* मोनिका गुप्ता

सनस्क्रीन हे एक असे त्वचेची काळजी घेणारे उत्पादने आहे, जे आपल्या त्वचेसाठी दररोज वापरणे फार महत्त्वाचे आहे. बहुतेक स्त्रियांना असे वाटते की सनस्क्रीन फक्त उन्हाळयामध्येच लावले जाते, परंतु सनस्क्रीन सर्व हंगामात वापरले पाहिजे. सनस्क्रीन आपल्या त्वचेला खराब होण्यापासून प्रतिबंधित करते.

उन्हाळयात सनस्क्रीन महत्त्वाचे का आहे?

त्वचा विशेषतज्ज्ञ डॉ. इंदू यांच्या या म्हणण्यानुसार जर एखाद्याला फ्रीकल्स, सनबर्नसारखी समस्या झाली असेल तर त्याने दिवसातून ३ वेळा सनस्क्रीन अवश्य लावावी. फ्रीकल्स ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा चेहऱ्यावर तपकिरी डाग दिसतात तेव्हा त्यांना फ्रीकल्स असे म्हणतात.

फ्रीकल्स टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. तथापि याचा सीवो २ लेसर उपचारदेखील आहे. बरेच लोक घरात राहतात तेव्हा आपल्या त्वचेची काळजी घेण्यात आळस करतात. जर आपण घरी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवत असाल तरीदेखील सनस्क्रीन अवश्य वापरा. सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफकडे नक्की लक्ष द्या.

सनस्क्रीन आणि एसपीएफ

वाढत्या वयाबरोबर त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या, बारीक रेघा, त्वचा फाटणे, रंगावर परिणाम, प्रतिबिंब या सर्वांचे सर्वात मोठे कारण म्हणजे अल्ट्राव्हायलेट किरण. जेव्हा आपण उन्हात जास्त वेळ घालवतो तेव्हा त्वचा काळी होण्यास सुरवात होते आणि त्वचेशी संबंधित काही गंभीर समस्यादेखील उद्भवू शकतात.

सनस्क्रीन खरेदी करताना त्यामध्ये असलेल्या सन प्रोटेक्शन फॅक्टर म्हणजेच एसपीएफ या प्रमाणाचे योग्य ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे. तसे तर एसपीएफ १५ चे प्रमाण असलेले सनस्क्रीन वापरणे चांगले असते. परंतु वाढती उष्णता आणि प्रदूषण दरम्यान, एसपीएफ १५ पासून एसपीएफ ३० पर्यंतचे सनस्क्रीन लोशन अधिक प्रभावी मानले जातात. आपण सनस्क्रीनशिवाय घराबाहेर पडल्यास आपली त्वचा उन्हात होरपळू शकते.

सनस्क्रीनमध्ये एसपीएफ खूप महत्वाचे आहे. एसपीएफचे प्रमाण जितके जास्त असेल तितकेच आपल्या त्वचेला संरक्षण जास्त मिळते. जर आपल्या सनस्क्रीनमध्ये ३० एसपीएफ असेल तर आपल्या त्वचेवरील संरक्षण ३० पटीने अधिक वाढेल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...