स्त्रीरोगतज्ज्ञांना अशी सांगा तुमची समस्या

* प्रतिनिधी

एक यशस्वी गायनोकॉलॉजिस्ट अर्थात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणजे ज्यांचे रुग्ण त्यांच्याशी त्यांच्या कौटुंबिक समस्या, जोडीदारासोबतच्या लैंगिक समस्या आणि पती-पत्नीचे नाते इत्यादींबद्दल मोकळेपणाने बोलू शकतात.

लैंगिक शिक्षण आणि पालकत्वासाठी ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ हेल्थ अँड कौन्सिल’ ही स्थापन करण्यात आले आहे, जेणेकरून लैंगिकतेच्या या समस्येबद्दल प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक नर्सिंग होममध्ये एकाच छताखाली लैंगिक आणि पुनरुत्पादक अशी दोन्ही माहिती उपलब्ध होईल.

लैंगिक औषधांसाठी, लैंगिक समस्यांसह सर्व वैयक्तिक समस्यांबद्दल बोलणे आवश्यक आहे. लोकांना त्यांच्या वैयक्तिक समस्यांबद्दल काहीही संकोच न बाळगता बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांना समजेल की, त्यांच्या लैंगिक समस्या या इतर रोगांप्रमाणेच आहेत ज्या शरीराशी संलग्न असल्यामुळे वेदना होतात. लैंगिक समस्यांना गुप्त किंवा घाणेरडे समजणे चुकीचे आहे.

चाचण्या आणि उपचार

आजकाल प्रसूतीशास्त्रात नवनवीन शोध लागले आहेत. त्यांचे अनेक फायदे आहेत. इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच आता प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातही तांत्रिक प्रगती दिसून येते. सर्वोत्कृष्ट औषधे, नवीन वैद्यकीय यंत्रे चाचण्या आणि प्रयोगशाळेतील तपासणीसाठी उपयुक्त आहेत. गरोदरपणातील मधुमेह, रक्तदाब इत्यादी गंभीर परिस्थितीत तंत्रज्ञानातील नवीन प्रगतीच्या मदतीने बाळाला वाचवता येते.

प्रत्येक नर्सिंग होममध्ये न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट असणे आवश्यक आहे. ८००, ९०० ग्रॅम वजनाच्या जन्मलेल्या बाळांनाही वाचवणे आता शक्य झाले आहे.

काही कारणांमुळे अनेक जोडप्यांना मूल होऊ शकत नाही, पण आता नवीन वैद्यकीय शोधांच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आता त्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या आणि उपचार घेता येतात. नवीन पद्धती वापरूनही त्यांना गर्भधारणा करता येत नसेल किंवा शक्यता कमी असेल तर दात्याचे वीर्य, दात्याची अंडी आणि सरोगेट मदर यांच्या माध्यमातून मदत मिळू शकते.

चांगला सल्ला का आहे महत्वाचा?

डॉक्टर काही जोडप्यांना मदत करू शकत नसतील तर त्यांच्या मनातून मूल दत्तक घेण्याबाबतचे गैरसमज दूर करून मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला जातो.

आपले कायदे खूप कडक असल्यामुळे मूल दत्तक घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. अनेकजण आता मूल विकतही घेतात. यामुळे त्यांना मातृत्व आणि पितृत्वाची सुखद अनुभूती मिळते आणि मुलालाही चांगले आयुष्य मिळते. धकाधकीचे जीवन, वातावरण, प्रदूषण, रासायनिक फवारणी केलेला भाजीपाला, धान्ये, फळे इत्यादींमुळे शारीरिक संतुलन बिघडते. हार्मोन्सची समस्या, अंडयाची समस्या, व्यावसायिक तणाव, पैशांची कमतरता, या सर्व कारणांमुळे वीर्य प्रभावित होते. त्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे.

गर्भाशयाची योग्य वाढ होत नसल्याने सरोगेट मदरची गरज भासते. गर्भाशय काढून टाकल्यास, कर्करोग, हृदयविकार इत्यादी रोग झाल्यास, जोडप्याची अंडी आणि वीर्य इतर स्त्रीच्या भ्रुणामध्ये विकसित केले जाते. हे काम करणाऱ्या महिलेला ‘सरोगेट मदर’ म्हणतात. गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतची जबाबदारी तिची असते आणि प्रसूतीनंतर तिला ते मूल जोडप्याला द्यावे लागते.

अशाप्रकारे, ‘सरोगेट मदर’ जोडप्याला त्यांचे जनुक विकसित करण्यास मदत करते. काही प्रमाणात ही प्रक्रिया व्यावसायिकतेचेही नेतृत्व करते, हे नाकारता येणार नाही. भारतात यासाठी आतापर्यंत जे नियम आणि कायदे बनवले गेले आहेत ते याला काळया बाजारात ढकलत आहेत.

समस्या येण्याची शक्यता कमी

वैद्यकीय पर्यटकांसाठी ते खूप उपयुक्त आहेत. परदेशात सरोगेट मदरची व्यवस्था करणे महागडे आहे, त्यामुळे परदेशी लोकही येथे येतात आणि आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या गरीब लोकांमधील महिला ‘सरोगेट माता’ बनण्यास तयार होतात. विदेशींना हे मूल सोबत नेण्यासाठी बराच त्रास होतो. देशातील मातांनाही जन्म प्रमाणपत्र उशिराने मिळते. नातेवाईक आणि मित्रमंडळीही टोमणे मारणे सोडत नाहीत.

आता वीर्य बँका खूप चांगले काम करत आहेत. या बँकांमध्ये चांगले नमुने उपलब्ध आहेत. वीर्य दात्यांचे वीर्य या बँकांमध्ये जतन केले जाते आणि ज्या पुरुषांना वीर्य समस्येचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरते. हे कृत्रिम रोपणासाठीही उपयुक्त ठरते. वीर्य बँका या नमुन्यांची चाचणी घेतात, त्यामुळे समस्या येण्याची शक्यता फारच कमी असते.

दुसरीकडे, आपल्याकडे माहितीचा अभाव असतानाही कुटुंब नियोजनात बरीच सुधारणा झाली आहे. गर्भनिरोधक गोळयांनी ५० वर्षे पूर्ण केली आहेत. आज बाजारात कमी हार्मोन्स आणि कमी साइड इफेक्ट्स असलेली औषधे आहेत, त्यामुळे त्या प्रभावहीन ठरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आता तर इमर्जन्सी गर्भनिरोधक महिला कंडोमही उपलब्ध आहे.

लग्नानंतरच्या समस्या

सामान्य आजारांपैकी, स्त्रीरोगतज्ज्ञांना स्त्रियांमधील सर्वात सामान्य मूत्र संक्रमणाच्या समस्येला सोडवावे लागते. महिलांचे गर्भाशय जननेंद्रियाच्या अगदी जवळ असल्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना मूत्र संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच त्यांना मासिक पाळी, प्रसूती किंवा गर्भधारणेदरम्यान संसर्ग होण्याची भीती असते. लग्नानंतरच्या पहिल्या लैंगिक संभोगादरम्यानही महिलांना संसर्ग होऊ शकतो. सर्वसाधारणपणे, कमी द्रव आहार घेतल्यास संसर्ग होऊ शकतो आणि जेव्हा मूत्राशय वाढणे, मुतखडा इत्यादी समस्या उद्भवू शकतात तेव्हा त्रास होऊ शकतो.

का आवश्यक आहे विशेष ज्ञान?

आजकाल मुलींना वयाच्या ९व्या वर्षी मासिक पाळी येऊ लागली आहे, पण त्या अनेक लैंगिक गोष्टींची माहिती आधीच करून घेतात, त्यामुळे त्यांच्या ज्ञानाची पातळी वाढत आहे. ही उत्तेजित प्रक्रिया मेंदूमध्ये खूप वेगवान असल्याने हार्मोन्स तयार होऊ लागतात. पर्यावरणीय प्रदूषणामुळे पसरणाऱ्या रसायनांचा शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो, त्यामुळे परिपक्वता लवकर येते.

तरुण वयात मासिक पाळी व्यवस्थापित करणे ही समस्या बनत आहे. यामुळे पालकही चिंतेत आहेत. मासिक पाळी सुरू होताच निसर्ग शरीराला पुनरुत्पादनासाठी तयार करतो, परंतु मासिक पाळीचा कालावधी कमी होत आहे आणि लग्नाचे वय वाढत आहे. लग्नाशिवाय नको असलेले लैंगिक संबंध, नको असलेली गर्भधारणा, गर्भपात आणि लग्नापूर्वी गर्भधारणा अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत.

पारंपरिकपणे, घरातील वडीलधरी या विषयावर गुप्तपणे बोलतात. अशा गोष्टी मुलांसमोर केल्या जात नाहीत. दुसरीकडे चित्रपट आणि माध्यमांतून त्याचा खुलासा होतो. मुलं संभ्रमात पडतात की बरोबर काय? सेक्सबद्दलची अपूर्ण आणि चुकीची माहिती मुलांना उत्तेजित करते.

उपयुक्त माहितीची गरज

मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य माहिती, लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. हे ज्ञान त्यांना घरातून आणि पुढे शाळा-महाविद्यालयांमध्ये मिळू लागले तर ती लग्न, मातृत्व आणि चांगले नागरिक बनण्यास तयार होतील, परंतु लैंगिक शिक्षण हे संभोगाचे शिक्षण आहे, असा गैरसमज समाजात आहे. मानसिक आणि शारीरिक वाढ, तारुण्य, स्त्री-पुरुष संबंध, लिंग, समानता, लिंगभेद, विरुद्ध लिंगी आकर्षण इत्यादी समलैंगिक शिक्षणाचा (सेक्स एज्युकेशन) भाग आहे. त्यामुळे मुलांना लहान वयात हे सर्व लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ सर्वाधिक उपयुक्त आहेत.

वैवाहिक समुपदेशनामुळे संभोगाबाबतचे गैरसमज आणि त्यासंबंधीच्या समस्या दूर होतात. अनेक प्रकरणांमध्ये, लैंगिक संबंधांबद्दल माहिती नसल्यामुळे लग्नाचा पहिला दिवस शेवटचा दिवस ठरतो.

आजच्या युगात, लोकांचे अनेक पर्यायी नातेसंबंध तयार होतात. त्याचा एकप्रकारे विवाह व्यवस्थेवर परिणाम होत असला तरी ते थांबवता येत नाहीत. जेव्हा एक स्त्री आणि पुरुष एकत्र काम करतात किंवा जवळ राहातात किंवा एकत्र अभ्यास करतात तेव्हा दोघांनाही एकमेकांची जास्त सोबत आवडते. काही जण घरभाडे वाचवण्यासाठी एकच घर दोघांमध्ये भाडयाने घेतात. अशा स्थितीत दोघांनाही लैंगिक संबंधांमध्ये बरीच काळजी घ्यावी लागते आणि यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांची भूमिका मोठी असते.

५ सुपर हेल्दी तेल हृदय ठेवतात निरोगी

* पारुल भटनागर

जेव्हा आपण स्वयंपाकाचे तेल विकत घ्यायला जातो तेव्हा त्याची किंमत किती आहे, हे पाहातो. ज्या तेलाची किंमत आपल्याला कमी वाटते ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे की नाही हे जाणून न घेताच आपण अनेकदा ते खरेदी करतो. प्रत्यक्षात तेलाचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी आणि हृदयाशी असतो. म्हणूनच हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की, स्वयंपाकाचे तेल काळजीपूर्वक निवडायला हवे, जेणेकरून तुमचे जेवण चविष्ट बनण्यासोबतच तुमच्या हृदयाचे आरोग्यही चांगले राहील.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात दरवर्षी सुमारे १२ लाख तरुण हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमावतात, ही अत्यंत चिंताजनक आकडेवारी आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.

चला तर मग जाणून घेऊया कोणते तेल आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे :

संतृप्त असंतृप्त तेल

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका संशोधनानुसार, जर आपल्याला आपले हृदय निरोगी ठेवायचे असेल तर आपण असंतृप्त तेल म्हणजेच चांगल्या चरबीचे सेवन करू शकतो, ज्याला पॉली अनसॅच्युरेटेड फॅट आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅट म्हणतात. हे खोलीच्या तपमानावर आधारित द्रव आहे. ओमेगा ३ फॅटी अॅसिड, जे असंतृप्त चरबी आहे, ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. हे फॅट्स हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतात.

याशिवाय ते शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्याचे काम करते. यासोबतच ते आपल्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवते आणि आपल्या धमन्या कडक होऊ देत नाही. दुसरीकडे सॅच्युरेटेड फॅट्स, ज्यांना वाईट फॅट्स असेही म्हणतात, आपण ते खाणे टाळले पाहिजे आणि जरी तुम्ही ते खाल्ले तरी खूप कमी प्रमाणात खा, कारण ते आपले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते.

हे खोलीतील तपमानावर चांगले राहते. तुम्ही कृत्रिम ट्रान्स फॅट्सपासून लांब राहा, कारण ते हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कर्करोग, लठ्ठपणा इत्यादी वाढवण्याचे काम करतात.

माहितीपूर्ण तथ्य

जर तुमच्या शरीराला रोज २००० कॅलरीजची गरज असेल तर तुम्ही त्यातील २०-२५ टक्के कॅलरीज फॅटमधून घ्याव्यात आणि ही फॅट असंतृप्त फॅट आहे याची खात्री करून घ्यावी. तुम्ही जर सॅच्युरेटेड फॅट घेत असाल तर त्याची मर्यादा ठरवा म्हणजे फक्त ५-६ टक्के घ्या.

कोणते तेल हृदयासाठी आहे आरोग्यदायी

ऑलिव ऑइल : तज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात विचार न करता स्वयंपाकासाठी ते निवडू शकता. मुळात हे तेल मोनोअनसॅच्युरेटेड आहे. यात ओलेइक अॅसिड नावाचे एक प्रमुख फॅटी अॅसिड असते, जे शरीरातील जळजळ, कर्करोग आणि हृदयविकारापासून संरक्षण करण्यास मदत करते. तसेच, त्यात मोठया प्रमाणात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला ऑक्सिडेशनपासून वाचवून हृदयरोगाचा धोका मोठया प्रमाणात कमी करतात.

स्ट्रोक किंवा झटका हे जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. एका संशोधनात सुमारे १.५ लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये असे आढळून आले की जे लोक सतत ऑलिव्ह ऑइलचे सेवन करतात त्यांच्यामध्ये स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो.

रक्तदाब आणि खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासोबतच ऑलिव्ह ऑईल रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारून तुमचे हृदय निरोगी बनवण्याचे काम करते. यामध्ये अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्मही कर्करोगाचा धोका मोठया प्रमाणात टाळण्यास मदत करतात. म्हणूनच स्वयंपाक करताना ऑलिव्ह ऑईलचा वापर फायदेशीर ठरतो.

कॅनोला तेल : जर तुम्ही हृदय किंवा कोलेस्ट्रॉलच्या आजाराने त्रस्त असाल किंवा त्यापासून स्वत:चे संरक्षण करू इच्छित असाल तर कॅनोला तेल तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे, कारण यात चांगले फॅट्स तसेच जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व के चे गुणधर्म असतात. हे कोलेस्ट्रॉलविरहित आहे. यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स असण्यासोबतच मोठया प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अॅसिड अल्फा लिनोलेनिक अॅसिड असते, जे तुमचा रक्तदाब, कोलेस्टेरॉलचा दाह नियंत्रित करून तुमच्या हृदयाची विशेष काळजी घेण्याचे काम करते.

अनेक आरोग्य संस्थांनी कॅनोला तेलाचे हृदय स्मार्ट तेल म्हणून वर्णन केले आहे, कारण त्यात ० टक्के ट्रान्स फॅट तसेच उच्च पातळीचे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे तुम्हाला हृदय आणि मधुमेहासारख्या घातक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करते.

अॅवोकॅडो तेल : यात भरपूर मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, म्हणजेच त्यात हेल्दी फॅट्स तसेच अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्याचा थेट संबंध खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासोबतच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्याशी असतो. ७० टक्के अॅवोकॅडो तेलामध्ये ओलिक अॅसिड असते, जे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते. कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य ठेवल्याने, हृदय योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम होते.

या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट मोठया प्रमाणात असते, जे पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते, तसेच ते शरीराला पॉलीफेनॉल नावाच्या अँटीऑक्सिडंट विरहित रॅडिकल्सपासून संरक्षण देण्यासही उपयुक्त ठरते. हे तेल फक्त हृदयासाठीच नाही तर तुमच्या एकूण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

सूर्यफूल तेल : अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, सूर्यफूल तेलामध्ये ८० टक्के असंतृप्त चरबी असते, जी हृदयासाठी खूप चांगली मानली जाते. त्यात सॅच्युरेटेड फॅट्स नसतात. त्यामुळे ते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. सॅच्युरेटेड फॅट्सच्या तुलनेत ते शरीराला लगेच ऊर्जा देण्याचे काम करतात. तसेच, यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे जिवाणू आणि विषाणू शरीरात सहज प्रवेश करू शकत नाहीत. यात असलेली प्रथिने ऊतींच्या दुरुस्ती आणि बांधणीसाठी उपयुक्त ठरतात.

तीळाचे तेल : तिळाचे तेल अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असते तसेच यात जीवनसत्त्व ई, फायटोस्टेरॉल, सेसामोल आणि सेसमिनॉल असते, जे तुमच्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. त्यात ओमेगा ३, ओमेगा ६ आणि ओमेगा ९ फॅटी अॅसिड संतुलित प्रमाणात असते. हे हृदयविकार रोखण्यासाठी कार्य करतात.

अभ्यासानुसार, तिळाचे तेल उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी होतो. त्यात ४१ टक्के पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि ३९ टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. म्हणूनच हे तेल हृदयासाठी खूप चांगले मानले जाते. यासोबतच, मॅग्नेशियमचा चांगला स्रोत असल्याने ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

पावसाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

* पारूल भटनागर

पावसाळा सुरूच होणार आहे, पाऊस सुरू होताच रखरखीत उन्हापासून दिलासा मिळतो. या ऋतूत मौजमजा करण्याची मनापासून इच्छा होते. मित्र-मैत्रिणी आणि प्रियजनांसोबत मजा करायला मन आतूर होते. या ऋतूत खाण्यापिण्याचीही वेगळीच मजा असते, पण या ऋतूत तनामनाला जितका दिलासा मिळतो तितकीच तुमची प्रतिकारशक्ती वाढवणेही गरजेचे असते, कारण पावसाळयात संसर्ग आणि फ्लूसारखे आजार वाढतात. आजारांचा धोका सर्वात जास्त असतो.

अशा परिस्थितीत, मजबूत प्रतिकारशक्ती असलेली व्यक्तीच निरोगी जीवन जगू शकते, सोबतच रोगांना शरीरावर ताबा मिळवण्यापासून रोखू शकते.

चला तर मग यासंबंधी वाशीतील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाचे इंटरनल मेडिसीनचे संचालक डॉ. फराह इंगळे, यांच्याकडून जाणून घेऊयात :

रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय?

प्रतिकारशक्ती म्हणजे ज्याला रोगप्रतिकार शक्ती असेही म्हणतात. ही शरीराची अंतर्गत रोगप्रतिकारकशक्ती आहे, जी शरीराला बाह्य घटकांपासून संरक्षण प्रदान करण्यास मदत करते. विषाणू, जीवाणू शरीरावर हल्ला करताच ही रोगप्रतिकारकशक्ती त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सक्रिय होते. ही प्रक्रिया थोडी अवघड असते, कारण या कामात वेगवेगळया प्रकारच्या पेशींचा सहभाग असतो, ज्या शरीराला बाह्य घटकांपासून वाचवून निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रतिकारशक्ती अनेक प्रकारची असते जसे की, सक्रिय प्रतिकारशक्ती. ही आपल्या शरीराला तेव्हा मिळते जेव्हा आपण कोणत्याही जीवाणू, विषाणूंच्या संपर्कात येतो. अशावेळी, आपल्याला आधीच मिळालेल्या अँटीबॉडीज आणि रोगप्रतिकारक पेशी त्या बाह्य घटकांचा नाश करण्यात गुंततात.

रोगप्रतिकारशक्तीचा दुसरा प्रकार म्हणजे निष्क्रिय प्रतिकारशक्ती, ज्यामध्ये विषाणूंपासून संरक्षण देण्यासाठी बाह्य रूपात अँटीबॉडीज पुरवल्या जातात. परंतु तेव्हाच शरीर बाह्य घटकांशी लढण्यास सक्षम होते जेव्हा ते आतून मजबूत असते आणि शरीर आतून मजबूत बनवायचे असेल तर चांगल्या आहारासोबत काही आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आवश्यक असते, विशेषत: पावसाळयात.

पोषक आहार घ्या

शरीराची भूक भागवण्यासाठी प्रत्येकजण अन्न खातो, परंतु आपण हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की, केवळ पोट भरल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते असे नाही, तर योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून शरीराचे पोषण होईल. आहाराद्वारे शरीराशी संबंधित गरजा पूर्ण करून प्रतिकारशक्तीही वाढवता येते.

यासाठी पावसाळयात आहारात आणि दिनचर्येत योग्य, पोषक आहाराचा नक्कीच समावेश करा. तुम्हाला निरोगी ठेवण्यासोबतच हे पदार्थ तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्याचेही काम करतील.

क जीवनसत्त्वयुक्त समृद्ध आहार

तुम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीवर काम करत असाल तर विशेषत: पावसाळयात तुमच्या आहारात क जीवनसत्त्व असलेले पदार्थ आणि फळे जसे की डाळिंब, संत्री, केळी, सफरचंद, द्राक्षे, किवी, ब्रोकोली, पिवळा भोपळा, टोमॅटो, पपई, हिरवी मिरची यांचा समावेश करा. पालेभाज्या खा, कारण त्या पौष्टिक तसेच भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असलेल्या असतात, असा आहार जीवाणू, विषाणूंपासून पूर्ण संरक्षण देण्यासोबतच शरीराला आतून मजबूत बनवण्याचे काम करतो.

याच्या मदतीने आपण सर्दी आणि फ्लूसारख्या मौसमी आजारांपासूनही दूर राहू शकतो. शरीर स्वत:हून क जीवनसत्त्व तयार करत नाही, म्हणूनच शरीरातील त्याची गरज पूर्ण करण्यासाठी, आपल्याला ते फक्त अन्न आणि पूरक, पोषक आहारातून घेणे आवश्यक असते.

प्रथिनांचे सेवन उत्तम

बाहेर जे घडते त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही, पण तुमच्या शरीरात जे काही घडत असते ते तुमच्या आहाराद्वारे नियंत्रित करून तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. जीवनसत्त्व अ, क, ड, ब ६ आणि जीवनसत्त्व ब १२ ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाची असतात, सोबतच त्यात, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक पोषकतत्त्वे असतात.

निरोगी प्रौढ व्यक्तीला त्याच्या वजनानुसार दररोज प्रति १ किलोग्रॅममागे १ ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक असते, जसे की जर तुमचे वजन ६० किलो असेल तर तुम्हाला दररोज ६० ग्रॅम प्रथिने घेणे गरजेचे असते.

यासाठी मूग डाळ, अंडी, सोयाबीन, पनीर, मिश्र कडधान्ये, भाजलेली नाचणी, ओट्स ब्रेड, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ, पीनट बटर, कडधान्य इत्यादींचा आहारात समावेश करा. यासह, स्वत:ला सुदृढ ठेवण्याबरोबरच तुमची प्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही आजारांपासून स्वत:चे संरक्षण करू शकाल.

खनिजेही खूप गरजेची

स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल, तर जीवनसत्त्वांसोबतच शरीरातील खनिजांच्या गरजाही पूर्ण कराव्या लागतील. हाडे मजबूत करण्यासाठी आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी खनिजे आवश्यक असतात, पण जर शरीरात त्याची कमतरता असेल तर नवीन निरोगी पेशी तयार होत नाहीत, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच संसर्ग होण्याची भीती वाढते. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या प्रतिकारशक्तीवर काम करावेच लागेल. पावसाळयात आजारांपासून स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर आहारात आवश्यक खनिजांचा समावेश करायला विसरू नका.

यासाठी तुमच्या आहारात लोह, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम यांचा समावेश करा. यामुळे स्नायूंना बळकट करण्यासोबतच मेंदूचा विकास होण्यास मदत होते, सोबतच नवीन पेशी तयार होण्यासही मदत होते.

स्वत:ला हायड्रेट ठेवा

ऋतू कोणताही असो, प्रत्येक ऋतूत, विशेषत: पावसाळयात स्वत:ला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक असते, कारण आल्हाददायक हवामान आणि थंड हवामानामुळे आपल्या शरीराला पाण्याची गरज भासत नाही, परंतु शरीरात पाण्याचे खूप महत्त्व असते. पाणी शरीरात महत्वाची भूमिका बजावते. हे शरीराच्या पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते, ज्यामुळे शरीर सुरळीतपणे कार्य करू शकते. हे शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास आणि आपल्या प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होण्यापासून रोखण्यासाठीही उपयुक्त ठरते.

आपली रोगप्रतिकारकशक्ती आपल्या रक्तप्रवाहातील पोषक तत्वांवर सर्वाधिक अवलंबून असते आणि आपले ब्लड स्ट्रीम म्हणजे आपल्या रक्तप्रवाहावर म्हणजेच पाण्यावर मोठया प्रमाणात रक्त प्रवाह बऱ्याच अंशी पाण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच जर आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर पोषक तत्त्वे प्रत्येक अवयवापर्यंत सहज आणि योग्यरित्या पोहोचत नाहीत. म्हणून, स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी, दररोज ९-१० ग्लास पाणी प्या. यासाठी तुम्ही लिंबू पाणी, नारळपाणी, फळांचा रस यांचाही आधार घेऊ शकता.

पुरेशी झोप

तुम्ही काही लोकांना असे सांगताना ऐकले असेल की, आम्ही १०-१२ तासांची झोप घेतली, तरीही आम्हाला मरगळल्यासारखेच वाटते, याउलट ५ तासांच्या झोपेनंतरही माणसाला खूप ताजेतवाने वाटू लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की, उत्तम झोप आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला बळकटी देण्याचे काम करते. बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ज्या लोकांना पूर्ण आणि चांगली झोप मिळत नाही, ते लवकर आजारी पडण्यासोबतच त्यांना सर्दी व्हायरसचा धोकाही जास्त असतो.

म्हणून, स्वत:ला उर्जावन ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीने दररोज ७-८ तास पुरेशी झोप घेणे आवश्यक असते, कारण ते शरीराचे संरक्षक जाळे असते, जे शरीरातील संसर्गास प्रतिबंध करून संसर्ग नियंत्रित करते.

तणाव दूर करणारे व्यायाम

व्यायाम तुम्हाला केवळ तणावापासून दूर ठेवत नाही तर तुमचे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासोबतच तुमची प्रतिकारशक्ती मजबूत बनवण्याचे काम करतो. इतकंच नाही तर व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास, वजन नियंत्रित करण्यास तसेच चांगली झोप येण्यासही मदत होते. म्हणूनच दररोज ३० मिनिटे व्यायाम करा. दीर्घ श्वास, पायी चालणे, सायकलिंग, नृत्य, धावणे, एरोबिक्स असे व्यायाम करा.

वजन कमी करण्यासाठी काय खावं?

* गृहशोभा

सातत्याने वाढणारे वजन शरीराला कित्येक वेगवेगळ्या आजाराने त्रस्त करू शकते. जर तुम्ही कायम हेल्दी आणि फिट राहू इच्छिता, तर आपल्या डाएटमध्ये या गोष्टी सामील करायला विसरू नका :

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या अथवा पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. याव्यतिरीक्त अशा भाज्यांत भरपूर व्हिटॅमिन, आयरन आणि प्रोटीनसुद्धा असतं. या सर्व घटकांची वजन कमी करण्यास खुप मदत होते. हे घटक शरीरातील विषारी पदार्थांचा नाश करून शरीरात असलेले फोलेट, पोटेशियम आणि फायबर बूस्ट करतात.

गाईच्या दुधाचं पनीर

गाईच्या दुधापासून बनवण्यात आलेल्या पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते, तसेच फॅट आणि कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असतात. यात असलेला कॅल्शिअम फॅट बर्नच्या प्रक्रियेत मदत करतो. तुम्ही दुपारच्या जेवणात सलाड आणि पाण्याचा समावेश करून तुमचा कॅलोरी इंटेक मोठ्या प्रमाणात कमी करू शकता.

टोमॅटो

टोमॅटो वजन कमी करण्यास खूप मदत करतात. टोमॅटोमध्ये लायकोपीन अँटीऑक्सिडंट नावाचा घटक असतो, जो वजन कमी करण्याच्या कामी येतो. हा घटक ना केवळ फक्त वजन कमी करण्यास मदत करतो, तर इतर कित्येक रोगांशी लढण्यास उपयुक्तदेखील ठरतो. सरतशेवटी, आपल्या आहारात टोमॅटो नक्की सामील करा.

अंडी

अंड्यात शरीरासाठी आवश्यक असणारे सगळे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असतात. अंड्यांमध्ये स्वास्थवर्धक फॅटसुद्धा असतात. यामुळेच जरी आपण अंडी कमी प्रमाणात खाल्ली, तरीसुद्धा पोट भरलेलं वाटतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही उकडलेल्या अंड्याच्या सफेद भागाचा तुमच्या नाश्त्यात समावेश करू शकता.

हंगामी फळे फ्रूट्स

बदलत्या हंगामानुसार उपलब्ध असलेल्या फळांचं सेवन करा. सिझनल फ्रूट्समध्ये नैसर्गिक शुगर असते, जी भूक नियंत्रित करण्यास मदत करते, तसेच या फळांमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाणसुद्धा सर्वाधिक असते. आंबा, डाळिंब, स्टॉबेरी, संत्री, पपई, पेरू इत्यादी फळे खाल्याने त्वचेला कोलोजन नावाचा प्रोटीनयुक्त घटक मिळतो व त्वचा तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यांमध्ये उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे एक्सट्रा फॅट बर्न होते. फळांचं सेवन वजन कमी करण्यात खूप लाभदायी ठरतं.

दलिया

भरपूर प्रमाणात फायबर असल्याकारणाने फॅट कमी करणारं सर्वात शक्तीशाली तत्व म्हणून दलियाला संबोधलं जातं. यामध्ये विरघळणारे फायबर असतात, जे पचनयंत्राच्या माध्यमाद्वारे धीम्या गतीने बाहेर पडतात, ज्यामूळे खूप वेळ भूक लागत नाही. दलिया रक्तातील शुगर लेवलला स्थिर ठेवते. दलिया जलद गतीने वजन घटवण्याच्या प्रक्रियेत फायदेशीर ठरते. दलिया शरीरातील एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास तसेच धमण्यांना स्वच्छ आणि साफ ठेवण्यासदेखील मदत करते.

डाळी

डाळींमध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटिन्स असतात. डाळींचे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात. डाळींमध्ये कोणत्याही प्रकारचं फॅट नसतं. डाळीचे सेवन केल्याने शरीरात असलेले अतिरिक्त फॅटसुद्धा कमी होते. डाळींमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या पेशींनासुद्धा पूर्ववत करण्याची क्षमता असते. म्हणून दिवसातून एकदा तरी डाळीचं सेवन जरूर करा. डाळी फक्त वजन कमी करण्यास उपयोगी नसतात, तर संपूर्ण शरीराच्या हेल्थच्या दृष्टीनेसुद्धा लाभदायी असतात.

सफरचंद

सफरचंदात कॅलोरी, फॅट आणि सोडियमचे प्रमाण कमी आणि व्हिटॅमिन, खनिज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. सफरचंदात असलेले हे सगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करतात. कमी कॅलोरीचा अर्थ असा आहे कि, तुम्ही अधिक ऊर्जा न खपवता खूप प्रमाणात सफरचंद खाऊ शकता. कच्या कापलेल्या एक बाउल सफरचंदात ६५ कॅलोरीज असतात. फॅट अजिबात नसतं. एका मध्यम आकाराच्या सफरचंदात ११० कॅलोरीज असतात.

आळशी

आळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबरसारखे घटक असतात. हे घटक वजन नियंत्रित करायला मदत करतात. आळशीचे सेवन जेवणाच्या आधी अथवा जेवणासोबत केले, तर पोट भरल्यासारखे वाटते आणि भूकदेखील कमी लागते. आळशीमधील तंतूमय घटक पचन सुलभ करतात. त्यामुळे वजन नियंत्रण करण्यात आळशी गुणकारी आहे. आळशीच्या सेवनाने लिवर निरोगी राहण्यास सुद्धा मदत होते.

सोया

सोया खूप चविष्ट आणि लिन प्रोटीनने परिपूर्ण स्रोत आहे. त्यामुळे काही लोकांच्या जेवणात याचे अमूल्य स्थान असते. सोया मिल्कमध्ये १ वाटी दलिया आणि पूर्ण तृणधान्यांऐवढे गुण असतात, जे खाल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट हृदय आणि त्वचेसाठी सगळ्यात चांगला स्रोत आहे. हे पचनयंत्राच्या गतीला धीमी करतं. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल, तर डार्क चॉकलेट खाल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. जर तुम्हाला खूप वेळ कामानिमित्त बाहेर राहावं लागणार असेल आणि तिथे जेवणाची कोणतीही सोय नसेल, तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता

निष्काळजीपणा पडेल भारी

* प्रतिभा अग्निहोत्री

अनुराधाच्या सासूबाईंना अचानक हार्ट अटॅक आला. पती आनंदने त्वरित सोर्बीटेट गोळी आणायला सांगितल्यावर, अनुराधाने प्रत्येक ड्रॉवर खोलून बघितला परंतु टॅबलेट कुठेच मिळत नव्हती. प्रत्येकवेळी ती जेव्हा लागेल तेव्हा बघू, हा विचार करायची, परंतु आता जेव्हा गरज पडली तर… शेवटी त्वरित ती शेजाऱ्यांकडून टॅबलेट घेऊन आली आणि सासूबाईंना दिली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की वेळेवरती सोर्बीटेट दिल्यामुळे त्यांचा जीव वाचला नाही तर… तेव्हा अनुराधाला तिच्या निष्काळजीपणाचा खूप राग आला.

विपाशाचे सासू-सासरे दोघेही बराच काळापासून आजारी होते. त्यांना औषधं देण्याचं काम विपाशाच करत असे. एके दिवशी तिने तिच्या सासऱ्यांचं बीपीचं औषध तिच्या सासूबाईंना दिलं. गोळी खाताच सासूबाई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्या, जेव्हा तिने बघितलं की सासऱ्यांच बीपीचे औषध तिने सासूबाईंना दिलंय, ज्या लो बीपीच्या पेशंट आहेत आणि हाय बीपीची गोळी खाल्ल्यामुळे त्यांचं बीपी अजूनच खाली गेलं, ज्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हा ती त्यांना घाईघाईत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तेव्हा मोठ्या मुश्किलीने त्यांचा जीव वाचला.

छोट्या छोट्या चुका

रचिताला तिच्या भावाच्या लग्नाला जाण्यासाठी बँक लॉकरमधून दागिने काढायचे होते परंतु दोन दिवसापासून लॉकरची चावी मिळत नव्हती. जेव्हा खूपच शोधाशोध केल्यावरती चावी मिळाली नाही तेव्हा तिने तिचे पती अमनला सांगितलं.

तेव्हा अमन म्हणाले, ‘‘गेल्यावेळी जेव्हा तू लॉकरसाठी गेली होतीस तेव्हा तुझी चावी हरवली होती आणि तू बँकेला त्याची सूचना देखील दिली होतीस. मग दुसरी चावी आणलीस की नाही.’’

आता बँकेत जायलादेखील वेळ नव्हता. शेवटी तिला लग्नात खरे दागिने असूनसुद्धा खोटे दागिने घालावे लागले.

आपल्या सर्वांनाच माहिती असतं की घरामध्ये फर्स्ट एड बॉक्स असणं किती गरजेचं आहे. गरीमानेदेखील बाजारातून सुंदरसा प्लास्टीक बॉक्स आणून फर्स्ट एड बॉक्स बनवला परंतु जेव्हा एके दिवशी तिच्या मुलाला लूज मोशन झाले तेव्हा त्याला तिने जी गोळी खायला दिली, ती गोळी खाल्लयामुळे तिच्या मुलाच्या शरीरावरती पूर्ण एलर्जी झाली. डॉक्टरांच्या मते एक्सपायरी डेटचं औषध दिल्यामुळे मुलाच्या शरीरावर अँटी रिएक्शन झाली होती.

निष्काळजीपणाचा परिणाम

रजत जवळ एक अननोन नंबरने फोन आला की त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे कारण त्याच्या स्कूटरचा एक्सीडेंट झालाय. त्याने अनेकदा सांगितलं की त्यांनी त्याची स्कूटर दोन वर्षांपूर्वीच ओलेक्समधून एका व्यक्तीला विकली होती परंतु पोलिसांनी काही त्याचा ऐकलं नाही कारण आतापर्यंत स्कूटर आरटीओ ऑफिसमध्ये त्याच्याच नावावरती होती.

आशिमा वर्षभराचा किराणा एकत्र एकदाच विकत घेत असे आणि त्यामध्ये पाऱ्याच्या गोळ्या टाकत असे ज्यामुळे ते अनेक दिवस खराब होत नसे. अनेकदा डाळ बनवण्यापूर्वी ती त्या गोळ्या काढून परत डब्यामध्ये टाकायची. परंतु एके दिवशी घाईघाईत तिने त्या डाळीसोबतच गोळीदेखील उकळली. डाळ खाल्लयानंतर सर्व कुटुंबीयांना फूड पॉइजनिंग झालं आणि सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

या घटना नक्कीच निष्काळजीपणाची उदाहरणं आहेत. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कोणाच्याही जीवावर बेतू शकतं तसंच नको असलेली मानसिक अशांती आणि तणाव देणारीदेखील असते. अशा प्रकारचा कोणताही निष्काळजीपणा तुमच्याकडून होता कामा नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

फर्स्ट एड बॉक्स खूपच गरजेचा

प्रत्येक घरामध्ये फर्स्ट एड बॉक्स असणं गरजेचं आहे, तेवढंच त्याला अपडेट ठेवणं. दर महिन्याला ते चेक करून एक्सपायरी डेटची औषधं काढून नविन औषधं रिप्लेस करा. बीपी, शुगरसारखी नियमित वापराची औषधं यामध्ये ठेवू नका.

सोर्बीटेट, डिस्प्रिनसारख्या कधीतरी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या घरातील सर्व लोकांना दाखवून ठेवा आणि पॅकेट वरती त्याची एक्सपायरी डेट आणि नाव देखील लिहा, म्हणजेच अडचणीच्यावेळी घरातील कोणत्याही सदस्याला सहजपणे औषध मिळेल. फर्स्ट एड बॉक्स नेहमी मोठा बनवा आणि त्यामध्ये दोन-तीन पार्टिशन करा, म्हणजे औषधांच्या ट्युब्स, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, टॅबलेट आणि बँडेजसारखा गोष्टी वेगवेगळ्या ठेवता येतील.

जुनी वाहनं विका परंतु काळजीपूर्वक

कार, स्कूटर वा स्कूटीसारखं कोणतंही वाहन तुम्ही ऑनलाईन वा ऑफलाईन कसेही विका परंतु समोरच्याला देण्यापूर्वी आरटीओ ऑफिसमध्ये वाहनाच्या खरेदी दाराच्या नावावर ट्रान्सफर करून टाका, म्हणजे भविष्यात कोणतीही दुर्घटना झाल्यास तुम्ही जबाबदार नसाल, कारण एखादी दुर्घटना झाल्यास ज्याच्या नावावर वाहन असतं त्याला शोधलं जातं. शक्य असल्यास ट्रान्सफर केलेल्या कागदांचा एक फोटो काढून तुमच्याजवळ देखील ठेवा.

बँक लॉकरचं चेकअप

अनेकदा आपण एकदाच बँकमध्ये दागिने ठेवून देतो आणि नंतर अनेक महिने ते खोलत देखील नाही, खरं तर सहा महिन्यातून एकदा तुमचा लॉकर खोलून पहा. यामुळे तुम्ही तुमची चावी, लॉकर नंबरने अपडेट रहाल आणि सोबतच लॉकरमधील दागिनेदेखील चेक करू शकाल, कारण बँक तुमच्या दागिन्यांची कोणतीही गॅरंटी घेत नाही. लॉकरची चावी नेहमी एका गुच्छमध्ये टाकून योग्य जागी ठेवण्या बरोबरच पती, सासू वा मोठ्या मुलांना देखील सांगून ठेवू शकता म्हणजे लक्षात नसल्यास तुम्ही त्यांची मदत घेऊ शकाल.

डॉक्युमेंटेशन खूपच गरजेचं

घरामध्ये प्रॉपर्टी, इन्शुरन्स, मेडिकल फाईल्स, म्युच्युअल फंड्स, मुलांच्या मार्कशीटसारखे अनेक कागद असतात, जे आपल्यासाठी खूपच गरजेचे असतात. त्यांची प्रत्येक विषयाची व्यवस्थित फाईल बनवून त्यावर स्केच पेनने विषयाचं नाव लिहून ठेवा म्हणजे गरज पडल्यास तुमचा वेळ वाया जाणार नाही. सर्व फाईल्स ठेवण्याची एक जागा देखील निश्चित करा.

बिल्स मॅनेज करा वेळोवेळी आपण घरामध्ये फ्रिज, एसी, टॅबलेट आणि लॅपटॉपसारख्या अनेक वस्तू विकत घेतो. यावर अनेक वर्षाची वॉरंटी वा गॅरंटी असते. जर तुम्ही ते व्यवस्थित ठेवले नाही तर ते खराब झाल्यावरती तुम्हाला फ्री सर्विसची सवलत असूनसुद्धा ती मिळत नाही आणि तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागतो.

मोबाईल जेव्हा बनेल फोबिया

* शोभा कटारे

मीरी की जग बरं, अशी म्हण अलीकडे जरा अशा प्रकारे बदलली आहे, ‘मी बरी आणि माझा मोबाईल बरा.’ अलीकडची तरुणाई आणि लहान व मोठी मुलं सतत मोबाईलच्या स्क्रीनवरती चिकटलेले दिसतात. त्यांना काही फिकीरच नसते. चालताफिरता, खातापिता, झोपता उठता सतत ते मोबाईलच्या जगात बुडालेले राहतात. आपल्या आजूबाजूचा जगापासून वेगळे राहतात. ते कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन बाहेरच्या जगाशी ठेवत नाहीत, त्यामुळे ते वर्चुअल ऑटिझमच्या अधीन होत आहेत.

वर्चुअल ऑटिझमने पिडित मुलं दुसऱ्यांशी बोलताना संकोचतात, आय कॉन्टॅक्ट करत नाहीत, त्यांच्यामध्ये बोलण्याच्या क्षमतेचा विकास उशिराने होतो, त्यांना लोकांसोबत एकत्र मिसळण्यास त्रास होतो आणि त्यांचा आयक्यूदेखील कमी होतो.

कमी होतं सोशल कम्युनिकेशन

अलीकडच्या मुलांना लहानपणापासून मोबाईल फोन हातात दिला जातो. कधी अभ्यासासाठी तर कधी काही दुसरं शिकण्यासाठी, जसं की कविता ऐकवण्यासाठी, सोबतच रडणाऱ्या छोट्या मुलांना गप्प बसवण्यासाठी ते कार्टून, सिनेमा, गेम्स इत्यादी त्यांना मोबाईलवरच दाखवतात. ज्यामुळे त्यांना हळूहळू याचं व्यसन लागतं. ज्यामुळे ते बोलणं नंतर शिकतात आणि मोबाईल चालवणं अगोदर शिकतात.

याचा नकारात्मक प्रभाव असा होतो की त्यांच्यामध्ये स्पीच डेव्हलपमेंट होत नाही. ते गॅजेट्समध्येच बिझि राहू लागतात. त्यांच्या वागण्यामध्ये त्रास तेव्हा होऊ लागतो, ज्यामुळे त्यांचा मानसिक विकास, त्यांचे सोशल कम्युनिकेशन आणि बिहेवियर स्किल्सवर परिणाम होतो.

वाढत्या दुर्घटना

मोबाईल फोन आता अपघातांचं सर्वात मोठं कारण बनत चाललंय. वाहन चालवतेवेळी मोबाईलवर बोलणं, आजच्या खासकरून तरुणांसाठी काही नवीन गोष्ट नाहीये. अनेकदा रस्त्यावरती लोकं कार वा बाईक चालवतेळी मोबाईलवर बोलताना दिसतात.

तरुण तर बाईक चालवतेवेळी इयरफोन लावून गप्पा मारतात वा मग गाणी ऐकतात, ज्यामुळे त्यांचं लक्ष दुसरीकडे असतं आणि अपघात होतो. वाहन चालवताना ब्रेक मारणं, स्पीड वाढवणं वा तोडणं सर्व काही नर्वस सिस्टमवर काम केल्यावरती होतं.

अशावेळी वाहन चालवतेवेळी स्पीड ब्रेकर आल्यावर ब्रेक लावणं, समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्यासाठी वळणं वा मग स्पीड वाढवण्याची गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि दुर्घटना घडतात.

वाढता लठ्ठपणा

सध्याच्या काळात मोबाईल लोकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अनेक लोकं तर अशीदेखील असतात जी मोबाईलला स्वत:पासून एक मिनिटासाठी देखील दूर ठेवू शकत नाहीत. जेवतेवेळी देखील मोबाईल मध्येच पाहत राहतात, ज्यामुळे अनेक नुकसान होतं जसं की लठ्ठपणा वाढणं, पोटाच्या समस्या, ओवर इटिंग.

जेव्हा आपण मोबाईल पाहत जेवतो तेव्हा आपलं खाण्यावरती लक्ष कमी असतं. अनेकदा आपण अन्न व्यवस्थित चावत नाही. यामुळे पोटात अपचन, पोट दुखी आणि पोटासंबंधी आजार होऊ शकतात. यामुळे अन्न पचवण्यामध्ये सहाय्यक असलेल्या ग्रंथी पूर्णपणे सक्रिय होत नाहीत, सोबतच जेव्हा आपण मोबाईल पाहत जेवतो तेव्हा गरजेपेक्षा अधिक खातो.

नात्यांमध्ये वाढता दुरावा

पूर्वी जेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा लोकांच्या आपापसात भेटीसाठी होत असत, गप्पा मारत असतं, लोकं एकमेकांच्या अडचणी आणि भावनांना समजत असत, सोबत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असत. परंतु जेव्हापासून मोबाईल आला आहे मुलं असो वा मोठे अनेकदा मोबाईलच्या जगामध्येच व्यस्त असतात, ज्यामुळे आपापसातील संवाद कमी होत चालला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून गप्पा जरी बऱ्याच होत असल्या, तरी मनातील दुरावा वाढत चालला आहे, लोकांमध्ये व्यवस्थित संवाद होत नाहीये. व्यक्तिगत समस्यांच जाळं वाढतच चाललं आहे आणि नाती मागे पडत चालली आहेत. अशावेळी नाती बनण्यापेक्षा ती तुटत जास्त चालली आहेत.

आपल्या सर्वांना सतत मोबाईलवर रहायला आवडतं. झोपण्यापूर्वी व्हॉट्सअपवर मेसेज चेक करतो आणि उठताच सर्वप्रथम मेसेज वाचतो. अलीकडे लोकं वर्चुअल जगामध्ये जास्त जगू लागली आहेत ज्यामुळे कुटुंबात अलीकडे समोरासमोर बसून गोष्टी करणे देखील कमी झालं आहे. ज्याचा नात्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे आणि अनेकदा ही नाती तुटण्याचं कारण बनत आहे.

स्क्रीनचा आरोग्यावर परिणाम

सोशल मीडियावर येणारी मीम्स वा मेसेज तुमच्या चेहऱ्यावर काही वेळासाठी हसू आणू शकतात, परंतु याचा तुमच्या आरोग्यावरतीदेखील वाईट प्रभाव पडू शकतो म्हणून स्क्रीनसोबत निरोगी रहा.

अलीकडच्या काळात स्मार्टफोनशिवाय आयुष्याची कल्पनादेखील करणं लोकांना कठीण होऊन बसलंय. सकाळच्या सुरुवातीनंतर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकवेळी फोन तुमच्यासोबत असतो. अशावेळी तुम्ही विचार केला आहे का की तुमचा फोन तुमच्यासोबत नसेल तर काय होईल? आजची तरुणाई फोन हरवल्यावर वा फोन नसल्यास काय होईल याच्या सतत भीतीत असतात. याला नोमोफोबियाचं नाव देण्यात आलंय.

अनेक गंभीर आजारदेखील होऊ शकतात

मोबाईल तुम्हाला डायबिटीस, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित अनेक आजार देऊ शकतो, कारण लाइटिंग स्क्रीनवाल्या गॅजेट्सचा उशिरापर्यंत वापर केल्यामुळे तुमच्या डोळ्यांवरती याचा परिणाम होतो आणि तुमच्या झोपेवरतीदेखील परिणाम होतो. यामुळे तुम्हाला हार्टशी संबंधित आजारासोबतच लठ्ठपणाची समस्यादेखील होऊ शकते आणि डोळ्यांना ग्लुकोमा वा लो नाइटविजनची समस्या देखील होऊ शकते. रिसर्च नुसार डोळ्यांसाठी स्मार्टफोनची ब्ल्यू लाईट हानिकारक असते.

थंब वा अंगठ्यामध्ये वेदना (आर्थराइटिस)

फोनवर स्क्रीन चालवण्यासाठी थंब वा अंगठ्याचा सर्वात जास्त वापर करतात, ज्यामुळे यामध्ये वेदना होण्याची समस्या निर्माण होते. ज्यामुळे थंब (अल्ट्राटिसचा) धोका देखील होऊ शकतो.

यामुळे तुमच्या अंगठ्याची शक्ती क्षीण होऊ शकते. थंब (आर्थाइटिस) झाल्यावर तुम्हाला वस्तू पकडण्यामध्ये आणि अंगठ्याच्या मुव्हमेंटमध्ये त्रास होऊ शकतो.

जर तुम्हाला स्क्रीनसोबतच निरोगी देखील रहायचं असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल ‘‘मोबाईलपासून दुरावाच बरा… तरच मी भला आणि जग भलं.’’

स्तनपानानंतर जेव्हा नवजात बाळाला उलटी होते

* सोमा घोष

नीता आणि सर्वेश या दोघांनाही पहिलं मूल झाल्यावर खूप आनंद झाला, पण रुग्णालयातून आल्यानंतर १० दिवसांनी सुनीताच्या लक्षात आलं की तिच्या बाळाला स्तनपानानंतर उलटी होऊ लागली होती. अनेकवेळा ही उलटी उशिरानेही होत असे. सुनीता घाबरली आणि डॉक्टरांकडे गेली. ही एक सामान्य प्रक्रिया असून याबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवसांनी बाळ बरं होईल. हे अगदी बरोबर होते. आज सुनीताचे बाळ २ महिन्यांचे झाले असून त्याला उलटीची तक्रार नाही.

खरं तर, आज बहुतेक तरुण नोकरदार जोडपे शहरांमध्ये एकटे राहातात आणि त्यांच्या मुलाचा जन्मही तेथेच होतो, जिथे ते काम करतात, त्यामुळे दोन्ही पालक नवजात बाळाची काळजी घेऊ शकतात.

नैसर्गिक प्रक्रिया

नवी मुंबईतील वरिष्ठ सल्लागार आणि बालरोगतज्ञ, डॉ. विजय येवले सांगतात की, बाळाला उलट्या होणे हे ‘रेगर्जिटेशनमुळे’ होते. हे स्वाभाविक आहे, कारण नवजात बाळ स्तनपान करताना हवा फार लवकर गिळते. तसेच, कधीकधी ते जास्त प्रमाणात दूध पिते, ज्यामुळे त्याला उलटी होते. जर बाळाचे वजन योग्यरित्या वाढत असेल, ते आजारी पडत नसेल, त्याला नीट झोप येत असेल, त्याला दिवसातून ५-६ वेळा लघवीला होत असेल, ते सक्रिय असेल तर यासाठी कोणत्याही औषधाची गरज नाही. हे सामान्य आहे.

याशिवाय गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स म्हणजेच अन्ननलिकेचे पुढे जाऊन पोट तयार होते. अन्ननलिका आणि पोट यांच्यामध्ये झडप असते. पोटातील आम्लयुक्त रस किंवा अन्न अन्ननलिकेत परत येते. यामुळे बाळ दूध वरच्या दिशेने फेकून देते. हे देखील कालांतराने कमी होते.

नवजात बाळाला दूध पाजताना या गोष्टी लक्षात ठेवा

* जेव्हा तुम्ही बाळाला स्तनपान कराल तेव्हा सोबत स्वच्छ कपडा ठेवा, जेणेकरून बाळाला उलटी होताच त्याला व्यवस्थित स्वच्छ करता येईल.

* दूध पाजल्यानंतर बाळाला जास्त हलवत बसू नका.

* दूध पाजताना घाई करू नका, त्याला हळूहळू दूध पाजा.

* दूध पाजल्यानंतर बाळाचा ढेकर काढायला विसरू नका.

उन्हाळ्यात करू नका अंतर्गत स्वच्छतेकडे दुर्लक्ष

* चंद्रकला

बदलत्या हवामानामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात घाम येणे, पुरळ येणे इत्यादी समस्या वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित असतात. म्हणूनच, या काळात तुम्ही तुमच्या अंतर्गत स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. विशेषत: महिलाना, वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आजार होतात.

स्वयंपाकघरापासून ते कामावरील कामादरम्यान महिला दिवसभरात अनेक कामं पूर्ण करतात. अशा परिस्थितीत त्यांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देता येत नाही.

इंटिमेट हायजीन म्हणजेच अंतर्गत स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने, महिलांना अनेक प्रकारचे संक्रमण जसे की यूटीआय (लघवी करताना जळजळ) आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात तर घामामुळे या समस्या आणखी वाढतात.

अंतर्गत स्वच्छता का आहे महत्त्वाची?

मासिक पाळीप्रमाणे आजही लोक वैयक्तिक स्वच्छतेबद्दल उघडपणे बोलणे टाळतात. अंतर्गत स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्याने, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) आणि कोरडेपणा यासारख्या समस्या उद्भवतात, बॅक्टेरियांचे म्हणजेच जिवाणूंचे संक्रमणदेखील वाढू शकते, ज्यामुळे पुरळ आणि खाज येते. बऱ्याच प्रकरणांमध्ये न्यूमोनिया किंवा रक्ताचे आजारदेखील होऊ शकतात.

अनेकदा लोक स्वच्छतेची काळजी घेत नाहीत, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक तणावाचे बळी ठरतात. ते नैराश्याचेही बळी ठरतात.

उन्हाळ्यात घ्या स्वच्छतेची काळजी

उन्हाळ्यात या समस्या अधिक वाढत असल्याने काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही या समस्या टाळू शकता.

काम करताना आणि प्रवास करताना आपल्याला अनेकदा घाम येतो. उन्हाळ्यात काही अंतर प्रवास केल्यावरही घाम येतो. घाम सुकल्यानंतर, जीवाणू आपल्या शरीरावर राहतात, जे आपल्याला त्वरित स्वच्छ करणे आवश्यक असते. आपण त्यांना कोरड्या कापडाने अंतर्गत जागेपासून स्वच्छ करू शकता.

पुरुष असो किंवा महिला, घामामुळे होणारी अँलर्जी टाळण्यासाठी, तुम्ही अंतर्गत शरीर स्वच्छ ठेवा. दररोज अंघोळ करताना ते स्वच्छ धुतले जाईल, याची काळजी घ्या. उन्हाळ्यात अंतर्गत भाग स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी, तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या इंटिमेट वॉश उत्पादनांचा वापर करू शकता, जे त्या भागाचे पीएच संतुलन राखून संसर्गाची शक्यता कमी करतात.

ओले अंतर्वस्त्र कधीच घालू नका, कारण यामुळे पुरळ आणि संसर्ग होऊ शकतो. घट्ट अंतर्वस्त्र किंवा घट्ट जीन्सदेखील टाळा. घट्ट कपड्यांमुळे घाम बाहेर येण्यास प्रतिबंध होतो आणि जीवाणू वाढू लागतात.

मासिक पाळी दरम्यान घ्या विशेष काळजी

इतर दिवसांपेक्षा मासिक पाळी दरम्यान, अंतर्गत स्वच्छतेकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे असते. मासिक पाळी दरम्यान खासगी भाग पूर्णपणे स्वच्छ ठेवा. मासिक पाळी दरम्यान आरामदायक अंतर्वस्त्र घाला. शक्य असल्यास घाम सहज शोषून घेणारे सुती अंतर्वस्त्र वापरा.

सुती कापडापासून बनवलेले चांगले सॅनिटरी नॅपकिन्स वापरा. दर ४ ते ६ तासांनी ते बदला. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो. या काळात वाढणारे जीवाणू शरीरात प्रवेश करतात आणि यूटीआय, योनीमार्गात संसर्ग, त्वचेची जळजळ इत्यादी समस्या निर्माण करतात. त्यामुळे आपल्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. स्वत:ला स्वच्छ ठेवल्याने आपले शरीर अनेक आजारांपासून वाचू शकते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमोपचार किट : जर तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करत असाल, तर सहल संस्मरणीय बनवा, त्रासदायक नाही

* शिखा जैन

वृद्धांसाठी प्रथमोपचार किट : तुमच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करताना, आपल्याला प्रवास संस्मरणीय बनवण्याबद्दल खूप विचार करावा लागतो, तणावपूर्ण नाही. हे देखील निर्विवाद आहे की एक छोटीशी चूक देखील तुम्हाला अनोळखी ठिकाणी अडचणीत आणू शकते. म्हणूनच, तुमच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करताना अतिरिक्त काळजी घेण्यात आणि तयार राहण्यात काहीही नुकसान नाही.

तुमच्या प्रथमोपचार किटसोबत या वस्तू तुमच्यासोबत ठेवा

तज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही लांबचा प्रवास करता तेव्हा वैद्यकीय आपत्कालीन किट पॅक करायला विसरू नका. हे किट कठीण काळात तुमचे प्राण वाचवू शकते.

प्रत्येकाकडे प्रथमोपचार किट असावी. त्यात असलेल्या औषधांबद्दल, तज्ञ अँटासिड्स, पॅरासिटामॉल, हँड सॅनिटायझर आणि अँटीसेप्टिक्स समाविष्ट करण्याची शिफारस करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून प्रथमोपचार किटमध्ये बर्न क्रीम, गॉझ पॅड, बँडेज आणि जंतूविरोधी क्रीम समाविष्ट करा.

प्रिस्क्रिप्शन औषधे

तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांपेक्षा कमीत कमी ५-७ दिवसांची औषधे ठेवा. तुम्हाला कधी जास्त औषधे लागतील हे तुम्हाला कधीच कळत नाही.

औषध ​​प्रिस्क्रिप्शन

मूळ प्रिस्क्रिप्शन आणि तुमच्या प्रिस्क्रिप्शनची छायाप्रत ठेवा. कधीकधी, औषधे खराब होऊ शकतात, हरवू शकतात किंवा दीर्घकाळ राहण्याची आवश्यकता असू शकते. जर तुम्हाला जास्त गरज असेल तर कोणत्याही समस्या टाळण्यासाठी प्रिस्क्रिप्शन जवळ ठेवा.

गोळ्यांचा बॉक्स

प्रवास करण्यापूर्वी एक बॉक्स खरेदी करा आणि तुमची सकाळ, दुपार आणि संध्याकाळची औषधे लेबलसह व्यवस्थित करा. तुमच्या वडिलांना हे समजावून सांगा जेणेकरून तुम्ही बाहेर असताना हॉटेलमध्ये आराम करू इच्छित असल्यास त्यांना कोणतीही समस्या येणार नाही.

बँडेज आणि बँडेज

किरकोळ दुखापती तुम्हाला कमीत कमी अपेक्षा असताना होतात, जसे की नवीन शूजमधून फोड येणे किंवा हायकिंग करताना लहान जखम होणे. येथेच बँडेज उपयुक्त ठरतात, कारण ते वेदना कमी करतात. म्हणून, हे देखील पॅक करायला विसरू नका. किरकोळ जखमांसाठी किंवा जखमांसाठी देखील त्यांचा वापर केला जाऊ शकतो.

गॉझ रोल/कापूस

काही कट आणि ओरखडे बँडेडने बरे करता येत नाहीत. त्यांना अधिक काळजी घ्यावी लागते. गॉझ रोल/कापूस विशेषतः जखमा झाकण्यासाठी किंवा वस्तू स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहेत.

अ‍ॅलर्जीविरोधी औषधे

त्वचेची खाज आणि पुरळ दूर करण्यासाठी, अँटी-अ‍ॅलर्जी औषधे, अँटी-फंगल क्रीम, कोरफड वेरा जेल आणि बर्न क्रीम ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. कट आणि ओरखडे दूर करण्यासाठी, सोप्रामायसिन सारखे अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक मलम ठेवा.

अ‍ॅलिटी अॅसिड्स

प्रवासादरम्यान, आपण सर्वजण नवीन पदार्थ वापरून पाहतो, ज्यामुळे आम्लता, छातीत जळजळ किंवा पोटफुगीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अँटासिड्स, एक प्रकारची औषधे, लक्षणीय आराम देतात. म्हणून, त्यांना तुमच्या प्रथमोपचार किटमध्ये समाविष्ट करायला विसरू नका.

वेदनाशामक

सर्वात महत्वाचे औषध म्हणजे वेदनाशामक. डोकेदुखी, पोटदुखी, सांधेदुखी किंवा जळजळ यासाठी असो, तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही तुमच्या आपत्कालीन किटमध्ये ठेवू शकता.

पोटाच्या समस्यांसाठी औषधे

पेप्टोबिस्मॉलचा वापर पोटदुखी, अतिसार, मळमळ, अपचन आणि अपचनासाठी केला जातो. तसेच एनो, मिंट आणि डायजेन घ्या. पॅरासिटामॉल, एव्होमाइन आणि कोरेक्स सारखी सामान्य औषधे देखील गरजेनुसार खूप उपयुक्त आहेत.

खाज सुटण्यापासून रोखणारे लोशन: कीटकांच्या चाव्याव्दारे किंवा पुरळ उठण्यासाठी कॅलामाइन लोशन.

व्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली: कोरड्या त्वचेमुळे किंवा भेगा पडलेल्या टाचांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी.

कात्री, सेफ्टी पिन आणि सुया. आवश्यक किंवा शक्य असल्यास, रक्तदाब मॉनिटर किंवा मशीन किंवा रक्तातील साखरेचे मीटर.

मोच आल्यास काय करावे

जर तुम्ही एखाद्या वृद्ध व्यक्तीसोबत प्रवास करत असाल आणि अचानक त्यांचा पाय मुरगळला आणि मोचला तर तुम्हाला काय करावे हे माहित असले पाहिजे. सर्वोत्तम उपचार म्हणजे ताबडतोब बर्फ शोधणे आणि तो मोचलेल्या भागात १५ मिनिटे अधूनमधून लावणे. यामुळे लक्षणीय आराम मिळेल. नंतर, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गुहेत प्रवेश केल्यानंतर गुदमरणे

बऱ्याच वेळा, जेव्हा आपण हायकिंगला जातो तेव्हा आपण गुहा आणि गुहांना भेट देतो. जर वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यांना खाली वाकण्यास सांगा. नंतर, एक हात त्यांच्या पोटावर आणि दुसऱ्या हाताच्या तळव्यावर ठेवा आणि पाठीच्या आणि खांद्याच्या खाली ४-५ वेळा घट्ट दाबा. एक मुठी नाभीच्या वर ठेवा आणि दुसरी मुठी ५ वेळा बरगड्यांकडे दाबा. यामुळे गुदमरल्यासारखे आराम मिळेल. यानंतर, तुम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकता.

डोळ्याला कोणतीही दुखापत

जर रसायनांच्या संपर्कात आले असेल तर डोळे चोळू नका. ताबडतोब पाण्याने धुवा आणि वैद्यकीय मदत घ्या. डोळे बांधू नका. जर डोळा फुंकला असेल तर कोल्ड कॉम्प्रेस लावा, परंतु डोळ्यावर दबाव आणू नका. जर काही जखम, रक्तस्त्राव किंवा दृष्टीमध्ये बदल असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

हाडांच्या आरोग्यासाठी टिप्स: ऑस्टिओपोरोसिसचा धोका

* आभा यादव

हाडांच्या आरोग्यासाठी टिप्स: हाडांची ताकद बहुतेकदा वृद्धत्वाशी संबंधित असते, परंतु अनेक महिलांसाठी ही समस्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर सुरू होते. फ्रॅक्चर किंवा सतत वेदना होण्यापूर्वीच, हाडांच्या रचनेत लहान बदल शांतपणे नुकसान करू लागतात. महिलांमध्ये हाडांची कमकुवतपणा ही एक गंभीर परंतु अनेकदा दुर्लक्षित केलेली समस्या आहे. हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती आणि व्हिटॅमिन डीची कमतरता यामुळे महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका झपाट्याने वाढतो. वेळेवर निदान आणि निरोगी जीवनशैली स्वीकारल्याने हा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो.

हाडांच्या समस्या आणि त्यांना कसे सामोरे जावे याबद्दल जाणून घेऊया:

ऑस्टिओपोरोसिस: हा हाडांशी संबंधित सर्वात सामान्य चयापचय रोगांपैकी एक आहे. हा आजार कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय हळूहळू वाढतो आणि हाडे लक्षणीयरीत्या कमकुवत झाल्यावर अनेकदा स्पष्ट होतो. जगभरातील २० कोटींहून अधिक लोकांना याचा परिणाम होतो, ज्यामध्ये महिलांची संख्या जास्त असते.

हार्मोनल बदल: कैलाश हॉस्पिटलमधील कन्सल्टंट ऑर्थोपेडिक्स आणि स्पोर्ट्स इजरी स्पेशालिस्ट डॉ. विनय कुमार अग्रवाल यांच्या मते, महिलांमध्ये हाडांची घनता कमी होण्याचे एक प्रमुख कारण हार्मोनल बदल आहेत. गर्भधारणेदरम्यान, रजोनिवृत्ती आणि रजोनिवृत्तीनंतर, शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी, जो मजबूत हाडे राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, कमी होऊ लागते.

रजोनिवृत्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात, महिलांमध्ये हाडांची झीज २०% पर्यंत असू शकते. म्हणूनच रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना ऑस्टियोपोरोसिसचा सर्वाधिक धोका असतो. आज, महिला त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग या असुरक्षित टप्प्यात घालवतात, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका आणखी वाढतो.

हे कधी धोकादायक आहे?

ऑस्टियोपोरोसिसला “मूक रोग” म्हटले जाते कारण त्याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. हा रोग जसजसा वाढत जातो तसतसे त्याच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट असू शकते:

सतत पाठ किंवा कंबर दुखणे.

उंची हळूहळू कमी होणे.

घसरगुंडीची स्थिती.

अगदी किरकोळ पडण्यामुळेही हाडांचे फ्रॅक्चर.

पाठीच्या कण्यातील फ्रॅक्चरमुळे फुफ्फुसांची क्षमता देखील कमी होऊ शकते, ज्यामुळे श्रम न करताही श्वास घेण्यास त्रास होतो. जगभरात दरवर्षी अंदाजे २० लाख ऑस्टियोपोरोसिस फ्रॅक्चर होतात. कंबर आणि पाठीच्या कण्यातील फ्रॅक्चर हे सर्वात गंभीर मानले जातात, ज्यामुळे हालचाल आणि जीवनमानावर गंभीर परिणाम होतो.

आवश्यक उपक्रम

वेगवान चालणे.

प्रतिकार प्रशिक्षण.

संतुलन व्यायाम.

या क्रियाकलापांमुळे हाडे मजबूत होतात आणि पडण्याचा धोका कमी होतो.

योग्य पोषण

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार.

हिरव्या पालेभाज्या.

काजू, शेंगा, संपूर्ण धान्य.

तयार केलेले अन्न आणि निरोगी चरबी.

योग्य पोषण असलेला आहार हाडांची घनता आणि खनिजांचे शोषण वाढविण्यास मदत करतो.

ऑस्टियोपोरोसिस शांतपणे दिसून येऊ शकतो, परंतु त्याचे परिणाम गंभीर असतात. योग्य माहिती, निरोगी जीवनशैली, वेळेवर तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याने महिलांमध्ये हाडांची कमकुवतपणा मोठ्या प्रमाणात रोखता येतो. मजबूत हाडे ही सक्रिय, स्वतंत्र आणि निरोगी जीवनाचा पाया आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें