गाथा नवनाथांची

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी ‘गाथा नवनाथांची’ ही पौराणिक मालिका लवकरच ९०० भागांचा टप्पा पार करणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचा अवतार, त्यांचा प्रवास आणि लीला हे सर्व दाखवण्यात आले आहे. सध्या नागनाथांचा  प्रवास व त्यांचे चमत्कार प्रेक्षक भक्तांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एकीकडे नाथांचा नकारात्मक गोष्टींविरुद्ध लढा सुरू आहे तर एकीकडे नागनाथ आणि भर्तरीनाथ यांचावर होणारे संस्कार पाहायला  मिळताहेत. पण आता मालिकेत दिसणार आहे अक्काबाई ही नकारात्मक व्यक्तिरेखा. अक्काबाई ही नाथांविरोधात उभी राहणार असून नाथांच्या पुढील कार्यात ती अडथळा निर्माण करणार आहे. अक्काबाईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनाली पाटील आता नव्या भूमिकेत येणार आहे. गाथा नवनाथांची मालिकेतून अक्काबाई हे पात्र ती साकारणार आहे. तिच्या अभिनयाच्या छटा प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की अनुभवता येतील.

अक्काबाईच्या येण्याने नाथांच्या पुढील कार्यात मोठे अडथळे तयार होणार आहेत. अक्काबाई ही अघोरी स्त्री आहे. ती गावकऱ्यांना आपल्या बाजूला करून घेणार आहे आणि नाथांच्या विरुद्ध कट रचणार आहे. त्यामुळे नाथांच्या कार्यात नक्कीच अडथळे तयार होतील. नाथांचे कार्य हे चांगली शिकवण देणे आणि नाथ परंपरा कायम ठेवणे हे आहे. पण आता अक्काबाईच्या गावात येण्याने भरपूर अडथळे निर्माण होतील. नाथ तिला कसे सामोरे जाणार, हे प्रेक्षकांना आता मालिकेत नक्कीच पाहायला मिळेल.

पाहायला विसरू नका, ‘गाथा नवनाथांची’ सोम. ते शनि. संध्याकाळी ६.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

वाणी कपूर आणि परेश रावल आणि शीबा चड्ढा यांच्या “बदतमीज गिल ” मध्ये दिसणार

* सोमा घोष

अपारशक्ती खुराणा जो कायम वैविध्यपूर्ण चित्रपटासाठी ओळखला जातो तो आता वाणी कपूर, परेश रावल आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत ‘बदतमीज गिल’ या गिल कुटुंबाच्या कॉमेडी-ड्रामासाठी तयार होत आहे. या चित्रपटात अपारशक्ती हा मुलगा वाणी ही मुलगी तर परेश रावल आणि शीबा चढ्ढा त्यांच्या पेटंटची भूमिका साकारणार आहेत.

नवज्योत गुलाटी दिग्दर्शित याच शूट बरेली आणि लंडन या दोन ठिकाणी होणार आहे. अपारशक्ती खुराणाने ‘ज्युबिली’, स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘दंगल’ आणि इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये वैविध्यपूर्ण पात्रे साकारली आहेत परंतु आता हा अभिनेता या चित्रपटात काय काम करणार हे बघणं उत्सुकतेच असणार आहे.

दरम्यान आगामी हॉरर-कॉमेडी ‘स्त्री 2’ मध्ये अपारशक्ती ‘बिट्टू’ ची भूमिका पुन्हा साकारताना पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. याशिवाय खुराना ‘बर्लिन’ या चित्रपटातही दिसणार आहे, जो एका मूकबधिर तरुणाची कहाणी मांडतो, ज्याला गुप्तहेर म्हणून अटक केली जाते. ॲपलॉज एंटरटेनमेंटचा ‘फाइंडिंग राम’ हा डॉक्युमेंटरीही त्याच्याकडे आहे.

जागतिक नृत्य दिनाबद्दल नर्गिस फाखरीने तिच्या नृत्याच्या आवडीबद्दल केली खास आठवण शेयर

* प्रतिनिधी

अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत चित्रपटांच्या वेगळ्या निवडीसह प्रेक्षकांमध्ये छाप पाडली आहे पण अभिनयाच्या पलीकडे अभिनेत्रीने तिच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये तिच्या डान्स मूव्हने सर्वांना थक्क केले आहे. तिची यार ना मिले, गलत बात है, ओये ओये आणि अधिकसारख्या लोकप्रिय गाण्यांनी केवळ संगीत लायब्ररीवरच राज्य केले नाही तर आजही ती प्रेक्षकांच्या मनात आहे.

जागतिक नृत्य दिनानिमित्त नर्गिस फाखरी हिने तिची एक खास आठवण शेयर केली आहे. या बद्दल बोलताना नर्गिस म्हणते “मला ठाम विश्वास आहे की नृत्य हा पडद्यावरील अभिव्यक्तीच्या सर्वोत्तम प्रकारांपैकी एक आहे. माझ्यासाठी नृत्य म्हणजे एक प्रकारच ध्यान आहे आणि नृत्यातून ताण विसरते. ‘रॉकस्टार’ करताना मी खूप घाबरले होते पण एकदा संगीत वाजले की मी थांबू शकले नाही”.

दरम्यान वर्क फ्रंटवर, नर्गिस फाखरी शेवटची ‘ततलुबाज’मध्ये दिसली होती. अभिनेत्रीकडे तिच्या मार्गावर येत असलेल्या प्रकल्पांची एक रोमांचक लाइनअप आहे, जी ती या वर्षाच्या शेवटी जाहीर करेल.

बॉलिवुडमध्ये येण्यापूर्वी नर्गिस फाखरीला हे व्हायचं होतं !

* सोमा घोष

‘रॉकस्टार’ ते ‘मैं तेरा हिरो’पर्यंत अभिनेत्री नर्गिस फाखरीने बॉलिवूडमधील तिच्या संपूर्ण प्रवासात काही सर्वात मोठे हिट चित्रपट दिले आहेत. ‘रॉकस्टार’ मुलीने ‘मद्रास कॅफे’, ‘अझहर’ आणि ‘हाऊसफुल 3’ सारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध केलं आहे. ती बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिच्यासाठी करिअरची वेगळी निवड कोणती होती हे नर्गिसने स्वतःच उघड केले आहे.

या बद्दल सांगताना नर्गिस म्हणते “मला लहानपणीच पशुवैद्य बनायचे होते. माझं प्राण्यांवरच प्रेम आणि माझ्या लहानपणापासूनच त्यांचा सोबतच नातं हे सुंदर आहे पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत आणि मी चित्रपटसृष्टीत आले. चित्रपसृष्टीत आले नसते तर नक्कीच मी पशुवैदयकीय शिक्षण घेऊन या विश्वात काहीतरी केलं असतं. वैविध्यूर्ण भूमिका साकारून आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मला मिळाली आहे तर कायम प्रेक्षकांना काय मोहित करून जाईल याकडे माझा कल आहे ”

अलीकडेच ‘मैं तेरा हिरो’ रिलीज होऊन 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे नर्गिस फाखरी ने जुन्या आठवणी ना उजाळा दिला. वर्क फ्रंटवर नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली होती आगामी काळात तिच्याकडे अनेक मनोरंजक प्रकल्प येत आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या शेवटी होणार आहे.

‘‘शाळेत असल्यापासूनच अभिनयाची इच्छा’’ – विजया बाबर

* सोमा घोष

मृदू स्वभाव आणि सुंदर बांधा असलेली २३ वर्षीय विजया बाबर ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि मराठी रंगभूमीवरील कलाकार आहे. तिने नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. मुंबईतील विजयाने अभिनयासोबतच म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे. ती एक अतिशय आकर्षक तरुणी आहे आणि तिने ‘मिस मुंबई’ चा किताबही जिंकला आहे. ‘शिकस्त ए इश्क’ हे तिचे मराठी नाटक होते, ज्यात तिने खूप सुंदर अभिनय केला होता. त्यानंतर तिने ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत चंदाची भूमिका साकारली, जी प्रेक्षकांना खूप आवडली, पण कोविड काळातील लॉकडाऊनमुळे मालिका बंद झाली.   विजयाच्या यशात तिच्या भावा-बहिणींचा मोठा वाटा आहे, दोघेही इंजिनीअर आहेत, पण सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते नेहमीच एकत्र असतात. विजयाच्या आईचे नाव नीलम बाबर तर वडिलांचे नाव आनंदा बाबर आहे. सध्या विजया सोनी मराठीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मध्ये बयोची मुख्य भूमिका साकारत आहे. तिने खास ‘गृहशोभिका’सोबत गप्पा मारल्या. त्यातीलच हा काही मनोरंजक भाग…

ही भूमिका करण्यामागचे काही विशेष कारण आहे का?

यात मी बयोची भूमिका साकारत आहे, जी मूळची कोकणातील एका छोटया गावातली आहे. गावात रुग्णालय नसल्याने तिला डॉक्टर व्हायचे आहे. तिच्या आईचे स्वप्न आहे की, तिच्या मुलीने डॉक्टर व्हावे. मी मोठया बयोची भूमिका साकारत आहे. बयो एकटीच मुंबईत येते आणि वैद्यकीय महाविद्यायात प्रवेश     घेते, इथे आल्यानंतर तिला सावत्र आई-वडील भेटतात, जे आजारी आहेत आणि         त्यांच्या उपचाराची जबाबदारी तिने स्वीकारली आहे.

ही भूमिका तुझ्या वास्तव जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

ही भूमिका माझ्या वास्तव जीवनाशी मिळतीजुळती आहे, कारण मी लहानपणापासून अभिनयाचे स्वप्न पाहिले आहे. आज त्याच स्वप्नाच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला आहे. शाळेत असल्यापासूनच मला अभिनय करण्याची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यायात असल्यापासूनच मी रंगभूमीवर काम करू लागले. मी प्रायोगिक, मोनो अभिनय, स्किड्स इत्यादी सर्व प्रकारचा अभिनय केला आहे. प्रायोगिक नाटकातूनच मला अभिनयाची पहिली संधी मिळाली. मी स्वामी समर्थचे ७५० भाग पूर्ण केले. त्यानंतर मला ही मालिका मिळाली.

तुला अभिनयात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातले नाही. टीव्ही पाहताना आणि शाळेत स्किड्स करताना अभिनय करण्याची इच्छा माझ्यात निर्माण झाली.

तुला कुटुंबाचा पाठिंबा किती मिळाला?

मी अभिनय करायचं ठरवलं तेव्हा सगळयांना एकत्र बसवून वर्षभराचा वेळ मागून घेतला. मला या क्षेत्रात ऑडिशन देऊन अभिनयाचा प्रयत्न करता यावा म्हणून मी हा वेळ मागितला होता. सर्वांनी ते मान्य केले, पण त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी मी नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. मला माझी पहिली मालिका मिळाली, ती मी पूर्ण मेहनतीने केली, कारण अभिनय हेच माझो सर्वस्व आहे, मी पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरत आहे.

तुला किती संघर्ष करावा लागला? पहिला ब्रेक कसा मिळाला?

मी स्वत:ला भाग्यवान समजते, कारण जेव्हा मी रंगभूमीवर काम करत होते त्यादरम्यान इंडस्ट्रीमधील कोणीतरी माझ्या अभिनयाची दखल घेत मला अभिनयाची संधी दिली आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मला चांगला ब्रेक मिळवून देणारी पहिली मालिका ठरली. या मालिकेतील माझे काम सर्वांना आवडले. त्यानंतर माझ्याकडे कामं येऊ लागली आणि मी बयोची भूमिका स्वीकारली. मला जास्त संघर्ष करावा लागला नाही, पण योग्य कथानक निवडणे हे माझ्यासाठी संघर्षाचे होते. पहिल्या मालिकेनंतर अनेक ऑफर्स आल्या, पण मी बयोची भूमिका निवडली, कारण ही भूमिका पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेवर आधारित कथा आहे.

तुला डॉक्टरच्या भूमिकेसाठी किती तयारी करावी लागली?

या मालिकेत मला मालवणी भाषा बोलायची आहे, ज्याचा मला काहीही अनुभव नाही. ही खूप अवघड भाषा आहे, मी अजूनही ती शिकत आहे. यात संवादानुसार काना – मात्रा बदलाव्या लागतात. मात्र सर्वजण यासाठी मला मदत करतात.

तुला कोणत्याही पात्रातून बाहेर पडून दैनंदिन जीवनात जगणे किती आवघड वाटते?

हे फार अवघड नाही, कारण मी रंगभूमीवर खूप काम केले आहे. मी सर्व नवीन कलाकारांना नाटकात काम करण्याचा सल्ला देते, जेणेकरून त्याद्वारे त्यांना अभिनयाचे पूर्ण ज्ञान मिळेल.

या भूमिकेमुळे तुझ्यात किती बदल झाले असे तुला वाटते?

या भूमिकेत खूप सहनशीलता आणि विश्वास आहे, ज्यामुळे मला खूप प्रेरणा मिळत आहे.

हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची तुद्ब्रा इच्छा आहे का?

मला हिंदीत काम करण्याची खूप इच्छा आहे. रणवीर सिंग आणि रणवीर कपूरसोबत सहकलाकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

लहानपणापासूनच मला फॅशन करायला आणि सगळयांसमोर नीटनेटके राहायला आवडते. मी कोणत्याही डिझायनरला फॉलो करत नाही, कारण आजकाल सोशल मीडियाचे जग खूप चांगले आहे, ज्यामध्ये खूप काही पाहायला मिळते. ट्रेंड फॉलो करण्याव्यतिरिक्त, मला आरामदायक कपडे घालायला आवडतात. माझे वॉर्डरोब रंगीत कपडयांनी भरले आहे.

मी खूप खवय्यी आहे, पण मी दोन वर्षांपासून घराबाहेर राहून अभिनय करत आहे. आता माझा सेट घराजवळ आहे, त्यामुळे मला रोज घरून जेवण येते, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मला आईच्या हातचे वरण, भात आणि वरून तुपाची धार असे जेवण खूप आवडते.

नवीन वर्षासाठीचा तुझा नवीन संकल्प कोणता?

वेगवेगळया भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न आहे. नवीन वर्षात मला माझ्या करिअरमध्ये पूर्णपणे गुंतून जायचे आहे. मानसिकदृष्टया मला स्वत:ला समजावून सांगायचे आहे की, फक्त पैशांच्या मागे धावायचे नसते, आरोग्याला प्राधान्य देऊनच काम केले पाहिजे, कारण एखादी व्यक्ती कामात व्यस्त असते आणि स्वत:ची काळजी घेत नाही, जे योग्य नाही. याशिवाय मी बाहेरचे कमी खाते आणि वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करते. कामासोबतच आरोग्याची काळजी घेण्याचा ठाम निर्धारही मनामध्ये करावा लागतो आणि एकदा का निर्धार केला की मग त्यासाठी वेळ आपसूकच मिळतो.

आवडता रंग – मूड असेल त्यानुसार.

आवडता पोशाख – भारतीय आणि पाश्चात्य.

आवडता परफ्यूम – बाथ आणि बॉडी वर्कस्.
आवडते पर्यटन स्थळ – केदारनाथ, ग्रीस.

वेळ मिळाल्यास – कुटुंबासोबत वेळ घालवणे.

जीवनातील आदर्श – कुटुंबाची काळजी घेणे.

सामाजिक कार्य – सुदूर गावात चांगल्या रुग्णालयाची व्यवस्था करणे.

जीवन जगण्याचा मंत्र – स्वत:वर विश्वास ठेवा.

सत्ता मिळाल्यास – शिक्षणातील भेदभाव दूर करणे.

‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने ‘ही अनोखी गाठ’मधील ‘मी रानभर’ प्रेमगीत प्रदर्शित झी

 * नम्रता पवार

स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. ‘मी रानभर’ असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले असून बेला शेंडेचा या प्रेमगीताला सुमधूर आवाज लाभला आहे. तर हितेश मोडक यांचीही या गाण्यासाठी साथ लाभली आहे. हितेश मोडक यांचेच संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांचे बोल लाभले आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिचे बहारदार नृत्य पाहाण्याची संधी प्रेक्षकांना या गाण्यातून मिळणार आहे.

या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, ” प्रेमदिनाच्या निमित्ताने हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या गाण्यात अधिक रंगत येत आहे. नवीन नात्याची सुरूवात या गाण्यातून दिसत आहे. हे नाते कसे बहरतेय, याचे सुंदर चित्रण यातून सादर होत आहे.’’ झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” अनोखी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात हे गाणे अतिशय चपखल बसत आहे. प्रेमाच्या तरल, हळुवार भावना यातून व्यक्त होत आहेत. श्रवणीय असे हे गाणे प्रेमीयुगुलांना नक्कीच आवडेल.’’

दरम्यान, १ मार्च रोजी ‘ही अनोखी गाठ’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

‘लग्नकल्लोळ’ चे दुसरे गाणे प्रदर्शित

* नम्रता पवार

मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या लग्नाचा कल्लोळ प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटातील ‘झणझणल्या काळजा वरती’ हे झणझणीत गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे धमाकेदार गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे. तर जय अत्रे यांचे जबरदस्त बोल लाभलेल्या या गाण्याला प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रिन्स याने केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=9UP8xOZSyF8

सिद्धार्थ जाधवचा एक वेगळाच लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या गाण्यातून याच्या काळजातील मयुरीविषयीची भावना, प्रेम तो व्यक्त करत आहे. हे जबरदस्त गीत ऐकायला जितके मस्त वाटते तितकेच पाहायलाही कमाल आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर ‘लग्नकल्लोळ’चे दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॅा. मयुर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे यांनी केले आहे. जितेंद्रकुमार परमार लिखित हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या गाण्याबद्दल डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, ‘’ अतिशय एनर्जेटिक असे हे गाणे आहे. सिद्धार्थ जाधव, आदर्श शिंदे ही जोडी एकत्र आल्याने या गाण्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यात या गाण्याच्या शब्दांनी आणि संगीताने अधिकच भर टाकली आहे. सिद्घार्थ आणि मयुरीची अफलातून केमिस्ट्री या गाण्यातून दिसत आहे. मला आशा आहे, पहिल्या गाण्याप्रमाणेच हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

‘‘सण कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो’’ – सीमा कुलकर्णी

* सोमा घोष

आकर्षक उंची, मृदुभाषी २७ वर्षीय मराठी अभिनेत्री सीमा कुलकर्णी ही महाराष्ट्रातील उस्मानाबादमधील तुळजापुरातली आहे. तिने मराठी चित्रपट, वेब सीरिज आणि अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये तिने ‘शिनमा येडा’ या चित्रपटातून या क्षेत्रातील प्रवास सुरू केला. त्यानंतर तिने अनेक वेब मालिका, चित्रपट आणि टीव्हीवरील मालिकांमध्ये काम केले. ‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

सीमा खऱ्या आयुष्यात फारशी संयमी नसली तरी अभिनयात मात्र ती प्रचंड संयम बाळगते. फिल्मी भाषेत सांगायचे तर तिला ‘अँक्शन’ आणि ‘कट’मध्ये जगायला खूप आवडते. तिच्या मते अभिनय क्षेत्र कधीच सोपे नसते. एका दृश्यासाठी तिने सुमारे ८ ते १० रिटेक दिलेत, जे तिला एका मोठया अभिनेत्यासोबत अभिनय करताना द्यावे लागले होते. मराठीशिवाय तिने हिंदी आणि मल्याळम मालिकांमध्येही काम केले आहे. सीमा तिच्या यशाचे श्रेय तिची आई शीतल कुलकर्णी आणि वडील विकास कुलकर्णी यांना देते. सन मराठी वाहिनीवर तिची ‘सावली होईन सुखाची’ ही मालिका सुरू आहे. यात ती गौरीच्या मुख्य भूमिकेत आहे.

ही मालिका करतानाचा तुझा अनुभव कसा आहे? ती तुझ्या वास्तविक जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

यामध्ये माझी भूमिका एका खेडयातील मुलीची आहे, जिला कुटुंबातील सर्व नातेसंबंध खूप आवडतात, परंतु तिच्या आई-वडिलांची इच्छा असते की तिने एका वृद्धाशी लग्न करावे, त्यामुळे गौरी पळून जाते आणि शहरात येते. तिथे घरकाम करू लागते. त्यादरम्यान, तिला एक ६ वर्षांची मुलगी भेटते, जिच्यावर ती आईसारखे प्रेम करते. दोघींमध्ये आई-मुलीचे नाते फुलते. हे खूपच भावनिक वळण आहे आणि मला ते करताना खूप मजा येत आहे.

वास्तविक जीवनात मला प्रत्येक नाते आणि कुटुंब खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे मालिकेतील नातेसंबंध माझ्या प्रत्यक्ष आयुष्याशी मिळतेजुळते आहे, पण ही मालिका असल्याने यात नाट्य थोडे अधिक आहे. याशिवाय आपल्या समस्यांशी कसे लढायचे हे मला माहीत आहे, पण मालिकेतील गौरीला ते समजायला आणखी काही वेळ लागेल. सुरुवातीला आईची भूमिका साकारणे अवघड वाटत होते. विशेषत: लहान मुलीसोबत अभिनय करणे अवघड आहे, कारण मुले मुडी असतात, पण ही मुलगी लहान असूनही चांगले काम करत आहे.

तुला किती तयारी करावी लागली?

मी त्या मुलीची आई आणि माझ्या आईचे वागणे पाहिले आणि तसे वागण्याचा प्रयत्न केला.

तुला अभिनयात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

लहानपणापासून टीव्हीवर चित्रपट आणि मालिका पाहून मी अभिनय करण्याचा विचार करत होते. तेव्हा मला नायिका व्हायचे होते. मला त्यावेळी अभिनेत्री आणि नायिकेतील फरक समजत नव्हता. मला नृत्याची आवड होती. माझे लहानसे शहर तुळजापूरमध्ये कोणालाच अभिनयाविषयी माहिती नव्हती आणि या क्षेत्रातील एकही कलाकार तिथला नव्हता, त्यामुळेच माझी इच्छा ऐकून सर्व माझ्यावर हसायचे. माझ्यावर माधुरी दीक्षित आणि मुक्ता बर्वेच्या कामाचा खूप प्रभाव होता. त्यांचे चित्रपट पाहिल्यानंतर मी त्याच जगात जगायचं, तेव्हाच मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

तुला कुटुंबाकडून किती पाठिंबा मिळाला?

सुरुवातीला या क्षेत्राबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्यावेळी सोशल मीडियाची फारशी क्रेझही नव्हती. मी नृत्याची सुरुवात व्हिडीओ पाहून गणपती उत्सवात नृत्याच्या पथकात सहभागी होऊन केली. तुळजापुरात नृत्याचे वर्ग नव्हते. जेव्हा मी थोडी मोठी झाले तेव्हा आजूबाजूचे लोक नाचणे चुकीचे आहे असे म्हणू लागले. त्यामुळे घरचे वैतागले आणि त्यांनी मला नृत्य करण्यास नकार दिला. मी ठरवले की मला इथे राहायचे नाही. त्याच दरम्यान पुण्याच्या जवळपासहून एक दिग्दर्शक आला आणि त्याने स्थानिक चित्रपट बनवण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने स्थानिक कलाकारांना घेतले. आधी चित्रीकरण सुरू केले, पण त्यानंतर त्याने अचानक चित्रीकरण थांबवून आर्टिस्ट कार्ड बनवण्यासाठी पैसे मागायला सुरुवात केली. मी आईला येऊन सर्व सांगितले आणि २०१२ मध्ये मी त्याला आर्टिस्ट कार्डसाठी २५ हजार रुपयेही दिले. वडिलांना न सांगता आईने सर्व पैशांची व्यवस्था केली होती. त्या लोकांनी आमची मेहनत पाहून तो चित्रपट स्थानिक पातळीवर गावातील दोन चित्रपटगृहांत प्रदर्शित केला. सर्व कलाकारांचे सर्व पैसे वाया गेले, कारण गावातील कोणालाच अभिनय क्षेत्राची माहिती नव्हती. नंतर समजले की ते सर्व फसवणूक करणारे होते. माझ्या वडिलांनी तो चित्रपट पाहिला होता आणि त्यांनी मला पुढील कामासाठी पुण्याला पाठवले. तोपर्यंत सोशल मीडिया थोडा सक्रिय झाला होता. त्यामार्फत मी अनेक ठिकाणी माझे फोटो पाठवले, पण सर्वांनी मुंबई आणि पुण्याला यायला सांगितले.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

पुण्यात आल्यावर मी मास मीडियाचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि थिएटरमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. तिथेही मला खूप चुकीचे लोक भेटले. मुंबईत आल्यानंतर मला या इंडस्ट्रीबद्दल खूप काही समजले. पहिला ब्रेक मिळणे सोपे नव्हते, पण पुण्यात असताना मी ‘मॅरेथॉन जिंदगी’ हा चित्रपट केला होता, ज्यात विक्रम गोखले आणि संजय नार्वेकर यांच्यासारखे मोठे कलाकार होते. तो माझा पहिला ब्रेक होता, पण मला त्यातून फारसा फायदा झाला नाही. मी पुण्यातून मुंबईला आले आणि छोटया भूमिका करू लागले. २०१८ मध्ये मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील काही भागांत काम केले. त्यानंतर ‘गुलमोहर’, ‘आणीबाणी’ ‘मेकअप’ आदी चित्रपटांत काम केले. एका रियालिटी शोमध्येही पहिल्या ६ मध्ये पोहोचले होते.

तुला किती संघर्ष करावा लागला?

कुठल्याही कलाकाराचा संघर्ष सुरूच असतो. आधी काम मिळवण्यासाठी, नंतर ते टिकवण्यासाठी आणि भविष्यात चांगले काम करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.

कोणत्या मालिकेने तुझे आयुष्य बदलले?

‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबसीरिज मी केली होती, ज्याने मला ओळख मिळवून दिली, सर्वांनी माझ्या भूमिकेचे कौतुक केले. थोडी टीकाही झली, कारण त्यात मी काही बोल्ड सीन दिले होते. एका दृश्यात मी बिकिनी घालून आले होते, पण त्या कथेत ते दृश्य आवश्यक होते.

इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्य तू किती सहजतेने करू शकतेस?

कथेच्या मागणीनुसार मी कोणतीही भूमिका करण्यास मागेपुढे पाहात नाही. मला असा एक चित्रपट मिळाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री फक्त बिकिनीमध्ये दिसणार होती, मात्र त्याचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता, त्यामूळे मी नकार दिला.

हिंदी चित्रपटसृष्टीत तुला काम करण्याची इच्छा आहे का?

अर्थातच. मला मराठीच नाही तर प्रत्येक भाषेतील वेगवेगळया चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. मला विकी कौशल आणि ऋतिक रोशन यांच्यासोबत काम करायचे आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याचीही माझा इच्छा आहे.

तू उस्मानाबादची आहेस, तिथे काय काम करायची तुझी इच्छा आहे?

मला तिथल्या लोकांना अभिनयाची माहिती द्यायची आहे. होय, कारण तिथे या क्षेत्राबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. छोटया शहरातील असूनही तेथील अनेकांमध्ये खूप प्रतिभा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी प्रसंगानुरुप फॅशन करते. कुठलाही ट्रेंड पाहून फॅशन करत नाही तर मला जे शोभेल तेच घालते.

मला खायला खूप आवडते. आईने बनवलेली डाळ ढोकळी खूप आवडते.

तू सण कसे साजरी करतेस?

सण कुठलाही असो, मला तो कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो.

तुला नवोदितांना काही संदेश द्यायचा आहे का?

तुमच्या कामावर प्रेम करा, मेहनत, समर्पण आणि संयम ठेवा, तरच तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.

आवडता रंग – पांढरा.

आवडता पोशाख – भारतीय साडी.

आवडते पुस्तक – कोसला कादंबरी.

आवडता परफ्यूम – टायटनचा कोणताही.

आवडते पर्यटन स्थळ – उटी.

वेळ मिळाल्यास – पुस्तकं वाचणे आणि वेब सिरीज पाहाणे.

जीवनातील आदर्श – प्रत्येकाला आदर देणे.

सामाजिक कार्य – प्राण्यांसाठी काम करणे.

स्वप्नातील राजकुमार – काम आणि कुटुंबाचा आदर करणारा.

जीवन जगण्याचा मंत्र – कृतज्ञत, कृज्ञत राहाणे.

नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी नेहमीच निरनिराळ्या विषयांच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आता आपल्या मनोरंजनाच्या पेटाऱ्यातून आणखी एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. “निवेदिता माझी ताई” असे या मालिकेचे नाव असून या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अशोक आणि एताशा यांनी याआधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. आता नव्या मालिकेतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन कशा प्रकारे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. यशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. पण या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहानगा मुलगा दिसणार आहे. रुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो असीम या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. असीम हा निवेदिताचा लहान भाऊ. आता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणते, हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.

सोनी मराठी वाहिनी नेहमीच रंगतदार विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येते. “निवेदिता माझी ताई” या मालिकेचा विषयही तितकाच आगळावेगळा आहे. अभिनेता अशोक फळदेसाई आपल्या प्रॉमिसिंग अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल. तसेच एताशा संझगिरीनेही याआधी काही मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे आणि आता या मालिकेत दोघेही नव्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतील. मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निवेदिता आणि यशोधन  यांच्या नव्या वेषभूषेची चर्चा नक्कीच रंगणार आहे. भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता असीम आणि निवेदिता या भावा-बहिणीचे अनोखे नाते कशाप्रकरचे असेल हे मालिकेतच आपल्याला पाहायला मिळेल. मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर दाखल होणार आहे. पाहायला विसरू नका “निवेदिता माझी ताई” लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट सलमान सोसाइटी चा ट्रेलर लॉन्च

* सोमा घोष

सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटिला आली आणि ती लोकांच्या पसंतीत उतरलीत. आज चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे.

ट्रेलर मध्ये खुप इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीचीही किनार आहे. हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांवर भाष्य करतो. एकुन हा चित्रपट शिक्षणवर भाष्य करतो. ट्रेलरमध्ये लहानग्यांची शिक्षणासाठीची धड़पड़ लक्ष वेधुन घेते.

दिग्दर्शक कैलाश पावर आणि निर्मात्यांनी प्रयत्न केला आहे की हया भटक्या, अनाथ मूलांची व्यथा सर्वाना समोर यावी आणि हयावर प्रबोधन होऊनी मुलांना योग्य ते शिक्षण मिळावे.

अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे . ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यानि दिले असुन डीओपी फारूक खान आहेत. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

प्रजक्ता एंटरप्राइजेस निर्मित, अवंतिका  दत्तात्रय पाटील आणि विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होत असुन म्यूजिक वीडियो पॅलेसवर उपलब्ध आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें