*  प्रतिनिधी

मी २४ वर्षांचा आहे आणि माझी मैत्रीण २५ वर्षांची आहे. मागील काही दिवसांत मी कंडोम न लावता मैत्रिणीसोबत २-३ वेळा सेक्स केला होता. मैत्रिणीने इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी ७२ तासांच्या वैद्यकीय मर्यादेत घेतली असली तरी आता आम्हा दोघांचे टेन्शन वाढले आहे. मैत्रिणीला २० ते २७ दिवसांच्या दरम्यान मासिक पाळी येते, जी यावेळी आली नाही. ती गर्भवती आहे का?

कंडोमप्रमाणेच आपत्कालीन गोळया या गर्भधारणा रोखण्याचे साधन आहेत. परंतु त्या सहसा तेव्हाच घेतल्या जातात जेव्हा लैंगिक संबंध उत्स्फूर्त झाला असेल आणि त्या काळात गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केला गेला नसेल,

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी समागमानंतर ७२ तासांच्या आत घ्यावी लागते. ७२ तासांपूर्वी घेतल्यास गर्भधारणेची शक्यता बऱ्याच प्रमाणात टाळता येते.

तुमच्या मैत्रिणीने इमर्जन्सी गोळी घेतल्याने तिच्या रक्तातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले असण्याची शक्यता आहे. तिची मासिक पाळी उशिरा येण्याचीही शक्यता आहे.

तुम्ही तुमच्या मैत्रिणीला युरिन प्रेग्नेंसी टेस्ट करायला सांगितल्यास बरे होईल. हे घरीदेखील सहज करता येते.

सेक्समध्ये उतावळेपणा करणे किंवा घाई करणे योग्य नसते आणि कंडोमशिवाय सेक्स केल्याने नवीन समस्या उद्भवते. त्यामुळे भविष्यात जेव्हाही तुम्ही लैंगिक संबंध बनवाल तेव्हा कंडोम अवश्य वापरा जेणेकरून तुम्हा दोघांनाही कोणत्याही भीतीशिवाय सेक्सचा आनंद घेता येईल आणि नंतर कोणतेही टेन्शन येणार नाही.

मी २६ वर्षांची विवाहित आहे. लग्नाला ३ वर्षे झाली आहेत पण अजूनही मला गर्भधारणा होऊ शकलेली नाही. यासाठी मी आता सेक्स करताना उशी खाली ही ठेवते आणि पतीला वीर्यस्खलनानंतर बराच वेळ त्या अवस्थेत राहण्यास सांगते. माझी मासिक पाळी नियमित आहे आणि आम्ही नियमितपणे सेक्सदेखील करतो. तरीही मी गर्भधारणा करू शकत नाही. मला सांगा मी काय करू?

संभोगाच्या दरम्यान वीर्यपतनाच्या वेळी पुरुषाच्या अवयवातून शुक्राणू अतिशय वेगाने बाहेर पडतात आणि खोलवर पोहोचतात. जे शुक्राणू स्ट्राँग नसतात ते योनीतून बाहेर ही पडतात, पण त्यामुळे गर्भधारणेच्या प्रक्रियेत काही फरक पडत नाही. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि यामुळे घाबरण्याची ही गरज नाही.

जर तुमच्या पतीची शुक्राणूंची संख्या बरोबर असेल, तुमची मासिक पाळी ही नियमित होत असेल, तर तुमच्या गर्भधारणा न होण्यामागे दुसरे काही वैद्यकीय कारण असू शकते. हे कारण तुमच्यामध्ये किंवा तुमच्या पतीमध्ये दोघांपैकी कोणामध्ये ही असू शकते.

स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घेऊन प्रजननक्षमतेबद्दल बोलले तर बरे होईल. तरच तुम्ही लवकर गर्भधारणा करू शकाल.

मी ३१ वर्षांची विवाहित महिला आहे. आम्हाला २ मुले आहेत आणि आम्ही सासू-सासरे, जेठ-जेठानी आणि त्यांच्या मुलांसह एकाच छताखाली राहतो. माझ्या जेठानी माझ्याशी बऱ्याच वेळा भांडतात आणि सासूचे कान भरत राहतात. मी एक खुल्या विचाराची स्त्री आहे तर जेठानी परंपरावादी आणि कमी शिकलेली आहे. त्या रोज माझ्याशी भांडत असतात. घरात जेठानीशी वारंवार भांडण होत असल्याने आम्हाला वेगळया घरात राहायला हवे का? यासाठी सासूबाई मला मनाई करतात, पण त्याचवेळी जेठानीचे बोलणे सहन करायला ही सांगतात. मला माझ्या पतीशी याबद्दल बोलायचे आहे पण मी ते कधी करू शकले नाही कारण, त्याला आई-वडिलांना सोडून वेगळे राहायचे नाही. मला सांगा मी काय करू?

जर सलोख्याचे सर्व मार्ग बंद असतील आणि कौटुंबिक कलह रोज होत असतील तर वेगळे राहण्यात काही नुकसान नाही. पण त्यापूर्वी तुम्ही जर सार्थक पुढाकार घेतलात तर घरात शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होऊ शकते.

सर्व प्रथम, तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की परस्पर भांडणाचे खरे कारण काय आहे? सामान्यत: घरगुती भांडण हे बजेटमधील भागीदारी, स्वयंपाकघरात कोण किती काम करते, घरातील कामांचे वितरण इत्यादीशी संबंधित असते. कधी-कधी एकमेकांचा मत्सर केल्यानेही परस्परांमध्ये दुराव्याचे वातावरण निर्माण होते.

भांडणाचे खरे कारण जाणून घेतल्यानंतर समेट करण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल, सासू आणि पती यांच्याकडून जेठानीच्या भांडणाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानेही परस्पर संबंध सुधारू शकतात. जेठानी कमी साक्षर आहेत, त्यामुळे हेही एक कारण असण्याची शक्यता आहे. त्यांच्यात तुमच्याबद्दल न्यूनगंड असू शकतो. योग्य वेळ पाहून जेठानीशी बोलणे हेसुद्धा तुमच्यासाठी चांगले असेल.

जर सासू तुम्हाला वेगळे घर घेण्यास नकार देत असतील तर साहजिकच त्या तुम्हाला आणि जेठानीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात, त्यामुळे फक्त तुमची सासूच योग्य निर्णय घेऊ शकतात.

एक-दोन गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर संयुक्त कुटुंब ही आजच्या काळाची गरज आहे, जिथे राहून प्रत्येकजण आपल्या स्वप्नांच्या पंखांना उड्डाण देऊ शकेन.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...