* शिखा जैन

उत्सव आयुष्य आनंदी आणि नाती मजबूत बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. ते जगण्यात उत्साह आणि उल्हासाचा रंग भरतात. इतकेच नाही तर नटण्यासजण्याची, नवे नवे पदार्थ चाखण्याचीही संधी देतात.

उत्सव सणांमुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. नात्यांमध्ये आलेला दुरावासुद्धा या सेलिब्रेशनमुळे दूर होतो. चला मग, या उत्सवांमध्ये जुने मित्र आणि नातेवाईकांपासून नात्यांची नवी सुरूवात करू, जेणेकरून जीवनात फक्त आणि फक्त आनंद आणि प्रेम मिळत राहील.

नात्यांचे महत्त्व

नाती सुगंधी फुलांप्रमाणे असतात, जी आपल्या आयुष्यात टवटवी आणि आनंद भरतात. नाती नसतील तर कुठलाही आनंद व्यक्त करण्याला आणि साजरा करण्याला काही अर्थच उरणार नाही. दु:ख असो की आनंद जोपर्यंत ते आपल्या जिवाभावाच्या माणसासोबत शेअर करत नाही तोवर त्याचे महत्त्व कळत नाही. आपल्या भल्याबुऱ्या काळात आपल्याला सांभाळणारी आणि ही जाणीव निर्माण करून देणारी नातीच तर असतात जी सांगततात की आपण एकटे नाहीत आणि आपल्यासोबत प्रत्येक क्षणी आहेत. आणि हेच कारण आहे की सणावारांच्यावेळी त्यांची कमतरता जाणवते. म्हणून नाती इतकी मजबूत बनवा की प्रत्येक सण उत्साहाने सोबत साजरे कराल.

नातेवाईकांशी संबंध वाढवण्यासाठी सण उत्सव हा उत्तम पर्याय : कधी कोणाला कशा प्रकारे मदतीची गरज भासेल सांगता येत नाही. गरज भासल्यास मित्र आणि नातेवाईकांकडूनच मदतीची अपेक्षा करता येऊ शकते. पण असे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा त्यांच्याशी आपले संबंध चांगले असतील. मग यावेळी त्यांना आपलेसे करण्यासाठी तुम्हीच पहिले पाऊल उचलावे.

यासाठी सणांच्या दिवशी त्यांच्या घरी मिठाई आणि गिफ्ट घेऊन जा. तुम्ही सणाच्या दिवशी गेलात तर त्यांच्या मनातील कटुता कमी होऊन ते ही झाले गेले विसरून एका नव्या नात्याची सुरूवात करतील.

नात्यांना नवे रूप द्या : आयुष्याच्या गदारोळात अडकल्यामुळे काही नाती मागे राहून जातात. इच्छा असूनही आपण त्यांना जवळ आणू शकत नाही. त्यांच्याशी आपले काही शत्रुत्त्व नसते. उलट संबंध चांगलेच होते, पण तरी ते जवळ नसतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...