लग्नापूर्वी या गोष्टी जरूर करा

* किरण बाला

कोणत्याही मुलीच्या आयुष्यात सर्वात मोठा आनंदी क्षण म्हणजे तिचं लग्न…लग्नामुळे तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. जर एखाद्या मुलाशी लग्न करण्यापूर्वी सर्व बाबींचा गंभीरपणे आणि शांतपणे विचार केला नाही तर लग्नानंतर मात्र पश्तात्ताप करण्याची वेळ येते. अशात एक तर तिला आयुष्यभर कुढतकुढत जगावं लागतं किंवा मग तिच्यावर घटस्फोटाची तरी वेळ येते. या दोन्ही परिस्थिती तिच्या बाजूने नसतात. अशात जर कोणत्याही नात्याला होकार देण्यापूर्वी स्वत: मुलीनेच काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तिला लग्नानंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही आणि तिचं आयुष्यही आनंदी व सुखी ठरेल.

काही विशेष मुद्दयांवर लग्नापूर्वी चर्चा करून घेणं तुमच्या हिताचंच ठरेल. कारण दाम्पत्याचा पाया हा याच मुद्दयांवर टिकून असतो आणि वादविवाद व घटस्फोटदेखील याच गोष्टींवरून होतात.

* लग्न हे लहान मुलांचा किंवा बाहुल्यांचा खेळ नव्हे. म्हणून लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याची भेट घेणं फार जरुरी आहे, जेणेकरून दोघांनाही एकमेकांचे विचार कळतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की समोरच्या माणसामध्ये ती वैशिष्ट्य किंवा गुण नाहीत जे तुम्हाला हवे आहेत, तर नंतर पस्तावण्यापेक्षा तुम्ही त्याच्याशी लग्न न करणंच चांगलं ठरेल. कारण लग्नापूर्वीच जर तुम्ही वेगळे झालात तर निदान तुमच्यावर घटस्फोटित असण्याचा ठपका तरी लागणार नाही.

* लग्नापूर्वी तुम्ही मुलाकडून त्याच्या भविष्याच्या योजनांबद्दलही जाणून घ्या. तसंच त्याला हेदेखील सांगा की तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे. जर समोरची व्यक्ती तुम्हाला हवी तशी असेल, तरच लग्न करा.

* बऱ्याचदा असं दिसून येतं की मुलगी आणि तिचे कुटुंबीय कोणीच तिच्या करिअर प्लॅनिंगबद्दल सांगत नाहीत, की ती लग्नानंतर नोकरी करणार की नाही. तिला जर आपलं करिअर सोडायचं नसेल किंवा नोकरी करायची असेल, तर ही गोष्ट तिने मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगायला पाहिजे. म्हणजे लग्नानंतर ते तिला नोकरी करण्यास अडवणार नाहीत. त्याचबरोबर जर ती वर्तमानकाळात नोकरी करत असेल आणि लग्नानंतर तिला नोकरी करायची नसेल, तरीदेखील तिने तिची इच्छा लग्नाआधीच व्यक्त करावी. नाहीतर लग्नानंतर ते नोकरी करण्यासाठी जोरही देऊ शकतात. नोकरी करणं किंवा न करणं याबाबत लग्नानंतर कसला वाद होऊ नये, म्हणून आपल्या करिअरचं प्लॅनिंग आधीच सांगणं फार गरजेचं आहे.

* तुम्ही जर कोणा नोकरदार मुलाशी लग्न करत असाल तर हे जाणून घ्या की त्याची नोकरी तर बदलणार नाही. जर बदली होत असेल तर त्याचं क्षेत्र कुठे आहे. नाहीतर तुम्ही हा विचार करून लग्नासाठी हो म्हणाल की त्याची बदली चंदीगड, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणार आहे. पण जर लग्नानंतर त्याची बदली एखाद्या लहानशा शहरात झाली, जिथे तुम्हाला जायचं नसेल, तर मग अशा परिस्थितीत तुमच्यात नक्कीच वाद होतील. त्यामुळे लग्नापूर्वीच तुम्ही हा विचार करून घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थैर्य हवंय की संपूर्ण भारतभर पतींच्या बदलींबरोबर भटकणं हवंय. तुम्ही जर नोकरी करत असाल तर हे जरुरी नाही की जिथे तुमच्या पतींची बदली होईल, तिथेच तुमचीही होईल. अनेक वेळा हे शक्य नसतं. अशावेळी एक तर तुम्हाला नोकरी सोडावी लागते किंवा आपल्या पतींपासून वेगळं तरी राहावं लागतं.

* तुम्हाला जर एकत्र कुटुंबात लग्न करायची इच्छा नसेल तर असं नातं आधीच नाकारणं बरं. तुम्ही जर त्यांना होकार देऊन लग्न केलं आणि नंतर पतींवर आईवडिलांपासून वेगळं होण्यासाठी जोर दिला तर ही गोष्ट मात्र अयोग्य ठरेल. त्याने कुटुंबात क्लेश निर्माण होईल आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं. तुम्हाला जर कोणाचं बंधन नको असेल तर मग अशाच मुलाबरोबर लग्न करा जो लग्नाच्या आधीपासूनच आईवडिलांपासून वेगळा राहात असेल आणि लग्नानंतरही त्याची वेगळंच राहाण्याची इच्छा असेल.

* ज्या कुटुंबात तुम्ही लग्न करत आहात तिथलं वातावरण, रीतीभाती, संस्कार, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी तुम्ही आधीपासूनच जाणून घ्या. शिवाय हेदेखील पाहा की तुम्ही अशा वातावरणात जुळवून घेऊ शकता की नाही. जर तुम्हाला तिथे जमणार नसेल तर तिथे लग्न करू नका. पण तरीदेखील तुम्ही जर तिथे लग्न केलं तर तुम्हाला तिथे ताळमेळ बसवावा लागेल. म्हणजे स्वत:ला त्यांच्यानुसार तुम्हाला घडवावं लागले. नाहीतर तुमचं कायमस्वरुपी माहेरी येणं ठरलंच समजा.

* लग्नापूर्वी मुलाबरोबर होणाऱ्या भेटीगाठींमध्ये त्याच्या आवडीनिवडी आणि सवयींबद्दलही जाणून घ्या. कदाचित त्याची एखादी आवड किंवा सवय तुम्हाला आवडत नसेल, ज्यामुळे लग्नानंतर तुमच्यात भांडण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंतही पोहोचू शकतं. तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल तर त्याला हे विचारून घ्या की तो आणि त्याचे कुटुंबीय शाकाहारी आहेत की नाही? लग्नानंतर जर तुम्हाला कळलं की तो मांसाहारी आहे तर तुमच्यावरही मांसाहारी बनवण्यासाठी जोर दिला जाईल आणि कदाचित तुम्ही ते करू शकणार नाही. त्याचबरोबर जर त्याला मद्यपान करण्याचं व्यसन असेल आणि तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही अशा माणसासोबत जवळिकी कशी वाढवणार? स्पष्टच आहे की त्याची ही सवय तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करेल आणि शेवटी तुम्हाला पश्चात्तापच करावा लागेल.

* लग्नाआधी जर तुमचा कुणी प्रियकर असेल किंवा कोणाबरोबर तुमचे संबंध राहिले असतील, तर ही गोष्ट आधीच सांगणं फायदेशीर ठरेल. शिवाय ती गोष्टही जरा थोडक्यात सांगितली गेली पाहिजे, जेणेकरून ते प्रकरण जास्त गंभीर नव्हतं, असं वाटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं जर कोणावर प्रेम असेल तर ही गोष्ट तुमच्या सर्कलमध्ये कित्येक जणांना माहीतच असेल. म्हणून त्याबद्दल जराशी माहिती देणं भविष्यासाठी योग्य ठरेल. कारण जर लग्नानंतर त्याला याबाबत बाहेरून कळलं तर तो तुमच्याकडे संशयाने बघेल आणि त्याला तुम्ही चारित्र्यहीन असल्याचं वाटेल. अविश्वासावरही दाम्पत्य जीवनाचा पाया जास्त दिवस टिकत नाही. पण हो, जर सगळं काही माहीत असूनही तो लग्नासाठी होकार देत असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे.

* तुम्हाला जर दोन-चार भेटीनंतरही हे कळत नसेल की तो तुमच्यासाठी फिट आहे की नाही, तर तुम्ही कोणा काउन्सलरचाही सल्ला घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल.

संसार मोडण्याचं कारण महत्त्वाकांक्षी पती किंवा पत्नी

* भारत भूषण श्रीवास्तव

दिग्दर्शक गुलजारचा १९७५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘आंधी’ने ‘रेकॉर्डब्रेक’ यश संपादन केलं होतं. या चित्रपटावर त्या काळात वाद झालेच होते, त्याची चर्चा आजही ऐकायला मिळते. कारण हा चित्रपट दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आयुष्यावर बनला होता. या चित्रपटात संजीव कुमारने नायकाची आणि सुचित्रा सेनने नायिकेची भूमिका साकारली होती, जिचं २०१४ साली निधन झालं होतं.

‘आंधी’ चित्रपटाचा केंद्रीय विषय राजकारण होता, पण हा चित्रपट चालला तो तडा जाणाऱ्या दाम्पत्य जीवनाच्या सटीक चित्रीकरणामुळे. ज्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये इंदिरा गांधी स्पष्ट दिसत होत्या. त्याचबरोबर दिसत होत्या त्या एक प्रतिभासंपन्न पत्नीच्या इच्छा आकांक्षा, ज्या पूर्ण करण्यासाठी ती पतीचाही त्याग करते आणि मुलीचाही, पण त्यांना मात्र ती विसरू शकत नाही. पतीपासून वेगळी होऊन जेव्हा ती अनेक वर्षांनी एका हिल स्टेशनवर आपले राजकीय दिवस घालवायला येते, तेव्हा ती ज्या हॉटेलात थांबते, तिथला मॅनेजर तिचा पतीच निघतो.

पतीला पुन्हा आपल्याजवळ बघून वृद्ध होत चाललेली नायिका कमजोर पडू लागते. तिच्या लक्षात येतं की खरं सुख पतीच्या बाहुपाशात, स्वयंपाकघरात, घरसंसारात, आपसातील थट्टामस्करीत आणि मुलांच्या संगोपनात आहे, अशा चिखलफेक करणाऱ्या राजकारणात नाही. पण प्रत्येकवेळी तिला हीच जाणीव होते की आता या राजकीय दलदलीतून बाहेर पडणं कठिण आहे, जे तिच्या पतीला आवडत नाही. राजकारण आणि पती यापैकी एकाची निवड करणं तिला कायम द्विधावस्थेत टाकत असे. अशात तिचे वडीलही तिला कायम पुढे जाण्यासाठी भडकवत असतात. ही द्विधावस्था चेहऱ्यावरील भाव आणि संवाद इत्यादींच्या माध्यमाने सुचित्रा सेनने इतकी सशक्त बनवली होती की कदाचित खरा पात्रदेखील असं करू शकला नसता.

आरतीची भूमिका साकारणारी सुचित्रा सेन जेव्हा दाम्पत्यजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर पतीबरोबर फिरताना आणि रोमांस करताना दिसते, तेव्हा तर विरोधक तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू लागतात.

स्वभावाने हट्टी आणि रागिष्ट आरती या सगळ्यामुळे भडकते, कारण तिच्या नजरेत ती काहीच चुकीचं करत नव्हती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा तिला सर्वत्र हे विचारलं जातं की हॉटेल मॅनेजर जे.के.शी तिचे काय संबंध आहेत, तेव्हा मात्र ती शस्त्र टाकते, अशात तिचा पती तिची साथ देतो. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या जनता सभेत ती आपल्या पतीला घेऊन जाते आणि सर्वांना सत्य सांगते की ते तिचे पती आहेत. जर त्यांच्यासोबत फिरणं हा अपराध आहे तर हो तिने हा अपराध केला आहे आणि शेवटी रडत रडत भावुक होऊन आरती जनतेला म्हणते की ती मत नव्हे, त्यांच्याकडून न्याय मागत आहे.

जनताही तिला विजयी करून न्याय मिळवून देते. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात ती जेव्हा हॅलीकॉप्टरमध्ये बसून दिल्लीला निघते, तेव्हा संजीव कुमार तिला सांगतो की मला तुला कायम जिंकताना पाहायचं आहे.

याच सुखावर चित्रपट संपतो. पण तिथेच ज्ञानी प्रेक्षकांसमोर हा प्रश्नदेखील सोडून जातो की ज्या पतीला करिअरसाठी सोडलं, त्याला सार्वजनिकरीत्या स्वीकार करणं हा राजाकारणाचा भाग नव्हता का? ही जनतेसोबत एक भावनात्मक ब्लॅकमेलिंग नव्हती का?

एकच गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात सगळं काही योग्य आहे. हेदेखील स्पष्ट होतं की एक महत्त्वाकांक्षी पत्नी जिला हरणं पसंत नाही ती जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.

इंदिरा गांधी: अपवाद आणि आदर्श

चित्रपट बाजूला ठेवला तर इंदिरा गांधी भारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श ठरल्या आहेत. याचं कारण म्हणावं तर ७०च्या दशकात स्त्रियांवर अनेक बंधनं होती. त्यांचं महत्त्वाकांक्षी असणं गुन्हा समजला जायचा आणि या महत्त्वाकांक्षेची हत्या तेव्हा खूपच सहजपणे पतप्रतिष्ठा आणि समाज नावाच्या शस्त्राने केली जायची. मात्र इंदिरा गांधी याला अपवाद होत्या, म्हणूनच त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा जिवंत ठेवली आणि दाम्पत्य व संसाराच्या भानगडीत पडल्या नाही, ज्यामुळे त्या एक आदर्श आणि अपवाद ठरल्या नव्या पिढीला त्यांच्याबद्दल फक्त इतकंच माहीत आहे की त्या एक यशस्वी आणि लोकप्रिय नेत्या होत्या. पण या सगळ्या गोष्टी त्यांनी कोणत्या अटींवर मिळवल्या होत्या, याचं दर्शन ‘आंधी’ चित्रपटातून झालं आहे.

इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधीचा त्यांच्या पत्नीवर कसलाच जोर चालत नव्हता. त्यामुळे इंदिरा गांधी आपल्या आंतरजातीय प्रेम विवाहावर कधीच पस्तावल्या नाहीत आणि त्यांनी कधीच सार्वजनिकरीत्या आपल्या पतीची निंदानालस्ती वा चर्चाही केली नाही. या वैशिष्ट्यांमुळेदेखील ज्याला पतीचा मोठा सन्मान समजला गेला होता. त्यांना उच्च स्तरावर नेऊन ठेवलं होतं.

पण जेव्हा पत्नी इतकी महत्त्वाकांक्षी असेल की ती घर तोडायलाच निघाली असेल तेव्हा पतीने काय करायला हवं, जेणेकरून संसारही टिकून राहील आणि पत्नीला कसलं नुकसानही होणार नाही. त्या प्रश्नाची एक नव्हे अनेक उत्तरं असतील, ज्या खरंतर सूचना असतील, कारण हे देखील स्पष्ट आहे की पत्नी महत्त्वाकांक्षी असणं ही समस्या नाही, तर समस्या पतीकडून तिला मॅनेज न करू शकणं आहे.

याच शृंखलेत पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटपटू ६३ वर्षांच्या क्रिकेटर इमरान खानचंही नाव येतं, ज्यांनी आपल्या पत्नी रेहम खानला तलाक दिला. विशेष म्हणजे रेहम खान आणि इमरान दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. रेहमला पहिल्या पतीपासून ३ मुलं आहेत, तर इमरानलाही पहिल्या पत्नीपासून २ मुलं आहेत. वयानेही रेहम इमरानपेक्षा २० वर्षांनी लहान आहे.

या घटस्फोटाचं कारण त्या दोघांचं दुसरं लग्न किंवा मेळ नसलेलं लग्न नसून इमरानच्या मते रेहमची वाढती राजकीय इच्छा आकांक्षा जबाबदार आहे. इमरान पाकिस्तानच्या मुख्य राजकीय पक्ष तहरीके इंसाफ (पीटीआय)चे संस्थापक आणि पुढारी आहेत. अशीदेखील चर्चा आहे की रेहम पीटीआयवर अधिकार गाजवायला बघत होती. ती सतत पक्षाच्या बैठकीत जाऊ लागली होती आणि कार्यकर्त्यांची पसंतही ठरू लागली होती. पीटीआयची पाकिस्तानच्या सत्तेत काही दखल असो वा नसो, पण तिथल्या राजकारणात मजबूत पकड आहे, ज्यामुळे पाकिस्तानात इमरानच्या चाहत्यांची संख्याही जास्त आहे.

या तणावामुळे एकेकाळची बीबीसीची टीव्हीवरील निवेदिका असलेल्या रेहमदेखील असं वक्तव्य करून हे सिद्ध केलं की या घटस्फोटाचं कारण खरोखरंच तिची महत्त्वाकांक्षा आहे. रेहम सांगते की पाकिस्तानात तिला शिव्या दिल्या जायच्या. तिथलं वातावरण स्त्रियांच्या हक्कांच्या बाजूचं नव्हतं. ती तर संपूर्ण देशाची वहिनी झाली होती, ज्यांना हवं ते तिला शिव्या देऊ शकत होते.

घटस्फोटानंतर रेहमने हे सांगितलं की इमरानची इच्छा होती की तिने फक्त चूल पेटवावी म्हणजे एखाद्या पारंपरिक घरगुती बायकोसारखं राहावं, जे तिला मान्य नव्हतं. स्पष्टच आहे की या सगळ्यांमुळे खरोखरंच रेहमच्या महत्वाकांक्षा जागृत होऊ लागल्या होत्या आणि इमरानला हे मान्य नव्हतं.

पती होण्याचा एक फरक

प्रश्न हा आहे की काय पतीकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकते की ते आपल्या पत्नींच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यास अडथळा ठरणार नाहीत. तर याचं उत्तर स्पष्ट आहे ‘नाही.’ कारण पुरुषांचा स्वत:चा अहंकार असतो. तो पत्नीला आपल्यापुढे जाऊन वेगळी ओळख निर्माण करण्याची आणि प्रसिद्ध होण्याची संधी देत नाही. मात्र याबाबत पूर्णपणे त्यालाच दोषी ठरवणंदेखील त्याच्याशी अतिरेकपणाचं ठरेल. जर पती म्हणू शकते की तिनेच का झुकावं आणि तडजोड करावी, तर पतीकडूनही हा हक्क हिरावला जाऊ शकत नाही. प्रश्न संसार आणि मुलांसोबत अघोषित असलेल्या विवाहाच्या नियमांचाही असतो.

१९७३ साली अमिताभ बच्चन आणि जया भादुरीचा चित्रपट ‘अभिमान’देखील बॉक्स ऑफिसवर बराच गाजला होता. या चित्रपटात पती पत्नी दोघेही गायक असतात, पण पत्नीला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे पती वैतागतो आणि एकमेकांपासून वेगळे होण्याची परिस्थिती निर्माण होते. पत्नी माहेरी निघून जाते आणि गर्भपात झाल्यामुळे दु:खी राहू लागते. मात्र नंतर पती तिची समजूत घालून तिला पुन्हा स्टेजवर आणतो आणि तिच्यासोबत गाणं गातो. पण असं तेव्हाच घडतं, जेव्हा पत्नीने पराभव पत्करलेला असतो.

एका मध्यमवर्गीय पतीचं आपल्या पत्नीचं यश आणि प्रसिद्धी पचवू न शकणं आणि त्यासाठी दु:खी, कुंठित आणि चिडचिडं होणं, या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं. त्याला वाटतं की पत्नी पुढे गेल्यामुळे जग त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. पत्नीमुळे त्याच्या प्रतिभेचं योग्य मूल्यमापन होत नाहीए आणि लोक त्याची चेष्टा करत आहेत. आता एक नजर रीलऐवेजी रियल लाइफवर टाकली, तर इथे अमिताभ प्रसिद्धीच्या अलौकिक उंचीवर होता, हे तर प्रत्येकालाच माहीत आहे की इथे जया भादूरीचे अमिताभसाठी कितपत आणि काय काय त्याग केले आहेत. आपल्या पतीचं बुडणारं करिअर सावरण्यासाठी तिने ‘सिलसिला’ चित्रपटात काम करणंही स्वीकारलं होतं.

खरंतर प्रतिभासंपन्न महत्त्वाकांक्षी पत्नीचा पती कायम हीनभावना आणि कुंठितपणाला बळी पडत असल्याची गोष्ट सामान्य आयुष्यात घडत असल्याचं दिसून येतं. कारण त्याचा कमकुवतपणा दर्शवणारं एक सत्य त्याच्यासमोर उभं ठाकलेलं असतं आणि इथूनच सुरू होतो लढा, द्विधावस्था, चिडचिड आणि कुंठितपणा. पतीला हे चांगल्याप्रकारे माहीत असतं की तो पत्नीपेक्षा मागे आहे आणि हे सत्य सर्वांना कळत आहे. वैवाहिक जीवनाचा हा तो टप्पा असतो जिथे तो आपल्या पत्नीला नाकारू शकत नाही, स्वीकारूही शकत नाही आणि खरंतर पत्नीची यामध्ये काहीच चूक नसते.

एकीकडे यश आणि प्रसिद्धीच्या पायऱ्या चढणाऱ्या पत्नीला पतीचा कुंठितपणा आणि चिंता कळतच नाही आणि ती आपला प्रवास सुरूच ठेवते तर दुसरीकडे पतीला असं वाटतं की ती मुद्दामून त्याला चिडवण्यासाठी असं करत आहे. अशावेळी गरज असते ती ‘अभिमान’ चित्रपटातील बिंदू, असराणी आणि डेविडसारख्या शुभचिंतकांची.

जे पतीपत्नीला समजवू शकतील की खरंतर दोघांपैकी चुकीचं कोणीच नाहीए. गरज वास्तविकता स्वीकारण्याची असते, जिथे कोणाचाच अपमान होणार नसतो.

पण असे शुभचिंतक चित्रपटांमध्येच आढळतात. खऱ्या जगात नाही. त्यामुळे पतीचा कुंठीतपणा नैराश्यात बदलू लागतो आणि तो अनेकवेळा क्रूरपणा करू लागतो.

अशा कुंठितपणापासून सुटका मिळवण्यासाठी ही गोष्ट फार गरजेची आहे की पतीने पत्नीची पात्रता आणि श्रेष्ठत्त्व मनापासून स्वीकारावं आणि पत्नीनेही पतीला सतत हे दर्शवून द्यावं की तिने आजवर जे काही मिळवलं आहे ते त्याच्या सहकार्यामुळेच आहे.

यात शंका नाही की महत्त्वाकांक्षी पत्नीचं पहिलं प्राधान्य तिचं आपलं ध्येय असतं, घर संसार, मुलं किंवा पती नाही. पण याचा अर्थ असा नसतो की तिला त्यांची कसलीच काळजी अगर पर्वा नाही. याचा हाच अर्थ असतो की तिला आपली प्रतिभा कळते, आपल्या ध्येयापर्यंत तिला पोहोचता येतं आणि कुठलीच तडजोड करण्यावर तिचा विश्वास नसतो.

लक्षात ठेवा

  • पतीपत्नीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा वैवाहिक जीवन आणि संसारासाठी चांगली नसते. म्हणून यापासून दूर राहा. एकमेकांच्या भावना आणि इच्छेचा मान राखल्यानेच ते दोघे त्या सर्व गोष्टी मिळवू शकतात, ज्या त्यांना हव्या आहेत.
  • पत्नीला जर आयुष्यात काही मिळवायचं असेल वा काही बनायचं असेल तर काहीच चुकीचं नाही. हा तिचा हक्क आहे. पण पत्नींनी हेदेखील समजून घ्यावं की त्यांना जे हवं आहे, त्याने त्यांना काय मिळणार आणि यामुळे पतींच्या भावना दुखावत तर नाहीत ना…?
  • पतीचं प्रोत्साहन आणि प्रशंसा मिळाल्याने पत्नीची प्रतिभा आणखीनच उजळून निघते. तिचा विचार पतीला अपमानित करण्याचा नसतो. ही परिस्थिती तेव्हाच येते, जेव्हा पती आतल्या आत जळफळत असतो आणि पत्नीने जे यश मिळवलं असतं त्यातून तो स्वत:ला बाजूला करून टाकतो.
  • पत्नी कमवती असेल, सार्वजनिक आयुष्य जगत असेल तर पतीनेही हीन भावना न बाळगता आपल्या पत्नीवर अभिमान बाळगायला हवा.

नातेबंधनात या ५ चुका टाळा

* प्रतिनिधी

नाते जोडणे अतिशय सोपे आहे पण ते निभावणे कठीण आहे. एका चांगल्या नात्याचा अर्थ केवळ फुल देणे आणि छान छान ठिकाणी डिनर करणे हा नसतो. तशा तर खूप अशा गोष्टी असतात, ज्या केल्याने तुमचे संबंध विस्कटू शकतात. पण अशा काही चुका आहेत, ज्या तुम्ही सिरिअस संबंधांमध्ये चुकूनही करता कामा नये. जर तुम्ही आपल्या नात्याच्या बंधनाला मजबूत बनवू इच्छित असाल तर या ५ चुका अवश्य टाळा.

रोमांसमध्ये कमी

एक वेळ अशी असते की तुम्ही समाधानी असता आणि विसरता की नात्यात प्रेम आणि रोमान्सही आवश्यक आहे. असे मानले जाते की प्रेमाचे प्रदर्शन केले जात नाही तर ते समजून घ्यायचे असते. जर तुम्ही एखाद्यावर खरे प्रेम करत असाल तर तो माणूस स्वत:च तुमचे प्रेम समजून घेईल पण कधी कधी जर तुम्ही आपले प्रेम जाहीर केले तर यामुळे तुमच्या जोडीदाराला एक वेगळाच आनंद मिळेल. तुमच्यासाठी आवश्यक आहे की नात्यात रोमांस येऊ द्या आणि तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहा. कधीकधी प्रेम व्यक्त करून आपल्या जोडीदाराला स्पेशल वागणूक द्या.

परफेक्ट जोडीदाराची अपेक्षा

या जगात कोणताच माणूस परफेक्ट नसतो म्हणून ही अपेक्षा करणे अयोग्य आहे. प्रत्येक बाबतीत आपल्या जोडीदाराला हिणवायचे आणि त्याच्या चुका काढत बसायचे हे बरोबर नाही. जर त्याच्याकडून एखादी चूक झाली तर त्याला रागावण्याऐवजी समजवा. सतत त्याच्या चुका दाखवल्याने त्याचा आत्मविश्वास कमी होईल. तुम्ही त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवल्या नाहीत तर अधिक बरे होईल आणि जरी एखादी चूक झालीच तर दुसऱ्यांसमोर त्यांना हटकू नका. याउलट ती आपापसात सोडवा, त्याला त्या सुधारवायच्या पद्धती सांगा जेणेकरून परत अशी चूक होणार नाही.

परिस्थितीला सामोरे जा

खूपदा आपण विचार करतो की एखादा वाद संपवण्यासाठी त्याविषयी न बोललेच बरे. पण बोलल्याशिवाय तुमचे सगळे वाद संपुष्टात येणार नाहीत उलट जास्त वाढू शकतील. जर तुम्हा दोघांमध्ये वाद असतील तर त्यांना सामोरे जा. सामोरे गेल्याने तुमच्यातले वाद नाहीसे होतील. या मतभेदांबाबत आपल्या जोडीदाराशी संवाद साधा, दुसऱ्या कोणाला याबद्दल सांगायची चूक करू नका. असे केल्यास लोकांमध्ये तुमचेच हसे होईल. कोणीच तुमच्या समस्यांचे समाधान करणार नाही. उलट तुम्हाला आणखीनच निराश करतील. आरामात बसून एकमेकांशी बोला आणि समस्येचे निराकरण करा.

जास्त बंधनात ठेवू नका

आपल्या नात्याला थोडी स्पेस द्या. जास्त दखल देणंही योग्य नसतं. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्हाला सगळया गोष्टी सोबत कराव्याशा वाटतात, पण नात्याच्या सुरूवातीला हे बरे वाटते. जसं तुम्ही पुढे जाता तसे जास्त एकमेकांसोबत राहणेसुद्धा तुमच्या नात्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. प्रत्येक माणसाचे आपले असे जीवन असते आणि थोडा खाजगी वेळ तुमचं नातं अधिक बळकट बनवू शकतं.

स्वत:ला आणि आपल्या जोडीदाराला बदलवण्याचा प्रयत्न

कधीही आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी स्वत:ला बदलू नका किंवा मग आपल्या आनंदासाठी जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करू नका. जर तुमी प्रेमात असाल तर तुम्ही जशा आहात तशाच त्याला आवडाल आणि तुम्हीसुद्धा त्याला असेच आवडून घ्यायला हवे. जर कोणी तुम्हाला बदलवू पाहात असेल तर त्याचे प्रेम तुमच्यापेक्षा जास्त दिखाव्यावर आहे. प्रेमाचा अर्थ एकमेकांच्या लहानसहान वस्तूंवर प्रेम करणे आहे, प्रत्येक बाबतीत एकमेकांना समजून घेतले पाहिजे.

असे बनवा अतूट नाते

* गरिमा पंकज

लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा हनीमूनचा टप्पा आठवणींमध्ये कमी झालेला असतो तेव्हा काही वैवाहिक समस्या डोके वर काढू लागतात. अशा परिस्थितीत हे नाते दृढ करणे आणि वेळेत त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

जेव्हा आपण जोडीदार कमी व रूममेट अधिक वाटू लागतात : लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी अशी वेळ येते जेव्हा आपण रोमँटिक जोडीदार कमी आणि रूममेट्ससारखे वागणे जास्त सुरू करता. आपण दीर्घकाळ दृढ नातेसंबंधात रहावे. यासाठी परस्पर आकर्षण राखणे आवश्यक आहे.

यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कधीकधी रोमँटिक ड्राईव्हवर जा. एकमेकांना सरप्राइज द्या. शारीरिक हालचालींद्वारे वेळोवेळी एकमेकांवर प्रेम व्यक्त करा. आवश्यक असल्यास समुपदेशनासाठी जात रहा.

असे प्रयत्न एकमेकांना जोडून ठेवतात. त्याउलट जर आपण आपले सर्व लक्ष एकमेकांऐवजी आयुष्याशी संबंधित इतर गोष्टींकडे केंद्रित केले तर समजून घ्या की तो दिवस फार दूर नाही जेव्हा आपण जोडीदार कमी, रूममेट अधिक वाटू लागाल.

एकमेकांविषयी कंटाळवाणेपणा : विवाहाच्या बऱ्याच वर्षानंतर, प्रत्येक दिवस आपणास परीकथांप्रमाणे सुंदर जाईल असा विचार करणे निरर्थक आहे. जर आपणास आपल्या विवाहित जीवनाचा कंटाळा येऊ लागला तर याचा अर्थ असा आहे की आपण एकमेकांना गृहीत धरले आहे. आपण नित्याचे जीवन जगण्यास सुरुवात केली आहे आणि कोणत्याही प्रकारचे जोखीम घेण्याचे टाळत आहात.

जर आपण लैंगिक संबंध, वृद्धत्व, किंवा अगदी आपला दिनक्रम बदलण्यासंबंधित विषयांवर चर्चा करण्यास संकोच करत असाल तर आपण स्वत:ला बदलणे, प्रत्येक विषयावर बोलणे आणि जीवनात विविधता आणणे महत्त्वाचे आहे.

प्रणय आणि शारिरीक जवळीकतेचा अभाव : बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षानंतर दाम्पत्याचे लैंगिक जीवन कमी होते. याची अनेक कारणे असू शकतात. जसे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न, झोपेचे प्रश्न, मुलांचा जन्म, औषधांचे परिणाम, नात्यातील समस्या इ.लग्नाच्या काही वर्षानंतर असे होणे बऱ्याचदा स्वाभाविक मानले जाते. परंतु जर ही परिस्थिती बराच काळ टिकली आणि अंतर वाढत गेले तर नात्यातील दृढतेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत कधीकधी आपल्या जोडीदाराचे चुंबन घेणे आणि त्यास मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करणे व त्यास शारीरिकरित्या दूर जाऊ न देणे महत्वाचे आहे.

उद्दिष्टयांपासून अंतर : लग्नाच्या १-१५ वर्षानंतर आपल्या मनात असा विचार करून असंतोष उत्पन्न होऊ शकतो की आपण जीवनात कोणतेही विशेष हेतू साध्य करू शकले नाही. जेव्हा आपण लग्न करता तेव्हा जीवनातील प्राधान्यक्रम बदलतात. आपला जीवनसाथी आणि मुले आपल्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण बनतात.

लग्नानंतर प्रत्येकाला लहान-मोठे त्याग आणि तडजोडी कराव्या लागतात, ज्यामुळे बऱ्याचदा विशेषत: महिलांना आपले करियर आणि आयुष्याशी संबंधित इतर उद्दीष्टे जसे स्वत:चा व्यवसाय सुरू करणे, प्रवास, मॉडेलिंग किंवा इतर छंदांना वेळ देणे यासारख्या गोष्टींपासून वंचित रहावे लागते. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षात जोडपे अनेकदा नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि कुटुंब वाढविण्यादरम्यान आपल्या स्वप्नांच्या उड्डाणावर निर्बंध घालतात जेणेकरुन विवाहित जीवनात स्थिरता राखता येईल. परंतु १०-१५ वर्षे उलटून गेल्यावर त्यांना वाईट वाटू लागते की त्यांनी आपल्या स्वप्नांपासून स्वत:ला का दूर ठेवले? त्यांना असं वाटतं की जणू आयुष्य परत बोलवत आहे.

सत्य हे आहे की जर जोडप्यांना याबद्दल खऱ्या अर्थाने काही करायचे असेल तर त्यांनी एकत्र येऊन पुढे वाटचाल केली पाहिजे, एकमेकांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे.

सहनशक्ती कमी होणे : लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जेव्हा आपला जोडीदार काही अनियमित किंवा त्रासदायक काम करतो तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु जसजसा काळ व्यतीत होतो, बहुतेक जोडीदारांमध्ये संयम राखण्याची आणि एकमेकांच्या चुकांना क्षमा करण्याची प्रवृत्ती कमी होते. सुरुवातीला ते ज्या गोष्टीं हसत टाळत असत आणि नंतर त्याच गोष्टींवर एकमेकांवर रागावू लागतात.

हे महत्वाचे आहे की लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जसे आपण एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी दाखवतात, चुकांकडे दुर्लक्ष करतात, त्याचप्रकारे ही प्रवृत्ती नंतरही कायम ठेवली पाहिजे.

लहान-मोठे उत्सव : लग्नाच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही अगदी लहानाहून लहान प्रसंग साजरे करता. सहा महिन्यांची मॅरिज अॅनिव्हर्सरी असेल किंवा फर्स्ट डेट अॅनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन डे असेल किंवा वाढदिवस उत्सव प्रत्येक प्रसंगासाठी विशेष करण्याचा प्रयत्न करता. पण लग्नाला १०-१२ वर्षे उलटताच उत्सव कमी होत जातात.

प्रत्येक लहान-मोठया खुषीचा आनंद उठवणे महत्त्वाचे आहे. उत्सवाचे कारण बदला परंतु मूड नाही. जसे की कामाची पदोन्नती, मुलाचा वाढदिवस, पदवी प्राप्त करणाऱ्या मुलाचा उत्सव, लग्नाला १० वर्षे उलटल्याचा उत्सव इ. त्यांना टाळण्याचा कधीही प्रयत्न करु नका. असे प्रसंग आपल्या दोघांनाही जवळ आणतील.

आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह गेटटुगेदर करू शकता किंवा मग आपापसातच उत्सव साजरा करू शकता. प्रत्येक प्रसंगाला संस्मरणीय बनवा, हे उत्सव महाग करणारे नाही, तर यात दोघेही आनंद लुटतील हे महत्वाचे आहे. आपले प्रेम साजरे करण्यासाठी कधीकधी लाँग ड्राईव्हवर जा, मैफिलीत भाग घ्या, चित्रपट पहा किंवा घरीच स्पा नाइटचा आनंद घ्या. तारखेला जाणे कधीही थांबवू नका.

मोठ-मोठया इच्छा पूर्ण करण्याचा दबाव : लग्नाला १०-१५ वर्षापर्यंत पोहोचत-पोहोचत जोडपे मोठ-मोठया जबाबदाऱ्यांचे ओझे उचलू लागतात. मोठ-मोठी उद्दिष्टे बनवतात. आपले घर, मुलांचे उच्च शिक्षण अशा अनेक योजना त्यांच्या मनात चालत असतात. ती पूर्ण करण्याच्या धडपडीत आपण आपल्या नात्यावरील आपले लक्ष गमावतो, तथापि अशा परिस्थितीत संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे. जर आपण एकमेकांनी मिळून आपल्या योजनांवर कार्य केले तर याने नाते आणखी मजबूत होते आणि लक्ष्यदेखील सहजतेने प्राप्त होते.

कसे बनाल उत्तम जीवनसाथी

* मोनिका अग्रवाल

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पतीपत्नीमधील प्रेम हरवणे स्वाभाविक आहे. पती-पत्नी दोघेही आपापले काम व जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त असतात की आयुष्य एका मशीनसारखे होऊन जाते. आश्चर्याची स्थिती तर तेव्हा होते, जेव्हा लग्नाच्या काही महिन्यानंतरच दोघे एकमेकांना समजू शकत नाहीत व अंतर वाढत जाते.

देवने जेव्हा आपला नवीन जॉब सुरू केला, तेव्हा बरेच महिने प्रचंड मेहनत केली. रात्रंदिवस फक्त आपल्या जॉबमध्येच बिझी असायचा. रात्री उशिरा घरी येऊ शकायचा. अशात त्याला आपली पत्नी सिमरनची साथ मिळाली नसती, तर कदाचित उद्दिष्ट गाठणे सोपे झाले नसते. सिमरनने केवळ पत्नीच नव्हे, तर एक मैत्रीण बनून त्याच्या प्रत्येक पावलावर व प्रत्येक निर्णयात त्याची सोबत केली.

सपोर्टिव्हही असावे : साधारणपणे बायका विचार करतात की नवऱ्याला बायकोचे रूप, शृंगार, वस्त्रे, प्रेम व गोड शब्द आवडतात, परंतु त्यांना फक्त याच गोष्टी आवडतात का? निर्विवादपणे, एक पती आपल्या पत्नीच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच साजशृंगार व शालीनतेचादेखील चाहता असावा, परंतु सोबतच तो पत्नीचा साधेपणा, अनुकूलता, गहिरे प्रेम व साथ निभावण्याचे गुणही पसंत करतो. तो इच्छितो की त्याची जीवनाची सोबतीण फक्त नावाचीच सोबतीण नसावी, तर समजूतदार, भावना समजणारी, त्याच्या सुख-दु:खात साथ देणारी, सपोर्टिव्हसुद्धा असावी.

खोटेपणा नव्हे गहनता असावी : पती-पत्नीचे नाते तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा दोघांमध्ये आपलेपणा असतो, खोटेपणा नव्हे. पतिला हे जाणवले पाहिजे की त्याची पत्नी जीवनाच्या प्रत्येक अडचणीत त्याची सोबत करेल. पत्नीची प्रेमपूर्ण साथ, त्याच्या गरजांना समजण्याची शक्ती व विश्वासच पतिचा आधार असतो, ज्याच्या बळावर तो जगातील साऱ्या अडचणींचा सामना आरामात करू शकतो.

आपसातील समजूतदारपणा : या नात्यात आपसातील समजूतदारपणा व विश्वास खूप गरजेचा आहे. एका पत्नीचीही हीच इच्छा असते की पतिने तिच्या भावना समजून घ्याव्यात व असा आधार बना, ज्याच्यासोबत ती जगातील प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकेल. परंतु हे एकतर्फी नसावं, समजूतदारपणा फक्त पत्नीच दाखवेल, तर ताळमेळ बिघडेल. त्यामुळे एकमेकांसोबत पावलाशी पाऊल मिळवून चालावे व जीवनातील सगळया अडचणींचा भार उतरवून फेकावा.

गरजा समजून घ्या : पुष्कळ पती-पत्नी वर्षानुवर्षे एकमेकांच्या गरजा व भावना ओळखू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या दरम्यानचे अंतर वाढू लागते. एकाच छताखाली राहूनदेखील ते एकमेकांसाठी अनोळखी होऊन राहतात. मानसिकरित्या त्रस्त राहतात.

जर तुम्ही पतिचा जीवनसाठी बनू इच्छिता, तर पतिची आवड-निवड लक्षात ठेवा. यात तुम्ही फक्त आहार वा पेहरावापुरत्या मर्यादित नाही ना मी ज्या आवडीनिवडीबद्दल बोलतेय, ती आहे पॅशन व विचार यांची. पॅशन पूर्ण करण्यात त्यांचा सहकारी बना, जसे की जर ते लेखक आहेत, तर त्यांच्या लेखणीला काही नवे लिहिण्याची शक्ती तुमच्याकडून मिळायला हवी.

जर त्यांना क्रिकेट खेळ आवडतो तर तुम्हीही त्यात रस घ्या व जेव्हा ते दौऱ्यावर असतील, तेव्हा वेळोवेळी त्यांना स्कोर अपडेट करा. विश्वास ठेवा, यामुळे तुमच्या दोघांमध्ये विश्वास वाढेल व जीवन सुखी होईल. त्यांच्या श्रीमंत असण्याचे दरवेळी प्रदर्शन करू नका वा कमी पगार असेल तर अगदी असंतोष वा चेष्टाही करू नका.

रिकामेपण भरून काढा : सांगण्याचा अर्थ असा, की आपल्या पतिच्या जीवनाचे रिकामंपण भरून काढा. तुमचं खरं प्रेम व सोबत त्यांच्या जीवनातील प्रत्येक कमतरता पूर्ण करेल. यातच जीवनाचा आनंद आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर चांगलेवाईट दिवस येत जात राहतात. एकमेकांवरील विश्वास कठीण परिस्थितीतदेखील हरू देणार नाही.

अनौपचारिक असावा आनंद : जीवनसाथी सोबत दु:ख वाटून घेतल्याने जितकं हलकं वाटतं, त्यापेक्षा कितीतरी आनंद त्याच्यासोबत आपलं हास्य वाटून घेतल्यानं मिळतं. जर तुमच्याकडे एक उत्तम लाइफपार्टनरची सोबत आहे, तर मग जीवनातील प्रत्येक लहानातील लहान आनंदातही तुम्ही खूपच अनौपचारिकपणे उत्साहाने हसाल.

एकमेकांकडून शिकू शकता : जर तुमच्या जीवनात एक चांगली महिला पत्नीच्या रुपात येते, तर तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे, कारण तुम्ही तिच्याकडून पुष्कळ काही शिकू शकता. तुम्ही दोघे एकमेकांशी मोकळे राहाल. यामुळे तुमच्या दोघांमध्ये चांगले कम्युनिकेशन राहू शकेल ज्यायोगे तुम्ही दोघे एकमेकांकडून पुष्कळ काही शिकू व समजू शकता.

दोन शरीरे एक मन : पतिपत्नीला उगाच दोन शरीरे एक मन म्हटले जात नाही. एक खरी व प्रेमळ महिला जेव्हा एखाद्या पुरुषाच्या जीवनात येते, तेव्हा ती नेहमी हेच इच्छिते की तिचा जीवनसाथीची कायम प्रगती व्हावी. तुमच्या जीवनसाथीमध्येदेखील असेच गुण असतील, तर स्पष्टच आहे की तुम्हा दोघांच्या जीवनाचे उद्दिष्ट वेगवेगळे नसूव एकच असेल.

दोन मिनिट नुडल्सवाले प्रेम तर बाह्यप्रदर्शनासाठी चालू शकते, परंतू जीवन त्याच व्यक्तिसोबत आनंदाने व्यतीत होते, ज्यात हे सारे गुण आहेत. असे गुण फक्त मुलांसाठीच नव्हेत, तर मुलींसाठीही गरजेचे आहेत. नात्याची दोन्ही चाके बरोबर असतील तरच नात्याची गाडी दूरवर चालेल.

कौमार्यच चारित्र्याकरता प्रमाण का?

* मिनी सिंह

आपण २१ व्या शतकात जगत आहोत. माणूस चंद्रावर पोहोचला आहे. अनेक क्षेत्रात मुली मुलांच्या समानतेने वाटचाल करत आहेत. उलट अनेक क्षेत्रात तर मुलींनी मुलांनाही मागे टाकले आहे. तरीही अजूनही काही लोक असे आहेत जे मुलींचे पावित्र्य त्यांच्या कौमार्यावरून ठरवतात. पुरुषांसाठी आजही मुलीचे कौमार्य महत्वाचे मानले जाते. आजही त्यांच्या पावित्र्याची पडताळणी केली जाते.

जरी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे पालन करतो, त्यांच्यासारखे खाणेपिणे, त्यांच्यासारखे उठणेबसणे, शिकणे, बोलणे, राहू इच्छितो, पण तरीही मानसिकता अजूनही १४-१५व्या शतकातील आहे. सुशिक्षित असूनही कुठेतरी मुलांची मानसिकता अजूनही अशीच आहे की त्यांची नववधू व्हर्जिन असायला हवी.

आजही भारतीय समाजात लग्नात मुलगी व्हर्जिन असणे अनिवार्य मानले जाते. मुली व्हर्जिन असणे घराची प्रतिष्ठा व चारित्र्य यांच्याशी तोलले जाते. जर लग्नाआधी मुलगी आपल्या पुरुष मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर तिला चारित्र्यहीन म्हटले जाते. पण जर मुलाने असे केले तर म्हटले जाते की हे वयच असे असते.

व्हर्जिनिटीचा अर्थ

व्हर्जिनिटीचा अर्थ कौमार्य म्हणजे मुलगी कुमारिका आहे व तिने याआधी कोणाशीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ती व्हर्जिन आहे. हे तपासण्यासाठी आपल्या समाजात अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ज्यात सर्वात विचित्र मार्ग म्हणजे पहिल्या रात्री बेडवर पांढरी चादर टाकून पाहणे की संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग पडले आहेत की नाही. कौमार्याबाबत आजही इतके गैरसमज आहेत की शिकलेसवरलेले लोकसुद्धा ही गोष्ट नाकारत नाही.

कौमार्याबाबत गैरसमज

पहिल्यावेळी शरीरसंबंध ठेवले की रक्तस्त्राव होतोच हा सर्वात मोठा गैरसमज आहे, कारण ९० टक्के घटनांमध्ये पहिल्यावेळी सेक्स केल्यास रक्तस्त्राव होत नाही. एका संशोधनात असे आढळले की सेक्स दरम्यान रक्तस्त्राव होत नाही. घोडेस्वारी व टेम्पोन अशा खेळांमुळे पडदा फाटतो किंवा तो अत्यंत पातळ होतो किंवा राहातच नाही.

पहिल्या वेळी सेक्स करताना वेदना होतात, हा एक दुसरा गैरसमज आहे. जर सेक्सच्या वेळी मुलगा व मुलगी मानसिकदृष्टया तयार असतील तर शक्यता आहे की वेदना होणार नाहीत. पण जर मुलगी तणावाखाली असून सेक्ससाठी मानसिकदृष्टया तयार नसेल तर योनी कोरडी व आकुंचन पावली तर पहिल्या वेळी वेदना होण्याची शक्यता असते. जर सेक्सआधी योग्य प्रकारे फोरप्ले केला गेला तरी वेदनेची शक्यता कमी असते किंवा नसतेच.

व्हर्जिन मुलीच्या योनीचा आकार लहान असतो, हे खोटे आहे, कारण प्रत्येक मुलीच्या योनीचा आकार तिच्या शरीरयष्टीप्रमाणे असतो. व्हजायनाचा आकार लहानमोठा असणे किंवा शिथिल अथवा आकुंचन पावलेला असणे याचा तिच्या व्हर्जिन असण्याशी काहीही संबंध नाही.

टू फिंगर टेस्ट

अनेक लोकांचे म्हणणे आहे की मुलीच्या कौमार्याच्या टेस्टसाठी सर्वात भरवशाची टेस्ट टू फिंगर टेस्ट आहे. पण अशी कोणतीही टेस्ट नाहीए, ज्यावरून हे समजेल की मुलीचे कुणाशी संबंध होते किंवा नाही.

हे अतिशय क्लेशकारक आहे की बलात्कारपीडित स्त्रीच्या कौमार्याचे परीक्षण टू फिंगर टेस्टने केले जाते. याने कळते की त्या मुलीचा बलात्कार झाला आहे की नाही. पण अशा प्रकारची टेस्ट करणे म्हणजे एका बलात्कारानंतर दुसरा बलात्कार करण्यासारखे आहे. २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की टू फिंगर टेस्ट पीडितेला तेवढयाच वेदना देतात, जेवढया दुष्कर्म करताना होतात. कोर्टाने असेसुद्धा म्हटले आहे की अशी टेस्ट करणे बलात्कार पीडितेचा अपमान आहे. हे तिचे अधिकार नाकारणे आहे. सरकारने ही टेस्ट बंद करून दुसरा एखादा उपाय शोधावा.

एका तज्ज्ञाचा दावा आहे की आज समाज तंत्रज्ञान जगात आहे. एका पीडितेसोबत अशी टू फिंगर टेस्ट करणे अमानवीय आहे. ही टेस्ट पीडितेसोबत परत बलात्कार करण्यासारखे आहे. म्हणून या टेस्टवर पूर्णत: बंदी आणायला हवी.

सायकल चालवणे, घोडेस्वारी, डान्स, व्यायाम किंवा इतर कोणत्या कामामुळे पडदा आधीच नाहीसा झालेला असतो. अशात एखाद्या मुलीच्या चारित्र्याचा अंदाज लावणे स्वत:लाच धोका देण्यासारखे आहे. महिलेच्या कौमार्याचे परीक्षण करणे मागास समाजाचे लक्षण आहे.

कौमार्याचे परीक्षण

तुम्ही हे ऐकून अवाक् व्हाल की आजही एक समुदाय असा आहे ज्यात नवविवाहित वधूचे कौमार्य परीक्षण केले जाते. महाराष्ट्रातील कांजरभाट समाजात पहिल्या रात्री वधूच्या कौमार्याची तपासणी त्या समाजातील महिला करतात. पहिल्या रात्री वरवधूच्या बेडवर पांढरी चादर टाकली जाते. खोलीत जाण्याआधी दागिने व टोकदार वस्तू ज्या तिने घातल्या असतात, त्या काढल्या जातात, जेणेकरून तिच्या अंगावर कोणतीही जखम होऊन रक्त येऊ नये.

जर संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग दिसले तर वधू परीक्षेत पास झाली, जर असे घडले नाही तर ती नापास झाली. या कुप्रथेत केवळ वधूचेच परीक्षण होते, वराचे नाही. मुलाने लग्नाआधी कोणाशी संबंध ठेवले आहे अथवा नाही हे कोणीच विचारात घेत नाही आणि कोणाला विचारायचेसुद्धा नसते.

कांजरभाट समाजातील अनेक तरुण व महिला या प्रथेविरुद्ध आवाज उठवतात, पण अशांना समाजातून बहिष्कृत केले जाते. या समुदायातील तरुण ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ या शीर्षकाखाली ही मोहीम चालवत आहेत. यात व्हीचा अर्थ व्हर्जिनिटी आहे. या मोहिमेचे समर्थन करणाऱ्या एका युवकाला या समुदायाने चांगलीच मारहाण केली होती.

थोड्याफार प्रमाणात ही मानसिकता इतर वर्गातही आहे. पण ती अशाप्रकारे दिसून येत नाही. पती सतत हेच जाणून घेण्यात गुंतलेला असतो की आपली पत्नी लग्नाआधी इतर कोणावर प्रेम तर करत नव्हती ना?

हायमन सर्जरीची का आवश्यकता आहे

आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की डॉक्टरांनी यावरसुद्धा उपाय शोधला आहे. हो, गमावलेली व्हर्जिनिटी मुलगी परत मिळवू शकते.

एका वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार हे ऑपरेशन केवळ हायक्लास मुलीच नाही तर उच्चवर्गीय, मध्यम वर्गीय मुलीसुद्धा करू शकतात. एका चिकित्सक संस्थानांद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात मुली हे सगळे विवश होऊन करतात, जेणेकरून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या उद्भवणार नाही.

नागपुरातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. घिसड यांचे म्हणणे आहे की मुली त्यांच्या योनीच्या आच्छादनाला पूर्ववत करण्याबाबत विचारतात कारण त्यांना वाटत असते की जर त्यांचे लग्न एखाद्या रूढीवादी कुटुंबात झाले तर ते लोक तिचे जगणे कठीण करून टाकतील.

डॉक्टर पुढे सांगतात की पालक स्वत:च मुलीला ऑपरेशन करण्यासाठी घेऊन येतात. व्हर्जिनिटी नष्ट होण्याचे कोणतेही कारण असो, जर आईबापांसोबत मुलगी आली तर तिचे मनोबल कायम राहते.

काय आहे ही हायमन सर्जरी

जर एखाद्या मुलीने कोणत्याही कारणास्तव आपली व्हर्जिनिटी गमावली असेल तर ती ही सर्जरी करू शकते. या सर्जरीत घाबरायचे कोणतेच कारण नाही ना याचे कोणते साईडइफेक्ट्स आहेत. ही सर्जरी करून कोणतीही महिला कुमारिका होऊ शकते.

मुलं कितीही उच्च विचारी असण्याचा दावा करत असतील तरी आजही त्यांचे लक्ष मुलीच्या कौमार्यावरच असते. पण आता त्यांना ही मानसिकता  बदलावी लागेल. आज जर मुलींना ही सर्जरी करावी लागत असेल तर ते केवळ त्या पुरुषी मानसिकतेमुळेच, ज्यांना लग्नानंतर आपल्या बायकोकडून हे सिद्ध करून घायचे असते की तिचे कौमार्य सुरक्षित आहे वा नाही, भले त्यांचे स्वत:चे अनेक मुलीशी संबंध का असेना.

 

काय करणार जर घटस्फोटाची वेळ आली तर

– सुमन बाजपेयी

आपल्या वैवाहिक जीवनात असंतुष्ट असल्याने घटस्फोट घेणे नि:संशय. त्यावेळी एखाद्या बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतरचे आयुष्य सहजसोपे होईल किंवा जीवनात परत आनंद निर्माण होईल, असा विचार करणे एक चूकच आहे. म्हणून घटस्फोटाचा निर्णय घेण्याआधी त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्ही घटस्फोट घेण्याचा विचार करत असाल, तर हे नक्की आहे की तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काहीतरी कुरबुर आहे अथवा लहानसहान समस्या एवढया मोठया झाल्या आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे की आता एकत्र राहणे अशक्य आहे. या गोष्टी विचारांमधील संघर्ष निर्माण होण्यापासून तर विवाहबाह्य संबंधांपर्यंत निगडीत असतात नाहीतर मुलांचे संगोपन वा आर्थिक प्रश्नांमधून उत्पन्न झालेल्या असू शकतात. म्हणजे ही लहानलहान भांडणं काळानुसार ना केवळ जोडप्यांमधील दुरावा वाढवतात तर त्यांना वेगळे होण्यास विवश करतात.

जुळवून न घेणे किंवा मानसिक स्तरावर अवलंबून असल्याने वेगळे होणे नि:संशय एक सोपा मार्ग वाटतो, पण त्यासाठी ज्या कायदेशीर, सामाजिक आणि भावनात्मक त्रासाचा सामना करावा लागतो, तो काही कमी यातना देणारा नसतो. जर एखादे जोडपे लग्नाला यातना समजत असेल, तर त्यातुन सुटका मिळवण्यासाठीसुद्धा कमी यातना सहन कराव्या लागत नाही.

मूल्यांकन करा

घटस्फोट घेण्याआधी असा विचार करा की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रास देत आहेत. शक्य आहे की त्या आपण सुधरवू शकू. मग हे ठरवा की वास्तवात तुम्ही त्यात बदल घडवून आणू इच्छिता का? आपल्या विवाहसोबत तुम्हाला याचेही मूल्यांकन करावे लागेल की हा विवाह तुम्हाला वाचवायचा आहे का? घटस्फोटाकडे वाटचाल करताना स्वत:ला अवश्य विचारा की जी असमाधानाची भावना तुमच्यात रुजते आहे ती थोडया काळासाठी आहे, जी काळानुसार दूर होणार आहे का? घटस्फोट दिल्यावर तुम्ही परत नवे संबंध निर्माण करणार आहात का? तुमच्या मुलांवर याचा काय परिणाम होईल आणि ते या निर्णयात तुम्हाला पाठिंबा देतील का?

अनेक लोक यासाठी वेगळे होतात की, कारण ते खूपच लवकर लग्नाच्या बंधनात बांधले गेलेले असतात, आणि नंतर त्यांना अशी जाणीव होते की ते एकमेकांसाठी बनलेले नसतात. अनेक दशक ते एकत्र राहतात आणि मुलं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना असे वाटे की आता सोबत राहण्यात कोणतीच विवशता नाही व ते वेगळे होतात.

सर्वात महत्वाचे कारण जोडीदाराने विश्वासघात करणे हे असते. अनेक जोडप्याना असे वाटते की आता त्यांच्यात प्रेम राहिले नाही. पैसा आणि विचारामध्ये मतभेद असल्यामुळे ते नेहमी भांडत असतात. काही जोडप्याना वाटते की त्यांना आयुष्याकडून आणखी वेगळे काही हवे आहे, आता ते या नात्याशी तडजोड करू शकत नाही.

सिनिअर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. भावना बर्मी यांच्या मते, ‘‘घटस्फोटाच्या वाढत्या दराची काही प्रमुख कारणं आहेत. व्यावसायिक पातळीवर स्त्री आणि पुरुष दोघांच्या सतत वाढत्या महत्वकांक्षा, ज्यामुळे त्याच्या प्राथमिकता परिवारपासून दूर जात करिअरवर क्रेंद्रित होतात. आपापसात बोलायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. ते काम आणि कुटुंब या ताळमेळ साधू शकत नाहीत. दोघांची अर्थिक निर्भरता एकमेकांवर कमी असते. सहनशक्ती कमी असणे महानगरांमध्ये वाढत्या घटस्फोटाचे एक मोठे कारण आहे. घटस्फोट घेताना तुम्हाला हे माहीत असायला हवे की तुमचे आयुष्य आपापसात बांधले गेले आहे आणि हे तुटणे दोघानाही एका विस्कळीत मार्गावर आणू शकते. समाजापासूनसुद्धा तुटण्याची शक्यता यामुळे वाढते.

तुम्ही हा बदल स्वीकारायला तयार आहात का?

तुमचे घटस्फोट घेण्याचे कारण, एकत्र घालवलेला वेळ, तुमची संपत्ती, मुलं या सगळया गोष्टी तुमच्या निर्णयासाठी महत्वाच्या असतात. पण सर्वात महत्वाचे हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्ही हे कशा प्रकारे हाताळणार आहात. या कारणास्तव आयुष्यात होणाऱ्या बदलांचा सामना करायला तुम्ही तयार आहात का? घटस्फोट जीवनातील अत्यंत महत्वचं वळण असते, ज्याचा नंतर येणारा बदल सुखद वा दु:खद काहीही असू शकतो. म्हणून विचार करून हा निर्णय घ्यायला हवा. शक्य आहे की मॅरेज कौन्सिलरला भेटल्यावर तुम्ही तुमचा हा विचार मनातून काढून टाकाल.

घटस्फोटाचा अर्थ आहे बदल आणि हे समजून घ्या की कोणत्याही परिस्थितीत बदलाचा सामना करणे सोपे नसते. अनेकदा मन वळून मागे पाहते, कारण नव्या प्रकारे आयुष्याची सुरवात करताना जेव्हा अडचणी येतात, तेव्हा मन पूर्वायुष्य आठवून अपराधी भावनेने दाटून येते. तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे की तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकता आणि तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता.

यादी बनवा

घटस्फोट घेण्याच्या कारणांची एक यादी बनवा. आपल्या संबंधातील चांगल्या वाईट दोन्ही बाजू लिहा. आपल्या जोडीदाराला खलनायकाच्या भूमिकेत ठेवू नका, कारण कमतरता तर तुमच्यातही असतील. घटस्फोट घेतल्यावर यशस्वी आणि सुंदर आयुष्य जगण्याची मी सकारत्मक मानसिकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हे गृहीत धरून चला की दोघांच्या चुकींमुळे आज वेगळे व्हायची वेळ आली आहे. म्हणून आपला राग आणि यातना रचनात्मक पद्धतीने हाताळा.

घटस्फोटानंतर तुम्हाला एका सपोर्ट सिस्टीमची आवश्यकता भासेल, ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून तुम्ही रडू शकाल. आपले मित्र आणि नातेवाईकांचा आधार घेण्यात संकोचू नका. जर आवश्यकता असेल तर थेरपिस्टकडे जा आणि आपल्या समस्या मोकळया करा. जेणेकरून तुमच्यावर कोणताही ताण रहाणार नाही.

मानसिकता व्यवहारी ठेवा

घटस्फोटानंतर आर्थिक समस्या सर्वात मोठी असते. जर तुम्ही कमावत्या असाल तरीसुद्धा ही अडचण असतेच. अभ्यासानंतर ही गोष्ट समोर आली आहे की ज्या स्त्रिया घटस्फोटीत असतात, त्यांच्या जीवनशैलीत ३० टक्के घट होते आणि पुरुषांच्या १० टक्के. मग स्त्री या वेगळे होण्यास कितीही तयार का असेना, ती आर्थिक पातळीवर स्वत:ला अक्षम मानू लागते.

योग्य हेच असते की आपल्या भावना नियंत्रणात ठेवून घटस्फोट घेण्याऐवजी व्यवहारीक मानसिकता ठेवून योग्य पावलं उचला. यामुळे फायदा जास्त आणि कमी हानी होते यावर लक्ष ठेवा. जर तुम्ही स्वावलंबी नसाल तर जाहीर आहे की नंतर तुम्हाला कोणावरतरी अवलंबून राहावे लागेल आणि अशाप्रकारे तुमच्या अभीमानाला ठेच लागेल.

घटस्फोटानंतर मुलांवर खोलवर परिणाम होतो, कारण त्यांच्यासाठी आईवडील दोघेही महत्वाचे असतात. वेगळे होणे त्याच्या मनाला जखम करते आणि कधीकधी तर ते वाईट मार्गाला लागतात. एकटी व्यक्ती आपल्याच समस्यांमध्ये गुंतला असल्याने त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ शकत नाही.

स्वत:ला काही प्रश्न विचारा

* आपल्या जोडीदाराप्रती अजूनही तुमच्या मनात भावना आहेत का? जर असे असेल तर एकदा आपल्या नात्याला वाचवायचा अवश्य प्रयत्न करा.

* तुम्ही यासाठी एकत्र राहत आहात का, की समाजाचे प्रेशर आहे नाहीतर नेहमी भांडतच राहिलो असतो?

* तुम्हाला खरेच घटस्फोट हवा आहे का की केवळ ही धमकी आहे? केवळ राग प्रदर्शित करण्याकरिता वा अशाप्रकारे आपल्या जोडीदाराला इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचलता आहात. अशाप्रकारे संबंध बिघडतीलच.

* तुम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक स्तरावर यासाठी तयार आहात का? तुम्ही यांच्या नकारात्मक परिणामांबाबत विचार केला आहे का? घटस्फोट तुमच्या साधनांमध्ये कमी आणू शकतो, ज्यामुळे तुमचे अनेक स्वप्न तुटू शकतात.

* तुमच्याजवळ एखादी सपोर्ट सिस्टीम आहे का? तुम्ही तुमच्या मुलांना समजावू शकाल का? आणि त्यामुळे होणारा त्रास दूर करण्यात सक्षम आहात का?

* तुम्ही तुमचे करिअर आणि आपले खाजगी आयुष्य यांचा समतोल राखू शकाल का?

घटस्फोट घेतल्यावर तुम्हाला नवे अनुभव, नवी नाती व नव्या घटना नव्या प्रकारे हाताळण्यासाठी तयार रहावे लागेल. आपले जीवन परत निर्माण करावे लागेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की दुसरे लग्न केल्यास तुमच्या सगळया समस्या सुटतील, तर या भ्रमातून बाहेर या, कारण दुसरे लग्न यशस्वी होईल याची खात्री देता येणार नाही. नक्की नाही की या वेळी योग्य जोडीदार मिळेलच.

गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट

* कुमुद कुमार

मुकुलने गर्लफ्रेंड जूहीला वाढदिवसानिमित्त जे मनगटावरील घड्याळ भेट म्हणून दिलं होतं, ते तिला काही आवडलं नव्हतं. त्याबाबत जूहीने त्याच्याकडे वर्षभर तक्रार केली होती.

मुकुलने विचार केला होता की यावेळी तो जूहीला छान भेटवस्तू देऊन तिची बोलती बंद करेल. त्याने जूहीशी बोलता बोलता जाणून घेतलं होतं की तिला कोणता आणि कोणत्या कंपनीचा मोबाइल आवडतो.

जेव्हा मोबाइल शॉपमध्ये मुकुलने त्या मोबाइलची किंमत जाणून घेतली, तेव्हा तो विचारात पडला. २५ हजार रुपयांचा मोबाइल, एवढा महागडा मोबाइल अखेरीस तो जूहीला तिच्या वाढदिवसाला कसा भेट देऊ शकणार होता? तो निराश होऊन घरी परतला.

मुकुलचे वडील दिवाणचंद्र एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. मुकुलला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी एका महागड्या शाळेत त्याचं अॅडमिशन केलं होतं. महागडी फी आणि महागडे शिक्षण. दिवाणचंद्रला यासाठी ओव्हरटाइम करावा लागत होता. नेहमीच ते उशिरा घरी परतत असत.

मुकुल या गोष्टीचा फायदा घेऊ लागला होता. साध्या भोळ्या आईला तर तो कस्पटासमान समजत असे. अभ्यासाचा काहीही बहाणा करून तो घरातून बाहेर पडत असे, जूही आणि मित्रांसोबत मौजमजा करत असे.

जूही एका मोठ्या बिझनेस मॅनची मुलगी होती. तिच्या वडिलांना व्यवसायाच्या निमित्ताने नेहमीच शहराबाहेर जावे लागत होते. जूही या गोष्टीचा खूप फायदा उठवत असे. तीसुद्धा स्वच्छंद वृत्तीची झाली होती. मोठ्या कुटुंबातील मुलगी असल्याकारणाने तिला महागड्या आणि आकर्षक वस्तू आवडत असत.

मुकुलचा जीव संकटात सापडला होता. जूहीला स्वस्त वस्तू भेट म्हणून देऊ शकत नव्हता आणि महागडी वस्तू खरेदी करणे त्याच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. आता तो काय करणार? याच विचारात तो गर्क राहत असे.

एके दिवशी मुकुलचा मित्र राकेश त्याला आपल्यासोबत मोबाइल शॉपमध्ये घेऊन गेला. त्याने तिथे एक महागडा मोबाइल खरेदी केला, त्याची किंमत ३५ हजार होती.

मुकुलने जेव्हा त्याला या महागड्या मोबाइलबाबत विचारलं की त्याने तो कोणासाठी खरेदी केला आहे? तेव्हा हे जाणून त्याला आश्चर्य वाटलं की एवढा महागडा मोबाइल राकेशने आपली गर्लफ्रेंड सारिकासाठी खरेदी केला होता. मग मुकुलने आपली उत्सुकता शमवण्यासाठी विचारलं, ‘‘एवढी महागडी भेटवस्तू खरेदी करण्याची काय आवश्यकता होती?’’

‘‘अरे मित्रा मुकुल, या मॉडर्न आणि सुंदर मुली महागड्या आणि आकर्षक वस्तूंवरच भाळतात. त्यांना जेवढ्या महागड्या भेटवस्तू द्याल, त्या तेवढ्याच अधिक खूश होतात. महागड्या भेटवस्तूद्वारेच त्या समोरच्याचीच प्रतिष्ठा जोखतात. चमकूगिरीवर मरतात या मुली, चमकूगिरीवर.’’

‘‘पण राकेश, तुझ्याकडे एवढी महागडी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले? तुझे आई-बाबा तर यासाठी तुला एवढे पैसे देणार नाहीत?’’

‘‘अरे मित्रा मुकुल, ही सर्व आतली गोष्ट आहे. गर्लफ्रेंडला खूश ठेवण्यासाठी खूप काही करावं लागतं.’’

आता मुकुल या ‘खूप काही’मध्ये गुरफटला. त्याने राकेशला याबाबत विचारलंही. परंतु राकेशने हे सांगून त्याला टाळलं की या ‘खूप काही’चा अर्थ त्याला तेव्हाच कळेल, जेव्हा तो त्याच्या इतर मित्रांशी मैत्री करेल.

रात्रभर मुकुल राकेशबाबत विचार करत राहिला. त्याला जूहीला खूश करण्याचा एक मार्ग राकेशच्या मैत्रीतून दिसत होता. एक महागडे गिफ्ट देऊन त्याला कोणत्याही परिस्थितित जूहीला खूश करायची इच्छा होती.

शेवटी त्याने निर्णय घेतला की तो राकेश आणि त्याच्या मित्रांच्या संगतीत राहील आणि ‘खूप काही’ करेल.

राकेशने मुकुलला विश्वासात घेऊन चोरी करण्याचे कौशल्य शिकवले. सायकल आणि बाइक चोरणे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. भंगार बाजारात कोणाकडे सामान विकायचे आहे, राकेश चांगल्याप्रकारे अशा चोर दुकानदारांशी परिचित होता. चेन स्नॅचिंगचे कामही राकेशच्या ग्रुपला माहित होते. याकामीही ते चांगलेच तज्ज्ञ होते.

मुकुलही लवकरच चोरी करायला, खिसा कापयला आणि सोनसाखळी खेचायला चांगल्याप्रकारे शिकला होता. जूहीला खूश करण्यात आता त्याला काही अडचण येणार नव्हती. यावेळी त्याने जूहीला केवळ महागडा मोबाइलच गिफ्ट दिला नाही तर पंचतारांकित हॉटेलमध्ये तिला बर्थडे पार्टीही दिली. जूहीला मुकुलसारखा बॉयफ्रेंड मिळाल्याने धन्य वाटत होते. मुकुल तर तिच्या स्वप्नातील राजकुमार बनला.

एके दिवशी राकेशने मुकुलसोबत मिळून चेन स्नॅचिंगची योजना बनवली. राकेश अनेक दिवसांपासून दिल्लीच्या मॉडेल टाउन गल्लीची रेकी करत होता. त्याने जाणून घेतलं की संध्याकाळच्या वेळी कोणकोणत्या महिला रोज डेअरीवरून दूध आणतात आणि कोणत्या महिला भाजी मंडईतून भाजी घेऊन परततात. त्यांचे लक्ष्य कमलादेवी होती. ती एकटीच जात-येत असे. तिच्या गळ्यात चमकणारी सोन्याची चेन त्यांचा मोह वाढवत होती.

राकेशने सर्व गोष्टी मुकुलला चांगल्याप्रकारे समजावल्या होत्या. चेनवर झडप घालून हिसकावणं एवढं काही कठीण काम नव्हतं, जेवढं त्यानंतर मोटारसायकलवर बसून पळणं होतं. चेनवर ?ाडप घालण्याचं काम मुकुलला मिळालं आणि मोटारसायकलवर ड्रायव्हिंग करण्याचं काम राकेशने स्वत:कडे घेतलं.

योजनेनुसार मुकुलने अगदी चलाखीने आपलं काम पार पाडलं. चेनवर झडप घातली, कमलादेवीला धक्का देऊन खाली पाडलं, जेणेकरून तिला उठायला उशीर होईल आणि या दरम्यान ते पळून जातील.

चेन काढून घेऊन मुकुल पापणी लवते न लवते तोच राकेशच्या मोटारसायकलवर येऊन बसला. राकेशने मोटारसायकल वेगाने पळवली, परंतु एक भटकं डुक्कर त्यांच्या मोटारसायकलपुढे आलं. डुक्कर तर पळाला, परंतु त्यांच्या मोटारसायकलचे संतुलन बिघडलं आणि दोघे मोटारसायकलसहित खाली कोसळले.

तोपर्यंत कमलादेवीचा आरडाओरडा ऐकून गल्लीतील लोक त्यांच्यामागे धावले. ते मोटारसायकलवरून पडताच, गर्दीने त्यांना पकडलं. गर्दीने त्यांना खूप मारलं.

इतक्यात गर्दीतून एक महिला पुढे आली. तिला मुकुलचा चेहरा ओळखीचा वाटला. तिने मुकुलला लक्षपूर्वक पाहिलं आणि विचारलं, ‘‘तू दिवाणचंद्रचा मुलगा मुकुल आहेस ना?’’

मुकुल रडत म्हणाला, ‘‘हो काकी.’’

त्या महिलेने मुकुलच्या जोरदार थोबाडीत लगावत म्हटलं, ‘‘शी, तुला लाज वाटत नाही, एवढ्या मेहनती आणि इज्जतदार वडिलांचा मुलगा असून असे नीच काम करतोस.’’

मुकुलच्या डोळ्यांतून सतत पाणी वाहू लागले. ती महिला दुसरी कोणी नाही, मुकुलच्या वडिलांसोबत प्रायव्हेट कंपनीमध्ये कार्यरत सहाय्यक प्रबंधक सुशीलादेवी होती. ती मुकुलचे बाबा दिवाणचंद्रना चांगल्याप्रकारे ओळखत होती. तिला हेही माहीत होतं की मुकुलच्या शिक्षणासाठी मुकुलचे वडील कसे अहोरात्र झटत होते.

सुशीलादेवीने मुकुलच्या वडिलांना फोन केला आणि गल्लीतील लोकांना सर्व हकिकत सांगत त्यांना पोलीस स्टेशनला जाण्यापासून रोखलं. जेव्हा गल्लीतील सर्व लोकांना हकिकत कळली, तेव्हा ते चकीत झाले की कसे एका प्रतिष्ठित विद्यालयाचे विद्यार्थी आपल्या गर्लफ्रेंडना खूश करण्यासाठी चोरी आणि चेन स्नॅचिंगचे काम करू लागले आहेत.

लवकरच मुकुल आणि राकेशचे आईवडील घटनास्थळी पोहोचले. त्यांची नजर लाजेने खाली झुकली होती. मुकुल आणि राकेश तर आपल्या आईवडिलांशी नजरही मिळवू शकत नव्हते. मुकुल आपल्या आईवडिलांच्या पायावर लोळण घेत म्हणाला, ‘‘आई… बाबा… मला माफ करा. अशी चूक पुन्हा करणार नाही.’’

‘‘मुकुल, मला तुझा किती अभिमान वाटत होता, पण तू हे काय केलंस तुला माहीत नाहीए. तू माझा आयुष्यभर मिळवलेला मानसन्मान व इज्जत एका क्षणात धुळीला मिळवलीस, जी कधी पुन्हा मिळू शकत नाही,’’ मुकुलचे बाबा म्हणाले.

हे ऐकताच सर्वांचे डोळे ओलावले. सर्व प्रत्यक्ष पाहत होते की, संततीचं एक कृत्य कशाप्रकारे आईवडिलांची मान खाली करायला लावतं.

सुशीलादेवी प्रकरण कसंतरी सावरून घेत गर्दीतून त्यांना आपल्या घरी घेऊन गेली. कमलादेवीलाही त्यांनी आपल्या घरी बोलावलं.

मुकुल आणि राकेशने कमलादेवीचींही माफी मागितली आणि भविष्यात असे कृत्य न करण्याचे वचन दिले.

मुकुल आणि त्याच्या आईवडिलांना त्या रात्री झोप आली नाही. मुकुलने प्रायश्चित्त करत सर्व सत्य हकिकत आईवडिलांच्या कानावर घातली. तेव्हा त्याचे बाबा म्हणाले, ‘‘बाळा, तू वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचला आहेस, जिथे तू माझा मुलगा नाहीस, तर मित्रासमान आहेस. तू मेहनत कर, तुला जूहीच काय, तिच्यापेक्षा चांगली जोडीदार मिळेल, पण आधी शिक्षण घेऊन योग्यता तरी कमाव. चोर बनून तुला जूहीही मिळणार नाही.’’

बाबांचं बोलणं खरं ठरलं. जूहीला जेव्हा मुकुलच्या कृत्याबाबत कळलं, तेव्हा तिने मुकुलला ‘चोर’ बोलून त्याच्याशी असलेले संबंध तोडले. त्याने दिलेल्या भेटवस्तूही तिने त्याला परत केल्या. मुकुलचा चेहरा पडला.

आता मुकुलला योग्य धडा मिळाला होता. त्याला आता आईवडीलच खरे मित्र वाटत होते. त्याला आता कळून चुकलं होतं की भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी योग्य मार्गदर्शक कोण होऊ शकतात, तो आता मन लावून अभ्यास करू लागला. त्याला दाखवून द्यायचं होतं की तो ‘चोर’ नाही, आपल्या आईवडिलांचा लायक मुलगा आहे.

पाळणाघराबद्ल या गोष्टी जाणून घ्या

 

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एका पाळणाघरामध्ये दहा महिन्यांच्या मुलीला जबर मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. जेव्हा पोलिस आणि मुलीच्या पालकांनी पाळणाघराचे सीसी टीव्ही कॅमेरे पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. फुटेजमध्ये पाळणाघरातील सेंटरमधील मुलगी मुलीला मारहाण करीत होती. त्याला लाथा मारत होती आणि चापट मारत होती. बरं, पाळणाघरामधील मुलांमध्ये असं प्रथमच घडले नाही आहे.

याआधीही दिल्लीतील पोलिसांनी सुमारे 70 वर्षांच्या एका व्यक्तीला पाळणाघरामध्ये जाऊन अटक केली होती. ज्यावर पाळणाघरात एका 5 वर्षाच्या मुलीची छेडछाड केल्याचा आरोप होता.

अशा घटना आगामी काळात घडतात, ज्यात पाळणाघरामधील मुलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होतात.

वास्तविक, आज महिलांना सासरी किंवा करियरमध्ये राहणे आवडत नाही. ती एक प्रकारची तडजोड करते. त्यांना असे वाटते की तेथे काही पाळणाघरं आहेत, जिथे त्यांची मुले सुरक्षित राहू शकतात. त्यांच्यासाठी खाणे, खेळणे, आराम करणे आणि क्रियाकलाप शिकण्याची संपूर्ण व्यवस्था होती.

सकाळी मुलाला ऑफिसच्या वाटेवर सोडून ती संध्याकाळी घरी परत जात असताना सोबत गेली. जर एखाद्या दिवशी ते झोपले तर पाळणाघरात ऑपरेटरला कॉल करा आणि त्यांना सांगा. जेव्हा मुलाला घरी आणले जाते तेव्हा त्याच्याबरोबर वेळ घालवण्याऐवजी इतर कामांमध्ये व्यस्त राहा. ती फक्त रविवारी मुलाबरोबर वेळ घालवते. परंतु आपल्या मुलास पाळणाघरामध्ये काळजी घेण्यासाठी पूर्णपणे सोडणे योग्य नाही. हे करून आपण आणि बॉन्डिंग मुलामध्ये होत नाही. तो आपले शब्द आपल्याशी सांगण्यात अक्षम आहे, दु:खी होऊ लागते आहे. बर्‍याच वेळा मुलाला त्याच्याबरोबर होत असलेले शोषण, त्याच्याबरोबर काय होत आहे हे समजण्यास अक्षम होतो.

पाळणाघरामध्ये मुलाची चांगली काळजी घेतली जाते, तो तेथे नवीन गोष्टी शिकतो, परंतु हे मुलाला दररोज पालणाघरामध्ये कसे ठेवले जाते याची पर्वा न करता, त्याने तेथे कोणीतरी असावे कोणतीही अडचण नाही, कारण मुले काहीच बोलत नाहीत, फक्त रडत रहा आणि पालकांना असे वाटते.

त्यांना तिथे जायचे नाही, म्हणून ते रडत आहेत. त्या बाळाला ओळखण्याची आपली जबाबदारी आहे तिथे का जायचे नाही.

हे काम दररोज करा

  • ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपण कितीही कंटाळलेले असलात तरी आपल्या मुलाबरोबर वेळ नक्कीच आहे
  • खर्च करा. आज पाळणाघरामध्ये त्याने काय केले, त्याने काय खाल्ले, काय शिकले? मजा आहे की नाही?
  • मुलाला काही विचित्र उत्तर दिल्यास, त्यास हळूवारपणे घेऊ नका, परंतु मुलास ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा

 

तो असे का बोलत आहे?

  • जेव्हा तुम्ही कचेरीतून परत याल, तेव्हा त्याच्या शरीरावर कोणतेही खूण नसल्याचे तपासा. असेल तर मुलाला विचारा की मार्क कसा आला, तसेच त्याचे लबाडी बदलली आहे का ते पहा.
  • आपण जेवणाच्या वेळी जे जे जेवताना दिले ते त्याने खाल्ले काय?

पाळणाघर कधी निवडायच

  • मुलासाठी खेळण्यासाठी, पलंग स्वच्छ आहे की नाही याची वीज आणि पाण्याची काय व्यवस्था आहे? खेळणी आहेत, हे निश्चितपणे पहा.
  • पाळणाघर नेहमी हवेशीर, खुले आणि हलके असावे. जो मुलगा त्याची देखभाल करतो, तो मुलांच्या बाबतीत कसा वागतो हे देखील पहा.
  • तिथे आलेल्या मुलांच्या पालकांशी बोला. पाळणाघर कसे आहे, ते समाधानी आहेत की नाही, ते त्यांची मुले आहेत तेव्हापासून त्यांना तिथे पाठविण्यात आले आहे
  • आपल्या मुलास स्वस्त आणि घराच्या जवळ कोणत्याही जागी ठेवू नका, कारण तेथे तुमची मुले व्यवस्थित राहतील, म्हणून स्वच्छ पाळणाघर करण्याचा प्रयत्न करा.

तर समजून जा तोच तुमचा जिवलग आहे

– गरिमा

जिवलग किंवा साथिदार हा तुमचा मित्र, नातेवाईक किंवा शिक्षक कोणीही असू शकेल, ज्याच्यासोबत मनापासून आणि दृढपणे जोडले गेल्याचे तुम्ही अनुभवत असाल. तो तुमच्यापुढे आव्हान निर्माण करतो, तुम्हाला प्रेरणा देतो, आधार देतो आणि सतत तुमच्या विचारात असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेमके काय हवे, याची जाणीव तो तुम्हाला करून देतो. तुम्ही त्याच्यासोबत शरीर, मन आणि भावनेनेही जोडले गेलेले असता.

तोच तुमचा जिवलग आहे, हे कसे ओळखाल

ज्याचा सहवास लाभताच मनाला खोलवर समाधान मिळते : अशी व्यक्ती जिच्यासोबत तुम्हाला सहजता आणि सुरक्षितता जाणवते. ज्याच्यासोबत असल्याने तुम्हाला आनंद मिळतो. तो येताच तुमच्यातील अस्वस्थता दूर होते आणि कुठल्याही कामात तुमचे मन रमू लागते, तर मग समजून जा की तोच तुमचा जिवलग आहे.

खूप काळ एकमेकांना ओळखत आहोत असे वाटते : पहिल्या भेटीत तो तुम्हाला अनोळखी भासत नाही. त्याच्याशी बोलताना तुम्ही नर्व्हस होत नाही. याच्याशी आपण कुठलीही गोष्ट शेअर करू शकतो असे तुम्हाला वाटते. शिवाय तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकाल असे मनापासून तेव्हाच वाटते, जेव्हा तुम्ही तुमच्या जिवलगास भेटता.

तो हाच आहे ज्याच्या शोधात आजवर होते : भले तुमचे वय कितीही असो किंवा अनेकांबद्दल तुम्हाला यापूर्वी आकर्षण वाटले असेल. अगदी तुम्ही विवाहित का असेना, जीवनात एक वळण असेही येते जेव्हा एखाद्याला भेटल्यानंतर तुम्हाला असे वाटू लागते की बस्स हा तोच आहे, ज्याला मन शोधत होते. त्याच्यासोबत तुम्ही जीवनात स्थैर्य अनुभवता आणि तुम्ही त्याच्यापासून कधीच वेगळे नव्हता, असे तुम्हाला अगदी अंत:करणापासून वाटते.

त्याच्यासोबत प्रत्येक समस्येचा सामना समर्थपणे करता येईल असे वाटते : अशी व्यक्ती जी केवळ जवळ असल्यानेच तुम्हाला तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्यासारखे वाटते. आव्हानांचा सामना करायला आणि संकटांना हरवायला तुम्ही उभे व्हाल, तेव्हा वाटेल जसे की ती व्यक्ती गडद अंधारात प्रकाशाच्या रुपात तुमच्यासोबत आहे, तर अशावेळी समजून जा तोच तुमचा जिवलग आहे.

सुरक्षित वाटते : एखाद्या व्यक्तिकडे तुम्ही स्वत:हून ओढले जात असाल, जणू काही चुंबकीय शक्ती तुमच्या दोघांमध्ये आहे असे तुम्हाला वाटते. शिवाय तो सोबत असताना तुम्ही सर्व प्रकारे सुरक्षित आहात असे वाटते तर समजून जा तोच तुमचा जिवलग आहे.

गरजेचे नाही की तो सुंदरच असावा : खऱ्या प्रेमाचा अर्थ केवळ शारीरिक आकर्षण नाही तर मनाने आणि भावनेनेही एकमेकांशी जोडले जाणे असते. तुम्ही त्याच्या डोळयांत तुम्हाला आणि तुमच्या डोळयांत त्याला पाहू शकत असाल तर समजून जा तोच तुमचे प्रेम आहे, जिवलग आहे. जिथे तुम्ही एकमेकांपासून वेगळे नसून एकच आहात, असा अनुभव तुम्ही घेत असाल. कारण जिथे ‘तू’ आणि ‘मी’ अशी भावना असते तिथे ओढ तर असते. पण जिवलगासोबत तुमचे नाते अतुट राहाते.

काही मिळविण्याची इच्छा नसते : त्याला भेटल्यानंतर काही मिळविण्याची इच्छाच उरत नाही. तुम्हाला त्याच्याकडून काहीही नको असते, पण तरीही तोच तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा असेल. तुम्ही नि:शब्द असूनही तासन्तास त्याच्यासोबत वेळ व्यतित करू शकता. त्याला फक्त बघत राहू शकता, त्याच्याजवळ राहू शकता किंवा दूर राहूनही त्याला अनुभवू शकता तर समजून जा की तोच तुमचा जिवलग आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें