उन्हाळ्यात बाळाची अशी करा देखभाल

* डॉ. कृष्ण याद

नवजात बालकासाठी उन्हाळ्याचा मोसम खूप असह्य असतो; कारण प्रथमच ते या वातावरणाचा सामना करत असतं. मोठ्याने ओक्साबोक्शी रडणं, खूप घाम येणं, केस ओले होणं, गाल लाल होणं आणि वेगाने श्वासोच्छ्वास घेणं यांसारखी लक्षणं या गोष्टींचे संकेत असतात की मुलं अति उकाड्याने त्रासलेली आहेत.

ओवर हीटिंग उन्हाळ्यात डायरियाला थेट कारणीभूत ठरतं, जे अनेक नवजात शिशूंसाठी घातकही ठरू शकतं.

उन्हापासून बचाव

उन्हाळ्याच्या मोसमात बाळाला उन्हाच्या प्रखर किरणांपासून दूर ठेवावं. ६ महिन्यांहून कमी वयाच्या बाळाच्या त्वचेमध्ये सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षा करणारा मेलानिन हा घटक खूप कमी असतो, जो त्वचा, डोळे आणि केसांना रंग प्रदान करतो. मेलानिनच्या अभावामुळे सूर्याची किरणं बाळाच्या त्वचेतील पेशींना कायमस्वरूपी हानी पोहोचवू शकतात.

तेलमालीश करा

बाळाला योग्य तेलमालीश केल्यास बाळाचे टिश्यू आणि मांसपेशी खुलतात आणि यामुळे त्याचा उत्तम विकास होतो. बाळाच्या नाजूक त्वचेला सर्वात चांगल्याप्रकारे सूट करणाऱ्या तेलाची निवड जशी आवश्यक आहे तशीच ही बाबही लक्षात घेणं जरुरी आहे की यामुळे चिकचिकीतपणा जाणवणार नाही, तेलाऐवजी मसाजिंग लोशन आणि क्रीमही वापरता येईल. अंघोळ घालताना ते व्यवस्थित बाळाच्या शरीरावरून स्वच्छ होईल हे बघा. कारण तेल बाळाच्या स्वेदग्रंथीचं कार्य रोखू शकते.

टबमध्ये अंघोळ घालणं

उकाड्यापासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे अंघोळ करणं. तसं बघता प्रत्येक वेळेस अंघोळ घालण्याऐवजी बाळाला ओल्या कपडाने पुसून घ्यावं. परंतु जेव्हा बाळ उकाड्याने अस्वस्थ होत असेल, तेव्हा त्याला पाण्याने भरलेल्या टबमध्ये अंघोळ घालावी, यात पाण्याचं तापमान कोमट असलं पाहिजे.

टाल्कम पावडर

टबमध्ये अंघोळ घातल्यानंतर मुलांच्या शरीरावर टाल्कम पावडर लावणं चांगलं मानलं जातं. जेथे काही मुलांचं घामोळे कमी करण्यात टाल्कम पावडर उपयुक्त ठरते, तेथे काही वेळा याचा त्रासही होऊ शकतो. तेव्हा आपल्या तळहातावर थोडी पावडर घेऊन बाळाच्या त्वचेवर लावावी, त्याच्यावर पावडर फवारू नये.

नियंत्रित तापमान

बाळाच्या खोलीला दिवसा थंड राखण्यासाठी पडदे लावून खोलीत अंधार करा. पंखा सुरू ठेवा. मुलांना एअरकंडिशनरच्या थेट संपर्कात कधी ठेवू नका; कारण यामुळे बाळाला सर्दीपडसंसुद्धा होऊ शकतं.

उपयुक्त पोशाख

आई बहुतेकदा द्विधा मन:स्थितीत असते की बाळाला कोणते कपडे घालावेत. असा समज आहे की नवजात शिशूला खूप गरम कपड्यांमध्ये ठेवलं पाहिजे. कारण गर्भाच्या तुलनेत बाहेरचं तापमान आतल्या तापमानाहून थंड असतं. परंतु उन्हाळ्याच्या मोसमात त्यांच्या उबदार कपड्यांची संख्या कमी करून त्यांना कमी कपड्यांमध्ये ठेवू शकता. त्यांना सुती सैलसर कपडे घालावेत जेणेकरून त्यांच्या त्वचेला हवेचा स्पर्श होईल आणि त्यांना आरामदेह वाटेल. सुती कपडे मुलांसाठी फायदेशीर असतात आणि हे घामसुद्धा शोषून घेतात. बाळाचं उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना त्याला हॅट जरूर घालावी.

स्लिमिंग पिल्सपासून रहा दूर

* पूनम अहमद

आजकाल बारीक दिसण्याचे वेड लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बारीक असणे हीच जणू सौंदर्य आणि हुशारीची ओळख आहे. कमी वेळेत मेहनतीशिवाय बारीक दिसण्याची इच्छा वाढीस लागली आहे. याचे दुष्परिणाम माहीत असूनही लोक तीच चूक करत आहेत जी ठाण्यात राहणाऱ्या २२ वर्षीय मेघनाने केली. मेघना अलीकडेच एका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कामाला लागली होती. जिममध्ये वर्कआऊटपूर्वी तिने डिनिट्रोफेनॉल घेतली आणि अचानक तिची तब्येत बिघडली. तिला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा कितीतरी जास्त होते. तिला श्वास घ्यायला त्रास होता. हृदयाची धडधड खूपच वेगवान होती आणि ब्लडप्रेशर खूपच वाढले होते. त्यामुळेच हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला.

हे औषध ऑनलाईन मिळते आणि यात असलेले आयनोफोरिक हे शरीरातील चयापचय प्रक्रियेचा स्तर वाढवून वजन कमी करते. हे असे एक रासायनिक तत्त्व आहे जे माणसाचा जीव घेऊ शकते. याचा डोस जास्त झाल्यास श्वास घ्यायला त्रास होणे, प्रचंड गरम होणे, हृदयाचे ठोके वाढणे इत्यादी अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.

आता याचा तपास सुरू आहे की, मेघनाने ते औषध कुठून आणि कसे मिळवले? पोलिसांनी जिममध्ये जाऊन तिच्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली.

मेघनाच्या भावाने सांगितले की, ती २ महिन्यांपासून प्रशिक्षक म्हणून जिमला जात होती. ते औषध तिला कुठून मिळाले? बाजारात अशा ब्रँडचे औषध मिळतेच कसे? असे प्रश्न तिच्या भावाने विचारले.

एफडीएच्या आयुक्त पल्लवी यांनी सांगितले की, ‘‘अशा ब्रँडची औषधे ऑनलाईन सहज मिळत असल्याने हा चिंतेचा विषय आहे. अनेकदा अशी औषधे एखाद्या वेगळया नावाने ऑनलाईन मिळतात. अशा ब्रँडची औषधे विकणाऱ्या आणि त्याची जाहिरात करणाऱ्या ६२ ठिकाणांवर आम्ही कारवाई केली आहे. आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, मेघनाला ते औषध कुठून मिळाले.’’

जीवघेण्या ठरत आहेत बारीक होण्याच्या गोळया

आजकाल लोक आपले आरोग्य आणि दिसण्याकडे जास्तच लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या स्लिमिंग पिल्स म्हणजे बारीक होण्याच्या गोळया खूपच लोकप्रिय होत चालल्या आहेत. याचे दुष्परिणाम माहीत करून घेण्यापूर्वीच अनेज जण या गोळया खात आहेत. संतुलित आहार, पुरेसा व्यायाम, निरोगी जीवनशैलीकडे लक्ष देण्यापेक्षा अशा गोळया खाणे त्यांना जास्त सोपे वाटू लागले आहे.

रिमाचे वजन लहानपणापासूनच खूप जास्त होते. एक ब्रेकअप आणि एका शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच कारणांमुळे वजन आणखी वाढले. तिने सांगितले की, ‘‘माझ्या एका मैत्रिणीने डेकसाप्रिन गोळी खाण्याचा सल्ला दिला. मला ती इंटरनेटवर मिळाली. मी ती खायला सुरुवात केली. तिचे साईड इफेक्ट लगेचच जाणवू लागले. मला खूप घाम यायचा. त्यानंतर अचानक थंडी वाजू लागायची. हृदय जोरजोरात धडधडू लागायचे. कामावर गेल्यानंतर हात थरथर कापायचे. मात्र माझे वजन कमी होऊ लागले होते. त्यामुळे मी खुश होते. त्यानंतर सहाव्या दिवशी माझ्या छातीत दुखू लागले. हृदय रोगाचा झटका येईल, असे मला वाटू लागले. मी त्याच वेळी घशात हात घालून गोळी बाहेर काढली. डेकसाप्रिनवर यूके आणि नेदरलँडमध्ये बंदी घालण्यात आली आहे.’’

यात असे घटक आहेत ज्यामुळे मानसिक असंतुलन, हृदय रोगाचा झटका, पक्षाघात होऊ शकतो. २०१२ मध्ये ३० वर्षीय लंडन मॅरेथॉनचा धावपटू क्लेअर्स  स्क्वायर्सचा मृत्यू त्यावेळी झाला ज्यावेळी तो अंतिम रेषेपासून फक्त १ मैल दूर होता. २०१४ मध्ये डच वैज्ञानिकांनी सांगितले की, त्या धावपटूच्या आहारात सिंथेटिक घटक सापडले होते.

फसव्या जाहिरातींचे जाळे

योग्य आहार, पुरेसा व्यायाम, मेहनत आणि संयम राखल्यास वजन कमी करता येते, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तरीही दरवर्षी हजारो लोक तात्काळ वजन कमी होण्याचा चमत्कार आपल्या आयुष्यात घडेल या आशेने इंटरनेटवरून बारीक होण्याच्या गोळया बेकायदेशीरपणे खरेदी करतात. रात्री उशिरा टेलिमार्केटिंगमध्ये अनेकदा एक बारीक मुलगी आपली कंबर आणि एक मुलगा त्याचे अॅप्स दाखवत असतो आणि बारीक होण्याच्या गोळयांमुळे हे शक्य झाले, असे दोघेही सांगतात. या गोळयांचे एक कटू सत्य असे की, त्या हायड्रोक्सिल पिल्स आहेत. वजन कमी करण्यासाठी त्या जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सेवनामुळे भूक मंदावते. चरबी कमी होते. यामुळे आपोआपच वजन कमी होऊ लागते. पण याचे साईड इफेक्ट खूपच धोकादायक आहेत.

आहारतज्ज्ञ डॉक्टर मानसी यांच्या मते, यामुळे यकृत आणि स्वादुपिंड खराब होऊ शकते. चिंता, झोप न येणे, मासिक पाळीच्या समस्या, हृदयाची धडधड वाढणे, अशा समस्याही निर्माण होतात. भलेही त्या आयुर्वेदिक किंवा हरबल असल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

५२ वर्षीय सुनीताचे वजन प्रमाणापलीकडे वाढले होते. त्यांनी सांगितले की, ‘‘लठ्ठपणामुळे कँसर होऊ शकतो, असे मी टीव्हीवर पाहिले होते. मी घाबरले. काहीतरी करायला हवे असे मला वाटले. मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सांगितले की, तुमचे जेवण कमी आहे. फक्त तुम्ही भरपूर व्यायाम करायला हवा. माझे समाधान झाले नाही. मला झटपट बारीक व्हायचे होते. त्यामुळे मी गूगलवर ‘स्लिमिंग पिल्स’ असे सर्च केले. बऱ्याच साईट्स दिसू लागल्या. एका साईटवर एक डॉक्टर गळयात स्टेथस्कोप घालून समजावत होते.

‘‘मला वाटले हीच साईट योग्य आहे. लोक बनावट वेबसाईटवर हे सर्व दाखवतात, याची मला कल्पना नव्हती. मी लगेच ऑर्डर देऊन त्या गोळया मागवल्या. गोळया खाऊन फक्त ३ आठवडेच झाले होते. अचानक माझी तब्येत बिघडली. मी घरी एकटीच होते. मुले शाळेत गेली होती. माझे पाय लटपटू लागले. जोरात चक्कर आली. मी मरणार, असे मला वाटू लागले. हे सर्व त्या गोळयांचे साईड इफेक्ट होते.’’

फिगर बनवण्याचे धोकादायक उपाय

चांगली फिगर किंवा बांधा हवा, असे दडपण महिलांवर असते. आता पुरुषांनाही असेच वाटू लागले आहे. कपडयांच्या एका मोठया ब्रँडच्या दुकानात अंजली आणि रवी दोघेही काम करत होते. अंजलीसारखे बारीक आणि सुंदर दिसावे, असे रवीलाही वाटत होते. तिथे येणाऱ्या एका मॉडेलच्या सल्ल्यानुसार दोघांनी इंटरनेटवरून डाएट पिल्स खरेदी केल्या.

काहीच दिवसात शरीरातील चयापचय प्रक्रियेची पातळी वेगाने वाढल्यामुळे रवीची तब्येत अचानक इतकी बिघडली की, तो यातून वाचू शकला नाही.

फेब्रुवारी २०२० मध्ये एफडीएने यूएसच्या मार्केटमधून उत्पादक आणि वितरकांना बेल्विक देऊ नका असे सांगितले, कारण बेल्विकमुळे कॅन्सरचे रुग्ण वाढू लागले होते.

बारीक होण्याच्या गोळया म्हणजे एखादी जादू किंवा चमत्कार नाही. म्हणूनच त्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

अशा गोळया खाऊन स्वत:चे आयुष्य धोक्यात घालू नका. बारीक होणे किंवा बारीकच राहणे अवघड नाही. त्यासाठी संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे गरजेचे आहे.

लक्षात ठेवा, बारीक राहिल्यामुळेच तुम्ही यशस्वी, सुंदर आणि सुखी व्हाल, असे मुळीच नाही. वजन जास्त असेल तर संयमाने रोज व्यायाम करून ते कमी करण्याचा प्रयत्न करा. मेहनत कधीच वाया जात नाही. बारीक होण्यासाठी कमी प्रमाणात खाणे, प्रोटीन घेणे, पालेभाज्या खाणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. बारीक होण्याच्या गोळयांपासून दूरच रहा.

महिला बनत आहेत थायरॉईडच्या शिकार

* प्रतिनिधी

अचानक वजन वाढणे, केस गरजेपेक्षा जास्त गळू लागणे इत्यादी लक्षणे सांगतात की, थायरॉईडची समस्या वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत, तरुण मुलींपासून ते महिलांपर्यंत सर्वच वेगाने याच्या शिकार ठरत आहेत. एका संशोधनानुसार, ८ पैकी १ महिला या समस्येने त्रस्त आहे.

थायरॉईडची ग्रंथी ही गळयासमोर फुलपाखराच्या आकाराएवढी ग्रंथी असते जी हार्मोन्स तयार करते आणि हे हार्मोन्स शरीराच्या वेगवेगळया अवयवांना त्यांचे काम योग्य प्रकारे करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. ते शरीराच्या मेटाबॉलिक म्हणजे चयापचय प्रक्रियेसह हृदय तसेच पचन संबंधी यंत्रणा सुरळीत ठेवतात. मेंदूचा विकास, मांसपेशींवर नियंत्रण आणि हाडे मजबूत राखणेही त्यांच्यामुळेच शक्य होते. थायरॉइडमधील बिघाडामुळे थायरॉइडच्या ग्रंथीच्या कामावर दुष्परिणाम होतो. यामुळे चयापचय प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स तयार करण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो.

महिलांनाच याचा जास्त त्रास का?

थायरॉईडमध्ये होणारा बिघाड ही जास्त करून आपोआपच बरी होणारी प्रक्रिया असते. यात रुग्णाची प्रति सुरक्षा प्रणाली हल्ला करून थायरॉइडच्या ग्रंथी नष्ट करते. विविध संशोधनांनुसार ऑटो इम्युन डिसिस जसे की, सिलिएक डिसिस, डायबिटीस मेलिटस टाइप, इम्प्लिमेंटरी बोवेल डिजिज, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि संधीवाताचा त्रास महिलांना सर्वसामान्यपणे होतोच.

हे आजार शोधून त्यावर उपचार करण्यासाठी यामुळे उशीर होतो कारण, याची वेगवेगळी लक्षणे शोधणे कठीण असते. ऑटो इम्युन आजार आयोडिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. गर्भावस्थेत आयोडिनची जास्त कमतरता भासते. याच्या कमतरतेमुळे थायरॉईड हार्मोन्सची पातळी खालावते.

थायरॉईडमधील बिघाडाचे किस्से

हायपोथायरॉडिज्म, हायपरथायरॉडिज्म, थायरॉईटिस, थायराईड कॅन्सरसारखे आजार पुरुष आणि महिला दोघांनाही त्रासदायक ठरतात. यातील हायपोथायरॉडिज्म, हायपरथायरॉडिज्म हे आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १० पट अधिक होतात.

हायपोथायरॉडिज्म हा एक प्रकारचा थायरॉईडचा आजार आहे. हा आजार तेव्हा होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथीची सक्रियता कमी होते आणि सर्वसाधारण हार्मोन्सच्या तुलनेत कमी हार्मोन्स तयार होतात. यामुळे शरीरातील हार्मोन्स आणि चयापचय प्रक्रियेचे संतुलन बिघडते. महिलांमधील हायपोथायरॉडिज्म होण्यामागील एक सर्वसामान्य कारण म्हणजे ऑटो इम्युन डिसिस. याला हॅशिमोटोज डिसिस असे म्हणतात. यात अँटीबॉडीज हळूहळू थायरॉइडला लक्ष्य करते आणि थायरॉईड हार्मोन्स बनवण्याची क्षमता नष्ट करते.

हायपरथायरॉडिज्म हा एक प्रकारचा थायरॉइडचा बिघाड आहे. हा बिघाड तेव्हा होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त सक्त्रिय होतात आणि गरजेपेक्षा जास्त हार्मोन्सची निर्मिती करतात. हार्मोन्स शरीरातील चयापचय प्रक्त्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

प्राथमिक लक्षणे

बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात थायरॉईडमधील बिघाड लक्षात येत नाही, कारण याची लक्षणे स्पष्ट नसतात. यामुळे त्याला वांझपणा, लिपिड डिसऑर्डर, अॅनिमिया किंवा मानसिक तणाव समजण्याची चूक केली जाते. लक्षणे उशिराने लक्षात येतात. तोपर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई करणे अशक्य होते.

हायपोथायरॉडिज्मच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असतो : थकवा, कोरडी त्वचा, मांसपेशी आखडणे, कफ, थंडी सहन न होणे, सुजलेल्या पापण्या, वजन नियंत्रणाबाहेर वाढणे, मासिक पाळीतील अनियमितता.

हायपरथायरॉडिज्मच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असतो : भीती वाटणे, झोप न लागणे, वजन कमी होणे, हातांना घाम येणे, हृदयाची वेगवान आणि अनियमित धडधड, डोळे जड होणे, डोळयांच्या पापण्या न मिटता एकटक पाहाणे, दृष्टिदोष, भरपूर भूख लागणे, पोट बिघडणे, गरमी सहन न होणे.

थायरॉईडच्या बिघाडासाठी जबाबदार घटक : थायरॉईडचा आनुवांशिक आजार, ऑटोइम्युन स्थिती, गळयात रेडिएशन असणे, थायरॉइडची शस्त्रक्रिया, थायरॉईड वाढणे.

निर्बंध

थायरॉइडमधील बिघाड हा जीवनशैलीमुळे झालेला बिघाड नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात आयोडिनचे सेवन करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करण्याची गरज नसते. भारत सरकारने युनिव्हर्सल सॉल्ट आयोडिनेशनला मान्यता दिल्यामुळे आता आयोडाईज्ड मिठात पुरेशा प्रमाणात आयोडिन असते.

थायरॉइडचा बिघाड वेळेवर लक्षात आल्यास आणि योग्य उपचार केल्यास गंभीर परिणाम रोखणे शक्य होते. महिलांनी वर्षातून एकदा थायरॉईड ग्रंथींची तपासणी करून घ्यायला हवी, जेणेकरून आजार लवकर लक्षात येईल आणि वेळीच उपचार करता येईल.

या घरगुती उपायांनी अॅसिडिटीपासून सुटका मिळेल

*गृहशोभिका टीम

तुम्हाला माहित आहे का की तुमच्या पोटात हायड्रोक्लोरिक नावाचे acidसिड पाचन तंत्राच्या सर्व कार्यासाठी जबाबदार आहे? जेव्हा आपण काहीतरी गुंतागुंतीचे खातो, तेव्हा ते पचवण्यासाठी पोटाचे आम्ल सामान्य पातळीवर असणे फार महत्वाचे आहे. जेव्हा शरीरात या acidसिडचे प्रमाण कमी होते, तेव्हा पचन व्यवस्थित होत नाही. या व्यतिरिक्त, पोटात acidसिडचा अतिरेक असला तरीही, पचन प्रक्रियेत अस्वस्थता असते, याला अॅसिडिटी म्हणतात.

अॅसिडिटी होण्याची कारणे

*  तळलेले आणि जास्त घन पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी होतो आणि हे अॅसिडिटीपणाचे मुख्य कारण आहे.

* जरी तुम्हाला एखाद्या गोष्टीवर ताण येत असेल, तर ते अॅसिडिटीचे कारणदेखील बनू शकते.

* सिगारेट आणि अल्कोहोलच्या अति सवयीमुळे अॅसिडिटीदेखील उद्भवते. या व्यतिरिक्त, जास्त मसालेदार अन्न खाल्ल्यानेदेखील अॅसिडिटी वाढतो.

* चहा, कॉफी आणि जास्त बीडीच्या सेवनामुळे अॅसिडिटीची समस्या निर्माण होते.

* लोणचे, व्हिनेगर, तळलेले अन्न, मिरची-मसालेदार इत्यादी गोष्टी खाल्ल्याने अॅसिडिटी होते.

अॅसिडिटीचे घरगुती उपाय

* अन्न खाल्ल्यानंतर लगेच कोणत्याही प्रकारचे पेय घेऊ नका.

* अन्न घेतल्यानंतर थोडा गूळ घ्या आणि चोखत रहा.

* जीवनसत्त्वे युक्त अधिक भाज्या खा.

* सकाळी उठून व्यायाम करा आणि दिवसभर शारीरिक क्रिया करत रहा.

* सकाळी उठून 2-3 ग्लास पाणी प्या.

* बदाम खाल्ल्याने आम्लपित्तामुळे तुमच्या छातीत जळजळ कमी होते.

* दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2-3 किलोमीटर चालण्याची सवय लावा.

डीहायड्रेशन होऊ नये म्हणून…

* डॉ. मंजरी चंद्रा द्य

उन्हाळ्याच्या मोसमात शरीरातून अधिक घाम निघाल्यामुळे पाण्याची कमतरता होते. शरीरातील पाण्याच्या अभावामुळे अनेक लहानमोठ्या समस्या होऊ शकतात जसं की ब्लडप्रेशर, फ्लक्चुएशन, तापमान वाढणं, अपचन होणं. याशिवाय मूत्राशय व यकृतावरही शरीरातील पाण्याच्या कमतरतेचा परिणाम होऊ शकतो.

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवरही दुष्परिणाम होतो. त्वचेवर पुरळमुरुमं येतात आणि काळे डाग पडू शकतात.

शरीराला किती प्रमाणात पाण्याची गरज आहे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जसं की तुम्ही किती शारीरिक मेहनत घेता, जेथे तुम्ही काम करता, तेथे किती तापमान असतं, जे लोक सतत एसीमध्ये काम करतात, ते पाणी कमी पितात; कारण तहान लागत नाही, परंतु वातानुकूलित ठिकाणी अधिक काळ काम करत राहिल्याने शरीर डीहायडे्रट होतं. सोबतच शरीरात पोषक तत्त्वांची घट निर्माण होते.

स्वत:ला हायडे्रट करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे की तुम्ही दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी जरूर प्या. पाण्याव्यतिरिक्त खाद्यपदार्थांतूनही शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढू शकतो.

फळं आणि भाज्या नैसर्गिक पद्धतीने शरीरातील पाण्याची पूर्तता करतात. पाण्याव्यतिरिक्त फळं आणि भाज्या अनेक महत्त्वाची पोषक तत्त्वसुद्धा शरीराला देतात. भाज्यांमधून तंतूही शरीराला मिळतात.

याशिवाय अनेक प्रकारचे पेयपदार्थही आपल्या शरीरातील पाण्याची पूर्तता करतात जसं की :

सरबत

फळांची सरबतं, कोकम सरबत आणि कैरीचं पन्हं ही पेयं उन्हाळ्याच्या मोसमात आपल्या शरीरात पाण्याचा समतोल कायम राखतात आणि शरीर थंड राखतात. सरबताच्या सेवनाने पचनशक्तीसुद्धा सुधारते.

लस्सी/ताक

दह्यामध्ये पाणी घालून पातळ करून गोड लस्सी वा ताक बनवता येतं. लस्सी गारवा देते आणि ताक पाण्याचा उत्तम स्त्रोत आहे. ताकामुळे मलावरोधापासूनही आराम मिळतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.

सूप

भाज्या जसं की लीक, स्प्रिंग ऑनियन, गाजर, टोमॅटो, कोबी, मिरी पावडर आणि मशरूम एकत्रित शिजवून पातळ सूप बनवू शकता. या सूपद्वारे पाण्यासोबत पोषक तत्त्वही शरीराला मिळतात, शिवाय हे अतिरिक्त कॅलरीपासून बचाव करतं.

फ्रूट स्मूदी

फळं, दूध, शेंगदाणे आणि व्हॅनिला इसेन्स ब्लेण्ड करून स्मूदी बनवता येतं, जी केवळ शरीराला गारवा पोहोचवत नाही, तर कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिनचेही उत्तम स्त्रोत आहे.

हिवाळ्यातही स्वस्थ राहतील अस्थमाचे रूग्ण

* सोमा घोष

१५ वर्षीय अनुरिमाला दमा आहे. लहानपणापासूनच तिला दम्याचे झटके येत असत. नंतर तर वाढत्या वयाबरोबर अजून वाढत गेले. यासाठी तिला नियमित औषधं घ्यावी लागतात. खरंतर हा त्रास थंडीच्या दिवसांत खूपच वाढतो कारण थंडीच्या दिवसांत श्वासनलिकेत कफ अधिक प्रमाणात साचतो. ज्यामुळे श्वासनलिका भरून जाते व रूग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. परिणामी धाप लागते. काहीजणांना थंडीच्या अॅलर्जीमुळेही अधिक त्रास होतो.

मुंबईतील एसआरवी हॉस्पिटलच्या चेस्ट फिजिशिअन डॉ. इंदू बूबना यासंबंधी सांगतात, ‘‘अतिताण आणि धूम्रपान ही दम्याची दोन मोठी कारणे आहेत. यामुळे दमा सर्वात जास्त बळावतो. याशिवाय अपुरी झोप, प्रदूषण हेसुद्धा याला जबाबदार आहेत.

हिवाळ्याच्या दिवसात हा आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. पण योग्य दिनक्रमाने हा धोका कमी केला जाऊ शकतो. माझ्याकडे असे अनेक रूग्ण येतात जे दम्याचे नाव ऐकूनच घाबरून जातात, जेव्हा की हा आजार जीवघेणा नाहीए.’’

डॉ. इंदू यांच्या मते हिवाळ्याच्या ऋतुमध्ये दम्याच्या रूग्णांनी खाली सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी :

* सर्वप्रथम घर स्वच्छ व हवेशीर ठेवावे.

* श्वास नेहमी नाकानेच घ्यावा. यामुळे हवा गरम होऊन छातीपर्यंत पोहोचते. ज्यामुळे थंडी कमी वाजते. तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करू नये.

* तापाची लस टोचून घ्यावी. यामुळे ७० टक्के व्यक्ती थंडीच्या अॅलर्जीपासून वाचू शकतात.

* घरात जर रूमहीटरचा वापर करत असाल तर वेळोवेळी त्याच्या फिल्टरची स्वच्छता करावी, जेणेकरून त्यावर धूळमाती जमणार नाही.

* घरातील पाळीव प्राणी, टेडीबिअरसारखी फरची खेळणी, झाडे इ. बेडपासून दूर ठेवावेत.

* थंडीपासून वाचण्यासाठी कित्येक जण आगीजवळ किंवा रूमहीटरजवळ बसतात. पण हे योग्य नाही कारण यामुळे लोकरी कापडाचे धागे जळतात. त्यातून निघणारा धूर दम्याच्या रूग्णांसाठी घातक असतो. म्हणून रूम हिटरने घर गरम करावे व त्यापासून दूर रहावे. तसेच घरातील उष्णता कायम राहिल असे पहावे.

* घरात जुने सामान ठेवू नये. साफसफाई करताना धूळ उडवू नये. ओल्या कापडाने घर स्वच्छ करावे.

* जेवण करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे कुठल्याही प्रकारच्या जिवाणूंशी संपर्क होणार नाही.

* थंडीच्या दिवसातही वर्कआउट अवश्य करा. पण आधी स्वत:ला वॉर्मअप करणे विसरू नये.

* थंडीत द्रवपदार्थ अधिक प्रमाणात खावेत. घरी बनवलेल्या कमी चरबीयुक्त आहाराचे सेवन करावे. आंबट खाल्ल्याने दमा वाढत नाही. पण ज्यांना अॅलर्जी आहे, त्यांनी खाऊ नये.

* रोज स्वच्छ व धूतलेले कपडे घालावेत. कॉटनचे कपडे घालून त्यावर लोकरीचे कपडे घालावेत.

* जर लहान मुलांना दमा असेल तर त्यांना पौष्टिक व न्यूट्रीशनयुक्त आहार द्यावा.

* औषधांचे नियमित सेवन करावे.

आरोग्य बिघडवू शकते एक्सरसाईज

* डॉ. सागरिका अग्रवाल, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल्स

आरोग्याच्या दृष्टीने एक्सरसाईज किंवा व्यायामाचे बरेच फायदे आहेत. पण आजकाल आपण अशी जीवनशैली जगत आहोत, जिथे व्यायामासाठी जराही वेळ नसतो. बऱ्याच वर्षांपासून जीवनशैली एकाच प्रकारची असल्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामध्ये शारीरिक स्थितीसह मानसिक परिस्थितीचाही समावेश असतो.

कुठल्याही प्रकारे का असेना, पण आपल्या शरीराला रोज थोडया प्रमाणात सक्रिय राहाणे गरजेचे असते. यामुळे आपल्या शारीरिक विकासास प्रोत्साहन मिळते आणि आपली एकूण कार्यक्षमताही वाढते. व्यायामाचे जसे अनेक सकारात्मक पैलू आहेत तसेच नकारात्मक पैलूदेखील आहेत, ज्यांच्याकडे ठराविक लोकांचेच लक्ष जाते. जसे की भरपूर व्यायामामुळे प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतात.

एक्सरसाईजचे सकारात्मक पैलू

हृदयाच्या स्थितित सुधारणा : आपण शारीरिकरित्या किती काम करतो यावर आपल्या हृदयाची स्थिती अवलंबून असते. जे लोक दररोज शारीरिकदृष्टया सक्रिय नसतात, त्यांनाच हृदयाशी संबंधित सर्वात जास्त आजार असतात.

चांगली झोप न येणे : अनेक अभ्यासांद्वारे हे सिद्ध झाले आहे की जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांना रात्री चांगली झोप येते. हे यामुळे घडते कारण व्यायामामुळे शरीराची सर्केडियन रिद्म व्यायामामुळे मजबूत होते, जी आपल्याला दिवसा सक्रिय ठेवण्यास मदत करते. यामुळे रात्री चांगली झोप येते.

शारीरिक उर्जेमध्ये वाढ : आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात एक्सरसाईजबाबत अनेक प्रकारचे गैरसमज असतात, जसे की एक्सरसाईज आपल्या शरीराची सर्व शक्ती शोषून घेते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर काहीही करू शकत नाही. प्रत्यक्षात याच्या अगदी उलट घडते. कारण एक्सरसाईजदरम्यान, तुमच्या शरीरातून काही खास प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात, जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात.

आत्मविश्वास वाढणे : नियमित व्यायामामुळे हवा तसा परफेक्ट शेप तुमच्या शरीराला मिळू शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो. शरीराची उत्तम ठेवण आणि सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही घर आणि कार्यालयातही पूर्वीपेक्षा अधिक चांगले काम करू शकता.

अति एक्सरसाईजचे नकारात्मक पैलू

नियमित व्यायामाचे बरेच फायदे आहेत, म्हणूनच फिजिकल अॅक्टिव्हिटीजकडे दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाही. परंतु काही अशा गोष्टीही आहेत, ज्यामुळे सिद्ध झाले आहे आणि ज्यामुळे हे लक्षात येते की अति व्यायामामुळे शरीरावर नकारात्मक परिणामदेखील होऊ शकतो :

* महिलांमध्ये एक विशेष स्थिती निर्माण होते, ज्याला रजोरोध म्हणतात. ही परिस्थिती तेव्हा निर्माण होते, जेव्हा सामान्य महिलेस सलग ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत योग्य प्रकारे मासिक पाळी येत नाही. बऱ्याच महिलांमध्ये अशी स्थिती निर्माण होते, कारण त्या शरीराला नियमित ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीज देणाऱ्या पदार्थांचे सेवन न करताच जिममध्ये काही विशेष प्रकारच्या व्यायामाचे ३-४ सेशन नियमित करतात.

* शरीरातील कॅलरीजच्या कमतरतेचा थेट परिणाम केवळ प्रजननक्षमतेवरच होत नाही तर महिलांच्या लैंगिक इच्छेवरदेखील याच प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त, लठ्ठपणादेखील यात महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण बहुतेक करून लठ्ठ महिला वजन कमी करण्यासाठी अनेकदा खूपच कठीण व्यायाम करतात, ज्याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

* लठ्ठपणामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे ओव्हुलेशन आणि मासिक पाळीवर परिणाम होतो आणि वंध्यत्वाचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये तरुण महिलादेखील एवढया जास्त प्रमाणात वर्कआऊट करतात की त्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी त्या स्तरापर्यंत जाते, जी त्यांच्या मासिक पाळीत अडथळा आणते. इस्ट्रोजेनच्या पातळीत बरेच बदल झाल्यास गर्भधारणा होण्यासाठीही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

* आपल्या सर्वांना आणि विशेषत: महिलांना हे चांगले माहीत असते की बहुतेक   गर्भनिरोधक औषधांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी जास्त असते. म्हणूनच महिला    त्यांचे सेवन केल्यानंतर गर्भवती होण्यापासून स्वत:ला रोखू शकतात. अति व्यायामामुळेही इस्ट्रोजेनची पातळी वाढते. म्हणूनच जर एखाद्या महिलेला गर्भधारणा करायची असेल तर तिने हेवी एक्सरसाईज करू नये.

* हेवी ट्रेनिंग सेशनमुळे पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, जी थेट त्यांच्या प्रजननाशी संबंधित आहे. आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जे बॉडी मेन्टेन ठेवण्यासाठी प्रदीर्घ काळ कठीण ट्रेनिंग सेशन फॉलो करतात.

* तुम्ही जर अति थकवा आणणाऱ्या आणि कठीण ट्रेनिंगमधून जात असाल तर सामान्य ट्रेनिंग सेशन फॉलो करणाऱ्या लोकांच्या तुलनेत तुमच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी असण्याची शक्यता असते.

* दीर्घ काळापर्यंत थकवा आणणारा कठीण व्यायाम केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, सोबतच पुनरुत्पादनाची क्षमतादेखील कमी होऊ शकते. शिवाय हेवी रेजिस्टन्स ट्रेनिंग फायद्याऐवजी तुमचे नुकसान करू शकते. कारण यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढते, जे पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इतर हार्मोन्सवर विपरित परिणाम करते. यामुळे तुमच्या महिला जोडीदारास गर्भधारणा होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नियमित व्यायामासह पुरेसा आहार घेणेदेखील आवश्यक असते, कारण तुमच्या शरीराला नियमितपणे कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. खास करून तेव्हा ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाईजदरम्यान खूप ऊर्जा गमावता. म्हणूनच पुरुषांनी वेळोवेळी आपले स्पर्म काउंट तपासून पाहिले पाहिजेत तर महिलांनी त्यांच्या गर्भधारणेच्या क्षमतेची तपासणी करून घेतली पाहिजे. यामुळे तुम्हाला समस्येतून बाहेर पडण्यासाठी आणि सामान्य जीवन जगण्यासाठी मदत होईल.

सकाळचा नाश्ता पोषक हवा

* डॉय सिमरन सॅनी, फोर्टिस हॉस्पितल

अनेकदा म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचं भोजन आहे. कारण रात्रभराची झोप आणि १२ तास वा अधिक वेळ अन्नाविना राहिल्यामुळे जेव्हा आपल्या शरीराला पोषणाची गरज भासते आणि त्याची आपूर्ति सकाळचा नाश्ता पूर्ण करतो. याव्यतिरिक्त जागे झाल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये काम करण्यासाठी ग्लूकोजचा वापर होतो. सकाळचा नाश्ता ग्लूकोजचं प्रमाण बॅलेन्स करतो आणि तुमच्या पाचनशक्तीला पुन्हा क्रियाशील बनवतो.

याव्यतिरिक्त, सकाळचा नाश्ता करण्याचे इतर फायदेदेखील आहेत. हा तुमची स्मरणशक्ती वाढवतो आणि तुमचं वजन समतोल ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका

साकारतो. सकाळचा नाश्ता नियमित न करणाऱ्यांना दिवसभरात जेव्हा भूक लागते, तेव्हा ते अधिक खातात, त्यामुळे त्याचं वजन वाढतं. सकाळचा नाश्ता करण्याची चांगली सवय ही उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह पिडित लोकांसाठी सहाय्य ठरते.

पोषक तत्त्वांनी परिपूर्ण

न्यूट्रिशनिस्ट नेहमीच सांगतात की सकाळचा नाश्ता हा जागे झाल्यानंतर २ तासातच करायला हवा. परंतु तुम्ही काय खाता हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सकाळचं हे पहिलं खाणं कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन बीसारख्या आवश्यक पोषक मुल्यांनी परिपूर्ण असावं. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या देशात सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ले जाणारे पदार्थ हे अनारोग्यकारक असतात. त्यामध्ये वापरली जाणारी साखर, लोणी, तूप आणि तेल इत्यादी पदार्थांमुळे तो हानिकारक ठरतो.

तेलकट अन्नामध्ये चरबीचं प्रमाण अधिक असतं, जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामध्ये कॅलरीज आणि चरबीदेखील अधिक असते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि

खराब कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. रक्त वाहिन्यांमध्ये मेद आणि प्लाक हळूहळू जमा होत राहिल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि शेवटी हृदयरोग म्हणजेच स्ट्रोक होतो. उच्च रक्तदाबामुळे पित्ताचा असमोतल वाढण्याची शक्यता असते.

नवी दिल्लीच्या फोर्टिस इस्पितळाच्या कन्सल्टंट डॉ. सिमरन सॅमी यांनी सांगितलं की नाश्त्यामध्ये तूप आणि लोणी यांचा सढळ वापर होणं आरोग्यासाठी घातक असतं. पुरी, बटर लावलेले पराठे, मैद्याची रोटी आणि ब्रेड रोलसारखे तळलेले पदार्थ नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. तेलकट, चरबीयुक्त व गोड पदार्थांमुळे पचनयंत्रणा बिघडते. त्यामुळे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत आजार होण्याची शक्यता वाढते. आपल्या आहारात तूप, लोणी आणि साखर यांचा नियमित वापर करण्याऐवजी आरोग्यदायक पदार्थांचा वापर करणं ही निरोगी जीवनशैलीची गरज आहे.

गोड कमी खा

उत्तम आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये अतिरिक्त मिठ आणि शर्करायुक्त पदार्थांऐवजी उच्च फायबर आणि कमी मीठ असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याची अधिक गरज आहे. गोड पदार्थांची आवड असणाऱ्यांनी सुरक्षित पर्याय म्हणून साखरेला मीठाचे उपलब्ध पर्याय वापरावेत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आरोग्याशी संबंधित पिडित लोकांनादेखील मदत मिळू शकेल. स्टेल्विया, एस्पारटेम आणि सुक्रेलोस साखर याचे पर्याय आहेत, जे जगभरात लोकप्रिय आहेत आणि आपल्या देशातदेखील उपलब्ध आहेत. परंतु याचा वापर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवा.

सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अशा पदार्थांचा वापर करा ज्यामध्ये फायबर प्रोटिन आणि कार्बोहायडे्रट अधिक प्रमाणात असतील तसंच मीठाचं प्रमाणदेखील कमी असेल. आपला आहार सतत बदलत राहा. एकच पदार्थ दररोज खाऊ नका. नाश्त्यामध्ये विविधता ठेवा आणि थोड्या थोड्या प्रमाणात पदार्थ खा.

सकाळच्या आरोग्यदायक नाश्त्यामध्ये रवा, पोहे, फळांचं सॅलड, पोळी, मल्ट्रीग्रेन डोसा, उपमा, सांबर, डाळ, सोया, मोडाची धान्य, भाज्यांचे सॅण्डविच, मका, फॅट नसलेलं दूध व दही, लस्सी, कॉटेज चीज, ताज्या फळांचा रस, ब्राउन राइस, केळ, टरबूज किंवा सफरचंदसारख्या फळांचा समावेश करा. साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ उदाहरणार्थ पेस्ट्री आणि डबाबंद फळं खाऊ नका. भरपूर तूप वा तेलयुक्त पराठे आणि ऑमलेट खाऊ नका. याशिवाय अधिक लोणी वा तूप, मैद्याचा रोटी, भात, फ्रेंच टोस्ट, चरबीयुक्त मटन, मलईयुक्त दही आणि अन्य पदार्थ खाऊ नका. लोणी आणि साखरेचे आरोग्यदायी पर्याय निवडा.

सकाळचा पोषक नाश्ता लहान मुलं आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी अधिक गरजेचा आहे. जे सकाळी पौष्टिक नाश्ता करतात, त्यांना शारीरिक व मानसिक कामे करण्यास अधिक उर्जा मिळते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि दररोजच्या दिनचर्येशी संबंधित आजारपण दूर पळविण्यास मदत होते.

अशी मुलं शाळांमध्येदेखील अधिकाधिक सक्रीय असतात. चिडचिडेपणा, बेचैनी, थकवा या मुलांमध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. यासाठीच प्रत्येकाने मग लहान असो वा मोठे सकाळचा नाश्ता अधिक गांभीर्याने घ्यायला हवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें