* वेणीशंकर पटेल

काही वर्षांपूर्वी आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या एका मुख्य निर्णयानुसार कलम ४९७ रद्द करत विवाहबाह्य संबंधांना अपराधाच्या श्रेणीतून हटवण्यात आले. त्यावेळचे सीजेआय दीपक मिश्रा यांनी आपला निर्णय सुनावला की विवाहबाह्य संबंध हा एक व्यक्तिगत मुद्दा असू शकतो. तो घटस्फोटाचे कारण ठरू शकतो, पण हा अपराध नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. समाजात वाढत असलेला व्यभिचार हा समाजाची वीण तोडण्याचा कुत्सित प्रयत्न तर करत आहे, पण असाही प्रश्न निर्माण होत आहे की या वाढत्या व्यभिचार आणि विवाहबाह्य संबंधांची कारणे काय आहेत?

मानवी संस्कृतीचा विकास होताना समाजाने शारीरिक समाधान आणि सेक्स संबंधांच्या मर्यादेसाठी विवाह नामक संस्थेला सामाजिक मान्यता दिली असावी. विवाहपश्चात पती पत्नीतील सेक्स संबंध सुरुवातीला ठीक असतात, पण कालांतराने सेक्स प्रति अरुची आणि पार्टनरच्या गरजांकडे पुरेसे लक्ष न देणे ही कलहाची कारणे ठरतात.

साधारणपणे सुखद सेक्स त्यालाच मानले जाते, ज्यात दोन्ही पार्टनर्सना ऑर्गेज्मचा आनंद मिळतो. जर पतिपत्नी सेक्स संबंधांत एकमेकांना समाधानी करण्यात यशस्वी झाले तर त्यांच्या दाम्पत्य जीवनाची केमिस्ट्री ही उत्तम राहते.

राकेश आणि प्रतिभा यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. त्यांना २ वर्षांची एक मुलगीही आहे. परंतु मुलीच्या जन्मानंतर प्रतिभा मुलीच्या संगोपनातच रमून गेली. आपल्या पतिच्या लहानसहान गरजांकडे लक्ष पुरवणारी प्रतिभा आता त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली.

कधी रोमँटिक मूड असताना जेव्हा राकेश सेक्सची इच्छा व्यक्त करत असे, तेव्हा प्रतिभा त्याला या गोष्टीवरून झिडकारायची की तुला फक्त या एका गोष्टीशीच मतलब आहे. यामुळे राकेश नाराज होऊन चिडचिड करत असे. मनाला मुरड घालून तो आपली कामेच्छा दाबून टाकत होता. हळूहळू सेक्सच्या ओढीने त्याला दुसरीकडे शारीरिक संबंध निर्माण करण्याचे विचार मनात येऊ लागले. प्रतिभासारख्या अनेक महिलांचे हे असे वागणे राकेशसारख्या पुरुषांना दुसऱ्या महिलांशी संबंध प्रस्थापित करायला प्रवृत्त करतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...