* सोमा

पावसाच्या हलक्या सरी वातावरण आनंददायी बनवतात. कडक उन्हानंतर पावसामुळे सर्वांना दिलासा मिळतो. परंतू आपण तेव्हाच या आल्हाददायी वातावरणाचा आनंद घेऊ शकतो, जेव्हा घर ताजेतवाने आणि सुगंधित असेल.

यासंदर्भात इलिसियम एबोडेसच्या संस्थापक आणि इंटिरियर डिझाइनर हेमिल पारिख सांगतात की खरंतर सततच्या पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. हा ओलावा घरातही शिरतो. उष्णता आणि ओलावा वाढल्यामुळे घराच्या भिंतींवर ओलसरपणा, बुरशी येणे इत्यादी होते, ज्यामुळे कुबट वास सर्वत्र पसरतो. स्वच्छ हवेची कमतरता होऊ लागते. म्हणूनच आपण आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि चांगले वातावरण मिळेल. यासाठी येथे काही महत्त्वपूर्ण टीप्स देत आहोत :

* बहुतेक लोक एखाद्या विशिष्ट प्रसंगीच कापूर जाळतात. पावसाळयात कापूर जाळल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि शिळा वास टाळता येतो. ते जाळल्यानंतर खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद करा आणि १५ मिनिटांनंतर उघडा. खोलीत फ्रेशनेस येईल.

* जर तुमच्या खोलीत फर्निचर असेल तर ते ओले होण्यापासून वाचवा. ओल्या फर्निचरमुळे कधीकधी दुर्गंधी येते.

* पायपुसणी ओली होऊ देऊ नका. दर २-३ दिवसांनी ती पंख्याखाली कोरडी करा.

* काही लोक कीटकांच्या भीतिने पावसाळयात दारे आणि खिडक्या बंद ठेवतात. यामुळे खोलीत जास्त कुजका वास येतो. खिडक्या आणि दारे थोडया वेळासाठी का होईना उघडी ठेवा, जेणेकरून बाहेरची ताजी हवा आत येईल. क्रॉस व्हेंटिलेशन होण्यासह खोलीतील दुर्गंधीदेखील जाईल.

* कुबट वास दूर करण्यासाठी व्हिनेगर खूप चांगले कार्य करते. रुंद तोंडाच्या भांडयात १ कप व्हिनेगर घाला आणि खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. थोडया वेळातच तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.

* आजकाल बाजारामध्ये रूम फ्रेशनर सहज उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार खोलीत फवारणी करता येते. त्यात लव्हेंडर, चमेली, गुलाब इत्यादी ताजेपणा निर्माण करतात.

* कडुलिंबाची पाने बुरशी दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. त्याची सुकलेली पाने कपडयांमध्ये आणि कपाटाच्या कोपऱ्यात ठेवता येतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...