निसर्गाच्या नियमांवर धार्मिक रंग कसे आले

* नसीम अंसारी कोचर

आपण कधी पाहिले आहे काय की मुंग्यानी त्यांच्या आवडत्या देवांची मंदिरे बांधली? मुर्ती बनवली आणि पूजा केली, किंवा मशिदी बांधल्या आणि प्रार्थना केल्या? मुंग्या आणि वाळविंच्या वारुळामध्ये, मधमाश्यांच्या पोळयामध्ये एखादी खोली देवासाठीही असते का? आपण कधीही माकडांना उपवास करतांना किंवा उत्सव साजरे करतांना पाहिले आहे काय? अंडी घालण्यासाठी पक्षी किती कार्यक्षमतेने आणि स्वेच्छेने सुंदर-सुंदर घरटे बनवतात, परंतु या घरटयांमध्ये ते देवासारख्या कोणत्याही गोष्टीसाठी उपासनास्थान बनवत नाहीत? देवासारख्या गोष्टीचे भय मानवाशिवाय पृथ्वीवर दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला नाही. देवाची भीती हजारो वर्षांपासून मानवजातीच्या मनात सतत भरवली जात आहे.

या पृथ्वीवर जवळपास ८७ लाख प्राण्यांच्या वेगवेगळया जाती आहेत, या लक्ष्यावधी प्राण्यांपैकी एक मनुष्यदेखील आहे. हे लक्ष्यावधी जीव एकमेकांपेक्षा भिन्न आकाराचे-वर्तुणूकीचे आहेत, परंतु त्यांच्यात एक गोष्ट समान आहे की त्या प्रत्येकामध्ये दोन जाती आहेत, एक नर आणि एक मादी. निसर्गाने या दोन जातींना समान कार्य दिले आहे की ते एकमेकांवर प्रेम आणि सहवासाद्वारे त्यांच्या प्रजातीला पुढे वाढवत राहावेत आणि पृथ्वीवर जीवन चालवत राहावेत.

जीवशास्त्रज्ञांनी पृथ्वीवर आढळणाऱ्या लक्ष्यावधी प्राण्यांचे जीवनचक्र जाणून घेण्यासाठी बरेच शोध, संशोधन आणि प्रयोग केले आहेत. परंतु आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला त्याच्या संशोधनात असे आढळले नाही की मानव वगळता या पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्याने देवासारख्या शक्तीवर विश्वास ठेवला असेल.

देवाच्या सामर्थ्याची जाणीव होण्यासाठी, त्याच्या नावावर धर्मांची स्थापना केली गेली. धर्माच्या नावाखाली मंदिरे, मशिदी, शिवालय, गुरुद्वार, चर्च बनवले गेलेत. यांमध्ये पूजा, भक्ती, नमाज, प्रार्थना यासारख्या गोष्टी सुरू झाल्या. या गोष्टी करण्यासाठी महंत, पुजारी, मौलवी, पाद्री, पोप यांना येथे बसवले गेले आणि त्यानंतर हेच लोक धर्म आणि ईश्वराची भीती दाखवून संपूर्ण मानवजातीला आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागले. अल्ला म्हणतो की पाच वेळा नमाज वाचा नाहीतर तुम्ही नरकात जाल. देव म्हणतो की दररोज सकाळी स्नान करून उपासना करा अन्यथा नरक प्राप्त होईल, यासारख्या हजारो तर्कविहीन गोष्टी मानवी जगात पसरवल्या गेल्या. हिंसाचाराद्वारे त्यांची भीती मनात भरवली गेली. स्वयंघोषित धर्माचे कंत्राटदार एवढे शक्तिशाली झाले आहेत की त्यांना हे प्रश्न कोणी विचारण्याची हिंमतच केली नाही की देव कधी आला? तो कसा आला? कुठून आला? तो कसा दिसतो? सर्व गोष्टी फक्त तुम्हालाच का सांगून गेला, सर्वांसमोर येऊन का सांगितल्या नाहीत?

मानवजातीने स्वत:घोषित धार्मिक आचार्यांच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला, त्यांनी जसे सांगितले तसे केले. धर्माचार्यांनी अनेक नियम तयार केले. असे जगा, असे जगू नका, हे खा, ते खाऊ नका, असे कपडे परिधान करा, असे कपडे घालू नका, येथे जा, तेथे जाऊ नका, याच्याशी प्रेम करा, त्याच्याशी करू नका, हा आपला आहे, तो परका आहे, आपल्या माणसावर प्रेम करा, इतरांचा द्वेष करा. धार्मिक आचार्यांनी मानवजातीला या पृथ्वीवर भयंकर युद्धात झाकले आहे यात शंका नाही. कोणत्याही धर्माची मुळे शोधा, त्या धर्माचा उदय लढाईतूनच झाला आहे, हजारो वर्षांपासून धर्माच्या नावाखाली भयंकर लढाई चालू आहे. आजही पृथ्वीच्या वेगवेगळया भागात अशा लढाया चालू आहेत. यहुदी, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू हे हजारो वर्षापासून धर्म आणि ईश्वराच्या नावाखाली लढवले जात आहेत.

आपण या पृथ्वीवर असणाऱ्या इतर कोणत्याही सजीव प्राण्याला धर्म आणि ईश्वराच्या नावाखाली भांडतांना पाहिले आहे का? ते भांडत नाहीत, कारण हे दोन शब्द (देव आणि धर्म) त्यांच्यासाठी अस्तित्त्वात नाहीत, ते निसर्गाच्या आणि सृष्टीच्या नियमांवर आनंदाने, प्रेमळपणे, आयुष्य पुढे सरकवत जगत आहेत.

पुरुषापेक्षा शारीरिक दृष्टया दुर्बल असलेल्या स्त्रीवर धर्माने सर्वात जास्त अत्याचार आणि दडपशाही केली आहे. जर तिने तिच्यावर लादलेले नियम पाळण्यास नकार दिला तर तिच्या नवऱ्याला तिचा छळ करण्यास उद्युक्त केले गेले. त्याला सांगण्यात आले की हे तुझ्या बायकोकडून करवून घे नाहीतर देव तुला शिक्षा करेल. तू नरकात जाशील. आणि पुरुष त्याच्या प्रियशीचा छळ करू लागला. त्या महिलेवर अत्याचार करू लागला, जी त्याच्या मदतीने या पृथ्वीवर मानवी जीवनाची उन्नती करण्याची जबाबदारी निभावते.

वेश्याव्यवसाय ही धर्माची देणगी आहे

निसर्गाने पुरुष आणि स्त्रीला हे स्वातंत्र्य दिले होते की तरुण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार जोडीदाराची निवड करावी, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत आणि सृष्टीच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे. धर्माने मानवजातीला वेगवेगळया मंडळात बांधले. हिंदू मंडळ, मुस्लिम मंडळ, ख्रिश्चन मंडळ, पारशी, जैन इत्यादी. या मंडळामध्येही अनेक मंडळ तयार केली गेली आहेत. माणूस विभक्त होत गेला.

प्रत्येक परिघावर नियंत्रण ठेवणाऱ्या धर्माचार्यांनी वीरांची किंवा राजांची निवड केली आणि त्यांना सर्व अधिकारांनी सुसज्ज केले. या अधिकारांपैकी एक म्हणजे स्त्रीचा आनंद लुटणे, धार्मिक लोकांनी लैंगिक समानतेचा नैसर्गिक कायदा नाकारला आणि पुरुषाला स्त्रीच्या वरचा दर्जा दिला.

धर्माचार्यानी राजांना आणि वीरांना समजावून सांगितले की स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे. रंगमहालामध्ये, अंत:पुरामध्ये या उपभोगाच्या वस्तू जबरदस्तीने गोळा केल्या जाऊ लागल्या. एक-एक राजाजवळ शेकडो राण्या होऊ लागल्या. नवाबांच्या अंत:पुरामध्ये सेविका जमू लागल्या. या बहाण्याने धर्माचार्यांनी त्यांच्या भोगविलासाचे सामानदेखील गोळा केले.

देवदासी प्रथा सुरू झाली. स्त्री नगरवधू बनली. इच्छा नसताना सर्वांसमोर नाचवली जाऊ लागली. प्रत्येकाने तिचा जबरदस्तीने उपभोग केला. देवदासींचा छळ एक प्रथा बनली. कालांतराने महिला कलावंतीण, वेश्या म्हणून वाडयां/खोल्यांमध्ये डांबली गेली आणि आता हॉटेलमध्ये वेश्या किंवा बार नर्तकीच्या रूपात दिसते. महिलेच्या या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? फक्त धर्म.

विधवापण ही धर्माची देणगी आहे

पुरुष जोडीदाराच्या मृत्यूनंतर धर्मगुरूंनी धर्म आणि देवाची भीती दाखवून महिलेला दुसरा जोडीदार निवडण्यास बंदी घातली. पुरुष कोणत्याही कारणास्तव मरण पावला असेल, यासाठी महिलेला दोषी ठरविण्यात आले. तिला शिक्षा देण्यात आली. तिच्याकडून कपडे हिसकावले गेले. केस काढून टाकले गेले. शृंगारावर बंदी घालण्यात आली.

तिला तुरूंगाप्रमाणे तिच्याच घरात राहायला भाग पाडले गेले. तिला उघडया जमिनीवर झोपायला विवश केलं. ज्याने इच्छा केली तिच्यावर बलात्कार केला. तिला नीरस-कोरडे अन्न दिले गेले. स्त्रीच्या इच्छेविरूद्ध ही सर्व हिंसक कृत्ये धर्मगुरुंनी देवाची भीती दाखवून पुरुष समाजाकडून करवून घेतली. विधवेला वेश्या बनविण्यातही ते मागे राहिले नाहीत.

या पृथ्वीवरील कोणत्याही इतर प्राण्याच्या जीवनात असे होतांना पाहिले गेले आहे काय? काही कारणास्तव नराच्या मृत्यूनंतर, मादी इतर नराबरोबर प्रेमक्रीडा करत सृष्टीच्या नियमाला गतिशील ठेवते. मादीच्या मृत्यूनंतर पुरुषही असेच करतो. त्रास देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तेथे फक्त प्रेम असते.

सती आणि जौहर प्रथा धर्माच्या देणगी आहेत

धर्माचार्यांनी सर्वप्रथम त्यांच्या धर्माच्या प्रसारासाठी लढाया करविल्या. त्यात लाखो माणसे मारली गेली. लूटमार झाली, विजयी राजे आणि त्यांच्या सैन्याने हरवलेल्या राजांच्या आणि त्यांच्या कुळातील स्त्रियांवर अत्याचार केले. सैनिकांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. त्यांना ठार मारले, त्यांना दासी बनवून नेले. धर्माचार्यांनी या कृत्याचे कौतुक केले. यास योग्य कृत्य म्हणून सांगितले. या कृत्यावर कोणत्याही धर्माचार्यांनी कधी बोट ठेवले नाही. छळ, शोषण, अत्याचार आणि कैदी बनविणे जाण्याच्या भीतीने महिलांनी आपल्या राजाच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी सती व जौहरचा मार्ग स्वीकारला. धर्माचार्यांनी या कृतीलाही योग्य ठरविले. महिलांनी आपल्या पुरुष सैनिकांच्या प्रेतांबरोबर स्वत:ला जाळून संपवण्यास सुरूवात केली. एकत्रितपणे गोळा होऊन आगीत उडी मारून जौहर करु लागली.

जरा विचार करा की त्यांनी किती त्रास सहन केला असेल. जर आपले बोट जळले, फोड आले तर ते खूप दुखवते आणि त्या संपूर्ण शरीरासह अग्नीत जळत राहिल्या, कोणत्याही धर्माचार्याला त्यांची वेदना जाणवत नव्हती, ही त्या काळातील सर्वात पवित्र धार्मिक कृती असल्याचे म्हटले जाते.

बालविवाहदेखील धर्माचीच देणगी

धर्माच्या कंत्राटदारांनी आपापल्या धर्मांची व्याप्ती निश्चित केली आणि त्यांनी स्त्री-पुरुषांच्या इच्छा-अनिच्छेला नियंत्रित केले. पुरुष आणि स्त्रियांनी त्यांचा धर्म सोडून इतरांच्या धर्मात प्रवेश करू नये. इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला आपला जोडीदार बनवू नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालविवाह प्रथा सुरू केली गेली. नवजात बालकांचेदेखील विवाहसोहळे सुरू केले गेले जेणेकरुन तरुण झाल्यानंतर, ते त्यांच्या पसंतीनुसार किंवा आवडीनुसार त्यांच्या प्रेमाचे जोडीदार निवडू नयेत.

बुरखा प्रथेच्या मुळाशी धर्म

आपण कधीही एखाद्या सिंहिनीला तिचा चेहरा लपवत फिरत असल्याचे पाहिले आहे किंवा मादी कबुतराला बुरखा ओढलेले पाहिले आहे? जर निसर्गाचा असा हेतू असता की स्त्री जातीने आपले तोंड पुरुषापासून लपवावे तर त्याने सर्व प्राण्यांसाठी काही ना काही व्यवस्था केली असती. भले पानांचा पदर राहिला असता, पंखांचा मुखवटा राहिला असता तरी मादी पक्षीने त्यातून आपले तोंड लपवले असते. परंतु हे कोठेही दिसत नाही. असे केवळ मानवी जगातच दिसून येते की स्त्री बुरखा घालण्यास विवश आहे. तोंड आणि शरीर लपविण्यासाठी तिला भाग पाडले जाते, का? कारण धर्माचार्यांनी असे म्हटले आहे की जर स्त्रीने पुरुषापासून बुरखा केला नाही तर हे पाप आहे, ती नरकात जाईल.

नुकतीच भारताचे क्रेंद्रशासित राज्य अंदमान येथे एक घटना घडली. अंदमानच्या सेंटिनेल बेटात ६० हजार वर्ष जुनी एक प्राचीन आदिवासी जमात राहते. निसर्गाच्या नियमांचे पालन करत तेथील स्त्री-पुरुष आजही या पृथ्वीच्या इतर प्राण्यांसारखेच जीवन जगतात. तेथे धर्म, देव, धार्मिक कट्टरता, कपडे, दागदागिने यासारख्या गोष्टींसाठी स्थान नाही. तेथे स्त्री-पुरुष एकसारखेच कपडयांविना जंगलात फिरत असतात. शिकार करून त्यांना त्यांचे भोजन मिळते आणि मोकळेपणाने सहवास करून ते आपले आयुष्य जगतात.

तेथे पुरुष आणि स्त्रिया समान आहेत. तेथे कोणीही मोठे किंवा लहान नाही. या बेटावर पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी आहे. पण ख्रिस्ती धर्माच्या एका अनुयायाने त्यांच्या आयुष्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हेतू हा होता की त्यांच्यामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार करणे. आपल्या तर्कहीन गोष्टींमध्ये अडकवून देवाचा आणि धर्माचा धाक त्यांच्यात बसवू शकेल.

त्याने फुटबॉल, मेडिकल किट इत्यादी वस्तूदेखील आपल्याबरोबर त्यांना मोहात पाडण्यासाठी नेल्या, जसे ख्रिस्ती मिशनरी सहसा आपला धर्म पसरवण्यासाठी करतात. जॉन एलन चाऊ नावाच्या या अमेरिकन नागरिकाने या बेटावर पोहोचून आदिवासींशी संपर्क साधला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण आदिवासींना त्याचा घृणास्पद हेतू कळला. जॉन एलन चाऊ घेरला गेला आणि त्यांच्या बाणांनी घायाळ झाला.

या एका घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की ज्यांना निसर्गाचे नियम समजतात ते आजही ते नियम बदलू इच्छित नाहीत, परंतु धर्म आणि देव यासारख्या तर्कविहीन गोष्टी निर्माण करणारे निसर्गाचे नियम पायदळी तुडवून चुकले आहेत, त्यांचे मूळ रूप एवढे खालावले आहे की पुन्हा त्यात सुधार होण्यासाठी एखाद्या प्रलयाचीच प्रतीक्षा करावी लागेल. मानवांमध्ये बुद्धिमत्तेचा विकास हा पृथ्वीवरील इतर प्राण्यांपेक्षा जास्त आहे, परंतु विध्वंसक कार्यात याचा अधिक उपयोग केला गेला आहे. याउलट, जर आपण स्त्री-पुरुषांमधील संबंधांच्या संदर्भात निसर्गाचे नियम अधिक खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचे परिणाम बरेच चांगले राहीले असते.

कुणी उपरोधक पाहिल्यास काय करावे

* पूजा पाठक

क्षिप्राच्या घरी किट्टी पार्टी चालू होती. अचानक घडयाळावर दृष्टी पडताच रागिनी उठून चालू लागली.

‘‘अगं, अजून तर फक्त ५ वाजले आहेत, ६ वाजता निघून जा,’’ क्षिप्राने विनवणी करत तिचा हात धरला.

‘‘माफ करा. मला उद्या सकाळी ऑफिसला जावं लागेल. आता मी तुझ्यासारखी गृहिणी तर नाही आहे की आरामात आयुष्य जगू शकेन. मला घराचे -बाहेरचे दोघेही पाहावे लागते.’’ रागिणी सौम्य कटाक्ष करत म्हणाली. आपुलकीने पकडलेल्या हाताची पकड सैल झाली. क्षिप्रा तोंडावर काहीच बोलली नाही, परंतु या एका व्यंग्यामुळे दोन मैत्रिणींमधील मैत्रीत एक अदृश्य भिंत तयार झाली.

उपरोक्त परिस्थितीतही किट्टी पार्टी दरम्यान क्षिप्राच्या घराच्या थाटामाटाबद्दल होणारी स्तुती रागिनी सहज पचवू शकली नाही आणि इच्छा नसूनही तिच्या तोंडून क्षिप्रासाठी अपमानजनक गोष्ट निघाली. ज्याने केवळ पार्टीचे वातावरणच त्रासदायक बनले नाही तर दोन मैत्रीणींमध्ये विवादासही जन्म दिला.

या मानसिकतेचे कारण काय आहे

अखेर, व्यंग्य करण्यामागे एखाद्याचा हेतू काय असू शकतो. खरं तर जेव्हा आपण एखाद्याला वरिष्ठ पाहता तेव्हा आपल्या मनात एक नैसर्गिक उत्सुकता निर्माण होते की तो आपल्यापेक्षा वरचढ का आहे? फक्त येथे, सकारात्मक विचारांची व्यक्ती ही गोष्ट प्रशंसेच्या रूपात घेते आणि समोरच्या माणसाची प्रशंसा करते. तो त्याच्या कलागुणातून किंवा प्रतिभेवरुन शिकण्याचा प्रयत्न करतो. तर वाईट भावनेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल हेवा, द्वेष आणि मत्सर वाटतो.

या प्रकारचे लोक खरोखर आजारी मानसिकतेचे गुलाम असतात. त्यांना इतरांचे सौंदर्य, प्रतिभा, आनंद किंवा यश आवडत नाही. जेव्हा त्यांना आपल्या या भावनेवर आळा घालता येत नाही, तेव्हा त्यांच्या तोंडातून व्यंग बाहेर येते, जे समोरच्या व्यक्तीचा अप्रत्यक्ष रूपाने अपमान करण्यासाठी असते.

कधीकधी हे व्यंग सूड उगवण्याच्या भावनेखाली केली जातात किंवा कदाचित आपली खुन्नस काढण्यासाठीदेखील. तथापि, ही वाक्ये अशा प्रकारे उच्चारली जातात की जेणेकरून त्यांच्यावर सरळ-सरळ कुठला आरोप लागू नये आणि वेळ आल्यावर ते असे सांगून स्वत:चा बचावही करू शकतील की मी तर असेच म्हटले होते.

यापासून वाचण्याचे मार्ग

अखेर असे काय करावे की सापही मरावा आणि काठीही मोडू नये. म्हणजेच, त्याला आरसाही दाखवावा आणि स्वत:ही दुखी होऊ नये, चला जाणून घेऊया :

* या गोष्टीला फारसे प्राधान्य देऊ नका आणि त्यावेळी असा विचार करून शांत रहा की आपल्यावर टोमणे मारणे ही त्याची दुर्बलता आहे. हो, नंतर योग्य वेळ पाहून त्याच्या मनात आपल्याबद्दल बसलेली घाण दूर करण्याचा प्रयत्न करा.

* त्याची जी काही विशेषता आपल्याला आवडत असेल तिची उघडपणे स्तुती करा, जेणेकरून त्याला स्वत:च्या कृतीची लाज वाटेल आणि तो तुमच्याबद्दल दुहेरी आदराने भरुन जाईल.

* त्याला स्पष्ट शब्दांत अशी कोणती गोष्ट न बोलण्यासाठी अवश्य सांगा. अशाने तो सावध होईल.
तेव्हा हा निर्णय व्यक्ती किंवा परिस्थिती पाहून आपल्याला स्वत:ला घ्यावा लागेल की एखाद्याकडून व्यंग केले गेल्यास आपली प्रतिक्रिया काय असावी. आपण फक्त हे निश्चित केले पाहिजे की आपण कोणाच्या टोमण्याबद्दल मनापासून दुखावणार नाहीत, आणि ना स्वत: एखाद्यावर विनाकारण वैयक्तिक आक्षेप घ्याल किंवा टिप्पणी कराल.

बालगोपाळांच्या कपड्यांची काळजी

* गरिमा पंकज

आईवडील जेव्हा आपल्या छोटयाशा बाळाला रुग्णालयातून घरी घेऊन येतात तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर नसतो. बाळाच्या जन्माआधीच छोटया, सुंदर, रंगीबेरंगी कपडयांनी घर भरून जाते. पण त्यांची खरेदी करताना आणि बाळाचे कपडे धुताना काही गोष्टींकडे लक्ष देणे खूपच गरजेचे असते, कारण कपडयांवरच बाळाचे आरोग्य आणि सुरक्षा अवलंबून असते.

कपडे खरेदी करताना सावधान

कापड : लहान मुलांसाठी नेहमी मऊ, आरामदायक कपडे खरेदी करा. ते सहज धुता येतील असे हवे. बाळाच्या त्वचेचे नुकसान होणार नाही, असेच कापड हवे. मुलांसाठी सुती कपडे सर्वात चांगले असतात, पण लक्षात ठेवा की सुती कपडे धुतल्यावर थोडे आकसतात.

लांबी-रुंदी : मुलांचे कपडे ३ महिन्यांच्या फरकाने तयार केलेले असतात. ०-३ महिने, ३-६ महिने, ६-९ महिने आणि ९-१२ महिने अशा प्रकारे शिवलेले असतात. मुलांना खूप मोठे कपडे घालू नका. ते सतत गळा आणि डोक्यावर येतात. यामुळे श्वास कोंडण्याची भीती असते.

सुरक्षा : बी एल कपूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे नवजात बाळांचे सल्लागार, तज्ज्ञ डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, लहान मुलांसाठी नेहमी साधे कपडे खरेदी करावेत. फॅन्सी, वजनदार कपडे विकत घेणे टाळा. ज्याला बटन, रिबीन, गोंडा नसेल, असे कपडे खरेदी करू नका. मुले बटण गिळू शकतात, ते त्यांच्या घशात अडकू शकते. ज्याला ओढायच्या दोऱ्या असतील, असे कपडेही खरेदी करू नका. त्या दोऱ्या कशात तरी अडकून ताणल्या जाऊ शकतात.

आरामदायी : असे कपडे खरेदी करा, जे मुलाला सहज घालता येतील, जेणेकरून कपडे बदलताना त्रास होणार नाही. पुढून उघडता येणारे सैल कपडे चांगले असतात. असे कपडे खरेदी करा जे स्ट्रेचेबल म्हणजे ताणले जातात. ते मुलाला घालणे आणि काढणे सोपे असते. ज्याला चैन असेल असे कपडे खरेदी करू नका.

कपडे धुण्याच्या टिप्स

डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, मुलांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. म्हणूनच त्यांचे कपडे धुताना कपडे धुण्याची साधी पावडर वापरू नका. रंगीत आणि सुवासिक पावडर तर अजिबात वापरू नका. लोकरीचे कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी सौम्य पावडर वापरणे जास्त चांगले असते. मुलांचे कपडे खूप वेळा पाण्यातून काढा, जेणेकरून पावडर किंवा साबण पूर्णपणे निघून जाईल. मुलाची त्वचा जास्तच संवेदनशील असेल तर लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली पावडरच वापरा.

मुलांचे कपडे लहान आणि मऊ असतात. म्हणूनच ते वॉशिंग मशीनऐवजी हाताने धुणे जास्त चांगले असते. मशीनमध्ये धुणार असाल तर ड्रायर वापरू नका. मोकळया जागेवर, ताजी हवा आणि सूर्यप्रकाशात कपडे सुकवा. तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनर वापरणार असाल तर खास मुलांसाठी असणाऱ्या सॉफ्टनरचाच वापर करा.

कपडे धुण्याच्या अन्य टिप्स

त्वचा किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये यासाठी मुलांचे कपडे कसे स्वच्छ ठेवायचे, हे माहिती करून घेऊया :

* कपडयांवर लावलेले लेबल नीट वाचा. लेबलवर मुलांच्या कपडयांसाठी ज्या सूचना असतील त्यांचे पालन करा.

* बरेचसे कपडे जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात. म्हणूनच कपडे धुताना जास्त गरम पाणी वापरू नका. कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवा.

* रंग, कापड आणि लागलेले डाग पाहून त्यानुसार मुलांचे कपडे वेगवेगळे धुवायला ठेवा. एकसारखे असलेले कपडे एकत्र धुवा. यामुळे कपडे धुणे सोपे होईल आणि ते सुरक्षितही राहतील.

* मुलांच्या कपडयांवर डाग लागले असतील तर बेबी फ्रेंडली सौम्य पावडर लावून हलक्या हातांनी चोळून कपडे धुवा. यामुळे डाग हलका होईल. त्यानंतर व्यवस्थित पाणी वापरून कपडे नीट धुवा.

* मुलांचे कपडे किटाणूमुक्त ठेवण्यासाठी काही महिला कपडे अँटीसेफ्टिक सोल्यूशनमध्ये भिजवतात. हे चुकीचे आहे. यामुळे मुलाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

* कपडे लादीवर ठेवून चोळण्याऐवजी हात किंवा मशीनच्या झाकणावर ठेवून धुवा.

* मुलाचे कपडे घरातील इतरांच्या कपडयांसोबत धुवू नका. बऱ्याचदा मोठयांचे कपडे जास्त मळलेले असतात. सर्व कपडे एकत्र धुतल्यामुळे त्यांच्यातील किटाणू मुलाच्या कपडयांमध्ये जाऊ शकतात.

* कपडे सुकल्यावर ते नीट इस्त्री करा, जेणेकरून उरलेले किटाणूही मरून जातील.

* कपडे नीट घडी करून कव्हरमध्ये किंवा कॉटनच्या कपडयात गुंडाळून ठेवा.

आर्थिक तणाव सेक्सवर ताबा तर मिळवला नाही ना?

– शैलेंद्र्र सिंह

सेक्स अर्थात संभोग ही केवळ एक शारीरिक कृती नाही. यामागे भावनिक ओढही असते. आर्थिक तणावाचा दुष्परिणाम खास करून भावनांवर होतो. चिंतेने ग्रासलेले मन शरीराशी पूर्णपणे एकरूप होऊ शकत नाही. याचा परिणाम संभोगावर होतो. फक्त नवरा-बायकोवरच नाही तर घर, कुटुंब, समाजावरही याचा परिणाम होतो. व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते.

प्रत्येक प्रकारचा तणाव सेक्स जीवनावर परिणाम करतोच. आर्थिक तणावाची चिंता स्वत:सोबत जोडीदारालाही असते, कारण पैशांअभावी डॉक्टर आणि औषध, दोन्हीही अवघड होते.

जोडीदाराला पैशांअभावी खुश ठेवण्यासाठी भेटवस्तू घेता येत नाही. जे वर्षानुवर्षे सोबत असतात तेही तुमच्यातील उणिवांचा पाढा वाचू लागतात. कोविड-१९ काळात घरभाडे, नोकरी जाणे, पगार कपात, पगार वेळेवर न मिळणे अशा काही चिंता आपल्याला सतावत आहेत.

कर्मचाऱ्याने नोकरी सोडावी यासाठी कंपन्या त्यांना विविध प्रकारे त्रास देत आहेत. मंदीचे कारण काहीही असले तरी याचा परिणाम सेक्स जीवनावर आहे. यामुळे नवरा-बायकोत दुरावा निर्माण होत आहे.

सामाजिक जीवनावर परिणाम

आर्थिक चणचण जाणवू लागल्यामुळे लोक मोठे शहर, प्रशस्त घर विकून साध्या ठिकाणी राहू लागले आहेत. भरपूर फी, शाळेचा इतर खर्च परवडणारा नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना मुलांना साध्या शाळेत प्रवेश घेऊन द्यावा लागत आहे. पैशांअभावी चांगले जगण्याचा स्तर खालावल्यामुळे तणाव वाढत आहे.

आर्थिक तणाव दूर करण्यासाठी लोक जास्त काम करू लागले आहेत. त्यामुळे सेक्स संबंधांसाठी वेळ मिळेनासा झाला आहे. थकवा वाढत आहे. त्यातच सेक्स संबंधातील समस्या जैसे थे आहे.

तणावाचा महिलांवर सर्वाधिक परिणाम

आर्थिक तणावाचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त होतो. त्यांना पैशांची चिंता जास्त सतावत असते. त्यामुळे संभोगात रमणे आणि त्याचा आनंद घेणे त्यांच्यासाठी अवघड होते. आर्थिक तणावाचा सेक्सच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम होतो. काहीच करण्याची इच्छा होत नाही.

तणावामुळे डोकेदुखी, पोट बिघडणे, उच्च रक्तदाब किंवा छातीत दुखणे असे अनेक प्रकारचे रोग बळावतात. या आजारांचा परिणाम सेक्सवर होतो. मेंटल हेल्थ अर्थात मानसिक आरोग्य बिघडल्यास तणाव, चिंता, हृदरोगाचा झटका सोबतच भावनिक समस्या यांचाही सेक्स जीवनावर परिणाम होतो.

तणाव वाढल्यामुळे शरिरातील हार्मोन्स मेटाबॉलिज्मवर दुष्परिणाम होतो. तणावामुळे मनात नकारात्मक विचार घर करतात. कोणत्याच गोष्टीत मन रमत नाही. याचा परिणाम सेक्स जीवनावर होणे स्वाभाविक असते.

मानसिक आरोग्य बिघडते

जेव्हा मन दु:खी असते, काहीच आवडेनासे होते तेव्हा मनाची घालमेल वाढते. संभोगाची इच्छा होत नाही. याचा परिणाम जोडीदाराच्या सेक्स जीवनावरही होतो. आर्थिक तणावाचा परिणाम सर्वात आधी मानसिक आरोग्यावर होतो. डोक्यात अनेक प्रकारचे विचार थैमान घालत असतात. मानसिक तणाव वाढतो. आपल्याच माणसांवर संशय घेण्याची वृत्ती बळावते. जोडीदाराचे मन भावनिकदृष्ट्या अस्थिर असेल तर त्याच्याकडून सेक्सची अपेक्षा ठेवणे निरर्थक असते.

सेक्स जीवन उत्तम राखण्यासाठी तणावापासून दूर राहणे किंवा नकारात्मक विचारसरणी बदलणे गरजेचे असते. हे सांगायला सोपे आहे, पण प्रत्यक्ष कृतीत आणणे बरेच अवघड असते. म्हणूनच तणावाचा आपल्या आयुष्यावर कमीत कमी परिणाम होईल यासाठी प्रयत्न करायला हवा, जेणेकरून तणाव आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकणार नाही. व्यायाम, समुपदेशनाद्वारे हे शक्य होईल.

यामुळे तणावाची पातळी कमी करता येईल, जेणेकरून त्याचा दुष्परिणाम सेक्स जीवनावर होणार नाही. म्हणूनच असे सांगितले जाते की, जेव्हा तुम्ही जोडीदारासोबत बेडरूममध्ये जाल तेव्हा इतर सर्व चिंता बाहेरच ठेवायला हव्यात.

अडचणींमुळे बिघडते हार्मोन्सचे संतुलन

तणावात असल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते. कोर्टिसोल आणि एपिनेफ्रिनची पातळी वाढल्यामुळे सेक्स जीवन निरोगी राहत नाही. महिलांमधील संभोग क्षमता कमी होते. याचा परिणाम सेक्स जीवनावर होतो.

कोर्टिसोलची पातळी वाढल्यामुळे त्याचा परिणाम सेक्स हार्मोनवर होतो. त्यामुळे संभोगाची इच्छा होत नाही. म्हणूनच अस्वस्थ न होता स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

तणावाचा दुष्परिणाम महिलांच्या मासिक पाळीवरही होतो. मासिक पाळीत अनियमितता येते. त्यामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात. परिणामी चिडणे, चट्कन रागावणे असे बदल स्वभावात होतात. या बदलांमुळेही तणाव वाढतो.

आर्थिक तणाव शरीराच्या हार्मोनल समतोल बिघडवतो, सोबतच जेव्हा शरीर तणावात असते तेव्हा भावनांवरही त्याचा परिणाम होतो. माणूस कोणाशीही न बोलण्याची, लोकांपासून दूर राहण्याची संधी शोधू लागतो.

वाढत्या तणावामुळे छोटीशी गोष्टही वेदना देते. संभोग ही केवळ एक शारीरिक कृती नाही तर त्यामध्ये भावनाही गुंतलेल्या असतात. त्यामुळेच आर्थिक तणाव असताना संभोगासाठी स्वत:च्या मनाला तयार करणे अवघड असते. आर्थिक तणावामुळे संभोग करूनही समाधान मिळत नाही. यामुळे नात्यातील प्रेमाची वीण टिकवून ठेवणे अवघड होते.

तणावाचा सामना कसा कराल?

पैशांची अडचण वेळीच सोडवणे, हे आर्थिक तणावापासून दूर राहण्यासाठी गरजेचे असते. जोपर्यंत आर्थिक स्थिती चांगली नसते तोपर्यंत एकमेकांच्या प्रेमळ साथीने परिस्थितीचा सामना करा. मन कणखर बनवा आणि लवकरच काहीतरी तोडगा निघेल, असा सकारात्मक विचार करा. ज्या गोष्टींमुळे तणाव वाढतो त्या गोष्टींपासून पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करा. पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा.

आपल्या जोडीदाराला वेळ द्या. त्याला प्रेमळ साथ द्या, त्याला विश्वासात घ्या. तुम्हाला परवडणाऱ्या ठिकाणी फिरायला जा, फिरल्यामुळे तणाव कमी होतो. प्रसन्न वाटते. तणावमक्त राहण्यासाठी व्यायाम हा सर्वात चांगला उपाय आहे. शांत, सुमधुर संगीतही मनावरचा ताण कमी करते.

आर्थिक तणावाच्या काळात मानसिकदृष्ट्या खंबीर असणे गरजेचे असते. अशावेळी जोडीदाराचा स्वभाव आणि वागणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे समस्यांचा सामना करणे सोपे होते. आपल्या जोडीदाराशी संवाद साधून त्याला समजवा की, दिवस एकसारखे नसतात. कठीण प्रसंगी तुमच्यासाठी त्याची प्रेमळ सोबत किती गरजेची आहे, हे त्याला पटवून द्या.

तुम्हाला ज्यामुळे आनंद मिळतो ते काम करा. पुस्तक वाचणे, बागकाम, चित्र काढणे, स्वयंपाक करणे, अशा तुमच्या एखाद्या छंदासाठी वेळ द्या. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. तणाव जास्तच असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसोपचारतज्ज्ञाला भेटा. समुपदेशन खूपच उपयुक्त ठरते.

Diwali Special: आनंद पसरवा, प्रदूषण नव्हे

* शैलेंद्र सिंह

देशाची राजधानी दिल्लीच नव्हे तर इतर सर्व शहरेही प्रदूषणामुळे चिंतेत आहेत. दिल्लीच्या सभोवताली पेंढा जाळल्यानेही प्रदूषण वाढते. दिवाळीच्या दिवशी फटाक्यांमुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक प्रदूषण होते. जगातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील सर्वाधिक शहरे समाविष्ट आहेत, जो एक धोकादायक इशारा आहे.

कोणत्याही उत्सवाचा हेतू तेव्हाच सार्थक होतो जेव्हा तो समाजात आनंद पसरवितो. प्रदूषण हा संपूर्ण जगाचा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. येणाऱ्या काळात ही आणखी वाईट परिस्थिती असेल. आपल्या भावी पिढयांना स्वच्छ हवा आणि पाणी देण्यासाठी आपणास प्रदूषण निर्मूलनासाठी काम केले पाहिजे.

फटाके आनंद कमी, प्रदूषण अधिक देतात

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे आनंद साजरा करण्यासाठी लोक फटाके आणि फुलबाजीचा अवलंब करतात, ज्यामधून धूर बाहेर पडून वातावरणात पसरतो आणि श्वसन रोगाचे रुग्ण असलेल्या लोकांना अधिक नुकसान पोहोचवतो.

श्वसन रोगाशिवाय फटाके वाजविल्याने होणाऱ्या मोठया आवाजाने कानदेखील खराब होतात, ज्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठीच रुग्णालये आणि शाळांचे क्षेत्र सायलेंस झोन बनविले जातात. येथे मोठया आवाजात हॉर्न वाजवण्यास मनाई आहे.

जेव्हा लोक मोठया आवाजाचे फटाके, बॉम्ब आणि इतर वस्तू फोडतात तेव्हा ते आपल्या कानांवर हात ठेऊन आपले तोंड दुसऱ्या बाजूला करतात. याचा अर्थ असा की त्यांनादेखील हा आवाज आवडत नाही,

जे हे सिद्ध करते की गरजेपेक्षा मोठा आवाज कानांसाठी योग्य नाही. विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या कानांना आवडत नाही तेव्हा ती इतरांना कशी आवडेल? म्हणूनच मोठया आवाजाचे फटाके वाजवू नयेत. फटाके केवळ वाजविणाऱ्यांनाच इजा पोहोचवत नाहीत तर त्यांना तयार करणाऱ्यांनाही इजा पोहोचवतात. फटाके तयार करण्यासाठी गनपाऊडरचा वापर केला जातो, यामुळे तयार करणाऱ्यांच्या हाताला नुकसान होते.

दिवाळीत आनंद साजरा करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे विद्युत दिवे वापरणे. यासाठी लोक मोठया संख्येने इलेक्ट्रिक स्कर्टिंग, बल्ब आणि इतर सजावटीच्या वस्तू वापरतात. यामधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांना इतरांचे पाहून आपले घर अधिकाधिक प्रकाशाने झळकावण्याची इच्छा असते. यासाठी विजेचा वापर होत आहे. यामुळे विजेचा खर्च वाढतो. त्याचा परिणाम असा होतो की वीजपुरवठयात अडचण तर येतेच शिवाय ज्या ठिकाणी तिची अत्यंत गरज आहे अशा ठिकाणी वीज पोहोचू शकत नाही. बरीच रुग्णालये, कार्यालये, रेल्वे स्थानके आणि बाजारपेठांमध्येही वीज मिळत नाही.

रांगोळीमध्ये नैसर्गिक रंग वापरा

रांगोळी तयार करण्यासाठी फक्त नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. यासाठी, फुले आणि पाने वापरली जाऊ शकतात. तांदूळ रंगविण्यासाठीदेखील हळद वापरा. हिरव्या रंगासाठी पाने वापरा. पाने बारीक चिरून घ्यावी. याचा वापर रांगोळीला आकर्षक रूप देण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळया रंगांची फुलेदेखील बारीक कापून रंगाच्या जागी वापरता येतात.

लखनौमधील रांगोळी कलाकार ज्योती रतन म्हणतात की आकर्षक आणि निरुपद्रवी रांगोळी नैसर्गिक रंगांनी बनवता येते. रांगोळीमध्ये तिची रचना आणि रंगांचा वापरच अधिक महत्वाचा असतो. आज, विविध प्रकारचे फुले प्राप्त होत आहेत, ज्यापासून रंगीबेरंगी रांगोळया तयार केल्या जाऊ शकतात.

अशा गोष्टींची काळजी घेत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली जाऊ शकते. यासह, खाद्यपदार्थ तयार करताना हे लक्षात ठेवा की त्यांच्यामध्ये आपल्या आरोग्यास हानी पोहोचविणाऱ्या गोष्टींचा वापर व्हायला नको.

महाराष्ट्र: कोरोना पसरविण्यास महाराष्ट्र सरकारचा निष्काळजीपणा

* शांतिस्वरूप त्रिपाठी

कोरोना पसरविण्यास महाराष्ट्र सरकारचा निष्काळजीपणा

कोरोना साथीच्या आजारामुळे देश संकटात सापडला आहे. मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांची छाया हरवली जात आहे. पालक आपली मुले गमावत आहेत. स्त्रिया विधवा होत आहेत. यातून दक्षिण भारतातील महाराष्ट्र राज्य देखील अस्पृश्य राहिलेले नाही. महाराष्ट्राची गणना ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध राज्यांमध्ये केली जाते. असे असूनही कोरोनामुळे आतापर्यंत 75000 (पंच्याहत्तर हजार) लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. याचा परिणाम म्हणजे बऱ्याचशा कुटुंबात मुले राहिले नाहीत तर अनेक कुटुंबांमध्ये विधवांची संख्या वाढली आहे. बर्‍याच मुलांच्या डोक्यावरुन पालकांची सावली हरवली आहे. परंतु कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबासाठी केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही काहीही केले नाही.

महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी मानली जाते हे आपण विसरू नये. पुणे हे शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र मानले जाते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, पालघर, नागपूर येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे. मुंबई, नागपूर, पुणे ही सर्वात विकसित शहरे आहेत असे असुनही ही परिस्थिती ओढावलेली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे (पुणे शहर हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.) नागपूर, ठाणे, पालघरसह अनेक शहरे व जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट आरोग्य सुविधा आहेत.

लोकांचे जीवन पुन्हा रुळावर येण्यापूर्वीच गडगडले

राजकारणी, उद्योगपती, मोठं-मोठी चित्रपट व्यक्तिमत्त्वे इ. कोरोना साथीच्या परिणामापासून बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहिले आहेत. ही वेगळी बाब आहे की या आजारामुळे काही लोक नक्कीच काळाच्या जबड्यात सामावले. परंतु कोरोना महामारीमुळे 25 मार्च 2020 पासून सर्वसामान्य लोक, नोकरदार लोक, छोटे-छोटे व्यापारी आणि उद्योग-व्यवसाय यांवर अशा प्रकारे मार पडली आहे की त्यांचे जीवन आजही रुळावर येऊ शकले नाही. जानेवारी २०२१ पासून सगळ्यांचे जीवन हळूहळू रुळावर परतण्यास सुरुवातच झाली होती की तेवढ्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्यास सामोरे जाण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे लोकांचे जीवन पुन्हा रुळावर येण्यापूर्वीच त्यांचे आयुष्य उखडले. महागाई शिगेला पोहोचली आहे. 15 एप्रिलपासून लॉकडाउन लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यभरात चित्रपटसृष्टी, दागिन्यांच्या बाजारपेठा, पोलाद भांडी उद्योग, बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेले लोक तसेच सर्व कामगार, रोजंदारीवरील कामगार, फेरीवाले आणि नोकरी व्यवसाय करणारे लोक इत्यादींसमोर पुन्हा एकदा दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न उभा ठाकला आहे. आपल्या जीवनाचे जहाज पुढे कसे रेटावे हे कोणालाही कळत नाही? सरकारकडेही याचे कुठले उत्तर नाही.

 

सरकारी मदतः उंटाच्या तोंडात जिऱ्यासमान [फारच अल्प]

15 एप्रिलपासून जाहीर झालेल्या लॉक डाऊनमध्ये महाराष्ट्र सरकारने गरीबांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन देण्याची घोषणा केली आहे. रिक्षाचालकांना दोन महिन्यांसाठी दरमहा दीड हजार रुपये देण्यात येण्याची चर्चा आहे. शिवथाळी नि:शुल्क दिली जात आहे. परंतु ज्या ठिकाणी शिवथाळी वितरित केली जात आहे तेथपर्यंत सामान्य गरिबांना पोहोचणे शक्य नाही. याशिवाय फेरीवाले, रोजंदारीवरील मजूर आणि चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी कोणी काही करत नाही.

 

महाराष्ट्र कोरोनाचा प्रसारक बनला का? धार्मिक भावनांमुळे कोरोनाकडे दुर्लक्ष

संपूर्ण देश संकटात आहे. परंतु या संकटाच्या प्रसारात पाच राज्यांच्या विधानसभा आणि उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकांबरोबरच महाराष्ट्र सरकारचे कामकाजदेखील जबाबदार आहे. संपूर्ण सेक्लुअर म्हणजे धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करणारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांचे संमिश्र सरकार महाराष्ट्रात आहे. पण उद्धव सरकारच्या निर्णयांची दखल घेतली तर उद्धव सरकारने सर्व निर्णय धर्माच्या आधारे घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महिलांना खुष करण्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 17 ऑक्टोबर 2020 पासून सर्व महिलांना मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली. त्यानंतर मराठी चित्रपट संस्था आणि ब्रॉडकास्टरच्या दबावाखाली 27 जूनपासून टीव्ही मालिकांच्या शूटिंगला परवानगी देण्यात आली. सर्व सुरक्षेच्या उपाययोजना असूनही दररोज कुठल्या न कुठल्या टीव्ही मालिकांच्या सेटवर कोरोना संक्रमित येत राहिले. दसऱ्यापर्यंत मुंबईत जवळपास सर्व उपक्रम सुरू झाले होते.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग बिनदिक्कत सुरू राहिला. तरीही फेब्रुवारी 2021 मध्ये संपूर्ण मोकळीक देण्यात आली. सामान्य पुरुष प्रवाश्यांनीही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास सुरवात केली. दरम्यान, कोरोनाचे फ्रंटवर्कर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लस दिली जाऊ लागली. त्यानंतर १ मार्चपासून 60 वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्तींना आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसी देणे सुरू झाले.

दुसरी लाटेची सुरूवात महाराष्ट्रापासून

कोरोनाची पहिली घटना फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वप्रथम केरळमध्ये सापडली होती, तर महाराष्ट्रात कोरोनाची पुष्टी 9 मार्च 2020 रोजी झाली होती. होय! महाराष्ट्रात कोरोना विषाणूची पहिली पुष्टी झाल्याची नोंद पुण्यात ९ मार्च २०२० रोजी करण्यात आली होती, तिथे दुबईहून परत आलेले जोडपे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलं होतं. ११ मार्च २०२० रोजी मुंबईत दोन रुग्ण आढळले आणि संध्याकाळपर्यंत त्यांची संख्या ११ पर्यंत वाढली. बघता-बघता १५ मार्चपासून याच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रातच येऊ लागल्या आणि २५ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागूनही मे २०२० पर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे सर्वात जास्त येत राहिली. २९ जुलै रोजी एकूण केसेसची संख्या 400,651 पर्यंत वाढली होती, त्यापैकी 1,46,433 ऍक्टिव्ह होते, १४,४६३, मृत्यूमुखी पडले होते तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील उत्तर प्रदेश, बिहारचे परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात पळून जाऊ लागले. पण सरकारने स्थलांतरित मजुरांच्या हितासाठी किंवा त्यांचे पळून जाणे थांबविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. दुसर्‍या लाटेनंतरही असेच घडले.

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रातूनच सुरू झाली आणि महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे दुसर्‍या लाटेचा प्रसार होण्यास हातभार लागला. मार्च 2021 च्या दुसर्‍या आठवड्यापासून अचानक मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली, परंतु सरकारने त्याकडे डोळेझाक केली. खरेतर तोपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुजरातमधील अहमदाबादेत बैठक झाली होती, त्यामुळे उद्धव ठाकरे अनावश्यक दबावाखाली आले आणि स्वत:ला लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लोकप्रिय सरकार म्हणून सिद्ध करण्यासाठी ढिलेपणा अवलंबत राहिले. परंतु कोरोनाची गती वाढतच गेली. महाराष्ट्रात एकाच दिवसात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या 40,000 (चाळीस हजार) वर पोहोचली आणि दबावाखाली येत मुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या कर्फ्यूची सुरवात केली आणि लॉकडाउन लावण्यास आपण अनुकूल नसल्याचा ते दावा करत राहिले. 11 एप्रिल 2021 रोजी 24 तासाच्या आत कोरोना बाधितांचा आकडा 61695 वर पोहोचला. परंतु महाराष्ट्र सरकार हिंदु नववर्षाची/गुढी पाडव्याची अर्थात 13 एप्रिल 2021 ची प्रतीक्षा करीत होते. (येथे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की ‘गंगूबाई काठीवाडी’सह ज्या चित्रपटांचे आणि नव्वद सीरियलचे मुंबईत तोपर्यंत शूटिंग चालू होते, त्या सर्वांच्या सेट्सवर दररोज अनेक कोरोना बाधित येत होते. संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता, पण उद्धव सरकार त्याकडे दुर्लक्ष करत राहिले.) हे ज्ञात आहे की उत्तर भारतमध्ये या दिवशी नवरात्रोत्सव सुरू होतो आणि महाराष्ट्रात ‘गुढी पाडवा’ मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. उद्धव ठाकरे यांनी गुढी पाडवा संपल्यानंतर 15 एप्रिल २०२१ पासून पंढरपूरसारखे ते जिल्हे सोडून, ज्यात पोटनिवडणूका होणार होत्या, संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातून स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेश, बिहार व इतर जवळपासच्या राज्यांकडे पळायला लागले. महाराष्ट्रातून धूम ठोकून उत्तर भारतातील राज्यांत पोहोचलेल्या स्थलांतरित मजुरांमुळे कोरोना उत्तर भारतातील राज्यांतदेखील झपाट्याने पसरला. आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की तोपर्यंत महाराष्ट्रात संक्रमण शिगेला पोचले होते. 24 एप्रिलच्या दिवशी सर्वाधिक 69000 च्या जवळपास कोरोनाचे रुग्ण आढळले. (आनंदाची गोष्ट म्हणजे लस फ्रंटलाइन वर्करांना [सीमावर्ती कार्यकर्ता] आणि वृद्धांना दिली गेली होती. अन्यथा परिस्थिती अधिक भयानक ठरली असती.) कारण सरकारने वेगाने वाढणार्‍या प्रकरणांची योग्य दखल घेतली नाही आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या नाहीत. लसीकरणातही गोंधळ पसरवला गेला, ज्यामुळे त्या कामाला गती मिळू शकली नाही. सर्वात मोठी गोष्ट  म्हणजे कोरोना लस तयार करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या अदार पूनावाला यांना धमकावले गेले आणि त्यांना देश सोडून लंडनला जाण्यास भाग पाडले गेले. आता महाराष्ट्र सरकार दावा करत आहे की या लसीचा डोस मिळत नाही, म्हणून गेल्या एक आठवड्यापासून महाराष्ट्रात लसीकरणाचे काम रखडले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गृहक्षेत्रात सर्व लस कशी दिली गेली, याचा जाब आता केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.

आयपीएल क्रिकेटला परवानगी का दिली गेली?

इतकेच नव्हे तर कोरोनाचा संसर्ग वाढतच राहीला, पण महाराष्ट्र सरकारने ‘आयपीएल क्रिकेट’ वर बंदी घातली नाही. १५ एप्रिलपासून सरकारने व्यायामशाळा, उद्याने यासह सर्व काही बंद केले आणि कडक निर्बंध घातले, परंतु १० एप्रिल ते २४ एप्रिल या काळात मुंबईच्या वानखेडे क्रिकेट मैदानावर आयपीएलचे दहा सामने खेळले गेले. आयपीएल क्रिकेटशी संबंधित क्रिकेटपटूंना मैदानावर सराव करण्याचीही परवानगी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत सरकारने आयपीएलवर बंदी का घातली नाही असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. जेंव्हा आयपीएलमुळेही कोरोना वाढला, अखेरीस अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकांना संसर्ग झाल्यानंतर आयपीएलवर 4 मेपासून बंदी घातली गेली, तोपर्यंत आयपीएलचे सर्व सामने मुंबईत खेळले गेले होते.

वसुलीत गुंतलेले सरकार

खरं तर कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे संपण्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने सर्व निर्बंध हटवले होते आणि राज्यभरातील सर्व उद्योग सुरू केले होते. मग जसे की महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेत, हे सरकार फेब्रुवारी 2021 पासून शंभर कोटींच्या वसुलीत गुंतल्यामुळे कोरोना संसर्गाची वाढती गती रोखण्याकडे लक्ष देऊ शकले नाही. या वसुली प्रकरणात भले राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हात असला तरी येत्या निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला सहन करावा लागू शकतो.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची शालीनता की  ..?

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार घेणारे उद्धव ठाकरे कोरोना कालावधीत आजपर्यंत जवळजवळ शांतच राहिले आहेत, या काळात त्यांनी अतिशय शांत मनाने महाराष्ट्रातील लोकांनाही संबोधित केले. त्यांनी कोणाबद्दल कधीच राग व्यक्त केला नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी कधीही केंद्र सरकारवर आरोप केले नाहीत. उद्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ऑक्सिजनची कमतरता किंवा औषधांचा अभाव किंवा प्लाझ्माचा अभाव असल्याचा आरोप करत कोणताही गोंधळ निर्माण केली नाही. कधीकधी त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना हे नक्कीच सांगितले की केंद्र सरकारने त्यांना दूरवरून ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली आहे.परंतु गोंधळ घालणारे किंवा तक्रार करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केले नाहीत. केंद्र सरकारच्या विरोधात कोर्टातही गेले नाहीत. मुंबई उच्च न्यायालय तर उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करीत आहे, जरी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळीही संपूर्ण देशातल्या सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण महाराष्ट्रातच आले होते. त्यावेळी एका दिवसाचा आकडा 35 हजारांहून अधिकवर पोहोचला होता. तर दुसर्‍या लाटेत ही आकडेवारी एका दिवसात 69 हजारांवर पोहोचली आहे, ही वेगळी बाब आहे की 8 मे रोजी चोवीस तासात 53 605 रुग्णांना संसर्ग झाला होता,तथापि संपूर्ण राज्यात एकूण सक्रीय रूग्णांची संख्या 8 मे रोजी 50 लाख 50 हजाराहून अधिक होती, फक्त मुंबईत 8 मे पर्यंत एकूण 1 लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. 7 मे रोजी आकडे खाली आल्यावर आरोप होत आहेत की महाराष्ट्रात गेल्या एक आठवड्यापासून तपासण्या कमी करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहिल्यास एका दिवसात 900 पर्यंत आकडे आले आहेत. 8 मे रोजीही 864 लोकांनी त्यांचे जीवन गमावले आहे.

काही लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या सभ्यतेला त्यांच्या शांत आणि सौम्य स्वभावाचे कारण मानतात. तर दुसरीकडे राजकारणाचे अनेक तज्ञ यास त्यांच्या सभ्यपणापेक्षा राजकीय विवशता संबोधतात. अरविंद केजरीवाल यांच्यासारखे उद्धव ठाकरे आपली पार्टी शिवसेनेच्या बळावर मुख्यमंत्री बनलेले नाहीत तर त्यांची खुर्ची राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर टिकलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नजरेत भाजप आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वाढलेली जवळीकही आहे. रेमडीसीर औषधाचे एक प्रकरण सोडले तर भाजपादेखील येथे फारशी आक्रमक नाही.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांप्रमाणेच ऑक्सिजन, औषध, बेडांचीही प्रचंड कमतरता आहे. कोरोनामुळे दररोज मृत्यू पावणाऱ्यांची संख्या इतर राज्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तरीदेखील राजकीय विवशतेमुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सेनापती म्हटले जाणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील केंद्र सरकारवर आक्रामक नाहीत. गंमतीची गोष्ट म्हणजे सारा मीडिया महाराष्ट्रातील परिस्थिती दर्शविणे सतत टाळत आहे.

चित्रपटसृष्टीबद्दल उपेक्षित व्यवहार

आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्रातील सरकारी तिजोरीच्या वाढीला सर्वाधिक हातभार लावणाऱ्या चित्रपटसृष्टीकडे उद्धव सरकार अत्यंत दुर्लक्षात्मक दृष्टीकोन अवलंबत आहे, तेही अशा वेळी जेव्हा काही लोक चित्रपट उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याच्या प्रयत्नात आहेत. चित्रपट उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारची काही विचारसरणी नाही, काही तज्ञांचे मानले तर सध्याच्या काळात ज्याप्रकारे मुंबईतील चित्रपटसृष्टीत भाजपा समर्थकांची संख्या वाढते आहे तेच याचे मूळ कारण आहे.

 

कोरोनाविरूद्ध जागरूकता अभियानाचा अभाव

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने पसरत राहिला, परंतु महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोरोनाविषयी किंवा कोरोना रोखण्यासाठीच्या  सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत जनजागृती मोहिमेकडेही लक्ष दिले गेले नाही. महाराष्ट्रात चित्रपटातील सेलिब्रिटींव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचाही  जमाव आहे, परंतु सरकारने या मोठ्या सेलिब्रिटींपैकी कोणालाही या मोहिमेचा भाग बनवले नाही.

उद्धव ठाकरे हे सोशल मीडियावर नायक राहिले आहेत

कोरोना साथीचा संसर्ग भले महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक असो, लोकांना बेड्स मिळत नसोत, लस मिळत नसो, सर्वसामान्यांचे जीवन रुळावरून घसरले असो, पण उद्धव ठाकरे सोशल मीडियावर नायक राहिले आहेत. मुंबई हायकोर्टाप्रमाणे सोशल मीडियावरही लोक उद्धव सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उचललेल्या पाऊलांचे कौतुक करताना थकलेले नाहीत. सोशल मीडियावर लोक उद्धव यांचे या गोष्टीबद्दल कौतुक करत आहेत की ते जनतेला संबोधित करतांनाही मोठ्या शांतपणाने बोलतात आणि सर्व आकडे आपल्यासोबत घेऊन बसतात. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांचे लंडनला पळून जाण्यामागेही लोक सोशल मीडियावर शिवसेनेला दोष देत नाहीत.

तथापि, कोरोना संक्रमणादरम्यान सामान्य माणसांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे, आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी कोरोना उपचार, लस, कॉरंटाइन सेंटर इत्यादी नियमितपणे चालू ठेवावेत, परंतु त्याचबरोबर बेरोजगारी आणि महागाई कमी करण्याच्या दिशेनेही पावले उचलावीत. अन्यथा असे होऊ शकते की देशातील कोरोनापेक्षा अधिक उपासमारीने लोक मरतील किंवा देशात लूटमार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होईल. तसेही आजकाल देशभरात लूटमार, घरफोडीच्या घटना मोठ्या वेगाने वाढल्या आहेत, ज्यांची एफआरआयदेखील नोंदली जात नाही. केवळ पोलिस डायरीमध्ये लिहून निघून जातात, ज्यामुळे या घटना ना माध्यमांत येत आहेत ना कुठल्या सरकारला याची योग्य माहिती मिळत आहे.

फिल्मी लोक मदतीसाठी पुढे आले

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सुरवातीच्या तीन महिन्यापर्यंत अनेक कलाकार आणि निर्मात्यांच्या संघटनांनी चित्रपट उद्योगातील कामगारांच्या मदतीसाठी आपले हात पुढे केलेत. पण कोरोनाची दुसरी लाट आणि १५ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनमुळे पूर्णत: बंद असलेल्या चित्रपट उद्योगातील कामगारांची कोणीही काळजी घेतली नाही. अक्षय कुमारने फिल्म इंडस्ट्रीतील कामगारांना मदत करण्याऐवजी दिल्लीतील भाजपा खासदाराची एन.जी.ओ. “गौतम गंभीर फाउंडेशन”ला एक कोटी रूपये दिले. पण अशा प्रसंगी सर्वप्रथम गायिका पलक मुछल पुढे आल्या.त्यांनी प्लाझ्मा, बेड्स, ऑक्सिजन इत्यादीसाठी प्रत्येक गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ऑक्सिजनच्या मदतीसाठी हात सरसावले. त्यानंतर अजय देवगण पुढे आले आणि हिंदुजा हॉस्पिटलसह मिळून शिवाजी पार्क येथील कोविड हॉस्पिटल तयार करण्याच्या कामास हातभार लावत आहेत. सोनू सूद स्वत:च्या मार्गाने लोकांना मदत करत आहेत. यश राज फिल्म्सने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 30,000 कामगारांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता सलमान खानने “फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज” च्या 25000 कामगारांना मदतनिधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एफडब्ल्यूआयसीई [FWICE] शी संबंधित 25 हजार सदस्यांना सलमान खान 1500 रुपयांची आर्थिक मदत करतील. सन  2020 मध्ये ही सलमान खानने कोरोनाच्या पहिल्या फेरीत एफडब्ल्यूआयसीईशी संबंधित कामगारांची मदत केली होती. त्याचबरोबर उर्वशी रौतेला यांनी 27 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स दान केले आहेत. शिल्पा शेट्टी आणि जॉन अब्राहम यांनीही काहींना मदत केली आहे. तर मनीष पॉल आणि ताहिरा कश्यप लोकांमध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी काम करत आहेत.

‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’चे अध्यक्ष बी एन तिवारी यांचे म्हणणे मान्य केल्यास आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स व निर्माते बॉडी गिल्डकडून आणि सिद्धार्थ रॉय कपूर व मनीष गोस्वामी यांच्याकडून 7,000 सदस्यांना पाच-पाच हजार देण्यात येतील. याशिवाय, ‘यश चोपडा फाऊंडेशन’च्या सौजन्याने, एफडब्ल्यूईसीशी संलग्न चार संघटना, अलाइड मजदूर युनियन, ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशन, महिला आर्टिस्ट असोसिएशन, जनरेटर व्हॅनिटी व्हॅन अटेंडंट असोसिएशन यांशी संबंधित कामगारांना, ज्या कामगारांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्या ज्येष्ठ कामगारांना पाच-पाच हजार रुपये दिले जातील आणि या चार संघटनांतील प्रत्येक सदस्याला कुटुंबातील चार सदस्यांच्या हिशोबाने  एका महिन्यासाठी आवश्यक खाद्यपदार्थ देण्यात येतील.

महिलांचे ऑर्गेज्म निषिद्ध नाही

* मदन कोथुनिया

नुकताच अन्य देशांत ‘वर्ल्ड ऑर्गेज्म डे’ साजरा करण्यात आला आणि यासंदर्भातील गोष्टी तेथे लोक मोकळेपणाने करतातही. मात्र भारतीय सेक्स आणि ऑर्गेज्मवर बोलताना तोंड लपवतात. बहुसंख्य लोक तर या विषयावर आपलाच साथीदार किंवा पार्टनरसोबतही बोलू शकत नाहीत. एक मजेशीर गोष्ट अशी की हिंदीत ऑर्गेज्मचा अर्थ लैंगिक पूर्ती सांगितला जातो, जो या शब्दाचा योग्य अर्थ नाही.

महिला आणि पुरुष दोघं एकमेकांपेक्षा शारीरिक रचनेत खूपच वेगळे आहेत. धर्मानुसार दोघांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणखीनच वेगळा आहे. जिथे पुरुषांना सर्व प्रकारची सवलत लहानपणापासूनच भेट म्हणून मिळते, तिथे महिलांना मात्र लहानपणापासूनच वेगळया प्रकारे वाढवले जाते. त्यांच्यासाठी कितीतरी प्रकारचे नियम तयार केले जातात. लहानपणापासून ते वयात येईपर्यंत त्यांना अशा प्रकारची शिकवण दिली जाते की त्या आपल्या शरीराशी संबंधित गोष्टी इच्छा असूनही सांगू शकत नाहीत.

जे पुरुषांसाठी योग्य ते महिलांसाठी चुकीचे का : जर एक महिला पुरुषाशिवाय संबंध ठेवून शारीरिक सुख प्राप्त करण्यास सक्षम असेल तर ही गोष्ट समाजाच्या पचनी पडत नाही. आम्ही येथे थेट मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथूनाबाबत बोलत आहोत, ज्याच्याबद्दल जास्तकरून मुलांना वयाच्या १० ते १२ वर्षींच माहिती होते. पण मुलींना वयात आल्यानंतरही याबाबत जास्त माहिती नसते. पुरुषाशी शारीरिक संबंध न ठेवताही शरीरसुख प्राप्त करू शकतात. ही गोष्ट त्या मैत्रिणींकडेही मान्य करत नाहीत. कारण समाजाने असे गृहित धरले आहे की पुरुषांसाठी मास्टरबेशन ठीक आहे पण महिलांसाठी चुकीचे आहे.

अशाच प्रकारे मास्टरबेशनवर बोलणे पुरुषांसाठी साधारण गोष्ट आहे, पण महिलांसाठी ती अशी गोष्ट आहे, जी तिची असूनही तिची नाही. खरंतर अशा मुद्यावर बोलणे खूपच गरजेचे आहे. हे जितक्या सहजपणे पुरुषांसाठी स्वीकारले गेले तेवढेच महिलांसाठी स्वीकारायला हवे.

मुली पीरियड्स, ब्रा या त्यांच्या सामान्य गोष्टींबाबत साहसाने बोलल्या तरी त्यांना पब्लिकली ट्रोल केले जाते. हे लज्जास्पद असल्याचे बोलले जाते. अशावेळी ऑर्गेज्म आणि तेही मुलींच्या ऑर्गेज्मवर बोलणे कल्पनेपलीकडचे आहे.

‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ अशा फिल्म आहेत, ज्यात महिलांशी संबंधित शारीरिक सुखाचा मुद्दा काहीसा उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारतीय पुरुषांनी यावर खुलेपणाने चर्चा करायचे सोडून या फिल्म आणि त्यातील अभिनेत्रींनाच ट्रोल केले आहे.

पुरुषांना हे माहीतच नाही : बहुसंख्य भारतीय पुरुषांना हे माहीतच नसते की महिलांचे ऑर्गेज्मदेखील तेवढेच मॅटर करते, जेवढे त्यांचे. प्रत्यक्षात इंटरकोर्स म्हणजे शारीरिक संबंधांच्यावेळी त्यांना याचा विचारही न येणे हे एकप्रकारे पितृसत्तेचे वर्चस्वच सांगते.

यावर जयपुरिया हॉस्पिटल, जयपूरच्या अधीक्षक विमला जैन यांचे म्हणणे आहे, ‘‘भारतीय पुरुषांना मुलींचे मास्टरबेशन यासाठीही पचनी पडत नाही, कारण त्यांना ते आपली सत्ता, पुरुषार्थावर आक्रमण वाटते. जेव्हा की अनेक संशोधनाअंती ६२ टक्के महिलांना ऑर्गेज्म मास्टरबेशनवेळीच होते. हादेखील अन्य सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रियांचाच एक भाग आहे. आरोग्यावर याचा थेट परिणाम होतो, पण भारतीय पुरूष हे कदाचितच समजू शकतील. त्यांना वाटते की ऑर्गेज्म ही पुरुषांच्या आधिकार क्षेत्रातीलच बाब आहे. महिलांसाठी सामाजिकदृष्टया निषिद्ध आहे.’’

या मुद्यांवर, लैंगिक शिक्षकाशी संबंधित पैलूंवर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी, जेणेकरून एका निरोगी आणि समानतेच्या समाजाची निर्मिती करता येईल. घरामध्ये महिला नेहमीच अस्वस्थ आणि तणावात राहू नयेत किंवा त्यांना अस्पृश्य असल्यासारखे वाटू नये तसेच त्यांनी अन्य रिस्क घेऊ नये यासाठी गरजेचे आहे की या गोष्टींवर कमीत कमी मुलींनी तरी आपसात खुलेपणाने बोलायला हवे.

लिव्हिंग रूममधील आरामदायी आसन व्यवस्था

* श्री.महेश एम., सीईओ, क्रिएटिसिटी

आपण एखाद्या घरात प्रवेश करतो, तेव्हा कोणती गोष्ट सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेते? ते समोरच्या भिंतीवरील जतन करून ठेवलेले दुर्मिळ पेंटिंगही नसते किंवा टाइल्स आणि त्यावरील कार्पेट. ती लक्ष वेधून घेणारी गोष्ट असते सोफा. तो सोफाच हे ठरवतो की ती त्या जागेमध्ये एखाद्याला किती आरामशीर वाटू शकते. फर्निचर आणि होम डेकोरच्या संभाव्य खरेदीदारांशी झालेल्या संवादामधून आणि दशकाहून अधिक काळची त्याची पसंती आणि सवयींच्या निरीक्षणावरून आमच्या असे लक्षात आले आहे की योग्य सोफ्याची खरेदी ही आजवर अत्यंत दुय्यम आणि त्यामुळेच सर्वात कठीण आव्हान आहे.

सोफ्याची डिझाइन

सोफ्याची अंतिम निवड करताना एखाद्याला नेमक्या कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते, हेही जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रथमत: आपल्या लिव्हिंग रूमला कसा लुक मिळायला हवा, हे ठरवणे महत्त्वाचे ठरते. क्लासी ते कंटेम्पररीपासून सोफ्याच्या डिझाईन्समध्ये ही क्षमता असते की ते एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे गोंधळात टाकू शकतात. हे वास्तव आपण समजून घेण्याची गरज असते की सोफ्यामध्ये अशी क्षमता असते की तो खोलीचा लुक आणि फील निश्चित करू शकतो. साहजिकच सोफ्याच्या डिझाइनची निवड ही त्या खोलीच्या एकंदर वातारवरणाशी सुसंगत आणि सोबतच त्या सोफ्यावर बसल्यानंतर माणसांची मान, पाठ आणि पायांनाही आरामदायी ठरेल. अशा प्रकारची असायला हवी. याव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टींबाबत माहिती घेतली पाहिजे. ती म्हणजे मटेरिअल कोणते आहे. आर्म रेस्ट कशी आहे. डायमेन्शन्स हे त्या खोलीला आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी अनुरूप ठरतात की नाही.

बजेटनुसार पर्याय

पुढील टप्पा आहे तो म्हणजे, आपले बजेट. बाजारपेठेमध्ये बजेटनुसार अनेकानेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे सोफ्यासाठी आपण किती खर्च करणार आहोत, याबाबत आपल्या मनामध्ये अत्यंत स्पष्टता असायला हवी. हे अशासाठी की ‘पॉकेट फ्रेंडली’ या शब्दाचा अर्थ प्रत्येक खरेदीदारानुसार बदलत असतो. कुटुंबाचा आकार हादेखील सोफ्याची निवड करतानाचा तितकाच महत्त्वाचा निकष असतो. जर तो ३+२ असेल तर मग त्याची लांबी किती असणार? तो खोलीमध्ये खूपच मोठा वाटेल का? एखाद्या कुटुंबाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर हे असे अनेक प्रश्न सुयोग्य उत्तर मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

याशिवाय सोफ्याच्या कार्यक्षमतेविषयी किंवा उपयुक्ततेविषयी स्पष्टता असणे आवश्यक असते. जो आराम त्या सोफ्यामुळे मिळतो, जेवढा वेळ आपण सोफ्यावर घालवतो यासारखे इतरही काही मुद्दे हे आपल्याला त्या सोफ्याची उपयुक्तता ठरविण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. पर्यायवरणीय परिस्थिती लक्षात घेता सोफ्यासाठी वापरले जाणारे साहित्य ठरवता येते, जसे की धूळ नसलेले वातावरण असेल तर कुणीही सहजपणे फॅब्रिक सोफ्याची निवड करू शकतो. त्या कुटुंबाची पसंती, वापर आणि पर्यावरण या अनुषंगानेही लेदर, हाफ लेदर उदा. पर्यायही उपलब्ध असतात.

सोफा खरेदी करण्यापूर्वी

सर्व प्रकारच्या निकषांचा विचार हा सोफा खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वीच करायला हवा. शिवाय खरेदीचे ठिकणही सर्वसमावेशी अशाच प्रकारचे असावे. सोफा अर्थ म्हणजे, कोणी सोफ्याचे अनेक प्रकार असलेले ठिकाण निश्चित करेल. ज्यामधून सर्जनशीलतेला बळ मिळेल. तर कोणी घराचा विचार करेल. वैविध्यापेक्षाही त्या उत्पादनाचा ‘टच अॅन्ड फिल’ हादेखील महत्त्वाचा घटत असू शकतो. म्हणून ऑर्डर देण्यापूर्वी गरजेची असलेली सर्व महिती नीट तपासून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, योग्य त्या सोफा खरेदी करण्यापूर्वी सर्व टीप्सचा विचार केला तर तो व्यवहार पूर्ण होण्यास मदत होऊ शकेल. म्हणूनच कोणी युरोपियन, अमेरिकन, एशियन, किंवा भारतीय शैलीच्या सोफ्यांना पसंती देत असेल तर त्यांनी सर्व घटकांचे मिश्रण असलेल्या ठिकाणाची काळजीपूर्वक निवड केली पाहिजे.

सोफ्याची देखभाल

योग्य सोफ्याची निवड केल्यानंतर त्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. व्यावसायिकदृष्ट्या सोफ्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने, कंपनीची सेवा घ्यायला हवी. जेणेकरून सोफ्याची स्वच्छता आणि चकाकी उपयुक्तता टिकून राहू शकेल. हे नेहमी लक्षात ठेवायला हवे की सोफा हा एखाद्याच्या घरातील लिव्हिंग रूममधील कम्फर्ट तर दर्शवतोच, शिवाय एखाद्या कुटुंबाच्या व्यक्तिमत्त्वाचेही प्रतिबिंब दाखवतो. घराची देखभाल ठेऊ शकणारे आणि घरापर्यंत येऊन सेवा देऊ शकणाऱ्या ‘शॉपिंग डेस्टिनेशन’ची निवड आपण करणेही महत्त्वाचे असते. जर या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर आपल्या सोफ्याची देखभाल करण्याची काही काळजी करावी लागत नाही.

पुण्याची बाजारपेठ ही एकल कुटुंब पद्धतीच्या रचनेसह वेगाने वाढत आहे. शिवाय रिअल इस्टेट आणि स्थलांतरीत लोकसंख्येमुळे होम फर्निचर खरेदीमध्ये मोठीच वाढ दिसून येत आहे. आज फर्निचर खरेदी ही अनुकूल जागेच्या दृष्टीकोनापेक्षाही त्या उत्पादनाचा दर्जा आणि त्या उत्पादनाचे प्रेरणादायी मूल्याहून अधिक म्हणजे डिझाईन आणि सौंदर्य यासह काहीसे पण क्वर्की नाविन्यपूर्णतेवर भर देणारी अशीच आहे.

म्हणूनच आजच्या काळात कोणाही सहजपणे त्यांच्या सोफ्यावर आराम करत नितांत राहू शकतो.

नववर्षात आनंदी जीवन जगण्याची २० सुत्रं

* सोमा घोष

यशस्वी आणि आनंदी जीवन सर्वजण जगू इच्छितात, पण कोणीही जीवनातील चढउतारांना सामोरं न जाता हे जगू शकत नाही, कारण जीवन आहे म्हटल्यावर नकारात्मकता तर येणारच. जरूरी नाही की हरक्षणी तुम्हाला सफलता मिळेल वा आयुष्यात कायम तुम्ही सुखी राहाल. जीवनातील कोरोनाच्या महामारीच्या अशा कठिण परिस्थितीमध्ये ताळमेळ कायम राखणं खूप जरूरी असतं. हा समतोल मेंदू आणि शरीराच्या माध्यमातूनच राखला जातो, पण कसा? नवीन वर्ष २०२१ येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो अशी २० सुत्रं, ज्यांचा अवलंब करून तुम्हीही आनंदी अन् सुखी जीवन जगू शकता.

  1. जीवन आपल्याला जगायच्या अनेक संधी उपलब्ध करून देते, ज्यांना जीवनात योग्य प्रकारे उतरवून व्यक्ती पुढे जाऊ शकते. जर काही कारणामुळे ही संधी हातून निसटली, तर निराश व्हायची गरज नाही. कारण यामुळे पुढे येणारी संधी तुम्ही गमावू शकता, नेहमी आपले लक्ष वर्तमानावर ठेवा.
  2. स्वत:साठी जगा, इतरांसाठी नाही. स्वत:वर प्रेम करा, तुम्हाला तुमचा आनंद कशात आहे हे ठरवावे लागेल. स्वत: वर प्रेम करणाराच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो.
  3. आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत चांगला वेळ घालावा. एखाद्या सण किंवा आनंदी प्रसंगी त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा.
  4. एखाद्याबाबत गैरसमज झाला असेल तर तो एकत्र बसून दूर करा, कारण जोशात येऊन आपण बोललेले एखादे वाक्य इतर कोणाच्या मनाला लागू शकते.
  5. आयुष्यात नेहमी काही नवे शिकण्याचा प्रयत्न करा, शिकणे थांबवले तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे पडू शकता.
  6. आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नका. एखाद्याला जर काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्याला मदत करा आणि त्या मोबदल्यात काही मिळावे असा प्रयत्न करू नका.
  7. जर एखादी व्यक्ती तुम्हाला नावे ठेवत असेल, तर त्याच्यापासून दूर राहिलेलेच बरे. शक्य असेल तितकं त्याच्या चुका माफ करा.
  8. जर काही समजवायचे असेल तर योग्य प्रकारे संवाद साधून समजावण्याचा प्रयत्न करा.
  9. जीवन सोपे नसते. नकारात्मकता तुमच्या सभोवताली कायम असली तरी त्यातही सकारात्मकता शोधा.
  10. आयुष्यात लोकांना महत्व द्यायला शिका. मजबूत नातीच तुमच्या मनाला स्वस्थ आणि मजबूत बनवतात, ज्यात आईवडील, सख्खे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने सहभागी होणे खूप जरूरी आहे. पण योग्य मित्रांची निवड करणे खूप मह्त्वाचे असते. जर मित्र योग्य असतील तर ते तुमचे आयुष्य आनंदाने भरून टाकतील. पण विश्वासघातकी आणि अप्रामाणिक मित्र तुमचे जीवन खराब करु शकतात.
  11. आपल्या भूतकाळातून बाहेर पडून वर्तमानकाळात जगायचा प्रयत्न करा टीकेचा सामना करण्याची क्षमता बाळगा.
  12. चूका स्वीकारायचे धैर्यसुद्धा दाखवा आणि त्यातून शिका. कोणाला त्यासाठी जबाबदार ठरवू नका.
  13. ऐकण्याची क्षमता वाढवा, यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्येचे समाधान लवकर शोधता येईल.
  14. धन तुम्हाला आनंद देते, पण त्याने आपल्या आनंदाचे आकलन करू नका. मेहनत आणि कमिटमेंटने केलेले प्रत्येक काम धन घेऊन येते.
  15. गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करा.
  16. आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे नवीन वर्षात लक्ष ठेवा. जर एखादा आजार तुमच्या आसपास असेल तर त्यासाठी नियमित शारीरिक चर्चा आणि औषधांचे सेवन करा, कारण स्वस्थ शरीरातच स्वस्थ मानसिक अवस्थेचा वास असतो.
  17. जीवनाच्या वेगासोबतच आपल्या शरीराला आराम द्यायची गरज असते, यासाठी व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ काढून आपल्यासाठी ठेवा आणि त्यात जे तुम्हाला आवडेल, ते करायचा प्रयत्न करा.
  18. अनेक जण रोजच्या व्यस्त आयुष्यात आपले छंद विसरून जगत असतात, त्यांनी आपले छंद पूर्ण करायला वेळ नक्कीच काढावा, जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनातील नीरसता नाहीशी होईल.
  19. जीवन खूप किचकट असल्यामुळे नकारात्मकता तुमच्या आसपास नेहमी असते. अशावेळी योग्य मार्ग निवडणे कित्येकदा कठीण असते. लोक तुम्हाला सकारात्मक विचार करण्याचा सल्ला तर देतात, पण त्यातून सहीसलामत बाहेर पडणे कठीण असते. अशावेळी एखाद्या तज्ज्ञाचे मत घेणे काही वाईट नाही.
  20. अधिकाधिक हसायचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे जीवन खूप प्रमाणात सोपे होईल. काही लोक सकाळी उठून ५ मिनिटं हसत राहतात, असे केल्याने दिवस छान जातो.

डेस्टिनेशन वेडिंग – विवाहसोहळा बनवा अविस्मरणीय

* गरिमा पंकज

डेस्टिनेशन वेडिंग म्हणजेच वेडिंगच्या वेळी संपूर्ण धमाल-मस्ती आणि रोमांचक क्षण. आजकाल सेलिब्रिटी असोत किंवा सामान्य माणसे सर्वजण आपल्या विवाहाच्या क्षणांना स्मरणीय आणि आनंदी बनविण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंगची निवड करतात.

अलीकडेच चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीचे डेस्टिनेशन वेडिंग खूप चर्चेत होते. विवाहसोहळा इटलीमध्ये संपन्न झाला होता. आपला खास मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना सहभागी करून, फेअरी टेल थीमनुसार त्यांनी आपले सात फेरे स्मरणीय बनविले.

वेडिंग कन्सल्टंट आणि मेकओव्हरच्या क्षेत्रात नाव कमावलेल्या आशमीन मुंजालने नुकतेच आपली मुलगी ऐनी मुंजालसह मिळून वेडिंग आपल्या व्हेंचर स्टार्सट्रक वेडिंगची सुरुवात केली आहे.

वेडिंग डिझायनर म्हणून आशमीन मुंजाल सांगते की डेस्टिनेशन वेडिंगचा अर्थ, आपले घर आणि शहरापासून दूर (कमीतकमी १०० मैल) एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन विवाहसोहळयाचा कार्यक्रम संपन्न करणे. इथे वर-वधू आपले कुटुंब, निवडक नातेवाईक आणि मित्रांसोबत ३-४ दिवस क्वालिटी टाइम घालवतात. कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा हा प्रयत्न असतो.

थीमवर आधारित डेस्टिनेशन वेडिंग

डेस्टिनेशन वेडिंग कोणत्या ना कोणत्या विशिष्ट थीमवर आधारित असते. विवाहाच्या वेगवेगळया कार्यक्रमांसाठीही वेगवेगळ्या थीम निवडल्या जाऊ शकतात. काही मुख्य थीम आहेत- हवाईन थीम, बॉलीवूड थीम, रजवाडा आणि मोगल थीम, फेयरी टेल थीम, जंगल बुक थीम, वॉटर, कोरल आणि रेड कारपेट थीम.

लोकेशनची निवड

आपली इच्छा असेल तर आपण शहराच्या आजूबाजूच्या लोकप्रिय लोकेशनची निवड करू शकता. उदा. गोवा, केरळ, जयपूर, आग्रा, उदयपूर वगैरे किंवा मग परदेशी लोकेशन्स उदा. मॅक्सिको, हवाई, युरोप, दुबईसारख्या ड्रीम प्लेसेसपैकी एखादे स्थान, जे आपल्या बजेटमध्ये असेल, त्याची निवड करू शकता.

आशमीन सांगते की डेस्टिनेशन वेडिंगचा अर्थ असा नव्हे की, तुम्हाला तुमचा खिसा जास्त सैल करावा लागेल. आपण प्रत्येक बजेटमध्ये आपल्या मनपसंत विवाहाचा आनंद घेऊ शकता.

२ लाखांपेक्षा कमी बजेट असेल तेव्हा : फालतू खर्च न करता आपण कमी बजेटमध्येच जास्तीतजास्त रोमांचक विवाहसोहळयाचा आनंद लुटू शकता.

वेन्यू : आजूबाजूचे बँक्वेट हॉल, फार्म हाऊस, कमी बजेटमधील व्हिला इ. खूप पर्याय असतात. जिथे जास्त सजावटीचीही आवश्यकता नसते. रात्रीऐवजी दिवसा विवाहसोहळा पार पाडला, तर विजेचा खर्च वाचविता येऊ शकतो. गरमीच्या दिवसांत संध्याकाळच्या वेळी ओपन एरियामध्ये विवाहाचा कार्यक्रम ठेवून वायफळ तामझम टाळता येऊ शकते.

सजावट : सजावटीचे काम खऱ्या फुलांऐवजी कृत्रिम फुलांनीही करता येऊ शकेल. यात पैसे कमी लागतील आणि शोभाही वाढेल. अशा प्रकारच्या सजावटीसाठी रिबन, गोटा, पेपरवॉल, ग्लास फ्लॉवर, आर्टिफिशयल प्लांट इ. चा वापर करून कमी खर्चात सुंदर दृश्य साकार केले जाऊ शकते.

कॅटरिंग : मांसाहाराऐवजी शाकाहारी जेवण कमी किंमतीत तयार होते. शाकाहारी जेवणात अनेक व्हरायटी मिळतात.

ढोलासोबत डीजे : डीजे महागडा असावा, हे आवश्यक नाही. राजस्थानी थीम घेतली, तर ढोल-टाळांच्या साथीने उत्तम संगीताचा आनंद घेता येऊ शकेल.

थीम : राजस्थानी थीम घेतला, तर प्रत्येक प्रकारचा खर्च कमी करता येईल. उदा. पाहुण्यांना बसण्यासाठी सोफे, खुच्यांएवजी चौरंग आणि झोपाळयांचा वापर होतो. पाहुण्यांसाठी पगडया भाडयाने घेता येऊ शकतील. साडया आणि लहंगाचोळीही भाड्याने मिळते. जयपुरी थीमनुसार वधुचा लहरिया लेहंगासुद्धा जास्त महाग नसतो. दागिनेही आर्टिफिशल वापरता येतील.

व्हिडीओग्राफी : आठवणी जपून ठेवायच्या असतील तर व्हिडीओग्राफर आणि कॅमेरामॅन विवाहसोहळयातील आवश्यक व्यक्ती आहेत. हे कामही कमी खर्चात होऊ शकते. विवाहाच्या दिवशीच सिंपल व्हिडीओग्राफी करता येऊ शकेल. यामुळे प्रीशूटचा खर्च वाचू शकतो.

३० लाखांपर्यंतचा विवाहसोहळा

३० लाखांच्या विवाहसोहळयात आपल्याकडे खूप पर्याय असतात. आपण आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकता.

वेन्यू : आपली इच्छा असेल तर आपण जवळपास २०० लोकांसाठी मानेसर, अलवर, जयपूर, दिल्ली, एनसीआरमध्ये फार्महाउस, फाइव्ह स्टार हॉटेल वगैरे बुक करू शकता.

थीम : आपण मोगल थीम, व्हिक्टोरियन थीम, इटालीयन थीम इ.ची निवड करून लॅविश अरेंजमेंटचा आनंद घेऊ शकता. थीमनुसारच आपल्याला जेवणही सर्व्ह केले जाईल.

वेगवेगळया फंक्शनमध्ये वेगवेगळे थीम प्ले होऊ शकतात. मॅजिकल अलादीन नाइट, बॉलीवूड नाइट, ओम शांति ओम, इटालियन हवाईन, एंजिल्स अँड डेव्हिल्स, फ्रेंचवीरा यांसारख्या अनेक थीम आहेत. त्यांचा आनंद घेता येऊ शकेल.

वाटल्यास वर-वधुचा ड्रेस जोधा-अकबर स्टाईलमध्ये ठेवता येऊ शकेल.

कॅटरिंग : आपण एवढया बजेटमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे भोजन अनेक व्हरायटींसह ठेवू शकता.

पैसा खर्च करून वेडिंगची इच्छा असेल, तर आपण थायलँड, मॉरिशस, दुबई, मॅक्सिको, इटली, स्वित्वझर्लंड यांसारख्या ठिकाणी लॅविश अरेजमेंट करून, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता.

या विवाहांमध्ये आपण सिंगर्स, टेलिव्हिजन स्टार्स, मॉडेल्स, बॉलीवूड स्टार्सपासून ते इतर सेलिब्रिटीजनाही गेस्ट म्हणून किंवा परफॉर्मर म्हणून बोलावू शकता.

सिक्युरिटीपासून ते गेस्ट हँडलिंग, व्हिडीओग्राफी, प्रीवेडिंग शूट आणि मिडियामध्ये प्रचार इ. सर्व जबाबदाऱ्या वेडिंग प्लॅनरच्या असतात.

युनिक वेडिंग टिप्स

आपण नेहमी अशा विवाहसोहळयाचे स्वप्न पाहतो, जो कायम आपल्या आठवणीत राहील. मॅरेज एक्सपर्ट शिजिनी चावला सांगते की काही सोप्या पद्धती आपल्या विवाहसोहळयाला स्पेशल बनवतील.

निमंत्रणपत्रिका : लग्नामध्ये रचनात्मक निमंत्रणपत्र आजच्या काळाची मागणी आहे. मखमली कागदाचे गोल्डन कार्ड्स आता बोरिंग झाले आहेत, ज्यामध्ये केवळ आपल्या उपनावांची स्पेलिंग लिहिलेली असते. अशा प्रकारच्या कार्ड्समध्ये कपलच्या नावाशिवाय त्यांच्याबद्दल काहीही लिहिलेले नसते. व्यवहारिकदृष्टया हे काम एक एसएमएस पाठवूनही होऊ शकते.

थोडे रचनात्मक बना : आपल्या निमंत्रणपत्रात याबाबतही माहिती द्या की आपण कोण आहात. आपल्या होणाऱ्या जीवनसाथीमध्ये काय स्पेशल आहे, कार्डमध्ये एक छानशी कविता टाकून त्याची किंमत वाढवा.

आपली कहाणी सांगा : आपण विवाहस्थळाचे प्रवेशद्वार किंवा मग सर्व ठिकाणी स्क्रिन, फोटो फ्रेम्स टांगू शकता. त्यामध्ये एकापाठोपाठ एक येणारे फोटो असू शकतात. हे मोठया स्क्रिनवर बॉलीवूड गाण्यावर चालणाऱ्या शो रीळपेक्षा उत्तम असेल.

पाहुण्यांचे स्वागत अविस्मरणीय बनवा : आपले पाहुणे जेव्हा विवाहस्थळाच्या ठिकाणी प्रवेश करत असतील, तेव्हा त्यांचे वय, लुक, ड्रेस इ. वर आधारित काही मस्त व खास गाणी वाजवा. त्यांना खास अनुभव द्या.

मंडपाचे डिझाइन : मंडपही स्पेशल असला पाहिजे. याला फ्लोरल लुक देऊ शकता किंवा मंडपाच्या भिंतींवर कपल्सचे फोटो लावू शकता.

मेंदी : आपल्या मेंदीमध्ये काहीतरी वेगळे करा. आपल्या पारंपरिक मेंदीबरोबरच पाहुण्यांसाठी नेल आर्ट आणि हँड आर्टबरोबरच मेंदी लावा.

पेहराव : विवाहांमध्ये लाल ब्रायडल लेहंगा आणि क्रीम शेरवानी सामान्य पेहराव आहे. आपण काहीतरी वेगळे आजमावून पाहा. जमदानी वर्कपासून इक्कत सिल्कपर्यंत पारंपरिक एम्ब्रॉयडरीची मागणी आहे. काहीतरी अनोखे ट्राय करा.

कलर थीम : आपल्या विवाहामध्ये एक थीम आणि कलर स्कीम निवडा. पाहुण्यांनाही खास कलर किंवा स्टाइलचे कपडे घालून येण्यास सांगू शकता.

सजावट : सजावटीत रचनात्मकता आणा. उदा. विवाहस्थळांमध्ये कंदिलांच्या रूपात टांगलेल्या फुलांच्या गुच्छांमध्ये लावलेले बल्ब सुंदरही दिसतील आणि रचनात्मकही.

वेडिंग टीप्स

लग्नाचे प्लान करताना या गोष्टीची काळजी जरूर घ्या :

* वेडिंगसाठी इनडोर अरेजमेंट किंवा आउटडोर अरेजमेंटपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. आपण काही विधी इनडोर ठेवणे व काही विधी आउटडोर ठेवणे उत्तम होईल. अर्थात, साखरपुडयासाठी संपूर्ण विधीसाठी इनडोर अरेजमेंट असणे चांगले ठरेल. परंतु मेंदीसारख्या विधी आउटडोरच चांगल्या वाटतात. पूल साइट किंवा लॉनच्या मोकळया वातावरणात मेंदी, संगीत इ.चा आनंद लुटणे काही निराळेच असते.

* फ्लोरल रेंजमध्येही अशा फुलांची निवड करा, जी लवकर खराब होत नाहीत. उदा. आर्किड, लिली वगैरे.

* कार्यक्रमाची वेळही योग्य निवडली पाहिजे. दुपारी १२ ते ३ पर्यंतची वेळ शक्यतो टाळा. लेट इव्हिनिंग फंक्शन छान एन्जॉय करता येतील.

* आपल्या पाहुण्यांना अशा अविस्मरणीय भेटवस्तू द्या, ज्या ते उपयोगात आणतील. सनग्लासेस, मुलांच्या कलरफुल कॅप यासारख्या भेटवस्तू उपयोगी सिद्ध होतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें