* जयलक्ष्मी राजगोपाळ

दिवाळीला फक्त एक दिवस उरला होता. सोसायटीच्या बहुतेक घरांमध्ये रंगरंगोटी आणि लाइटिंगचं काम पूर्ण झालं होतं आणि लोक दिवाळीच्या तयारीसाठी इथे-तिथे फेऱ्या मारत होते. मिठायांचा गंध सोसायटीभर दरवळत होता. अधूनमधून फटाक्यांचे आवाजही ऐकू येत होते. सर्वत्र लगभग सुरू होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होतं.

या सर्व गोंधळात कॉलनीतील एक घर शांत होतं. ते होतं मिनी, रिनी आणि बबलूचं घर. तिन्ही मुलं पुन्हापुन्हा गॅलरीत जाऊन उभी राहत आणि आस लावून विचार करत होते, ‘आईबाबा आले असते तर आपणसुद्धा दिवाळी साजरी केली असती.’

त्यांचे वडिल ५ दिवस आधी कार अपघातात जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल झाले होते आणि अजूनही रुग्णालयातच होते. त्यांची काळजी घेण्यासाठी आईसुद्धा तिथेच होती.

इतके दिवस तीन मुलांनी कसंकसं घर सांभाळलं होतं. जेवण करून खाणं, ते शाळेत घेऊन जाणं इ. ते स्वत: करत होते. पण आता आईबाबांशिवाय सण कसा साजरा करणार?

‘‘आता आईबाबा कदाचित दिवाळीनंतरच घरी येतील.’’ रात्री जेवताना रिनी आणि बबलू मिनीला म्हणाले.

‘‘हं...कदाचित डॉक्टरांनी बाबांना घरी जाण्याची परवानगी दिली नसेल,’’ मिनी उदास होऊन म्हणाली.

रिनी आणि बबलूने एकमेकांकडे पाहिलं आणि गप्प बसले. हॉस्पिटल जवळ असतं तर ते केव्हाच जाऊन बाबांना भेटून आले असते. पण हॉस्पिटल दूर होतं आणि ते कोणाला सोबत घेतल्याशिवाय जाऊ शकत नव्हते. या ५ दिवसांत ते फक्त एकदा आईबाबांना भेटले होते.

मान खाली घालून जेवणाऱ्या रिनी आणि बबलूला पाहून मिनी विचारात पडली. आईबाबा नसल्याने गेल्या काही दिवसांत त्यांच्यात किती बदल झाला  होता. आधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणारे आता एकजूट झाले होते. या पाच दिवसांत एकदाही त्यांच्यात भांडण झालं नव्हतं.

आईबाबा असते तर आज घरात किती आनंदी वातावरण झालं असतं, किती फटाके आले असते, किती मिठाया आणल्या असत्या आणि असं शांतशांत बसलेल्या रिनी आणि बबलूने धमाल केली असती. आपल्या लहान भावंडांकडे पाहून मिनीने एक निर्णय घेतला.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...