* गरिमा पंकज
लग्न एक सुंदर नातं आहे, जे प्रेम आणि विश्वासावरती टिकून असतं. जेव्हा दोन प्रेम करणारे जीव एकमेकांशी लग्न करतात तेव्हा आयुष्यातील सर्व रंग मिसळतात. आपल्या प्रियकरासोबत आयुष्य घालवण्याची अनुभूती वेगळीच असते. परंतु अनेकदा समाज, कुटुंब खासकरून नातेवाईक प्रेमाच्या बाबतीत थोडे कंजर्वेटिव्ह होतात. जिथे तरुणांना आपला जोडीदार निवडणं आणि प्रेमाच्या आकाशात उड्डाण करण्याची मुक्तता हवी असते, तिथे त्यांचे आई-वडील अनेकदा स्वत:ला समाज, परंपरा, जाती, धर्मासारख्या मापदंडामध्ये अडकलेले दिसतात आणि अगदी तिथेच खरी टक्कर सुरू होते. अशावेळी प्रश्न हा निर्माण होतो की पालकांना या लग्नासाठी कसं तयार करायचं?
जर तुमचं मनापासून कोणावर प्रेम असेल आणि त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं असेल आणि तो देखील तुमच्यावर खूप प्रेम करत असेल परंतु तुमचे पालक या प्रेमाच्या विरुद्ध असतील आणि त्यांना वाटत नसेल की तुम्ही त्या मुलाशी लग्न करावं. पालकांना स्वत:च्या मर्जीने तुमचं लग्न करायचं आहे. अशावेळी तुम्ही काय कराल? शांतपणे आपल्या स्वप्नांचा गळा घोटून पालकांचं म्हणणं ऐकणार की मग पालकांना सोडून त्या मुलासोबत स्वत:चा संसार थाटणार?
जसं की आम्हाला माहित आहे की आजच्या काळामध्ये मुली स्वत:ची स्वप्नं आणि स्वत:चं आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगू इच्छितात. अशा अनेक मुली आहेत ज्या स्वत:च्या आयुष्याचे मोठे निर्णय स्वत:च घेतात. जर त्यांना पालकांचं म्हणणं नाही पटलं तर त्याविरुद्ध आवाज उठवतात. अनेकदा अशा परिस्थितीत मुलींना आपल्या पालकांचे घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु काही झालं तरी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वत: होऊन पालकांना या लग्नाला तयार करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा.
कोणत्या कारणांमुळे पालक तयार होत नाहीत
कुटुंब : लव मॅरेजसाठी नकार हा कुटुंबामुळे देखील होतो. मुलगी वा मुलाच्या कुटुंबांचा एखादा गुन्हेगारी रेकॉर्ड असेल किंवा मग त्यांना गुंडगिरीसाठी ओळखलं जात असेल तर प्रेमविवाहात अडचणी येऊ शकतात.





