* पूनम अहमद
मुंबईमध्ये राहणाऱ्या सुनीताची मुले नववीच्या वर्गात असताना ती आणि तिचा नवरा निलीन पुण्यात एका लग्नाला गेले होते. लग्नाला जाणे गरजेचे होते आणि त्यात मुलांची परीक्षा होती. बऱ्याच विचाराअंती पतिपत्नी मुलांची समजूत घातल्यानंतर कामवालीला सूचना देऊन २ रात्रींसाठी पुण्याला गेले.
ती म्हणते, ‘‘पहिल्यांदा तर माझ्या मनात याची चिंता वाटत होती की, आम्ही नसताना मुलांना काही अडचण भासू नये, आम्ही सोसायटीमध्येही नवीन होतो. मीही बरेच दिवस घरात राहून कंटाळले होते. याआधी कधी मुलांना एकटे सोडून गेलो नव्हतो. पण जेव्हा गेलो, तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ज्या गोष्टीची विनाकारण चिंता करत मी गेले होते, परंतु पहिल्याच रात्री मुलांशी बोलून इतका आनंद झाला, जेव्हा बघितले की दोघेही छानपणे आपापले काम करत आहेत, आमच्याशिवाय सर्व व्यवस्थित मॅनेज करत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. तेव्हा कुठे मी माझी पहिली चाइल्ड फ्री ट्रिप मनापासून एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही दोघे बऱ्याच वेळा १-२ रात्रींसाठी बाहेर फिरायला गेलो, मुलांनीही हेच सांगितले की, आम्ही तर शाळा-कॉलेजमध्ये व्यस्त असतो, तुम्ही निर्धास्तपणे जाऊन येत जा.
‘‘मुले जेव्हा फ्री झाली तेव्हा त्यांच्यासोबत कधी फिरायला गेलो, नाहीतर आम्ही २-३ रात्रींच्या ट्रिपवरून आता १ आठवडयाच्या ट्रिपवर आलो आहोत आणि तसे वारंवार जात राहतो. काही दिवस एकमेकांच्या सहवासात स्वत:चा वेळ घालवून फ्रेश होऊन परत येतो. त्यामुळे मन आनंदी राहते.’’
आता तर कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे कुटुंबातील वेळ जास्तीचा झाला होता. बऱ्याचशा लोकांवर वर्क फ्रॉम होमचा फार ताण होता, घरातील इतर सदस्यांच्या गरजा आणि मुलांचे ऑनलाइन वर्ग यामुळे पती-पत्नीला एकमेकांबरोबरचे मोकळे क्षण फार मुश्किलीने मिळत होते. दोघांवरही कामाचा भरपूर ताण होता. कदाचित हेच कारण आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर पती-पत्नी एकमेकांसोबत चांगले क्षण घालवण्यासाठी मुलांशिवाय ट्रिपचे नियोजन करताना दिसले, जे कदाचित गरजेचेही झाले होते.