* प्रतिनिधी
एक यशस्वी गायनोकॉलॉजिस्ट अर्थात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणजे ज्यांचे रुग्ण त्यांच्याशी त्यांच्या कौटुंबिक समस्या, जोडीदारासोबतच्या लैंगिक समस्या आणि पती-पत्नीचे नाते इत्यादींबद्दल मोकळेपणाने बोलू शकतात.
लैंगिक शिक्षण आणि पालकत्वासाठी ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ हेल्थ अँड कौन्सिल’ ही स्थापन करण्यात आले आहे, जेणेकरून लैंगिकतेच्या या समस्येबद्दल प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक नर्सिंग होममध्ये एकाच छताखाली लैंगिक आणि पुनरुत्पादक अशी दोन्ही माहिती उपलब्ध होईल.
लैंगिक औषधांसाठी, लैंगिक समस्यांसह सर्व वैयक्तिक समस्यांबद्दल बोलणे आवश्यक आहे. लोकांना त्यांच्या वैयक्तिक समस्यांबद्दल काहीही संकोच न बाळगता बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांना समजेल की, त्यांच्या लैंगिक समस्या या इतर रोगांप्रमाणेच आहेत ज्या शरीराशी संलग्न असल्यामुळे वेदना होतात. लैंगिक समस्यांना गुप्त किंवा घाणेरडे समजणे चुकीचे आहे.
चाचण्या आणि उपचार
आजकाल प्रसूतीशास्त्रात नवनवीन शोध लागले आहेत. त्यांचे अनेक फायदे आहेत. इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच आता प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातही तांत्रिक प्रगती दिसून येते. सर्वोत्कृष्ट औषधे, नवीन वैद्यकीय यंत्रे चाचण्या आणि प्रयोगशाळेतील तपासणीसाठी उपयुक्त आहेत. गरोदरपणातील मधुमेह, रक्तदाब इत्यादी गंभीर परिस्थितीत तंत्रज्ञानातील नवीन प्रगतीच्या मदतीने बाळाला वाचवता येते.
प्रत्येक नर्सिंग होममध्ये न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट असणे आवश्यक आहे. ८००, ९०० ग्रॅम वजनाच्या जन्मलेल्या बाळांनाही वाचवणे आता शक्य झाले आहे.
काही कारणांमुळे अनेक जोडप्यांना मूल होऊ शकत नाही, पण आता नवीन वैद्यकीय शोधांच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आता त्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या आणि उपचार घेता येतात. नवीन पद्धती वापरूनही त्यांना गर्भधारणा करता येत नसेल किंवा शक्यता कमी असेल तर दात्याचे वीर्य, दात्याची अंडी आणि सरोगेट मदर यांच्या माध्यमातून मदत मिळू शकते.
चांगला सल्ला का आहे महत्वाचा?
डॉक्टर काही जोडप्यांना मदत करू शकत नसतील तर त्यांच्या मनातून मूल दत्तक घेण्याबाबतचे गैरसमज दूर करून मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला जातो.
आपले कायदे खूप कडक असल्यामुळे मूल दत्तक घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. अनेकजण आता मूल विकतही घेतात. यामुळे त्यांना मातृत्व आणि पितृत्वाची सुखद अनुभूती मिळते आणि मुलालाही चांगले आयुष्य मिळते. धकाधकीचे जीवन, वातावरण, प्रदूषण, रासायनिक फवारणी केलेला भाजीपाला, धान्ये, फळे इत्यादींमुळे शारीरिक संतुलन बिघडते. हार्मोन्सची समस्या, अंडयाची समस्या, व्यावसायिक तणाव, पैशांची कमतरता, या सर्व कारणांमुळे वीर्य प्रभावित होते. त्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे.
गर्भाशयाची योग्य वाढ होत नसल्याने सरोगेट मदरची गरज भासते. गर्भाशय काढून टाकल्यास, कर्करोग, हृदयविकार इत्यादी रोग झाल्यास, जोडप्याची अंडी आणि वीर्य इतर स्त्रीच्या भ्रुणामध्ये विकसित केले जाते. हे काम करणाऱ्या महिलेला ‘सरोगेट मदर’ म्हणतात. गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतची जबाबदारी तिची असते आणि प्रसूतीनंतर तिला ते मूल जोडप्याला द्यावे लागते.
अशाप्रकारे, ‘सरोगेट मदर’ जोडप्याला त्यांचे जनुक विकसित करण्यास मदत करते. काही प्रमाणात ही प्रक्रिया व्यावसायिकतेचेही नेतृत्व करते, हे नाकारता येणार नाही. भारतात यासाठी आतापर्यंत जे नियम आणि कायदे बनवले गेले आहेत ते याला काळया बाजारात ढकलत आहेत.
समस्या येण्याची शक्यता कमी
वैद्यकीय पर्यटकांसाठी ते खूप उपयुक्त आहेत. परदेशात सरोगेट मदरची व्यवस्था करणे महागडे आहे, त्यामुळे परदेशी लोकही येथे येतात आणि आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या गरीब लोकांमधील महिला ‘सरोगेट माता’ बनण्यास तयार होतात. विदेशींना हे मूल सोबत नेण्यासाठी बराच त्रास होतो. देशातील मातांनाही जन्म प्रमाणपत्र उशिराने मिळते. नातेवाईक आणि मित्रमंडळीही टोमणे मारणे सोडत नाहीत.
आता वीर्य बँका खूप चांगले काम करत आहेत. या बँकांमध्ये चांगले नमुने उपलब्ध आहेत. वीर्य दात्यांचे वीर्य या बँकांमध्ये जतन केले जाते आणि ज्या पुरुषांना वीर्य समस्येचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरते. हे कृत्रिम रोपणासाठीही उपयुक्त ठरते. वीर्य बँका या नमुन्यांची चाचणी घेतात, त्यामुळे समस्या येण्याची शक्यता फारच कमी असते.
दुसरीकडे, आपल्याकडे माहितीचा अभाव असतानाही कुटुंब नियोजनात बरीच सुधारणा झाली आहे. गर्भनिरोधक गोळयांनी ५० वर्षे पूर्ण केली आहेत. आज बाजारात कमी हार्मोन्स आणि कमी साइड इफेक्ट्स असलेली औषधे आहेत, त्यामुळे त्या प्रभावहीन ठरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आता तर इमर्जन्सी गर्भनिरोधक महिला कंडोमही उपलब्ध आहे.
लग्नानंतरच्या समस्या
सामान्य आजारांपैकी, स्त्रीरोगतज्ज्ञांना स्त्रियांमधील सर्वात सामान्य मूत्र संक्रमणाच्या समस्येला सोडवावे लागते. महिलांचे गर्भाशय जननेंद्रियाच्या अगदी जवळ असल्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना मूत्र संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच त्यांना मासिक पाळी, प्रसूती किंवा गर्भधारणेदरम्यान संसर्ग होण्याची भीती असते. लग्नानंतरच्या पहिल्या लैंगिक संभोगादरम्यानही महिलांना संसर्ग होऊ शकतो. सर्वसाधारणपणे, कमी द्रव आहार घेतल्यास संसर्ग होऊ शकतो आणि जेव्हा मूत्राशय वाढणे, मुतखडा इत्यादी समस्या उद्भवू शकतात तेव्हा त्रास होऊ शकतो.
का आवश्यक आहे विशेष ज्ञान?
आजकाल मुलींना वयाच्या ९व्या वर्षी मासिक पाळी येऊ लागली आहे, पण त्या अनेक लैंगिक गोष्टींची माहिती आधीच करून घेतात, त्यामुळे त्यांच्या ज्ञानाची पातळी वाढत आहे. ही उत्तेजित प्रक्रिया मेंदूमध्ये खूप वेगवान असल्याने हार्मोन्स तयार होऊ लागतात. पर्यावरणीय प्रदूषणामुळे पसरणाऱ्या रसायनांचा शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो, त्यामुळे परिपक्वता लवकर येते.
तरुण वयात मासिक पाळी व्यवस्थापित करणे ही समस्या बनत आहे. यामुळे पालकही चिंतेत आहेत. मासिक पाळी सुरू होताच निसर्ग शरीराला पुनरुत्पादनासाठी तयार करतो, परंतु मासिक पाळीचा कालावधी कमी होत आहे आणि लग्नाचे वय वाढत आहे. लग्नाशिवाय नको असलेले लैंगिक संबंध, नको असलेली गर्भधारणा, गर्भपात आणि लग्नापूर्वी गर्भधारणा अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत.
पारंपरिकपणे, घरातील वडीलधरी या विषयावर गुप्तपणे बोलतात. अशा गोष्टी मुलांसमोर केल्या जात नाहीत. दुसरीकडे चित्रपट आणि माध्यमांतून त्याचा खुलासा होतो. मुलं संभ्रमात पडतात की बरोबर काय? सेक्सबद्दलची अपूर्ण आणि चुकीची माहिती मुलांना उत्तेजित करते.
उपयुक्त माहितीची गरज
मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य माहिती, लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. हे ज्ञान त्यांना घरातून आणि पुढे शाळा-महाविद्यालयांमध्ये मिळू लागले तर ती लग्न, मातृत्व आणि चांगले नागरिक बनण्यास तयार होतील, परंतु लैंगिक शिक्षण हे संभोगाचे शिक्षण आहे, असा गैरसमज समाजात आहे. मानसिक आणि शारीरिक वाढ, तारुण्य, स्त्री-पुरुष संबंध, लिंग, समानता, लिंगभेद, विरुद्ध लिंगी आकर्षण इत्यादी समलैंगिक शिक्षणाचा (सेक्स एज्युकेशन) भाग आहे. त्यामुळे मुलांना लहान वयात हे सर्व लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ सर्वाधिक उपयुक्त आहेत.
वैवाहिक समुपदेशनामुळे संभोगाबाबतचे गैरसमज आणि त्यासंबंधीच्या समस्या दूर होतात. अनेक प्रकरणांमध्ये, लैंगिक संबंधांबद्दल माहिती नसल्यामुळे लग्नाचा पहिला दिवस शेवटचा दिवस ठरतो.
आजच्या युगात, लोकांचे अनेक पर्यायी नातेसंबंध तयार होतात. त्याचा एकप्रकारे विवाह व्यवस्थेवर परिणाम होत असला तरी ते थांबवता येत नाहीत. जेव्हा एक स्त्री आणि पुरुष एकत्र काम करतात किंवा जवळ राहातात किंवा एकत्र अभ्यास करतात तेव्हा दोघांनाही एकमेकांची जास्त सोबत आवडते. काही जण घरभाडे वाचवण्यासाठी एकच घर दोघांमध्ये भाडयाने घेतात. अशा स्थितीत दोघांनाही लैंगिक संबंधांमध्ये बरीच काळजी घ्यावी लागते आणि यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांची भूमिका मोठी असते.





