* शोभा कटारे
मीरी की जग बरं, अशी म्हण अलीकडे जरा अशा प्रकारे बदलली आहे, ‘मी बरी आणि माझा मोबाईल बरा.’ अलीकडची तरुणाई आणि लहान व मोठी मुलं सतत मोबाईलच्या स्क्रीनवरती चिकटलेले दिसतात. त्यांना काही फिकीरच नसते. चालताफिरता, खातापिता, झोपता उठता सतत ते मोबाईलच्या जगात बुडालेले राहतात. आपल्या आजूबाजूचा जगापासून वेगळे राहतात. ते कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन बाहेरच्या जगाशी ठेवत नाहीत, त्यामुळे ते वर्चुअल ऑटिझमच्या अधीन होत आहेत.
वर्चुअल ऑटिझमने पिडित मुलं दुसऱ्यांशी बोलताना संकोचतात, आय कॉन्टॅक्ट करत नाहीत, त्यांच्यामध्ये बोलण्याच्या क्षमतेचा विकास उशिराने होतो, त्यांना लोकांसोबत एकत्र मिसळण्यास त्रास होतो आणि त्यांचा आयक्यूदेखील कमी होतो.
कमी होतं सोशल कम्युनिकेशन
अलीकडच्या मुलांना लहानपणापासून मोबाईल फोन हातात दिला जातो. कधी अभ्यासासाठी तर कधी काही दुसरं शिकण्यासाठी, जसं की कविता ऐकवण्यासाठी, सोबतच रडणाऱ्या छोट्या मुलांना गप्प बसवण्यासाठी ते कार्टून, सिनेमा, गेम्स इत्यादी त्यांना मोबाईलवरच दाखवतात. ज्यामुळे त्यांना हळूहळू याचं व्यसन लागतं. ज्यामुळे ते बोलणं नंतर शिकतात आणि मोबाईल चालवणं अगोदर शिकतात.
याचा नकारात्मक प्रभाव असा होतो की त्यांच्यामध्ये स्पीच डेव्हलपमेंट होत नाही. ते गॅजेट्समध्येच बिझि राहू लागतात. त्यांच्या वागण्यामध्ये त्रास तेव्हा होऊ लागतो, ज्यामुळे त्यांचा मानसिक विकास, त्यांचे सोशल कम्युनिकेशन आणि बिहेवियर स्किल्सवर परिणाम होतो.
वाढत्या दुर्घटना
मोबाईल फोन आता अपघातांचं सर्वात मोठं कारण बनत चाललंय. वाहन चालवतेवेळी मोबाईलवर बोलणं, आजच्या खासकरून तरुणांसाठी काही नवीन गोष्ट नाहीये. अनेकदा रस्त्यावरती लोकं कार वा बाईक चालवतेळी मोबाईलवर बोलताना दिसतात.
तरुण तर बाईक चालवतेवेळी इयरफोन लावून गप्पा मारतात वा मग गाणी ऐकतात, ज्यामुळे त्यांचं लक्ष दुसरीकडे असतं आणि अपघात होतो. वाहन चालवताना ब्रेक मारणं, स्पीड वाढवणं वा तोडणं सर्व काही नर्वस सिस्टमवर काम केल्यावरती होतं.
अशावेळी वाहन चालवतेवेळी स्पीड ब्रेकर आल्यावर ब्रेक लावणं, समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्यासाठी वळणं वा मग स्पीड वाढवण्याची गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि दुर्घटना घडतात.





