माहेरच्या माणसांच्या मूर्खपणामुळे मोडणारे मुलींचे संसार

* प्रतिभा अग्निहोत्री

‘‘आई, मी धड इकडची होऊ शकणार नाही की धड तिकडची, हे जर मला माहीत असते तर मी कधीच इकडे आले नसते.’ तुझ्याकडून मी नेहमीच असे ऐकत आले की, मुलीला लग्नानंतर सासरी आपले महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर काहीही झाले तरी पतीला आईचा लाडका होण्यापासून दूर ठेवायला हवे. इतकेच नव्हे तर आपल्या घरातही कधी आई मी तुला वडिलांच्या नातेवाईकांचा मान राखताना पाहिले नाही. तू दिलेला हाच धडा गिरवत लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच रवीने मला विचारूनच सर्व काही करावे, असे मला वाटू लागले होते. मात्र रवीचे आईवडिलांशिवाय पानही हलत नव्हते. जेव्हा कधी मी तुला माझ्या सासरच्या समस्या सांगायची तेव्हा तू हेच सांगायचीस की, तू कमावती आहेत. त्यामुळे दडपणाखाली राहण्याची गरज नाही. त्यांना तुझी किंमत नसेल तर कधीही परत ये, माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून मी सासरी क्षुल्लक कारणांवरुन भांडण करू लागले. रवीदेखील किती काळ माझे असे वागणे सहन करणार होता, अखेर आमच्यामध्ये वाद होऊ लागले. माहेरहून मिळालेल्या चुकीच्या शिकवणीमुळे मी स्वत:हून माझ्या पायावर दगड मारुन घेतला,’’ एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली सुवर्णा रडतच आईशी तावातावाने बोलत होती.

‘‘तूच तर सांगायचीस की, रवी तुझे नाही तर त्याच्या आईचेच सर्व काही ऐकतो. ज्या घरात तुझ्या शब्दाला किंमत नाही तिथे राहण्यात काय अर्थ आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे परिस्थिती आणखी बिघडत गेली असती. आम्ही तुला लाडाने वाढवले. तुला काहीच किंमत नाही, हे पाहून आम्हाला वाईट वाटणार नाही का?’’ सुवर्णाच्या आईने स्वत:ची बाजू मांडत सांगितले.

‘‘पण इकडे तरी कुठे मला महत्त्व आहे. तुम्ही सर्व शुल्लक कारणावरुन मला सतत बोलता. तिकडे रवीला माझ्या पगाराबद्दल काही देणेघेणे नव्हते. इकडे मात्र सर्व माझ्या पैशांवरच लक्ष ठेवून असतात. आई, मी मूर्ख होते पण तू तुला तर सर्व समजत होते ना, मग हळूहळू सर्व काही ठीक होईल, असे तू मला समजावून सांगायला हवे होते.’’

सुवर्णा आणि तिच्या आईमध्ये अशाप्रकारे वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. आई आणि बहिणीच्या सल्ल्यानुसार वागून सुवर्णा लग्नाला १ वर्ष पूर्ण होण्याआधीच प्राध्यापक असलेला नवरा आणि सासूला सोडून माहेरी आली होती. आता ४ वर्षांनंतर तिला असे वाटते की, आईचे ऐकून तिने मोठी चूक केली. ती सासरी परत जाण्याचा विचार करत आहे.

४० वर्षीय सवितासोबतही काहीसे असेच घडले. तिने सांगितले की, ‘‘मी घरातली एकुलती एक मुलगी आहे. आईने माझ्याकडून घरातले कुठलेच काम कधी करुन घेतले नाही. सासरी मी थोरली सून होते. अचानक खांद्यावर जबाबदारी आल्याने मी घाबरले. माझी अडचण जेव्हा आईला सांगायचे तेव्हा ती म्हणायची, ‘‘जास्त काम करायची काही गरज नाही. एकदा केलेस की रोजच करावे लागेल. तू त्या घरातली नोकर आहेस का?’’

आईने माझ्या मनात सासरच्या लोकांबद्दल इतके विष भरले होते की मी त्यांना कधीच आपले मानू शकले नाही. त्यामुळेच माझे नवऱ्यासोबत वाद होऊ लागले. सासरी कशीबशी ३ वर्षे राहिल्यानंतर आईवडिलांच्या सल्ल्यानुसार, मी माहेरी परत आले.

सुरुवातीला, जेव्हा पतीने मला परत नेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आईवडील आणि भावाने त्याला चांगलेच सुनावले. अनेक अटी घातल्या. मी वयाने लहान होती. वहिनी संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर सोडून ऑफिसला जायची. मी मात्र स्वत:ला त्या घरची राणी समजायचे. त्यामुळे मला हे सर्व पटायचे नाही. आता वय होत चालले आहे. आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत ठीक आहे. मी भाऊ, वहिनी, भाच्यांसाठी एखाद्या नोकराप्रमाणे आहे. जो तो स्वत:च्या मनानुसार मला वागवू इच्छितो. मूर्खपणे आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या त्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, पण आता हे सर्व सहन नाईलाजाने करावे लागत आहे.

अशा प्रकारच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात, जिथे मुलीच्या माहेरच्यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे मुलीचा हसताखेळता संसार उद्ध्वस्त होतो. आश्चर्याची गोष्ट अशी की, आपल्या मुलीचे सर्वाधिक हित इच्छिणाऱ्या आईवडिलांच्या मुलीच्या संसारातील हस्तक्षेपामुळेच असे घडते. लग्नानंतर मुलगी सासरी जाते तेव्हा ते खूपच भावूक होतात. लाडाने वाढलेली मुलगी त्यांच्यापासून खूप दूर जाणार असते. त्यामुळेच त्यांना तिची काळजी वाटू लागते. याच अतिकाळजीतून ते तिला चुकीचे सल्ले देऊ लागतात आणि स्वत:पेक्षा आईवडिलांवर जास्त विश्वास ठेवणारी मुलगी कसलाही विचार न करता त्या सल्लायांनुसारच वागू लागते.

मुलीने काय करावे

कोणताही पूर्वग्रह नसावा : लग्नाआधी मैत्रिणींवर किंवा ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून सासरच्यांविषयी कोणताही पूर्वग्रह करुन घेऊ नये. आस्थाचेच उदाहरण घ्या, तिने रोमिलशी प्रेमविवाह केला. लग्नापूर्वी मैत्रिणी आणि आईवडिलांनी समजावले की, ‘‘कायस्थ मुलगी ब्राह्मण कुटुंबात जात आहे. हे ब्राह्मण धर्माबाबत खूपच कट्टर असतात. पूजाविधीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे तुझे काय होईल?

चांगल्या गोष्टीच सर्वांना सांगा : लग्नानंतर सुरुवातीच्या काळात नववधू सासरच्यांबद्दलची प्रत्येक लहानसहान, चांगली-वाईट गोष्ट माहेरच्यांना सांगते. असे करणे चुकीचे आहे. कारण तुम्ही जे सांगता त्यावरुनच माहेरच्या माणसांचे तुमच्या सासरच्यांबद्दल मत तयार होत असते.

सासर आणि माहेरच्यांचे भरभरुन प्रेम मिळालेल्या माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की, ‘‘लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मी माहेरच्यांना नेहमी सासरच्यांबद्दल चांगल्याच गोष्टी सांगितल्या. त्याचा असा परिणाम झाला की, लग्नाच्या ५ वर्षांनंतर माझ्या सासरची आणि माहेरची माणसे ही एकमेकांचे चांगले मित्र बनली आहेत आणि मी स्वत: एक सुखी कौटुंबिक जीवन जगत आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. पण, मी त्याकडे दुर्लक्ष करुन फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिले.’’

फोनचा मर्यादित वापर करा : तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात सुखी कुटुंबांना विभक्त करण्यात मोबाईलही कारणीभूत ठरत आहे. कारण आजकाल, दिवसभरातून १० वेळा तरी आई-मुलगी एकमेकींशी फोनवरुन बोलतात. यामुळे मुलीच्या घरात घडणारी प्रत्येक लहानसहान गोष्ट त्यांना माहीत होते. यामुळे प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे आणि सल्ला देणे हा ते स्वत:चा अधिकार  समजू लागतात.

एके दिवशी रवी आणि नमितामध्ये शुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्याचवेळी नमिताच्या आईचा फोन आला. नमिताने रागाने, रडतच सर्व सांगितले. ते ऐकल्यानंतर आईला वाटले की जावई आपल्या मुलीवर अन्याय करत आहे. काहीही विचार न करता त्यांनी रवीला फोन करुन चांगलेच सुनावले. यामुळे नमिता आणि रवीमधले नाते घटस्फोटापर्यंत गेले. शेवटी नमिताने बऱ्याच प्रयत्नांनी हे नाते जोडून ठेवले. म्हणूनच, राग आणि भावनेच्या भरात माहेरच्यांशी बोलणे टाळा, जेणेकरून घरातला वाद घरातच राहील आणि तुम्ही तो तुमच्या पद्धतीने सोडवाल. कारण एकदा सुटलेला बाण पुन्हा परत येत नाही.

समजूतदारपणे वागा : आई-वडिलांचा सल्ला किंवा त्यांच्या मताला विरोध करुन त्यांचा अपमान करण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐका, पण ते अमलात आणण्यापूर्वी दहादा विचार करा की याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर किंवा पतीच्या कुटुंबावर काय परिणाम होईल. असा कोणताच सल्ला ऐकू नका ज्यामुळे तुमच्या पतीच्या कुटुंबाच्या आत्मसन्माला तडा जाईल.

अनिताने सांगितले, ‘‘आजारी नणंदेवर उपचार करण्यासाठी मी तिला घरी घेऊन आले. लहान मुलांची काळजी घेताना तिच्याकडे लक्ष देणे त्रासदायक होते. दरम्यान, माझ्या आईने मला सल्ला दिला की, तुझे घर तुझ्या नणंदेसाठी नवीन जागा आहे. त्यामुळे तिला तिच्या नवऱ्याकडेच सोडून ये आणि उपचारासाठी दरमहा पैसे पाठव. तू नोकरी कर आणि तुझे कुटुंब सांभाळ.’’

अनिताला आईचा सल्ला अजिबात आवडला नाही. तिने आईला सांगितले की, ‘‘जरा विचार कर, आज जर नणंदेच्या जागी माझी बहीण असती तर तू हाच सल्ला दिला असता का?’’

अनिताचे म्हणणे ऐकल्यानंतर तिची आई निरुत्तर झाली. त्या दिवसापासून तिने तिच्या सासरच्या गोष्टीत हस्तक्षेप करणे थांबवले.

पारदर्शकता ठेवा : पतीपासून लपून माहेरच्यांसाठी काहीच करू नका. प्रतिमाचे माहेर गरीब आहे. ती पतीपासून लपवून आई आणि भावाला पैशांची मदत करीत असे. जेव्हा तिच्या पतीला हे समजले तेव्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यामुळे तिचे माहेर आणि नवरा दोघांसोबतचे संबंध बिघडू लागले. म्हणूनच, आपल्या माहेरच्यांना आर्थिक मदत करण्यापूर्वी पतीला विश्वासात घेऊन सर्व सांगा. लक्षात ठेवा, पती-पत्नीच्या नात्यात पारदर्शकता असणे खूप गरजेचे आहे. एकमेकांपासून लपूनछपून केलेल्या व्यवहारांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

सीमा निश्चित करा : सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या संसारात कोणी किती हस्तक्षेप करावा, याची सीमा तुम्ही निश्चित करायला हवी. त्या व्यक्तीने याचे उल्लंघन केल्यास त्याला वेळीच रोखा. कारण तुमच्या कुटुंबातील समस्या तुम्ही आणि तुमचा पतीच चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. सासरच्या आणि माहेरच्या माणसांशी सारखेच प्रेमाने वागा.

आईवडिलांनी काय करावे : हे मान्य की, आजकाल बहुतेक पालक मुला-मुलीमध्ये फरक करत नाहीत. माहेरी लाडात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात दु:खाची सावली जरी आली तरी ते अस्वस्थ होतात. पण त्यांनी हेदेखील लक्षात ठेवायला हवे की, आता त्यांची मुलगी ही कुणाची तरी सून, पत्नी आहे. तिच्या पतीच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या मुलाला तितक्याच प्रेमाने वाढवले आहे. त्यामुळे सासरच्या अडचणी तिला स्वत:ला सोडवू द्या. एखाद्या वळणावर सल्ला देणे गरजेचे असल्यास तो तटस्थपणे द्या.

मुलीच्या सासरच्या गोष्टीत अनावश्यक हस्तक्षेप टाळा. तिला कोणत्याही विषयावर सल्ला देताना आधी हा विचार करा की, जर हाच सल्ला तुमच्या सुनेला तिच्या माहेरच्यांनी दिला तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

व्हिडिओ कॉलिंग, मोबाइल फोन यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर मुलगी कशी आहे, हे पाहण्यासाठी करा. तिच्या सासरच्यांना नावे ठेवण्यासाठी याचा वापर करु नका.

तुमची आर्थिक स्थिती भलेही मुलीच्या सासरच्यांपेक्षा जास्त चांगली असेल पण तरीही त्यांना तुमच्यापेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न कधीच करु नका. लक्षात ठेवा, तुम्ही त्यांचा मान ठेवला तरच तुमची मुलगीही त्यांचा आदर करायला शिकेल.

मुलीला केवळ पतीचाच नव्हे तर संपूण सासरच्या मंडळींचा प्रेमाने आदरसन्मान करायला, त्यांच्यासोबत जमवून घ्यायला शिकवा. कुटुंबाशी नाते तोडून पतीसोबत वेगळे राहण्याची शिकवण तिला देऊ नका.

अनुजाने लग्नाच्या दोन दिवस आधी आपल्या मुलीला तिचे दागिने दाखवून सांगितले की, तुझे दागिने तुझ्या सासूकडे चूकुनही देऊ नकोस. एकदा दिलेस तर ते परत कधीच मिळणार नाहीत. असा अव्यवहार्य सल्ला देण्याऐवजी आपल्या मुलीच्या मनात सासरच्यांबद्दल प्रेम, आपलेपणाची भावना जागवा, जेणेकरुन तिचे वैवाहिक आयुष्य सुखाचे होईल.

लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीला थोडा वेळ द्या. ती कशी आहे, हे सतत विचारत राहून तिला त्रास देऊ नका. त्याऐवजी तिला सासरच्या मंडळींसोबत थोडा वेळ घालवू द्या, जेणेकरुन तिथल्या वातावरणात सहज रुळणे तिला शक्य होईल.

दांपत्य जीवनातील ९ वचनं

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

बदलत्या काळाबरोबर बदलही आवश्यक आहे. आजच्या युगात दांपत्य विशेषकरून नवविवाहित जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आपल्या भावना आणि विचारांचा अंदाज थोडा बदलायलाच हवा. पूर्वी विवाहाचा अर्थ फक्त प्रेम आणि त्याग होता, ज्यात बहुतेकदा स्त्रियाच पती आणि त्याच्या घर-कुटुंबासाठी समर्पित राहण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानत असत आणि त्याग व कर्तव्याची मूर्ती बनून सारे जीवन आनंदाने व्यतित करायच्या. घरकुटुंबात यामुळेच त्यांना सन्मानही मिळत असे.

पुरुष पण अशी पत्नी मिळाल्याने आनंदीत व्हायचे. त्यांची मानसिकताही स्त्रियांप्रति हीच होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही ही गोष्ट समजली आहे. आज स्त्रियाही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, प्रगती साधत आहेत.

वर-वधू लग्नाच्या वेळेस रीती-रिवाजाच्या नावावर ७ वचने घेतात आणि बहुतेक खूप लवकर विसरूनही जातात. परंतु दांपत्य सर्वेक्षणाच्या आधारावर निष्कर्षाच्या रूपातील या वचनांचा विवाहानंतरही स्विकार करा, यांना लक्षात ठेवा आणि निभवासुद्धा. दोघांनाही एकमेकांच्या कामात सहकार्याच्या रूपाने ताळमेळ बसवून चालण्याची आवश्यकता आहे, ज्यातून सगळयांच्या विचार-विमर्शातून निघालेली ही खालील वचने मोठया कामाची आहेत :

जे माझे आहे ते तुझेही : लखनौऊचे आर्किटेक्ट सुहास आणि त्यांची पत्नी सीमामध्ये सुरुवातीला छोटया-छोटया गोष्टींवरून नेहमी भांडणे होत. सीमा म्हणते, ‘‘जसे माहेरून मिळालेल्या महाग बेड कव्हर, क्रॉकरी इत्यादीचा जेव्हा सुहास आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी उपयोग करायचे, तेव्हा मला अजिबात आवडायचे नाही. त्याचप्रमाणे त्यांनाही माझे नातेवाईक, मैत्रिणींद्वारे त्यांचे म्युझिक सिस्टम किंवा पुस्तके हाताळणे एकदम असह्य व्हायचे. नंतर एके दिवशी आम्ही ठरवले की जर आपण एक आहोत तर एकमेकांच्या वस्तूंचा उपयोग का नाही करायचा. त्यादिवसापासून सगळा परकेपणा दूर झाला.

जसे मला आपले आई-बाबा, भाऊ-बहिण, मित्र-नातेवाईक प्रिय आहेत, तसेच तुम्हालाही आपले :

जयपुरचे डॉ. राजेश आणि त्यांची होममेकर पत्नी इशाने या गोष्टीचा खुलासा केला की पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा घरात समान आदर होणे आवश्यक आहे. राजेशने आपली बहिण रिमाच्या घरी आपली व आपल्या आई-बाबांची पुन्हा-पुन्हा अपमानित होण्याची घटना सांगितली. बहिण आपल्या पतिकडून होणाऱ्या अपमानजनक व्यवहारामुळे दु:खी असायची. यामुळे त्यांचे आपसातील नाते कधी गोड झाले नाही. ही तर चुकीची अपेक्षा आहे की फक्त पत्नीने पतिच्या घरच्यांचे प्रेमाने स्वागत करायचे आणि पतिने तिच्या माहेरच्या लोकांचा आदर न करता जेव्हा-तेव्हा अपमान करायचा. पतिचेही तेवढेच कर्तव्य आहे. पत्नी अर्धांगिनी आहे, जीवनसाथी आहे, गुलाम नाही.

जशा माझ्या गरजा आवश्यक तशाच तुमच्याही : सुजाता एका कॉर्पोरेट ऑफिसात काम करते. नेहमी तिला घरी येण्यास उशीर होतो. घरी असतानाही तिला कधी-कधी ऑफिसचे काम करावे लागते. यावर पती विशाल चिडचिड करत असे. एके दिवशी सुजाताने त्याला बसवून चांगल्याप्रकारे समजावले की विशाल मी लग्नाच्या अगोदरच तुम्हाला सांगितले होते, तेव्हा तर तुम्हाला माझ्या चांगल्या पॅकेजपुढे सर्व स्वीकार होते. जेव्हा तुम्ही आपल्या बिझनेस मीटिंगमधून उशिरा येता तेव्हा तर माझी काही हरकत नसते. तर मग तुम्ही का समजून घेत नाही? मी नोकरी सोडू शकत नाही. आईचे प्रत्येक महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन मी थांबवू शकत नाही. नि:संदेह तुम्ही मला सोडू शकता. माझी यालाही काही हरकत नाही. मी डिवोर्ससाठी तयार आहे. मी उद्याच दुसरीकडे कोठे शिप्ट होईल.

आपल्या सवयी, छंद, संस्कार जसे माझे तसेच तुमचे : पती-पत्नी वेगवेगळया परिवारातून, वेगवेगळया वातावरणातून येतात पण दुसऱ्याकडून आपल्यासारखे आचरण व राहणीमानाची अपेक्षा करतात किंवा वेगळे पाहून टर उडवतात तर हे योग्य नाही, त्यापेक्षा याचे समाधान शोधणे योग्य असते. स्कूल टीचर दीप्ती आपल्या बँक मैनेजर पती शिखरला अनवाणी पायांनी घरात फिरल्यानंतर अंथरुणात घुसण्याने वैतागत असे. तर शिखर तिचे बाहेरून कोठून आल्यावर कपडे चेंज करून अंथरुणावर टाकणे पसंत नव्हते. शेवटी एके दिवशी बसून दोघांनी समस्येचे समाधान शोधले. आता पायांच्या अस्वच्छतेपासून वाचण्यासाठी शेखरने कार्पेट अंथरले तर दीप्तीनेही शिखरचे बघून कपडे व्यवस्थित हँग करायला सुरूवात केली. त्यांचे जीवन पुन्हा सुरेल सुरावट बनली.

दुसऱ्यांच्या समोर एकमेकांचे दोष किंवा टर उडवायची नाही : दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील माला पहिल्यांदा विवाहानंतर विमानयात्रा करत होती. पती अंश व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याचा एक मित्रही पत्नीसहित त्यांच्याबरोबर होता. सर्व एका तिसऱ्या मित्राच्या लग्नाला जात होते. बेल्ट बांधण्याची सूचना झाली तर मालाने घाईत जवळच्या सीटचा बेल्ट उचलला आणि लावण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून अंश हसू लागला, ‘‘अक्कल चरायला गेली आहे काय? एवढेपण कळत नाही.’’ हे बघून सर्व हसू लागले. तेव्हा मालाला खूप वाईट वाटले. मग ती म्हणाली, ‘‘तुम्हाला हसण्याऐवजी माझी मदत करायला हवी होती किंवा यांच्यासारखी श्रीमंत घरातील पत्नी आणयला हवी होती.’’

अंशला आपली चुक कळाली की त्याने असे बोलायला नको होते. अशाचप्रकारे बरेली निवासी गीताचे भाऊ-वहिनी तिला भेटण्यासाठी आले. तेव्हा पती दिपक बाटलीनेच पाणी पित होता. त्याने गीताच्या भावालाही तीच पाण्याची बाटली ऑफर केली.

‘‘थांबा, मी ग्लास आणते. आमच्या येथे कोणी अडाण्यासारखे पाणी पित नाही,’’ गीता म्हणाली.

दिपकला तिचे म्हणणे खटकले. म्हणाला, ‘‘आणि आमच्या येथेही पतिशी असे कोणी बोलत नाही.’’

भावाने गीताला टोकले व विषय सांभाळला, नंतर दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटले आणि दुसऱ्यांच्या समोर एकमेकांची टर न उडवण्याचे आणि दोष न काढायचे वचन दिले.

जशी माझी सामाजिक बांधिलकी तशीच तुमचीही : दीपांकरची पत्नी जया लग्नाच्या आधीपासूनच फार सामाजिक होती. सर्वांच्या सुखदु:खात, सणासुदीच्या प्रसंगी सामील होत आली होती. ऑफिस असो किंवा शेजारी, नातेवाईक सगळयांशी मिळून-मिसळून राहायची. आणि अजूनही राहत आहे. दीपांकरही तिला सहकार्य करतो, त्यामुळे जयासुद्धा दीपांकरच्या सामजिक नातेबंधांची काळजी घेते.

जशी मला काही स्पेस हवी तशीच तुम्हालाही : पारुलने सांगितले संपूर्ण दिवस तर ती पती रवीमागे हात धुवून लागत नाही. काही वेळ त्याला एकटे सोडते, जेणेकरून तो आपले काही काम करू शकेल. पतिसुद्धा या गोष्टीची काळजी घेतो की मला स्पेस मिळावी.

दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद होत नाही. दुसऱ्या दिवसाचा होमवर्कही सहज होतो. सोबत असल्यावर छान पटतं.

जसे माझे काही सिक्रेट्स न सांगण्यासारखे, माझी इच्छा तशीच तुझीही : लग्नाच्या आधी काय झाले होते पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर वा त्यांच्या घर-कुटुंबात. जर ही गोष्ट कोणी सांगू इच्छित नसेल तर ठीक आहे, खोदून-खोदून का विचारावे? शंकेत वा संभ्रमात राहणे व्यर्थ आहे. कॉलेजचे इंग्रजीचे प्रोफेसर डॉ. नगेंद्र आणि त्यांची हिंदीची प्रोफेसर पत्नी नीलमचे हेच मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नात्याच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. वर्तमान बघावे, एकमेकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवावा.

पॉकेटमनीच्या खर्चावर अडवणूक नको : ‘‘आमच्या दोघांच्या छान जीवनाचा हाच तर सरळ फंडा आहे. घरखर्च आम्ही सहमतीने सारखा शेअर करतो आणि पॉकेटमनीवर एकमेकांना रोखत नाही,’’ स्टेट बँक कर्मचारी प्रिया आणि तिच्या असिस्टंट मॅनेजर पती करणने आपल्या गमतीशीर गोष्टीने अजून एक महत्वाचे वचनही सांगून टाकले.

तर मग आता विलंब कशाचा. लग्नाच्या वेळेस ७ वचने घेतली होती, तर लग्नानंतरही पती-पत्नी दोघांनी ही वचनं आत्मसात करावी आणि प्रेमाने हे नाते निभवावे.

लग्न : एक बेडी

* निलू चोपडा

अनेकदा महिलांना लग्नानंतर स्वत:चं व्यक्तिमत्व, स्वभाव यांना पूर्णपणे बदलावं लागतं. स्त्रीला स्वत:ची अशी ओळखच नाहीए, अशीच समाजात धारणा आहे. लग्नानंतर तर अगदी प्रेमाने तिचं सामाजिक, मानसिक स्वातंत्र्य काढून घेतलं जातं. आणि तिचं स्वातंत्र्य हिसकावून घेणारे हे तिचे स्वत:चेच  आईवडील, सासूसासरे आणि तिचा पती नावाचा प्राणी असतो.

पाठवणीच्या वेळी आईबाबा मुलीला अगदी हुंदके देत समजावतात की मुली हा आता तुझा दुसरा जन्म आहे. सासूसासरे आणि पती यांचं म्हणणं ऐकणं तुझं पहिलं कर्तव्य आहे.

सासरी तर सासूसासरे आणि पती कधी स्पष्टपणे तर कधी आडून सासरच्या चालीरीतीनुसार चालण्याची ताकीद देतात. मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय समाजाची हिच तर मोठी समस्या आहे.

पत्नी बुद्धिमान आणि एखाद्या कलेत पारंगत असेल तर सासरची आणि संकुचित मानसिकता असणारा पती तिच्या कलेला मूठमाती देऊन टाकतात. नृत्य पारंगत वा गायन क्षेत्र असेल तर सरळसरळ सांगून टाकलं जातं की इथे हे काही चालणार नाही. कुटुंबाच्या मानमर्यादा यांचे दाखले दिले जातात.

अनेक घरात तर सुनांना नोकरी करण्यासदेखील मनाई केली जाते. मग घरात कितीही तंगी असली तरी चालेल. मात्र घराचा आर्थिक डोलारा घसरु लागताच तिला नोकरी करण्याची मुभा दिली जाते तीदेखील कार्यालयात कोणत्याही पुरुषाशी बोलायचं नाही आणि सगळा पगार पती वा सासूबाईच्या हाती द्यायचा ही खास अट ठेऊनच.

कळसूत्री बाहुलीचं आयुष्य

सुनंदा राष्ट्रीय स्तरावरची टेनिस खेळाडू होती. घरात सगळयांची लाडकी. आयुष्याचा मनमुराद आनंद कसा घ्यायचा हे तिच्याकडून शिकावं. मात्र आयुष्याच्या स्पर्धेत मात्र मागे पडली. वरवरचा सरंजाम पाहून एका अनोळखी ठिकाणी लग्न जमवलं गेलं. पती व सासरे दोघेही उच्चपदस्थ होते. मात्र लग्नाच्या महिनाभरातच कळसूत्री बाहुलीसारखं आयुष्य तिला नाईलाजाने जगावं लागलं. काय घालायचं, कुठे जायचं, किती बोलायचं हे सर्व पती आणि सासरची मंडळी ठरवत होती.

तिच्या वाहिनीने स्वत:चा मोबाईल तिला देऊन ठेवला होता. संधी मिळताच सुनंदाने तिला स्वत:ची व्यथा सांगितली तेव्हा तिच्या वाहिनीला आश्चर्य वाटलं. मात्र जर हे घरी सांगितलं तर सासरची माणसं तिच्या भावाला आणि वडिलांना त्रास देतील या भीतीने ती गप्प राहत होती.

एके दिवशी संधी मिळताच तिच्या वडिलांनी आणि भावाने तिला माहेरी परत आणलं. वर्षभर ती त्यांच्यासोबत राहिली. जिल्ह्याच्या क्लबमध्ये टेबल टेनिसची कोच बनली. वर्षभर सासरची माणसं नाराजच होती त्यामुळे कोणीच चौकशी करायला देखील आलं नाही. मात्र एकेदिवशी तिचा पती माफी मागून सुनंदाला येण्याचा आग्रह करू लागला.

नंतर मात्र तिच्या घरातल्यांनी त्याच्याकडून तो आणि त्याचे वडील ज्या गोष्टीवरून सुनंदाला धमकावत होते त्याबद्दल लेखी लिहून घेतलं तसंच सुनंदाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्याबाबतच वचन रेकॉर्ड करून घेऊन नंतरच सुनंदाला त्याच्यासोबत पाठवलं.

त्रास देण्याच्या नव्या पद्धती

अश्याच एका नव्या घटनेत एका तरुणीचा विवाह एका फसवेगिरी करणाऱ्या कुटुंबात करण्यात आला होता. त्यांनी खूप श्रीमंत आणि सुशिक्षित असल्याचा दिखावा केला होता. खरंतर ही लोकं पूर्णपणे कर्जात बुडालेली होती. लग्नात भरपूर पैसाअडका मिळेल अशी लालसा होती, मात्र तो मिळत नसल्याचं दिसताच खरं रूप समोर आलं.

मुलीच्या सर्व मूलभूत गरजावरच आडकाठी करण्यात आली. पती आणि सासरे यांच्या जेवणानंतर उरलंसूरलेलं ती खात असे. फोन करण्यास, बाहेर जाण्यास मनाई होती. माहेर दुसऱ्या शहरात होतं. सासरचे तर ओळखीच्या लोकांना देखील भेटायला देत नसतं. जर कोणी भेटायला आलं तर ती झोपलीय वा तब्बेत बिघडल्याची कारण देत असत. बऱ्याच प्रयत्नानंतर तिला तिथून बाहेर पडण्याची संधी मिळाली.

सेक्सबाबतीतदेखील पती त्याला हवं तेव्हा मागणी करतो. मग पत्नी थकलेली असो वा आजारी वा तिची इच्छा असो वा नसो तिला पतीची गरज पूर्ण करावीच लागते आणि जर पत्नीने यात पुढाकार घेतला तर तिला कामातून गेलेली बाई समजून अपमानित केल जातं. म्हणजेच पावलोपावली तिचं स्वातंत्र्य नाकारलं जातं.

काही पुरुष तर स्वत:च्या पत्नीला स्वत:ची मालमत्ताच समजतात. काही दिवसापूर्वी एका बातमीची चर्चा होती की एक सैनिक स्वत:च्या पत्नीला आपले  सैनिक मित्र आणि सहकाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडत होता. नकार दिल्यास चाकूने तिचे कपडे फाडत असे. खरंच एखाद्या स्त्रीसोबत असा दुव्यवहार करणं खूपच भयानक आहे. लग्नानंतर जर एखादी स्त्री अशाप्रकारे पुरुषरुपी लांडग्यांच्या तावडीत सापडली तर तिचं सर्वप्रकारचं स्वातंत्र्य संपून जातं.

अनेकदा स्त्रियांना स्त्री समस्यां, बलात्काराच्या वाढत्या घटना, कोणत्याही सभेत बोलण्यास वा लिहिण्यासदेखील बंदी केली जाते. पती जर दारुडा, मारझोड करणारा, नपुंसक असला तरी तिलाच जबाबदार ठरवलं जातं.

महिलांनी यासाठी काय करावं

लग्नानंतर स्वत:ची ओळख, स्वत:चं स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी स्वत:च्या अधिकारांबाबत जागरूक असायला हवं. काही दिवसांपूर्वी एका लग्नात नवरदेव दारूच्या नशेत नाचत होता. हे पाहून नववधू लग्न मोडून सरळ लग्नाच्या मंडपातून बाहेर पडली. अलीकडे अनेकदा हुंडा घेणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी स्वत: मुलीने लग्नाचं वऱ्हाड पाठवून देण्याच्या बातम्या येत असतात. हा खूपच चांगला संकेत आहे.

आजच्या तरुण पिढीने स्वत:च्या होणाऱ्या पती वा पत्नीसोबत एकत्र बसून आपली स्वप्न, इच्छा-आकांक्षा, विचार यांची देवाणघेवाण करायला हवी.

दारुडे, बेरोजगार तसंच हुंडा घेणाऱ्या लोभी पुरुषांवर बहिष्कार टाकायला हवा. आईवडिलानीदेखील स्वत:च्या मुलींना विनाकारण माघार घ्यायला भर पाडू नये.

ज्याप्रकारे आपण एखादं रोपटं मुळासकट उखडून दुसऱ्या जागी लावतो, तेव्हा आपण माती, पाणी, हवा या सगळयासाठी अनुकूल आहे की नाही हे पाहतो. जर माती ठिक नसेल, पाणी कमी वा अधिक दिलं, हवा, ऊन व्यवस्थित मिळालं नाही तर रोपटं सुकून जातं. त्याचप्रकारे स्त्रीदेखील लग्नानंतर स्वत:ची मूळ माहेराहून काढून सासररुपी बागेत लावते.

लग्न हा स्त्री स्वातंत्र्याचा शेवट नाहीए. प्रत्येक स्त्रीने स्वत:ची प्रतिभा, आकांक्षा आणि स्वप्न पाहण्याचा पूर्णपणे हक्क आहे. हा तिच्या आयुष्याचा एक अमूल्य ठेवा आहे, तो नष्ट होण्यापासून रोखायला हवा. तिचं व्यक्तिमत्व आणि अस्तित्व मिटविण्याचा कोणालाच हक्क नाहीए.

जर एखादी स्त्री एखाद्या कारणामुळे अशा नरकयातना भोगत असेल, तर तिने कोणाची तरी मदत घ्यायला हवी. स्वत:च्या स्वातंत्र्याबाबत जागरूक असायला हवं. स्त्री ही जननी आहे. तिचा अपमान करणं, तिच्यावर अत्याचार करणं वा तिचा मानसिक, शारीरिक, स्वातंत्र्यांवर पाबंदी लावणं हा सर्वात मोठा गुन्हा असण्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल.

नात्यात जेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात

* सुमन बाजपेयी

राधा आणि अनुजच्या लग्नाला २ वर्षे झाली. राधाला आपल्या नोकरीच्या निमित्ताने बऱ्याचदा बाहेर जावे लागते. वीकेंडला जेव्हा ती घरी असते, तेव्हा तिला काही वेळ एकटीने वाचन करायला किंवा मग आराम करायला आवडते किंवा घरातील बारीकसारीक कामे करण्यात तिचा वेळ जातो.

अनुजला आठवड्यातील ५ दिवस तिला मिस करत असतो. त्यामुळे त्याची अशी इच्छा असते की ते २ दिवस तरी तिने त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. दोघांनी एकत्र आउटिंग करावे, पण राधा ट्रॅव्हलिंग करून थकलेली असल्याने, बाहेर जाण्याच्या नावानेच संतापते.

अनुजला राधाचे हे वागणे हळूहळू खटकू लागले. त्याला असे वाटू लागले की राधा त्याला अव्हॉइड करत आहे. तिला कदाचित तो आवडत नसावा असे त्याला वाटू लागले होते आणि राधाला असे वाटत होते की अनुजला तिची आणि तिच्या इच्छांची मुळीच पर्वा नाही. तो फक्त आपल्या गरजा तिच्यावर लादत होता असे तिला वाटत होते. अशाप्रकारे आपल्या पद्धतीने जोडीदाराविषयी अनुमान काढल्याने त्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहू लागली.

अनेक विवाह हे असे छोटे छोटे गैरसमज दूर न केल्यामुळे तुटतात. छोटासा गैरसमज खूप मोठा व्हायला वेळ लागत नाही. गैरसमज हा एखाद्या जहाजात झालेल्या छोटयाशा छिद्रासमान असतो. तो जर का वेळीच बुजवला गेला नाही तर नाते तुटायला वेळ लागत नाही.

भावना समजून न घेणे

गैरसमज हा एखाद्या काटयासारखा असतो आणि जेव्हा तो आपल्या नात्याला टोचू लागतो, तेव्हा कधी काळी फुलासारखे जपलेले नातेही जखमा करू लागते. जे युगुल कधीकाळी एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते, एकमेकांच्या बाहुपाशात ज्यांना सर्वस्व लाभत होते आणि जे आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होते त्या नात्याला गैरसमजाचा सर्प जेव्हा दंश करतो, तेव्हा नात्यातील गोडवा आणि प्रेम यांना तिरस्कारात बदलण्यात वेळ लागत नाही.

साधारणपणे गैरसमज म्हणजे अशी स्थिती असते, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे किंवा भावना समजून घेण्यास असमर्थ ठरते आणि जेव्हा हे गैरसमज वाढतात, तेव्हा मग भांडणे होऊ लागतात आणि याचा शेवट कधी कधी फार भयंकर असतो.

रिलेशनशिप एक्स्पर्ट अंजना गौड यांच्यानुसार, ‘‘साथीदाराला माझी पर्वा नाही किंवा तो फक्त स्वत:चाच विचार करतो अशा प्रकारचा गैरसमज युगुलांमध्ये निर्माण होणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराच्या प्राथमिकता आणि विचारांना चुकीचे समजणे खूप सोपे असते.‘‘स्वत:च्या दृष्टीने जोडीदाराच्या वागण्याचा अर्थ काढणे किंवा आपले म्हणणे जोडीदाराच्या समोर मांडण्यात इगो आडवा येणे ही खरी समस्या आहे. ही गोष्ट हळूहळू मोठे रूप धारण करते आणि मग गैरसमजाचे कधी कडाक्याच्या भांडणात रूपांतर होते आपल्याला कळतच नाही.’’

कारणे काय आहेत

स्वार्थी असणे : पती आणि पत्नीचे नाते दृढ होण्यासाठी आणि एकमेकांवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून न लपवणे आणि कायम एकमेकांना सांभाळून घेणे. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ असले पाहिजे. गैरसमज तेव्हा निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आत्मकेंद्री असता. फक्त स्वत:चा विचार करता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने अविश्वास दाखवणे स्वाभाविकच ठरते.

माझी पर्वा नाही : पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही असे वाटू शकते की आपल्या जोडीदाराला आपली पर्वा नाही आणि तो आपल्यावर प्रेमही करत नाही. पण वास्तव हे आहे की विवाह हा प्रेम आणि काळजी यांच्याआधारे टिकून असतो. जेव्हा जोडीदाराला आपण इग्नोर होत आहोत किंवा आपली गरज नाही असे वाटू लागते, तेव्हा गैरसमजाचे उंच बुरुज उभे राहतात.

जबाबदाऱ्या पार पाडण्यात कमी पडणे : जेव्हा जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यात कमी पडतो किंवा घेत नाही तेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशावेळी मनात असे प्रश्न उठणे स्वाभाविक असते की त्याचे आता आपल्यावर प्रेमच नाही का? त्याला माझी पर्वाच नाही का? तो जबरदस्ती तर माझ्यासोबत संसार करत नाही ना? असे गैरसमज नात्यांमध्ये येऊ नयेत म्हणून प्रत्येक युगुलाने आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजेत.

काम आणि कमिटमेंट : हल्ली स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरापुरतेच मर्यादित राहिलेले नसून विस्तृत झाले आहे. आता त्या हाउसवाइफच्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पतिने त्यांच्या काम आणि कमिटमेंटची योग्य कदर करणे गरजेचे आहे. बदलणाऱ्या परिस्थितीत पत्नीस सर्वतोपरी सहकार्य करावे. नात्यात आलेला हा बदल स्वीकारणे हे पतिसाठी निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण हीच गोष्ट आजच्या काळात गैरसमजाचे मोठे कारण ठरू पाहत आहे. त्यामुळे दोघानांही आपापल्या कमिटमेंट्स एकमेकांशी डिस्कस करून त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

धोका : हे सर्वात सामान्य कारण आहे. हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा एका जोडीदाराला वाटू लागते की आपल्या पार्टनरचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. आणि हे तो कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधाराशिवायही मानू शकतो. असे ही होऊ शकते की ती गोष्ट खरीही असेल. पण ही गोष्ट जर योग्य रीतीने हाताळली गेली नाही तर लग्न मोडूही शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार अस्वस्थ आहे आणि तुमच्याकडे संशयाने पाहत आहे तेव्हा त्वरित सतर्क व्हा.

दुसऱ्यांचा हस्तक्षेप : जेव्हा दुसरे लोक मग ते तुमचे कुटुंबातील सदस्य असोत की तुमच्या मित्रपरिवारापैकी किंवा नातेवाईक. जर ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू लागले तर गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशा लोकांना दोघांमध्ये भांडणे लावून दिली की आनंद होतो. आणि त्यांचा स्वार्थ साधला जातो. पती आणि पत्नीचे नाते भले कितीही मधुर असो, त्यात किती का प्रेम असो, पण मतभिन्नता आणि भांडणे ही होतातच आणि हे अस्वाभाविकही नाही. असे झाल्यास कोणा तिसऱ्या व्यक्तिस आपल्या समस्या सांगण्यापेक्षा स्वत:च त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे.

सेक्सला प्राधान्य द्या : सेक्स संबंध हे वैवाहिक जीवनातील गैरसमजाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पती पत्नी दोघांचीही इच्छा असते की सेक्स संबंध एन्जॉय करावेत. पण जेव्हा तुम्ही त्यात दुरावा निर्माण करता, आणि तो नात्याला कमकुवत करू लागतो. तुमचा साथीदार तुमच्यावर खुश नसेल किंवा तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर यामुळे नात्यात खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

13-14 व्या वर्षी प्रेम, पालकांनी काय करावे

* किरण आहुजा

असं म्हणतात की प्रेम कुणावरही कोणत्याही वयात होऊ शकतं. ते हृदय आहे, ते कोणाकडे येते. असे किती किस्से वाचले आहेत की अश्याच्या प्रेमात पडलो आणि नंतर हे घडले, ते घडले इत्यादी.

प्रेम ही अशी गोष्ट आहे. माणसांना काय, प्राण्यांनाही प्रेम कळतं. प्रेमाच्या भावनेने, 60 वर्षांच्या वृद्धाचे हृदय किशोरवयीन मुलासारखे धडधडू लागते. अशा परिस्थितीत 14-15 वर्षांचा मुलगा आणि किशोरावस्थेच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवणारी मुलगी यांच्यात हेच प्रेम असेल तर काय म्हणाल?

तौबताउबा, मुला-मुलीच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची माहिती मिळताच घरात वादळ उठते. 13-14 वर्षांचे प्रेम तारुण्यात येऊन लग्नाच्या रूपाने त्यांच्या प्रेमाला कुटुंब आणि समाजाची मान्यता मिळाल्याचे फार क्वचितच ऐकायला मिळते. किशोरवयीन प्रेम यशस्वी का होत नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शालेय जीवनात घडलेले हे प्रेम पुस्तकांच्या पानांपुरतेच बंदिस्त राहते. परिपक्व प्रेम किंवा नातेसंबंधात येणारे वाद मिटवण्याचा प्रयत्न जोडपे करतात, पण किशोरवयात असे काही घडले तर जोडपे एकमेकांपासून दूर राहण्याचे मार्ग शोधू लागतात.

बहुतेक किशोरवयीन प्रेम अयशस्वी

हे खरे आहे की किशोरवयीन प्रेम सुरुवातीला त्याच्या शिखरावर आहे. ना वयाची चिंता ना समाजाच्या बंधनांची भीती. यातून सुटलेला क्वचितच कोणी असेल. प्रत्येकाला त्यांच्या शाळेच्या काळात काहीतरी क्रश असेलच. ज्यांच्यात हिंमत असते, ते आपल्या क्रशचे प्रेमात रूपांतर करतात आणि काहीजण आपली आवड हृदयात बसवून ठेवतात.

किशोरवयीन प्रेम ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. हार्मोनल बदलांमुळे मुलामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल होतात. जसजसे गुप्तांग विकसित होतात तसतसे सेक्सची इच्छा वाढणे स्वाभाविक होते. ही अशी अवस्था आहे जेव्हा तो लहान किंवा प्रौढ नसतो. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण असते आणि हे आकर्षण कुणालाही असू शकते. आपल्या स्वतःच्या वयाने किंवा अगदी मोठ्या असलेल्या कोणाशी तरी.

2002 मध्ये एक चित्रपट आला – ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’. यामध्ये हा विषय बारकाईने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 15 वर्षांचा मुलगा त्याच्या समोरच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या वृद्ध स्त्रीकडे कसा आकर्षित होतो? तो रात्रंदिवस दुर्बिणीने तिची प्रत्येक हालचाल पाहतो. जेव्हा त्या स्त्रीचा प्रियकर त्याच्या घरी येतो आणि जेव्हा ती प्रेयसी आणि ती स्त्री लैंगिक संबंध ठेवते तेव्हा तो तिला पाहतो आणि त्याला राग येतो शेवटी तो त्या स्त्रीला सांगण्याची हिंमत करतो की त्याचे तिच्यावर प्रेम आहे.

ती बाई मुलाला पटवून देण्याचा प्रयत्न करते की ती त्याच्यासाठी योग्य मुलगी नाही. पण तो म्हणतो की त्याला पर्वा नाही, तो फक्त तिच्यावर प्रेम करतो.

शेवटी, ती स्त्री त्याला स्पष्टपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की हे फक्त विरुद्ध लिंगाबद्दलचे आकर्षण आहे. प्रेम नाही. फक्त 2 मिनिटे एक आनंद आहे. स्त्री त्याला स्वतःच्या हातांनी हस्तमैथुन करून भ्रमातून बाहेर काढण्याचा आणि वास्तवाचा सामना करण्याचा प्रयत्न करते.

चित्रपटात हा मुलगा भावनिक दाखवण्यात आला असून वयाच्या १५ व्या वर्षी मन परिपक्व होत नाही हे दाखवण्यात आले आहे. अनेक गोष्टी त्याच्या आकलनापलीकडच्या असतात. जेव्हा एखादी स्त्री असे करते तेव्हा तिला खूप दुखापत होते आणि तिच्या हातातील नस कापते.

हा चित्रपट होता, पण प्रत्यक्षातही घडतो. हे वय असे असते की मनात प्रेमाची ओढ असते. समजल्यानंतरही मला प्रकरण समजत नाही. प्रेमाची नशा मनाला भिडते. या वयातील लोकांसाठी ही एक कठीण वेळ आहे जेव्हा त्यांना स्वतःला समजत नाही किंवा त्यांना काय हवे आहे आणि त्यांना काय हवे आहे? तुम्हाला कोणत्या गंतव्यस्थानी जायचे आहे?

बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनवणे हे स्टेप सिम्बॉल बनत चालले आहे

आजची आधुनिक जीवनशैली आणि बदलती जीवनशैली यामुळे या गोष्टीला अधिक चालना मिळाली आहे. BBPM शाळेतील इयत्ता 7वीतील नम्रता म्हणाली, “माझ्या बहुतेक मित्रांना बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आहेत. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल आपापसात बोलतो. अशा परिस्थितीत बॉयफ्रेंड नसल्यामुळे मला अनेकवेळा लाज वाटायची. म्हणूनच मी बॉयफ्रेंडही बनवला आहे. आता मी पण मोठ्या अभिमानाने कुठेतरी जाते आणि माझ्या बॉयफ्रेंडसोबत मित्रांच्या पार्टीत जाते.

यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. आज गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड हे स्टेटस सिम्बॉल बनले आहे आणि जो याच्या पलीकडे आहे तो निगोशिएटर मानला जातो. मुलींना वाटतं की माझ्यात आकर्षण नाही, म्हणूनच मुलं माझ्याकडे बघत नाहीत.

कारणे काय आहेत

* कुटुंबातील मुलांना पुरेसा वेळ न देणे. अनेकदा आई-वडील दोघेही नोकरी करत असतात आणि विभक्त कुटुंबामुळे मूल घरात एकटेच राहते. मुलामध्ये अतृप्त कुतूहल निर्माण होते.

* मुलांना त्या कुतूहलांची उत्तरे हवी असतात पण पालकांकडे ना वेळ असतो ना उत्तरे, ना मुलांचे ऐकण्याचा संयम.

* बदलत्या जीवनशैलीमुळे मुले तणावग्रस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत, स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी ते आपुलकीचा आधार शोधू लागतात.

* या वयात उत्साह आणि उत्साह खूप जास्त असतो, वरून खाण्याच्या खाण्याच्या सवयी आणि जास्त ऊर्जा त्यांच्यात सेक्सची इच्छा वाढवते.

* अनेक वेळा भावनिकतेच्या आहारी गेलेली किशोरवयीन मुले निकालाची चिंता न करता, कोणते पाऊल, कधी उचलायचे हे लगेच ठरवून काहीही बोलू शकत नाहीत. कधीकधी मुले फसवणूक किंवा प्रेमात मन मोडणे सहन करू शकत नाहीत आणि ते मानसिकदृष्ट्या तुटलेले असतात. अशा परिस्थितीत त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी किंवा त्यांचे मानसिक संतुलन गमावण्यापूर्वी त्यांची काळजी घ्या. त्यासाठी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

* जर मुलाने चुकीच्या मार्गावर चालणे सुरू केले असेल, तर ही वेळ त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे त्याला प्रेमाने समजावून सांगितले जाऊ शकते. जर हा वेळ वाया गेला किंवा करिअरमध्ये अडथळा आला तर तो त्याच्या सर्व समवयस्कांच्या मागे असेल आणि आयुष्यात काहीही होणार नाही. तुमच्या बोलण्याचा नक्कीच मुलावर परिणाम होईल. फक्त त्याच्यासोबत राहा आणि तुम्ही नेहमी त्याच्या पाठीशी आहात याची जाणीव करून देत रहा. त्यांच्यापासून काहीही लपवू नका.

* जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचे मूल एखाद्याच्या प्रेमात पडले आहे, तेव्हा त्याला समजावून सांगा की हे लहान वयातील प्रेम आहे. हे फक्त एक आकर्षण आहे जे कालांतराने नाहीसे होऊ शकते.

* या वयात मुलं खूप संवेदनशील आणि भावनिक असतात, त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुमचे हृदय प्रेमात मोडते तेव्हा त्यांना तुच्छ लेखू नका. त्यांना मित्रांसारखे वागवा. त्यांच्या दु:खाला आपले दु:ख मानून, त्यांना आलिंगन द्या.

* मुलाच्या प्रेयसी किंवा बॉयफ्रेंडबद्दल संपूर्ण माहिती मिळवा आणि त्यांना घरी बोलावून त्यांच्याशी बोलण्याचा दृष्टिकोन अंगीकारा, ज्यामध्ये तुमच्या मुलाला तुमच्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही आणि तो सर्व काही शेअर करतो.

* शेवटी मी हेच सांगू इच्छितो की पालकांनी केलेला छोटासा प्रयत्न मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतो. मुलांच्या नाजूक वयाचा हा टर्निंग पॉइंट आहे. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची, त्यांना मार्गदर्शन करण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे.

५ टीप्स सुखी वैवाहिक जीवनासाठी

* रीना जैस्वार

अरेंज्ड किंवा लव्ह, लग्न कसेही झाले तरी, सासरच्या लोकांमध्ये आपसांतील मतभेद, वैचारिक मतभेद यासारख्या तक्रारी ही घर-घरची कथा आहे, कारण आपल्या समाजात लग्न फक्त २ व्यक्तींचे नाही तर २ कुटुंबांचे असते, जिथे लोक एकमेकांच्या विचारांबद्दल आणि स्वभावाबद्दल अनभिज्ञ असतात. आजकाल मुलं-मुली लग्नाआधी एकत्र येतात आणि एकमेकांना समजून घेतात, पण कुटुंबातील बाकीच्या सदस्यांना समजून घेण्याची संधी लग्नानंतरच मिळते. ज्याप्रमाणे सून सासरचे लोक कसे असतील याबाबत संभ्रमात असते, त्याचप्रमाणे सासरचे लोकसुद्धा सूनेच्या वर्तणुकीबद्दल अनभिज्ञ असतात. सासरी पती व्यतिरिक्त, सासू-सासरा, नणंद, दीर, जेठ-जेठाणीसह अनेक महत्त्वाची नाती आहेत.

जर ४ लोक एकाच छताखाली राहत असतील, तर वैचारिक संघर्ष होणे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा तो आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतो, तेव्हा संबंधांमध्ये कटुता येते.

आपापसांतील मतभेदाची कारणे

जनरेशन गॅप, कल्पना लादणे, अधिकार गाजविण्याची मानसिकता, वाढत्या अपेक्षा, पूर्वग्रह, आर्थिक समस्या, फसवणुकीला बळी पडणे, प्रेमात फूट पडण्याची भीती इत्यादी कारणांमुळे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. कधी-कधी स्वत: नवरासुद्धा सासू-सुनेमध्ये दुरावा निर्माण होण्याचे कारण बनतो. या सगळयांशिवाय आजकाल सासू-सुनेच्या नात्यावर आधारित टीव्ही मालिकाही आगीत तेल टाकण्याचे काम करत आहेत.

विवाहित अंजली म्हणते, ‘‘घरात पती आणि २ मुले वगळता सासू, नणंद, दीर, जेठ-जेठाणी आणि त्यांची मुले आहेत. घरात अनेकदा एकमेकांमध्ये भांडण आणि दुराव्याचे वातावरण असते, कारण सासू-नणंदेला वाटते की आम्ही सूना म्हणजे फक्त काम करणारी यंत्रे आहोत. आमचे हसणे-बोलणे त्यांना काट्यासारखे टोचत असते. परिस्थिती अशी आहे की कुटुंबातील सदस्य आपापसात बोलतही नाहीत.’’

मुंबईतील सोनम म्हणते, ‘‘माझ्या लग्नाला एक वर्ष झाले आहे. माझ्या लक्षात आले आहे की माझे पती एकतर आईचे ऐकतात किंवा आमच्यातील मतभेदांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, जे मला योग्य वाटत नाही. पती हा पत्नी आणि घरातील इतर सदस्यांमधील दुवा आहे, जो दोन्ही पक्षांना जोडतो. तो जरी कोणत्याही एका बाजूचे समर्थन करत नसेल, परंतु योग्य-अयोग्यबद्दल एकदा त्याने अवश्य विचार केला पाहिजे.’’

त्याचप्रमाणे ५० वर्षीय निर्मला म्हणते, ‘‘घरात सून तर आहे पण ती फक्त माझ्या मुलाची पत्नी आहे. तिला पती आणि मुलांव्यतिरिक्त घरात इतर कोणीही दिसत नाही. त्या लोकांमध्ये ती इतकी व्यस्त असते की ती आमच्या जवळ येऊन तासभरही बसत नाही, ना आमच्या तब्येतीची चौकशीही करते. आम्ही तिच्या वागण्याने किंवा जीवनशैलीने कधीही आनंदी नसतो, ज्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. मुलींचा संदर्भ देत ती अनेकदा उलट उत्तर देते. अशा परिस्थितीत तिच्या असण्याने किंवा नसल्याने आम्हाला काही फरक पडत नाही.’’

लग्नानंतर नात्यांमध्ये आलेल्या अशा काही कटुता कशा दूर कराव्यात की जेणेकरून लग्नानंतरही नेहमी आनंदी राहता येईल, त्यासाठी येथे काही टीप्स दिल्या आहेत :

अंतर कसे मिटवायचे : मानसोपचारतज्ज्ञ डॉ वृषाली तारे सांगतात की संयुक्त कुटुंबात आपापसात गोडवा असणे फार महत्वाचे आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा राखण्याची जबाबदारी कोणत्याही एका व्यक्तीची नाही, तर घरातील सर्व सदस्यांची असते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने समान प्रयत्न केले पाहिजेत.

विचारांमध्ये पारदर्शकता आणा : डॉ. वृषालीच्या मते, कुटुंबात एकमेकांमध्ये जास्तीत जास्त संवाद असावा, जो समोरासमोर असावा, डिजिटल नसावा. दुसरी गोष्ट एकमेकांच्या मतांमध्ये पारदर्शकता असावी जी कोणत्याही मजबूत नात्याचा पाया असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही लग्नानंतरही काम करत असाल किंवा कुठेतरी बाहेर जात असाल, तर घरी पोहोचताच लवकर किंवा उशिरा येण्याचे कारण, कार्यालयातील दिवस कसा राहिला यासारख्या छोटया-छोटया गोष्टी कुटुंबातील सदस्यांसह शेअर करा. यामुळे घराचे वातावरण हलके होईल तसेच एकमेकांवरील विश्वास वाढेल.

मेंटल प्रोटेस्ट टाळा : आजकालची सर्वात मोठी समस्या अशी आहे की आपण आधीच आपल्या मनात अशी धारणा बनवून चुकलो असतो की सून कधीही मुलगी होऊ शकत नाही, सासू कधीच आई होऊ शकत नाही. अशा नकारात्मक विचारांना मेंटल प्रोटेस्ट म्हणतात. असे अनेकदा दिसून येते की सुनांची मानसिकता अशी असते की घरी त्यांच्या वाट्याचे काम पडले असेल. सासू, नणंद नक्कीच काहीतरी बोलतील. अशा विचारसरणीचा संबंधांवर वाईट परिणाम होतो आणि याच विचारसरणीसह लोक संबंध सुधारण्याचा प्रयत्नही करत नाहीत. त्यामुळे अशा नकारात्मक विचारांच्या वर्तुळातून बाहेर पडणे आणि एकमेकांमधील वाढते अंतर कमी करणे आवश्यक आहे.

समुपदेशकाची मदत घ्या : डॉ. वृषाली तारे म्हणतात की संयुक्त कुटुंबात किरकोळ वाद, वैचारिक मतभेद सामान्य गोष्ट आहे, जे संवाद, प्रेम आणि संयमाने सोडवता येतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचे शरीर आणि मन निरोगी असेल. पण जर प्रकरण गंभीर असेल तर घरातील सर्व लोकांनी संकोच न करता समुपदेशकाची मदत घ्यावी. बहुतेक नात्यांमध्ये कटुतेचे कारण मानसिक अस्वस्थता असते, जी लोकांना समजत नाही.

रूढीवादी मानसिकतेतून बाहेर पडा : विज्ञान आणि आधुनिकतेच्या काळात रूढीवादी चालीरीतींमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. घरातील सदस्यांच्या राहणीमानात आणि जीवनशैलीत झालेले बदल स्वीकारा, कारण एकमेकांवर विचार लादण्याने कधीही नात्यात गोडवा येऊ शकत नाही. सहिष्णुता आणि आदर देणे ही केवळ तरुणांची जबाबदारी नाही, तर वडिलधाऱ्यांमध्येदेखील ही भावना असली पाहिजे, अधिकार गाजविण्याऐवजी किंवा कल्पना लादण्याऐवजी व्यक्तीला नात्यापेक्षा अधिक महत्त्व द्याल तर संबंध आपोआप सुंदर होतील.

हे उघड आहे की नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा आणि आपलेपणा यायला वेळ लागतो, परंतु नातेसंबंध असेच बनत नाहीत. यासाठी संस्कार आणि संगोपन महत्वाचे मानले जातात, कधीकधी योग्यवेळी योग्य विचार करणेदेखील खूप महत्वाचे असते.

घरून काम करून त्रासलेल्या बायका

* शैलेंद्र सिंग

‘‘अगं ऐकतेस का,’’ सारखा थोडया-थोडया वेळाने पतीचा हा आवाज ऐकून पत्नीचा संयम सुटू लागतो.

‘‘ऐकतेय, मी बहिरी नाही, बोला.’’ बायकोने रागाने उत्तर दिले.

बायकोला अस्वस्थ पाहून नवरा मंद स्वरात म्हणाला, ‘‘थोडे पापड तळून दिले असते… कधीतरी पकोडे बनवत जा.’’

असेच काहीसे आवाज आता बायकांच्या नित्यक्रमात सामील झाले आहेत. आता एवढं सगळं बनवून घरची सगळी कामंही करा, कारण लॉकडाऊन आहे, मदतीला कुणी नाही. इतक्या मसालेदार नाष्टयांनंतर जेवणात ही कोणती कसर राहू नये. दररोज चटणी, रायता, कोशिंबीर अदलून-बदलून हवी. वरून ही स्थिती की किचनमध्ये येऊन बोलतील की अगं, हे का बनवलं? हे तर मी उद्या बनवून घेण्याचा विचार केला होता.

रेणू अग्रवाल म्हणते, ‘‘कोरोनामध्ये काय-काय रडायचे, काही नाही बोलायचे आणि सर्व काही सहन करायचे. कुणाला सांगू मी माझ्या मनाची दशा. दशा झालीय माझी दुर्दशा. पतीसाठी घरून काम आणि पत्नींसाठी? दिवसभर काम करा. पूर्वी नवरेमंडळी फक्त रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीच घरी असायचे. आता सकाळपासून रात्रीपर्यंत स्वत:च लहान मोठया सासूबाईंपेक्षा कमी वाटत नाहीत. आता तर चोवीस तास बनियान घालून इंग्रजीभाषेच्या पांडित्याचे प्रदर्शन करत राहतात. कधी चहा, कधी कॉफीच्या भानगडीत मेंदूचे दही होत चालले आहे. ३ वेळा जेवण, ४ वेळा नाश्ता. कधी कधी तर वाटते की मलाच कोरोना व्हावा, कमीत कमी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये विश्रांती तर मिळेल.

घरून काम करण्याच्या बाबतीत बायकांना ना स्वातंत्र्य राहिले, ना कुठले टाइम टेबल. नवरा खाण्यापिण्यापासून जेव्हा मोकळा होईल, तेव्हाच तर इतर कामे होतील. तसे बनियानमध्ये आरामात बसून घरून काम करताना त्यांना आरामदायक वाटते, परंतु जेव्हा ऑनलाइन कॉन्फरन्स असते तेव्हा ते पँट-शर्ट आणि सकाळपासून रात्रीपर्यंत स्वत:च लहान मोठया सासूबाईंपेक्षा कमी वाटत नाहीत. आता तर चोवीस तास बनियान घालून इंग्रजीभाषेच्या पांडित्याचे प्रदर्शन करत राहतात. कधी चहा, कधी कॉफीच्या भानगडीत मेंदूचे दही होत चालले आहे. ३ वेळा जेवण, ४ वेळा नाश्ता. कधी कधी तर वाटते की मलाच कोरोना व्हावा, कमीत कमी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये विश्रांती तर मिळेल.

घरून काम करण्याच्या बाबतीत बायकांना ना स्वातंत्र्य राहिले, ना कुठले टाइम टेबल. नवरा खाण्यापिण्यापासून जेव्हा मोकळा होईल, तेव्हाच तर इतर कामे होतील. तसे बनियानमध्ये आरामात बसून घरून काम करताना त्यांना आरामदायक वाटते, परंतु जेव्हा ऑनलाइन कॉन्फरन्स असते तेव्हा ते पँट-शर्ट आणि टाय घालून व्यवस्थितपणे सजून-सवरून बसतात.

घरातून कामामुळे तणाव वाढला

घरातून कामामुळे हैराण झालेल्या बायकांची कहाणी मोठी आहे. दुखत्या नाडीवर फक्त हात लागायचे निमित्त असते. बायकांच्या वेदना उतू येऊ लागतात.

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आकांक्षा जैन सांगतात, ‘‘लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोच्या नात्यात वारंवार संघर्ष होताना दिसतोय. आधी असं वाटत होतं की प्रकरण १५-२० दिवसांचे आहे, तर सगळं काही अगदी उत्साहात चाललं. कधी नवरा स्वयंपाक करत असे, तर कधी बायको. नवरा घराची साफसफाई करायचा, मुलांची काळजी घ्यायचा, झाडांची देखभाल करायचा. पती-पत्नीला असं वाटत होतं जणू त्यांना बऱ्याच दिवसांपासून एकत्र काम करण्याची आणि वेळ घालवण्याची संधी मिळत नव्हती ती आता त्यांना मिळाली आहे. परंतु जसजसे लॉकडाऊनचे दिवस वाढू लागले आणि लॉकडाऊननंतरही घरून काम सुरूच राहिले, पती-पत्नीतील भांडणाच्या घटना वाढू लागल्या. कधी कधी या गोष्टी गंभीर होऊन पोलिसांपर्यंतही पोहोचू लागल्या.’’

आकांक्षा पुढे सांगते की, ‘‘लॉकडाऊनच्या सुरुवातीला घरातून कामाबरोबरच घरचा आनंदही लुटता येत होता, पण नंतर हळूहळू हा उत्साह ओसरू लागला.

लॉकडाऊन संपल्यानंतरही सर्व कार्यालये वर्क फ्रॉम होमद्वारे चालत राहिली. हे प्रकरण दीर्घकाळ चालणार हे आता स्पष्ट झाले आहे.

आई ऑनलाइन क्लासमध्ये अडकली

मानसशास्त्रज्ञ सुप्रीती बाली सांगतात, ‘‘गोष्ट फक्त घरून काम करण्यापुरतीच नाही. नवऱ्याचं ऑफिसच नाही, तर मुलांची शाळाही बंद असल्याने बायकांची जबाबदारी वाढत आहे. पूर्वी नवरा ऑफिसला आणि मुलं शाळेत गेल्यावर महिलांना स्वत:साठी वेळ मिळायचा. आता बायकोला दिवसभर घरची कामेही करावी लागतात आणि शिवाय गप्पदेखील बसावे लागते, कारण एकीकडे घरून काम चालू असते आणि दुसरीकडे ऑनलाइन क्लास असतो. मुलाला वेळेवर उठवणे, त्याची तयारी करून देऊन ऑनलाइन क्लाससाठी बसवावे लागते. ऑफिस आणि क्लास दोन्हीची वेळ बरोबर असते. पण मुलांची लवकर तयारी करावी लागते. त्याच वेळी त्यांना मदतही करावी लागते. घरात पूर्ण शांततादेखील ठेवावी लागते.’’

नोकरदार महिलांचे वेगळे दुखणे आहे

चंद्रप्रभा नर्सिंग सेवेत आहेत. कोरोनाच्यावेळी त्यांच्या ड्युटीच्या वेळाही बदलल्या आणि कामाचे तासही बदलले. त्यांचे पतीही नोकरीला आहेत. चंद्रप्रभा सकाळी लवकर उठतात. जेवण, नाश्ता एकाच वेळेस बनवितात. पती आणि मुलांना नाश्ता देऊन तयार करतात. मुलांना मदत करण्यासाठी त्यांची आई घरीच असते. मग त्या आपले कर्तव्य बजवायला जातात. जेव्हा त्या वेळेवर परत येऊ शकत नाहीत तेव्हा त्यांची आईच मदत करते. त्या कामावरून थकूनभागून घरी येतात तेव्हा त्यांची आईही थकलेली असते. जे काही ठेवलेले असते ते खाऊन त्या परत रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागतात. पुन्हा दुसऱ्या दिवसाची चिंता सुरू होते.

आकांक्षा जैन सांगतात, ‘‘गृहिणीपेक्षा नोकरदार महिलांना जास्त त्रास होतो. पूर्वी नवरा ऑफिसला जायचा आणि मुलं शाळेत, मग तेवढा वेळ घराची चिंता नसायची. आता नवरा आणि मुलं घरी आहेत, त्यामुळे तिला ऑफिसमध्ये राहूनही घराची काळजी करावी लागते. ज्या घरात आजी-आजोबा किंवा कोणी नातेवाईक मदतीला असतील तेथे ठीक आहे, पण जिथे एकल पालक आहेत तिथे समस्या जास्त आहेत. नोकरदार महिलांसाठी ऑनलाइन क्लास आणि घरून काम करणे हे जात्यासारखे आहे, ज्यामध्ये स्त्रिया पीसल्या जात आहेत.’’

गेला गप्पांचा काळ

कोरोनापूर्वी महिला पतीला ऑफिस आणि मुलांना शाळेत पाठवल्यानंतर स्वत:साठी वेळ काढून घराबाहेर पडायच्या. कधी किटी पार्टी, कधी फिल्म तर कधी आऊटिंगमध्ये वेळ घालवत असायच्या. फक्त रविवार आणि सुट्टीच्या दिवशीच नवरा आणि मुलांसोबत घरी वेळ घालविला जाई. आता बाहेर पडणे बंद झाले आहे. फोनवरच्या गप्पांमध्ये एक भीती असते की कदाचित समोरची व्यक्ती आपले बोलणे रेकॉर्ड तर करणार नाही ना. अशा परिस्थितीत सासू आणि मैत्रिणींबद्दल उघडपणे बोलणे गॉसिपमध्ये केले जात नाही. कुठेतरी बाहेर जातानाही सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात. खाण्या-पिण्यापासून ते मास्क लावण्यापर्यंत गोंधळाला सामोरे जावे लागते.

संतोष कुमारी सांगतात, ‘‘४ महिन्यांनंतर मी घरातून बाहेर पडले तेव्हा एखाद्या मोकळया जागेवर आल्यासारखं वाटत होतं. माझंच शहर मला बदलल्यासारखं वाटत होतं, कारण मी खूप दिवसांनी पाहत होते. मास्क घालायची सवय नाही म्हणून गाडी चालवताना मास्क काढला. चौकात पोलिसांनी मास्क न लावलेले बघितल्यावर दंडाची पावती फाडली. गाडीत असताना मास्क घालायची काय गरज? हे समजत नाही. कोरोनापूर्वी आम्ही बिनधास्त हिंडायचो आणि मजा करायचो, आता जणू एका बांधणीत जगतोय असं वाटतंय. गॉसिपच नाही तर मेकअप करण्याची मजाही निघून गेली. जर चेहराच दाखवायचा नाही तर मग मेक-अप काय करणार, स्त्री मेकअपशिवाय अपूर्ण असते.’’

लॉकडाऊन संपल्यानंतरही घरून काम आणि ऑनलाइन क्लासेस चालण्याने बायकांचा त्रास संपलेला नाही. त्यांचा बराचसा वेळ पती आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यातच जातो. नवरा आणि मुलांसोबत राहायचे आहे आणि त्यांच्या सुखसोयींची काळजी घ्यायची आहे, पण त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे तणाव आणखी वाढतो. कोरोनाचा सर्वाधिक फटका पत्नींना बसला आहे. काम वाढले पण मजामस्ती कमी झाली.

नाजूक आहेत कमकुवत नाही

* रोहित

२१ व्या शतकातील २०२२ या वर्षात आपण पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी बरेच बदल झाले, पण एक गोष्ट जशीच्या तशी आहे आणि ती म्हणजे समाजातील महिलांची स्थिती. हजारो वर्षांपासून जगात एक रुढीवादी परंपरा आपली मुळे घट्ट रोवून आहे, जी असे सांगते की, पौराणिक काळापासूनच देव आणि निसर्गाने महिला, पुरुषांमध्ये भेदभाव केला आहे. यामुळे पुरुषांचे काम वेगळे आणि महिलांचे काम वेगळे आहे. ही प्रवृत्ती नेहमीच असे सांगत आली आहे की, आदि मानवासापासून जेव्हा कधी जेवण गोळा करण्यासारखे अवघड काम करावे लागले, मग ती जुन्या काळात शिकार करणे असो किंवा आजच्या युगात बाहेर पडून कुटुंबासाठी पैसे कमावणे असो, त्यासाठी पुरुषांनाच सक्षम ठरवण्यात आले आहे आणि शारीरिकदृष्टया कमकुवत असल्यामुळे महिलांच्या वाटयाला घरातली कामे आली आहेत.

या लैंगिक भेदामुळेच महिलांचे बाहेर पडून काम न करण्यामागचे कारण त्यांचा शारीरिक कमकुवतपणा असल्याचे सांगण्यात आले. त्यांची शारीरिक ठेवण पुरुषांच्या तुलनेत दुबळी किंवा कमकुवत आणि अशुद्ध ठरवण्यात आली. त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले. त्या पुरुषांच्या तुलनेत शारीरिकदृष्टया कमकुवत आहेत, बाहेरचे काम करण्यासाठी योग्य नाहीत आणि कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाहीत, याची जाणीव त्यांची त्यांनाच करून देण्यात आली.

हेच कारण आहे की, आज लिंगावर आधारित असमानतेवर जगभरात वादविवादाच्या फैरी झोडत आहेत. महिलांचा शारीरिक दुबळेपणा हा नेहमीच या वादातील एक मोठा भाग राहिला आहे. याच

वादादरम्यान संशोधकांनी दक्षिण अमेरिकेतील एंडिज पर्वतरांगेत ९,००० वर्षांपूर्वीच्या अशा एका जागेचा शोध लावला जिथे महिला शिकाऱ्यांना दफन केले जात असे. या शोधामुळे प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या पुरुषप्रधान वर्चस्वाला आव्हान मिळाले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाशी जोडले गेलेले आणि या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिक असलेले रँडी हास यांचे म्हणणे आहे की, प्राचीन काळातील दफनविधी प्रक्रियेचे हे संशोधन आणि विश्लेषण फक्त पुरुषच शिकारी असण्याचे पुरुषांचे वर्चस्व मोडणारे आहे.

कुशल शिकारी

या संशोधनात यावर शिक्कामोर्तब झाले आहे की, प्राचीन काळात पुरुषांप्रमाणेच महिलाही घराबाहेर पडून शिकार करायच्या. त्यावेळी बाहेर पडून शिकार करणे हे पूर्णपणे श्रमावर आधारित होते, लिंगभेदावर नाही.

२०१८ मध्ये पेरूच्या पर्वतांवरील उंचीवर पुरातत्त्व उत्खननादरम्यान संशोधकांनी जुन्या शिकाऱ्यांना दफन केलेल्या प्राचीन जागेचा शोध लावला होता. तेथे शिकारीची आणि प्राण्यांना कापण्याची धारदार अवजारे सापडली होती. त्याच ठिकाणी ९,००० वर्षांपूर्वी दफन केलेले मानवी सांगाडे सापडले. त्यांची हाडे आणि दातांच्या तपासणीनंतर ते महिलांचे सांगाडे असल्याचा निष्कर्ष निघाला.

 

उत्तरेकडील आणि दक्षिणी अमेरिकेत सापडलेल्या अशा १०७ प्राचीन ठिकाणांच्या संशोधनानंतर संशोधकांनी ४२९ सांगाडयांची ओळख पटवली. संशोधकांनी सांगितले की, यातील एकूण २७ शिकाऱ्यांचे सांगाडे होते, ज्यात ११ महिला आणि १६ पुरुष होते. सांगाडे आणि संशोधकांनी लावलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, प्राचीन काळात महिलाही शिकार करायच्या. इतकेच नव्हे तर शिकारीच्या कामात पुरुषांच्या तुलनेत महिलाही जवळपास बरोबरीतच होत्या. संशोधनानुसार संशोधकांचे असे म्हणणे आहे की, त्या काळात शिकारीच्या कामात महिला, पुरुषांचे समान वर्चस्व होते. महिलांचा शिकारीत सहभाग घेण्याचा वाटा जवळपास ३०-५० टक्के पर्यंत होता. उत्खननात सापडलेल्या सांगाडयांच्या आधारावर असा निष्कर्ष निघतो की, असे कोणतेच निर्बंध (नैसर्गिक किंवा दैवी) त्या काळात महिलांवर नव्हते, ज्या आधारे असे म्हणता येईल की, तेव्हा कामांची विभागणी होत असे.

हा शोध लैंगिक समानतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचे मोठे कारण महिला आणि पुरुषांमध्ये कामाच्या विभागणीवरून पूर्वापार चालत आलेला वाद हे आहे. या संशोधनात जी महत्त्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे त्या काळात महिला पूर्णपणे स्वावलंबी होत्या. स्वत:चे निर्णय स्वत:च घेत होत्या. एका महिलेचे शिकारी असणे हेच सांगते की, ती आपली जमात किंवा कुटुंबासाठी बाहेर पडून काम करत होती. स्वत:च्या मुलांचे पोट स्वत: भरू शकत

होती. तिला पुरुषाच्या खांद्याच्या आधाराची गरज नव्हती. शिकार करून आणलेल्या मांसाचे वाटप कशा प्रकारे करायचे आहे, किती करायचे आहे आणि ते कोणाला द्यायचे आहे, हे सर्व निर्णय महिलाच घेत असत. हे स्वाभाविक आहे की, जो आपल्या जमातीचे पोट भरतो त्याला त्या जमातीवर वर्चस्व गाजवण्याचा अधिकार असतो. अशा वेळी जर महिला आणि पुरुष बरोबरीने कुटुंबाचे पालनपोषण करत असतील तर तिथे दोघांना समान अधिकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिकारी होण्यामागचा एक अर्थ असाही आहे की, त्या काळातील महिलांकडे आपल्या सुरक्षेसाठी लागणारी हत्यारे होती. ही हत्यारे त्यांना सुरक्षा मिळवून देण्यासोबतच ती त्यांच्याकडील बहुमूल्य साधनांपैकी एक होती. यातून कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो, जसे की, ज्या पुरुषी समाजात महिलांना स्वत:कडे संपत्ती ठेवण्याचा अधिकार नसेल, पण कदाचित त्या काळात महिलांकडेच मौल्यवान संपत्ती म्हणून पाहिले जात असेल. त्यामुळेच त्या काळातील तो एक असा समाज असेल जिथे महिलांकडे संपत्तीच्या रूपात हत्यारांचे असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.

महिला शारीरिकदृष्टया दुबळया किंवा कमकुवत असतात, त्यामुळेच त्या घराबाहेरची कामे करण्यासाठी योग्य नाहीत, असा जो तर्क पुरुषप्रधान संस्कृती पूर्वापारपासून लावत आली आहे त्या तर्काला या संशोधनाने मोठा धक्का दिला आहे. शिकारीसारख्या कामासाठी आवश्यक असलेली शारीरिक चपळता, ताकद, हिंमत महिलांमध्ये होती, सोबतच त्या हे काम करण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत कुठेच कमी नव्हत्या. अशा वेळी प्रश्न असा उपस्थित होतो की, जर प्राचीन काळात महिला शारीरिकदृष्टया पुरुषांच्या बरोबरीने काम करत होत्या तर मग आज याच्या अगदी उलट अशी त्या शारीरिकदृष्टया कमकुवत असल्याची प्रतिमा समाजात कशी रूढ झाली?

धर्माचे निर्बंध

जगातील कितीतरी इतिहासकारांनी महिलांवरील पुरुषांच्या वर्चस्वाशी संबंधित असलेले अनेक शोध यापूर्वी लावले आहेत. ज्यात त्यांनी असे सांगितले की, आदियुगात अशा समाजाचे अस्तित्व होते जिथे कुठलीही गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य महिलांना होते. परंतु या शोधांवर सर्वात जास्त कठोर आणि थेट हल्ला ज्या लोकांनी केला ते धर्मकर्माशी जोडलेले रुढीवादी लोक होते. त्यांच्या मतानुसार जग देवाने बनवले आहे आणि महिलांच्या शारीरिक ठेवणीला कमकुवत तर पुरुषांना बळकट करून या जगाचे संतुलन साधण्यात आले आहे. त्यांच्या या तर्कामुळेच पुरुषांना संरक्षक आणि महिलांना अबलेचा दर्जा देण्यात आला.

हे पूर्णपणे महिलांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रत्येक धर्मातील त्या कथांना, ग्रंथांना प्रमाण मानण्यात येऊ लागले जे महिलांना आदर्श स्त्री किंवा पतिव्रता बनण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर दबाब आणणारे होते. महिलांनी पतिव्रता असणे केवळ वंशाच्या शुद्धीसाठीच नव्हे तर परपुरुषाशी तिने शारीरिक संबंध ठेवू नयेत यासाठीही गरजेचे मानले जाऊ लागले.

धर्मदेखील आहे जबाबदार

हिंदू समाजातील ग्रंथ, पौराणिक कथा, रामायण, महाभारत, गीता, वेद आणि तत्सम संबंधित कथांमध्ये सामूहिकरित्या सांगण्यात आले आहे की, महिलांनी स्वतंत्र होता कामा नये.

मनुस्मृती ज्याला सरंजामशाहीचे संविधान मानले जाते त्यात महिला पुरुषांच्या तुलनेत कमकुवत आणि दुय्यम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जवळपास सर्वच संघटित धर्मग्रंथांमध्ये पृथ्वीवरील संतुलनासाठी लिंग भेदभाव हे प्रमाण मानले गेले. ज्या पौराणिक ग्रंथांमधून महिला स्वतंत्र असल्याचे आणि सक्षम असल्याचे समोर आले तिथे ते ग्रंथ किंवा अशा सक्षम महिलेला राक्षसीन, कुरूप समजण्यात आले. त्यांच्याऐवजी घाबरलेल्या, भित्र्या, कमकुवत, गृहिणी असलेल्या महिलेलाच आदर्श मानण्यात आले

या सर्व बुरसटलेल्या विचारसरणीमुळे महिलांना घराबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले, सोबतच राहणीमान, वागणे-बोलणे, हसणे, यौन शुचिता अशा सर्वच बाबतीत तिच्यावर निर्बंध लादण्यात आले. याचे दूरगामी परिणाम असे झाले की, महिलांकडून जबरदस्तीने किंवा त्यांना आपले म्हणणे पटवून देऊन त्यांच्याकडून यासाठी परवानगी घेण्यात आली की, त्यांचे व्यक्तिमत्त्व निसर्गत:च पुरुषांपेक्षा दुबळे, कमकुवत आहे. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी पुरुषांचा आधार घ्यायला हवा.

असो, पण या संशोधनातून २ गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे महिलांचे व्यक्तिमत्त्व नैसर्गिकरित्या पुरुषांपेक्षा कमकुवत नाही आणि दुसरे म्हणजे धर्मात महिलांसाठी लिहून ठेवण्यात आलेल्या सर्व गोष्टी या ईश्वराच्या मुखातून निघालेली अमरवाणी नाही तर धर्मातील पुरुष ठेकेदारांनी अर्ध्या लोकसंख्येकडून फुकटात श्रमाची कामे करून घेण्यासाठी आणि भोगविलासाचे जीवन जगण्यासाठी करून ठेवलेली तरतूद आहे.

आधीही नव्हती आणि आताही कमकुवत नाही

उत्तराखंडातील पौडी जिल्ह्यातील जलथा गावात राहणाऱ्या ४४ वर्षीय बसंती भंडारीचे गाव कोटद्वार शहरापासून खूप दूर, दुर्गम भागात आहे. या गावातील जनजीवन त्याच्या जवळ असलेल्या इतर भागातील गावांसारखेच खूप अवघड आहे. पहाडी, दुर्गम भाग असल्यामुळे आजही लोकांना उदरनिर्वाहासाठी बऱ्याच लांबवर शेती करण्यासाठी जावे लागते. त्यासाठी बसंती देवी यांना पाळीव जनावरांचे वजनदार शेण गोळा करून त्याचे खत बनवून ते डोक्यावरून २-३ किलोमीटरपर्यंत घेऊन जावे लागते. असे काम करण्यासाठी हिंमत आणि प्रचंड ताकदीची गरज असते.

बसंती भंडारी सांगतात, ‘‘माझे अर्धे आयुष्य असेच मेहनतीच्या कामात गेले. पर्यटकांना हे पर्वत आवडतात, पण मी नेहमीच येथे खूप काबाडकष्ट केले.

‘‘इतके अवजड वजन डोक्यावर वाहून नेण्याबाबत त्यांनी सांगितले की, पुरुषांचे काम फक्त शेतात बैलांना हाकून नांगर चालवण्यापुरतेच आहे. महिलांनाच पेरणी, खत घालणे, कापणी, गवत आणणे, दूरवरून पाणी, लाकडे आणणे, अशी श्रमाची कामे करावी लागतात. तरीही त्याची दखल कुठेच घेतली जात नाही. खरंतर जास्त मेहनतीची कामे महिलाच करतात.

नाही आहोत कमकुवत

असे फक्त खेडोपाडयात पाहायला मिळत नाही. दिल्ली शहरात मजुरी करणाऱ्या २६ वर्षीय मुनमुन देवीचे गाव उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात आहे. लग्नाला वर्ष झाल्यानंतर त्या ४ वर्षांपूर्वी आपल्या पतीसह दिल्ली शहरात आल्या होत्या. मुनमुन यांना ३ मुले आहेत. या ३ मुलांमध्ये १ मुलगी असून ती दिड वर्षांची तर मुलगा २ वर्षांचा आहे. मोठा मुलगा ३ वर्षांचा आहे. दिल्लीतील बलजीत नगर परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे, तिथे सरकारी ठेकेदाराकडे काम करताना मुनमुन एका हाताने आपल्या ३ वर्षांच्या रडणाऱ्या मुलाला कसेबसे आपल्या कमरेवर पकडून डोक्यावर सिमेंटने भरलेले घमेले घेऊन जाते.

मुनमुन सांगते की, मी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पतीसोबत मजुरी करते. आमच्यातील बहुतांश महिलांचे काम डोक्यावरून विटा उचलून नेणे, घमेल्यातून सिमेंट आणणे, खड्डा खोदणे असे असते. या कामासाठी आम्हाला तितकीच ताकद लागते जितकी एका पुरुषाला हे काम करण्यासाठी लागेल. असे असताना आम्ही कमकुवत कशा काय? अनेकदा आम्हाला कामादरम्यान मुलांना दूधही पाजावे लागते.’’

युनायटेड नेशनच्या एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय महिलांना एकूण कामांपैकी ५१ टक्के कामांचा मोबदला मिळत नाही. दुसरीकडे जगभरात घरातील ७५ टक्के काम महिला कोणताच मोबदला न घेता करतात. तरीही जगातील ६० टक्के महिला किंवा मुली भुकेल्या असतात. त्यांच्यात भूकबळीचे प्रमाण अधिक असते.

एका अभ्यासानुसार, आफ्रिका आणि आशियात एकूण कामगारांपैकी जवळपास ६० टक्के कामगार महिला असतात आणि तरीही पुरूषप्रधान समाजात त्यांना शेतकऱ्याचा दर्जाही मिळत नाही.

अशा वेळी हे स्पष्ट आहे की, महिला पूर्वीही कमकुवत नव्हत्या आणि आजही नाहीत. त्या शारीरिकदृष्टया सक्षम आहेत. पुरुषांप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. फक्त समाजाच्या डोक्यातून महिलांना कमकुवत समजण्याच्या संकुचित विचाराला कायमची तिलांजली देण्याची गरज आहे.

 

ब्रेकअपपासून मुक्ती मिळविण्याचे ५ उपाय

* रितू वर्मा

जेव्हा अंशूला समजले की तिची भाची आरवीचे ५ वर्षं जुने नाते तुटले आहे, तेव्हा ती खूप घाबरली. आरवी आणि कबीरची जोडी किती छान होती. दोघेही मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिकत होते. दोन्ही कुटुंबांनी हे नाते स्वीकारले होते, फक्त सामाजिक मान्यता मिळणे बाकी होते. अंशु अतिशय दु:खी मनाने तिच्या बहिणीच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की आरवी अगदी सामान्य दिसत होती आणि खदखदा हसत होती.

अंशूला मनाशी वाटले की आजकालच्या मुलांचे प्रेम पण काय प्रेम आहे. हवं तेव्हा नात्यात पडायचे आणि हवं तेव्हा ब्रेकअप करायचे. ही आजकालची नाती पण काय नाती आहेत? सर्व   केवळ शारीरिक पातळीवरच आधारित आहेत.

अंशूला तिचा तो काळ आठवला जेव्हा तिचे प्रवेशसोबतचे नाते तुटले होते. पूर्ण दोन वर्षे ती या गर्तेतून बाहेर पडू शकली नव्हती. तिने आपले नवीन नाते मोठया अवघडपणे स्वीकारले होते? कधी-कधी अंशूला वाटतं की आजपर्यंत ती आपल्या पतीला स्वीकारू शकली नाही. प्रवेशसोबतच्या त्या तुटलेल्या नात्याची सल अजूनही कायम आहे.

रात्री आरवीने अंशूला मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘मावशी, तू आलीस हे खूप चांगले झाले. माझे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे आहे, म्हणूनच तर मी हा निर्णय घेऊ शकले.’’

पण अंशूला वाटले की खरंतर आरवीला कधीच कबीरशी प्रेम जडले नव्हते. पण आरवीच्या म्हणण्यानुसार गुदमरल्यासारखे जगण्याऐवजी जर तुमचे जमत नसेल तर ब्रेकअप करून आगेकूच का करू नये.

दुसरीकडे जेव्हा मानसीचे ऋषीसोबतचे २ वर्षे जुने नाते तुटले तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली. आपल्या बरोबर तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे जगणेही कठीण केले होते, कोणतेही नाते जबरदस्तीने टिकत नसते. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी संबंध ठेवू इच्छित नसेल तर गयावया करण्याऐवजी जर तुम्ही सन्मानाने पुढे वाटचाल केलीत तर ते केवळ तुमच्या जोडीदारासाठीच नाही तर तुमच्यासाठीही चांगले होईल.

जर आपण वैयक्तिक जीवनात या छोटया-छोटया व्यावहारिक टिप्स अवलंबल्या तर खूप लवकर आपण परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करू शकता :

हुतात्मा भावनेने फिरू नका : ब्रेकअप झाला म्हणजे तुम्ही २४ तास मुळूमुळू रडक्या तोंडाने फिरत राहावे असे नव्हे. हा जीवनाचा शेवट नाही. आयुष्य तुम्हाला पुन्हा आनंद मिळवण्याची संधी देत आहे. तुमची ओळख ही तुमच्या स्वत:मुळे आहे. अनेकवेळा आपण नात्यांमध्येच आपले अस्तित्व शोधू लागतो. म्हणूनच आपल्याला कोणत्याही किंमतीत ब्रेकअप करायचे नसते. १-२ दिवस मूड खराब होणे स्वाभाविक आहे, परंतु त्या वाईट नातेसंबंधाच्या आठवणी च्युइंगमप्रमाणे दीर्घकाळ ओढत बसू नये.

हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा : एका अपघाताचा अर्थ तुम्ही आयुष्य जगणे थांबवणे असा होत नाही. हृदयाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा. प्रत्येक रात्रीनंतर एक सकाळ नक्कीच असते. एखादा अनुभव वाईट असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आशेच्या किरणापासून तोंड फिरवावे.

कामात मन लावा : काम हे प्रत्येक आजारावरचे औषध असते, म्हणून स्वत:ला कामात बुडवून घ्या, अर्ध्याहून अधिक दु:ख तर असेच गायब होईल आणि जितके जास्त काम तुम्ही मन लावून कराल तितकी तुमची प्रतिभा अधिक सुधारेल आणि प्रगतीचे मार्ग उघडतील.

आशा सोडू नका : ब्रेकअप झाल्यानंतर लोक निराशेच्या गर्तेत गेल्याचे अनेकदा पाहायला मिळते. एका गुदमरणाऱ्या नात्यात सर्व आयुष्य निराशेत घालवण्यापेक्षा ब्रेकअप करून नव्याने सुरुवात करणे चांगले आहे, आशेचा पदर धरून ठेवा आणि ब्रेकअपनंतर नवीन सुरुवात करा.

आयुष्य सुंदर आहे : आयुष्य सुंदर आहे आणि ब्रेकअपमुळे त्याच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या ब्रेकअपमधून काहीतरी शिका आणि त्याच चुका पुन्हा करू नका.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्रेकअप म्हणजे पूर्णविराम नव्हे, तर नात्याची नवी सुरुवात असते.

पोटगी कायदा काय म्हणतो

* गरिमा पंकज

लग्न हे प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. २ लोक एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि एकमेकांचा आधार बनतात, परंतु जेव्हा नात्यात प्रेम कमी आणि गुदमरणे जास्त होते तेव्हा अशा नात्यापासून वेगळे होणेच शहाणपणाचे मानले जाते. पण वेगळे झाल्यानंतरचा रस्ता ही तितकासा सोपा नाही.

पती-पत्नीचे नाते तुटल्यानंतर अनेकदा महिलांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. असे घडते कारण महिला सहसा आर्थिक गरजांसाठी त्यांच्या पुरुष जोडीदारावर अवलंबून असतात. वाद

पत्नी नोकरी करत नसल्यास, वाद झाल्यास न्यायालय महिलेचे वय, शैक्षणिक पात्रता, कमाईची क्षमता लक्षात घेऊन पोटगीचा निर्णय देते. मुलाची देखभाल करण्यासाठी वडिलांना वेगळे पैसे द्यावे लागतात.

सर्वोच्च न्यायालयाने मासिक पोटगीची मर्यादा निश्चिंत केली आहे. ती पतीच्या एकूण पगाराच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. पतीच्या पगारात बदल झाल्यास ती वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते.

परंतु अनेक वेळा असे दिसून येते की पती पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ करतात आणि कसेही करून ही रक्कम कमीत कमी करून घेण्याचा प्रयत्न करतात. आपले उत्पन्न खूपच कमी असल्याचे ते न्यायालयासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

भत्ता देण्यास नकार

हैदराबादमधील नुकतेच घडलेले एक प्रकरण लक्षात घेण्यासारखे आहे. एका डॉक्टरने आपल्या वेगळया राहत असलेल्या पत्नीला दरमहा १५,००० रुपये पोटगी देण्याच्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की या दोघांचे १६ ऑगस्ट २०१३ रोजी लग्न झाले होते आणि दोघांना १ अपत्यही आहे. मुलाच्या जन्मानंतर पती-पत्नीमध्ये काही मतभेद निर्माण झाले. पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणासह पोटगीसाठी अर्ज दाखल केला. पतीला दरमहा 80 हजार रुपये पगार आणि घर व शेतजमिनीतून 2 लाख रुपये भाडयाचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा पत्नीने केला होता. तिने स्वत:च्या आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी मासिक रुपये 1.10 लाखांची मागणी केली.

कौटुंबिक न्यायालयाने मुख्य याचिकेचा निकाल लागेपर्यंत पत्नी आणि मुलाला दरमहा रुपये १५ हजार पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयाविरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की आजच्या काळात केवळ रुपये 15 हजारात मुलाचे संगोपन करणे शक्य आहे का? लोकांच्या क्षुद्र प्रवृत्तीकडे लक्ष वेधत खंडपीठाने सांगितले की आजकाल बायकांनी भरणपोषणाची मागणी केल्यावर नवरे म्हणतात की ते आर्थिक संकटातून जात आहेत किंवा गरीब झाले आहेत. हे योग्य नाही. लग्नाच्या बाबतीत विचित्र ढोंगीपणा आपल्या देशात पाहायला मिळतो. जेव्हा नातेसंबंध जोडण्याची गोष्ट येते तेव्हा मुलाचे उत्पन्न आणि राहणीमान शक्य तितके फुगवून सांगितले जाते, परंतु जेव्हा लग्नानंतर बेबनाव होऊ लागतो आणि मुलाला पत्नीपासून मुक्त व्हावेसे वाटू लागते तेव्हा परिस्थिती उलट होते. कोर्टात पती स्वत:ला अधिकाधिक असहाय्य आणि गरीब सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ही दुहेरी मानसिकता अनेक महिला आणि त्यांच्या मुलांसाठी यातनांचे कारण बनते.

अलीकडेच दिल्लीतील रोहिणी येथील न्यायालयात यासंबंधीच्या एका प्रकरणाची सुनावणी झाली. तक्रारदार ही ३ वर्षाच्या मुलाची आई आहे. ती तिच्या पतीपासून वेगळी राहते आणि तिच्या पालकांच्या खर्चावर उदरनिर्वाह करत आहे. तिचा पती भोपाळचा मोठा व्यापारी आहे. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम आहे.

मात्र जेव्हा पत्नी आणि मुलाला पोटगी देण्याची वेळ आली तेव्हा प्रतिवादी पतीने आपली आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे सांगून आपल्या नावाने घेतलेले संगणक आणि लॅपटॉपही आपल्या आईच्या नावे हस्तांतरित केले. पूर्वी त्याच्या मालकीची असलेली कंपनीदेखील त्याने त्याच्या आईच्या नावावर केली होती जेणेकरून त्याला पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलाचा देखभालीचा खर्च टाळता यावा. त्याने तात्काळ कंपनीचा राजीनामा दिला आणि आता त्याच्या नावावर एक पैसाही नाही.

त्याच्या या वागण्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले की लोकांच्या या दुहेरी मानसिकतेला काय म्हणावे, ते स्वत:च्या मुलाचा खर्च उचलण्यास तयार नाहीत. नंतर न्यायालयाने पतीला कनिष्ठ न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगीची रक्कम पत्नी आणि मुलाला देण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने महिला आणि तिच्या अजाण बाळासाठी १५ हजाराची अंतरिम रक्कम देण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला पतीने सत्र न्यायालयात आव्हान दिले असता सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

यासारखी प्रकरणे दर्शवतात की काही लोकांसाठी नातेसंबंधांचे काहीही महत्त्व नसते. त्यांच्यासाठी पैशांपेक्षा काहीही महत्वाचे नाही. पैसे वाचवण्यासाठी हे लोक प्रामाणिकपणा बाजूला ठेवून कितीही खालच्या स्तरावर जाऊ शकतात. याचा फटका मुलाला सहन करावा लागतो.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या गोष्टी लक्षात घेऊन नुकताच सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वादाच्या प्रकरणात पोटगीची रक्कम ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की कोर्टातील कामकाजादरम्यान दोन्ही पक्षांना त्यांची मालमत्ता आणि दायित्वे यांचा खुलासा अनिवार्यपणे करावा लागेल. तसेच न्यायालयात अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासूनच पोटगीचा निर्णय घेतला जाईल.

सुप्रीम कोर्टाने सांगितले की देखभालीची रक्कम दोन्ही पक्षांच्या स्थितीवर अवलंबून आहे. पत्नीची गरज, मुलांचे शिक्षण, पत्नीचा व्यावसायिक अभ्यास, तिचे उत्पन्न, नोकरी, पतीची स्थिती असे सर्व मुद्दे पहावे लागतील. दोन्ही पक्षांची नोकरी आणि वयही पाहावे लागेल. या आधारे महिलेला किती पैसे द्यायचे हे ठरवले जाईल.

अनेकवेळा असेही घडते की पतीच्या क्षमतेपेक्षा जास्त पोटगीची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत जर पतीने हे सिद्ध केले की तो इतकेही कमावत नाही की स्वत:ची काळजी घेऊ शकेल किंवा पत्नीचे उत्पन्न चांगले आहे किंवा तिने दुसरे लग्न केले आहे, पुरुषाचा त्याग केला आहे किंवा इतर पुरुषाशी तिने संबंध ठेवला आहे, तर त्याला उदरनिर्वाह खर्च द्यावा लागणार नाही. स्वत:च्या कमी उत्पन्नाचा किंवा तुमच्या पत्नीच्या पुरेशा उत्पन्नाचा पुरावा सादर केला तरीही पोटगीचा बोजा पडणार  नाही.

फेब्रुवारी, २०१८ मध्ये पंजाब-हरियाणा हायकोर्टाने पोटगीबाबत असाच एक आदेश जारी करताना हे स्पष्ट केले होते की जर पत्नी स्वत:ला सांभाळू शकत असेल तर ती पतीकडून पोटगी मिळविण्यासाठी पात्र नाही म्हणजेच पतीने उच्च न्यायालयाला सांगितले होते की याचिकाकर्ता ही सरकारी शिक्षिका असून ऑक्टोबर २०११ मध्ये तिचा पगार ३२ हजार रुपये होता. या आधारावर न्यायालयाने तिची पोटगीची मागणी फेटाळून लावली.

नाते तुटल्यानंतरही एकमेकांप्रती माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपणे आवश्यक आहे विशेषत: मुले असताना, कारण या गोष्टींचा परिणाम कुठे न कुठेतरी मुलांच्या भविष्यावर होत असतो.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें