* शोभा कटारे

मीरी की जग बरं, अशी म्हण अलीकडे जरा अशा प्रकारे बदलली आहे, ‘मी बरी आणि माझा मोबाईल बरा.’ अलीकडची तरुणाई आणि लहान व मोठी मुलं सतत मोबाईलच्या स्क्रीनवरती चिकटलेले दिसतात. त्यांना काही फिकीरच नसते. चालताफिरता, खातापिता, झोपता उठता सतत ते मोबाईलच्या जगात बुडालेले राहतात. आपल्या आजूबाजूचा जगापासून वेगळे राहतात. ते कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन बाहेरच्या जगाशी ठेवत नाहीत, त्यामुळे ते वर्चुअल ऑटिझमच्या अधीन होत आहेत.

वर्चुअल ऑटिझमने पिडित मुलं दुसऱ्यांशी बोलताना संकोचतात, आय कॉन्टॅक्ट करत नाहीत, त्यांच्यामध्ये बोलण्याच्या क्षमतेचा विकास उशिराने होतो, त्यांना लोकांसोबत एकत्र मिसळण्यास त्रास होतो आणि त्यांचा आयक्यूदेखील कमी होतो.

कमी होतं सोशल कम्युनिकेशन

अलीकडच्या मुलांना लहानपणापासून मोबाईल फोन हातात दिला जातो. कधी अभ्यासासाठी तर कधी काही दुसरं शिकण्यासाठी, जसं की कविता ऐकवण्यासाठी, सोबतच रडणाऱ्या छोट्या मुलांना गप्प बसवण्यासाठी ते कार्टून, सिनेमा, गेम्स इत्यादी त्यांना मोबाईलवरच दाखवतात. ज्यामुळे त्यांना हळूहळू याचं व्यसन लागतं. ज्यामुळे ते बोलणं नंतर शिकतात आणि मोबाईल चालवणं अगोदर शिकतात.

याचा नकारात्मक प्रभाव असा होतो की त्यांच्यामध्ये स्पीच डेव्हलपमेंट होत नाही. ते गॅजेट्समध्येच बिझि राहू लागतात. त्यांच्या वागण्यामध्ये त्रास तेव्हा होऊ लागतो, ज्यामुळे त्यांचा मानसिक विकास, त्यांचे सोशल कम्युनिकेशन आणि बिहेवियर स्किल्सवर परिणाम होतो.

वाढत्या दुर्घटना

मोबाईल फोन आता अपघातांचं सर्वात मोठं कारण बनत चाललंय. वाहन चालवतेवेळी मोबाईलवर बोलणं, आजच्या खासकरून तरुणांसाठी काही नवीन गोष्ट नाहीये. अनेकदा रस्त्यावरती लोकं कार वा बाईक चालवतेळी मोबाईलवर बोलताना दिसतात.

तरुण तर बाईक चालवतेवेळी इयरफोन लावून गप्पा मारतात वा मग गाणी ऐकतात, ज्यामुळे त्यांचं लक्ष दुसरीकडे असतं आणि अपघात होतो. वाहन चालवताना ब्रेक मारणं, स्पीड वाढवणं वा तोडणं सर्व काही नर्वस सिस्टमवर काम केल्यावरती होतं.

अशावेळी वाहन चालवतेवेळी स्पीड ब्रेकर आल्यावर ब्रेक लावणं, समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्यासाठी वळणं वा मग स्पीड वाढवण्याची गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि दुर्घटना घडतात.

वाढता लठ्ठपणा

सध्याच्या काळात मोबाईल लोकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अनेक लोकं तर अशीदेखील असतात जी मोबाईलला स्वत:पासून एक मिनिटासाठी देखील दूर ठेवू शकत नाहीत. जेवतेवेळी देखील मोबाईल मध्येच पाहत राहतात, ज्यामुळे अनेक नुकसान होतं जसं की लठ्ठपणा वाढणं, पोटाच्या समस्या, ओवर इटिंग.

जेव्हा आपण मोबाईल पाहत जेवतो तेव्हा आपलं खाण्यावरती लक्ष कमी असतं. अनेकदा आपण अन्न व्यवस्थित चावत नाही. यामुळे पोटात अपचन, पोट दुखी आणि पोटासंबंधी आजार होऊ शकतात. यामुळे अन्न पचवण्यामध्ये सहाय्यक असलेल्या ग्रंथी पूर्णपणे सक्रिय होत नाहीत, सोबतच जेव्हा आपण मोबाईल पाहत जेवतो तेव्हा गरजेपेक्षा अधिक खातो.

नात्यांमध्ये वाढता दुरावा

पूर्वी जेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा लोकांच्या आपापसात भेटीसाठी होत असत, गप्पा मारत असतं, लोकं एकमेकांच्या अडचणी आणि भावनांना समजत असत, सोबत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असत. परंतु जेव्हापासून मोबाईल आला आहे मुलं असो वा मोठे अनेकदा मोबाईलच्या जगामध्येच व्यस्त असतात, ज्यामुळे आपापसातील संवाद कमी होत चालला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून गप्पा जरी बऱ्याच होत असल्या, तरी मनातील दुरावा वाढत चालला आहे, लोकांमध्ये व्यवस्थित संवाद होत नाहीये. व्यक्तिगत समस्यांच जाळं वाढतच चाललं आहे आणि नाती मागे पडत चालली आहेत. अशावेळी नाती बनण्यापेक्षा ती तुटत जास्त चालली आहेत.

आपल्या सर्वांना सतत मोबाईलवर रहायला आवडतं. झोपण्यापूर्वी व्हॉट्सअपवर मेसेज चेक करतो आणि उठताच सर्वप्रथम मेसेज वाचतो. अलीकडे लोकं वर्चुअल जगामध्ये जास्त जगू लागली आहेत ज्यामुळे कुटुंबात अलीकडे समोरासमोर बसून गोष्टी करणे देखील कमी झालं आहे. ज्याचा नात्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे आणि अनेकदा ही नाती तुटण्याचं कारण बनत आहे.

स्क्रीनचा आरोग्यावर परिणाम

सोशल मीडियावर येणारी मीम्स वा मेसेज तुमच्या चेहऱ्यावर काही वेळासाठी हसू आणू शकतात, परंतु याचा तुमच्या आरोग्यावरतीदेखील वाईट प्रभाव पडू शकतो म्हणून स्क्रीनसोबत निरोगी रहा.

अलीकडच्या काळात स्मार्टफोनशिवाय आयुष्याची कल्पनादेखील करणं लोकांना कठीण होऊन बसलंय. सकाळच्या सुरुवातीनंतर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकवेळी फोन तुमच्यासोबत असतो. अशावेळी तुम्ही विचार केला आहे का की तुमचा फोन तुमच्यासोबत नसेल तर काय होईल? आजची तरुणाई फोन हरवल्यावर वा फोन नसल्यास काय होईल याच्या सतत भीतीत असतात. याला नोमोफोबियाचं नाव देण्यात आलंय.

अनेक गंभीर आजारदेखील होऊ शकतात

मोबाईल तुम्हाला डायबिटीस, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित अनेक आजार देऊ शकतो, कारण लाइटिंग स्क्रीनवाल्या गॅजेट्सचा उशिरापर्यंत वापर केल्यामुळे तुमच्या डोळ्यांवरती याचा परिणाम होतो आणि तुमच्या झोपेवरतीदेखील परिणाम होतो. यामुळे तुम्हाला हार्टशी संबंधित आजारासोबतच लठ्ठपणाची समस्यादेखील होऊ शकते आणि डोळ्यांना ग्लुकोमा वा लो नाइटविजनची समस्या देखील होऊ शकते. रिसर्च नुसार डोळ्यांसाठी स्मार्टफोनची ब्ल्यू लाईट हानिकारक असते.

थंब वा अंगठ्यामध्ये वेदना (आर्थराइटिस)

फोनवर स्क्रीन चालवण्यासाठी थंब वा अंगठ्याचा सर्वात जास्त वापर करतात, ज्यामुळे यामध्ये वेदना होण्याची समस्या निर्माण होते. ज्यामुळे थंब (अल्ट्राटिसचा) धोका देखील होऊ शकतो.

यामुळे तुमच्या अंगठ्याची शक्ती क्षीण होऊ शकते. थंब (आर्थाइटिस) झाल्यावर तुम्हाला वस्तू पकडण्यामध्ये आणि अंगठ्याच्या मुव्हमेंटमध्ये त्रास होऊ शकतो.

जर तुम्हाला स्क्रीनसोबतच निरोगी देखील रहायचं असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल ‘‘मोबाईलपासून दुरावाच बरा… तरच मी भला आणि जग भलं.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...