हिवाळ्यातही स्वस्थ राहतील अस्थमाचे रूग्ण

* सोमा घोष

१५ वर्षीय अनुरिमाला दमा आहे. लहानपणापासूनच तिला दम्याचे झटके येत असत. नंतर तर वाढत्या वयाबरोबर अजून वाढत गेले. यासाठी तिला नियमित औषधं घ्यावी लागतात. खरंतर हा त्रास थंडीच्या दिवसांत खूपच वाढतो कारण थंडीच्या दिवसांत श्वासनलिकेत कफ अधिक प्रमाणात साचतो. ज्यामुळे श्वासनलिका भरून जाते व रूग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. परिणामी धाप लागते. काहीजणांना थंडीच्या अॅलर्जीमुळेही अधिक त्रास होतो.

मुंबईतील एसआरवी हॉस्पिटलच्या चेस्ट फिजिशिअन डॉ. इंदू बूबना यासंबंधी सांगतात, ‘‘अतिताण आणि धूम्रपान ही दम्याची दोन मोठी कारणे आहेत. यामुळे दमा सर्वात जास्त बळावतो. याशिवाय अपुरी झोप, प्रदूषण हेसुद्धा याला जबाबदार आहेत.

हिवाळ्याच्या दिवसात हा आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. पण योग्य दिनक्रमाने हा धोका कमी केला जाऊ शकतो. माझ्याकडे असे अनेक रूग्ण येतात जे दम्याचे नाव ऐकूनच घाबरून जातात, जेव्हा की हा आजार जीवघेणा नाहीए.’’

डॉ. इंदू यांच्या मते हिवाळ्याच्या ऋतुमध्ये दम्याच्या रूग्णांनी खाली सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी :

* सर्वप्रथम घर स्वच्छ व हवेशीर ठेवावे.

* श्वास नेहमी नाकानेच घ्यावा. यामुळे हवा गरम होऊन छातीपर्यंत पोहोचते. ज्यामुळे थंडी कमी वाजते. तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करू नये.

* तापाची लस टोचून घ्यावी. यामुळे ७० टक्के व्यक्ती थंडीच्या अॅलर्जीपासून वाचू शकतात.

* घरात जर रूमहीटरचा वापर करत असाल तर वेळोवेळी त्याच्या फिल्टरची स्वच्छता करावी, जेणेकरून त्यावर धूळमाती जमणार नाही.

* घरातील पाळीव प्राणी, टेडीबिअरसारखी फरची खेळणी, झाडे इ. बेडपासून दूर ठेवावेत.

* थंडीपासून वाचण्यासाठी कित्येक जण आगीजवळ किंवा रूमहीटरजवळ बसतात. पण हे योग्य नाही कारण यामुळे लोकरी कापडाचे धागे जळतात. त्यातून निघणारा धूर दम्याच्या रूग्णांसाठी घातक असतो. म्हणून रूम हिटरने घर गरम करावे व त्यापासून दूर रहावे. तसेच घरातील उष्णता कायम राहिल असे पहावे.

* घरात जुने सामान ठेवू नये. साफसफाई करताना धूळ उडवू नये. ओल्या कापडाने घर स्वच्छ करावे.

* जेवण करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे कुठल्याही प्रकारच्या जिवाणूंशी संपर्क होणार नाही.

* थंडीच्या दिवसातही वर्कआउट अवश्य करा. पण आधी स्वत:ला वॉर्मअप करणे विसरू नये.

* थंडीत द्रवपदार्थ अधिक प्रमाणात खावेत. घरी बनवलेल्या कमी चरबीयुक्त आहाराचे सेवन करावे. आंबट खाल्ल्याने दमा वाढत नाही. पण ज्यांना अॅलर्जी आहे, त्यांनी खाऊ नये.

* रोज स्वच्छ व धूतलेले कपडे घालावेत. कॉटनचे कपडे घालून त्यावर लोकरीचे कपडे घालावेत.

* जर लहान मुलांना दमा असेल तर त्यांना पौष्टिक व न्यूट्रीशनयुक्त आहार द्यावा.

* औषधांचे नियमित सेवन करावे.

आरोग्य बिघडवू शकते एक्सरसाईज

* डॉ. सागरिका अग्रवाल, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल्स

आरोग्याच्या दृष्टीने एक्सरसाईज किंवा व्यायामाचे बरेच फायदे आहेत. पण आजकाल आपण अशी जीवनशैली जगत आहोत, जिथे व्यायामासाठी जराही वेळ नसतो. बऱ्याच वर्षांपासून जीवनशैली एकाच प्रकारची असल्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामध्ये शारीरिक स्थितीसह मानसिक परिस्थितीचाही समावेश असतो.

कुठल्याही प्रकारे का असेना, पण आपल्या शरीराला रोज थोडया प्रमाणात सक्रिय राहाणे गरजेचे असते. यामुळे आपल्या शारीरिक विकासास प्रोत्साहन मिळते आणि आपली एकूण कार्यक्षमताही वाढते. व्यायामाचे जसे अनेक सकारात्मक पैलू आहेत तसेच नकारात्मक पैलूदेखील आहेत, ज्यांच्याकडे ठराविक लोकांचेच लक्ष जाते. जसे की भरपूर व्यायामामुळे प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतात.

एक्सरसाईजचे सकारात्मक पैलू

हृदयाच्या स्थितित सुधारणा : आपण शारीरिकरित्या किती काम करतो यावर आपल्या हृदयाची स्थिती अवलंबून असते. जे लोक दररोज शारीरिकदृष्टया सक्रिय नसतात, त्यांनाच हृदयाशी संबंधित सर्वात जास्त आजार असतात.

चांगली झोप न येणे : अनेक अभ्यासांद्वारे हे सिद्ध झाले आहे की जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांना रात्री चांगली झोप येते. हे यामुळे घडते कारण व्यायामामुळे शरीराची सर्केडियन रिद्म व्यायामामुळे मजबूत होते, जी आपल्याला दिवसा सक्रिय ठेवण्यास मदत करते. यामुळे रात्री चांगली झोप येते.

शारीरिक उर्जेमध्ये वाढ : आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात एक्सरसाईजबाबत अनेक प्रकारचे गैरसमज असतात, जसे की एक्सरसाईज आपल्या शरीराची सर्व शक्ती शोषून घेते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर काहीही करू शकत नाही. प्रत्यक्षात याच्या अगदी उलट घडते. कारण एक्सरसाईजदरम्यान, तुमच्या शरीरातून काही खास प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात, जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात.

आत्मविश्वास वाढणे : नियमित व्यायामामुळे हवा तसा परफेक्ट शेप तुमच्या शरीराला मिळू शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो. शरीराची उत्तम ठेवण आणि सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही घर आणि कार्यालयातही पूर्वीपेक्षा अधिक चांगले काम करू शकता.

अति एक्सरसाईजचे नकारात्मक पैलू

नियमित व्यायामाचे बरेच फायदे आहेत, म्हणूनच फिजिकल अॅक्टिव्हिटीजकडे दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाही. परंतु काही अशा गोष्टीही आहेत, ज्यामुळे सिद्ध झाले आहे आणि ज्यामुळे हे लक्षात येते की अति व्यायामामुळे शरीरावर नकारात्मक परिणामदेखील होऊ शकतो :

* महिलांमध्ये एक विशेष स्थिती निर्माण होते, ज्याला रजोरोध म्हणतात. ही परिस्थिती तेव्हा निर्माण होते, जेव्हा सामान्य महिलेस सलग ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत योग्य प्रकारे मासिक पाळी येत नाही. बऱ्याच महिलांमध्ये अशी स्थिती निर्माण होते, कारण त्या शरीराला नियमित ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीज देणाऱ्या पदार्थांचे सेवन न करताच जिममध्ये काही विशेष प्रकारच्या व्यायामाचे ३-४ सेशन नियमित करतात.

* शरीरातील कॅलरीजच्या कमतरतेचा थेट परिणाम केवळ प्रजननक्षमतेवरच होत नाही तर महिलांच्या लैंगिक इच्छेवरदेखील याच प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त, लठ्ठपणादेखील यात महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण बहुतेक करून लठ्ठ महिला वजन कमी करण्यासाठी अनेकदा खूपच कठीण व्यायाम करतात, ज्याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

* लठ्ठपणामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे ओव्हुलेशन आणि मासिक पाळीवर परिणाम होतो आणि वंध्यत्वाचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये तरुण महिलादेखील एवढया जास्त प्रमाणात वर्कआऊट करतात की त्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी त्या स्तरापर्यंत जाते, जी त्यांच्या मासिक पाळीत अडथळा आणते. इस्ट्रोजेनच्या पातळीत बरेच बदल झाल्यास गर्भधारणा होण्यासाठीही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

* आपल्या सर्वांना आणि विशेषत: महिलांना हे चांगले माहीत असते की बहुतेक   गर्भनिरोधक औषधांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी जास्त असते. म्हणूनच महिला    त्यांचे सेवन केल्यानंतर गर्भवती होण्यापासून स्वत:ला रोखू शकतात. अति व्यायामामुळेही इस्ट्रोजेनची पातळी वाढते. म्हणूनच जर एखाद्या महिलेला गर्भधारणा करायची असेल तर तिने हेवी एक्सरसाईज करू नये.

* हेवी ट्रेनिंग सेशनमुळे पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, जी थेट त्यांच्या प्रजननाशी संबंधित आहे. आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जे बॉडी मेन्टेन ठेवण्यासाठी प्रदीर्घ काळ कठीण ट्रेनिंग सेशन फॉलो करतात.

* तुम्ही जर अति थकवा आणणाऱ्या आणि कठीण ट्रेनिंगमधून जात असाल तर सामान्य ट्रेनिंग सेशन फॉलो करणाऱ्या लोकांच्या तुलनेत तुमच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी असण्याची शक्यता असते.

* दीर्घ काळापर्यंत थकवा आणणारा कठीण व्यायाम केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, सोबतच पुनरुत्पादनाची क्षमतादेखील कमी होऊ शकते. शिवाय हेवी रेजिस्टन्स ट्रेनिंग फायद्याऐवजी तुमचे नुकसान करू शकते. कारण यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढते, जे पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इतर हार्मोन्सवर विपरित परिणाम करते. यामुळे तुमच्या महिला जोडीदारास गर्भधारणा होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नियमित व्यायामासह पुरेसा आहार घेणेदेखील आवश्यक असते, कारण तुमच्या शरीराला नियमितपणे कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. खास करून तेव्हा ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाईजदरम्यान खूप ऊर्जा गमावता. म्हणूनच पुरुषांनी वेळोवेळी आपले स्पर्म काउंट तपासून पाहिले पाहिजेत तर महिलांनी त्यांच्या गर्भधारणेच्या क्षमतेची तपासणी करून घेतली पाहिजे. यामुळे तुम्हाला समस्येतून बाहेर पडण्यासाठी आणि सामान्य जीवन जगण्यासाठी मदत होईल.

सकाळचा नाश्ता पोषक हवा

* डॉय सिमरन सॅनी, फोर्टिस हॉस्पितल

अनेकदा म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचं भोजन आहे. कारण रात्रभराची झोप आणि १२ तास वा अधिक वेळ अन्नाविना राहिल्यामुळे जेव्हा आपल्या शरीराला पोषणाची गरज भासते आणि त्याची आपूर्ति सकाळचा नाश्ता पूर्ण करतो. याव्यतिरिक्त जागे झाल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये काम करण्यासाठी ग्लूकोजचा वापर होतो. सकाळचा नाश्ता ग्लूकोजचं प्रमाण बॅलेन्स करतो आणि तुमच्या पाचनशक्तीला पुन्हा क्रियाशील बनवतो.

याव्यतिरिक्त, सकाळचा नाश्ता करण्याचे इतर फायदेदेखील आहेत. हा तुमची स्मरणशक्ती वाढवतो आणि तुमचं वजन समतोल ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका

साकारतो. सकाळचा नाश्ता नियमित न करणाऱ्यांना दिवसभरात जेव्हा भूक लागते, तेव्हा ते अधिक खातात, त्यामुळे त्याचं वजन वाढतं. सकाळचा नाश्ता करण्याची चांगली सवय ही उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह पिडित लोकांसाठी सहाय्य ठरते.

पोषक तत्त्वांनी परिपूर्ण

न्यूट्रिशनिस्ट नेहमीच सांगतात की सकाळचा नाश्ता हा जागे झाल्यानंतर २ तासातच करायला हवा. परंतु तुम्ही काय खाता हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सकाळचं हे पहिलं खाणं कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन बीसारख्या आवश्यक पोषक मुल्यांनी परिपूर्ण असावं. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या देशात सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ले जाणारे पदार्थ हे अनारोग्यकारक असतात. त्यामध्ये वापरली जाणारी साखर, लोणी, तूप आणि तेल इत्यादी पदार्थांमुळे तो हानिकारक ठरतो.

तेलकट अन्नामध्ये चरबीचं प्रमाण अधिक असतं, जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामध्ये कॅलरीज आणि चरबीदेखील अधिक असते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि

खराब कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. रक्त वाहिन्यांमध्ये मेद आणि प्लाक हळूहळू जमा होत राहिल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि शेवटी हृदयरोग म्हणजेच स्ट्रोक होतो. उच्च रक्तदाबामुळे पित्ताचा असमोतल वाढण्याची शक्यता असते.

नवी दिल्लीच्या फोर्टिस इस्पितळाच्या कन्सल्टंट डॉ. सिमरन सॅमी यांनी सांगितलं की नाश्त्यामध्ये तूप आणि लोणी यांचा सढळ वापर होणं आरोग्यासाठी घातक असतं. पुरी, बटर लावलेले पराठे, मैद्याची रोटी आणि ब्रेड रोलसारखे तळलेले पदार्थ नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. तेलकट, चरबीयुक्त व गोड पदार्थांमुळे पचनयंत्रणा बिघडते. त्यामुळे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत आजार होण्याची शक्यता वाढते. आपल्या आहारात तूप, लोणी आणि साखर यांचा नियमित वापर करण्याऐवजी आरोग्यदायक पदार्थांचा वापर करणं ही निरोगी जीवनशैलीची गरज आहे.

गोड कमी खा

उत्तम आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये अतिरिक्त मिठ आणि शर्करायुक्त पदार्थांऐवजी उच्च फायबर आणि कमी मीठ असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याची अधिक गरज आहे. गोड पदार्थांची आवड असणाऱ्यांनी सुरक्षित पर्याय म्हणून साखरेला मीठाचे उपलब्ध पर्याय वापरावेत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आरोग्याशी संबंधित पिडित लोकांनादेखील मदत मिळू शकेल. स्टेल्विया, एस्पारटेम आणि सुक्रेलोस साखर याचे पर्याय आहेत, जे जगभरात लोकप्रिय आहेत आणि आपल्या देशातदेखील उपलब्ध आहेत. परंतु याचा वापर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवा.

सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अशा पदार्थांचा वापर करा ज्यामध्ये फायबर प्रोटिन आणि कार्बोहायडे्रट अधिक प्रमाणात असतील तसंच मीठाचं प्रमाणदेखील कमी असेल. आपला आहार सतत बदलत राहा. एकच पदार्थ दररोज खाऊ नका. नाश्त्यामध्ये विविधता ठेवा आणि थोड्या थोड्या प्रमाणात पदार्थ खा.

सकाळच्या आरोग्यदायक नाश्त्यामध्ये रवा, पोहे, फळांचं सॅलड, पोळी, मल्ट्रीग्रेन डोसा, उपमा, सांबर, डाळ, सोया, मोडाची धान्य, भाज्यांचे सॅण्डविच, मका, फॅट नसलेलं दूध व दही, लस्सी, कॉटेज चीज, ताज्या फळांचा रस, ब्राउन राइस, केळ, टरबूज किंवा सफरचंदसारख्या फळांचा समावेश करा. साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ उदाहरणार्थ पेस्ट्री आणि डबाबंद फळं खाऊ नका. भरपूर तूप वा तेलयुक्त पराठे आणि ऑमलेट खाऊ नका. याशिवाय अधिक लोणी वा तूप, मैद्याचा रोटी, भात, फ्रेंच टोस्ट, चरबीयुक्त मटन, मलईयुक्त दही आणि अन्य पदार्थ खाऊ नका. लोणी आणि साखरेचे आरोग्यदायी पर्याय निवडा.

सकाळचा पोषक नाश्ता लहान मुलं आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी अधिक गरजेचा आहे. जे सकाळी पौष्टिक नाश्ता करतात, त्यांना शारीरिक व मानसिक कामे करण्यास अधिक उर्जा मिळते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि दररोजच्या दिनचर्येशी संबंधित आजारपण दूर पळविण्यास मदत होते.

अशी मुलं शाळांमध्येदेखील अधिकाधिक सक्रीय असतात. चिडचिडेपणा, बेचैनी, थकवा या मुलांमध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. यासाठीच प्रत्येकाने मग लहान असो वा मोठे सकाळचा नाश्ता अधिक गांभीर्याने घ्यायला हवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें