* प्रतिनिधी

मी ३० वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. माझं माहेर आणि सासर कानपूरला जवळ-जवळच आहे. मी पती आणि एक वर्षाच्या मुलासोबत दिल्लीत राहते. जेव्हा मी १०-१५ दिवसांसाठी जाते, तेव्हा सासूची अशी इच्छा असते की मी माझा संपूर्ण वेळ त्यांच्यासोबतच घालवावा. माहेरी २-३ दिवस राहण्यावरही त्यांचा आक्षेप असतो. त्यांचं म्हणणं असतं की माहेर जवळच आहे ना मग तिथे राहायला जाण्यात काय अर्थ आहे. फक्त भेटून ये. पण इच्छा असूनही मला असं करता येत नाही. आई आणि भावंडांसोबत २-४ दिवस राहिल्याशिवाय समाधान होत नाही. माझे पती स्वत:च्या आईला काही बोलत नाहीत आणि मलाही.

पुढच्या महिन्यात माझ्या पुतणीचं लग्न आहे. लग्नाचं निमंत्रण आल्यापासून मी उत्साहात आहे की त्यानिमित्ताने नातेवाईकांची भेट होईल. पण मी तिथे जाऊन राहिल्याने परत सासू आकांडतांडव करेल याची भीती वाटते. सगळी मजाच निघून जाईल.

दादा-वहिनी आतापासूनच आग्रह करत आहेत की मी सर्वात पहिलं पोहोचलं पाहिजे. लग्नाची खरेदी माझ्यासोबतच करणार. इतक्या आग्रहाने बोलवत असल्यामुळे त्यांना नाही म्हणता येत नाही आहे आणि जास्त दिवसांसाठी गेले तर सासू वाद घालेल. काय करू कळत नाहीये. कृपया मार्गदर्शन करा.   

तुमचं माहेर आणि सासर जरी एका शहरात असलं तरी तुम्ही स्वत: दिल्लीला  राहता. त्यामुळे माहेरच्यांशीही कधीतरीच भेटणं होत असेल. अशावेळी तुम्ही २-४ दिवस माहेरी जाऊन राहात असाल तर तुमच्या सासूला हरकत असण्याचं कारण नाही. तुम्ही पूर्णवेळ सासरी घालवल्यानंतर माहेरून मात्र एका दिवसात परत ये हे सासूने सांगणं चुकीचं आहे.

तुमच्या सासूचा हा हट्ट तालिबानी आहे. तुमचे पती तुम्हा दोघींच्या वादात पडत नाहीत, तटस्थ राहतात. हे काही प्रमाणात योग्यही आहे. तुम्ही तुमच्या सासूला प्रेमाने समजावू शकता की तुमचं माहेर जवळच असलं तरीही तुम्ही दिल्लीला राहात असल्याने तिथे कधीतरीच जाणं होतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवावासा वाटतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...