच्या भूतकाळाविषयी सर्व काही सांगितले तर त्यांच्या प्रामाणिकपणाचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही त्यांच्या लग्नाच्या पत्नी आहात आणि तुम्ही मान्य करता की ते तुमच्यावर प्रेम करतात. मग विनाकारण त्यांच्यावर संशय घेऊ नका. त्यांना एवढे प्रेम द्या की त्यांना इतर कुणाबद्दल विचार करण्याची गरजच पडणार नाही. तुमचे नवे नवे लग्न झाले आहे तर या सर्व गोष्टींचा विचार सोडून वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • मी १८ वर्षीय तरूणी आहे. उन्हात फिरल्याने माझा चेहरा खूप टॅन झाला आहे. मला ब्लीच वापरून पाहायचे आहे. पण याबाबत मला फार माहिती नाहीए. कृपया माझ्या त्वचेनुसार मी ब्लीचचा वापर कसा करू ते सांगा?

जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह असेल तर लॅक्टो ब्लीचचा वापर करायला हवा. लॅक्टो ब्लीचने त्वचेवर अॅलर्जी येण्याची शक्यता कमी असते. ऑक्सि ब्लीच सगळया प्रकारच्या त्वचेला चांगले ठेवते, तर गोऱ्या रंगासाठी केशरयुक्त ब्लीच चांगले असते. सावळया रंगासाठी पर्ल ब्लीचचा वापर कारायला हवा. जर तुम्ही लग्न, अथवा पार्टीसाठी ब्लीच करू इच्छिता तर इन्स्टंट ग्लोकरीता गोल्ड ब्लीचचा वापर करा.

  • माझे वय २५ वर्षं आहे. चेहऱ्यावर पिंपल्ससोबत टॅनिंगसुद्धा आहे. कृपया सांगा की मी काय करू, जेणेकरून माझे पिंपल्स आणि टॅनिंगचा त्रास नाहीसा होईल?

पपई अथवा केळ कुस्करून टॅनिंग आहे तिथे लावा. पपई आणि केळ यांच्या पल्पमध्ये बटाटा आणि टोमॅटोचा रस मिसळून ते पिंपल्स असलेल्या जागी लावा. १० मिनिट लावून ठेवा. नंतर चेहरा धुवा.

  • चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणण्यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा?

२ चमचे चंदन पावडमध्ये थोडे गुळाबजल मिसळून पेस्ट बनवा. आता हे चेहऱ्यावर लावा आणि १०-१५ मिनिटं तसेच लावून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर सौम्य मॉइश्चरायझर लावा.

  • माझे वय १७ वर्षं आहे. माझे केस अजिबातच वाढत नाहीत. कृपया ते लांबसडक आणि दाट होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगा.

व्हिटॅमिन ई केसांसाठी आवश्यक पोषकतत्त्व आहे. लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल याचे मिश्रणसुद्धा व्हिटॅमिन ईचा सर्वात चांगला पयार्य आहे. केसांसाठी मास्क करायचा असेल तर एका वाटीत १० मिमी. लिबांचा रस घ्या आणि यात १० मिमी. ऑलिव्ह तेल घ्या. हे मिश्रण छान मिसळा व आपल्या केसांना लावा आणि २० मिनिटे ठेवल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा. हे तुम्ही आपल्या घरीसुद्धा करुन पाहू शकता. हे तुमच्या केसांसाठी खुपच लाभदायक आहे. या मिश्रणातील पोषक घटक तुमच्या केसांचे होणारे नुकसान टाळते आणि त्यांना नैसर्गिक चमक देते.

  • माझे वय ३० वर्षं आहे. काही दिवसांपासून माझी त्वचा सैल पडते आहे. त्वचा टाईट करायला एखादा प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय आहे का?

सैल त्वचेला टाईट करण्याकरिता तुम्ही एका वाटीत केळं व्यवस्थित बारीक कुस्करून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घ्या जेणेकरून छान पेस्ट तयार होईल. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावा. फेस पॅक चांगला वाळल्यावर गरम पाण्याने धुवा.

केळ्यात असलेले व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ अॅन्टीएजिंगचे कार्य करतात. नियमित या फेस मास्कचा उपयोग केल्यास उत्तम आणि टाईट त्वचा मिळवण्यात मदत होऊ शकते.

तुम्ही नियमित त्वचेला खोबरेल तेल लावा. यासाठी झोपण्याआधी १ चमचा खोबरेल तेलाने तुमच्या चेहऱ्याला साधारण ५ मिनिटं मालिश करा. खोबरेल तेल त्वचेसंबंधीच्या तक्रारी दूर करण्यात सहाय्यक असते.

  • माझी त्वचा खूप ऑईली आहे. ऑईली त्वचेसाठी मुलतानी मातीचा फेस पॅक फायदेशीर ठरेल का?

मुलतानी मातीचा फेस पॅक तेल शोषून घेणारा मास्क आहे, जो ऑयली त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी खूपच फायदेशीर असतो. मुलतानी मातीचा फेस पॅक अतिरिक्त तेल, मळ आणि मृत त्वचा पेशी नाहीशी करतो. थोडया वेळातच चेहऱ्याला स्वच्छ आणि गोरा बनवतो. तुमच्या चेहऱ्यावरून तेल नाहीसे कारण्याकरिता तुम्ही २ मोठे चमचे मुलतानी माती, १ टोमॅटो आणि १ लिंबाचा रस घ्या. टोमॅटोमधील बिया काढून त्याचा रस काढा. आता एका वाटीत हे सगळे साहित्य चांगले मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. ३०-४० मिनिटं तसेच राहू द्या. आता बोटे गोल फिरवून हा पॅक काढा आणि पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही हा पॅक आठवडयातून १-२ वेळा लावू शकता.

  • माझे केस लांबसडक आणि दाट आहेत. अशावेळी केस रोज धुणे आणि मग सुकवणे त्रासदायक काम आहे. आठवडयातून किती वेळा केस धुवायला हवेत?

केस रोज धुवावे अथवा नाही हे तुमच्या केसांच्या टेक्सचरवर अवलंबून आहे कारण यामुळे हे निश्चित होते की केसांच्या मुळातून सीबम कसे तुमच्या केसात पसरते. जाड आणि कुरळया केसात सीबम हळुवार पसरते. म्हणून असे केस आठवडयातून केवळ एकदाच धुवायची गरज असते. तुमचे केस जाड आणि कुरळे आहेत आणि खूप दिवस धुतले नाहीत तरीही ते निर्जीव वाटणार नाहीत, म्हणून हे रोजरोज धुवायची गरज नाही. आठवडयातून एकदा जरी केस धुतले तरी त्यांत फार फरक पडणार नाही. जर तुमचे केस ऑयली असतील, तर मात्र तुम्ही केस आठवडयातून दोनदा धुवू शकता.

ऑईली केसांसाठी ड्राय शाम्पू वापरणे योग्य ठरेल. जर तुमचे केस पातळ आणि लांबसडक असतील तर तुम्ही एक दिवसा आड केस धुवू शकता.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी एक ५२ वर्षांची स्त्री आहे. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला ५ वर्षे झाली आहेत. माझे गेल्या काही महिन्यांपासून २७ वर्षांच्या अविवाहित पुरुषाशी शारीरिक संबंध आहेत. तो माझी खूप काळजी घेतो आणि आम्ही दोघे परस्पर संमतीने लैंगिक संबंध बनवतो. मला त्याच्याबरोबर समाधान वाटते आणि तो केवळ सेक्समध्येच नव्हे तर दु:खातदेखील नेहमी सहकार्य करतो. तो खूप जोमदारदेखील आहे पण सेक्स करताना त्याला कंडोम लावायला आवडत नाही. तथापि, मी कुटुंब नियोजन केले आहे. यात काही धोका तर नाही ना? कृपया सल्ला द्या?

आपल्या लैंगिक जोडीदाराचा लैंगिक संबंधादरम्यान कंडोम न वापरल्याने कौटुंबिक नियोजनाशी कोणताही संबंध नाही. लैंगिक संबंधात गर्भधारणेसाठी वाव असेल याची शक्यताही फारच कमी आहे. परंतु कंडोम केवळ गर्भनिरोधकच नव्हे तर लैंगिक संसर्गापासून बचाव करण्याचे एक चांगले साधन देखील मानले जाते.

सेक्स पार्टनरला सेक्स दरम्यान कंडोम वापरण्यास सांगा. याद्वारे आपण दोघेही लैंगिक संसर्गापासून वाचाल आणि तणावमुक्त होऊन लैंगिक संबंधाचा आनंद घेऊ शकाल.

 

  • मी २८ वर्षांची महिला आहे. गेल्या वर्षीच लग्न झाले. लग्नानंतर सासरी आल्यावर २-३ दिवसांतच समजले की नवरा मम्माज बॉयआहे. ते कोणतीही कामे केवळ आईला विचारून करतात आणि ते माझ्या एकाही गोष्टीशी सहमत होत नाहीत. माझ्या सासूच स्वयंपाकापासून ते पडद्याच्या रंगापर्यंतची निवड करतात आणि माझ्या शब्दांना थोडेही महत्त्व देत नाहीत. यामुळे मी खूप तणावात असते. काय करावे हे समजत नाही?

आपण नुकतेच विवाहित झाला आहात. आपले पती समजूतदार आहेत आणि म्हणूनच त्याला अचानक आपल्या आईकडे दुर्लक्ष करून तुमच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे योग्य वाटत नसेल. यामुळे घरात अनावश्यक तणाव निर्माण होईल.

कालांतराने आपण हळूहळू घरात आपले स्थान बनवावे. आपल्या सासूला, सासू नव्हे तर आई समजावे. त्यांच्या मोकळया वेळेत त्यांच्याबरोबर बसा, टीव्ही पहा, खरेदी करायला जा, त्यांचा आवडता ड्रेस त्यांना खरेदी करून द्या. घरातील कामात मदत करा.

जेव्हा आपल्या सासूला खात्री होईल की आपण आता घरगृहस्थी चांगल्या प्रकारे हाताळू शकता तेव्हा हळूहळू ती संपूर्ण जबाबदारी आपल्याकडे सोपवेल.

  • मी ४८ वर्षांची महिला आहे. सेक्सची इच्छा होते पण ओलेपणा कमी होतो. असे नाही की मी शिखरावर पोहोचत नाही. मला सांगा मी काय करावे?

रजोनिवृत्तीमुळे ही समस्या उद्भवू शकते, कारण रजोनिवृत्तीनंतर शरीरात फीमेल हार्मोन इस्ट्रोजेनची कमतरता असते आणि यामुळेही ही समस्या उद्भवते.

शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण आहारातील गरजेकडे लक्ष दिले पाहिजे. हंगामी फळे, हिरव्या भाज्या, दूध, पनीर इत्यादी नियमितपणे खा आणि नियमित फिरा, व्यायाम करा.

आपण सध्या सेक्स करताना क्रीम वापरू शकता. हे गुळगुळीतपणा ठेवेल आणि सेक्सचा आनंददेखील येईल. सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले करणे चांगले. यानेदेखील बऱ्याच प्रमाणात कोरडेपणाचा त्रास टाळता येऊ शकतो.

मी २६ वर्षांची आहे आणि माझा प्रियकर माझ्यापेक्षा ५ वर्ष मोठा आहे. यामुळे लैंगिक संबंधात कोणतीही समस्या उद्भवू शकते का? मला त्याच्याबरोबर सेक्स करण्याची इच्छा आहे परंतु कधीकधी असे वाटते की तो मला पाठिंबा देऊ शकत नाही, कारण एकदा जेव्हा दीर्घकाळापर्यंत फोरप्ले केल्यानंतर तो त्याचे जननेंद्रिय घालायचा प्रयत्न करीत होता, तेव्हा वारंवार प्रत्त्न करूनही तो यशस्वी होऊ शकत नव्हता. त्याला काही अडचण आहे का? कृपया सल्ला द्या?

तुमच्या जोडीदाराचे वय इतकेही झाले नाही की तो सेक्स करण्यात अयोग्य असेल. सत्य हे आहे की जर त्याने योग्य आहारविषयक सूचनांचे पालन केले आणि नियमित व्यायामाची सवय लावली तर लैंगिक संबंधाचा आनंद बऱ्याच काळापर्यंत उपभोगता येऊ शकेल.

हे सहसा लैंगिक संभोगाच्या ज्ञानाअभावी होते. घाई-गडबडीमुळे किंवा कुठल्या भीतीमुळे तो लैंगिक संबंध बनवण्यात अयशस्वी झाला असेल. सेक्स ही एक आरामात हाताळण्याची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दोघांचीही मने शांत असावीत आणि वातावरणदेखील शांत असावे.

तुम्ही दोघे सेक्स करण्यापूर्वी फोरप्लेचा आनंद घ्याल तर अधिक चांगले होईल.     जेव्हा पार्टनर सेक्ससाठी पूर्णपणे तयार असेल, तेव्हा त्याला जननेंद्र्रिय घालायला सांगा. नक्कीच, आपणा दोघांनाही त्यात पराकाष्ठेचा आनंद मिळेल. परंतु लक्षात ठेवा, कृपया यावेळी पुरुष जोडीदारास कंडोम वापरण्यास सांगा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें