* कुसुम अग्रवाल
काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मी चविष्ट पदार्थ बनवले, त्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पार्कमध्ये फिरायला गेलो, काही वेळ फिरलो, घरी परतल्यानंतर फोनवर गप्पा मारल्या आणि झोपायला गेलो तेव्हा अचानक माझ्या पतीने सांगितले की, आजकाल तो जराही आनंदी नाही. त्याचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण मला वाटले की किमान आज तरी त्याने असे म्हणायला नको होते, कारण आजचा दिवस खूप खास होता.
मी विचार करू लागले की, तो असं का म्हणाला? यामागे काहीतरी कारण असले पाहिजे. मी त्याला विचारत राहिले, पण प्रत्येकवेळी मला एकच उत्तर मिळालं की त्याला कोणत्याही प्रकारची समस्या नाही पण तरीही तो आनंदी नाही. मग मी स्वत:ला विचारले, मी आनंदी आहे का? माझ्या मनाने उत्तर दिले की नाही, कदाचित तूही आनंदी नसशील. तेव्हा मला प्रश्न पडला की, असे का आहे? आम्ही दोघेही सर्व सुखसोयींसह आरामदायी जीवन जगत आहोत, तरी अजूनही आम्ही आनंदी का नाही?
ही गोष्ट मला अस्वस्थ करू लागली. मी जीवनाबद्दलच्या चिंतनाशी संबंधित सर्व पुस्तके चाळली. दु:खाचे कारण आणि आनंद मिळवण्याचा एखादा मार्ग शोधण्यासाठी इंटरनेटवरील सर्व साइट्स शोधल्या. अनेक तथाकथित संत-महात्म्यांचा सल्लाही घेतला, पण कुठूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. निराश होऊन मी माझ्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना माझ्या समस्या सांगून विचारले की, हा एखादा मानसिक आजार आहे का? जर तसे असेल तर कृपया मला लवकरात लवकर त्यावरील उपचार सांगा.
कोणताही रोग नाही
डॉक्टर हसले आणि म्हणाले की, हा आजार असू किंवा नसूही शकतो, पण त्याचा उपचार तुमच्याच हातात आहे, कारण एखादी व्यक्ती आनंदी आहे की नाही हे आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या ४ हार्मोन्सवर अवलंबून असते. जर तुमचे शरीर योग्य प्रमाणात हे चार हार्मोन्स तयार करत असेल तर तुम्ही नेहमीच आनंदी राहू शकता.





