गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • मी विवाहित युवक आहे आणि एका मुलाचा बाप आहे. मी आपल्या वैवाहिक जीवनाबाबत खूप चिंतीत आहे. माझ्या बायकोने आधी एका तरुणाबरोबर मैत्री केली आणि हळूहळू त्यांच्यातली जवळीक इतकी वाढली की दोघांमध्ये लैंगिक संबंधही निर्माण झाले. मला जेव्हा बायकोच्या या व्यभिचाराबद्दल कळलं तेव्हा प्रथम आमच्यात खूप भांडणतंटे झाले. एकत्र राहत असूनही आम्हा दोघांमध्ये दुरावा वाढू लागला आणि एक दिवस ती मुलाला माझ्याजवळ सोडून निघून गेली. आता ३ वर्षांनंतर ती अचानक परत आली.

वाटतं की त्या मित्राने तिला दगा दिला आहे, म्हणून ती परत आली आहे. ती आल्यानंतर मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण एवढं करूनही ती माझ्याशी ना मोकळेपणाने बोलते ना शरीर संबंधांना होकार देते. एकाच छताखाली राहूनही आम्ही दोघे अपरिचितासारखे वावरतो. मी काय करू?

आता हे तर म्हणू शकत नाही की तुमच्या बायकोला तिच्या कुकर्माचा पश्चाताप होत असेल आणि म्हणून ती नॉर्मल होत नाही आहे. तुम्ही आशा करा की काही काळानंतर ती स्वत:च सामान्य व्यवहार करू लागेल. जर असे झाले नाही तर तुम्ही एखाद्या मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्या. काउन्सिंलिंगमुळे कळेल की बायकोच्या मनात काय आहे. कायदा हातात घेणं सोपं नाही, कारण न्यायालय अशा बायकांचंही अधिकिने ऐकून घेतं.

  • मी २५ वर्षांची विवाहिता आहे. माझं वैवाहिक जीवन सुखी नाही. याचं कारण मी स्वत: आहे असं मी मानते. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. पण सगळा दिवस छान गेल्यावर रात्री मी पतीला उदास आणि नाराज करते. कारण जेव्हा पण ते माझ्या सहवासाची अपेक्षा करतात, मी बिथरते.

सहवास तर दूर त्यांना चुंबन आणि मिठीही मारू देत नाही. यामुळे त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. हास्यास्पद हे आहे की जेव्हा ते माझ्याजवळ नसतात, तेव्हा माझं मन त्यांच्यासाठी व्याकुळ होतं. त्याच्याशी संबंध ठेवायची इच्छाही होते. मी काय करू की माझ्या पतिला शारीरिक सुख देऊ शकेन?

तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याच जवळ आहे. तुम्हाला हे कळायला हवं की सेक्स हा सहजीवनाचा कणा आहे. म्हणून जेव्हा पती तुमच्या सहवासाची अपेक्षा करतो, तेव्हा इच्छा नसतानाही तुम्ही त्याला समर्पित व्हायला हवं. स्त्रीची शारीरिक रचनासुद्धा अशी असते की प्रयत्न न करताही ती पतीची कामेच्छा पूर्ण करू शकते.

तुम्हाला मानसिकदृष्टया थोडं सक्रिय व्हायची गरज आहे आणि तुमच्याकडून शारीरिक सुख घेणं हा तुमच्या पतीचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही त्यांना यापासून वंचित ठेवता कामा नये. सहवासात तुमच्या सक्रियतेने तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचं सहजीवन छान बहरेल.

मी २५ वर्षीय युवक आहे. माझं लग्न होऊन ३ वर्ष उलटली आहेत. एक दिड वर्षांची मुलगीसुद्धा आहे. माझ्या पत्नीशी विवाह झाल्यावर पहिली २ वर्ष खूप छान गेली किंवा असं म्हणा की खूपच रोमँटिक गेली. आम्ही दोघे खूप फिरलो, दिवस रात्र रोमान्समध्ये बुडालेलो असायचो. माझे मित्र आम्हाला लव्हबर्ड म्हणत असत. कारण आम्ही नेहमी रोमँटिक मूडमध्ये असायचो. वाटायचं की आम्ही आजन्म असेच राहू. २ वर्ष उलटता उलटता ती एका मुलाची आई झाली आणि तिच्या पत्नी म्हणून वर्तणुकीत जमीन अस्मानाचा फरक पडला. आता तिची सेक्समधील रुची समजा की संपत चालली आहे. आधी ती सहवासासाठी व्याकुळ असायची. ती आता सेक्सकडे पाठ फिरवते आणि मी रुची दाखवली तरीही खास उत्साह दाखवत नाही.

कित्येकदा मला जाणवतं की मी बलात्कार करत आहे. सहवासालासुद्धा ती इतर कामांप्रमाणे आटोपून टाकायचा प्रयत्न करते. मी शोधत राहतो की पूर्वीची उर्जा, आधीचा उत्साह अचानक कुठे हरवला? काय सगळया जोडप्यांमध्ये असंच होतं?

थोडं व्यावहारिक होऊन विचार कराल तर लग्नाच्या सुरूवातीच्या काळाची तुलना करून नाराज होणार नाही. तुम्हाला कळायला हवं की लग्नाच्या सुरूवातीच्या काळात तुम्ही बिनधास्त होऊन रोमान्स यामुळे करू शकला कारण त्यावेळेस कोणती जवाबदारी नव्हती. तुम्ही फक्त स्वत:च्या दृष्टींने नाही तर बायकोच्या दृष्टीनीही बघायला हवं. गर्भावस्थेचे कठीण ९ महिने मग प्रसूती आणि नंतर लहान बालकाचं संगोपन. या सगळयामुळे जर तुमची बायको तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष करत असेल तर अजाणता का होईना तुम्ही तिची परिस्थिती समजून घ्यायला हवी.

हे फार छान होईल जर तुम्ही बाळाला सांभाळण्यात किंवा घराच्या बारीक सारीक कामात मदत केलीत. आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर एखादी कामवाली बाई ठेवा. यामुळे तिला थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तक्रार करायला संधी मिळणार नाही.

याशिवाय बाळ थोडं मोठं झाल्यानंतरही तुमचं सहजीवन आपोआप मार्गी लागेल. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांप्रमाणे नाही, पण खूप छान वाटेल तुम्हाला. थोडा धीर धरा.

सौंदर्य समस्या

*समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • माझ्या कपाळाच्या दोन्ही बाजूला काळसर डाग आहेत. कृपया उपाय सांगा?

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी बेसनाचा वापर उत्तम आहे. अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद, २ चमचे बेसन यांचं चांगलं मिश्रण करून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून सुकू द्या. असं दिवसातून एकदा नियमित करा. काळसर डाग नाहीसे होतील.

  • सकाळी उठल्यावर माझा चेहरा नॉर्मल भासतो. पण दुपारपर्यंत लाल होतो. हे कशामुळे होतं?

ऊन, काळजी, चॉकलेट व मसालेदार खाणं वगैरे यामुळे असे त्वचेचे आजार होतात. यावर उपाय म्हणजे रोज चेहरा नीट साफ करा व आहारांकडे विशेष लक्ष द्या. उन्हात जायचं असल्यास १५ ते २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा, जे तुमच्या स्कीनचं युव्हीए व युव्हीबीपासून संरक्षण करेल. जास्तवेळ उन्हात राहायचं असेल तर २ तासांनी परत सनस्क्रीन लावा. भरपूर पाणी प्या.

  • माझ्या कपाळावर व ओठांभोवती काळपटपणा आला आहे. यावर उपाय काय?

ओठांच्या काळपटपणासाठी आधी ओठांना माइश्चराइज करण्याची गरज आहे. यासाठी भरपूर पाणी प्या. रात्री झोपण्याआधी बेंबीत ई-व्हिटामिन तेलाचे ३ थेंब टाका. ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी गुलाबाच्या पानांची पेस्ट लावणे हा अचूक उपाय आहे. नियमित वापर केल्यास ओठांचा रंग हलका गुलाबी व चमकदार होतो. हवं असल्यास या पेस्टमध्ये तुम्ही थोडंसं ग्लिसरीन टाकू शकता.

  • मी १९ वर्षांची आहे. एक वर्षापूर्वी मी भुवयांवर पियरसिंग केलं होतं. पण मला आता त्यात काही घालायचं नाही. मी हे कॉस्मेटिक सर्जरी करून बंद करू शकते का? यात किती खर्च येईल?

नक्कीच. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे तुम्ही तुम्हाला नको असलेल्या रिकाम्या जागा भरू शकता. यात कमीतकमी रू. १०-३० हजार रुपये खर्च आहे.

  • मी ४५ वर्षांची आहे. माझे केस खूप तेलकट आहेत. आठवड्यातून मी ३-४ वेळा शाम्पूने केस धुते. पांढऱ्या केसांसाठी डाय करते. परंतु १५-२० दिवसात परत भांगाच्या आसापास पांढरे केस दिसू लागतात. मी माझ्या केसांबद्दल चिंतीत आहे. केस दिर्घकाळ काळे राहावे यासाठी सोपा उपाय सांगा?

तेलकट केसांसाठी पाण्यात १ चमचा व्हिनेगर, २-३ थेंब लव्हेंडर इसेंशियल तेल टाकून केस धुवा. कलर्ड केसांसाठी असा कोणताही स्थायी उपचार नाही. पण जर तुम्ही प्रोफेशनल सलूनमध्ये जाऊन वर टचअप केला तर फायदा होईल.

केस सौम्य शाम्पूने धुवा. जमल्यास जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या वाटून १ चमचा भिजवलेल्या मेथ्या बारीक करून मिश्रण तयार करा. ते २-३ तास डोक्याच्या त्वचेवर लावा व नंतर शाम्पू करा.

  • मी २५ वर्षांची आहे. माझे केस खूप गळतात. असा काहीतरी घरगुती उपाय सांगा, ज्यामुळे केस गळणं कमी होईल?

केस गळण्यामागे चुकीची जीवनशैली, सुंतलित आणि पौष्टिक आहाराचा अभाव, प्रदूषित वातावरण आणि हार्मोन्समधील बदल अशी बरीच कारणं असतात. सोबतच एखादा आजार वा औषधाच्या सेवनामुळेही केसगळती होऊ शकते. आधी तुम्ही तुमचे केस गळण्याची कारणं जाणून घ्या. मग त्यानुसार उपाय करा.

घरगुती उपाय म्हणून आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मसाज करा आणि दही लावा, केसगळती थांबवण्यासाठी दही हा घरगुती उपाय आहे. दह्यामुळे केसांना पोषण मिळते. केस धुण्याच्या कमीत कमी ३० मिनिटं आधी दही लावा. दही सुकलं की केस धुवून टाका.

दुसरा उपाय म्हणून कोमट ऑलिव्ह तेलात १ चमचा मध आणि १ चमचा दालचिनी पावडर मिसळून त्याची पेस्ट करा आणि अंघोळीआधी केसांना लावा. एका तासाने केस शॉम्पूने धुवा. यामुळे केसगळती थांबते.

  • मी २९ वर्षांची आहे. माझी समस्या ही आहे की माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं आली आहेत आणि माझी त्वचासुद्धा फिकट पडली आहे. चेहऱ्यावरचं तेज परत मिळवण्यासाठी उपाय सांगा?

डोळ्यांखालच्या काळ्या वर्तळांमुळे वय जास्त दिसतंच शिवाय चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होतं. बऱ्याच काळासाठी चुकीचा आहार, संगणकाचा अतिवापर, त्वचेमध्ये पाण्याची कमतरता, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे ही वर्तुळं घालवण्यासाठी  बदामाच्या तेलाने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा. हवं तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या अंडरआय क्रिमचाही वापर करू शकता.

तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. वाटलं तर तुम्ही दहीसुद्धा चेहऱ्यावर लावू शकता. दही त्वचेच्या आत लपलेली घाण दूर करून चेहऱ्यावरचे डाग, मुरमं नष्ट करते.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ५३ वर्षांची आहे. बँकेत ऑफिसर आहे. माझ्यावर कामाचा खूप ताण असतो. कदाचित म्हणूनच माझं ब्लडप्रेशर वाढत आहे. माझ्या लक्षात येतयं की गेल्या २-३ वर्षांपासून हिवाळ्यात जास्त वाढतं. घरी मुलं व नवरा माझी थट्टा करतात की असं काही वसंत ऋतुप्रमाणे ब्लडप्रेशर कमी जास्त होत नाही. पण मला भुक लागली की खायची सवय आहे. कृपया मला सांगा की हिवाळ्याचा ब्लडप्रेशर वाढण्यासाठी काही संबंध आहे का? जर असेल तर ते सामान्य ठेवण्यासाठी काय उपाय करावे जेणेकरून माझं आरोग्य मला सुहृढ राखता येईल.

उत्तर : नक्कीच हिवाळ्यात काहीचं ब्लडप्रेशर वाढू शकतं. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात कित्येकाचं ब्लडप्रेशर ६-७ ते १० अंकांनी वाढत असतं असं वैद्यकीय संशोधनात (क्लिनिकल संशोधनात) आढळलं आहे. जर ब्लडप्रेशर वाढून १४० अंक सिस्टॉलिक व ९० अंक डायस्टॉविकच्यावर गेलं तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलावी.

ब्लडप्रेशर वाढणं हे तब्येतीला हानिकारक आहे. शरीरातील नसांवर अतिरिक्त दबाव पडल्याने हृदय, किडणी, मेंदू व डोळ्यांचा पडदा यावर हळूहळू परीणाम होऊ शकतो.

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपयुक्त औषधांशिवाय जीवनशैलीत बदल करायची गरज आहे. समतोल आहारत मीठाचा कमी वापर, नियमित व्यायाम व वजनावर नियंत्रण असायला हवं.

जर सकाळी उठल्यावर डोक्याचा मागचा भाग जड वाटत असेल तर ब्लडप्रेशर जास्त आहे असे मानावे व लगेच ब्लडप्रेशर मोजून घ्या. वाढलं असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी जर तुम्हाला औषधाचा डोस वाढवून दिला तर त्यात चालढकल करू नका. उलट लगेच सुरू करा. कधीकधी एखादं छोटंसं जास्तीचं औषध घ्यावं लागतं.

हिवाळ्यात काही लोकांचं ब्लडप्रेशर वाढतं कारण ते जेवणात अधिक मीठ वापरतात. त्यामुळे दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

ताजी फळं, पालेभाज्या भरपूर खा. शुद्ध दुधाऐवजी स्प्रेटा दुध प्या. जेवणात सॅचुरेटेड फॅट्स कमी करा.

काही रूग्णांमध्ये सकाळी सकाळी ब्लडप्रेशर जास्त आढळते. जर तुमचं असं असेल तर औषधांची वेळ बदलण्याची गरज आहे. काही औषधं सकाळी तर काही संध्याकाळी घेऊन ब्लडप्रेशर नियंत्रणात आणता येतं. याबाबतीत तुम्ही डॉक्टरांना विचारा.

तुमच्या कार्यशैलीतला बदल तुमचा ताण कमी करू शकेल. हसण्या खेळण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी वेळ येण्याची गरज आहे. शिवाय एकत्र व्यायाम, ध्यान, वगैरे हे ताण कमी करण्याचे उत्तम उपाय आहेत.

प्रश्न : माझं वय ४४ वर्षं आहे. मला मासिक पाळीच्या काही दिवस आधी स्तनांमध्ये जडत्त्व व वेदना जाणवतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आहे की काय असं वाटतं. माझ्या मावशीला हा रोग झाला होता. त्यामुळे लहान वयातच ती वारली. आता मी काय करायला हवं?

उत्तर : तुमची मावशी ब्रेस्ट कॅन्सरने गेली. त्यामुळे तुमच्या मनात भीतीचा आजाराप्रति असणं स्वाभाविक आहे. परंतु ज्याप्रकारे मासिक पाळीबरोबर स्तनांमध्ये होणारे बदल तुम्ही सांगता आहात, ते मला फायब्रोयडिनोसिस किंवा फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट डिसीज याची लक्षणं वाटतात. यात मासिकपाळीच्या ३-४ दिवस आधी वेदना सुरू होतात व स्त्राव सुरू झाल्यावर थांबतात. स्तनांच्या हालचालीबरोबर वेदना वाढतात. हे मासिकपाळीच्या चक्राबरोबर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे प्रेरीत होतं. त्याचा ब्रेस्ट कॅन्सरशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही.

वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही छोटेछोटे उपाय करू शकता. आधी तर दिवसभर २४ तास ब्रेसिअर घालून राहा. ज्यामुळे स्तनांना आधार मिळतो. तरीही    वेदना जाणवल्या तर एखादं सौम्य वेदनाशमक औषध उदा. पॅरासिटामोल, इबुप्रोफेन घ्या. तरीही फायदा झाला नाही तर एखाद्या सर्जनला भेटा. गरज असेल तर व्हिटॅमिन ई व हारर्मोनल औषधांनी बरं वाटेल.

तुमच्या मावशीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तुमचं याबाबतीत जागृत असणं चांगलं आहे. त्यामुळे दर महिन्याला तुम्ही तुमच्या ब्रेस्टची स्वयंतपासणी नियमितपणे करणं फारच उत्तम ठरेल. बेडवर झोपून किंवा आरशासमोर उभं राहून दोन्ही स्तनांमध्ये गाठ, त्वचेतील बदल व स्तनाग्रातील बदल यांचं निरिक्षण करा. थोडा जरी संशय आला तर ताबडतोब तपासणी करा. चालढकळ करू नका. वेळेत उपचार घेतल्याने कितीतरी केसेसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं मुळासकट निर्मुलन झालं आहे.

आपण वजन, आहार यांचा नेहमी समतोल ठेवा. लठ्ठपणा, जंकफूड, तळलेले पदार्थ, मांसाहार वगैरे ब्रेस्ट कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतात. तुमच्याकडे असा इतिहास आहे (मावशीचा) तुमच्या कुटुंबात आधीच हा रोग आहे त्यामुळे या रिस्कला अधिक वाढू न देणंच योग्य आहे.

सौंदर्य समस्या

* समाधान ब्यूटी एक्सपर्र्ट, पूजा साहनी

मी ४२ वर्षांची स्त्री आहे. मी माझ्या पांढऱ्या केसांमुळे खूप चिंतित आहे. खरं तर मी जो हेअरकलर वापरते, त्यामध्ये असलेल्या पीपीडीने मला एलर्जी होते. मी हर्बल मेंदीदेखील वापरून बघितली पण काहीच फायदा झाला नाही. कृपया मला हेअरकलर करण्याची अशी एखादी पद्धत सांगा जी नॉन एलर्जिक असावी किंवा पीपीडीरहित असावी?

तुम्ही हे सांगितलं नाही की हेअरकलर यूज केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची एलर्जी होते. सामान्यपणे अनेक लोकांना हेअर कलरमध्ये असलेल्या पीपीडीने घबराट, खाज, सूज यासारख्या समस्या होतात. याचा एकमेव उपाय हा आहे की तुम्ही अशा हेअर कलरचा वापर करा, ज्यामध्ये पीपीडी नसेल किंवा हेअर कलर वापरण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही एण्टीएलर्जिक औषध घ्या, म्हणजे तुम्हाला एलर्जी होणार नाही.

मी १८ वर्षांची तरुणी आहे. माझी त्वचा सावळट आहे. मला स्किन व्हाइटनिंग आणि गोरेपणाबद्दल जाणून घ्यायचं आहे जेणेकरून माझा रंग सुधारेल?

गोरेपणा किंवा सावळटपणा हे नैसर्गिक असतं. पण काही उपाय करून त्वचेचा रंग नितळवला जाऊ शकतो. त्वचेचा रंग नितळवण्यासाठी तुम्ही १० तुळशीची पानं वाटून त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिसळून १५ ते २० मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. असं सलग २० दिवस करा. तुम्हाला तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये जरूर फरक दिसेल. ब्यूटी ट्रीटमेंटबद्दल म्हणावं तर तुम्ही व्हाइटनिंग फेशियलही करून घेऊ शकता. घरगुती उपाय म्हणून तुम्ही दही किंवा कच्च्या बटाट्याचा रसही वापरू शकता. त्यानेदेखील तुमची त्वचा नितळेल.

मी २८ वर्षांची तरुणी आहे. माझ्या चेहऱ्याच्या त्वचेवर मुरमांमुळे डाग पडलेत. हे दूर करण्याचा उपाय सांगा?

मुरमांचे डाग कमी करण्यासाठी तुम्ही मेथीच्या पानांचा पॅक चेहऱ्यावर लावू शकता. जर मेथीची पानं नसतील तर मेथीचं बी उकळूनदेखील तुम्ही पॅक बनवू शकता. हा पॅक तुम्ही चेहऱ्यावर १५-२० मिनिटं लावून ठेवा, मग चेहरा धुवा. शिवाय जिथे जिथे मुरमांचे डाग आहेत तिथे लिंबाच्या रसामध्ये कापूस भिजवून तोपर्यंत त्वचेवर ठेवा जोपर्यंत लिंबाचा रस त्वचेमध्ये पूर्णपणे मुरत नाही. लिंबाचा रस एका नैसर्गिक ब्लीचचं काम करतं. याने मुरमांचे डाग कमी होण्यास मदत होईल.

मी १७ वर्षांची तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर मुरमांमुळे ओपन पोर्स झाले आहेत. ते बंद करण्याचा एखादा उपाय सांगा?

बाजारात ओपन पोर्सना घट्ट करण्यासाठी अनेक ओपन पोर्स रिड्यूसिंग लोशन मिळतात. तुम्ही हवं तर ते वापरू शकता. याशिवाय ओपन पोर्सना बंद करण्यासाठी तुम्ही दररोज टोनरचा वापर करा. शिवाय अंड्याचा मास्कही तुम्ही वापरू शकता. अंड्याचा मास्क तुमच्या त्वचेला टाइटनिंग इफेक्ट देईल.

मी २८ वर्षांची तरुणी आहे. उन्हात गेल्यावर घाम येऊन माझे केस चिकट होतात, त्यामुळे मी माझे केस मोकळे ठेवू शकत नाही. केसांचा चिकटपणा दूर करण्याचा उपाय सांगा?

उन्हात गेल्यावर गरमी आणि घामामुळे केस चिकट होत असतात. या समस्येपासून बचावण्यासाठी केस धुण्यासाठी अशा शाम्पूचा वापर करा ज्यामध्ये कमी प्रमाणात मॉश्चरायझर असेल. जास्त मॉश्चरायझारयुक्त शाम्पूमुळे केस लवकरच तेलकट आणि चिकट होतात. याशिवाय केस धुण्यासाठी थंड पाण्याचाच वापर करा. स्काल्पवर कंडीशरनचा वापर करू नका आणि केस सुकल्याशिवाय बांधू नका.

मी २२ वर्षांची तरुणी असून माझी त्वचा खूपच संवेदनशील आहे. जरासं उन्हात गेले किंवा हवामान बदलताच त्याचा परिणाम माझ्या चेहऱ्यावर दिसू लागतो. काही कारण नसताना माझ्या त्वचेवर खाज आणि कंड सुटू लागतो. मी माझ्या त्वचेची काळजी कशी घेऊ?

ही समस्या स्वच्छतेची कमी, प्रदूषण, स्टेस आणि हार्मोनल बदल इत्यादीमुळेही होऊ शकते. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापूर्वी ती पूर्णपणे तपासून घ्यावी. उन्हात बाहेर निघताना सनस्क्रीन लोशन वापरावं. नॅचरल प्रसाधनांचा वापर करावा.

मी १८ वर्षांची तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर फिकट काळ्या रंगाचे डाग झाले आहेत. शिवाय डोळ्यांखाली काळी वर्तुळंही झाली आहेत. मी अनेक प्रकारच्या फेशियल क्रीम्स आणि फेसवॉशचाही वापर केला, पण काहीच फरक दिसत नाहीए. कृपया एखादा उपाय सांगा, ज्याने हे डाग आणि काळी वर्तुळं दूर होतील?

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी कडुलिंब आणि तुळशीची पानं उकळून घ्या. मग त्या पाण्यामध्ये मुलतानी माती मिसळून फेसवॉश पॅक बनवा आणि चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुऊन काढा. हा उपाय आठवड्यातून एकदा करा. काळ्या वर्तुळांबाबत म्हणावं तर त्यासाठी भरपूर झोप घ्या. झोपतेवेळी डोळ्यांखाली बदामाचं तेल लावा आणि हळुवारपणे मालीश करा.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्हाला भाऊ नाहीए. माझं आणि माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आहे. माझ्या बहिणीच्या सासरचे लोक तिला खूपच त्रास देतात. आईबाबांच्या घरी जाणं तर दूर, ते तिला त्यांना फोनही करू देत नाहीत. पोलिसांत तक्रार केली पण ते तिथे माझ्या बहिणीवर आणि माझ्या पतीच्या चारित्र्यावर दोष लावून साफ बचावले. तुम्हीच सांगा, मी माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांच्या त्रासापासून कसं वाचवू?

तुम्ही हे स्पष्ट सांगितलं नाहीए की तुमच्या बहिणीच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या माहेरच्या लोकांना भेटायला बंधन का घातलं आहे? पण कारण काही असो, अशाप्रकारे कोणाला बंधक बनवून ठेवणं अयोग्य आहे. कोणत्याही प्रकारचा अत्याचार आणि घरगुती अत्याचाराच्या विरुद्ध सरकारही सक्त आहे. तुमच्या बहिणीची जर पोलिसांनी मदत केली नसेल तर तुम्ही वुमन सेल, महिला कल्याण समिती किंवा अशाच एखाद्या समाजसेवी संस्थेची मदत घेऊ शकता. ते लोक तुमच्या बहिणीच्या सासरच्या लोकांशी भेटून चर्चा करतील आणि तुमच्या बहिणीला न्याय मिळवू देतील.

  • मी २७ वर्षांची तरुणी आहे. मला आईवडील नाहीत. धाकटा भाऊ आहे आणि एक विवाहित बहीण आहे. माझ्या भावोजींनी माझ्या भावाजवळ माझ्यासाठी एक स्थळ आणलं. मुलगा सरकारी नोकरी करतो. कुटुंबही समृद्ध आहे. बाहेरून तर सगळं काही व्यवस्थित वाटलं. भाऊ आणि भावोजींनी जाऊन लग्नासाठी होकारही दिला आणि दोन महिन्यांनी साखरपुड्याची तारीख ठरवली. तत्पूर्वी भावाने मुलाच्या कुटुंबियांबद्दल माहिती काढली तेव्हा कळलं की मुलाच्या मोठ्या भावाचा अपराधिक भूतकाळ होता. त्याने तुरुंगवासही भोगला आहे. माझ्या भावाने भावोजींना सांगितलं की त्यांनी या लग्नाला नकार द्यावा. तेव्हा ते माझ्या भावाला खूप बडबडले. आम्हाला भीती वाटत आहे की या गोष्टीवरून माझ्या भावोजींनी बहिणीला त्रास देऊ नये. हा विचार करून करून मी खूपच चिंतित आहे. तुम्हीच सांगा. मी काय करू?

लग्नसंबंधामुळे फक्त दोन माणसांचं नव्हे, तर २ कुटुंबांचं नातं जुळतं. म्हणूनच नातं ठरवताना कुटुंबाकडेही पाहिलं जातं. तुमच्या भावाने जर अशा कुटुंबात तुमचं लग्न करून द्यायला नकार दिला आहे, जिथला एक सदस्य गुन्हेगारी जगताशी जोडलेला आहे, तर यात तुमच्या भावोजींनी नाराज व्हायला नकोए. त्यांनी या गोष्टीला विनाकारण आपल्या अहंकाराशी जोडलं आहे. तुमची बहीण त्यांना प्रेमाने समजावू शकते की तिच्या बहिणीला आईवडिलांचा आधार नाहीए. भविष्यात काही अघटित घडू नये म्हणून जास्त काळजीची गरज आहे. म्हणून त्यांनी विनाकारण नाराज होऊ नये.

  • मी २२ वर्षांची तरुणी आहे. एका मुलावर मी प्रेम करायचे. त्याने मला लग्नाचं वचन दिलं होतं. म्हणून आम्ही प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आमच्यामध्ये शारीरिकसंबंधही होते, पण वर्षभरापूर्वी तो माझी फसवणूक करून निघून गेला. आता माझे कुटुंबीय माझ्या लग्नासाठी स्थळ शोधत आहेत. मी फारच द्विधावस्थेत आहे. कसलाच निर्णय घेऊ शकत नाहीए. कृपया मला सांगा की, लग्न ठरवण्यापूर्वी मी मुलाला हे सांगू का, की माझे एका मुलाबरोबर शारीरिकसंबंध होते. कारण मी त्याला हे सांगितलं नाही, तरी ही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला कळेलच. जर लग्नानंतर त्याला ही गोष्ट कळली आणि त्याने मला अपमानित करून सोडलं तर परिस्थिती आणखीनच वाईट होईल. यापेक्षा चांगलं तर हे आहे की मी आधीच ही गोष्ट सांगून टाकू. त्यानंतर त्याला नातं ठेवायचं आहे की नाही हे त्याच्यावर अवलंबून राहील. विनाकारण मला घाबरून तर राहावं लागणार नाही?

कोणत्याही मुलाला हे कळलं की लग्नाआधी मुलीचे कोणाबरोबर तरी शारीरिकसंबंध होते तर तो तिच्याशी कधीच लग्न करणार नाही. लोक कितीही आधुनिक आणि मॉडर्न व स्वतंत्र विचारांचे असल्याचा दावा करत असले तरी पत्नी म्हणून त्यांना सतीसावित्रीच हवी असते. म्हणून तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका. लग्नाच्या आधीही नाही आणि लग्नानंतरही. जोपर्यंत तुम्ही स्वत: सांगणार नाही तोपर्यंत हे कोणीच जाणू शकणार नाही की तुमचे लग्नापूर्वी कोणाशी शारीरिकसंबंध होते.

  • मी ३० वर्षांची विवाहित स्त्री आहे. मी माझ्या एका वैयक्तिक समस्येने खूप त्रस्त आहे. कोणालाही ती समस्या सांगू शकत नाही. खरंतर माझी गुप्तांग खूपच सैल झालं आहे, ज्यामुळे माझ्या पतींना सहवास करताना आनंदाचा अनुभव घेता येत नाही. यामुळे ते चिडतात आणि मग अनेक दिवस माझ्यापासून तुटक वागतात. सहवासही करत नाहीत. कृपया असा एखादा उपाय सांगा, ज्याने माझ्या गुप्तांगाला पूर्वीसारखा घट्टपणा येईल आणि पतींनाही सहवास करताना आनंद वाटेल?

तुमची समस्या काही वेगळी नाहीए. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या गुप्तांगाला लग्नाच्या काही वर्षांनी सैलपणा येतो त्यामुळे पूर्वीसारखा घट्टपणा कायम राहाणं शक्य नाही. असं असूनदेखील दाम्पत्य सहवासाचा पूर्ण आनंद घेतात. तुमच्या पतीनेही कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न बाळता परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे. पण तरीदेखील जर ते संतुष्ट होत नसतील तर तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाची भेट घेऊन आपल्या गुप्तांगाला २-३ टाके घालून ते आकुंचित करण्याची छोटीशी शस्त्रक्रिया करवून घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

*गृहशोभिका टीम

  • मी २७ वर्षीय विवाहित महिला आहे. माझे लग्न १० महिन्यांपूर्वी झाले आहे. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात, पण मी त्यांना सेक्सच्या बाबतीत संपूर्णपणे समाधानी करू शकत नाही. कारण आहे माझ्या व्हजायनल मसल्स गरजेपेक्षा जास्त आकुंचित म्हणजे जास्त टाईट आहेत. सेक्स संबंध करताना या कारणामुळे मी माझ्या पतिला साथ देऊ शकत नाही. या दरम्यान मला अत्यंत वेदना होतात. पतिच्या आग्रहाला मी नाकारूही शकत नाही. पण सेक्स करण्याच्या नावाने माझे हात पाय गळतात आणि टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करते. यामुळे माझे पती नाराज राहू लागले आहेत. सांगा मी काय करू?

आधी तर तुम्हाला तुमच्या मनात सेक्सबद्दल बसलेली भीती काढावी लागेल, कारण ही निसर्गाने दिलेली देणगी आहे जी वैवाहिक जीवनातील ऊब कायम ठेवते.

दुसरे, व्हजायनल मसल्स गरजेपेक्षा जास्त टाईट असणे फार गंभीर समस्या नाहीए, शिवाय लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसांमधील ही एक सामान्य समस्या असू शकते किंवा मनात बसलेल्या भीतिमुळे तुम्ही व्हजायना संकुचित करत असाल.

त्यापेक्षा सेक्स करण्याअगोदर फोरप्ले करणं अधिक योग्य ठरेल आणि याचा वेळ सुरूवातीला एवढा जास्त असावा की तुम्ही सेक्ससाठी पूर्णत: तयार व्हाल. हे आणखी इंटरेस्टिंग व्हावे यासाठी पतिला सांगा की त्याने ल्युब्रिकंट वा चिकट तेलाचा वापर करावा.

बाजारात आजकाल व्हजायनल मोल्ड्ससुद्धा उपलब्ध आहेत, ज्याच्या वापराने सेक्सक्रिया आणखी आनंदी केली जाऊ शकते. पतिला सेक्स संबंधांच्या काळात पेनिट्रेशन स्लो ठेवायला सांगा. हळूहळू तुम्हालासुद्धा याचा आनंद घेता येईल आणि तुम्ही मोकळेपणाने आनंद उपभोगाल. या शिवाय जर समस्या जशीच्या तशी राहिली तर एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाला भेटा.

  • मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. लग्नाला २ वर्ष झाली आहेत. सासरी कशाची कमी नाही. पती सरकारी नोकरी करतात आणि उच्चपदस्थ आहेत. ते स्कूल टॉपर विद्यार्थी होतेच शिवाय कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतसुद्धा टॉपर होते. आपल्या कार्यालयातसुद्धा त्यांच्या कामाला कोणी नावं ठेवत नाहीत. पण समस्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील आहे आणि अशी आहे की जी आजवर केवळ माझ्या आईला आणि सासूला माहीत आहे. खरेतर, पती सेक्स संबंध ठेवताना हिंसक बनतात. ते मला त्यांच्यासोबत पॉर्न मुव्ही बघायला सांगतात आणि मग सेक्स करतात. यादरम्यान ते माझ्या कोमल अवयवांना जोरजोरात घर्षण करतात आणि त्यावर दातसुद्धा रुतवतात. कधीकधी तर माझ्या ब्रेस्टमधून रक्तसुद्धा निघू लागते. अशा असह्य वेदना सहन केल्यावर माझ्याच्याने अंथरुणातून उठणेसुद्धा होत नाही. माझे पती माझी ही अवस्था पाहून खेद व्यक्त करतात आणि सारखे क्षमा मागत राहतात. कधीकधी वाटते की आत्महत्या करावी. खरेतर माझे पती माझी गरजेपेक्षा काळजी करतात आणि माझे त्यांच्यापासून दूर राहणे त्यांना इतके खटकते की ते माझ्याविना एक क्षणही राहू शकत नाही.

जर पती केवळ मानसिक त्रास देत असते आणि प्रेम केले नसते तर मी त्यांना केव्हाच घटस्फोट दिला असता पण वाटते की कदाचित ते एखाद्या मानसिक रोगाने ग्रासले आहेत. आणि असा विचार करूनच मी पतिला सोडू शकत नाही. मी माझ्या सासूला, ज्या मला आपल्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात, हे सगळे सांगितले तर त्या गप्प बसल्या. त्या केवळ एवढेच म्हणाल्या की हळूहळू सगळे नीट होईल. इकडे आईला सांगितले तेव्हा ती संतापली आणि सर्वाना एकत्र बसवून ती यावर चर्चा करू इच्छित होती. अजून हे माझाया बाबांना माहीत नाही, कारण मला माहीत आहे की ते या मुद्द्यावर गप्प बसणार नाहीत. पती, सासर आणि माहेर हे नाते क्षणात संपू शकते. काहीच समजत नाही की काय करू? कृपया सल्ला द्या?

तुमची समस्या पाहाता असे वाटते की तुमच्या पतिला सेक्शुअल सॅडिज्म हा मनोविकार आहे. असा मनोरुग्ण सामान्य जीवनात तर नॉर्मल राहतो, अशांच्या वर्तनावर कोणालाच संशय येत नाही, पण सेक्स करताना ते लोक हिंसक होतात आणि दुसऱ्याला चावणे, बोचकारणे, संवेदनशील अवयवांवर प्रहार करणे, वेगात सेक्स करणे अशा पीडा देण्यात त्यांना आनंद वाटतो. कधीकधी असे मनोरुग्ण जोडीदाराला इतक्या वेदना देतात की या संबंधांना पूर्णविराम मिळतो. तसे आपल्या अशा वर्तनाचा नंतर त्यांना पश्चातापसुद्धा होतो आणि अशी चूक परत न करण्याचे वचनसुद्धा देतात, पण परत सेक्स करताना सगळे विसरून जातात.

तुमच्याबाबतीतसुद्धा असेच झाले आहे आणि तुम्ही हे चांगले केले की हे सगळे आपल्या आईला आणि सासूला सांगितले आहे.

अशा मनोरुग्णांना भावनिक आधाराची गरज असते. रोजचे व्यवहार करताना तुमच्या पतिसोबत बोला. पतिसोबत जास्तीतजास्त वेळ घालवा, एकत्र फिरायला जा, शॉपिंग करा, चांगले साहित्य वाचायला प्रोत्साहन द्या.

एखाद्या चांगल्या सेक्शुअल सॅडिज्मच्या तज्ज्ञांकडे उपचारासाठी घेऊन जा, तरीही आशेचा काही किरण दिसत नसेल तर पतिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करा.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • माझे पती नुकतेच त्यांच्या अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. मला दोन मुले आहेत, जी विवाहित जीवन जगतात आणि दुसऱ्या शहरात राहतात. माझे पती नोकरीतून सेवानिवृत्त झाले तेव्हा वाटले की आता उर्वरित आयुष्य शांततेत व्यतित करू. पण माझ्या पतिच्या बदललेल्या वागण्याने मला आश्चर्य वाटले. खरं तर पती महिन्यात २-४ दिवस दुसऱ्या शहरात जातात आणि तेथे कॉलगर्लसमवेत वेळ घालवतात. हे सर्व मला त्यांच्या मोबाइलवरून कळाले आहे. दुसरी मोठी समस्या म्हणजे घरात होणाऱ्या पार्ट्यांची, ज्यात खाण्या-पिण्याबरोबर भरपूर मद्यपान चालते आणि आसपास राहणाऱ्या नणंदासुद्धा पार्टीत सामील होण्यासाठी येतात. कधीकधी असे वाटते की मी माझ्या मुलांना ही सर्व माहिती द्यायला हवी, परंतु नंतर असा विचार करून देत नाही की आपल्या वडिलांचा हा घृणित चेहरा पाहिल्यानंतर वडील आणि मुलांमधील नातेसंबंध बिघडतील. मी माझ्या पतिला पुष्कळ वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु उत्तर हेच मिळते की मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सर्वासाठी घालवले आहे, आता मी फक्त माझ्यासाठी जगेन. पतिला कशाप्रकारे योग्य मार्गावर आणता येईल यासाठी मला कोणताही मार्ग दिसत नाही. कृपया मला सांगा, मी काय करू?

वाढत्या वयानुसार इच्छा किंवा शारीरिक आवश्यकता कमी होत नाहीत. हे चांगले आहे की आपली मुले आपल्या पायावर उभी आहेत आणि चांगले आयुष्य व्यतित करत आहेत, तेव्हा आपल्याकडेसुद्धा जुन्या आठवणींना मुक्तपणे ताजेतवाने करण्यास आणि आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यासदेखील वेळ असेल.

स्वत:ला वृद्ध न मानता काळाबरोबर चला. साजश्रृंगार करा, आपल्या पतीबरोबर चित्रपट पाहा, मॉलमध्ये जा, खरेदी करा, जेणेकरून आपल्यालासुद्धा आपल्या पतिची जवळीक आवडेल.

जर पतिमध्ये थोडा बदल झाला तर त्यांना प्रेमाने समजावू शकता. आपण आपल्या नणंदानाही असे सांगू शकता की जेव्हा त्या दारू इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहतील तेव्हाच त्यांचे घरी स्वागत होईल. आपणसुद्धा त्यांच्या पार्टीत सामील झालात तर बरे होईल, पण दारूची फेरी होणार नाही या अटीवर.

असे असूनही जर पती आणि नणंदा योग्य मार्गावर येताना दिसत नसतील तर आपण कठोरपणे वागू शकता. जर आपण गोष्टी बिघडत असल्याचे पाहिले तर आपण सर्व काही मुलांसोबत शेअर करू शकता.

तसही, या वयात विवाहित पुरुष किंवा स्त्री या दोघांनाही एकमेकांची जास्त गरज असते, कारण या वयात येईपर्यंत मुलेही स्थायिक होतात आणि आपापले स्वत:चे कुटुंब आणि करिअर बनविण्यात व्यस्त होतात. जर आपण आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ राहिलात तर त्यांनादेखील आपले पाठबळ मिळेल आणि शक्य आहे की ते योग्य मार्गावर येतील.

  • मी एक ३६ वर्षीय महिला आणि ९ वर्षाच्या मुलीची आई आहे. ५ वर्षांपूर्वी पतिचा एका अपघातात मृत्यू झाला. माहेर आणि सासरचे लोकसुद्धा दुसरे लग्न करण्यावर ठाम आहेत, पण नवऱ्याचा चेहरा माझ्या मनातून उतरत नाही. माझ्या माहेर आणि सासरच्यांना एक मुलगा आवडला आहे. मुलगा विनाअट लग्न करण्यासदेखील तयार आहे. मी काय करू?

आयुष्य एखाद्याच्या आठवणी आणि विश्वासाने चालत नाही किंवा थांबत नाही. तुमची मुलगी अजून लहान आहे. उद्या मुलीचे लग्न होईल आणि तीही आपल्या कुटुंबात आनंदी असेल.

आपल्याकडे आता वेळ आहे. म्हणूनच दुसरे लग्न करण्यात काहीही चूक नाही. आपल्या मुलीला योग्यप्रकारे प्रशिक्षण देण्याची आणि तिचे लग्न करण्याची जबाबदारी आपण वेळेवर तेव्हाच पार पाडू शकता, जेव्हा आपल्या घर संसाराचा जम बसला असेल. आपली इच्छा असल्यास मुलीच्या पालन-पोषणासाठी आपण भावी पतिशी आधीच चर्चा करू शकता.

  • मी २६ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. ऑफिसचे वातावरण ठीक आहे, पण मी माझ्या एका सहकाऱ्यावर नाराज आहे. खरंतर तो दिवस-रात्र व्हॉट्सअॅपवर मला मेसेज पाठवत राहतो. तो उत्तर देण्यासदेखील सांगतो, परंतु मला चिड येते. एकतर वेळेचा अभाव आणि दुसरे म्हणजे कामाचा भार. वास्तविक, त्याचे संदेश मर्यादेच्या बाहेर नसले तरी वारंवार संदेशांमुळे मी अस्वस्थ होते. माझे लक्षदेखील कामापासून विचलित होते. माझी अशी इच्छा नाही की त्या सहकाऱ्यामुळे माझ्या कार्यालयीन वागणूकीवर परिणाम व्हावा, परंतु त्याचबरोबर त्याने मला असा त्रास देऊ नये अशीही माझी इच्छा आहे. सांगा, मी काय करू?

आपल्याला त्या सहकाऱ्याचे व्हॉट्सअॅप करणे आवडत नसल्यास आपण त्यास थेट नकार देऊ शकता. आपण असे म्हणू शकता की जर संदेश कामाशी संबंधित असेल तर ठीक आहे अन्यथा व्यर्थचे व्हॉट्सअॅप मेसेज करू नका. आपण त्याला असे देखील सांगू शकता की ऑफिसच्या वेळेस व्हॉट्सअॅपवर टाईमपास करून आपली प्रतिमा बिगडेल आणि जेव्हा ही गोष्ट बॉसपर्यंत पोहोचेल तेव्हा प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकेल.

तसेच त्याने पाठविलेल्या सततच्या व्हॉट्सअॅप संदेशाकडे दुर्लक्ष करा आणि कुठलाही प्रतिसाद देऊ नका. त्यानंतर काही दिवसांनी तो स्वत:च व्हॉट्सअॅप करणे बंद करेल. अशाने सापदेखील मरेल आणि काठीही तुटणार नाही.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • माझ् ?या हाताच्या वरच्या भागावर लाल रंगाचे लहान लहान फोड आले आहेत. वास्तविक पहाता मला यामुळे खाज अथवा वेदना होत नाही. पण यामुळे मी बिनबाह्यांचे ड्रेस घालू शकत नाही. हे नाहीसे करायला एखादा उपाय सांगा?

त्वचेवर लाल रंगाचे लहान फोड म्हणजे बंप्स होण्याची समस्या ज्याला केराटोटिस पाइलेरिस म्हटले जाते. जवळपास ५० टक्के माणसं या व्याधीने पीडित असतात. बंप्स सामान्यत: लाल आणि पांढऱ्या रंगाचे मुरमांप्रमाणे  दिसतात. प्रत्यक्षात हे इतर काही नसून, मृत त्वचा असते. ज्यात त्वचेवरील केस व्यत्यय आणू शकतात. हे केवळ तुमच्या हातावरच नाही तर पार्श्वभागावर आणि जांघांच्या मागेसुद्धा येऊ शकतात. यातून सुटका मिळवायला तुम्ही दिवसातून दोनदा उत्तम मॉइश्चराइजरचा वापर करा. तुम्ही सेलीसिलिक आणि अल्फा हायड्रॉक्सी निवडू शकता. ए जीवनसत्वयुक्त क्रीमने त्वचेच्या पेशींची स्थिती चांगली होते. एक्सफॉलिएशनमुळे मृत त्वचा पेशीत लक्षणीय घट होते. एक्सफॉलिएटिंग स्क्रबचासुद्धा वापर करू शकता. लक्षात ठेवा की कोणतेही क्रीम लावण्याआधी त्वचाविकार तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. उत्तम परिणाम दिसावे यासाठी या गोष्टींचा वापर नियमित करा.

  • माझा चेहरा सतत धुवूनही चिपचिपा दिसतो. मी चेहऱ्याला कोणतेही क्रीम लावत नाही, पण बघताना असं वाटते  की मी अनेक क्रीमचे थर चेहऱ्यावर थापते. कृपया एखादा उपाय सांगा?

तुमची त्वचा अतिशय तेलकट आहे आणि अशी त्वचा असणारे लोक आपल्या त्वचेमुळे  वैतागलेले असतात. पण जांभूळ ऑयली त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. हे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यात सहाय्यक असते. म्हणून आपल्या त्वचेवर जांभळाचा फेसपॅक लावू शकता. ऑयली त्वचेसाठी जांभळाचा फेस पॅक बनवण्यासाठी याचा गर काढून एका बाउलमध्ये ठेवा. आता नंतर यात एक चमचा आवळयाचा रस आणि एक चमचा गुलाबजल मिसळा. यानंतर हे मिश्रण नीट एकत्र करा आणि घट्ट पेस्ट तयार झाली की हे आपल्या चेहऱ्यावर लावा. २०-३० मिनिटांनी चेहरा धुवा.

  • माझे वय २० वर्ष आहे. माझे केस खूपच ऑयली आहेत. यामुळे जवळपास रोजच मला हे धुवावे लागतात. पण आता माझ्या केसात कोंडासुद्धा होऊ लागला आहे. मी काय करू जेणेकरून माझा त्रास दूर होईल?

तुम्ही झेंडूच्या फुलांचे हेअर टॉनिक वापरा. झेंडूच्या फुलात फायटोकॉन्स्टिट्यूंट्स असतात, जे कोंडा नाहीसा करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय हे केसांना चिकट होण्यापासून सुरक्षित ठेवते. ऑयली केस असणाऱ्या व्यक्तींसाठी झेंडूचे फुल हा फारच छान घरगुती उपाय आहे. हे वापरण्याकरिता झेंडूची सुकलेली फुलं कोमट पाण्यात उकळत ठेवा. हे पाणी गाळून घेत चोथ्यापासून वेगळे करा आणि शाम्पू केल्यावर एकदा या पाण्याने आपले केस धुवा. कोंडा निघून जाईल.

  • माझी त्वचा ऑइली आहे. मला असे वाटते की ऑयली त्वचेला मॉइश्चराइजर केल्यास ती अजूनच चिपचीपी बनेल. ऑयली त्वचेला मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे का?

हो, ऑयली त्वचेलासुद्धा मॉइश्चराइज करावे लागते. तुम्ही संत्र्यांचा रस आणि कोरफडीचा गर यापासून बनवलेला हायडे्रटिंग फेस मास्क लावू शकता, जो ऑयली त्वचेतील अतिरिक्त सिबम शोषण्यासाठी सक्षम असतो आणि त्वचेला तजेलदार बनवतो. यासाठी सर्वात आधी १ मोठा चमचा संत्र्याचा रस आणि १ चमचा कोरफडीचा गर घ्या. दोन्ही एका वाटीत एकत्र मिसळा. हे चेहऱ्यावर लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ करा आणि स्वच्छ हाताने ही पेस्ट लावा. डोळयांपाशी लावू नका नाहीतर जळजळ होऊ शकते. साधारण २० मिनिट पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

  • माझं वय ३० वर्ष आहे. माझ्या चेहऱ्यावरचे त्वचाछिद्र आत्तापासूनच मोठे दिसू लागेल आहेत. मी काय करू की माझ्या चेहऱ्यावरील त्वचाछिद्र बंद होतील. आणि माझी त्वचा पूर्वीसारखी होईल?

कोरफड चेहऱ्याला मॉइश्चराइज करते आणि मोठया त्वचाछिद्रांना संकुचित करते. कोरफडीच्या पानाच्या आत असलेला गर चेहऱ्याला उत्तम पोषण देतो आणि चेहऱ्यावर जमलेले तेल आणि मळ नाहीसे करतो, ज्यामुळे त्वचाछिद्रांवर आकुंचन पावतात. आपल्या चेहऱ्यावरील पोअर्सवर कोरफडीचा थोडा गर लावून थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर १० मिनिट तसेच ठेवा. मग थंड पाण्याने चेहरा धुवा.

  • माझे वय २५ वर्ष आहे. माझ्या कपाळावर आत्तापासूनच सुरकुत्या आल्या आहेत, ज्या खूपच वाईट दिसतात. या नाहीशा करायला एखादा घरगुती उपाय आहे का?

वयाआगोदर जर तुमच्या कपाळावर सुरकुत्या आल्या असतील तर, जवसाचे तेल हा खूप चांगला आणि तात्पुरता आणि घरगुती उपाय आहे. यात तुम्हाला जवसाच्या तेलाने मालिश करायचे नाही, तर १ चमचा जवसाचे तेल दिवसातून ३-४ वेळा प्यायचे आहे. हे त्वचेच्या बाहेरील थरांना वर आणतात, ज्यामुळे कपाळाच्या सुरकुत्या आणि रेषा कमी होतात.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २७ वर्षांची तरुणी आहे. माझा विवाह ८ महिन्यांपूर्वी झाला आहे. मी आपल्या पतिला अजिबात पसंत करत नाही. ते एक उच्च अधिकाऱ्याच्या हुद्दयावर आहेत आणि स्वभावाने सरळही आहेत. मी मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करते. मुंबईत राहत असतानाच मागच्या ४ वर्षांपासून आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही एकाच फ्लॅटमध्ये बरोबर राहत होतो. बॉयफ्रेंड बंगालचा निवासी आहे. तर मी उत्तराखंडची राहणारी आहे.

आमच्या संबंधाबद्दल माझ्या पॅरेंट्सना माहिती होती. परंतु त्यांना हे स्थळ मंजूर नव्हते. बॉयफ्रेंड लग्नासाठी तयार होता. त्याच्या घरच्यांचाही विरोध नव्हता. पण माझे घरचे आग्रह करून मला सोबत घेऊन गेले आणि लग्नाचा दबाव टाकू लागले. या दरम्यान त्यांनी मला तयार करण्यासाठी जात-धर्म व सामाजिक बदनामीची भीतीही दाखवली. तरीही मी तयार झाले नाही.

एके दिवशी माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला हॉस्पिटलला अॅडमिट करण्यापर्यंत वेळ आली. घर-कुटुंब, मामा-मामी आणि त्याचबरोबर माझी एक टीचर, जिचा मी खूप सन्मान करते अशा सर्वांकडूनच माझ्यावर दबाव आणला गेला. मी आतून खचले आणि विवाहासाठी हो म्हटले. पती मोकळया मनाचे व विचारांचे वाटले. मी त्यांच्याबरोबर देहरादूनला गेले. जेथे त्यांची पोस्टिंग होती. परंतु रात्रं-दिवस बॉयफ्रेंडच्या आठवणीत गुंतून राहायची. नोकरीचे निमित्त करून नंतर मी मुंबईला येऊ लागले आणि पुन्हा बॉयफ्रेंडबरोबर राहू लागले. बॉयफ्रेंड खूप रडला आणि पतिकडून डिवोर्स घेण्यासाठी जोर देऊ लागला. मी त्याला सांगितले की मी पतिबरोबर सेक्स संबंध ठेवले आहेत, तरीही तो म्हणतो की त्याचा काही आक्षेप नाही आहे आणि तो मला जीवनभर प्रेम करत राहणार. त्याच्या दबावात येऊन मी एके दिवशी पतिला फोनवर सर्व सत्य खरं-खरं सांगितले.

ते काही वेळ तर शांत राहिले, नंतर म्हणाले की तुझे आपले जीवन आहे. तू ज्याच्याबरोबर राहू इच्छिते, राहा. पण मी डिवोर्स देणार नाही आणि तू स्वत: माझ्याकडे परत येशील याची वाट बघेन. मी पतिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी  ऐकले नाही आणि म्हणत राहिले की तू नाही तर कोणीच नाही.

इकडे बॉयफ्रेंडपासून दूर जाण्याची गोष्ट ऐकूनच तो त्रासून जातो आणि कुठल्याही परिस्थितीत साथ न सोडण्याच्या जिद्दीवर अडून बसला आहे. मी खूप अडचणीत आहे. काय करावं ते कळत नाहीए. कृपा करून सल्ला द्या?

आपण आपल्या घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या शिकार झाल्या आहात, यात काही संशय नाही. जात-धर्म व सामाजिक बदनामीची भीती दाखवून त्यांनी तुम्हाला नाईलाजास्तव लग्न करण्यास तयार केले. ही त्यांची चूक आहे.

दुसरीकडे जर तुम्ही आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये एवढया पुढे निघून गेल्या होतात तर आपणही हे लग्न करायला नको होते. आपण व आपला बॉयफ्रेंड दोघे आपल्या स्वत:च्या पायावर उभे होतात आणि सज्ञान होतात. घरचे मानत नव्हते तर आपण कोर्ट मॅरेज करू शकत होतात. नंतर त्यांनी या नात्याला स्वीकारलेच असते.

आता जर तुमचे लग्न झालेच आहे आणि जसे की आपण सांगितले की तुमचे पती मोकळया मनाचे आहेत तर तुम्ही आपल्या पतिबरोबरच राहायला हवे. सद्यस्थितीत बॉयफ्रेंडबरोबरचे नाते बेकायदेशीर मानले जाईल. बरे झाले असते जर आपण बॉयफ्रेंडबरोबरचे नाते पतिला सांगितले नसते आणि सगळे विसरून नवीन जीवनाची चांगल्या पद्धतीने सुरुवात केली असती. आता जर आपण आपल्या पतिला सर्व काही खरे सांगून टाकले आहे आणि असे असूनही ते आपली साथ देण्यासाठी तयार आहेत तर स्पष्ट आहे की ते खरेच मोकळया मनाचे पुरुष आहेत. जे विवाहरूपी संस्थेला कमकुवत होऊ देऊ इच्छित नाहीत. डिवोर्सनंतर त्यांच्यावरसुद्धा दोष ठेवला जाईल, हे ते जाणत असतील.

पती चांगले कमावणारे आहेत, उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि आपणास हृदयापासून स्वीकारताहेत तर चांगले होईल, आपण आपल्या पतिकडे परत जावे आणि या बेकायदेशीर नात्याला पूर्णविराम लावावा.

  • मी २५ वर्षीय महिला आहे. नुकतेच लग्न झाले आहे. पती घरातील एकुलते एक अपत्य आहेत आणि सरकारी बँकेत कामाला आहेत. घर सर्व सुखसोयीनीं युक्त आहे. पण सगळयात मोठी अडचण सासूबाईंची आहे. त्यांनी माझ्या आधुनिक कपडे घालणे, टीव्ही बघणे, मोबाईलवर गप्पा मारणे आणि एवढेच नाहीतर माझ्या झोपण्यावरसुद्धा बंदी घातली, जे मला खूप बोचतेय, सांगा मी काय करू?

आपण घरातील एकुलत्या एक सुनबाई आहात. तेव्हा स्पष्ट आहे की पुढे जाऊन आपणास मोठया जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. ही गोष्ट आपल्या सासुबाई चांगल्याप्रकारे जाणून आहेत. म्हणून त्यांची इच्छा असेल की तुम्ही लवकरच आपली जबाबदारी ओळखून घर सांभाळावे. खूप बरे होईल की सासरच्या सर्वांना विश्वासात घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. सासूला आईसारखे समजून, मान-सन्मान द्याल तर लवकरच त्यासुद्धा आपल्याशी मिळून मिसळून राहतील आणि तेव्हा त्या स्वत: आपणास आधुनिक कपडे घालण्यास प्रेरित करतील.

घराचे कामकाज आटपून टीव्ही बघण्यास सासूबाईंचाही काही आक्षेप नसणार. चांगले हे होईल की आपण सासूबाईंबरोबर जास्तीत-जास्त वेळ घालवा, एकसाथ शॉपिंग करायला जा, घरातील जबाबदारी ओळखा, मग बघा आपण दोघी एकत्र एकमेकांच्या पूरक व्हाल.

सौंदर्य समस्या

– परमजीत सोई, ब्यूटी एक्सपर्ट

  • मी २० वर्षीय तरुणी आहे. चेहऱ्यावर व वरच्या ओठांवर लव आहे. वॅक्स केल्यानंतर डाग राहातात. हे हटविण्याचा उपाय सांगा?

अपरलिप्स व चेहऱ्यावरची लव व डाग हटविण्यासाठी हळदीची घट्ट पेस्ट बनवा व त्यामध्ये लिंबाचा रस एकत्रित करून त्या जागी लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवा. असं ४-५ आठवडे सतत करा. हळूहळू डाग व लव विरळ होतील.

मी ३० वर्षीय महिला आहे. माझ्या समस्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांबद्दल आहे. ते दूर करण्याचा उपाय सांगा?

डोळ्यांखालची काळी वर्तुळं कम्प्युटर स्क्रीनसमोर अधिक वेळ बसल्याने व झोप पूर्ण न होण्यामुळेदेखील होऊ शकतात. ते काढण्यासाठी झोपतेवेळी डोळ्यांच्या आजूबाजूला बदाम तेल वा अंडर आय जेल लावा. फायदा होईल. यासोबत पौष्टिक आहारदेखील घ्या.

  • मी १७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर खूपच पिंपल्स आहेत आणि त्याचे डागदेखील पडले आहेत; ज्यामुळे चेहरा खूपच कुरूप दिसतो. मी खूप उपाय केलेत परंतु काहीच फरक पडला नाही. कृपया, मला ही समस्या दूर करण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहऱ्यावर पिंपल्स हे प्रदूषण व हार्मोनल बदलामुळे होतात. पिंपल्सचे डाग हटविण्यासाठी टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने डागांवर लावा. याव्यतिरिक्त बटाट्याची सालं चेहऱ्यावर चोळा. दही व बेसनचं उटणे लावा. लिंबाच्या रसात हळद मिसळून पेस्ट बनवा व पिंपल्सवर लावा. या सर्व घरगुती उपायांनी तुमच्या समस्येचं समाधान होईल आणि हळूहळू पिंपल्सचे डागदेखील विरळ होतील. याव्यतिरिक्त अधिक तेलकट अन्न खाऊ नका. जंक फूड खाऊ नका.

  • माझं वय २२ वर्षं आहे. माझी समस्या अशी आहे की थंडीत माझी त्वचा कोरडी व रुक्ष होते. त्वचेवर अजिबात चमक नसते. त्वचेतील ओलावा कायम राहावा यासाठी मला काय करायला हवं?

त्वचेतील कोरडेपणा दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या. कारण पाण्याच्या अभावामुळेदेखील त्वचा कोरडी व रुक्ष होते. याव्यतिरिक्त त्वचेवर अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चरायझर लावा. त्वचेचा थंड वाऱ्यापासून बचाव करा. बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने चेहरा झाकून घ्या. त्वचा जर अधिक कोरडी असेल, तर गुलाबपाण्यात ग्लिसरीन एकत्रित करून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्याला ओलावा मिळण्याबरोबरच चेहऱ्याचं टोनिंगदेखील होईल.

  • मी ३० वर्षीय स्त्री आहे. माझे केस खूपच कोरडे व रूक्ष आहेत. ते सिल्की व शाइनी बनविण्याचा एखादा उपाय सांगा?

खाण्यापिण्यात पौष्टिक तत्त्वांचा अभाव आणि धूळप्रदूषणामुळे केस निस्तेज व रुक्ष दिसू लागतात. त्यांची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या. घरगुती उपायासाठी तुम्ही २ कप गरम पाण्यात १ चमचा मध मिसळून केसांवर लावा आणि अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.

याव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा कोमट खोबरेल तेलाने केसांना मसाज करा व हॉट टॉवेल थेरेपी घ्या. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होईल आणि ते सिल्की व शाइनी बनतील.

  • मी ४२ वर्षीय स्त्री आहे. माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, ज्या मी मेकअपने लपविते तरीदेखील त्या दिसतात. सुरकुत्या कमी करण्याचा एखादा उपाय सांगा?

सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही दुधाच्या पावडरमध्ये पाणी आणि मध एकत्रित करून चेहऱ्यावर लावा. असं केल्याने तुमची त्वचा कोमल होईल आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यादेखील दिसणार नाहीत. याव्यतिरिक्त केळं मॅशकडून त्याचा पॅक चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासानंतर चेहरा धुऊन घ्या. असं केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्यादेखील कमी होतात.

  • मी २२ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर व्हाइटहेड्स आहेत, ज्यामुळे चेहरा खराब दिसतो. ते घालविण्याचे उपाय सांगा?

व्हाइटहेड्स तेलकट त्वचेवर अधिक येतात. यामुळे अशा स्त्रियांनी धूळमाती व प्रदूषणयुक्त वातावरणापासून दूर राहायला हवं.

तुम्ही भरपूर पाणी प्या. बाहेरून घरी आल्यावर त्वचेचं क्लीजिंग करा. यामुळे मृतत्वचा व रोगजंतू निघून जातील. क्रीमी व ऑइली ब्यूटी प्रॉडक्ट्सचा कमीत कमी वापर करा. व्हाइटहेड्सवर लिंबाचा रस व काकडीचा रस लावा. स्टीम घेतल्यानेदेखील फायदा होईल.

  • मी १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिंनी आहे. माझे हात व चेहऱ्याचा रंग सावळा आहे. त्यामुळे रंग उजळण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहरा व हातांचा रंग उजळण्यासाठी कच्चं दूध चेहरा व हातांवर लावा. हे टोनरचं काम करेल. कच्चं दूध हात व चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि सुकल्यावर धुऊन टाका. यामुळे रंग उजळेल.

याव्यतिरिक्त पपईचा पल्प मॅश करून चेहरा व हातांवर लावा. यामुळेदेखील रंग उजळेल. घरातून निघतेवेळी चेहरा व हातांवर एसपीएफयुक्त सनस्क्रीन लावावं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें