* शांतिस्वरूप त्रिपाठी

कोरोना पसरविण्यास महाराष्ट्र सरकारचा निष्काळजीपणा

कोरोना साथीच्या आजारामुळे देश संकटात सापडला आहे. मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांची छाया हरवली जात आहे. पालक आपली मुले गमावत आहेत. स्त्रिया विधवा होत आहेत. यातून दक्षिण भारतातील महाराष्ट्र राज्य देखील अस्पृश्य राहिलेले नाही. महाराष्ट्राची गणना ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध राज्यांमध्ये केली जाते. असे असूनही कोरोनामुळे आतापर्यंत 75000 (पंच्याहत्तर हजार) लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. याचा परिणाम म्हणजे बऱ्याचशा कुटुंबात मुले राहिले नाहीत तर अनेक कुटुंबांमध्ये विधवांची संख्या वाढली आहे. बर्‍याच मुलांच्या डोक्यावरुन पालकांची सावली हरवली आहे. परंतु कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबासाठी केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही काहीही केले नाही.

महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी मानली जाते हे आपण विसरू नये. पुणे हे शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र मानले जाते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, पालघर, नागपूर येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे. मुंबई, नागपूर, पुणे ही सर्वात विकसित शहरे आहेत असे असुनही ही परिस्थिती ओढावलेली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे (पुणे शहर हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.) नागपूर, ठाणे, पालघरसह अनेक शहरे व जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट आरोग्य सुविधा आहेत.

लोकांचे जीवन पुन्हा रुळावर येण्यापूर्वीच गडगडले

राजकारणी, उद्योगपती, मोठं-मोठी चित्रपट व्यक्तिमत्त्वे इ. कोरोना साथीच्या परिणामापासून बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहिले आहेत. ही वेगळी बाब आहे की या आजारामुळे काही लोक नक्कीच काळाच्या जबड्यात सामावले. परंतु कोरोना महामारीमुळे 25 मार्च 2020 पासून सर्वसामान्य लोक, नोकरदार लोक, छोटे-छोटे व्यापारी आणि उद्योग-व्यवसाय यांवर अशा प्रकारे मार पडली आहे की त्यांचे जीवन आजही रुळावर येऊ शकले नाही. जानेवारी २०२१ पासून सगळ्यांचे जीवन हळूहळू रुळावर परतण्यास सुरुवातच झाली होती की तेवढ्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्यास सामोरे जाण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे लोकांचे जीवन पुन्हा रुळावर येण्यापूर्वीच त्यांचे आयुष्य उखडले. महागाई शिगेला पोहोचली आहे. 15 एप्रिलपासून लॉकडाउन लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यभरात चित्रपटसृष्टी, दागिन्यांच्या बाजारपेठा, पोलाद भांडी उद्योग, बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेले लोक तसेच सर्व कामगार, रोजंदारीवरील कामगार, फेरीवाले आणि नोकरी व्यवसाय करणारे लोक इत्यादींसमोर पुन्हा एकदा दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न उभा ठाकला आहे. आपल्या जीवनाचे जहाज पुढे कसे रेटावे हे कोणालाही कळत नाही? सरकारकडेही याचे कुठले उत्तर नाही.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...